Skip to main content

राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने

लेखक श्रीरंग_जोशी यांनी शनिवार, 16/06/2012 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात. जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते. पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात. आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते. यावर लालूप्रसाद यादव म्हणाले की मतदान जेवणाआधीच व्हायला हवे, एकदा जेवणात सरकारचे मीठ खाल्ल्यावर आम्ही सरकारविरुद्ध कसे मतदान करणार? यावर आपले मोठे साहेब लगेच म्हणाले, लालूजी के लिये बीना नामक का खाना बनाईये. मिपाकरांना आवाहन आहे की या प्रकाराची आवडती विधाने संदर्भासह या धाग्यावर टंकावावीत...

वाचने 66499
प्रतिक्रिया 155

प्रतिक्रिया

In reply to by कानडाऊ योगेशु

१९९८ मध्ये जेव्हा लोकसभा निवडणूका होऊन गेल्या होत्या, नेमके त्यावेळी भारत - ऑस्ट्रेलिया एक दिवसीय सामने (भारतात व नंतर शारजा येथे) सुरू होते. महान फलंदाज राहुल द्रविड त्यावेळी फॉर्मात नसल्याने संघामध्ये नव्हता. कर्णधार अझहर ने, नयन मोंगियास ६ / ७ व्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. तोवर या क्रमांकावर राहुल द्रविड फलंदाजीस यायचा. नयन मोंगियाच्या छोट्या पण वेगवान खेळींमुळे संघाला फायदा झाला व आपण शारजातील मालिकाही जिंकलो. अर्थात सचिनची दोन्ही शतके अजरामर आहेतच. त्या मालिकेचे वर्णन करताना बहुधा कणेकर (कदाचित संझगिरीही असतील) यांनी लिहिले, की जसे अटलजींच्या भाषणांतील दोन वाक्यातल्या विरामात सोनिया गांधींचे एक छोटेखानी भाषण संपून जाते तसेच राहुल द्रविडने धाव काढलेल्या २ चेंडूंच्या दरम्यान नयन मोंगियाची अख्खी खेळी संपून जाते.

विरोधी पक्ष नेते म्हणून (मला वाटते रावांच्या काळात) अटलजी जोशपूर्ण भाषणात, "हम बदलेंगे, हम ये बदलेंगे, वो बदलेंगे" वगैरे म्हणत होते. तर काँग्रेसच्या बाकावरून त्यांच्या नावावरून कोटी करण्यासाठी म्हणून कोणीतरी म्हणाले, की" लेकीन आप तो अटल है (फिर बदलेंगे कैसे?) " ... अटलजींनी मिश्कीलपणे बघत म्हणले, "हां लेकीन मै बिहारी भी हूं!" अगदी जुना अत्र्यांचा पत्रकार म्हणून किस्सा, आधीच्या एका माझ्याच प्रतिसादात सांगितलेला: नीलम संजीव रेड्डी आणि व्हि व्हि गिरींच्या मधे झालेल्या चुरशीच्या लढतीची आठवण झाली. ज्या मधे इंदिरा गांधींनी व्हि व्हि गिरींना (अनधिकृत उमेदवारास) निवडून आणून दिले. बर्‍याच अंशी ही भारताच्या राजकीय आणि काँग्रेस पक्षाच्या अजूनच र्‍हासाची सुरवात होती. वाचनावरून आठवते त्याप्रमाणे, यशवंतरावांनी तेंव्हा बाईंना त्यांच्या बाजूने मत देईन म्हणून शब्द दिला आणि तो पाळला नाही. बाईंनी आयुष्यभर त्यांच्यावर त्यावरून डूग धरला आणि कधीच आपले समजले नाही....याच गिरीसाहेबांच्या जिंकण्यावरून आणि त्यांच्या ११ मुलांवरून आचार्य अत्र्यांनी दुसर्‍या दिवशीच्या पेपरात संपूर्ण कुटूंबाचा फोटो देत "व्हि व्हि गिरींची कामगिरी" असे शिर्षक दिले होते.

हा घागा फकस्त राजकीय पुढार्‍यांच्या विनोदी विधानांसाठी मर्यादित केल्याबद्दल णिषेध व्यक्त करण्यात येत आहे ... परवाच ह्या सहस्रकाचा विनोद ठरलेले विधान वाचले बातमी म्हणून ... ते म्हणजे पाकिस्तानच्या अतिसभ्य लष्कर प्रमुख कयानींचे विधान .... टाईम्स ऑफ ईंडिया च्या वेब्साईटवर वाचलेले ... "पाकिस्तान हा शांतिप्रिय देश आहे ..." (हशा ... + टाळ्या) कोण म्हणतो कि लष्करी अधिकार्यांना विनोदबुद्धी नसते म्हणून ....

In reply to by sagarparadkar

अहो पण मुळात पाकिस्तानी लष्कराचे मोठे अधिकारी त्यांच्या देशात राजकारणी म्हणूनच ओळखले जातात. आपल्या देशातील राजकारणीही कमी पडतील अशी कामगिरी ते कधी कधी करून दाखवतात.

माझे सर्वात आवडते राजकीय विधान. अंगावर आले तर शिंगावर घ्या...! ज्या माणसाला साधा कार्यकर्ता ते मुख्यमंत्री हा प्रवास होताना पाहिले, त्याला डावा हात म्हणून वागवले तो विरोधकांशी हातमिळवणी करताना दिसतोय असे लक्षात येताच बाळासाहेबांनी पक्षाबाहेर काढले. ही घटना दोन्ही बाजूंना भावनिक वेदना देणारी होती यात शंकाच नाही. पण राणेसमर्थक राडा करताहेत हे दिसल्याबरोबर लगेच साहेबांचा आदेश आला अंगावर आले तर शिंगावर घ्या...! अन सैनिक कामाला लागले. हाच बाणा दैनंदिन जीवनात कधी कधी कामी येतो, उगाच कुणाच्या वाटेला जाऊ नये पण कुणी उगाचच अंगावर आल्यास तयास शिंगावर घ्यायची तयारी ठेवावी. अवांतर - हाच बाणा मिपावर सुद्धा बरेचदा वापरला जातो, काही वेळा यश मिळते अन काही वेळा झेपत नाही तर घेताव कशाला (शिंगावर) असे म्हणायची वेळ येते ; -).

बाबासाहेब भोसले.(प्राचार्य शिवाजी राव भोसले यांचे सख्खे भाउ) ते पण शब्दप्रभू होते. १) खुदा मेहेरबान तो गधा पेहेलवान (स्वतःमुख्यमंत्री झाल्यावर) २) बंडोबा थंडोबा झाले ( बंड निवळल्यावर) स्व.राजीव गांधी एकदा म्हणाले होते "ऐसा नही किया तो हम इलेक्शन लुजेंगे"

In reply to by कापूसकोन्ड्या

या प्रतिक्रियेसाठी आपले विशेष आभार. बंडोबा हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात बाबासाहेबांनी प्रथम आणला. तसेच बारामतीच्या साहेबांनी २ वर्षांपूर्वी 'तोडपाणी' हा शब्दही आणला. काही लोकांनी त्याचा 'तोडबाजी' असा अपभ्रंश केला.

प्रमोद महाजन ह्यांनी पुण्यातल्या जाहीर सभेत हा उत्तुंग षटकार मारला होता. त्या सभेला मी स्वतः हजर होतो. नुकतेच बॅ. आदिक हे आपल्या 'हवाई' कारकीर्दीमुळे पायउतार होत होते किंवा झाले होते. त्या वेळेच्या आसपास जी निवडणूक झाली, तिच्या प्रचारसभेत महाजनांनी जबरदस्त आतषबाजी केली होती. तेव्हा काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले "काय म्हणायचे ह्या काँग्रेसला ... ह्या महाराष्ट्राला ह्यांनी चार वर्षांत साडेतीन मुख्यमंत्री दिले ..." (लोक अचंबित .... म्हणजे काय?) तर महाजनांनी लगेचच त्या साडेतीन मुख्यमंत्र्यांची यमक जुळवत नावे सांगितली ... "अंतुले, भोसले, दादा .... आदिक आधा !" ....आणि एकच हशा उसळला .... आणि टाळ्यांचा कडकडाटच झाला ....

हटाव लुंगी ,बजाव पुंगी. हे विधान दक्षिण भारतीयांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले होते तेव्हा खूप गाजले होते. किंवा मला सत्ता द्या मी बिहार चे रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळीत करून दाखवतो. लालू उवाच गुड्डी आता बुड्ढी झाली तरी ..... नाना आता तरी टीक रे , नाही मागे एकदा केले विधान केल्यावर मग म्हणाला होता , मी असे म्हणालोच नाही. अवांतर मिपाच्या इतिहासातील गाजलेली आणि विनोदी तकिया कलाम किंवा विधाने ह्यांच्यावर एखादा लेख काढला तर प्रतिसादातून मराठी साहित्यात अनमोल भर पाडणारा खजिना सापडेल. .

बाबू जगजीवनराम सांसदीय कामकाज मंत्री म्हणून इंदिराजींच्या म.म्त्रीमंडळात कार्यरत असताना त्यांनी सर्व खासदारांसाठी शासकीय खर्चाने एक सुट्टी मंजूर केली. त्यावेळेस ते म्हणाले ... " Member is allowed to be accompanied by his or her spouce on the trip..." अटलबिहारी वाजपेयी उभे राह्यले आणि विचारले.. "What about unmarried members ? Can they go with their friends..?" बाबू जगजीवनराम क्षणार्धात म्हणाले.... "I said Spouce and not Spice , Mr. Vajpeyi......"

(वाचनात लक्षात राहिलेले काही किस्से) खासदार पिलू मोदी हे मिश्किल गृहस्थ होते. लोकसभेत त्यांच्या विधानांनी खसखस पिकत असे. ते काही वेळा बिनधास्त बोलत असत. एकदा भाषणात टीका करताना ते म्हणाले, 'काही दुय्यम नेते आता स्वतःला सरकार समजू लागले आहेत. यांची पात्रता ती काय? हे नुसते आपल्या विद्यमान पंतप्रधानांचा पेटिकोट पकडून चालत चालत आलेत.' त्यावर सत्तारुढ सदस्यांनी 'पेटिकोट' शब्दाला आक्षेप घेतला आणि तो शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. अध्यक्षांनी त्यावर मोंदीकडे पाहिले. तर मोदी म्हणाले, 'महोदय, पण पेटिकोट काढून टाकला तर मग उरलं काय?' यावर तत्कालीन पंतप्रधानांनाही हसू आवरले नाही. महाराष्ट्र विधानसभेत एकदा सर्व सदस्यांच्या छापील माहितीच्या सूचीवरुन चर्चा झाली. या सूचीत अनवधानाने सर्व महिला सदस्यांच्या इंग्रजीतील नावामागे मिस लावले होते. याला विवाहित महिला सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यावर सभापती मधुकरराव चौधरी यांनी ती चूक दुरुस्त करण्याचा आदेश दिला आणि गंमतीने महिला सदस्यांकडे पाहून म्हणाले, ' मला खात्री आहे. सन्माननीय सदस्या आता 'मिसप्रिंट' वर आक्षेप घेणार नाहीत.

In reply to by बॅटमॅन

अजून एक मिसप्रिंट पेपरातील बातमी "काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात साधारण ३०० वक्ष कोसळले"

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

असे कोसळलेले वक्ष सावरण्याचे काम करायला समाजातून सेवकांचा लोंढा येईल येविषीं यत्किमपि शंका आम्हास वाटत नाही ;)

In reply to by बॅटमॅन

विमे आणि ब्याम्या अशा सभ्य समजल्या जाणार्‍या आयडीकडून असले प्रतिसाद बघून एक मिपाकर असल्याची... वैग्रै..., वैग्रै.. (कधी कधी) असभ्य असणारा आणि ते (नेहमीच) कबूल करणारा ;-) - मोदक.

In reply to by मोदक

आम्ही कधी म्हटले आम्हाला सभ्य समजा म्हणून... जे तुमच्या मनात आहे ते माझ्या हातात नाही*. (नेहमीच) असभ्य असणारा आणि ते (कधी कधी) कबूल करणारा - विमे. * या मागचा किस्सा सांगू का ?? ;-)

In reply to by बॅटमॅन

पुरे करा रे पोरांनो... आधीच जोशी काका दुनियेच्या टारगेट वर आहेत त्यात तुम्ही अवांतराचे तेल ओतू नका. (सभ्य, सोज्वळ, सज्जन आणि निरागस नसणारा) मोदक.

In reply to by मोदक

साहेबांचे राजकारणाखेरीज इतर क्षेत्रातील मान्यवरांशी नेहमीच जवळचे संबंध असतात. असाच एक किस्सा ४०+ वर्षांपूर्वीचा. साहेबांनी बारामतीमध्ये एका साहित्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात पुलं व गदिमा यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रम अर्थातच जोरदार झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे साहेबांकडे त्यावेळी स्वतःची गाडी नव्हती. त्यामुळे एका स्थानिक शेठजींची गाडी घेण्यात आली होती. संध्याकाळी पुण्याला परत जाताना शेठजी व साहेब पण बरोबर होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर शेठजींनी सवयीप्रमाणे सरळ मुद्द्यालाच हात घातला. ते म्हणाले, हे साहित्य वगैरे ठीक आहे हो पण तुम्ही लोक पोटापाण्यासाठी काय करता? गाडीमध्ये एक दडपणयुक्त शांतता पसरली. गदिमांच्या कोपिष्ट स्वभावाची साहेबांना पूर्ण कल्पना होती. अपेक्षेप्रमाणेच, पुलंनी परिस्थितीचा ताबा घेतला, ते म्हणाले आम्ही पोस्टासमोर काम करतो. या अण्णांचं हस्ताक्षर खूप चांगलं आहे त्यामुळे ते लोकांची पत्रं लिहून देतात आणि मी लोकांच्या तुटलेल्या छत्र्या दुरुस्त करून देतो...

In reply to by शिल्पा ब

एकावेळी पाचच धागे मुखपृष्ठावर दिसत असल्याने काहीही केले तरी तारखेनुसार क्र. ६ किंवा त्यापुढील धागा मुखपृष्ठावर दिसणार नसतोच. कृपया मार्गदर्शन करावे...

In reply to by श्रीरंग_जोशी

जोशी साहेब.. म्याडम "नवे लेखन" बद्दल म्हणत आहेत. ते जावूद्या, तुम्ही नवे किस्से सांगा, मजा येत आहे वाचायला. (खोचकपणे बोलत नाहीये - गैरसमज नसावा) "राजधानीतून" नावाचे अशोक जैन यांचे पुस्तक वाचले आहे का? राजकारण्यांचे किस्सेच किस्से आहेत त्यात. :-)

In reply to by मोदक

आपला आभारी आहे, मोदकराव! म्हणजे मिपावरही म्याडम आहेत तर... हे पुस्तक वाचलेले नाहीये. खरे सांगायचे तर आवड असूनही फारशी पुस्तकं वाचणे जमलेच नाही. राजकारणाच्या या विनोदी अंगाचे दर्शन प्रथम घडले ते तंबी दुराई (श्रीकांत बोजेवार) यांच्या २ फूल १ हाफ या सदराने. ११ वर्षात एखाद- दुसरेच वाचायचे राहिले असेल. आता ते सदर नसल्याने लोकरंगची पार रयाच गेली आहे.

जबतक समोसे मी आलू रहेगा तबतक बिहार मी लालू रहेगा. वाकड्या तोंडाचा गांधी , मैद्याचे पोते , लखोबा लोखंडे हि बाळासाहेबांनी दिलेली विशेषणे ज्याचा ते आपल्या भाषणात नेहमी उल्लेख करत खूप गाजली होती. राजकारण म्हणजे गजकरण ( गजकर्ण ) हे त्यांचे विधान सुद्धा गाजले होते.

शरद पवारांना विलासराव परत मुख्यमंत्री होणार का विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं, समय से पहले और किस्मत से ज्यादा किसीको कुछः नाही मिलता...

१९९८ ची लोकसभा निवडणूक, संयुक्त आघाडीच्या सरकारचा २०-२१ महिन्यांचा कारभार, सोनियाजींचे उगवते नेतृत्व यामुळे भाजप व मित्रपक्ष पूर्ण भरात होते. खास करून महाराष्ट्रात तर युतीचे वारू चौखूर उधळले होते. १९९६ च्या निवडणूकीत युतीला ४८ पैकी ३३ जागा मिळाल्या होत्या. भाजपचे राज्यातील नेतृत्व तर अती आत्मविश्वासात होते. त्याचीच परिणिती नागपूरचे खासदार यांचे तिकिट कापण्यात झाली. पुरोहितांनीही एका रात्रीत आपला गट बदलला व ते काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले. द हितवाद (याचे ते मालक -संपादक आहेत अजूनही) वर्तमानपत्रात तर मुख्यमंत्र्यांच्या रामटेकमधील सभेत गुरे ढोरे बसल्याचे छायाचित्र आले होते. नितीन गडकरींनी यावर म्हटले की पुरोहितांबरोबर त्यांचे वर्तमानपत्रही बदलले. पुरोहितांनी त्या निवडणूकीत काँग्रेस उमेदवार विलास मुत्तेमवार यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण जोर लावला. मतदानाच्या काही दिवस अगोदर सोनियांची नागपूरमधील पहिलीच जाहीर सभा होती. कस्तुरचंद पार्कवर लाखांची गर्दी जमली होती. व्यासपीठावर विदर्भातील ११ ही मतदारसंघांचे काँग्रेस - रिपाई चे उमेदवार व काँग्रेसचे राज्यातील नेते उपस्थित होते. अर्थातच बनवारीलाल पुरोहितही होतेच. नेमका सोनियाजींना सभास्थानी पोचण्यास उशीर झाला. या संधीचा लाभ उठवण्यासाठी पुरोहितांनी त्यांना सोनियाजी येईपर्यंत भाषण करू देण्याची विनंती केली. एवढ्या मोठ्या गर्दीसमोर भाषण करण्याची संधी उभ्या आयुष्यात मिळणार नव्हती. लोकसत्तेच्या वार्ताहराने याबद्दल लिहिले की त्यावेळी बोलू दिले नसते तर पुरोहितांना हार्ट अटॅकच आला असता. मौके की नजाकत पाहून काँग्रेस नेत्यांनीही त्यांना बोलण्याची संधी दिली. पुरोहितांनीही मिळालेल्या संधीचा पूर्ण वापर करून गडकरी व महाजनांवर यथेच्छ तोंडसुख घेतले. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गडकरींनी पूरोहितांना फ्युझ्ड बल्ब म्हणून हिणवले होते. यावर पुरोहितांनी या सभेत प्रत्युत्तर दिले. ये गडकरी ने मुझे फ्युझ्ड बल्ब कहा, अगर मैने इनके ११ के ११ बल्ब फ्युझ नही किये तो नाम बदल दूंगा. अन काय सांगावे ऐन भरात असलेल्या युतीचे ११ ही उमेदवार पडले. त्यात ७ खासदार होते हे विशेष. महाराष्ट्रातही केवळ १० (सेना ६, भाजप ४) उमेदवार निवडून आले. विदर्भातील ३ धरून रिपाईचेही इतिहासात प्रथमच ४ खासदार निवडून आले. पवारांचे राजकीय समीकरण (काँग्रेस, सपा, रिपाई) व जुलै १९९७ ची रमाबाई आंबेडकर नगरातील घटना यांचा संयुक्त परिणामाने युतीचे न भूतो न भविष्यती असे पानिपत झाले.

In reply to by शिल्पा ब

+१, मी तर प्रतिसाद वरुन खाली, खालुन वर, डाविकडुन उजवीकडे, त्याच्या उलट, मग एक ओळ सोडुन एक ओळ( अशा प्रकारे वाचायचं साहित्य हल्ली फार कमी झालं आहे) सगळ्या प्रकारे वाचुन पाहिलं, विनोद तर सोडा, विनोद तावडेंचं नाव देखील नाही सापडलं.

In reply to by शिल्पा ब

गाजलेली विधाने हि प्राथमिक पात्रता आहे धाग्याच्या शीर्षकाप्रमाणे. विनोदी असेल तर दुधात साखर.

आणखी एक गाजलेले विधान. ६ डिसेंबर १९९२ च्या अयोध्येतील घटनेनंतर देशभरात दंगली पेटल्या व बरेच आठवडे सुरू राहिल्या. मोजके बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव या घटनेवर धोरणात्मक असं काही बोलले नाही. काही महिन्यांनंतर सर्व काही शांत झाल्यानंतर त्यांनी चक्क अयोध्येत जाहीर सभा घेतली. या सभेत स्वतःच्या कार्यपद्धतीला शोभून न दिसणारे (अयोध्येत मंदिर मशीद पुन्हा बांधण्याचे) आश्वासन त्यांनी दिले. हा (उजवे व डावे) विरोधकच काय तर स्वपक्षीयांसाठीही एक धक्काच होता. अर्थातच विरोधी पक्षांनी यावर रणकंदन सुरू केले व स्पष्टीकरणाची मागणी केली. त्यावेळी सरकारच्या वतीने तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण (यांना अख्खा महाराष्ट्र हेडमास्तर म्हणून संबोधायचा) याबद्दलचे स्पष्टीकरण दिले. "पंतप्रधानांनी अयोध्येत मंदिर मशिद बांधायचे आश्वासन जरूर दिले, पण कुठे बांधले जाणार त्या जागेचे नाही". अर्थातच या एका उत्तराने विरोधकांच्या विरोधामधली हवाच काढून घेतली.

In reply to by विजुभाऊ

धन्यवाद विजुभाऊ! मूळ लेखन टंकले तेव्हा 'रणकंदन' असेच टंकले होते अथवा टंकण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित अनुस्वार वगैरे राहिला असेल. म्हणून शुद्धिचिकित्सकाने सरळ रानाकडे न्यावे? अर्थात शु. चि. वापरताना माझीच घाई व अतिआत्मविश्वास नडला असणार.

ममता ब्यानर्जी रेल्वे बजेट संसदेत सादर करताना म्हणाल्या "आय कांट सॅटिस्फाय ऑल ऑफ यू", प्रचंड हशा उसळला. त्यांचेच एक दुसरे उदा. बंगालमध्ये गुंतवणूक करावी वैग्रे सांगणारी एक समिट् बोलावली होती. त्यात त्या म्हणाल्या, "यू हॅभ टु इन्भेस्ट इन बेंगॉल, बिकॉज बेंगॉल इज द गेटवे टु नॉर्थइस्टर्न कंट्रीज(राज्ये म्हणावयाचे असावे). ऑल्सो, इट इज द गेटवे टु बांगलादेश अँड बांगलादेश इज द गेटवे टु पाकिस्तान". ऐकता ऐकता कळावयाचे बंद झाले. तूनळीवर ममता ब्यानर्जींच्या मजेशिर भाषणांची क्लिप आहे, सर्चल्यास मिळंल लग्गेच.

स्व. दादा कोंडके यांचे कोल्हापुरातील फार जुनी सभा आहे शिवसेनेच्या समर्थनात ..त्यात त्यांनी शरद पवार ला ,राजीव गांधीला आणि कॉंग्रेस ला खूपच हाणले आहे... :) http://www.youtube.com/watch?v=CK3Ve4nE_A8 कॉंग्रेस(आय) चा अर्थ पण सांगितला आहे.. :) जाता जाता "लागले हे आपापली "cyclindare" उचलून कामाला..." इति शिवसेना प्रमुख....

आपले कृषी मंत्री मोजकेच बोलतात. शेती तज्ञ असल्याने कुठे काय पेरावे व त्या पासून किती पिक मिळेल याचा त्यांना नेमका अंदाज असतो. मोर जसा पावसाळा सुरु झाल्यावर केका करतो तसेच प्रत्येक निवडणुकीच्या आधी साहेब बोलतात. १.देशाच्या राजकारणामध्ये प्रमोद महाजनांचा दबदबा होता , बाळासाहेबांशी मैत्री होती आणि त्याचा परिपाक म्हणजे मनोहर जोशी (मर्यादित कर्तुत्वावर अलगद) लोकसभेचे अध्यक्ष झाले. वास्तविक पवारही तेंव्हा आपत्ती निवारण संन्स्थेचे मोठे पद (महाजन पवार दोस्तीमुळे परस्पर हितवादी ) राखून होते. निवडणुका आल्यावर साहेब बोलले होते - हल्ली राजकारण जोशी -महाजनांच्या हातात आहे. भारताचा कर्णधार रवी शास्त्री असताना , चंद्रकांत पंडित ही भारतीय संघात होता. ( आणि मुंबईचा कर्णधार). त्यावेळचे त्यांचे उद्गार "भार्तीईय क्रिकेट मध्येही शास्त्री-पंडितांचेच राज्य आहे " असो. पुढे त्यांनी क्रिकेटचा कारभार हाती घेतला आणि आता मराठी मुलगा भारतीय संघात नाहीच तर मुंबईत ही हाताच्या बोटावरमोजण्याईतकेच. हया वाक्यामध्ये फार मोठा विनोद ( अतिशयोक्ती हो ) तर आहेच पण , एखादे बीज कसे पेरावे व त्यापासून भरघोस पिक कसे घ्यावे हे सांगणारे आहे. - साहेब सगळ्यांचे बारसे जेवले आहेत हेच खरे.

जाणता राजा म्हणून प्रसिद्ध असणारे शरच्चंद्रजीरावदादासाहेब पवार लोकसभेत दुष्काळ या विषयावर अस्खलित हिंदीत भाषण करत होते, "महाराष्ट्र में इतना बडा सूखा पडा है के लोगोंको चार घास भी ठीक से खाने को नही मिलते!" तमाम हिंदीभाषिक बुचकळ्यात. महाराष्ट्र मे लोग घास खाते है?

In reply to by हुप्प्या

खासदार झाल्यावर सुरुवातीच्या काळात हिंदीवर प्रभुत्व नसल्याने झालेले घोळ बघून साहेबांनी हिंदीची शिकवणी लावली होती अशी वंदता होती. तसेच नंतरच्या काळात इंग्रजीची पण शिकवणी लावल्याची कुजबूज होती. खरे खोटे साहेबच जाणे.

इंग्लंडच्या उच्च संसदीय परंपरांचे उदाहरण म्हणून सांगितला जाणारा एक किस्सा... एकदा इंग्लंडचे अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडण्यासाठी तेथील संसदेत पोचत होते. प्रवेशद्वारापाशीच एक विरोधी सदस्याला सिगारेट ओढताना पाहून ते कुत्सितपणे म्हणाले, 'महोदय, उद्यापासून ही चैन आपल्याला परवडणार नाही'. अर्थसंकल्प मांडून झाल्या झाल्या तो विरोधी सदस्य उभा राहून म्हणाला की अर्थमंत्र्यांनी गोपनीयतेचा भंग केलेला आहे म्हणून मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. संपूर्ण सभागृह अवाक होवून पाहत असताना त्या सदस्याने सकाळचा किस्सा समजावून सांगितला. अर्थसंकल्पात तंबाखुजन्य पदार्थांवरील कर वाढवल्यामुळे सकाळी बोललेले वाक्य म्हणजे अर्थमंत्र्यांनी गोपनीयतेचा शपथेचा भंग केलेला आहे. अन आपल्याला आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे अर्थमंत्र्यांनी हा आरोप मान्य करून तडक राजीनामा दिला व तो लगेच मंजूरही करण्यात आला.

बांग्लादेशच्या युद्धात पाकिस्तान चा न भूतो न भविष्यती असा पराभव केल्यावर फील्डमार्शल सॅम माणेकशॉ लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले होते. पंतप्रधान म्हणून इंदिराजींनि खेळलेल्या राजकीय डावपेचांबद्दल त्यांनाही यथोचित श्रेय मिळतच होते. पंतप्रधान व सैन्यप्रमुख म्हणून दोघांचेही संबंध सलोख्याचे होते. परंतु या दिग्विजयी कामगिरीनंतर इंदिराजींच्या भोवती असलेल्या काही विघ्नसंतोषी मंडळींनी इंदिराजींचे कान भरणे सुरू केले की माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर उठाव करणार आहे. आपल्या देशाच्या सुदैवाने इंदिराजींनी कुठलेही अविचारी पाऊल न उचलता सरळ माणेकशॉ यांना पाचारण केले व स्पष्ट शब्दांत याबाबत विचारणा केली. सॅम यांनी अगदी सहजणे उत्तर दिले. देवाने आपल्या दोघांनाही चांगले धारदार नाक दिले आहे जे आपण दोघेही एकमेकांच्या कामात कधी खुपसत नाही व यापुढेही खुपसणार नाही.

(बहुतेकांना माहीत असावा.) चर्चिल हे खूप हजरजबाबी म्हणून प्रसिध्द होते. एकदा विरोधी पक्षाच्या सदस्या चिडून त्यांना म्हणाल्या," मी जर तुमची पत्नी असते तर तुमच्या चहात विष मिसळले असते." क्षणाचाही विलंब न लावता चर्चिल उत्तरले,"मी जर तुमचा नवरा असतो तर तो चहा आनंदाने प्यायलो असतो!"

In reply to by श्रीरंग

विन्स्टन चर्चिल काय अन जॉर्ज बर्नाड शॉ काय, दोन्हीही इरसाल माणसे. असे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत त्यांच्याबद्दल...

In reply to by श्रीरंग_जोशी

चर्चील आणि नॅन्सी अ‍ॅस्टर (ब्रिटनच्या पहिल्या महिला खासदार) यांच्यातला किस्सा आहे तो!

चर्चीलचा अजून एक गाजलेला किस्सा - चर्चील पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या टॉयलेटमध्ये असताना दाराची कडी वाजली. चर्चीलचा सेक्रेटरी बाहेरुन म्हणाला, "Excuse me Prime Minister, but the Lord Privy Seal wishes to speak to you." "Tell His Lordship: I'm sealed on The Privy and can only deal with one shit at a time!" चर्चीलने आतून उत्तर दिलं!

जॉर्ज बर्नाड शॉने एकदा आपल्या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाची दोन तिकीटं चर्चीलला पाठवली. सोबत एक खवचट चिठी होती. "तुला एखादा मित्रं असलाच तर त्याच्याबरोबर नाटकाला ये!" "तुझ्या नाटकाचा दुसरा प्रयोग झालाच, तर नक्की येईन!" चर्चीलने त्याच कागदावर खाली लिहून पाठवलं!

In reply to by जॅक द रिपर

चिट्ठी जरा अशा भाषेत होती असे वाचल्याचे स्मरते. मित्राला घेऊन नाटकाला ये......... कुणी असला तर. अवश्य दुसर्‍या प्रयोगाला येईन.......जर झाला तर.

सर विन्स्टंट चर्चिल हे पंतप्रधान असताना, एकदा आजारी असून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. त्यांना भेटायला विरोधी पक्षाचे काही सद्स्य हॉस्पिटलमध्ये आले होते. नेमके त्याचवेळी, एक नर्स, त्यांचा नैसर्गिक विधी उरकून, ते भांडे घेऊन चालली होती. रुममध्ये त्यावेळी उपस्थित विरोधी पक्ष सदस्याना बघून सर विन्स्टंट चर्चिल म्हणाले, "First time I am seeing my 'motion' being carried unopposed.”

अमेरीकेतील नागरी युद्धाच्या काळातला हा एक किस्सा - दक्षिणी राज्यांविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत उत्तरी राज्यांचा मॅक्लेलान नावाचा एक सेनापती होता. हा मॅक्लेलान आपले रिपोर्ट पाठवण्याबाबत कमालीचा आळशी होता. त्याच्या एखाद्या चकमकीचा अहवाल बर्‍याचदा महिन्याभराने लिंकनच्या हाती येत असे! वैतागून लिंकनने एकदा त्याला रोजच्यारोज डिटेल रिपोर्ट पाठवण्याचा सक्तं हुकूम सोडला. "आज आम्ही शत्रूच्या चार गाई पकडल्या आहेत!" मोजून दोन दिवसांनी मॅक्लेलानचा संदेश आला! "ताबडतोब दूध काढून सैनिकांना पिण्यास द्या!" लिंकानने उत्तर पाठवलं!

मी हा किस्सा लोकसभेच्या प्रेक्षक ग्यालरीत बसून ऐकलेला आहे - सभागृहात मिरे (Pepper) निर्यातीबद्दल चर्चा चालली होती. त्या वर बिहार मधील एका खासदारांनी उठून हा प्रश्न विचारला होता - देशात paper (कागदा) चा इतका तुटवडा असताना त्याच्या निर्यातीची चर्चा का चालली आहे ?

लालू बेचारा आदत का मारा घरमे थी रबडी लेकिन खा रहा था चारा

लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. ( कोणत्या साली ते आठवत नाही, जाणकारानी शोधुन लिहावे ) केरळमधुन काँग्रेसचे खासदार जाफर शरीफ निवडून आले होते. पहिलाच दिवस असल्याने , खासदारांचा शपथविधी सुरु होता. जाफर शरीफ यांचे नाव पुकारले गेले आणि नेमक्या त्याच वेळेला ते बाहेर निघून गेले होते. त्यावेळी नाथ पै की मधू दंडवते कोणीतरी पटकन म्हणाले , " हमारे में एक ही तो ' शरीफ ' था , वो भी बाहर गया है '! ! १९६२ सालच्या चिनी आक्रमणा नंतर पं. जवाहरलाल नेहरू , आपण गमावलेल्या १२,००० चो. मैलाच्या भुभागाचे , न पटणारे समर्थन करीत असतांना म्हणाले , " नाहीतरी त्या जमीनीवर गवताचे एक पाते उगवत नव्हते, जमीन काही कामाची नव्हतीच. " त्यावर श्री पिलू मोदी हे गुजराथ मधील खासदार , नेहरुन्च्या , तुळतुळीत टकलाकडे पाहून म्हणाले, " आपल्याही डोक्यावर असेही काही उगत नाही, तेही आपल्या काय कामाचे ? " लोकसभेत हंशा पिकला हे सांगायला नकोच.

चरिचिलना नभोवाणी वरून भाषण करायचे होते. काही कारणाने त्याना ट्याक्सी तून जावे लागले.रस्त्यावर आल्यावर त्यानी एक ट्याक्सी थांबविली " नभोवाणी केद्रावर नेतोस का अर्जट ? चर्चिल " नाही जमायचे नाही ! मला चर्चिल साहेबांचे भाषण ऐकायला थांबायचेय " ड्रायव्हर अरे, मी चौपट पैसे देतो तुला जायचे " चर्चिल असे का मग चला साहेब तो चर्चिल गेला खड्ड्यात " ड्रायव्हर .

बरेच आधी एक किस्सा वाचला होता तो लिबरल ब्रिटिश प्राइम मिनिस्टर लॉयड जॉर्ज ह्यांचा होता की अब्राहम लिंकन चा नीट आठवत नाहीये जाणकार कदाचित सांगु शकतील, किस्सा असा की लॉयड जॉर्ज/ लिंकन एकदा निवडणूक प्रचारासंबंधात एक "नुक्कड़ सभा" सारखी सभा घेत होते तेव्हा प्रेक्षकात बसलेला एक टारगट बाप्या ओरडला "ह्याचा बाप एक जुना खटारा चालवत असे ज्याला घोड्या ऐवजी गाढ़वे जुंपलेली असत!" ह्यावर अजिबात तोल न ढळू देता लॉयड जॉर्ज / लिंकन मिश्किलपणे म्हणाला की "आज आमचे पिताजी जिवंत नाहीत किंवा त्यांचा तो खटारा ही अस्तित्वात नाहीत पण त्याला जुंपलेली गाढ़वे मात्र अजुन जिवंत आहेत"

१९९६ साली अट्लबिहारी वाजपेयीं पंतप्रधान असताना विरोधकांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आणला व NDA सरकार १३ दिवसात पडलं.त्यानंतर तिस-या आघाडीला बाहेरुन पाठींबा देऊन काँग्रेसनी देवेगौडांना पंतप्रधान केलं. त्या वेळी संसदेच्या पहिल्याच सत्रात प्रमोद महाजन बोलत होते. सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात त्यांनी तुफानी आतिषबाजी केली होती. त्या वेळच्या तडजोडीच्या राजकारणावर सडकुन टिका करताना त्यांनी एक किस्सा सांगायला सुरुवात केली.एकदा भारतीय सर्व-पक्षीय संसदीय मंडळ चीनच्या दौर्यावर गेले होते,त्यावेळी एका चिनी राजकारणी माणसाने महाजनांना भारतीय लोकशाही बद्दल काही प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना महाजन म्हणाले," हम जब चीन मे गये तो बहुत सारे लोग हमारे साथ थे| तब मुझे किसीने पुछा आपकी democracy कैसे चलती है? मैने कहा की democracy समझाने से अच्छा मैं सिर्फ आपको अपने सहचारिंओंका परीचय करवां देता हूं आप खुद ही भारतीय democracy समझ जायेंगे. मैंने कहा..'I am Pramod mahajan, I am member of Loksabha, I belong to single largest party in the house.. and I am in opposition!' फिर मैंने श्रीवल्लभ पाणिग्रहींकी ओर हाथ करे बोला,'He belongs to second largest party (Congress). He is outside the Government..supporting the Government', फिर मैंने अहमद बेदी साहाब को उठाया और कहा,'He is in third largest party(Janata Dal).. he is inside the front but out side of government' और फिर मैंने कहा,'he is Mr. Ramakant Khalap,( Maharashtrawadi Gomantak Party) he is the only member of his party and he is in the government!!(Law Minister)'...

In reply to by पामर

प्रमोद महाजनांचे हे भाषण म्हणजे खरोखरच खूपच छान होते. एक सुधारणा-- हे भाषण प्रमोद महाजनांनी देवेगौडा सरकार आल्यानंतर पहिल्या संसद अधिवेशनात केले नव्हते तर सीताराम केसरींनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा अचानक काढून घेतल्यानंतर ११ एप्रिल १९९७ रोजी देवेगौडा सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत केले होते. (११ एप्रिल १९९७ च्या विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेतील प्रत्येक भाषण अगदी भक्तीभावाने ऐकलेला) ट्रुमन