मुस्लिमच कां जिंकले ? एक अभ्यास
भारतावर अनादी काळापासून आक्रमणे होत आहेत. भागवतात यांची सूची दिली आहे. उदा. किरात,हूण, पुलिन्द, आभीर,शुंग, यवन, खस, शक इत्यादी. पण इस्लामचे आक्रमण एक अभूतपूर्व आक्रमण होते. इतर आक्रमणांत व याच्यात काय फरक होता की फक्त इस्लामच यशस्वी झाले याची चिकित्सा करावयाचा हा एक प्रयत्न.
इ.स.पूर्व २००० ते इ.स.६०० हा कालखंड प्रथम बघू. या वेळी भारतात "हिंदू" नावाचा धर्म नव्हता पण श्रुति-स्मृति-पुराणोक्त वचनांवर विश्वास ठेवणारी एक समाजघडी प्रस्थापित होती. प्रथम तीन, नंतर चार व त्यानंतर ४+१ (चातुर्वर्णांबाहेरचा) अशी वर्णव्यवस्था प्रचारात होती. वर्णसंकराने निर्माण होणारी प्रजा निराळी जात म्हणून जन्मास येत होती. अशा शेकडो जाती निर्माण झाल्या पण त्या सर्व परत या समाजघडीतच सामावल्या जात होत्या. हा सर्वसंग्राहक विचार एका दृष्टीने कोता होता; पूर्वीसारखे आता कोणीही कोणत्याही प्रकारे वर्ण बदलू शकत नव्हता. पूर्वी क्षत्रीयाला वर्ण बदलून ब्राह्मण होता येत होते, तशी परवानगी आता नव्हती. पण दुसर्या दृष्टीने या सर्वसमावेशक व्यवस्थेने सर्वांना सामावून घेतले. जन्माला येणार्या कोणालाही मी या व्यवस्थेचा "भाग" नाही असे सांगावयाची सोयच ठेवली नाही. सिंहाच्या गुहेत आत गेला की गेलाच तसे तू जन्माला आलास की तू आमच्यातलाच, तुझे स्थान ठरलेच, भले ते वरचे असेल की खालचे. तुला बाहेर पडावयास जागाच नाही. आता या त्रयीवर अजिबात विश्वास न ठेवणारे, तिला झुगारून देणारे नव्हतेच कां ? होते की. बुद्ध होते, जैन होते, नाथपंथी, योगी, निरीश्वरवादी आदि होतेच. यांना ना श्रुति-स्मृति-पुराण मान्य होते ना वर्णव्यवस्था. पण शेवटी यांनाही गिळंकृत केले गेले. मान न मान, तुम हम एक.
हाच न्याय आक्रमकांना लावला गेला. या कालखंडातील आक्रमक सांस्कृतिक बाजूने इथल्या संस्कृतीपेक्षा डावे होते. त्यांना सामावून जातांना फारसे त्रास पडले नाहीत. त्यातही व्यवहार पाहिला गेलाच. आक्रमक योद्धा असेल तर त्याला क्षत्रीय म्हणा, गबर असेल तर वैश्यात ढकला आणि गौण असेल तर शूद्र म्हणा. संपलं. महाभारतातील युद्धात देखील हे उपरे "आपल्यातीलच" म्हणून दोनही बाजूंनी लढले. शेकडो वर्षे येणार्या या परदेशी नद्यांना येथील समाज सागराने आपल्यात सामावून घेतले. त्यांच्या चाली-रिती, निष्ठा स्विकारून त्यांनाही आपल्या जीवन पद्धतीत जागा देण्यास आली. तुझे +माझे = आपले ही उदार विचार धारा भारतात प्राचीन काळापासून प्रचलित होती.
या सर्व समावेशक पद्धतीमध्ये फायदे तसे तोटेही होते. सगळ्यांना वाव देतांना एकसंधीपणा नष्ट झाला. प्रथमत: देवतांची संख्या अतोनात वाढली. त्यांच्या उपासनेत विविधता आली. कर्मकांडे वाढली. आपलाच देव सर्वश्रेष्ठ असे म्हणता म्हणता एकमेकातील भांडणे विकोपाला गेली. त्यातही पुरुषार्थाची महती कमी होऊन दैववाद फोफावला. कलिनिषेध सारखा मूर्खपणा आपला अनिष्ट प्रभाव सर्व स्तरांवर गाजवू लागला. या सगळ्यामुळे मला माझ्या शेजार्याची काळजी वाटेनाशी झाली. तो माझ्या जातीचा नाही, त्याचा देव निराळा, त्याची भाषा निराळी असले निरर्थक वाद एकमेकांमध्ये भिंती उभ्या करू लागले. आता सिन्धवर हल्ला झाला तर त्याच्या मदतीला जायला पाहिजे असे मगधाला वाटेनासे झाले.. एका राष्ट्राच्या दृष्टीने ही एक फार भयानक गोष्ट होती. दुर्दैवाने यावर विचार करून त्याचे उत्तर शोधू शकेल असा महापुरुष त्या काळी निर्माण झाला नाही.
या व्यवस्थेत सगळे काही संतुष्ट नव्हते. एक तर माणुस कोणत्याही परिस्थीतीत संतुष्ट नसतोच व वर्णव्यवस्थेत खालच्या
वर्णांतील लोकांनी संतुष्ट असावयाचे कारणच नव्हते. पण त्यांना यातून बाहेर पडावयास मार्गच नव्हता. जाणार कुठे व कुणाकडे ? असंतुष्ट होते ते असहाय्य होते....... आणि या वेळीच इस्लामने भारतावर आक्रमणे केली
इस्लामची स्थापना झाल्यावर लगेचच खलिफांनी सागरमार्गे भारतावर आक्रमण करायाचा प्रयत्न केला. तो फसला. मग खुष्कीमार्गे हल्ले केले पण त्यातही फार यश मिळाले नाही. सिन्धच्या राजाने प्रतिकार करून त्यांना पिटाळून लावले. पण काही फितुर, देशद्रोह्यांमुळे मुस्लिमांनी प्रथम सिन्धमध्ये आ॒पले पाय रोवले. (इ.स.७०८) पण सिन्धबाहेर प्रदेश जिंकावयाच्या प्रयत्नात प्रतिहार, चालुक्य वंशांच्या राजांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. सिंधमधूनही यांना हुसकावणे शक्य होते. पण आड आले मुलतानमधील सूर्यमंदिर. यावर अनेकांची श्रद्धा होती. त्यामुळे भारतीयांचा हल्ला झाला की मंदिराचा नाश करू एवढी धमकीही पुरी होतसे.
दुसरी अवस्था गझनीच्या महमुदाच्या स्वार्यांची. त्यालाही कडवा प्रतिकार झाला. जथपाल राजाने तर गझनीवर स्वारीची सुरवात केली. केवळ वाटेतील प्रचंड हिमवृष्टीने गझनी वाचली ! १०२४ ला सौराष्ट्रातील सोमनाथ मंदिर लुटण्यात आले.. महमद घोरीची स्वारी ही तिसरी अवस्था. पृथ्वीराजाच्या पराभवानंतर मुसलमान भारतात स्थिरावले. भारतातील लोकांनी मदत केली नसती तर हे अशक्य होते.
आता आपण मुस्लिम यशस्वी कां झाले याचा विचार करू. आता "हिंदूधर्म" हा शब्द वापरावयास हरकत नाही. दोन धर्मातील सर्व फरक मी येथे विचारात घेणार नाही. पण इस्लाममधील काही महत्वाच्या गोष्टी प्रथम नोंदवू. (१) कोणताही मुसलमान दुसर्या कोणत्याही मुसलमानाचा भाऊ असतो.(२) कोणालाही मुसलमान होता येते किंवा करता येते.(३) अल्लावर श्रद्धा नसलेल्या ’काफिर" यांना येनकेन प्रकारेण धर्मात घ्या. धर्मप्रसाराकरिता तलवार वापरण्यास हरकत नाही. उलट हिंदू धर्मात (१) एकसंघता नव्हती, बंधूत्व सोडाच, पण एकमेकाची सावलीही वर्ज्य होती.(२) बाहेरच्याला हिंदूधर्मात येण्यास बंदी होती. (३) मतप्रवर्तन तलवारीने नव्हे तर विचारांनी व्हावे अशी अपेक्षा होती. (४) कलीयुगात "अधर्माचा’ प्रसार होणार" असे "धर्मच " सांगत होता.
आता इस्लामला हिंदुस्थानातील धर्माशी वैर होते व हिंदूंना त्यांना सामावून घ्यावयाचे नव्हते. दलितांना इस्लाममधील एकता आवडली व जातीच्या जाती इस्लामात सामील झाल्या. या परक्यांना मदत करावयास येथील लोक तयार झाले. इथे फितुर वा देशद्रोही ही विशेषणे जरा जपूनच वापरली पाहिजेत. एक हिंदू राजा दुसर्या हिंदू राजाचा पराभव करण्यास मुसलमानांना बोलवत होता. आणि आपल्या धर्मग्रंथांत सुग्रीव, बिभिषण, इ. उदाहरणे होतीच. थोडक्यात मुस्लीमांचा विजय अटळ होता. थोड्याफार फरकाने इंग्रजांच्या वेळीही हेच झाले.
शरद
वाचने
58921
प्रतिक्रिया
201
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतात इस्लामचे आगमन
नविन माहिती दिल्या बद्दल
In reply to भारतात इस्लामचे आगमन by arunjoshi123
यात नवीन काय आहे? केरळातला
In reply to नविन माहिती दिल्या बद्दल by मुक्त विहारि
http://en.wikipedia.org/wiki
In reply to यात नवीन काय आहे? केरळातला by उद्दाम
खरच नवी
In reply to यात नवीन काय आहे? केरळातला by उद्दाम
अवांतर
In reply to यात नवीन काय आहे? केरळातला by उद्दाम
.
In reply to अवांतर by रामपुरी
जो केरली राजा अरबस्तानात
In reply to भारतात इस्लामचे आगमन by arunjoshi123
.
अय्या! तुम्ही एवढे निरागस
In reply to . by आशु जोग
आपल्याला
In reply to अय्या! तुम्ही एवढे निरागस by शिल्पा ब
कै च्या कै लेखन!
भारतातील मुसलमानांचे हिंदुकरण
In reply to कै च्या कै लेखन! by ऋषिकेश
अवांतरच,
In reply to भारतातील मुसलमानांचे हिंदुकरण by सुहास..
जरा
इ स पूर्व.
.
प्रतिसाद
अगदी सुंदर उत्तर. म्हणूनच
In reply to प्रतिसाद by मनो
गुप्तकाळ आणि मौर्यकाळ व अन्य
In reply to अगदी सुंदर उत्तर. म्हणूनच by उद्दाम
>>> पण इस्लाममधील काही
.
In reply to >>> पण इस्लाममधील काही by श्रीगुरुजी
>>> या लोकांचे वर्तन
+१ टू श्रीगुरुजी...!
In reply to >>> या लोकांचे वर्तन by श्रीगुरुजी
अत्रुप्त आत्मा, गुरुजी
In reply to +१ टू श्रीगुरुजी...! by अत्रुप्त आत्मा
+१११.
In reply to +१ टू श्रीगुरुजी...! by अत्रुप्त आत्मा
आत्माराम
In reply to +१ टू श्रीगुरुजी...! by अत्रुप्त आत्मा
माहितीपूर्ण प्रतिसाद
In reply to +१ टू श्रीगुरुजी...! by अत्रुप्त आत्मा
इन्शाल्लाह !
In reply to +१ टू श्रीगुरुजी...! by अत्रुप्त आत्मा
छान
In reply to +१ टू श्रीगुरुजी...! by अत्रुप्त आत्मा
अहो मी नाय, अ आ बुवांनी
In reply to छान by इरसाल
समारोप करा
.
In reply to समारोप करा by सुनील
वेळ असतो हो
.
In reply to वेळ असतो हो by शरद
.
कसली लिंक देताय राव. खाली
In reply to . by आशु जोग
नाही. ह्यात दिलेली
कोणत्या मुस्लिम राजाला
In reply to नाही. ह्यात दिलेली by म्हैस
यादि देणे
In reply to कोणत्या मुस्लिम राजाला by उद्दाम
पृथ्वीराज चौहान ने महंमद
In reply to कोणत्या मुस्लिम राजाला by उद्दाम
खरे की खोटे?
In reply to पृथ्वीराज चौहान ने महंमद by सुबोध खरे
ते ११९१ आणि ११९२ असे वाचावे.
In reply to खरे की खोटे? by उद्दाम
ऊप्स!
In reply to खरे की खोटे? by उद्दाम
मरा किवा मारा ह्या वृत्तीने ते जिंकले आहेत.
In reply to नाही. ह्यात दिलेली by म्हैस
नामस्मरणाने मनासारख्या गोष्टी
In reply to नाही. ह्यात दिलेली by म्हैस
.
अहो साहेब
In reply to . by आशु जोग
धर्माचा उगम
हिंदू धर्मात रोजच्या रोज
In reply to धर्माचा उगम by lakhu risbud
चष्मा (काढून) का घालून
In reply to हिंदू धर्मात रोजच्या रोज by उद्दाम
म्हणजे गोमांस खाल्ल्याने
In reply to चष्मा (काढून) का घालून by lakhu risbud
शेवरीचा कापूस
In reply to म्हणजे गोमांस खाल्ल्याने by उद्दाम
इंट्रेस्टिंग..
In reply to धर्माचा उगम by lakhu risbud
@उद्दाम . तुम्हाला का मिरच्या
म्हैस दीदी हिंदू वर या देशात
In reply to @उद्दाम . तुम्हाला का मिरच्या by म्हैस
अमोल
In reply to म्हैस दीदी हिंदू वर या देशात by पिंपातला उंदीर
अनिरुद्ध साहेब ते कसे काय
In reply to अमोल by अनिरुद्ध प
यात मला झोंबण्यासारखे काही
In reply to @उद्दाम . तुम्हाला का मिरच्या by म्हैस
आणि तुमचा प्रतिसाद आणि ती
In reply to @उद्दाम . तुम्हाला का मिरच्या by म्हैस
हिंदू धर्मात रोजच्या रोज
:)
In reply to हिंदू धर्मात रोजच्या रोज by पिंपातला उंदीर
यात
In reply to हिंदू धर्मात रोजच्या रोज by पिंपातला उंदीर
तोटा
अगदी बरोबर
In reply to तोटा by arunjoshi123
ज्या वेळी हि मुस्लिम आक्रमणं
देवा ! काय होणार आहे पुढे काय
In reply to ज्या वेळी हि मुस्लिम आक्रमणं by म्हैस
देवा ! काय होणार आहे पुढे काय माहित.भारतात गल्लोगल्ली सुंता केंद्रे निघाली नाही तर नशीब!!वाल्मिकी रामायण कोणी वाचलं
या लिंक्स बघा.
In reply to वाल्मिकी रामायण कोणी वाचलं by म्हैस
अजून बघ
In reply to या लिंक्स बघा. by बॅटमॅन