Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २५

लेखक गामा पैलवान यांनी रविवार, 11/03/2018 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274 याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले? याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/ मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं. एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन. जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही. आ.न., -गा.पै.

वाचने 51422
प्रतिक्रिया 265

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

जरा मोर्च्या बद्दल सगळ्या बातम्या बघितल्या तरी कळेल कि हे आलेले नक्कि कोण आहेत, बहुसंख्यांच्या मागण्या किती साध्या आहेत. उगाच फोटो मधे एखादा फोन दिसला, टाय दिसली तर बोंब मारायची. उन्हातानात चालणारे अनवाणी पाय नाही दिसले, त्या पायांना पडलेल्या भेगा नाही दिसल्या. तुमच्यासारख्या समर्थकांमुळे सरकार बदनाम होतंय, तुम्ही लोकांनी अशा बाबतीत आपली तोंडं बंद ठेवली तरी सरकारवर उपकार होतील. ---------------------------------- फडणवीस सरकारने परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी फक्त आयत्या मोर्च्यावर आपला फायदा उचलायला बघत होते, ते पण जेव्हा मोर्चा मुंबईत आला तेव्हा. त्याआधी झोपलेले. मोर्च्या, आंदोलनांचे प्रमाण ह्या सरकारच्या काळात वाढलंय, कारण हे सरकार काहीतरी करेल असं वाटतंय लोकांना. एकही आंदोलन असं दिसलं नाही के जे ह्या सरकारमुळे झालंय, आधीचे प्रश्नच सोडवताहेत फडणवीस.

In reply to by शलभ

मुळात हा मोर्चा त्याच मागच्यावेळी संप आंदोलन केलेल्या शेतकरयांचा त्याच मागण्यासाठी परत काढलेला मोर्चा आहे हे दाखविण्याची केविलवाणी धडपड चालली आहे. आणि त्यामुळेच कर्जमाफी फसवी होती वगैरे मुद्दे पुढे ढकलायचा प्रयत्न दिसतोय. -------------------------------------------- वर्तमानपत्रे वाचून मला जे समजले ते असे कि या मोर्च्यातील बहुतांशी शेतकरी हे आदिवासी शेतकरी आहेत आणि त्यांची मुख्य मागणी ते कसत असलेल्या वनजमिनी त्यांच्या नावावर कराव्यात अशी आहे. जे आदिवासी जमले ते या मुख्य मागणीसाठी असे मला वाटते. बाकी सिपीआयच्या झेंड्याखाली हा मोर्चा काढल्याने याला राजकीय रंग लागला नसता तरच नवल होते. हा राजकीय मोर्चा नाही म्हणणे अजिबात योग्य वाटत नाही. जर एक सामान्य निरपेक्ष शेतकरी मोर्चा रास्त मागण्यांसाठी काढायचा असेल तर त्यांनी राजकीय पक्षांपासून निराळे राहायलाच हवे (जसे मागच्या वेळी संपाच्या बहुतांश काळ झाले). ------------------------------------------- राज्यातील शेतकरी इतका हवालदिल झाला आहे का कि इथले शेतकरी माकप वगैरे लोकांचा आधार घेऊन मोर्चे काढतील आणि इथले मुख्य विरोधी पक्ष, शेतकऱ्यांचे कैवारी वगैरे मोर्चा मुंबईत आल्यावर त्यांच्या स्वागताला जाऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणण्यापुरतेच राहतील? यापुढची निवडणूक भाजप वि. माकप अशी समजावी का असा एक प्रश्न उगाच मनात डोकावून गेला.

In reply to by बिटाकाका

मशीद पाडणे , मंदिर बांधणे , कसायाला ठेचणे हे करायला राजकीय पक्ष पुढे सरसावले तर कौतुक होते. शेतकरी आण्दोलनाला कुणी भाकरी पुरवली तर लगेच चौकश्या सुरु - शेतकरी अन ह्या पक्षाचा काय संबंध ? ह्याना राजकीय फायदा हवा आहे का ? किती लोक अन किती भाकरी लागल्या ? किती खर्च आला ?

In reply to by श्रीगुरुजी

शेतकरी दरिद्री आहे , याचे क्रेडिट काँग्रेसला द्यायचे . तळागाळात मोबाइल व सौर पॅनेल पोचले याचे क्रेडिट मोदीना द्यायचे. भक्तलोकहो , बरोबर ना ?

In reply to by श्रीगुरुजी

आमच्या गरीब पेशंटची आम्ही NGO ना यादी देतो , त्याना मदत मिळावी म्हणून. .. ते home visit करतात आणि नंतर रिमार्क टाकतात .. घरात फ्रीज आहे , गरीब नाही. घरात टी व्ही आहे , गरीब नाही. घर ४०० फुटाचे आहे , गरीब नाही. लाइट बिल ८०० रु येते , गरीब नाही. दुधाचा चहा दिला , गरीब नाही . शेवटी ते कुणालाच मदत देत नाहीत. यादी तशीच. ( घरातल्या त्या वस्तू जेंव्हा कर्ता पुरुष धडधाकट होता , तेंव्हाच्या असतात , आता तो सिरियस आहे किंवा कैलासवासी झाला आहे , तर केवळ त्या वस्तूंच्या दर्शनाने family ची आर्थिक कंडिशन समजेल काय ? )

In reply to by श्रीगुरुजी

किती इंची स्क्रीन असलेला मोबाईल गरिबी रेषेच्या वरती/खाली असणे/नसणे डिफाईन करत असावा असे आपल्याला वाटते श्रीगुरुजी?

In reply to by जेम्स वांड

जेमतेम ५-६ हजार मिळविणारे कंठपट्टीवाले कर्जमाफी, फुकट वीज, नुकसान भरपाई इ. ची सातत्गणीयाने केल्याचे ऐकिवात नाही.

In reply to by आनन्दा

तो आयटिआय चा कोर्स करतोय. मशिन तयार करणार आहे. ईकडुन बटाटा टाकायचा तिकडुन सोने बाहेर. पुण्यनगरीमध्ये सोनारांनि बटाटाच्या गोदामे भरुन घ्यायला सुरुवात केलिय. २०१९ नंतर बटाट्याचे सोने होणार।

एकीकडे स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी करतात तर दुसरीकडे सातत्याने कर्जमाफी मागतात. परंतु कर्जमाफी हा उपाय नाही असे स्वामीनाथन् म्हणतात.

मोर्चासाठी लाखोंचे फंडींग करणाऱ्यांना काही अनवाणी लोकांना साध्या चपला नाही पुरवता आल्या? की हा मोर्चा पायी असणार आहे हे त्यांना माहितीच नव्हतं? पण लाल टोप्या पुरवण्याऐवजी चपला पुरवल्या असत्या तर असे फोटो दाखवून त्याचं राजकीय भांडवल कसं करता आलं असतं ना.

In reply to by श्वेता व्यास

चपलांऐवजी लाल टोप्या आणि लाल झेंडे पुरवून स्वपक्शाची जाहिरात करणे जास्त सोपे होते.

In reply to by श्रीगुरुजी

सहमत. चपला पुरवल्या असत्या तर त्यात काही राजकीय लाभ नाही ना. मग ज्यांचा इतका कळवळा आला आहे त्यांचे हाल होईनात का .

In reply to by श्वेता व्यास

बाजीरावाची शेंडी अहमदशहा अब्दालीला नाही लावली तर मजा कशी येणार? हवेत गोळ्या मारायच्या आणि विचारले कि उत्तर नाही द्यायचे हा मोडस ऑपरेंडी दिसतोय. -------------------------------------------- बाकी एवढा नकारात्मक प्रचार करून, मोर्चे वगैरे काढून हाताशी काही लागत नाही म्हटल्यावर काय चडफडाट होत असेल नाही?

In reply to by manguu@mail.com

रथयात्रेतले लोक मुलायम सिंगाला नैवेद्याचे पैशे मागायला गेले होते हे नविनच ऐकलं. =============== मंजे त्यांना पैसे पुरवलेच असणार हे तुमचं म्हणनं मान्य केलं तरी ते "मागायला" गेले नव्हते.

In reply to by श्वेता व्यास

चप्पल घालून पायाला फोड येत नाहीत का ? मोर्चासाठी लाखोंचे फंडींग करणाऱ्यांना ?? याबद्द्लचे पुरावे द्या . उचलला हात , काढला आयडी आणि लागले पो टाकयला !

In reply to by कपिलमुनी

इतकं कळतं तर पायाला फोड येईस्तोवर चालू नये, तेही स्वत:चं नुकसान करून दुसऱ्याच्या राजकीय फायद्यासाठी. आयडी काढण्यापूर्वी किंवा पो टाकण्यापूर्वी तुमची परवानगी घ्यावी लागते का? स्वारी मला माहिती नव्हतं

In reply to by कपिलमुनी

कॉमन सेन्सला पुराव्याची गरज नसावी. फंडिंग नसते तर टोप्या चालताना आकाशातून डोक्यावर येऊन पडल्या आणि झेंडे जमिनीतून उगवून हातात आले का? तेवढा कॉमन सेन्स नसेल तर मी तुम्हास पुरावे देण्यास बांधील नाही.

In reply to by कपिलमुनी

फोडांचं काय घेऊन बसलात. अगदी ऐश करत प्रचंड सुखाचं जीवन जगताना देखील नको नको तिथे फोड येतच असतात. ================ प्रश्न असा आहे कि शक्य तितके शारीरिक त्रास कमी करायचा तर बरं असतं. दूरून चालत येणंच मोप आहे, वर मुद्दाम बिनाचपलेचं येणं वा ती मिळत असताना न घेणं, वा तोच मुद्दा बनवायचा म्हणून त्रास करून घेणं एका माईल्ड आत्महत्येसारखं आहे. =================== खर्च झालाय हे तर खरं आहे. तुम्ही देव मानत नाही तेव्हा ईश्वरानं तर फंडिंग केलेलं नसणार.

In reply to by श्वेता व्यास

मुंबईत आलेल्या फाटक्या माणसांच्या मोर्चाला झेंडे, टोप्या ,जेवण खाण ह्यासाठी “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ अस म्हणून बरेच काळजीवाहू लोक काळजीने डोक खाजवून त्यांचे प्रश्न सगळ्या रंध्रातून बदबदा वाहू राहिलेत. तर “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ ह्या लाखमोलाच्या सवालासाठी आणि शेतकरी मोर्चाच्या खर्चाच पोस्टमार्टेम करणाऱ्या ह्या काळजीवाहू लोकांच्या मेंदूला अजून खाद्य पुरवायला कोरी करकरीत प्रश्नमंजुषा. पोस्टमार्टेम क्रमांक एक दिल्लीत भाजपने नुकतच नव ऑफिस बांधल. भाजपने हे ऑफिस १७०००० वर्गफूट जमिनीवर बांधलेलं आहे.तिथल्या सुविधा आणि बांधकामाचा दर्जा ह्यावरून सहजच किंमत काढता येईल. भाजपला २०१६-१७ मध्ये कॉर्पोरेट देणग्या २९० कोटीच्या मिळाल्यात.सत्तेवर नसतानाही एवढ्याच देणग्या मिळत असतील अस गृहीत धरल आणि देशभरात होणाऱ्या पक्षीय निवडणुकाचा खर्च ह्याच निधीतून भागवला जात असेल अस गृहीत धरल तर दरवर्षी उरणारी श्रीशिल्लक नेमकी किती आणि ह्या नव्या ऑफिसच्या बांधकामाला खर्च किती आला ह्याच गणित मांडल तर “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ हा प्रश्न तिकडेही विचारायला पाहिजे. पोस्टमार्टेम क्रमांक दोन भाजपची मातृपितृ का काय म्हणतात अशी संघटना म्हणजे संघ. संघाची नोंदणी भारतातल्या कुठल्या कायद्याने झालेली आहे.१५ ऑगस्ट १९४७ पूर्वी काहीही असल तर त्यानंतर देशातल्या सगळ्या स्वयंसेवी संस्थांनी नव्या भारतीय कायद्यांनी आपापली नोंदणी केलेली असावी तशी संघाची नोंदणी कुठल्या कायद्याने झालेली आहे ? संघाला मिळणाऱ्या देणग्या नेमक्या कुठल्या कायद्याने स्विकारल्या जातात ? आता विचारा , “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ पोस्टमार्टेम क्रमांक तीन विवेकानंद फौंडेशन नावाची अजित डोभाल ( तेच ते गावठी जेम्स बॉंड ) ह्यांची संस्था अण्णांच्या आंदोलनात सक्रीय होती,तेच आंदोलन ज्यामुळे कॉंग्रेसला वेगवेगळे आरोप करून, लोकपालाचा बागुलबुवा उभारून सत्तेवरून खाली खेचल त्या आंदोलनात लोकांनी किती आणि कसा खर्च केला ? विवेकानंद फौंडेशन ला देणग्या कुठून मिळाल्यात ? आता विचारा , “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ पोस्टमार्टेम क्रमांक चार मार्च महिन्यात फक्त दहा दिवस ठराविक बँकामधून इलेक्ट्रोरल बॉंड ची विक्री सरकार करणार होत ज्याद्वारे राजकीय पक्षांना देणग्या मिळणार होत्या. शौचालय बांधण्यापासून मर्तिकाच्या सामानापर्यंत आणि जन्मापासून माणूस सरणावर चढवेपर्यंत सगळ्या ठिकाणी आधारकार्डाची सक्ती करणार सरकार ह्या बॉंडच्या खरेदीला आधार कार्ड सक्तीच नाही म्हणतय ते का बुवा ? आता विचारा , “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ आता “ हे त्यांना का विचारत नाही “ छाप प्रश्न घेऊन येणाऱ्या लोकांसाठी. शेतकरी मोर्चाला पैसे कुठून आलेत ह्याची चिरफाड करणारी लोक सरकार समर्थक असण आणि विशिष्ट राजकीय पक्ष-विचारसरणी ह्यांच्याशी संबंधित असण हा योगायोग आहे अस आम्ही समजतोय. म्हणूनच वरच सगळ पोस्टमार्टेम करायला घेतलेले पेशंट एकाच विचारसरणीशी संबंधित आहेत हाही योगायोग समजावा. आता विचारा, “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “

In reply to by चिर्कुट

>>> श्रीशिल्लक नेमकी किती आणि ह्या नव्या ऑफिसच्या बांधकामाला खर्च किती आला ह्याच गणित मांडल तर “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ हा प्रश्न तिकडेही विचारायला पाहिजे. गरज नाही. ते बांधकामाचा खर्च सरकारने द्यावा अशी मागणी करून आंदोलने करीत नाहीत. >>> संघाची नोंदणी भारतातल्या कुठल्या कायद्याने झालेली आहे.१५ ऑगस्ट १९४७ पूर्वी काहीही असल तर त्यानंतर देशातल्या सगळ्या स्वयंसेवी संस्थांनी नव्या भारतीय कायद्यांनी आपापली नोंदणी केलेली असावी तशी संघाची नोंदणी कुठल्या कायद्याने झालेली आहे ? RSS is already a registered organisation with registration number 08-D 0018394. The digit code of registration is 94910. The registration has been issued under section 1860 of Indian Government and Society Registration Law 1950. https://www.google.co.in/amp/s/www.nagpurtoday.in/revealed-rss-is-alrea… >>> विवेकानंद फौंडेशन ला देणग्या कुठून मिळाल्यात ? विवेकानंद फौंडेशनला देणग्या मिळाल्यात हे कोठून समजले? >>> मार्च महिन्यात फक्त दहा दिवस ठराविक बँकामधून इलेक्ट्रोरल बॉंड ची विक्री सरकार करणार होत ज्याद्वारे राजकीय पक्षांना देणग्या मिळणार होत्या. झाली का विक्री सुरू? >>> आता विचारा, “ यवडे पैशे कुठून आले ब्वा “ तेच परत विचारतो. चपलांना पैसे नाहीत, कर्ज परतफेडीला पैसे नाहीत, वापरलेल्या स्वस्त विजेचे बिल भरायला पैसे नाहीत . . . पण मग ३०-४० हजार टोप्या, ३०-४० हजार झेंडे, मोठ्या पडद्याचा चतुर भ्रमणध्वनी, कंठपट्टी इ. साठी "यवडे पैशे कुठून आले ब्वा"?

>>छत्तीसगड: नक्षलवाद्यांचा हल्ला; ९ जवान शहीद दहशतवाद्या विरोधात राबवतात तशी मोहिम नक्षलवाद्यांचा विरोधात राबवायला हवी.

In reply to by कपिलमुनी

अहो, किती सोहराबुद्दीन टाईपच्या केसेस अमित शहा नि मोदी एका आयुष्यात झेलू शकतात? कुणाला काही हात लावला तर बोंबलायला इतके डावे आहेत कि कुणाला हात न लावणंच योग्य होईल. ========================= काल एका काँग्रेसच्या उमेदावारानं ३.३० वाजता दिल्लित मिळालेलं प्रमाणपत्र निर्वाचन आयोगाला गुजरातेत त्याच दिवशी ३.०० वाजता दिलं!!!!! हे टाईम ट्रॅव्हल कसं काय शक्य आहे म्हणून चर्चा चालू होती. काँग्रेसच्या प्रतिनिधिला खोटारडेपणा केल्याचा काही गम नव्हता. आमची चोरी तुम्ही पकडू शकला नाहीत (प्रमाणपत्र दिलंच कसं आणि घेतलंच कसं) हाच तुमचा खोटारडेपणा असं काहीतरी तो बरळत होता. ================= काश्मिरमधल्या हत्यांपेक्षा नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्या कितीतरी पट आहेत इतकी मूलभूत माहीत भारतातल्या लोकांना नाही. डाव्यांच्या प्राणप्रिय अशा नक्षल्यांना कोणीही हात लावू आणि स्वतःवर खटले दाखल करून घेऊ नये.

फडणविसांनी पुन्हा एकदा अत्यंत प्रगल्भतेने शेतकरी मोर्चा शांतपणे हाताळून बंडोबांचा थंडोबा केला व फडणवीस सरकार घालविण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या व फक्त आपणच शेतकर्‍यांचे कैवारी आहोत असे दाखवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार्‍या सर्व पक्षांच्या हातात वाटाण्याच्या अक्षता दिल्या. मागील ३-४ वर्षात फडणविसांना अडचणीत आणण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील निर्भया प्रकरणाचे निमित्त करून मराठ्यांना राखीव जागांसाठी सर्व जिल्ह्यातून मोर्चे काढण्यात येऊन फडणविसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. परंतु फडणविसांनी सर्व मागण्यांना पाठिंबा देऊन मोर्चेकर्‍यांचे छुपे हेतू हाणून पाडले. शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावा म्हणून सातत्याने शिवसेनेला डिवचले जात आहे. परंतु पाठिंबा काढण्याची सेनेच्या पार्श्वभागात हिंमत नाही हे फडणवीस चांगलेच ओळखून आहेत व त्यामुळे ते सेनेच्या दबावाला अजिबात भीक घालत नाहीत. २०१५ मध्ये अवर्षणाचे व डाळींच्या भावाचे निमित्त करून फडणविसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. तोही फोल ठरला. मागील वर्षी कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांच्या संपाचे निमित्त करून जनतेला वेठीस धरून नासधूस करण्यात आली. ते आंदोलन सुद्धा फडणविसांनी शांतपणे हाताळले. कर्जमाफीची योजना जाहीर करून त्यातून धनदांडग्यांना व लबाड कर्जदारांना बाजूला ठेवल्यामुळे आंदोलनाचे निमित्त करून कर्ज बुडविणार्‍यांना चाप लागला. नंतर भीमा-कोरेगावचे निमित्त करून महाराष्ट्रात जातीय तणाव पेटविण्याचे जोरदार प्रयत्न झाले. ते प्रयत्न सुद्धा फोल ठरले. काही महिन्यांपूर्वी अडगळीत पडलेल्या यशवंत सिन्हांनी महाराष्ट्रात येऊन शेतकर्‍यांना पेटविण्याचा प्रयत्न केला. फडणविसांनी प्रगल्भतेने त्यांचाही थंडोबा केला. आता या शेतकरी मोर्चाच्या निमित्ताने भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी मोर्चाला पाठिंबा देऊन आपली राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न केला. फडणविसांनी तो प्रयत्नसुद्धा फोल ठरविला. जर या प्रकरणाचे श्रेय कोणाला मिळणार असेल तर ते मोर्चा आयोजित करणार्‍या उजव्या कम्युनिस्ट पक्षाला व भाजपलाच जाईल. आशाळभूतपणे वाट पहात असलेल्या इतर सर्व पक्षांना याचे कणभरही श्रेय मिळणार नाही. उजवा कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या मृतवत असल्याने त्यांना याचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे अंतिमतः भाजपच लाभार्थी ठरेल. ठाकरे बंधू, , पवार (थोरली व दोन्ही धाकटी पाती), अशोक चव्हाण, विखे पाटील अशा अनेकांचे मनसुबे फडणविसांनी मागील ३-४ वर्षात आपल्या प्रगल्भतेने उधळून लावलेले आहेत व त्यांना हात चोळत बसावे लागले आहे. आपली राजकीय कारकीर्द फडणविसांच्या वयापेक्षाही मोठी असून आपल्याला अशी प्रगल्भता का दाखविता येत नाही याची खंत विशेषतः पवारांना नक्की वाटत असेल. चरफडत बसलेले विरोधी पक्ष पुढील एकदीड वर्षात महाराष्ट्रात जातीय दंगली भडकावण्याचे व पुन्हा एकदा शेतकर्‍यांना पेटविण्याचे जोरदार प्रयत्न करणार हे नक्की. परंतु त्यातून फडणवीस नक्की मार्ग काढतील याची खातरी आहे.

In reply to by विशुमित

तुमच्या साहेबांप्रमाणेच तुम्हीसुद्धा खजील होऊन ओशाळवाणे हसण्यापलिकडे दुसरे काहीही करू शकणार नाही.

In reply to by विशुमित

अहो असे हसू नका ओ आमच्या प्रगल्भ मुमंना... त्यांनी नदीच्या गाण्यात किती प्रगल्भ अभिनय केलाय पाहिलं नाही का? :)

In reply to by चिर्कुट

पपेट शो.. फ्रॅकली सांगतो मला फक्त मा. मंगुटीवारांचाच अभिनय आवडला. मा.मु. ना नाही जमले. अभिनय येत नसल्याने त्या विडियोसाठी काम नव्हते करायला पाहिजे होते असे माझे वैयक्तिक मत आहे.

त्या पब मारामारी प्रकरणातून ते श्रीराम सेनावाले सुटले म्हणे. ज्याचे विडिओ फुटेज आहेत अशा प्रकारांत असे होत असेल तर अजून काय बोलायचे? कसा व्हायचा न्याय? https://www.ndtv.com/india-news/mangalore-pub-attackers-let-off-despite…

In reply to by बिटाकाका

भांडारकर हल्ल्याची जाहीर कबुली देऊन सत्कार करून घेणारे जसे निर्दोष सुटले तसेच हे.

पुणे: माहिती आणि तंत्रज्ञाचे हब बनत चाललेल्या पुण्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सच्या उपस्थितीतच एका आजारी महिलेवर जादूटोणा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. संध्या गणेश सोनवणे या २४ वर्षीय महिलेची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना डॉ. सतीश चव्हाण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात करण्यात आले होते. परंतु तिथेही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे या महिलेच्या कुटुंबीयांनी एका मांत्रिकाला थेट रुग्णालयात बोलावून जादूटोणा केला. या मांत्रिकाने डॉक्टर आणि नर्सच्या समोरच मंत्र पुटपुटत महिलेच्या अंगावरून उतारा काढला. दरम्यान, आजार अधिकच बळावल्याने या महिलेचं निधन झालं आहे. जादूटोण्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.