चांगली ओळख आहे. जाधव सरांचे वैयक्तिक जिवन ह्या लेखात वर्ज्य होते काय? ती ओळखही वाचायला आवडली असती
सरांना कोणताच विषय व्यर्ज नव्हता पण सरांचा आवडता विषय होता ’गणित’. वैदिक गणिताशी ओळख झाली ती सरांमुळेच! सर तोंडी आकडेमोड अशी काही करायचे की समोरच्याने तोंडात बोटे घातली पाहिजेत! तीन तीन चार चार आकडी गुणाकार, भागाकार सर तोंडी सांगायचे! संख्येच्या वर्गाची व घनाची सोपी पद्धत सरांमुळेच कळली!
त्या निमित्ताने आठवले:
वैदिक गणिताचे इंग्रजीमधले पुरीच्या शंकराचार्यांचे पुस्तक आणि याच पुस्तकावर आधारित (सध्या रत्नागिरीला राहत असलेल्या?)दिलीप कुळकर्णींचे सोप्या मराठीतले गोष्टीत गुंफलेले पुस्तक हे शाळकरी दिवसांमधे भुरळ पाडणारे होते. सुट्ट्यांचे कित्येक दिवस पाटी पेन्सील घेउन सोडविलेली गणितं आणि सुट्टी संपली की शाळेतल्या गणिताच्या मास्तरांना अडलेल्या शंका विचारून भंडावून सोडलेले दिवस आठवले :)
अर्थात १२वी नंतरच्या अभ्यासक्रमात वैदिक गणिताचा क्वचित उपयोग होतो त्यामुळे ते मागे पडले ते पडलेच.
असो.
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
सरांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल मुद्दाम लिहिले नाही; खात्री नव्हती आणि जास्त माहितीपण!
खरतर त्यावयात एवढे लक्षात येत नव्हते हेच मूळ कारण.
थोड्या थोड्या वेळाने सर बाहेर चक्कर मारून यायचे. शाळेतून पळून जाणारी, बाहेर भटकणारी मुले आणि त्यांचे मित्र हे सरांचे मुख्य लक्ष्य! अनेकदा शेजारच्या शाळेतील उनाड मुलांना सरांनी पकडून स्वत: २ तास तरी वर्गात बसवलयं!
असे मुल घडविणारे शिक्षक असले बर वाटतं.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
आणखी काही अनुभव वाचायला नक्कीच आवडले असते. विशेषतः सरांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल.
लेख आमच्या ४ थीच्या स्कॉलरशिपच्या बाईंची आठवण करून देऊन गेला.
(विद्यार्थी)बेसनलाडू
असे शिक्षक/शिक्षिका लाभणं म्हणजे गतजन्मीचं पुण्य असं वाटतं. आयुष्यभर न पुसले जाणारे ठसे सोडून जातात ही माणसं!
आमच्या चौथीच्या रसाळ बाईंच्या आठवणी जाग्या झाल्या!
सकाळी १०.३० ते ११.३० असा नेहेमीच्या शाळेच्या आधी एक तास त्या स्कॉलरशिपचा जास्तीचा घेत.
मराठी शिकवायच्या. एखाद्या विषयात आरपार शिरणं काय असतं ते त्यांच्याकडे बघून समजायचं.
म्हणी शिकायच्यात? ३०० म्हणी फळ्यावर स्वतः मोत्यासारख्या अक्षरात लिहून दिल्या होत्या. त्या कशा निर्माण झाल्या, अर्थ काय इत्थंभूत माहिती!
तसेच वाक्प्रचार. व्याकरण. इ.
एकाच वर्षी ओळीनं आमच्या शाळेची १४ मुलं चौथीच्या स्कॉलरशिपला जिल्ह्यात आली होती! डोळ्यात पाणी आलं होतं बाईंच्या, आनंदानं रडल्या होत्या!!
अजूनही नगरला जातो तेव्हा त्यांच्या पायावर डोकं ठेवून येतो.
चतुरंग
अरे वा! मि हि फिरोदियाचाच आहे! (ई) भेटुन बरे वाट्ले.
जाता जाता एक कल्पना, एक ओळख धागा सुरु करायला काय हरकत आहे? मिपा वरील लोक नक्किच आपल्या कल्पकतेने धमाल आणतील!
आम्हालापण जाधव सर होते.(ते हे नव्हे... दुसरे!).
कोणते खास गणित सोडवताना म्हणायचे: "सुंSSदर गणित आहे." गणितांना सुंदर हे विशेषण त्यांच्या तोंडूनच ऐकले. :)
लेख वाचून माझ्या शिष्यवॄत्त्ति परिक्षेच्या आठवणी जाग्या झाल्या.
यशोदेचा घनश्याम
खुप छान लिहीले आहेत. ही माणसं खरी देवमाणसं असताता. पडद्यामागे राहुन शांतपणे, निस्वार्थपणे आपलं काम करत राहतात.
मला ४ थीली स्कॉलरशिपच्या परिक्षेत आमच्या येरगुंडे गुरुजींची खुप मदत झाली होती.
इथे पाहा http://www.misalpav.com/node/6837 , सातवा नंबर मिळाला स्कॉलरशिपमध्ये, तेव्हा गुरुजींनी मला एक एअरमेलचं पेन बक्षीस म्हणुन दिलं होतं. नंतर सातवीला असताना श्री. झोपे सर म्हणुन होते, त्यांनी खुप मेहेनत घेतली होती माझ्यावर. जेव्हा स्कॉलरशिप मिळाली तेव्हा सर मला घेवुन प्रत्येक वर्गात हिंडले होते. खुप छान अनुभव होता तो. असे शिक्षक मिळणे यासाठी खरंच भाग्यच लागतं.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
प्रतिक्रिया
छान!
वर्ज्य होते काय?
सुंदर ओळख
मस्त पण त्रोटक
छान ओळख
सुंदर!
ईच्छा!
जाधव सरांच्या आठवणी मस्त!
शाऴ़करी!
छान आठवण!
हे
खुप छान !!