शेतकर्यांच्या आंदोलना बाबत असंवेदनशील (माज, मस्ती असे शब्द वापरणारे) असणार्यांसाठी खास आजचा एक लेख
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/kisan-log-urban-insensitivity-worsens-farm-
pain/articleshow/63292366.cms
पुर्ण लेख वाचायचा कंटाळा आला असल्यास फक्त पहीला काही भाग (नीरोचे पाहुणे)आणि शेवट्चा भाग वाचावा (हस्तीदंती मनोर्यामधील लोकांसाठी)
लेख वाचला रे मराठी माणसा. पण शेतकर्यांवर जी परिस्थिती आली आहे त्याला जबाबदार कोण? शहरात राहणारे मध्यमवर्ग? खाजगी कंपन्यांत काम करणारे कर्मचारी? की गेल्या ६० वर्षापासून असणारी नियोजन शून्यता?सध्याच्या सरकारचे माहित नाही, पण आधीच्या सरकारांनी काय प्रयत्न केले होते, ह्यावर कोठेच चर्चा नाही..
आजचा हाही लेख वाचनीय . खास करुन "ह्या लोकांना सर्वच फुकट हवे" असे म्हणणांर्या साठी.
https://www.loksatta.com/mati-mansa-aani-maya-news/malnutrition-issue-in-india-raghuram-rajan-gap-between-middle-class-and-the-poor-1648866/
धागालेखक अकु नेहमीप्रमाणेच धागा टाकून गायबलेत आणि बाकीची मंडळी आपआपले नेहमीचेच अजेंडे राबवून धाग्याचा टि.आर.पी. वाढवत आहेत, हे पाहून मणोरंजन झाले.
बाकी अकुनी याखेपेला एक ओळी धागा न टाकता, तीन ओळी खरडल्या याबध्दल त्यांचे हभिनंदन.
शेतकर्यांवर जी परिस्थिती आली आहे त्याला जबाबदार कोण? शहरात राहणारे मध्यमवर्ग? खाजगी कंपन्यांत काम करणारे कर्मचारी? की गेल्या ६० वर्षापासून असणारी नियोजन शून्यता?
माई शेतकऱ्यांचे हाल गेल्या ६० वर्ष्यातच सुरु झाले का ?
त्या आधीही शेतकऱ्यांचे हाल होतच होते की ....
त्यामुळे मागील फक्त ६० वारश्याच्या नावाने गळे काढण्याचा व्हाटसपी (आणि संस्कारी पाठशाळा प्रशिक्षित ) प्रकार करू नकोस गं ....
माई खास तुझ्याच साठी ...
1883 मध्ये महात्मा फुलेंनी लिहिलेले 'शेतकर्यांचा आसूड' हे पुस्तक. त्यात त्यांनी शेतकर्यांच्या अवस्थेचे केलेले विदारक चित्रण, त्यांच्या दुरवस्थेची केलेली कारणमीमांसा, त्यावर सुचविलेली उपाययोजना या सर्व बाबी आहेत.
या लेखसंग्रहात महात्मा फुले आपल्या साध्या परंतु निर्भिड भाषेत ब्राह्मणवाद आणि दलितांवर होणा-या जुलुमाविरुद्ध कडाडून हल्ला चढवतात. आपले विचार साधार स्पष्ट करताना ते बुद्धीप्रामाण्यवादाला कधीच सोडत नाहीत. या पुस्तकाच्या वाचकांनी हे लक्षात घेणे जरूर आहे की फुल्यांचा विरोध (आणि अत्यंत कडवा विरोध) फक्त ब्राह्मणवादाला, ब्राह्मणी काव्याला आणि जुलुमाला आहे, ब्राह्मणांना नाही. ब्राह्मणांच्या विधवांनी भावी अत्याचारांना भिऊन टाकून दिलेल्या बालकांसाठी फुल्यांनी अनाथालय काढले, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी काढलेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेत सर्व जातींना प्रवेश होता. भारतीय दलित चळवळ तसेच वर्णव्यवस्थेच्या अभ्यासकांसाठी हे लेख वाचणे अत्यंत आवश्यक व उपयुक्त आहे.
http://boltipustake.blogspot.in/2010/08/blog-post.html
शेतक-याचा आसूड
लेखक: महात्मा जोतीबा फुले
वाचक: माधवी गणपुले
(संपर्क: voiceofmadhavi@gmail.com)
पगला गजोधर,
तुमच्या मजकुरात मला तीन प्रश्न दिसतात. तिन्ही वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध नाही.
प्रश्न १. ब्राह्मणवाद :- असा कुठ्लावी वाद अस्तित्वात नाही.
प्रश्न २. दलितांवरील जुलूम :- याला ब्राह्मण थेट जबाबदार नाहीत.
प्रश्न ३. शेतकऱ्यांची हालत :- शेतकऱ्यांची हालत इंग्रज राजवटीमुळे खराब होती. दादाभाई नवरोजींनी आपल्या Poverty and un-British Rule या पुस्तकांत इंग्रजांच्या आर्थिक धोरणांचे वाभाडे काढले आहेत. हिचाही ब्राह्मणांशी थेट संबंध नाही.
ब्राह्मणावर चिखलफेक होऊ नये म्हणून हा प्रतिसाद दिला आहे.
आ.न.,
-गा.पै.
गा पै जी
चिखलफेक होणार नाही, कारण अनेक दशकांपूर्वीचे हे पुस्तक तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे वर्णन करते.
शेतकऱ्यांचे हाल हे आताचे (किंवा गेल्या ६०-७० वर्षांतील) नव्हेत तर अनेक शतकापासूनचे आहेत, असेच मला वरील प्रतिसादात उल्लेखित करायचे होते. शिवाय कुठल्या लिंकवरून मी मजकूर दिलाय त्याचा दुवाही जोडालाच आहे.
उत्तम शेती, मध्यम व्यापार , हे सग्ळं खोटं होतं?
=========================
भारताचा जागतिक व्यापार ३३% वरून १.५% वर आला त्या काळात, महाशय, जागतिक व्यापार वाढलाच नव्हता असं म्हणता येईल. याचा अर्थ ३३/१.५ = २२ पट वा २२००% भारताचा जीडीपी कमी झाला.
गरीबी आली सगळेच निगेटीव दिसू लागते, ती गत फुल्यांची झाली होती.
गजोधरा, अरे १५ वर्षात(९९ ते २०१४) काँग्रेस सरकारने असे कोणत्या उपाय योजना केल्या होत्या, ज्या सध्याच्या सरकारला जमत नाही आहेत? हे जाणून घेण्यात रस आहे. कोणत्याही पक्षाची बाजू घ्यायचा प्रश्न नाही. टी.व्ही.वर कर्जमाफी करा म्हणून काही नेते सांगत होते. मग कर्ज्माफी केली तर त्याचे अर्थव्यवस्थेवर (चांगले/वाईट)परिणाम ह्यावर चर्चा करायला हवी . ती कोणाकडूनच होताना दिसत नाही.
@पगला गजोधर साहेबः
शेतकर्याचा आसूडचा दुवा दिल्याबद्दल आभार. सध्या मला डोळ्यांच्या त्रासामुळे वाचन्/मिपा अगदी मर्यादित करणे भाग पडत आहे, त्यामुळे आसुडाच्या १२ प्रकरणांपैकी मराठी काव्याबद्दल नेमक्या कोणत्या प्रकरणात लिहीले आहे, हे कळवल्यास फार सोयीचे होईल.
फुल्यांचा 'ब्राम्हणी काव्या'ला (म्हणजे मोरोपंत, वामन पंडित, रघुनाथ पंडित वगैरे का?) विरोध का होता, हे वाचायला आवडेल.
डोळ्यांचा त्रास आपणांस आहे याबद्दल खेद वाटतो,
परंतु डोळ्यांचा त्रास असूनही, आपण हा लेखं वाचून, त्यांवरील प्रतिक्रिया वाचून, पुढे प्रतिक्रिया देण्याचे श्रम घेतलें, म्हणून
.
फुल्यांचा 'ब्राम्हणी काव्या'ला विरोध (म्हणजे मोरोपंत, वामन पंडित, रघुनाथ पंडित वगैरेना अजिबात नसून) , तो नक्की कशाला आहे, हे वाचण्यासाठी सदर लिंक दिलेली आहे.
माझ्या वरील प्रतिक्रियेतून, मी या धाग्यावर अकस्मात हुक्की येवोन, मराठी काव्यविषयावर भाष्य करू इच्छित आहे, असा आपला समज झाल्याबद्दल सुद्धा खेद आहे.
या पुस्तकात ब्राह्मणद्वेष्टे फुले भारतीय कॅलेंडर मेंटेन करायच्या कामालाही शिव्या घालतात, अपशब्द वापरतात. धन्य आहेत.
====================
तरीच म्हटलं विवेकी, पुरोगामी लोकांचा विवेक कोणत्या स्रोतानं वाहवत जातो.
संपूर्ण पुस्तकात वाक्यावाक्यात ब्राह्मणद्वेष ओतप्रोत भरलेला आहे. पुस्तकात सरासरी प्रत्येक पानावर किमान ४ वेळा ब्राह्मण हा शब्द येतो. त्या काळात सर्वच जाती अस्पृश्यता पाळत होत्या. त्यात ब्राह्मण जेमतेम ३-४ टक्के असतील. अस्पृश्यता पाळणारी सर्वाधिक मोठी जात मराठा. अस्पृश्यता पाळणार्या माळी जातीची संख्या सुद्धा ब्राह्मणांपेक्षा जास्त होती. त्यामुळे पुस्तकात "ब्राह्मणवाद", "ब्राह्मणी कावा" असले शब्द वापरण्याऐवजी "मराठावाद किंवा माळीवाद", "मराठा कावा किंवा माळी कावा" हे शब्द वस्तुस्थितीशी जास्त प्रामाणिक ठरले असते. परंतु मुळातच ब्राह्मणांचा द्वेष करायचा असल्याने वाक्यावाक्यातून ब्राह्मणांना शिव्या हासडलेल्या आहेत.
पुस्तकाचे नाव "शेतकर्यांचा आसूड". नावावरून पुस्तक शेतकर्यांविषयी असणार असे वाटले होते. परंतु संपूर्ण पुस्तकात शेती, शेतकर्यांच्या समस्या, त्यावर उपाय इ. वर लिहिण्याऐवजी ब्राह्मणांना झोडपून काढले आहे.
पुस्तकातील काही वाक्ये -
- आर्य ब्राह्मण मूळचे इराणचे
- त्यावर काही काळ लोटल्यानंतर हजरत महंमद पैगंबराचे जहामर्द शिपाई आर्य भटांचे कृत्रिम धर्मासहीत सोरटी सोमनाथासारख्या मूर्तीचा तरवारीने विध्वंस करून शूद्र शेतकर्यांस आर्यांच्या या कपटातून मुक्त करू लागल्यामुळे, भट ब्राह्मणांमधील मुकुंदराज व ज्ञानोबांनी भागवतबखरीतील काही कल्पित भाग उचलून त्यांचे प्राकृत भाषेत विवेकसिंधु व ज्ञानेश्वरी या नावाचे डावपेची ग्रंथ करून शेतकर्यांची मने इतकी भ्रमिष्ट केली की ते कुराणासहीत महंमदी लोकांस नीच मानून त्यांचा उलटा द्वेष करू लागले. नंतर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम या नावाचा साधु शेतकर्यांमध्ये निर्माण झाला. तो शेतकर्यांस त्यांच्या पाशातून सोडवील या भयास्तव ब्राह्मणातील अट्टल वेदांती रामदास स्वामींनी महाधूर्त गागाभट्टाचे संगनमताने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्टल ठरवून अज्ञानी शिवाजीचा व निस्पॄह तुकारामबोवांचा स्नेहभाव वाढून दिला नाही.
(वरील उतारा एखाद्या ब्रिगेडी पुस्तकातील वाटेल. या उतार्यानुसार शिवाजी महाराज हे अक्षरशून्य व अज्ञानी आणि ते रामदास स्वामी व महाधूर्त गागाभट्टांच्या काव्याला बळी पडले. मुळात तुकाराम महाराज गेले ते १६४९ मध्ये. गागाभट्ट व शिवाजी महाराजांचा संबंध आला तो १६७४ मध्ये. एकीकडे ब्रिगेडी म्हणतात रामदास स्वामी व शिवाजी महाराजांची कधीही भेट झाली नव्हती, तर हे म्हणतात की १६४९ मध्ये देहावसान झालेल्या तुकाराम महाराजांना महाराजांपासून दूर ठेवण्यासाठी रामदास स्वामी व गागाभट्टांनीच कारस्थान केले. निदान महाराजांचे कान भरताना तरी रामदास स्वामी व महाराजांच्या अनेक भेटी झाल्या असतील ना. )
फक्त २ उदाहरणे दिली आहेत. प्रत्यक्षात या पुस्तकात प्रत्येक वाक्यात ब्राह्मणांविषयीचा जळफळाट ठासून भरलेला आहे व पुस्तकाचे नाव शेतकर्यांचा आसूड असे असले तरी त्यात शेतीबद्दल चकार शब्द नाही.
-
,
अहो कितीवेळा जगाला मूर्ख म्हणणार ?
तुम्ही मागेच डिक्लेअर केलाय नं ?
जगात तुम्हालाच एकट्याला अक्कल आहे
मी मानतो की
तुम्ही जन्मजात ज्ञानवंत , तुम्ही कधी कुठे कधी काय शिकायलाच गेला नाही,
तुमचे सर्व ब्रम्हज्ञान उपजतच ...
तुम्ही तुमच्याच मातापित्यांना आपल्या ज्ञानसामर्थ्यावर जन्म दिला.
हा प्रतिसाद वाचेपर्यंत आपल्या विरोधी विचारसरणीचे जे अनेक लोक आहेत त्यांपैकी कित्येकांना आपल्यासारखीच अक्कल असू शकते असे वाटायचे. आता तो ही स्कोप तुम्ही काढून टाकलात. प्रत्येक गोष्टीचा अभिप्रेत नसलेला अर्थ घेण्याची हातोटी महान गोष्ट आहे. मनःशांतीसाठी आवश्यक असलेले असले सारे अवगुण शिकवणार्या शाळेचे नाव आम्हालाही सांगा.
=====================================
तुम्ही तुमच्याच मातापित्यांना आपल्या ज्ञानसामर्थ्यावर जन्म दिला.
तुमच्या धुरीणांनी स्वतःचे कोणते सामर्थ्यही न वापरता अनस्तित्वातून अखिड ब्रह्मांडास जन्म दिला आहे असे तुम्हांस वाटते. अशा नरश्रेष्ठांसमोर आमचा काय पाड?
यातले वाळवेकर मराठा आणि गोवंडे कोण याची कल्पना नाही. शेकापचे जेधे कट्टर ब्राह्मणद्वेष्टे असूनसुद्धा काकासाहेब गाडगीळ त्यांचे सहकारी होते, तसेच आढाव-वैद्य ही जोडी माहिती असेलच.
तुमच्यामते जर वरील लोकं जर ब्राम्हणविरोधी मग ,
कदाचित
तुमच्यामते ब्राम्हण सपोर्टिव्ह लोकं म्हणजे
"तत्कालीन घरातील, तरुण अबला (ब्राम्हण) नवविधवेवर, कुटुंबांतर्गत वारंवार बलात्कार करणारे,
व त्यातून कधी ती गरोदर राहिली तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारे, लिंगपिसाट वासनांध
व अश्या नाराधमांना पाठीशी घालणारे कुटुंबीय नातेवाईक गोतावळा"
असावा.
तो जो जेधे आहे तो मराठा आहे आणि तो आंबेडकरांना म्हणाला होता चवदार तळ्याच्या चळवळीसाठी हजारो लोक देईन, एका अटीवर तिथे एकही ब्राह्मण दिसता कामा नये मग तो भले ही तळ्यावर दलितांचा पाण्याचा हक्क मान्य करणारा का असेना.
=============
याला सुस्पष्ट ब्राह्मणद्वेष्टाच म्हणत असावेत.
तो जो जेधे आहे तो मराठा आहे आणि तो आंबेडकरांना म्हणाला होता चवदार तळ्याच्या चळवळीसाठी हजारो लोक देईन, एका अटीवर तिथे एकही ब्राह्मण दिसता कामा नये मग तो भले ही तळ्यावर दलितांचा पाण्याचा हक्क मान्य करणारा का असेना.
Dr. Ambedkar: Life and Mission - Page 89 - Google Books Result
https://books.google.co.in/books?isbn=8171542379
Dhananjay Keer - 1995 - India
The non-Brahmin leaders of Maharashtra, Javalkar and Jedhe, declared their whole-hearted support for the proposed struggle on condition that all the Brahmins should be weeded out from it, that the struggle should be non-violent and that it should be staged on a mass scale after convening a conference at Mahad in this ...
१०-१२ वर्षांपूर्वी शिवधर्म नावाचं एक ब्रिगेडी फ्याड आलं होतं. ब्राह्मणांच्या प्रगतीमुळे जळफळाट होणा-या काही फ्यासिस्ट ब्रिगेडींनी हे फ्याड काढलं होतं. त्या शिवधर्मात म्हणे ब्राह्मण सोडून इतर सर्वांना प्रवेश घ्यायची परवानगी होती. या दुस्वासाचं मूळ वरील उता-यामुळे समजलं.
ब्राम्हण सपोर्टिव्ह लोकं म्हणजे
"तत्कालीन घरातील, तरुण अबला (ब्राम्हण) नवविधवेवर, कुटुंबांतर्गत वारंवार बलात्कार करणारे,
व त्यातून कधी ती गरोदर राहिली तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारे, लिंगपिसाट वासनांध
व अश्या नाराधमांना पाठीशी घालणारे कुटुंबीय नातेवाईक गोतावळा"
हे कोणी सांगितले/ठरवलं?
कदाचित तुमच्यामते
ब्राम्हण सपोर्टिव्ह लोकं म्हणजे
"तत्कालीन घरातील, तरुण अबला (ब्राम्हण) नवविधवेवर, कुटुंबांतर्गत वारंवार बलात्कार करणारे,
व त्यातून कधी ती गरोदर राहिली तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारे, लिंगपिसाट वासनांध
व अश्या नाराधमांना पाठीशी घालणारे कुटुंबीय नातेवाईक गोतावळा"
असावा.
.
मूळ प्रतिसादातील हायलाईट केलेले शब्द वगळून, तुम्ही दिशाभूल करू इच्छित आहात कदाचित.
मग तुमच्यामते...
""तत्कालीन घरातील, तरुण अबला (ब्राम्हण) नवविधवेवर, कुटुंबांतर्गत वारंवार बलात्कार करणारे,
व त्यातून कधी ती गरोदर राहिली तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारे, लिंगपिसाट वासनांध
व अश्या नाराधमांना पाठीशी घालणारे कुटुंबीय नातेवाईक गोतावळा""
.
हे ब्राम्हण-विरोधक होते का ?
प्रतिक्रिया
आपण जगलो तरच शेतकरी जगेल.
अरेरे
शेतकर्यांच्या आंदोलना बाबत
लेख
>>> शेतकर्यांवर जी परिस्थिती
छान
दु आयडी?
आजचा हाही लेख वाचनीय . खास
धागालेखक अकु नेहमीप्रमाणेच धागा टाकून गायबलेत
शेतकर्यांवर जी परिस्थिती आली
माई खास तुझ्याच साठी ...
तिन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत.
गा पै जी
उत्तम शेती, मध्यम व्यापार ,
बरोबर
कर्ज्माफी केली तर त्याचे
ब्राम्हणी काव्य
..., हे वाचायला आवडेल.
शेतकर्याचा आसूड
LLRC
:कपालहस्तमुद्रा:
फुल्यांचा 'ब्राम्हणी काव्या
या पुस्तकात ब्राह्मणद्वेष्टे
संपूर्ण पुस्तकात
टिळकांचे मत
https://www.google.co.in/amp
आर्य द्रविड या
अहो कितीवेळा जगाला मूर्ख
हा प्रतिसाद वाचेपर्यंत आपल्या
पान क्र ४शालेय शिक्षण चालू
यातले वाळवेकर मराठा आणि
मग तुमच्यामते हि सगळी मंडळी
हो
तुमच्यामते जर वरील लोकं जर
>>> तुमच्यामते ब्राम्हण
तुम्ही उत्तर दिले नाहीत , की
जग फक्त ब्राह्मण विरोधक किंवा
तो जो जेधे आहे तो मराठा आहे
तो जो जेधे आहे तो मराठा आहे
Dr. Ambedkar: Life and
१०-१२ वर्षांपूर्वी शिवधर्म
संदर्भासाठी धन्यवाद ..
ब्राम्हण सपोर्टिव्ह लोकं
कदाचित तुमच्यामते
माझे असे विकृत/ब्रिगेडी मत
मग तुमच्यामते...
अजूनही ब्रिगेडीगिरी सुरूच
गुरुजी, कधी कधी तुम्हाला
प्रश्न काल्पनिक आहे.
गुरुजी, तुमच्या काल्पनिक
Pagination