Skip to main content

राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने

लेखक श्रीरंग_जोशी यांनी शनिवार, 16/06/2012 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात. जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते. पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात. आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते. यावर लालूप्रसाद यादव म्हणाले की मतदान जेवणाआधीच व्हायला हवे, एकदा जेवणात सरकारचे मीठ खाल्ल्यावर आम्ही सरकारविरुद्ध कसे मतदान करणार? यावर आपले मोठे साहेब लगेच म्हणाले, लालूजी के लिये बीना नामक का खाना बनाईये. मिपाकरांना आवाहन आहे की या प्रकाराची आवडती विधाने संदर्भासह या धाग्यावर टंकावावीत...

वाचने 66498
प्रतिक्रिया 155

प्रतिक्रिया

In reply to by गॅरी ट्रुमन

law will take its own course - या वरुन "आप रेस कोर्स मे बैठे हो ऑर उनको ओन कोर्स बोल रहे हो ये कैसे चलेगा" - हे पण याच भाषणा वेळी. :) :)

In reply to by गॅरी ट्रुमन

त्यांची भाषणे आणि घोडे बाजारातील खरेदी विक्रीचे कसब चांगले होते. आता संघात भाजपात फर्डे व्यक्ते अनेक होते पण भाजपात पंचताराकित वलयांकीत व कलंकित संस्कृती आणण्याचा बहुमान ह्यांचाच भाजपला महाराष्ट्रात दुबळे व सेनेचे बांडगुळ ह्यांनीच बनवले. नुसत्या भाषणांनी आर्थिक सुधारणा व प्रशासकीय कारभारात सुधारणा शक्य असत्या तर अजून काय हवे होते आपल्या मतदार संघात त्यांना गुरुदास कामत ह्यांचे अप्रतिम कामाचे व प्रभावी कार्यकर्त्यांच्या जाळ्याचे आव्हान लाभले होते , राम मंदिर नानात्र ची निवडणूक वगळता इतरवेळी त्यांचा नेहमीच सुपडा साफ झाला.

In reply to by पामर

चुकी साठी माफी असावी
माफी वगैरे कशाला? समजा प्रमोद महाजनांनी ते भाषण एप्रिल १९९७ मध्ये केले असे म्हणण्याऐवजी जून १९९६ मध्ये केले असे म्हटले तरी त्यामुळे आभाळ थोडीच कोसळणार आहे? रेकॉर्ड स्ट्रेट असावा म्हणून सुधारणा सुचवली इतकेच. माफी वगैरे मागून टेन्शन घेऊ आणि देऊ नका राव. मिपा आपलाच असा :)

"इंदिरा इ़ज इंडीया " आणीबाणीच्या काळातले हे काँग्रेस पुढा-याचे वाक्य खूप गाजले होते. बहुतेक बॅ. रजनी पटेल. नक्की आठवत नाही. अजून एक, "काँग्रेसला राजीव गांधींशिवाय पर्याय नाही आणि देशाला काँग्रेससिवाय पर्याय नाही " - बॅ. विठ्ठलराव गाडगीळ

लालबहादूर शास्त्रींनंतर इंदिरा गांधींना पंतप्रधान बनविण्यात कामराज, निजलिंगप्पा, अतुल्य घोष इत्यादी सिंडिकेटचा महत्वाचा वाटा होता. १९६७ च्या निवडणुकांपर्यंत इंदिरांना पंतप्रधानपदी ठेवायचे तोपर्यंत त्यांना कठपुतलीप्रमाणे कसेही फिरवता येईल असा त्यांचा कयास होता.पण तो कयास जोरदार फसला. इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदी आल्यावर स्वतःचा इंगा दाखवून द्यायला सुरवात केली. १९६६ मध्ये रूपयाचे अवमूल्यन करायचा निर्णय इंदिरा गांधींच्या सरकारने घेतला.हा निर्णय सिंडिकेटला फारसा रूचला नव्हता.त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी "Great man's daughter--small man's mistake" असे म्हटले. म्हणजे Great man's (नेहरूंच्या) daughter (इंदिरांना) पंतप्रधान बनविणे ही small man's mistake होती. इथे small man हे कामराजांनी स्वतःला उद्देशून म्हटले. अर्थातच यात विनोदी काहीच नाही पण हे कामराजांचे गाजलेले विधान होते म्हणून इथे लिहित आहे.

लोकसभा निवडणूक १९८४. बारामती मधून शरद पवारसाहेब (स. काँग्रेस) आणि शंकरराव पाटील (काँग्रेस) असा प्रमुख सामना होता. पवारसाहेबांची आकुर्डीच्या सभेमधील भाषणातील काही वाक्ये - ".... आजच टाईम्समधे गेल्या पाच वर्षांत ज्यांनी लोकसभेत एकही प्रश्न विचारला नाही अशा खासदारांची लिस्ट आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या २८ खासदारांची नावे आहेत. त्यात पहीले नाव आहे शंकरराव बाजीराव पाटील. या माणसानी लोकसभेत फक्त दोन वेळा तोंड उघडले. पहील्यांदा खासदारकीची शपथ घ्यायला. कारण त्याशिवाय खासदारकीचे बेनीफिट मिळत नाहीत. आणि दुस-यांदा जांभई दयायला..." प्रचंड हशा ....

(चु. भु . द्या . घ्य.) बाबासाहेब भोसले यांच्या विरुद्ध त्यांच्याच पक्षातील लोकांनी एका बैठकीत बंड केले, प्रकरण हातघाईवर आले, तेव्हा कसेबसे बाहेर आलेल्या बाबासाहेबांची प्रतिकिया :- यांची उक्ती बंडाची वृत्ती गुंडांची कृती षंढांची

या माणसाचे नाव घेतले की हसायला येते राव! जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करताना अबू आझमीं ने तोडलेले तारे! इस प्रोजेक्ट को हर एक मुसलमान को विरोध करना चाहिए। कयोकि ये प्रोजेक्ट बना कौन रहा है? अरेवा कंपनी। अरेवा कंपनी किधर की है? फ़्रांस की। ये फ़्रांस ऐसा देश है जिसने मुसलमानो को बुरक़ा पेहन्नेपर पाबन्दी लगाईं है। तो सब मुसलमान भाइयो को इस प्रोजेक्ट का विरोध करना चाहिये।

शिवसेनेच्या दसरा मेळावा, " हे कॉंग्रेसवाले सेनेला उखडून टाकायची भाषा करतात, साले हे कॉंग्रेसचे उपटू शकले नाय तर आमचे काय उपटणार" एक छोटासा पॉज, मोठा हसा प्रेक्षकातुन. नंतर दादा बोलले " गवत हो"

In reply to by भंकस बाबा

दादा कोंडके या माणसाविषयी थोडाफार आदर आहे. पण त्याची शिवसेनेच्या प्रचाराच्या वेळची केलेली भाषणे फारच खालच्या लेवलची होती. कोल्हापुर येथे भाषणात "बाळासाहेबांना पकडणार म्हणजे त्यांचे काय पकडणार?" असे बोलण्यापर्यंत मजल गेली होती. (नंतर लगेच "संपुर्ण बाळासाहेब तुम्हाला कधीच सापडणार नाही" असे बोलून टाळ्या घेण्याचा प्रयत्न केला होता). अर्थात दादांच्या या भाषणाला कोल्हापुरकरांनी हशा दिला आणि टाळ्या वाजवल्या याचे जास्त वाईट वाटले. एकदा शंकरराव चव्हाण यांच्याविषयी दादांनी असे उद्गार काढले होते. "शंकरराव आणि त्यांच्या पत्नी आतमध्ये आहेत आणि त्यांच्या पत्नी XXXX पहात आहेत". त्या काळात ना.धो. ताम्हनकराचा मानसपुत्रावर आलेली गिरीश घाणेकर दिग्दर्शित एक सिरीयल खूपच प्रसिद्ध होती. XXXX च्या जागी दादांनी त्या सिरीयलचे नाव घेतले होते त्यामुळे भलताच अर्थ निघत होता. अशा त्यांच्या बोलण्यावर शंकररावांनी टिका केली असता खुद्द बाळासाहेबानी दादांची खरडपट्टी काढली होती.