Skip to main content

या चोरांचे काय करायचे?

लेखक विजुभाऊ
Published on शुक्रवार, 04/03/2016
मंडळी आपण सर्व मिपाकर येथे अतिशय प्रामाणीकपणे लिखाण करतो. काहिवेळा इथले लिखान दुसर्‍या संस्थळावर प्रकाशित करतो. इतर कोणाचे लिखाण इथे प्रकाशित केले तर त्याखाली मूळ लेखकाचे नाव लिहायला विसरत नाही. आपण सर्वजण हे असे करतो कारन आपण सर्वजण सभ्य आहोत. मात्र गेले काही दिवस एक विचित्र गोष्ट अनुभवास येत आहे. मिपावरील काही लेखनांचे इतरत्र प्रकाशन होत आहे. यात त्या लेखकाची परवानगी तर जाऊद्या पण साधे लेखकाचे नाव देखील दिले जात नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर मी परवा तात्या अभ्यंकरांच्या रौषनी बद्दल एक लेख वाचला. तसेच छो डॉन ने पुणेरी आयपील च्या अटी तर आंतरजालावर व्हायरल झाल्या होत्या. आपल्या मित्रांचे लिखाण लोक एकमेकाना फॉर्वर्ड करतात हे कौतुकास्पद आहे मात्र ते तसे करताना मूळ लेखकाचे नाव दिले जात नाही हा संतापजनक प्रकार आहे. अशा वांङ्मय चोरीला आळा घालणे कठीण आहे. टेक्नीकली मिपा संपादकीय मंडळाने यावर काही विचार केला तर हे जमू शकेल. ( उदा : कॉपी पेस्ट डिसेबल करणे वगैरे) तोपर्यन्त तरी अशा चोरांना आळा कसा घलाता येईल यावर कोणीतरी काही सुचवा. तुम्हाला एखादा असा लेख आढळला तर तो ज्याने पाठवला त्याला मूळ लेखकाचे नाव सांगा तसेच आपणही असा लेख फॉर्वर्ड करताना मूळ लेखकाचे नाव त्या खाली अ‍ॅड करून पाठवूया.

वाचन संख्या 4349
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

www.bedhundlahari.com येथेही बरेच चोरीचे लेख आहेत !!

औघड आहे ! याला आळा घालणे कठीण आहे. कॉपीराईट अ‍ॅक्टचा काही उपयोग होईल ?

तात्यांची रौशनी सिरीज एका ठिकाणी चोरली आहे.रामदास काकांच्या कविता दुसरीकडे पाहिल्या आहेत..छोट्या मोठ्या लेखन चोर्या चलतच राहतात..

बघुया एखादा तंत्रज्ञ काही ऊपाय काढतो का ते? चोप्य्पस्ते बंद करणे हा तेवढा सोपा ऊपाय वाटत नाही.

In reply to by मी-सौरभ

जालावरची कोणतीही गोष्ट सेफ नाही. फोटो , लेख ईतर काही. एकदा जालावर आले की ते कोणीही सहज कॉपी करू शकतो.

In reply to by कपिलमुनी

चोप्य्पस्ते बंद करणे हे तांत्रिकदृष्टया तितकेसे अवघड नसावे. ड्रुपलचे Copy Prevention मोडयुल उपलब्ध आहे त्यासाठी. वाङ्मयचौर्याचा "चोप्य्पस्ते" हा अतिशय सोपा मार्ग असला तरी एकमेव मार्ग नाही.
जालावरची कोणतीही गोष्ट सेफ नाही. फोटो , लेख ईतर काही. एकदा जालावर आले की ते कोणीही सहज कॉपी करू शकतो.
सहमत. वरील Copy Prevention मोडयुलच्या दुव्यात म्हटल्याप्रमाणे:
Anything you put out there in the Internet (public pages) is available for anyone else to copy and save/re-use. So if you really want your content to be safe and protected - do not put it online.

प्रत्येक चोरिवर कारवाई करता येइल पण त्या कोर्ट कचेरिसाठी वेळ अन पैसा कुठून आणनार ? मोठे खेळाडु दमले पायरसीपुढे तिथे तुम्ही आम्ही किती खर्च करणार ?

माझ्या काही लेख/ गोष्टी चोरी झाल्या होत्या. काहींचे ई मेल शोधून जाब विचारला. काहींनी माफी हि मागितली. काहींनी नाव खाली दिले, काहींनी कुठलेच औदार्य दाखविले नाही. काय करणार. ओळख - उचलगिरी करणाऱ्यांची http://www.misalpav.com/node/31899 या लेखात काहींची नावे दिली आहे.

धाग्यात व्यक्त केलेल्या काळजीशी सहमत.
कॉपी पेस्ट डिसेबल करणे
याने फारसा फरक पडत नाही. वेब पेज सेव्ह करून सगळा मजकूर सहजपणे मिळवता येतो. मागे मिपाकर गणेशाने अशाच एका धाग्यावर पूर्वी व्यक्त केलेले विचार आठवतात.
"तुम्ही माझी रचना स्वतःच्या नावावर खपवू शकता. परंतु ती लिहिताना मला मिळणारा नवनिर्मितीचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही".
शब्द थोडे फार वेगळे असतील पण विचार हाच होता.

सभासदा शिवाय लेख वाचायला परवानगी नसावी आणि सर्व सभासदांचे वैयक्तिक व्हेरिफिकेशन केल्या शिवाय अकाउंट क्रिएट करू नये,अशाने डुप्लिकेट id हि सहज बॅन होतील,आणि जे हि लेख आहेत ते सर्व jpg (इमेज)फॉरमॅट मध्ये प्रकाशित व्हावेत ।

बंदीपेक्षा प्रबोधन जास्त चांगला परिणाम करते.

या चोरट्यांच्या मायला,!!!! कॉलेज मधे असतानाची गोष्ट आहे, खुप सारी नरसाळी पोरं पोरी नेटवरनं ढापलेल्या कविता द्याची म्यागझीनात छापायला, तवा आमी संपादक मंडळात विद्यार्थी संपादक हुतो, तर लय वैताग याचा कॉपी आयटम न खर्या अभिव्यक्ती शोधायला. १सो१ कॉपी बहाद्दर भेटायचे, आमी मरायचो कि पहिल्या ३ मदी बसावं आपलं म्यागझीन आन हे खुशाल चोर्या करायचे आन आनुन द्याचे

www.bedhundlahari.com/ ही लिंक चालत नाहिय्ये. पण अशा चोरीसाठी काय करावे हे कळत नाही. जालावर लिखाण बंद करावे तर ते शक्य नाही.

शक्य तितक्या संस्थळावर एकाच वेळी प्रसिद्ध करावे. एकट-दुकट संस्थळावर लिहित राहल्यास लेखनकंडू शमतो पण अनेक संस्थळावर सातत्याने लिहित राहल्यास दोन फायदे होतात. एक, आपसूक पोहोच वाढते. चोराला प्रसिद्धीसाठी प्लेटफॉर्म मिळत नाही. सर्व संस्थलांवर नेहमी एकाच, खर्‍या नावाने लिहावे. तुमचे टोपणनाव कोणीही माझेच आहे म्हणून खपवू शकतो. चोर विनाकष्टाच्या प्रसिद्धीस हपापलेले असतात. त्या गरजेस आपले साहित्य उपयोगी पडणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजेच जिथे जिथे व्यापक जनसमुदाय आहे अशा सर्व संस्थळावर प्रसिद्धी करणे. थोडे कष्टाचे आहे पण नंतर येणारी उद्विग्नता टाळता येते, रसिकांचे प्रेमही मिळते, त्या प्रेमापोटी संरक्षणही. ज्यांनी वाचलंय ते अशी चोरी पटकन पकडतात.