मुस्लीमच कां जिंकले ? एक अभ्यास
मुस्लिमच कां जिंकले ? एक अभ्यास
भारतावर अनादी काळापासून आक्रमणे होत आहेत. भागवतात यांची सूची दिली आहे. उदा. किरात,हूण, पुलिन्द, आभीर,शुंग, यवन, खस, शक इत्यादी. पण इस्लामचे आक्रमण एक अभूतपूर्व आक्रमण होते. इतर आक्रमणांत व याच्यात काय फरक होता की फक्त इस्लामच यशस्वी झाले याची चिकित्सा करावयाचा हा एक प्रयत्न.
इ.स.पूर्व २००० ते इ.स.६०० हा कालखंड प्रथम बघू. या वेळी भारतात "हिंदू" नावाचा धर्म नव्हता पण श्रुति-स्मृति-पुराणोक्त वचनांवर विश्वास ठेवणारी एक समाजघडी प्रस्थापित होती. प्रथम तीन, नंतर चार व त्यानंतर ४+१ (चातुर्वर्णांबाहेरचा) अशी वर्णव्यवस्था प्रचारात होती. वर्णसंकराने निर्माण होणारी प्रजा निराळी जात म्हणून जन्मास येत होती. अशा शेकडो जाती निर्माण झाल्या पण त्या सर्व परत या समाजघडीतच सामावल्या जात होत्या. हा सर्वसंग्राहक विचार एका दृष्टीने कोता होता; पूर्वीसारखे आता कोणीही कोणत्याही प्रकारे वर्ण बदलू शकत नव्हता. पूर्वी क्षत्रीयाला वर्ण बदलून ब्राह्मण होता येत होते, तशी परवानगी आता नव्हती. पण दुसर्या दृष्टीने या सर्वसमावेशक व्यवस्थेने सर्वांना सामावून घेतले. जन्माला येणार्या कोणालाही मी या व्यवस्थेचा "भाग" नाही असे सांगावयाची सोयच ठेवली नाही. सिंहाच्या गुहेत आत गेला की गेलाच तसे तू जन्माला आलास की तू आमच्यातलाच, तुझे स्थान ठरलेच, भले ते वरचे असेल की खालचे. तुला बाहेर पडावयास जागाच नाही. आता या त्रयीवर अजिबात विश्वास न ठेवणारे, तिला झुगारून देणारे नव्हतेच कां ? होते की. बुद्ध होते, जैन होते, नाथपंथी, योगी, निरीश्वरवादी आदि होतेच. यांना ना श्रुति-स्मृति-पुराण मान्य होते ना वर्णव्यवस्था. पण शेवटी यांनाही गिळंकृत केले गेले. मान न मान, तुम हम एक.
हाच न्याय आक्रमकांना लावला गेला. या कालखंडातील आक्रमक सांस्कृतिक बाजूने इथल्या संस्कृतीपेक्षा डावे होते. त्यांना सामावून जातांना फारसे त्रास पडले नाहीत. त्यातही व्यवहार पाहिला गेलाच. आक्रमक योद्धा असेल तर त्याला क्षत्रीय म्हणा, गबर असेल तर वैश्यात ढकला आणि गौण असेल तर शूद्र म्हणा. संपलं. महाभारतातील युद्धात देखील हे उपरे "आपल्यातीलच" म्हणून दोनही बाजूंनी लढले. शेकडो वर्षे येणार्या या परदेशी नद्यांना येथील समाज सागराने आपल्यात सामावून घेतले. त्यांच्या चाली-रिती, निष्ठा स्विकारून त्यांनाही आपल्या जीवन पद्धतीत जागा देण्यास आली. तुझे +माझे = आपले ही उदार विचार धारा भारतात प्राचीन काळापासून प्रचलित होती.
या सर्व समावेशक पद्धतीमध्ये फायदे तसे तोटेही होते. सगळ्यांना वाव देतांना एकसंधीपणा नष्ट झाला. प्रथमत: देवतांची संख्या अतोनात वाढली. त्यांच्या उपासनेत विविधता आली. कर्मकांडे वाढली. आपलाच देव सर्वश्रेष्ठ असे म्हणता म्हणता एकमेकातील भांडणे विकोपाला गेली. त्यातही पुरुषार्थाची महती कमी होऊन दैववाद फोफावला. कलिनिषेध सारखा मूर्खपणा आपला अनिष्ट प्रभाव सर्व स्तरांवर गाजवू लागला. या सगळ्यामुळे मला माझ्या शेजार्याची काळजी वाटेनाशी झाली. तो माझ्या जातीचा नाही, त्याचा देव निराळा, त्याची भाषा निराळी असले निरर्थक वाद एकमेकांमध्ये भिंती उभ्या करू लागले. आता सिन्धवर हल्ला झाला तर त्याच्या मदतीला जायला पाहिजे असे मगधाला वाटेनासे झाले.. एका राष्ट्राच्या दृष्टीने ही एक फार भयानक गोष्ट होती. दुर्दैवाने यावर विचार करून त्याचे उत्तर शोधू शकेल असा महापुरुष त्या काळी निर्माण झाला नाही.
या व्यवस्थेत सगळे काही संतुष्ट नव्हते. एक तर माणुस कोणत्याही परिस्थीतीत संतुष्ट नसतोच व वर्णव्यवस्थेत खालच्या
वर्णांतील लोकांनी संतुष्ट असावयाचे कारणच नव्हते. पण त्यांना यातून बाहेर पडावयास मार्गच नव्हता. जाणार कुठे व कुणाकडे ? असंतुष्ट होते ते असहाय्य होते....... आणि या वेळीच इस्लामने भारतावर आक्रमणे केली
इस्लामची स्थापना झाल्यावर लगेचच खलिफांनी सागरमार्गे भारतावर आक्रमण करायाचा प्रयत्न केला. तो फसला. मग खुष्कीमार्गे हल्ले केले पण त्यातही फार यश मिळाले नाही. सिन्धच्या राजाने प्रतिकार करून त्यांना पिटाळून लावले. पण काही फितुर, देशद्रोह्यांमुळे मुस्लिमांनी प्रथम सिन्धमध्ये आ॒पले पाय रोवले. (इ.स.७०८) पण सिन्धबाहेर प्रदेश जिंकावयाच्या प्रयत्नात प्रतिहार, चालुक्य वंशांच्या राजांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. सिंधमधूनही यांना हुसकावणे शक्य होते. पण आड आले मुलतानमधील सूर्यमंदिर. यावर अनेकांची श्रद्धा होती. त्यामुळे भारतीयांचा हल्ला झाला की मंदिराचा नाश करू एवढी धमकीही पुरी होतसे.
दुसरी अवस्था गझनीच्या महमुदाच्या स्वार्यांची. त्यालाही कडवा प्रतिकार झाला. जथपाल राजाने तर गझनीवर स्वारीची सुरवात केली. केवळ वाटेतील प्रचंड हिमवृष्टीने गझनी वाचली ! १०२४ ला सौराष्ट्रातील सोमनाथ मंदिर लुटण्यात आले.. महमद घोरीची स्वारी ही तिसरी अवस्था. पृथ्वीराजाच्या पराभवानंतर मुसलमान भारतात स्थिरावले. भारतातील लोकांनी मदत केली नसती तर हे अशक्य होते.
आता आपण मुस्लिम यशस्वी कां झाले याचा विचार करू. आता "हिंदूधर्म" हा शब्द वापरावयास हरकत नाही. दोन धर्मातील सर्व फरक मी येथे विचारात घेणार नाही. पण इस्लाममधील काही महत्वाच्या गोष्टी प्रथम नोंदवू. (१) कोणताही मुसलमान दुसर्या कोणत्याही मुसलमानाचा भाऊ असतो.(२) कोणालाही मुसलमान होता येते किंवा करता येते.(३) अल्लावर श्रद्धा नसलेल्या ’काफिर" यांना येनकेन प्रकारेण धर्मात घ्या. धर्मप्रसाराकरिता तलवार वापरण्यास हरकत नाही. उलट हिंदू धर्मात (१) एकसंघता नव्हती, बंधूत्व सोडाच, पण एकमेकाची सावलीही वर्ज्य होती.(२) बाहेरच्याला हिंदूधर्मात येण्यास बंदी होती. (३) मतप्रवर्तन तलवारीने नव्हे तर विचारांनी व्हावे अशी अपेक्षा होती. (४) कलीयुगात "अधर्माचा’ प्रसार होणार" असे "धर्मच " सांगत होता.
आता इस्लामला हिंदुस्थानातील धर्माशी वैर होते व हिंदूंना त्यांना सामावून घ्यावयाचे नव्हते. दलितांना इस्लाममधील एकता आवडली व जातीच्या जाती इस्लामात सामील झाल्या. या परक्यांना मदत करावयास येथील लोक तयार झाले. इथे फितुर वा देशद्रोही ही विशेषणे जरा जपूनच वापरली पाहिजेत. एक हिंदू राजा दुसर्या हिंदू राजाचा पराभव करण्यास मुसलमानांना बोलवत होता. आणि आपल्या धर्मग्रंथांत सुग्रीव, बिभिषण, इ. उदाहरणे होतीच. थोडक्यात मुस्लीमांचा विजय अटळ होता. थोड्याफार फरकाने इंग्रजांच्या वेळीही हेच झाले.
शरद
वाचने
58867
वाचनखूण
प्रतिक्रिया
201
In reply to हाहाहा. भारी बे by प्रचेतस
करा करा भाषांतर... वल्ली,
In reply to हाहाहा. भारी बे by प्रचेतस
वल्ल्या तरी पण तु गवताळ प्राणी??
In reply to सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च by प्रचेतस
श्लोक
In reply to श्लोक by अनिरुद्ध प
गंगेचा उल्लेख त्या श्लोकात
In reply to श्लोक by अनिरुद्ध प
हो.
In reply to हो. by प्रचेतस
एकाच
In reply to या लिंक्स बघा. by बॅटमॅन
चांगलं लागतं बे चवीला !
In reply to वाल्मिकी रामायण कोणी वाचलं by म्हैस
.
In reply to . by उद्दाम
यात नवीन काय
In reply to यात नवीन काय by अनिरुद्ध प
अहो अगस्तीच कशाला, वर गुरु
In reply to अहो अगस्तीच कशाला, वर गुरु by बॅटमॅन
तुम्ही वर दिलेल्या
In reply to तुम्ही वर दिलेल्या by अनिरुद्ध प
लिंकच्या डाव्या पानावरचे
In reply to लिंकच्या डाव्या पानावरचे by बॅटमॅन
"येनागतेषु वसिष्ठमिश्रेषु
In reply to "येनागतेषु वसिष्ठमिश्रेषु by बॅटमॅन
पुराणात कुठे म्हशी कापल्याचा
In reply to पुराणात कुठे म्हशी कापल्याचा by मृत्युन्जय
हाहाहा.
In reply to हाहाहा. by प्रचेतस
जबरीच रे. बहुतेक हाच तो
In reply to हाहाहा. by प्रचेतस
एका रात्रीच्या जेवणाला २१,०००
In reply to पुराणात कुठे म्हशी कापल्याचा by मृत्युन्जय
महिषासुरमर्दिनी
In reply to महिषासुरमर्दिनी by सुनील
नाय नाय. तो म्हैसा पक्षी रेडा
In reply to नाय नाय. तो म्हैसा पक्षी रेडा by प्रचेतस
हा हा
In reply to पुराणात कुठे म्हशी कापल्याचा by मृत्युन्जय
पुराणांचे माहिती नाही.
In reply to पुराणांचे माहिती नाही. by बॅटमॅन
शी किती घाणेरडे होते आपले
In reply to शी किती घाणेरडे होते आपले by मृत्युन्जय
हो ना! कशाचेही मांस खायचे,
In reply to . by उद्दाम
अन्नं वै प्राणा:
In reply to अन्नं वै प्राणा: by अनुप ढेरे
धन्यवाद
In reply to अन्नं वै प्राणा: by अनुप ढेरे
धन्यवाद
आपल्याकडे अंधश्रद्धा
In reply to आपल्याकडे अंधश्रद्धा by आशु जोग
कोण ओ कोण..?
In reply to कोण ओ कोण..? by मोदक
.
In reply to . by आशु जोग
लाजू नका.. नाव घ्या!
सुरेख लिहले आहे.
गुरांची खिल्लारे
मुस्लिमान विरुद्ध बोलण्याची
In reply to मुस्लिमान विरुद्ध बोलण्याची by म्हैस
ओ म्हैस तै, तुमच्या शंकेचे
In reply to मुस्लिमान विरुद्ध बोलण्याची by म्हैस
:)
जथपाल राजाने तर गझनीवर
In reply to जथपाल राजाने तर गझनीवर by उद्दाम
?
नॉन व्हेजची सुस्ती आली .
In reply to नॉन व्हेजची सुस्ती आली . by उद्दाम
कारण
@बॅटमॅन. अहो महाराज माझ्या
In reply to @बॅटमॅन. अहो महाराज माझ्या by म्हैस
अगं अगं म्हशी धागा कुठे नेशी
In reply to अगं अगं म्हशी धागा कुठे नेशी by बॅटमॅन
अरे बापरे
In reply to अगं अगं म्हशी धागा कुठे नेशी by बॅटमॅन
.
...
...
पाकिस्तानातल्या बलुचिस्तानात भूकंप झाला आणि **च्या कृपेने नॅचरल गॅस बाहेर येवू लागला. आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड आहे ** च्या कृपेनेIn reply to ... by आशु जोग
.
In reply to . by उद्दाम
गॅस कुणाचा आलाय ते दिसतंच आहे
तुम्ही स्वताच्या अंगावर ओढून
In reply to तुम्ही स्वताच्या अंगावर ओढून by म्हैस
एक काम करा
२००
.... मुस्लीमच कां जिंकले ?