मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुलवामा : काही प्रश्न

गामा पैलवान ·

या हल्ल्यामुळे सर्व सुरक्षासंस्था (सैनिकी, निमसैनिकी आणि मुलकी) चिडलेल्या असणारच. मात्र, कोणतीही सक्षम आणि विकसित व्यक्ती अथवा संस्थेची प्रतिक्रिया चिडीची व प्रतिक्षिप्त (नी जर्क) नसते. ते काम पूर्ण विचारांती आणि आपण ठरवलेल्या वेळ, स्थळ आणि पद्धतिने करायचे असते... तसे केले तरच स्वतचे शून्य/कमीत कमी नुकसान व शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान/बिमोड करणे शक्य असते. डोके गरम करून केलेली कृती स्वतःचेच जास्त नुकसान करते. पंतप्रधानांनी, त्यासंबंधी आज आणि अगोदरही अनेक संकेत दिलेले आहेतच. तेव्हा, शत्रूची आणि स्वतःची कशी परिस्थिती आहे हे माहीत नसता, उगा तर्क/वितर्क न करता थोडीशी कळ सोसणे आणि नंतर घडलेली सत्य परिस्थिती पाहणे हेच उचीत ठरेल. केवळ, "माझ्या मते काय कृती करावी" असा अपुर्‍या माहीतीवर आधारलेली (uninformed) मागणी/विधान करायचे असले तर, ठीक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@ गामा पैलवान तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणे सुरू झाले आहे... मात्र, ही फक्त चांचणी परिक्षा आहे. ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यामधले दोन गर्भित संदेश जाणून घेण्याजोगे आहेत... १. उध्वस्त केलेल्या ३ अतिरेकी कँप्सपैकी एक बालाकोट येथिल कँप पाकिस्तानी भूमीवर (पाकव्याप्त काश्मीरमध्ये नाही) आहे (म्हणजे होता, आता १००० किलो वजनांच्या लेझर गायडेड बाँब्जनी नष्ट झाला आहे). ३. एकूण सुमारे २४५ अतिरेकी मारले गेले आहेत. त्यांत, कंदाहार विमान अपहरणात सामील असलेला, मसूद अझरचा जवळचा नातेवाईक मारला गेला आहे. ३. इतकी मोठी सैनिकी कारवाई झाली असूनही पंतप्रधानांनी त्यांचा आजचा एकही कार्यक्रम बदलला नाही. यामधील, त्यांची राजस्थानात चुरू येथे असलेली सार्वजनिक राककिय सभा सुरू झाली आहे. हा पाकिस्तानला, "तू चिलट आहेस. तुला भारत सहज चिरडू शकतो. आजची कारवाई आमच्यासाठी फार साधी आहे.", असा संदेश आहे.

दिगोचि 16/02/2019 - 05:26
प्रथम म्रुत जवानाना श्रद्धान्जली. सरकार त्यान्च्या कुटुम्बियान्ची उत्तम सोय करेलच ही खात्री आहे. या हल्ल्यात वापरलेली ३५० किलोग्राम स्फोटके काश्मिरात कोठून व कशी आली किसाठवली होतीम्वा येऊ शकली याचा शोध करणे जरूर आहे. तसेच ती आल्यावर कोठे साठवली होती. तसेच इन्टरनेटवरून कोणाशी सम्बन्ध होते हे पण जाणणे जरूर आहे. पाकीस्तानवर हल्ला करायचा असेल तर तो पूर्ण विचार करून करावा. असा हल्ला केला तर त्यासाठी पाकिस्तान तयार असेल व त्यात अनेक सैनिक शहिद होतिल त्याचा परिणाम सरकारवर पर्यायाने मोदीवर म्हणजे होणार्या निवडणुकीवर होईल. सध्या तरी पाकिस्तानवर इतर राष्ट्राकडुन दडपण आणणे, पाकिस्तानी नागरीकाना व्हिसा देणे बन्द करणे वगैरे उपाय करावे.

Rajesh188 16/02/2019 - 08:27
निमलष्करी दल आसेल किंवा लष्करी दल आसेल जेव्हा ऐका जागेवरून दुसऱ्या जागेकडे पाठवले जाते तेव्हा त्याचे नक्कीच काहीतरी नियम आसतात .त्यात काश्मीर हा सवेदनशिल भाग आहे म्हणजे तिथे अजून कडकं नियम असणार.पण हयात ज्या मार्गे फोर्स प्रवास करणार आस्ते तो रस्ता सुरक्षित आहे का ह्याची तपासणी केली जाते तशी आता पण केली असणार . ज्या हायवे ज्या चेक पोष्ट होत्या त्या काही कारणाने local सरकारनी हटवल्या होत्या आस मी वाचलं आहे . आणि आपल्याकडे संसाधन ची कमी असल्या मुळे रस्ता खराब जरी आसेल तरी हवाई मार्गे सैन्य पाठवायला मर्यादा आहे . आता ह्या हल्ल्या नंतर जी कारवाई होईल ती गुप्त असणार आणि आसली पाहिजे .आणि हा विषय राजकारणासाठी कोणीच वापरू नये ह्या मध्येच देश हित आहे

In reply to by Rajesh188

ज्या हायवे ज्या चेक पोष्ट होत्या त्या काही कारणाने local सरकारनी हटवल्या होत्या आस मी वाचलं आहे . हे मुख्य दुखणे आहे, जे हितसंबंधी माध्यमे जनतेसमोर आणत नाही. काही काळापूर्वी, जम्मू-कश्मिरमध्ये, बॅरिकेड उभारण्यासाठी कडक नियमावली होती. त्या वेळेस स्वतःला महत्वाचा समजणारी एक व्यक्ती (आता नाव आठवत नाही) बॅरिकेडवर थांबणे म्हणजे अपमान समजली आणि तिने दोन बॅरीकेड्सना धडक देऊन गाडी पुढे काढली. तिसर्‍या बॅरिकेडला तो धडक मारत असताना तेथे असलेल्या सुरक्षासैनिकाने, अर्थातच, त्याच्यावर गोळीबार केला. त्यात ती व्यक्ती मरण पावली. या घटनेवर, त्याकाळी मुख्यमंत्री असलेल्या मेहबुबा मुफ्ती आणि (अर्थातच) मानवतेच्या तथाकथित पाठीराख्यांनी, गदारोळ केला. त्या सुरक्षासैनिकावर खटला भरला गेला आणि त्याला शिक्षा होऊन तो आता (बहुदा तिहार) तुरुंगात खितपत पडला आहे. त्यानंतर, Confidence building च्या नावाखाली सुरक्षादलांच्या बॅरिकेड्स उभारण्याच्या कृतीवर लक्षणीय बंधणे घालण्यात आली. इतर कारणांबरोबरच या कारणामुळे, पुलवामा येथे, अतिरेक्याला कॉन्व्हॉयच्या जवळ जाणे शक्य झाले. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता बॅरिकेड्सचे नियम परत कडक केले जात आहेत, अश्या बातम्या आहेत.

In reply to by अर्वाच्य

Blackcat 19/02/2019 - 20:09
https://www.indiatoday.in/fact-check/story/fact-check-viral-claim-that-mehbooba-sent-army-jawans-to-tihar-is-false-1459230-2019-02-18 Fact Check: Viral claim that Mehbooba sent Army jawans to Tihar is false BJP leader Subramanian Swami also claimed that the "army jawans were prosecuted and are still in jail". घटना झाली , केस झाली , गोळी घालणार्याला तिहारला नेलेदेखील , रेशीमरेघी मंद लोक खोट्या बातम्या लिहितात की जावेद अख्तरच्या सिनेमाची स्टोरी !!! तीन तासात स्टोरी खल्लास!! अजून एका बातमीत , न थांबणार्या जीपवर सुरक्षाकर्मिने टायरवर गोळी झाडली , पण त्यात काही आक्षेपार्ह मिळाले नसल्याचे दिले आहे,

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

राजाभाऊ 20/02/2019 - 06:38
काळीमाऊ, तुम्ही दिलेल्या लेखातलाच हा परिच्छेद - >>We reached out to Gen. Bakshi about the claims that he made during the TV show. He admitted that he was wrong about his claim regarding the armymen languishing in jail. However, he insisted that the PDP government was responsible for relaxing the security checking procedures in the Valley which were earlier being followed. व्हेन यु अँड दि सो कॉल्ड प्रेस्टिट्युट्स आर गोइंग टु अ‍ॅडमिट/नोटिस एलिफंट इन दि रूम? इथे महत्वाचं काय आहे - जवानाला झालेली (किंवा न झालेली) शिक्षा कि सिक्युरिटी लॅप्समुळे घडलेली दुर्घटना? सेना दलांच्या बाबतीत तरी हा चूक/तो चूक या पक्षिय राजकारणांतुन वर उठण्याचा प्रयत्न करा...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अर्वाच्य 20/02/2019 - 12:51
https://goo.gl/uP1CcQ दिलेलि लिन्क शन्तपने शेवटपर्यंत वाचा. आपले महामहिम ह्याच घटनेसाठी स्वतः श्रेय घेतांना दिसतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शब्दबम्बाळ 20/02/2019 - 13:50
मोदी सरकार पुलवामाच्या घटनेला कसे जबाबदार नाही हे दाखवण्याचा समर्थकांचा/भक्तांचा आटापिटा बघून कीव येते बिचाऱ्याची! आधी कुठलीही योजना मनासारखी झाली नाही कि काँग्रेस वरती ढाकळायचं धोरण होत आता हा हल्ला होऊन इतके जवान शहीद झाले तरी याना आपली कातडी वाचवायचं पडलं आहे फक्त! आणि इतर वेळी आम्ही कोणाचे झेंडे घेऊन फिरत नाही म्हणणारे मिपाचे विद्वान लोक हळूच "फेक न्यूज" ढकलवतात. परत कोणी सांगितलं हे खोट आहे कि म्हणता येतं कि "लोकांनी हे पाहून त्याची समीक्षा वगैरे करावी या उद्देशाने इथे दिले होते वगैरे!" आधी पोस्टकार्ड साईझ यायच्या आता साईझ मोठा आहे. वरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली घटना मुफ्तीच्या CM काळात झालीच नाहीए! जवानांना अटकसुद्धा झालीच नाहीये! त्यात कहर म्हणजे 2014च्या घटनेनंतर स्वतः जेटली यांनी ट्विट करून त्या घटनेचा दुःख व्यक्त करत कारवाईची हमी दिलेली होती. जेटली बीजेपीचे कि आणखी कोणाचे?? त्यावर कहर म्हणजे प्रधानसेवक "मला सेवा करायची संधी द्या" सांगायला जेव्हा 2014ला श्रीनगरला गेलेले तेव्हा मोठ्या तावात (जो की नेहमीच असतो म्हणा) "गेल्या ३०वर्षात कधी असे झाले नव्हते पण केवळ मी आल्यावर सेनेने जाहीर माफी मागितली आहे आणि ज्यांनी गोळ्या चालवल्या त्यांच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या आहेत. हे फक्त माझ्या सरकारमुळे होऊ शकल आहे" असे स्पष्ट म्हणताना दिसतात. मग आता अचानक यु टर्न कसा घेतला बरे? आणि घटनेचं राजकारण करू नका म्हणायचं आणि बीजेपीचे अध्यक्ष म्हणतात "आमच्या पार्टीचं सरकार आहे काँग्रेसचं नाहीये म्हणून कारवाई होणार दोषी लोकांवर"

In reply to by शब्दबम्बाळ

विनोद१८ 23/02/2019 - 00:28
'वरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली घटना मुफ्तीच्या CM काळात झालीच नाहीए! जवानांना अटकसुद्धा झालीच नाहीये! त्यात कहर म्हणजे 2014च्या घटनेनंतर स्वतः जेटली यांनी ट्विट करून त्या घटनेचा दुःख व्यक्त करत कारवाईची हमी दिलेली होती. जेटली बीजेपीचे कि आणखी कोणाचे?? त्यावर कहर म्हणजे प्रधानसेवक "मला सेवा करायची संधी द्या" सांगायला जेव्हा 2014ला श्रीनगरला गेलेले तेव्हा मोठ्या तावात (जो की नेहमीच असतो म्हणा ) "गेल्या ३०वर्षात कधी असे झाले नव्हते पण केवळ मी आल्यावर सेनेने जाहीर माफी मागितली आहे आणि ज्यांनी गोळ्या चालवल्या त्यांच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या आहेत. हे फक्त माझ्या सरकारमुळे होऊ शकल आहे" असे स्पष्ट म्हणताना दिसतात. मग आता अचानक यु टर्न कसा घेतला बरे?' वरच्या तीनही विधानां संबंधी पुरावे दिलेत तर मिपाकरांच्या ज्ञानात भर पडेल. जो प्रश्न गेल्या ७० वर्षापुर्वी निर्माण केला गेला आणि आजपर्यन्त सुटला नाही तो चुटकी सरशी सोडविण्याचा काही उपाय तुमच्याकडे आहे का ?? पुलवामाच्या घटनेची जबाबदारी सरकारने झिडकारली असे का वाटते ?? काय गेल्या ७० वर्षात यापेक्षा भयानक घटना / घातपात देशात झालेच नाहीत का ?? किती माणसे आणि सैनिक या काश्मीरसाठी देशाने गमाविलेत याची मोज्दाद केलीत काय कधी ?? आधी कुठलीही योजना मनासारखी झाली नाही कि काँग्रेस वरती ढाकळायचं धोरण होत आता हा हल्ला होऊन इतके जवान शहीद झाले तरी याना आपली कातडी वाचवायचं पडलं आहे फक्त! कुठे कोणी आणि कशी आपली कातडी वाचविलेली दिसली या प्रकरणी ?? जरा विस्ताराने लिहिलेत तर त्याला काही अर्थ आहे. मुळात ह्या काश्मीर प्रश्ण निर्माण कोणी केला, त्यावर आपले राजकारण कोणी केले हे कसे विसरता येइल.

गेल्या महिन्याभरापासून सी.आर.पी.एफ.वर अधून मधून हल्ले होतच होते. दुर्दैवाने लष्कर प्रमुखांनी "आम्ही कोणत्याही हल्ल्यास तोंड देण्यास तयार आहोत" असे एका प्रश्नाला उत्तर दिले होते. १ फेब्रुवारी- अनंतनाग येथे हल्ला (https://www.tribuneindia.com/news/jammu-kashmir/two-crpf-men-among-8-hurt-in-anantnag-grenade-attack/721944.html ) १८ जानेवारी ला श्रीनगरच्या लाल्चौकात हल्ला https://economictimes.indiatimes.com/news/defence/srinagar-militants-lob-grenade-near-crpf-bunker-in-lal-chowk/videoshow/67587830.cms ११ फेब्रुवारीला ग्रेनेड हल्ला - http://risingkashmir.com/news/4-cops-3-crpf-men-among-11-injured-in-palladium-grenade-blast-343653.html

In reply to by चौकटराजा

तेजस आठवले 20/02/2019 - 14:59
ह्या बातमीची लिंक मिळेल का? खरंच ते असं म्हणाले ? कठीण आहे. एवढेच काय, उद्या औरंगजेब, अफझलखान आणि गझनीचा मेहमूद ही टोपणनामे घेऊन अनुक्रमे जोशी, बापट आणि गोडबोले ह्यांनी भारतीय जनतेवर अनन्वित अत्याचार केले असे सुद्धा हे ब्रिगेडी लोक ठोकून देतील.

गामा पैलवान 19/02/2019 - 00:30
लोकहो, पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान व सैन्य जे करायला पाहिजे ते करेलंच. पण एक सामान्य माणूस म्हणून आपण काय करू शकतो, असा प्रश्न पडणं साहजिकंच आहे. माझ्या मते आपण घटनेतलं ३७० कलम रद्द करायचा आग्रह धरू शकतो. बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भारतातले राजकीय नेत्रुत्व/यंत्रणा जेव्हा जेव्हा अपयशी ठरते तेव्हा "तुम्ही काय केले देशासाठी?" हा प्रश्न सामान्य मतदारांना नेहमी विचारण्यात येतो. " देश की सेना तो काम कर रही है. लेकिन आपने क्या किया देश के लिये?" इंदिरा गांधीनी दोन-तीन वेळा भाषणात विचारल्याचे स्मरते. असो. १)डिसेंबर पासून हल्ले होत असतना आपली गुप्तचर यंत्रणा गप्प राहिली.. वा अपयशी ठरली. यंत्रणेच्या प्रमुखाने/गृहखात्याने हे सांगायला हवे की नको? २) बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ. ने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बसेसने नेण्यास विरोध केला होता. हॅलिकॉप्टरची मागणी केली होती. ती अमान्य झाली. काल सर्वपक्षीय बैठक झाली. ह्यात सर्वानी 'पलिकडून' दहश्तवाद्यांना मिळणार्या मदतीबद्दल धिक्कार केला. ह्या ठरावात "पाकिस्तान' हा उल्लेखही नाही. ! एवढे पोलिटिकली सेफ का? असो. चीन्/सौदी अरेबियाचे काय करायचे? चीन हफीझ सईदला दहशतवादी मानायला तयार नाही. आणी पाकिस्तान हे सर्व धंदे करतो हे माहित असूनही सौदीचे राजपुत्र काल पाकिस्तान भेटीवर गेले व प्रचंड आर्थिक मदतही जाहीर केली. सौदी-पाक मैत्री जुनी आहे. आज ते भारतात येत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विशुमित 19/02/2019 - 10:41
असले अडचणीचे प्रश्न विचारयचे नसतात ग माई. घरचा मामला आहे. जनतेने फक्त मेणबत्या पेटवायच्या, जवानांच्या कुटुंबीयांना पेटीएम द्वारे दान करायचे ( खरंच चक्क एकजण असेच म्हटला "दान करायचे,"), ठरल्याप्रमाणे मुस्लिम, कश्मिरी तरूण आणि पाकिस्तानवर बिल फाडायचं. असो..

In reply to by विशुमित

इरसाल 19/02/2019 - 16:17
ठरल्याप्रमाणे मुस्लिम, कश्मिरी तरूण आणि पाकिस्तानवर बिल फाडायचं. असो.. यातुन ह्या लोकांनी काही केलेले नाही असा अर्थ निघतोय. आणी तुम्ही असं लिहीताय म्हणजे हे कोणी केलय याबाबत तुम्हाला माहिती असावी अस दिसतय. कॄपया सरकारला योग्य ती माहिती पुरवुन गुन्हेगारांना शासन होण्यास मदत करावी ही नम्र विनंती.

In reply to by विशुमित

डँबिस००७ 19/02/2019 - 23:00
असले अडचणीचे प्रश्न विचारयचे नसतात ग माई. घरचा मामला आहे. सर्व दलीय बैठकीत पाकिस्तानचा उ ल्लेख टाळणे म्हणजे अडचणीचे प्रश्न असतील तर चक्क काँग्रेसच्या उच्च पदस्थांनी बोललेले कोणाला सांगणार ? उदा, ओसामाजी लादेन जी, ( दिग्विजय सींग ) किंवा अफजल गुरुजी ( रणदीप सुरझेवाला) हा तर फक्त कॉग्रेसच्याच घरचा मामला होता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे 19/02/2019 - 20:03
१)डिसेंबर पासून हल्ले होत असतना आपली गुप्तचर यंत्रणा गप्प राहिली.. वा अपयशी ठरली. यंत्रणेच्या प्रमुखाने/गृहखात्याने हे सांगायला हवे की नको? पुलवामा मध्ये यापूर्वी म्हणजे २०१८ मध्येच तीन वेळेस चकमकी झाल्या (३० एप्रिल, २९ जून आणि १५ डिसेम्बर) या गुप्तहेर खात्याच्या बातम्यांमुळेच झाल्या ना? कि लष्कर घराघरात शिरून रोज तपासणी करीत होते? १०० धागे दोरे मिळतात त्या सर्वांवर कार्यवाही होत असते पण प्रत्यक्ष एखादाच धागा ठोस पुराव्या सोबत असतो. एक लक्षात ठेवा जेन्व्हा एक हल्ला होतो तेंव्हा त्याच्या मागे कमीत कमी १०० हल्ले निकामी केलेले असतात. खबरी मिळवणे त्याचे विश्लेषण करणे आणि त्यातून सज्जड अशी माहिती तयार करणे हे काय आपोआप होणारे काम आहे का? शेंडा ना बुडखा पण कळफलक बडवायचा २) बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ. ने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बसेसने नेण्यास विरोध केला होता. हॅलिकॉप्टरची मागणी केली होती. ती अमान्य झाली. २५०० सैनिकांना जम्मू वरून श्रीनगरला हेलिकॉप्टरने न्यायचे या साठी हेलिकॉप्टरच्या किती फेऱ्या लागतील याची कल्पना आहे का? साधारण माणशी २० रुपये/ किमी या दराने २०० किमी (कावळा उडतो तसे) ४००० रुपये माणशी लागतील म्हणजे १ कोटी रुपये नुसते इंधनावर लागतील. हे सुद्धा सरळ उडायचे असेल तर उंची गाठायची असेल तर हे गणित बदलते. जम्मू समुद्रसपाटीच्या ३५० मीटर वर आहे आणि श्रीनगर १५८५ या उंचीवर चढवण्यासाठी इंधन दुप्पट खर्च होते. बाकी हेलिकॉप्टरच्या ५०० तासांची किंमत त्याच्या पायलटचा पगार अलाहिदा. त्यांना हेलिकॉप्टरने नेण्यासाठी परवानगी कुणी द्यायची (अशी परवानगी मंत्रालयातून मिळण्यास तीन ते चार महिने सहज लागतील). संरक्षण मंत्रालयातील बाबूंनी आणि कॅगने लेखा हरकत (AUDIT OBJECTION) घेतले तर ते पैसे कुणी भरायचे? सैनिकांच्या पगारातून वसूल करायचे? कि अधिकाऱ्यांच्या? आणि एकदा असे केले कि "वहिवाट" होण्याची भीती असते ती गोष्ट वेगळी. कोणतरी बुणगा काही तरी बलतो आणि ते लोक पुढे ढकलतात. उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे आज जो उठतो तो बेफाट आरोप करतोय

In reply to by सुबोध खरे

Blackcat 19/02/2019 - 20:18
साध्या निमलष्करी जवानांना विमान अन हेलिकॉप्टर द्यायला ते का मंत्री आहेत ? निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत , कॉन्ट्रॅक्टवाल्यांचे पगार 2012 ला काँग्रेस काळात वाढले होते , नन्तर काही नाही. ) आजवर हल्ल्यात जितके मेले , त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्यात म्हणे. https://youtu.be/IuhtlAq3yNY

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ 19/02/2019 - 23:04
निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत २०१२ नंतर डायरेक्ट २०१४ सुरु होत हे नविनच कळल !! २०१२ ते २०१४ पर्यंत ते तुमचे भ्रष्ट सरकार काय करत होते म्हणे ? ह्यांच्या ईथे क्लीष्ट गणित सोडाच , साधे आकडे मोजण्याचे सुद्धा वांदे आहेत तर !! एक पद एक पेन्शन तर तुमच्या भ्रष्ट काँग्रेसच्या सरकार ने १० वर्षे अडगळीत टाकलेले होते हे विसरलात ?

In reply to by डँबिस००७

Blackcat 19/02/2019 - 23:15
तुमचे गणित कच्चे आहे, 2012 ला पगाराचे स्लॅब वाढले , मग पाच वर्षे किरकोळ इन्क्रीमेंट असतात , त्याही दोन तीन वर्षे मिळत नाहीत , त्यांनतर पुन्हा स्लॅब वाढणे 2017 ला अपेक्षित होते, पण भाजप सरकारने ते 2021 पर्यंत पुढे ढकलले , फक्त इन्क्रीमेंट मिळतील ह्याची घोषणा केली , तेही 2017 पासून मिळाले नाहीत. 2-3 वर्षे झाली की एखादे इन्क्रीमेंट देतात , एक दोन राखून ठेवतात

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Blackcat 19/02/2019 - 23:21
आमचे काँग्रेस निदान स्लॅब तरी पाच वर्षांनी वेळेवर वाढवत होते , मधल्या काळात इन्क्रीमेंट असेनात का मागेपुढे, पण भाजपे तर स्लॅबच पुढे ढकलत आहेत , आणि गम्मत म्हणजे महाराष्ट्रीतील भाजप सरकारने याच काळात आमदारांचे पगार 50 हजारवरून दीड लाख केले .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 20/02/2019 - 10:57
तुम्ही आपली बुद्धी बाजूला ठेवूनच प्रतिसाद लिहिता का हो? कि बेलाशक खोटे बोलणे याबद्दल तुम्हाला काहीही वाटेनासे झाले आहे? काश्मीर मधील केंद्रीय राखीव पोलीस दल हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. वेतन आयोग नावाची काही वस्तू अतित्वात आहे याबद्दल आपल्याला माहिती आहे का? सहावा वेतन आयोग २००६ साली आला आणि त्याची अंमल बजावणी २००८ मध्ये झाली. https://en.wikipedia.org/wiki/Sixth_Central_Pay_Commission तसेच २०१५च्या नोव्हेंबर महिन्यात सातव्या वेतन आयोगाचा अहवाल आला आणि तो मोदी सरकारने ५ सप्टेंबर २०१६ लागू केला On 5 September 2016 the Bharatiya Janata Party (BJP) led National Democratic Alliance (NDA) government implemented the recommendations of the 7CPC including those affecting the armed forces with minor modifications.(स्रोत विकिपीडिया) उगाच नको तेथे अक्कल पाजळणे थांबवा. केंद्रीय वेतन आयोग "१० वर्षातून" एकदाच बसतो बाकीचा वेळ फक्त महागाई भत्ता वाढवता येतो. आमचे काँग्रेस निदान स्लॅब तरी पाच वर्षांनी वेळेवर वाढवत होते.

हे सिद्ध करून दाखवा हे तुम्हाला आव्हान आहे.

नाही तर अशा धादांत खोट्या प्रतिसादाबद्दल माफी मागा

In reply to by सुबोध खरे

प्रसाद_१९८२ 20/02/2019 - 11:17
हे सिद्ध करून दाखवा हे तुम्हाला आव्हान आहे. नाही तर अशा धादांत खोट्या प्रतिसादाबद्दल माफी मागा
-- सर, आता तो मोगा तुमच्या या प्रतिसादाकडे फिरकणार देखील नाही.

In reply to by सुबोध खरे

Blackcat 20/02/2019 - 11:19
हे आलेच धावून, पाच वर्षे स्लॅब हे आमच्या पगाराबद्दल लिहिले आहे, बाकी , त्यांच्या पगाराबद्दल व्हिडिओत आहे , ते वाचा, सैनिकांना हेलिकॉप्टर वापरायचा अधिकार नाही , हे बोलून तुम्हीच आधुनिक वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केला आहे , तुम्हीच देशाची माफी मागा, सैनिकांनी जीव घालवावा , पण त्यांना सुविधा मिळणार नाहीत , हे लिहिल्याबद्दल मी डॉ खरेंचा जाहीर निषेध नोंदवत आहे

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 20/02/2019 - 12:07
तोंडाला येईल ते बोलू नका. सरकारी हेलिकॉप्टरचा वापर कशासाठी करायचा याची SOP (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर)असते. सैनिकाचा( एवढेच नव्हे तर तेथील सिव्हिलियनचा सुद्धा) "जीव वाचवण्यासाठी" तेथील डॉक्टर "स्थानीक कमांडर"च्या टेलिफोनिक परवानगीने हेलिकॉप्टर बोलावू शकतो. सैनिकांना सुटीवर जाण्यासाठी आणि सुटीवरून परत आणण्यासाठी हेलिकॉप्टर वापरुन देशाचे दिवाळे वाजवायचे आहे का? काश्मीरमध्ये एकंदर २ लाख १० हजार लष्करी जवान आणि १ लाख ३० हजार केंद्रीय पोलीस दले यांचे जावं तैनात आहेत. एवढ्या सगळ्या जवानांना (३ लाख ४० हजार) हेलिकॉप्टरने नेण्यासाठी भारताकडे तेवढी हेलिकॉप्टर्स नाहीतच. बाष्कळ बडबड खोटे बोलणे या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे इतक्या भंपक गोष्टी निर्लज्जपणे करताना जनाची नाही तरी मनाची लाज तरी बाळगा. सैनिकांनाच काय पण अधिकाऱ्यांना सुद्धा हेलिकॉप्टर वापरायचा अधिकार नाही. आधुनिक वर्णव्यवस्थेचापुरस्कार केला आहे असली घाण उगाच तोंड उचकटून कशाला बाहेर टाकता आहात? निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत) हे आपलेच लिखाण आहे ना? मग सातव्या वेतन आयोगाबद्दल न वाचता फुकट कळफलक बडवून खोटे नाटे कशाला लिहीत आहात?

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 20/02/2019 - 12:15
मोगा खान बाकी तुम्ही आर्मीत डॉक्टर म्हणून भरती होणार होतात त्याच काय झाले? हेलिकॉप्टर मध्ये फिरायची संधी मिळेल (तुमच्याच म्हणण्याप्रमाणे) आणि भरपूर पगार, भरपूर सुट्या, स्वस्त दारू राजासारखे राहाल. केंव्हा येताय? माझा ब्रिगेडियर वर्गमित्र लष्करी मुख्यालयात दिल्लीला आहे. चिकटवून टाकू कुठेतरी तंगधार https://www.google.com/maps/search/tangdhar+army+camp/@34.8687725,72.6431672,7z गुरेझ https://www.google.com/maps/search/gurez+army+camp/@34.6268302,73.7540836,8z उडी https://www.google.com/maps/place/Uri+193123/@34.0560504,73.4232996,9z/data=!4m5!3m4!1s0x38e05748af885045:0xa67531f1a8648f93!8m2!3d34.0881166!4d74.0339852 नाही तर सियाचेन आहेच एकदम आरामात राहा. छान थंड थंड बायकोची हि कटकट नाही

In reply to by सुबोध खरे

Blackcat 20/02/2019 - 12:23
हेलिकॉप्टरची मागणी त्यांनी स्वतःच केली होती , वातावरण खराब होते म्हणून, Speaking to Asia Times, a senior security official said that travelling on the road was riskier and the attack would have been avoided if they had used helicopters instead of trucks. “Had helicopters been made available to troops then this could perhaps have been avoided. This is not the main cause and we do have a massive intelligence failure. But this could have probably saved lives,” he said. https://newscentral24x7.com/pulwama-terror-attack-modi-govt-refused-helicopters-to-ferry-crpf-officials-in-kashmir/ ते सगळ्या लोकांना मजेसाठी फिरायला हेलिकॉप्टर नव्हते मागत.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 20/02/2019 - 12:37
कशाला कुठल्या तरी प्रेस्टिट्यूटच्या आड लपता आहात शिखंडी सारखे? सिनियर सिक्युरिटी ऑफिशियलचे नाव घेऊन ते खोटे बोलत आहेत त्यात तुम्ही त्यांची हांजी हांजी चालवली आहे. सिनियर सिक्युरिटी ऑफिसर जर सरकारी असेल तर त्याला वस्तुस्थिती माहिती आहे आणि सरकारी नसेल तर कुणीही बुणगा काहीही बोलतो ते तुम्ही न विचार करता पुढे पाठवून मला जाब विचारता? लष्करी दलाच्या पगारा बद्दल खोटं बोलून झालं माझ्यावर वर्णव्यवस्थेबद्दल चिखल उडवून झाला अडीच हजार सैनिकांना सुटीवरुन परत येण्यासाठी हेलिकॉप्टर कोणाचा बाप देणार होता? तीन लाख चाळीस हजार सैनिकांना वर्षात तीन वेळेस सुटीवर जाण्यासाठी आणि तीन वेळेस परत येण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवायचे तर ७०% आयकर भरावा लागेल आणि ५० % जी एस टी. भरणार का तुम्ही? बेताल आणी बाष्कळ बडबड आणि पचपच केल्याशिवाय अन्न पचत नाही का?

In reply to by सुबोध खरे

Blackcat 20/02/2019 - 14:11
मुलांना ऑक्सिजन सिलेंडरला पैसे नाहीत, सैनिकांना सुरक्षित ठेवायला पैसे नाहीत.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 20/02/2019 - 19:17
मुलांना ऑक्सिजन सिलेंडरला पैसे नाहीत, सैनिकांना सुरक्षित ठेवायला पैसे नाहीत. ना शेंडा ना बुडखा नुसतीच पचपच

In reply to by सुबोध खरे

महेश हतोळकर 21/02/2019 - 17:53
मिपावरच्या चर्चा सरकार एवढ्या गांभीर्याने घेत असेल हे माहिती नव्हते. जपून वावरायला पाहिजे बाबा इथं. http://mtonline.in/B-Lzua/a36my

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

रानरेडा 24/02/2019 - 22:55
मध्ये एका गावठी वैदू कडून उपचार करून घेतलेल्या ( आणि सरकारी कोलेज मधून डॉक्टर झालेल्या ) डॉक्टर ची खाणी ऐकली होती वर म्हणे तो डॉक्टर मुंबईत एका सरकारी रुग्णालयात आहे आणि मुसलमान बनून हि आधीच्याच हिंदू नावाने वावरत आहे , ह्लाला साठी झाला मुसलमान तो त्यामुळे डॉक्टर खरे यांना कशाला दोष द्या , डॉक्टर कसे असतात ते माहित आहे आम्हाला

In reply to by सुबोध खरे

तेजस आठवले 20/02/2019 - 14:33
संपादक मंडळ असल्या खोटारड्या प्रतिसादांवर काहीच कारवाई करणार नाही का ? का मोगा पुढे हात टेकले?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud 20/02/2019 - 13:34
मोगा खान,तुमच्या आवाक्यातला प्रश्न MBBS म्हणवणारा कोणी डागदर धनगरी औषध वापरण्याची कबुली आणि जाहिरात कसे देऊ शकतो ?

In reply to by सुबोध खरे

अर्वाच्य 20/02/2019 - 12:59
एक लक्षात ठेवा जेन्व्हा एक हल्ला होतो तेंव्हा त्याच्या मागे कमीत कमी १०० हल्ले निकामी केलेले असतात. {{> हे वाक्य जेव्हा राहुल गांधी बोलले होते तेव्हा बरीच टिका झाली होती. तुम्हि अगदि राहुल गान्धीसारखे बोलत आहात. :-) https://goo.gl/XQ8FSQ

In reply to by अर्वाच्य

सुबोध खरे 20/02/2019 - 19:23
राहुल गांधी राजकारणी आहेत पण कुठे बोलायचे आणि कुठे नाही याचा त्यांना पोच नाही. मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काही जबाबदारीने बोलावे कि नाही. सत्य कुठे आणि कसे बोलावे हे महत्त्वाचे असते. एखाद्या पायलटच्या मृत्यू प्रसंगी पायलटची चूक होती म्हणून तो दिवंगत झाला हे बोलणे सत्य असले तरी अप्रस्तुत आणि अनुचित असते अंधभक्ती हि अशीच आहे.

Rajesh188 19/02/2019 - 12:13
नेहमी 370 कलम रद्द करा आसा युक्तिवाद होतो पण ते कलम रद्द करण्याचा अधिकार संसेदला आहे का . काश्मीर भारतात जेव्हा विलीन झाला तेव्हा काही करार झाला होता त्यात हे कलम सुधा आहे आस ( मला नक्की माहित नाही चुकीचं आसेल तर माहिती द्यावी ,) ते कलम रद्द केले तर भारतीय कायदे त्या राज्याला सुधा लागू होतील .आणि भारतीय जनता तिथे जावून जमीन सुधा खरेदी करू शकेल आणि तिथे बाकी समाजाची वस्ती वाढेल आसा युक्तिवाद आहे . पण आशा अस्थिर वातावरणात tas स्थलांतर होईल

In reply to by Rajesh188

खरे आहे. एवढा साधासुधा तर्क नाही ३७० मागे. नाहीतर केव्हाच रद्द केले असते आधीच्या सरकारानी. सार्वमत झाल्याशिवाय ३७० चा निर्णय घेता येणार नाही अशी अट आहे असे वाचले होते. नक्की माहित नाही. त्यामुळे ३७० रद्द करण्याचा आग्रह धरायचा तर तो कश्मिरमध्ये घेतला पाहिजे. मुंबई/पुण्यात्/दिल्लीतल्या लोकांच्या आग्रहाला विशेष महत्व नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे 27/02/2019 - 10:57
@माईसाहेब आधीच्या सरकारांनी तीन तलाक बंद केला नाही. आधीच्या सरकारांनी बेनामी मालमत्तेचा कायदा येऊ दिला नाही आधीच्या सरकारांनी पाकिस्तानात घुसून कार्यवाही केली नाही आधीच्या सरकारांनी ३७० कलम रद्द केले नाही. यात काही साम्य दिसतंय का माईसाहेब? आधीच्या सरकारांनी केलं नाही म्हणून आताचे सरकार या गोष्टी करू शकत नाही हे म्हणणे हास्यास्पद आहे

गामा पैलवान 19/02/2019 - 14:01
माईसाहेब, भारतीय संसद अनुच्छेद ३७० स्वत:च्या अधिकारात रहित करू शकते. इतर कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही. कलम ३७०, परिच्छेद ३ असा आहे : Notwithstanding anything in the foregoing provisions of this article, the President may, by public notification, declare that this article shall cease to be operative or shall be operative only with such exceptions and modifications and from such date as he may specify: Provided that the recommendation of the Constituent Assembly of the State referred to in clause (2) shall be necessary before the President issues such a notification. वरील मजकुरातली Constituent Assembly (= घटना समिती) या घडीला अस्तित्वात नाही. त्यामुळे राष्ट्रपती एका वटहुकूमाद्वारे कलम ३७० रद्द करू शकतो. तसंही पाहता ३७० हे तात्पुरत्या तरतुदींसाठी अस्तित्वात आलेलं आहे. कलमाच्या शीर्षकात Temporary, Transitional and Special Provisions असा उल्लेख आहे. तात्पुरत्या तरतुदी रद्द करण्यातही खास परवानग्यांची गरज नसते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

धन्यवाद रे पैलवाना. Constituent Assembly अस्तित्वात नसेल तर हे डेड-लॉक झाले म्हणायचे. On 3 April 2018, the Supreme Court of India gave a similar opinion declaring that the Article 370 has acquired a permanent status. It stated that, since the State Constituent Assembly has ceased to exist, the President of India would not be able to fulfil the mandatory provisions required for its abrogation.[49] https://en.wikipedia.org/wiki/Article_370_of_the_Constitution_of_India

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गामा पैलवान 19/02/2019 - 18:02
अहो माईसाहेब, घटनासमिती अस्तित्वात नसल्याने ३७० रहित करता येणार नाही असा निर्णय जम्मूकाश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे. पुढे सर्वोच्च न्यायालयाने ३७० कायमस्वरूपी आहे असं मत प्रदर्शित केलंय. ३७० च्या शीर्षकात जरी 'तात्पुरते व अंतरिम' असा उल्लेख असला तरी त्यास कायमपणा प्राप्त झालाय. असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Article_370_of_the_Constitution_of_India#Calls_for_abrogation असं असलं तरीही माझ्या माहितीप्रमाणे घटनेचा अन्वयार्थ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास न्यायिक फेरआढावा ( = ज्युडिशियल रिव्ह्यू) घेता येतो. किंवा शासन तसा घेण्यास स.न्या.स विनंती करू शकतं. यामागचं कारण म्हणजे घटनासमिती हीच मुळी तात्पुरती योजना आहे. मग तिच्या अनास्तित्वाच्या आधारे तात्पुरते ३७० कायम कसे करता येईल? असा युक्तिवाद करून शासन सर्वोच्च न्यायालयाकडे पुनरावेदन ( = अपील) करून निर्णय फिरवून घेऊ शकेल. आ.न., -गा.पै.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Blackcat 19/02/2019 - 19:08
370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

प्लॉट्स वगैरे मोठ्या बिल्डरांना- लोढा/हिरानंदानीना,राजकीय पुढार्यांना घेऊ देत. एखादी टाऊनशीपची जाहिरात येऊ दे.. मग बघु.. असो २६-११ च्या मुंबई हल्ल्यानंतर शिवराज पाटलांनी चार दिवसात राजिनामा दिला होता. आता ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अर्धवटराव 19/02/2019 - 20:19
शिवाजीरावांनी दिवसभरात तीन वेळा कपडे बदलुन प्रतिक्रीया दिल्या, त्यावरुन ते ट्रोल झाले (आपली जनता ट्रोल करण्याच्या बाबतीत जरा जास्तच जागृत आहे). त्यांची देहबोली देखील मानसीक खच्चीकरण झाल्यासारखी निस्तेज झाली होती. त्यामुळे गृहमंत्रालयाची इमेज कचखाऊ झाल्यासारखी वाटत होती. तसंही, शिवाजीरावांना स्वतंत्रपणे बोलण्याचा काहि अधिकार नव्हता (आजच्या गृहमंत्र्यांना देखील तो अधिकार नाहि). त्यामुळे त्यांनी बस्तान आवरतं घेतलं. आबा पाटलांचा राजिनामा मात्र अवास्तव होता असं वाटतं. एक कार्यक्षम मंत्री म्हणुन मला आबा पाटील फार आवडायचे. त्यांच्या हिंदी प्रतिक्रीयेला उगाच ओढुन ताणुन दाखवण्यात आलं, आणि त्यांना राजीनाम द्यायला लागला (राष्ट्रवादीतली अंतर्गत स्पर्धा देखील काहि अंशी कारणीभूत असेल. पण पवार साहेबांचा आबांना नेहेमीच पाठिंबा राहिला आहे)

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ 19/02/2019 - 23:16
Blackcat , ३७० कलम ठेवुन कश्मिरला स्वतःच प्राईव्हेट राज्य करायचा प्लान होता का तुमच्या लाडक्या पंडीतजींचा ? नाही म्हणजे संपुर्ण देश एकसंध केलेला असताना फक्त ह्यांच्या गावाला (काश्मिरला) स्पेशल स्टेटस का हवा होता म्हणे ? 370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ? ३७० कलम असताना कायद्याप्रमाणे भारतीय माणसाला काश्मिरमध्ये प्रॉपर्टी विकत घेता येत नाही त्यामुळे विकत घ्यायची असेल तर ३७० कलम जाण्याची वाट पहावी लागेलच !

In reply to by डँबिस००७

Blackcat 19/02/2019 - 23:23
काश्मीरचे सँस्थानिक नेहरू नव्हते , कुणीतरी हरीसिंग वा तत्सम होते ना ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 20/02/2019 - 10:59
370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ? तुम्ही घ्या कि चारी बाजूला भरपूर मशिदी आणि मदरसे आहेत. तुमचा वेळ बरा जाईल

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 20/02/2019 - 12:40
बघा प्लॉट घ्यायचा असेल तर दुवा पाठवला आहे. भरपूर प्लॉट्स रिकामे आहेत. https://www.justdial.com/Baramulla/Estate-Agents-in-Gurez/nct-10192623

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 20/02/2019 - 19:25
तिकडे चारी बाजूनी मशिदी आणि भोंगेच आहेत इकडच्या सारखे "आरती, स्तोत्र, जय भवानी जय शिवाजी ऐकून " वगैरे ऐकून तुमचे ब्लड प्रेशर वाढणार नाही शिवाय तिथे प्लॉट फारच स्वस्तात आहेत.

In reply to by सुबोध खरे

रानरेडा 25/02/2019 - 00:10
आणि डोंगराळ भागात भरपूर वैदू , मेंढपाळ असतील तिकडे तुम्हाला औषधच औषध मिळेल ! फक्त आपण MBBS डॉक्टर आहात हे सांगू नका हा , ;) ;)

Rajesh188 20/02/2019 - 12:46
आपण स्वतःचा जरी विचार केला तरी समजेल . मुंबई आणि राज्यात हिंदी भाषिक लोकांची संख्या वाढली आहे आणि त्या मुळे आपण सुधा अस्वस्थ होतो .हे सत्य आहेच की . कोणत्याच राज्याच्या संस्कृतीवर आक्रमण विनाश कडे घेवून जाईल

Rajesh188 20/02/2019 - 14:08
ह्या विषयावर खूप प्रतिक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी वाचल्या . पण पूर्ण विचार करून परिणामाचा विचार करून प्रतिक्रिया खूप कमी आहेत . प्रत्येक जण आपल्या विचारधारा सोडायला तयार नाहीत आणि aashich अवस्था पाकिस्तान मध्ये सुधा आहे . डोकं थोड शांत ठेवून दोन्ही देशांनी मिळून निर्णय घेणे अपेक्षित आहे इथे भावनिक mudhe काही कामाचे नाहीत. व्यवहारिक विचार झाला पाहिजे . दोन्ही देश विकसनशील देश आहेत आणि दोघे सुधा गरीबी bairojgari,लोकसंख्या अनियंत्रित वाढ आशा बऱ्याच समस्यांनी ग्रासले आहेत .जर दोन्ही देशांना काश्मीर च हित हवं आसेल तेथील जनता सुखी समाधानी झालेली बघायची आसेल तर थोड पाठी सरल पाहिजे . दोन्ही देशाची अखंडत्व आणि सर्वभोमत्व ह्या वर कसली ही तडजोड न करता सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे . हा सुवर्ण मध्य दोन्ही देशांनी ठरवावं .तो आपण काय सुचवणार . आता आसा विचार केला की दोन्ही देश आपल्याला हवा तसा काश्मीर प्रश्न सोडवू लागला तर त्याचे परिणाम काय होतील aatangvad हा त्याच्या वर नक्कीच उपाय नाही आणि युद्ध हा सुधा उपाय नाही . Aatangvad ही दुधारी तलवार आहे हिचा वापर जो करेल ती तलवार त्याच्या वर सुधा वार करू शकते आणि ह्याचा चांगला अनुभव पाकिस्तान कडे आहे ते चक्रव्यूहात सापडले आहेत बाहेर येण्याचा मार्ग सध्या तरी बंद आहे . दोन्ही देशातील दुष्मानीचा फायदा बाकी देश मित्रत्वाचे वाचन देवून स्वतःचा स्वार्थ साधून घेतली त्यात होणाऱ्या नुकसानी शी त्यांचा काहीही संबंध नसेल . पाहिजे तर ह्या विषयावर bayanbaji करायला दोन्ही देशांनी बंदी घातली पाहिजे .प्रधान मंत्री व्यतिरिक्त कोणताही नेता ह्या विषयावर बोलणार नाही ह्याची काळजी घेणे . युद्ध न परवडणारे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत आताच युद्ध खूप भयंकर आसेल .आणि युद्ध काळात सर्व विकास योजना बंद होवून रोजगाराचा प्रश्न गंभीर होईल . आपण आता कितीही बोललो तरी त्या वेळी वेगळा विचार करू . पोट भरणे अवघड झाले की afratafar maju शकते . शास्त्र विकणारे लढा चालू ठेवतील आणि दोन्ही देशाचं वाटोळे होईल . समजा आपण युद्ध जिंकाल तर पाकिस्तान मध्ये आपण सत्ता स्थापित करू शकणार नाही जागतिक विरोध होईल मग युद्ध जिंकून फायदा काय अजुन द्वेष वाढेल

Blackcat 20/02/2019 - 14:24
१९८९ पर्यंत भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबे अगदी सहजपणे काश्मिरभर हिंडून-फिरून , एक तरी कौटुंबिक फोटो-अल्बम सोबत घेऊन आनंदाने परतत होता! काश्मीर की कली, परदेसियो से ना अखिया मिलाना, किती सुंदर गाणी बघायला मिळायची. याचा अर्थ, तेव्हा तेथे दहशदवादाचा मागमूस नव्हता. नेहरुजी, शास्त्रीजी, इंदिराजी आणि राजीवजीपर्यंत काश्मिरात दहशदवाद नव्हता, आणि पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! २००१ मध्ये जम्मू- काश्मीर विधानसभेवर हल्ला झाला. पी एम होते अटलजी! अमरनाथ यात्रा हल्ला.... तेव्हाही भाजपाचे शासन! काँग्रेस-शासनात असा एकही हल्ला नाही. काश्मीरसाठी कॉंग्रेसने ३ युध्दे खेळली आणि जिंकली देखील! नव्या सरकारकडून काही अपेक्षा ठेवायच्या तर सैनिकच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षित करायचे तर म्हणे 50 % कर भरा, असे इथले तज्ञ सांगतात. आमचे पूर्वधर्माचे गोत्र काश्यप , ज्यांनी काश्मीर निर्माण केले त्या ऋषीचे नाव , बिचारे तळमळत असतील , हेचि फळ काय मम तपाला?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आनन्दा 20/02/2019 - 15:42
१९८९-९० मध्ये तेथे दहशतवाद आला तेव्हा तुमचे शासन होत वाटते तिथे? हजारो काश्मीरी पंडितींना विस्थापित केले तेव्हा नव्हता वाटते दहशतवाद? की तो जिहाद होता?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ 20/02/2019 - 19:00
बरेच विसरभोळे आहात तुम्ही !! पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! हा हा हा काँग्रेस चे कमकुवत सरकार बघुन एक दोन नव्हे तर चार चार युद्धे लादली पाकिस्तानने भारतावर !! चीन ने तर एकाच तडाख्यात लोळवल होत विसरले काय ? ते तर बर की भारतीय सेना खमकी होती म्हणुन बचावलो !! अन्यथा काँग्रेसवाल्यांनी देशच आंदण दिला असता पाकिस्तानला ! काश्मिरचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग पाकिस्तानच्या अख्त्यारीत आहे ! गीलगीट बाल्टीस्तान, अक्साई चीन हा भाग सुद्धा काँग्रेसवाल्यांनी देऊन टाकला ! कॉग्रेस मुक्त भारत झाल तर १८८५ पासुनचा रोग बरा होईल !!

In reply to by डँबिस००७

Blackcat 20/02/2019 - 19:22
जवानांच्या अंतयात्रेत उपमुख्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह, केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह, साक्षी महाराज हसत होते व प्रार्थनेत जोडे घालून आले होते, नातेवाईकांनी हाकलून लावले. व्हाट्सपवर व्हिडीओ फिरत आहेत, ते पहा. भाजपयाना तर इथलेच लोक विचारेनात , पाकिस्तान तर लांब राहिला.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 20/02/2019 - 19:28

९०,००० सैनिक युद्धबंदी होते आणि पाकिस्तानी लष्करशहा हात बांधून शरण आलेले असताना काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधींनी घालवली.

त्याबद्दल तुमची पचपच करणारी विचारसरणी काय म्हणते आहे?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 21/02/2019 - 09:22
इतिहास वाचलेलाच दिसत नाही. १ कोटी बांगलादेशी निर्वासित भारतात आले होते आणि त्या निर्वासितांच्या निर्वाहासाठी आपण( सामान्य नागरिक) २० पैशाच्या पोस्टाच्या तिकिटांवर ५ पैसे निर्वासित अधिभाराचे तिकीट लावत होतो https://www.thedailystar.net/supplements/victory-day-2016-special/refugee-relief-the-postal-tax-helped-millions-1330345. त्यामध्ये ९०,००० तोंडे म्हणजे काहीच नाही

त्या "ओलिस सैनिकांच्या" बदल्यात आणि शरण आलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या बदल्यात काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधी यांनी घालवली.

त्या धनगराकडे मेंदू विकारावर औषध आहे का विचारुन पहा. कायम नुसती जळजळ आणि मेंदूत जळमटं झाली आहेत. कोणताही विषय अजिबात न वाचता किंवा अजिबात विचार न करता नुसती आचरटपणाची पचपच करण्याची सवय सोडून द्या जाता जाता -- मला कोणतेही निवृत्ती वेतन नाही. तेंव्हा तुम्हाला जळजळ होण्याचे कारण नाही.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

विशुमित 21/02/2019 - 16:02
काश्मीर प्रश्नाला पंडित नेहरूच कारणीभूत, अमित शाह यांचा आरोप. काश्मीर प्रश्नाचे जनक कोण असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर पंडित नेहरू असेच आहे. नेहरूंमुळे काश्मीरचा मुद्दा निर्माण झाला. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. काश्मीर खोरे कायम धगधगतेच असते या सगळ्याचं कारण पंडित नेहरू आहेत त्यांनी हा प्रश्न निर्माण केला आणि भिजत ठेवला असाही आरोप अमित शाह यांनी केला. सगळ्यात महत्वाचे आहे, हे तुम्ही लक्ष्यात ठेवा == पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे असे पंतप्रधान आहेत जे २४ पैकी १८ तास काम करतात. देशाच्या सुरक्षेसाठी ते कटिबद्ध आहेत त्यांच्यावर तुमच्यासारख्यांच्या आरोपांमुळे परिणाम होणार नाही असेही अमित शाह यांनी ठणकावले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/pandit-nehru-responsible-for-kashmir-issue-says-amit-shah-1845117/ === सगळं रांकेला लावून आज ते कोरियाला भुर्र उडून गेले आहेत. तुम्ही बसा उंदरांचा पाठलाग करत!!

Blackcat 20/02/2019 - 14:24
१९८९ पर्यंत भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबे अगदी सहजपणे काश्मिरभर हिंडून-फिरून , एक तरी कौटुंबिक फोटो-अल्बम सोबत घेऊन आनंदाने परतत होता! काश्मीर की कली, परदेसियो से ना अखिया मिलाना, किती सुंदर गाणी बघायला मिळायची. याचा अर्थ, तेव्हा तेथे दहशदवादाचा मागमूस नव्हता. नेहरुजी, शास्त्रीजी, इंदिराजी आणि राजीवजीपर्यंत काश्मिरात दहशदवाद नव्हता, आणि पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! २००१ मध्ये जम्मू- काश्मीर विधानसभेवर हल्ला झाला. पी एम होते अटलजी! अमरनाथ यात्रा हल्ला.... तेव्हाही भाजपाचे शासन! काँग्रेस-शासनात असा एकही हल्ला नाही. काश्मीरसाठी कॉंग्रेसने ३ युध्दे खेळली आणि जिंकली देखील! नव्या सरकारकडून काही अपेक्षा ठेवायच्या तर सैनिकच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षित करायचे तर म्हणे 50 % कर भरा, असे इथले तज्ञ सांगतात. आमचे पूर्वधर्माचे गोत्र काश्यप , ज्यांनी काश्मीर निर्माण केले त्या ऋषीचे नाव , बिचारे तळमळत असतील , हेचि फळ काय मम तपाला?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

भंकस बाबा 20/02/2019 - 23:01
5लाख पंडितानी जीवाच्या भीतिने काश्मीर सोडले तेव्हा विद्यमान सरकारने ना त्यांची चिंता केली वा चिकित्सा, मग जे पाहिजे ते आपसुक तोंडात पडले तर कोण कशाला अतिरेकी बनतोय? उद्या काळ्या माउकड़े शांतताप्रिय धर्माचे लोक बोलायला आले की तुमची जागा आम्हाला आमचे प्रार्थनास्थळ म्हणून हवे आहे तर तुम्ही किती आनंदाने ते खाली कराल ? आधी तुमचा प्रतिसादच गंडलाय, भाजपा सरकारमधे अमरनाथ हल्ला झाला व विधानसभा हल्ला झाला मग पाकिस्तानमधून कसाब आणि कंपनी कोंग्रेसच्या काळात क़ाय आटयांपाट्या खेळायला आली होती ? हायला , यांचा क़ाय भरोसा नाय, प्रतिसाद झोम्बल्यावर कसाब आपल्या मुब्र्यातुंन आला होता बोलायला कमी करणार नाही. इशरतजहांचा बदला घ्यायला ! संपादक मंडळाला एक विनंती आहे , ह्या काळ्या माऊचा ईमेल आईडी उघड़ करावा , मग काहीतरी सामदामदंडभेद करता येईल

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud 21/02/2019 - 11:58
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा व वैफल्य यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल. का या असल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची धमक नाही ?

In reply to by lakhu risbud

सुबोध खरे 21/02/2019 - 12:56
@ Blackcat निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत) हे सपशेल खोटे विधान निर्लज्जपणे केलेत त्यावर पुरावा मागितला तो काही देता येत नाही. माझ्या वर्णव्यवस्थेच्या पुरस्काराबद्दल खोटारडेपणा केला त्याबद्दल कोणताही पुरावा देता येत नाही. इतका खोटारडेपणा, निलाजरेपण,, लोक टोचून बोलतात त्याबद्दल खंत नाही खेद नाही मिपावरून हाकलून दिल्यावर पन्नास वेगवेगळे डू आयडी घेऊन परत परत येण्यासारखा लोचट पणा आणि लुब्रेपणा आहे. आयुष्यातील वैफल्य जालावर काढून ते जाणार नाही आणि खोटेपणा हा लांड्या चादरी सारखा असतो. वरनं ओढली तर खालचा भाग उघड पडतो आणि खाली ओढली तर वरचा. मनाची नाहीच पण जनाची तरी लाज बाळगा.

सुबोध खरे-"उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे आज जो उठतो तो बेफाट आरोप करतोय "प्रधान मंत्रीजी आप मुझे बताईये, सारा कम्युनिकेशन भारत सरकार के हात मे है, आप कोई भी फोन टॅप कर सकते हो, आप् ने अभीतक क्या किया? अभीभी घुसपेटी भारत के अंदर कसे आते है ? कितने आतण्कवादीयोंको आपने विदेशसे भारत लाया? आतंकवादीयोंके पास बाहर से गन आता है, गोला बारूद आता है, हवाला के माध्यमसे पैसा आता है, पैसा बँको के माध्यमसे आता है, प्रधान मंत्री, आप ईतनी निगरानी नही रख सकते? ये राज्योंका विषय नही है.. ये आपका विषय है.. काय किया है आपने ?" नरेंद्र मोदींनी २०१२ मध्ये मनमोहन सिंगांना भाषणात विचारलेले हे काही प्रश्न. (https://www.youtube.com/watch?v=SZQwy91riOo&t=737s २०:०० ते २३:००) ह्याला काय म्हणायचे रे सुबोधा? उचलली जीभ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

डँबिस००७ 20/02/2019 - 19:26
माईसाहेब , अजुनही तुमची उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे पुलवामा रस्त्यावर तिन तिन बॅरीकेडस होते ! कश्मिरच्या मुख्यमंत्र्यामुळे ते बॅरीकेडस बंद झाले आणि अतिरेक्यांना रस्ता साफ झाला ! पण त्या कश्मिरच्या मुख्यमंत्र्याला ना खंत ना खेद ! अजुन ही पाकिस्तानशी बोलणी कर ण्याची वार्ता करत आहे ! वायरलेस, मोबाईल, टेक्स्ट मेसेज,व ईतर कम्युनिकेशन वर करडी नजर असल्याने अतिरेक्यांनी ह्यावेळेला नविन मोबाईल + वायरलेस मेसेज सिस्टीम वापरली. चायनात बनलेली ही एनक्रिपशन सिस्टीम अजुन ही आपल्या कम्युनिकेशन ए़क्स्पर्टसना क्रॅक झालेली नाही. स्फोटके कश्मिरच्या सीमा भागातुन खंदक खणुन त्या मार्गाने आणलेली आहेत असा कयास आहे. गेल्या ६५ वर्षांत काश्मिरची सीमा सील करता आलेली नाही. त्या सीमेतुन माणसे, प्राणी , मादक पदार्थ ह्यांची तस्करी चालु असते. अश्या तस्करी मुळे सीमा पुर्ण पणे सील राहील ह्याची शाश्वती नसते. गेल्या ६५ वर्षांत सील न झालेली सीमा आता सील का झाली नाही अस विचारण म्हणजे मुर्खपणा आहे हे तुमच्या व तुमच्या ह्यांना आम्ही सांगावे म्हणजे काजव्याने सुर्याला .................. गेल्या ६५ वर्षांत जे न घडलेल आहे त्यातल जे काही ह्या ५ वर्षांत घडलेल आहे ते मात्र बघायच नाही असा प्रयास आपल्यालाच खाली घेऊन जाणार आहे !

In reply to by डँबिस००७

Blackcat 20/02/2019 - 19:59
61 चा पाढा आता 65 ला आला, त्यातली 10 भाजपचीही आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे 20/02/2019 - 19:35
| माईसाहेब कुरसूंदीकर १)डिसेंबर पासून हल्ले होत असतना आपली गुप्तचर यंत्रणा गप्प राहिली.. वा अपयशी ठरली. यंत्रणेच्या प्रमुखाने/गृहखात्याने हे सांगायला हवे की नको? २) बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ. ने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बसेसने नेण्यास विरोध केला होता. हॅलिकॉप्टरची मागणी केली होती. ती अमान्य झाली. या दोन्ही गोष्टी अप्रस्तुत आणि अप्रासंगिक आहेत आणि त्यात आपला केवळ भाजप द्वेष दिसतो आहे हे मी सप्रमाण सिद्ध केलंय. ३ लाख ४० हजार सैनिकांना वर्षात तीन वेळेस हेलीकॉप्टरने घेऊन जाणे आणि परत आणणे हि अशक्य गोष्ट आहे हे शेम्बड्या पोरालाही पटेल. मुळात हि मागणी कुणी केली आहे हे तुम्हाला दाखवता येईल का? नसेल तर उगाच कळफलक बडवणे थांबवा कोणत्यातरी बोकड प्रेस्टिट्यूटने कुणाचा तरी हवाला देऊन लिहिलेले वाक्य मोगा खानने पाठवले होते उगाच फालतू प्रतिवाद करू नका आणि विषयाला फाटे फोडून पळवाट काढू नका.

In reply to by सुबोध खरे

ही घ्या लिंक https://www.thequint.com/news/india/pulwama-terror-attack-crpf-request-air-transit-of-jawans-ignored#gs.9bLAc65P मूळ मुद्दा हा नाही. मोदी व भाजपा २०१२ च्या भाषणात ज्या गमजा मारत होते, मनमोहन सिंगांनाच जबाबदार ठरवत होते. कश्मिर प्रश्न हा जणू काही काँग्रेसवाल्यांनी मुद्दामून निर्माण केला आहे.. आम्ही सत्तेवर आलो की तो सोडवू... मग वाट वाकडी करून नवाझ शरीफांना केक भरवायला जाणे.. मोदी सत्तेवर आल्यापासून पाकिस्तान सूतासारखा सरळ आला आहे.. ह्या बद्दल बातम्या पसरवणे... मग सर्जिकल स्ट्राएकने कशी कायमची अद्दल घड्वली..वगैरे... ६०-६५ वर्षत जे झाले नाही ते ५ वर्षात होणार नाही हे कळण्यास राजकीय पंडिताची गरज नाही. मग जाहिरातबाजी न करता निमूटपणे काम तरी करा. प्रत्येकवेळी ईतिहासात जाऊन आधीचे सत्ताधारी कसे चुकले.. हेच सांगणार असाल तर लोक प्रश्न विचारणारच ना?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे 21/02/2019 - 11:00
परत तेच कुणा तरी पत्रकाराने कुणाचा तरी हवाला देऊन सांगितलेली गोष्ट जी केवळ अशक्यप्राय आहे ( ३ लाख ४० हजार सैनिकांना वर्षात सहा फेऱ्या हेलिकॉप्टरने करणे). बरेच लोक मूळ वस्तुस्थिती माहित नसताना आपल्या त्रोटक माहितीप्रमाणे आणि आपल्या राजकीय कल (INCLINATION) प्रमाणे सोयीस्कर अशा काहीही गोष्टी टंकतात याबद्दल हा आक्षेप आहे. या स्थितीवर अचूक बोट ठेवणारा जालावर फिरणारा विनोद -- कुठे कुठे आणि कशी क्षेपणास्त्रे डागून पाकिस्तानला नष्ट करणारा डावपेच मी जालावर टाकणार होतोच तेवढ्यात आतून आमची हि ओरडली अहो जाता जाता धोब्याकडे इस्त्रीला कपडे टाका आणि ऑफिसमधून येताना न विसरता दळणाचा डबा घेऊन या. मुलखाचे धांदरट मेले. कुठे लक्ष असतं कुणास ठाऊक? मग लक्षात आलं -- आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत

In reply to by सुबोध खरे

Blackcat 21/02/2019 - 13:06
तात्पर्य : इथून पुढे चहावाल्यांनी चहावालेच रहावे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 21/02/2019 - 19:47
हो डॉक्टर होऊन धनगराचे औषध घेण्यापेक्षा बरं नाही का?

In reply to by सुबोध खरे

"आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत" हे प्रथम सत्तधार्यांना सांगाय्ला हवे. अंतिम संस्काराला चपला घालुन बसणे, अंत्ययात्रा जात असताना पोझ देणे. ज्या दिवशी हल्ला झाला त्याच रात्री खाजगी पार्टीत नाचणे.... https://www.youtube.com/watch?v=CiEatCP6X6Q

In reply to by सुबोध खरे

शब्दबम्बाळ 25/02/2019 - 11:01
कोणत्यातरी बोकड प्रेस्टिट्यूटने कुणाचा तरी हवाला देऊन लिहिलेले वाक्य मोगा खानने पाठवले होते
अरेरे सरकार आता खरे साहेबानी डिक्लेर केलेल्या अश्या प्रेस्टिट्यूटने दिलेल्या बातम्यांचा विचार करून निर्णय घ्यायला लागले! आता कसं व्हायचं?! व्हात्साप्प ग्रुपवरती माहिती मिळाली नाही वाटत यावेळेस?? बाकी तुम्हीच खाली लिहिलेलं पटलं बुआ आपल्याला
बरेच लोक मूळ वस्तुस्थिती माहित नसताना आपल्या त्रोटक माहितीप्रमाणे आणि आपल्या राजकीय कल (INCLINATION) प्रमाणे सोयीस्कर अशा काहीही गोष्टी टंकतात याबद्दल हा आक्षेप आहे.
मग लक्षात आलं -- आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत
येऊ द्या हं नीट लक्षात!

गामा पैलवान 20/02/2019 - 18:35
लोकहो, पुलवामा हल्ल्याचा काश्मिरियतशी कसलाही संबंध नाही. मसूद अझरचा भाऊ अब्दुल रौफ अजगर याने आत्मघातकी आक्रमणाची धमकी दिल्याची चित्रफीत समोर आली आहे. यामध्ये त्याने ‘जर मोदी सरकारने अयोध्येत राममंदिर उभारण्याचा प्रयत्न केला, तर आत्मघातकी आक्रमणे करू’, अशी धमकी दिली आहे. संदर्भ : https://sanatanprabhat.org/marathi/219206.html अधिक माहिती : https://mumbaimirror.indiatimes.com/news/india/pulwama-attack-nine-days-before-the-attack-jems-abdul-rauf-asghar-vowed-to-terrify-delhi/articleshow/68022324.cms पाकिस्तानात ५ फेब्रुवारी हा काश्मीर दिवस पाळला जातो. त्याचं चलचित्र : https://www.youtube.com/watch?v=ENOPIhZQFQA उपरोक्त चलचित्रात भारत मुर्दाबाद स्पष्टपणे म्हंटलं आहे. आ.न., -गा.पै.

Rajesh188 20/02/2019 - 19:44
काश्मीर मध्ये घडणाऱ्या हिंसक कारवाया काश्मीर प्रश्र्नाशी संबंधित नसेल तर भारताचा इस्लामिक देश बनवायचा आहे आस अर्थ निघतो . मग डिफेन्स सुधा फक्त काश्मीर मध्ये करून चालणार नाही पूर्ण देशात आशा कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल

In reply to by Rajesh188

ट्रेड मार्क 20/02/2019 - 23:26
काश्मीर मध्ये घडणाऱ्या हिंसक कारवाया काश्मीर प्रश्र्नाशी संबंधित नसेल तर भारताचा इस्लामिक देश बनवायचा आहे आस अर्थ निघतो नक्कीच बनवायचा आहे. फक्त भारतच नव्हे तर समस्त जग मुस्लिम नेशन झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. गझवा-ए-हिंद म्हणजे काय हे विशद करून सांगणारा हा व्हिडिओ बघाच ही विनंती आहे. फक्त ६-७ मिनिटांचाच आहे त्यामुळे फार वेळ वाया जाणार नाही. पूर्वापार हिंदुस्थानवर होत असलेली मध्यपूर्वेकडून होणारी आक्रमणे ही याची साक्षीदार आहेत की हे फक्त प्रदेश काबीज करण्यासाठी नसून धार्मिक आक्रमण होते. हल्ले करून देवळे तोडून, ग्रंथ पुराणे जाळून, तरुण हिंदूंना मारून, हिंदू तरुण स्त्रियांना बळजबरीने इस्लाम स्वीकारायला लावणे आणि बलात्कार करून दासी म्हणून भरपूर पोरे काढून त्यांना मुस्लिम वळण लावणे हे कशाचे द्योतक आहे? सीमेवर हे उघड हल्ले तरी लोकांना दिसत आहेत, देशांतर्गत चालू असलेले छुपे हल्ले अजून लोकांच्या लक्षात येत नाहीयेत. एकीकडे हिंदू मुलींना नादाला लावण्यासाठी ग्रूमिंग गँग्स, दुसरीकडे शालेय शिक्षणात अकबर, औरंगजेब, टिपू, तैमूर यांचे गोडवे गाणारे धडे, मुस्लिम संस्कृती कशी चांगली आहे हे सांगणारे परिच्छेद आणि त्याच जोडीने हिंदू राजांबद्दल संस्कृतीबद्दल अतिशय कमी माहिती, तिसरीकडून सिनेमासारख्या माध्यमांतून उर्दू भाषेचे चाललेले कौतुक आणि चौथ्या बाजूने लोकसंख्या वाढण्यासाठी चार चार लग्न करून अनिर्बंध पोरे पैदा करणे. असा चोहीबाजूने छुपा हल्ला चालू आहे. इंग्लंडची वाट लावलीच आहे. युरोपातील बहुतांश देश येत्या २५-५० वर्षात मुस्लिम बहुल होतील, बरेचसे मुस्लिम अधिपत्याखाली जातील. त्या देशातील स्थानिक लोकसंख्या कमी जन्मदरामुळे अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. त्यावर तथाकथित मानवतावादाच्या नदी लागून भरमसाठ मुस्लिम रेफ्युजी घेऊन ठेवलेत. आता ते लोक फुकटची वैद्यकीय सेवा आणि child केअर वर मजा मारत आहेत. हे पैसे स्थानिक जनता कष्ट करून जो टॅक्स भरते त्यातून येतात. जेव्हा मुस्लिम लोकसंख्या ३०% च्या वर जाते तेव्हा हे लोक शरियाची मागणी करतात. ते पण फक्त त्यांच्यासाठी नव्हे तर संपूर्ण प्रदेशात लागू करावा असा आग्रह होतो. जेव्हा ५०% च्या वर जाते तेव्हा तिथे बिगर मुस्लिमांचे जबरदस्तीने धर्मांतरण तरी चालू होते अथवा हत्याकांड चालू होते. त्यानंतर बिगर मुसलमानांचे तिथे राहणे अशक्य होऊन जाते आणि तो प्रदेश पूर्ण मुस्लिम अधिपत्याखाली जातो. हे लक्षात घ्या की नुसती त्यांच्या अधिपत्याखाली जायची प्रोसेसच निर्दयी आणि रक्ताळलेली नसून नंतर सुद्धा हे लोक तेवढेच निर्दयी व क्रूर आहेत.

सुबोध खरे 20/02/2019 - 19:55
https://en.wikipedia.org/wiki/Category:Islamic_terrorism_in_India यात भरपूर दुवे आहेत वाचून पहा, महिनाभर तरी लागेल. मग चर्चा करू. पण असे एका धर्माला नाव ठेवायचे नसते त्याने आपल्या पुरोगामित्वाचा धक्का पोहोचतो.

मनो 21/02/2019 - 01:28
दोन प्रश्नांची उत्तरे देतो - ३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते. आदिल अहमद हा स्फोटतत्ज्ञ नसून एक डोके भडकावलेला आणि साधन म्हणून वापरला गेला अतिरेकी होता. त्याला आय ई डी बद्दल माहिती होती कि नाही ते माहित नाही, पण या कृत्याचे बोलावते धनी वेगळे आहेत - अश्या वेळी आय ई डी कसा वापरायचा याची माहिती आणि प्रशिक्षण आय एस आय किंवा अफगाणी तालिबान यांच्याकडून मिळते. स्फोटके स्थानिक, चोरून अथवा इतर मार्गानी जमवतात. स्थानिक मदतनीस इतर व्यवस्था (गाडी वगरे) करतात. प्रत्येकाला पूर्ण प्लॅन माहित नसतो - तो प्लॅन सीमेपलीकडून आखला जातो आणि प्रत्येकाला त्याचा भाग फक्त माहिती असतो. त्याने लाल रंगाची मारुती कार वापरलेली आहे, जीप नव्हे. फोटो पाहिलेत तर तुम्हाला त्यात लाल रंगाचे छोटे कारचे तुकडे दिसतील. प्राणहानी स्फोटामुळे नाही, तर shrapnel मुळे झाली आहे. त्यामुळे दिशा वेगळी असली तरी त्याने फरक पडलेला नाही. ४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय? गोळीबार नाही, त्या shrapnel च्या खुणा आहेत. अश्या वेळी या घटनेमागचे मदतनीस कोण, बोलावते धनी कोण याचा पूर्ण तपास जर लावला तर आपल्याला पाकिस्तानवर पुराव्यानिशी आरोप करता येतील. पण हे पुरावे मिळणे अर्थातच फार अवघड असते.

In reply to by मनो

राघव 26/02/2019 - 21:58
१. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का? हे सर्वस्वी सेनेवर अवलंबून असून सेना त्या त्या परिस्थितीत योग्य तो निर्णय घेत असते. त्यात आपण इथं खल करत बसण्यानं खरंच काही उपयोग नाही. २. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का? या प्रकाराला अँबुश अटॅक म्हणतात. हा कधीही, कुठेही, कुणावरही होऊ शकतो. जसं हार्ट अटॅक आलेला समजण्याआधी अनेक अटॅक येऊन गेलेले असतात आणि त्यांना शरीर सांभाळून घेतं, त्यासारखं. असा अटॅक येतो तेव्हा योग्य मदत मिळाली तर तोही परतवून लावता येतो. अर्थात् संपूर्ण सुरक्षीत कुणीच / कधीच नसतो. त्यामुळे अशा अटॅक्समुळे गुप्तचर यंत्रणा सपशेल अपयशी ठरली असं मकुणीच, मला तरी योग्य वाटत नाही. सर्वजण आपापल्या परीनं पूर्ण प्रयत्न करतच असतात, नाही तर पावलोपावली अटॅक्स झाले असतेत. जे अशा अपयशाच्या नावानं बोंब मारतात, ते सरकारला नव्हेत तर सेना, गुप्तचर यंत्रणा आणि समग्र संरक्षण यंत्रणेला नावं ठेवत असतात. या प्रकाराला शुद्ध कृतघ्नपणा असंच म्हणतात. एक मुखबीर नावाचा चित्रपट आहे, तो बघावा अशा लोकांनी.. चित्रपट असला तरी इतका अंगावर येतो.. प्रत्यक्षात कसं असेल याची आपल्याला कल्पनाही येऊ शकत नाही. ५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय? झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील? कोणताही समर्थ देश हे जाहीररित्या करेल. त्याला असलं काही लपून करण्याची गरज नाही. जसं इस्रायल. आता भारतही. म्हणतांना खरंच अभिमान वाटतोय. :-) ६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं हे आत्ताचं नाही. जानेवारी २०१४ मधे हे वक्तव्य प्रसारित झालेलं मला चांगलं आठवतंय. मी तो विडिओ बघितलेला आहे. या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल? आज केलेला स्ट्राईक हा ऑफेन्सिव्ह डिफेन्स याच प्रकारात मोडतो. उरीचा बदलाही असाच. पण एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे. आंतरराष्ट्रीय दबाव, आर्थिक नाकेबंदी, शत्रूच्या मित्रदेशांशी हातमिळवणी करून शत्रूला एकटे पाडणे, संरक्षण दलांना पूर्ण मोकळीक, कडक गुप्तचर यंत्रणांचे जाळे... हे सगळे नाही अशी कल्पना करा आणि मग ह्या प्रकारच्या स्ट्राईकची कल्पना करा.. उरीच्या बदल्याच्या वेळेसच मोठ्या युद्धाला तोंड फुटले असते. अचूक नियोजन करून, बिनचूक अटॅक करणे आणि शत्रूदेशाची सीमा ओलांडून ३०० ते ३५० अतिरेकी एकरकमी मारणे, हे गुप्तचर यंत्रणांच्या निर्भेळ यशाचेच द्योतक आहे. जाता जाता: मला स्वतःला असं वाटतंय की हा बालाकोटचा हल्ला पुरेसा राहणार नाही. आणिकही काही होईल. काय त्याची कल्पना नाही अर्थात्.. अवांतरः कलम ३७० कधीही रद्द करता येऊ शकते. https://www.youtube.com/watch?v=OcEpkuNZEqQ मला ३५ अ / ब याबद्दल माहिती हवी आहे. असल्यास सांगावे. राघव

सुबोध खरे 21/02/2019 - 09:30
आपल्याला पाकिस्तानवर पुराव्यानिशी आरोप करता येतील. हा एक गैरसमज आहे तुम्ही वाटेल तो पुरावा द्या पाकिस्तान तो मान्य करणारच नाही. India

will not submit any evidence to Pakistan

on the role of Jaish-e-Mohammad in the Pulwama terror strike, and instead give all such facts to friendly nations to unmask the role of elements based in the neighbouring country in the attack, a senior government official said. The official was sharing the views within the government, which is not at all in favour of giving any evidence to Pakistan considering the past experience when despite giving multiple dossiers on the involvement of Pakistan-based elements in the 26/11 Mumbai terror attacks and terror strike in Pathankot airbase, Islamabad did nothing to punish the perpetrators. https://www.business-standard.com/article/pti-stories/india-won-t-give-proof-to-islamabad-but-to-friendly-nations-to-unmask-pak-role-in-terror-official-119022000941_1.html तपासाचा मूळ हेतू हा आहे कि गुन्हा कसा घडला त्याची पार्श्वभूमी त्याची पद्धत(MODUS OPERANDI) त्यात हातभार लावणारे घरभेदी कोण आहेत त्यांचा छडा लावणे हा आहे. पाकिस्तानला कितीही पुरावा दिला तरी ते ग्राह्य धरणार आहेत का? अजमल कसाबला जिवंत पकडल्यावर(प्रत्यक्ष पुरावा असताना) तो पाकिस्तानी नागरिक नाहीच म्हणून सांगितले मग परिस्थितीजन्य पुराव्याचा काय उपयोग?

In reply to by मनो

ट्रेड मार्क 21/02/2019 - 19:07
घरभेदी कोण असावेत याचा अंदाज येण्यासाठी खालील लेख वाचा लेख १ लेख २ वरील लेखामधील एक परिच्छेद - २०११ च्या सुमारास अकस्मात एक बातमी भारतीय माध्यमातून झळकली आणि राजकारणात एकच खळबळ उडालेली होती. संरक्षणमंत्र्यांच्या फ़ोनवरील संभाषणही चोरून ऐकले जात असल्याची ती बातमी होती. तो आक्षेप भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागावर ठेवण्यात आलेला होता. त्याखेरीज आणखी एक अशीच अफ़वा वर्तमानपत्रातून सोडली गेलेली होती. प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने सेनादलाच्या अनेक तुकड्या राजधानी दिल्लीत संचलनाचा सराव करीत होत्या. त्याचवेळी उत्तरप्रदेशाच्या मेरठ येथून काही सेनादलाच्या तुकड्या इतरत्र कुच करीत होत्या. त्यातून भारतीय लोकशाही उलथून टाकत सेनादल सत्ता काबीज करायच्या प्रयत्नात असल्याची ती अफ़वा होती. तिला कुठलाही आधार नव्हता आणि गोंधळ उडवून देण्याचाच त्यामागचा हेतू होता. तो मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाला. कारण तितके निमीत्त साधून दिल्लीची नोकरशाही, राजकारणी व तथाकथित बुद्धीमंतांनी मोठा हलकल्लोळ माजवला आणि तेव्हाचे लष्करप्रमुख व्हॊ. के. सिंग यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले. उपरोक्त दोन बातम्या भारतीय सुरक्षा दलाच्या विविध दक्षता यंत्रणांना उध्वस्त करणाचा व्यापक कट होता. कारण तेव्हा सिंग व संरक्षणमंत्री अन्थोनी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते आणि त्याचाच आधार घेऊन गलिच्छ राजकारण खेळले जात होते. माध्यमातून मग सिंग यांना सरसकट लक्ष्य करण्याची मोहिमच हाती घेण्यात आली. काश्मिरातील पाकवादी प्रवृतीच्या राजकारण्यांनी तोफ़ा डागल्या. सिंग लष्करी अधिकारी आणि संरक्षण खात्याचा पैसा वापरून काश्मिरी राजकारणात ढवळाढवळ करीत असल्याचाही एक आरोप त्यात समाविष्ट होता. त्यासाठी मग टीएसडी हा शब्द पुढे आला, ही टीएसडी म्हणजे टेक्नीकल सपोर्ट डिव्हीजन गुप्तचर म्हणून काम करीत नसून काश्मिरातील लोकांनी निवडलेले सरकार पाडण्यासाठी उचापती करीत असल्याचा आरोप पुढे आला. लष्करी पैसे देऊन एक अपक्ष आमदाराला खरेदी करण्यात आल्याचा बिनबुडाचा आरोप ठळकपणे पुढे आला आणि त्याचा कुठलाही पुरावा कधीच कोणी दिलेला नव्हता. पर्यायाने टीएसडी ही गोपनीय बाब चव्हाट्यावर आली आणि तिचा गाशा सेनादलाला गुंडाळावा लागला. त्यात कार्यरत असलेल्या अधिकारी व हस्तकांचे चेहरे उघडे पडले आणि अनेक अधिकारी कोर्टमार्शलचे बळी झाले. पण ती बाब महत्वाची नाही. त्यातून काश्मिरात गुपचुप जी कारस्थाने शिजवलॊ जात होती, त्यांची इत्थंभूत माहिती सेनादलाला मिळण्याचा मार्गच बंद होऊन गेला.

Rajesh188 21/02/2019 - 10:36
Kashmir आणि खलिस्तान ह्याची तुलना केली तर दोघांना सुधा स्वायतत्ता हवी होती . आणि संघर्षाचं कारण उघड तरी दोघांचं होते . मग खलिस्तान प्रश्न मिटवता आला परंतु काश्मीर धागगत राहायला ह्या मधून आसा पण निष्कर्ष निघतो की हा काश्मीर शी संबंधित प्रश्न नसून dharmikteshi संबंधित प्रश्न आहे आणि त्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आघाड्या उघडलेल्या आहेत पण आपण फक्त ऐकाच आघाडीवर लक्ष केंद्रित केले आहे त्या मुळे तो सुटत नाही . ऐक तर्क आसा सुधा करता येतो सध्य परिस्थिती बघून

In reply to by अर्वाच्य

सिद्धार्थ ४ 21/02/2019 - 11:18
तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही बोलता का हो?आज वर म्हात्रें काकांनी मिपा वर एकही खोटा किंवा असंतुलित प्रतिसाद मी तरी वाचला नाही आहे.

In reply to by अर्वाच्य

lakhu risbud 21/02/2019 - 12:24
बा अर्वाच्च्या तु मिपा वरुन हाकलुन लावलेल्या ज्या कोणाचा आय डी आहेस तुझी हकालपट्टी ही तुझ्याच कर्माने झालेली आहे या याबद्दल निश्चिन्त रहा . ती का झाली असावी याचाही अंदाज आता यायला लागला आहे. म्हात्रे कांकांवर खोटारडे पणाचा आरोप त्यांच्या विचारसरणीचे विरोधकही करणार नाहीत.. जर तू डोक्यावर पडला असशील तर बाबच वेगळी आहे !

In reply to by lakhu risbud

विशुमित 21/02/2019 - 13:11
अगदी बरोबर..!! शेवटी एक मिपाकरच दुसऱ्या मिपाकराच्या मदतीला येणार. खांद्यावर डोके वगैरे वगैरे..! आपल्या कांकांवर खोटारडे पणाचा आरोप म्हणजे काय ! जाहीर निषेद..! ===

In reply to by विशुमित

lakhu risbud 25/02/2019 - 15:23
इथले काका त्यांचे ते बघण्यास समर्थ आहेत हो ! तुम्ही तुमच्या काकांची काळजी करा.पुतण्याला तोंडघशी पाडलंन त्यांनी. मावळातून लढायचं म्हणे पर्यंत कात्रज चा घाट दाखवलान. तुम्हाला आता प्रचाराचा ओव्हरटाईम कसा जमणार ते बघा.

In reply to by lakhu risbud

विशुमित 25/02/2019 - 15:48
अस कस अस कस.. आपले सन्मानीय काका देखील डू आय डी चा सहारा घेत आहेत, असे जाणवते आहे. बाकी आमच्या तालुक्यातील काका पुतणे त्यांच ते बघून घेतील. तुम्ही कशाला लुडबुड करताय? चिरीमिरीसाठी एवढा निर्लज्जपणा?? अरेरे...!!

In reply to by lakhu risbud

शब्दबम्बाळ 21/02/2019 - 16:12
जिथे तिथे व्यक्तिपूजाच करणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार! म्हात्रेंनी वरती व्हिडीओ लिंक शेअर केली आहे ती फेक बातमी आहे, मजकूर खुबीने टाकलाच नाहीये म्हणजे असे नको व्हायला कि काही स्वतः काहीतरी लिहून जबाबदारी घ्यायला लागावी! हे आधी पण काही ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे असे होऊच्च शकत नाही टाईप प्रतिसाद तुमच्यापाशी ठेवा! बाकी जास्त काही बोलायला नको नाहीतर "जिएसटी च्या धाग्यावर त्यांनी चुकीचे टॅक्स टेबल टाकून स्वस्ताई दाखवायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा संक्षींनी व्यवस्थित विरोध केला होता आणि HSN का काहीतरी नंबर मागितला होता. जो कि द्यायला जमला नाही पण संक्षींना घालून पाडून बोललं गेलं! सोबतीला इतर सवंगडी आलेच लगेच... १-२ दिवसातच संक्षींचा आयडी देखील बॅन झाला!" असो, आताशा इकडे येणे कमीच केले असल्याने स्वतःच्या आयडीबद्दल फारसे ममत्व राहिलेले नाही त्यामुळे चालू द्यात काहीही! ट्रोल्सचे पीक चिखलात उत्तम येत आहे.

In reply to by अर्वाच्य

शब्दबम्बाळ 21/02/2019 - 18:29
द्वेषातुन प्रतिसाद देण्याची काही गरज नव्हती असे वाटते... त्यांनी केलेल चांगले लिखाण हे चांगलेच आहे.. जिथे चुक वाटते तिथेच बोलणे संयुक्तिक असावे

In reply to by शब्दबम्बाळ

शब्दबम्बाळ 22/02/2019 - 14:09
अर्वाच्य हा आयडी इतक्यात बॅन पण झाला! केवढं ते स्पीड! इथले बरेच मान्यवर आयडी इतरांची लायकी/पगार काढून, शिवीगाळ करूनही कवच कुंडले पांघरून सुरक्षित राहतात असे दिसतंय! असेही खाजगी संस्थळ आहे म्हणा! पण मग जाहीर करून टाका ना, की या या आयडीना स्पेशल प्रोटेक्शन योजना आहे, बाकी लोकांनी काहीही बोलू नये अन्यथा १ दिवसाच्या आत हकालपट्टी होईल. याशिवाय फेक न्यूज पसरवल्याबद्दल अवाक्षर देखील काढलेलं नाहीये अजून कोणी! पुरावा दिल्यावर आता सवंगडी आणि फॉलोवर गायब झाले वाटत...

In reply to by शब्दबम्बाळ

यशवंत पाटील 22/02/2019 - 14:25
म्हणून गपगुमान बस्तो. काही लोकांनी कायबी लीहीलं तर चालतंय हिकड. अट एकच मोदीशेठला चांगलं म्हणा. म्हात्रे साहेब न ते दुसरे खरे साहेब यांना आवरा अस कुणी सांगायच आन कुणाला. ते गुर्जी का कोण आन ते मोदक साहेब न्हाईत वाटत आजकाल.

In reply to by शब्दबम्बाळ

विशुमित 22/02/2019 - 14:39
संपादक मंडळ- आय डी बॅन बाबत काही पारदर्शकता आणता येउ शकते का ? नाहीतर मिपा हे २०१९ च्या निवडणुकीपर्यंतच स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू शकेल. कृपया याला कोणी "गर्भित धमकी" वगैरे असली विशेषणे लावू नका. कारण ती मी फाट्यावर मारत असतो. मला फक्त मिपाची काळजी आहे. विविध वाङ्मय रसग्रहणाची हक्काची जागा म्हणून मी या संकेतस्थळाकडे आज पर्यंत तरी पाहिले आहे.

In reply to by विशुमित

शब्दबम्बाळ 25/02/2019 - 10:50
अहो संपादक मंडळाला विनंती करताय पण त्यात कोण आहे पाहिलंय का? :) बर मागे कोणीतरी म्हटलं होत कि संपादक मंडळाला अधिकार नाहीत हकालपट्टीचे, पण "वट्ट" असला कि कोण काय बोलणारे?! ;) इतरांनी चुकीची बातमी दिली(जी फक्त भाजपशी रिलेटेड असेल) तर पानभर लिहितील समोरच्याला उपदेश! पण स्वतः दिलेली सगळी माहिती चुकीची निघाल्यावर खेद व्यक्त करायला पण जमत नाही! ब्रम्हांडनायकाकरून हि गोष्ट तेव्हडी चांगली शिकून घेतलीये त्यांच्या फोल्लोवर्सनी!

In reply to by lakhu risbud

विशुमित 25/02/2019 - 16:01
तुम्हाला सदाशिव पेठेत जायचे असताना बारामतीच्या एस टी त कसे काय बसता?? काही केमिकल लोचा आहे का?? === अवांतर- काही महाभाग वारसाहक्काने मिळाल्यासारखं मिपावर वावरत असतात. प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात.

In reply to by विशुमित

lakhu risbud 26/02/2019 - 13:03
असे हिसके मारू नका हो ! गळ्यातला पट्टा अचानक दिसतो हो. अवांतर- काही महाभाग वारसाहक्काने मिळाल्यासारखं मिपावर वावरत असतात. प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात. स्वतःबद्दलचे एवढे अचूक आणि परखड निरीक्षण करणारे आजकाल विरळच ! मिपाकर म्हणून तुमच्या प्रगतीबद्दल अभिमान वाटला.

In reply to by lakhu risbud

विशुमित 26/02/2019 - 13:25
असे हिसके मारू नका हो ! गळ्यातला पट्टा अचानक दिसतो हो. ==)) अस होय, सोर्री सॉरी. उगाच हिस्के मारले तुम्हाला. त्यां मेनका मैडम यायच्या धावत. तुम्हाला दुखलं असेल ना! === बाकी वरचं विश्लेषण तुमच्यासाठीच होते. वाटले होते तुम्हाला समजले असेल पण तुम्हाला एस टी चा बोर्डच नाही समजत तर हे कुठले समजायला. असो. आता तरी समजलं असेल अशी आशा करुयात. आता तुम्हाला युयु करतोय, परत आला की हाड हाडच असणार आहे ...!

In reply to by lakhu risbud

तेजस आठवले 26/02/2019 - 15:00
प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात.
हे वाक्य अप्रतिम आहे, पण ते प्रत्येकालाच लागू होते ह्याची नोंद घ्यावी. वारसाहक्काने कुठले आयडी स्वतःच्या प्रतिकृती काढून येत आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे.बिग्रेडी अजेंडा राबवणारे ह्याला अपवाद नाहीत.

In reply to by शब्दबम्बाळ

जिएसटी च्या धाग्यावर त्यांनी चुकीचे टॅक्स टेबल टाकून स्वस्ताई दाखवायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा संक्षींनी व्यवस्थित विरोध केला होता आणि HSN का काहीतरी नंबर मागितला होता. जो कि द्यायला जमला मला फक्त जिएसटी माधे इन्तेरेस्त आहे ,कोनि धाग सन्गु शकेल कोन्त आहे ?

Blackcat 21/02/2019 - 17:38
२०१४ पासून काश्मीरमध्ये दर दोन दहशतवाद्यांमागे एक जवान शहीद https://www.loksatta.com/desh-videsh-news/since-2014-in-kashmir-for-every-2-militants-killed-forces-lost-1-of-its-men-1845217/

Blackcat 21/02/2019 - 19:31
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सैनिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सर्व केंद्रीय सुरक्षा दलांना आता जम्मूहून श्रीनगरला नेण्यासाठी विमान प्रवासाची सेवा पुरवली जाणार आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार आता बीएसएफ, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी आणि आयटीबीपीच्या जवानांना काश्मीर खोऱ्यात तैनातीसाठी हवाईमार्गे श्रीनगरला नेलं जाणार आहे. सुट्टीवर जाताना, सुट्टीवरुन परतताना किंवा सुरक्षा दलाच्या पथकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी हवाईमार्गाचा वापर केला जाणार आहे. दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली आणि जम्मू-श्रीनगर व श्रीनगर-दिल्ली या मार्गावर विमान सेवेचा वापर केला जाईल. जवळपास 7 लाख 80 हजार जवानांना याचा लाभ मिळणार, केंद्रीय गृहमंत्रालयाचा हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-pulwama-attack-govt-allows-air-travel-for-jawans-of-crpf-and-other-forces-deployed-in-kashmir-1845151/ मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी पडले.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ 21/02/2019 - 19:49
मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी पडले. हे बघण्या आधी भाजपा सरकारला सैनिकांची सुरक्षा व त्यांचे जीव हे जास्त महत्वाचे आहेत हा महत्वाचा संदेश दिलेला आहे. त्यामुळे जवळपास ८ लाख सैनिक हे श्री मोदीजींचे फॅन झालेले आहेत. सैनिकांच्या रक्ताची दलाली करणार्यां काँग्रेसला व अश्या पक्षाची दलाली करणार्या निर्बुद्धाला हे कळणार नाही !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

गामा पैलवान 21/02/2019 - 21:43
ए माझ्या काळ्याकुट्ट मनीमावट्ये, तू कित्तीकीत्ती गोंडस आहेस, अगदी त्या पप्पूसारखी गं! पण तू किनई त्याच्यारखा बथ्थडपणा करू नकोस हं. विमान म्हणजे काय गं माऊ? हे वाक्य 'दारू म्हणजे काय रे भाऊ' याच्या धर्तीवर शंभर वेळा बडबडून बघ. मग तुला विमान आणि हेलिकॉप्टर यांच्यातला फरक आपोआप कळून येईल. तु. न., -गा.पै.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 21/02/2019 - 20:26
७ लाख ८० हजार एका सुटीच्या वेळेस होणारे ४ हजार येण्यासाठी आणि ४ हजार जाण्यासाठी असे ८ हजार प्रत्येकी म्हणजे ६२४ कोटी रुपये एका सुटीला देणे सरकारला ( आणि पर्यायाने जनतेला) परवडणार आहे का? वर्षात तीन वेळेस जवानांना सुटी मिळते याच्या तिप्पट खर्च शक्य आहे का? आणि असल्यास एवढी विमाने कोणाकडे आहेत? आणि आता श्रीनगर च्या विमानांचे आरक्षण मिळणे अशक्य होणार आहे. वायुदलाची किंवा एअर इंडियाची विमाने गृह खात्याकडून वापरली तर त्याचे पैसे तर द्यावेच लागतील अर्थ खात्याची मंजुरी मिळेल का? हा एक मोठा प्रश्न आहे. नि जर्क रिऍक्शन आहे एवढेच मी म्हणेन.

Blackcat 21/02/2019 - 20:37
हल्ला झाला तेंव्हा महामहिम जिम कॉर्बेट पार्क मध्ये फोटो शूट करत होते म्हणे , असे सर्वत्र येत आहे, खरे आहे का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

विशुमित 22/02/2019 - 13:52
त्यांना खराब हवामानामुळे उशीरा संदेश पोहचला, असे स्पष्टीकरण आले आहे. === ते पिश्चर मधे दाखवतात तसा रेडिओ सेट नव्हते का त्यांच्या ताफ्यात?? "अल्फा टॅगो चार्ली, ओव्हर ऍण्ड आऊट..!!""

प्रसाद_१९८२ 21/02/2019 - 21:05
हल्ला झाला तेंव्हा महामहिम जिम कॉर्बेट पार्क मध्ये फोटो शूट करत होते म्हणे , असे सर्वत्र येत आहे, खरे आहे का ? -- असा हल्ला होईल, हे काय स्वप्नात आले होते का त्यांच्या ? -- तो कॉंग्रेसी सुरजेवाला डोक्यावर पडलेला माणूस आहे, फार लक्ष नका देऊ तुम्ही त्याच्याकडे.

In reply to by प्रसाद_१९८२

डँबिस००७ 22/02/2019 - 14:51
भ्रष्ट काँग्रेस सुरझेवाला , दिग्विजय सींग , मणी शंकर अय्यर सारख्या लोकांमुळे बुडणार आहे !!

या हल्ल्यामुळे सर्व सुरक्षासंस्था (सैनिकी, निमसैनिकी आणि मुलकी) चिडलेल्या असणारच. मात्र, कोणतीही सक्षम आणि विकसित व्यक्ती अथवा संस्थेची प्रतिक्रिया चिडीची व प्रतिक्षिप्त (नी जर्क) नसते. ते काम पूर्ण विचारांती आणि आपण ठरवलेल्या वेळ, स्थळ आणि पद्धतिने करायचे असते... तसे केले तरच स्वतचे शून्य/कमीत कमी नुकसान व शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान/बिमोड करणे शक्य असते. डोके गरम करून केलेली कृती स्वतःचेच जास्त नुकसान करते. पंतप्रधानांनी, त्यासंबंधी आज आणि अगोदरही अनेक संकेत दिलेले आहेतच. तेव्हा, शत्रूची आणि स्वतःची कशी परिस्थिती आहे हे माहीत नसता, उगा तर्क/वितर्क न करता थोडीशी कळ सोसणे आणि नंतर घडलेली सत्य परिस्थिती पाहणे हेच उचीत ठरेल. केवळ, "माझ्या मते काय कृती करावी" असा अपुर्‍या माहीतीवर आधारलेली (uninformed) मागणी/विधान करायचे असले तर, ठीक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@ गामा पैलवान तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणे सुरू झाले आहे... मात्र, ही फक्त चांचणी परिक्षा आहे. ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यामधले दोन गर्भित संदेश जाणून घेण्याजोगे आहेत... १. उध्वस्त केलेल्या ३ अतिरेकी कँप्सपैकी एक बालाकोट येथिल कँप पाकिस्तानी भूमीवर (पाकव्याप्त काश्मीरमध्ये नाही) आहे (म्हणजे होता, आता १००० किलो वजनांच्या लेझर गायडेड बाँब्जनी नष्ट झाला आहे). ३. एकूण सुमारे २४५ अतिरेकी मारले गेले आहेत. त्यांत, कंदाहार विमान अपहरणात सामील असलेला, मसूद अझरचा जवळचा नातेवाईक मारला गेला आहे. ३. इतकी मोठी सैनिकी कारवाई झाली असूनही पंतप्रधानांनी त्यांचा आजचा एकही कार्यक्रम बदलला नाही. यामधील, त्यांची राजस्थानात चुरू येथे असलेली सार्वजनिक राककिय सभा सुरू झाली आहे. हा पाकिस्तानला, "तू चिलट आहेस. तुला भारत सहज चिरडू शकतो. आजची कारवाई आमच्यासाठी फार साधी आहे.", असा संदेश आहे.

दिगोचि 16/02/2019 - 05:26
प्रथम म्रुत जवानाना श्रद्धान्जली. सरकार त्यान्च्या कुटुम्बियान्ची उत्तम सोय करेलच ही खात्री आहे. या हल्ल्यात वापरलेली ३५० किलोग्राम स्फोटके काश्मिरात कोठून व कशी आली किसाठवली होतीम्वा येऊ शकली याचा शोध करणे जरूर आहे. तसेच ती आल्यावर कोठे साठवली होती. तसेच इन्टरनेटवरून कोणाशी सम्बन्ध होते हे पण जाणणे जरूर आहे. पाकीस्तानवर हल्ला करायचा असेल तर तो पूर्ण विचार करून करावा. असा हल्ला केला तर त्यासाठी पाकिस्तान तयार असेल व त्यात अनेक सैनिक शहिद होतिल त्याचा परिणाम सरकारवर पर्यायाने मोदीवर म्हणजे होणार्या निवडणुकीवर होईल. सध्या तरी पाकिस्तानवर इतर राष्ट्राकडुन दडपण आणणे, पाकिस्तानी नागरीकाना व्हिसा देणे बन्द करणे वगैरे उपाय करावे.

Rajesh188 16/02/2019 - 08:27
निमलष्करी दल आसेल किंवा लष्करी दल आसेल जेव्हा ऐका जागेवरून दुसऱ्या जागेकडे पाठवले जाते तेव्हा त्याचे नक्कीच काहीतरी नियम आसतात .त्यात काश्मीर हा सवेदनशिल भाग आहे म्हणजे तिथे अजून कडकं नियम असणार.पण हयात ज्या मार्गे फोर्स प्रवास करणार आस्ते तो रस्ता सुरक्षित आहे का ह्याची तपासणी केली जाते तशी आता पण केली असणार . ज्या हायवे ज्या चेक पोष्ट होत्या त्या काही कारणाने local सरकारनी हटवल्या होत्या आस मी वाचलं आहे . आणि आपल्याकडे संसाधन ची कमी असल्या मुळे रस्ता खराब जरी आसेल तरी हवाई मार्गे सैन्य पाठवायला मर्यादा आहे . आता ह्या हल्ल्या नंतर जी कारवाई होईल ती गुप्त असणार आणि आसली पाहिजे .आणि हा विषय राजकारणासाठी कोणीच वापरू नये ह्या मध्येच देश हित आहे

In reply to by Rajesh188

ज्या हायवे ज्या चेक पोष्ट होत्या त्या काही कारणाने local सरकारनी हटवल्या होत्या आस मी वाचलं आहे . हे मुख्य दुखणे आहे, जे हितसंबंधी माध्यमे जनतेसमोर आणत नाही. काही काळापूर्वी, जम्मू-कश्मिरमध्ये, बॅरिकेड उभारण्यासाठी कडक नियमावली होती. त्या वेळेस स्वतःला महत्वाचा समजणारी एक व्यक्ती (आता नाव आठवत नाही) बॅरिकेडवर थांबणे म्हणजे अपमान समजली आणि तिने दोन बॅरीकेड्सना धडक देऊन गाडी पुढे काढली. तिसर्‍या बॅरिकेडला तो धडक मारत असताना तेथे असलेल्या सुरक्षासैनिकाने, अर्थातच, त्याच्यावर गोळीबार केला. त्यात ती व्यक्ती मरण पावली. या घटनेवर, त्याकाळी मुख्यमंत्री असलेल्या मेहबुबा मुफ्ती आणि (अर्थातच) मानवतेच्या तथाकथित पाठीराख्यांनी, गदारोळ केला. त्या सुरक्षासैनिकावर खटला भरला गेला आणि त्याला शिक्षा होऊन तो आता (बहुदा तिहार) तुरुंगात खितपत पडला आहे. त्यानंतर, Confidence building च्या नावाखाली सुरक्षादलांच्या बॅरिकेड्स उभारण्याच्या कृतीवर लक्षणीय बंधणे घालण्यात आली. इतर कारणांबरोबरच या कारणामुळे, पुलवामा येथे, अतिरेक्याला कॉन्व्हॉयच्या जवळ जाणे शक्य झाले. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता बॅरिकेड्सचे नियम परत कडक केले जात आहेत, अश्या बातम्या आहेत.

In reply to by अर्वाच्य

Blackcat 19/02/2019 - 20:09
https://www.indiatoday.in/fact-check/story/fact-check-viral-claim-that-mehbooba-sent-army-jawans-to-tihar-is-false-1459230-2019-02-18 Fact Check: Viral claim that Mehbooba sent Army jawans to Tihar is false BJP leader Subramanian Swami also claimed that the "army jawans were prosecuted and are still in jail". घटना झाली , केस झाली , गोळी घालणार्याला तिहारला नेलेदेखील , रेशीमरेघी मंद लोक खोट्या बातम्या लिहितात की जावेद अख्तरच्या सिनेमाची स्टोरी !!! तीन तासात स्टोरी खल्लास!! अजून एका बातमीत , न थांबणार्या जीपवर सुरक्षाकर्मिने टायरवर गोळी झाडली , पण त्यात काही आक्षेपार्ह मिळाले नसल्याचे दिले आहे,

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

राजाभाऊ 20/02/2019 - 06:38
काळीमाऊ, तुम्ही दिलेल्या लेखातलाच हा परिच्छेद - >>We reached out to Gen. Bakshi about the claims that he made during the TV show. He admitted that he was wrong about his claim regarding the armymen languishing in jail. However, he insisted that the PDP government was responsible for relaxing the security checking procedures in the Valley which were earlier being followed. व्हेन यु अँड दि सो कॉल्ड प्रेस्टिट्युट्स आर गोइंग टु अ‍ॅडमिट/नोटिस एलिफंट इन दि रूम? इथे महत्वाचं काय आहे - जवानाला झालेली (किंवा न झालेली) शिक्षा कि सिक्युरिटी लॅप्समुळे घडलेली दुर्घटना? सेना दलांच्या बाबतीत तरी हा चूक/तो चूक या पक्षिय राजकारणांतुन वर उठण्याचा प्रयत्न करा...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अर्वाच्य 20/02/2019 - 12:51
https://goo.gl/uP1CcQ दिलेलि लिन्क शन्तपने शेवटपर्यंत वाचा. आपले महामहिम ह्याच घटनेसाठी स्वतः श्रेय घेतांना दिसतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शब्दबम्बाळ 20/02/2019 - 13:50
मोदी सरकार पुलवामाच्या घटनेला कसे जबाबदार नाही हे दाखवण्याचा समर्थकांचा/भक्तांचा आटापिटा बघून कीव येते बिचाऱ्याची! आधी कुठलीही योजना मनासारखी झाली नाही कि काँग्रेस वरती ढाकळायचं धोरण होत आता हा हल्ला होऊन इतके जवान शहीद झाले तरी याना आपली कातडी वाचवायचं पडलं आहे फक्त! आणि इतर वेळी आम्ही कोणाचे झेंडे घेऊन फिरत नाही म्हणणारे मिपाचे विद्वान लोक हळूच "फेक न्यूज" ढकलवतात. परत कोणी सांगितलं हे खोट आहे कि म्हणता येतं कि "लोकांनी हे पाहून त्याची समीक्षा वगैरे करावी या उद्देशाने इथे दिले होते वगैरे!" आधी पोस्टकार्ड साईझ यायच्या आता साईझ मोठा आहे. वरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली घटना मुफ्तीच्या CM काळात झालीच नाहीए! जवानांना अटकसुद्धा झालीच नाहीये! त्यात कहर म्हणजे 2014च्या घटनेनंतर स्वतः जेटली यांनी ट्विट करून त्या घटनेचा दुःख व्यक्त करत कारवाईची हमी दिलेली होती. जेटली बीजेपीचे कि आणखी कोणाचे?? त्यावर कहर म्हणजे प्रधानसेवक "मला सेवा करायची संधी द्या" सांगायला जेव्हा 2014ला श्रीनगरला गेलेले तेव्हा मोठ्या तावात (जो की नेहमीच असतो म्हणा) "गेल्या ३०वर्षात कधी असे झाले नव्हते पण केवळ मी आल्यावर सेनेने जाहीर माफी मागितली आहे आणि ज्यांनी गोळ्या चालवल्या त्यांच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या आहेत. हे फक्त माझ्या सरकारमुळे होऊ शकल आहे" असे स्पष्ट म्हणताना दिसतात. मग आता अचानक यु टर्न कसा घेतला बरे? आणि घटनेचं राजकारण करू नका म्हणायचं आणि बीजेपीचे अध्यक्ष म्हणतात "आमच्या पार्टीचं सरकार आहे काँग्रेसचं नाहीये म्हणून कारवाई होणार दोषी लोकांवर"

In reply to by शब्दबम्बाळ

विनोद१८ 23/02/2019 - 00:28
'वरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली घटना मुफ्तीच्या CM काळात झालीच नाहीए! जवानांना अटकसुद्धा झालीच नाहीये! त्यात कहर म्हणजे 2014च्या घटनेनंतर स्वतः जेटली यांनी ट्विट करून त्या घटनेचा दुःख व्यक्त करत कारवाईची हमी दिलेली होती. जेटली बीजेपीचे कि आणखी कोणाचे?? त्यावर कहर म्हणजे प्रधानसेवक "मला सेवा करायची संधी द्या" सांगायला जेव्हा 2014ला श्रीनगरला गेलेले तेव्हा मोठ्या तावात (जो की नेहमीच असतो म्हणा ) "गेल्या ३०वर्षात कधी असे झाले नव्हते पण केवळ मी आल्यावर सेनेने जाहीर माफी मागितली आहे आणि ज्यांनी गोळ्या चालवल्या त्यांच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या आहेत. हे फक्त माझ्या सरकारमुळे होऊ शकल आहे" असे स्पष्ट म्हणताना दिसतात. मग आता अचानक यु टर्न कसा घेतला बरे?' वरच्या तीनही विधानां संबंधी पुरावे दिलेत तर मिपाकरांच्या ज्ञानात भर पडेल. जो प्रश्न गेल्या ७० वर्षापुर्वी निर्माण केला गेला आणि आजपर्यन्त सुटला नाही तो चुटकी सरशी सोडविण्याचा काही उपाय तुमच्याकडे आहे का ?? पुलवामाच्या घटनेची जबाबदारी सरकारने झिडकारली असे का वाटते ?? काय गेल्या ७० वर्षात यापेक्षा भयानक घटना / घातपात देशात झालेच नाहीत का ?? किती माणसे आणि सैनिक या काश्मीरसाठी देशाने गमाविलेत याची मोज्दाद केलीत काय कधी ?? आधी कुठलीही योजना मनासारखी झाली नाही कि काँग्रेस वरती ढाकळायचं धोरण होत आता हा हल्ला होऊन इतके जवान शहीद झाले तरी याना आपली कातडी वाचवायचं पडलं आहे फक्त! कुठे कोणी आणि कशी आपली कातडी वाचविलेली दिसली या प्रकरणी ?? जरा विस्ताराने लिहिलेत तर त्याला काही अर्थ आहे. मुळात ह्या काश्मीर प्रश्ण निर्माण कोणी केला, त्यावर आपले राजकारण कोणी केले हे कसे विसरता येइल.

गेल्या महिन्याभरापासून सी.आर.पी.एफ.वर अधून मधून हल्ले होतच होते. दुर्दैवाने लष्कर प्रमुखांनी "आम्ही कोणत्याही हल्ल्यास तोंड देण्यास तयार आहोत" असे एका प्रश्नाला उत्तर दिले होते. १ फेब्रुवारी- अनंतनाग येथे हल्ला (https://www.tribuneindia.com/news/jammu-kashmir/two-crpf-men-among-8-hurt-in-anantnag-grenade-attack/721944.html ) १८ जानेवारी ला श्रीनगरच्या लाल्चौकात हल्ला https://economictimes.indiatimes.com/news/defence/srinagar-militants-lob-grenade-near-crpf-bunker-in-lal-chowk/videoshow/67587830.cms ११ फेब्रुवारीला ग्रेनेड हल्ला - http://risingkashmir.com/news/4-cops-3-crpf-men-among-11-injured-in-palladium-grenade-blast-343653.html

In reply to by चौकटराजा

तेजस आठवले 20/02/2019 - 14:59
ह्या बातमीची लिंक मिळेल का? खरंच ते असं म्हणाले ? कठीण आहे. एवढेच काय, उद्या औरंगजेब, अफझलखान आणि गझनीचा मेहमूद ही टोपणनामे घेऊन अनुक्रमे जोशी, बापट आणि गोडबोले ह्यांनी भारतीय जनतेवर अनन्वित अत्याचार केले असे सुद्धा हे ब्रिगेडी लोक ठोकून देतील.

गामा पैलवान 19/02/2019 - 00:30
लोकहो, पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान व सैन्य जे करायला पाहिजे ते करेलंच. पण एक सामान्य माणूस म्हणून आपण काय करू शकतो, असा प्रश्न पडणं साहजिकंच आहे. माझ्या मते आपण घटनेतलं ३७० कलम रद्द करायचा आग्रह धरू शकतो. बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भारतातले राजकीय नेत्रुत्व/यंत्रणा जेव्हा जेव्हा अपयशी ठरते तेव्हा "तुम्ही काय केले देशासाठी?" हा प्रश्न सामान्य मतदारांना नेहमी विचारण्यात येतो. " देश की सेना तो काम कर रही है. लेकिन आपने क्या किया देश के लिये?" इंदिरा गांधीनी दोन-तीन वेळा भाषणात विचारल्याचे स्मरते. असो. १)डिसेंबर पासून हल्ले होत असतना आपली गुप्तचर यंत्रणा गप्प राहिली.. वा अपयशी ठरली. यंत्रणेच्या प्रमुखाने/गृहखात्याने हे सांगायला हवे की नको? २) बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ. ने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बसेसने नेण्यास विरोध केला होता. हॅलिकॉप्टरची मागणी केली होती. ती अमान्य झाली. काल सर्वपक्षीय बैठक झाली. ह्यात सर्वानी 'पलिकडून' दहश्तवाद्यांना मिळणार्या मदतीबद्दल धिक्कार केला. ह्या ठरावात "पाकिस्तान' हा उल्लेखही नाही. ! एवढे पोलिटिकली सेफ का? असो. चीन्/सौदी अरेबियाचे काय करायचे? चीन हफीझ सईदला दहशतवादी मानायला तयार नाही. आणी पाकिस्तान हे सर्व धंदे करतो हे माहित असूनही सौदीचे राजपुत्र काल पाकिस्तान भेटीवर गेले व प्रचंड आर्थिक मदतही जाहीर केली. सौदी-पाक मैत्री जुनी आहे. आज ते भारतात येत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विशुमित 19/02/2019 - 10:41
असले अडचणीचे प्रश्न विचारयचे नसतात ग माई. घरचा मामला आहे. जनतेने फक्त मेणबत्या पेटवायच्या, जवानांच्या कुटुंबीयांना पेटीएम द्वारे दान करायचे ( खरंच चक्क एकजण असेच म्हटला "दान करायचे,"), ठरल्याप्रमाणे मुस्लिम, कश्मिरी तरूण आणि पाकिस्तानवर बिल फाडायचं. असो..

In reply to by विशुमित

इरसाल 19/02/2019 - 16:17
ठरल्याप्रमाणे मुस्लिम, कश्मिरी तरूण आणि पाकिस्तानवर बिल फाडायचं. असो.. यातुन ह्या लोकांनी काही केलेले नाही असा अर्थ निघतोय. आणी तुम्ही असं लिहीताय म्हणजे हे कोणी केलय याबाबत तुम्हाला माहिती असावी अस दिसतय. कॄपया सरकारला योग्य ती माहिती पुरवुन गुन्हेगारांना शासन होण्यास मदत करावी ही नम्र विनंती.

In reply to by विशुमित

डँबिस००७ 19/02/2019 - 23:00
असले अडचणीचे प्रश्न विचारयचे नसतात ग माई. घरचा मामला आहे. सर्व दलीय बैठकीत पाकिस्तानचा उ ल्लेख टाळणे म्हणजे अडचणीचे प्रश्न असतील तर चक्क काँग्रेसच्या उच्च पदस्थांनी बोललेले कोणाला सांगणार ? उदा, ओसामाजी लादेन जी, ( दिग्विजय सींग ) किंवा अफजल गुरुजी ( रणदीप सुरझेवाला) हा तर फक्त कॉग्रेसच्याच घरचा मामला होता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे 19/02/2019 - 20:03
१)डिसेंबर पासून हल्ले होत असतना आपली गुप्तचर यंत्रणा गप्प राहिली.. वा अपयशी ठरली. यंत्रणेच्या प्रमुखाने/गृहखात्याने हे सांगायला हवे की नको? पुलवामा मध्ये यापूर्वी म्हणजे २०१८ मध्येच तीन वेळेस चकमकी झाल्या (३० एप्रिल, २९ जून आणि १५ डिसेम्बर) या गुप्तहेर खात्याच्या बातम्यांमुळेच झाल्या ना? कि लष्कर घराघरात शिरून रोज तपासणी करीत होते? १०० धागे दोरे मिळतात त्या सर्वांवर कार्यवाही होत असते पण प्रत्यक्ष एखादाच धागा ठोस पुराव्या सोबत असतो. एक लक्षात ठेवा जेन्व्हा एक हल्ला होतो तेंव्हा त्याच्या मागे कमीत कमी १०० हल्ले निकामी केलेले असतात. खबरी मिळवणे त्याचे विश्लेषण करणे आणि त्यातून सज्जड अशी माहिती तयार करणे हे काय आपोआप होणारे काम आहे का? शेंडा ना बुडखा पण कळफलक बडवायचा २) बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ. ने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बसेसने नेण्यास विरोध केला होता. हॅलिकॉप्टरची मागणी केली होती. ती अमान्य झाली. २५०० सैनिकांना जम्मू वरून श्रीनगरला हेलिकॉप्टरने न्यायचे या साठी हेलिकॉप्टरच्या किती फेऱ्या लागतील याची कल्पना आहे का? साधारण माणशी २० रुपये/ किमी या दराने २०० किमी (कावळा उडतो तसे) ४००० रुपये माणशी लागतील म्हणजे १ कोटी रुपये नुसते इंधनावर लागतील. हे सुद्धा सरळ उडायचे असेल तर उंची गाठायची असेल तर हे गणित बदलते. जम्मू समुद्रसपाटीच्या ३५० मीटर वर आहे आणि श्रीनगर १५८५ या उंचीवर चढवण्यासाठी इंधन दुप्पट खर्च होते. बाकी हेलिकॉप्टरच्या ५०० तासांची किंमत त्याच्या पायलटचा पगार अलाहिदा. त्यांना हेलिकॉप्टरने नेण्यासाठी परवानगी कुणी द्यायची (अशी परवानगी मंत्रालयातून मिळण्यास तीन ते चार महिने सहज लागतील). संरक्षण मंत्रालयातील बाबूंनी आणि कॅगने लेखा हरकत (AUDIT OBJECTION) घेतले तर ते पैसे कुणी भरायचे? सैनिकांच्या पगारातून वसूल करायचे? कि अधिकाऱ्यांच्या? आणि एकदा असे केले कि "वहिवाट" होण्याची भीती असते ती गोष्ट वेगळी. कोणतरी बुणगा काही तरी बलतो आणि ते लोक पुढे ढकलतात. उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे आज जो उठतो तो बेफाट आरोप करतोय

In reply to by सुबोध खरे

Blackcat 19/02/2019 - 20:18
साध्या निमलष्करी जवानांना विमान अन हेलिकॉप्टर द्यायला ते का मंत्री आहेत ? निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत , कॉन्ट्रॅक्टवाल्यांचे पगार 2012 ला काँग्रेस काळात वाढले होते , नन्तर काही नाही. ) आजवर हल्ल्यात जितके मेले , त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्यात म्हणे. https://youtu.be/IuhtlAq3yNY

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ 19/02/2019 - 23:04
निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत २०१२ नंतर डायरेक्ट २०१४ सुरु होत हे नविनच कळल !! २०१२ ते २०१४ पर्यंत ते तुमचे भ्रष्ट सरकार काय करत होते म्हणे ? ह्यांच्या ईथे क्लीष्ट गणित सोडाच , साधे आकडे मोजण्याचे सुद्धा वांदे आहेत तर !! एक पद एक पेन्शन तर तुमच्या भ्रष्ट काँग्रेसच्या सरकार ने १० वर्षे अडगळीत टाकलेले होते हे विसरलात ?

In reply to by डँबिस००७

Blackcat 19/02/2019 - 23:15
तुमचे गणित कच्चे आहे, 2012 ला पगाराचे स्लॅब वाढले , मग पाच वर्षे किरकोळ इन्क्रीमेंट असतात , त्याही दोन तीन वर्षे मिळत नाहीत , त्यांनतर पुन्हा स्लॅब वाढणे 2017 ला अपेक्षित होते, पण भाजप सरकारने ते 2021 पर्यंत पुढे ढकलले , फक्त इन्क्रीमेंट मिळतील ह्याची घोषणा केली , तेही 2017 पासून मिळाले नाहीत. 2-3 वर्षे झाली की एखादे इन्क्रीमेंट देतात , एक दोन राखून ठेवतात

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Blackcat 19/02/2019 - 23:21
आमचे काँग्रेस निदान स्लॅब तरी पाच वर्षांनी वेळेवर वाढवत होते , मधल्या काळात इन्क्रीमेंट असेनात का मागेपुढे, पण भाजपे तर स्लॅबच पुढे ढकलत आहेत , आणि गम्मत म्हणजे महाराष्ट्रीतील भाजप सरकारने याच काळात आमदारांचे पगार 50 हजारवरून दीड लाख केले .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 20/02/2019 - 10:57
तुम्ही आपली बुद्धी बाजूला ठेवूनच प्रतिसाद लिहिता का हो? कि बेलाशक खोटे बोलणे याबद्दल तुम्हाला काहीही वाटेनासे झाले आहे? काश्मीर मधील केंद्रीय राखीव पोलीस दल हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. वेतन आयोग नावाची काही वस्तू अतित्वात आहे याबद्दल आपल्याला माहिती आहे का? सहावा वेतन आयोग २००६ साली आला आणि त्याची अंमल बजावणी २००८ मध्ये झाली. https://en.wikipedia.org/wiki/Sixth_Central_Pay_Commission तसेच २०१५च्या नोव्हेंबर महिन्यात सातव्या वेतन आयोगाचा अहवाल आला आणि तो मोदी सरकारने ५ सप्टेंबर २०१६ लागू केला On 5 September 2016 the Bharatiya Janata Party (BJP) led National Democratic Alliance (NDA) government implemented the recommendations of the 7CPC including those affecting the armed forces with minor modifications.(स्रोत विकिपीडिया) उगाच नको तेथे अक्कल पाजळणे थांबवा. केंद्रीय वेतन आयोग "१० वर्षातून" एकदाच बसतो बाकीचा वेळ फक्त महागाई भत्ता वाढवता येतो. आमचे काँग्रेस निदान स्लॅब तरी पाच वर्षांनी वेळेवर वाढवत होते.

हे सिद्ध करून दाखवा हे तुम्हाला आव्हान आहे.

नाही तर अशा धादांत खोट्या प्रतिसादाबद्दल माफी मागा

In reply to by सुबोध खरे

प्रसाद_१९८२ 20/02/2019 - 11:17
हे सिद्ध करून दाखवा हे तुम्हाला आव्हान आहे. नाही तर अशा धादांत खोट्या प्रतिसादाबद्दल माफी मागा
-- सर, आता तो मोगा तुमच्या या प्रतिसादाकडे फिरकणार देखील नाही.

In reply to by सुबोध खरे

Blackcat 20/02/2019 - 11:19
हे आलेच धावून, पाच वर्षे स्लॅब हे आमच्या पगाराबद्दल लिहिले आहे, बाकी , त्यांच्या पगाराबद्दल व्हिडिओत आहे , ते वाचा, सैनिकांना हेलिकॉप्टर वापरायचा अधिकार नाही , हे बोलून तुम्हीच आधुनिक वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केला आहे , तुम्हीच देशाची माफी मागा, सैनिकांनी जीव घालवावा , पण त्यांना सुविधा मिळणार नाहीत , हे लिहिल्याबद्दल मी डॉ खरेंचा जाहीर निषेध नोंदवत आहे

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 20/02/2019 - 12:07
तोंडाला येईल ते बोलू नका. सरकारी हेलिकॉप्टरचा वापर कशासाठी करायचा याची SOP (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर)असते. सैनिकाचा( एवढेच नव्हे तर तेथील सिव्हिलियनचा सुद्धा) "जीव वाचवण्यासाठी" तेथील डॉक्टर "स्थानीक कमांडर"च्या टेलिफोनिक परवानगीने हेलिकॉप्टर बोलावू शकतो. सैनिकांना सुटीवर जाण्यासाठी आणि सुटीवरून परत आणण्यासाठी हेलिकॉप्टर वापरुन देशाचे दिवाळे वाजवायचे आहे का? काश्मीरमध्ये एकंदर २ लाख १० हजार लष्करी जवान आणि १ लाख ३० हजार केंद्रीय पोलीस दले यांचे जावं तैनात आहेत. एवढ्या सगळ्या जवानांना (३ लाख ४० हजार) हेलिकॉप्टरने नेण्यासाठी भारताकडे तेवढी हेलिकॉप्टर्स नाहीतच. बाष्कळ बडबड खोटे बोलणे या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे इतक्या भंपक गोष्टी निर्लज्जपणे करताना जनाची नाही तरी मनाची लाज तरी बाळगा. सैनिकांनाच काय पण अधिकाऱ्यांना सुद्धा हेलिकॉप्टर वापरायचा अधिकार नाही. आधुनिक वर्णव्यवस्थेचापुरस्कार केला आहे असली घाण उगाच तोंड उचकटून कशाला बाहेर टाकता आहात? निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत) हे आपलेच लिखाण आहे ना? मग सातव्या वेतन आयोगाबद्दल न वाचता फुकट कळफलक बडवून खोटे नाटे कशाला लिहीत आहात?

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 20/02/2019 - 12:15
मोगा खान बाकी तुम्ही आर्मीत डॉक्टर म्हणून भरती होणार होतात त्याच काय झाले? हेलिकॉप्टर मध्ये फिरायची संधी मिळेल (तुमच्याच म्हणण्याप्रमाणे) आणि भरपूर पगार, भरपूर सुट्या, स्वस्त दारू राजासारखे राहाल. केंव्हा येताय? माझा ब्रिगेडियर वर्गमित्र लष्करी मुख्यालयात दिल्लीला आहे. चिकटवून टाकू कुठेतरी तंगधार https://www.google.com/maps/search/tangdhar+army+camp/@34.8687725,72.6431672,7z गुरेझ https://www.google.com/maps/search/gurez+army+camp/@34.6268302,73.7540836,8z उडी https://www.google.com/maps/place/Uri+193123/@34.0560504,73.4232996,9z/data=!4m5!3m4!1s0x38e05748af885045:0xa67531f1a8648f93!8m2!3d34.0881166!4d74.0339852 नाही तर सियाचेन आहेच एकदम आरामात राहा. छान थंड थंड बायकोची हि कटकट नाही

In reply to by सुबोध खरे

Blackcat 20/02/2019 - 12:23
हेलिकॉप्टरची मागणी त्यांनी स्वतःच केली होती , वातावरण खराब होते म्हणून, Speaking to Asia Times, a senior security official said that travelling on the road was riskier and the attack would have been avoided if they had used helicopters instead of trucks. “Had helicopters been made available to troops then this could perhaps have been avoided. This is not the main cause and we do have a massive intelligence failure. But this could have probably saved lives,” he said. https://newscentral24x7.com/pulwama-terror-attack-modi-govt-refused-helicopters-to-ferry-crpf-officials-in-kashmir/ ते सगळ्या लोकांना मजेसाठी फिरायला हेलिकॉप्टर नव्हते मागत.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 20/02/2019 - 12:37
कशाला कुठल्या तरी प्रेस्टिट्यूटच्या आड लपता आहात शिखंडी सारखे? सिनियर सिक्युरिटी ऑफिशियलचे नाव घेऊन ते खोटे बोलत आहेत त्यात तुम्ही त्यांची हांजी हांजी चालवली आहे. सिनियर सिक्युरिटी ऑफिसर जर सरकारी असेल तर त्याला वस्तुस्थिती माहिती आहे आणि सरकारी नसेल तर कुणीही बुणगा काहीही बोलतो ते तुम्ही न विचार करता पुढे पाठवून मला जाब विचारता? लष्करी दलाच्या पगारा बद्दल खोटं बोलून झालं माझ्यावर वर्णव्यवस्थेबद्दल चिखल उडवून झाला अडीच हजार सैनिकांना सुटीवरुन परत येण्यासाठी हेलिकॉप्टर कोणाचा बाप देणार होता? तीन लाख चाळीस हजार सैनिकांना वर्षात तीन वेळेस सुटीवर जाण्यासाठी आणि तीन वेळेस परत येण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवायचे तर ७०% आयकर भरावा लागेल आणि ५० % जी एस टी. भरणार का तुम्ही? बेताल आणी बाष्कळ बडबड आणि पचपच केल्याशिवाय अन्न पचत नाही का?

In reply to by सुबोध खरे

Blackcat 20/02/2019 - 14:11
मुलांना ऑक्सिजन सिलेंडरला पैसे नाहीत, सैनिकांना सुरक्षित ठेवायला पैसे नाहीत.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 20/02/2019 - 19:17
मुलांना ऑक्सिजन सिलेंडरला पैसे नाहीत, सैनिकांना सुरक्षित ठेवायला पैसे नाहीत. ना शेंडा ना बुडखा नुसतीच पचपच

In reply to by सुबोध खरे

महेश हतोळकर 21/02/2019 - 17:53
मिपावरच्या चर्चा सरकार एवढ्या गांभीर्याने घेत असेल हे माहिती नव्हते. जपून वावरायला पाहिजे बाबा इथं. http://mtonline.in/B-Lzua/a36my

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

रानरेडा 24/02/2019 - 22:55
मध्ये एका गावठी वैदू कडून उपचार करून घेतलेल्या ( आणि सरकारी कोलेज मधून डॉक्टर झालेल्या ) डॉक्टर ची खाणी ऐकली होती वर म्हणे तो डॉक्टर मुंबईत एका सरकारी रुग्णालयात आहे आणि मुसलमान बनून हि आधीच्याच हिंदू नावाने वावरत आहे , ह्लाला साठी झाला मुसलमान तो त्यामुळे डॉक्टर खरे यांना कशाला दोष द्या , डॉक्टर कसे असतात ते माहित आहे आम्हाला

In reply to by सुबोध खरे

तेजस आठवले 20/02/2019 - 14:33
संपादक मंडळ असल्या खोटारड्या प्रतिसादांवर काहीच कारवाई करणार नाही का ? का मोगा पुढे हात टेकले?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud 20/02/2019 - 13:34
मोगा खान,तुमच्या आवाक्यातला प्रश्न MBBS म्हणवणारा कोणी डागदर धनगरी औषध वापरण्याची कबुली आणि जाहिरात कसे देऊ शकतो ?

In reply to by सुबोध खरे

अर्वाच्य 20/02/2019 - 12:59
एक लक्षात ठेवा जेन्व्हा एक हल्ला होतो तेंव्हा त्याच्या मागे कमीत कमी १०० हल्ले निकामी केलेले असतात. {{> हे वाक्य जेव्हा राहुल गांधी बोलले होते तेव्हा बरीच टिका झाली होती. तुम्हि अगदि राहुल गान्धीसारखे बोलत आहात. :-) https://goo.gl/XQ8FSQ

In reply to by अर्वाच्य

सुबोध खरे 20/02/2019 - 19:23
राहुल गांधी राजकारणी आहेत पण कुठे बोलायचे आणि कुठे नाही याचा त्यांना पोच नाही. मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काही जबाबदारीने बोलावे कि नाही. सत्य कुठे आणि कसे बोलावे हे महत्त्वाचे असते. एखाद्या पायलटच्या मृत्यू प्रसंगी पायलटची चूक होती म्हणून तो दिवंगत झाला हे बोलणे सत्य असले तरी अप्रस्तुत आणि अनुचित असते अंधभक्ती हि अशीच आहे.

Rajesh188 19/02/2019 - 12:13
नेहमी 370 कलम रद्द करा आसा युक्तिवाद होतो पण ते कलम रद्द करण्याचा अधिकार संसेदला आहे का . काश्मीर भारतात जेव्हा विलीन झाला तेव्हा काही करार झाला होता त्यात हे कलम सुधा आहे आस ( मला नक्की माहित नाही चुकीचं आसेल तर माहिती द्यावी ,) ते कलम रद्द केले तर भारतीय कायदे त्या राज्याला सुधा लागू होतील .आणि भारतीय जनता तिथे जावून जमीन सुधा खरेदी करू शकेल आणि तिथे बाकी समाजाची वस्ती वाढेल आसा युक्तिवाद आहे . पण आशा अस्थिर वातावरणात tas स्थलांतर होईल

In reply to by Rajesh188

खरे आहे. एवढा साधासुधा तर्क नाही ३७० मागे. नाहीतर केव्हाच रद्द केले असते आधीच्या सरकारानी. सार्वमत झाल्याशिवाय ३७० चा निर्णय घेता येणार नाही अशी अट आहे असे वाचले होते. नक्की माहित नाही. त्यामुळे ३७० रद्द करण्याचा आग्रह धरायचा तर तो कश्मिरमध्ये घेतला पाहिजे. मुंबई/पुण्यात्/दिल्लीतल्या लोकांच्या आग्रहाला विशेष महत्व नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे 27/02/2019 - 10:57
@माईसाहेब आधीच्या सरकारांनी तीन तलाक बंद केला नाही. आधीच्या सरकारांनी बेनामी मालमत्तेचा कायदा येऊ दिला नाही आधीच्या सरकारांनी पाकिस्तानात घुसून कार्यवाही केली नाही आधीच्या सरकारांनी ३७० कलम रद्द केले नाही. यात काही साम्य दिसतंय का माईसाहेब? आधीच्या सरकारांनी केलं नाही म्हणून आताचे सरकार या गोष्टी करू शकत नाही हे म्हणणे हास्यास्पद आहे

गामा पैलवान 19/02/2019 - 14:01
माईसाहेब, भारतीय संसद अनुच्छेद ३७० स्वत:च्या अधिकारात रहित करू शकते. इतर कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही. कलम ३७०, परिच्छेद ३ असा आहे : Notwithstanding anything in the foregoing provisions of this article, the President may, by public notification, declare that this article shall cease to be operative or shall be operative only with such exceptions and modifications and from such date as he may specify: Provided that the recommendation of the Constituent Assembly of the State referred to in clause (2) shall be necessary before the President issues such a notification. वरील मजकुरातली Constituent Assembly (= घटना समिती) या घडीला अस्तित्वात नाही. त्यामुळे राष्ट्रपती एका वटहुकूमाद्वारे कलम ३७० रद्द करू शकतो. तसंही पाहता ३७० हे तात्पुरत्या तरतुदींसाठी अस्तित्वात आलेलं आहे. कलमाच्या शीर्षकात Temporary, Transitional and Special Provisions असा उल्लेख आहे. तात्पुरत्या तरतुदी रद्द करण्यातही खास परवानग्यांची गरज नसते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

धन्यवाद रे पैलवाना. Constituent Assembly अस्तित्वात नसेल तर हे डेड-लॉक झाले म्हणायचे. On 3 April 2018, the Supreme Court of India gave a similar opinion declaring that the Article 370 has acquired a permanent status. It stated that, since the State Constituent Assembly has ceased to exist, the President of India would not be able to fulfil the mandatory provisions required for its abrogation.[49] https://en.wikipedia.org/wiki/Article_370_of_the_Constitution_of_India

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गामा पैलवान 19/02/2019 - 18:02
अहो माईसाहेब, घटनासमिती अस्तित्वात नसल्याने ३७० रहित करता येणार नाही असा निर्णय जम्मूकाश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे. पुढे सर्वोच्च न्यायालयाने ३७० कायमस्वरूपी आहे असं मत प्रदर्शित केलंय. ३७० च्या शीर्षकात जरी 'तात्पुरते व अंतरिम' असा उल्लेख असला तरी त्यास कायमपणा प्राप्त झालाय. असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Article_370_of_the_Constitution_of_India#Calls_for_abrogation असं असलं तरीही माझ्या माहितीप्रमाणे घटनेचा अन्वयार्थ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास न्यायिक फेरआढावा ( = ज्युडिशियल रिव्ह्यू) घेता येतो. किंवा शासन तसा घेण्यास स.न्या.स विनंती करू शकतं. यामागचं कारण म्हणजे घटनासमिती हीच मुळी तात्पुरती योजना आहे. मग तिच्या अनास्तित्वाच्या आधारे तात्पुरते ३७० कायम कसे करता येईल? असा युक्तिवाद करून शासन सर्वोच्च न्यायालयाकडे पुनरावेदन ( = अपील) करून निर्णय फिरवून घेऊ शकेल. आ.न., -गा.पै.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Blackcat 19/02/2019 - 19:08
370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

प्लॉट्स वगैरे मोठ्या बिल्डरांना- लोढा/हिरानंदानीना,राजकीय पुढार्यांना घेऊ देत. एखादी टाऊनशीपची जाहिरात येऊ दे.. मग बघु.. असो २६-११ च्या मुंबई हल्ल्यानंतर शिवराज पाटलांनी चार दिवसात राजिनामा दिला होता. आता ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अर्धवटराव 19/02/2019 - 20:19
शिवाजीरावांनी दिवसभरात तीन वेळा कपडे बदलुन प्रतिक्रीया दिल्या, त्यावरुन ते ट्रोल झाले (आपली जनता ट्रोल करण्याच्या बाबतीत जरा जास्तच जागृत आहे). त्यांची देहबोली देखील मानसीक खच्चीकरण झाल्यासारखी निस्तेज झाली होती. त्यामुळे गृहमंत्रालयाची इमेज कचखाऊ झाल्यासारखी वाटत होती. तसंही, शिवाजीरावांना स्वतंत्रपणे बोलण्याचा काहि अधिकार नव्हता (आजच्या गृहमंत्र्यांना देखील तो अधिकार नाहि). त्यामुळे त्यांनी बस्तान आवरतं घेतलं. आबा पाटलांचा राजिनामा मात्र अवास्तव होता असं वाटतं. एक कार्यक्षम मंत्री म्हणुन मला आबा पाटील फार आवडायचे. त्यांच्या हिंदी प्रतिक्रीयेला उगाच ओढुन ताणुन दाखवण्यात आलं, आणि त्यांना राजीनाम द्यायला लागला (राष्ट्रवादीतली अंतर्गत स्पर्धा देखील काहि अंशी कारणीभूत असेल. पण पवार साहेबांचा आबांना नेहेमीच पाठिंबा राहिला आहे)

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ 19/02/2019 - 23:16
Blackcat , ३७० कलम ठेवुन कश्मिरला स्वतःच प्राईव्हेट राज्य करायचा प्लान होता का तुमच्या लाडक्या पंडीतजींचा ? नाही म्हणजे संपुर्ण देश एकसंध केलेला असताना फक्त ह्यांच्या गावाला (काश्मिरला) स्पेशल स्टेटस का हवा होता म्हणे ? 370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ? ३७० कलम असताना कायद्याप्रमाणे भारतीय माणसाला काश्मिरमध्ये प्रॉपर्टी विकत घेता येत नाही त्यामुळे विकत घ्यायची असेल तर ३७० कलम जाण्याची वाट पहावी लागेलच !

In reply to by डँबिस००७

Blackcat 19/02/2019 - 23:23
काश्मीरचे सँस्थानिक नेहरू नव्हते , कुणीतरी हरीसिंग वा तत्सम होते ना ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 20/02/2019 - 10:59
370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ? तुम्ही घ्या कि चारी बाजूला भरपूर मशिदी आणि मदरसे आहेत. तुमचा वेळ बरा जाईल

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 20/02/2019 - 12:40
बघा प्लॉट घ्यायचा असेल तर दुवा पाठवला आहे. भरपूर प्लॉट्स रिकामे आहेत. https://www.justdial.com/Baramulla/Estate-Agents-in-Gurez/nct-10192623

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 20/02/2019 - 19:25
तिकडे चारी बाजूनी मशिदी आणि भोंगेच आहेत इकडच्या सारखे "आरती, स्तोत्र, जय भवानी जय शिवाजी ऐकून " वगैरे ऐकून तुमचे ब्लड प्रेशर वाढणार नाही शिवाय तिथे प्लॉट फारच स्वस्तात आहेत.

In reply to by सुबोध खरे

रानरेडा 25/02/2019 - 00:10
आणि डोंगराळ भागात भरपूर वैदू , मेंढपाळ असतील तिकडे तुम्हाला औषधच औषध मिळेल ! फक्त आपण MBBS डॉक्टर आहात हे सांगू नका हा , ;) ;)

Rajesh188 20/02/2019 - 12:46
आपण स्वतःचा जरी विचार केला तरी समजेल . मुंबई आणि राज्यात हिंदी भाषिक लोकांची संख्या वाढली आहे आणि त्या मुळे आपण सुधा अस्वस्थ होतो .हे सत्य आहेच की . कोणत्याच राज्याच्या संस्कृतीवर आक्रमण विनाश कडे घेवून जाईल

Rajesh188 20/02/2019 - 14:08
ह्या विषयावर खूप प्रतिक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी वाचल्या . पण पूर्ण विचार करून परिणामाचा विचार करून प्रतिक्रिया खूप कमी आहेत . प्रत्येक जण आपल्या विचारधारा सोडायला तयार नाहीत आणि aashich अवस्था पाकिस्तान मध्ये सुधा आहे . डोकं थोड शांत ठेवून दोन्ही देशांनी मिळून निर्णय घेणे अपेक्षित आहे इथे भावनिक mudhe काही कामाचे नाहीत. व्यवहारिक विचार झाला पाहिजे . दोन्ही देश विकसनशील देश आहेत आणि दोघे सुधा गरीबी bairojgari,लोकसंख्या अनियंत्रित वाढ आशा बऱ्याच समस्यांनी ग्रासले आहेत .जर दोन्ही देशांना काश्मीर च हित हवं आसेल तेथील जनता सुखी समाधानी झालेली बघायची आसेल तर थोड पाठी सरल पाहिजे . दोन्ही देशाची अखंडत्व आणि सर्वभोमत्व ह्या वर कसली ही तडजोड न करता सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे . हा सुवर्ण मध्य दोन्ही देशांनी ठरवावं .तो आपण काय सुचवणार . आता आसा विचार केला की दोन्ही देश आपल्याला हवा तसा काश्मीर प्रश्न सोडवू लागला तर त्याचे परिणाम काय होतील aatangvad हा त्याच्या वर नक्कीच उपाय नाही आणि युद्ध हा सुधा उपाय नाही . Aatangvad ही दुधारी तलवार आहे हिचा वापर जो करेल ती तलवार त्याच्या वर सुधा वार करू शकते आणि ह्याचा चांगला अनुभव पाकिस्तान कडे आहे ते चक्रव्यूहात सापडले आहेत बाहेर येण्याचा मार्ग सध्या तरी बंद आहे . दोन्ही देशातील दुष्मानीचा फायदा बाकी देश मित्रत्वाचे वाचन देवून स्वतःचा स्वार्थ साधून घेतली त्यात होणाऱ्या नुकसानी शी त्यांचा काहीही संबंध नसेल . पाहिजे तर ह्या विषयावर bayanbaji करायला दोन्ही देशांनी बंदी घातली पाहिजे .प्रधान मंत्री व्यतिरिक्त कोणताही नेता ह्या विषयावर बोलणार नाही ह्याची काळजी घेणे . युद्ध न परवडणारे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत आताच युद्ध खूप भयंकर आसेल .आणि युद्ध काळात सर्व विकास योजना बंद होवून रोजगाराचा प्रश्न गंभीर होईल . आपण आता कितीही बोललो तरी त्या वेळी वेगळा विचार करू . पोट भरणे अवघड झाले की afratafar maju शकते . शास्त्र विकणारे लढा चालू ठेवतील आणि दोन्ही देशाचं वाटोळे होईल . समजा आपण युद्ध जिंकाल तर पाकिस्तान मध्ये आपण सत्ता स्थापित करू शकणार नाही जागतिक विरोध होईल मग युद्ध जिंकून फायदा काय अजुन द्वेष वाढेल

Blackcat 20/02/2019 - 14:24
१९८९ पर्यंत भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबे अगदी सहजपणे काश्मिरभर हिंडून-फिरून , एक तरी कौटुंबिक फोटो-अल्बम सोबत घेऊन आनंदाने परतत होता! काश्मीर की कली, परदेसियो से ना अखिया मिलाना, किती सुंदर गाणी बघायला मिळायची. याचा अर्थ, तेव्हा तेथे दहशदवादाचा मागमूस नव्हता. नेहरुजी, शास्त्रीजी, इंदिराजी आणि राजीवजीपर्यंत काश्मिरात दहशदवाद नव्हता, आणि पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! २००१ मध्ये जम्मू- काश्मीर विधानसभेवर हल्ला झाला. पी एम होते अटलजी! अमरनाथ यात्रा हल्ला.... तेव्हाही भाजपाचे शासन! काँग्रेस-शासनात असा एकही हल्ला नाही. काश्मीरसाठी कॉंग्रेसने ३ युध्दे खेळली आणि जिंकली देखील! नव्या सरकारकडून काही अपेक्षा ठेवायच्या तर सैनिकच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षित करायचे तर म्हणे 50 % कर भरा, असे इथले तज्ञ सांगतात. आमचे पूर्वधर्माचे गोत्र काश्यप , ज्यांनी काश्मीर निर्माण केले त्या ऋषीचे नाव , बिचारे तळमळत असतील , हेचि फळ काय मम तपाला?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आनन्दा 20/02/2019 - 15:42
१९८९-९० मध्ये तेथे दहशतवाद आला तेव्हा तुमचे शासन होत वाटते तिथे? हजारो काश्मीरी पंडितींना विस्थापित केले तेव्हा नव्हता वाटते दहशतवाद? की तो जिहाद होता?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ 20/02/2019 - 19:00
बरेच विसरभोळे आहात तुम्ही !! पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! हा हा हा काँग्रेस चे कमकुवत सरकार बघुन एक दोन नव्हे तर चार चार युद्धे लादली पाकिस्तानने भारतावर !! चीन ने तर एकाच तडाख्यात लोळवल होत विसरले काय ? ते तर बर की भारतीय सेना खमकी होती म्हणुन बचावलो !! अन्यथा काँग्रेसवाल्यांनी देशच आंदण दिला असता पाकिस्तानला ! काश्मिरचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग पाकिस्तानच्या अख्त्यारीत आहे ! गीलगीट बाल्टीस्तान, अक्साई चीन हा भाग सुद्धा काँग्रेसवाल्यांनी देऊन टाकला ! कॉग्रेस मुक्त भारत झाल तर १८८५ पासुनचा रोग बरा होईल !!

In reply to by डँबिस००७

Blackcat 20/02/2019 - 19:22
जवानांच्या अंतयात्रेत उपमुख्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह, केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह, साक्षी महाराज हसत होते व प्रार्थनेत जोडे घालून आले होते, नातेवाईकांनी हाकलून लावले. व्हाट्सपवर व्हिडीओ फिरत आहेत, ते पहा. भाजपयाना तर इथलेच लोक विचारेनात , पाकिस्तान तर लांब राहिला.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 20/02/2019 - 19:28

९०,००० सैनिक युद्धबंदी होते आणि पाकिस्तानी लष्करशहा हात बांधून शरण आलेले असताना काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधींनी घालवली.

त्याबद्दल तुमची पचपच करणारी विचारसरणी काय म्हणते आहे?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 21/02/2019 - 09:22
इतिहास वाचलेलाच दिसत नाही. १ कोटी बांगलादेशी निर्वासित भारतात आले होते आणि त्या निर्वासितांच्या निर्वाहासाठी आपण( सामान्य नागरिक) २० पैशाच्या पोस्टाच्या तिकिटांवर ५ पैसे निर्वासित अधिभाराचे तिकीट लावत होतो https://www.thedailystar.net/supplements/victory-day-2016-special/refugee-relief-the-postal-tax-helped-millions-1330345. त्यामध्ये ९०,००० तोंडे म्हणजे काहीच नाही

त्या "ओलिस सैनिकांच्या" बदल्यात आणि शरण आलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या बदल्यात काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधी यांनी घालवली.

त्या धनगराकडे मेंदू विकारावर औषध आहे का विचारुन पहा. कायम नुसती जळजळ आणि मेंदूत जळमटं झाली आहेत. कोणताही विषय अजिबात न वाचता किंवा अजिबात विचार न करता नुसती आचरटपणाची पचपच करण्याची सवय सोडून द्या जाता जाता -- मला कोणतेही निवृत्ती वेतन नाही. तेंव्हा तुम्हाला जळजळ होण्याचे कारण नाही.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

विशुमित 21/02/2019 - 16:02
काश्मीर प्रश्नाला पंडित नेहरूच कारणीभूत, अमित शाह यांचा आरोप. काश्मीर प्रश्नाचे जनक कोण असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर पंडित नेहरू असेच आहे. नेहरूंमुळे काश्मीरचा मुद्दा निर्माण झाला. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. काश्मीर खोरे कायम धगधगतेच असते या सगळ्याचं कारण पंडित नेहरू आहेत त्यांनी हा प्रश्न निर्माण केला आणि भिजत ठेवला असाही आरोप अमित शाह यांनी केला. सगळ्यात महत्वाचे आहे, हे तुम्ही लक्ष्यात ठेवा == पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे असे पंतप्रधान आहेत जे २४ पैकी १८ तास काम करतात. देशाच्या सुरक्षेसाठी ते कटिबद्ध आहेत त्यांच्यावर तुमच्यासारख्यांच्या आरोपांमुळे परिणाम होणार नाही असेही अमित शाह यांनी ठणकावले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/pandit-nehru-responsible-for-kashmir-issue-says-amit-shah-1845117/ === सगळं रांकेला लावून आज ते कोरियाला भुर्र उडून गेले आहेत. तुम्ही बसा उंदरांचा पाठलाग करत!!

Blackcat 20/02/2019 - 14:24
१९८९ पर्यंत भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबे अगदी सहजपणे काश्मिरभर हिंडून-फिरून , एक तरी कौटुंबिक फोटो-अल्बम सोबत घेऊन आनंदाने परतत होता! काश्मीर की कली, परदेसियो से ना अखिया मिलाना, किती सुंदर गाणी बघायला मिळायची. याचा अर्थ, तेव्हा तेथे दहशदवादाचा मागमूस नव्हता. नेहरुजी, शास्त्रीजी, इंदिराजी आणि राजीवजीपर्यंत काश्मिरात दहशदवाद नव्हता, आणि पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! २००१ मध्ये जम्मू- काश्मीर विधानसभेवर हल्ला झाला. पी एम होते अटलजी! अमरनाथ यात्रा हल्ला.... तेव्हाही भाजपाचे शासन! काँग्रेस-शासनात असा एकही हल्ला नाही. काश्मीरसाठी कॉंग्रेसने ३ युध्दे खेळली आणि जिंकली देखील! नव्या सरकारकडून काही अपेक्षा ठेवायच्या तर सैनिकच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षित करायचे तर म्हणे 50 % कर भरा, असे इथले तज्ञ सांगतात. आमचे पूर्वधर्माचे गोत्र काश्यप , ज्यांनी काश्मीर निर्माण केले त्या ऋषीचे नाव , बिचारे तळमळत असतील , हेचि फळ काय मम तपाला?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

भंकस बाबा 20/02/2019 - 23:01
5लाख पंडितानी जीवाच्या भीतिने काश्मीर सोडले तेव्हा विद्यमान सरकारने ना त्यांची चिंता केली वा चिकित्सा, मग जे पाहिजे ते आपसुक तोंडात पडले तर कोण कशाला अतिरेकी बनतोय? उद्या काळ्या माउकड़े शांतताप्रिय धर्माचे लोक बोलायला आले की तुमची जागा आम्हाला आमचे प्रार्थनास्थळ म्हणून हवे आहे तर तुम्ही किती आनंदाने ते खाली कराल ? आधी तुमचा प्रतिसादच गंडलाय, भाजपा सरकारमधे अमरनाथ हल्ला झाला व विधानसभा हल्ला झाला मग पाकिस्तानमधून कसाब आणि कंपनी कोंग्रेसच्या काळात क़ाय आटयांपाट्या खेळायला आली होती ? हायला , यांचा क़ाय भरोसा नाय, प्रतिसाद झोम्बल्यावर कसाब आपल्या मुब्र्यातुंन आला होता बोलायला कमी करणार नाही. इशरतजहांचा बदला घ्यायला ! संपादक मंडळाला एक विनंती आहे , ह्या काळ्या माऊचा ईमेल आईडी उघड़ करावा , मग काहीतरी सामदामदंडभेद करता येईल

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud 21/02/2019 - 11:58
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा व वैफल्य यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल. का या असल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची धमक नाही ?

In reply to by lakhu risbud

सुबोध खरे 21/02/2019 - 12:56
@ Blackcat निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत) हे सपशेल खोटे विधान निर्लज्जपणे केलेत त्यावर पुरावा मागितला तो काही देता येत नाही. माझ्या वर्णव्यवस्थेच्या पुरस्काराबद्दल खोटारडेपणा केला त्याबद्दल कोणताही पुरावा देता येत नाही. इतका खोटारडेपणा, निलाजरेपण,, लोक टोचून बोलतात त्याबद्दल खंत नाही खेद नाही मिपावरून हाकलून दिल्यावर पन्नास वेगवेगळे डू आयडी घेऊन परत परत येण्यासारखा लोचट पणा आणि लुब्रेपणा आहे. आयुष्यातील वैफल्य जालावर काढून ते जाणार नाही आणि खोटेपणा हा लांड्या चादरी सारखा असतो. वरनं ओढली तर खालचा भाग उघड पडतो आणि खाली ओढली तर वरचा. मनाची नाहीच पण जनाची तरी लाज बाळगा.

सुबोध खरे-"उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे आज जो उठतो तो बेफाट आरोप करतोय "प्रधान मंत्रीजी आप मुझे बताईये, सारा कम्युनिकेशन भारत सरकार के हात मे है, आप कोई भी फोन टॅप कर सकते हो, आप् ने अभीतक क्या किया? अभीभी घुसपेटी भारत के अंदर कसे आते है ? कितने आतण्कवादीयोंको आपने विदेशसे भारत लाया? आतंकवादीयोंके पास बाहर से गन आता है, गोला बारूद आता है, हवाला के माध्यमसे पैसा आता है, पैसा बँको के माध्यमसे आता है, प्रधान मंत्री, आप ईतनी निगरानी नही रख सकते? ये राज्योंका विषय नही है.. ये आपका विषय है.. काय किया है आपने ?" नरेंद्र मोदींनी २०१२ मध्ये मनमोहन सिंगांना भाषणात विचारलेले हे काही प्रश्न. (https://www.youtube.com/watch?v=SZQwy91riOo&t=737s २०:०० ते २३:००) ह्याला काय म्हणायचे रे सुबोधा? उचलली जीभ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

डँबिस००७ 20/02/2019 - 19:26
माईसाहेब , अजुनही तुमची उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे पुलवामा रस्त्यावर तिन तिन बॅरीकेडस होते ! कश्मिरच्या मुख्यमंत्र्यामुळे ते बॅरीकेडस बंद झाले आणि अतिरेक्यांना रस्ता साफ झाला ! पण त्या कश्मिरच्या मुख्यमंत्र्याला ना खंत ना खेद ! अजुन ही पाकिस्तानशी बोलणी कर ण्याची वार्ता करत आहे ! वायरलेस, मोबाईल, टेक्स्ट मेसेज,व ईतर कम्युनिकेशन वर करडी नजर असल्याने अतिरेक्यांनी ह्यावेळेला नविन मोबाईल + वायरलेस मेसेज सिस्टीम वापरली. चायनात बनलेली ही एनक्रिपशन सिस्टीम अजुन ही आपल्या कम्युनिकेशन ए़क्स्पर्टसना क्रॅक झालेली नाही. स्फोटके कश्मिरच्या सीमा भागातुन खंदक खणुन त्या मार्गाने आणलेली आहेत असा कयास आहे. गेल्या ६५ वर्षांत काश्मिरची सीमा सील करता आलेली नाही. त्या सीमेतुन माणसे, प्राणी , मादक पदार्थ ह्यांची तस्करी चालु असते. अश्या तस्करी मुळे सीमा पुर्ण पणे सील राहील ह्याची शाश्वती नसते. गेल्या ६५ वर्षांत सील न झालेली सीमा आता सील का झाली नाही अस विचारण म्हणजे मुर्खपणा आहे हे तुमच्या व तुमच्या ह्यांना आम्ही सांगावे म्हणजे काजव्याने सुर्याला .................. गेल्या ६५ वर्षांत जे न घडलेल आहे त्यातल जे काही ह्या ५ वर्षांत घडलेल आहे ते मात्र बघायच नाही असा प्रयास आपल्यालाच खाली घेऊन जाणार आहे !

In reply to by डँबिस००७

Blackcat 20/02/2019 - 19:59
61 चा पाढा आता 65 ला आला, त्यातली 10 भाजपचीही आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे 20/02/2019 - 19:35
| माईसाहेब कुरसूंदीकर १)डिसेंबर पासून हल्ले होत असतना आपली गुप्तचर यंत्रणा गप्प राहिली.. वा अपयशी ठरली. यंत्रणेच्या प्रमुखाने/गृहखात्याने हे सांगायला हवे की नको? २) बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ. ने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बसेसने नेण्यास विरोध केला होता. हॅलिकॉप्टरची मागणी केली होती. ती अमान्य झाली. या दोन्ही गोष्टी अप्रस्तुत आणि अप्रासंगिक आहेत आणि त्यात आपला केवळ भाजप द्वेष दिसतो आहे हे मी सप्रमाण सिद्ध केलंय. ३ लाख ४० हजार सैनिकांना वर्षात तीन वेळेस हेलीकॉप्टरने घेऊन जाणे आणि परत आणणे हि अशक्य गोष्ट आहे हे शेम्बड्या पोरालाही पटेल. मुळात हि मागणी कुणी केली आहे हे तुम्हाला दाखवता येईल का? नसेल तर उगाच कळफलक बडवणे थांबवा कोणत्यातरी बोकड प्रेस्टिट्यूटने कुणाचा तरी हवाला देऊन लिहिलेले वाक्य मोगा खानने पाठवले होते उगाच फालतू प्रतिवाद करू नका आणि विषयाला फाटे फोडून पळवाट काढू नका.

In reply to by सुबोध खरे

ही घ्या लिंक https://www.thequint.com/news/india/pulwama-terror-attack-crpf-request-air-transit-of-jawans-ignored#gs.9bLAc65P मूळ मुद्दा हा नाही. मोदी व भाजपा २०१२ च्या भाषणात ज्या गमजा मारत होते, मनमोहन सिंगांनाच जबाबदार ठरवत होते. कश्मिर प्रश्न हा जणू काही काँग्रेसवाल्यांनी मुद्दामून निर्माण केला आहे.. आम्ही सत्तेवर आलो की तो सोडवू... मग वाट वाकडी करून नवाझ शरीफांना केक भरवायला जाणे.. मोदी सत्तेवर आल्यापासून पाकिस्तान सूतासारखा सरळ आला आहे.. ह्या बद्दल बातम्या पसरवणे... मग सर्जिकल स्ट्राएकने कशी कायमची अद्दल घड्वली..वगैरे... ६०-६५ वर्षत जे झाले नाही ते ५ वर्षात होणार नाही हे कळण्यास राजकीय पंडिताची गरज नाही. मग जाहिरातबाजी न करता निमूटपणे काम तरी करा. प्रत्येकवेळी ईतिहासात जाऊन आधीचे सत्ताधारी कसे चुकले.. हेच सांगणार असाल तर लोक प्रश्न विचारणारच ना?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे 21/02/2019 - 11:00
परत तेच कुणा तरी पत्रकाराने कुणाचा तरी हवाला देऊन सांगितलेली गोष्ट जी केवळ अशक्यप्राय आहे ( ३ लाख ४० हजार सैनिकांना वर्षात सहा फेऱ्या हेलिकॉप्टरने करणे). बरेच लोक मूळ वस्तुस्थिती माहित नसताना आपल्या त्रोटक माहितीप्रमाणे आणि आपल्या राजकीय कल (INCLINATION) प्रमाणे सोयीस्कर अशा काहीही गोष्टी टंकतात याबद्दल हा आक्षेप आहे. या स्थितीवर अचूक बोट ठेवणारा जालावर फिरणारा विनोद -- कुठे कुठे आणि कशी क्षेपणास्त्रे डागून पाकिस्तानला नष्ट करणारा डावपेच मी जालावर टाकणार होतोच तेवढ्यात आतून आमची हि ओरडली अहो जाता जाता धोब्याकडे इस्त्रीला कपडे टाका आणि ऑफिसमधून येताना न विसरता दळणाचा डबा घेऊन या. मुलखाचे धांदरट मेले. कुठे लक्ष असतं कुणास ठाऊक? मग लक्षात आलं -- आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत

In reply to by सुबोध खरे

Blackcat 21/02/2019 - 13:06
तात्पर्य : इथून पुढे चहावाल्यांनी चहावालेच रहावे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 21/02/2019 - 19:47
हो डॉक्टर होऊन धनगराचे औषध घेण्यापेक्षा बरं नाही का?

In reply to by सुबोध खरे

"आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत" हे प्रथम सत्तधार्यांना सांगाय्ला हवे. अंतिम संस्काराला चपला घालुन बसणे, अंत्ययात्रा जात असताना पोझ देणे. ज्या दिवशी हल्ला झाला त्याच रात्री खाजगी पार्टीत नाचणे.... https://www.youtube.com/watch?v=CiEatCP6X6Q

In reply to by सुबोध खरे

शब्दबम्बाळ 25/02/2019 - 11:01
कोणत्यातरी बोकड प्रेस्टिट्यूटने कुणाचा तरी हवाला देऊन लिहिलेले वाक्य मोगा खानने पाठवले होते
अरेरे सरकार आता खरे साहेबानी डिक्लेर केलेल्या अश्या प्रेस्टिट्यूटने दिलेल्या बातम्यांचा विचार करून निर्णय घ्यायला लागले! आता कसं व्हायचं?! व्हात्साप्प ग्रुपवरती माहिती मिळाली नाही वाटत यावेळेस?? बाकी तुम्हीच खाली लिहिलेलं पटलं बुआ आपल्याला
बरेच लोक मूळ वस्तुस्थिती माहित नसताना आपल्या त्रोटक माहितीप्रमाणे आणि आपल्या राजकीय कल (INCLINATION) प्रमाणे सोयीस्कर अशा काहीही गोष्टी टंकतात याबद्दल हा आक्षेप आहे.
मग लक्षात आलं -- आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत
येऊ द्या हं नीट लक्षात!

गामा पैलवान 20/02/2019 - 18:35
लोकहो, पुलवामा हल्ल्याचा काश्मिरियतशी कसलाही संबंध नाही. मसूद अझरचा भाऊ अब्दुल रौफ अजगर याने आत्मघातकी आक्रमणाची धमकी दिल्याची चित्रफीत समोर आली आहे. यामध्ये त्याने ‘जर मोदी सरकारने अयोध्येत राममंदिर उभारण्याचा प्रयत्न केला, तर आत्मघातकी आक्रमणे करू’, अशी धमकी दिली आहे. संदर्भ : https://sanatanprabhat.org/marathi/219206.html अधिक माहिती : https://mumbaimirror.indiatimes.com/news/india/pulwama-attack-nine-days-before-the-attack-jems-abdul-rauf-asghar-vowed-to-terrify-delhi/articleshow/68022324.cms पाकिस्तानात ५ फेब्रुवारी हा काश्मीर दिवस पाळला जातो. त्याचं चलचित्र : https://www.youtube.com/watch?v=ENOPIhZQFQA उपरोक्त चलचित्रात भारत मुर्दाबाद स्पष्टपणे म्हंटलं आहे. आ.न., -गा.पै.

Rajesh188 20/02/2019 - 19:44
काश्मीर मध्ये घडणाऱ्या हिंसक कारवाया काश्मीर प्रश्र्नाशी संबंधित नसेल तर भारताचा इस्लामिक देश बनवायचा आहे आस अर्थ निघतो . मग डिफेन्स सुधा फक्त काश्मीर मध्ये करून चालणार नाही पूर्ण देशात आशा कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल

In reply to by Rajesh188

ट्रेड मार्क 20/02/2019 - 23:26
काश्मीर मध्ये घडणाऱ्या हिंसक कारवाया काश्मीर प्रश्र्नाशी संबंधित नसेल तर भारताचा इस्लामिक देश बनवायचा आहे आस अर्थ निघतो नक्कीच बनवायचा आहे. फक्त भारतच नव्हे तर समस्त जग मुस्लिम नेशन झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. गझवा-ए-हिंद म्हणजे काय हे विशद करून सांगणारा हा व्हिडिओ बघाच ही विनंती आहे. फक्त ६-७ मिनिटांचाच आहे त्यामुळे फार वेळ वाया जाणार नाही. पूर्वापार हिंदुस्थानवर होत असलेली मध्यपूर्वेकडून होणारी आक्रमणे ही याची साक्षीदार आहेत की हे फक्त प्रदेश काबीज करण्यासाठी नसून धार्मिक आक्रमण होते. हल्ले करून देवळे तोडून, ग्रंथ पुराणे जाळून, तरुण हिंदूंना मारून, हिंदू तरुण स्त्रियांना बळजबरीने इस्लाम स्वीकारायला लावणे आणि बलात्कार करून दासी म्हणून भरपूर पोरे काढून त्यांना मुस्लिम वळण लावणे हे कशाचे द्योतक आहे? सीमेवर हे उघड हल्ले तरी लोकांना दिसत आहेत, देशांतर्गत चालू असलेले छुपे हल्ले अजून लोकांच्या लक्षात येत नाहीयेत. एकीकडे हिंदू मुलींना नादाला लावण्यासाठी ग्रूमिंग गँग्स, दुसरीकडे शालेय शिक्षणात अकबर, औरंगजेब, टिपू, तैमूर यांचे गोडवे गाणारे धडे, मुस्लिम संस्कृती कशी चांगली आहे हे सांगणारे परिच्छेद आणि त्याच जोडीने हिंदू राजांबद्दल संस्कृतीबद्दल अतिशय कमी माहिती, तिसरीकडून सिनेमासारख्या माध्यमांतून उर्दू भाषेचे चाललेले कौतुक आणि चौथ्या बाजूने लोकसंख्या वाढण्यासाठी चार चार लग्न करून अनिर्बंध पोरे पैदा करणे. असा चोहीबाजूने छुपा हल्ला चालू आहे. इंग्लंडची वाट लावलीच आहे. युरोपातील बहुतांश देश येत्या २५-५० वर्षात मुस्लिम बहुल होतील, बरेचसे मुस्लिम अधिपत्याखाली जातील. त्या देशातील स्थानिक लोकसंख्या कमी जन्मदरामुळे अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. त्यावर तथाकथित मानवतावादाच्या नदी लागून भरमसाठ मुस्लिम रेफ्युजी घेऊन ठेवलेत. आता ते लोक फुकटची वैद्यकीय सेवा आणि child केअर वर मजा मारत आहेत. हे पैसे स्थानिक जनता कष्ट करून जो टॅक्स भरते त्यातून येतात. जेव्हा मुस्लिम लोकसंख्या ३०% च्या वर जाते तेव्हा हे लोक शरियाची मागणी करतात. ते पण फक्त त्यांच्यासाठी नव्हे तर संपूर्ण प्रदेशात लागू करावा असा आग्रह होतो. जेव्हा ५०% च्या वर जाते तेव्हा तिथे बिगर मुस्लिमांचे जबरदस्तीने धर्मांतरण तरी चालू होते अथवा हत्याकांड चालू होते. त्यानंतर बिगर मुसलमानांचे तिथे राहणे अशक्य होऊन जाते आणि तो प्रदेश पूर्ण मुस्लिम अधिपत्याखाली जातो. हे लक्षात घ्या की नुसती त्यांच्या अधिपत्याखाली जायची प्रोसेसच निर्दयी आणि रक्ताळलेली नसून नंतर सुद्धा हे लोक तेवढेच निर्दयी व क्रूर आहेत.

सुबोध खरे 20/02/2019 - 19:55
https://en.wikipedia.org/wiki/Category:Islamic_terrorism_in_India यात भरपूर दुवे आहेत वाचून पहा, महिनाभर तरी लागेल. मग चर्चा करू. पण असे एका धर्माला नाव ठेवायचे नसते त्याने आपल्या पुरोगामित्वाचा धक्का पोहोचतो.

मनो 21/02/2019 - 01:28
दोन प्रश्नांची उत्तरे देतो - ३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते. आदिल अहमद हा स्फोटतत्ज्ञ नसून एक डोके भडकावलेला आणि साधन म्हणून वापरला गेला अतिरेकी होता. त्याला आय ई डी बद्दल माहिती होती कि नाही ते माहित नाही, पण या कृत्याचे बोलावते धनी वेगळे आहेत - अश्या वेळी आय ई डी कसा वापरायचा याची माहिती आणि प्रशिक्षण आय एस आय किंवा अफगाणी तालिबान यांच्याकडून मिळते. स्फोटके स्थानिक, चोरून अथवा इतर मार्गानी जमवतात. स्थानिक मदतनीस इतर व्यवस्था (गाडी वगरे) करतात. प्रत्येकाला पूर्ण प्लॅन माहित नसतो - तो प्लॅन सीमेपलीकडून आखला जातो आणि प्रत्येकाला त्याचा भाग फक्त माहिती असतो. त्याने लाल रंगाची मारुती कार वापरलेली आहे, जीप नव्हे. फोटो पाहिलेत तर तुम्हाला त्यात लाल रंगाचे छोटे कारचे तुकडे दिसतील. प्राणहानी स्फोटामुळे नाही, तर shrapnel मुळे झाली आहे. त्यामुळे दिशा वेगळी असली तरी त्याने फरक पडलेला नाही. ४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय? गोळीबार नाही, त्या shrapnel च्या खुणा आहेत. अश्या वेळी या घटनेमागचे मदतनीस कोण, बोलावते धनी कोण याचा पूर्ण तपास जर लावला तर आपल्याला पाकिस्तानवर पुराव्यानिशी आरोप करता येतील. पण हे पुरावे मिळणे अर्थातच फार अवघड असते.

In reply to by मनो

राघव 26/02/2019 - 21:58
१. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का? हे सर्वस्वी सेनेवर अवलंबून असून सेना त्या त्या परिस्थितीत योग्य तो निर्णय घेत असते. त्यात आपण इथं खल करत बसण्यानं खरंच काही उपयोग नाही. २. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का? या प्रकाराला अँबुश अटॅक म्हणतात. हा कधीही, कुठेही, कुणावरही होऊ शकतो. जसं हार्ट अटॅक आलेला समजण्याआधी अनेक अटॅक येऊन गेलेले असतात आणि त्यांना शरीर सांभाळून घेतं, त्यासारखं. असा अटॅक येतो तेव्हा योग्य मदत मिळाली तर तोही परतवून लावता येतो. अर्थात् संपूर्ण सुरक्षीत कुणीच / कधीच नसतो. त्यामुळे अशा अटॅक्समुळे गुप्तचर यंत्रणा सपशेल अपयशी ठरली असं मकुणीच, मला तरी योग्य वाटत नाही. सर्वजण आपापल्या परीनं पूर्ण प्रयत्न करतच असतात, नाही तर पावलोपावली अटॅक्स झाले असतेत. जे अशा अपयशाच्या नावानं बोंब मारतात, ते सरकारला नव्हेत तर सेना, गुप्तचर यंत्रणा आणि समग्र संरक्षण यंत्रणेला नावं ठेवत असतात. या प्रकाराला शुद्ध कृतघ्नपणा असंच म्हणतात. एक मुखबीर नावाचा चित्रपट आहे, तो बघावा अशा लोकांनी.. चित्रपट असला तरी इतका अंगावर येतो.. प्रत्यक्षात कसं असेल याची आपल्याला कल्पनाही येऊ शकत नाही. ५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय? झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील? कोणताही समर्थ देश हे जाहीररित्या करेल. त्याला असलं काही लपून करण्याची गरज नाही. जसं इस्रायल. आता भारतही. म्हणतांना खरंच अभिमान वाटतोय. :-) ६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं हे आत्ताचं नाही. जानेवारी २०१४ मधे हे वक्तव्य प्रसारित झालेलं मला चांगलं आठवतंय. मी तो विडिओ बघितलेला आहे. या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल? आज केलेला स्ट्राईक हा ऑफेन्सिव्ह डिफेन्स याच प्रकारात मोडतो. उरीचा बदलाही असाच. पण एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे. आंतरराष्ट्रीय दबाव, आर्थिक नाकेबंदी, शत्रूच्या मित्रदेशांशी हातमिळवणी करून शत्रूला एकटे पाडणे, संरक्षण दलांना पूर्ण मोकळीक, कडक गुप्तचर यंत्रणांचे जाळे... हे सगळे नाही अशी कल्पना करा आणि मग ह्या प्रकारच्या स्ट्राईकची कल्पना करा.. उरीच्या बदल्याच्या वेळेसच मोठ्या युद्धाला तोंड फुटले असते. अचूक नियोजन करून, बिनचूक अटॅक करणे आणि शत्रूदेशाची सीमा ओलांडून ३०० ते ३५० अतिरेकी एकरकमी मारणे, हे गुप्तचर यंत्रणांच्या निर्भेळ यशाचेच द्योतक आहे. जाता जाता: मला स्वतःला असं वाटतंय की हा बालाकोटचा हल्ला पुरेसा राहणार नाही. आणिकही काही होईल. काय त्याची कल्पना नाही अर्थात्.. अवांतरः कलम ३७० कधीही रद्द करता येऊ शकते. https://www.youtube.com/watch?v=OcEpkuNZEqQ मला ३५ अ / ब याबद्दल माहिती हवी आहे. असल्यास सांगावे. राघव

सुबोध खरे 21/02/2019 - 09:30
आपल्याला पाकिस्तानवर पुराव्यानिशी आरोप करता येतील. हा एक गैरसमज आहे तुम्ही वाटेल तो पुरावा द्या पाकिस्तान तो मान्य करणारच नाही. India

will not submit any evidence to Pakistan

on the role of Jaish-e-Mohammad in the Pulwama terror strike, and instead give all such facts to friendly nations to unmask the role of elements based in the neighbouring country in the attack, a senior government official said. The official was sharing the views within the government, which is not at all in favour of giving any evidence to Pakistan considering the past experience when despite giving multiple dossiers on the involvement of Pakistan-based elements in the 26/11 Mumbai terror attacks and terror strike in Pathankot airbase, Islamabad did nothing to punish the perpetrators. https://www.business-standard.com/article/pti-stories/india-won-t-give-proof-to-islamabad-but-to-friendly-nations-to-unmask-pak-role-in-terror-official-119022000941_1.html तपासाचा मूळ हेतू हा आहे कि गुन्हा कसा घडला त्याची पार्श्वभूमी त्याची पद्धत(MODUS OPERANDI) त्यात हातभार लावणारे घरभेदी कोण आहेत त्यांचा छडा लावणे हा आहे. पाकिस्तानला कितीही पुरावा दिला तरी ते ग्राह्य धरणार आहेत का? अजमल कसाबला जिवंत पकडल्यावर(प्रत्यक्ष पुरावा असताना) तो पाकिस्तानी नागरिक नाहीच म्हणून सांगितले मग परिस्थितीजन्य पुराव्याचा काय उपयोग?

In reply to by मनो

ट्रेड मार्क 21/02/2019 - 19:07
घरभेदी कोण असावेत याचा अंदाज येण्यासाठी खालील लेख वाचा लेख १ लेख २ वरील लेखामधील एक परिच्छेद - २०११ च्या सुमारास अकस्मात एक बातमी भारतीय माध्यमातून झळकली आणि राजकारणात एकच खळबळ उडालेली होती. संरक्षणमंत्र्यांच्या फ़ोनवरील संभाषणही चोरून ऐकले जात असल्याची ती बातमी होती. तो आक्षेप भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागावर ठेवण्यात आलेला होता. त्याखेरीज आणखी एक अशीच अफ़वा वर्तमानपत्रातून सोडली गेलेली होती. प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने सेनादलाच्या अनेक तुकड्या राजधानी दिल्लीत संचलनाचा सराव करीत होत्या. त्याचवेळी उत्तरप्रदेशाच्या मेरठ येथून काही सेनादलाच्या तुकड्या इतरत्र कुच करीत होत्या. त्यातून भारतीय लोकशाही उलथून टाकत सेनादल सत्ता काबीज करायच्या प्रयत्नात असल्याची ती अफ़वा होती. तिला कुठलाही आधार नव्हता आणि गोंधळ उडवून देण्याचाच त्यामागचा हेतू होता. तो मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाला. कारण तितके निमीत्त साधून दिल्लीची नोकरशाही, राजकारणी व तथाकथित बुद्धीमंतांनी मोठा हलकल्लोळ माजवला आणि तेव्हाचे लष्करप्रमुख व्हॊ. के. सिंग यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले. उपरोक्त दोन बातम्या भारतीय सुरक्षा दलाच्या विविध दक्षता यंत्रणांना उध्वस्त करणाचा व्यापक कट होता. कारण तेव्हा सिंग व संरक्षणमंत्री अन्थोनी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते आणि त्याचाच आधार घेऊन गलिच्छ राजकारण खेळले जात होते. माध्यमातून मग सिंग यांना सरसकट लक्ष्य करण्याची मोहिमच हाती घेण्यात आली. काश्मिरातील पाकवादी प्रवृतीच्या राजकारण्यांनी तोफ़ा डागल्या. सिंग लष्करी अधिकारी आणि संरक्षण खात्याचा पैसा वापरून काश्मिरी राजकारणात ढवळाढवळ करीत असल्याचाही एक आरोप त्यात समाविष्ट होता. त्यासाठी मग टीएसडी हा शब्द पुढे आला, ही टीएसडी म्हणजे टेक्नीकल सपोर्ट डिव्हीजन गुप्तचर म्हणून काम करीत नसून काश्मिरातील लोकांनी निवडलेले सरकार पाडण्यासाठी उचापती करीत असल्याचा आरोप पुढे आला. लष्करी पैसे देऊन एक अपक्ष आमदाराला खरेदी करण्यात आल्याचा बिनबुडाचा आरोप ठळकपणे पुढे आला आणि त्याचा कुठलाही पुरावा कधीच कोणी दिलेला नव्हता. पर्यायाने टीएसडी ही गोपनीय बाब चव्हाट्यावर आली आणि तिचा गाशा सेनादलाला गुंडाळावा लागला. त्यात कार्यरत असलेल्या अधिकारी व हस्तकांचे चेहरे उघडे पडले आणि अनेक अधिकारी कोर्टमार्शलचे बळी झाले. पण ती बाब महत्वाची नाही. त्यातून काश्मिरात गुपचुप जी कारस्थाने शिजवलॊ जात होती, त्यांची इत्थंभूत माहिती सेनादलाला मिळण्याचा मार्गच बंद होऊन गेला.

Rajesh188 21/02/2019 - 10:36
Kashmir आणि खलिस्तान ह्याची तुलना केली तर दोघांना सुधा स्वायतत्ता हवी होती . आणि संघर्षाचं कारण उघड तरी दोघांचं होते . मग खलिस्तान प्रश्न मिटवता आला परंतु काश्मीर धागगत राहायला ह्या मधून आसा पण निष्कर्ष निघतो की हा काश्मीर शी संबंधित प्रश्न नसून dharmikteshi संबंधित प्रश्न आहे आणि त्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आघाड्या उघडलेल्या आहेत पण आपण फक्त ऐकाच आघाडीवर लक्ष केंद्रित केले आहे त्या मुळे तो सुटत नाही . ऐक तर्क आसा सुधा करता येतो सध्य परिस्थिती बघून

In reply to by अर्वाच्य

सिद्धार्थ ४ 21/02/2019 - 11:18
तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही बोलता का हो?आज वर म्हात्रें काकांनी मिपा वर एकही खोटा किंवा असंतुलित प्रतिसाद मी तरी वाचला नाही आहे.

In reply to by अर्वाच्य

lakhu risbud 21/02/2019 - 12:24
बा अर्वाच्च्या तु मिपा वरुन हाकलुन लावलेल्या ज्या कोणाचा आय डी आहेस तुझी हकालपट्टी ही तुझ्याच कर्माने झालेली आहे या याबद्दल निश्चिन्त रहा . ती का झाली असावी याचाही अंदाज आता यायला लागला आहे. म्हात्रे कांकांवर खोटारडे पणाचा आरोप त्यांच्या विचारसरणीचे विरोधकही करणार नाहीत.. जर तू डोक्यावर पडला असशील तर बाबच वेगळी आहे !

In reply to by lakhu risbud

विशुमित 21/02/2019 - 13:11
अगदी बरोबर..!! शेवटी एक मिपाकरच दुसऱ्या मिपाकराच्या मदतीला येणार. खांद्यावर डोके वगैरे वगैरे..! आपल्या कांकांवर खोटारडे पणाचा आरोप म्हणजे काय ! जाहीर निषेद..! ===

In reply to by विशुमित

lakhu risbud 25/02/2019 - 15:23
इथले काका त्यांचे ते बघण्यास समर्थ आहेत हो ! तुम्ही तुमच्या काकांची काळजी करा.पुतण्याला तोंडघशी पाडलंन त्यांनी. मावळातून लढायचं म्हणे पर्यंत कात्रज चा घाट दाखवलान. तुम्हाला आता प्रचाराचा ओव्हरटाईम कसा जमणार ते बघा.

In reply to by lakhu risbud

विशुमित 25/02/2019 - 15:48
अस कस अस कस.. आपले सन्मानीय काका देखील डू आय डी चा सहारा घेत आहेत, असे जाणवते आहे. बाकी आमच्या तालुक्यातील काका पुतणे त्यांच ते बघून घेतील. तुम्ही कशाला लुडबुड करताय? चिरीमिरीसाठी एवढा निर्लज्जपणा?? अरेरे...!!

In reply to by lakhu risbud

शब्दबम्बाळ 21/02/2019 - 16:12
जिथे तिथे व्यक्तिपूजाच करणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार! म्हात्रेंनी वरती व्हिडीओ लिंक शेअर केली आहे ती फेक बातमी आहे, मजकूर खुबीने टाकलाच नाहीये म्हणजे असे नको व्हायला कि काही स्वतः काहीतरी लिहून जबाबदारी घ्यायला लागावी! हे आधी पण काही ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे असे होऊच्च शकत नाही टाईप प्रतिसाद तुमच्यापाशी ठेवा! बाकी जास्त काही बोलायला नको नाहीतर "जिएसटी च्या धाग्यावर त्यांनी चुकीचे टॅक्स टेबल टाकून स्वस्ताई दाखवायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा संक्षींनी व्यवस्थित विरोध केला होता आणि HSN का काहीतरी नंबर मागितला होता. जो कि द्यायला जमला नाही पण संक्षींना घालून पाडून बोललं गेलं! सोबतीला इतर सवंगडी आलेच लगेच... १-२ दिवसातच संक्षींचा आयडी देखील बॅन झाला!" असो, आताशा इकडे येणे कमीच केले असल्याने स्वतःच्या आयडीबद्दल फारसे ममत्व राहिलेले नाही त्यामुळे चालू द्यात काहीही! ट्रोल्सचे पीक चिखलात उत्तम येत आहे.

In reply to by अर्वाच्य

शब्दबम्बाळ 21/02/2019 - 18:29
द्वेषातुन प्रतिसाद देण्याची काही गरज नव्हती असे वाटते... त्यांनी केलेल चांगले लिखाण हे चांगलेच आहे.. जिथे चुक वाटते तिथेच बोलणे संयुक्तिक असावे

In reply to by शब्दबम्बाळ

शब्दबम्बाळ 22/02/2019 - 14:09
अर्वाच्य हा आयडी इतक्यात बॅन पण झाला! केवढं ते स्पीड! इथले बरेच मान्यवर आयडी इतरांची लायकी/पगार काढून, शिवीगाळ करूनही कवच कुंडले पांघरून सुरक्षित राहतात असे दिसतंय! असेही खाजगी संस्थळ आहे म्हणा! पण मग जाहीर करून टाका ना, की या या आयडीना स्पेशल प्रोटेक्शन योजना आहे, बाकी लोकांनी काहीही बोलू नये अन्यथा १ दिवसाच्या आत हकालपट्टी होईल. याशिवाय फेक न्यूज पसरवल्याबद्दल अवाक्षर देखील काढलेलं नाहीये अजून कोणी! पुरावा दिल्यावर आता सवंगडी आणि फॉलोवर गायब झाले वाटत...

In reply to by शब्दबम्बाळ

यशवंत पाटील 22/02/2019 - 14:25
म्हणून गपगुमान बस्तो. काही लोकांनी कायबी लीहीलं तर चालतंय हिकड. अट एकच मोदीशेठला चांगलं म्हणा. म्हात्रे साहेब न ते दुसरे खरे साहेब यांना आवरा अस कुणी सांगायच आन कुणाला. ते गुर्जी का कोण आन ते मोदक साहेब न्हाईत वाटत आजकाल.

In reply to by शब्दबम्बाळ

विशुमित 22/02/2019 - 14:39
संपादक मंडळ- आय डी बॅन बाबत काही पारदर्शकता आणता येउ शकते का ? नाहीतर मिपा हे २०१९ च्या निवडणुकीपर्यंतच स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू शकेल. कृपया याला कोणी "गर्भित धमकी" वगैरे असली विशेषणे लावू नका. कारण ती मी फाट्यावर मारत असतो. मला फक्त मिपाची काळजी आहे. विविध वाङ्मय रसग्रहणाची हक्काची जागा म्हणून मी या संकेतस्थळाकडे आज पर्यंत तरी पाहिले आहे.

In reply to by विशुमित

शब्दबम्बाळ 25/02/2019 - 10:50
अहो संपादक मंडळाला विनंती करताय पण त्यात कोण आहे पाहिलंय का? :) बर मागे कोणीतरी म्हटलं होत कि संपादक मंडळाला अधिकार नाहीत हकालपट्टीचे, पण "वट्ट" असला कि कोण काय बोलणारे?! ;) इतरांनी चुकीची बातमी दिली(जी फक्त भाजपशी रिलेटेड असेल) तर पानभर लिहितील समोरच्याला उपदेश! पण स्वतः दिलेली सगळी माहिती चुकीची निघाल्यावर खेद व्यक्त करायला पण जमत नाही! ब्रम्हांडनायकाकरून हि गोष्ट तेव्हडी चांगली शिकून घेतलीये त्यांच्या फोल्लोवर्सनी!

In reply to by lakhu risbud

विशुमित 25/02/2019 - 16:01
तुम्हाला सदाशिव पेठेत जायचे असताना बारामतीच्या एस टी त कसे काय बसता?? काही केमिकल लोचा आहे का?? === अवांतर- काही महाभाग वारसाहक्काने मिळाल्यासारखं मिपावर वावरत असतात. प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात.

In reply to by विशुमित

lakhu risbud 26/02/2019 - 13:03
असे हिसके मारू नका हो ! गळ्यातला पट्टा अचानक दिसतो हो. अवांतर- काही महाभाग वारसाहक्काने मिळाल्यासारखं मिपावर वावरत असतात. प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात. स्वतःबद्दलचे एवढे अचूक आणि परखड निरीक्षण करणारे आजकाल विरळच ! मिपाकर म्हणून तुमच्या प्रगतीबद्दल अभिमान वाटला.

In reply to by lakhu risbud

विशुमित 26/02/2019 - 13:25
असे हिसके मारू नका हो ! गळ्यातला पट्टा अचानक दिसतो हो. ==)) अस होय, सोर्री सॉरी. उगाच हिस्के मारले तुम्हाला. त्यां मेनका मैडम यायच्या धावत. तुम्हाला दुखलं असेल ना! === बाकी वरचं विश्लेषण तुमच्यासाठीच होते. वाटले होते तुम्हाला समजले असेल पण तुम्हाला एस टी चा बोर्डच नाही समजत तर हे कुठले समजायला. असो. आता तरी समजलं असेल अशी आशा करुयात. आता तुम्हाला युयु करतोय, परत आला की हाड हाडच असणार आहे ...!

In reply to by lakhu risbud

तेजस आठवले 26/02/2019 - 15:00
प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं, स्वतःचा अजेंडा राबवायला मिपाचा गैरवापर करत आहेत. हे मी एकटाच नाही म्हणत तर मिपावरील आजीमाजी सदस्य खाजगीत बोलत असतात.
हे वाक्य अप्रतिम आहे, पण ते प्रत्येकालाच लागू होते ह्याची नोंद घ्यावी. वारसाहक्काने कुठले आयडी स्वतःच्या प्रतिकृती काढून येत आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे.बिग्रेडी अजेंडा राबवणारे ह्याला अपवाद नाहीत.

In reply to by शब्दबम्बाळ

जिएसटी च्या धाग्यावर त्यांनी चुकीचे टॅक्स टेबल टाकून स्वस्ताई दाखवायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा संक्षींनी व्यवस्थित विरोध केला होता आणि HSN का काहीतरी नंबर मागितला होता. जो कि द्यायला जमला मला फक्त जिएसटी माधे इन्तेरेस्त आहे ,कोनि धाग सन्गु शकेल कोन्त आहे ?

Blackcat 21/02/2019 - 17:38
२०१४ पासून काश्मीरमध्ये दर दोन दहशतवाद्यांमागे एक जवान शहीद https://www.loksatta.com/desh-videsh-news/since-2014-in-kashmir-for-every-2-militants-killed-forces-lost-1-of-its-men-1845217/

Blackcat 21/02/2019 - 19:31
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सैनिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सर्व केंद्रीय सुरक्षा दलांना आता जम्मूहून श्रीनगरला नेण्यासाठी विमान प्रवासाची सेवा पुरवली जाणार आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार आता बीएसएफ, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी आणि आयटीबीपीच्या जवानांना काश्मीर खोऱ्यात तैनातीसाठी हवाईमार्गे श्रीनगरला नेलं जाणार आहे. सुट्टीवर जाताना, सुट्टीवरुन परतताना किंवा सुरक्षा दलाच्या पथकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी हवाईमार्गाचा वापर केला जाणार आहे. दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली आणि जम्मू-श्रीनगर व श्रीनगर-दिल्ली या मार्गावर विमान सेवेचा वापर केला जाईल. जवळपास 7 लाख 80 हजार जवानांना याचा लाभ मिळणार, केंद्रीय गृहमंत्रालयाचा हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-pulwama-attack-govt-allows-air-travel-for-jawans-of-crpf-and-other-forces-deployed-in-kashmir-1845151/ मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी पडले.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ 21/02/2019 - 19:49
मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी पडले. हे बघण्या आधी भाजपा सरकारला सैनिकांची सुरक्षा व त्यांचे जीव हे जास्त महत्वाचे आहेत हा महत्वाचा संदेश दिलेला आहे. त्यामुळे जवळपास ८ लाख सैनिक हे श्री मोदीजींचे फॅन झालेले आहेत. सैनिकांच्या रक्ताची दलाली करणार्यां काँग्रेसला व अश्या पक्षाची दलाली करणार्या निर्बुद्धाला हे कळणार नाही !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

गामा पैलवान 21/02/2019 - 21:43
ए माझ्या काळ्याकुट्ट मनीमावट्ये, तू कित्तीकीत्ती गोंडस आहेस, अगदी त्या पप्पूसारखी गं! पण तू किनई त्याच्यारखा बथ्थडपणा करू नकोस हं. विमान म्हणजे काय गं माऊ? हे वाक्य 'दारू म्हणजे काय रे भाऊ' याच्या धर्तीवर शंभर वेळा बडबडून बघ. मग तुला विमान आणि हेलिकॉप्टर यांच्यातला फरक आपोआप कळून येईल. तु. न., -गा.पै.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे 21/02/2019 - 20:26
७ लाख ८० हजार एका सुटीच्या वेळेस होणारे ४ हजार येण्यासाठी आणि ४ हजार जाण्यासाठी असे ८ हजार प्रत्येकी म्हणजे ६२४ कोटी रुपये एका सुटीला देणे सरकारला ( आणि पर्यायाने जनतेला) परवडणार आहे का? वर्षात तीन वेळेस जवानांना सुटी मिळते याच्या तिप्पट खर्च शक्य आहे का? आणि असल्यास एवढी विमाने कोणाकडे आहेत? आणि आता श्रीनगर च्या विमानांचे आरक्षण मिळणे अशक्य होणार आहे. वायुदलाची किंवा एअर इंडियाची विमाने गृह खात्याकडून वापरली तर त्याचे पैसे तर द्यावेच लागतील अर्थ खात्याची मंजुरी मिळेल का? हा एक मोठा प्रश्न आहे. नि जर्क रिऍक्शन आहे एवढेच मी म्हणेन.

Blackcat 21/02/2019 - 20:37
हल्ला झाला तेंव्हा महामहिम जिम कॉर्बेट पार्क मध्ये फोटो शूट करत होते म्हणे , असे सर्वत्र येत आहे, खरे आहे का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

विशुमित 22/02/2019 - 13:52
त्यांना खराब हवामानामुळे उशीरा संदेश पोहचला, असे स्पष्टीकरण आले आहे. === ते पिश्चर मधे दाखवतात तसा रेडिओ सेट नव्हते का त्यांच्या ताफ्यात?? "अल्फा टॅगो चार्ली, ओव्हर ऍण्ड आऊट..!!""

प्रसाद_१९८२ 21/02/2019 - 21:05
हल्ला झाला तेंव्हा महामहिम जिम कॉर्बेट पार्क मध्ये फोटो शूट करत होते म्हणे , असे सर्वत्र येत आहे, खरे आहे का ? -- असा हल्ला होईल, हे काय स्वप्नात आले होते का त्यांच्या ? -- तो कॉंग्रेसी सुरजेवाला डोक्यावर पडलेला माणूस आहे, फार लक्ष नका देऊ तुम्ही त्याच्याकडे.

In reply to by प्रसाद_१९८२

डँबिस००७ 22/02/2019 - 14:51
भ्रष्ट काँग्रेस सुरझेवाला , दिग्विजय सींग , मणी शंकर अय्यर सारख्या लोकांमुळे बुडणार आहे !!
लोकहो, काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात अवंतीपूर जवळ गोरीपोरा येथे राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या बसवर हल्ला झाला. त्यासंबंधी काही प्रश्न उद्भवले आहेत. १. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का? २. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का? ३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही).

काश्मीर - वल्गना आणि वास्तव.

संदीप ताम्हनकर ·

गॅरी ट्रुमन 21/07/2016 - 14:22
याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच....
हे वाक्य वाचले आणि पुढचे काही वाचायची इच्छाच राहिली नाही. बाकी चालू द्या.

आकाश कंदील 21/07/2016 - 14:32
मूळ मुद्दा असा आहे की 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' हा कायदा काश्मिरात का आणि पुण्यात का नाही याचा जरा निरपेक्ष विचार करा उत्तर तुंम्हाला सापडेल आणि तुमचे मुद्दे किती योग्य ते तुम्ही ठरवू शकाल

अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे काय? राष्ट्रवादात पण ३०-६०-९०-क्वार्टर-हाफ-फुल अशी सिस्टम असते काय? तुम्ही लिबरल असाल अन लिबरल तत्वातच देशाच्या १२५ कोटी जनतेचे हित समाविष्ट असल्याचे तुम्हाला ठामपणे वाटत असेल तर ते उघड मान्य करा, मोदी, डोवल वगैरे असू दे, आधी ताकाला जाऊन भांडी लपवणे सोडावेत हे सुचवतो. अवांतर - डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गंम्बा 22/07/2016 - 12:26
अवांतर - डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी.
बाप्पु, हे तुम्हीच लिहीलेत हे बरे झाले. तसेच सैन्यावर जी पातळी सोडुन टिका आहे त्याचे पण तुम्ही खरमरीत उत्तर द्याच. काश्मीर मधे सैन्याला कीती हात बांधुन आणि पॉलिटीकली करेक्ट भुमिका घेउन ( पटत नसली तरी ) काम करावे लागते ह्या बद्दल पण लिहाच.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी. +१००० काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? असे अवास्तव आणि प्रक्षोभक लिहिण्याऐवजी खालीलप्रमाणे लिहिणे वास्तवाला धरून होईल... काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात जेथे, (अ) लष्कराला दोषी ठरवून स्वार्थी हितसंबंध साधणारे राजकिय व अराजकीय (पन इंटेंडेड) नेते शेकड्याने आहेत, (आ) सीमेपलिकडून येणारा पैशाच्या लालचीपायी काश्मीर घगघगत ठेवण्यासाठी प्रयत्नशील लोक आहेत, (इ) पाकिस्तानाचे बाहेरून अतिरेकी पाठवणे आणि स्थानिक मुलकी नागरिकांना फूस देणे सतत चालू असते, व (ई) संकुचित स्वार्थासाठी देशाला धोका पोचणारा कांगावाही करायला मागेपुढे न पाहणारे व नसलेले दोष हुडकून काढणारे तथाकथित लिबरल मोठमोठी बहिर्गोल भिंगे रोखून सतत तयार आहेत... ज्यांच्या लेखी अतिरेक्यांच्या मानवी हक्कांचा कळवळा सर्वोच्च आहे पण अतिरेक्यांच्या गोळांना बळी पडणार्‍या निरपराध सामान्य नागरिकांच्या व त्यांचे संरक्षण करणार्‍या सैनिक-पोलिसांच्या जीवाची किंमत शून्य आहे; अशा ठिकाणी भारतिय लष्कराला किती संयमाने, धोकादायक व तणावपूर्ण परिस्थितीत काम करावे लागत असेल याची कल्पनाही करणे कठीण आहे.

तिमा 21/07/2016 - 15:05
काश्मीरातील वास्तव हे आहे की बहुसंख्य काश्मीरींना (पश्चिमी भागातल्या) स्वतंत्र होण्याची मनांतून इच्छा आहे. अगदी २५-३० वर्षांपूर्वी आम्ही गेलो होतो, तेंव्हाही हॉटेल मालकापासून अनेकांनी, 'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का' असे आम्हाला विचारले होते. ते स्वतःला अजूनही भारताचे मानायला तयार नाहीत. पण त्याचवेळी, पाकिस्तानात जावे लागले तर, या भीतिने, त्यातले मवाळ जास्त आग्रह धरत नाहीत. पण पाकिस्तानची फूस असल्यामुळे जहालवादी हिंसक आंदोलने करतात आणि अतिरेक्यांनाही मदत करतात. सैन्यदलाकडून त्यांच्यावर काहीच अत्याचार झाले नाहीत असे कोणीच म्हणणार नाही. पण बहुसंख्य केसेसमधे भारतीय लष्कराने त्यांना शिक्षा दिली आहे. तिथल्या विचित्र परिस्थितीला बाकीच्या राज्यांसारखे नॉर्मल वातावरण करणे, हे अतिशय कठीण काम आहे. याच काश्मीर राज्यात लेह, लडाख देखील आहे. तिथे अशी आंदोलने होत नाहीत. उलट तिथले लोक प्रत्यक्ष भेटीत खूपच शांत व चांगल्या स्वभावाचे वाटले. तिथे विकासावरही फारच अल्प खर्च केला जातो.तरीही तिथल्या लोकांना सैन्यदलाचा का बरे त्रास होत नाही, वेगळे व्हावेसे का वाटत नाही,हा प्रश्न स्वतःस विचारुन पहावा.

In reply to by तिमा

नाखु 22/07/2016 - 12:50
साल २०१० : सख्खे नातेवाईक जाऊन आले
'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का'+१ आणि आम्हाला तुम्ही पयर्टनाला या पण आमहाला स्वतंत्र व्हायचे आहे आणि भारताच्या कुठल्याही व्य्वस्थेवर प्रेम नाही पण रागच आहे
साल २०१३ : जुन्या कंपनीतील सहकारी काश्मीरला जाऊन आले त्याने थेट विचारले तुमचे उप्जीवीकेचे एक्मेव साधन काय तर पर्यटन (राहण्यास शिकार्यात होता तो कुटुंबासहीत).
'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का'+१ आणि आम्हाला तुम्ही पयर्टनाला या पण आमहाला स्वतंत्र व्हायचे आहे आणि भारताच्या कुठल्याही व्य्वस्थेवर प्रेम नाही पण रागच आहे
साल २०१५: नुकताच कंपनीतील एक सहकारी जाऊन आला त्यांनाही असाच अनुभव जर या शिल्लक राहिलेल्यांना (हिंदु पंडीत कधीच नेसत्या वस्त्रानिशी निर्वासीत झालेत तिथून) तर उर्वरीत भारताला का त्यांच्याबद्दल अनुकंपा/ममत्व वाटावे. उलट मी म्हणेन अश्या क्रुतघ्न (खाल्ल्या थाळीत **णार्यांच्या उपजीवेकेला आधारभूत ठरण्यापेक्षा पूर्वांचल राज्यात पर्य्टन करावे ती जनता कष्टाळूही आहे आणि बहुअंशी मुख्य प्रवाहाशी फटकून नाही. ता:कः खालच्या एका प्रतिसादातील उल्लेखाबद्दल धन्यवाद. पेराल तेच उगवेल यावर विश्वास असलेला नाखु

In reply to by नाखु

आपण नॉर्थ ईस्टला फिरले आहात काय? असल्यास आपण उलट मी म्हणेन अश्या क्रुतघ्न (खाल्ल्या थाळीत **णार्यांच्या उपजीवेकेला आधारभूत ठरण्यापेक्षा पूर्वांचल राज्यात पर्य्टन करावे ती जनता कष्टाळूही आहे आणि बहुअंशी मुख्य प्रवाहाशी फटकून नाही. हे बोलला नसतात असे म्हणू धजतो. शिलाँग (रॉक म्युझिक कॅपिटल ऑफ इंडिया) सोडून बऱ्याच ठिकाणी प्रचंड अवघड आहे सगळे, ब्लॉकेड लागले एक एक की 20 30 दिवस आयुष्य उभे राहते, बटाटे 400 रुपये किलो अन पेट्रोल 600 रुपये लिटर घ्यायला लागते, तिकडे फुटीरतावादाचा चेहरा शांत अन सटल दिसतो पण खूप भयानक असतो. अर्थात पहिल्या पेक्षा बरेच आहे तरी ते मेनस्ट्रीम मध्ये वगैरे अजिबात नसतात, इतके मी आत्मविश्वासपूर्वक सांगतो

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

शाम भागवत 24/07/2016 - 14:15
आजही नॉर्थ इस्ट वगळता उर्वरीत भारतातील रहिवासी असलेले असे केंद्र सरकार व आस्थापनातले अधिकारी यांना तिथे पोस्टिंग नको असते. त्यासाठी केंद्र सरकार व आस्थापनातील अधिकार्‍यांना बर्‍याच सवलती, जास्त पगार वगैरेचे आमिष दाखवावे लागते. रिझर्व्ह बँक, नाबार्ड मधे आजही हा भाग अशांत टापू म्हणूनच ओळखला जातो व त्यासाठी तेथे काम करायला तयार असणार्‍यांना विशेष पॅकेज असते.

In reply to by शाम भागवत

नाखु 25/07/2016 - 09:05
कार्यरत असलेल्याकडून माहीती आलेली असल्याने (पुर्वांचलबाबत) आमची सपशेल माघार, तरी पण खाल्लाय घरचे वासे मोजणार्या कश्मीरीम्बाबतचे मत तेच राहिल. पुर्वांचल निसर्गसौंदर्याने नटलेले आहे असे नेहमीच पेपेरात्/मिपावरहीही वाचतो पण तिथली सामाजीक आणि अशांत बाजूबद्दल फारसे लिखाण वाचनात आले नाही म्हणून असेल. तरी सोन्याबापुंनी कळफलक धूळ झटकून एखादा प्रसंग जमल्यास मालीकाच लिहावी ही विनंती.. चू भू देणे घेणे

In reply to by नाखु

शाम भागवत 25/07/2016 - 10:58
१) आजही गौहत्तीला फॅमीली न्यायला लोक तयार असतात पण मिझोराम, नागालँड, मणिपूर, मेघालय व त्रिपुरा येथे राजधानीच्या ठिकाणी जरी पोस्टिंग असेल तरी फॅमीली न नेता एकटेच जातात. २) पण ही माणसे आपल्याकडे आली तर त्यांना कोणी भारतीय समजत नाही. नेपाळी समजतात. जर एखादी स्त्री गोरी व दिसायला चांगली व सुखवस्तू असेल तर जपानीही समजतात. काही काळा नंतर ही लोकं यालाही सरावतात पण आत मधे एक बोच राहातेच. पुण्या मुंबई सारख्या प्रगत भागात असे होत असेल तर महाराष्ट्राच्या इतर भागात काय होत असेल? असो. ३) भारत खूप खूप मोठा आहे. सगळ्याच बाबतीत खूपच विविधता आहे. नीट समजावून घेता आले पाहिजे. म्हणजे सगळे गुणदोष लक्षात येतात व उपाय ही सापडतात व मुख्य म्हणजे राग आवरून हे साधता येऊ शकते व जेव्हा राग आवरून उपाय योजना केली जाते तेव्हा उपायापेक्षा रोग बरा म्हणायची वेळ येत नाही. जाऊ दे. विषयांतर नको.

In reply to by शाम भागवत

पैसा 25/07/2016 - 14:06
http://www.misalpav.com/node/27810 हा चिगोचा लेख सहजच आठवला. ------- काश्मिर आणि सैन्याबद्दलच्या या आताच्या लेखातील मते बुद्धिभेद करणारी आहेतच. त्याचा निषेध. त्याशिवाय लेखकाने काही मिपाकरांबद्दल जे वयक्तिक शेरे मारले आहेत त्याची संपादक मंडळाने दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी ही विनंती आणि अपेक्षा आहे.

In reply to by टवाळ कार्टा

विनोद१८ 25/07/2016 - 18:07
..देउ नये, कारण हा विषय अत्यंत्य संवेदन्शील आहे, हा बुद्धीभेद करणारा लेख आहे हे तर सरळ सरळ दिसतेच आहे. लेखक वरकरणी लिखणस्वातंत्र्याचा आधार / गैरफायदा घेउन आपल्या शत्रुदेशाचा अजेंडा पुढे रेटीत आहे असेच दिसते. त्यांचा हेतु शुध्ध दिसत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते.

In reply to by विनोद१८

गॅरी ट्रुमन 25/07/2016 - 18:34
हा विषय अत्यंत्य संवेदन्शील आहे, हा बुद्धीभेद करणारा लेख आहे हे तर सरळ सरळ दिसतेच आहे. लेखक वरकरणी लिखणस्वातंत्र्याचा आधार / गैरफायदा घेउन आपल्या शत्रुदेशाचा अजेंडा पुढे रेटीत आहे असेच दिसते. त्यांचा हेतु शुध्ध दिसत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते.
अहो असले काहीतरी बरळणार्‍यांना हल्ली विचारवंत म्हणायची फ्याशन आहे हे माहित नाही का तुम्हाला?

चलत मुसाफिर 21/07/2016 - 15:07
कलम 370 रद्दबातल करून जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेणे हा रामबाण उपाय आहे. तोपर्यंत मात्र अंतरिम उपाय म्हणून सरकार व सैन्य यांनी आपल्या प्रसिद्धीतंत्रात बदल करावा. "तुम्ही भारतीय आहात" असे म्हणण्याऐवजी "आम्हीही काश्मिरी आहोत" असे मुख्य सूत्र ठेवावे.

श्रीगुरुजी 21/07/2016 - 15:20
प्रतिक्रिया देणार नव्हतो. परंतु खालील वाक्य वाचल्यानंतर,
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल?
हेच लिहावेसे वाटते की वरील लेख म्हणजे पराकोटीचा मूर्खपणा आहे.

महासंग्राम 21/07/2016 - 15:32
काही प्रश्न/शंका आहेत तुम्ही योग्य समाधान कारक उत्तरे देऊन दूर कराल अशी अपेक्षा
कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल
हे विधान कोणत्या आधारावर केले आहे काही संदर्भ नक्कीच असेल तो द्यावा. वरील परस्थिती आपण स्वतः अनुभवली आहे का की फक्त पेपर मधल्या बाटलंय/विश्लेषणे लेख लिहिला आहे ???

वरुण मोहिते 21/07/2016 - 15:40
पुण्याचा माहित नाही काय खरं काय खोटा ह्या लेखात तो मुद्दा नव्हता आणायला पाहिजे ..बाकी काश्मीर मध्ये सिमेन्स बरोबर काम केलं आहे पण उधमपूर सोडलं की पुढच्या लोकांची इच्छा नसते भारतासोबत राहण्याची असा वाटतं ..३-३ महिने तिकडे राहिलो आहे म्हणून वाटलं बाकी चूक बरोबर डॉक खरे आणि सोन्याबापू सांगतील

बाळ सप्रे 21/07/2016 - 16:06
आता काश्मीर भारतात असल्याने नक्की प्रॉब्लेम काय आहे काश्मीरींचा?? भारतातील इतर राज्यांप्रमाणे एक राज्य म्हणून रहाण्यात नक्की काय तोटा आहे त्यांचा?? सैन्याचा त्रास वगैरे पाकिस्तानींची मदत घेतल्याने ओढवून घेतलेला आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाकी ते डोवाल साहेबांना कशाला मधे आणले उगाच ? जुनाच अजेंडा किती दिवस राबवणार ?

In reply to by अनुप ढेरे

अनुपराव, तत्व म्हणून तुम्ही म्हणता ते मी मान्य करतोच, फक्त उत्तरपूर्वेतले अनुभव पाहता, आफस्पा तूर्तास तरी लेसर इव्हिल ऑफ द अव्हेलेबल इव्हिल्स वाटते मला तरी.

श्रीनगर- बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलिस चौकीतच पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी आज (गुरुवार) दिली. http://www.esakal.com/Tiny.aspx?K=E3642t

गामा पैलवान 21/07/2016 - 23:03
संदीप ताम्हनकर, तुमची दोन विधानं खासकरून पटलं नाहीत. १. >> याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील >> अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत. वल्गनायुक्त पोष्टींमुळे अजित दोभाल यांचं महत्त्व जराही कमी होत नाही. कारण नसतांना कृपया त्यांना या विषयात ओढू नये. २. >> .... तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित >> असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? सैनिकांची बाजू घेणारा कुठलाही कायदा काश्मिरात अस्तित्वात नाही. उलट भारतीय सैन्य राष्ट्रीय मानवी हक्क आयोगास उत्तरदायी आहे. जगात कुठल्याही देशाचं सैन्य अशा प्रकारे बांधील नाही. त्यामुळे तुमचं हे विधान म्हणजे शुद्ध दिशाभूल आहे. आ.न., -गा.पै.

कलंत्री 22/07/2016 - 17:19
विकतचे दुखणे असेच मला वाट्ते. काश्मिरला राजकिय तोडग्याची गरज आहे. कोणी चाणक्य / चंद्रगुप्त / शिवाजीच्या प्रमाणे विचार करणारा नेता जोपर्यंत भारतात होत नाही तो पर्यंत चांगला तोडगा निघणे अशक्यच आहे. काश्मिरी आपले देशबांधव आहेत असा विचार जर मनात आला तर आपोआपच नेमके काय चुकत आहे हे समजणे सोपे होईल. मोदीजी कधी मौन सोडतील आणि चांगला दूरद्रष्टी नेता शोधतील तो पर्यंत अल्ला मालिक आणि परमेश्वराची इच्छा असेच म्हणावे लागेल.

मनो 22/07/2016 - 19:31
हमीद दलवाई यांचा अनुभव (भाऊ तोरसेकर यांच्या ब्लॉग वरून उचलला आहे) http://bhautorsekar.in/काश्मिरची-समस्या-की-कांग/ ‘भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये. मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’ मी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते. ‘आप कल कहॉ गये थे?’ मग त्याने विचारले. मी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे. ‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले. हाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपणे विचारले, ‘तेथे काय पाहिलेत?’ ‘लढाई चाललेली पाहिली.’ ‘कुणाची जीत होत आहे?’ ‘हिंदूस्तानी फ़ौजेची.’ कसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला. मग तो बोलू लागला – अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते! पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे? यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले. मी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते? येथे काय दु;ख आहे? कशाची कमतरता आहे?’ तो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’ श्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’

In reply to by मनो

शाम भागवत 23/07/2016 - 16:04
मनोंचा प्रतिसाद येऊन २४ तास व्हायला आले आहेत तरीही .... "भाऊ तोरसेकर? खी..खी..खी.." असा एखादा प्रतिसाद आला नाही हे एक आश्चर्यच!!! :))

In reply to by शाम भागवत

भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत इतकेही स्वस्त माझे तरी खी खी खी नाहीत म्हणुन सोडले बघा भागवत साहेब बाकी ताम्हनकर साहेब विरोधी पक्षाचे तोरसेकर होऊ शकतील असे वाटते ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मृत्युन्जय 25/07/2016 - 11:11
तो अनुभव हमीद दलवाई यांचा आहे बाप्पु. तोरसेकरांनी केवळ लिहिला. तरीही खीखीखी करायची असेल तर काय करणार. कदाचित दलवाई मुसलमानांचे भाऊ तोरसेकर आहेत असे ऐकायला मिळेल आता.

In reply to by मृत्युन्जय

एकतर भाऊ भाट आहेत, इतकी वर्ष मुंबई महापालिका हातात असताना सुद्धा रस्त्यावर असलेल्या खड्डयांची जबाबदारी सेनेची कशी नाही ह्यावर लेख पाडतात ते, त्यामुळे हो, भाऊंवर माझे खी खी खी मी बरबाद करणार नाही हे खरे, बाकी कोणीतरी कोणाचातरी कोणीतरी आहे असे समजा मी मागे कधी म्हणले असेल तर तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे अन तो माझ्या अल्पमतीनुसार मी बनवलेला आहे, त्याचा इथे अस्थानी उल्लेख करायचे अन भाऊंवर खी खी खी बरबाद करणार नाही असे म्हणल्याने तुम्हाला झोम्बायचे कारण मात्र कळले नाही मृत्युंजय भाऊ

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मृत्युन्जय 25/07/2016 - 13:32
मिपावर लेख पाहुन नाही तर माणुस पाहुन प्रतिसाद पडतात असा एक आरोप नेहमी करण्यात येतो (थोडक्यात काय लिहिले आहे ते महत्वाचे नसुन कोणी लिहिले आहे ते महत्वाचे आहे असे दिसते). खरे खोटे देव जाणे. सद्यस्थितीत भाऊ तोरसेकरांबद्दलची कमेंट त्याच सदरात मोडते. पण केवळ एखादा अनुभव भाऊ तोरसेकरांनी लिहिलेला आहे म्हणून तो हास्यास्पद होत नाही. सद्य परिस्थितीत तर अनुभव पण तोरसेकरांचा नाही. अनुभव तोरसेकरांचा असो किंवा दलवाईंचा, त्या अनुभवामागची दारुण वस्तुस्थिती काश्मिरमधली भयावह परिस्थिती विदीत करते. अश्या वेळेस त्या परिस्थितीवर हसण्यासारखे काय आहे हे मला नक्कीच उमजलेले नाही. भागवतांचा प्रतिसाद वाचा:
"भाऊ तोरसेकर? खी..खी..खी.." असा एखादा प्रतिसाद आला नाही हे एक आश्चर्यच!!!
\ त्यावर तुमचा प्रतिसाद वाचा:
भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत इतकेही स्वस्त माझे तरी खी खी खी नाहीत म्हणुन सोडले बघा भागवत साहेब
थोडक्यात म्हणजे वरचा संपुर्ण अनुभव (दलवाईंचा - तोरसेकरांनी लिहिलेला) हा हास्यास्पद आहे असे म्हणून त्या वस्तुस्थितीची कुचेष्टा करण्यामागचे कारण समजले नाही. काश्मीरमध्ये सामान्य माणसाच्या मनात काय पराकोटीचा भारतद्वेष आहे आणि तो केवळ धर्माच्या नावाखाली आहे हे त्या अनुभवातुन दिसते. ही अतिशय दारुण परिस्थिती आहे आणि त्याला अर्थातच तोरसेकर जबाबदार नाहित. असे असता त्यावर खीखीखी करुन हसण्यासारखे काही कारण मला दिसत नाही सोन्याबापु. त्यामुळेच हे अस्थायी विधान प्रचंड खटकले. इथे लेखक तोरसेकर नसुन हमीद दलवाई असले असते तरी हेच म्हणालो असतो किंबहुना अगदी राहुल गांधीने जरी हा अनुभव लिहिला असता आणी त्यावर तुम्ही हा प्रतिसाद दिला असता तरी तो तेवढाच खटकला असता.
बाकी कोणीतरी कोणाचातरी कोणीतरी आहे असे समजा मी मागे कधी म्हणले असेल तर तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे अन तो माझ्या अल्पमतीनुसार मी बनवलेला आहे,
या वाक्याचा संदर्भ, मतितार्थ, आशय आणि उपयोग नाही कळाला त्यामुळे यावर प्रतिसाद देत नाही.

In reply to by मृत्युन्जय

सगळे उलगडतो, प्रथम एक विनंतीवजा मागणी पूर्ण करता आली तर पहा, ती म्हणजे, हमीद दलवाई ह्यांचा हा अनुभव त्यांच्याच फर्स्टहँड लेखनात मिळाला तर सांगा किंवा द्या (मला कल्पना नाही), मला वाचायला आवडेल, जर इतका महत्वाचा अनुभव खुद्द दलवाईंच्या लेखनात नसला तर पुढे काय? आजकाल कोणाचा भरवसा घेता? अनुभव एकाचा मांडतोय दुसरा..

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मृत्युन्जय 25/07/2016 - 14:10
माहिती नाही. तोरसेकरांना हा अनुभव कसा माहिती झाला ते माहिती नाही. पण तोरसेकरांनी धादांत खोटे लिहिले आहे असे कोणी म्हणत नाही. त्यामुळे त्यावर शंका घ्यायचे काही कारण मला दिसत नाही. त्यांनी तद्दन भूलथापा मारल्या आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय सोन्याबापू?

In reply to by मृत्युन्जय

नाही, मला असेच म्हणायचे नाहीये, मला फक्त इतके म्हणायचे आहे की संवेदनशील विषयात पब्लिक फोरम पक्षी ब्लॉग वगैरे वर जर कोणी "हियरसे" प्रकारचे अनुभव मांडले तर त्यावर एकदम डोळे झाकून विश्वास ठेवू नये, ह्यात लेखक कोण आहे ह्यावर बायस असायचे कारण नाही, शिवाय भाऊंच्या विषयाला भागवतांनी आऊट ऑफ द ब्लु तोंड फोडले म्हणून मी त्या कॉमेंट संबंधित माझी मते त्याच्याखाली नोंदवली आहेत,

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

शाम भागवत 25/07/2016 - 14:42
सोन्याबापू तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल प्रथम सॉरी. खरे सांगायचे तर कोणीतरी तोरसेकरांबद्दल खी.खी.खी. असे लिहिल्याचे आठवत होते. तुम्ही ते लिहिलेय हे गावीही नव्हते. तुमच्या उत्तरावरून माझी कॉमेंट तुम्हाला दुखवून गेल्याचे जाणवल्याने मी स्मायली देऊन थांबलोही होतो. असो. मला तुमच्या बद्दल आदर आहे. तसेच तुम्हाला दुखवायचा माझा कोणताही हेतू नव्हता हे इथे स्पष्ट करून मी परत एकदा सॉरी म्हणतो. ओके?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

शाम भागवत 25/07/2016 - 14:32
मी दलवाईंचा लेख खूप पूर्वीच वाचला होता. पण नक्की कुठे ते आठवत नव्हते. आत्ता तोरसेकरांचा तो लेख वाचला त्यानुसार
१९६५ सालच्या भारत पाक युद्धात आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ तर्फ़े हमीद दलवाई व वसंत सोपारकर हे पत्रकार युद्धवार्ता घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळचा हमीदभाईंनी एका लेखात लिहून ठेवलेला हा अनुभव. तेव्हाच्या काश्मिरी व भारतीय मुस्लिम मानसिकतेचा हा दाखला आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या ३ मे १९८२ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात दलवाईंनी मुस्लिम व सेक्युलर मानसिकतेचे नेमके विश्लेषण केलेले आहे.
अवांतरः मलाही तोरसेकरांची सर्व मते पटत नाहीत. पण तरीही मला त्यांच्या अनेक पोस्ट मधून विचार करण्यासारखे बरेच मुद्दे मिळाले आहेत.

In reply to by शाम भागवत

हाच संदर्भ अगोदर मिळाला असता तर पुढले अवांतर टाळता आले असते असे वाटते भागवत साहेब मला. असो झाल्यागेल्यावर मी माझ्यातर्फे पाणी टाकतो :) कसे?

In reply to by मृत्युन्जय

बाकी , आमच्या "उप-प्रतिसादाची" पिसे काढायला हिरीरीने आलात, तेव्हा खुद्द अनुभवावर काहीही मत न देता ,नुसते भाऊंच्या विरोधकांवर श्लेष करणाऱ्या भागवतांच्या कॉमेंट वर काही बोलला नाहीत ते? एकदाही नाही सांगावे वाटले का भागवतांस की बोआ तुम्ही का अनुभव सोडून लेखक-सादरकर्त्यावर घसरताय, जरा विषण्ण परिस्थितीवर बोला, बोलायचे नाही ठरवले होते पण विषय वाढवलाच आहात तर बोलतो, हा मुदलातलाच डबल स्टॅण्डर्ड मलाही काही खास रुचला नाही बरंका मृत्युंजय भाऊ :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मृत्युन्जय 25/07/2016 - 14:31
भागवतांना समज द्यावीशी वाटली नाही त्याचे कारण असे की त्यांनी तोरसेकर विरोधकांवर कुत्स्तित टिप्पणी केली होती पण त्यामुळे काश्मीर मधल्या परिस्थितीची कुचेष्टा होत नाही. तुमच्या प्रतिसादातुन तसे होत आगे. त्या अनुभवावर खीखीखी करुन हसणे किंवा
"भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत इतकेही स्वस्त माझे तरी खी खी खी नाहीत म्हणुन सोडले बघा भागवत साहेब"
(याचा अर्थ असा होतो की तोरसेकरांनी न लिहिता अजुन कोणी लिहिले असते तर तुम्ही खी खी खी करुन हसले असता) असे म्हणुन काश्मीर मधील भयाणा परिस्थितीची कुचेष्टा करणे हे मात्र मला खटकले. जे आहे ते स्पष्तपणे त्या अनुभवात मांडले आहे. तुम्हाला तोरसेकर आवडत नाहित म्हणून तोरसेकरांनी लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीची कुचेष्टा करण्याचे काहिच कारण नाही. मिपावरील बर्‍याच आयडींचे विचार हे माझ्या प्रकृतीच्या विरोधात जाणारे आहेत पण म्हणुन त्यांच्या प्रत्येक प्रतिसादावर अथवा धाग्यावर फक्त हेटाळणीच करायची असे काही मी करत नाही विशेषतः तसे केल्याने जेव्हा एखाद्या व्यक्तिची, घटनेची अथवा वस्तुस्थितीची हेटाळणी होत असेल किंवा गांभीर्य कमी होत असेल तेव्हा. त्याउप्परही तोरसेकर म्हटल्यावर तुच्छतापुर्वक उल्लेखच करायचा असल्यास त्यासही माझा आक्षेप नाही कारण ते एखाद्याचे वैयक्तिक मत असु शकते मात्र तसे करण्याने विदित केलेल्या देशविघतक वस्तुस्थितीला नाकारले जात असेल, त्याची हेटाळणी होत असेल किंवा त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर माझा नक्कीच आक्षेप आहे. तोरसेकरांचा विरोध करुन अथवा तोरसेकरांना उचलुन धरुन. तोरसेकरांना शिव्या घालुन अथवा तोरसेकरांबद्दल गोग्गोड बोलुन, तोरसेकरांची निंदा नालस्ती करुन अथवा तोरसेकरांचा जयजयकार करुन , काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" Because the Union Must Persist. थोडक्यात आक्षेप तोरसेकर विरोधाला नाहि. हा मुदलातलाच डबल स्टॅण्डर्ड मलाही काही खास रुचला नाही बरंका मृत्युंजय भाऊ :) डबल स्टेंडर्ड असण्याचा प्रश्नच नाही, कारण वरती विदित केलेच आहे. स्पष्टपणे बोलुन दाखवले. त्याबद्दल नाईलाज आहे. तुम्हाला रुचले नाही याचा खेद आहे.

In reply to by मृत्युन्जय

(याचा अर्थ असा होतो की तोरसेकरांनी न लिहिता अजुन कोणी लिहिले असते तर तुम्ही खी खी खी करुन हसले असता) हा अर्थ कसा निघाला बुआ?? मी स्पष्ट बोललोय की तोरसेकरांबद्दल माझे मत प्रतिकूल आहेच, त्यातून मी काश्मिरी परिस्थितीची कुचेष्टा करतोय हा जावईशोध आपण लावलाय भाऊ, माझे मत परत एकदा मांडतो "तोरसेकर ह्यांच्यावर खर्च करण्याइतके माझे खी खी स्वस्त नाहीत" ह्यात मी कश्मीर परिस्थितीची कुचेष्टा कशी केली ते सांगा? शिवाय तोरसेकर हा माझा एकमेव सोर्स नाही काश्मीर बद्दल अभ्यास करायला, का मी तोरसेकरांना मना करतोय म्हणून मी काश्मीरला कुचेष्टेने पाहतोय असे सोलॉजिझम लढवलेत आपण?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मृत्युन्जय 25/07/2016 - 15:03
हा अर्थ कसा निघाला बुआ?? मी स्पष्ट बोललोय की तोरसेकरांबद्दल माझे मत प्रतिकूल आहेच, त्यातून मी काश्मिरी परिस्थितीची कुचेष्टा करतोय हा जावईशोध आपण लावलाय भाऊ, माझे मत परत एकदा मांडतो तोरसेकरांबद्दलचे तुमचे मत काहिही असले तरीही त्यांनी लिहिलेल्या सत्य अनुभवावर खीखीखी करणे किंवा केवळ त्यांनी लिहिले आहे म्हणुन खीखीखी देखील करणार नाही असे लिहिणे यातुन त्या परिस्थितीची कुचेष्टाच होते सोन्याबापु. तो शोध नाही. जाव्ईशोध तर त्याहुन नाही. तुम्ही जुनेच मत परत व्यक्त केल्याने त्या परिस्थितीत काहिही बदल होत नाही. तुम्हाला तसे म्हणायचे नव्हते असे म्हणा वाटल्यास. का मी तोरसेकरांना मना करतोय म्हणून मी काश्मीरला कुचेष्टेने पाहतोय असे सोलॉजिझम लढवलेत आपण? परत एकदा लिहितो:
तोरसेकरांचा विरोध करुन अथवा तोरसेकरांना उचलुन धरुन. तोरसेकरांना शिव्या घालुन अथवा तोरसेकरांबद्दल गोग्गोड बोलुन, तोरसेकरांची निंदा नालस्ती करुन अथवा तोरसेकरांचा जयजयकार करुन , काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" Because the Union Must Persist.
आधी लिहिलेले अजुन एक वाक्य वाचा
इथे लेखक तोरसेकर नसुन हमीद दलवाई असले असते तरी हेच म्हणालो असतो किंबहुना अगदी राहुल गांधीने जरी हा अनुभव लिहिला असता आणी त्यावर तुम्ही हा प्रतिसाद दिला असता तरी तो तेवढाच खटकला असता.
वरची २ वाक्ये एवढी स्पष्ट असुनही तुम्ही तोरसेकरांना विरोध करताय म्हणुन मी हे सगळे लिहितोय असे घोडे तुम्हाला पुढे दामटायचे असेल तर तो तुमचा प्रश्न आहे सोन्याबापु. त्याबद्दल मी काहीच करु शकत नाही. त्यामुळे तुम्ही जे लिहिले आहे त्यातुन जो अर्थ प्रतीत होतो आहे त्याला Theory of Deduction म्हणा अथवा syllogism म्हणा, परिस्थिती बदलणार नाही. फक्त बघण्याचे चष्मे बदलतील.

In reply to by मृत्युन्जय

भाऊ तोरसेकर????? >>>> खी खी खी → असे विधान मी केले होते,श्रीगुरूजींना उपप्रतिसाद दिला होता जाकिर नाईकांच्या धाग्यावर बहुतेक!!! तुम्ही कृपया वाद घालत बसू नका. . . . . आणखी एक राहिलचं "खी खी खी खी"

श्रीगुरुजी 23/07/2016 - 13:59
हा 'ऐसी'वर शोभणारा लेख चुकुन इथे टाकलेला दिसतोय. 'ऐसी'वर या लेखात ओकलेल्या गरळीचे समर्थन करणारे आतापर्यंत किमान १००० प्रतिसाद आले असते.

वटवट 23/07/2016 - 16:33
सुरुवातीला वाटले रात्रीच्या नशेत लिहिलाय हा लेख..... पण नंतर बघीतलं...चक्क दुपारी पोस्टलाय हा लेख??? ऑ .... दुपारी दुपारीच असं कसं ब्वॉ???

दखलपात्र प्रतिक्रियां संबंधी: - 'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल' - हे मी लिहिलेले नाही. अशा पोस्ट समाजमाध्यमातून जोरात फिरत आहेत. कोण पुढे पाठवतं ते सगळे जाणतातच. प्रत्यक्ष रस्त्यावर जे सैन्य असते ते एवढ्या बौद्धिक क्षमतेचे असते का? आणि सैन्याला विशेषाधिकार दिले की त्याचा अतिरेक होतो ही जगभरातील वस्तुस्थिती आहे. भारतात अनेक राज्यात १९५८ पासून आफ्स्पा लागू आहे, त्या मणिपुरी मानवाधिकार कार्यकर्त्या आरोम चानू शर्मिला गेली अनेक वर्षे सत्याग्रह करतायत तो का आणि कसा ते जरा वाचा. काश्मिरी उपास करत नाहीत तर दगड फेकतात. श्री डोवाल यांची काशिरातील कामगिरी काय हे अजून समोर यायचंय. तोपर्यंत संघ परिवारातला माणूस म्हणून ज्यांना त्यांच्या आरत्या करायच्यात त्यांनी जरूर कराव्या. काश्मिरात पाक पुरस्कृत अशांतता आणि दहशतवाद आहे यात कोणाचेच दुमत नाही. प्रश्न कसे हाताळावे हा मुद्दा आहे. केवळ सैन्याच्या बळावर काश्मीर प्रश्न सोडवता येईल असे वाटणारे मुर्खांच्या नंदनवनात वावरतायत हे नक्की. याबाबत अतिराष्ट्रवाद्यांचा अभिनिवेश हास्यास्पद आहे. अश्याने खरे नंदनवन हातातून निसटून जाईल. आर्मीने, अर्ध-सैन्यबलांनी केलेले अत्याचार आणि बळाचा अतिरिक्त वापर यावरही बरेच मटेरिअल आंतरजालावर उपलब्ध आहे. मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने, स्वताः गाडी चालवत बऱ्याच ठिकाणी फिरलोय, स्थानिकांशी अजूनही संपर्कात आहे. तसेच इतर अभ्यासाच्या आधारावर मूळ पोस्ट लिहिल्येय. सध्याच्या अशांततेच्या, दंग्याच्या, गोळीबाराच्या, पॅलेट गनच्या कमरेच्या वर चालवण्याच्या अनेक स्टोरीज आंतरजालावर आहेत. बहुतेकवेळा कॅमेरा सैन्याच्या (बाजूने) समोरील आंदोलकांचे चित्रण करतो. या चित्राची दुसरी बाजूसुद्धा आहेच. दहशतवादाचे पीक पेरण्यासाठी जमिनीची मशागत भारतीय सैन्यदले पाकिस्तानला फुकटात करून देतायत, असे चित्र आहे. बाकी टवाळखोरांचे सगळे मटेरिअल साभार परत.

In reply to by संदीप ताम्हनकर

वटवट 23/07/2016 - 17:57
आयला... अजित डोवाल आणि आरएसेंस संबंध.... नवीनच ब्वॉ... (दादा.. दुसर्या बाजूचेपण व्हिडीओ उपलब्ध आहेत... जमल्यास ते बघा...) असो... पण एक खरंय... तुमच्यासारखे विचारवंत असतील तर आर्मी काही फार चांगले करू शकेल असे वाटत नाही.... खेद ह्याच गोष्टीचा आहे कि तुमच्या काश्मीरमधल्या वास्तव्यात काश्मिरी पंडितांना कधी भेटू वाटलं? त्याबद्दल लिहायचा प्रयत्न करा.. आणि जमल्यास आर्मीमधल्या लोकांशी पण बोला जे तिथे आहेत... साली ही देशातली कीड आधी संपली पाहिजे. बाहेरचे लोक मारणे खूप सोपे... पण हे असले साप.... अतिभयंकर... (खरं तर मी एव्हढं भडक कधीच बोलत नाही... पण वस्तुस्तिथीचे योग्य आकलन नं करता जर कोणी अकलेचे तारे नां..... सटकते राव...)

In reply to by संदीप ताम्हनकर

अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे काय? ह्याचे उत्तर दिलेत तर उपकृत होईन ताम्हनकर साहेब, दुसरे म्हणजे, माझा रास्वसंघ विरोध हा मिपावर बरेच जणांना माहिती आहे, त्याला माझी काही वैयक्तिक कारणे आहेत, अन ती बदलावीत असे सकारात्मक संघाने राजकीय आघाडीवर काही केलेले मला आजवर दिसलेले नाही, पण तो भाग वेगळा, ते तुमच्यासमोर मी सिद्ध करावे ही ऑथॉरिटी मी वैयक्तिकरित्या तुम्हाला देत नाहीये, अजून जर विषय संबंधित बोलायचे झाले तर डोवल हे रास्वसंघसंलग्न आहेत हे मला माहिती होते/आहे, पण फक्त ते संघ संबंधित होते म्हणुन त्यांची इंटेलिजन्स ब्युरो मधील कारकीर्द जर तुम्ही नाकारत असाल किंवा त्याची हुर्यो उडवत असाल तर संघडले अन तुमच्यात फरक तो काय उरणार न? की मग १. तुम्ही स्वतः आयबी मध्ये नोकरी करत होतात म्हणून तुम्हाला डोवल ह्यांचे उदात्तीकरण माहिती आहे? २. का ते फक्त संघाशी संबंधित होते म्हणून त्यांचे मीठ तुम्हाला अळणी आहे? उरता उरला काश्मीरचा प्रश्न तर, माझ्या नोकरीत (मला दरवेळी उल्लेख करायला आवडत नाही तरीही) अर्धसैनिकबल असलेल्या एका संघटनेचा एक अधिकारी म्हणून माझ्या पाहणीत आलेले अनुभव हे भयानक अन अतिशय सेन्सिटिव्ह श्रेणीतील असल्यामुळे मी ते इथे मांडू शकत नाहीये, फक्त टाळी एका हाताने कधीच वाजत नसते इतके सांगतो. पटले तर घ्या नाहीतर आम्हालाही गाढवात काढा :)

In reply to by संदीप ताम्हनकर

श्रीगुरुजी 24/07/2016 - 14:36
'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल' - हे मी लिहिलेले नाही. अशा पोस्ट समाजमाध्यमातून जोरात फिरत आहेत. कोण पुढे पाठवतं ते सगळे जाणतातच.
यात काही सत्य आहे का नाही हे समजण्याएव्ढी तुम्हाला बुद्धी आहे का नाही? इथे ते टाकण्याआधी सारासार विचार केला होता का? कशाला इतरांच्या आड लपता? मी कायअप्पावर अनेक गटांचा सदस्य आहे. असली पोस्ट आजतगायत कोणत्याही ग्रुपवर आलेली नाही. या असल्या उपसाहात्मक पोस्ट्स तुमच्यासारख्या निधर्मांधांच्या डोक्यातून बाहेर पडत असतात.
प्रत्यक्ष रस्त्यावर जे सैन्य असते ते एवढ्या बौद्धिक क्षमतेचे असते का? आणि सैन्याला विशेषाधिकार दिले की त्याचा अतिरेक होतो ही जगभरातील वस्तुस्थिती आहे. भारतात अनेक राज्यात १९५८ पासून आफ्स्पा लागू आहे, त्या मणिपुरी मानवाधिकार कार्यकर्त्या आरोम चानू शर्मिला गेली अनेक वर्षे सत्याग्रह करतायत तो का आणि कसा ते जरा वाचा. काश्मिरी उपास करत नाहीत तर दगड फेकतात.
अत्यंत निर्बुद्ध वाक्य! अतिरेक्यांशी, दंगलखोरांशी लढायला सैन्य पाठवितात ते काय निर्बुद्ध सैनिक असतात का? भारतात फक्त काश्मिर, मणिपूर इ. मोजक्या ठिकाणीच सैन्य का आहे व सैन्याला विशेषाधिकार का द्यावा लागला आहे हे समजण्याइतकी बुद्धी आहे का? सैन्याला विशेषाधिकार दिले की त्याचा अतिरेक होतो म्हणे. सैन्याने काय आणि किती वेळा अतिरेक केला? काश्मिरमध्ये आणि देशात इतरत्र एके ४७ आणि ग्रेनेड्स घेऊन अतिरेकी हल्ले करतात, गोळ्या घालून व बॉम्बस्फोट करून निष्पापांना जीवानिशी मारतात, काही जणांना जन्माचे अपंग करतात, या क्रूर नरभक्षक जनावरांना काही स्थानिक लोक पाठिंबा देतात, लहान मुलांच्या आडून सैन्यावर दगडफेक होते, जमावात मागे उभे राहून सैनिकांच्या दिशेने ग्रेनेड फेकतात, त्यात सैनिक जखमी होतातच पण जमावात पुढे असलेली लहान मुलेही जखमी होतात, एका पोलिसाला जमावाने घेरून मारहाण करून त्याचे डोळे फोडले, अजून एका पोलिसाला जमावाने त्याच्या वाहनासकट नदीत फेकून दिले . . इ. क्रूर कृत्यांबद्दल चकार शब्द नाही. ही कृत्ये होत असताना सैन्याने काय गुलाबाची फुले वाटून शांततेचे आवाहन करायचे का? अशा कृत्यांना विरोध करून अतिरेक्यांशी लढताना सैन्याला जे जे करावे लागते ते क्षम्य आहे. त्यात कोणताही अतिरेक नाही. अतिरेक वाटत असला तर तो होणारच. संचारबंदी जाहीर झालेली असून रस्त्यावर अतिरेक्यांशी लढण्यासाठी सैन्य असताना अतिरेकी बुर्‍हान वाणीच्या मृत्युचा निषेध करण्यासाठी संचारबंदी मोडून रस्त्यावर उतरलेल्या व सैनिकांवर व पोलिसांवर हल्ले व दगडफेक करणार्‍या वाणीच्या समर्थकांना आपल्या दुष्कृत्यांची शिक्षा भोगावी लागणारच. बुर्‍हान वाणी हा काही साधुसंत नव्हता. तो अतिरेकी होता आणि त्याच्या समर्थनासाठी संचारबंदी असतानाही रस्त्यावर उतरलेले सुद्धा साधुसंत नव्हते. ते घराबाहेर पडले नसते तर बाकी प्रश्न उद्भवलेच नसते.
श्री डोवाल यांची काशिरातील कामगिरी काय हे अजून समोर यायचंय. तोपर्यंत संघ परिवारातला माणूस म्हणून ज्यांना त्यांच्या आरत्या करायच्यात त्यांनी जरूर कराव्या.
अत्यंत बेताल वाक्य. डोवाल संघ परिवारातले कधीपासून झाले? ते १९८४ च्या आधीपासून कार्यरत आहेत. त्यांच्या कोणीही आरत्या ओवाळत नाही. ते आपके काम करताहेत. ते संघ परिवारातले आहेत म्हणून त्यांच्या आरत्या केल्या जाताहेत हे अत्यंत मूर्खपणाचा आरोप आहे.
काश्मिरात पाक पुरस्कृत अशांतता आणि दहशतवाद आहे यात कोणाचेच दुमत नाही. प्रश्न कसे हाताळावे हा मुद्दा आहे. केवळ सैन्याच्या बळावर काश्मीर प्रश्न सोडवता येईल असे वाटणारे मुर्खांच्या नंदनवनात वावरतायत हे नक्की. याबाबत अतिराष्ट्रवाद्यांचा अभिनिवेश हास्यास्पद आहे. अश्याने खरे नंदनवन हातातून निसटून जाईल. आर्मीने, अर्ध-सैन्यबलांनी केलेले अत्याचार आणि बळाचा अतिरिक्त वापर यावरही बरेच मटेरिअल आंतरजालावर उपलब्ध आहे.
सैन्याला व सरकारला एकवेळ नसेल कळत काश्मिर प्रश्न कसा हाताळायचा ते, पण तुम्हाला आहे का अक्कल काश्मिर प्रश्न हाताळायची? असली तर सैन्याला व सरकारला जाऊन सांगा. तुम्हाला इथे बसून समजतंय का काश्मिर प्रश्न कसा हाताळायचा ते. आंतरजालावर बरेच काही असते. ते काय सगळे खरे असते का? अतिरेक्यांनी केलेल्या निष्पापांच्या हत्या, सौरभ कालिया सारख्या पकडलेल्या सैनिकांचे लिंग कापून केलेले हालहाल, भारतीय सैनिकांची कापलेली मुंडकी इ. सुद्धा बरेच मटेरिअल आंतरजालावर आहे. ते वाचलंय का? बुर्‍हान वाणीसुद्द्धा आंतरजालाच्या माध्यमातून लोकांना भडकावत होता. इसिस आणि जाकीर नाईक सुद्धा आंतरजालाच्या माध्यमातून लोकांना भडकावतात.
मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने, स्वताः गाडी चालवत बऱ्याच ठिकाणी फिरलोय, स्थानिकांशी अजूनही संपर्कात आहे. तसेच इतर अभ्यासाच्या आधारावर मूळ पोस्ट लिहिल्येय.
काश्मिरात सैन्य नसते तर पहिल्याच भेटीत पैगंबरवासी झाला असता हे लक्षात येतंय का? का स्वतःला जेम्स बाँड समजता? सैन्यामुळेच तिथे ३-३ वेळा निर्वेध फिरू शकलात आणि त्याचमुळे इथे येऊन मूर्खासारख्या पोस्ट्स टाकू शकलात याची जाणीव आहे का? ३ वेळा काश्मिरात फिरून सुखरूप परत आलात याचे श्रेय सैन्याला देऊन कृतज्ञ राहण्याऐवजी कृतघ्नपणे सैन्यावरच दुगाण्या झाडताना शरम कशी वाटत नाही?
सध्याच्या अशांततेच्या, दंग्याच्या, गोळीबाराच्या, पॅलेट गनच्या कमरेच्या वर चालवण्याच्या अनेक स्टोरीज आंतरजालावर आहेत. बहुतेकवेळा कॅमेरा सैन्याच्या (बाजूने) समोरील आंदोलकांचे चित्रण करतो. या चित्राची दुसरी बाजूसुद्धा आहेच.
सैन्यावर व पोलिसांवर हल्ले होत असताना जगातील कोणतेही सैन्य हात बांधून स्वस्थ बसणार नाही. गोळीबारात जे लोक जखमी झाले आहेत ते स्वतःच्या चुकीमुळे जखमी झालेले आहेत. संचारबंदी सुरू असताना त्यांनी घरात बसणे अपेक्षित आहे. ते न करता मेलेल्या अतिरेक्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर येऊन सैन्यावर हल्ले करण्याची ही किंमत द्यावी लागत आहे. सैन्याच्या गोळ्या खायच्या नसतील तर संचारबंदी सुरू असताना घरात बसा किंवा रस्त्यावर आलात तर शांततेने निदर्शने करा. पोलिसांवर व सैनिकांवर हल्ले केलेत तर प्रत्त्युत्तर मिळणारच.
दहशतवादाचे पीक पेरण्यासाठी जमिनीची मशागत भारतीय सैन्यदले पाकिस्तानला फुकटात करून देतायत, असे चित्र आहे.
परत एकदा मूर्खपणा. पाकिस्तान हा सुरवातीपासून दहशतवादी निर्माण करणारा देश आहे. जगातल्या अनेक देशात, जिथे भारतीय सैन्याचा काहीही संबंध नाही, त्या देशात सुद्धा पाकिस्तानने दहशतवादी हल्ले केलेले आहेत. भारतात सुरू असलेल्या दहशतवादाचे खापर भारतीय सैन्यावर फोडणे हा पराकोटीचा मूर्खपणा आहे.
बाकी टवाळखोरांचे सगळे मटेरिअल साभार परत.
तुम्ही कोणाचेही मटेरिअल साभार परत करा. तो तुमचा प्रश्न आहे. पण अत्यंत बेताल व मूर्खपणाचे लेख लिहिणार्‍या तुमच्या सारख्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 24/07/2016 - 15:07
धन्यवाद! मूळ लेख वाचल्यावर निधर्मांधांची नेहमीचीच मतलबी आरडाओरड अशी समजूत करून दुर्लक्ष केले होते. परंतु लेखकाचा नंतर आलेला प्रतिसाद वाचल्यावर संताप आला आणि म्हणून प्रतिसाद दिला.

In reply to by श्रीगुरुजी

100 टक्के सहमत हा देश या देशावर प्रेम करणाऱ्या आणि देशाला आपले मानणाऱ्या सगळ्यांचा आहे मग तो कुठल्याही जात, धर्म, वय, पंथ, विचारधारेचा असो आणि त्याचे जर देशावर प्रेम नसेल, तर तो कुठल्याही जात धर्म पंथाचा असेल तरी तो देशद्रोही च आहे

In reply to by संदीप ताम्हनकर

भंकस बाबा 25/07/2016 - 13:10
तुम्ही अरुन्धती रॉयचा चश्मा वापरता काय? काश्मिरी पण्डिताचा उल्लेख टाळून लेख पाडलाय म्हणुन विचारले. काश्मिरी जनतेची फारच कीव आलेली दिसत आहे तुम्हाला, काय उद्योगधंदे आहेत हो यांचे. आज सेनेच्या नियंत्रणामुळे कश्मीर दिल्ली आणि पाकिस्तानमधे बफर स्टेट बनून राहिलय , नाहीतर आज जसे अफगनिस्तानात हल्ले होत आहेत ते पार जम्मू , पंजाब , दिल्ली पर्यन्त पोचले असते. आमचे राजनाथसिंग भले सर्टिफिकेट देत फिरतील की भारतीय मुस्लमान आईएससारख्या अतिरेकी संघटनेची कास नाही पकडणार, मग आता ही कनेक्शन निघत आहेत ती काय भारतीय गुप्तचर विभागाची कारस्थानं आहेत? काश्मीरबाबत तुर्तास इतकेच बोलू शकतो की 'नजर हटी तो दुर्घटना घटी' रच्याकने ते काश्मिर हिंसाचाराचे अगदी पब्लिकमधुन काढलेल्या क्लिप्स बघितल्या आहेत.

In reply to by संदीप ताम्हनकर

विनोद१८ 25/07/2016 - 14:24
... प्रत्यक्ष रस्त्यावर जे सैन्य असते ते एवढ्या बौद्धिक क्षमतेचे असते का ? असा प्रश्ण विचारुन तुम्ही आपल्याच देशाच्या सैन्याला कमी लेखताय व त्यांचा अपमान करताय याचे जरा भान ठेवा. भारतीय सैन्याचा इतिहास काय व कसा आहे याविषयीचा तुमचा अभ्यास शुन्य दिसतोय म्हणुन आपल्याला असलेल्या लिहिण्याच्या स्वातंत्र्याचा असा दुरुपयोग करताय. तुम्ही या दुव्यावर ( https://www.facebook.com/Presstitues/videos/1239597949407107/ ) जा म्हणजे तुमच्या प्रश्णांची उत्तरे तुम्हाला मिळतील. ह्या सैनिकाच्या प्रश्णावर उत्तर द्या किंवा स्वता गणवेश घालुन एक सैनिक म्हणुन एकदाच काश्मिरला जाउन या म्हणजे मग समजेल घरी बसुन मिपावर कळफलक बडवुन जिल्ब्या टाकणे व तिकडे काश्मिरात एक सैनिक म्हणुन रस्त्यावर ठामपणे उभे राहुन आन्दोलकांचे दगड खाणे यातला फरक. ... मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने, स्वताः गाडी चालवत बऱ्याच ठिकाणी फिरलोय, स्थानिकांशी अजूनही संपर्कात आहे. तसेच इतर अभ्यासाच्या आधारावर मूळ पोस्ट लिहिल्येय. म्हणजे काश्मीरचा प्रश्ण आपल्याला जितका समजला तितका तो इतर कुणालाच समजला नाही अस तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. 'मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने जाउन आलोय' म्हणजे तो केवळ मलाच समजला असा तुमचा समज झालेला दिसतोय. जे इतर तिकडे आपल्या गाड्या घेउन जात नाहीत त्यांना त्यातले काहीच कळत नाही, समजला तो केवल मला आणि मलाच असा तुमचा एकुण अभिनिवेश दिसतोय ह्या वाक्यातुन. आता भारत सरकारने काश्मिरचा तुमचे मार्गदर्शन घेउन सोडवावा असे तुम्हाला सुचवायचे आहे का ?? फक्त एकच सांगा ही जिलबी तुम्ही कोणत्या उद्देशाने / हेतुने इथे टाकलीत ?? ह्या लेखातुन तुम्हाला कोणाबद्दल नेमके काय सुचवायचे आहे ??

In reply to by संदीप ताम्हनकर

एवढा प्रचंड काळ कोणत्याही प्रदेशात 'आस्फा'सारखे कायदे लागू असणं अमानुष आणि असं‌वेदनशील वाटतं. हा तुमचा मुद्दा आधीच पटलेला आहे, पण लेख आवडला असं म्हणवत नाही; मतं काय हे नीट न समजल्यामुळे मतांशी सहमती असंही म्हणवत नाही. अशासारख्या लेखनात जर उग्र भाषा वापरायची असेल तर त्यात विनोदी तिरकस-खवचटपणा असावा किंवा सरळ, साध्या भाषेत लिहावं. इतरांची उद्धृतं देताना तसा स्पष्ट उल्लेख हवा. अन्यथा अजित डोवालांना जेम्स बाँड म्हणण्याबद्दल जसे गैरसमज झालेले आहेत तसे होतात. पुलेशु

अन हो, एक राहिलेले म्हणजे, एखादा मनुष्य आर्मीची बाजू घेतोय म्हणजे तो संघिष्ट असला पाहिजे असा तुमचा ग्रह असल्यास तो तात्काळ डोक्यातून काढून टाकावा आपण, ही नम्र विनंती, आर्मी कोणाचीच नसते पण सगळ्यांसाठी असते, जमल्यास एखादी चक्कर एखाद्या बटालियनच्या एमएमजी स्थल उर्फ मंदिर मस्जिद गुरुद्वारा स्थलला नक्की द्या!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सैन्य कोणाचंही (राजकीय विचारधारेचं) नसतं, नसावं हे मान्यच. तसे सावरकर, भगतसिंग, सरदार पटेल हे लोकही संघाचे नव्हते, पण मरणोपरान्त त्यांचं संघीकरण झालेलं आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टीही संघ (आणि संघाच्या भावंडांनी) पळवायला आणि त्यावर जणू आपलाच अधिकार आहे असं म्हणायला सुरुवात केलेली आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

संदीप डांगे 25/07/2016 - 21:51
जसं की...?? म्हणजे सरदार पटेल, भगतसिंग, सावरकर हे संघाचेच झाले हे केव्हापासून मानायला लागलात आपण? तसेच राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टी संघाने कुठून पळवल्या तेही सांगावे. काँग्रेसने गांधीघराण्याचा उदो उदो करण्यापासून थोडी सवड काढली असती तर उपरोल्लिखित किमान दोन महापुरुषांना असं ह्याचं त्याचं झाले म्हणायची सोय राहिली असती का? किमानपक्षी भारतीय जनता ह्यावेळी असे काही मानते का? डाव्यांचे राष्ट्रप्रेम जगजाहिर आहे. डाव्यांकडून राष्ट्रवाद पळवला असे म्हणायचे असेल तर तो त्यांच्याकडे केव्हा होता हे ही कळावे? मी बालक अज्ञानी आहे, माझी समज-आकलन अर्थातच तुमच्या सारख्या दिग्गजांपेक्षा फारच कमी आहे. त्यास्तव तुमच्या विधानांचे स्पष्टीकरण मागण्याची जुर्रत करत आहे. उत्तरे मिळतील अशी अपेक्षा करतो. कारण तमाम भारतीयांचे आदराचे, श्रद्धेचे, राष्ट्राभिमानाचे प्रतिक जर 'ह्याचे झाले त्याचे झाले' असे आपण बोलत असाल तर मजसारख्या सामान्य भारतीयाचे मन विचलित होते. ते होऊ नये, बुद्धीभेदाचे डावपेच दोन्ही बाजूंकडून अजिबात सफल होऊ नयेत असे मजसारख्याला वाटते, तस्मात हा प्रतिसादप्रपंच...

In reply to by संदीप डांगे

मी बालक अज्ञानी आहे, माझी समज-आकलन अर्थातच तुमच्या सारख्या दिग्गजांपेक्षा फारच कमी आहे.
अय्या, मी पण हेच लिहायला आले होते! असो. १. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टी संघाने कुठून तरी पळवल्या => म्हणजे त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, २. काँग्रेसने सरदार पटेल, भगतसिंग, सावरकर ह्यांच्यापैकी कोणीतरी दोन लोकांची व्यक्तीपूजा करायला हवी होती ३. संघिष्ठ नाहीत म्हणजे डावेच असं काही तुम्ही समजता असं मला समजलं. असं समजत नसाल तर माझ्या आकलनातली चूक. मी आळशी बाई आहे आणि रिअॅक्शनरी लिहिण्याचा हल्ली खूप कंटाळा येतो. तुमचे विचार समजले. उत्तराबद्दल आभार.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

संदीप डांगे 26/07/2016 - 18:32
मला काय समजलं नाय समजलं किंवा तुम्ही आळशी आहात किंवा तुम्हाला कंटाळा येतो हा विषय तुर्तास बाजूला असू देत. निम्नलिखित आपलीच विधाने आहेत. सावरकर, भगतसिंग, सरदार पटेल हे लोकही संघाचे नव्हते, पण मरणोपरान्त त्यांचं संघीकरण झालेलं आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टीही संघ (आणि संघाच्या भावंडांनी) पळवायला आणि त्यावर जणू आपलाच अधिकार आहे असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. हे आपण कोणत्या आधारावर, संदर्भासहित लिहिले आहे तेवढं फक्त विचारलंय मी. तुमच्यासारख्या दिग्गजांनी असले विचार ठेवले म्हणजे नक्की काहीतरी आधार असेलच अशी मज भाबड्या पामराची समजूत होती. अन्यथा तत्सम पिंका टाकायला दोन रुपयाचा मावाही खायला लागत नाही असे निरिक्षण आहे. बाकी 'संघिष्ठ नाहीत म्हणजे डावेच' असलं काहीही मी तरी म्हटलेलं नाही. तसं असतं तर तुमच्या प्रतिसादाला फाट्यावर मारुन पुढे गेलो असतो. पण डावेही नाही किंवा संघिष्ठही नाही म्हणून काहीही लिहायचे व त्यावर कोणी स्पष्टीकरण मागितले तर आळसाचे किंवा कंटाळ्याचे सोयिस्कर पळपुटेपणाचे कारण द्यायचे हे काही पटलं नाही, बघा आता कसं ते..?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यातील खरी गंमत ही आहे - सैन्य कुठल्याही विचारधारेच नसाव असे तुम्ही म्हणता पण त्याच वेळी सैनिकांना मतदानाचा हक्क असतो हे विसरता. सैनिक शेवटी माणूसच असतो आणि त्यालाही राजकीय विचारधारा असते. हे खरे मानले तर सैन्य कोणत्याही विचारधारेचे नसते असे म्हणणे जरा धाडसाचे होईल. हां सध्या बर्‍यापैकी समतोल आहे असे म्हणता येईल पण तो तसाच राहील असे मानणे भाबडेपणा होईल.... :-) राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम या भावना कोणीही भारतीयांनी पळवाव्यात व त्यावर अधिकार सांगावा या मताचा मी आहे.... :-)

@आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? ››› लेखक महोदय, आपणास अकाली दीर्घजीवी मती-मंदत्व प्राप्त झालेले आहे... असा निर्वाळा देऊन , मी माझे वाक्य संपवितो.

डँबिस००७ 23/07/2016 - 22:12
काश्मिरात पाक पुरस्कृत अशांतता आणि दहशतवाद आहे यात कोणाचेच दुमत नाही. प्रश्न कसे हाताळावे हा मुद्दा आहे. अरे मग ६० वर्ष काय करत होते, सरकार आणी लोक ? जम्मु आणी कश्मिर सरकारच्या जोरावर ३ लाख काश्मिरी पंडीतांना काश्मिर मधुन रातोरात हाकलले गेले , कित्येक पंडित त्यांच्या बायकांना आपला जीव हकनाक गमवावा लागला, कित्येक बायकांना शिकार केले गेले त्यावेळेला केंद्र सरकारने हा प्रश्न कसा काय हाताळला ? त्यावेळेला सैन्य नव्हत ? का हिंदु पंडीत मरताहेत मग मरु दे, म्हणुन काँग्रेस सरकारला काहीच करावस वाटल नाही ?

In reply to by डँबिस००७

प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे/राहणे हा आहे की, काश्मिरी पंडित?? काश्मिरी पंडित ह्या मुद्द्यावर आमचे मत आमचे अत्यंत लाडके नेतृत्व अन इलिनॉइस राज्यातले धडाडीचे लोकाभिमुख नेते, स्प्रिंगफिल्ड खुर्दचे अब्राहमदादा लिंकन म्हणत असत तसे आहे "सगळे गुलाम मुक्त करून, सगळे गुलाम गुलाम ठेऊन, गुलामगिरी नष्ट करून, अबाधित ठेऊन, काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" ह्यात गुलाम शब्द काढून पंडित, सुन्नी, मुसलमान, दलित, ब्राह्मण, शीख, तामिळ काय वाटेल ते भरा! For, the union must persist :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाप्पूसाहेब! या प्रतिसादाची प्रिन्टऔट काढून रोज नजरेपुढे राहावी अशी व्यवस्था करावी म्हणतो. बाकी, तुमच्या संतुलित प्रतिसादासाठी तुम्हाला एक काहवा, एक पटियाला लस्सी, एक बैदा पाऊच, एक प्लेट फरसाण, एक प्लेट सोँदेश,एक म्हैसूर डोसा, एक बिसिबेल्ली भात अन एक चेट्टीनाड चिकन!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पुंबा 26/07/2016 - 14:22
बापू, तुमचे सारे प्रतिसाद संतुलीत आणि अत्यंत प्रगल्भ आहेत. त्यांच्यामुळे अनेक प्रश्नांचा सांगोपांग विचार करता आला. धन्यवाद. प्रस्तुत धागालेखकाने सांगितलेली पुण्याची घटना ठाऊक नाही परंतू अशाच प्रकारची घटना नाशीकला घडली होती. तिथे अ‍ॅकॅडमीत शिकणार्या आर्मी कॅडेटसच्या १००-१५० जनांच्या टोळक्याने सबंध पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केली होती त्यात बरेच पोलीस जखमीदेखील झाले होते आणि त्यंच्यावर कसलीही कारवाई झाल्याचे नंतर वाचले नाही(झालेली असू शकते, ठऊक नाही.). मला असे विचारायचे आहे की अश्या घटना घडल्यानंतर या विद्यार्थ्यांवर काही कारवाई होऊ शकते का? किंवा पोलीसांवर हात उचलला असे चार्जेस लावून खटला चालवला जातो का? सैन्यात जाण्याच्या आधीच विद्यार्थी ईतक्या मुजोरपणे कायद्याला न जुमानता मनमानी करु शकतात हे सैन्याचे(किंवा एकूनच आपल्या समाजाचे आणि कायद्यांचे) अपयश वाटते मला. इथे काश्मीरबद्दल आजीबातच भाष्य करायचे नाही तिथे अफस्पा सारख्या कायद्यांची गरज आहेच.

प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे/राहणे हा आहे की, काश्मिरी पंडित?? काश्मिरी पंडित ह्या मुद्द्यावर आमचे मत आमचे अत्यंत लाडके नेतृत्व अन इलिनॉइस राज्यातले धडाडीचे लोकाभिमुख नेते, स्प्रिंगफिल्ड खुर्दचे अब्राहमदादा लिंकन म्हणत असत तसे आहे "सगळे गुलाम मुक्त करून, सगळे गुलाम गुलाम ठेऊन, गुलामगिरी नष्ट करून, अबाधित ठेऊन, काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" ह्यात गुलाम शब्द काढून पंडित, सुन्नी, मुसलमान, दलित, ब्राह्मण, शीख, तामिळ काय वाटेल ते भरा! For, the union must persist :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

विटेकर 25/07/2016 - 12:42
टाळ्या आणि वंदन सुद्धा ! परवा श्री अजित डोवल पुण्यात बोलाताना नेमेके हेच म्हणाले. राष्ट्र हे पिढ्या- पिढ्यांचे असते , सरकार येते आणि जाते देखील !

सुधीर काळे 23/07/2016 - 23:08
असले लेख लिहायला आपल्याला आपल्या भारतदेशात मुभा आहे हीच आपल्या राष्ट्राच्या राज्यघटनेची थोरवी आहे असे मी समजतो. आपल्या सरकारबद्दल, सैन्याबद्दल जर कांहीं चांगले लिहिता येत नसेल वा लिहायचे नसेल तर गप्प बसावे, विरोधात लिहून आणखी आग भडकवू नये! आपल्याला भाषण व लेखनस्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेने दिले आहे ते वापरावे. फलिहिलेलीमी नुकतीच लिहिलेली माझी पोस्ट वाचावी हीच नम्र विनंती. तो लेख बराच लांब आहे व इंग्रजीमध्ये आहे म्हणून इथे पूर्ण देत नाहीं. पण तो वाचावा अशी मी ताम्हनकर-जींना विनंती करतो.

सुधीर काळे 23/07/2016 - 23:14
असले लेख लिहायला आपल्याला आपल्या भारतदेशात मुभा आहे हीच आपल्या राष्ट्राच्या राज्यघटनेची थोरवी आहे असे मी समजतो. आपल्या सरकारबद्दल, सैन्याबद्दल जर कांहीं चांगले लिहिता येत नसेल वा लिहायचे नसेल तर गप्प बसावे, विरोधात लिहून आणखी आग भडकवू नये व आपल्या सेनादलाच्या मनोधैर्यावर घाव घालू नयेत! आपल्याला भाषणस्वातंत्र्य व लेखनस्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेने दिले आहे ते जरूर वापरावे पण गैरवापर करू नये. फेसबुकवर मी नुकतीच लिहिलेली माझी पोस्ट वाचावी हीच नम्र विनंती. ही पोस्ट बरीच लांब आहे व इंग्रजीमध्ये आहे म्हणून इथे पूर्ण देत नाहीं. पण ती वाचावी अशी मी ताम्हनकर-जींना विनंती करतो.

In reply to by सुधीर काळे

ती घटना, हिंदुराष्ट्र म्हणून नाही तर

सोवरीन सोसिअलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इंडिया

म्हणून लिहिली गेली आहे, आता ह्या वर उल्लेखलेल्या भारताच्या अधिकारीक नावातील बहुतेक शब्द आपणाला खटकत असतील तर तो आपला प्रश्न आहे, त्याला उत्तर म्हणून प्राचीन शिल्पकलेचे अविष्कार असणारी मंदिरे आपण पेढे अन ऑइल पेंट फासून विकृत करतो तसे घटनेवर अमुक एक रंग मारून विकृत करणे मी वैयक्तिकरित्या निषेधार्ह मानतो :)

पिनाक 24/07/2016 - 01:10
ताम्हनकर, 1. सैन्याला विशेषाधिकार दिल्यानं ते त्याचा अतिरेक करत असतील तरी सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. 2. काश्मीर ची जमीन आमचं सरकार कधीही सोडणार नाही. त्यासाठी कितीही काश्मिरी मुसलमानांना ठार मरावं लागलं तरी ते केलं जाईल. 3. सैन्य विरुद्ध बोलणाऱ्या इथल्या अस्तनीच्या निखाऱयांना एक तर एन्काउंटर करून संपवलं जाईल किंवा अगदीच शक्य नसेल तर "आत" घातलं जाईल. 4. सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल त्याची अर्थातच आम्हाला काही पर्वा नाहीये. 5. "अपरिपकव", "हास्यास्पद" वगैरे काहीही बोललं तरी जमिनीवरची परिस्थिती बदलत नाही. सरकार, सैन्य आणि भारताची जनता अचानक केलेल्या या कटानं गोंधळून गेली होती. पण आता सरकार सावरलं आहे, सैन्यानं पुन्हा परिस्थिती चा ताबा घेतला आहे आणि भारताची जनता भक्कम पणे सरकारच्या पाठीशी उभी आहे. आता काश्मिरी मुसलमानांचा बदला घेतला जाईल आणि जाईलच. आता दहशत वादयांच्या नावे बांग दे किंवा सैन्याच्या नावानं शिमगा कर पण त्या पेलेट्स मध्ये जे जखमी झालेत त्यांना सैन्य शोधेल आणि मग ठोकेल.

In reply to by पिनाक

ओ साहेब, उगाच कट्टरपणा इज द न्यू कुल सिद्ध करायला काय वाटेल ते बोलू नका हो, आपण आर्मी सारख्या एका इंस्टिट्यूशन वर शिंतोडे उडवत आहात ह्याचे भान असू द्या, अन काय मुसलमानांचा बदला वगैरे लावले आहे मालक? आपली विकृती सैन्याच्या आडून आडून नका प्रदर्शित करू, उगाच काहीही लिहू नका ही विनंती

In reply to by पिनाक

ताम्हनकर साहेब, आपला प्रतिसाद "भारतिय सैन्याला पाठिंबा देणे किंवा त्याच्या उत्तम कामाची भलावण करणे" हे तर करत नाहीच पण; सैन्याने काय करावे याबाबत लेखकाचा अतिरेकी अजेंडा सैन्याच्या नावावर खपवून "शिस्तबद्ध आणि संयमित भारतिय सैन्याच्या किर्तीला डाग लावण्याचा विनोदी प्रयत्न" करणारा आहे. हे जर तुमचे खरोखरचे मत असेल तर... आपण या विषयावरचा आपला अभ्यास वाढवणे खूsssप जरूरीचे आहे !

In reply to by पिनाक

शाम भागवत 24/07/2016 - 14:39
नेहरूंनी शेख अब्दुलांना गजाआड ठेवले होते तोपर्यंतच काश्मिरमधे शांतता नांदत होती. इंदिरा गांधीनी त्यांना मुक्त केले नसते तर आजही तिथे शांतता नांदत राहिली असती. काश्मिर पंडीतांची समस्या उभीच राहीली नसती. जिथे खूप सावध राहायला पाहिजे तिथेच नेमका विश्वास ठेऊन गाफील रहावयाची (पृथ्विराज चौहानापासून लागलेली) भारतीयांची खोड कधी जाणार आहे कोणास ठाऊक.

साती 24/07/2016 - 11:13
तुम्हाला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत्येय. दोन्ही बाजूंच्या अतिशयोक्त दावे आणि विधानांचा आपण अत्यंत संयमाने समाचार घेत आहात. हे पाहून तुमच्याविषयी असलेला आदर दुणावला आहे. तुमचे अनेकानेक आभार!

In reply to by साती

राही 24/07/2016 - 14:00
खरोखर. सोन्याबापू नेहमीच अतिरेक टाळून वस्तुस्थितीनिदर्शक विधानं करीत असतात. आणि वस्तुस्थिती त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या तर्‍हेने इथे दुसरं कोण जाणणार?

तिमा 24/07/2016 - 14:40
खरे वास्तव हे आहे की, जनमतचाचणी घेतली तर काश्मीर दुसर्‍या दिवशी स्वतंत्र होईल आणि तिसरा दिवस उगवायच्या आंत, कायमचे पाकिस्तानच्या ताब्यात जाईल. शिवाय दहशतवाद थांबणार नाहीच तो अन्य भारताच्या आणखी जवळ येईल.

In reply to by तिमा

श्रीगुरुजी 24/07/2016 - 15:42
हे खरे नाही. जम्मू-काश्मिरने भारतातच रहायचे का पाकिस्तानात जायचे का स्वतंत्र देश म्हणून रहायचे या तीनपैकी एकाही पर्यायाला स्थानिक जनतेचा पुरेसा निर्णायक पाठिंबा नाही असे २०१३ साली चॅथम हाऊस या इंग्लंडमधील प्रसिद्ध संस्थेने केलेल्या एका जनमत चाचणीत दिसून आले आहे. या सर्व तीन पर्यायांना ५०% पेक्षा कमी जनतेने पाठिंबा दिलेला आहे. यापैकी कोणत्याच पर्यायाला ५०% किंवा अधिक मते मिळू शकलेली नाहीत. तसेच यावरील जनमत वेगवेगळ्या विभागानुसार वेगळे होते हेही दिसून आले आहे. काश्मिरमध्ये जनमत घेऊन निर्णय घेणे हे जवळपास अशक्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९४८ च्या ठरावानुसार भारतीय काश्मिर व पाकव्याप्त काश्मिर अशा दोन्ही भागातून दोन्ही देशांनी सैन्य काढून घेणे ही सार्वमताची पूर्वअट आहे. दोन्ही देश ही अट पाळणे अशक्य आहे. त्यामुळे सार्वमत घेता येणार नाही. हा ठराव १९४८ चा होता. त्यानंतर ६८ वर्षे उलटून गेली आहेत. त्यावेळची परिस्थिती आता पूर्ण बदलली आहे. त्यामुळे १९४८ चा ठराव आता जसाच्या तसा अंमलात आणणे अशक्य आहे. यासाठीच काही वर्षांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाने हा ठराव बॅकबर्नरवर टाकलेला आहे. काश्मिर मध्ये श्रीनगर खोरे, जम्मू व लडाख हे तीन वेगवेगळे भाग आहेत. श्रीनगरमध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. जम्मूमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत व लडाखमध्ये बौद्ध मोठ्या प्रमाणात आहेत. फुटिरतावादाला पाठिंबा मुख्यत्वेकरून श्रीनगरच्या खोर्‍यातून मिळतो. जम्मू व लडाखमध्ये फुटिरतावादाला कमी पाठिंबा आहे. जनमत घेतल्यास जम्मू व लडाख भारतात राहण्याच्या बाजूने कौल देतील तर श्रीनगरमधील जनमत तीन पर्यार्यांमध्ये विभागलेले असेल. संपूर्ण काश्मिरचा एकत्रित विचार करता येणार नाही. त्यामुळे जनमत घेऊनही फायदा नाही. भारत कधीही काश्मिरचा ताबा सोडणार नाही. काश्मिरमध्ये अनेक महत्त्वाची शिखरे आहेत. त्यांच्यावर पाकिस्तानला ताबा मिळाला तर पाकिस्तानी सैन्याला अ‍ॅडव्हांटेज मिळून उर्वरीत भारताची सुरक्षा धोक्यात येईल. त्यामुळे भारत कधीही काश्मिर हातचे जाऊन देणार नाही. काश्मिरला स्वतंत्र देश होऊन देण्यास पाकिस्तानचा जोरदार विरोध असेल. पाकिस्तानला काश्मिर स्वतःच्या देशात हवे आहे. पाकिस्तान काश्मिरला स्वतंत्र राहू देणार नाही. समजा काश्मिर एक स्वतंत्र देश झाला तर पाकिस्तान व चीन एकत्र येऊन ते काश्मिर ताब्यात घेतील कारण दोन्ही देशांच्या सैन्याच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे. समजा काश्मिर प्रश्न पाकिस्तानला हवा तसा सुटला तरीसुद्धा पाकिस्तान गप्प राहणार नाही. त्यानंतर पाकिस्तान पंजाब सारख्या इतर राज्यांकडे वळेल व तिथे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होईल. पाकिस्तानला काश्मिरींविषयी काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त भारताला त्रास द्यायचा आहे. सध्या त्यासाठी काश्मिर हे एक निमित्त आहे. हे निमित्त संपले तर ते दुसरे निमित्त शोधतील. वरील चाचणीतील काही परिच्छेद - The first-ever survey on both sides of Kashmir by Robert W Bradnock, a senior fellow at Chatham House, UK's most influential think-tank, has shown that only two percent of people in Jammu and Kashmir want to join Pakistan while 43 percent prefer independence. The survey 'Kashmir: Paths to Peace' has been sponsored by Libyan president Muammar Gaddafi's son, Dr Saiful Islam. It found preference for independence was fairly uniform across districts in PaK but it was uneven in J&K. In Kashmir valley division it was between 75 to 95 percent; none in Poonch, Rajauri, Udhampur and Kathua of Jammu division and in Jammu itself it was just one percent. In Ladakh division, it was 30 percent in Leh and 20 percent in Kargil”. “This poll, in common with two preceding polls in J&K shows that setting aside all other political obstacles, it is difficult to see how plebiscite proposed in UN resolutions of 1948/49 could play any part today in the resolution of the dispute. There is no clear majority in the prospect for independence either. In J&K there is a majority in favour of outright independence for entire Kashmir in only four districts, all in Kashmir valley division and in five other districts the support for independence is one percent or less”, reports the survey. http://www.milligazette.com/news/7376-survey-shows-preferences-across-kashmir

In reply to by श्रीगुरुजी

पुनश्च एकदा गुर्जींबर सहमती, आज गुर्जी पेटले आहेत! संदर्भ म्हणून चक्क 'मिल्लीगॅझेट'ची लिंक उचलून आणलीन!! =))

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अभ्या.. 24/07/2016 - 19:05
श्रीगुरुजींच्या सर्व मुद्याना सहमती. देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आपली सेना जे कर्तव्य बजावत आहे ते अतुलनीय आहे. काही छुटपूत घटनांचा उल्लेख करून बुद्धदीभेद करण्याचा मार्ग अश्लाघ्य असाच आहे

श्रीगुरुजी 24/07/2016 - 15:03
आता मूळ लेखाबद्दल -
काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते.
अत्यंत मूर्खासारखे विचार! कोण आहेत हे उथळ राष्ट्रवादी आणि त्यांना चेव चढला आहे म्हणजे नकी काय होतंय? काश्मिरमधल्या फुटिरतावाद्यांना पाकिस्तानचा उघड पाठिंबा आहे ही वस्तुस्थिती आहे आणि पाकिस्तानने अनेकवेळा याची जाहीर कबुली दिली आहे. हे काही या तथाकथित अतिराष्ट्रवाद्यांचे स्वत:चे मत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तिथे असलेले सैन्य काश्मिरच्या रक्षणासाठी व पर्यायाने उर्वरीत भारताच्या रक्षणासाठी आहे हे कळतंय का? काश्मिरसाठी पाकिस्तानने ४ वेळा युद्ध केले व अजूनही काश्मिर बळकावण्याचे प्रयत्न सुरू आहेतच. त्यामुळे तिथे सैन्य असणारच. आणि जेएनयू सारख्या संस्थातील देशद्रोह्यांना सरळ करण्यासाठी सैन्याची अजिबात गरज नाही व नव्हती. या देशातील न्यायालये त्यासाठी पुरेशी सक्षम आहेत. कन्हैयाकुमार २० दिवस तुरूंगार राहून आल्यावर लगेच टोन बदलून अफझल गुरूची आरती ओवाळण्याऐवजी दलित, मोदी इ. विषयांवर बरळायला लागला हे लक्षात आलं असेलच.
हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता.
म्हणजे खरा राग मोदी समर्थकांवर दिसतोय. मोदी लोकशाही मार्गाने निवडून येऊन बहुमत मिळवून पंतप्रधान झाले हे अजूनही अनेकांना मान्य होत नाहीय्ये.
पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की.
नेहरूंनी काश्मिरप्रश्नाचा कायमस्वरूपी विचका केला हे १९४८ पासून लिहिले जात आहे. ती वस्तुस्थिती आहे. त्यात काहीही असत्य नाही. हे आताच लिहिले गेलेले नवीन लेखन नाही.
ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा.
सैन्याला हा अधिकार फक्त काश्मिर, मणीपूर इ. मोजक्याच ठिकाणी का दिला गेला याची कल्पना आहे का? जेव्हा अतिरेकी निष्पापांची हत्या करायला लागतात, सर्वसामान्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी सैन्याला पाचारण करावेच लागते. मुळात मी काही चुकीचे करीत नसेन, अतिरेक्यांना मदत करीत नसेन तर कशाला सैनिक मला अटक करतील? मी जर काही संशयास्पद कृत्ये करीत असेन, अतिरेक्यांना मदत करीत असेन हे दिसून आले तरच माझ्यामागे सैनिकांचा ससेमिरा लागेल.
पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल.
३१ जानेवारी २०१२ पूर्वी व त्यानंतर असे किती प्रकार झाले? जरा माहिती देता का? इतक्या वर्षात हा एकच अपवादात्मक प्रकार काही मोजक्या सैनिकांना केला असेल तर या एका प्रकारावरून संपूर्ण सैन्याला कायमस्वरूपी दोषी ठरवायचे?
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
सैन्य धुमाकूळ घालत असेल? असे लिहायला जनाची नसली तरी निदान मनाची तरी लाज वाटायला हवी. सैन्याच्या जीवावरच आज आपण सर्वजण सुरक्षित आहोत. सैन्य नसते तर एका बाजूने चीनने व दुसर्‍या बाजूने पाकिस्तानने देशाचे लचके तोडले असते. कॅप्टन सौरभ कालिया व त्यांच्या ५ सहकार्‍यांना पाकड्यांनी किती हालहाल करून मारले हे माहिती आहे का? ३ वर्षांपूर्वी २ भारतीय सैनिकांना पकडून त्यांची मुंडकी कापलेली आठवतात का? रोज होणार्‍या गोळीबारात अनेक सैनिक प्राणांचे मोल देतात याची जाणीव आहे का? का उचलली जीभ आणि लावली टाळ्याला?

झेन 24/07/2016 - 18:57
- कलम ३७० असताना, पलिकडे पाकिस्तान असताना काश्मीरी लोक सर्वार्थाने भारताला आपला देश मानतिल का? - पाकव्याप्त काश्मीरमधे आपल्या ३७० सारखे काही स्वतंत्र अधिकार देणारे काही आहे का ? जर तिथे काही नसेल तर इथे हे लाड का आणि कधिपर्यंत ? - जर भारत सरकारच्याअधिक्रूत भूमिकेनुसार सार्वमत हा मुद्दा जर टाईमबार/आऊटडेटेड झाला असेल तर अजून कलम ३७० हा मुद्दा अजून जिवंत का ? - जोपर्यंत संपूर्ण भारतीयांना समान न्याय/ अधिकार नसेल तोपर्यंत टीआरपी ची आवश्यकता असणारा मिडीया आणि "विद्वान" हे भारतीय लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्याचा दूरूपयोग करणारच.

संदीप डांगे 24/07/2016 - 19:18
Mi kaay mhanato, udavatayat na bhangar lekh. Ase lekh shuddh deshdroh aahe. Sanghavarach sandhan sadhayche tar armyla kale kaun dakhavane nalayakpana aahe. Asha nalayak lekhanchi ithech Kay bharatat kuthehi garaj nahi. Please remove this thread. Sanghavarach raag kadhaycha asel tar special lekh lihana Tamhankar...

In reply to by संदीप डांगे

गॅरी ट्रुमन 24/07/2016 - 23:28
संदीपराव, एक विनंती करतो. हे असे मिंग्लिशमध्ये लिहिणे शक्य झाले तर टाळा. मिपा हे मराठी संकेतस्थळ असल्यामुळे बरेचसे मराठीत देवनागरी लिपीमध्ये लिहिणे ओघाने आलेच.बहुतांश सदस्य तसे करतातही. पण हे मिंग्लिश म्हणजे जेवताना घासाघासाला खडा आल्याप्रमाणे वाटते. गेल्या काही दिवसात बऱ्याच प्रतिसादांमध्ये असे मिंग्लिश तुम्ही वापरले आहे म्हणून हे लिहित आहे.

अमितदादा 25/07/2016 - 00:37
लेख जरा एकांगी वाटला. लेखकाशी अंशतः सहमत. काश्मीर भारतामध्ये राखण्यास तसेच तेथील दहशदवाद मोडून काढण्यात भारतीय आर्मी चा मोलाचा वाटा आहे यात शंकाच नाही. भारतीय जवानांच्या बलिदानामुळे काश्मीर अजून भारतात आहे याचे कायम भान राहील, मात्र भारतीय जवानांच्या कडून या 3 दशकात नक्कीच काही चुका घडल्या आहेत याचे भान राखाय हवे. काश्मीर हा प्रश्न हा फक्त मिलिटरी सोडवू शकणार नाही तर बरोबर पोलिटिकल अँप्रोच सुद्धा जरुरी आहे. जर भारत सरकार नागा बंडखोर, उल्फा बंडखोर यांचाबर संवाद साधत असेल तर काश्मीर फुटीरवाद्याबर बोलण्यात कसला आलाय कमीपणा हे कळत नाही. जर काश्मीर प्रश्न लवकर सुटला नाही तर खालील भीती वाटते 1. आतापर्यंत भारतीय मुस्लिम हे भारतीय सरकार च्या भूमिकेबद्दल कायम बरोबरीनं राहिलेत.भारतीय मुस्लिम प्रश्न आणि काश्मीर मुस्लिम प्रश्न नेहमी वेगळे राहिले आहेत.जर दोनी ठिकाणच्या radical लोकांची युती जाली तर दाहशवाद हा वानव्यासारखा भारतभर पसरेल. 2. पोलिटिकल इंडिसिव्हनेस ला कंटाळून जर PDP ने राजीनामा दिला तर भारताची काश्मीर वरील moral grip कमी होईल. आता सध्या कश्मीर मध्ये फक्त political पार्टी आणि पोलीस भारतीय सरकार चा भूमिकेशी प्रामाणिक आहेत, बाकी सर्वसामान्य जनता विरोधी आहे. टीप : google translate वापर्यामुळे भाषेत काही चुका राहतील. हि माझी भूमिका आहे एक्स्पर्ट ओपिनियन नव्हे.

In reply to by अमितदादा

आनन्दा 25/07/2016 - 11:56
माझ्यामते फुटीरतावाद्यांशी बोलायला भारताने नकार दिला असे नसावे. पण चर्चेत पाकिस्तानला सहभागी करून घेण्यास मात्र भारताचा कायमच नकार आहे, आणि तो योग्य देखील आहे.

In reply to by आनन्दा

अमितदादा 25/07/2016 - 14:43
माझ्यामते फुटीरवादी च काय पण पाकिस्तान शी सुधा चर्चा केली पाहिजे. एकवेळ फुटीरवादी राहूदे पण पाकिस्तान ची चर्चा केलीच पाहिजे, कारण आपला तोटा झाला तरी चालेल पण भारतच पण नुकसान झाल पाहिजे हि पाकिस्तान ची भूमिका आहे, तशी भूमिका भारत ठेवू शकत नाही कारण आपला मार्ग वेगळा आहे. म्हणून मला वाटते कि पाकिस्तान शी पण वेळ येयील त्यावेळी चर्चा करा, वेळ येयील त्यवेळी चार फटके द्या, पण ताठर आणि एगोइस्तिक भूमिका घेवू नका.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 25/07/2016 - 16:33
या चर्चेतून काय निष्पन्न होणार आहे? फुटिरतावाद्यांच्या व काश्मिरातील इतर काही जणांच्या मागण्या बघू या. १) काही जणांना संपूर्ण काश्मिर पाकिस्तानात विलीन करायचे आहे. भारत ही मागणी कधीही मान्य करणार नाही. तसेच जम्मू व लडाखमधील बहुतेकांना हे मान्य नाही. याबाबतीत भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही. २) काही जणांना काश्मिर हा स्वतंत्र देश म्हणून हवा आहे. भारत ही मागणी कधीही मान्य करणार नाही. तसेच जम्मू व लडाखमधील बहुतेकांना हे मान्य नाही. याबाबतीत भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. काश्मिर स्वतंत्र देश होणे पाकिस्तानलाही मान्य नाही. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही. ३) काश्मिरला १९५३ पूर्वी जितकी स्वायत्तता होती तितकीच स्वायत्तता आता मिळावी अशी काही जणांची मागणी आहे. त्यामध्ये संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे इ. ३-४ गोष्टी वगळता उर्वरीत सर्व अधिकार राज्याकडे असावेत अशी मागणी आहे. मुळात काश्मिरला आता जितके अधिकार आहेत तेच धोकादायक आहेत. त्यात अजून भर टाकली तर परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्त बिघडेल. त्यामुळे उर्वरीत भारताला अजून धोका निर्माण होईल. १९९९-२००४ या काळात नॅकॉ रालोआचा भाग होता. सन २००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी काश्मिरला १९५३ पूर्वीची स्वायत्तता मिळावी असा ठराव विधानसभेत बहुमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविल्यावर वाजपेयींनी त्यातील धोके ओळखून तो लगेच फेटाळून लावला. नंतरच्या संपुआ सरकारने सुद्धा या मागणीकडे दुर्लक्ष केले. केंद्रात कोणतेही सरकार असले तरी ही मागणी मान्य होणार नाही. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही. ४) काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे अशी काही जणांची मागणी आहे. याबाबतीत सुद्धा भारताची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही. ५) काश्मिरमधील बेरोजगारी कमी व्हावी, उद्योगधंदे वाढावेत, गुंतवणूक वाढावी अशी बर्‍याच जणांची मागणी आहे. काश्मिरला लागू केलेले ३७० वे कलम हाच यातील मुख्य अडथळा आहे. या कलमामुळे काश्मिरमधील कोणालाही तिथे जमीन, घर विकत घेता येत नाही, तिथे स्थायिक होता येत नाही. त्यामुळे कोणताही उद्योगपती तिथे जाऊन उद्योग, कारखाने सुरु करू शकत नाही. तिथला मुख्य उद्योग पर्यटन हाच आहे. परंतु अशांत वातावरणामुळे पर्यटनावर परीणाम झालेला आहे. तिथली बेरोजगारी कमी करणे हे काश्मिरीच्याच हातात आहे. अतिरेक्यांना पाठिंबा देणे थांबविले, स्वतंत्रे देशाची किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची किंवा स्वायत्ततेची मागणी थांबविली, स्वत: शांततेने राहून इतरांना शांततेने राहून दिले आणि ३७० वे कलम रद्द केले तर तिथे समृद्धी नक्कीच येईल. ६) काश्मिरमधून सैन्य हटवावे व अ‍ॅफ्प्सा हटवावा अशी बर्‍याच जणांची मागणी आहे. काश्मिर पाकिस्तानला लागून असल्याने तिथून सैन्य हटविणे शक्य नाही. तिथे अतिरेकी धुमाकूळ घालत असल्याने व त्यांनी काही स्थानिक पाठिंबा देत असल्याने सैन्याला विशेषाधिकार देणे आवश्यक आहे. याबाबतीत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट असल्याने या मुद्द्यावर चर्चा होऊ शकत नाही. म्हणजे जर काश्मिरींशी चर्चा करायची तर जवळपास सर्व मुद्द्यांवर ठाम भूमिका असल्याने चर्चेला अर्थ नाही. काश्मिरची समस्या सोडविणे हे भारताच्या हातात नसून काश्मिरी व पाकिस्तानच्याच हातात आहे. पाकिस्तानने काश्मिरींना भडकाविणे थांबविले व काश्मिरींनी वरील मुद्दा क्रं. (५) मधील काही गोष्टी केल्या तर हा प्रश्न सुटु शकेल. भारत व केंद्र सरकार याबाबतीत फार काही करू शकणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा 25/07/2016 - 18:42
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. परंतु तुमचा 5 नंबर चा मुद्दा मान्य नाही. आता सध्याचा वातावरणात राज्य सरकारच्या कर्मचारांची मुले सुद्धा दगडफेक करतायत. स्वतः बुर्हाण वाणी चे वडील हि सरकारी कर्मचारी आहेत. आजच The Hindu वर बातमी वाचली कि जमू आणि काश्मीर मधील 1 % लोकांवर केंद्र सरकार 10 % खर्च करते म्हणजे जोपर्यंत तुमी ह्या लोकांना पोलिटिकल सोल्युशन देणार नाही तोपर्यंत ते असंतुष्ट राहणार जरी तुमी तिथं सोन्याचे रस्ते करून दिले तरी. जर विकास हेच सोल्युशन असत तर स्कॉटलंड ने uk पासून कधीच स्वतंत्र मागितलं नसत। आणि त्या लोकांच्या मागण्या जरी अनाठायी असल्या तरी हि कॉमन टेक्निक आहे अगोदर अवास्तव मागण्या ठेवायचं आणि चर्चा जशी होईल तसे climb down करायचं. नागा बंडखोरांनी ग्रेटर नागालॅंड आणि स्वतंत्र ध्वज ह्या मागण्या लावून धरल्या आहे आणि भारत सरकार ते मान्य न करता चर्चा करतायच ना , तसेच तिथं शांतता आहेच ना. भारतीय राज्यघटनेच्या आधीन राहून आपण त्यांना मोकळीक देऊ शकतो ना, शेवटी india is not a state but union of states. त्यामुळं ठराविक राज्यांचे नियम वेगळे असले मानून काय फरक पडत नाही जशी प्रगती होईल तसे हे नियम आपोआप गळून पडतील.

In reply to by अमितदादा

अमितदादा 25/07/2016 - 18:46
आणि जम्मू आणि लडाख हे भाग पूर्ण पणे indianized झालेत। त्यामुळे त्यांचा काही issue नाहीये। त्यामुळं आपले प्रतिसाद काश्मीर पर्यंत सीमित ठेवले तर बरे होतील.

In reply to by अमितदादा

सुबोध खरे 25/07/2016 - 21:59
अमित दादा साहेब काश्मीर च काय जम्मू आणि लदाख मध्ये पण कलम ३७० मुळे आपण "काश्मिरी" नसाल तर आपल्याला जमीन विकत घेता येत नाही किंवा घर घेता येत नाही . यामुळे कोणतेच उद्योग तेथे आपले कारखाने काढू शकत नाहीत अशा परिस्थितीत कोण उद्योगपती तेथे दुसऱ्याच्या नावाने उद्योग सुरु करेल? आणि उद्योग धंदे नसल्यामुळे काश्मिरी लोकांना नोकऱ्या नाहीत. रिकामे डोके हे सैतानाचे घर असते त्यामुळे अशा तरुणांचे डोके भडकवण्याचे काम करणारे दहशतवादी आणि निधर्मांध काही कमी नाहीत. यामुळेच हा प्रश्न सहज सुटणार नाही. गरिबी ही क्रांती आणि गुन्हेगारी यांची माता आहे असे म्हटले जाते. येथे तर फुटीरवाद्यांचे समर्थन करून आरामखुर्चीत विचारवंतांनी त्यातील फरकच धूसर केला आहे.

In reply to by सुबोध खरे

अमितदादा 25/07/2016 - 22:22
खरे साहेब, तुमच्या प्रतिसादाशी अशांत: सहमत, पण फक्त रिकामी डोकी आणि बेरोजगारी हे अशांतते मगच कारण आहे का, मला नाही अस वाटत. तुमि जालावर नक्कीच काश्मीर मधील बातम्या वाचल्या असतील. कितीतरी आतंकवादी हे रोजगाराची संधी उपलब्द असताना हिंसक मार्गाकडे वाळलेत, 2 ते 4 पोलीस कॉन्स्टेबल फोर्स सोडून हिजबुल मुजाहिद्दीन ला जॉईन झालेत. काश्मीर चे सगळे politician दिल्ली मध्ये एक भाषा आणि काश्मीर मध्ये soft separatizm ची भाषा वापरतात. हे काय होतंय, त्यामुळं मला प्रश्न पडतो की आपण काही चुकत नाही आहोत का ? मी हि काही वर्षां पूर्वी काश्मीर मध्ये आर्मी ला फुल्ल पॉवर देऊन असंतोषी लोकांना चिरडा अशा मताचा होतो, पण हळूहळू त्यातील फोलपणा माजा लक्षात आला. मला प्रश्न पडतो की how will u defeat people who have already defeated their fear ? त्यामुळं मज आस मत बनलंय कि deploy military and political approach at same time, talk to everyone who are interested. लष्कर चा अनुभव तुमाला जास्त त्यामुळं तुमचा मताचा आदरच आहे, परंतु अनुभव नसल्याची मते आरामखुर्चीत विचारवंत मानून हेटाळून नाही चालणार. मग शेतकऱ्यांचा विषयवार शेतकरी, स्त्री यांचा विषयावर स्त्री ने आणि डॉक्टर च्या विषयावर डॉक्टर नेच बोलय हवे.

In reply to by अमितदादा

सुबोध खरे 25/07/2016 - 22:41
काश्मीरचा प्रश्न लष्करी बळावर सुटणार नाहीच याबद्दल दुमत नाहीच. पण काश्मीर आज लष्करामुळेच आपल्या ताब्यात आहे हीही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. तेंव्हा लष्कराचे मानसिक खच्ची कारण थांबवा एवढीच माझी विचारवंतांना विनंती आहे. त्यावर राजकीय तोडगा काढणे हाच उपाय आहे हेही माझे मत आहे पण तो तोडगा काय असेल हे मला सांगता येणार नाही कारण तेवढी माझ्या बुद्धीची झेप नाही.

दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग २: - कलम ३७० रद्द करा ही सुद्धा अतिराष्ट्रवाद्यांची आवडती पण अव्यवहार्य मागणी आहे. सध्याच्या भाजपा सरकारने तसे नुसते सूतोवाच करून पाहावे, मग काश्मीर मध्ये जो काही आगडोंब उसळेल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. विरोधी पक्षात राहून अशी मागणी करणे वेगळे, शाखेतल्या बौद्धिकात (?) बरळणे वेगळे आणि प्रत्यक्षात सत्तेत असताना यासंबंधी कृती सोडा नुसते बोलणे वेगळे, हे आतातरी समजून घ्या. गामा पैलवान या आयडीने आफ्स्पा कायदा पाहावा ही विनंती, या अंतर्गत सैन्यबलांना मिळालेले अधिकार पाहावे. कलंत्री यांची प्रतिक्रिया संतुलित आणि विचारपूर्ण आहे, जबाबदार व्यक्तिमत्वाची द्योतक आहे. अजित डोवाल (संघ प्रणित) विवेकानंद आंतरराष्ट्रीय केंद्राचे फाउंडर डायरेक्टर आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Ajit_Doval After retirement (2005–2014)[edit] Doval retired in January 2005[4] as Director, Intelligence Bureau. In December 2009, he was the founder Director of the Vivekananda International Foundation, a think tank set up by the Vivekananda Kendra, a Spiritually Oriented Organisation.[8][9] सोन्या बापू या आयडीने स्वतः खूप हुशार असल्याचे गृहीत धरले असल्यामुळे साहजिकच बाकी सर्व जण त्यांच्या दृष्टीने निर्बुद्ध आहेत. ते खूपच 'मी मी' करतात. त्यामुळे खरेतर दखलपात्र नाहीच पण त्यांनी माझी पूर्ण पोस्ट रिपीट केल्याबद्दल एवढेतरी लिहिले पहिजे. सैनिक उच्च शिक्षित असतात हे त्यांचे मत करमणूक करणारे आहे. मूळ लेखातील मुद्दे समजून न घेता तिसऱ्याच गोष्टी लिहून भलतेच उलट आरोप करायचे ही वितंडवाद्यांची जुनी खोड आहे, ती सहजी जाणार नाही. पॅलेट गन कमरेच्या वर मारून शेकडो तरुण आंधळे झाले आणि ५० जण गोळीबारात मेले. त्याबद्दल डझनभर जवान आणि अधिकारी निलंबित होऊन चौकशीला सामोरे जातायत हे लक्षात घ्या. गृहमंत्र्यांनी सैन्याला सबुरीचा सल्ला दिला, पॅलेट गन वापरावर बंदी आणली याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करायचे ही खोड आहे. माझ्या विचार आणि (अल्प) बुद्धीनुसार सैन्यबळानी अतिरेक करू नये, सैन्याने स्वतःच्या डोक्याने वागू नये, धोरण ठरवणा-यानी दिलेल्या आदेशाची संयमित अंमलबजावणी करावी, अतिराष्ट्रयवाद्यांनी पाठवलेल्या देशप्रेमाने लडबडलेल्या पोस्ट सैनिकांच्या हातातील फोनवर सुद्धा जातात हे लक्षात ठेवावे, चेव येऊन कोणतीही कृती करू नये, इतिहासाचे दाखले हेत्वारोप करण्यासाठी न देता, चुका सुधारण्यासाठी द्यावे, हा भारतासाठी नुसता भूभागाचा (रिअल इस्टेटचा) प्रश्न नसून तेथील जनतेसकट त्यांच्या अशा आकांक्षांसकट भूभागाचा प्रश्न आहे हे कुठेतरी मान्य केले पाहिजे. अदखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी: - मूळ लेखावरील अनेक प्रतिक्रिया वैयक्तिक झाल्यामुळे मला नाईलाजाने वैयक्तिक व्हावे लागत आहे त्याबद्दल दिलगीर आहे. येथील बहुतेक खोट्या नावांच्या शिखंडी आयडी असून लपून बाण मारायला बघतात. मागितलेले नसताना फुकटचे सल्ले द्यायची घाणेरडी रोगट साथ बहुतेक प्रतिक्रिया देणा-यांच्यांत पसरलेली आहे. सोन्याबापू नावाचे आयडी जगप्रसिद्ध सर्वद्न्य असल्याच्या थाटात व्यक्त होतायत. त्यांची गणना कशात करायची हेपण स्वतःच सांगतायत हे एक बरे. मूळ लेख अतिराष्ट्रवाद्यांच्या भ्रामक कल्पना यांच्याविषयीच आहे यामुळे समाजमाध्यमांवर फिरणारे बाष्कळ फॉर्वर्डस यांचा उल्लेख करूनच लेख लिहिलंय. डोवाल विषयक मजकूरसुद्धा याच प्रकारचा आहे. येथील काही लोकांना आपण पर्यटक म्हणून काश्मीरला जाऊन आलो आणि वेटर, ड्रायव्हर, लॉजवाले इत्यादींशी काही बोललो म्हणजे लगेच काश्मीर प्रश्नावर मत व्यक्त करायला क्वालिफाय झालो असेही वाटते आहे. काश्मिरात मी फिरलो ते सैन्याच्या भरोशावर नाही. एका सैनिकाने स्थानिकांशी बोलतांना माझ्या छातीला स्टेन गन लावली होती. तेव्हा ती बाजूला करून त्यातील गोळ्या, गणवेश, बूट हे सगळे माझ्यासारख्या माणसांनी दिलेल्या टॅक्सेस मधून येते हे विसरू नको असे नाईलाजाने सांगावे लागले होते. काश्मिरात फिरताना हुर्रियत तसेच स्थानिक संस्थांची बरीच मदत झाली हे मात्र नक्की. सैन्याच्या उपस्थितीमुळे फिरतांना मदत झालीच. वैचारिक विरोधकाला राष्ट्रद्रोही म्हणून घोषित करायचे आणि आम्ही म्हणतो तीच खर्रीखुर्री राष्ट्रवादाची व्याख्या आहे असे म्हणायचे ही अतिराष्ट्रवाद्यांची जुनीच पद्धत आहे. त्याच धर्तीवर येथे एकमेकांच्यात 'अहो रूपं! अहो ध्वनी!' चालू आहे. श्रीगुरुजी या आयडीने त्यांच्या एका पोस्ट मध्ये या पोस्ट वर दखलपात्र मूल्यवर्धन (Value Addition) केले आहे. तरीही समाजमाध्यमात फिरणारी JNU वर धमक्या देणाऱ्या नाटकातील सैनिकांची क्लिप त्यांनी आवर्जून पाहावी ही विनंती. पटेल आंदोलन, जाट आंदोलन हाताळताना वापरलेले बळ आणि काश्मिरात वापरलेले उपाय याची तुलना करून पहा. ही सगळीच भारताची अविभाज्य राज्ये आहेत पण ट्रीटमेंट वेगळी दिली जाते. सैन्य धुमाकूळ घालत आहे असे मी न लिहिलेले वाक्य माझ्या तोंडी टाकू नका. सैन्य नक्की काय करते हे खऱ्या अर्थाने आपल्या पर्यंत कधीच येत नाही. स्थानिक लोकांचा उद्रेक झाला तरच थोडी वस्तुस्थिती समजते. काश्मिर खोऱ्यात प्रत्येक शंभर मीटरवर सैनिक एवढे सैन्य असताना सारखा स्थानीकांचा उद्रेक का होतो याचे उत्तर शोधावे ही विनंती. PDP पहिल्यापासून फुटीरतावादी आहेच. आता BJP त्यांच्यासोबत सत्तेत आहेत. त्यामुळे अशी आता ५६ इंची छाती वाल्यांकडून अशी काय Break Through Strategy वापरली जाते हे पाहण्यासाठी देशातील जनता उत्सुक असताना जे चाललंय ते खेदजनक आहे आणि विशेष आशादायक नाही हे सत्य वारंवार समोर येतंय. नॅशनल कॉन्फरन्स बजेट आणि निधी साठी भारताबरोबर, भावनिक ऍडव्हान्टेज करिता काश्मिरीयत बरोबर आणि आंतरराष्ट्रीयकरण करण्याकरिता पाकिस्तान बरोबर अशी सोयीस्कररित्या भूमिका घेते.

In reply to by संदीप ताम्हनकर

अनुप ढेरे 25/07/2016 - 12:24
पटेल आंदोलन, जाट आंदोलन हाताळताना वापरलेले बळ आणि काश्मिरात वापरलेले उपाय याची तुलना करून पहा.
कैच्याकै! जाट आंदोलन आणि पटेल आंदोलनात आंदोलक ग्रेनेड फेकत होते का? त्यांच्या मागे एके४७वाले उभे असायचे का?
हा भारतासाठी नुसता भूभागाचा (रिअल इस्टेटचा) प्रश्न नसून तेथील जनतेसकट त्यांच्या अशा आकांक्षांसकट भूभागाचा प्रश्न आहे हे कुठेतरी मान्य केले पाहिजे.
याच्याशी समहत. देश = जमीन एवढंच नसून देश = लोकं हे देखील आहे.

In reply to by संदीप ताम्हनकर

शिद 25/07/2016 - 15:13
सोन्या बापू या आयडीने स्वतः खूप हुशार असल्याचे गृहीत धरले असल्यामुळे साहजिकच बाकी सर्व जण त्यांच्या दृष्टीने निर्बुद्ध आहेत. ते खूपच 'मी मी' करतात. त्यामुळे खरेतर दखलपात्र नाहीच पण त्यांनी माझी पूर्ण पोस्ट रिपीट केल्याबद्दल एवढेतरी लिहिले पहिजे. सैनिक उच्च शिक्षित असतात हे त्यांचे मत करमणूक करणारे आहे.
ओ साहेब, सोन्याबापूंच मत पटलं किंवा नाही पटलं तर त्यावर बोला ना की उचलला कळफलक आणि लागले बडवायला. किमान त्यांच्या सैनिकी पेशाचा तरी जरा आदर ठेवा. अरे, विसरलोच...तुम्हाला तर सगळ्या सैनिंकाबद्दल अ‍ॅलर्जी आहे ते, म्हणजे लेख वाचून तरी तसेच वाटतंय.

गॅरी ट्रुमन 21/07/2016 - 14:22
याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच....
हे वाक्य वाचले आणि पुढचे काही वाचायची इच्छाच राहिली नाही. बाकी चालू द्या.

आकाश कंदील 21/07/2016 - 14:32
मूळ मुद्दा असा आहे की 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' हा कायदा काश्मिरात का आणि पुण्यात का नाही याचा जरा निरपेक्ष विचार करा उत्तर तुंम्हाला सापडेल आणि तुमचे मुद्दे किती योग्य ते तुम्ही ठरवू शकाल

अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे काय? राष्ट्रवादात पण ३०-६०-९०-क्वार्टर-हाफ-फुल अशी सिस्टम असते काय? तुम्ही लिबरल असाल अन लिबरल तत्वातच देशाच्या १२५ कोटी जनतेचे हित समाविष्ट असल्याचे तुम्हाला ठामपणे वाटत असेल तर ते उघड मान्य करा, मोदी, डोवल वगैरे असू दे, आधी ताकाला जाऊन भांडी लपवणे सोडावेत हे सुचवतो. अवांतर - डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गंम्बा 22/07/2016 - 12:26
अवांतर - डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी.
बाप्पु, हे तुम्हीच लिहीलेत हे बरे झाले. तसेच सैन्यावर जी पातळी सोडुन टिका आहे त्याचे पण तुम्ही खरमरीत उत्तर द्याच. काश्मीर मधे सैन्याला कीती हात बांधुन आणि पॉलिटीकली करेक्ट भुमिका घेउन ( पटत नसली तरी ) काम करावे लागते ह्या बद्दल पण लिहाच.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

डोवल ह्यांच्यासारख्या माणसाला जर आपण हेटाळत असाल तर आपल्याला अभिनिवेष सोडून अभ्यास वाढवावा लागेल इतके मात्र तूर्तास सुचवतो तुम्हाला मी. +१००० काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? असे अवास्तव आणि प्रक्षोभक लिहिण्याऐवजी खालीलप्रमाणे लिहिणे वास्तवाला धरून होईल... काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात जेथे, (अ) लष्कराला दोषी ठरवून स्वार्थी हितसंबंध साधणारे राजकिय व अराजकीय (पन इंटेंडेड) नेते शेकड्याने आहेत, (आ) सीमेपलिकडून येणारा पैशाच्या लालचीपायी काश्मीर घगघगत ठेवण्यासाठी प्रयत्नशील लोक आहेत, (इ) पाकिस्तानाचे बाहेरून अतिरेकी पाठवणे आणि स्थानिक मुलकी नागरिकांना फूस देणे सतत चालू असते, व (ई) संकुचित स्वार्थासाठी देशाला धोका पोचणारा कांगावाही करायला मागेपुढे न पाहणारे व नसलेले दोष हुडकून काढणारे तथाकथित लिबरल मोठमोठी बहिर्गोल भिंगे रोखून सतत तयार आहेत... ज्यांच्या लेखी अतिरेक्यांच्या मानवी हक्कांचा कळवळा सर्वोच्च आहे पण अतिरेक्यांच्या गोळांना बळी पडणार्‍या निरपराध सामान्य नागरिकांच्या व त्यांचे संरक्षण करणार्‍या सैनिक-पोलिसांच्या जीवाची किंमत शून्य आहे; अशा ठिकाणी भारतिय लष्कराला किती संयमाने, धोकादायक व तणावपूर्ण परिस्थितीत काम करावे लागत असेल याची कल्पनाही करणे कठीण आहे.

तिमा 21/07/2016 - 15:05
काश्मीरातील वास्तव हे आहे की बहुसंख्य काश्मीरींना (पश्चिमी भागातल्या) स्वतंत्र होण्याची मनांतून इच्छा आहे. अगदी २५-३० वर्षांपूर्वी आम्ही गेलो होतो, तेंव्हाही हॉटेल मालकापासून अनेकांनी, 'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का' असे आम्हाला विचारले होते. ते स्वतःला अजूनही भारताचे मानायला तयार नाहीत. पण त्याचवेळी, पाकिस्तानात जावे लागले तर, या भीतिने, त्यातले मवाळ जास्त आग्रह धरत नाहीत. पण पाकिस्तानची फूस असल्यामुळे जहालवादी हिंसक आंदोलने करतात आणि अतिरेक्यांनाही मदत करतात. सैन्यदलाकडून त्यांच्यावर काहीच अत्याचार झाले नाहीत असे कोणीच म्हणणार नाही. पण बहुसंख्य केसेसमधे भारतीय लष्कराने त्यांना शिक्षा दिली आहे. तिथल्या विचित्र परिस्थितीला बाकीच्या राज्यांसारखे नॉर्मल वातावरण करणे, हे अतिशय कठीण काम आहे. याच काश्मीर राज्यात लेह, लडाख देखील आहे. तिथे अशी आंदोलने होत नाहीत. उलट तिथले लोक प्रत्यक्ष भेटीत खूपच शांत व चांगल्या स्वभावाचे वाटले. तिथे विकासावरही फारच अल्प खर्च केला जातो.तरीही तिथल्या लोकांना सैन्यदलाचा का बरे त्रास होत नाही, वेगळे व्हावेसे का वाटत नाही,हा प्रश्न स्वतःस विचारुन पहावा.

In reply to by तिमा

नाखु 22/07/2016 - 12:50
साल २०१० : सख्खे नातेवाईक जाऊन आले
'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का'+१ आणि आम्हाला तुम्ही पयर्टनाला या पण आमहाला स्वतंत्र व्हायचे आहे आणि भारताच्या कुठल्याही व्य्वस्थेवर प्रेम नाही पण रागच आहे
साल २०१३ : जुन्या कंपनीतील सहकारी काश्मीरला जाऊन आले त्याने थेट विचारले तुमचे उप्जीवीकेचे एक्मेव साधन काय तर पर्यटन (राहण्यास शिकार्यात होता तो कुटुंबासहीत).
'तुम्ही हिंदुस्तानातून आलात का'+१ आणि आम्हाला तुम्ही पयर्टनाला या पण आमहाला स्वतंत्र व्हायचे आहे आणि भारताच्या कुठल्याही व्य्वस्थेवर प्रेम नाही पण रागच आहे
साल २०१५: नुकताच कंपनीतील एक सहकारी जाऊन आला त्यांनाही असाच अनुभव जर या शिल्लक राहिलेल्यांना (हिंदु पंडीत कधीच नेसत्या वस्त्रानिशी निर्वासीत झालेत तिथून) तर उर्वरीत भारताला का त्यांच्याबद्दल अनुकंपा/ममत्व वाटावे. उलट मी म्हणेन अश्या क्रुतघ्न (खाल्ल्या थाळीत **णार्यांच्या उपजीवेकेला आधारभूत ठरण्यापेक्षा पूर्वांचल राज्यात पर्य्टन करावे ती जनता कष्टाळूही आहे आणि बहुअंशी मुख्य प्रवाहाशी फटकून नाही. ता:कः खालच्या एका प्रतिसादातील उल्लेखाबद्दल धन्यवाद. पेराल तेच उगवेल यावर विश्वास असलेला नाखु

In reply to by नाखु

आपण नॉर्थ ईस्टला फिरले आहात काय? असल्यास आपण उलट मी म्हणेन अश्या क्रुतघ्न (खाल्ल्या थाळीत **णार्यांच्या उपजीवेकेला आधारभूत ठरण्यापेक्षा पूर्वांचल राज्यात पर्य्टन करावे ती जनता कष्टाळूही आहे आणि बहुअंशी मुख्य प्रवाहाशी फटकून नाही. हे बोलला नसतात असे म्हणू धजतो. शिलाँग (रॉक म्युझिक कॅपिटल ऑफ इंडिया) सोडून बऱ्याच ठिकाणी प्रचंड अवघड आहे सगळे, ब्लॉकेड लागले एक एक की 20 30 दिवस आयुष्य उभे राहते, बटाटे 400 रुपये किलो अन पेट्रोल 600 रुपये लिटर घ्यायला लागते, तिकडे फुटीरतावादाचा चेहरा शांत अन सटल दिसतो पण खूप भयानक असतो. अर्थात पहिल्या पेक्षा बरेच आहे तरी ते मेनस्ट्रीम मध्ये वगैरे अजिबात नसतात, इतके मी आत्मविश्वासपूर्वक सांगतो

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

शाम भागवत 24/07/2016 - 14:15
आजही नॉर्थ इस्ट वगळता उर्वरीत भारतातील रहिवासी असलेले असे केंद्र सरकार व आस्थापनातले अधिकारी यांना तिथे पोस्टिंग नको असते. त्यासाठी केंद्र सरकार व आस्थापनातील अधिकार्‍यांना बर्‍याच सवलती, जास्त पगार वगैरेचे आमिष दाखवावे लागते. रिझर्व्ह बँक, नाबार्ड मधे आजही हा भाग अशांत टापू म्हणूनच ओळखला जातो व त्यासाठी तेथे काम करायला तयार असणार्‍यांना विशेष पॅकेज असते.

In reply to by शाम भागवत

नाखु 25/07/2016 - 09:05
कार्यरत असलेल्याकडून माहीती आलेली असल्याने (पुर्वांचलबाबत) आमची सपशेल माघार, तरी पण खाल्लाय घरचे वासे मोजणार्या कश्मीरीम्बाबतचे मत तेच राहिल. पुर्वांचल निसर्गसौंदर्याने नटलेले आहे असे नेहमीच पेपेरात्/मिपावरहीही वाचतो पण तिथली सामाजीक आणि अशांत बाजूबद्दल फारसे लिखाण वाचनात आले नाही म्हणून असेल. तरी सोन्याबापुंनी कळफलक धूळ झटकून एखादा प्रसंग जमल्यास मालीकाच लिहावी ही विनंती.. चू भू देणे घेणे

In reply to by नाखु

शाम भागवत 25/07/2016 - 10:58
१) आजही गौहत्तीला फॅमीली न्यायला लोक तयार असतात पण मिझोराम, नागालँड, मणिपूर, मेघालय व त्रिपुरा येथे राजधानीच्या ठिकाणी जरी पोस्टिंग असेल तरी फॅमीली न नेता एकटेच जातात. २) पण ही माणसे आपल्याकडे आली तर त्यांना कोणी भारतीय समजत नाही. नेपाळी समजतात. जर एखादी स्त्री गोरी व दिसायला चांगली व सुखवस्तू असेल तर जपानीही समजतात. काही काळा नंतर ही लोकं यालाही सरावतात पण आत मधे एक बोच राहातेच. पुण्या मुंबई सारख्या प्रगत भागात असे होत असेल तर महाराष्ट्राच्या इतर भागात काय होत असेल? असो. ३) भारत खूप खूप मोठा आहे. सगळ्याच बाबतीत खूपच विविधता आहे. नीट समजावून घेता आले पाहिजे. म्हणजे सगळे गुणदोष लक्षात येतात व उपाय ही सापडतात व मुख्य म्हणजे राग आवरून हे साधता येऊ शकते व जेव्हा राग आवरून उपाय योजना केली जाते तेव्हा उपायापेक्षा रोग बरा म्हणायची वेळ येत नाही. जाऊ दे. विषयांतर नको.

In reply to by शाम भागवत

पैसा 25/07/2016 - 14:06
http://www.misalpav.com/node/27810 हा चिगोचा लेख सहजच आठवला. ------- काश्मिर आणि सैन्याबद्दलच्या या आताच्या लेखातील मते बुद्धिभेद करणारी आहेतच. त्याचा निषेध. त्याशिवाय लेखकाने काही मिपाकरांबद्दल जे वयक्तिक शेरे मारले आहेत त्याची संपादक मंडळाने दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी ही विनंती आणि अपेक्षा आहे.

In reply to by टवाळ कार्टा

विनोद१८ 25/07/2016 - 18:07
..देउ नये, कारण हा विषय अत्यंत्य संवेदन्शील आहे, हा बुद्धीभेद करणारा लेख आहे हे तर सरळ सरळ दिसतेच आहे. लेखक वरकरणी लिखणस्वातंत्र्याचा आधार / गैरफायदा घेउन आपल्या शत्रुदेशाचा अजेंडा पुढे रेटीत आहे असेच दिसते. त्यांचा हेतु शुध्ध दिसत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते.

In reply to by विनोद१८

गॅरी ट्रुमन 25/07/2016 - 18:34
हा विषय अत्यंत्य संवेदन्शील आहे, हा बुद्धीभेद करणारा लेख आहे हे तर सरळ सरळ दिसतेच आहे. लेखक वरकरणी लिखणस्वातंत्र्याचा आधार / गैरफायदा घेउन आपल्या शत्रुदेशाचा अजेंडा पुढे रेटीत आहे असेच दिसते. त्यांचा हेतु शुध्ध दिसत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते.
अहो असले काहीतरी बरळणार्‍यांना हल्ली विचारवंत म्हणायची फ्याशन आहे हे माहित नाही का तुम्हाला?

चलत मुसाफिर 21/07/2016 - 15:07
कलम 370 रद्दबातल करून जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेणे हा रामबाण उपाय आहे. तोपर्यंत मात्र अंतरिम उपाय म्हणून सरकार व सैन्य यांनी आपल्या प्रसिद्धीतंत्रात बदल करावा. "तुम्ही भारतीय आहात" असे म्हणण्याऐवजी "आम्हीही काश्मिरी आहोत" असे मुख्य सूत्र ठेवावे.

श्रीगुरुजी 21/07/2016 - 15:20
प्रतिक्रिया देणार नव्हतो. परंतु खालील वाक्य वाचल्यानंतर,
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल?
हेच लिहावेसे वाटते की वरील लेख म्हणजे पराकोटीचा मूर्खपणा आहे.

महासंग्राम 21/07/2016 - 15:32
काही प्रश्न/शंका आहेत तुम्ही योग्य समाधान कारक उत्तरे देऊन दूर कराल अशी अपेक्षा
कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल
हे विधान कोणत्या आधारावर केले आहे काही संदर्भ नक्कीच असेल तो द्यावा. वरील परस्थिती आपण स्वतः अनुभवली आहे का की फक्त पेपर मधल्या बाटलंय/विश्लेषणे लेख लिहिला आहे ???

वरुण मोहिते 21/07/2016 - 15:40
पुण्याचा माहित नाही काय खरं काय खोटा ह्या लेखात तो मुद्दा नव्हता आणायला पाहिजे ..बाकी काश्मीर मध्ये सिमेन्स बरोबर काम केलं आहे पण उधमपूर सोडलं की पुढच्या लोकांची इच्छा नसते भारतासोबत राहण्याची असा वाटतं ..३-३ महिने तिकडे राहिलो आहे म्हणून वाटलं बाकी चूक बरोबर डॉक खरे आणि सोन्याबापू सांगतील

बाळ सप्रे 21/07/2016 - 16:06
आता काश्मीर भारतात असल्याने नक्की प्रॉब्लेम काय आहे काश्मीरींचा?? भारतातील इतर राज्यांप्रमाणे एक राज्य म्हणून रहाण्यात नक्की काय तोटा आहे त्यांचा?? सैन्याचा त्रास वगैरे पाकिस्तानींची मदत घेतल्याने ओढवून घेतलेला आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाकी ते डोवाल साहेबांना कशाला मधे आणले उगाच ? जुनाच अजेंडा किती दिवस राबवणार ?

In reply to by अनुप ढेरे

अनुपराव, तत्व म्हणून तुम्ही म्हणता ते मी मान्य करतोच, फक्त उत्तरपूर्वेतले अनुभव पाहता, आफस्पा तूर्तास तरी लेसर इव्हिल ऑफ द अव्हेलेबल इव्हिल्स वाटते मला तरी.

श्रीनगर- बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलिस चौकीतच पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी आज (गुरुवार) दिली. http://www.esakal.com/Tiny.aspx?K=E3642t

गामा पैलवान 21/07/2016 - 23:03
संदीप ताम्हनकर, तुमची दोन विधानं खासकरून पटलं नाहीत. १. >> याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील >> अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत. वल्गनायुक्त पोष्टींमुळे अजित दोभाल यांचं महत्त्व जराही कमी होत नाही. कारण नसतांना कृपया त्यांना या विषयात ओढू नये. २. >> .... तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित >> असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? सैनिकांची बाजू घेणारा कुठलाही कायदा काश्मिरात अस्तित्वात नाही. उलट भारतीय सैन्य राष्ट्रीय मानवी हक्क आयोगास उत्तरदायी आहे. जगात कुठल्याही देशाचं सैन्य अशा प्रकारे बांधील नाही. त्यामुळे तुमचं हे विधान म्हणजे शुद्ध दिशाभूल आहे. आ.न., -गा.पै.

कलंत्री 22/07/2016 - 17:19
विकतचे दुखणे असेच मला वाट्ते. काश्मिरला राजकिय तोडग्याची गरज आहे. कोणी चाणक्य / चंद्रगुप्त / शिवाजीच्या प्रमाणे विचार करणारा नेता जोपर्यंत भारतात होत नाही तो पर्यंत चांगला तोडगा निघणे अशक्यच आहे. काश्मिरी आपले देशबांधव आहेत असा विचार जर मनात आला तर आपोआपच नेमके काय चुकत आहे हे समजणे सोपे होईल. मोदीजी कधी मौन सोडतील आणि चांगला दूरद्रष्टी नेता शोधतील तो पर्यंत अल्ला मालिक आणि परमेश्वराची इच्छा असेच म्हणावे लागेल.

मनो 22/07/2016 - 19:31
हमीद दलवाई यांचा अनुभव (भाऊ तोरसेकर यांच्या ब्लॉग वरून उचलला आहे) http://bhautorsekar.in/काश्मिरची-समस्या-की-कांग/ ‘भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये. मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’ मी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते. ‘आप कल कहॉ गये थे?’ मग त्याने विचारले. मी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे. ‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले. हाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपणे विचारले, ‘तेथे काय पाहिलेत?’ ‘लढाई चाललेली पाहिली.’ ‘कुणाची जीत होत आहे?’ ‘हिंदूस्तानी फ़ौजेची.’ कसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला. मग तो बोलू लागला – अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते! पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे? यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले. मी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते? येथे काय दु;ख आहे? कशाची कमतरता आहे?’ तो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’ श्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’

In reply to by मनो

शाम भागवत 23/07/2016 - 16:04
मनोंचा प्रतिसाद येऊन २४ तास व्हायला आले आहेत तरीही .... "भाऊ तोरसेकर? खी..खी..खी.." असा एखादा प्रतिसाद आला नाही हे एक आश्चर्यच!!! :))

In reply to by शाम भागवत

भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत इतकेही स्वस्त माझे तरी खी खी खी नाहीत म्हणुन सोडले बघा भागवत साहेब बाकी ताम्हनकर साहेब विरोधी पक्षाचे तोरसेकर होऊ शकतील असे वाटते ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मृत्युन्जय 25/07/2016 - 11:11
तो अनुभव हमीद दलवाई यांचा आहे बाप्पु. तोरसेकरांनी केवळ लिहिला. तरीही खीखीखी करायची असेल तर काय करणार. कदाचित दलवाई मुसलमानांचे भाऊ तोरसेकर आहेत असे ऐकायला मिळेल आता.

In reply to by मृत्युन्जय

एकतर भाऊ भाट आहेत, इतकी वर्ष मुंबई महापालिका हातात असताना सुद्धा रस्त्यावर असलेल्या खड्डयांची जबाबदारी सेनेची कशी नाही ह्यावर लेख पाडतात ते, त्यामुळे हो, भाऊंवर माझे खी खी खी मी बरबाद करणार नाही हे खरे, बाकी कोणीतरी कोणाचातरी कोणीतरी आहे असे समजा मी मागे कधी म्हणले असेल तर तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे अन तो माझ्या अल्पमतीनुसार मी बनवलेला आहे, त्याचा इथे अस्थानी उल्लेख करायचे अन भाऊंवर खी खी खी बरबाद करणार नाही असे म्हणल्याने तुम्हाला झोम्बायचे कारण मात्र कळले नाही मृत्युंजय भाऊ

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मृत्युन्जय 25/07/2016 - 13:32
मिपावर लेख पाहुन नाही तर माणुस पाहुन प्रतिसाद पडतात असा एक आरोप नेहमी करण्यात येतो (थोडक्यात काय लिहिले आहे ते महत्वाचे नसुन कोणी लिहिले आहे ते महत्वाचे आहे असे दिसते). खरे खोटे देव जाणे. सद्यस्थितीत भाऊ तोरसेकरांबद्दलची कमेंट त्याच सदरात मोडते. पण केवळ एखादा अनुभव भाऊ तोरसेकरांनी लिहिलेला आहे म्हणून तो हास्यास्पद होत नाही. सद्य परिस्थितीत तर अनुभव पण तोरसेकरांचा नाही. अनुभव तोरसेकरांचा असो किंवा दलवाईंचा, त्या अनुभवामागची दारुण वस्तुस्थिती काश्मिरमधली भयावह परिस्थिती विदीत करते. अश्या वेळेस त्या परिस्थितीवर हसण्यासारखे काय आहे हे मला नक्कीच उमजलेले नाही. भागवतांचा प्रतिसाद वाचा:
"भाऊ तोरसेकर? खी..खी..खी.." असा एखादा प्रतिसाद आला नाही हे एक आश्चर्यच!!!
\ त्यावर तुमचा प्रतिसाद वाचा:
भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत इतकेही स्वस्त माझे तरी खी खी खी नाहीत म्हणुन सोडले बघा भागवत साहेब
थोडक्यात म्हणजे वरचा संपुर्ण अनुभव (दलवाईंचा - तोरसेकरांनी लिहिलेला) हा हास्यास्पद आहे असे म्हणून त्या वस्तुस्थितीची कुचेष्टा करण्यामागचे कारण समजले नाही. काश्मीरमध्ये सामान्य माणसाच्या मनात काय पराकोटीचा भारतद्वेष आहे आणि तो केवळ धर्माच्या नावाखाली आहे हे त्या अनुभवातुन दिसते. ही अतिशय दारुण परिस्थिती आहे आणि त्याला अर्थातच तोरसेकर जबाबदार नाहित. असे असता त्यावर खीखीखी करुन हसण्यासारखे काही कारण मला दिसत नाही सोन्याबापु. त्यामुळेच हे अस्थायी विधान प्रचंड खटकले. इथे लेखक तोरसेकर नसुन हमीद दलवाई असले असते तरी हेच म्हणालो असतो किंबहुना अगदी राहुल गांधीने जरी हा अनुभव लिहिला असता आणी त्यावर तुम्ही हा प्रतिसाद दिला असता तरी तो तेवढाच खटकला असता.
बाकी कोणीतरी कोणाचातरी कोणीतरी आहे असे समजा मी मागे कधी म्हणले असेल तर तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे अन तो माझ्या अल्पमतीनुसार मी बनवलेला आहे,
या वाक्याचा संदर्भ, मतितार्थ, आशय आणि उपयोग नाही कळाला त्यामुळे यावर प्रतिसाद देत नाही.

In reply to by मृत्युन्जय

सगळे उलगडतो, प्रथम एक विनंतीवजा मागणी पूर्ण करता आली तर पहा, ती म्हणजे, हमीद दलवाई ह्यांचा हा अनुभव त्यांच्याच फर्स्टहँड लेखनात मिळाला तर सांगा किंवा द्या (मला कल्पना नाही), मला वाचायला आवडेल, जर इतका महत्वाचा अनुभव खुद्द दलवाईंच्या लेखनात नसला तर पुढे काय? आजकाल कोणाचा भरवसा घेता? अनुभव एकाचा मांडतोय दुसरा..

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मृत्युन्जय 25/07/2016 - 14:10
माहिती नाही. तोरसेकरांना हा अनुभव कसा माहिती झाला ते माहिती नाही. पण तोरसेकरांनी धादांत खोटे लिहिले आहे असे कोणी म्हणत नाही. त्यामुळे त्यावर शंका घ्यायचे काही कारण मला दिसत नाही. त्यांनी तद्दन भूलथापा मारल्या आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय सोन्याबापू?

In reply to by मृत्युन्जय

नाही, मला असेच म्हणायचे नाहीये, मला फक्त इतके म्हणायचे आहे की संवेदनशील विषयात पब्लिक फोरम पक्षी ब्लॉग वगैरे वर जर कोणी "हियरसे" प्रकारचे अनुभव मांडले तर त्यावर एकदम डोळे झाकून विश्वास ठेवू नये, ह्यात लेखक कोण आहे ह्यावर बायस असायचे कारण नाही, शिवाय भाऊंच्या विषयाला भागवतांनी आऊट ऑफ द ब्लु तोंड फोडले म्हणून मी त्या कॉमेंट संबंधित माझी मते त्याच्याखाली नोंदवली आहेत,

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

शाम भागवत 25/07/2016 - 14:42
सोन्याबापू तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल प्रथम सॉरी. खरे सांगायचे तर कोणीतरी तोरसेकरांबद्दल खी.खी.खी. असे लिहिल्याचे आठवत होते. तुम्ही ते लिहिलेय हे गावीही नव्हते. तुमच्या उत्तरावरून माझी कॉमेंट तुम्हाला दुखवून गेल्याचे जाणवल्याने मी स्मायली देऊन थांबलोही होतो. असो. मला तुमच्या बद्दल आदर आहे. तसेच तुम्हाला दुखवायचा माझा कोणताही हेतू नव्हता हे इथे स्पष्ट करून मी परत एकदा सॉरी म्हणतो. ओके?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

शाम भागवत 25/07/2016 - 14:32
मी दलवाईंचा लेख खूप पूर्वीच वाचला होता. पण नक्की कुठे ते आठवत नव्हते. आत्ता तोरसेकरांचा तो लेख वाचला त्यानुसार
१९६५ सालच्या भारत पाक युद्धात आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ तर्फ़े हमीद दलवाई व वसंत सोपारकर हे पत्रकार युद्धवार्ता घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळचा हमीदभाईंनी एका लेखात लिहून ठेवलेला हा अनुभव. तेव्हाच्या काश्मिरी व भारतीय मुस्लिम मानसिकतेचा हा दाखला आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या ३ मे १९८२ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात दलवाईंनी मुस्लिम व सेक्युलर मानसिकतेचे नेमके विश्लेषण केलेले आहे.
अवांतरः मलाही तोरसेकरांची सर्व मते पटत नाहीत. पण तरीही मला त्यांच्या अनेक पोस्ट मधून विचार करण्यासारखे बरेच मुद्दे मिळाले आहेत.

In reply to by शाम भागवत

हाच संदर्भ अगोदर मिळाला असता तर पुढले अवांतर टाळता आले असते असे वाटते भागवत साहेब मला. असो झाल्यागेल्यावर मी माझ्यातर्फे पाणी टाकतो :) कसे?

In reply to by मृत्युन्जय

बाकी , आमच्या "उप-प्रतिसादाची" पिसे काढायला हिरीरीने आलात, तेव्हा खुद्द अनुभवावर काहीही मत न देता ,नुसते भाऊंच्या विरोधकांवर श्लेष करणाऱ्या भागवतांच्या कॉमेंट वर काही बोलला नाहीत ते? एकदाही नाही सांगावे वाटले का भागवतांस की बोआ तुम्ही का अनुभव सोडून लेखक-सादरकर्त्यावर घसरताय, जरा विषण्ण परिस्थितीवर बोला, बोलायचे नाही ठरवले होते पण विषय वाढवलाच आहात तर बोलतो, हा मुदलातलाच डबल स्टॅण्डर्ड मलाही काही खास रुचला नाही बरंका मृत्युंजय भाऊ :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मृत्युन्जय 25/07/2016 - 14:31
भागवतांना समज द्यावीशी वाटली नाही त्याचे कारण असे की त्यांनी तोरसेकर विरोधकांवर कुत्स्तित टिप्पणी केली होती पण त्यामुळे काश्मीर मधल्या परिस्थितीची कुचेष्टा होत नाही. तुमच्या प्रतिसादातुन तसे होत आगे. त्या अनुभवावर खीखीखी करुन हसणे किंवा
"भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत इतकेही स्वस्त माझे तरी खी खी खी नाहीत म्हणुन सोडले बघा भागवत साहेब"
(याचा अर्थ असा होतो की तोरसेकरांनी न लिहिता अजुन कोणी लिहिले असते तर तुम्ही खी खी खी करुन हसले असता) असे म्हणुन काश्मीर मधील भयाणा परिस्थितीची कुचेष्टा करणे हे मात्र मला खटकले. जे आहे ते स्पष्तपणे त्या अनुभवात मांडले आहे. तुम्हाला तोरसेकर आवडत नाहित म्हणून तोरसेकरांनी लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीची कुचेष्टा करण्याचे काहिच कारण नाही. मिपावरील बर्‍याच आयडींचे विचार हे माझ्या प्रकृतीच्या विरोधात जाणारे आहेत पण म्हणुन त्यांच्या प्रत्येक प्रतिसादावर अथवा धाग्यावर फक्त हेटाळणीच करायची असे काही मी करत नाही विशेषतः तसे केल्याने जेव्हा एखाद्या व्यक्तिची, घटनेची अथवा वस्तुस्थितीची हेटाळणी होत असेल किंवा गांभीर्य कमी होत असेल तेव्हा. त्याउप्परही तोरसेकर म्हटल्यावर तुच्छतापुर्वक उल्लेखच करायचा असल्यास त्यासही माझा आक्षेप नाही कारण ते एखाद्याचे वैयक्तिक मत असु शकते मात्र तसे करण्याने विदित केलेल्या देशविघतक वस्तुस्थितीला नाकारले जात असेल, त्याची हेटाळणी होत असेल किंवा त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर माझा नक्कीच आक्षेप आहे. तोरसेकरांचा विरोध करुन अथवा तोरसेकरांना उचलुन धरुन. तोरसेकरांना शिव्या घालुन अथवा तोरसेकरांबद्दल गोग्गोड बोलुन, तोरसेकरांची निंदा नालस्ती करुन अथवा तोरसेकरांचा जयजयकार करुन , काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" Because the Union Must Persist. थोडक्यात आक्षेप तोरसेकर विरोधाला नाहि. हा मुदलातलाच डबल स्टॅण्डर्ड मलाही काही खास रुचला नाही बरंका मृत्युंजय भाऊ :) डबल स्टेंडर्ड असण्याचा प्रश्नच नाही, कारण वरती विदित केलेच आहे. स्पष्टपणे बोलुन दाखवले. त्याबद्दल नाईलाज आहे. तुम्हाला रुचले नाही याचा खेद आहे.

In reply to by मृत्युन्जय

(याचा अर्थ असा होतो की तोरसेकरांनी न लिहिता अजुन कोणी लिहिले असते तर तुम्ही खी खी खी करुन हसले असता) हा अर्थ कसा निघाला बुआ?? मी स्पष्ट बोललोय की तोरसेकरांबद्दल माझे मत प्रतिकूल आहेच, त्यातून मी काश्मिरी परिस्थितीची कुचेष्टा करतोय हा जावईशोध आपण लावलाय भाऊ, माझे मत परत एकदा मांडतो "तोरसेकर ह्यांच्यावर खर्च करण्याइतके माझे खी खी स्वस्त नाहीत" ह्यात मी कश्मीर परिस्थितीची कुचेष्टा कशी केली ते सांगा? शिवाय तोरसेकर हा माझा एकमेव सोर्स नाही काश्मीर बद्दल अभ्यास करायला, का मी तोरसेकरांना मना करतोय म्हणून मी काश्मीरला कुचेष्टेने पाहतोय असे सोलॉजिझम लढवलेत आपण?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मृत्युन्जय 25/07/2016 - 15:03
हा अर्थ कसा निघाला बुआ?? मी स्पष्ट बोललोय की तोरसेकरांबद्दल माझे मत प्रतिकूल आहेच, त्यातून मी काश्मिरी परिस्थितीची कुचेष्टा करतोय हा जावईशोध आपण लावलाय भाऊ, माझे मत परत एकदा मांडतो तोरसेकरांबद्दलचे तुमचे मत काहिही असले तरीही त्यांनी लिहिलेल्या सत्य अनुभवावर खीखीखी करणे किंवा केवळ त्यांनी लिहिले आहे म्हणुन खीखीखी देखील करणार नाही असे लिहिणे यातुन त्या परिस्थितीची कुचेष्टाच होते सोन्याबापु. तो शोध नाही. जाव्ईशोध तर त्याहुन नाही. तुम्ही जुनेच मत परत व्यक्त केल्याने त्या परिस्थितीत काहिही बदल होत नाही. तुम्हाला तसे म्हणायचे नव्हते असे म्हणा वाटल्यास. का मी तोरसेकरांना मना करतोय म्हणून मी काश्मीरला कुचेष्टेने पाहतोय असे सोलॉजिझम लढवलेत आपण? परत एकदा लिहितो:
तोरसेकरांचा विरोध करुन अथवा तोरसेकरांना उचलुन धरुन. तोरसेकरांना शिव्या घालुन अथवा तोरसेकरांबद्दल गोग्गोड बोलुन, तोरसेकरांची निंदा नालस्ती करुन अथवा तोरसेकरांचा जयजयकार करुन , काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" Because the Union Must Persist.
आधी लिहिलेले अजुन एक वाक्य वाचा
इथे लेखक तोरसेकर नसुन हमीद दलवाई असले असते तरी हेच म्हणालो असतो किंबहुना अगदी राहुल गांधीने जरी हा अनुभव लिहिला असता आणी त्यावर तुम्ही हा प्रतिसाद दिला असता तरी तो तेवढाच खटकला असता.
वरची २ वाक्ये एवढी स्पष्ट असुनही तुम्ही तोरसेकरांना विरोध करताय म्हणुन मी हे सगळे लिहितोय असे घोडे तुम्हाला पुढे दामटायचे असेल तर तो तुमचा प्रश्न आहे सोन्याबापु. त्याबद्दल मी काहीच करु शकत नाही. त्यामुळे तुम्ही जे लिहिले आहे त्यातुन जो अर्थ प्रतीत होतो आहे त्याला Theory of Deduction म्हणा अथवा syllogism म्हणा, परिस्थिती बदलणार नाही. फक्त बघण्याचे चष्मे बदलतील.

In reply to by मृत्युन्जय

भाऊ तोरसेकर????? >>>> खी खी खी → असे विधान मी केले होते,श्रीगुरूजींना उपप्रतिसाद दिला होता जाकिर नाईकांच्या धाग्यावर बहुतेक!!! तुम्ही कृपया वाद घालत बसू नका. . . . . आणखी एक राहिलचं "खी खी खी खी"

श्रीगुरुजी 23/07/2016 - 13:59
हा 'ऐसी'वर शोभणारा लेख चुकुन इथे टाकलेला दिसतोय. 'ऐसी'वर या लेखात ओकलेल्या गरळीचे समर्थन करणारे आतापर्यंत किमान १००० प्रतिसाद आले असते.

वटवट 23/07/2016 - 16:33
सुरुवातीला वाटले रात्रीच्या नशेत लिहिलाय हा लेख..... पण नंतर बघीतलं...चक्क दुपारी पोस्टलाय हा लेख??? ऑ .... दुपारी दुपारीच असं कसं ब्वॉ???

दखलपात्र प्रतिक्रियां संबंधी: - 'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल' - हे मी लिहिलेले नाही. अशा पोस्ट समाजमाध्यमातून जोरात फिरत आहेत. कोण पुढे पाठवतं ते सगळे जाणतातच. प्रत्यक्ष रस्त्यावर जे सैन्य असते ते एवढ्या बौद्धिक क्षमतेचे असते का? आणि सैन्याला विशेषाधिकार दिले की त्याचा अतिरेक होतो ही जगभरातील वस्तुस्थिती आहे. भारतात अनेक राज्यात १९५८ पासून आफ्स्पा लागू आहे, त्या मणिपुरी मानवाधिकार कार्यकर्त्या आरोम चानू शर्मिला गेली अनेक वर्षे सत्याग्रह करतायत तो का आणि कसा ते जरा वाचा. काश्मिरी उपास करत नाहीत तर दगड फेकतात. श्री डोवाल यांची काशिरातील कामगिरी काय हे अजून समोर यायचंय. तोपर्यंत संघ परिवारातला माणूस म्हणून ज्यांना त्यांच्या आरत्या करायच्यात त्यांनी जरूर कराव्या. काश्मिरात पाक पुरस्कृत अशांतता आणि दहशतवाद आहे यात कोणाचेच दुमत नाही. प्रश्न कसे हाताळावे हा मुद्दा आहे. केवळ सैन्याच्या बळावर काश्मीर प्रश्न सोडवता येईल असे वाटणारे मुर्खांच्या नंदनवनात वावरतायत हे नक्की. याबाबत अतिराष्ट्रवाद्यांचा अभिनिवेश हास्यास्पद आहे. अश्याने खरे नंदनवन हातातून निसटून जाईल. आर्मीने, अर्ध-सैन्यबलांनी केलेले अत्याचार आणि बळाचा अतिरिक्त वापर यावरही बरेच मटेरिअल आंतरजालावर उपलब्ध आहे. मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने, स्वताः गाडी चालवत बऱ्याच ठिकाणी फिरलोय, स्थानिकांशी अजूनही संपर्कात आहे. तसेच इतर अभ्यासाच्या आधारावर मूळ पोस्ट लिहिल्येय. सध्याच्या अशांततेच्या, दंग्याच्या, गोळीबाराच्या, पॅलेट गनच्या कमरेच्या वर चालवण्याच्या अनेक स्टोरीज आंतरजालावर आहेत. बहुतेकवेळा कॅमेरा सैन्याच्या (बाजूने) समोरील आंदोलकांचे चित्रण करतो. या चित्राची दुसरी बाजूसुद्धा आहेच. दहशतवादाचे पीक पेरण्यासाठी जमिनीची मशागत भारतीय सैन्यदले पाकिस्तानला फुकटात करून देतायत, असे चित्र आहे. बाकी टवाळखोरांचे सगळे मटेरिअल साभार परत.

In reply to by संदीप ताम्हनकर

वटवट 23/07/2016 - 17:57
आयला... अजित डोवाल आणि आरएसेंस संबंध.... नवीनच ब्वॉ... (दादा.. दुसर्या बाजूचेपण व्हिडीओ उपलब्ध आहेत... जमल्यास ते बघा...) असो... पण एक खरंय... तुमच्यासारखे विचारवंत असतील तर आर्मी काही फार चांगले करू शकेल असे वाटत नाही.... खेद ह्याच गोष्टीचा आहे कि तुमच्या काश्मीरमधल्या वास्तव्यात काश्मिरी पंडितांना कधी भेटू वाटलं? त्याबद्दल लिहायचा प्रयत्न करा.. आणि जमल्यास आर्मीमधल्या लोकांशी पण बोला जे तिथे आहेत... साली ही देशातली कीड आधी संपली पाहिजे. बाहेरचे लोक मारणे खूप सोपे... पण हे असले साप.... अतिभयंकर... (खरं तर मी एव्हढं भडक कधीच बोलत नाही... पण वस्तुस्तिथीचे योग्य आकलन नं करता जर कोणी अकलेचे तारे नां..... सटकते राव...)

In reply to by संदीप ताम्हनकर

अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे काय? ह्याचे उत्तर दिलेत तर उपकृत होईन ताम्हनकर साहेब, दुसरे म्हणजे, माझा रास्वसंघ विरोध हा मिपावर बरेच जणांना माहिती आहे, त्याला माझी काही वैयक्तिक कारणे आहेत, अन ती बदलावीत असे सकारात्मक संघाने राजकीय आघाडीवर काही केलेले मला आजवर दिसलेले नाही, पण तो भाग वेगळा, ते तुमच्यासमोर मी सिद्ध करावे ही ऑथॉरिटी मी वैयक्तिकरित्या तुम्हाला देत नाहीये, अजून जर विषय संबंधित बोलायचे झाले तर डोवल हे रास्वसंघसंलग्न आहेत हे मला माहिती होते/आहे, पण फक्त ते संघ संबंधित होते म्हणुन त्यांची इंटेलिजन्स ब्युरो मधील कारकीर्द जर तुम्ही नाकारत असाल किंवा त्याची हुर्यो उडवत असाल तर संघडले अन तुमच्यात फरक तो काय उरणार न? की मग १. तुम्ही स्वतः आयबी मध्ये नोकरी करत होतात म्हणून तुम्हाला डोवल ह्यांचे उदात्तीकरण माहिती आहे? २. का ते फक्त संघाशी संबंधित होते म्हणून त्यांचे मीठ तुम्हाला अळणी आहे? उरता उरला काश्मीरचा प्रश्न तर, माझ्या नोकरीत (मला दरवेळी उल्लेख करायला आवडत नाही तरीही) अर्धसैनिकबल असलेल्या एका संघटनेचा एक अधिकारी म्हणून माझ्या पाहणीत आलेले अनुभव हे भयानक अन अतिशय सेन्सिटिव्ह श्रेणीतील असल्यामुळे मी ते इथे मांडू शकत नाहीये, फक्त टाळी एका हाताने कधीच वाजत नसते इतके सांगतो. पटले तर घ्या नाहीतर आम्हालाही गाढवात काढा :)

In reply to by संदीप ताम्हनकर

श्रीगुरुजी 24/07/2016 - 14:36
'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल' - हे मी लिहिलेले नाही. अशा पोस्ट समाजमाध्यमातून जोरात फिरत आहेत. कोण पुढे पाठवतं ते सगळे जाणतातच.
यात काही सत्य आहे का नाही हे समजण्याएव्ढी तुम्हाला बुद्धी आहे का नाही? इथे ते टाकण्याआधी सारासार विचार केला होता का? कशाला इतरांच्या आड लपता? मी कायअप्पावर अनेक गटांचा सदस्य आहे. असली पोस्ट आजतगायत कोणत्याही ग्रुपवर आलेली नाही. या असल्या उपसाहात्मक पोस्ट्स तुमच्यासारख्या निधर्मांधांच्या डोक्यातून बाहेर पडत असतात.
प्रत्यक्ष रस्त्यावर जे सैन्य असते ते एवढ्या बौद्धिक क्षमतेचे असते का? आणि सैन्याला विशेषाधिकार दिले की त्याचा अतिरेक होतो ही जगभरातील वस्तुस्थिती आहे. भारतात अनेक राज्यात १९५८ पासून आफ्स्पा लागू आहे, त्या मणिपुरी मानवाधिकार कार्यकर्त्या आरोम चानू शर्मिला गेली अनेक वर्षे सत्याग्रह करतायत तो का आणि कसा ते जरा वाचा. काश्मिरी उपास करत नाहीत तर दगड फेकतात.
अत्यंत निर्बुद्ध वाक्य! अतिरेक्यांशी, दंगलखोरांशी लढायला सैन्य पाठवितात ते काय निर्बुद्ध सैनिक असतात का? भारतात फक्त काश्मिर, मणिपूर इ. मोजक्या ठिकाणीच सैन्य का आहे व सैन्याला विशेषाधिकार का द्यावा लागला आहे हे समजण्याइतकी बुद्धी आहे का? सैन्याला विशेषाधिकार दिले की त्याचा अतिरेक होतो म्हणे. सैन्याने काय आणि किती वेळा अतिरेक केला? काश्मिरमध्ये आणि देशात इतरत्र एके ४७ आणि ग्रेनेड्स घेऊन अतिरेकी हल्ले करतात, गोळ्या घालून व बॉम्बस्फोट करून निष्पापांना जीवानिशी मारतात, काही जणांना जन्माचे अपंग करतात, या क्रूर नरभक्षक जनावरांना काही स्थानिक लोक पाठिंबा देतात, लहान मुलांच्या आडून सैन्यावर दगडफेक होते, जमावात मागे उभे राहून सैनिकांच्या दिशेने ग्रेनेड फेकतात, त्यात सैनिक जखमी होतातच पण जमावात पुढे असलेली लहान मुलेही जखमी होतात, एका पोलिसाला जमावाने घेरून मारहाण करून त्याचे डोळे फोडले, अजून एका पोलिसाला जमावाने त्याच्या वाहनासकट नदीत फेकून दिले . . इ. क्रूर कृत्यांबद्दल चकार शब्द नाही. ही कृत्ये होत असताना सैन्याने काय गुलाबाची फुले वाटून शांततेचे आवाहन करायचे का? अशा कृत्यांना विरोध करून अतिरेक्यांशी लढताना सैन्याला जे जे करावे लागते ते क्षम्य आहे. त्यात कोणताही अतिरेक नाही. अतिरेक वाटत असला तर तो होणारच. संचारबंदी जाहीर झालेली असून रस्त्यावर अतिरेक्यांशी लढण्यासाठी सैन्य असताना अतिरेकी बुर्‍हान वाणीच्या मृत्युचा निषेध करण्यासाठी संचारबंदी मोडून रस्त्यावर उतरलेल्या व सैनिकांवर व पोलिसांवर हल्ले व दगडफेक करणार्‍या वाणीच्या समर्थकांना आपल्या दुष्कृत्यांची शिक्षा भोगावी लागणारच. बुर्‍हान वाणी हा काही साधुसंत नव्हता. तो अतिरेकी होता आणि त्याच्या समर्थनासाठी संचारबंदी असतानाही रस्त्यावर उतरलेले सुद्धा साधुसंत नव्हते. ते घराबाहेर पडले नसते तर बाकी प्रश्न उद्भवलेच नसते.
श्री डोवाल यांची काशिरातील कामगिरी काय हे अजून समोर यायचंय. तोपर्यंत संघ परिवारातला माणूस म्हणून ज्यांना त्यांच्या आरत्या करायच्यात त्यांनी जरूर कराव्या.
अत्यंत बेताल वाक्य. डोवाल संघ परिवारातले कधीपासून झाले? ते १९८४ च्या आधीपासून कार्यरत आहेत. त्यांच्या कोणीही आरत्या ओवाळत नाही. ते आपके काम करताहेत. ते संघ परिवारातले आहेत म्हणून त्यांच्या आरत्या केल्या जाताहेत हे अत्यंत मूर्खपणाचा आरोप आहे.
काश्मिरात पाक पुरस्कृत अशांतता आणि दहशतवाद आहे यात कोणाचेच दुमत नाही. प्रश्न कसे हाताळावे हा मुद्दा आहे. केवळ सैन्याच्या बळावर काश्मीर प्रश्न सोडवता येईल असे वाटणारे मुर्खांच्या नंदनवनात वावरतायत हे नक्की. याबाबत अतिराष्ट्रवाद्यांचा अभिनिवेश हास्यास्पद आहे. अश्याने खरे नंदनवन हातातून निसटून जाईल. आर्मीने, अर्ध-सैन्यबलांनी केलेले अत्याचार आणि बळाचा अतिरिक्त वापर यावरही बरेच मटेरिअल आंतरजालावर उपलब्ध आहे.
सैन्याला व सरकारला एकवेळ नसेल कळत काश्मिर प्रश्न कसा हाताळायचा ते, पण तुम्हाला आहे का अक्कल काश्मिर प्रश्न हाताळायची? असली तर सैन्याला व सरकारला जाऊन सांगा. तुम्हाला इथे बसून समजतंय का काश्मिर प्रश्न कसा हाताळायचा ते. आंतरजालावर बरेच काही असते. ते काय सगळे खरे असते का? अतिरेक्यांनी केलेल्या निष्पापांच्या हत्या, सौरभ कालिया सारख्या पकडलेल्या सैनिकांचे लिंग कापून केलेले हालहाल, भारतीय सैनिकांची कापलेली मुंडकी इ. सुद्धा बरेच मटेरिअल आंतरजालावर आहे. ते वाचलंय का? बुर्‍हान वाणीसुद्द्धा आंतरजालाच्या माध्यमातून लोकांना भडकावत होता. इसिस आणि जाकीर नाईक सुद्धा आंतरजालाच्या माध्यमातून लोकांना भडकावतात.
मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने, स्वताः गाडी चालवत बऱ्याच ठिकाणी फिरलोय, स्थानिकांशी अजूनही संपर्कात आहे. तसेच इतर अभ्यासाच्या आधारावर मूळ पोस्ट लिहिल्येय.
काश्मिरात सैन्य नसते तर पहिल्याच भेटीत पैगंबरवासी झाला असता हे लक्षात येतंय का? का स्वतःला जेम्स बाँड समजता? सैन्यामुळेच तिथे ३-३ वेळा निर्वेध फिरू शकलात आणि त्याचमुळे इथे येऊन मूर्खासारख्या पोस्ट्स टाकू शकलात याची जाणीव आहे का? ३ वेळा काश्मिरात फिरून सुखरूप परत आलात याचे श्रेय सैन्याला देऊन कृतज्ञ राहण्याऐवजी कृतघ्नपणे सैन्यावरच दुगाण्या झाडताना शरम कशी वाटत नाही?
सध्याच्या अशांततेच्या, दंग्याच्या, गोळीबाराच्या, पॅलेट गनच्या कमरेच्या वर चालवण्याच्या अनेक स्टोरीज आंतरजालावर आहेत. बहुतेकवेळा कॅमेरा सैन्याच्या (बाजूने) समोरील आंदोलकांचे चित्रण करतो. या चित्राची दुसरी बाजूसुद्धा आहेच.
सैन्यावर व पोलिसांवर हल्ले होत असताना जगातील कोणतेही सैन्य हात बांधून स्वस्थ बसणार नाही. गोळीबारात जे लोक जखमी झाले आहेत ते स्वतःच्या चुकीमुळे जखमी झालेले आहेत. संचारबंदी सुरू असताना त्यांनी घरात बसणे अपेक्षित आहे. ते न करता मेलेल्या अतिरेक्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर येऊन सैन्यावर हल्ले करण्याची ही किंमत द्यावी लागत आहे. सैन्याच्या गोळ्या खायच्या नसतील तर संचारबंदी सुरू असताना घरात बसा किंवा रस्त्यावर आलात तर शांततेने निदर्शने करा. पोलिसांवर व सैनिकांवर हल्ले केलेत तर प्रत्त्युत्तर मिळणारच.
दहशतवादाचे पीक पेरण्यासाठी जमिनीची मशागत भारतीय सैन्यदले पाकिस्तानला फुकटात करून देतायत, असे चित्र आहे.
परत एकदा मूर्खपणा. पाकिस्तान हा सुरवातीपासून दहशतवादी निर्माण करणारा देश आहे. जगातल्या अनेक देशात, जिथे भारतीय सैन्याचा काहीही संबंध नाही, त्या देशात सुद्धा पाकिस्तानने दहशतवादी हल्ले केलेले आहेत. भारतात सुरू असलेल्या दहशतवादाचे खापर भारतीय सैन्यावर फोडणे हा पराकोटीचा मूर्खपणा आहे.
बाकी टवाळखोरांचे सगळे मटेरिअल साभार परत.
तुम्ही कोणाचेही मटेरिअल साभार परत करा. तो तुमचा प्रश्न आहे. पण अत्यंत बेताल व मूर्खपणाचे लेख लिहिणार्‍या तुमच्या सारख्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 24/07/2016 - 15:07
धन्यवाद! मूळ लेख वाचल्यावर निधर्मांधांची नेहमीचीच मतलबी आरडाओरड अशी समजूत करून दुर्लक्ष केले होते. परंतु लेखकाचा नंतर आलेला प्रतिसाद वाचल्यावर संताप आला आणि म्हणून प्रतिसाद दिला.

In reply to by श्रीगुरुजी

100 टक्के सहमत हा देश या देशावर प्रेम करणाऱ्या आणि देशाला आपले मानणाऱ्या सगळ्यांचा आहे मग तो कुठल्याही जात, धर्म, वय, पंथ, विचारधारेचा असो आणि त्याचे जर देशावर प्रेम नसेल, तर तो कुठल्याही जात धर्म पंथाचा असेल तरी तो देशद्रोही च आहे

In reply to by संदीप ताम्हनकर

भंकस बाबा 25/07/2016 - 13:10
तुम्ही अरुन्धती रॉयचा चश्मा वापरता काय? काश्मिरी पण्डिताचा उल्लेख टाळून लेख पाडलाय म्हणुन विचारले. काश्मिरी जनतेची फारच कीव आलेली दिसत आहे तुम्हाला, काय उद्योगधंदे आहेत हो यांचे. आज सेनेच्या नियंत्रणामुळे कश्मीर दिल्ली आणि पाकिस्तानमधे बफर स्टेट बनून राहिलय , नाहीतर आज जसे अफगनिस्तानात हल्ले होत आहेत ते पार जम्मू , पंजाब , दिल्ली पर्यन्त पोचले असते. आमचे राजनाथसिंग भले सर्टिफिकेट देत फिरतील की भारतीय मुस्लमान आईएससारख्या अतिरेकी संघटनेची कास नाही पकडणार, मग आता ही कनेक्शन निघत आहेत ती काय भारतीय गुप्तचर विभागाची कारस्थानं आहेत? काश्मीरबाबत तुर्तास इतकेच बोलू शकतो की 'नजर हटी तो दुर्घटना घटी' रच्याकने ते काश्मिर हिंसाचाराचे अगदी पब्लिकमधुन काढलेल्या क्लिप्स बघितल्या आहेत.

In reply to by संदीप ताम्हनकर

विनोद१८ 25/07/2016 - 14:24
... प्रत्यक्ष रस्त्यावर जे सैन्य असते ते एवढ्या बौद्धिक क्षमतेचे असते का ? असा प्रश्ण विचारुन तुम्ही आपल्याच देशाच्या सैन्याला कमी लेखताय व त्यांचा अपमान करताय याचे जरा भान ठेवा. भारतीय सैन्याचा इतिहास काय व कसा आहे याविषयीचा तुमचा अभ्यास शुन्य दिसतोय म्हणुन आपल्याला असलेल्या लिहिण्याच्या स्वातंत्र्याचा असा दुरुपयोग करताय. तुम्ही या दुव्यावर ( https://www.facebook.com/Presstitues/videos/1239597949407107/ ) जा म्हणजे तुमच्या प्रश्णांची उत्तरे तुम्हाला मिळतील. ह्या सैनिकाच्या प्रश्णावर उत्तर द्या किंवा स्वता गणवेश घालुन एक सैनिक म्हणुन एकदाच काश्मिरला जाउन या म्हणजे मग समजेल घरी बसुन मिपावर कळफलक बडवुन जिल्ब्या टाकणे व तिकडे काश्मिरात एक सैनिक म्हणुन रस्त्यावर ठामपणे उभे राहुन आन्दोलकांचे दगड खाणे यातला फरक. ... मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने, स्वताः गाडी चालवत बऱ्याच ठिकाणी फिरलोय, स्थानिकांशी अजूनही संपर्कात आहे. तसेच इतर अभ्यासाच्या आधारावर मूळ पोस्ट लिहिल्येय. म्हणजे काश्मीरचा प्रश्ण आपल्याला जितका समजला तितका तो इतर कुणालाच समजला नाही अस तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. 'मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने जाउन आलोय' म्हणजे तो केवळ मलाच समजला असा तुमचा समज झालेला दिसतोय. जे इतर तिकडे आपल्या गाड्या घेउन जात नाहीत त्यांना त्यातले काहीच कळत नाही, समजला तो केवल मला आणि मलाच असा तुमचा एकुण अभिनिवेश दिसतोय ह्या वाक्यातुन. आता भारत सरकारने काश्मिरचा तुमचे मार्गदर्शन घेउन सोडवावा असे तुम्हाला सुचवायचे आहे का ?? फक्त एकच सांगा ही जिलबी तुम्ही कोणत्या उद्देशाने / हेतुने इथे टाकलीत ?? ह्या लेखातुन तुम्हाला कोणाबद्दल नेमके काय सुचवायचे आहे ??

In reply to by संदीप ताम्हनकर

एवढा प्रचंड काळ कोणत्याही प्रदेशात 'आस्फा'सारखे कायदे लागू असणं अमानुष आणि असं‌वेदनशील वाटतं. हा तुमचा मुद्दा आधीच पटलेला आहे, पण लेख आवडला असं म्हणवत नाही; मतं काय हे नीट न समजल्यामुळे मतांशी सहमती असंही म्हणवत नाही. अशासारख्या लेखनात जर उग्र भाषा वापरायची असेल तर त्यात विनोदी तिरकस-खवचटपणा असावा किंवा सरळ, साध्या भाषेत लिहावं. इतरांची उद्धृतं देताना तसा स्पष्ट उल्लेख हवा. अन्यथा अजित डोवालांना जेम्स बाँड म्हणण्याबद्दल जसे गैरसमज झालेले आहेत तसे होतात. पुलेशु

अन हो, एक राहिलेले म्हणजे, एखादा मनुष्य आर्मीची बाजू घेतोय म्हणजे तो संघिष्ट असला पाहिजे असा तुमचा ग्रह असल्यास तो तात्काळ डोक्यातून काढून टाकावा आपण, ही नम्र विनंती, आर्मी कोणाचीच नसते पण सगळ्यांसाठी असते, जमल्यास एखादी चक्कर एखाद्या बटालियनच्या एमएमजी स्थल उर्फ मंदिर मस्जिद गुरुद्वारा स्थलला नक्की द्या!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सैन्य कोणाचंही (राजकीय विचारधारेचं) नसतं, नसावं हे मान्यच. तसे सावरकर, भगतसिंग, सरदार पटेल हे लोकही संघाचे नव्हते, पण मरणोपरान्त त्यांचं संघीकरण झालेलं आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टीही संघ (आणि संघाच्या भावंडांनी) पळवायला आणि त्यावर जणू आपलाच अधिकार आहे असं म्हणायला सुरुवात केलेली आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

संदीप डांगे 25/07/2016 - 21:51
जसं की...?? म्हणजे सरदार पटेल, भगतसिंग, सावरकर हे संघाचेच झाले हे केव्हापासून मानायला लागलात आपण? तसेच राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टी संघाने कुठून पळवल्या तेही सांगावे. काँग्रेसने गांधीघराण्याचा उदो उदो करण्यापासून थोडी सवड काढली असती तर उपरोल्लिखित किमान दोन महापुरुषांना असं ह्याचं त्याचं झाले म्हणायची सोय राहिली असती का? किमानपक्षी भारतीय जनता ह्यावेळी असे काही मानते का? डाव्यांचे राष्ट्रप्रेम जगजाहिर आहे. डाव्यांकडून राष्ट्रवाद पळवला असे म्हणायचे असेल तर तो त्यांच्याकडे केव्हा होता हे ही कळावे? मी बालक अज्ञानी आहे, माझी समज-आकलन अर्थातच तुमच्या सारख्या दिग्गजांपेक्षा फारच कमी आहे. त्यास्तव तुमच्या विधानांचे स्पष्टीकरण मागण्याची जुर्रत करत आहे. उत्तरे मिळतील अशी अपेक्षा करतो. कारण तमाम भारतीयांचे आदराचे, श्रद्धेचे, राष्ट्राभिमानाचे प्रतिक जर 'ह्याचे झाले त्याचे झाले' असे आपण बोलत असाल तर मजसारख्या सामान्य भारतीयाचे मन विचलित होते. ते होऊ नये, बुद्धीभेदाचे डावपेच दोन्ही बाजूंकडून अजिबात सफल होऊ नयेत असे मजसारख्याला वाटते, तस्मात हा प्रतिसादप्रपंच...

In reply to by संदीप डांगे

मी बालक अज्ञानी आहे, माझी समज-आकलन अर्थातच तुमच्या सारख्या दिग्गजांपेक्षा फारच कमी आहे.
अय्या, मी पण हेच लिहायला आले होते! असो. १. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टी संघाने कुठून तरी पळवल्या => म्हणजे त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, २. काँग्रेसने सरदार पटेल, भगतसिंग, सावरकर ह्यांच्यापैकी कोणीतरी दोन लोकांची व्यक्तीपूजा करायला हवी होती ३. संघिष्ठ नाहीत म्हणजे डावेच असं काही तुम्ही समजता असं मला समजलं. असं समजत नसाल तर माझ्या आकलनातली चूक. मी आळशी बाई आहे आणि रिअॅक्शनरी लिहिण्याचा हल्ली खूप कंटाळा येतो. तुमचे विचार समजले. उत्तराबद्दल आभार.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

संदीप डांगे 26/07/2016 - 18:32
मला काय समजलं नाय समजलं किंवा तुम्ही आळशी आहात किंवा तुम्हाला कंटाळा येतो हा विषय तुर्तास बाजूला असू देत. निम्नलिखित आपलीच विधाने आहेत. सावरकर, भगतसिंग, सरदार पटेल हे लोकही संघाचे नव्हते, पण मरणोपरान्त त्यांचं संघीकरण झालेलं आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टीही संघ (आणि संघाच्या भावंडांनी) पळवायला आणि त्यावर जणू आपलाच अधिकार आहे असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. हे आपण कोणत्या आधारावर, संदर्भासहित लिहिले आहे तेवढं फक्त विचारलंय मी. तुमच्यासारख्या दिग्गजांनी असले विचार ठेवले म्हणजे नक्की काहीतरी आधार असेलच अशी मज भाबड्या पामराची समजूत होती. अन्यथा तत्सम पिंका टाकायला दोन रुपयाचा मावाही खायला लागत नाही असे निरिक्षण आहे. बाकी 'संघिष्ठ नाहीत म्हणजे डावेच' असलं काहीही मी तरी म्हटलेलं नाही. तसं असतं तर तुमच्या प्रतिसादाला फाट्यावर मारुन पुढे गेलो असतो. पण डावेही नाही किंवा संघिष्ठही नाही म्हणून काहीही लिहायचे व त्यावर कोणी स्पष्टीकरण मागितले तर आळसाचे किंवा कंटाळ्याचे सोयिस्कर पळपुटेपणाचे कारण द्यायचे हे काही पटलं नाही, बघा आता कसं ते..?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यातील खरी गंमत ही आहे - सैन्य कुठल्याही विचारधारेच नसाव असे तुम्ही म्हणता पण त्याच वेळी सैनिकांना मतदानाचा हक्क असतो हे विसरता. सैनिक शेवटी माणूसच असतो आणि त्यालाही राजकीय विचारधारा असते. हे खरे मानले तर सैन्य कोणत्याही विचारधारेचे नसते असे म्हणणे जरा धाडसाचे होईल. हां सध्या बर्‍यापैकी समतोल आहे असे म्हणता येईल पण तो तसाच राहील असे मानणे भाबडेपणा होईल.... :-) राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम या भावना कोणीही भारतीयांनी पळवाव्यात व त्यावर अधिकार सांगावा या मताचा मी आहे.... :-)

@आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? ››› लेखक महोदय, आपणास अकाली दीर्घजीवी मती-मंदत्व प्राप्त झालेले आहे... असा निर्वाळा देऊन , मी माझे वाक्य संपवितो.

डँबिस००७ 23/07/2016 - 22:12
काश्मिरात पाक पुरस्कृत अशांतता आणि दहशतवाद आहे यात कोणाचेच दुमत नाही. प्रश्न कसे हाताळावे हा मुद्दा आहे. अरे मग ६० वर्ष काय करत होते, सरकार आणी लोक ? जम्मु आणी कश्मिर सरकारच्या जोरावर ३ लाख काश्मिरी पंडीतांना काश्मिर मधुन रातोरात हाकलले गेले , कित्येक पंडित त्यांच्या बायकांना आपला जीव हकनाक गमवावा लागला, कित्येक बायकांना शिकार केले गेले त्यावेळेला केंद्र सरकारने हा प्रश्न कसा काय हाताळला ? त्यावेळेला सैन्य नव्हत ? का हिंदु पंडीत मरताहेत मग मरु दे, म्हणुन काँग्रेस सरकारला काहीच करावस वाटल नाही ?

In reply to by डँबिस००७

प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे/राहणे हा आहे की, काश्मिरी पंडित?? काश्मिरी पंडित ह्या मुद्द्यावर आमचे मत आमचे अत्यंत लाडके नेतृत्व अन इलिनॉइस राज्यातले धडाडीचे लोकाभिमुख नेते, स्प्रिंगफिल्ड खुर्दचे अब्राहमदादा लिंकन म्हणत असत तसे आहे "सगळे गुलाम मुक्त करून, सगळे गुलाम गुलाम ठेऊन, गुलामगिरी नष्ट करून, अबाधित ठेऊन, काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" ह्यात गुलाम शब्द काढून पंडित, सुन्नी, मुसलमान, दलित, ब्राह्मण, शीख, तामिळ काय वाटेल ते भरा! For, the union must persist :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाप्पूसाहेब! या प्रतिसादाची प्रिन्टऔट काढून रोज नजरेपुढे राहावी अशी व्यवस्था करावी म्हणतो. बाकी, तुमच्या संतुलित प्रतिसादासाठी तुम्हाला एक काहवा, एक पटियाला लस्सी, एक बैदा पाऊच, एक प्लेट फरसाण, एक प्लेट सोँदेश,एक म्हैसूर डोसा, एक बिसिबेल्ली भात अन एक चेट्टीनाड चिकन!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पुंबा 26/07/2016 - 14:22
बापू, तुमचे सारे प्रतिसाद संतुलीत आणि अत्यंत प्रगल्भ आहेत. त्यांच्यामुळे अनेक प्रश्नांचा सांगोपांग विचार करता आला. धन्यवाद. प्रस्तुत धागालेखकाने सांगितलेली पुण्याची घटना ठाऊक नाही परंतू अशाच प्रकारची घटना नाशीकला घडली होती. तिथे अ‍ॅकॅडमीत शिकणार्या आर्मी कॅडेटसच्या १००-१५० जनांच्या टोळक्याने सबंध पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केली होती त्यात बरेच पोलीस जखमीदेखील झाले होते आणि त्यंच्यावर कसलीही कारवाई झाल्याचे नंतर वाचले नाही(झालेली असू शकते, ठऊक नाही.). मला असे विचारायचे आहे की अश्या घटना घडल्यानंतर या विद्यार्थ्यांवर काही कारवाई होऊ शकते का? किंवा पोलीसांवर हात उचलला असे चार्जेस लावून खटला चालवला जातो का? सैन्यात जाण्याच्या आधीच विद्यार्थी ईतक्या मुजोरपणे कायद्याला न जुमानता मनमानी करु शकतात हे सैन्याचे(किंवा एकूनच आपल्या समाजाचे आणि कायद्यांचे) अपयश वाटते मला. इथे काश्मीरबद्दल आजीबातच भाष्य करायचे नाही तिथे अफस्पा सारख्या कायद्यांची गरज आहेच.

प्रश्न कश्मीर भारतात ठेवणे/राहणे हा आहे की, काश्मिरी पंडित?? काश्मिरी पंडित ह्या मुद्द्यावर आमचे मत आमचे अत्यंत लाडके नेतृत्व अन इलिनॉइस राज्यातले धडाडीचे लोकाभिमुख नेते, स्प्रिंगफिल्ड खुर्दचे अब्राहमदादा लिंकन म्हणत असत तसे आहे "सगळे गुलाम मुक्त करून, सगळे गुलाम गुलाम ठेऊन, गुलामगिरी नष्ट करून, अबाधित ठेऊन, काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" ह्यात गुलाम शब्द काढून पंडित, सुन्नी, मुसलमान, दलित, ब्राह्मण, शीख, तामिळ काय वाटेल ते भरा! For, the union must persist :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

विटेकर 25/07/2016 - 12:42
टाळ्या आणि वंदन सुद्धा ! परवा श्री अजित डोवल पुण्यात बोलाताना नेमेके हेच म्हणाले. राष्ट्र हे पिढ्या- पिढ्यांचे असते , सरकार येते आणि जाते देखील !

सुधीर काळे 23/07/2016 - 23:08
असले लेख लिहायला आपल्याला आपल्या भारतदेशात मुभा आहे हीच आपल्या राष्ट्राच्या राज्यघटनेची थोरवी आहे असे मी समजतो. आपल्या सरकारबद्दल, सैन्याबद्दल जर कांहीं चांगले लिहिता येत नसेल वा लिहायचे नसेल तर गप्प बसावे, विरोधात लिहून आणखी आग भडकवू नये! आपल्याला भाषण व लेखनस्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेने दिले आहे ते वापरावे. फलिहिलेलीमी नुकतीच लिहिलेली माझी पोस्ट वाचावी हीच नम्र विनंती. तो लेख बराच लांब आहे व इंग्रजीमध्ये आहे म्हणून इथे पूर्ण देत नाहीं. पण तो वाचावा अशी मी ताम्हनकर-जींना विनंती करतो.

सुधीर काळे 23/07/2016 - 23:14
असले लेख लिहायला आपल्याला आपल्या भारतदेशात मुभा आहे हीच आपल्या राष्ट्राच्या राज्यघटनेची थोरवी आहे असे मी समजतो. आपल्या सरकारबद्दल, सैन्याबद्दल जर कांहीं चांगले लिहिता येत नसेल वा लिहायचे नसेल तर गप्प बसावे, विरोधात लिहून आणखी आग भडकवू नये व आपल्या सेनादलाच्या मनोधैर्यावर घाव घालू नयेत! आपल्याला भाषणस्वातंत्र्य व लेखनस्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेने दिले आहे ते जरूर वापरावे पण गैरवापर करू नये. फेसबुकवर मी नुकतीच लिहिलेली माझी पोस्ट वाचावी हीच नम्र विनंती. ही पोस्ट बरीच लांब आहे व इंग्रजीमध्ये आहे म्हणून इथे पूर्ण देत नाहीं. पण ती वाचावी अशी मी ताम्हनकर-जींना विनंती करतो.

In reply to by सुधीर काळे

ती घटना, हिंदुराष्ट्र म्हणून नाही तर

सोवरीन सोसिअलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इंडिया

म्हणून लिहिली गेली आहे, आता ह्या वर उल्लेखलेल्या भारताच्या अधिकारीक नावातील बहुतेक शब्द आपणाला खटकत असतील तर तो आपला प्रश्न आहे, त्याला उत्तर म्हणून प्राचीन शिल्पकलेचे अविष्कार असणारी मंदिरे आपण पेढे अन ऑइल पेंट फासून विकृत करतो तसे घटनेवर अमुक एक रंग मारून विकृत करणे मी वैयक्तिकरित्या निषेधार्ह मानतो :)

पिनाक 24/07/2016 - 01:10
ताम्हनकर, 1. सैन्याला विशेषाधिकार दिल्यानं ते त्याचा अतिरेक करत असतील तरी सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. 2. काश्मीर ची जमीन आमचं सरकार कधीही सोडणार नाही. त्यासाठी कितीही काश्मिरी मुसलमानांना ठार मरावं लागलं तरी ते केलं जाईल. 3. सैन्य विरुद्ध बोलणाऱ्या इथल्या अस्तनीच्या निखाऱयांना एक तर एन्काउंटर करून संपवलं जाईल किंवा अगदीच शक्य नसेल तर "आत" घातलं जाईल. 4. सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल त्याची अर्थातच आम्हाला काही पर्वा नाहीये. 5. "अपरिपकव", "हास्यास्पद" वगैरे काहीही बोललं तरी जमिनीवरची परिस्थिती बदलत नाही. सरकार, सैन्य आणि भारताची जनता अचानक केलेल्या या कटानं गोंधळून गेली होती. पण आता सरकार सावरलं आहे, सैन्यानं पुन्हा परिस्थिती चा ताबा घेतला आहे आणि भारताची जनता भक्कम पणे सरकारच्या पाठीशी उभी आहे. आता काश्मिरी मुसलमानांचा बदला घेतला जाईल आणि जाईलच. आता दहशत वादयांच्या नावे बांग दे किंवा सैन्याच्या नावानं शिमगा कर पण त्या पेलेट्स मध्ये जे जखमी झालेत त्यांना सैन्य शोधेल आणि मग ठोकेल.

In reply to by पिनाक

ओ साहेब, उगाच कट्टरपणा इज द न्यू कुल सिद्ध करायला काय वाटेल ते बोलू नका हो, आपण आर्मी सारख्या एका इंस्टिट्यूशन वर शिंतोडे उडवत आहात ह्याचे भान असू द्या, अन काय मुसलमानांचा बदला वगैरे लावले आहे मालक? आपली विकृती सैन्याच्या आडून आडून नका प्रदर्शित करू, उगाच काहीही लिहू नका ही विनंती

In reply to by पिनाक

ताम्हनकर साहेब, आपला प्रतिसाद "भारतिय सैन्याला पाठिंबा देणे किंवा त्याच्या उत्तम कामाची भलावण करणे" हे तर करत नाहीच पण; सैन्याने काय करावे याबाबत लेखकाचा अतिरेकी अजेंडा सैन्याच्या नावावर खपवून "शिस्तबद्ध आणि संयमित भारतिय सैन्याच्या किर्तीला डाग लावण्याचा विनोदी प्रयत्न" करणारा आहे. हे जर तुमचे खरोखरचे मत असेल तर... आपण या विषयावरचा आपला अभ्यास वाढवणे खूsssप जरूरीचे आहे !

In reply to by पिनाक

शाम भागवत 24/07/2016 - 14:39
नेहरूंनी शेख अब्दुलांना गजाआड ठेवले होते तोपर्यंतच काश्मिरमधे शांतता नांदत होती. इंदिरा गांधीनी त्यांना मुक्त केले नसते तर आजही तिथे शांतता नांदत राहिली असती. काश्मिर पंडीतांची समस्या उभीच राहीली नसती. जिथे खूप सावध राहायला पाहिजे तिथेच नेमका विश्वास ठेऊन गाफील रहावयाची (पृथ्विराज चौहानापासून लागलेली) भारतीयांची खोड कधी जाणार आहे कोणास ठाऊक.

साती 24/07/2016 - 11:13
तुम्हाला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत्येय. दोन्ही बाजूंच्या अतिशयोक्त दावे आणि विधानांचा आपण अत्यंत संयमाने समाचार घेत आहात. हे पाहून तुमच्याविषयी असलेला आदर दुणावला आहे. तुमचे अनेकानेक आभार!

In reply to by साती

राही 24/07/2016 - 14:00
खरोखर. सोन्याबापू नेहमीच अतिरेक टाळून वस्तुस्थितीनिदर्शक विधानं करीत असतात. आणि वस्तुस्थिती त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या तर्‍हेने इथे दुसरं कोण जाणणार?

तिमा 24/07/2016 - 14:40
खरे वास्तव हे आहे की, जनमतचाचणी घेतली तर काश्मीर दुसर्‍या दिवशी स्वतंत्र होईल आणि तिसरा दिवस उगवायच्या आंत, कायमचे पाकिस्तानच्या ताब्यात जाईल. शिवाय दहशतवाद थांबणार नाहीच तो अन्य भारताच्या आणखी जवळ येईल.

In reply to by तिमा

श्रीगुरुजी 24/07/2016 - 15:42
हे खरे नाही. जम्मू-काश्मिरने भारतातच रहायचे का पाकिस्तानात जायचे का स्वतंत्र देश म्हणून रहायचे या तीनपैकी एकाही पर्यायाला स्थानिक जनतेचा पुरेसा निर्णायक पाठिंबा नाही असे २०१३ साली चॅथम हाऊस या इंग्लंडमधील प्रसिद्ध संस्थेने केलेल्या एका जनमत चाचणीत दिसून आले आहे. या सर्व तीन पर्यायांना ५०% पेक्षा कमी जनतेने पाठिंबा दिलेला आहे. यापैकी कोणत्याच पर्यायाला ५०% किंवा अधिक मते मिळू शकलेली नाहीत. तसेच यावरील जनमत वेगवेगळ्या विभागानुसार वेगळे होते हेही दिसून आले आहे. काश्मिरमध्ये जनमत घेऊन निर्णय घेणे हे जवळपास अशक्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९४८ च्या ठरावानुसार भारतीय काश्मिर व पाकव्याप्त काश्मिर अशा दोन्ही भागातून दोन्ही देशांनी सैन्य काढून घेणे ही सार्वमताची पूर्वअट आहे. दोन्ही देश ही अट पाळणे अशक्य आहे. त्यामुळे सार्वमत घेता येणार नाही. हा ठराव १९४८ चा होता. त्यानंतर ६८ वर्षे उलटून गेली आहेत. त्यावेळची परिस्थिती आता पूर्ण बदलली आहे. त्यामुळे १९४८ चा ठराव आता जसाच्या तसा अंमलात आणणे अशक्य आहे. यासाठीच काही वर्षांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाने हा ठराव बॅकबर्नरवर टाकलेला आहे. काश्मिर मध्ये श्रीनगर खोरे, जम्मू व लडाख हे तीन वेगवेगळे भाग आहेत. श्रीनगरमध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. जम्मूमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत व लडाखमध्ये बौद्ध मोठ्या प्रमाणात आहेत. फुटिरतावादाला पाठिंबा मुख्यत्वेकरून श्रीनगरच्या खोर्‍यातून मिळतो. जम्मू व लडाखमध्ये फुटिरतावादाला कमी पाठिंबा आहे. जनमत घेतल्यास जम्मू व लडाख भारतात राहण्याच्या बाजूने कौल देतील तर श्रीनगरमधील जनमत तीन पर्यार्यांमध्ये विभागलेले असेल. संपूर्ण काश्मिरचा एकत्रित विचार करता येणार नाही. त्यामुळे जनमत घेऊनही फायदा नाही. भारत कधीही काश्मिरचा ताबा सोडणार नाही. काश्मिरमध्ये अनेक महत्त्वाची शिखरे आहेत. त्यांच्यावर पाकिस्तानला ताबा मिळाला तर पाकिस्तानी सैन्याला अ‍ॅडव्हांटेज मिळून उर्वरीत भारताची सुरक्षा धोक्यात येईल. त्यामुळे भारत कधीही काश्मिर हातचे जाऊन देणार नाही. काश्मिरला स्वतंत्र देश होऊन देण्यास पाकिस्तानचा जोरदार विरोध असेल. पाकिस्तानला काश्मिर स्वतःच्या देशात हवे आहे. पाकिस्तान काश्मिरला स्वतंत्र राहू देणार नाही. समजा काश्मिर एक स्वतंत्र देश झाला तर पाकिस्तान व चीन एकत्र येऊन ते काश्मिर ताब्यात घेतील कारण दोन्ही देशांच्या सैन्याच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे. समजा काश्मिर प्रश्न पाकिस्तानला हवा तसा सुटला तरीसुद्धा पाकिस्तान गप्प राहणार नाही. त्यानंतर पाकिस्तान पंजाब सारख्या इतर राज्यांकडे वळेल व तिथे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होईल. पाकिस्तानला काश्मिरींविषयी काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त भारताला त्रास द्यायचा आहे. सध्या त्यासाठी काश्मिर हे एक निमित्त आहे. हे निमित्त संपले तर ते दुसरे निमित्त शोधतील. वरील चाचणीतील काही परिच्छेद - The first-ever survey on both sides of Kashmir by Robert W Bradnock, a senior fellow at Chatham House, UK's most influential think-tank, has shown that only two percent of people in Jammu and Kashmir want to join Pakistan while 43 percent prefer independence. The survey 'Kashmir: Paths to Peace' has been sponsored by Libyan president Muammar Gaddafi's son, Dr Saiful Islam. It found preference for independence was fairly uniform across districts in PaK but it was uneven in J&K. In Kashmir valley division it was between 75 to 95 percent; none in Poonch, Rajauri, Udhampur and Kathua of Jammu division and in Jammu itself it was just one percent. In Ladakh division, it was 30 percent in Leh and 20 percent in Kargil”. “This poll, in common with two preceding polls in J&K shows that setting aside all other political obstacles, it is difficult to see how plebiscite proposed in UN resolutions of 1948/49 could play any part today in the resolution of the dispute. There is no clear majority in the prospect for independence either. In J&K there is a majority in favour of outright independence for entire Kashmir in only four districts, all in Kashmir valley division and in five other districts the support for independence is one percent or less”, reports the survey. http://www.milligazette.com/news/7376-survey-shows-preferences-across-kashmir

In reply to by श्रीगुरुजी

पुनश्च एकदा गुर्जींबर सहमती, आज गुर्जी पेटले आहेत! संदर्भ म्हणून चक्क 'मिल्लीगॅझेट'ची लिंक उचलून आणलीन!! =))

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अभ्या.. 24/07/2016 - 19:05
श्रीगुरुजींच्या सर्व मुद्याना सहमती. देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आपली सेना जे कर्तव्य बजावत आहे ते अतुलनीय आहे. काही छुटपूत घटनांचा उल्लेख करून बुद्धदीभेद करण्याचा मार्ग अश्लाघ्य असाच आहे

श्रीगुरुजी 24/07/2016 - 15:03
आता मूळ लेखाबद्दल -
काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते.
अत्यंत मूर्खासारखे विचार! कोण आहेत हे उथळ राष्ट्रवादी आणि त्यांना चेव चढला आहे म्हणजे नकी काय होतंय? काश्मिरमधल्या फुटिरतावाद्यांना पाकिस्तानचा उघड पाठिंबा आहे ही वस्तुस्थिती आहे आणि पाकिस्तानने अनेकवेळा याची जाहीर कबुली दिली आहे. हे काही या तथाकथित अतिराष्ट्रवाद्यांचे स्वत:चे मत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तिथे असलेले सैन्य काश्मिरच्या रक्षणासाठी व पर्यायाने उर्वरीत भारताच्या रक्षणासाठी आहे हे कळतंय का? काश्मिरसाठी पाकिस्तानने ४ वेळा युद्ध केले व अजूनही काश्मिर बळकावण्याचे प्रयत्न सुरू आहेतच. त्यामुळे तिथे सैन्य असणारच. आणि जेएनयू सारख्या संस्थातील देशद्रोह्यांना सरळ करण्यासाठी सैन्याची अजिबात गरज नाही व नव्हती. या देशातील न्यायालये त्यासाठी पुरेशी सक्षम आहेत. कन्हैयाकुमार २० दिवस तुरूंगार राहून आल्यावर लगेच टोन बदलून अफझल गुरूची आरती ओवाळण्याऐवजी दलित, मोदी इ. विषयांवर बरळायला लागला हे लक्षात आलं असेलच.
हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता.
म्हणजे खरा राग मोदी समर्थकांवर दिसतोय. मोदी लोकशाही मार्गाने निवडून येऊन बहुमत मिळवून पंतप्रधान झाले हे अजूनही अनेकांना मान्य होत नाहीय्ये.
पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की.
नेहरूंनी काश्मिरप्रश्नाचा कायमस्वरूपी विचका केला हे १९४८ पासून लिहिले जात आहे. ती वस्तुस्थिती आहे. त्यात काहीही असत्य नाही. हे आताच लिहिले गेलेले नवीन लेखन नाही.
ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा.
सैन्याला हा अधिकार फक्त काश्मिर, मणीपूर इ. मोजक्याच ठिकाणी का दिला गेला याची कल्पना आहे का? जेव्हा अतिरेकी निष्पापांची हत्या करायला लागतात, सर्वसामान्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी सैन्याला पाचारण करावेच लागते. मुळात मी काही चुकीचे करीत नसेन, अतिरेक्यांना मदत करीत नसेन तर कशाला सैनिक मला अटक करतील? मी जर काही संशयास्पद कृत्ये करीत असेन, अतिरेक्यांना मदत करीत असेन हे दिसून आले तरच माझ्यामागे सैनिकांचा ससेमिरा लागेल.
पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल.
३१ जानेवारी २०१२ पूर्वी व त्यानंतर असे किती प्रकार झाले? जरा माहिती देता का? इतक्या वर्षात हा एकच अपवादात्मक प्रकार काही मोजक्या सैनिकांना केला असेल तर या एका प्रकारावरून संपूर्ण सैन्याला कायमस्वरूपी दोषी ठरवायचे?
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
सैन्य धुमाकूळ घालत असेल? असे लिहायला जनाची नसली तरी निदान मनाची तरी लाज वाटायला हवी. सैन्याच्या जीवावरच आज आपण सर्वजण सुरक्षित आहोत. सैन्य नसते तर एका बाजूने चीनने व दुसर्‍या बाजूने पाकिस्तानने देशाचे लचके तोडले असते. कॅप्टन सौरभ कालिया व त्यांच्या ५ सहकार्‍यांना पाकड्यांनी किती हालहाल करून मारले हे माहिती आहे का? ३ वर्षांपूर्वी २ भारतीय सैनिकांना पकडून त्यांची मुंडकी कापलेली आठवतात का? रोज होणार्‍या गोळीबारात अनेक सैनिक प्राणांचे मोल देतात याची जाणीव आहे का? का उचलली जीभ आणि लावली टाळ्याला?

झेन 24/07/2016 - 18:57
- कलम ३७० असताना, पलिकडे पाकिस्तान असताना काश्मीरी लोक सर्वार्थाने भारताला आपला देश मानतिल का? - पाकव्याप्त काश्मीरमधे आपल्या ३७० सारखे काही स्वतंत्र अधिकार देणारे काही आहे का ? जर तिथे काही नसेल तर इथे हे लाड का आणि कधिपर्यंत ? - जर भारत सरकारच्याअधिक्रूत भूमिकेनुसार सार्वमत हा मुद्दा जर टाईमबार/आऊटडेटेड झाला असेल तर अजून कलम ३७० हा मुद्दा अजून जिवंत का ? - जोपर्यंत संपूर्ण भारतीयांना समान न्याय/ अधिकार नसेल तोपर्यंत टीआरपी ची आवश्यकता असणारा मिडीया आणि "विद्वान" हे भारतीय लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्याचा दूरूपयोग करणारच.

संदीप डांगे 24/07/2016 - 19:18
Mi kaay mhanato, udavatayat na bhangar lekh. Ase lekh shuddh deshdroh aahe. Sanghavarach sandhan sadhayche tar armyla kale kaun dakhavane nalayakpana aahe. Asha nalayak lekhanchi ithech Kay bharatat kuthehi garaj nahi. Please remove this thread. Sanghavarach raag kadhaycha asel tar special lekh lihana Tamhankar...

In reply to by संदीप डांगे

गॅरी ट्रुमन 24/07/2016 - 23:28
संदीपराव, एक विनंती करतो. हे असे मिंग्लिशमध्ये लिहिणे शक्य झाले तर टाळा. मिपा हे मराठी संकेतस्थळ असल्यामुळे बरेचसे मराठीत देवनागरी लिपीमध्ये लिहिणे ओघाने आलेच.बहुतांश सदस्य तसे करतातही. पण हे मिंग्लिश म्हणजे जेवताना घासाघासाला खडा आल्याप्रमाणे वाटते. गेल्या काही दिवसात बऱ्याच प्रतिसादांमध्ये असे मिंग्लिश तुम्ही वापरले आहे म्हणून हे लिहित आहे.

अमितदादा 25/07/2016 - 00:37
लेख जरा एकांगी वाटला. लेखकाशी अंशतः सहमत. काश्मीर भारतामध्ये राखण्यास तसेच तेथील दहशदवाद मोडून काढण्यात भारतीय आर्मी चा मोलाचा वाटा आहे यात शंकाच नाही. भारतीय जवानांच्या बलिदानामुळे काश्मीर अजून भारतात आहे याचे कायम भान राहील, मात्र भारतीय जवानांच्या कडून या 3 दशकात नक्कीच काही चुका घडल्या आहेत याचे भान राखाय हवे. काश्मीर हा प्रश्न हा फक्त मिलिटरी सोडवू शकणार नाही तर बरोबर पोलिटिकल अँप्रोच सुद्धा जरुरी आहे. जर भारत सरकार नागा बंडखोर, उल्फा बंडखोर यांचाबर संवाद साधत असेल तर काश्मीर फुटीरवाद्याबर बोलण्यात कसला आलाय कमीपणा हे कळत नाही. जर काश्मीर प्रश्न लवकर सुटला नाही तर खालील भीती वाटते 1. आतापर्यंत भारतीय मुस्लिम हे भारतीय सरकार च्या भूमिकेबद्दल कायम बरोबरीनं राहिलेत.भारतीय मुस्लिम प्रश्न आणि काश्मीर मुस्लिम प्रश्न नेहमी वेगळे राहिले आहेत.जर दोनी ठिकाणच्या radical लोकांची युती जाली तर दाहशवाद हा वानव्यासारखा भारतभर पसरेल. 2. पोलिटिकल इंडिसिव्हनेस ला कंटाळून जर PDP ने राजीनामा दिला तर भारताची काश्मीर वरील moral grip कमी होईल. आता सध्या कश्मीर मध्ये फक्त political पार्टी आणि पोलीस भारतीय सरकार चा भूमिकेशी प्रामाणिक आहेत, बाकी सर्वसामान्य जनता विरोधी आहे. टीप : google translate वापर्यामुळे भाषेत काही चुका राहतील. हि माझी भूमिका आहे एक्स्पर्ट ओपिनियन नव्हे.

In reply to by अमितदादा

आनन्दा 25/07/2016 - 11:56
माझ्यामते फुटीरतावाद्यांशी बोलायला भारताने नकार दिला असे नसावे. पण चर्चेत पाकिस्तानला सहभागी करून घेण्यास मात्र भारताचा कायमच नकार आहे, आणि तो योग्य देखील आहे.

In reply to by आनन्दा

अमितदादा 25/07/2016 - 14:43
माझ्यामते फुटीरवादी च काय पण पाकिस्तान शी सुधा चर्चा केली पाहिजे. एकवेळ फुटीरवादी राहूदे पण पाकिस्तान ची चर्चा केलीच पाहिजे, कारण आपला तोटा झाला तरी चालेल पण भारतच पण नुकसान झाल पाहिजे हि पाकिस्तान ची भूमिका आहे, तशी भूमिका भारत ठेवू शकत नाही कारण आपला मार्ग वेगळा आहे. म्हणून मला वाटते कि पाकिस्तान शी पण वेळ येयील त्यावेळी चर्चा करा, वेळ येयील त्यवेळी चार फटके द्या, पण ताठर आणि एगोइस्तिक भूमिका घेवू नका.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी 25/07/2016 - 16:33
या चर्चेतून काय निष्पन्न होणार आहे? फुटिरतावाद्यांच्या व काश्मिरातील इतर काही जणांच्या मागण्या बघू या. १) काही जणांना संपूर्ण काश्मिर पाकिस्तानात विलीन करायचे आहे. भारत ही मागणी कधीही मान्य करणार नाही. तसेच जम्मू व लडाखमधील बहुतेकांना हे मान्य नाही. याबाबतीत भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही. २) काही जणांना काश्मिर हा स्वतंत्र देश म्हणून हवा आहे. भारत ही मागणी कधीही मान्य करणार नाही. तसेच जम्मू व लडाखमधील बहुतेकांना हे मान्य नाही. याबाबतीत भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. काश्मिर स्वतंत्र देश होणे पाकिस्तानलाही मान्य नाही. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही. ३) काश्मिरला १९५३ पूर्वी जितकी स्वायत्तता होती तितकीच स्वायत्तता आता मिळावी अशी काही जणांची मागणी आहे. त्यामध्ये संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे इ. ३-४ गोष्टी वगळता उर्वरीत सर्व अधिकार राज्याकडे असावेत अशी मागणी आहे. मुळात काश्मिरला आता जितके अधिकार आहेत तेच धोकादायक आहेत. त्यात अजून भर टाकली तर परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्त बिघडेल. त्यामुळे उर्वरीत भारताला अजून धोका निर्माण होईल. १९९९-२००४ या काळात नॅकॉ रालोआचा भाग होता. सन २००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी काश्मिरला १९५३ पूर्वीची स्वायत्तता मिळावी असा ठराव विधानसभेत बहुमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविल्यावर वाजपेयींनी त्यातील धोके ओळखून तो लगेच फेटाळून लावला. नंतरच्या संपुआ सरकारने सुद्धा या मागणीकडे दुर्लक्ष केले. केंद्रात कोणतेही सरकार असले तरी ही मागणी मान्य होणार नाही. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही. ४) काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे अशी काही जणांची मागणी आहे. याबाबतीत सुद्धा भारताची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासारखे काहीही नाही. ५) काश्मिरमधील बेरोजगारी कमी व्हावी, उद्योगधंदे वाढावेत, गुंतवणूक वाढावी अशी बर्‍याच जणांची मागणी आहे. काश्मिरला लागू केलेले ३७० वे कलम हाच यातील मुख्य अडथळा आहे. या कलमामुळे काश्मिरमधील कोणालाही तिथे जमीन, घर विकत घेता येत नाही, तिथे स्थायिक होता येत नाही. त्यामुळे कोणताही उद्योगपती तिथे जाऊन उद्योग, कारखाने सुरु करू शकत नाही. तिथला मुख्य उद्योग पर्यटन हाच आहे. परंतु अशांत वातावरणामुळे पर्यटनावर परीणाम झालेला आहे. तिथली बेरोजगारी कमी करणे हे काश्मिरीच्याच हातात आहे. अतिरेक्यांना पाठिंबा देणे थांबविले, स्वतंत्रे देशाची किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची किंवा स्वायत्ततेची मागणी थांबविली, स्वत: शांततेने राहून इतरांना शांततेने राहून दिले आणि ३७० वे कलम रद्द केले तर तिथे समृद्धी नक्कीच येईल. ६) काश्मिरमधून सैन्य हटवावे व अ‍ॅफ्प्सा हटवावा अशी बर्‍याच जणांची मागणी आहे. काश्मिर पाकिस्तानला लागून असल्याने तिथून सैन्य हटविणे शक्य नाही. तिथे अतिरेकी धुमाकूळ घालत असल्याने व त्यांनी काही स्थानिक पाठिंबा देत असल्याने सैन्याला विशेषाधिकार देणे आवश्यक आहे. याबाबतीत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट असल्याने या मुद्द्यावर चर्चा होऊ शकत नाही. म्हणजे जर काश्मिरींशी चर्चा करायची तर जवळपास सर्व मुद्द्यांवर ठाम भूमिका असल्याने चर्चेला अर्थ नाही. काश्मिरची समस्या सोडविणे हे भारताच्या हातात नसून काश्मिरी व पाकिस्तानच्याच हातात आहे. पाकिस्तानने काश्मिरींना भडकाविणे थांबविले व काश्मिरींनी वरील मुद्दा क्रं. (५) मधील काही गोष्टी केल्या तर हा प्रश्न सुटु शकेल. भारत व केंद्र सरकार याबाबतीत फार काही करू शकणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा 25/07/2016 - 18:42
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. परंतु तुमचा 5 नंबर चा मुद्दा मान्य नाही. आता सध्याचा वातावरणात राज्य सरकारच्या कर्मचारांची मुले सुद्धा दगडफेक करतायत. स्वतः बुर्हाण वाणी चे वडील हि सरकारी कर्मचारी आहेत. आजच The Hindu वर बातमी वाचली कि जमू आणि काश्मीर मधील 1 % लोकांवर केंद्र सरकार 10 % खर्च करते म्हणजे जोपर्यंत तुमी ह्या लोकांना पोलिटिकल सोल्युशन देणार नाही तोपर्यंत ते असंतुष्ट राहणार जरी तुमी तिथं सोन्याचे रस्ते करून दिले तरी. जर विकास हेच सोल्युशन असत तर स्कॉटलंड ने uk पासून कधीच स्वतंत्र मागितलं नसत। आणि त्या लोकांच्या मागण्या जरी अनाठायी असल्या तरी हि कॉमन टेक्निक आहे अगोदर अवास्तव मागण्या ठेवायचं आणि चर्चा जशी होईल तसे climb down करायचं. नागा बंडखोरांनी ग्रेटर नागालॅंड आणि स्वतंत्र ध्वज ह्या मागण्या लावून धरल्या आहे आणि भारत सरकार ते मान्य न करता चर्चा करतायच ना , तसेच तिथं शांतता आहेच ना. भारतीय राज्यघटनेच्या आधीन राहून आपण त्यांना मोकळीक देऊ शकतो ना, शेवटी india is not a state but union of states. त्यामुळं ठराविक राज्यांचे नियम वेगळे असले मानून काय फरक पडत नाही जशी प्रगती होईल तसे हे नियम आपोआप गळून पडतील.

In reply to by अमितदादा

अमितदादा 25/07/2016 - 18:46
आणि जम्मू आणि लडाख हे भाग पूर्ण पणे indianized झालेत। त्यामुळे त्यांचा काही issue नाहीये। त्यामुळं आपले प्रतिसाद काश्मीर पर्यंत सीमित ठेवले तर बरे होतील.

In reply to by अमितदादा

सुबोध खरे 25/07/2016 - 21:59
अमित दादा साहेब काश्मीर च काय जम्मू आणि लदाख मध्ये पण कलम ३७० मुळे आपण "काश्मिरी" नसाल तर आपल्याला जमीन विकत घेता येत नाही किंवा घर घेता येत नाही . यामुळे कोणतेच उद्योग तेथे आपले कारखाने काढू शकत नाहीत अशा परिस्थितीत कोण उद्योगपती तेथे दुसऱ्याच्या नावाने उद्योग सुरु करेल? आणि उद्योग धंदे नसल्यामुळे काश्मिरी लोकांना नोकऱ्या नाहीत. रिकामे डोके हे सैतानाचे घर असते त्यामुळे अशा तरुणांचे डोके भडकवण्याचे काम करणारे दहशतवादी आणि निधर्मांध काही कमी नाहीत. यामुळेच हा प्रश्न सहज सुटणार नाही. गरिबी ही क्रांती आणि गुन्हेगारी यांची माता आहे असे म्हटले जाते. येथे तर फुटीरवाद्यांचे समर्थन करून आरामखुर्चीत विचारवंतांनी त्यातील फरकच धूसर केला आहे.

In reply to by सुबोध खरे

अमितदादा 25/07/2016 - 22:22
खरे साहेब, तुमच्या प्रतिसादाशी अशांत: सहमत, पण फक्त रिकामी डोकी आणि बेरोजगारी हे अशांतते मगच कारण आहे का, मला नाही अस वाटत. तुमि जालावर नक्कीच काश्मीर मधील बातम्या वाचल्या असतील. कितीतरी आतंकवादी हे रोजगाराची संधी उपलब्द असताना हिंसक मार्गाकडे वाळलेत, 2 ते 4 पोलीस कॉन्स्टेबल फोर्स सोडून हिजबुल मुजाहिद्दीन ला जॉईन झालेत. काश्मीर चे सगळे politician दिल्ली मध्ये एक भाषा आणि काश्मीर मध्ये soft separatizm ची भाषा वापरतात. हे काय होतंय, त्यामुळं मला प्रश्न पडतो की आपण काही चुकत नाही आहोत का ? मी हि काही वर्षां पूर्वी काश्मीर मध्ये आर्मी ला फुल्ल पॉवर देऊन असंतोषी लोकांना चिरडा अशा मताचा होतो, पण हळूहळू त्यातील फोलपणा माजा लक्षात आला. मला प्रश्न पडतो की how will u defeat people who have already defeated their fear ? त्यामुळं मज आस मत बनलंय कि deploy military and political approach at same time, talk to everyone who are interested. लष्कर चा अनुभव तुमाला जास्त त्यामुळं तुमचा मताचा आदरच आहे, परंतु अनुभव नसल्याची मते आरामखुर्चीत विचारवंत मानून हेटाळून नाही चालणार. मग शेतकऱ्यांचा विषयवार शेतकरी, स्त्री यांचा विषयावर स्त्री ने आणि डॉक्टर च्या विषयावर डॉक्टर नेच बोलय हवे.

In reply to by अमितदादा

सुबोध खरे 25/07/2016 - 22:41
काश्मीरचा प्रश्न लष्करी बळावर सुटणार नाहीच याबद्दल दुमत नाहीच. पण काश्मीर आज लष्करामुळेच आपल्या ताब्यात आहे हीही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. तेंव्हा लष्कराचे मानसिक खच्ची कारण थांबवा एवढीच माझी विचारवंतांना विनंती आहे. त्यावर राजकीय तोडगा काढणे हाच उपाय आहे हेही माझे मत आहे पण तो तोडगा काय असेल हे मला सांगता येणार नाही कारण तेवढी माझ्या बुद्धीची झेप नाही.

दखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी भाग २: - कलम ३७० रद्द करा ही सुद्धा अतिराष्ट्रवाद्यांची आवडती पण अव्यवहार्य मागणी आहे. सध्याच्या भाजपा सरकारने तसे नुसते सूतोवाच करून पाहावे, मग काश्मीर मध्ये जो काही आगडोंब उसळेल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. विरोधी पक्षात राहून अशी मागणी करणे वेगळे, शाखेतल्या बौद्धिकात (?) बरळणे वेगळे आणि प्रत्यक्षात सत्तेत असताना यासंबंधी कृती सोडा नुसते बोलणे वेगळे, हे आतातरी समजून घ्या. गामा पैलवान या आयडीने आफ्स्पा कायदा पाहावा ही विनंती, या अंतर्गत सैन्यबलांना मिळालेले अधिकार पाहावे. कलंत्री यांची प्रतिक्रिया संतुलित आणि विचारपूर्ण आहे, जबाबदार व्यक्तिमत्वाची द्योतक आहे. अजित डोवाल (संघ प्रणित) विवेकानंद आंतरराष्ट्रीय केंद्राचे फाउंडर डायरेक्टर आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Ajit_Doval After retirement (2005–2014)[edit] Doval retired in January 2005[4] as Director, Intelligence Bureau. In December 2009, he was the founder Director of the Vivekananda International Foundation, a think tank set up by the Vivekananda Kendra, a Spiritually Oriented Organisation.[8][9] सोन्या बापू या आयडीने स्वतः खूप हुशार असल्याचे गृहीत धरले असल्यामुळे साहजिकच बाकी सर्व जण त्यांच्या दृष्टीने निर्बुद्ध आहेत. ते खूपच 'मी मी' करतात. त्यामुळे खरेतर दखलपात्र नाहीच पण त्यांनी माझी पूर्ण पोस्ट रिपीट केल्याबद्दल एवढेतरी लिहिले पहिजे. सैनिक उच्च शिक्षित असतात हे त्यांचे मत करमणूक करणारे आहे. मूळ लेखातील मुद्दे समजून न घेता तिसऱ्याच गोष्टी लिहून भलतेच उलट आरोप करायचे ही वितंडवाद्यांची जुनी खोड आहे, ती सहजी जाणार नाही. पॅलेट गन कमरेच्या वर मारून शेकडो तरुण आंधळे झाले आणि ५० जण गोळीबारात मेले. त्याबद्दल डझनभर जवान आणि अधिकारी निलंबित होऊन चौकशीला सामोरे जातायत हे लक्षात घ्या. गृहमंत्र्यांनी सैन्याला सबुरीचा सल्ला दिला, पॅलेट गन वापरावर बंदी आणली याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करायचे ही खोड आहे. माझ्या विचार आणि (अल्प) बुद्धीनुसार सैन्यबळानी अतिरेक करू नये, सैन्याने स्वतःच्या डोक्याने वागू नये, धोरण ठरवणा-यानी दिलेल्या आदेशाची संयमित अंमलबजावणी करावी, अतिराष्ट्रयवाद्यांनी पाठवलेल्या देशप्रेमाने लडबडलेल्या पोस्ट सैनिकांच्या हातातील फोनवर सुद्धा जातात हे लक्षात ठेवावे, चेव येऊन कोणतीही कृती करू नये, इतिहासाचे दाखले हेत्वारोप करण्यासाठी न देता, चुका सुधारण्यासाठी द्यावे, हा भारतासाठी नुसता भूभागाचा (रिअल इस्टेटचा) प्रश्न नसून तेथील जनतेसकट त्यांच्या अशा आकांक्षांसकट भूभागाचा प्रश्न आहे हे कुठेतरी मान्य केले पाहिजे. अदखलपात्र प्रतिक्रियांसंबंधी: - मूळ लेखावरील अनेक प्रतिक्रिया वैयक्तिक झाल्यामुळे मला नाईलाजाने वैयक्तिक व्हावे लागत आहे त्याबद्दल दिलगीर आहे. येथील बहुतेक खोट्या नावांच्या शिखंडी आयडी असून लपून बाण मारायला बघतात. मागितलेले नसताना फुकटचे सल्ले द्यायची घाणेरडी रोगट साथ बहुतेक प्रतिक्रिया देणा-यांच्यांत पसरलेली आहे. सोन्याबापू नावाचे आयडी जगप्रसिद्ध सर्वद्न्य असल्याच्या थाटात व्यक्त होतायत. त्यांची गणना कशात करायची हेपण स्वतःच सांगतायत हे एक बरे. मूळ लेख अतिराष्ट्रवाद्यांच्या भ्रामक कल्पना यांच्याविषयीच आहे यामुळे समाजमाध्यमांवर फिरणारे बाष्कळ फॉर्वर्डस यांचा उल्लेख करूनच लेख लिहिलंय. डोवाल विषयक मजकूरसुद्धा याच प्रकारचा आहे. येथील काही लोकांना आपण पर्यटक म्हणून काश्मीरला जाऊन आलो आणि वेटर, ड्रायव्हर, लॉजवाले इत्यादींशी काही बोललो म्हणजे लगेच काश्मीर प्रश्नावर मत व्यक्त करायला क्वालिफाय झालो असेही वाटते आहे. काश्मिरात मी फिरलो ते सैन्याच्या भरोशावर नाही. एका सैनिकाने स्थानिकांशी बोलतांना माझ्या छातीला स्टेन गन लावली होती. तेव्हा ती बाजूला करून त्यातील गोळ्या, गणवेश, बूट हे सगळे माझ्यासारख्या माणसांनी दिलेल्या टॅक्सेस मधून येते हे विसरू नको असे नाईलाजाने सांगावे लागले होते. काश्मिरात फिरताना हुर्रियत तसेच स्थानिक संस्थांची बरीच मदत झाली हे मात्र नक्की. सैन्याच्या उपस्थितीमुळे फिरतांना मदत झालीच. वैचारिक विरोधकाला राष्ट्रद्रोही म्हणून घोषित करायचे आणि आम्ही म्हणतो तीच खर्रीखुर्री राष्ट्रवादाची व्याख्या आहे असे म्हणायचे ही अतिराष्ट्रवाद्यांची जुनीच पद्धत आहे. त्याच धर्तीवर येथे एकमेकांच्यात 'अहो रूपं! अहो ध्वनी!' चालू आहे. श्रीगुरुजी या आयडीने त्यांच्या एका पोस्ट मध्ये या पोस्ट वर दखलपात्र मूल्यवर्धन (Value Addition) केले आहे. तरीही समाजमाध्यमात फिरणारी JNU वर धमक्या देणाऱ्या नाटकातील सैनिकांची क्लिप त्यांनी आवर्जून पाहावी ही विनंती. पटेल आंदोलन, जाट आंदोलन हाताळताना वापरलेले बळ आणि काश्मिरात वापरलेले उपाय याची तुलना करून पहा. ही सगळीच भारताची अविभाज्य राज्ये आहेत पण ट्रीटमेंट वेगळी दिली जाते. सैन्य धुमाकूळ घालत आहे असे मी न लिहिलेले वाक्य माझ्या तोंडी टाकू नका. सैन्य नक्की काय करते हे खऱ्या अर्थाने आपल्या पर्यंत कधीच येत नाही. स्थानिक लोकांचा उद्रेक झाला तरच थोडी वस्तुस्थिती समजते. काश्मिर खोऱ्यात प्रत्येक शंभर मीटरवर सैनिक एवढे सैन्य असताना सारखा स्थानीकांचा उद्रेक का होतो याचे उत्तर शोधावे ही विनंती. PDP पहिल्यापासून फुटीरतावादी आहेच. आता BJP त्यांच्यासोबत सत्तेत आहेत. त्यामुळे अशी आता ५६ इंची छाती वाल्यांकडून अशी काय Break Through Strategy वापरली जाते हे पाहण्यासाठी देशातील जनता उत्सुक असताना जे चाललंय ते खेदजनक आहे आणि विशेष आशादायक नाही हे सत्य वारंवार समोर येतंय. नॅशनल कॉन्फरन्स बजेट आणि निधी साठी भारताबरोबर, भावनिक ऍडव्हान्टेज करिता काश्मिरीयत बरोबर आणि आंतरराष्ट्रीयकरण करण्याकरिता पाकिस्तान बरोबर अशी सोयीस्कररित्या भूमिका घेते.

In reply to by संदीप ताम्हनकर

अनुप ढेरे 25/07/2016 - 12:24
पटेल आंदोलन, जाट आंदोलन हाताळताना वापरलेले बळ आणि काश्मिरात वापरलेले उपाय याची तुलना करून पहा.
कैच्याकै! जाट आंदोलन आणि पटेल आंदोलनात आंदोलक ग्रेनेड फेकत होते का? त्यांच्या मागे एके४७वाले उभे असायचे का?
हा भारतासाठी नुसता भूभागाचा (रिअल इस्टेटचा) प्रश्न नसून तेथील जनतेसकट त्यांच्या अशा आकांक्षांसकट भूभागाचा प्रश्न आहे हे कुठेतरी मान्य केले पाहिजे.
याच्याशी समहत. देश = जमीन एवढंच नसून देश = लोकं हे देखील आहे.

In reply to by संदीप ताम्हनकर

शिद 25/07/2016 - 15:13
सोन्या बापू या आयडीने स्वतः खूप हुशार असल्याचे गृहीत धरले असल्यामुळे साहजिकच बाकी सर्व जण त्यांच्या दृष्टीने निर्बुद्ध आहेत. ते खूपच 'मी मी' करतात. त्यामुळे खरेतर दखलपात्र नाहीच पण त्यांनी माझी पूर्ण पोस्ट रिपीट केल्याबद्दल एवढेतरी लिहिले पहिजे. सैनिक उच्च शिक्षित असतात हे त्यांचे मत करमणूक करणारे आहे.
ओ साहेब, सोन्याबापूंच मत पटलं किंवा नाही पटलं तर त्यावर बोला ना की उचलला कळफलक आणि लागले बडवायला. किमान त्यांच्या सैनिकी पेशाचा तरी जरा आदर ठेवा. अरे, विसरलोच...तुम्हाला तर सगळ्या सैनिंकाबद्दल अ‍ॅलर्जी आहे ते, म्हणजे लेख वाचून तरी तसेच वाटतंय.
काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील.