Skip to main content

कोणते हे "मुल निवासी नायक" दैनिक ज्याने स्वामी समर्थ, गजानन महाराज, आणि साईबाबा संत नव्हेत असे म्हटले

लेखक प्रमोद देर्देकर यांनी सोमवार, 16/12/2013 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाचनात एक अनुदिनि आली की जिने फक्त ब्राह्मण ह्या जाती विरुद्ध लिहण्याचा जणु विडा उचलला आहे. या अनुदिनीने मला अजुन एक दैनिक "मुलनिवासी नायक" जे औरंगाबाद येथुन प्रसिद्ध होते या वृत्तपत्राचे एक पान डकवले ज्यात असे लिहले होते की , साईबाबा नेमके कोण होते, त्याच बरोबर श्री गजानन महाराज आणि अक्क्लकोट स्वामी महाराजाविषयी आक्षेपार्ह लिखाण केलेले आढळले त्या पानास इथे डकवले आहे. या पत्रा द्वारे ते म्हाणतात की १८५७ साली जे बंड झाले पण ते पुढे फसले. त्या बंडात सहभागी असलेले तात्यासाहेब टोपे, आणि नानासाहेब पेशवे हे भगवे वेष परिधान करुन भुमिगत झाले (इंग्राजांपासुन दुर पळण्याण्यासाठी) आणि त्यातील तात्या टोपे हे श्री गजानन महाराज म्हणून तर नानासाहेब पेशवे हे शिर्डीचे साईबाबा म्हणून प्रकटले असे म्हटले आहे. तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दुसरे कोणी नसून पानिपतच्या युद्धभुमी वरुन पळालेले सदाशिवराव भावु आहेत असा शोध लावाला आहे. तर वर उल्लेखलेल्या अनुदिनीचा पत्ता अनिता पाटिल.ब्लोगस्पॉट असा आहे. सदर अनुदिनीमध्ये सवर्णद्वेष सहज पणे दिसुन येतो. खालील काही लेखाचे फक्त शिर्षक मी उदाहरणे देत आहे. १). शिवरायांचा अवसानघात करणारा 'कु'मंत्री मोरोपंत २). रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता ३). शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला ४). शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे ५). एका लेखातील हा उल्लेख "औरंगजेबाने राजांना धर्मांतराचा आग्रह धरला नव्हता व संभाजीराजांनी धर्मांतरासाठी मुलीची मागणी केली नव्हती. राजांची हत्या झाल्यानंतर ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन गुढीपाडवा सुरु केला." ( हसायला येते). ६). शेफारलेले बाळे आणि बाळ्या ( इथे सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा दद्वेष) ७). हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही! ८). या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या ९). ब्राह्मणांच्या अश्लिल शिव्या १०). सनी लिओनला भारतरत्न का नाही? Why Bharat Ratna Not Been Conferred On Sunny Leone (हसून हसून पुरी वाट :-))) ) ११). अटल अटल, बोलत सुटल (वाजपेयीं विषयी द्वेष) १२). लोकमान्य नव्हे भटमान्य ११). प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का? सावरकर : फाळणीचे गुन्हेगार ही अनुदिनी संपूर्णपणे ब्राह्मणद्वेषी लिखाण करण्यास वाहलेली आहे. माझी आपल्या मी.पा.वरिल श्री. जयंत कुलकर्णी , श्री. इन्द्रजित पवार या इतिहासप्रेमी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी यावर काही प्रकाश टाकावा. धन्यवाद

वाचने 45050
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

In reply to by म्हैस

>>तो गझनी एवढ्या लांब येवून इथली देवळे पडतो तेव्हा देव तुम्हाला म्हणाला होता का नुसत माकडासारख बघत बसा म्हणून? गो बाये!! माणसापेक्षा देव बलवान ना? मग त्यानंच स्वतःच रक्षण का नाय केलंन्?

बास करा आता

गो बाये!! माणसापेक्षा देव बलवान ना? मग त्यानंच स्वतःच रक्षण का नाय केलंन्?
अरे पण देव फक्त देवळात असतो , देवूळ वाचाव्ल्याने देवाचं रक्षण होतं अस कुणी सांगितलाय तुम्हाला? देवूळ फोडल्याने का कुठं देवाचं अस्तित्व नष्ट होतं? तसं असतं तर हा गझनी कीस झाड कि पत्ती ? देवाच्या सामर्थ्याची कल्पना सामान्य माणसाच्या आवाक्यात आहे का?देवळाच रक्षण करण हे आपल कर्तव्य आहे . गझनीच्या वेळचा इतिहास जर आपण वाचला असेल तर आपल्या लक्षात येईल अफाट संपत्ती , सगळ्या सुखसोयी असल्यामुळे आपले लोक , राजे रजवाडे कसे नुसते ऐतखावू झाले होते

In reply to by म्हैस

अरे पण देव फक्त देवळात असतो , देवूळ वाचाव्ल्याने देवाचं रक्षण होतं अस कुणी सांगितलाय तुम्हाला?
असं असेल तर
देवळाच रक्षण करण हे आपल कर्तव्य आहे
तर यात विरोधाभास नाही का? आणि
देवाच्या सामर्थ्याची कल्पना सामान्य माणसाच्या आवाक्यात आहे का?
इतका सामर्थ्यवान देव चार देवळेही वाचवू शकला नाही तर...हॅ हॅ हॅ, बाकीचे सोडाच.

In reply to by म्हैस

>>अरे पण देव फक्त देवळात असतो , देवूळ वाचाव्ल्याने देवाचं रक्षण होतं अस कुणी सांगितलाय तुम्हाला? देवूळ फोडल्याने का कुठं देवाचं अस्तित्व नष्ट होतं? तेच की !! ही तुमची अक्कल 'तो गझनी एवढ्या लांब येवून इथली देवळे पडतो तेव्हा देव तुम्हाला म्हणाला होता का नुसत माकडासारख बघत बसा म्हणून?' हे लिहीताना तुमची बुद्धी कोणत्या कुरणात चरायला धाडली होतीत ते सांगाल का, म्हैसबाई? देव सगळीकडे असतो मग देऊळ पाडलंनीत किंवा ठेवलंनीत काही फरक पडत नाही ही उपरती आता कशी झाली? बाकी प्रत्येक धाग्यावर आपला आयडी सार्थ करुन दाखवायचं ठरवलंच असाल तर तुमचं चालू द्या. इति लेखनसीमा !!

In reply to by म्हैस

देवूळ वाचाव्ल्याने देवाचं रक्षण होतं अस कुणी सांगितलाय तुम्हाला? हायला, म्हशे, मग बाबरी पाडून देऊळ बांधायची काय गरज आहे गं ? :)

सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या तर देवाची गरजच काय
देवाची गरज काय आहे हे समजणं तुझ्या बुद्धीच्या बाहेरचं आहे बाळा . त्यामुळे तू त्याचा विचार करणं सोडून दे. वेळ आली कि तुला ते आपोआप समजेलच . तोपर्यंत वाट बघत बस .
तुमच्यासारख्यांमुळे भोंदूबाबांचं फावतं.
देवाचा , आमच्यासारख्या लोकांचा भोन्दुबाबांशी काय संबंध? भोंदूबाबा तर तुमच्या सारख्या लोकांना गंडवायला बसलेत . कारण देव म्हनला कि भोंदू बाबा आला हे तुमच्यासारख्या लोकांचं समीकरण आहे

In reply to by म्हैस

शेप्रेट प्रतिसाद देणार होतो पण सुडक्यानें माझें कष्ट वाचवलेंनीत (व्याक्रण ब्रोब्र आहे का रे?).
ही तुमची अक्कल 'तो गझनी एवढ्या लांब येवून इथली देवळे पडतो तेव्हा देव तुम्हाला म्हणाला होता का नुसत माकडासारख बघत बसा म्हणून?' हे लिहीताना तुमची बुद्धी कोणत्या कुरणात चरायला धाडली होतीत ते सांगाल का, म्हैसबाई? देव सगळीकडे असतो मग देऊळ पाडलंनीत किंवा ठेवलंनीत काही फरक पडत नाही ही उपरती आता कशी झाली? बाकी प्रत्येक धाग्यावर आपला आयडी सार्थ करुन दाखवायचं ठरवलंच असाल तर तुमचं चालू द्या. इति लेखनसीमा !!
इतकी देवभक्त म्हैस आमच्यासारख्या मूर्ख मर्त्य लोकांबरोबर विकारांच्या चिखलात डुंबत बसते याची बाकी मौज वाटली. तुमच्या देवाला चालतं का गं हे? मारे देवदेव करायचं अन शंका उपस्थित केली की शिव्या घालायच्या. हेच का तुमचे उच्च आचरण?

असं असेल तर
जर तर च्या गोष्टी कशाला करताय? ते सत्य आहे ते बोला ना .
इतका सामर्थ्यवान देव चार देवळेही वाचवू शकला नाही तर
देवून देवाने बांधलेल नाहीये . ते माणसाने बांधलेल आहे . तेव्हा देवळ वाचवण्याची जबाबदारी माणसांची आहे . देवाची नाही .

In reply to by म्हैस

देवून देवाने बांधलेल नाहीये . ते माणसाने बांधलेल आहे . तेव्हा देवळ वाचवण्याची जबाबदारी माणसांची आहे . देवाची नाही .
इन द्याट केस, काही क करता वर नुस्ता तमाशा बघत बसणार्‍या आणि भक्ती केली नाही म्हणून लहान मुलागत चिडणार्‍या देवाची उपासना करणे या भंपक फंदात लोकांनी का म्हणून पडावे? सगळाच भ्रामक अन भंपक प्रकार.

करण्याच्या उद्देशाने लिहिलेले नसून ब्राह्मणांना त्यांच्या ब्राह्मणत्वाची आठवण करून देण्यासाठी लिहिलेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भारतीय संविधानाची आधारभूत तत्वे या देशात परंपरेने चालत आलेल्या वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यांच्या मुळांवरच घाव घालत आहेत. ही प्रक्रिया थांबवून ती उलट फिरवणे हेच असल्या लेखनाचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था ह्यांची आधारभूत तत्वे असल्या प्रचारकी लेखनाच्या माध्यमातून जनतेच्या विचारप्रक्रियेत खोलवर रुजवून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्यांच्या मुळांवरच घाव घालणे हा खरा उद्देश आहे.

मनात ब्राह्मणांविषयी ज्या काही बर्‍या वाईट भावना आहेत त्या तुम्च्या पाशीच ठेवा. इथे मळमळ काढु नका. अजुन बरेच धागे आहेत तुम्ची ब्राहणांविषयीची मते सांगायला. तिकडे बोला.
हा हा . झोंबल न. सत्य कटूच असतं . बरं असे कुठले धागे आहेत ते तरी जर सांगा . अहो तुम्हाला नुसतं बोललं तर एवढा राग येतो … मग ज्यांनी ते सोसलंय त्यांनी काय म्हणावं? आणि तुम्ही हाथ पाय आपटल्याने जे आहे ते बदलणार नहिये. मला दटावून तुम्ही गप्पं बसवलं हो पण सगळं जग बोलताय त्याचं काय करणार? बाकी तुमचा इतिहासाचा अभ्यास मला चांगलाच माहित आहे .
बाकी प्रत्येक धाग्यावर आपला आयडी सार्थ करुन दाखवायचं ठरवलंच असाल तर तुमचं चालू द्या.
मी कुठल्या धाग्यावर प्रतिसाद द्यायचा कुठल्या नाही हे तुम्ही सांगायची गरज नहि. तुम्हाला आवडत नसेल तर वाचू नका माझे प्रतिसद. @बॅटमॅन --- हाथी जाता हे जाने दो, कुत्ता भोकता हे भोक्ने दो :-)

In reply to by बॅटमॅन

तेच लिहीणार होतो, पण हल्ली त्या क्रियापदाने प्रतिसाद उडतात म्हणे. म्हणून थोडं डायल्युट केलं.

In reply to by म्हैस

हा हा . झोंबल न. सत्य कटूच असतं . बरं असे कुठले धागे आहेत ते तरी जर सांगा . अहो तुम्हाला नुसतं बोललं तर एवढा राग येतो … मग ज्यांनी ते सोसलंय त्यांनी काय म्हणावं? आणि तुम्ही हाथ पाय आपटल्याने जे आहे ते बदलणार नहिये. मला दटावून तुम्ही गप्पं बसवलं हो पण सगळं जग बोलताय त्याचं काय करणार? बाकी तुमचा इतिहासाचा अभ्यास मला चांगलाच माहित आहे .
शुभेच्छा..!