Skip to main content

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ३

लेखक तुषार काळभोर यांनी शनिवार, 12/12/2015 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २ १०० प्रतिसाद झाल्याने (व सध्या संमं हायबरनेट झाल्याने,) मीच तिसरा भाग सुरू करतोय. जानेवारीच्या ८-१० तारखेला महाबळेश्वरला जायचे नियोजन आहे. (प्रेरणा: चौदहवी कि रात). मागच्या वेळी प्रतापगड रस्त्यावर मधुसागरच्या मागे असलेल्या ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. लोकेशन चांगलं आहे. एकदम जंगलाच्या मध्ये असल्यासारखं. खोल्याही चांगल्या आहेत. परत तिथेच जाणे हा पर्याय आहेच, तरी महाबळेश्वर मध्ये अजून राहण्यासाठी चांगली ठिकाणे माहिती असल्यास ती शेअर करावीत. बाजारपेठेमध्ये/लगत नकोय. मागच्या वेळी दोघे गेलो होतो. यावेळी दीड वर्षाचा मुलगाही बरोबर आहे. बजेट अंदाजे २५००-३००० प्रति रात्र. (स्वतःची गाडी न्यायची आहे. पार्किंगची व्यवस्था हवी.).हॉटेल्/रिसॉर्टमध्ये जेवण्याची व्यवस्था नसेल वा चांगली नसेल तरी चालेल. गावात जाऊन जेवता येईल. ठिकाण मात्र असे हवे जिथे 'कुटुंब' नेता येईल. धन्यवाद!

वाचने 54368
प्रतिक्रिया 176

प्रतिक्रिया

भारतासकट अनेक राष्ट्रे लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करून चाचणी उत्तीर्ण झाल्याचे जाहीर करतात. क्षेपणास्त्रांचा पल्ला काही शे किमी पासून काही हजार किमी पर्यंत असतो. समजा २००० किमी पल्ला असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी असेल तर प्रत्यक्षात लक्ष्य २००० किमी अंतरावर ठेवले असते का? इतक्या लांब ठेवलेल्या लक्ष्यावर क्षेपणास्त्र अगदी अचूक जाऊन आदळते का? तसे नसल्यास प्रत्यक्षात किती अंतरावर लक्ष्य ठेवून चाचणीचे निष्कर्ष काढतात?

In reply to by एस

मग समजा १ किमी = १० किमी असे प्रमाण ठरवून २०० किमी अंतरावर लक्ष्य ठेवले, आणि हे लक्ष्य भेदताना क्षेपणास्त्र ५ मीटर लक्ष्याबाहेर गेले म्हणजे प्रत्यक्षात ते ५० मीटर लक्ष्यापासून दूर जाईल का? की त्याला आणखी काही नियम लागू होतात?

In reply to by मोदक

मला याबद्दल काहीही माहिती नाही, पण एक अंदाज. १:१० :: ५:५० अशी लीनियर स्केल न ठेवता लॉगॅरिदमिक स्केल ठेवत असावेत.

आता फार दूरच्या लक्षावर हल्ला करणारी अस्त्रे निरुपयोगी झाली असावीत.अती वेगवान पण हलके अस्त्र त्याला आकाशातच गाठून भेदते.शिवाय gps गाइडेड असल्याने ते स्वत:च वेध घेते.( इराक युद्धातले पेट्रिअट.)

पहीली मुलाखत श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे. दुसरी मुलाखत श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे. वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत. मनातले छोटे विचार हल्ली मिपावरील लेखनाचा दर्जा खालावलाय का ? याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.

पहीली मुलाखत श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे. दुसरी मुलाखत श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे. वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत. मनातले छोटे विचार हल्ली मिपावरील गोंधळ फार वाढलाय का ? याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.

पहीली मुलाखत श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे. दुसरी मुलाखत श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे. वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत. मनातले छोटे विचार हल्ली मिपावरील गोंधळ फार वाढलाय का ? याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.

मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुण्यातुन कुठे फिरायला जायचे असेल (३-४ दिवस) तर एखादी जागा सुचवाल का? फार लांबचा प्रवास नको. फार दिवस हातात नसल्याने खुप काही पहाणे वगैरे हेतु नसुन हवापालट आणि निव्वळ टाईमपास म्हणुन जायचे आहे. माथेरान, महाबळेश्वर ते गोवा वगैरे नेहमीचे यशस्वी कलाकार पाहुन झालेले आहेत.

In reply to by पिलीयन रायडर

ईगतपूरी बघा. तिथे अश्विन नामक चांगले हॉटेल आहे. इच्छा असल्यास विपश्यना केंद्राला एकदा भेट देवू शकता. बाकी ब॑घण्यासारखे फारसे काही नाही (कळसूबाई, भंडारदारा ई आहे). सकाळ सायंकाळ गावातून चक्कर, कधी घाटात जावून सुर्यास्त बघणे वगैरे अनुभवू शकता. मार्च /एप्रिलमध्ये तापमान जास्त असू शकते एसी रुम्स घेणे बरे राहील.

In reply to by पिलीयन रायडर

आंबोलीला जाऊ शकता. प्रवास थोडा लांबचा आहे, पण २-३ दिवस घालवू शकाल. किंवा पन्हाळा-आंबा घाट हा भाग पण करू शकता.

गेल्या वर्षभरातील आलेल्या सिनेमातील रोमँटीक गाण्यांनी कॅसेट भरुन समजा कोणी देण्यासारखी भेटली तर कोणती गाणी द्यावीत कृपया सुचवावीत. म्हणजे समजा अशी लेटेस्ट रोमँटीक गाण्यांची कॅसेट बनवायचीय तर तुम्ही कुठली गाणी टाकणार ?

गेल्या वर्षभरातील आलेल्या सिनेमातील रोमँटीक गाण्यांनी कॅसेट भरुन समजा कोणी देण्यासारखी भेटली तर कोणती गाणी द्यावीत कृपया सुचवावीत. म्हणजे समजा अशी लेटेस्ट रोमँटीक गाण्यांची कॅसेट बनवायचीय तर तुम्ही कुठली गाणी टाकणार ?

मनवा लागे सावन आया है तूही तू तेरे बिना नाही लागे मोह मोह के धागे जीना जीना मस्त मगन कभी जो बादल बरसे सुनो ना संगेमरमर -बरीच निघतील.लगेच आठवली ती लिहिली.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ते मिपाचे लाईफगार्ड आहेत. संस्कृती, धर्म किंवा इतर काहीही बुडायला लागलं की "बुडत्याला धाग्याचा आधार" या न्यायाने धागा काढतात.

एक सिंगल 'की' बदलता येते म्हणून चिकलेट कीबोर्ड वाला लॅपटॉप घेतला. त्याची 'की' कुठे मिळेल कुणाला माहित आहे का?

राजकीय नेत्यांची भाषणे कोण लिहून देतात? त्यांचे पर्सनल असिस्टंट की भाषणे लिहिण्यासाठी वेगळी फौज असते? आणि म्येन शंका म्हणजे राहुल गांधीच्या वैयक्तीक सल्लागार समितीवर कोण आहे काही कल्पना आहे का? (सिरीयस शंका आहे - टीपीसाठी विचारलेले नाहीये. आणि ही माहिती मिळवून काही प्रोजेक्ट वगैरे करणार नाहीये. लै दिवसांची उत्सुकता आहे.)

लान्स नायक हनुमंताप्पा कालवश फार वाईट वाटल ही बातमी ऐकून.....
लान्स नायक हनुमंताप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
1

पेशव्यांच्या काळात जे कारंजे होते , ते कसे काम करीत होते ? म्हणजे आता जे कारंजे असतात त्यात विजेवर चालणाऱ्या मोटारी असतात. पण त्या काळात तर विजेवर चालणाऱ्या मोटारी नसतील ना !

In reply to by उगा काहितरीच

सायफुन पद्ध्त वापरत असावेत. दिल्लीच्या लाल महालात (शनिवार वाडा बांधायच्या बर्याच आधी) ही पद्ध्त वापर्त होते.

मला हार्ड डिस्क घ्यायची आहे. माझ्याकडे अमॅझॉनचं एक कूपन आहे १००० रुपयांचं आणि १००० कॅश बॅक मिळणार आहे. सिगेट आणि डब्लूडी असे २ ऑप्शन आहेत २ टीबी मधे, जे मला वाटतंय सफिशियंट आहेत माझ्यासाठी. ह्याच दोन पैकी घ्यायची असं नाही, पण रिव्यूज पॉजिटिव्ह आहेत म्हणून या दोन लिंक पेस्ट केल्या. सगळे ऑप्शन इथे आहेत. एक्स्टर्नल हार्ड डिस्कची माहिती असणार्‍यांनी कॄपया निवड करण्यासाठी सल्ला द्या.

In reply to by नाव आडनाव

मी WD ची वापरतो १ TB ची आहे माझ्याकडे . स्पिड चांगली आहे. बॕटरी कमी खाते, शिवाय वजनही जास्त नाही. सिगेट पेक्षा WD चांगली असे माझे मत . मित्राकडे सिगेट आहे. २ TB घ्यायची असेल तर वजन पाहून घ्यावी. आणी यात पार्टिशन होत नाहीत त्यामुळे डेटा सॉर्ट करायला अवघड जाते. माझ्याकडे ही आहे . आणी अजून एक याचा उपयोग pen drive सारखा केला आणी चुकून व्हायरस आला तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. मी याचा उपयोग Back-up साठीच करतो.

In reply to by उगा काहितरीच

याच्याशी सहमत. सिगेट वाईट नसेल, पण वेस्टर्न डिजीटल आवडते मला.बाकी दोन्ही रिलायबल आहेत.(१००% रिलायबल काहीच नसते. कोणतीही हार्डडिस्क घेतल्यावर दुसर्‍यादिवशी बंद पडू शकते.) दुसरं काही शक्यतो घेऊ नका.

श्री संजय सोनवणी यांनी त्यांच्या फेसबुकवर केलेले आवाहन इथे डकवत आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ मदत हवी. शेतक-यांसाठी थेट खरेदी विक्रीचे माध्यम असावे म्हणून App आणि Portal बनवायचे काम सुरु आहे. त्यात धान्य, कडधान्य . फळे, भाज्या, फुले इत्यादिंचा समावेश असेल. हे इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेत असेल. मदत ही हवी कि कोणी मला धान्ये-कडधन्ये, भाज्या, फळे, फुले यांची इंग्रजी नांवे व त्यांचे हिंदी व मराठीतील पर्यायी नांवे याची यादी पुरवु शकेल काय? मला काही माहित असली तरी मग इंग्रजी नांवे माहित नाहित किंवा मग हिंदी नांवे माहित नसतात. य झटापटीत वेळ जातो आहे. तरी उदारहृदयी मित्रांनी मदत करावी. एखाद-दुसरे सुचवून उपयोग नाही. यादी शक्यतो येथे न देता मेल करावी ही नम्र विनंती. sanjaysonawani@gmail.com

आस्थापनांनी (दुकान, हॉटेल ई) स्थानिक भाषेत नामफलक लावणे बंधनकारक आहे (म्हणजे महाराष्ट्रात मराठीतून सोबत इतर भाषेतून लावू शकतातच पण मराठी सक्तीचे) आता या नियमाची /कायद्याची अंमलबजावणी करणे हे कोणाचे कर्तव्य आहे ? मागे मी PCMC च्या संकेतस्थळावर दोन हॉटेल्सची तक्रार छायाचित्रांसकट टाकली होती मात्र ही गोष्ट PCMC च्या अखत्यारीत येत नाही असा शेरा देत ही तक्रार बंद करण्यात आली. या संदर्भात कुणाकडे (मनसे सोडून) तक्रार करावी याचे कृपया नेमके मार्गदर्शन करावे