Skip to main content

अतिरेकी देवो भव !

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 19/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15544120.cms अतिथी देवो भव अर्थात अतिथीला देव मानणारे व्हा अशा अर्थाचा वेदातला एक श्लोक आहे. आपल्या सरकारने त्यात थोडा बदल करुन अतिरेकी देवो भव केला आहे की काय अशी शंका येणारी ही बातमी. ही खोटी असू दे अशी इच्छा. पण ह्या नराधमाला रमझान आहे म्हणून सुकामेवा, भेजा फ्राय, मलई असल्या अन्नाची रेलचेल असणारे खाणे दिले जात आहे अशी ही बातमी आहे. सामान्य लोकांनाही असले खाणे परवडत नसेल. आणि अन्य कैद्यांनाही असले खायला दिले जात नसेल ते ह्या नररत्नांना कुठल्या कारणाने दिले जाते? आणि हा खर्च कोण करतो? हे अगदी भयानक आहे.

वाचने 6217
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

रमझानचा पवित्र महिना सुरु असल्याने आपण "धर्मनिरपेक्ष" कसे आहोत हे कदाचित सरकारला दाखवुन द्यायचे असेल ! इकडे या देशद्रोही पाकड्या अतिरेक्यांची अशी सेवा चालु असताना तिकडे पाकिस्तानात अडकलेल्या सरबजितला मात्र जेवणात विष कालवुन दिले जात आहे. संदर्भ :--- http://daily.bhaskar.com/article/NAT-TOP-i-am-being-poisoned-sarabjit-s… पुप्या तुझी युक्ती पाकडे वापरत आहेत रे बघ.

नको त्या ठिकाणी आपण फारच सच्चे, चांगली माणसे आहोत असे दाखवले जाते. आपल्या धर्मशास्त्रात लिहिले आहे की ज्याच्यावर माणूसकी दाखवतो त्याची पात्रता नसताना सुद्धा जेव्हा दाखवणारा दाखवतो ती एक तामसी वृत्तीच आहे. (पात्रता ओळखून, तारतम्य राखून व्यवहार करावेत) शिवाजी सोडून आपल्याला स्टेटक्राफ्ट कधी जमले नाही. त्यात अजून सुद्धा असे आहे की लोकं एक ग्रॅम मलईवर खूप चर्चा करतील - एवढ्या फाईन प्रिंटवर जाऊ नका. टायपो पण झाल्या असतील. पण अजमल व अबूला खूप काही छान छान खायला मिळते व तेही निर्लज्ज सरकार देते आहे हे महत्वाचे (आता त्याच्या नावावर 'इतरही' 'लोकं' 'खात' असतील ती गोष्ट वेगळी).

In reply to by अप्पा जोगळेकर

चालायचंच. कशा कशाचा लोड घ्यायचा आपण. -दिलीप बिरुटे

मिपावर असे धागे काढण्याची वारंवार संधी दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन. (बांगड्या न भरलेल्या मर्दांच्या आशेवर असलेला) नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

कृपया 'शौर्य' हा गुण अधोरेखित करण्यासाठी इतर कुठलीतरी वचने वापरावीत. वाचताना खटकणार नाही.

In reply to by नितिन थत्ते

>>>बांगड्या न भरलेल्या मर्दांच्या आशेवर असलेला काय एकेकाची आवड अस्ते नै ! :)

In reply to by नितिन थत्ते

काय स्मरणशक्ती आहेय ? शब्दच्छल चालू द्या ! --- असो कसाबचा अफजलखान का होत नाही

पण ह्या नराधमाला रमझान आहे म्हणून सुकामेवा, भेजा फ्राय, मलई असल्या अन्नाची रेलचेल असणारे खाणे दिले जात आहे अशी ही बातमी आहे
संशयित्/गुन्हेगारांकडून माहिती मिळवण्यासाठी हे केले जाते. उ.दा. अंडरवर्ल्डमधल्या लोकांना पोलिस बराच वेळ भुकेले ठेवतात मग जिलब्या(खर्‍या जिलब्या,मिपावरच्या नव्हेत!) वा तत्सम आवडते पदार्थ समोर ठेवतात. बर्‍यापैकी मार खावून झाल्यावर खायच्या आशेने संशयित मग माहिती पुरवतात. येथेही हाच प्रकार असावा.

In reply to by चिरोटा

अजमल कडून काय माहिती मिळवायची ती अजून इतक्या वर्षांनी सुद्धा अजून राहिलीच असेल तर मग आता तर मुळीच मिळणार नाही. ती वेळ निघून गेली आहे.

In reply to by दादा कोंडके

मस्त.
व्हेरी व्हेरी स्पेशल निवृत्त झाला आता सचिन कधी निवृत्त होणार.
- दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिभा ताई निवृत्त झाल्या , आपले साहेब कधी निवृत्त होणार.

पोलीसांना मारहाण झाली, महीला पोलीसांचा विनयभंग केला, मिडीयाला टारगेट करून मारहाण आणि जाळपोळ केली, बसेसवर दगडफेक केली आणि सर्वावर कडी म्हणजे अमर जवान स्मारक तोडले यांच्यावर काहिही कारवाई जे सरकार करीत नाही त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा ठेवता.

गणपतीला आमच्या कैद्यांना हेच पोलीस मोदक पुरवणार का ? ;) अमोल

-जेलमधे कोणाला कायकाय आणि किती ग्रॅम खायला दिलं जातं याच्या तपशिलाच्या बातम्या बाहेर कशा येतात? -काही अज्ञात जेल कर्मचार्‍यांनी "नाव न सांगण्याच्या बोलीवर लीक केलेल्या" बातम्यांना कितपत खरे मानावे? -जुंदाल कसाबादि लोकांना देण्यासाठी बिर्याणी, मलई आदि नाही मागवली तर कर्मचार्‍यांना ती फुकट खायला कशी मिळणार? याचा विचार झाला आहे का? -अशा प्रकारे नुसता तर्काने विचार केला तर ते जुंदाल किंवा कसाबला अतएव दहशतवादाला पाठिंबा देणं आहे किंवा लांगूलचालन आहे किंवा देशद्रोह आहे असं मानता येईल का? ही बातमी खरी असू शकेलही पण .. नसेलही.. यावर माझं एकच म्हणणं आहे की अशा बातम्यांनी हिंदूंच्या मनात असलेली रास्त तिडिक अजूनच तीव्र होत असते. अशा वेळी जेलच्या ऑथॉरिटीजनी पुढे येऊन काय ते खरं सांगावं.

In reply to by गवि

तेच ना चायला. बाकी सगळं सोडून कसाबने आज इतक्या कोंबड्या चापल्या आणि इतकी मलई खाल्ली याचे तपशील या रिकामचोटांना कसे मिळतात काय माहिती.

भेजा फ्राय ह्या पदार्थाची पाकृ लवकरात लवकर मिपावर टाकुन ,ते नेमके काय असते हे आम्हाला दाखवुन द्यावे. ही नम्र विनंती. बाकी आपले चालु द्या.

म्हणे अरूण गवळीला अशी शिक्षा दिली आहे, कसाब वा गुरुपैकी ज्याला शेवटी फाशी दिली जाईल तोपर्यंत सक्त मजुरी! हे ऐकल्यावर तो दगडी माणूसही ढसढसा रडू लागला. आता आपण जिवंत सुटणार नाही असे कळून चुकले त्याला!

In reply to by हुप्प्या

अरूण गवळीस शिक्षा देणार्‍या मोक्का कोर्टाच्या न्यायमुर्तींचे नाव पृथ्वीराज चव्हाण आहे. :-)

हे पण अतिरेकी मानले जाऊ शकतात का? सरळ सरळ चिथावणी ऐकू येते. "ए माचीस ला! माचीस! ए जला ए जला... इस्की माकी भेंचोद. ए जला जला न्युज वाले को जला भेंचोद!" दुवा: http://youtu.be/08gud4_bS-o

In reply to by निनाद

ह्या पण अतिरेकी मानल्या जाऊ शकतात का?

In reply to by daredevils99

बाप्रे! पोलिसांनाच अतिरेकी म्हंटले तर मग अतिरेक्यांना काय म्हणता तुम्ही? पोलिस??

In reply to by daredevils99

बाकी ह्या बाईंनी बोलघेवड्यांची पंचाईत करून ठेवली आहे!!

In reply to by daredevils99

नाही. त्यांना दंगेखोर किंवा चिथावणीखोर असे संबोधता येईल. अतिरेकी ही वेगळी संज्ञा आहे त्या संज्ञेमधे त्या बसु शकत नाहीत असा माझा प्राथमिक अंदाज आहे. अर्थात मिपावर अनेक अत्यंत विद्वान, हुशार आणि फक्त तारतम्याने वागणारे विचारवंत आहेत त्यांच्यानुसार सदर बाई ह्या अतिरेकी असू शकतात.

In reply to by निनाद

या तिस्ता सेटलवाड आहेत ना? त्यांना २८ वर्षांची शिक्षा झाली त्या...
नाही हो. या मायाबेन कोडनानी आहेत. भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकेकाळच्या जवळच्या सहकारी. (ही सलगी अंगाशी येणार हे लक्षात येताच त्यांनी हे सहकारीपण नाकारले ती गोष्ट वेगळी).

In reply to by नाना चेंगट

नाही. त्यांना दंगेखोर किंवा चिथावणीखोर असे संबोधता येईल. अतिरेकी ही वेगळी संज्ञा आहे त्या संज्ञेमधे त्या बसु शकत नाहीत असा माझा प्राथमिक अंदाज आहे.
हे बरे आहे. तुमचा असला तर अतिरेकी आणि आमचा असला तर केवळ दंगेखोर किंवा चिथावणीखोर. या बाईंचा ९०-१०० लोकांना जाळून मारायच्या अत्यंत घृणास्पद घटनेत हात होता हे कोर्टानेही मान्य केले आहे.तरीही त्या केवळ दंगेखोर किंवा चिथावणीखोर. मग गोध्रामध्ये ५०-६० जणांना जाळून मारणारे (तितकाच घृणास्पद गुन्हा करणारे) पण केवळ दंगेखोर किंवा चिथावणीखोर का? एकूणच काय की बहुसंख्यांकांच्या जातीयवादाला राष्ट्रवादाचा मुलामा देता येतो पण अल्पसंख्यांकांचा जातीयवाद हा नुसता जातीयवाद न राहता देशद्रोहही ठरतो. चालू द्या.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

मग गोध्रामध्ये ५०-६० जणांना जाळून मारणारे (तितकाच घृणास्पद गुन्हा करणारे) पण केवळ दंगेखोर किंवा चिथावणीखोर का? होय. जर ते भारतीय असतील (आणि स्वतःला तसे समजत असतील) तर त्यांना दंगेखोर अथवा चिथावणीखोर असेच संबोधले जावे. पण त्यात कुणी अभारतीय असेल तर त्याला अतिरेकी म्हणण्यास मला गैर वाटणार नाही. आणि माझ्या माहितीनुसार सर्वत्र गोध्रा दंगल, गुजरात दंगल असाच शब्दप्रयोग करण्यात आला आहे. गोध्र्याला अतिरेकी हल्ला किंवा गुजरातेत अतिरेकी हल्ला असा प्रयोग करण्यात आलेला नाही. कुणी केला असल्यास ती चूक आहे. बाकी राष्ट्रद्रोह अथवा जातीयवाद यावर आमची तुमच्याहून भिन्न मते आहेत एवढे सध्या पुरे.

In reply to by नाना चेंगट

जर ते भारतीय असतील (आणि स्वतःला तसे समजत असतील) तर त्यांना दंगेखोर अथवा चिथावणीखोर असेच संबोधले जावे. पण त्यात कुणी अभारतीय असेल तर त्याला अतिरेकी म्हणण्यास मला गैर वाटणार नाही.
म्हणजे भारतीय अतिरेकी नसतात तर.हे नवीनच कळत आहे.अतिरेकी असण्या/नसण्याचा भारतीय (किंवा अन्य कोणत्याही देशाचा) असायचा/नसायचा काय संबंध हे कळले नाही.
गोध्र्याला अतिरेकी हल्ला किंवा गुजरातेत अतिरेकी हल्ला असा प्रयोग करण्यात आलेला नाही. कुणी केला असल्यास ती चूक आहे.
गोध्रा कांडात पाकिस्तानच्या आय.एस.आय चा हात असायची शक्यता आहे असे पोलिसांनीच म्हटले आहे. संघ परिवाराशी संबंधित विश्व संवाद केंद्र पण तेच म्हणत आहे . आता आय.एस.आय म्हणजे दहशतवाद आलाच. आणि त्या प्रकारात केवळ आय.एस.आय ही पाकिस्तानी दहशतवादी संस्थाच सामील होती आणि कोणीच भारतीय नव्हते हे असंभवनीय आहे (कोर्टानेही काही भारतीयांनाच त्याबद्दल शिक्षा केली आहे). तेव्हा काही भारतीयही दहशतवादी कृत्यात सामील होतेच. १९९३ च्या स्फोटांच्या वेळी दाऊद इब्राहिम भारतीय पासपोर्ट धारक भारतीय नागरिकच होता.तेव्हा भारतीय दहशतवादात सामील नसतात असे अजिबात नाही. किंबहुना दहशतवादी असण्या/नसण्यामागे कोणत्या एका देशाच्या नागरिकत्वाचा (किंवा अमुक एका धर्माचे असण्याचा/नसण्याचा) संबंधच नाही. माझ्यासारख्यांचा आक्षेप कशाला आहे? गोध्रा म्हणजे दहशतवादी निंदनीय घटना मानणारेच गोध्राइतक्याच निंदनीय दंगलींचे एका अर्थी समर्थन करतात. म्हणूनच म्हटले-- तुमचा असेल तो दहशतवादी आणि आमचा असेल तर केवळ चिथावणीखोर.
बाकी राष्ट्रद्रोह अथवा जातीयवाद यावर आमची तुमच्याहून भिन्न मते आहेत एवढे सध्या पुरे.
वाचून आनंद वाटला.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

>>>>माझ्यासारख्यांचा आक्षेप कशाला आहे? गोध्रा म्हणजे दहशतवादी निंदनीय घटना मानणारेच गोध्राइतक्याच निंदनीय दंगलींचे एका अर्थी समर्थन करतात. म्हणूनच म्हटले-- तुमचा असेल तो दहशतवादी आणि आमचा असेल तर केवळ चिथावणीखोर. :) तुमचा आणि आमचा करुन तुम्ही "तुमचा" ह्या शब्दात मला गोवत असाल तर माझा आक्षेप आहे. तुमचे भांडण ज्यांच्याशी आहे त्यांच्याशी चालू ठेवा. >>>वाचून आनंद वाटला. तुम्हाला आनंद वाटला म्हणून मला पण आनंद वाटला.

एखाद्या धार्मीक माणसाने दुसर्‍या धार्मीक माणसाचा आणि त्याचा भावनांचा, धर्माचा आदर करावा इतपतच क्रिया भारताने केली आहे. त्यात भयानकपणा वगैरे आढळला नाही. पण अनाहूतपणे देशाचा, जनतेचा आणि तमाम अन्य कैद्यांचा मक्ता घेतलेले काही लेखक इतके खुनशी लेखन करताना बघून गंमत वाटली. बहुधा कंपनीचे फुकट मिळणारे नेट वापरून असे फुकटचे विचार बनले असावेत. असो.

नरोडा हत्यांकांड प्रकरणी न्यायालयाने जो निकाल दिला आहे, तो भाजपाच्या मंत्री/बजरंग दल यांच्याऐवजी सिमी (वा तत्सम) दहशतवादी संघटनेविरुद्ध असता तर, मिपावर एव्हाना शतकी धाग्याचा महापूर लोटला असता (त्यात गैर काहीही नाही) पण आता शतकी सोडाच पण साधा सूतकी धागादेखिल नाही!!! ;) अळीमिळी गुपचिळी!!! बाकी ही बसलेली दातखीळदेखिल बरेच काही सांगून जाते ;)