Skip to main content

मोदींच्या काही चुका

लेखक तिमा यांनी गुरुवार, 10/03/2016 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान, नरेंद्र मोदी, यांनी त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत ज्या चुका केल्या त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा मोदीद्वेष्टा, दोन्हीही नसल्यामुळे, एका सामान्य नागरिकाच्या नजरेने जे वाटते, ते लिहित आहे. यांत सर्वच मुद्द्यांचा परामर्ष घेतला आहे, असा माझा दावा नाही. मिपाकर त्यांत मोलाची भर घालू शकतात. १. बीफ प्रकरणांत, भाजपातले अतिरेकी देशभर गोंधळ घालत असताना, मोदींनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता आणि इतके दिवस जे धोरण चालू आहे तेच यापुढेही चालू राहील, हे स्पष्टपणे सांगायला हवे होते. खाण्यापिण्याच्या बाबतीत हे सरकार, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही, हे ठासून सांगणे आवश्यक होते. असे केले असते तर, त्यानंतर असहिष्णुतेवरुन झालेली पुरस्कारवापसीही टळली असती. २. जे.एन.यु. प्रकरणांत, भारतविरोधी घोषणा झाल्यावर, खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायला हवा होता. घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा न लावता, सुप्रीम कोर्टाचा अनादर केल्याचा गुन्हा, वा तत्सम योग्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करुन पुरले असते. बाकी मिडिया ट्रायल चालूच राहिली असती, पण सरकार बदनाम झाले नसते. ३. 'मनकी बात'चा अतिरेक होतोय, असे लोकांना वाटायच्या आंत तो कार्यक्रम बंद करायला हवा होता. तिथे भरभरुन बोलायचे आणि महत्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगायचे, हा प्रकार अनाकलनीय आहे. ४. लोकसभा व राज्यसभा नीट चालावी असे वाटत असेल तर काँग्रेसला सतत टोमणे मारणे बंद करायला हवे होते. काँग्रेसने गेल्या साठ वर्षांत केवळ वाईटच गोष्टी केल्या आहेत, हा अपप्रचार आहे. त्यांच्या चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला असता, तर इतके कटु वातावरण झालेच नसते. ५. भाजपातल्या, मूर्खपणाची बडबड करणार्‍या लोकांची जाहीरपणे कानौघाडणी करुन, त्यांना गप्प करायला हवे होते. अर्थात, आत्तापर्यंत झालेल्या कारभारात काहीच चुकले नाही, असे त्यांना वाटत असेल तर, वरील सर्व मुद्दे गैरलागू होतात.

वाचने 29256
प्रतिक्रिया 184

प्रतिक्रिया

शूल भरे कंटक पथ पर, आजीवन अभियान किया है, मैं मधु से अनभिन्न आज भी, जीवन भर विषपान किया है.!! - बाकी चलु द्या!!

जेटली साहेबाना अजुन भारतीय जन-मानसाची जाण्न नसावी का? ईपीएफ टॅक्स ची भानगड आलीच कुठून ? दोन वर्षे होत आली , आता तरी महत्तवाचे आणि खरे मुद्दे हताळायलाच हवेत

प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा मोदीद्वेष्टा, दोन्हीही नसल्यामुळे, एका सामान्य नागरिकाच्या नजरेने जे वाटते, ते लिहित आहे
असं सांगून काहिही होत नाही.. अगदी मोदींच्या चांगल्याबाजू इथे अथवा इतरत्र लिहूनही आता काही फायदा नाही.. मोदीद्वेषाचा शिक्का बसलाय तुमच्यावर आता .. :-) खांग्रेसी, डावे, आपटार्ड्, निधर्मांध, हिंदूविरोधी, सिक्युलर्, फुर्रोगामी आणि म्हणून देशद्रोही तिमांचा णिषेध !!

In reply to by बाळ सप्रे

अर्थात, आत्तापर्यंत झालेल्या कारभारात काहीच चुकले नाही, असे त्यांना वाटत असेल तर, वरील सर्व मुद्दे गैरलागू होतात.
या न्यायाने तुमचे सगळे मुद्दे गैरलागू झालेत..

मोदींची सगळ्यात मोठ्ठी चुक म्हणजे - लोकसभा निवडणुकीला उभे राहुन निवडुन येणे आणि वर पंतप्रधान बनणे ! बघा ना , मोदी निवडुन यायच्या आधी देषात सारे कसे आनबान होते , कोणतीही असहिष्णुता नव्हती , गिलानी अरुंधती दिल्लीत येवुन स्वतंत्र काश्मीरचे नारे देवुन अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत होते , लादेनला लादेनजी असे संबोधुन मरणान्तिनी वैराणि ह्या आदर्श संस्क्रुतीचा बोध दिग्विजजज जी करुन देत होते. मनमोहन जी मौनं सर्वार्थ साधनं ह्या गहन सत्याचे आपल्याला सार शिकवत होते. मुंबई हल्ल्यानंतर विलासराव हल्ल्याची खरी माहीती सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचावी ह्या हेतुने रामुला ट्रिप घडवुन आणत होते, अण्णा मस्तपैकी आंदोलन बिंदोलन करुन देशाला फुल्ल इन्टर्टेनमेन्ट देत होते आणि हो , मिसळपाव वर राजकारणाव्यतिरिक्त कितीतरी छान छान लेख साहित्य येत होते वगैरे वगैरे. मोदी निवडुन आले अन पंतप्रधान झाले अन सगळा देश एकदम दुत्त दुत्त झाला :-\ अवांतरः वुमन एम्पावर्मेंट करण्यासाठी आम्ही मागल्या निवडणुकीत राहुलजींना कोंग्रेसला मत दिले होते , पुढल्या निवडणुकीत ही राहुलजींनाच मत देवु आणी निवडुन आणु आणि पंतप्रधान करु , तेव्हाच कोठे गांधी नेहरु वाड्रांच्या पुरोगामी इन्डियाचा विजय होईल. राहुल आप पी.एम बनेंगे इन्शाल्लाह इन्शाल्लाह

काय राव प्रगो साहेब ! उगाच तिरकस प्रतिसाद? राहुल गांधी किंवा काँग्रेसची भलामण धागाकर्त्याने कुठेतरी केलेली आहे काय? प्रमाणिक मुद्दे आधारित विरोधही करायचा नाही का?

In reply to by नाना स्कॉच

नाना , अहो तिरकस काही नाही ! खरेच मी काँग्रेसला/ राष्ट्रवादी काँग्रेसला मत देत आलोय आजवर . गेल्या निवडणुकीतही राष्ट्रवादीलाच मत दिले होते ! आणि येवढ्या मोदी लाटेतही आमच्या मतदार संघात राष्ट्रवादीच जिंकली !! राहुल पंतप्रधान व्हावेत असे मला मनापासुन वाटते. काँग्रेस हाच खरा देशाचा तारणहार आहे . गांधी आमचे सावरकर तुमचे ! भारत = गांधी = काँग्रेस

तुम्ही "मनकी बात" बद्दल जे काही म्हटले ते अगदी मनाला स्पर्श करून गेले. हे रेडियो वर येवून जनतेला प्रवचन करणे मला तरी अगदी disgusting वाटते. आम्ही काही सरकारी गुलाम नाही आहोत कि आम्हाला हि प्रवचने ऐकावी लागावीत. त्या प्रवचनात जो आव आणला जातो त्याचा तर मला खूपच तिटकारा आहे. म्हणे मुलांनी परीक्षेची चिंता करू नये, देशांत शिक्षणाची इतकी कमतरता आहे कि चांगल्या शाळेत प्रवेश घ्यायचा म्हणजे अर्धा मार्क सुद्धा महत्वाचा ठरतो. मुले आणि पालक मूर्ख आहेत म्हणून अभ्यासाचे इतके टेन्शन घेत नाहीत, सरकरी धोरणा मुले चांगल्या शिक्षणाचा प्रचंड अभाव आहे आणि गरिबीतून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण आहे हे सर्वाना ठावूक आहे. आपले काम करायचे सोडून अम्हाला हि प्रवचने. आणि महत्वाच्या मुद्द्यावर मौन तर माझ्या लक्षांतच येत नाही. - नरेंद्र मोदी ह्यांच्या बद्दल माझ्या मनात अपार आदर भावना आहे. पण निवडणुकी आधीच्या मोदी मध्ये आणि पंतप्रधान मोडी मध्ये बराच फरक दिसून येतो.

आम्ही काही सरकारी गुलाम नाही आहोत कि आम्हाला हि प्रवचने ऐकावी लागावीत.
हे समजलं नाही. कुणी सक्ती केली आहे ' मन की बात ' कार्यक्रम ऐकायची? रेडिओचं बटन आपल्या हातात आहे. नका ऐकू. आजकाल सुदैवाने रेडिओवरही भरपूर channels आहेत. अजिबात नका ऐकू. आणि तसंही त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकायला (to hear या अर्थाने, to follow या अर्थाने पण घेऊ शकता) हव्यात असं अजिबात नाही.

In reply to by बोका-ए-आझम

मग गावोगावीच्या शाळा मधली मुले ज्यांना जबरदस्तीने हि भाषणे ऐकावी लागतात ती गुलाम आहेत का ?

In reply to by अभिजित - १

त्यांच्यावर तशी जबरदस्ती होत असेल तर ती चुकीचीच गोष्ट आहे पण साहनाजींच्या प्रतिसादात या मुलांचा उल्लेख कुठे आहे? त्यांनी स्वतःचा उल्लेख केलाय. म्हणून मी तसं लिहिलं. शिवाय या मुलांवर जबरदस्ती होते आहे असं ती मुलं पण म्हणून देत ना. आपणच का असं गृहीत धरायचं?

In reply to by बोका-ए-आझम

सगळे म्हणणे न म्हणणे जर बालाकांना समजले असते तर "बालके" अन "प्रौढ़" असे कायदेशीर वर्गीकरण कश्याला केले असते साहेब? कायदेशीर रीत्या सज्ञान नसणाऱ्या पोरक्या पोरांना 18 चे होईपर्यंत रिजेंट किंवा वार्डन/लीगल प्रॉक्सी/ पर्सन विथ पॉवर ऑफ़ अटॉर्नी कश्याला ठेवत असतील कायद्यानुसार? सरळ त्या पोरालाच विचारायचे की त्याला काय हवे आहे ते!, काय म्हणता?? बाकी मोदक ह्यांच्या खालील प्रतिसादाशी सहमत. बाकी एक कुतूहल आहे मन की बात ही मोदी ज्या मुशीत अन संस्कारात् घडले आहेत त्याचा इफ़ेक्ट असावा काय? :D

In reply to by नाना स्कॉच

हा गैरसमज आहे. त्यांना ब-याच गोष्टी समजतात. लहान मुलं तर प्रचंड smart असतात. इथे हे उदाहरण अस्थानी नाही की शिवाजीमहाराजांनी तोरणा जिंकला तेव्हा ते आजच्या कायद्याच्या दृष्टीने सज्ञान नव्हते (१६ वर्षांचे). दुस-या टोकाचीही उदाहरणं आहेत - ज्यात लहान म्हणावी अशी मुलं अत्यंत घातकी गुन्हे करताना सापडली आहेत. १८ वर्षे ही सरकारने ठरवलेली मर्यादा आहे. आधी २१ होती. मी पहिली-दुसरीत असताना जे शिकलो त्याच्या अनेकपट जास्त माहिती माझ्या आता पहिलीत जाणाऱ्या मुलाला शिकवली जाते आहे आणि ती त्याला आणि त्याच्या वयाच्या मुलांना समजतेसुद्धा. ते ज्या प्रकारे त्याचा वापर करतात त्यावरून कळतंच. ते असो. इथे कुठल्याही सक्तीचं समर्थन करायचा हेतू नाही. पण मुलांना काही कळत नाही हे म्हणणं चुकीचं आहे.

In reply to by बोका-ए-आझम

तुम्हाला मान्य नसेल तर सोडतो पण शिवाजी महाराज हे उदाहरण लैच जास्त गड़बड़ वाटले इतके नोंदवतो, कारण तो सेट ऑफ़ रिफरेन्स वेगळा आहे ! ती राजेशाही होती, मध्ययुग होते आपण ज्या व्यवस्थे अन सिस्टम बद्दल बोलतोय ती वेस्टमिंस्टर सिस्टम पुर्ण वेगळी पड़ते असे वाटते, नथिंग पर्सनल जाणवले ते सांगतोय. हे एक, दूसरे म्हणजे तुमचा "स्मार्टनेस" अन "डिसिशन मेकिंग मॅचुरिटी" ह्या दोन गोष्टीत गोंधळ उडालाय का भाऊ? असो!.

In reply to by नाना स्कॉच

शासनव्यवस्थेचा नाही. दुसरी गोष्ट - Smartness आणि decision making maturity या गोष्टीचा वयाशी काहीही संबंध नाही. तसंच म्हणायचं तर ४६ व्या वर्षीसुद्धा या दोन्हीही गोष्टी नसलेला किमान १ माणूस तरी तुम्हाला माहित असेलच, काय म्हणता?

कमाल आहे मोदींच्या पारंपरिक विरोधकांना त्यांच्या चुका सापडू नये निदान ह्या धाग्यापुरत्या, तिरसिंगराव एखाद सूराग भी दिया करो

In reply to by श्री गावसेना प्रमुख

खिकss बाकी काही नाही पण ती हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट आठवली. मोदींच्या बाबतीत सगळ्यांचे असेच होतेय काय ?

मोदीबद्दल इतर काहीही मतमतांतरे असोत पण त्यात प्रांजलपणाचा अभाव आहे असे मला वाटते. अजूनही ते प्रचारसभा असाव्यात अश्याच उत्साहात बोलत असतात तर कधी काँग्रेसच्या चूका याच भांडवलावर बोलत असतात. सध्या देश अपरिपक्व नेत्यांचा कचाट्यात सापडला आहे मग ते मोदी असो, राजनाथसिंह असो अथवा कॉग्रेसची नेतेमंडली असोत. देशापेक्षा स्व प्रतिमाहीच सर्वांना महत्त्वाची वाटते.

In reply to by कलंत्री

अपरिपक्वतेच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत. बाकी देशापेक्षा स्वप्रतिमा मोठी वाटणं हे जगातल्या सगळ्याच राजकीय नेत्यांबाबतीत खरं आहे. नार्सिसिस्ट असल्याशिवाय तुम्ही नेता किंवा अभिनेता बनूच शकत नाही.

In reply to by कलंत्री

किमान १०% टक्के तरी वाजपेयी असावे आणि त्याकरीता १०% भाजपेयी नसले तरी चालेल !!!

१. बीफ प्रकरणांत, भाजपातले अतिरेकी देशभर गोंधळ घालत असताना, मोदींनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता आणि इतके दिवस जे धोरण चालू आहे तेच यापुढेही चालू राहील, हे स्पष्टपणे सांगायला हवे होते. खाण्यापिण्याच्या बाबतीत हे सरकार, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही, हे ठासून सांगणे आवश्यक होते. असे केले असते तर, त्यानंतर असहिष्णुतेवरुन झालेली पुरस्कारवापसीही टळली असती. बीफ प्रकरण नवे नाही. खास करुन गोमांसावर बंदी काँग्रेसच्या राज्यातच घातली आहे. अमेरीकेतही घोडा आणि कुत्रा याच्या मांसावर बंदी आहे. मग जर मुद्दाम कोणी आमचा हक्क आहे म्हणुन जाहिर बीफ पार्टी करत असतील तर प्रतिक्रिया येणारच. मोदींनी कश्या कश्यात हस्तक्षेप करायचा ? महाराष्ट्रात आलेल्या गोवंश बंदी संदर्भात अल्पभुधारक शेतकरी आणि शेतीची किफायती यावर पद्मश्री सुभाष पाळेकरांच्या विचाराचा परामर्ष जरुर घ्यावा. शेतकरी जर शुन्य खर्चावर आधारीत शेती करायला हवा असेल तर फक्त गाय वाचुन उपयोग नाही. गावरान बैल ( वळु ) यांचेही संगोपन आवश्यक आहे. म्हैस आणि जर्सी गायी लालु प्रसाद यादवांसारखा निधर्मी सुध्दा मारु देणार नाही कारण त्यांची उत्पादकता जास्त आहे. २. जे.एन.यु. प्रकरणांत, भारतविरोधी घोषणा झाल्यावर, खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायला हवा होता. घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा न लावता, सुप्रीम कोर्टाचा अनादर केल्याचा गुन्हा, वा तत्सम योग्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करुन पुरले असते. बाकी मिडिया ट्रायल चालूच राहिली असती, पण सरकार बदनाम झाले नसते. वो कत्ल भी करते है तो चर्चा नही होती हम हा हा भी भरते है तो हो जाते है बदनाम ( बदनाम करायचे एकदा ठरले की ८३०० विद्यर्थ्यांनी निवडलेला कन्हैया १२० कोटी लोकांनी निवडलेल्या पंतप्रधानांच्या पेक्षा मोठा होतो. गंमत म्हणजे तो पंतप्रधानांवर टीका करतो हे मिडीया दाखवते. ) ३. 'मनकी बात'चा अतिरेक होतोय, असे लोकांना वाटायच्या आंत तो कार्यक्रम बंद करायला हवा होता. तिथे भरभरुन बोलायचे आणि महत्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगायचे, हा प्रकार अनाकलनीय आहे. ( कन्हैया किंवा अन्य मिडीयाने उचललेल्या मोहीमा पैड आहेत. मोदी त्यापेक्षा जास्त महत्व स्वच्छ्तेला, मेक इन इंडियाला, किंवा विकासाला देतात ज्यामुळे पुढील काही वर्षात जनता विरोधकांना विसरेल यासाठी हा पेड गदारोळ आहे. ) ४. लोकसभा व राज्यसभा नीट चालावी असे वाटत असेल तर काँग्रेसला सतत टोमणे मारणे बंद करायला हवे होते. काँग्रेसने गेल्या साठ वर्षांत केवळ वाईटच गोष्टी केल्या आहेत, हा अपप्रचार आहे. त्यांच्या चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला असता, तर इतके कटु वातावरण झालेच नसते. भाजप टोमणे प्रतिक्रिया म्हणुन देते. स्मृती इराणी केवळ राहुल गांधींच्या मतदार संघात निवडणुक लढल्या त्यामुळे बदनामीला पात्र झाल्या आहेत. मोदी नसते तर काँग्रेसचे घोटाळेबाज सरकार पुन्हा निवडुन आले असते म्हणुन मोदी टिकेला पात्र आहेत हे समजायला थोडासाच विचार करावा लागतो. ५. भाजपातल्या, मूर्खपणाची बडबड करणार्‍या लोकांची जाहीरपणे कानौघाडणी करुन, त्यांना गप्प करायला हवे होते. मायला, दिग्वीजय सिंग यु पी ए च्या काळात बडबड करायचे ते फारच विनोदी असायचे. आता करमणुक होत नाही ही तक्रार असेल तर त्यांची जागा आप नेत्यांनी घेतली आहे.

In reply to by गॅरी शोमन

१) बदनाम करायचे एकदा ठरले की ८३०० विद्यर्थ्यांनी निवडलेला कन्हैया १२० कोटी लोकांनी निवडलेल्या पंतप्रधानांच्या पेक्षा मोठा होतो. गंमत म्हणजे तो पंतप्रधानांवर टीका करतो हे मिडीया दाखवते. २) मायला, दिग्वीजय सिंग यु पी ए च्या काळात बडबड करायचे ते फारच विनोदी असायचे. आता करमणुक होत नाही ही तक्रार असेल तर त्यांची जागा आप नेत्यांनी घेतली आहे. आणि अशा तर्‍हेने क्लिंटन भौ ह्यानि ओव्हरच्या ५ बॉल मध्ये ३ चौकार आणि २ षटकार मारलेले आहेत.... २ षटकार हे तर जबरा शॉट होते.

In reply to by sagarpdy

अरारा रारा. लैच बेक्कार गोंधुळ. कायतरी करा पाहिजे. संपादक/मालक, लक्ष घाला इकडे. उगा भांडणे व्हायची

In reply to by तर्राट जोकर

प्रतिसादकर्ता शोमन आहेत ट्रुमन नाही. मी पण प्रतिसाद वाचून गोंधळलो होतो पण सदस्यनाम वाचून खात्री करुन घेतली.

In reply to by तर्राट जोकर

वरील प्रतिसाद गॅरी ट्रुमन यांचा असल्याच्या नजरचुकीने झालेल्या घोळातून हा प्रतिसाद दिला गेला. संपादकांना विनंती की प्रतिसाद उड्वावा. व गॅरी ट्रुमन यांना विनंती की या चुकी साठी एकडाव माफी द्यावी. नाम साधर्म्यामुळे हा घोळ झालाय.

In reply to by तर्राट जोकर

म्हणजे तो प्रतिसाद ट्रूमन यांनी दिला असता तर अभ्यासू असता आणि शोमन यांनी दिलाय म्हणून अभ्यासू नाही?

In reply to by होबासराव

१) बदनाम करायचे एकदा ठरले की ८३०० विद्यर्थ्यांनी निवडलेला कन्हैया १२० कोटी लोकांनी निवडलेल्या पंतप्रधानांच्या पेक्षा मोठा होतो. गंमत म्हणजे तो पंतप्रधानांवर टीका करतो हे मिडीया दाखवते. असे असताना आता कुठलि आझादि मागताहेत हे २) मायला, दिग्वीजय सिंग यु पी ए च्या काळात बडबड करायचे ते फारच विनोदी असायचे. आता करमणुक होत नाही ही तक्रार असेल तर त्यांची जागा आप नेत्यांनी घेतली आहे. मान्य पण कन्हैय्या बेगुसरायकर आणि मंडळिने काहि काळा पासुन ह्याना रंगमंचापासुन दुर ठेवलेय.

In reply to by बोका-ए-आझम

गॅरी ट्रुमन उर्फ क्लिंटन यांची मिपावर अभ्यासू सदस्य अशी ओळख आहे. शोमन यांची अजुनतरी तशी मिपावर कारकिर्द, ओळख नाही असे मला वाटते, इतर सदस्यही याला कदाचित अनुमोदन देतील. बाकी, मोदींच्या बाजूने येणारा प्रत्येक प्रतिसाद अभ्यासपूर्णच आणि निष्पक्षच आहे असे डोळे झाकून, बुद्धी बंद ठेवून समजायचे असेल तर आमची काहीसुद्धा हरकत नाही. गो अहेड.

In reply to by तर्राट जोकर

असा एकतरी उल्लेख माझ्या प्रतिसादात आहे का? मी गॅरी ट्रूमन आणि गॅरी शोमन यांच्यामध्ये झालेल्या गोंधळाबद्दल बोलतोय. आता तुम्हाला जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी मोदी दिसतात आणि मी न लिहिलेल्या गोष्टीही त्यांच्याशी जोडाव्याशा वाटतात त्यावरून कोण मोदींबद्दल obsessed अाहे ते समजतंच. असो. Move on.

In reply to by बोका-ए-आझम

तुम्ही हा जो आत्ता प्रतिसाद दिलाय ना त्या प्रकाराची सवय झाली आहे. सो नो प्रॉब्लेम. आज फक्त माझ्या नशिबाने हा धागा फक्त आणि फक्त मोदींशी संबंधित आहे. सो आय डोण्ट केअर अ‍ॅट ऑल.

In reply to by तर्राट जोकर

तुम्हाला कुठलाही विषय, मग धागा कोणताही असो, मोदींवर न्यायची सवय झाली आहे. हा तर धागाच मोदींवर आहे. म्हणजे तुम्ही फुल बॅटिंग करणारच. होम पिच.

In reply to by गॅरी शोमन

र गांधी नावाची पातशाही अनके दशके राज्य करून गेली. घोड्याचे मास हा मुद्दा मागे मी सुद्धा मांडला होता घोड्याचे मास जर्मनीत कायदेशीर आहे पण अमेरिकेत त्यावर बंदी आणतांना ह्या प्रण्याच्यावर तेथील जनतेचे प्रेम त्यांच्या भावना लक्षात घेऊन बंदी आणल्या गेली कारण धार्मिक नाही आहे भारतात गायीचे मास हे बहुसंख्य लोकांच्या धार्मिक भावनेशी निगडीत असल्याने त्यावर बंदी आणल्या गेली किंबहुना ती युपिए व एन डी अ ने सुद्द्धा आणली पण मोदीभरारी मुळे देशात त्यांचे विओर्धक त्यातही विचार्जंत एवढे सैरभैर झाले की त्यांनी कुठल्याही गोष्टींचे अवडंबर माजवले, बीफ च्या मुद्यावर राजकारण आंजा व टीव्ही वर राजकारण तापले सर्व सामान्य माणसाला त्याने शष्प फरक पडला नाही,

In reply to by निनाद मुक्काम …

भारतात गायीचे मास हे बहुसंख्य लोकांच्या धार्मिक भावनेशी निगडीत असल्याने त्यावर बंदी आणल्या गेली >> अभ्यासू सदस्य, अभ्यास वाढवा. जेव्हा भाजपविरोधक हाच मुद्दा घेऊन विरोध करतात तेव्हा भाजपसमर्थक घटनेतले कायदे दाखवून गोमांसबंदीमागे कसे धार्मिक कारण नाही हे पटवून देतात. तेव्हा एक काय ते निश्चित करा.

In reply to by तर्राट जोकर

अभ्यास तुमचा वाढवा घटने मध्ये जेव्हा एखादे कलम असते त्यामागे एक तर्क असतो व बैठक असते व गोहत्येवर बंदी हा हिंदू धार्जिणे कलम हे धर्मनिरपेक्ष देशात फक्त ह्यासाठी अस्तित्वात आले कारण बहुसंख्य हिंदू लोकांची भावना व श्रद्धेशी निगडीत प्रश्न आहे. म्हणूनच प्रत्येक राज्य सरकारला ह्याबाबत स्वतंत्र कायदा करण्याची मुभा आहे उदा गोव्यात बहुसंख्य ख्रिस्ती बांधवांच्या भावनांचा आदर करत ही बंदी गोव्यात आणली नाही.

In reply to by निनाद मुक्काम …

ओ दादा असे काय करताय हो? भारतीय संविधानात जी

डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़ स्टेट पॉलिसी

दिली आहेत ती 3 तत्वांवर आधारित आहेत. 1 समाजवादी तत्वे 2 गांधियन तत्वे 3 लिबरल इंटेलेक्चुअल तत्वे गोहत्या बंदी ही आर्टिकल 48. च्या अंतर्गत येते , हे तत्व गांधियन तत्वांच्या अंतर्गत घटनेत समाविष्ट केले गेले आहे , आता मग कसे हो? गोहत्या बंदी झाल्याने तुम्हाला त्यात जे कायदेशीर दिसते आहे ते गांधियन तत्वांच्या अंतर्गत आहे, मग आता एक कबुल करा की 1 गांधी हे प्रचंड मोठे हिंदु समर्थक होते (हे तुमच्या राजकीय स्टैंड ला कमीपणा आणेल) किंवा 2 पुर्ण मसूदा समिती (ड्राफ्टिंग कमिटी) हुकलेली होती. गोहत्याबंदी बद्दल कलम 48 म्हणते "Organisation of agriculture and animal husbandry The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter, of cows and calves and other milch and draught cattle" ह्यात हिंदु धर्माचा संबंध कुठे आला? की आता म्हणता घटना समिति ला गाँधीवादी तत्वे अन हिन्दुत्वातला फरक कळत नव्हता?? कारण गांधी तर तुमच्यालेखी हिंदु विरोधी होते, नाही का? उगाच काय वाटेल ते बोलु नका दादा , धन्यवाद

In reply to by नाना स्कॉच

त्यांच्या इन्डॉक्ट्रीनेशनच्या बाहेर ते बोलु शकत नाहीत, तेव्हा त्यांना माफ करा स्कॉचनाना.

In reply to by तर्राट जोकर

तसे पाहता
1 समाजवादी तत्वे 2 गांधियन तत्वे 3 लिबरल इंटेलेक्चुअल तत्वे
हेच त्यांना मूलतः त्याज्य असावे हो!!!

In reply to by नाना स्कॉच

ते तर प्रकाशाएवढे सत्य आहे हो. घटना मानायची तर ह्या तत्त्वांना मान्यता द्यायला लागते. ह्या तत्वांना मान्यता न देणारे कोण आहेत ते काय आपल्याला ठावूक नाही.

तिमा शी सहमत आहे. मोदींबद्दल आणि मुख्य म्हणजे भा ज पा बद्दल हळु हळु का होईना जनमानसात अपेक्षाभंगाची भावना येत आहे. एखादी चूक मान्य करायचा मोठेपणा त्यांनी दाखवायला पाहिजे. मल्ल्या पळाला हे सत्य आहे आणि आम्ही त्याला परत आणु हे म्हणणे योग्य आहे. क्वत्रोचीचा काय संबंध या प्रकरणाशी?

In reply to by मी-सौरभ

मल्ल्या साहेब यांना राज्यसभेवर खासदार म्हणून कॉंग्रेस आणि जनता दलाने निवडून दिलेले आहे आणि त्यांची कर्जे तारणाच्या "कित्येक पट" पण कॉंग्रेसच्याच काळात "दिली गेली" आहेत आणि त्यांना बाहेर जायला अटकाव होणार आहे हि "बातमी" पण त्यांच्या कडे "सोयीस्कर रित्या" पोहोचली आहे. त्यांचा सुब्रतो रॉय होऊ नये हि "काळजी" घेणारे कोण आहेत हे बाहेर आले-- "तर"-- हा "तर"च महत्त्वाचा आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब, अर्धवट बातम्या देऊन दिशाभूल करु नये. Mallya was elected to the Rajya Sabha in 2002 from his home state of Karnataka with the support of the Congress party and Janata Dal (Secular). In 2010, he was reelected for a second term, this time with the backing of the Bharathiya Janata Party and the JDS. तसेच काँग्रेसच्या काळात कर्जे दिली गेलीत म्हणून आता सत्ताधारी भाजपची जबाबदारी नाही असे म्हणायचे आहे का?

In reply to by तर्राट जोकर

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/cbi-was-aw… मल्ल्या साहेबानी २ मार्च रोजी उड्डाण केले. याविषयी सीबीआय ला माहिती होती परंतु संबंधित बँकांनी तक्रार दिलेली नसल्याने व परिणामी अटक वॉरंट नसल्याने त्यांना थांबवणे शक्य झाले नाही. यासंबंधी सीबीआय ने बँकांना वारंवार तक्रार नोंदवायला सांगूनही ती नोंदवली गेली नाही (आणि नेमकी पळून गेल्यावरच कशी नोंदवली ब्वा?)

In reply to by तर्राट जोकर

तेव्हा ते ६ वर्षांनी कर्ज न फेडता पळून जातील असं भाजप नेत्यांना अंतर्ज्ञान झालं होतं याचा पुरावा आहे का तुमच्याकडे? असेल तर ताबडतोब द्यावा ही विनंती.

In reply to by बोका-ए-आझम

हाच प्रश्न आपण डॉ. खरे यांनाही काँग्रेस नेत्यांबाबत विचारला असता तर जास्त आनंद झाला असता.

In reply to by बोका-ए-आझम

असल्या लागट प्रतिसादांचीही सवय झाली आहे. त्यामुळे गेंड्याची कातडी झाली आहे. चिंता नसावी.

In reply to by तर्राट जोकर

जोकर साहेबा आय माय स्वारी . मल्ल्या साहेबांनी भाजपच्या आमदारांना पण पटवले होते असे दिसते. सर्व गुणं कांचनं आश्रयते असे काहीतरी संस्कृत सुभाषित आहे त्याचा प्रत्यय येतो.

In reply to by सुबोध खरे

मल्ल्यांच्या बाबतीत एक वाक्य अगदी फिट बसते. "सब मिले हुये है जी" माल्याचे सारेच दोस्त आहेत, त्यामुळे त्याच्या उडून जाण्यामागे कोणा एका पक्षावर शरसंधान करुन उपयोग नाही. जस्ट लाईक व्यापम.

In reply to by मी-सौरभ

मोदीं सरकारबद्दल आणि मुख्य म्हणजे भा ज पा बद्दल हळु हळु का होईना जनमानसात अपेक्षाभंगाची भावना येत आहे. सहमत आहे. बाकी चालु द्या. दिलीप बिरुटे

भाजपा व खण्ग्रेस बर्यापैकी सारखे आहेत राजकीय, प्रशासकीय व आर्थिक रित्या. सामाजिक रित्या ते निराळे आहेत पण जिथे दैनैदिन प्रश्न महत्वाचे आहेत तिथे कसलं महत्व आलेय गोमातेला अन मंदिराला ! आजही निवडून द्यायचे तर एकवेळ भाजपाला मी मत देणार नाही पण नाईलाजाने मोदीनाच मत देईन ! ( डाव्या विचारांचा असूनही ! ) .

मोदींची सर्वात मोठी चुक किंवा चुका म्हणजे जुन्या राज्यकर्त्यां च्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणाला तातडीने धसास लावले नाही. तसे केले असते तर जनतेला पण बरे वाटलेच असते आणि संसद पण नीट चालली असती. वर मोदींनी बारामतीला येऊन मिठ्या मारल्या त्यानी भाजप ला मते देणारा मतदार नक्कीच दुखावला आहे.

In reply to by प्रसाद१९७१

मोदींची सर्वात मोठी चुक किंवा चुका म्हणजे जुन्या राज्यकर्त्यां च्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणाला तातडीने धसास लावले नाही. तसे केले असते तर ....... ........... आणि संसद पण नीट चालली असती.
अच्छा म्हणजे जुन्या राज्यकर्त्यां च्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणाला तातडीने धसास लावले नाही म्हणून संसद नीट चालली नाही असे म्हणायचे आहे का ?

In reply to by प्रसाद१९७१

घाबरुन गप्प बसले असते संसदेत, आणि कामकाज नीट चालले असते.
हम्म.. काँग्रेची राजकारण्यांचा हा हातखंडा भाजपाच्या अंगवळ्णी पडण्यास जरासातरी वेळ लागेल आणि भारतातल्या कोणत्याही राजकीय पक्षाची निवडणूक फंडींग सेम व्यावसायिक वर्गांकडून होत असल्यामुळेही हात बांधले जात असावेत. नाहीतर बोफोर्स प्रकरण गुंडाळले जाताना भाजपाचे हात बांधले जाण्याचे फारसे कारण नसावे. एकाच व्यक्तिला पुन्हा पुन्हा कितीवेळा निवडून येता येते यावर काहीतरी निर्बंध येई पर्यंत तुम्ही म्हणता ते अवघड असावे.

In reply to by प्रसाद१९७१

आपले प्रधानमन्त्री पद टिकवायचेअसेल तर पक्षातील ५१ टक्के व लोकसभेतील ५१ टक्के मनांच्या तालावर नाचावे लागते. तिथे थुन्कतो या पदावर पण सत्यापासून ढळणार नाही हे लोकशाही पद्धतीत शक्य नाही. सबब न्यायालयेच काहीतरी भ्रष्टाचार दूर करू शकतील असे भाबडेपणाने जनतेला वाटते. जुडीशियल रिफॉर्म हा अण्णा हजारे यांचा नारा होता पण.........