मुस्लिमच कां जिंकले ? एक अभ्यास
भारतावर अनादी काळापासून आक्रमणे होत आहेत. भागवतात यांची सूची दिली आहे. उदा. किरात,हूण, पुलिन्द, आभीर,शुंग, यवन, खस, शक इत्यादी. पण इस्लामचे आक्रमण एक अभूतपूर्व आक्रमण होते. इतर आक्रमणांत व याच्यात काय फरक होता की फक्त इस्लामच यशस्वी झाले याची चिकित्सा करावयाचा हा एक प्रयत्न.
इ.स.पूर्व २००० ते इ.स.६०० हा कालखंड प्रथम बघू. या वेळी भारतात "हिंदू" नावाचा धर्म नव्हता पण श्रुति-स्मृति-पुराणोक्त वचनांवर विश्वास ठेवणारी एक समाजघडी प्रस्थापित होती. प्रथम तीन, नंतर चार व त्यानंतर ४+१ (चातुर्वर्णांबाहेरचा) अशी वर्णव्यवस्था प्रचारात होती. वर्णसंकराने निर्माण होणारी प्रजा निराळी जात म्हणून जन्मास येत होती. अशा शेकडो जाती निर्माण झाल्या पण त्या सर्व परत या समाजघडीतच सामावल्या जात होत्या. हा सर्वसंग्राहक विचार एका दृष्टीने कोता होता; पूर्वीसारखे आता कोणीही कोणत्याही प्रकारे वर्ण बदलू शकत नव्हता. पूर्वी क्षत्रीयाला वर्ण बदलून ब्राह्मण होता येत होते, तशी परवानगी आता नव्हती. पण दुसर्या दृष्टीने या सर्वसमावेशक व्यवस्थेने सर्वांना सामावून घेतले. जन्माला येणार्या कोणालाही मी या व्यवस्थेचा "भाग" नाही असे सांगावयाची सोयच ठेवली नाही. सिंहाच्या गुहेत आत गेला की गेलाच तसे तू जन्माला आलास की तू आमच्यातलाच, तुझे स्थान ठरलेच, भले ते वरचे असेल की खालचे. तुला बाहेर पडावयास जागाच नाही. आता या त्रयीवर अजिबात विश्वास न ठेवणारे, तिला झुगारून देणारे नव्हतेच कां ? होते की. बुद्ध होते, जैन होते, नाथपंथी, योगी, निरीश्वरवादी आदि होतेच. यांना ना श्रुति-स्मृति-पुराण मान्य होते ना वर्णव्यवस्था. पण शेवटी यांनाही गिळंकृत केले गेले. मान न मान, तुम हम एक.
हाच न्याय आक्रमकांना लावला गेला. या कालखंडातील आक्रमक सांस्कृतिक बाजूने इथल्या संस्कृतीपेक्षा डावे होते. त्यांना सामावून जातांना फारसे त्रास पडले नाहीत. त्यातही व्यवहार पाहिला गेलाच. आक्रमक योद्धा असेल तर त्याला क्षत्रीय म्हणा, गबर असेल तर वैश्यात ढकला आणि गौण असेल तर शूद्र म्हणा. संपलं. महाभारतातील युद्धात देखील हे उपरे "आपल्यातीलच" म्हणून दोनही बाजूंनी लढले. शेकडो वर्षे येणार्या या परदेशी नद्यांना येथील समाज सागराने आपल्यात सामावून घेतले. त्यांच्या चाली-रिती, निष्ठा स्विकारून त्यांनाही आपल्या जीवन पद्धतीत जागा देण्यास आली. तुझे +माझे = आपले ही उदार विचार धारा भारतात प्राचीन काळापासून प्रचलित होती.
या सर्व समावेशक पद्धतीमध्ये फायदे तसे तोटेही होते. सगळ्यांना वाव देतांना एकसंधीपणा नष्ट झाला. प्रथमत: देवतांची संख्या अतोनात वाढली. त्यांच्या उपासनेत विविधता आली. कर्मकांडे वाढली. आपलाच देव सर्वश्रेष्ठ असे म्हणता म्हणता एकमेकातील भांडणे विकोपाला गेली. त्यातही पुरुषार्थाची महती कमी होऊन दैववाद फोफावला. कलिनिषेध सारखा मूर्खपणा आपला अनिष्ट प्रभाव सर्व स्तरांवर गाजवू लागला. या सगळ्यामुळे मला माझ्या शेजार्याची काळजी वाटेनाशी झाली. तो माझ्या जातीचा नाही, त्याचा देव निराळा, त्याची भाषा निराळी असले निरर्थक वाद एकमेकांमध्ये भिंती उभ्या करू लागले. आता सिन्धवर हल्ला झाला तर त्याच्या मदतीला जायला पाहिजे असे मगधाला वाटेनासे झाले.. एका राष्ट्राच्या दृष्टीने ही एक फार भयानक गोष्ट होती. दुर्दैवाने यावर विचार करून त्याचे उत्तर शोधू शकेल असा महापुरुष त्या काळी निर्माण झाला नाही.
या व्यवस्थेत सगळे काही संतुष्ट नव्हते. एक तर माणुस कोणत्याही परिस्थीतीत संतुष्ट नसतोच व वर्णव्यवस्थेत खालच्या
वर्णांतील लोकांनी संतुष्ट असावयाचे कारणच नव्हते. पण त्यांना यातून बाहेर पडावयास मार्गच नव्हता. जाणार कुठे व कुणाकडे ? असंतुष्ट होते ते असहाय्य होते....... आणि या वेळीच इस्लामने भारतावर आक्रमणे केली
इस्लामची स्थापना झाल्यावर लगेचच खलिफांनी सागरमार्गे भारतावर आक्रमण करायाचा प्रयत्न केला. तो फसला. मग खुष्कीमार्गे हल्ले केले पण त्यातही फार यश मिळाले नाही. सिन्धच्या राजाने प्रतिकार करून त्यांना पिटाळून लावले. पण काही फितुर, देशद्रोह्यांमुळे मुस्लिमांनी प्रथम सिन्धमध्ये आ॒पले पाय रोवले. (इ.स.७०८) पण सिन्धबाहेर प्रदेश जिंकावयाच्या प्रयत्नात प्रतिहार, चालुक्य वंशांच्या राजांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. सिंधमधूनही यांना हुसकावणे शक्य होते. पण आड आले मुलतानमधील सूर्यमंदिर. यावर अनेकांची श्रद्धा होती. त्यामुळे भारतीयांचा हल्ला झाला की मंदिराचा नाश करू एवढी धमकीही पुरी होतसे.
दुसरी अवस्था गझनीच्या महमुदाच्या स्वार्यांची. त्यालाही कडवा प्रतिकार झाला. जथपाल राजाने तर गझनीवर स्वारीची सुरवात केली. केवळ वाटेतील प्रचंड हिमवृष्टीने गझनी वाचली ! १०२४ ला सौराष्ट्रातील सोमनाथ मंदिर लुटण्यात आले.. महमद घोरीची स्वारी ही तिसरी अवस्था. पृथ्वीराजाच्या पराभवानंतर मुसलमान भारतात स्थिरावले. भारतातील लोकांनी मदत केली नसती तर हे अशक्य होते.
आता आपण मुस्लिम यशस्वी कां झाले याचा विचार करू. आता "हिंदूधर्म" हा शब्द वापरावयास हरकत नाही. दोन धर्मातील सर्व फरक मी येथे विचारात घेणार नाही. पण इस्लाममधील काही महत्वाच्या गोष्टी प्रथम नोंदवू. (१) कोणताही मुसलमान दुसर्या कोणत्याही मुसलमानाचा भाऊ असतो.(२) कोणालाही मुसलमान होता येते किंवा करता येते.(३) अल्लावर श्रद्धा नसलेल्या ’काफिर" यांना येनकेन प्रकारेण धर्मात घ्या. धर्मप्रसाराकरिता तलवार वापरण्यास हरकत नाही. उलट हिंदू धर्मात (१) एकसंघता नव्हती, बंधूत्व सोडाच, पण एकमेकाची सावलीही वर्ज्य होती.(२) बाहेरच्याला हिंदूधर्मात येण्यास बंदी होती. (३) मतप्रवर्तन तलवारीने नव्हे तर विचारांनी व्हावे अशी अपेक्षा होती. (४) कलीयुगात "अधर्माचा’ प्रसार होणार" असे "धर्मच " सांगत होता.
आता इस्लामला हिंदुस्थानातील धर्माशी वैर होते व हिंदूंना त्यांना सामावून घ्यावयाचे नव्हते. दलितांना इस्लाममधील एकता आवडली व जातीच्या जाती इस्लामात सामील झाल्या. या परक्यांना मदत करावयास येथील लोक तयार झाले. इथे फितुर वा देशद्रोही ही विशेषणे जरा जपूनच वापरली पाहिजेत. एक हिंदू राजा दुसर्या हिंदू राजाचा पराभव करण्यास मुसलमानांना बोलवत होता. आणि आपल्या धर्मग्रंथांत सुग्रीव, बिभिषण, इ. उदाहरणे होतीच. थोडक्यात मुस्लीमांचा विजय अटळ होता. थोड्याफार फरकाने इंग्रजांच्या वेळीही हेच झाले.
शरद
वाचने
58921
प्रतिक्रिया
201
मिसळपाव
प्रतिक्रिया
इतिहासाची फारशी माहिती नाही
हाच मुद्दा थोडा पुढे नेताना .
In reply to इतिहासाची फारशी माहिती नाही by मराठीप्रेमी
जगभरात सगळे मुस्लिम बंधू
In reply to हाच मुद्दा थोडा पुढे नेताना . by अद्द्या
लखनवी मुसलमान
In reply to जगभरात सगळे मुस्लिम बंधू by llपुण्याचे पेशवेll
मुस्लिम भारतात येऊन खरेच
क्या बात!!
In reply to मुस्लिम भारतात येऊन खरेच by प्रचेतस
+१
In reply to मुस्लिम भारतात येऊन खरेच by प्रचेतस
भारताला "दारुल हरब" किंवा
In reply to +१ by मन१
दार अल इस्लाम म्हणजे इस्लामची
In reply to भारताला "दारुल हरब" किंवा by धन्या
वल्ली साहेब भारत, बांग्लादेश व पाकिस्तान ह्यांची...
In reply to मुस्लिम भारतात येऊन खरेच by प्रचेतस
हेच मी खाली लिहिले आहे.
In reply to वल्ली साहेब भारत, बांग्लादेश व पाकिस्तान ह्यांची... by निश
असहमत. जालावरची आकडेवारी
In reply to वल्ली साहेब भारत, बांग्लादेश व पाकिस्तान ह्यांची... by निश
पेशवे साहेब, हिंदुपेक्षा जास्त भरत नसली तरी त्यांच प्रमाण...
In reply to असहमत. जालावरची आकडेवारी by llपुण्याचे पेशवेll
>>आपल्या लक्षात येईल की
In reply to पेशवे साहेब, हिंदुपेक्षा जास्त भरत नसली तरी त्यांच प्रमाण... by निश
लेखन आवडले
.
In reply to लेखन आवडले by दत्ता काळे
जिंकले ? कधी ? कुठे ?
लोकसंख्याबळ न्हवे तर
In reply to जिंकले ? कधी ? कुठे ? by अद्द्या
थोडक्यात मुस्लीमांचा विजय अटळ
"हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत."
In reply to थोडक्यात मुस्लीमांचा विजय अटळ by वामन देशमुख
आण्णा, मुसलमानानी भारत कधीच
In reply to थोडक्यात मुस्लीमांचा विजय अटळ by वामन देशमुख
अभ्यासपूर्ण लेखन
खरे आहे...
+१११
In reply to खरे आहे... by शशिकांत ओक
.
वल्लीशेटशी सहमत. संक्षिप्त माहिती :
लेख रोचक तदपि अंमळ सरसकटीकरण
लेख आवडला
...लिया पाकिस्तान, ...लेंगे हिंदुस्तान
In reply to लेख आवडला by पैसा
निव्वळ लोकसंख्या बघा!
In reply to ...लिया पाकिस्तान, ...लेंगे हिंदुस्तान by वामन देशमुख
विषयांतर
In reply to निव्वळ लोकसंख्या बघा! by पैसा
केवळ संख्येवर उपद्रवमुल्य तर
In reply to निव्वळ लोकसंख्या बघा! by पैसा
ते खरंच
In reply to केवळ संख्येवर उपद्रवमुल्य तर by डॉ सुहास म्हात्रे
.
In reply to लेख आवडला by पैसा
अपवाद एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर दलितांनी केलेल्या धर्मांतराचा. पण त्याला धर्मांतर म्हणावे का हा प्रश्न पडतो. कारण हिंदू धर्माने बौद्ध हा पंथ म्हणून सामावून घेतला होता.इथे याचा संबंध काय ?अर्धवट वाचू नका
In reply to . by आशु जोग
लष्करी इतिहास शिकवताना
In reply to लेख आवडला by पैसा
राजा शिवछत्रपती.
In reply to लष्करी इतिहास शिकवताना by सुबोध खरे
उदयपूर.
In reply to राजा शिवछत्रपती. by प्रभाकर पेठकर
<<<राजस्थानात मोंघलांच्या
In reply to राजा शिवछत्रपती. by प्रभाकर पेठकर
घोड्यांच्या तोंडाला
In reply to <<<राजस्थानात मोंघलांच्या by शिल्पा ब
दारू पिलेले हत्ती
In reply to घोड्यांच्या तोंडाला by उद्दाम
हत्तीला दारु पाजण्याच्या
In reply to दारू पिलेले हत्ती by योगी९००
रणनिती.
In reply to हत्तीला दारु पाजण्याच्या by गवि
हत्तीलाच नव्हे तर घोड्यालाही
In reply to रणनिती. by प्रभाकर पेठकर
पण,
In reply to हत्तीलाच नव्हे तर घोड्यालाही by llपुण्याचे पेशवेll
हत्ती आणि दारू.
In reply to पण, by दादा कोंडके
हा हा...
In reply to हत्ती आणि दारू. by प्रभाकर पेठकर
त्यामुळे घोड्याला आपण
In reply to हत्तीलाच नव्हे तर घोड्यालाही by llपुण्याचे पेशवेll
(की अशा वेळी किल्ल्याचे
In reply to हत्तीला दारु पाजण्याच्या by गवि
(की अशा वेळी किल्ल्याचे दरवाजे तोडण्यासाठी हत्तीला डोक्याने धडका द्यायला लावत असत?)हत्तीने किल्ल्याच्या दरवाजावरच्या खिळ्याला न घाबरता जोरदार धडक द्यावी म्हणून उंटाला मध्ये ठेवत असत. मात्र यात हत्ती सुरक्षित रहात असला तरी उंट चिरडला जात असल्याने "पेटा" ने त्या उंटांच्या वंशजांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून लढा उभारायला वाव आहे ;)हात्तीच्या
In reply to हत्तीला दारु पाजण्याच्या by गवि
>>> काही मनुष्यांबाबत दारु
In reply to हत्तीला दारु पाजण्याच्या by गवि
बाथरूम, बेसिन, सगळे काही आले
In reply to >>> काही मनुष्यांबाबत दारु by श्रीगुरुजी
(मद्यजनित वमनकहाण्यांचा
In reply to बाथरूम, बेसिन, सगळे काही आले by बॅटमॅन
तिसरा का ?
In reply to लष्करी इतिहास शिकवताना by सुबोध खरे
अहो, म्हणजे आता ज्या नव्या
In reply to तिसरा का ? by सुधीर मुतालीक
मुस्लिमच कां जिंकले याचं कारण
मुसलमानांच्या विरुद्ध खरे
In reply to मुस्लिमच कां जिंकले याचं कारण by काळा पहाड
+१००००
In reply to मुस्लिमच कां जिंकले याचं कारण by काळा पहाड
तो लाल माकडटोपी घालणारा
बिशनसिंग बेदी
येनकेन प्रकारेण
आत्ताही
असे आहे का ?
कारण अगदी सोपं आहे ...
त्यांचे प्रमाण भारतात २०५० ला पनास टक्क्याहून अधिक झाले तर ...?
अजुन सरकार कुत्र्यांच्या
In reply to त्यांचे प्रमाण भारतात २०५० ला पनास टक्क्याहून अधिक झाले तर ...? by चेतनकुलकर्णी_85
मुस्लिम आक्रमण
अत्यंत परिपूर्ण प्रतिसाद...!
In reply to मुस्लिम आक्रमण by अवतार
सुंदर, परीपुर्ण प्रतिसाद..
In reply to मुस्लिम आक्रमण by अवतार
+१
In reply to मुस्लिम आक्रमण by अवतार