Skip to main content

कोणते हे "मुल निवासी नायक" दैनिक ज्याने स्वामी समर्थ, गजानन महाराज, आणि साईबाबा संत नव्हेत असे म्हटले

लेखक प्रमोद देर्देकर यांनी सोमवार, 16/12/2013 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाचनात एक अनुदिनि आली की जिने फक्त ब्राह्मण ह्या जाती विरुद्ध लिहण्याचा जणु विडा उचलला आहे. या अनुदिनीने मला अजुन एक दैनिक "मुलनिवासी नायक" जे औरंगाबाद येथुन प्रसिद्ध होते या वृत्तपत्राचे एक पान डकवले ज्यात असे लिहले होते की , साईबाबा नेमके कोण होते, त्याच बरोबर श्री गजानन महाराज आणि अक्क्लकोट स्वामी महाराजाविषयी आक्षेपार्ह लिखाण केलेले आढळले त्या पानास इथे डकवले आहे. या पत्रा द्वारे ते म्हाणतात की १८५७ साली जे बंड झाले पण ते पुढे फसले. त्या बंडात सहभागी असलेले तात्यासाहेब टोपे, आणि नानासाहेब पेशवे हे भगवे वेष परिधान करुन भुमिगत झाले (इंग्राजांपासुन दुर पळण्याण्यासाठी) आणि त्यातील तात्या टोपे हे श्री गजानन महाराज म्हणून तर नानासाहेब पेशवे हे शिर्डीचे साईबाबा म्हणून प्रकटले असे म्हटले आहे. तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दुसरे कोणी नसून पानिपतच्या युद्धभुमी वरुन पळालेले सदाशिवराव भावु आहेत असा शोध लावाला आहे. तर वर उल्लेखलेल्या अनुदिनीचा पत्ता अनिता पाटिल.ब्लोगस्पॉट असा आहे. सदर अनुदिनीमध्ये सवर्णद्वेष सहज पणे दिसुन येतो. खालील काही लेखाचे फक्त शिर्षक मी उदाहरणे देत आहे. १). शिवरायांचा अवसानघात करणारा 'कु'मंत्री मोरोपंत २). रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता ३). शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला ४). शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे ५). एका लेखातील हा उल्लेख "औरंगजेबाने राजांना धर्मांतराचा आग्रह धरला नव्हता व संभाजीराजांनी धर्मांतरासाठी मुलीची मागणी केली नव्हती. राजांची हत्या झाल्यानंतर ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन गुढीपाडवा सुरु केला." ( हसायला येते). ६). शेफारलेले बाळे आणि बाळ्या ( इथे सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा दद्वेष) ७). हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही! ८). या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या ९). ब्राह्मणांच्या अश्लिल शिव्या १०). सनी लिओनला भारतरत्न का नाही? Why Bharat Ratna Not Been Conferred On Sunny Leone (हसून हसून पुरी वाट :-))) ) ११). अटल अटल, बोलत सुटल (वाजपेयीं विषयी द्वेष) १२). लोकमान्य नव्हे भटमान्य ११). प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का? सावरकर : फाळणीचे गुन्हेगार ही अनुदिनी संपूर्णपणे ब्राह्मणद्वेषी लिखाण करण्यास वाहलेली आहे. माझी आपल्या मी.पा.वरिल श्री. जयंत कुलकर्णी , श्री. इन्द्रजित पवार या इतिहासप्रेमी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी यावर काही प्रकाश टाकावा. धन्यवाद

वाचने 45050
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

In reply to by अनिरुद्ध प

KODAK या कम्पनीच्या विदेशी माणसाने त्यांचा फोटो काढला होता असे ऐकुन आहे,बाकी काही नाही.
आता कॉड्याक कंपनीच्या पहिल्या फोटोचे उगमवर्ष शोधणे आले. सापडले.. १८९२ (अक्षरी अठराशे ब्याण्णव) साली कंपनी स्थापन झाली असे दिसते. सतराशेच्या शतकात स्वामी समर्थ असतील तर तेव्हाच कॉड्याकचे प्री-लाँच बुकिंगरुपात पदार्पण झाले असावे असे वाटून कॉड्याकविषयीचा आदर वाढला.

In reply to by गवि

>>>कॉड्याकचे प्री-लाँच बुकिंगरुपात पदार्पण झाले असावे असे वाटून कॉड्याकविषयीचा आदर वाढला. *lol*

In reply to by गवि

मी माझी माहिती ही ऐकीव आहे असे उध्रुत केले आहे ते खरेच आहे असे माझे म्हणने नाही,तसेच वरिल प्रतिसादात श्री बट्ट्मण्ण यानी श्री स्वामी समर्थ हे एकोणिसाव्या शतकात होते असे म्हटले आहे,तेव्हा माझे वाचन योग्य असावे असे वाटले,म्हणुनच हा प्रतिसाद देण्याची हिम्मत केली,बाकी मी काही ईतिहास अभ्यासक वगैरे नाही,माझी माहीती चुकिची असेल तर क्षमस्व.

In reply to by अनिरुद्ध प

क्षमस्वबिमस्व नको हो लगेच. जरा गंमत केली इतकंच. त्यानिमित्ताने अतिअवांतर करुन पाहतो. नॅशनल जॉग्राफिकच्या वेबसायटीवरुन जगातला पहिला फोटोग्राफ १८२६ साली काढला गेलेला, पाहायला मिळाला. A अधिक माहितीचा दुवा: http://photography.nationalgeographic.com/wallpaper/photography/photos/…

In reply to by बॅटमॅन

त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक कमीतकमी. आता औतारबितार म्हण्णार असाल तर आमची अळीमिळी गुपचिळी
गुपचिळीच श्रेयस्कर आहे बॅट्या! ऐकीव कथा अशी की श्री नृसिंह सरस्वती तप करण्यासाठी (का समाधीसाठी? तपशील विसरलो) जंगलात गेले. पुढिल ३००+ वर्षांत तिथे त्यांच्या भोवती एक वारूळ तयार झाले. एकदा एका लाकूड तोड्याने ते वारूळ फोडले तर आतून श्री समर्थ प्रकटले.चुभुद्याघ्या

In reply to by बॅटमॅन

नाही बॅट्या हे अगदि असेच त्रोटक वर्णन मराठी विकीपिडियावर दिले आहे.
जीवन[संपादन] विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून ते प्रकट झाले, अशी मान्यता प्रचलित आहे.[१] त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले. इ.स. १८५६-इ.स. १८५७ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. इ.स. १८७५ सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना "सध्या लढायची वेळ नाही" असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. सबसे बडा गुरू.. गुरूसे बडा गुरू का ध्यास.. और उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज... इ.स. १४५७ च्या सुमारास (माघ वद्य १, शके १३८०)[२] श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली व ती वारूळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उद्धवाचे निमित्त साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली - तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज...

In reply to by प्रमोद देर्देकर

असेल हो, अमुक अमुक कथा असेल याबद्दल अविश्वास नव्हताच. कथेच्या सत्यतेवर अविश्वास दर्शवला इतकेच. नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या दोन्हीही व्यक्ती भूतलावर प्रत्यक्ष होऊन गेल्या हे मलाही पटतेच. पण ते ३०० वर्षे वैग्रे पटत नाही. कुणाला पटत असेल तर पटो बापडे.

In reply to by ऋषिकेश

ही कथा पहिल्यांदाच समजतेय. त्या बद्दल धन्यवाद. गुपचिळीबद्दल सहमत. अशा कथांमधे उगाच अती लॉजिक लावत बसू नये, काही उपयोग होत नाही.

In reply to by उद्दाम

लोकांमध्ये बरेच समज गैरसमज पसरावण्यात येतात असे वाटते.

आम्ही आपले स्वामीच्या चरणी पाया पडतो......बाकी त्याचा इतिहास तपसायचा प्रयत्न केलेला नाही.जय जय स्वामी समर्थ....

In reply to by वेताळ

सुद्धा श्री स्वामी समर्थांच्या पायाच पडतो,पण हे ऐकीव सन्दर्भ हे फोटोसहीत आहेत हे वाचनात आले आहे हाच माहीत असलेला ईतिहास ईथे व्यक्त केला ईतकेच.

ऐसी अक्षरे वरील हा प्रतिसाद वाचावा - http://www.aisiakshare.com/node/1190#comment-15792 हा ब्लॉग अनिता पाटील या फेक नावाने कोणी एका पुरुषाने लिहिला होता, त्याबद्दल बऱ्याच दिवसापूर्वी अगदी त्याला कसे पकडले ह्याचे साद्यंत वर्णन वाचले होते, तो दुवा आत्ता सापडत नाही आहे, सापडल्यावर देतो. वरील लिंक मध्ये या ब्लॉगरची माहिती आहेच.

In reply to by प्रसाद प्रसाद

ते सगळं मान्य. पण ह्या प्रतिसाद ज्या कोणा व्यक्तीचा आहे त्याचंच नाव ब्लॉगवर हे (बाई/ बुवा) अभिमानाने मिरवतंय ते पाह्यलं का? दुर्लक्ष करा राव. असले धागे काढून आणि लिंका देऊन माहिती नसणार्‍यांना पण हा ब्लॉग माहिती करुन देण्याचं काम फुकटात होतंय. मन चिंती ते वैरी न चिंती: प्रमोद देर्देकर ह्याच ऐसि वरच्या सुप्रिया जोशी, अनिता पाटील आणि रविंद्र तहकीक तर नव्हेत? दया कुछ तो गडबड है !! ;)

>>>>>> या पत्रा द्वारे ते म्हाणतात की १८५७ साली जे बंड झाले पण ते पुढे फसले. त्या बंडात सहभागी असलेले तात्यासाहेब टोपे, आणि नानासाहेब पेशवे हे भगवे वेष परिधान करुन भुमिगत झाले आणि त्यातील तात्या टोपे हे श्री गजानन महाराज म्हणून तर नानासाहेब पेशवे हे शिर्डीचे साईबाबा म्हणून प्रकटले असे म्हटले आहे. खरं तर असा एक लेख कोणत्या तरी मासिकात छापून आल्याचं मला आठवतं. बाकी वरच्या सर्व गोष्टी थोतांड आहेत पण काही शक्यता तपासता येतात का ? नसेल तर सोडून द्यावे. -दिलीप बिरुटे

इथे सवर्ण एकमेकांशी भांड्तायेत . त्याच्याशी आपल्याला काही देण घेण नहि. पण गजानन महाराज , स्वामी समर्थांचा उल्लेख आला म्हणून हा प्रतिसाद . प्रमोद देर्देकर - अगदी सहमत . ज्यांना पटत नसेल त्यांनी सोडून द्यवे. ज्यांना अनुभव हवा असेल त्यांनी घ्यावा . ३०० वर्षे सामान्य लोकांसाठी खूप जास्त आहेत म्हणून आपला विश्वास बसत नाही . ईश्वरासाठी ३०० वर्षे काहीच नाहीत . अजून १ गोष्ट . इथे ब्राह्मणांचा द्वेष करायचा नाहीये पण हे सत्य आहे कि मुसलमान राजवटीत ह्या ब्राह्मणांना भिक मागणं सुधा मुश्किल झाल होत. देवाची पूजा करणं , मंदिरात जाण सुधा दुरापास्त झालं . शिवाजी महाराजांनी ह्यांना भयमुक्त केलं . पण महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला 'शिवाजी भोसले' क्षत्रिय नाहीत म्हणून त्यांना राज्याभिषेक करता येणार नाही म्हणून १ सुधा ब्राह्मण तयार झाला नहि. शेवटी जिजाबाई ना काशीहून गागाभात्तांना बोलवावं लागलं . बाकी ब्राह्मणांचे हजारो वर्षांपासून चालत आलेले प्रताप तर सगळ्यांनाच माहित आहेत

In reply to by म्हैस

३०० वर्षे सामान्य लोकांसाठी खूप जास्त आहेत म्हणून आपला विश्वास बसत नाही . ईश्वरासाठी ३०० वर्षे काहीच नाहीत .
अगदी बरोबर, तरी शंका येते की गझनीचा महमूद किंवा खिलजी वैग्रे लोक तिथे देवळे पाडापाड करीत असताना हे भगवंतराव काय स्वर्गलोकाच्या टूरला गेले होते का?

In reply to by बॅटमॅन

अगदी बरोबर, तरी शंका येते की गझनीचा महमूद किंवा खिलजी वैग्रे लोक तिथे देवळे पाडापाड करीत असताना हे भगवंतराव काय स्वर्गलोकाच्या टूरला गेले होते का? >>>> अगगग !! =))

In reply to by बॅटमॅन

*lol* अरे? आपलं काय ठरलंय? लॉजिक शोधायचं नाही. आहे हे असं आहे. कथा आहेत राव त्या, इतिहास थोडीच आहे. :)

In reply to by थॉर माणूस

होय ओ, कथाच आहेत, पण त्यांवर कुणी लिटरली विश्वास ठेवू लागलं की अशा शंका येतात, तोपर्यंत सगळं ठीक असतं. ;)

In reply to by म्हैस

इथे ब्राह्मणांचा द्वेष करायचा नाहीये पण हे सत्य आहे कि मुसलमान राजवटीत ह्या ब्राह्मणांना भिक मागणं सुधा मुश्किल झाल होत. देवाची पूजा करणं , मंदिरात जाण सुधा दुरापास्त झालं . शिवाजी महाराजांनी ह्यांना भयमुक्त केलं . पण महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला 'शिवाजी भोसले' क्षत्रिय नाहीत म्हणून त्यांना राज्याभिषेक करता येणार नाही म्हणून १ सुधा ब्राह्मण तयार झाला नहि. शेवटी जिजाबाई ना काशीहून गागाभात्तांना बोलवावं लागलं . बाकी ब्राह्मणांचे हजारो वर्षांपासून चालत आलेले प्रताप तर सगळ्यांनाच माहित आहेत
त्याकाळच्या ब्राह्मणांनी केलेला विरोध कुठच्या ऐतिहासिक दस्तावेजात नमूद आहे ?? कारण हा मुद्दा गेली काही वर्ष चेपू अन ओर्कुट वरून फिरतोय पण कुठेही त्याचा संदर्भ दिलेला वाचनात आला नाही. तो विरोध नसून; राज्याभिषेकासाठी क्षत्रिय असणे गरजेचे असून त्याबाबत काय स्टान्स घ्यावा अशी शंका उपस्थित केली गेली असावी, असा खुलासा हि वाचल्याचे स्मरते.

In reply to by म्हैस

इथे ब्राह्मणांचा द्वेष करायचा नाहीये
आणि मग लगेच हे ही...
बाकी ब्राह्मणांचे हजारो वर्षांपासून चालत आलेले प्रताप तर सगळ्यांनाच माहित आहेत
ऑं?? बाई.. मिळाला वेळ म्हणुन काहीही लिहीत सुटणार का? धागा काय, तुम्ही लिहीताय काय? उगाच जातीची भांडणं इथे आणु नकात. तुमच्या मनात ब्राह्मणांविषयी ज्या काही बर्‍या वाईट भावना आहेत त्या तुम्च्या पाशीच ठेवा. इथे मळमळ काढु नका. अजुन बरेच धागे आहेत तुम्ची ब्राहणांविषयीची मते सांगायला. तिकडे बोला.

In reply to by पिलीयन रायडर

बाकी काही असो पण संस्कृत विद्या स्वतःपुरतीच ठेवणे ही ब्राह्मणांची घोडचूक होती. शिवाय ते अन्य जातींच्या धंद्यांत घुसायचे पण अन्य जातींचा त्यांच्या धंद्यातला शिरकाव त्यांनी कधी खपवून घेतला नाही- लै थोडे अपवाद आहेत त्याला.

In reply to by बॅटमॅन

कोण म्हणतय की चुका केल्या नाहीत ब्राहमणांनी? पण माझे २-३ प्रश्न आहेत (तुलाच असे नाही..) १. अशी कोणती जात आहे ज्यांच्या कडुन चुका झाल्याच नाहीत? माणुस म्हणला की चुक आलीच.. २. बर तरी खुप मोठी चुक आहे, नाही विसरता येणार... पण म्हणुन वाट्टेल ते बरळायच कारण नाही. पुरावे द्या आणि बोला. तसं नसेल तर अनिता पाटीलचा ब्लॉग आणि असे प्रतिसाद ह्यात फार फरक रहाणार नाही. (तसही ब्राहमण विषयावर गरळ ओकणार्‍या लोकांकडुन मी कधीही लॉजिकल प्रतिवाद ऐकला नाहीये.. ते फक्त आधंळा द्वेष करतात.. अशां सोबत बोलायची गरजही वाटत नाही खरं तर) ३. मुख्य प्रश्न.. ब्राह्मण आणि त्यांच्या चुका हा या धाग्याचा विषय आहे का? मग ओढुन ताणुन का उतरायच त्या विषयावर..? असा सुरु होऊन मग तो परत आरक्षण आणि इ टिपि़कल मुद्द्यावर येणार. आणि तरीही चर्चा करायची असेल तर ह्याच विषयाला वाहीलेले अनेक धागे आहेत, ते वापरा / स्वतःचा धागा काढा.

In reply to by पिलीयन रायडर

अशी कोणती जात आहे ज्यांच्या कडुन चुका झाल्याच नाहीत? माणुस म्हणला की चुक आलीच..
या कार्पेटखाली ब्राह्मण किंवा अन्य जातींच्या चुका झाकणे चूक आहे. बाकी अनिता पाटील अँड हर इल्क हे लोक फक्त आंधळा द्वेष करतात यावर दुमत असायचे कारण नाही. फक्त आपल्या चुकांवर पांघरूण घालू नये इतकेच म्हणावयाचे आहे. असो. बाकी एका वाक्यावरून इतके वर्क्ड अप व्हायचे कारणही नव्हते असे मला वाटते. कारण अशा हजारो निर्गुणी मतपिंका तथाकथित उदंड विद्या शिकलेले टाकत असतात. पण त्यांमधील म्याटर पाहता "त्याला कोण पुसे?" असेच म्हणावे लागते. असो.

In reply to by बॅटमॅन

बर आता तु म्हणतोयस तर असो.. फक्त धागा आणि विषय न पहाता कसहि करुन ह्याच विषयावर उतरणे ह्या प्रकाराचाच कंटाळा आलाय..

In reply to by बॅटमॅन

>>>संस्कृत विद्या स्वतःपुरतीच ठेवणे ही ब्राह्मणांची घोडचूक होती. संस्कृत ब्राह्मणांपुरती नव्हती. संस्कॄतमधे जैन आनि बौद्धांनी खुप लिहिले आहे. अब्राह्मण हिंदूंच्या किती रचना आहेत याची गणतीच नाही. (उदा. वाल्म्इकी आणि व्यास ब्राह्मन नव्हते.) ब्राह्मणांकदे होती ती केवळ कर्मकांडाची निरर्थक बडबड. तिला तेव्हाही अर्थ नव्हता आजही नाही. ब्राह्मणांपाशी अशी कोनतीही विद्या नव्हती जी दिली नाही म्हणून समाजाचं नुकसान झालं. आजही जेव्हा कर्मकांडाची विद्या (!) सर्वांना उपलब्ध आहे तेव्हा ती शिकणारे किती? आणि असे शिकलेले असूनही त्यांना न बोलावता केवण बामनालाच बोलवणारे किती?

In reply to by मारकुटे

कृष्ण द्वैपायन सत्यवतीच्या पोटी पराशर ऋषींशी तिच्या असलेल्या संबंधातुन जन्मले. पराशर ऋषी माझ्या मते ब्राह्मण होते. सत्यवती नव्हती. अश्या संततीला माझ्या मते ब्राह्मणच संबोधिले जायचे. बाकी त्याकाळी ब्राह्मणांकडे ज्ञान नव्हते ("ब्राह्मणांकदे होती ती केवळ कर्मकांडाची निरर्थक बडबड") हे अतिशय हास्यास्पद विधान आहे.

In reply to by मृत्युन्जय

मनुस्मृती ब्राह्मण पुरुष आणि शुद्र स्त्रीच्या संतानाला काय म्हणते? हास्यास्पद विधानाबद्दल तुमचे मताचा आदर आहे. मात्र असेच विचार कुरुंदकरांचे पण होते. कुरुंदकर कोण असा प्रश्न हास्यास्पद होऊ शकतो.

In reply to by मारकुटे

महाभारत काळ मनुस्मृतीच्या अगोदरचा आहे सबब मनुस्मृतीचे क्लासिफिकेशन महाभारताला लावणे मूर्खपणा आहे.

In reply to by मारकुटे

महाभारत ग्रंथ हा लै वर्षे रीरैटिंग होत आलेला ग्रंथ आहे. काही आधीचे तर काही नंतरचे अशी लै भेसळ आहे त्यात. त्यामुळे महाभारतात मनूच का, अगदी यवनांचेही उल्लेख असले तरी आश्चर्य वाटायचं कारण नाही.

In reply to by मारकुटे

ग्रीक आणि अयोनिअन (यवन) महाभारता आधीपासून ज्ञात आहेत.
महाभारता आधीपासून म्हणजे ग्रंथाआधीपासून की त्यातल्या घटना घडल्या त्या लोहयुगाच्या आधीपासून? पर्शियाचा राजा डरायस याच्या एका स्किलॅक्स नामक ग्रीक एक्प्लोररच्या आधी (इसपू ५००) भारत अन ग्रीसचा संबंध आल्याचे वाचलेले नाही. त्यामुळे त्या काळच्या आधीचा पुरावा असेल तर बाय ऑल मीन्स मला सांगावा.

In reply to by बॅटमॅन

महाभारत ग्रंथलेखनाच्या आधी (इपु २००) महाभारत घडलं का नाही, घडलं तर कधी घडलं हे मी गौण मानतो. कारण जे लिहिलं आहे ते तसंच घडलं अस मी मानत नाही जे घडलं तेच लिहिलं असं मी मानत नाही. त्यामुळे चर्चा लेखनाचा काळ येवढीच व्याप्ती पकडून व्हावी.

In reply to by मारकुटे

ओके. महाभारताबद्दल तुम्ही उपस्थित केलेल्या शंका मलाही पटतात. मुद्दा एवढाच आहे, की स्मृतीप्रमाणे पाहिल्यास विसंगत वाटणार्‍या अनेक गोष्टी महाभारतात आहेत, उदा. बहुपतित्व. काहीतरी स्पष्टीकरण देऊन का होईना त्या ग्रंथामध्ये आहे तशा ठेवल्यात याचाच अर्थ त्या जुन्या समाजाचे नियम वेगळे होते. इथला वाद सुरू झाला तो व्यास ब्राह्मण होते की नव्हते यावरून. स्मृतीनुसारच सगळे पाहू शकत नाही हे सांगण्याचा प्रयत्न होता इतकेच.

In reply to by मारकुटे

कुरुंदकरांचे असे विचार असतील तर त्यांचेही विचार हास्यास्पद होते. केवळ कुरुंदकरांनी मांडले म्हणून मान्य करण्यात काहिच अर्थ नाही. शेंडा बुडखा नसलेली असली वाक्ये शोधुन त्यावर चिंतन करणे तर केवळ अमान्य. " ब्राह्मणांनी अनावश्यक कर्मकांडावर जास्त भर दिला" इतपत विधान मान्य होण्यासारखे आहे पण सरसकट " ब्राह्मणांकडे कर्मकांडाव्यतिरिक्त इतर ज्ञान नव्हते" हे चुकीचे आहे.

In reply to by मृत्युन्जय

ब्राह्मणांकडे खरेच असे ज्ञान होते म्हणजे तरी काय होते? वैद्यक म्हटले तर अन्य जातींतही तरबेज वैद्य होते. क्यालेंडर म्हटले तर एकवेळ ठीक. पण बाकी ज्ञानाचा जण्रल समाजाला फार कमी उपयोग होता. अध्यात्म वैग्रे म्हणावे तर वेळोवेळी रिबेल उठून देशभाषांत आणत- ज्ञानेश्वर तुकाराम वैग्रे. मग यांची मोनॉपॉली होती तरी कुठल्या ज्ञानावर? ते जे कै होते ते लै कमी होते.

In reply to by बॅटमॅन

ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर जातीत ज्ञान नव्हते असे मी कधीच म्हटलेलो नाही. ब्राह्मणांकडे नव्हते या मुद्द्याला माझा आक्षेप आहे. बाकी असतीलच की इतर जातीत विद्वान लोक. अजुनही आहेत. जर्मन लोक लढवय्ये होते म्हणुन ब्रिट्स पळपुटे होते असे नाही.

In reply to by मृत्युन्जय

ते ठीक हो, ब्राह्मण एकजात ढ होते असे तरी मला कुठे म्हणायचे आहे? मुद्दा इतकाच आहे, की बह्वंशी ब्राह्मण ज्याला "ज्ञान" म्हणत त्याचा समाजाला वट्ट उपयोग नव्हता. सैद्धांतिक चिरफाड करून करून दिमाग मस्त तयार झाला होता पण त्याचे अ‍ॅप्लिकेशन प्रॅक्टिकल गोष्टींत करायला पाहिजे होते. जेवढे थोडेफार केले- वैद्यक अन खगोलशास्त्रात- त्यापेक्षा अजून जास्त करायला पाहिजे होते असे वाटते इतकेच. इतर समाजाला ज्ञान दिले नाही म्हणजे ही पद्धतशीर विचार करण्याची पद्धत दिली नाही. तो मुळात ज्ञानाच्या व्याख्येचाच घोळ म्हणावा लागेल.

In reply to by मृत्युन्जय

अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान देणारा, घेणारा, बुद्धी तीक्ष्ण असून समाज उपयोगी कामे करणारा अशा गुणांच्या अधिकारी व्यक्तीला ब्राह्मण म्हणतात ना? गुणकर्म विभागशः??

In reply to by मारकुटे

खालील वाक्य सोडून प्रतिसादाशी सहमत. >>> ब्राह्मणांपाशी अशी कोनतीही विद्या नव्हती जी दिली नाही म्हणून समाजाचं नुकसान झालं. काळानुसार स्वतःला बदलण्याची व बदलत्या काळाशी जुळवून घेऊन कर्मकांड व जातीय अस्मितेचा बाऊ न करता स्वतःची प्रगती करण्याची विद्या ब्राह्मणांनी समाजाला दिलेली नाही.

In reply to by श्रीगुरुजी

>>>कर्मकांड व जातीय अस्मितेचा बाऊ न करता आमच्याकडे असं नसतं आणि परशुराम नृसिहांच्या बँडबाजा मिरवणूकी पाहिलेल्या दिसत नाहीत तुम्ही. आम्हाला देशस्थ / कोकणास्थ / यजुर्वेदी/ ऋग्वेदी चालत नाहीत हे वाक्य ऐकले नाही का?

In reply to by मारकुटे

>>> आमच्याकडे असं नसतं आणि परशुराम नृसिहांच्या बँडबाजा मिरवणूकी पाहिलेल्या दिसत नाहीत तुम्ही. आम्हाला देशस्थ / कोकणास्थ / यजुर्वेदी/ ऋग्वेदी चालत नाहीत हे वाक्य ऐकले नाही का? या सर्व गोष्टी करणारे ब्राह्मण खूप कमी आहेत. बहुसंख्य ब्राह्मणांनी जानवे, संध्या, श्रावणी इ. कर्मकांडे व ब्राह्मण नेते/संत यांची अस्मिता बाळगणे व त्यांच्या बदनामीचा बाऊ करणे हे केव्हाच बंद केले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

>>>आम्हाला देशस्थ / कोकणास्थ / यजुर्वेदी/ ऋग्वेदी चालत नाहीत हे वाक्य ऐकले नाही का? हे सररास लग्नामधे घडते. आणि बहुसंख्य ब्राह्मण अजून लग्न करतात.

In reply to by मारकुटे

>>> >>>आम्हाला देशस्थ / कोकणास्थ / यजुर्वेदी/ ऋग्वेदी चालत नाहीत हे वाक्य ऐकले नाही का? >>> हे सररास लग्नामधे घडते. आणि बहुसंख्य ब्राह्मण अजून लग्न करतात. सध्याच्या काळात बहुसंख्य ब्राह्मण तरूण/तरूणी लग्नासाठी आपल्या पोटजातीचा आग्रह धरत नाहीत.

In reply to by मारकुटे

मी तर आजकाल कुठल्याही रस्त्यात, वाडीत, मिरवणुकांमध्ये, राजकीय सभांमध्ये, जातीय संमेलनांमध्ये "आंबेडकर, फुले आणि शाहू महाराज" यांच्या तसबिरी बघतो. क्वचित प्रसंगी शिवाजी महाराज देखील दिसतात. तुम्ही या बँडबाजा मिरवणुकी बघितलेल्या नसतील तर गेल्या १० वर्षात तुम्ही घराबाहेर पडलेले असण्याची शक्यता नाही. आणि हो. ९६ कुळी मराठा मुलगा / मुलगीच पाहिजे हा आग्रह धरणारे लोक तुम्ही बघितले नसेल तर जगातले ८ वे आश्चर्यच म्हणायला लागेल. ९६ कुळी नसतील तर केवळ मराठा असण्याच्या पुण्याईवर ९६ कुळी घराबरोबर संबंध जमवता येणे अवघड आहे. या अट्टाहासापायी आजकाल प्रत्येकजण स्वतःला ९६ कुळी म्हणवुन घेतो. आता ९६० कुळी म्हणायची पद्धत आणायला हवी त्यामुळे. ९६ कुळी समाजातल्या एका मित्राने ब्राह्मण मुलीशी लग्न करायचे म्हटल्यावर त्याच्या घरात काय गहजब झाला होता तेही माहिती आहे. त्यामुळे या असल्या टिमक्या वाजवणे बंद करा.

In reply to by मृत्युन्जय

>> त्यामुळे या असल्या टिमक्या वाजवणे बंद करा. ओ हो हो हो. अहो तापु नका इतके... माझ्याकडून तुमचा अपमान झाला असेल तर माफी मागतो. पण इतके रागावू नका. कसं आहे चर्चा म्हटली की मत मतांतरे होणारच. असं तापुन कसं चालेल. बर ब्राह्मणाने कसं असावं क्षमाशील, दयाळु, आर्जवी आणि लाघवी !

In reply to by मारकुटे

मान्य. जैन आणि बौद्धांनी टनावारी रचना केलेली आहे संस्कृतात. पण ही रचना कधीपासून आणि कुणामुळे झाली हे पाहिल्यास माझ्या दाव्याला पुष्टी मिळते. व्यास हे ब्राह्मणच होते-पराशर ऋषींचा मुलगा. वाल्मिकी मात्र नव्हते. पण नंतरच्या काळात पहा की, लै कमी उदाहरणे सापडतील. होता होईल तो प्युअर संस्कृत इतर लोकांपर्यंत पोहोचली नाहीच. तुलनेने युरोपात लॅटिन मात्र सगळीकडे शिकवली जात असे. संस्कृत विद्या शिकून फार कुणी श्रीमंत होईल वैग्रे प्रकार कधीच नव्हता पण एक महत्त्वाची चूक म्हणजे थिअरी अन प्रॅक्टिकल यांची नीट सांगड युरोपासारखी आपल्या इथे कधी घातली गेली नाही. ब्राह्मण थिअरी मांडत एकदम शिस्तीने, बाकी समाज प्रॅक्टिकलही तेवढ्याच किंबहुना जास्त कुशलतेने करीत. पण दोहोंची सांगड कधी नीटपणे घातली गेली नाही. याला जबाबदार फक्त ब्राह्मणच आहेत असे नाही पण त्यांना हे समजायला हवे होते असे वाटते. समाजातला बुद्धिजीवी वर्ग म्हणून हे त्यांनी केले असते तर चांगले झाले असते. शिवाय हे अपेक्षिणे फार काही लै देखील नाहीये. असो, तो एका वेगळ्या धाग्याचा विषय आहे.

In reply to by बॅटमॅन

होता होईल तो प्युअर संस्कृत इतर लोकांपर्यंत पोहोचली नाहीच अष्टाध्यायी मुखोद्ग्त करायची. पातंजलीचे भाष्य अभ्यासायचे. कात्यायनाची टीका समजून घ्यायची. मग साहित्य अभ्यास करुन थेट आनंदवर्धनाचे ध्वन्यालोकापर्यंत भरतुहरी वाचायाचा. आयुश्याची तिशी उलटते. एवढं करुन खायला काय मिळणार? बहुजन समाजाला गरज वाटली नसावी प्युअर संस्कृत शिकायची.

In reply to by मारकुटे

याला ब्राह्मणही तितकेच जबाबदार आहेत. संस्कृत शुद्ध ठेवण्याच्या नादात तिचे महत्त्व कमी कमी करत नेले या लोकांनी. त्याचे काही दूरगामी परिणाम झाले खरे. म्हणजे संस्कृत भाषेत काही स्पेशल होतं असे नाही पण पद्धतशीरपणे एखादी गोष्ट शिकणे, विकसित करणे हा कुठलीही विद्याशाखा शिकायचा एक प्रकार असतो. संस्कृत विद्या सोडता अन्य प्रॅक्टिकल शास्त्रांमध्ये थिअरीचा शिरकाव जर बर्‍यापैकी प्रमाणावर झाला असता, तर भारत होता त्यापेक्षाही एका वेगळ्याच उंचीला गेला असता. युरोपमध्ये नेमके हे झाल्याने ते लोक एका वेगळ्याच उंचीवर गेले. असो.

In reply to by बॅटमॅन

ब्राह्मणही तितकेच जबाबदार आहेत. संस्कृत शुद्ध ठेवण्याच्या नादात तिचे महत्त्व कमी कमी करत नेले या लोकांनी. प्रतिसादाशी सहमत. वरील वाक्य वेगळे काढले कारण पाणिनी नंतर वैयाकरण्यांनी भाषा बदलते हे तथ्य मान्य केले पण अंमलात आणअले नाही. वेगळ्या भाषा जन्मत आहेत हे सोईस्कर विसरले. आणि पाणिनीला भगवान बनवून तो म्हणतो तेच खरे असं करुन संस्कृतमधे बदल होऊ दिले नाहीत. तीच जुनाट शब्दांची कसरत करत राहिले. पतंजलीला सुद्धा धाप लागलेली दिसते. असो. चर्चा करुन आनंद वाटला.

In reply to by मारकुटे

वरील वाक्य वेगळे काढले कारण पाणिनी नंतर वैयाकरण्यांनी भाषा बदलते हे तथ्य मान्य केले पण अंमलात आणअले नाही. वेगळ्या भाषा जन्मत आहेत हे सोईस्कर विसरले.
इथे अंमळ असहमत. हेमचंद्र वैग्रे लोकांनी प्राकृतचे व्याकरण लिहिले, दक्षिणेत तमि़ऴचे तोलकाप्पियम तर कन्नडचे कविराजमार्गम् हे व्याकरण लिहिले गेलेच होते. पण अन्यत्र हे इतके दिसले नाही. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. ते एक असो पण अन्य भाषांचे अस्तित्व नाकारणे हा मुद्दा नव्हता, फक्त त्यांनाही महत्त्व देणे हा प्रकार उत्तरेत झाला नाही. आणि एकूणच संस्कृतचे क्षेत्र धार्मिक सोडून नंतर प्रचंड विस्तारले, जरी संस्कृत काव्यनाटकशिलालेख इ. मध्ये जास्तजास्त दिसू लागली तरी विषयांची व्याप्ती शास्त्रांत कधी तितकी दिसली नाही.

In reply to by बॅटमॅन

अन्य भाषांचे अस्तित्व नाकारणे हा मुद्दा नव्हता, फक्त त्यांनाही महत्त्व देणे हा प्रकार उत्तरेत झाला नाही
हे आजदेखिल होते आहे काय? ;) बाकी चर्चेचा आनंद घेत आहेच!

In reply to by लोटीया_पठाण

पहिली गोष्ट म्हणजे राज्याभिषेक हा शब्द चुकिचा आहे. अहो सर्व राज्याचा का अभिषेक करायचा आहे? नाही ना? मग. मला वाटते तो शब्द

राजाभिषेक

आहे. काराण शिवाजी राजांचा अभिषेक करायाचा आहे. पण कालौघात तो "य" डकवला जावुन ज चा ज्या झाला तो कायम्चा.

In reply to by प्रमोद देर्देकर

कालौघात तो "य" डकवला जावुन ज चा ज्या झाला तो कायम्चा.
अच्छा. म्हणजे हे थोडेसे "पिळवणूक" शब्दासारखे झाले! फसवणे वरून फसवणूक हे ठीकच. परंतु, पिळवणे असा शब्द नसून तो पिळणे असा आहे. तेव्हा, पिळणूक हा शब्द वापरायला हवा!! असो, चर्चा वाचीत आहेच!

अगदी बरोबर, तरी शंका येते की गझनीचा महमूद किंवा खिलजी वैग्रे लोक तिथे देवळे पाडापाड करीत असताना हे भगवंतराव काय स्वर्गलोकाच्या टूरला गेले होते का? >>>>
भगवंताने सगळ्याला हाथ, पाय दिले अहेत. बुद्धी दिली आहे . सगळ्या गोष्टी देवानेच करायच्या असतील तर तुम्ही काय नुसते खायला काळ आणि भुईला भर आहात काय? तो गझनी एवढ्या लांब येवून इथली देवळे पडतो तेव्हा देव तुम्हाला म्हणाला होता का नुसत माकडासारख बघत बसा म्हणून? तो काय तुमचा नोकर आहे का? श्री क्रीश्नांनी हातामध्ये शास्त्र घेतल नवतं . हातात शस्त्र घेवून लढाई अर्जुनाने केली होती . हे माहित नाही का? ते लोक सुधा आपल्या देशाचं , धर्माचं रक्षण करायचं सोडून तुमच्यासारखे म्हशी आणि रेड्यावर comments करत बसले होते म्हणून तर मुसलमान, इंग्रजांचं फावलं

In reply to by म्हैस

सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या तर देवाची गरजच काय =)) तुमच्यासारख्यांमुळे भोंदूबाबांचं फावतं.