ताज्या घडामोडी - भाग २६

लेखक: कपिलमुनी काथ्याकूट
राणे भाजपात दाखल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल. चला , राणे भाजपात नाही असे ठासून सांगणाऱ्याच्या आता कोलांट्या उड्या बघायच्या :)

पगला गजोधर यांनी 18/03/2018 - 22:17 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by कपिलमुनी

Permalink

राज ठाकरे यांचे गुढीपाडवा भाषण ऐकले, आज दि 18 मार्च 2018, त्यांनी भाकीत केलात, भाजपा या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू मुसलमान दंगे घडवून आणणार, राम मंदिर मुद्द्यावरून.... :(

manguu@mail.com यांनी 15/03/2018 - 02:35 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

बिरबलाचे माकड पाण्यात बुडू नये म्हणून पोर पाया खाली घेते. तसे ह्यानी स्वत:च्याच पक्षाचे अध्यक्षपद पायाखाली दाबून भाजपाकडुन् ऑक्सिजन घेतला. मुख्यमंत्री फडणवीस पूर्वीच बोलले होते - राणे ही पक्षाची संपत्ती आहे ! http://abpmajha.abplive.in/mumbai/cm-devendra-fadanvis-on-eknath-khadse-and-narayan-rane-latest-update-492296 संपत्ती वाढल्याबद्दल भक्तांचे अभिनंदन.

श्रीगुरुजी यांनी 15/03/2018 - 09:54 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by जेम्स वांड

Permalink

राणेला पक्शात अधिकृत प्रवेश दिल्याची बातमी प्रमुख वृत्तपत्रात आलेली दिसत नाही. खरोखरच प्रवेश दिला असेल तर ती भाजपचा घोडचूक ठरेल.

तुम्हाला नैतिक दृष्टिकोनातून घोडचूक वाटतेय कि राजकीय दृष्टिकोनातून?

राजकीयदृष्ट्या अमितभाई शहा कधीही आतबट्याचा व्हावहार करणार नाहीत, राजकीय दृष्टिकोनातून ह्याचा भाजपला फायदा नसता तर राणेंना घेतलेच नसते.

सहमत, राजकीयदृष्ट्या घोडचूक म्हणण्यास सध्यातरी मुद्दे नाहीत. ======================= नैतिकदृष्ट्या घोडचूक का म्हणावे ते कळत नाही. भाजपला उजवा पक्ष म्हटले जाते, शिवसेनेला उजवा पक्ष म्हटले जाते. शिवसेनेत ४० वर्षे काढलेल्या राणेंची विचारसरणी उजवीच असावी असा साधारण अंदाज आहे. त्यांना काँग्रेस संस्कृती मानवणारीच नव्हती पण बहुदा सत्तेत राहण्याच्या हिशेबाने ते काँग्रेसमध्ये गेले असावेत. चिरंजीवांनी मधल्या काळात चर्चेत राहण्यासाठी जे काही केले तो राणेंचा पिंड असावा असे मला वाटत नाही. ======================= सगळेच पक्ष एकमेकांवर राजकीय चिखलफेक करत असतात, मग आधी तुम्ही ज्यांच्यावर चिखलफेक करत होतात त्यांना का घेतले म्हणण्यात काही मुद्दा नाही. राजकीय लाभ मिळणार असेल तर सगळेच पक्ष अशा आयाराम गायरामांसाठी नैतिकता धाब्यावर बसवतात असे मला वाटते. फक्त सिद्ध गुन्हे किंवा वैयक्तिक गुन्हेगारी केसेस चालू असणाऱ्यांना पक्षांनी घेऊ नये असे मलातरी वाटते.

सगळेच पक्ष अशा आयाराम गायरामांसाठी नैतिकता धाब्यावर बसवतात असे मला वाटते. हीच ती काँग्रेसी संस्कृती, आयाराम गयाराम जोजवणे, येनकेनप्रकारेण सत्ता घट्ट धरून ठेवणे, त्यासाठी पक्षांतरबंदी वगैरे रीतसर कायदे करून घेणे, हिलाच तर मुळापासून गाडायचं, भारतीय राजकारणाला एक सकारात्मक वळण लावायचं ह्या हेतूनेच तर जनतेने मोदींजींना भरभरून प्रेम दिलं होतं, आजही देतेय, हे किमान भाजपने तरी करणे मला उदास करून गेलं.

जोपर्यंत फक्त विकासाच्या मुद्द्यावर बहुमत मिळवणे एखाद्या पक्षाला शक्य होत नाही तोपर्यंत हे असलेच राजकारण करणे - मग ते मोदी असोत कि वाजपेयी - कुठल्याही नेत्याला अपरिहार्य आहे असे मला वाटते. ----------------------------------- माफ करा पण भारतीय राजकारणाला वळण लागण्याची शक्यता अजून २५ एक वर्षे तरी मला दिसत नाही. याला फक्त नेते नाही, मतदारही तितकेच कारणीभूत आहेत असे मला वाटते. "आपला माणूस" या बेसिस वर मतदान होत राहणार तोपर्यंत हेच होत राहील. ----------------------------------- ३.५ लाख मते आहेत ना कोळी समाजाची मग करू निषादला उभे, ब्राह्मणांची मते दूर जाऊ द्यायची नाहीत ना मग करू शुक्ला ला उभे हि असली विचारसरणी निवडणुकांमधून संपेल तो सुदिन, शक्यता तसूभरही नाही!!

३.५ लाख मते आहेत ना कोळी समाजाची मग करू निषादला उभे, ब्राह्मणांची मते दूर जाऊ द्यायची नाहीत ना मग करू शुक्ला ला उभे हि असली विचारसरणी निवडणुकांमधून संपेल तो सुदिन बाडीस

जोपर्यंत फक्त विकासाच्या मुद्द्यावर बहुमत मिळवणे एखाद्या पक्षाला शक्य होत नाही तोपर्यंत हे असलेच राजकारण करणे - मग ते मोदी असोत कि वाजपेयी - कुठल्याही नेत्याला अपरिहार्य आहे असे मला वाटते. बरेच लोक (माझ्यासहित) भाजपने २०१४ मध्ये विकास आधारित राजकारण करून विकासाच्या मुद्द्यावर (अच्छे दिन) बहुमत घेतल्याचे कायम अभिमानाने सांगत असत, २०१४ चे लोकसभा निवडणूक घोषणापत्र (भाजपचे) पाहिले तरी त्यात मंदिर मस्जिद वगैरे ठेवणीतल्या भाजपीय मुद्द्यांपेक्षा विकास आधारित मुद्दे जास्त दिसतात (असे एक निरीक्षण माझे) , जर तुमचं विधान ग्राह्य धरले तर २०१४ मधेही भाजपने जातीय राजकारण केले किंवा विकास सोडून राजकारण केले असा अर्थ निघू शकेल जो अजूनच क्लेशकारक आहे काका. :(

पण भाजपाने तर मुस्लिम एरियातही हिंदू खासदार निवडून आणले , एकही मुसलिम उमेदवार दिला नाही . लोकाना जात धर्म नको , विकास हवा आहे , असे बोलून स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. आता हेच भाजपे बोलतात - लोकाना विकास नको म्हणे. जात हवी. भाजपाच्या गाढवावरून विकासाचे खोटार्डे कातडे सरकले , हे लोकान्नी ओळखले.

जेम्स वांड यांनी 15/03/2018 - 12:03 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

बघा! काळ सोकावतो तो असा, आतातरी माझ्या क्लेषाचे नेमके कारण तुम्हाला हा सूर्य हा जयद्रथ अश्या ह्या उदाहरणातून समजून यावे ही अपेक्षा. :(

पण भाजपाने तर मुस्लिम एरियातही हिंदू खासदार निवडून आणले..
हे खोटे आहे का? मग त्या त्या ठिकाणी त्यांनी पाठ थोपटवून घेतली तर दुखणे काय आहे? ------------------------------------------ एक तो घोडा बोलो या चतुर बोलो....तुमचे काय मत आहे ते सांगा उगा एक भाजप समर्थक काही म्हणाला कि भाजपे असं म्हणतात मग दुसऱ्या समर्थकाने काही वेगळं मत मांडलं कि (तेच) भाजपे तसं म्हणतात असला दुटप्पीपणा कशाला? ------------------------------------------ २७२ पलीकडे पोहोचण्यासाठी नुसत्या विकासाचं राजकारण पुरेसं नाही हे न कळायला मोदी शहा काही दुधखुळे नाहीत. पण जाहीर विकासाचं राजकारण आणि जागा वाढवण्यासाठी आतलं राजकारण त्यांनी केलं असावं असं आपल्याला वाटत नाही का? आणि केलं तर चूक काय? सपा-बसपा एकत्र येण्याचं कारणच काय होतं? ----------------------------------------- सध्याच्या युत्या/आघाड्या आणि अंधविरोधकांचं नकारात्मक राजकारण बघून माझं तर असं मत बनत चाललं आहे कि भाजप ने काय वाट्टेल ते करावं आणि जिंकावं. धुतल्या तांदळासारखं राहून/म्हणवून घेऊन काय मिळणार आहे? भाजप ने जशास तसे वागावे, जिंकावे आणि देशहिताचे निर्णय "लादावेत".

तुमची मते असण्याचा तुमचा हक्क मान्य करून मी असहमती दर्शवून थांबतो. कारण भाजपचा हाय मोरल कंपास हेच भाजपचं यूएसपी होतं/आहे/राहील असा माझा ठाम विश्वास होता/आहे/राहील. संघाच्या मुशीतून तावून सुलाखून तयार झालेली राजकीय संघटना मोरल हाय ग्राउंड सोडणार असेल तर माझ्यामते ते दुर्दैवी आहे. असो...

>>> सहमत, राजकीयदृष्ट्या घोडचूक म्हणण्यास सध्यातरी मुद्दे नाहीत. राणेमुळे कोकणातील १-२ मतदारसंघात फायदा होऊ शकेल. परंतु महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात अर्धापाऊण ब्राह्मण मते विरोधात गेली तरी भाजपला मोठा फटका बसू शकेल. राणे अत्यंत उपद्रवी आहे. त्याचे खरे ध्येय मुख्यमंत्रीपद आहे. भाजपत राहून राणे सातत्याने फडणवीसांना त्रास देत राहील. राणे व राणेपुत्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. ज्याप्रमाणे लालूपुत्रांनी नितीशकुमारांना त्रस्त करून सोडले होते तसेच राणेपुत्रांमुळे फडणवीस त्रस्त होतील व त्यामुळे भाजपचा प्रतिमा अजून खराब होईल. हा निर्णय नैतिक व राजकीय दृष्ट्या चूकच आहे.

माझा हाच प्रश्न आहे श्रीगुरुजी. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात अर्धापाऊण ब्राह्मण मते विरोधात गेली तरी भाजपला मोठा फटका बसू शकेल. हे विधान मोघम वाटते आहे, अनेक मतदारसंघ म्हणजे नेमके किती मतदारसंघ ? तिथली किती लोकसंख्या ब्राह्मण आहे, तिथले वोटिंग ट्रेंड काय होते, तिथली किती मते दुरावल्याने भाजपला मोठा फटका बसेल, शिवाय 'मोठा फटका' ची व्याख्या काय, हे मला पडणारे प्रश्न आहेत. अर्थात, तुमचा अभ्यास वादातीत आहेच, त्यामुळे तुम्ही जर नीट आकडेवारीसह साद्यांत पद्धतीने जर ह्याची उत्तरे देऊ शकले तर माझेही डाऊट क्लिअर होतील आणि मी ही नैतिक अन राजकीय अशी दोन्ही पातळ्यांवर भाजपने केलेली चूक आहे असे निःशंकपणे मान्य करून टाकेन

manguu@mail.com यांनी 15/03/2018 - 08:42 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीच्या निकालांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपाचा गड असलेल्या गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाने जबरदस्त मुसंडी मारली. गोरखपूर लोकसभा मतदारसंघात २९ वर्षांनंतर पहिल्यांदाच गोरक्षधाम मठाबाहेरील एखादी व्यक्ती निवडून आली आहे. यापूर्वी महंत अवैद्यनाथ आणि नंतर योगी आदित्यनाथ १९८९ ते २०१७ पर्यंत गोरखपूरचे खासदार राहिले आहेत. पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाकडून प्रवीणकुमार निषाद गोरखपूरचे खासदार झाले आहेत. प्रवीण हे अवघे २९ वर्षांचे असून ते लखनऊ येथील गौतम बुद्ध विद्यापीठातून २०११ साली अभियंत्याची पदवी घेतली आहे. त्यांच्याविरोधात एकही गुन्हेगारीविषयक गुन्ह्याची नोंद नाही. प्रवीण यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे जमीन नाही. ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार प्रवीण यांनी दूरस्थ शिक्षणाद्वारे एमबीए पदवीही मिळवली आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवलेल्या प्रवीण यांनी सप अध्यक्ष अखिलेश यादव यांचे आभार मानले आहेत. प्रवीण यांची पत्नी रितिका या सरकारी नोकरी करतात. प्रवीण यांच्याकडे सुमारे ११ लाख रूपयांची संपत्ती आहे. यात ९९ हजारांचे कर्ज देखील आहे. प्रवीण आणि रितिका यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

उत्तर प्रदेशातील दोन जागा गमावल्यामुळे भाजपाचे लोकसभेतील संख्याबळ २७२ वर येऊन पोहोचले आहे. केंद्रात बहुमतांसाठी जितक्या जागा लागतात तितक्याच जागा आता भाजपाकडे आहेत. २०१४ मध्ये भाजपाने एकूण २८२ जागा जिंकल्या होत्या. सरकार स्थापनेसाठी भाजपाला मित्रपक्षांच्या पाठिंब्याची सुद्धा गरज नव्हती.

चान चान!! पण भाजप २७२ वर कशी पोहोचली ते काय कळलं नाय बगा! जरा इस्कटून सांगता का? -------------------------------------- माझ्या माहितीनुसार भाजप २७२ + १ सभापती महोदय + २ अँग्लो इंडियन असे २७५ वर असायला हवेत. २०१४ नंतर भाजप ने रतलाम (म.प्र.), गुरुदासपूर (पं.), अलवर आणि अजमेर (रा.), गोरखपूर आणि फुलपुर (उ. प्र.) या सहा जागा गमावल्या आहेत. एका जागेचा हिशेब लागत नाय, अजून कुठली पोटनिवडणूक बाकी आहे का ते बघावं लागेल.

बिटाकाका यांनी 16/03/2018 - 10:22 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by ray

Permalink

बरोबर! भंडारा-गोंदिया बाकी आहे. पण ती या पोटनिवडणुकांसोबत का घेतली नाही काय माहित? कदाचित भाजप ०-४ झाली असती! ------------------------------------------- प्रफुल्ल पटेलांची भाजप जवळीक खटकल्याने पटोलेंनी "भंडारा" उधळला असेल काय? बहुतेक पटेल भाजपचे पुढचे उमेदवार असतील (अंधविरोधकांनुसार पवित्र होतील)!

manguu@mail.com यांनी 15/03/2018 - 11:48 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

http://www.freepressjournal.in/mumbai/mumbai-pil-seeks-ed-probe-against-narayan-rane-in-multi-crore-money-laundering-case/1149803 ही काय भानगड होती ? Mumbai: In what can cause serious problems for Narayan Rane, the new ally of BJP-led Nationalist Democratic Alliance (NDA), a criminal PIL has been filed in the Bombay High Court. The PIL has sought directions to the Enforcement Directorate to “reopen” a multi-crore money laundering case against Rane and his associate Avigna group head — Kailash Agarwal. The criminal PIL has been filed by journalist-turned-activist Ketan Tirodkar. In his petition, Tirodkar has stated, “I learnt from my sources in the last week of September that the Union Finance Ministry had directed the ED to stop the probe it initiated against Avighna group owner Kailash Agarwal & Neelam Hotels Pvt. Ltd. founder Narayan Rane. The ED was probing their money laundering operations.”

कपिलमुनी यांनी 15/03/2018 - 13:37 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

युपी मधल्या २ सिटमुळे राष्ट्रीय राजकारणावर फार फरक पडणार नाही. पण भाजपच्या अंर्तगत वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे. योगींच्या मनात मठाचे स्वामी चिन्मयानंद यांचे नाव होते , ते डावलून शहांनी दुसरा उमेदवार दिला . यंदा बर्‍यच वर्षांनी मठाच्या बाहेरचा उमेदवार दिला गेला . आता योगींचा उमेदवार कापल्याने योगिंनी शहांचा उमेदवार पाडला की होम ग्रांऊड वर योगींना सेट्बॅक बसण्यासाठि दुसरा उमेदवार , ताकद न लावणे असे प्रकार करून त्यांना बॅकफूटवर जाण्यास मोदी- शहांनी भाग पाडले ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहेत. आकडे : https://en.wikipedia.org/wiki/Gorakhpur_(Lok_Sabha_Constituency)#Election_Results आकड्यांकडे नजर टाकली तर सप + बसप यांच्या मतात फार वाढ नाही , पण मोदी+ योगींचा करीष्मा या वेळी नव्हता आणि मतदानामध्ये घट झाली ही झालेलि घट भाजपाच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे असे वाटते

ह्म्म.. म्हणजे भाजपाला ही निवडणूक जिंकायची नव्हतीच असं तुम्हाला म्हणायचे आहे का? त्याची कारणे काय असावीत? केवळ अंतर्गत दुफळी हेच कारण असेल असे वाटत नाही. तसेही मोदींनंतर शहा हे पंप्रचे उमेदवार नक्कीच नाहीयेत. त्यामुळे हे नेमके असे का वागले हे समजणे कठीण

पण योगी असू शकतात. यूपी मधले ७० खासदार म्हणजे पंप्र पदाचे तिकिट मानले जाते. हा एक चर्चिला जाणारा तर्क आहे . माझे मत कमी झालेले मतदान ,विरोधी युती आणि अगरवाल सारख्या नेत्यांचे प्रवेश , विजय गृहित धरल्याने कमी पडलेले प्रयत्न ही कारणे आहेत

बिहारप्रमाणे इथेही विरोधी मते एकवटल्याने भाजप हरला. मायावतीला राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याच्या बदल्यात बसपने सपला पाठिंबा दिला. परंतु २०१९ मध्ये हे दोघे युती करतील का हे सांगणे अवघड आहे. विरोधी पक्शात पंतप्रधान इच्छुक अनेकजण आहेत. त्यांच्यात एकमत होणे अवघड आहे.

अशा चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहेत.
या वर्तुळांना काही इज्जत नाही उरली. निवडणूकीत पराभव होतच असतो.

बबन ताम्बे यांनी 15/03/2018 - 16:45 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

खरे असेल तर धक्कादायक !! बुद्धी भ्रष्ट झालीय काय असले बोर्ड लावणार्‍यांची ?

http://zeenews.india.com/hindi/india/pune-deenanath-mangeshkar-hospital-doctor-get-patient-treated-by-tantrik-causes-death/380205 http://indianexpress.com/article/cities/pune/video-shows-man-performing-rituals-on-dying-patient-in-hospital-her-doctor-booked-5097037/ https://www.loksatta.com/maharashtra-news/news-of-black-magic-in-dinanath-mangeshkar-hospital-of-pune-1644716/

एवढ्या बातम्यांच्या आधारावर घाईने निष्कर्ष काढणे श्रेयस्कर होईल असे वाटत नाही . अ‍ॅडीषनल डिटेल्सची गरज आहे असे वाटते.

घटना वाचली आहे मी पेपरमध्ये. ती धक्कादायक तर आहेच. तुम्ही ज्या बोर्डची इमेज इथे चिकटवलीय तो बोर्ड खरा आहे का हे मी विचारतोय. खरा असेल तर अजून धक्कादायक आहे असे मला म्हणायचे आहे.

manguu@mail.com चा एक निराधार वक्तव्य कॉपीपेस्ट करणारा एक प्रतिसाद संपादकांनी उडवलेला दिसतोय. मी संदर्भासहीत उत्तर टाईपून प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला तर मूळ प्रतिसाद गेला असे सांगून मिपा सॉफ्टवेअरने माझा देखील उपप्रतिसाद गिळला. असो.

कपिलमुनी यांनी 15/03/2018 - 16:47 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

इथे आणि इथे तुम्ही लिहिल्याप्रमाणे "राणे भाजपत आला तर मी व्यक्तिशः विशेषतः विधानसभेसाठी भाजपला मत देणार नाही." सध्या आता प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि मुरलीधरन हे भाजपचे अधिकृत उमेदवार असतील, असे राज्याचे मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. या दुव्यानुसार आणि वरती दिलेल्या दुव्याच्या माहितीनुसार राणे सध्या भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत . तर तूम्ही तुमच्या "राणे भाजपत आला तर मी व्यक्तिशः विशेषतः विधानसभेसाठी भाजपला मत देणार नाही." या मतावर ठाम आहात का ??

श्रीगुरुजी यांनी 15/03/2018 - 16:54 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by कपिलमुनी

Permalink

राणे भाजपत आला आहे, का तो भाजप पुरस्कृत आहे ते अजून स्पष्ट नाही. पण मी माझ्या मतावर ठाम आहे.

A day before filing his nomination papers for the Rajya Sabha elections, former CM Narayan Rane quit his own party, the Maharashtra Swabhiman Paksha. He has now joined the BJP. Rane told TOI he quit the Maharashtra Swabhiman Paksha as it would have been incorrect for him to be associated with two parties at the same time. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/narayan-rane-quits-own-party-joins-bjp-ahead-of-rs-polls/articleshow/63292383.cms

"वाल्याचा वाल्मिकी झाला" छापाच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत !

हा विचार करून बघा न सर मग, म्हणजे तितका बाजूला काढला की उरलेला तटस्थपणा (ना नफा ना तोटा) किंवा थेट नफा सापडू शकेल, म्हणजे असे मला वाटतं बरंका डॉक्टर साहेब.

पगला गजोधर यांनी 15/03/2018 - 20:04 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

तटस्थपणा (ना नफा ना तोटा) किंवा थेट नफा सापडू शकेल
. शिंपल आहे वांड साहेब, शिवसेना व इतर प्रतिपक्षातील, उपद्रवमूल्य (राजकीय उपद्रवमूल्य नव्हे तर हमरीतुमरीवर वेळ आलीच तर रस्त्यावरचे उपद्रवमूल्य) असलेला मराठा नेता शहा साहेबानी पदरी बाळगलाय हो ...

सुबोध खरे यांनी 15/03/2018 - 20:38 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

Sharad Pawar, president of Nationalist Congress Party (NCP), which is part of the ruling alliance in Maharashtra told a Marathi news channel:“We are not a bunch of saints, and if we are going to get political advantage for giving reservations to Marathas and Muslims, then so be it.”हे साहेबांचे निर्लज्ज वक्तव्य होते. http://www.livemint.com/Opinion/76XE10XAWthbQgvyhHjnNN/Will-Maratha-and-Muslim-reservation-stand-legal-scrutiny.html यानंतर महा मोर्चा वगैरे प्रकरणे झाली. तेंव्हा काट्याने काटा काढावा या न्यायाने श्री नारायण राणे याना त्यांच्या समोर उभे करणे हा एक हेतू असू शकतो.

श्रीगुरुजी यांनी 15/03/2018 - 20:39 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

https://www.loksatta.com/desh-videsh-news/arvind-kejriwal-apologies-to-punjab-minister-1646152/ मी चुकलो, मला माफ करा – अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंजाबचे महसूल मंत्री बिक्रम सिंह मजिठिया यांची माफी मागितली. मे २०१६ मध्ये मजिठिया यांनी केजरीवाल आणि आपच्या अन्य दोघांविरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता. पंजाबमधल्या ड्रग समस्येवरुन केजरीवालांनी मजिठियांना टार्गेट केले होते. खोटे आरोप करुन केजरीवाल आपली व आपल्या कुटुंबाची बदनामी करत आहेत असा आरोप मजिठिया यांनी केला होता. केजरीवालांच्या आरोपांनी संतप्त झालेल्या मजिठियांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता. अलीकडे मी तुमच्यावर तुम्ही ड्रग व्यवसायात सहभागी असल्याचे आरोप केले होते. माझी विधाने राजकीय हेतुन प्रेरित होती. या आरोपातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे माझ्या लक्षात आले आहे. या मुद्यांवरुन पुन्हा राजकारण नको असे केजरीवाल यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. मी तुमच्यावर केलेले सर्व आरोप मागे घेतो आणि माफी मागतो असे केजरीवालांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. मागच्यावर्षी केजरीवालांनी हरयाणाचे भाजपा नेते अवतार सिंह भडाना यांची माफी मागून विषय संपवला होता. २०१४ साली केजरीवालांनी अवतार सिंह भडाना यांना भ्रष्टाचारी म्हटले होते. या विधानाबद्दल भडाना यांनी सुद्धा केजरीवालांविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता.

कपिलमुनी यांनी 15/03/2018 - 21:20 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by श्रीगुरुजी

Permalink

खोटे आरोप केल्यावर माफी मागायला लागली हे चांगले झाले.

पगला गजोधर यांनी 15/03/2018 - 20:44 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आणि म्हणे "पार्टी विथ डिफरन्स" ... "चाल - चेहरा - चरित्र".... ब्ला ब्ला ब्ला .....

बिटाकाका यांनी 15/03/2018 - 21:55 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by पगला गजोधर

Permalink

तुम्ही म्हणाल तेच डिफरन्सेस गृहीत धरायचे का? बरं मग एकदा लिस्ट करून टाका कि अमुक एक डिफरंट गोष्टी केल्या तरच पार्टी विथ डिफ्फरन्स नाहीतर नाही, कसे?

माईसाहेब कुरसूंदीकर यांनी 15/03/2018 - 21:14 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

सगळे तसलेच रे गजोधरा. त्या 'आप'वाल्या अरविंदाकडून थोड्या अपेक्षा होत्या. दिल्लीत तो बर्यापैकी काम करतोय असे वाचले आहे.

arunjoshi123 यांनी 18/03/2018 - 23:11 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

माईसाहेब, कानांचा इलाज करून घ्या, ह्यांच्या डोळ्यांचा पण इलाज करा. ================================ केजरीवालाने दिल्लीची पुरती वाट लावली आहे.

सर टोबी यांनी 15/03/2018 - 22:19 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

उद्देश हा अंध, संघ, भाजप विरोधकांनी नव्याने समजून घ्यावा या उद्देशाने हा प्रतिसाद लिहीत आहे. खरे तर मला देखील असा साक्षात्कार हल्लीच झाला आहे. असे बघा, सत्य जर सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असते तर एक दोन भागातच अंध भक्त झाले असते किंवा भक्त अंध झाले असते. पण तसे नाहीये. त्यामुळे जर हि मालिका भक्तांसाठीच जर राखीव ठेवली तर किती चांगले होईल. भक्त अनेक नव्या तऱ्हांनी हे धागे सजवतील. कधी नरेंद्र सूक्त, कधी नरेंद्र सप्तशतीचा पाठ, संकट मोचनासाठीचा अध्याय, आणि नरेंद्र आरती अशा गोष्टी नावारूपाला येतील. सवाई गंधर्व वगैरे ठिकाणी जसे रसिक एकमेकांना स्वतःला भावलेल्या जागा दाखवून एकूणच परस्परांचे भावविश्व समृद्ध करतात तद्वत इथे लोक या सरकारच्या अनवट गोष्टींचे आपल्याला समजलेले मर्म समविचारी लोकांना समजावून सांगतील. जसे नोटबंदी नंतरची काश्मीर शांतता, सर्जिकल स्ट्राईकनंतरचे पाकिस्तानचे मोडलेले कंबरडे, भ्रष्टाचाराची झालेली उचलबांगडी, डिजिटल इंडिया वगैरे गोष्टींमुळे महासत्तेचे वास्तव कसे उंबर्यापर्यंत आले आहे अशा गोष्टींची चर्चा होईल. तेंव्हा अंध विरोधकांना हे आवाहन आहे कि त्यांनी या मालिकेचे काही भाग भक्तांना महानुभाव घेण्यासाठीच मुक्त ठेवावेत.

भक्तांसाठी पेशल जागा या धाग्यावर कशी असणार ? ही मुम्बै लोकल आहे . इथे सगळेच येणार. भक्तांसाठी खास गाडी - राजधानी बुलेट ट्रेन श्रीगुरुजीनी एकदा चालवली होती .. पहिल्या वर्षी ... नंतर ती परत कधी दिसली नाही.

>>> भक्तांसाठी खास गाडी - राजधानी बुलेट ट्रेन श्रीगुरुजीनी एकदा चालवली होती .. पहिल्या वर्षी ... नंतर ती परत कधी दिसली नाही. पण त्यात विनातिकीट अंधद्वेष्टेच झुंडीने घुसुन जागा बळकावण्याचा प्रयत्न करीत होते. तो धागा वर्षभर चालला आणि त्या अवधीत कागलकरला संपादकांनी १०-१२ वेळा हाकलून त्याचे सदस्यत्व नष्ट केले होते.

सुखीमाणूस यांनी 15/03/2018 - 22:37 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

पण सरकारच्या/भाजपा च्या चुका कोणीतरी ईथे लिहितयत की... मग त्यावर दोन्ही बाजू हिरिरीने मत मांडत आहेत. ताज्या घडामोडी हा धागा काय फक्त सरकारला शिव्या घालायला हवा का?

श्रीगुरुजी यांनी 16/03/2018 - 10:21 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

तेलगू देसमने मोदी सरकारचा पाठिंबा काढून घेतला असून ते सरकारविरोधातील अविश्वास ठरावाला पाठिंबा देणार आहेत. बरोबर १९ वर्षांपूर्वी एप्रिल १९९९ मध्ये जयललिताने वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेऊन अविश्वास ठरावाला पाठिंबा दिल्याने केवळ १ मताच्या फरकाने सरकार पडले होते. त्यावेळी वाजपेयींनी जयललिताच्या blackmail पुढे मान झुकविली नव्हती आणि आज मोदी नायडूंच्या blackmail पुढे मान झुकवायला तयार नाहीत. कणखर बाणा दाखविल्याबद्दल मोदींचे अभिनंदन!

बाकी विरोधी पक्ष पाठिंबा देत नाहीत तोपर्यंत अविश्वास प्रस्ताव पुढे सरकार नाही. कदाचित प्रस्तावच फेटाळला जाईल.

प्रस्ताव पुढे जाईल असे दिसते. काँग्रेस, माकप, अण्णा द्रमुक, एमआयएम ने पाठिंबा द्यायचे ठरवले आहे. काँग्रेस ४८ + अण्णा द्रमुक ३७ + टिडीपी १६ + माकप ९ + वायएसआर ८ + एमआयएम १ = ११९ जणांचा पाठिंबा आहे. यात तृणमूल ३४ आणि शिवसेना १८ यांचे काय होतेय हे पाहणे रोचक आहे. ----------------------------------------------------- भाजपचे स्वतःचे २७४ सदस्य असल्याने सरकारला कुठलाही धोका दिसत नाही पण निवडणूक येऊ घातल्याने वातावरण तयार करून मित्रपक्ष फोडण्याचे प्रयत्न विरोधकांकडून चालल्याचे दिसते.

कास्मिरपासून नागापर्य्ंत सगळ्या फुटिर पक्षाना मिठ्या मारणारी, गोवा , पूर्व राज्यात गोमांस खायला पर्मिशन देणारी, अतिरेक्याना विमान देणारी.. भाजपा ताठ कण्याची !!!! एक्स रे काढून बघा गुरुजी

बिटाकाका यांनी 16/03/2018 - 11:28 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

हे तुमचे एखाद्या पक्षाचे समर्थन करायचे निकष आहेत का? असतील तर तुमचा आवडता पक्ष कोणता? नसेल तर फक्त भाजप विरोध हा तुमचा अजेंडा असण्यामागचे कारण काय? --------------------------------------------- इतरत्र फुसके बार काढून मग प्रतिसाद इग्नोर मारला जातो तसा इथेही मारला तरी काही हरकत नाही.

arunjoshi123 यांनी 18/03/2018 - 23:18 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

अतिरेक्याना विमान देणारी..
हे नविनच. भाजपानं सरकारी विमानावर तुळशीपत्र ठेवलं??????????????? ================================================== अफगाणिस्तानात काय पदयात्रा काढायची होती का? भाजप द्वेष्ट्यांचा आय क्यू लैच भारी असतो.

विशेष राज्याचा दर्जा देवू असे आधी बोलून मग भाजपे वचन विसरले. चंद्राबाबूनी कैकयीच्या आवेशात मोडू नका वचनास नाथा , असे स्पष्टपणे सांगितले. अविश्वास ठरावाचा प्रस्तावही मांडायचे ठरवले. म्हणजे कणखर बाणा बाळगल्याबद्दल अभिनंदनास भाजपा/ मोदी/ शहापेक्षा चंद्राबाबूच अधिक पात्र आहेत ना ?

विचार करायला ३-४ वर्षे दिली . कोर्टात घटस्फोटसुद्धा काडी मोडण्याइतक्या सहजतेने होत नाही.

कसला डोंबलाचा विचार. पुढील वर्षी आपली वाट लागणार याचा अंदाज आल्यावर आपल्या नाकर्तेपणाचे खापर दुस-यावर फोडण्याचाच हा प्रकार.

हाहाहा, आश्वासन (दिले असेल तर) पूर्ण होणार कि नाही हे समजायला ३-४ वर्षे लागतात होय, छानय! इथे अंधविरोधक वाहिल्या वर्षीपासूनच फेकूगिरी वगैरे म्हणून नाचत आहेत, त्यांच्याकडून काहीतरी शिकून घ्यायचं ना चंद्राबाबूंनी! --------------------------------------------------- मग आता विशेष राज्याचा दर्जा पुढच्या वर्षी देणार का कोणी? काँग्रेस? कि तिसरी आघाडी?

श्रीगुरुजी यांनी 16/03/2018 - 15:43 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

बिहारमधील पोटनिवडणक राजदने जिंकल्यावर विजयी मिरवणुकीत "भारत तेरे तुकडे होगे", "पाकिस्तान झिंदाबाद" अशा घोषणा देत असतानाच्या चित्रफिती व्हायरल झाल्यात. भाजपला विरोध करण्याच्या धुंदीत आपण कोणाला समर्थन देतोय याबद्दल ना खंत ना खेद.

काय झाले त्यांचे ? जिथे भाजप्यांची नाके आपटतात नेमके तिथेच अशा फिती कशा सापडतात ? अशा फिती कितीका असेनात , विकास , संघ , हिंदुत्व इ इ फुल्ल्ल्ल हिंदुत्वाचा डोस असताना हिंदुबहुल भागात भाजपे का हरले म्हणे ?

३० वर्शे मठाची सत्ता असताना कधी दिसले नाहीत. आता एकदमच उगवले ?

बिटाकाका यांनी 16/03/2018 - 17:33 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

जिथे भाजप्यांची नाके आपटतात नेमके तिथेच अशा फिती कशा सापडतात ? अशा फिती कितीका असेनात , विकास , संघ , हिंदुत्व इ इ फुल्ल्ल्ल हिंदुत्वाचा डोस असताना हिंदुबहुल भागात भाजपे का हरले म्हणे ? ---------------------- या दोन्ही प्रश्नांची तुमची उत्तरे सांगाल का? का परत हवेतच बाण? ती फीत सापडली आहे यावर काहीच बोलणे नाही, तिथेच कशी सापडली म्हणे? काहींच्या काही! ---------------------- विकास , संघ , हिंदुत्व इ इ फुल्ल्ल्ल हिंदुत्वाचा डोस चालत नाही किंवा मोदी वेव्ह वगैरे नाही माहित होतं तर सपा बसपा युती का झाली?

जिथे भाजप्यांची नाके आपटतात नेमके तिथेच अशा फिती कशा सापडतात ?
अरे भाऊ, किशनगंज, अरेरिया बद्दल तुला काई माहिती आहे का? =============================================== आणि तू स्वतः कधी गेलाय का जे एन यू मधे? मी स्वतः आय आय एफ टी मधून एम बी ए केलं आहे जे जे एन यू पासून १ कि मी वर आहे. मी तिथे खूपदा गेलो आहे. (तिथली कँटीन मस्त आहे.) तिथली घाण चुक्षुरवे पाहिली आहे. असह्य भारतद्वेष (बाकी असोच) पाहिला आहे. त्यावेळी कोण्याचंही नाक आपटलं नव्हतं. ============================== जे एन यू असं जगातलं एकमात्र कँपस असावं जिथे अ‍ॅलम्नायला पण आत घेत नाहीत. =================================== तू ना अगोदर काश्मिर. ईशान्य भारत, जे एन यू, किशन्गंज, इ इ स्वतः फिरून ये. ====================================== तुला भाजपला मत द्यायचं नाही तर नको देऊ. तू म्हणतो म्हणून मी ही नाही देणार. पण बरगळायचं बंद कर. हा प्रश्न काही तिथल्याच स्थानिक लोकांच्या दूरगामी अस्तित्वाचा आहे. सुरक्षेचा आहे. तू आणि तुझा पक्ष तुमच्या पद्धतीनं सोडवा. पण गाढवासारखं एखादा प्रश्नच नाही असं म्हणू नकात. ============================ बाय द वे, भारताचं खरंखुरं विभाजन करायचं सामर्थ्य जे एन यू मधे आहे आणि ते ते बर्‍याच अंशी वापरतात देखील.

असह्य भारतद्वेष तुम्हाला दिसला तर रीतसर पोलिस केस करायची की . किंवा निदान संघ , अभाविप अशा हिंदुरक्षक संघटनाना तरी सांगायचे . माझ्यावर राग काढणे , हे उत्तर नव्हे.

arunjoshi123 यांनी 19/03/2018 - 10:52 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

धन्यवाद. =========== आमच्या कॉलेजच्यावेळी विद्यार्थ्यांची गुंडगिरी, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान, कॉलेजात संप घडवून आणणे, अंमली पदार्थांची व्यसने, राजकीय विरोध, सामाजिक चळवळींचे तिथल्या राजकारणात दिसणारे प्रारुप आणि भारतद्वेष यांच्यात नक्की भेद करता येत नसे. तितकी अक्कल नव्हती. हे सगळं आम्हाला सारखंच वाईट वाटायचं. आज मला इतर गोष्टी तारुण्यसुलभ, इ इ वाटतात. पण भारतद्वेष आजही खुपतो. बाकी संघविरोधी शैक्षणिक वातावरणात शिकल्यामुळं आम्ही काही तिकडे तक्रार केली नाही. आज मात्र पाठींबा आहे. ================= मला काही तुमचा राग असायचा प्रश्न येत नाही. आणि तक्रार करायचं कर्तव्य माझं एकट्याचं नाही. तुमचंही आहे. आज जितका मी परिपक्व आहे आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे तितका तेव्हा असतो तर बर्‍याच जणांना जेलमधे घातलंही असतं. आज जे मी तुम्हाला 'काहीही फालतू बरगळू नकोस' असं लिहितो ते मला परवडतं. त्या काळात नसतं. ===================== बाय द वे, तुम्ही इथे जे एकूण काही मोदी, भाजप, संघ, अभाविप इ इ बद्दल विष ओकता, तर किती पोलिस तक्रारी केल्यात? का लोका सांगे...?

manguu@mail.com यांनी 19/03/2018 - 11:22 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by arunjoshi123

Permalink

बाय द वे, तुम्ही इथे जे एकूण काही मोदी, भाजप, संघ, अभाविप इ इ बद्दल विष ओकता फारच आक्षेपार्ह बोलता आहात. तुम्हाला मार्ग सुचवला , तर मलाच उलट बोलत आहात. तुम्ही जे बोलतात गुंडगिरी , व्यसन , राजकारण ते कितेव्तरी कॉलेजात होते.

arunjoshi123 यांनी 19/03/2018 - 12:22 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

कास्मिरपासून नागापर्य्ंत सगळ्या फुटिर पक्षाना मिठ्या मारणारी, गोवा , पूर्व राज्यात गोमांस खायला पर्मिशन देणारी, अतिरेक्याना विमान देणारी.. भाजपा ताठ कण्याची !!!! एक्स रे काढून बघा गुरुजी
हे विष नाहीतर काय आहे? अतिरेक्यांना काश्मिरमधून काबूलला पायी नेतात का? तुम्ही भाजपला शौर्य नसलेली म्हणा, सत्तेचा हव्यास असलेली म्हणा आणि त्यासाठी फुटीरवादी शक्तींना खुश करणारी म्हणा. तुम्हाला यातून भाजप ही अतिरेकीप्रेमी आहे असंच म्हणायचं आहे ना? ================ अतिरेक्यांना विमान दिलं तर कुठे पोलिस कंप्लेंट केली होतीत? गोमांसाची कंप्लेंट कुठे केलीत? ======================= अक्कल नसेल तर माणसानं गप्प बसावं. भाजपची सत्ता मणिपूरमधे यायच्या आधी मणिपूर सतत १२० दिवस जळत होतं. पेट्रोल ३०० रु. गॅस २०० रु. https://energy.economictimes.indiatimes.com/news/oil-and-gas/lpg-price-touches-rs-3000-per-cylinder-in-manipur-on-economic-blockade/55468096 ज्या दिवसापासून भाजप दोन्हीकडे युतीत सत्तेत आली, त्या दिवसापासून लोक इम्फाळ ते कोहिमा स्कूटरवर जात आहेत. काहीही दंगा झालेला नाही. फूटिरांना मिठ्या मारल्यात त्या तिथे अभूतपूर्व शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून. तुमच्यासाठी सन्मानाची भाषा करण्याची आमची निश्चितच इच्च्छा आहे. पण अख्ख्या काश्मिरच्या मतदारांना, नागालँडच्या मतदारांना, लोकशाही मार्गाने बनलेल्या पक्षांना, त्यांच्या आकांक्षांना तुम्ही फुटीर म्हणून संभावता तेव्हा सन्मान द्यायची इच्छा मरून जाते. -------------------- तुमचा भाजपशी राजकीय मतांतर असणं अत्यंत सन्मान्य आहे. मोदीला २०१९ मधे २ काय १ च जागा मिळो. तुमच्या तोंडात घी शक्कर. अ‍ॅडवान्समधे अभिनंदन. पण त्यात विष, विखार नको. थोडं वास्तव पण पहा. सुयोग्य तितकीच टिका करा. नाही तर मग संघावाले चेकाळून तितकीच घाणेरडी टीका काँग्रेसच्या चांगल्या माणसांवर करतात. कशाला संभाषणाचा दर्जा घसरवायचा?

अरे भावा, मी वर दिलेली लिंक पाहा. त्यात एका गॅस सिलिंडरची किंमत ३००० रुपये लिहिली आहे. तो काळ काँग्रेसचा. लिंक देऊन आजची (भाजपच्या शांतीपूर्ण काळातली) पेट्रोल प्राईस का सांगतोस? ब्लॉकेडच्या काळातली पाहा. गूगल जमत नाही का ? मी खाली लिंक देतो. वाच. http://www.nagalandpost.com/ChannelNews/Regional/RegionalNews.aspx?news=TkVXUzEwMDEwNTE5NQ%3D%3D =========================== तरीच म्हटलं, भाजपद्वेष (विरोध नव्हे) करायला एक विशिष्ट किमान निर्बुद्धता आवश्यक आहे. ======================== आणि अशा ब्लॉकेडस तिथे पवित्र काँग्रच्या काळात एकूण किती झाल्यात ते पण वाच मंजे त्यांचं महत्त्व कळेल. मग फुटीर , मिठ्या म्हणत गावभर फिर.

अरुण जोशी सर, पटलं नाही म्हणून सांगतो, तुमच्याकडून त्रागायुक्त भाषेची बिलकुल अपेक्षा नाही, एकेरी तर नाहीच नाही! --------------------------------------- maguuu तुमच्या ओळखीचे असतील तर, चालुद्या!

अरुण जोशी सर, पटलं नाही म्हणून सांगतो, तुमच्याकडून त्रागायुक्त भाषेची बिलकुल अपेक्षा नाही, एकेरी तर नाहीच नाही!
तुमची अपेक्षा नॉर्मल, रास्त आहे. ======================= माझ्या प्रतिक्रिया अचानक नाहीत. त्या बर्‍याच दिवसांच्या निरीक्षणानंतरच्च्या आहेत. ========================== सभ्यता, औपचारिकता, शिष्टाचार इ इ आपल्या मूळ उद्देशापेक्षा महत्त्वाचं असू शकत नाही. अनेक लोकांना पात्रतेप्रमाणेच वागवणे इष्ट असते. द्वेषबुद्धीला सन्मानाने वागवणे आत्मघातक असते.

अख्ख्या काश्मिरच्या मतदारांना, नागालँडच्या मतदारांना, लोकशाही मार्गाने बनलेल्या पक्षांना, त्यांच्या आकांक्षांना तुम्ही फुटीर म्हणून संभावता तेव्हा सन्मान द्यायची इच्छा मरून जाते. असेच आहे तर भाजपावाल्यानीही इतर पक्ष , त्यांचे नेते व त्यांची कारकीर्द ह्यांचा सन्मान ठेवावा. ( तसेही व्यक्तिश: ना तुमच्या सन्मानावर जगतो ना तुमचे जोडे घालून फिरतो . दोन्ही तुमच्याकडेच ठेवले तरी चालेल. )

विशुमित यांनी 19/03/2018 - 14:52 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

तसेही व्यक्तिश: ना तुमच्या सन्मानावर जगतो ना तुमचे जोडे घालून फिरतो . दोन्ही तुमच्याकडेच ठेवले तरी चालेल.>> ==>> यासाठी +1

विशुमितराव, ह्या मंगूच्या या मानसिकतेला प्रोत्साहन देऊ नकात. सन्मानच काय माणूस पेटला तर त्याला कोणाच्या कशाचीच गरज पडणार नाही. पण म्हणून काय आपल्याला लोक किती सन्मान देतात याला काहीच मूल्यच नसावं का? जे लोकांत आपण संवाद करत आहात तिथे ते तुम्हाला काय मानतात याचा तुम्हाला फरकच पडत नसला तर सामाजिक संवाद नासून जाईल. ============ आणि माझ्या सन्मानाची व्यक्तिशः त्यांना गरज आहे असं मला म्हणायचंही नव्हतं.

बिटाकाका यांनी 19/03/2018 - 14:58 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

हाहाहा, विरोधाभास तर बघा, विरोधी पक्षवाले काय भाजपच्या सन्मानावर जगात आहेत काय? मग कशाला अपेक्षा?

arunjoshi123 यांनी 19/03/2018 - 15:33 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

असेच आहे तर भाजपावाल्यानीही इतर पक्ष , त्यांचे नेते व त्यांची कारकीर्द ह्यांचा सन्मान ठेवावा.
अर्थातच. ठेवतातच कि. कोणाचा नाही ठेवला? ===================================== तुम्ही भाजपचं राहूच द्या. संघावाले कम्यूनिस्ट, काँग्रेस, बसपा, लीग यांचादेखील (मंजे तत्त्वतः आणि काही काही नेत्यांचा) सन्मान ठेवतात. फायजे असेल तर मी लिंक देतो. कालच मी फेसबुकवर पोस्ट केलं होतं. आंबेडकरांचा वारसा कसा श्रेष्ठ आहे आणि तो आज कोणाकडे आहे याबद्दल काल मी एका संघावाल्याचं भाषण ऐकत होतो. यूट्यूबवर. भाषणाअंती तो म्हणाला कि आंबेडकरांचा हा वारसा आज त्या सर्व लोकांकडे आहे ज्यांकडे त्यांना अभिप्रेत असलेलं देशप्रेम आहे, विचार आहेत, संस्कृती आहे, तत्त्वे आहेत, इ इ. अर्थातच इथे "ज्यांकडे" मंजे संघाकडे असंच त्याला म्हणायचं होतं. मला वाटलं इथे तो भाषण संपवेल. पण तो पुढे असं म्हणाला कि दक्षिणेतील अनांबेडकरी चळवळ आणि उत्तरेतील आंबेडकरी चळवळ यांची आजची फलितं पाहीली तर आंबेडकरांचा खरा वारसा बहुजन समाजवादी पक्षाकडे आहे असं म्हणता येईल. असं नाव घेऊन संघावाला आंबेडकरांचा वारसा त्यांच्या विरोधात युती करणारांना देतात हे मला अजिबात अपेक्षित नव्हतं. ह्यांचेच संस्कार भाजपवाल्यांकडे आहेत असं तुम्हीच म्हणत असता.

arunjoshi123 यांनी 19/03/2018 - 15:45 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

तसेही व्यक्तिश: ना तुमच्या सन्मानावर जगतो ना तुमचे जोडे घालून फिरतो .
याचा मला देखील आनंद आहे. ईश्वर आपणांस असेच ठेवो. =============== एक राजकीय विचार म्हणून किंवा एक अयशस्वी सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा अजून काही म्हणून भाजपला मत देऊ नका असं सांगायचे शेकडो मुद्दे आहेत. त्यांचा आधार घ्या. पण अव्वाच्या सव्वा काहीही बरगळत कमी जा. ========================= तुमच्यासारख्या लोकांनी भाजपविरोधाची इज्जत घालवलीय. भाजपसमर्थक इतका अभ्यास आणि लॉजिक घेऊन येतात आणि त्यांना टोटल चित करणारा एकही अभ्यस्त मुद्दा तुम्ही मांडू शकत नाही मंजे काय? ========================= बाय द वे, त्या अतिरेक्यांना कंचे जोडे घालून कंच्या रस्त्यानं पायी श्रीनगरवरून काबूलला न्यायचं होतं? फार उत्सुकता लागून राहिलिय.

भाजपसमर्थक इतका अभ्यास आणि लॉजिक घेऊन येतात आणि त्यांना टोटल चित करणारा एकही अभ्यस्त मुद्दा तुम्ही मांडू शकत नाही मंजे काय?>>> ==>> यासाठी -१

मांगु यांच्या प्रतिसादातील विखार तुम्हाला सहन झालेला दिसत नाही. तुमच्या या प्रतिसादात तत्कालीन पंतप्रधानांबद्दल काय प्रेम उतू चालले होते? हा घ्या तुमचा प्रतिसाद:

त्याच धाग्यावर त्याच प्रतिसादाच्या वर नेहरूविरोधकांवर टिका करताना (श्रीगुरुजींनी नेहरूंना -१०० दिले म्हणून) मी खालील प्रतिसाद दिला. इथे मी थेट नेहरूंच्या विरोधकांना अतिद्वेष (म्हणजे विखारापेक्षा खतरनाक काहीतरी) नसावा असं म्हटलं आहे. ============================================ त्याच धाग्यावरचा हा उतारा वाचूक मला नेहरूंचा विखार आहे असं तुमच्यासारखा सुबुद्ध डावाच म्हणो जाणे.
वर अनेक लोकांनी नेहरूंना -१०० मार्क दिले आहेत. अतिद्वेषाबद्दलचा हा सल्ला त्यांना देखिल लागू पडतो. कंपनीचे चेअरमन "चीप, मीन" असू शकतात, पण त्यांच्यात काहीही चांगलं नाही असं कसं? नेहरूंमधे सत्ताहव्यास एकिकडे आणि देशाचे हित काँप्रो करणारा भाबडेपणा दुसरीकडे होता म्हटलं तरी त्यांनी केलेल्या कार्यांत बरिच चांगली पण असणार ना? तुम्हाला -१०० (सर्वस्वी दुर्गुणी?) मार्क्स द्यावेत असा वाटणारा मनुष्य १५ वर्षे निवडून कसा आला? लोक इतके मूर्ख होते? किंवा इतर शब्दांत माझे, तुमचे पणजोबा इतके मूर्ख होते? हा त्या काळातल्या त्यांना नेते मानणार्‍या सर्व खासदारांचा अपमान नाही का? नेहरूंना एकही मार्क न देण्यातलं अनौदार्य आणि मोदींना २१ कलमी दोष देणे यात गुणात्मक फरक आहे का? (नाही असं माझं मत आहे. नाहीच असा दावा तुमच्यासाठी नाही, आहे का असा प्रश्न आहे.). त्यांच्या विचारसरणी आपल्याला मान्य नसणं वेगळं, त्याच्या चुका दिसणं वेगळं मात्र त्यांची त्यांचि जी काही विचारसरणि आहे तिच्याशी देखिल त्यांची प्रामाणिकता नव्हती याची खात्री असणं विचित्र आहे. पहा, एकूणात, मला देखिल नेहरू द्वेष (तसलं कैतरि) आहे, मात्र -१०० वैगेरे नाही हो.
================================== मूळात मला मोदीविरोधकांचा विखार आहे या गृहितकाने तुम्ही माझा विखार माझ्या लेखनात शोधत आहात. जीवनभरासाठी शुभेच्छा.

असह्य भारतद्वेष तुम्हाला दिसला तर रीतसर पोलिस केस करायची की . किंवा निदान संघ , अभाविप अशा हिंदुरक्षक संघटनाना तरी सांगायचे . माझ्यावर राग काढणे , हे उत्तर नव्हे.

डँबिस००७ यांनी 16/03/2018 - 23:34 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

बिहार मधील ऐका गावातल्या चौकाला मा श्री नरेद्र मोदी यांच नाव दिल्याच्या कारणावरुन ऐका वरीष्ठ नागरिकाची शीर धडावेगळ करुन हत्त्या करण्यात आली! भारतात हळु हळु मोघल हुकुमत परत येत आहे !!

डँबिस००७ यांनी 16/03/2018 - 23:37 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

http://m.gulfnews.com/news/asia/india/indian-man-beheaded-for-naming-village-square-after-prime-minister-modi-1.2189145 जमोप्या अभिनदंन !

manguu@mail.com यांनी 16/03/2018 - 23:50 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by डँबिस००७

Permalink

चौकाला एका माणसाने बळजबरीने नाव दिले, ही मोगलाई की त्याबद्दल त्याचे मुंडके उडवले ही मोगलाई ?

arunjoshi123 यांनी 18/03/2018 - 23:45 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

याच न्यायाने घटनेत जबरदस्तीने सेक्यूलर शब्द घुसडला म्हणून इंदिरा गांधीचे मुंडके उडवले गेले असते तर ती मोघलाई असली नसती, शब्द जबरदस्तीने घुसडले हीच मुघलाई असली असती, बरोब्बर?

डँबिस००७ यांनी 17/03/2018 - 00:54 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

पुर्ण देशा तल्या प्रत्येक गोष्टीला एकाच गांधीच नाव देण्याची ६५ वर्षांची मोगलाई च होती ! हे मान्य केल्या बद्दल अभिनंदन !!

मी एका माणसाचे नाही म्हटले एका माणसाने असे म्हटले. चौकाला नाव द्यायला तिथल्या लोकल म्युन्सिपलमध्ये ठराव करतात व मग नाव देतात. एक गांधी , एक नेहरु सर्वानाच आवडले तर प्रत्येक गावात त्या नावाचे चौक , रस्ता , शाळा असणारच. पण त्यांचं नाव चौकाला आहे , तर ह्यांचंही हवेच , म्हणून एका माणसाने अधिकार नसताना बोर्ड लावणे , हे चूक. ( मोगलाई हा शब्द का वापरायचा ? मोगलांच्या काळात मोगल हेच म्युन्सिपल कौन्सिल होते ना ? )

http://www.newindianexpress.com/nation/2018/mar/16/man-hacked-to-death-in-bihar-over-naming-of-a-site-as-narendra-modi-chowk-probe-points-at-old-lan-1788211.html

बिटाकाका यांनी 17/03/2018 - 09:50 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

हाहाहा, हेच सुरुवातीला करायचं असतं हो! अंधविरोध काहीही करायला लावतो माणसाला!! यामुळेच, भक्त, गुलाम, चाटु, आपटार्ड असणे केव्हाही वाईट!!

छान, छान!! अंधविरोधाची पुढची पायरी गाठल्याबद्दल हार्दिक हबिणंदन!!! --------------------------------- थोडक्यात, उद्या एखाद्याने पालिकेकडून परवानगी न घेता चहाचा गाडा वगैरे लावला की गळे कापले जावेत याला तुमचे समर्थन आहे काय?? तुमच्या आवडत्या सरकारच्या काळात अच्छे दिन बद्दल तुमची अपेक्षा अशी आहे होय, छानय! -------------------------------- ते पालिकेचा नियम असताना विंग्रजीमध्ये फलक लावणाऱ्यांचं तुमच्यामते काय करायचं असतं? देशात कायदा नावाची गोष्ट आहे याची आपल्याला जाणीव असणारच! ------------------------------- नेहरू सगळ्यांना आवडतात आणि मोदी सगळ्यांना आवडत नाहीत याची काही आकडेवारी? की आपलं नेहमीप्रमाणे हवेत गोळ्या?

गळे कापण्याचे समर्थन केलेले नाही. त्याना कायद्याने शिक्षा दिली जाईल. तसेही न्यायप्रिय भाजपाचेच शासन आहे. विश्वास ठेवावा. गोमांस प्रकरणातील हत्यांचे भाजपे नक्कीच समर्थन करणार नाहीत. तसेच ह्याही प्रकरणात हत्यांचे समर्थन अ-भाजपे लोक कधीही करणार नाहीत. नेहरुंच्या काळात मोदी नव्हते.

तुम्ही तुमचाच उत्स्फूर्त प्रतिसाद परत वाचा वरचा! असो, तुम्ही तुमचे म्हणणे स्पष्ट केल्याने परत प्रतिवाद करण्यात फायदा नाही. पण अंधविरोधच अशा उत्स्फूर्त प्रतिसादाना कारणीभूत असतो असे मला वाटते.

गळे कापण्याचे समर्थन केलेले नाही.
अर्थातच नाही केलं तुम्ही. तुम्ही फक्त इतकंच म्हणालात कि मोदीचं नाव ठेवणं हे गळा कापण्यापेक्षा अधिक अन्यायकारक आहे.

एक गांधी , एक नेहरु सर्वानाच आवडले तर प्रत्येक गावात त्या नावाचे चौक , रस्ता , शाळा असणारच.
नेहरू हा अहिंसावादी (बोस, मुखर्जी, गांधी सोडून ??) स्टॅलिन होता. किम जोंग उत्तर कोरीयात फार प्रसिद्ध आहे तसा होता. यांचे सर्वांचे मुखवटे हळूहळू उतरताहेत.

माहितगार यांनी 17/03/2018 - 09:54 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

भारताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी अलिकडे इंडियन सायन्स काँग्रेसच्या व्यासपीठावरून खालील प्रमाणे दावा केला.
....Even Stephen Hawking said, our Vedas might have a theory superior to Einstein’s law E=MC2.
कोणती थेअरी कुणाला कशापासून सुपीरीअर वाटते ते ठरवण्याचा ज्याला त्याला अभिव्यक्ती स्वांतंत्र्याचा अधिकार आहेच पण Stephen Hawking चे नाव वापरले गेल्याने काही मंडळी बुचकळ्यात पडली असावीत. Stephen Hawking असे म्हणाल्याचा स्रोत संदर्भ काय असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पत्रकारांना तुम्हीच शोधून काढा असे सांगितले डॉ. हर्ष वर्धन यांच्या माहितीच्या स्रोताचा अंदाजा किमान एका लेखकास आल्याचे या लेखावरुन वाटते आहे. बेसिकली कुणी तिसर्‍याने फेसबूकवर stephen-hawking/ च्या नावाने पान बनवून स्वतःचे मत मांडले ते stephen-hawking चे समजून कोणत्याच्शा हिंदू विचराने प्रेरीत वेबसाईटवर आले आणि ते डॉ. हर्ष वर्धन यांच्या वाचनात कुठून तरी आले असावे . एनी वे त्या फेसबूक पेजचा दावा काय आहे ?
Vedas might have a theory superior to Einstein’s law E=MC2. The Satapatha Brahmana 7-1-2-23 and Gayatri Mantra talk about Universe being threefold (triloka): Prithvi (Earth), Antariksha (the space in between) and Dayu (Heaven). Krishna Yajurveda 23.12 (7-4-45) 43 Pannam-18th Anuvakam-45th Panasa suggests the existence of a softer intermediate space called Pilipila. Modern science says the matter and energy are interchangeable but the Vedic science says there is Pilipila in between.the two.(Ref: Modern Science in Vedas- 1 and 2 by Dr. Sakamuri sivaram Babu and Arjunadevi-Guntur-A.P.India published in 2007). Both Vedic and modern science agree upon a continuous dance of creation and annihilation of particle energy everywhere in the universe - Siva tandavam as per Hindu mythology, Rigveda discusses this cycle in detail. Vedic View: The Universe rotates, shaped like an egg. Modern View: The Universe is still and it resembles the surface of a sphere.
या बद्दल मिपा जाणकारांची काय मते आहेत ?

असे बिनबुडाचे दावे करणाऱ्या मंत्र्यांना सरळ मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात यावा. सत्यपाल सिंह, हर्षवर्धन हे उच्छशिक्षित लोक विनापूरावा असले दावे करतात तेव्हा खरच किव येते. --------------------------------- वेद महत्वाचे असतीलही पण असा दावा करताना पुरावे सज्जड पाहिजेत.

त्या फेसबुक कराने दावा Modern Science in Vedas- 1 and 2 by Dr. Sakamuri sivaram Babu and Arjunadevi-Guntur-A.P.India published in 2007) इथून घेतला आहे. लेखक Dr. Sakamuri sivaram Babu ह्यांची त्यांच्या बायोडाटावरून रसायनशास्त्रातील पिएचडी दिसते आहे.

The Indian Express spoke to Dr. Sakamuri Sivaram Babu, whose theory Vardhan referred to Friday, who said he was not aware of the minister’s comment since he was working on his book on the Yajurveda. “According to the research paper I wrote in 2007, there is an intermediate stage between the Yajurveda and the Atharvaveda which suggests that energy cannot directly convert into matter. There is an intermediate stage. So what I proposed was a modification from the Einstein theory to a Vedic theory,” he said. Babu said he had forwarded this research paper to Hawking who replied with an endorsement. As proof, he showed the text of the fake Facebook post. He wrote a second research paper which he said was published in the the Vedic Science Journal in 2013. Babu approached Hawking again: “Later I asked him (Hawking) to comment on my other paper for which he expressed his inability due to health reasons. Initially, he commented himself for my first paper,” he added. “Both times we were not able to connect with Hawking. The only reply we received was an email which was not directly related to us,” said K.V. Kirshnamurthy, former chairman of I-SERVE. The website states that I-SERVE is “recognised by DSIR, Government of India, as a Scientific and Industrial Research Organisation and is registered under FCRA, Ministry of Home Affairs in September 2008. इंडीयन एक्सप्रेस : Written by Sowmiya Ashok | Imphal | Updated: March 17, 2018 7:31 am

कपिलमुनी यांनी 18/03/2018 - 23:54 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

शेवटच्या चेंडूवर षटकार मारून मॅच जिंकली. बऱ्याच दिवसांनी थरारक मॅच पाहिली

manguu@mail.com यांनी 19/03/2018 - 09:13 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

राज ठाकरे यांचे वक्तव्य - मोदी हटाव मतदान पुन्हा पेपरवर घेण्याची विरोधकांची मागणी

बिटाकाका यांनी 19/03/2018 - 11:15 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

ईव्हीएम मशीन हाताळणे/घोळ घालणे अवघड जात असावे बहुतेक. त्यापेक्षा मतपेट्या पळवणे सोपे असावे, कौशल्य असेल म्हणून? ------------------------------------------- मोदींच्या बाजूने बोलून मोदींच्या मतांमधील वाटा मिळू शकत नाही. जे काही खेचायचंय ते मोदीविरोधी मतांमधून! मग काय, द्या मोदींना शिव्या! अंधविरोधकांना काही लागत नाही. राज ठाकरे हे त्या विरोधी मतांमधील नवे वाटेकरी आहेत असे मला वाटते.

manguu@mail.com यांनी 19/03/2018 - 09:13 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

राज ठाकरे यांचे वक्तव्य - मोदी हटाव मतदान पुन्हा पेपरवर घेण्याची विरोधकांची मागणी

चावटमेला यांनी 19/03/2018 - 13:04 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

दिनेश कार्तिक हा एक गुणी खेळाडू आहे, पण धोनी नामक वादळापुढे झाकोळून गेला आणि सतत दुसर्‍या फळीतला विकेटकीपर अशीच त्याची ओळख राहिली. ह्या खेळीने त्याचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल.

जयन्त बा शिम्पि यांनी 19/03/2018 - 13:32 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

ज्याचे अस्तित्व महाराष्ट्रात ,ज्यांच्यामुळे होत्याचे नव्हते झालेले आहे, ते त्यांच्याबद्दल असेच म्हणणार.राष्ट्रवादी , खांग्रेसबरोबर आणि मनसे राष्ट्रवादी बरोबर, काय युती आहे ?

पगला गजोधर यांनी 19/03/2018 - 15:00 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by जयन्त बा शिम्पि

Permalink

ज्याचे अस्तित्व महाराष्ट्रात ,ज्यांच्यामुळे होत्याचे नव्हते झालेले आहे, ते त्यांच्याबद्दल असेच म्हणणार.
शिवसेने ने उष्टवून फेकलेल्या पत्रावळी, चाटणार्या पक्षाच्या समर्थकांनी, जरा स्वतःच्या गिरेबान मध्ये ढुंकून पहा, 70 % उमेदवार काँ, राष्ट्र काँ, शिवसेना मनसे मधून आयात केलेत.. कठीण काळात पक्षा बरोबर असलेल्याना सतरंज्या उचलायला ठेवलंय....

70 % उमेदवार काँ, राष्ट्र काँ, शिवसेना मनसे मधून आयात केलेत..
याचा स्रोत देणे, कोणत्या निवडणुकीत, कोण कोण वगैरे. --------------------------------- डेटा नसताना फेकाफेकी करणे हि जुनीच मोडस ऑपरेंडी आहे असे एक निरीक्षण आहे.

गुजरात विधानसभेत काही होते म्हणे. https://www.ndtv.com/india-news/gujarat-election-results-2017-5-congress-rebels-lose-2-win-on-bjp-tickets-1789882 आता ते महाराष्ट्रात शिवरायांबद्दल अपशब्द वापरलेले ते कोण , तेही दुसर्या पक्षातून आले ना ?

बिटाकाका यांनी 19/03/2018 - 15:29 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

अरे देवा, टक्केवारी कशी काढतात ते माहित असेल अशी अपेक्षा आहे माझी. नसेल माहित तर सांगतो, त्यात काय एवढं! -------------------------------------- बातम्या तरी स्वतःच्या दाव्याला साजेशा देत जावा. बाहेरून आलेल्या सात पैकी ५ हरले म्हणे, दोनच जिंकले. अशा बाहेरून येऊन हरलेल्या लोकांमुळे सरकार बनतं होय, चान चान!! यावरून तरी भाजपला धडा मिळाला असेल, ९९ ऐवजी १०४ झाले असते. --------------------------------------- भाजपमधून नाराज होऊन बाहेर गेलेल्यांची यादी माहित नसेलच, त्याची काय आवश्यकता म्हणा! याशिवाय ते का त्यांचे पक्ष सोडून जातात हे तर अतिशयच गौण आहे!

मी काय सगळ्या भारताचा सेन्सस घेऊन बसावं की काय ? प्रत्येकजण आपल्याला माहीत असेल तितकी माहिती देत राहील. यावेळची गुजरात एलेक्शन अटीतटीची ठरली. त्यात जो डिफ्रन्स भाजपाने घेतला almost तितकेच उमेदवार बाहेरुन आले होते , असे कुठेतरी वाचले होते. आता या निमित्ताने शोधण्याचा प्रयत्न केला.

बिटाकाका यांनी 19/03/2018 - 16:31 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

७०% चा अर्थ कळतो का? त्यांच्या त्या प्रतिक्रियेवर समर्थनार्थ तुम्ही मला हि लिंक दाखवण्याचे कारण काय? मी भाजपमध्ये दोन चार जण बाहेरून आले हे नाकारले आहे काय? असे निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे भाजपने सुरु केले काय? इतर पक्ष याबाबतीत काय करतात? मग हा मुद्दा तुमच्या भाजपद्वेषाचा निकष कसा काय बनू शकतो? यामुळे तुमची भाजप विरोधाची दांभिकता उघडी पडत नाही काय?

मी त्यांच्या ७० % समर्थनासाठी लिहिलेले नाही. काही उमेदवार आले आहेत , मी याबद्दल लिहिले . त्यांच्या ७० % चा हिशोब त्याना विचारा.

बिटाकाका यांनी 19/03/2018 - 16:48 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by manguu@mail.com

Permalink

व्हय मालक, त्यांस्नीच इचारलं व्हतं! तुमास्नी फट्याक्कन पर्तिसाद द्यायची जणू सवयच हाये त्याला आपुन काय करणार?

In 2013, the BJP had forfeited its deposit in 49 of the 50 seats it contested, bagging less than two percent of the vote. This time around, it swept to a comfortable majority winning 43 seats with an ally, ousting the long-serving Communist Chief Minister of the state, Manik Sarkar. Biplab Deb, a young BJP leader with a background in the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), is expected to be the state’s new CM. The BJP’s strategy of switching from Nagaland’s dominant regional party, Naga People’s Front, and allying with former CM Neiphiu Rio-led new formation, Nationalist Democratic Progressive Party (NDPP), seemed to have paid off. Madhav tweeted on Saturday evening, “NDPP BJP Alliance has secured 30 seats. With the support of one independent, we are comfortably placed to form the government.” ================================================ The BJP has had mixed success with its strategy of first calling incumbent parties corrupt and then ‘importing’ their disgruntled members to gain power in the State. It was the winners among the 51 “imported” candidates who helped BJP move close to the 122 mark. Notable among such candidates were “giant-killers” like Sunil Deshmukh who won from the prestigious Amravati constituency defeating Congress leader and former President Pratibha Patil’s son Raosaheb Shekhawat. Deshmukh had left the Congress after being denied ticket. Dr. Vijaykumar Gavit, who was ousted from the NCP, retained his traditional stronghold of Nandurbar for the BJP this time. Former NCP member Kisanrao Kathore, who filed his nomination from Murbad as a BJP candidate, won against the NCP candidate with a margin of over 25,000 votes. Former Congressman Prashant Thakur, who left the party on the issue of toll plazas, won the Panvel seat for the BJP. Not all ‘imported’ candidates were successful. Former NCP strongman and ex-minister Babanrao Pachpute, who crossed over to the BJP claiming he was insulted by another NCP stalwart, could not win the Srigonda constituency. Former Minister and ex-Congressman Sanjay Deotale, who joined the BJP after being denied a ticket, lost to Shiv Sena candidate in Warora (Chandrapur). Former NCP leader Ajit Ghorpade, who joined BJP and contested from Tasgaon, lost to former Home Minister R.R. Patil. Of the nearly 51 candidates imported by the BJP in the hope of cashing in on their local clout, around 35 were from the Congress and the Nationalist Congress Party. The BJP also drew about a dozen candidates from the Shiv Sena. Some independents who were sure to win were given offers.

arunjoshi123 यांनी 19/03/2018 - 17:23 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by पगला गजोधर

Permalink

संपूर्ण पूर्वोत्तर भारतातली भाजप उधारीवर आणलेली आहे. पण तिथे खूपकाळापासून सतरंज्या उचलणारे लोक नव्हतेच म्हणून फरक पडत नाही.

बिटाकाका यांनी 19/03/2018 - 17:25 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by पगला गजोधर

Permalink

असं बघा गजोधर साहिब, भाजप कडे १२२ आमदार आहेत, त्यातील ७०% म्हणजे साधारण ८६ आमदार आपल्या म्हणण्यानुसार दुसऱ्या पक्षातून आलेले असायला हवेत नाही का? आता जे आले आणि हरले ते तर सोडूनच देऊ कारण त्यांचा इथे संदर्भ देण्याचा आपला उद्देश नसेल असे मी गृहीत धरतो. आता हे ८६ आमदार कोणते हे जरा कृपा करून सांगाल का? ------------------------------------- भाजपमध्ये आलेले आणि निवडून आलेल्यांपैकी किती लोकांना त्यांच्या पक्षाने तिकीट द्यायचे ठरवले होते? तिथे त्यांना डावलले म्हणूनच ते भाजपमध्ये आले असे नाही का? ------------------------------------ बाहेरून भाजपमध्ये आलेल्यांपैकी जिंकलेल्यांचे प्रमाण सुद्धा ४५% नाही, तुम्ही एकूण आमदारांच्या ७०% बाहेरून आलेले आहेत हा हास्यास्पद दावा करत आहात. पहिल्यांदाच २८८ जागा लढवणाऱ्या या पक्षांनी २८८ उमेदवार द्यायचे कुठून होते? तुमचा भाजपद्वेष तुम्हाला फक्त भाजपचे आकडे दाखवतोय, पण एकदा बाकीच्यांचे आकडेही बघून घ्या. भाजपने स्वतःचे २०९ उमेदवार उभे करून १०० जागा जिंकल्या तर बाहेरचे ५१ उमेदवार (हे सगळे निवडणुकीआधी ४ ते ० वर्षे आधी भाजपात आले असावेत) उभे करून २२ जागा जिंकल्या. या ५१ मध्ये ४ अपक्ष उमेदवार बाहेरून आले होते, एक मनसे, एक लोकसंग्राम असे सहा छोट्या पक्षांचे उमेदवार होते. ते भाजपचं काय जिंकण्याची संधी असेल तर कुठेही गेले असते. ------------------------------------- उरलेले जे ४५ आहेत त्यातले किती नावाजलेले होते, आधी आमदार किंवा मंत्री होते कि संधी मिळत नाही म्हणून ते भाजप मध्ये आले होते याच्याशी काहीही देणे घेणे न ठेवता सरसकट आरोप करणे हा अंधविरोधाचा कळस आहे. उलट, जी मोठी नवे भाजपमध्ये आली होती ती बहुतेक सगळी २०१४ मध्ये हरली आहेत. बाकी सुज्ञास सांगणे न लगे.

>>> 70 % उमेदवार काँ, राष्ट्र काँ, शिवसेना मनसे मधून आयात केलेत.. थापेबाजी नको. भाजपने २०१४ मध्ये २५२ जागा लढविल्या होत्या. यातील १७६ आयात केलेले उमेदवार सांगा.

It was the winners among the 51 “imported” candidates who helped BJP move close to the 122 mark.
परंतु जिंकलेल्या १२२ पैकी ५१ बाहेरून आयात केलेले , म्हणजे जवळ जवळ ४२ % . त्यामुळे ७०% च्याऐवजी , वरील प्रतिक्रियेत फक्त ४२% आयात असे वाचावे. साहित्य संपादक वरील प्रतिक्रियेत ७०% बदलून ४२% करावे ही विनन्ति.