साताऱ्याच्या वेढयात औरंगझेब - अजिंक्यताऱ्याची कहाणी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
१९ फेब्रुवारी या शासकीय शिवजयंतीच्या निमित्ताने आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझ्या संशोधनावर आधारित ही बातमी प्रसिद्ध होत आहे. पॅरिसच्या राष्ट्रीय संग्रहालयात मला मराठयांच्या इतिहासातील एक सुवर्णपान ज्याला म्हणता येईल अश्या साताऱ्याच्या वेढ्याचे चित्र सापडले. त्यावर पुढील संशोधन करताना आणि चित्राची सत्यता तपासताना यासंबंधीत जुनी माहिती सापडली. ही माहिती आणि ते चित्र एकत्रित स्वरूपात इथे इतिहासाच्या अभ्यासकांसाठी आणि इतिहासप्रेमी वाचकांसाठी इथे देत आहे. हा लेख मूळ स्वरूपात सोशल मीडियावर अथवा इतर कुठे शेअर करण्यास माझी काही हरकत नाही.
सर्व चित्रे (अनुल्लेखित) साभार Bibliothèque nationale de France यांच्याकडून. त्यांची परवानगी वापरासाठी आवश्यक आहे.
हे चित्र कर्नल जेंतील याच्या संग्रहात मिळाले. हा फ्रेंच सैनिक अवधचा नबाब शुजाउद्दोला याच्या पदरी मिलिटरी सल्लागार म्हणून होता. १७७८ साली त्याने फ्रान्सला परत जाताना सगळा संग्रह आपल्याबरोबर नेला. तो आता फ्रान्सच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे.
चित्रातला प्रसंग १४ एप्रिल १७०० या दिवशी घडला. त्यामुळे हे चित्र १७०० ते १७७८ या कालावधीत कधीतरी काढलेले आहे. औरंगझेबाने चित्रकला इस्लामला निषिद्ध मानली होती, त्यामुळे त्याच्या पदरी असलेले बादशाही चित्रकार दुसरीकडे आश्रयाला गेले. मोगल चित्रकलेला पुन्हा राजाश्रय लाभला तो मुहम्मद शाह रंगीला याच्या कारकिर्दीत १७१९ ते १७४८ ला वर्षात. त्यामुळे हे चित्र बहुदा त्या काळातले असायची जास्त शक्यता आहे. वेढ्याची जी हकीगत आहे त्यातले प्रसंग एकत्र जोडून हे चित्र काढलेले दिसते. हे चित्र त्यामुळे अनेक प्रसंग जोडून एकदम दाखवते. हे काही एखाद्या फोटोग्राफसारखे अस्सल प्रातिनिधिक सत्यचित्रण नाही.
या मोठ्या केलेल्या भागात आपल्याला बादशाह औरंगझेब हा 'तख्त-ए-रवा' (फारसी - म्हणजे चालते-फिरते सिंहासन) या पालखीसारख्याच पण वरून उघड्या वाहनात दिसतो. बादशाह हा नेहमी सार्वजनिक जागी आजूबाजूच्या गोंधळाकडे लक्ष न देता हातात कुराणाची एक प्रत घेऊन ती वाचत असे. त्याचे खास शाही भोई लाल रंगाचे कपडे घातलेले आहेत. बादशाही मानमरातब चिन्हे छत्र-चामर इत्यादी जवळपास आहेत. बादशाहच्या डोक्याभोवती नेहेमीप्रमाणे सोनेरी वलय (अरोरा) आहे. त्यावर फारसीत त्याचे नाव 'आलमगीर' آلمگیر असे लिहिलेले आहे. बादशाह हा पूर्ण वृद्ध झाला असून त्याची मानही म्हातारपणामुळे वाकलेली आहे.
शाहजादा आझम (विकिपीडियावरून साभार)
बादशाहच्या काळ्या ढालीवर असलेली खास व्यक्ती म्हणजे त्याचा मुलगा शाहजादा आझम. त्याचा या लढाईतील आणि किल्ल्याच्या नामकरणातील सहभाग आपण खाली नंतर बघणार आहोत. आझमचे वयही भरपूर दिसते आहे, त्याची दाढी जवळजवळ पांढरी झालेली आहे.
बाद्शाहसमोर हात पुढे घडी घालून उभी असलेली व्यक्ती म्हणजे बहुदा तर्बीयतखान. हा मोगलांचा 'मीर-अतिश' म्हणजे तोफखान्याचा मुख्य होता. याच्याच प्रयत्नाने किल्ल्याला सुरुंग लावला गेला. तोफा, त्यांचे दमदमे हे सगळे याने आपल्या तुकडीकरवी रचले. त्याने पूर्ण लोखंडी चिलखत घातले आहे आणि त्याची दोन मुले (अथवा दोन अनुयायी/सरदार) त्याच्या मागे उभी आहेत.
हीच व्यक्ती (बहुदा तर्बीयतखान) आपल्याला हल्ला करायला तयार असलेल्या घोडेस्वारात एका घोड्यावर स्वार दिसते. घोडेस्वारांच्या रांगा सुरुंगातून पडलेल्या खिंडारावर हल्ला करायला तयार आहेत. मोगली सैन्यातले वेगवेगळे मनसबदार, त्यांचे झेंडे, सजवलेले घोडे असा सगळं आपल्याला तपशिलात काढलेले दिसते. प्रत्यक्षात (आपण खाली पाहू) हा हल्ला पहाटेस अंधारात घडला आणि साताऱ्याच्या किल्ल्यात घोडेस्वारावरून हल्ला करणे शक्य नाही. त्यामुळे आपण हा भाग एक कल्पनाचित्र म्हणूनच पहायचा.
इथे आपल्याला किल्ल्यावर हल्ला करण्याऱ्या तोफा एकत्र आग ओकताना दिसतात. एका वर्षानंतर १७०१ मध्ये पन्हाळ्याच्या वेढ्यात हजार असलेल्या इंग्लिश राजदूत विल्यम नॉरीस (हा एक एक वेगळ्या लेखाचा विषय आहे) याने म्हणाले आहे की मोगल लोखंडी गोळ्याऐवजी बऱ्याचदा दगडाचे तुकडे तोफातून उडवीत. त्यामुळे तोफा लवकर खराब होत.
इथे आपल्याला किल्ल्यावरच्या बुरुजाला एक गोल छप्पर घातलेले दिसते. डेक्कन कॉलेजचे श्री. सचिन जोशी याना इतर चित्रातही ते सापडले आहे. त्यावरून सारे सांगता येते की त्या काळात पहारेकर्यांच्या सोयीसाठी (उन्हापावसात, रात्री अपरात्री गस्त घालताना) बुरुजावर आडोसा केलेला होता. सचिन जोशी यांचे अनुमान असे की तो लाकडाचा असल्यामुळे कधीच नष्ट झाला. त्याच्या खोबणी आपल्याला आजही कुठेकुठे किल्ल्यांवर सापडतात.
या भागात आपल्याला किल्याला सुरुंग उंडवल्यामुळे पडलेले खिंडार दिसते.
औरंगझेबाच्या दरबारात रोज घडलेली हकीगत फारसीत लिहून ठेवली जात असे . जयपूर इथे त्या हकीगतीतले काही सारांश मिळाले आहेत. ते लंडन आणि बिकानेर इथे सध्या आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळात त्याची कॉपी आहे. त्यांना 'अखबारात-ए-दरबार-ए-मुअल्ला' म्हणजे 'श्रेष्ठ दरबारची बातमीपत्रे' असे म्हणतात. दिनांक १४ एप्रिल १७०० या दिवसाखाली आपल्याला खालील नोंद अखबारात सापडते.
(मी श्री. सेतुमाधवराव पगडी यांनी 'मोगल दरबारची बातमीपत्रे खंड १' यात दिलेले मराठी भाषांतर वापरलेले आहे)
काल बादशहा शेख हिदायतकेश याला म्हणाले, "तुम्ही तरबियतखानाला आज रात्री सुरुंग उडविण्यासाठी हुकुम लिहा." त्याप्रमाणे तरबियतखानाला हुकुम पाठविण्यात आला. बादशहांनी मुखलिसखान, हमीदुद्दीनखानबहादुर, सियादतखान वगैरेंना पुढीलप्रमाणे आज्ञा केली - रात्रीचा एक प्रहर राहिला असता तुम्ही स्वतःची पथके घेऊन हल्ला करण्यासाठी म्हणून तरबियतखानाच्या मोर्च्यात जा.
दिवसाच्या चार घटिका झाल्या असता बादशहांना कळविण्यात आले ते असे : आज्ञेप्रमाणे तरबियतखान याने दोन्ही सुरुंग उडविले. किल्ल्याची भिंत किल्ल्याच्या आत पडली. पण बुरुजाचा वरील भाग, वीस दरआ (?) लांबी रुंदीचा उडून दमदुम्यावर पडला. पुढील माणसे ठार झाली :-- खास चौकीची माणसे, मरहूम दिलावरखानाची मुले सखीखान, बुदीखान, असदुद्दीन, मरहूम लोधीखान याचा मुलगा अहमद, मुहंमद जमान वगैरे काकड जमातीचे लोक, सटवाजी डफळे याचा मुलगा बुदीखान, हजारी पथकातील माणसे, बंदुकची, दक्षिण सुभ्यातील तैनात सैनिक. अशी एकंदरीत जवळजवळ एक हजार माणसे दगडांच्या उडण्यामुळे त्या माराने मारली गेली आहेत. गनीम (मराठे) हे बुरुजाच्या पलीकडच्या बाजूला ठाण मांडून उभे असून बाण आणि बंदुकी यांचा मारा करीत आहेत. मुखलिसखान, तरबियतखान, हमीदुद्दीनखानबहादुर, मतलबखान वगैरे सरदार हे लढत आहेत (हमला मी नुमायद, हल्ला करीत आहेत). पण वरून बाण व बंदुकी यांचा इतका वर्षाव होत आहे की त्यांना पुढे सरकण्यास वाट सापडत नाही.
अर्थातच औरंगझेबाच्या स्वतःच्या अखबारात त्याला कमीपणा येईल अशी गोष्ट सापडत नाही, किंवा ती अगदी सौम्य पद्धतीने लिहिली जाई, कारण बादशाह अखबार स्वतः पाहून त्याला मंजुरी देत असे. हे अखबार बऱ्याच महत्वपूर्ण आणि तपशीलवार माहितीने भरलेले आहेत (त्यांच्याविषयी पुन्हा केंव्हातरी एका वेगळ्या लेखात लिहीन) आपल्याला साताऱ्याच्या प्रसंगाचे साग्रसंगीत विवरण साकी मुस्तेदखान या समकालीन इतिहासकाराने आपल्या 'मासिर-ए-अलामगिरी' या ग्रंथात लिहून ठेवलेले सापडते.
(हा उताराही सेतुमाधवराव पगडी यांच्या खंड १ मधून)
"काही वेळाने किल्ल्यातील मराठे त्या जागी आले. आणि बंदुकी झाडून गोळ्यांचा वर्षाव करू लागले. मोगलांचा दमदुमा मोडून पडला होता. त्यांच्या तोफा ठिकठिकाणी पडल्या होत्या. मोगल सैनिकांनी लढण्याचे सोडून दिले होते. मराठ्यांशी लढू शकेल असा तेथे कोण होता? मोर्चे येथून तेथपर्यंत लाकडाचे होते. बहेलियांनी रात्रीच्या वेळी कुणाला न कळत मोर्च्यांना आगी लावल्या. ही आग सात रात्री सात दिवस सारखी जळत होती. त्या भयंकर आगीला विझवू शकेल इतके पाणी तेथे कोठून मिळणार? ढिगाऱ्यात सापडलेले सगळे हिंदू आणि ज्यांना काढण्यास अवधी मिळाला नाही असे काही मुसलमान हे सगळे जळून खाक झाले. धन्य आहे या विश्वरूप अग्निकुंडाची."
सातारा जिल्हा गॅझेटीअरमध्ये आपल्याला सैन्याची रचना आणि सुरुंग लावलेली अंदाजे जागा सापडते. ही माहिती मी वरील नकाशात दाखवली आहे. आजही सातारा जिल्ह्यात अजिंक्यताऱ्याच्या दक्षिणेस आपल्याला नदीकाठी शहापूर हे खेडे सापडते. १७०० साली शाहजादा आझम याचा मुक्काम इथे होता. स्वतः औरंगझेब उत्तरेस 'कारंजा' इथे छावणी करून होता.
यानंतरची हकीगत आपल्याला अखबार आणि मराठी पत्रे (परशुरामपंत प्रतिनिधी यांनी चांदजी पाटणकर याना पाठवलेले पत्र - रेकॉर्डस् ऑफ शिवाजी पिरियड) यातून समजते. शाहजादा आझम याने साताऱ्याचा किल्लेदार सुभानजी याच्याबरोबर वाटाघाटी केल्या. मराठ्यांना बादशाहच्या नकळत एक मोठी रक्कम देणे कबुल केले आणि किल्ल्यातील सर्वाना सुरक्षित बाहेर जाऊ देण्याची हमी दिली. त्यानुसार मराठ्यांनी किल्ला रिकामा केला. बादशाहने मात्र शाहजादा आझम याने किल्ला 'घेतला' याचा आनंद मानून सातारा किल्ल्याचे नाव 'आझम तारा' असे ठेवले. आझम या फारसी शब्दाचा अर्थ अत्यंत श्रेष्ठ (Greater; greatest. Grand.). किल्ला मोगलांना फार काळ लाभला नाही. मराठ्यांनी तो लगेच पुन्हा ताब्यात घेतला. आझमताऱ्याचा आज अजिंक्यतारा असा (अपभ्रंश?) आपल्याला झालेला दिसतो.
सातारा वेढ्याच्या चार महिन्यांच्या काळात सेनापती धनाजी जाधव यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. बादशहाला झुल्फिकारखानाची नेमणूक धनाजीच्या पाठलागावर करावी लागली. त्यांच्या या पाच महिन्यात सहा लढायांची अखबारात नोंद आहे. पंधरा हजार सैन्यानिशी कऱ्हाड इथे, मग हमिद्दुदीनखान याच्याशी लढाई, मग रहिमतपूरजवळ झुल्फिकारखानाबरोबर झुंज, खानापूर ठाण्यावर हल्ला, मग परांडा तालुक्यात उंदरगाव इथे खजिन्यावर हल्ला आणि गुलबर्गा जिल्ह्यात फिरोझाबाद इथे पुन्हा झुल्फिकारखानाबरोबर अशी चौफेर धनाजी जाधवांनी दिलेल्या लढायांची यादी फक्त सातारा वेढ्याच्या जेमतेम ४ महिन्यांच्या काळात आपल्याला सापडते.
सर्व चित्रे (अनुल्लेखित) साभार Bibliothèque nationale de France यांच्याकडून. त्यांची परवानगी वापरासाठी आवश्यक आहे.
हे चित्र कर्नल जेंतील याच्या संग्रहात मिळाले. हा फ्रेंच सैनिक अवधचा नबाब शुजाउद्दोला याच्या पदरी मिलिटरी सल्लागार म्हणून होता. १७७८ साली त्याने फ्रान्सला परत जाताना सगळा संग्रह आपल्याबरोबर नेला. तो आता फ्रान्सच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे.
चित्रातला प्रसंग १४ एप्रिल १७०० या दिवशी घडला. त्यामुळे हे चित्र १७०० ते १७७८ या कालावधीत कधीतरी काढलेले आहे. औरंगझेबाने चित्रकला इस्लामला निषिद्ध मानली होती, त्यामुळे त्याच्या पदरी असलेले बादशाही चित्रकार दुसरीकडे आश्रयाला गेले. मोगल चित्रकलेला पुन्हा राजाश्रय लाभला तो मुहम्मद शाह रंगीला याच्या कारकिर्दीत १७१९ ते १७४८ ला वर्षात. त्यामुळे हे चित्र बहुदा त्या काळातले असायची जास्त शक्यता आहे. वेढ्याची जी हकीगत आहे त्यातले प्रसंग एकत्र जोडून हे चित्र काढलेले दिसते. हे चित्र त्यामुळे अनेक प्रसंग जोडून एकदम दाखवते. हे काही एखाद्या फोटोग्राफसारखे अस्सल प्रातिनिधिक सत्यचित्रण नाही.
या मोठ्या केलेल्या भागात आपल्याला बादशाह औरंगझेब हा 'तख्त-ए-रवा' (फारसी - म्हणजे चालते-फिरते सिंहासन) या पालखीसारख्याच पण वरून उघड्या वाहनात दिसतो. बादशाह हा नेहमी सार्वजनिक जागी आजूबाजूच्या गोंधळाकडे लक्ष न देता हातात कुराणाची एक प्रत घेऊन ती वाचत असे. त्याचे खास शाही भोई लाल रंगाचे कपडे घातलेले आहेत. बादशाही मानमरातब चिन्हे छत्र-चामर इत्यादी जवळपास आहेत. बादशाहच्या डोक्याभोवती नेहेमीप्रमाणे सोनेरी वलय (अरोरा) आहे. त्यावर फारसीत त्याचे नाव 'आलमगीर' آلمگیر असे लिहिलेले आहे. बादशाह हा पूर्ण वृद्ध झाला असून त्याची मानही म्हातारपणामुळे वाकलेली आहे.
शाहजादा आझम (विकिपीडियावरून साभार)
बादशाहच्या काळ्या ढालीवर असलेली खास व्यक्ती म्हणजे त्याचा मुलगा शाहजादा आझम. त्याचा या लढाईतील आणि किल्ल्याच्या नामकरणातील सहभाग आपण खाली नंतर बघणार आहोत. आझमचे वयही भरपूर दिसते आहे, त्याची दाढी जवळजवळ पांढरी झालेली आहे.
बाद्शाहसमोर हात पुढे घडी घालून उभी असलेली व्यक्ती म्हणजे बहुदा तर्बीयतखान. हा मोगलांचा 'मीर-अतिश' म्हणजे तोफखान्याचा मुख्य होता. याच्याच प्रयत्नाने किल्ल्याला सुरुंग लावला गेला. तोफा, त्यांचे दमदमे हे सगळे याने आपल्या तुकडीकरवी रचले. त्याने पूर्ण लोखंडी चिलखत घातले आहे आणि त्याची दोन मुले (अथवा दोन अनुयायी/सरदार) त्याच्या मागे उभी आहेत.
हीच व्यक्ती (बहुदा तर्बीयतखान) आपल्याला हल्ला करायला तयार असलेल्या घोडेस्वारात एका घोड्यावर स्वार दिसते. घोडेस्वारांच्या रांगा सुरुंगातून पडलेल्या खिंडारावर हल्ला करायला तयार आहेत. मोगली सैन्यातले वेगवेगळे मनसबदार, त्यांचे झेंडे, सजवलेले घोडे असा सगळं आपल्याला तपशिलात काढलेले दिसते. प्रत्यक्षात (आपण खाली पाहू) हा हल्ला पहाटेस अंधारात घडला आणि साताऱ्याच्या किल्ल्यात घोडेस्वारावरून हल्ला करणे शक्य नाही. त्यामुळे आपण हा भाग एक कल्पनाचित्र म्हणूनच पहायचा.
इथे आपल्याला किल्ल्यावर हल्ला करण्याऱ्या तोफा एकत्र आग ओकताना दिसतात. एका वर्षानंतर १७०१ मध्ये पन्हाळ्याच्या वेढ्यात हजार असलेल्या इंग्लिश राजदूत विल्यम नॉरीस (हा एक एक वेगळ्या लेखाचा विषय आहे) याने म्हणाले आहे की मोगल लोखंडी गोळ्याऐवजी बऱ्याचदा दगडाचे तुकडे तोफातून उडवीत. त्यामुळे तोफा लवकर खराब होत.
इथे आपल्याला किल्ल्यावरच्या बुरुजाला एक गोल छप्पर घातलेले दिसते. डेक्कन कॉलेजचे श्री. सचिन जोशी याना इतर चित्रातही ते सापडले आहे. त्यावरून सारे सांगता येते की त्या काळात पहारेकर्यांच्या सोयीसाठी (उन्हापावसात, रात्री अपरात्री गस्त घालताना) बुरुजावर आडोसा केलेला होता. सचिन जोशी यांचे अनुमान असे की तो लाकडाचा असल्यामुळे कधीच नष्ट झाला. त्याच्या खोबणी आपल्याला आजही कुठेकुठे किल्ल्यांवर सापडतात.
या भागात आपल्याला किल्याला सुरुंग उंडवल्यामुळे पडलेले खिंडार दिसते.
औरंगझेबाच्या दरबारात रोज घडलेली हकीगत फारसीत लिहून ठेवली जात असे . जयपूर इथे त्या हकीगतीतले काही सारांश मिळाले आहेत. ते लंडन आणि बिकानेर इथे सध्या आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळात त्याची कॉपी आहे. त्यांना 'अखबारात-ए-दरबार-ए-मुअल्ला' म्हणजे 'श्रेष्ठ दरबारची बातमीपत्रे' असे म्हणतात. दिनांक १४ एप्रिल १७०० या दिवसाखाली आपल्याला खालील नोंद अखबारात सापडते.
(मी श्री. सेतुमाधवराव पगडी यांनी 'मोगल दरबारची बातमीपत्रे खंड १' यात दिलेले मराठी भाषांतर वापरलेले आहे)
काल बादशहा शेख हिदायतकेश याला म्हणाले, "तुम्ही तरबियतखानाला आज रात्री सुरुंग उडविण्यासाठी हुकुम लिहा." त्याप्रमाणे तरबियतखानाला हुकुम पाठविण्यात आला. बादशहांनी मुखलिसखान, हमीदुद्दीनखानबहादुर, सियादतखान वगैरेंना पुढीलप्रमाणे आज्ञा केली - रात्रीचा एक प्रहर राहिला असता तुम्ही स्वतःची पथके घेऊन हल्ला करण्यासाठी म्हणून तरबियतखानाच्या मोर्च्यात जा.
दिवसाच्या चार घटिका झाल्या असता बादशहांना कळविण्यात आले ते असे : आज्ञेप्रमाणे तरबियतखान याने दोन्ही सुरुंग उडविले. किल्ल्याची भिंत किल्ल्याच्या आत पडली. पण बुरुजाचा वरील भाग, वीस दरआ (?) लांबी रुंदीचा उडून दमदुम्यावर पडला. पुढील माणसे ठार झाली :-- खास चौकीची माणसे, मरहूम दिलावरखानाची मुले सखीखान, बुदीखान, असदुद्दीन, मरहूम लोधीखान याचा मुलगा अहमद, मुहंमद जमान वगैरे काकड जमातीचे लोक, सटवाजी डफळे याचा मुलगा बुदीखान, हजारी पथकातील माणसे, बंदुकची, दक्षिण सुभ्यातील तैनात सैनिक. अशी एकंदरीत जवळजवळ एक हजार माणसे दगडांच्या उडण्यामुळे त्या माराने मारली गेली आहेत. गनीम (मराठे) हे बुरुजाच्या पलीकडच्या बाजूला ठाण मांडून उभे असून बाण आणि बंदुकी यांचा मारा करीत आहेत. मुखलिसखान, तरबियतखान, हमीदुद्दीनखानबहादुर, मतलबखान वगैरे सरदार हे लढत आहेत (हमला मी नुमायद, हल्ला करीत आहेत). पण वरून बाण व बंदुकी यांचा इतका वर्षाव होत आहे की त्यांना पुढे सरकण्यास वाट सापडत नाही.
अर्थातच औरंगझेबाच्या स्वतःच्या अखबारात त्याला कमीपणा येईल अशी गोष्ट सापडत नाही, किंवा ती अगदी सौम्य पद्धतीने लिहिली जाई, कारण बादशाह अखबार स्वतः पाहून त्याला मंजुरी देत असे. हे अखबार बऱ्याच महत्वपूर्ण आणि तपशीलवार माहितीने भरलेले आहेत (त्यांच्याविषयी पुन्हा केंव्हातरी एका वेगळ्या लेखात लिहीन) आपल्याला साताऱ्याच्या प्रसंगाचे साग्रसंगीत विवरण साकी मुस्तेदखान या समकालीन इतिहासकाराने आपल्या 'मासिर-ए-अलामगिरी' या ग्रंथात लिहून ठेवलेले सापडते.
(हा उताराही सेतुमाधवराव पगडी यांच्या खंड १ मधून)
"काही वेळाने किल्ल्यातील मराठे त्या जागी आले. आणि बंदुकी झाडून गोळ्यांचा वर्षाव करू लागले. मोगलांचा दमदुमा मोडून पडला होता. त्यांच्या तोफा ठिकठिकाणी पडल्या होत्या. मोगल सैनिकांनी लढण्याचे सोडून दिले होते. मराठ्यांशी लढू शकेल असा तेथे कोण होता? मोर्चे येथून तेथपर्यंत लाकडाचे होते. बहेलियांनी रात्रीच्या वेळी कुणाला न कळत मोर्च्यांना आगी लावल्या. ही आग सात रात्री सात दिवस सारखी जळत होती. त्या भयंकर आगीला विझवू शकेल इतके पाणी तेथे कोठून मिळणार? ढिगाऱ्यात सापडलेले सगळे हिंदू आणि ज्यांना काढण्यास अवधी मिळाला नाही असे काही मुसलमान हे सगळे जळून खाक झाले. धन्य आहे या विश्वरूप अग्निकुंडाची."
सातारा जिल्हा गॅझेटीअरमध्ये आपल्याला सैन्याची रचना आणि सुरुंग लावलेली अंदाजे जागा सापडते. ही माहिती मी वरील नकाशात दाखवली आहे. आजही सातारा जिल्ह्यात अजिंक्यताऱ्याच्या दक्षिणेस आपल्याला नदीकाठी शहापूर हे खेडे सापडते. १७०० साली शाहजादा आझम याचा मुक्काम इथे होता. स्वतः औरंगझेब उत्तरेस 'कारंजा' इथे छावणी करून होता.
यानंतरची हकीगत आपल्याला अखबार आणि मराठी पत्रे (परशुरामपंत प्रतिनिधी यांनी चांदजी पाटणकर याना पाठवलेले पत्र - रेकॉर्डस् ऑफ शिवाजी पिरियड) यातून समजते. शाहजादा आझम याने साताऱ्याचा किल्लेदार सुभानजी याच्याबरोबर वाटाघाटी केल्या. मराठ्यांना बादशाहच्या नकळत एक मोठी रक्कम देणे कबुल केले आणि किल्ल्यातील सर्वाना सुरक्षित बाहेर जाऊ देण्याची हमी दिली. त्यानुसार मराठ्यांनी किल्ला रिकामा केला. बादशाहने मात्र शाहजादा आझम याने किल्ला 'घेतला' याचा आनंद मानून सातारा किल्ल्याचे नाव 'आझम तारा' असे ठेवले. आझम या फारसी शब्दाचा अर्थ अत्यंत श्रेष्ठ (Greater; greatest. Grand.). किल्ला मोगलांना फार काळ लाभला नाही. मराठ्यांनी तो लगेच पुन्हा ताब्यात घेतला. आझमताऱ्याचा आज अजिंक्यतारा असा (अपभ्रंश?) आपल्याला झालेला दिसतो.
सातारा वेढ्याच्या चार महिन्यांच्या काळात सेनापती धनाजी जाधव यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. बादशहाला झुल्फिकारखानाची नेमणूक धनाजीच्या पाठलागावर करावी लागली. त्यांच्या या पाच महिन्यात सहा लढायांची अखबारात नोंद आहे. पंधरा हजार सैन्यानिशी कऱ्हाड इथे, मग हमिद्दुदीनखान याच्याशी लढाई, मग रहिमतपूरजवळ झुल्फिकारखानाबरोबर झुंज, खानापूर ठाण्यावर हल्ला, मग परांडा तालुक्यात उंदरगाव इथे खजिन्यावर हल्ला आणि गुलबर्गा जिल्ह्यात फिरोझाबाद इथे पुन्हा झुल्फिकारखानाबरोबर अशी चौफेर धनाजी जाधवांनी दिलेल्या लढायांची यादी फक्त सातारा वेढ्याच्या जेमतेम ४ महिन्यांच्या काळात आपल्याला सापडते.
प्रतिक्रिया
फारच रोचक आहे. ह्या
सविस्तर लेखनासाठी धन्यवाद,
छान माहिती
अजून एक माहितीपूर्ण आणि रोचक
तुमचे लेख नेहमीच अतिशय
खुपच उत्तम धागा !
अतिशय रोचक
त्या काळी तोफांची मारा
सुरुंग
खडकात भोक पडून एक मोकळी पोकळी
आले लक्षात
लेखन माहितीपूर्ण आहे.
नाही हो, ऐसी वर माझे नाहीये
अत्युत्तम लेखन. प्रचंड आवडले.
दमदमा की धमधमा
हो तोच तो
अभिनंदनीय लेख. वृत्ती
हे चित्र कुणीतरी व्ही आर रघु
उत्कृष्ट लेख
आज इतक्या वर्षानंतर आपल्याला
रोचक माहीती. निनाद
मोगल दरबारची बातमीपत्रे खंड ३
सिंहगडच्या वेढ्याच्या काळातला
अधिक माहिती मिळेल काय ??
समकालीन कागदात धर्मांतर
विशेष माहिती
छान
_/\_ _/\_. मनःपूर्वक आभार!
अजमतारा का अजिंक्यतारा?
अजिंक्य(?)तारा विडीओ
धन्यवाद
चांगला लेख
राजपूत + मराठे
शिवाजी महाराजांनी
फार मोठा विषय आहे हा, तरी
१७०० सालातले एक उदाहरण.
अवांतर : साल्हेरची लढाई