Skip to main content

adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

लेखक कोंबडी प्रेमी यांनी शुक्रवार, 21/07/2017 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU हि एक लिंक पाहिली. ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ?? एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ?? “मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर” अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात. मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा” मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ? मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे) तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल .... समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..

वाचने 144225
प्रतिक्रिया 445

प्रतिक्रिया

In reply to by विशुमित

अगदी खरं साहेब.. एडके काकी मुळात स्वयंसिद्धा आहेतच. त्यांना 'काय करायचंय म्हातारपणात शिकून' असं कुणी म्हटलं जरी असतं तरी त्यांनी त्याला भिक घातली नसती. पण शिक्षण अर्धवट सोडून लग्न करायला लागलेल्या आणि स्वत:च्या पायावर उभ्या नसलेल्या एखाद्या मुलीला अश्या प्रकारे शिक्षण पूर्ण करायचं म्हटलं तर प्रचंड अडचणी येतात. पुरूषसत्ताक समाजात स्वतंत्र निर्णय घेताना एखाद्या मुलीला आणि त्यात जर ती ग्रामीण भागातली किंवा समाजाच्या निम्न वर्गातून आली असेल तर तीला खूप त्रास होतो. अशी अनेक उदाहरणे जवळच्या वर्तुळात बगहयला मिळाली आहेत. अजो किंवा गामा यांना अपर्णाबाईंच्या व्याख्यानांमुळे प्रतिगामी लोकांना थोडे का होईना बळ मिळते हेच कसे मान्य होत नाही याचे नवल वाटते.

In reply to by पुंबा

प्रचंड अडचणी प्रत्येकाच्या जीवनात आहेत. === त्रयस्थ माणसांच्या हस्तक्षेपामुळे संसाराला खूप क्षती पोहचते यात वादच नाही. अपर्णाताईंसारखे वक्ते, कीर्तनकार आणि टीव्ही मालिका त्यात सगळ्यात जास्त भर घालतात.

In reply to by विशुमित

विशुमित, एकाकी पडलेल्या वयस्कर बाईची हालत कशी वाईट होते हे सांगण्याचा अपर्णाबाईंच्या व्याख्यानांचा हेतू नाही. शिकलेल्या व स्वतंत्र वृत्तीच्या बाईने नवऱ्याशी कसं जुळवून घ्यावं याविषयी ते विवेचन आहे. कुठे तोडावं ते शिकलेल्या मुलीस ते कळणं सोपं असावं. जर तरुणपणी त्या बाईने तडजोड करायला शिकलं नाही तर म्हातारपणी हालत अत्यंत खराब होते. तुम्ही म्हणता ती पुरुषसत्ताक वगैरे भुतं छळायला लागतात. तुम्ही वर उल्लेखलेली समस्या उद्भवू नये अशा हेतूने अपर्णाबाईंची व्याख्यानं आकळायला हवीत. आ.न., -गा.पै.

In reply to by श्वेता२४

मुली दुसऱ्यांकडून अपेक्षा खूप ठेवतात. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे जेव्हा बंद करतील तेव्हा खरा फेमिनिज्म अस्तित्वात येईल.

In reply to by विशुमित

तेच तर म्हणतेय मी! कुणी तरी येऊन मला स्वातंत्र्य देईल, समानता देईल असं काही नसतं. ते माझं मला लोकांना फाट्यावर मारून मिळवावं लागतं. आणि हो त्यात जास्त कष्ट आहेत, रिस्क आहे, निर्णय घ्यावे लागतात,अवलंबून राहता येत नाही कुणावर. ते ही अनेकांना नको असतं किंवा तितका आत्मविश्वास नसतो. ज्यांना तो असतो, त्या जातात मस्त पुढे.

In reply to by पिलीयन रायडर

ते ही अनेकांना नको असतं किंवा तितका आत्मविश्वास नसतो.>> ==>> मग बसा तसेच. जगाला कोसत. (हे स्त्री पुरुष बाल वृद्ध सगळ्यांसाठी लागू आहे) ==== महिन्यापूर्वीचा आमच्या वाडीतील किस्सा सांगतो.. सासू रोज सुनेला घालून पाडून बोलायची. ती बिचारी (?) जास्त प्रतिवाद न करता ऐकून घायची. पण सासूची मजल तिच्यावर हात उचलण्यापर्यंत गेली. ती पण शेजाऱ्यांसमोर. २-४ फटके खाल्यावर सुनेने जे दोन थोबाडीत मारल्या सासूच्या की ती खाली पडून फडतळीवर आदळली. सासूचा हात मोडला. आपण काहीतरी खूप मोठा अपराध केला हे सुनेच्या क्षणार्धात लक्ष्यात आले. आता तीच पोरगी सासूची सेवा करताना मी पाहत आहे. वातावरण एकदम शांत आहे. पण त्याचा इम्पॅक्ट असा झाला आहे की वाडीतील बाकीच्या सासवा रुळावर आल्या आहेत. (आणि सुनांना जोर चढला आहे.) ==== हे असा इंगा दाखवावा लागतो तरच जगात माणूस टिकू शकतो. असो... आता बास करतो.. नाहीतर म्हणाल विशुमितला आज काय कामधंदा दिसत नाही आहे :)

हायला अजुन चालु आहे की काथ्याकुट ! भारीच बरेच दिवसांनी मिपाकट्टप्पा मुवींच्या धाग्यांना प्रतिसाद संक्झ्येत हरवु शकेल असा धागा दिसला =)))) चला मग आम्हीही आमच्या मताची पिंक टाकुन जातो ! आम्ही अन्यत्र म्हणल्या प्रमाणे भारतीय समाजचे क्लस्टरिंग झालेले आहे आणि गेल्या काही वर्षात त्यांच्यातील बाऊंडरीज ठळक होवुन एकदम प्रकर्षाने दिसायला लागल्या आहेत :) आता " एका विशिष्ठ" क्लस्टर ने अपर्णा मॅडमचे सल्ले ऐकावेत , थोडी पडती बाजु घेवुन नाती जपावीत, बायकांनी भाकर्‍या बडावाव्यात , नवर्‍यांनी " बायको इवढे करीयर करुनही केवळ प्रेमाखातर आणि अपर्णा मॅडमने सांगितले म्हणुन भाकर्‍या बडवत आहे " हे पाहुन तिला जमेल तितकी मदत करावी , तिच्या आनंदाच्या ४ गोष्टी कराव्यात ! मध्येच सर्प्राईज म्हणुन तिला छानश्या ट्रिपला न्यावे किंव्वा छानशी साडी किंव्वा दागिना खरेदीला न्यावे किंव्वा अजुन काहीतरी जेणे करुन तिला आनंद होईल असे काही करावे ! सायकॉलॉजीत ज्याला ओफ्हरंट कंडीशनिंग म्हणातत तसे काहीसे ! पॉसिटीव्ह रीइन्फोर्समेन्ट दोघांचेही बिहेवीयर एकमेकांना सुखद होईल :) आणि " दुसर्‍या क्लस्टर" ने , सतत नवर्‍याशी / बायकोशी बरोबरी करत रहावी , तो म्हणला भाकरी कर कि त्याला म्हणावे तु भाजी कर , तो म्हणाला साडी नेस कि त्याला म्हणावे तु धोतर नेस, चान्स मिळेल तेव्हा नवर्‍याशी कचकुन भांडावे , जरा काही बोलाला तर लगेच माहेरी जावे ! :) आणि हो सर्वात महत्वाचे म्हणाजे कृपया आम्हाला तुमचा थोडासा डेटा प्रोव्हाईड करावा ;) आमचे हायपॉथेसीस आहे : H0 : लग्न ही एक अत्यंत टाकाऊ आणि निरर्थक संस्था आहे. सशक्त विवाहसंस्थेचा कौटुंबिक आणि पर्यायाने सामाजिक आर्थिक विकासाशी काडीमात्र संबंध नाही. हे हायपॉथेसीस सिध्द किंव्वा असिध्द करायला आम्हाला डेटा हवा आहे. हा डेटा मिळाल्यास ह्या दोन क्लस्टरमधील लोकांच्या लाँङगटर्म मधील आर्थिक सुबत्तेवरुन योग्य अनुमान काढता येईल अशी आशा आहे :)

In reply to by विशुमित

हे पहा , एकदम सोप्प आहे, तुम्हाला वाटतंय की अपर्णा मॅडम म्हणाल्या त्याने संसार मोडतात, बायकांना परत माजघरात ढकलले जाते वगैरे वगैरे। बाकी काहींना वाटत आहे, की अपर्णा मॅडम म्हणतात ते योग्यच आहे , बायका गोडबोलून च नवऱ्याला अन घराला मुठीत ठेवतात । उर्मट बोलून अन तुसडे पणा दाखवून फक्त नाती तुटतील जुळणार नाहीतच । आता ह्यातील कोणते विधान सत्याच्या कसोटीवर खरे उतरते हे पडताळून पाहण्यासाठी हायपोथॅसिस टेस्टिंग करावेच लागेल । नुसत्या अर्ग्युम्नेट्स ने काहीही सिद्ध होत नसते , पुरावा द्यावा लागतोच , एखाददुसर्या वैयक्तिक अनुभवांवरून काहीही सिद्ध होत नसते.

In reply to by प्रसाद गोडबोले

माझ्या पाहण्यात दोन्ही बाजूची उदाहरणे आहेत, तुसडेपणाने बोलणारी सून कसें का होईना पण गोड बोलायला लागली अन अचानक अक्षरशः अविश्वसनीय रित्या संसार सुखाचा झाल्याचे एक अतिषय जवळचे उदाहरण आहे तसेच प्रचंड मान राखूनही हिडीस फिदीस करणारे सासू सासरे सहन करणारी एक सून ही पाहण्यात आहे . तस्मात मी कोणत्याच बाजूला बायसड नाहीये । पुराव्याने शाबीत केल्याशिवाय कोणत्याही एका बाजूच्या मतावर विश्वास ठेवणे मला जमणार नाही :)

ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या साठी नाही, पण ज्यांचा होऊ घातलाय, लग्नासाठी मुली किंवा मुलं बघणं चालू आहे त्यांनी कुंडली बघताना या ताईंच्या भाषणाची रेकॉर्ड (वॉट्सअँप मेसेज) दुसऱ्या पार्टी ला पाठवून द्यायचा आणि विचारायचं कि तुमचे साधारण असेच विचार आहेत का ? जर दोन्ही बाजूचे विचार असेच असतील तरच लग्न लावायचं. बऱ्याच ठिकाणी सेल्स डिपार्टमेंट वेगळं आणि प्रत्यक्ष काम वेगळं असाच असतं. तसं न करता मुलीला कांदेपोहे कार्यक्रमातच नीट कल्पना द्यायची. आणि जी तयार होईल (झाली तर) तिच्याशीच लग्न करायचं. जरी लग्न जमायला उशीर झाला तरी अजिबात अटींवर तडजोड करायची नाही. ताईच भाषण ऐकवल्याशिवाय लग्न करायचा नाही. बरेचदा काय होत, लोकांना घरात घालायचा गाऊन घ्यायचा असतो पण बघायला गेले कि शर्ट-पॅन्ट पसंत पडते, दिसते स्मार्ट, पटकन आवडते, घेऊन येतात, आणि मग आल्यावर प्रश्न पडतो कि आरे आपल्याला गाऊन हवा होता. डिमांड क्लिअर असूनहि ती आयत्यावेळी बदलल्याने नसल्याने सप्लाय चुकीचा होतो :P , :D . प्रेमात पडताना पण आपल्याला आवडलेली मुलगी आपल्या घरी नीट राहील का, याचा अंदाज येणं अशक्य नसत. पण लग्नाआधी "लग्न होणं" महत्वाचं असतं. आणि लग्न झाल्यावर इतर गोष्टी महत्वाच्या होतात. आपल्या इथे लग्न मोडणं हि अजूनही "टॅबू " गोष्ट असूनही करताना अजिबातच विचार न करता करतात. हल्ली किमान शिकलेल्या, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र मुली त्यामानाने सावध झाल्या आहेत.

In reply to by वीणा३

झी मराठीची जाहिरात पाहिली का? एक मुलगा म्हणतो की मला "घरी बसून आई वडिलांची सेवा करणारी" बायको हवी आहे. लोकांना मोलकरीण किंवा रामागडी हवा असतो, शोधतात बायको! पण तुमचं मला अगदी पटलं! मी नुकताच एका अत्यन्त जवळच्या व्यक्तीच्या वधुसंशोधनात भाग घेतलाय. त्याला नीट शिकलेली, नोकरी करणारी पण ह्याने जॉब बदलला की सेंकदात जॉब सोडून त्याच्या मागे जाणारी, आई वडिलांची सेवा करणारी, सर्व धार्मिक कार्य करणारी, पण मॉडर्न, आणि भाऊ असलेली, अजिबात एकुलती एक नसलेली (तिच्या आई वाडीलांची ब्याद माझ्या गळ्यात नको) आणि मग बाकी नाजूक, गोरी, सुंदर मुलगी हवी होती. अशा परस्परविरोधी अपेक्षा ठेवून कसं होणार? बरं मग फोटो मध्ये फटकड्या मुली आवडायच्या आणि प्रत्यक्षात त्या "बरं मग किती स्वयंपाक येतो तुला" इथून सुरुवात करायच्या! आणि घरगुती साध्या मुली अजिबात आवडत नव्हत्या. साडे तीन वर्षा नन्तर त्याने ह्यातली एकही अट पूर्ण न करणारया मुलीशी लग्न केलं!

In reply to by पिलीयन रायडर

आईच्या पदराड जगलेली लग्नाऊ पोरांच्या बावळट अपेक्षा असतात. नंतर आपोआप सरळ होतात.

In reply to by वीणा३

वीणा ताई वंटास प्रतिसाद... === आमच्या कडे सुपारी फोडताना लग्नाच्या याद्या केल्या जातात. त्यावर लग्न ठरवायला आलेल्या दोन्ही कडच्या पाहुण्याच्या सह्या असतात. अपर्णा ताईचं संपूर्ण भाषणच लिहून आणायचं, करा सह्या म्हणायचं. === हे एक वर्ष सगळ्यांनी काटकोर पाळले तर कापड बस्ते, फर्निचर आणि भांडीवाल्याना गबाळ बांधून काशी यात्रेला जावे लागेल. आणि फोटूवले झाडाला उलटे लाटून स्वतःचेच फोटो काढत बसतील.


In reply to by गामा पैलवान

अपर्णाबाईंच्या भाषणाचा परत चुकीचा उपयोग होतोय. -- लग्नाच्या आधी जसं मुलीला स्वयंपाक येतो का हे विचारतात, तसंच आहे हे. आपल्या घरात येणार नवीन माणूस आपल्या विचारांचं आहे कि नाही हे शोधायचा अगदीच सोपा मार्ग आहे हा. आणि मला खात्री आहे कि मुलांकडचे कधीच हा मार्ग वापरणार नाहीत, मुलींनीच सुरवात करायला हवी. आधीच विचारून घ्यावं कि तुमचे विचार अपर्णाताईंच्या विचारांशी मिळतेजुळते आहेत का? म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेणं सोपं जाईल. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे जेव्हा बंद करतील तेव्हा खरा फेमिनिज्म अस्तित्वात येईल. हे अगदी बरोबर बोललात. -- हे तुम्ही परस्परविरोधी बोलताय असं नाही वाटत का? जर सगळ्या बाबतीत "नवऱ्याचं / सासरच्यांच ऐक " हा मुख्य सल्ला ७०% भाषणात असेल तर दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणं कसाकाय बंद करणार. कितीतरी ओळखीच्या मैत्रिणी इंजिनिअरिंग करून लग्न झाल्यावर घरी बसल्या आहेत, आधी सांगितलं होता कि नोकरी केली तरी चालेल, लग्न झाल्यावर ३-४ महिन्यात नोकरी बंद, घरातली कामवाली बाई बंद. फक्त भांडण नको म्हणून संसार चालू. दुसरीच्या ओंजळीने पाणी प्यायचं नसे तर लग्नच करू नये किंवा घटस्फोट घेऊन एकटं राहावं हि बऱ्याच घरातली परिस्तिथी आहे. प्रॉब्लेम असा आहे कि अपर्णा ताई अशा पद्धतीने भाषण करतात कि "नवीन सून /बायको" हा घर मोडण्यातला एकमेव मुद्दा आहे. काही घरात तो असेलही (पण तो अगदी अगदी कमी टक्के असावा (विदा नाही )) . पण इतर मुद्यांबद्दल त्या बोलताच नाहीयेत हेच खूप लोकांना खटकतंय. पण इथे बऱ्याच लोकांना असं वाटतंय कि जेव्हा तुम्ही पब्लिक फोरम वर बोलता तेव्हा एखाद्या चांगल्या (किंवा जुळवून घेण्याचा प्रयत्न करणारी) सूनेला (वरती अक्षदा नि म्हटल्याप्रमाणे ) टोचून बोलणारी लोक ढिगाने सापडतील. खूप जवळून बघितलेलं एक उदहारण आहे. मुलीचे वडील बिल्डर होते, मुलाला मुंबईत एक फ्लॅट, गाडी, भरपूर सोन, अतिशय खर्चिक लग्न असा मामला होता, मुलीला काय जमत नाही लाडात वाढलीये असं आधीच सांगितलं होतं. लग्नामुळे आर्थिक फायदे भरपूर झाले आणि करून घेतले पण. इतर नातेवाईंकांनी सावध पण केलं होत कि बाकी सगळं चॅन आहे पण हिला सांभाळून घायला लागेल. आधी एवढं काय म्हणाले, आणि नंतर (स्वतःच्या मुलासारख्याच :P )सुनेच्या सवयी बघून जमेनास झालं. तरी ती बिचारी कायतरी स्वयंपाक करायला बघायची पण सवय नसल्याने अगदीच वाईट व्हायचा. १००% मुलीची चूक असं खरंच एकही उदाहरण नाहीये. लग्नाआधीच्या भन्नाट अटी दोन्ही बाजूनी ऐकल्या आहेत. पण लग्नानंतर (माझ्या पाहण्यातला) ९०% घरात मुलींनीच जुळवून घेतलंय

In reply to by वीणा३

वीणाताई, १.
.... मुलींनीच सुरवात करायला हवी. आधीच विचारून घ्यावं कि तुमचे विचार अपर्णाताईंच्या विचारांशी मिळतेजुळते आहेत का? म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेणं सोपं जाईल.
मान्य. साधारणत: मुली विवाहाबाबत जास्त चोखंदळ असतात. त्यांना स्वत:चं घर सोडून दुसरीकडे जायचं असतं म्हणून. त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेतलेला बरा पडावा. २.
हे तुम्ही परस्परविरोधी बोलताय असं नाही वाटत का? जर सगळ्या बाबतीत "नवऱ्याचं / सासरच्यांच ऐक " हा मुख्य सल्ला ७०% भाषणात असेल तर दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणं कसाकाय बंद करणार.
जरी ते परस्परविरोधी वाटंत असलं तरी प्रत्यक्षात तसं नाही. इतरांचं ऐकण्याचा सल्ला कुटुंबात रुळेपर्यंत लागू आहे. एकदा का रुळली की स्वत:च्या ओंजळीनं पाणी कसं प्यावं ते हल्लीच्या मुलींना चांगलंच जाणून असतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मुली विवाहाबाबत जास्त चोखंदळ असतात. ते हल्लीच्या मुलींना चांगलंच जाणून असतात. >> हे तुम्ही एका अतिशय छोट्या गटातल्या मुलींविषयी बोलत आहात. १९ वर्षाच्या आत एक/दोन मुल होणाऱ्या ४७% मुली आहेत भारतात... कित्येक शिकलेल्या मुलीदेखील पाहिल्या आहेत ज्या आपल्याला होकार देणाऱ्या पहिल्याच मुलाशी लग्न करतात, आवडला नसेल तरीही. कारण मुलीने नकार दिला तर समाजात बोभाटा होऊन तिला पुढे फारशी स्थळच येणार नाहीत... असो. मी आधीच म्हणल्याप्रमाणे म आं जा वर फक्त (इतर समाजाशी नाळ तुटलेल्या) 5% लोकांविषयी बोलणं चालू असत...ं

ही बघा आळशी 'नोकरदार' बाईबद्दल 'कामसू' गृहिणीची कमेंट: तथाकथित उच्चभ्रू वस्तीत ते तरुण जोडपं राहत होतं. फक्त ब्रँडेड वस्तू आणि सगळे व्यवहार ऑनलाइन. शेजारीपाजारी कोण राहतोय, कोण जगला मेला सोयरसुतक नाही. दोघे एका उच्च बँकेत उच्च पदावर. एकदा त्यांच्याकडे काम करणारी बाई एक आठवडा सुट्टीवर गेली. आठव्या दिवशी आली आणि नाक दाबत बाहेर आली. शेजारची पन्नाशीची बाई तेव्हा नेमकी स्वतःच्या दाराबाहेर झाडत होती. म्हणाली, काय गं, काय झालं? तर काम करणारी बाई सांगू लागली "काय सांगू ताई. सिंक आणि ओटा भरून खरकटी भांडी आणि बाकी घरभर घाण कचरा आहेच पण अहो सात दिवसांच्या चड्ड्या बॉड्या आणि नाक पुसलेले चिकट रुमाल सुद्धा तसेच पडलेत." किळस शिसारी राग चीड व्यक्त करावी (अर्थात फक्त स्वतःशी) की "मला काय त्याचे" म्हणत पुढे जावे ! हं. शिक्षणाचा, पदाचा, भाषेचा, प्रांतांचा, पिढीपिढीतल्या अंतराचा कशाकशाशी कशाचाच संबंध नसतो. संबंध असतो फक्त माणूस असा किंवा तसा असण्याशी. बाकी गोष्टी छोट्याच असतात. - स्मिता गानू जोगळेकर >>अगदी खरं आहे शिक्षणाचा, पदाचा, भाषेचा, प्रांतांचा, पिढीपिढीतल्या अंतराचा कशाकशाशी कशाचाच संबंध नसतो. शिक्षणात काडीचीही अडचण न आलेली बाई, आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या पुरुषवर अवलंबून राहते, स्वतःखेरीज जास्तीजास्त ३ लोकांचा स्वैपाक करायच्या बदल्यात ४० हजार महिनाची लाईफस्टाईल मिळवते आणि उच्च बँकेत उच्च पदावर काम करणाऱ्या बाईचे चार घरी काम करून स्वतःचे घर चालवणाऱ्या बाईसोबतचे वागणे याबद्दल जालावर येऊन पो टाकते.... दुपारी ढाराढुर झोपणाऱ्या किंवा माझ्या नवऱ्याची बायको बघत बसणाऱ्या किंवा जालावर येऊन होममेकरी पो टाकणाऱ्या बायकांची कमी नाही जगात!

In reply to by एमी

शिक्षणात काडीचीही अडचण न आलेली बाई, आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या पुरुषवर अवलंबून राहते, स्वतःखेरीज जास्तीजास्त ३ लोकांचा स्वैपाक करायच्या बदल्यात ४० हजार महिनाची लाईफस्टाईल मिळवते आणि उच्च बँकेत उच्च पदावर काम करणाऱ्या बाईचे चार घरी काम करून स्वतःचे घर चालवणाऱ्या बाईसोबतचे वागणे याबद्दल जालावर येऊन पो टाकते.... दुपारी ढाराढुर झोपणाऱ्या किंवा माझ्या नवऱ्याची बायको बघत बसणाऱ्या किंवा जालावर येऊन होममेकरी पो टाकणाऱ्या बायकांची कमी नाही जगात!
हे मत वाचल्यावर
शिक्षणाचा, पदाचा, भाषेचा, प्रांतांचा, पिढीपिढीतल्या अंतराचा कशाकशाशी कशाचाच संबंध नसतो. संबंध असतो फक्त माणूस असा किंवा तसा असण्याशी.
हे मत पटले.

हा धागा आणि या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या आणि जगातील सर्वात लहान फेअरी टेल (shortest fairy tale) आठवली. A boy proposed to a girl. She refused. And he lived happily ever after. पिरीयड.