Skip to main content

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...

लेखक यनावाला यांनी सोमवार, 19/02/2018 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्‍यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत. " ईश्वर अस्तित्वात नाही." हे ठामपणे सांगणारे निरीश्वरवादी भारतात अगदी वेदकाळापासून आहेत. आता या विज्ञानयुगात त्यांची संख्या वेगाने वाढते आहे. सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान असा देव जर आहे तर तो आपल्या अस्तित्वाची प्रचीती सर्व माणसांना येईल असे कांहीच का करीत नाही ? इतका लपून-छपून का राहतो ? आपले अस्तित्व दाखविण्यात त्याला कोणती अडचण आहे ? तसेच त्याचे जे गुणवर्णन आहे त्यांतील एकाही गुणाचा अनुभव कधीही येत नाही. संकटात देव धावून आला आहे असे कधीही घडत नाही. हे कसे ? दीन-दुबळ्यांवर अन्याय होतो, निष्पाप बालिकेवर अत्याचार होतो या प्रत्यही घडणार्‍या घटना तो करुणासागर देव निष्क्रियपणे पाहात कसा राहातो? आस्तिक लोक अशा घटनांविषयीं विचार करीतच नाहीत. त्यांना त्यांची श्रद्धा टिकवून धरायची असते. ती अशा घटनांनी डळमळली तर काय करायचे ? आपल्याला कोणाचा आधार आहे ? अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे अन्यायपीडित व्यक्ती पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगतात असले बुद्धीला न पटणारे काहीतरी भोंगळ तत्त्व श्रद्धेने खरे मानून मनाचे समाधान करतात. आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली, देवासाठी जी कर्मकांडे परंपरे अनुसार करीत आहोत ती सोडून दिली तर देव आपल्यावर कोपेल. शिक्षा करील. अशी भीतीही त्यांना वाटत असावी. या संदर्भात डॉ.र.धों.कर्वे यांचे एक विधान आहे. ते म्हणतात, "माणूस देवाला नमस्कार करतो तो "दुर्जनं प्रथमं वन्दे ।" या न्यायाने. म्हणजे देवाने आपल्यावर कोप करू नये, आपले कांही वाईट करू नये म्हणून. हे पटण्यासारखे आहे. यावर आस्तिकांनी थोडा विचार करावा. जगात निरीश्वरवादी माणसे पूर्वीपासून आहेत; हे आस्तिकांना ठावूक आहेच ते नास्तिक देवा-धर्माचे कोणतेही कर्मकांड करीत नाहीत. देवाला हात जोडून त्याच्यापुढे नतमस्तक होत नाहीत. एवढेच नव्हे तर देवाचे अस्तित्वसुद्धा नाकारतात . आता प्रश्न असा पडतो की त्या नास्तिकांना देव शिक्षा का करीत नाही ? देव सर्वज्ञ आहे. जगात निरीश्वरवादी लोक आहेत. ते कधी माझी पूजा-अर्चा-प्रार्थना करीत नाहीत. मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील. देवाचे अस्तित्व मुकाट्याने मानतील. त्याची पूजा-अर्चा करू लागतील. आस्तिक-नास्तिक वाद मिटून जाईल. हे देवाला नको आहे का? नास्तिकांना कडक शासन करणे देवाला अशक्य आहे का? तो सर्वशक्तिमान आहे ना ? मग त्याच्या दृष्टीने एवढी सोपी असलेली गोष्ट तो स्वत: का करीत नाही ? देवदर्शनाला जाणार्‍या तसेच दर्शन घेऊन परत येणार्‍या भक्तांच्या वाहनांना अपघात का होतात ? त्यात अनेक भक्त का मरतात ? कोणी म्हणतील -आस्तिकांच्याच वाहनांना अपघात होतात का ? नास्तिकांच्या वाहनांना होत नाहीत ? -- होतातच. गाडीत कोण बसले आहेत ? आस्तिक का नास्तिक ? भूकंपात जखमी झालेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर का घरफोडीसाठी जाणारे दरोडेखोर ? याचा अपघाताशी कांही संबंध नसतो. अपघाताची कारणे वेगळी असतात.नास्तिकांच्या वाहनांना अपघात होऊ शकतो हे सत्यच आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्‍या नास्तिकांना तो शिक्षा का करत नाही ? आणि या प्रश्नाचे सत्य उत्तर असे आहे की,ईश्वर अस्तित्वातच नाही. वास्तव काय आहे ? सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. आस्तिकांवर येतात तसे नास्तिकांवरही येतात. श्रीमंतांवर येतात. गरिबांवर येतात. आस्तिक लोक देवाचे भजन-पूजन करतात, नामस्मरण करतात म्हणून त्यांच्यावर दु:खाचे प्रसंग क्वचितच येतात तर नास्तिक लोक देवाचे काहीच करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर सतत दु:खाचे डोंगर कोसळतात असे मुळीच दिसत नाही. जगन्नियंता देव अस्तित्वात असेल तर असे घडायला हवे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही. यावरून कोणता निष्कर्ष निघतो ? अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते. अनेक सद्विचारी, सदाचारी, सज्जन आस्तिकांना आयुष्यात मोठे दु:ख भोगावे लागले. देवाने त्यांच्यावर कांही कृपा केली नाही. दोन उदाहरणे द्यायची तर तुकाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रात लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला. तुकारामांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली. त्यांची पहिली पत्‍नी भूकबळी ठरली. त्यांनी लिहिले आहे, "दुष्काळे आटले द्रव्य गेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली. आता काय खावे कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥ विठ्ठलाच्या या निष्ठावंत भक्ताची अशी अवस्था झाली. रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परम भक्त होते. "स्वत: माता माझ्याशी बोलते " असे ते सांगत. त्यांना घशाचा कॅंन्सर झाला. अन्नाचा घास गिळता येईना. भक्तांनी विनवले की, " तुम्ही कालीमातेला साकडे घाला. ती तुमचा आजार बरा करील." परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. इतर लोक जेवतात त्याने रामकृष्ण परमहंस यांचे पोट भरते का ? त्यांना भूक लागणार नाही का ? तात्पर्य एवढेच की आस्तिक माणसांना, देवभक्तांना सुद्धा दु:खे भोगावी लागतात. त्यांच्यासाठी देव काहीच करू शकत नाही. तो अस्तित्वाच नाही तर काय करणार ? पण अशा सुप्रसिद्ध आस्तिकांचाच विचार का करायचा ? शंभर वर्षांपूर्वीच्या हिंदु समाजाचा विचार करावा. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती. चौथा वर्ण शूद्र . ते सगळे आस्तिकच होते. इतर तीन वर्ण त्यांना अस्पृश्य मानत. हे लोक निरक्षर होते. अज्ञानी होते. अत्यंत दीनवाणे अपमानास्पद जीवन जगत होते. जो देव आहे असे ते मनापासून मानत होते त्या देवाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. करुणासागर देवाला त्यांची दया आली नाही. देश स्वतंत्र झाला. प्रजासत्ताक स्थापन झाले. संविधान लागू झाले. तेव्हा कागदोपत्रींतरी अस्पृश्यता गेली. या दलितांचा उद्धार देवामुळे झाला नाही. डॉ.आंबेडकरांमुळे झाला. कांहीजण बाबासाहेबांनाच देव मानतात. तसे मानणे हा त्यांचा अपमान आहे हे त्या दलितांच्या ध्यानी कसे येत नाही ? कवि विंदा करंदीकर म्हणतात, "देवातुनी समाजा ज्याने विमुक्त केले । त्यालाच देव करिती याला इलाज नाही. ॥" तर अशा या देवाचे अस्तित्व खरे कसे मानता येईल ? देव अस्तित्वात नाही हेच बुद्धीला पटणारे सत्य आहे. देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. मात्र परंपरेने आलेले जे सण-सुदिन आहेत ते समाजाचे आनंद सोहळे आहेत. ते अवश्य साजरे करावे. त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल. .................................................................................

वाचने 82936
प्रतिक्रिया 247

प्रतिक्रिया

मागील जन्मी केलेल्या पापांमुळे माणुस या जन्मी नास्तिक बनतो; आणि या जन्मी नास्तिक होऊन आस्तिक लोकांना सतत पिडण्याच्या पापाची फळे त्याला त्याच्या पुढच्या जन्मी मिळतात, असं आम्हाला...  या देवदुताने सांगितले आहे. पण, तरीही आम्हाला तुमच्या प्रचंड चिकाटीने चालवलेल्या कामाचे  प्रचंड कौतूक आहे, हे सुद्धा नमूद करत आहोत !   हघ्याहेवेसांनल.

In reply to by प्रचेतस

मिपाच्या सगळ्याच आयड्यांना यनावालांनी झपाटले आहे आणि ते ती "झाडे" सोडायला अजाबात तयार नाहीत ! =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

झाडेच त्याच्या मागं मागं जाताना दिसत असतात. अता झाडाचं मूळ आणि ऋषींचे कूळ शोधू नये असं कुठेतरी वाचलंय. मुकाट्याने पायवाटेने चालत असलेल्या​ सामान्य जनतेतील एक क्षुल्लक पांथस्थ नाखु

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?..... त्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट त्याने त्याच्या भेकड भक्तांना दिले आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी .....

वालावलकर सेठ, ईश्वर आपल्याला काय शिक्षा देणार ? तुम्हाला आणि माझ्यासहीत सर्व निरीश्वरवाद्यांना देव उकळत्या तेलाच्या कढ़ईत आपल्याला भज्यासारखे तळून काढतील. लक्षात ठेवा. ;) धन्स सर, तुम्ही माझ्यातला देवाचे खुळ काढल्याबद्दल. देवा तू असशील तर ना सर्व भाबड्या मिपकरांच्या खात्यात रात्रीतून एक एक कोटी जमा कर... लै कड़कीत आहेत बिचारे....;) -दिलीप बिरुटे

दोन्ही कडे पेटलेलीय ................. डोळ्यात धुर गेल्याने समोरुनच पेटल्याचा भास होत असावा. हलक्यात अजिबात न घेणे हे वेगळे सांगणे नलगे. असो बाकी यनावाला सर तुम्ही मेटाएथिक्स वाइज कसा विचार करत असणार याचे एक अकारण कुतुहल आहे तुमच्या लेखात एकसुरीपणा जाणवतो विरोधी आर्ग्युमेंट्स मध्ये व्हरायटी नाही याचे कारण तुम्ही मर्यादीत स्टॅन्ड्स वा पवित्रे हाताळलेले असावेत अशी शंका येते. बहुधा तुम्ही वाचल नसल्यास एक पुस्तक सुचवावेसे वाटते When Bad Things Happen to Good People- Harold Kushner फार रोचक आहे ,

In reply to by मारवा

पुस्तक छान आहे पण चश्मा काढून वाचावे लागेल. काही लोक रीझल्ट आधी ठरवूनच रीसर्च करतात ईश्वर त्यांच काही करू शकत नाही.

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ---> केवळ विश्वास नाही म्हणून त्याने शिक्षा का करावी? उद्या यनावाला असे कोणी नाहीच असे केवळ म्हणले तर तुम्ही जाऊन त्याला शिक्षा कराल का? मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील>>> एखाद्या नास्तिकाने देवावर विश्वास ठेवला काय किंवा नाही ठेवला काय त्याने देवाला काहीच फरक पडत नाही. त्याची इच्छा एवढीच आहे की तुम्ही त्याच्या शोधासाठी स्वतःहून प्रयत्न करावेत. आणि तसे प्रयत्न करण्याची प्रेरणा तुम्हाला व्हावी म्हणूनच हे द्वंद्वयुक्त जग आहे. इथे सुख असेल तर दुःख देखील आहे. जोपर्यंत दुःखाचे चटके सोसायची तुमची तयारी आहे आणि ईश्वर प्राप्तीची इच्छा नाही तोपर्यंत तुम्ही सुख दुःख भोगत राहाल. ज्याक्षणी तुम्हाला या सुख दुःखाच्या पलीकडे काहीतरी आहे आणि ते मला प्राप्त करायचे आहे अशी इच्छा, निर्धार होईल आणि त्या दिशेने तुम्ही प्रयत्न कराल तेंव्हा शेवटी तो या मार्गावर भेटेलच. ज्या लोकांवर त्याचा विश्वास नाही केवळ त्यांची उत्सुकता शमवायला त्याने यावे असे का म्हणून? निरीश्वरवाद्यांनी असे काय केले आहे कि त्यांच्यासमोर तो उभा ठाकेल? त्याला जाणून घ्यायचे असेल तर त्याने स्वतः अथवा इतर संतांनी जे मार्ग सांगितले आहेत त्यावर चालून पाहावे. थोडी न थोडकी प्रचिती नक्कीच येईल. परंतु काहीच न करता निरीश्वरवाद्यांसमोर त्याने उभे ठाकावे हि अपेक्षाच चुकीची आहे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही.>>> असे का? या सृष्टीचे काही नियम आहेत. त्यातला एक म्हणजे कार्यकारणभाव. त्यालाच कर्म असेही म्हणतात. कर्मसिद्धांत असे सांगतो कि आत्ता तुम्ही भोगत असलेले आयुष्य हे तुम्ही पूर्वी केलेल्या कर्माचा परिपाक आहे. त्याचा तुमचा आस्तिक किंवा नास्तिक असण्याशी काही संबंध नाही. तुमचे कर्म चांगले असेल आणि तुम्ही ईश्वर मानत नसाल तरी तुमच्या कर्माचे फळ मिळेलच. पण तुम्ही आस्तिक असाल आणि अनेक वाईट कर्मे करून केवळ आस्तिकतेच्या नावाखाली त्यातून सुटून जाऊ पाहत असाल तर ती शुद्ध फसवणूक ठरेल. परंतु याला थोडेसे अपवाद असू शकतात. जर केलेले कर्म नकळतपणे झाले असेल किंवा केलेल्या कृत्याचा खूपच पश्चाताप झाला असेल आणि त्या कृत्यामुळे ओढवलेल्या संकटातून तरून जाण्यासाठी अत्यंत निर्मल मनाने तुम्ही ईश्र्वरभक्ती केलेली असेल तर कदाचित सुटूही शकाल. 'कर्मणे गहन: गती: असे कृष्णाने म्हणून ठेवले आहे. परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. >>> . तुम्हाला जर असे वाटत असेल कि घशाचा कॅंन्सर मुळे परमहंसांना एका सध्या माणसाला होतात तश्या वेदना होत असतील तर ते चुकीचे आहे. ते मनाच्या अश्या अवस्थेत जाऊन पोहोचले होते कि त्यांना झालेल्या शारीरिक व्याधीचा बऱ्याचदा जाण पण नसे. अशी माणसे शरीराच्या पलीकडे गेलेली असतात व त्यांना अश्या व्याधीमुळे कोणताही फरक पडत नसतो. देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे>>>>> खरे आहे. ह्या विश्वाचा कारभार कर्मसिद्धतांवर आहे आणि केलेली चांगली कर्मे फलद्रुप होतात. अश्या कर्मात देवाच्या उपासाऐवजी भुकेल्या माणसाला दिलेल्या जेवणाचा हि समावेश होतो. परंतु असे कर्म हि नकळतपणे केलेली ईश्वराची सेवाच आहे कारण ह्या जगात ईश्वर सर्वत्र भरून राहिला आहे.

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ---> केवळ विश्वास नाही म्हणून त्याने शिक्षा का करावी? उद्या यनावाला असे कोणी नाहीच असे केवळ म्हणले तर तुम्ही जाऊन त्याला शिक्षा कराल का? मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील----- एखाद्या नास्तिकाने देवावर विश्वास ठेवला काय किंवा नाही ठेवला काय त्याने देवाला काहीच फरक पडत नाही. त्याची इच्छा एवढीच आहे की तुम्ही त्याच्या शोधासाठी स्वतःहून प्रयत्न करावेत. आणि तसे प्रयत्न करण्याची प्रेरणा तुम्हाला व्हावी म्हणूनच हे द्वंद्वयुक्त जग आहे. इथे सुख असेल तर दुःख देखील आहे. जोपर्यंत दुःखाचे चटके सोसायची तुमची तयारी आहे आणि ईश्वर प्राप्तीची इच्छा नाही तोपर्यंत तुम्ही सुख दुःख भोगत राहाल. ज्याक्षणी तुम्हाला या सुख दुःखाच्या पलीकडे काहीतरी आहे आणि ते मला प्राप्त करायचे आहे अशी इच्छा, निर्धार होईल आणि त्या दिशेने तुम्ही प्रयत्न कराल तेंव्हा शेवटी तो या मार्गावर भेटेलच. ज्या लोकांवर त्याचा विश्वास नाही केवळ त्यांची उत्सुकता शमवायला त्याने यावे असे का म्हणून? निरीश्वरवाद्यांनी असे काय केले आहे कि त्यांच्यासमोर तो उभा ठाकेल? त्याला जाणून घ्यायचे असेल तर त्याने स्वतः अथवा इतर संतांनी जे मार्ग सांगितले आहेत त्यावर चालून पाहावे. थोडी न थोडकी प्रचिती नक्कीच येईल. परंतु काहीच न करता निरीश्वरवाद्यांसमोर त्याने उभे ठाकावे हि अपेक्षाच चुकीची आहे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही.------ असे का? या सृष्टीचे काही नियम आहेत. त्यातला एक म्हणजे कार्यकारणभाव. त्यालाच कर्म असेही म्हणतात. कर्मसिद्धांत असे सांगतो कि आत्ता तुम्ही भोगत असलेले आयुष्य हे तुम्ही पूर्वी केलेल्या कर्माचा परिपाक आहे. त्याचा तुमचा आस्तिक किंवा नास्तिक असण्याशी काही संबंध नाही. तुमचे कर्म चांगले असेल आणि तुम्ही ईश्वर मानत नसाल तरी तुमच्या कर्माचे फळ मिळेलच. पण तुम्ही आस्तिक असाल आणि अनेक वाईट कर्मे करून केवळ आस्तिकतेच्या नावाखाली त्यातून सुटून जाऊ पाहत असाल तर ती शुद्ध फसवणूक ठरेल. परंतु याला थोडेसे अपवाद असू शकतात. जर केलेले कर्म नकळतपणे झाले असेल किंवा केलेल्या कृत्याचा खूपच पश्चाताप झाला असेल आणि त्या कृत्यामुळे ओढवलेल्या संकटातून तरून जाण्यासाठी अत्यंत निर्मल मनाने तुम्ही ईश्र्वरभक्ती केलेली असेल तर कदाचित सुटूही शकाल. 'कर्मणे गहन: गती: असे कृष्णाने म्हणून ठेवले आहे. परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. ----- तुम्हाला जर असे वाटत असेल कि घशाचा कॅंन्सर मुळे परमहंसांना एका सध्या माणसाला होतात तश्या वेदना होत असतील तर ते चुकीचे आहे. ते मनाच्या अश्या अवस्थेत जाऊन पोहोचले होते कि त्यांना झालेल्या शारीरिक व्याधीचा बऱ्याचदा जाण पण नसे. अशी माणसे शरीराच्या पलीकडे गेलेली असतात व त्यांना अश्या व्याधीमुळे कोणताही फरक पडत नसतो. देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे------ खरे आहे. ह्या विश्वाचा कारभार कर्मसिद्धतांवर आहे आणि केलेली चांगली कर्मे फलद्रुप होतात. अश्या कर्मात देवाच्या उपासाऐवजी भुकेल्या माणसाला दिलेल्या जेवणाचा हि समावेश होतो. परंतु असे कर्म हि नकळतपणे केलेली ईश्वराची सेवाच आहे कारण ह्या जगात ईश्वर सर्वत्र भरून राहिला आहे.

In reply to by क्रिप्ट

असं अधिकार वाणीने लिहीलेले वाचून तुम्ही "अवतारी" पुरुष असून नुकताच अवतार धारण केलेला असणार असे उगाचच वाटले.

In reply to by सतिश गावडे

गुरु माऊलींनी परमेश्वराची वाट दाखवली आहे, नमस्कार करा. जय जय राम कृष्ण हारी, जय जय राम कृष्ण हारी. बाकी, धन्यासेठ, मला तुकडोजी महाराजांचं भजन मात्र आवडतं. सांगा मी काय करु, भक्ती करु का पोट भरु. आवडलं तर चहा पाजा आज. -दिलीप बिरुटे ( एक जालअवतारी महापुरुष)

आपण नास्तिक आहोत असे स्पष्टपणे सांगणार्‍या एका सदगृहस्थाने भगवान रमण महर्षींना चिरडीला आणण्यासाठी प्रश्न विचारला, "ईश्वर असतो का, ईश्वराचे अस्तित्व आपण सिद्ध करू शकाल काय?" महर्षींनी स्मितहास्य केले आणि त्यांनी उत्तर दिले, "ईश्वराची चिंता आपण कशाला करता आहात? त्याला त्याची चिंता वाहू द्या! हा प्रश्न ज्याला पडला आहे त्याच्या स्वरूपाचा शोध घ्या". तो नास्तिक बुचकळ्यात पडला. श्री रमणांनी त्याने "मी कोण आहे?" हे पुस्तक वाचावे अशी शिफारस केली. त्यामुळे जेमेतेम काही तास आश्रमाला भेट देण्याच्या हेतूने आलेल्या या आगंतुकाने तेथेच काही दिवस मुक्काम केला. शेवटी तो म्हणाला, "मी इथे येताना ईश्वराला नाकारणारा एक नास्तिक म्हणून आलो, आणि त्या वेळी मी सुखी होतो. आता मात्र स्वतःलाच "मी कोण आहे" असा प्रश्न केल्याने मी जाम गोंधळून गेलेलो आहे. मला वाटते आहे की आपली (मानसिक) स्थिती बिघडत चालली आहे आणि त्यामुळे मी नाखूश आहे" श्री रमणांनी त्याच्याकडे बघत स्मितहास्य केले आणि म्हणाले, "तुझा हा वैचारिक गोंधळ बिघडलेल्या मनस्थितीचे द्योतक नाही. आपल्याच अस्तित्वामागच्या सत्याकडे, स्वस्वरूपाकडे तू आजवर पूर्णपणे दुर्लक्ष करत आलेला आहेस. आता कुठे तू एक मूलगामी स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहेस, ज्यामुळे तू या (स्वस्वरूपाकडे) दुर्लक्ष करण्याच्या स्थितीपासून दुरावत चालला आहेस. त्यामुळे झालीच असेल तर एक सुधारणा झालेली आहे! (स्वस्वरूपाकडे) दुर्लक्ष करण्यापासून आत्ताचा वैचारिक गोंधळ, या गोंधळातून सुस्पष्टतेकडे, त्या बौद्धिक स्पष्टतेकडून प्रचितीकडे आणि प्रचितीकडून अंती ठामपणे (सच्चिदानंद) स्वरूपातच स्थित होउन राहणे - अशा चढत्या भाजणीनेच अध्यात्मिक साधनेची वाटचाल होत असते. मूळ स्त्रोतः http://realizedone.com/post/when-a-confessed-atheist-provocatively-asked...

ईश्वर हा साक्षीदार - भक्ताच्या भाषेत "सर्वसाक्षी" आहे. व साक्षीदार हा त्रयस्थ असतो सबब त्याला दुसर्याला शासना करण्याचा अधिकार असेलच कसा ?

जेवढे आस्तिक मंडळी देवाचं नाव घेत नस्तील किंवा लेख पाडत नस्तील, तेवढे, नास्तीक लोकं करतात अस वाटतंय :)

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला कदाचित् निरीश्वरवाद्यांकडे लक्ष द्यावे इतकेही त्यांचे महत्व इश्वराला वाटत नसावे ! मात्र, यनावाला कळत नकळत ईश्वराची सतत इतकी आठवण काढत असतात की स्वर्गाच्या लाईनमध्ये त्यांचा नंबर सगळ्या आस्तिकांच्या पुढे असेल* असेच वाटते ! :) * : संदर्भ : कुठल्याश्या कथेत सांगितले आहेच ना की, "शिकारीची वाट पहात बेलाच्या झाडावर बसलेल्या एक पारधी केवळ वेळ घालवण्यासाठी बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला, ती झाडाखालच्या शंकराच्या पिंडीवर पडत राहिली आणि काही वेळाने शंकराने प्रसन्न होऊन पारध्याला दर्शन दिले."

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

* : संदर्भ : कुठल्याश्या कथेत सांगितले आहेच ना की, "शिकारीची वाट पहात बेलाच्या झाडावर बसलेल्या एक पारधी केवळ वेळ घालवण्यासाठी बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला, ती झाडाखालच्या शंकराच्या पिंडीवर पडत राहिली आणि काही वेळाने शंकराने प्रसन्न होऊन पारध्याला दर्शन दिले."
शिवलीलामृत अध्याय २

लागुंचा एक किस्सा आठवला. त्यांच्या मुलाचा तन्वीर चा लोकल मधे वर्मी दगड लागून मृत्यू झाला. त्यांना काही कठोर सश्रद्धांनी सागितले," बघा तुम्ही देव मानीत नाही ना? देवाने तुम्हाला शिक्षा केली". लागू म्हणाले की मी त्याला मानीत नाही म्ह्णून तो माझ्या मुलाला शिक्षा करणार असेल तर तो देव कसला? राक्षस असला पाहिजे.
अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते.
यात बाबा आमटे राहिले की! या सगळ्या मंडळींच नास्तिक्य कुणाला खुपत नव्हत. ते देव न मानणारे असतील पण देवाला शत्रू मानणारे नव्हते. तसेच असंख्य लोक जे देवाला मानतात त्यांना दुखवणारे नव्हते.त्यांच्या श्रद्धेची टिंगल किंवा अवहेलना करणारे नव्हते.तसेच चिकित्सा करणारे ही नव्हते. बाबांना तर लोक देव न मानणारा देव माणूस म्हणायचे. अनेक सौम्य नास्तिक लोकांची साधारण भूमिका अशी असायची मी माझ्या पुरता देव मानीत नाही. तुम्हीही तो मानू नये असा माझा आग्रह नाही. तुम्ही तो मानत असल्यास तुमच्या भावनेचाही आदरच आहे. त्याला मानण्या न मानण्यामुळे आपल्या माणूस पणात कुठलीही बाधा येत नाही. अस्तिक व नास्तिक या केवळ सोयी साठी वापरलेल्या संज्ञा आहेत. ते काही वॊटर टाईट कंपार्टमेट नाही. मधे अज्ञेयवादाचा पट्टा मोठा आहे. शिवाय ही वर्गवारी चल आहे.परमेश्वर हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी यत्र तत्र सर्वत्र आहे अशीही संकल्पना आहे. प्रथम तो निर्गुण निराकार. त्याची कल्पना करण सामान्यांना अवघड झाल. मग तो सगुण साकार झाला. तो ही पुरेनासा झाला मग भक्तवत्सल करुणा घन. सर्वगुण संपन्न सर्वशक्तीमान असणे परमेश्वराला भाग आहे नाही तर त्याला कुणी विचारणार नाही. असशील तू लै भारी पण मला त्याचा उपयोग नसेल तर? तुही भिकारी व मी ही भिकारी. बसू दोघे भीक मागत. असे झाले असते ना! त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या, द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं ममः देवदेवा || सगळी नाती चिकटवून टाकली इथे. विरोध भक्ती मधे देवाला शिव्या द्यायची परमीशन आहे. आमच्या गावाकडे लव्हाराचा शंकर्‍या व मुसलमानाचा पाप्या हे एकमेकांना घट्ट मैत्रीत आईबहिणी वरुन शिव्या द्यायचे. त्याच्या शिवाय मैत्रीच नात घट्ट झाल्याचे त्यांना वाटायच नाही. असो मुद्दा असा आहे की प्रत्येकाच्या देव या संकल्पना सुद्धा वेगळ्या आहेत. त्याला एकच पदर नाही. मानला तर देव नाही तर दगड असे म्हणणारे अनेक सश्रद्ध मी गावाकडे लहानपणी पाहिले आहेत. आजही शहरात पाहतो. मी व माझा देव हे विं श चौघुले संपादित पुस्तक जरुर वाचावे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

घाटपांडे साहेब, तुम्ही देवावर श्रद्धा ठेवता का म्हणजे त्याला मानता का ? हो किंवा नाही इतकेच सांगा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमचा देवावर विश्वास आहे का? असा प्रश्न भल्याभल्यांना बुचकळयात, संभ्रमात, चिंतनात टाकतो. मग तुम्हाला कोणता देव अभिप्रेत आहे? अशा प्रतिप्रश्नाने उसंत मिळते अस मी ग्रंथ परिचयात म्हटले आहे. हो कि नाही? अशा द्वैत प्रश्न मला खर तर अपुरे ( अगदी खर तर अप्रगल्भ) वाटतात. बरेच लोक कृष्ण धवल द्वैतात अडकतात. राम किंवा रावण, विरोधक किंवा समर्थक, पाप किंवा पुण्य, चांगले किंवा वाईट. if you are not with us, you are with them असे काहीसे गणित असते मी बहुरंगी दृष्टीने पहातो. किमान तसा प्रयत्न असतो. माझ्या जगण्याच्या गरजेनुसार मेंदु ठरवतो. कधी मी नास्तिक तर कधी अस्तिक तर कधी अज्ञेयवादी असतो. हे एक उत्तर दुसर अस की माना मानू नका काही फरक पडत नाही. मूळात ती एक संकल्पना आहे म्हणजे मानवी मेंद्चा अविष्कार. मी कुठल्याही प्रतिमेत अडकत नाही. तसे अस्तिक म्हणजे सनातनी बुरसटलेला व नास्तिक म्हणजे रॅशनल सुधारक असेही मी मानत नाही. यावत् जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् | भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत : || अर्थ जीवनात सुखेनैव जगावे. गरज पडल्यास कर्ज काढून तूपरोटी खावी. एकदा देहाची राख झाल्यावर परत कोण येणार आहे? अस मानतो. उद्या माझ्या मेंदुत जैवरासायनिक बदल झाले तर माझे म्हणणे बदलेलही. अर्थात ते कुणाचेही बदलेल. अगदी यनावालांचेही. निसर्ग नियम तुमच्या माझ्यासाठी वेगळे नाहीत. कुणाच्याही मेंदुत केमिकल लोच्या होउ शकतात. शिवाय प्रत्येक गोष्टीवर आपले काहीतरी मत असलेच पाहिजे असेही मी मानीत नाही. अनेक गोष्टी आपल्यासाठी अदखलपात्र असू शकतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

वरचा आणि हा, दोन्ही प्रतिसाद आवडले. ******************************************** प्रतिष्ठित नास्तिकांची नावे देताना असे अगणित प्रतिष्ठित आस्तिकही होऊन गेले आहेत हा मुद्दा सरळ सरळ बाजूला टाकला जातो. देव त्याची भक्ती केली नाही तर शिक्षा देतो हे जणूकाही सर्व आस्तिकांचे ब्रह्मवाक्य आहे अशा थाटात वरील लेख लिहिला गेला आहे असे मला वाटते. देव शिक्षा नाही तर न्याय करतो, देव प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळे देतो असे मानणारे (चान्गली आणि वाईट कर्मे ठरवण्याचे सामर्थ्य ईश्वरात आहे असे मानण्यात काहीच गैर नसावे) आस्तिक लेखकाच्या खिजगिणतीतही नसतात त्यामुळे असे लेख नेहमी स्वतः तयार केलेल्या मुद्द्यांवर, एकांगी होतात असे मला वाटते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मला माहिती होतं तुम्ही हो किंवा नाही मधे उत्तर देनार नाहीत. एक मोठा वर्ग असा आहे की, जो अद्भूत सृष्टीतल्या चराचर सृष्टीला मानतो. पण, मध्यस्थ, मंदिरं, बाबा-बुवा, दगड, देव, खडे, अंगठ्या, आकार उकार यांना मानत नाही. मला हे बरं वाटतं. या लोकांचा तान नसतो. ही मंडळी कोणालाही त्रास देत नाही. मला तुमचं मत समजलं आहे. तुम्ही हो आणि नाही मधे पक्के अडकलेले आहात.

उद्या माझ्या मेंदुत जैवरासायनिक बदल झाले तर माझे म्हणणे बदलेलही.

मान्य.

अर्थात ते कुणाचेही बदलेल.

हं. जीवनात संकटं. आली की मतं बदलतात, असं एक निरिक्षण आहे.

 

अगदी यनावालांचेही.

यनांचे आता मत कधीच बदलनार नाही, बदलूही नये असं माझं ठाम मत आहे. जालावर माझे दोन सर आदर्श आहेत, एक दैववादी जे आहे ते आहे असं मानणारे शरद सर, आणि कंप्लेट दैव नाकारणारे वालावलकरसेठ. बाकी, सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. एकदा भेटूया....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यनांचे आता मत कधीच बदलनार नाही, बदलूही नये असं माझं ठाम मत आहे
यनावालांचे मत कधीच बदलणार नाही हे वैज्ञानिक दृष्टीकोनात बसत नाही. हा जो च आहे ना तो काही अढळ नाही. फार तर असे म्हणा की एकूण परिस्थितीचा विचार करता यनावालांचे मत बदलण्याची शक्यता कमी वाटते. आणि बदलूही नये हे तुमची इच्छा आहे ठाम मत नव्हे. एक प्रतिसाद अशा चर्चांमधे सारखा द्यावा लागतो. तो चिकटवतो आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो. खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही जण मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार त्यांच्या मनात उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो.... हा प्रतिसाद मिपावर दिला आहे कुठे तरी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जो अद्भूत सृष्टीतल्या चराचर सृष्टीला मानतो.
मंजे काय हे काही कळायला भाग नाही. -------------------- अवांतर - तांत्रिकदृश्ट्या अद्भूत हे विशेषण नास्तिकांनी वापरू नये.

In reply to by arunjoshi123

मंजे काय हे काही कळायला भाग नाही. आपणास प्रतिसादातला काही भाग कळला नसेल तर आपण प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावे, ही लम्र विनंती. मिपावर सर्वच गोष्टी सर्वांना समजल्या पाहिजेत असा काही नियम नाही. आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर सर्वच गोष्टी सर्वांना समजल्या पाहिजेत असा काही नियम आहे असं गृहित धरून मी प्रश्न विचारला नव्हता. परंतु त्याच वेळी सर्वच गोष्टी सर्वांना समजल्या पाहिजेत आणि त्यांनी तद्नुसार वागायलाच पाहिजे इ इ कोणाची विचारसरणी असू शकते (जशी इथे यनावालांची आहे.) हे ही मला कळतं असा माझा समज आहे. शिवाय प्रत्येक गोष्ट कळावी अशी माझी जैविक रचना, बुद्धिमत्ता, अर्हता, आवश्यकता इ इ नाही हे देखिल मला कळतं असा माझा समज आहे. पण अर्थातच प्रा आणि डॉ लावल्यामुळं तुमच्या विधानाचा अर्थ काढायचा प्रयत्न करत होतो. ते अनावश्यक नि मूर्खपणाचं असलं तरी इन्स्टिंक्टिव आहे हो. बच्चे को गलती कि माफी दे दो.

In reply to by arunjoshi123

बच्चे को गलती कि माफी दे दो. आपले प्रतिसाद पाहता आपल्याला केव्हाच माफ केलंय आणि इग्नोरही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by arunjoshi123

ईश्वराने आम्हाला असंच वेडं बनवलंय. किती लोड घेणार काका सोडून द्या. आपले एकमेकांचे विचार नाय पटत सोडून द्यायचं. लै मनावर नै घ्यायचं. तुमचा वेंगी आवडला. चांगलं लेखन करता तुम्ही. बाकी काय चाललंय नवीन. :) उदगीरला मागच्या महिन्यात आलो होतो प्रचाराला. काय रस्ते आहेत राव. भेटलो असतो तिकडे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी मस्त. आमच्या उदगीरला कोण्या का निमित्ताने जाणारे लोक विशेष आवडतो. ( सध्याला मी पुण्यात राहतो.) ============== मी कै लोड इ नै घेतंय. नि समोरचेही घेत नसतात हे ही माहित आहे. गंमत म्हणून गपाट्या करायच्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक दैववादी जे आहे ते आहे असं मानणारे शरद सर... माझी जरी व्यक्तिगत ओळख नसली तरी श्री. शरद यांच्या लेखनावरून ते "दैव"वादी आहेत असे अजिबात वाटत नाही.

In reply to by विकास

दैव वाद व देव वाद हे पूर्ण भिन्न आहेत असे मी ६५ वर्षाच्या अनुभवा नंतर ठाम पणे विधान करीत आहे. दैव याची माझी सोपी व्याख्या अशी की जे आपल्या हातात नाही असा सर्व गोष्टीचा आपल्यावर होणारा समुच्चय परिणाम. तुम्ही देवाचे अस्तित्व माना अगर नका मानू दैवाचे अस्तित्व तुम्हाला मान्य करावेच लागते कारण या जगात कोणीच परिपूर्ण कोणत्याच अर्थाने नाही. सबब पराधीनता यातून कोणाही माणसाचीच नवे तर एकूणच सर्वांची सुटका नाही. पराधीनता आली की दैव आलेच ! देवाचे तसे नाही. काहीतरी अचाट, अगम्य शक्ती आहे असे देवाचे स्वरूप मानणारे ही अनेक आहेत. पण जगाच्या कारभारात हेतूपूर्वक भाग घेणारा नियंता म्हणून देव अस्तित्वात आहे ही जी भक्त लोकांची धारणा आहे ती मान्य करता येत नाही. म्हणूनच तुम्ही देववादी असलात तर प्लासिबो म्हणून काही फायदे होत असतीलही पण देव वादी नसलात तर होणारे फायदे अधिक आहेत असा माझा तरी अनुभव आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा. डॉ. दिलिप बिरुटे, तुम्हाला मी या ही पेक्षा एक सोपा प्रश्न विचारतो. फक्त हो किंवा नाही मधे उत्तर द्या. ============== प्रश्नः प्रा. डॉ. दिलिप बिरुटे, तुम्हाला प्रश्न विचारता येतो का?

उलट असली वांड मुले मला फार आवडतात... पैजारबुवा,

यनावाला , नमस्कार .... आस्तिक आणि नास्तिक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ... आस्तिक : जो युगानुयुगे एका दैवी शक्तीला सदैव सलाम करत आला आहे ... नास्तिक : जो हे सार थोतांड आहे आणि त्याचा स्वतःवर ठाम विश्वास आहे . ( इथे " कर्मयोग लागू होतो बरं का ) देव आहे कि नाही : मानलं तर हो आणि नाही तर नाही .. पण ह्या साऱ्या निर्थक गोष्टी आहेत .. कारण आपल्या धर्मात दोन्ही पक्षासाठी ( आस्तिक आणि नास्तिक ) ध्येय प्राप्तीच्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत .. आस्तिक लोक , देवाला स्मरून कर्म करतात तर नास्तिक लोक स्वतःवर विश्वास ठेवून कर्म करतात .. कर्मयोग हीच खरी ईश्वरभक्ती आहे ... अंधश्रदधा ठेवून जर कोणी " असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी " असे जर कोणी म्हणत असेल तर त्याच्या पेकाटात लाथ मारानेच उचित ठरेल ... तुम्ही काय करता , कमावता आणि त्याचा व्यय कसा करता यावर ठरते ... माझा देवापेक्षा , हि जी आपल्या ऋषीमुनींनी स्तोत्रे लिहून ठेवली आहेत ना त्याच्यावर फार विश्वास आहे ... मी लहानपणापासून गणपती स्तोत्रे आणि नवग्रह स्तोत्र म्हणत आलो आहे .. आता सध्या त्याच्यासोबतच रुद्रपाठ नित्य चालू असतो .. त्यासाठी देवासमोर बसून राहत नाही .. मनातल्यामनात घोकत असतो .. त्यातून मला शांती मिळते आणि मला वाटत ,, प्रत्येकाला ती हवी असते .. अगदी नास्तिकाला सुध्दा ... तेव्हा शांतीची व्याख्या आणि त्याचे वाद , हाच खरा वादाचा विषय आहे ... इथे ईश्वराचे काहीही देणेघेणे नाही ... या पृथ्वीतलावरील प्रत्येक जीव , माणूस सोडला तर , सृष्टीचे नियम अगदी काटेकोरपणे पाळतो ... अगदी समुद्राला येणारी भरती ओहोटीसुध्द्धा ... असो .. स्तोत्रांबद्दल मी माझे अनुभव तुम्हाला सांगतो नवग्रह स्तोत्र फळ : "इति श्री वेदव्यास मुखोदगीतं यापठेतसुसमहितौ दिवावयादिवा रात्रौ विघनशांतीभविष्यति नरनारीनृपनाचं भावेददुस्वप्न नाशानं ऐश्वर्यं अतुलाम तेषां आरोग्यम पुष्टिवर्धनाम ग्रहनक्षत्रजा पिडांतस्कराग्नि समुद्भवाम ता सर्वा प्रशामम यान्ति व्यासो ब्रूट निसंशयह " माझे आतापर्यंतचे जीवनमान : १) मला एकही स्वप्न पडत नाही २) मला कसलेही भय वाटत नाही .. अगदी मृत्यूचेसुध्दा ३) कधी अडचणीत सापडलो तर मार्ग मिळण्यासाठी फार तिष्ठत बसावे लागत नाही ४) एक बंडखोर , आणि आगाऊ मुलगा , ज्याच्या भविष्याचा फार यक्ष प्रश्न बापासमोर उभा होता , तो आज संपूर्ण कुटुंबात एक चांगले उदाहरण बनला आहे .. माझ्या डॉक्टर बनण्यामागे एक अविश्वसनीय प्रवास होता .. ज्याची मलादेखील कल्पना नव्हती .. पण तो घडून आला .. आणि हे सांगण्यामागचे कारण हेच कि तो निदान माझ्याकडून तरी शक्य नव्हता .. मी एम एस सी झाल्यावर या सगळ्याला मूठमाती दिली होती .. पण ते व्हायचाच होते .. गाईड स्वतः मागे लागले आणि ते घडून आले .. नुसतंच डिग्री नाही बरं का .. चांगले बारा तेरा पेपर पब्लिश झालेत आणि तीन पेपरने तर अवॉर्ड मिळवलेत .. आता बोला .. आहे कि नाही या स्तोत्रांची कमाल .. तुम्हाला स्तोत्र फळ खोटे ठरवायचे आहे तर एकदम सोप्प काम आहे .. पण जर ते खरं ठरवायचं असेल तर ती ऋषीमुनींनी दिलेली संख्या पार पदवीच लागते .. ते करा म्हणजे हा वाद कायमचा मिटेल ... अहो सोप्पी गोष्ट आहे .. ऋषीमुनींना हे मनाचे खेळ फार आधीच समजले होते ... त्यांनी दिलेला हा अगाध ठेवा जातं होण्यासाठीच देव हि संकल्पना साकारली गेली ... निरीश्वरवादी आणि ईश्वरवादी हे सारे थोतांड आहे ... पण एक मात्र नक्की , हि शृष्टी एका अनामिक आणि अगाध दैवी शक्तीवर कार्यरत आहे आणि ते विज्ञानापलीकडचे आहे ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

नवग्रह स्तोत्र फळ : "इति श्री वेदव्यास मुखोदगीतं यपठेतसुसमहितौ दिवावायदिवा रात्रौ विघनशांतीभविष्यति नरनारीनृपनाचं भवेददुस्वप्न नाशनं ऐश्वर्यं अतूलम तेषां आरोग्यम पुष्टिवर्धनम ग्रहनक्षत्रजा पिडांतस्कराग्नि समुद्भवाम ता सर्वा प्रशामम यान्ति व्यासो बृते निसंशयह "

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?
लॉजिकली हा प्रश्न अस्तिकांना आणि मूर्ख, इल्लॉजिकल नास्तिकांना पडू शकतो.

In reply to by arunjoshi123

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?
मध्यंतरी ईश्वर भेटला होता. त्याला मी हाच प्रश्न केला. तो म्हणाला," ते जरी मला मानत नसले तरी मी त्यांना मानतो. मी त्यांना शिक्षाही करत नाही व बक्शीस ही देत नाही." :)

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही
ईश्वराने मानवास ईश्वर आहे की नाही हे ठरवा किंवा केवळ ईश्वर प्रार्थना करा यासाठी पृथ्वीवर पाठवलेले नाही. चांगले वाईट भोग, भोगण्यास पाठवले आहे, परिणाम स्वरुप निरीश्वरवाद्यांना ईश्वराने शिक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही. असे मी म्हणल्यास

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही आणि आस्तिकांनाच ईश्वर शिक्षा करतो हीच मुळात निरीश्वरवाद्यांची सर्वात मोठी अंधश्रध्दा आहे. एनि वे फारच महा लोल लेख आहे.

बापरे लोक एवढा गूढ आणि गहन विचार करतात? आणि एवढा त्याना वेळही असतो? आणि असा विचार करायला आवडतो? आमचे जीवन *शरद तळवलकर* आहे. काना मात्रा वेलांटी नसलेले सरळसोट. असला विचार सुचत नाही आणि सुचला तर झेपत नाही.

बापरे लोक एवढा गूढ आणि गहन विचार करतात? आणि एवढा त्याना वेळही असतो? आणि असा विचार करायला आवडतो? आमचे जीवन *शरद तळवलकर* आहे. काना मात्रा वेलांटी नसलेले सरळसोट. असला विचार सुचत नाही आणि सुचला तर झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

आमचे जीवन *शरद तळवलकर* आहे. देव बाप्पा कान कापेल म्हणून आमचे बालपण देखील शरद तळवलकर होते. आता वाटते "देव बाप्पा कान कापेल" हे तपासायला हवे होते.

मला एक प्रश्न पडलाय - जो नाहीच्चे त्याबद्द्ल (त्या देवाबद्दल ) यनावालासर इतके सतत का लिहीत राहतात. तो नाहीये हे मान्य ना मग त्याला जरा आरामात बसू द्या ना, नास्तिकांनी का इतके enguage करून ठेवायचे , थोडा तर आस्तिकांच्या वाट्याला येऊ द्या त्याला ! कि यनावाला सरांच्या मनात देवाने घर केले आहे ??

In reply to by सप्तरंगी

समाजात वावरतांना लोक देवधर्माचे प्रचंड बळी ठरतात. विवेक गमावून बसतात, त्याचं आपलं प्रबोधनाचं काम. पटलं तर घ्या नाय तर सोडून द्या. अशिक्षित लोकांचं एक वेळा प्रबोधन करता येईल पण उच्चशिक्षितांचं प्रबोधन करणे फ़ार अवघड आहे, ही वाढत्या देवधर्माच्या ठिकाणी वाढलेली गर्दी पाहता आणि भोंदुबाबांच्या नादी लागलेल्यांच्या बातम्या पाहता काही गोष्टी लक्षात येतात , त्यामुळे त्याचं एकमेव काम प्रबोधनाचं आहे, असे वाटते. एक अभंग आहे, जरासा वेगळा फ़क्त कामापूरत्या ओळी डकवतो. देव न लगे देव न लगे । साठवणेचे रुधले धागे ।। देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करू ।। -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आधुनिक समाजात वावरताना माणसानं थोडं व्यवहारी असावं. धर्मव्यवस्थेअंतर्गत सव्वा रुपया दक्षिणा लूटून पळणार्‍या भटाच्या मागे पळण्याऐवजी अर्थव्यवस्थेअंतर्गत ११५०० कोटी रुपये लूटणार्‍या मोदीच्या मागे लागावे.
वाढत्या देवधर्माच्या ठिकाणी वाढलेली गर्दी पाहता
असली आत्मसृजित स्वप्नं कुठून येतात कुणास ठाऊक. आम्हीही याच भारतात राहतोय. उच्चशिक्षित भारतीय आणि युरोपीय गोरे यांच्या संस्क्रुतीत फरक उरलेला आम्हाला दिसत नाही. देवाधर्माच्या जागी गर्दी वाढलेली कुठे दिसते? आमच्या शेजारच्च्या मॉलमधे देवपूजेची आणि दारूची दुकानं शेजार शेजारी आहेत. कुठलं ओसाड असतं हे लिहायची गरज नाही. दारुच्या अड्डयावर गर्दी करण्यापेक्षा देवळात केलेली कधीही बरी. देवळात, चर्चात वा मशिदीत सणासुदीला जमा झालेले जमाव बिनडोक नास्तिकांना एक प्रचंड भयप्रद झुंड वाटते, मूल्यहिन असा एकूल एक बसलेला नास्तिक देखील तितकाच भयप्रद लांडगा असू शकतो. आपण रिचर्ड डॉकिन्सचं उदाहरण घेऊ. https://www.huffingtonpost.com/2013/09/09/richard-dawkins-pedophilia_n_… हा इसम एक प्रतिष्ठित नास्तिक आहे. जगातला अग्रगण्य. ओबामाला आमच्या देशात सर्व धर्मांचा/विचारांचा आदर होतो इ इ करिता प्रत्येक धर्माचे लोक व्हाईट हावसात बोलावले होते त्यात हा नास्तिकांचा प्रतिनिधी म्हणून भेटायला आलेला. हा इसम म्हणतो कि बालकांवर धर्मसंस्कार करणं त्यांच्यावर बलात्कार करण्यापेक्षा घृणास्पद आहे. नि विधान कितीही विरोध होऊन त्यानं आजतागायत मागं घेतलं नाही. बालबलात्कारानं कायमचं असं कोणतंही नुकसान होत जे धार्मिक झाल्यामुळं आयुष्यभर होतं असा या इसमाचा युक्तिवाद आहे. म्हणजे उद्या एक पादरी आणि एक पेडोफाईल याच्याकडे आला तर आपलं मूल पेडोफाइलला देईल!!! https://www.youtube.com/watch?v=8EC42_2KIx0 ==================== विकृती या सर्वच प्रकारच्या व्यवस्थांत निर्माण होऊ शकतात. ज्या ज्या व्यवस्थांचे फेस व्हॅल्यू वर उद्दिष्टं चांगली आहेत नि आताचे चालक बरे आहेत तिच्यात सहभागी. तिच्या विरोधी व्यवस्थेशी सहिष्णोता असावी. नि परस्परविरोधी अशा दोन्ही व्यवस्थांतील वाईटपणा घालवण्यासाठी प्रयत्न करावेत, ती व्यवस्थाच नष्ट करायला जाऊन कलह माजवू नये.

In reply to by arunjoshi123

बाकी दैववादी असेच बिथरलेले असतात. त्यांचं प्रबोधन होऊ शकत नाही. मी आजच्या साठी थांबतो. आपलं प्रवचन सुरु ठेवा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्हाला त्यांच्या मुद्द्यांचं खंडन करता येत असेल तर बघा, नाहीतर तुम्ही इतरांना देता तो सल्ला लागू करून पहायला हरकत नसावी! इग्नोर करणे...उगाच बिथरल्यासारखं करून काय उपयोग? ============================== अजो...तुमचा मुद्दा पटतोय थोडा थोडा! शहरातल्या मंदिरात गर्दी नसली तरी, ठराविक देवस्थानांना होणारी तुफान गर्दी लक्षणीय आहे. अर्थात ती गर्दीही एकूण ईश्वरवादी लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे म्हणा. सगळेच ईश्वरवादी मंदिरात गर्दी करून अंधश्रद्धांना बळी पडतात हे स्वतःच्या नास्तिकतेला फुलवण्यासाठी नास्तिकांनी तयार केलेलं तुणतुणे आहे जे सदानकदा वाजवून स्वतःची नास्तिकता जागृत ठेवण्याची अपरिहार्यता नास्तिकांवर असते असे मला वाटते.

In reply to by बिटाकाका

ठराविक देवस्थानांना होणारी तुफान गर्दी लक्षणीय आहे. अर्थात ती गर्दीही एकूण ईश्वरवादी लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे म्हणा.
मुद्दा शांतपणे समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. ------------------ जनरली थोडसं आक्रामक वा तत्सम स्टाईलनं संवाद केला तर अंततः जी मंडळी तरीही सुसंवाद्य वा फक्त शांतपणे मुद्द्याचं बोलतात ती लवकर कळतात. ही एक रिलेशन बिल्डिंग वा कम्यूनिकेशन स्ट्रॅटेजी आहे नि त्यात हेतू कुणाला दुखवायचा इ. नसतो. व्यक्तिगत आयुष्यात मोस्टली सगळी मंडळी छानछानच असतात. जालावर ज्वरपूर्ण संवाद त्यामानानं सेफ असतो. --------------------------------- आता ईश्वरवादी लोक गर्दी करतात हि काय तक्रार झाली? देशात काय १४४ लागू असतं का नेहमी? नास्तिक लोक किती नगण्य आहेत तरी किती पार्ट्या करतात! तुच्छात तुच्छ नास्तिक त्या त्या सर्कल मधे प्रसिद्ध असतो. ते अंधश्रद्धावाले किती तरी मोर्चे मेळावे काढतात. दाभोळकरांच्या भाषणाला होते तिला गर्दीच म्हणतात ना? ------------------ लोक झेंडावंदन करायला किती गर्दी करतात. सरकारी खर्चानं देखावे इ इ होतात. काय गरज आहे? झेंडा नि देव त्याच अर्थांनी नि त्याच नियमांनी निरर्थक नाहीत का? देश असायला झेंडा कशाला लागतो? बिनझेंड्याचा देश का असू शकत नाही (बाय द वे, उगाच ७ बिलियन मधल्या काही लोकांचा एक उपगट बनवणे हे सुद्धा निरर्थकच आहे म्हणा, पण ते असो. असला निर्थकतेचा पाढा लै लांब जातो म्हणून माणसानं अस्तिक बनून सर्वाथ पाहिलेला परवडतं)? बिचार्‍या लहान्या पोरांना छळतात तालमी करवून करवून. --------------------- आता ठराविक जागांचं काही असतं म्हणून तिथं जास्त गर्दी होते. लाल किल्याच्या झेंडावंदनाला जास्त गर्दी होते. मग? नास्तिकी नियमांनुसार सर्व भूमींचे थोड्या फार फरकाने तेच रासायनिक कंपोझिशन असले तरी अस्तिकाच्या दृश्टीने स्थळाची वेगळा महिमा, पावित्र्य, वैशिष्ट्य, महात्म्य, इ इ असतं. ----------------------- गर्दी हा शब्द नास्तिकाकडनं वापरला जातो तेव्हा त्याला एक तुच्छता अभिप्रेत असते. नास्तिकाचं म्हणणं असतं कि मला कशाचाच डिफेन्स करायचा नाही तेव्हा मी जिंकणारच. पण कशाचाच डीफेन्स न करायच्या नादात शेवटी स्वतःचाच डिफेन्स करता येत नाही मग म्हणून चार गोष्टींना हो चार गोष्टींना नाही करायच्या नादात ते विचित्रविचारधारी बनतात. धागालेखक याचं आदर्श उदाहरण आहे.

In reply to by arunjoshi123

गर्दी, त्याचा तुच्छतादर्शक उल्लेख याबतीतील मुद्दा इतर उदाहरणामुळे पटला. त्यामुळे ते नास्तिकांचं एक राहू देतो. ------------------------------------------- पण धार्मिक स्थळी ते ज्या देवाला मानतात त्याचे काही सेकंदासाठी दर्शन घेण्यासाठी जी रेटारेटी, फसवणूक (स्वतःची आणि दुसऱ्यांची) चालते, हे कसे समर्थनीय आहे? देव चराचरात आहे हि शिकवण सर्व ईश्वरवाद्यांना का मान्य नसावी? हे एकूणच ईश्वरवादी व्यवस्थेचे फेल्युअर मानावे का? यामुळेच नास्तिकांचे फावते असे म्हणणे चुकीचे ठरेल काय? ------------------------------------------ अर्थात गर्दीच्या तशा वागण्याने कोणाचेच काही नुकसान होत नाही असे मला वाटते. मात्र अंधश्रद्धा बोकाळवणारी गर्दी मात्र डोक्यात जाते. उदा. नवस फेडायचा म्हणून मंदिरावरून लहान मुलांना खाली फेकणारी गर्दी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

न बिथरलेले असतानाही लोकांना लोक दैववादी आहेत का अजून काही आहेत हे कळत नाही. बिथरण्या न बिथरण्यात कै फरक असला पायजे राव. ============== बाय द वे, दैववादी मंजे काय?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा. साहेब माफी असावी पण सध्या येथे होणारे लेखन बघता मला "देवधर्म" हा शब्द बदलून त्या ऐवजी "मोदिद्वेष"हा शब्द वापरावसा वाटतो. कारण आपण केलेले सर्व वर्णन "मोदिद्वेष" या शब्दाला तंतोतंत लागू पडत आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण उच्चशिक्षितांचं प्रबोधन करणे फ़ार अवघड आहे,
जगात नास्तिकवादाचे अनेक विकृत उपप्रवाह जन्माला आलेत. हे उच्चशिक्षित असल्यानं, नि अकलेचा महाभयंकर माज असल्यामुळं, त्यांचं प्रबोधन असो त्यांचेशी संवाद साधणं सुद्धा असंभव आहे. त्याचं एक उदा. मिलिटंट अथेईझम नावाचा पंथ. धर्म नष्ट करण्यासाठी काहिही मंजे काहिहि केलं पाहिजे असं अनॉफिशियल सूत्र असलेले लोक. दुसरे हे बालबलात्कारवादी. --------------------------- आपण फक्त जास्त शहाणे आहोत इतकंच दाखवण्यासाठी जे लोक नास्तिक होतात पण ज्यांची नैतिक मूल्यं व्यवस्थित असतात नि ज्यांच्याकडून उपदेशांचे डोस प्यावे लागतात, असे नास्तिक डोकेदुखी आहेत, पण इतकी डोकेदुखी जगरहाटीचा भाग आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा लेख तसेच इथले आधीचे आणि या आधी उपक्रमावरील लेखन, अर्थात armchair activism पाहून हसायला येते. खरेच जर प्रबोधन करायचे असेल तर ते करण्यासाठी आभासी जाला पेक्षा वास्तवातील जगात करावे लागते. जसे नजीकच्या भूतकाळात दाभोलकरांनी केले होते, अजूनही ते कार्य करणारे ज्ञात अज्ञात भरपूर आहेत आणि न बोलता केवळ कृतीतून करणारेतर अनेक आहेत. यातील प्रत्येकाचा प्रत्येक विचार पटेलच असे नाही. पण त्यांच्या तळमळी बद्दल आदर वाटतो. इथे मात्र दिवाळीतील atom bomb च्या वातीला उदबत्ती लावून लांब उभे राहून अथवा कानावर हात ठेवून वागल्याप्रमाणे लेखन वाटते. लेखकाबद्दल आदर राखून म्हणावेसे वाटते, की खरेच असे half hearted प्रबोधन आणि मुख्यत्वे लेखनातला तिरस्कार पाहून वाटते की त्याना अशा एखाद्या भोंदू ईश्वरवादीचा अथवा एखाद्या बाबा- महाराजाचा व्यक्तिगत वाईट अनुभव आला आहे म्हणून हे सर्व चालले आहे. कालानुरूप प्रबोधनात पण बदल करणे गरजेचे असते. नाहीतर काय तो पण एक पंथच होतो आणि त्यावर चालणारे, महाजनो येन गत: स पंथ: प्रमाणे वाटचाल करत राहतात. दुर्दैवाने "निरीश्वरवाद पंथीय प्रबोधन" हे पण असल्या लेखात एखाद्या जुनाट पोथी सारखे वापरले जात आहे आणि त्यावर आधारित जिथे गरज नाही अशा ठिकाणी लेखन करून प्रबोधनाचे फळ मिळणार आणि आपल्याला हवा तसा समाज बदलणार अशी अंधश्रद्धा आहे. शेवटी काय, "साक्षात" मार्क्स बाबांनी म्हणल्याप्रमाणे रिलीजन (म्हणजे पंथ. भारतीय भाषांमधील "धर्म" नाही) अफूची गोळी आहे. हा रिलीजन भल्या भल्यांना नशा चढवतो. ती नशा हि निश्रीश्वारवादी पंथीयांना पण चढते. विशेष करून दुसर्या बाजूकडील जनतेला तुच्छ लेखायचे झाले की...

In reply to by विकास

>>>>>इथे मात्र दिवाळीतील atom bomb च्या वातीला उदबत्ती लावून लांब उभे राहून अथवा कानावर हात ठेवून वागल्याप्रमाणे लेखन वाटते. >>>> नुसते सुतळीबॉम्ब नाहीत, तडतड्या, साप गोळ्या, फुलबाज्या, भुईचक्र, भुसनळे, फुसके फटाके, लवंगी, केपा सगळे प्रकार प्रतिक्रियामध्ये पण बघायला मिळत आहेत. मजा आली! =))

In reply to by विकास

प्रबोधनाची अशी एक कोणती जागा नसते. चळवळींची सुरुवात कुठूनही होत असते, गल्ली बोळातून, कट्ट्यातून, कुठूनही. वास्तव जग असो की आभासी असो, विचारांची गरज असतेच असते. विशेषतः आपण जेव्हा स्वतःला सुशिक्षित म्हूणन घेतो तेव्हा तर त्याची खूप आवश्यकता असते. उच्चशिक्षित असून तुम्ही तुम्ही जर देवाळू लोकांच्या प्रवृत्तीमुळे अजूनही अज्ञानी म्हणून जगत असाल तर गेली अनेक दशके ज्या समाजधुरीनांनी प्रबोधन म्हणून जे प्रयत्न केले ते वायाच गेले असे म्हणावे लागेल. मला वाटतं यनांसरांचा प्रयत्न त्याचाच भाग आहे. कोणाला पटो ना पटो. अनेक शतकांच्या वहिवाटीमुळे हिंदू धर्मात कित्येक आततायी रुढी तयार झाल्या. व्रतवैकल्य, नवससायास, शुष्क कर्मकांड, निरर्थक-शाब्दिक तत्वचर्चा, विधिनिषेधात्मक क्रियाकर्म, हे आजही सुरुच आहे असे दिसते. विविध प्रकारचे देव, त्यांचे ते वेगवेगळे मंत्र, त्याचे ते क्लिष्ट तंत्र, त्यांची गुंतागंतीची पूजा यावर पहिलं प्रबोधन संतांनी केलं. अशा हाडामासात जाऊन बसलेल्या नव्हे रुतलेल्या गोष्टीतून बाहेर येणं इतकं सोपं नाही, कारण तो संस्काराचा भाग होता. आता त्यावर नक्कीच विचार केला पाहिजे. बाकी, भोंदू बाबा, चोवीस बाय सात चालत असलेली वाहिन्यांवरील विविध बापू, महाराज, मा, अक्का यांच्या अनुभवातून काय काय बाहेर येतं ते पाहिलंच पाहिजे. उगाच डोळेझाक करुन किंवा कोणाला त्याचा वाईट अनुभव असेल तर त्याचा विचार केलाच पाहिजे. देवाळू लोकांच्या अंधश्रद्धेमुळे देवाच्या नावावर दलाली करणारे मूर्ख, लबाड, ढोंगी निघत असूनही त्यांच्यावर बोलण्याऐवजी प्रबोधन करणार्‍यांकडे शंकेने पाहावं, त्यांच्या नावाने शिमगा व्हावा हे पाहून मात्र नवल वाटते. महाराष्ट्रात प्रबोधनाचा फार मोठा इतिहास आहे, तुम्हाला तो सर्व माहितीही आहे. आपलं वाचनही मला माहिती आहे. प्रबोधनाचा विडा उचलणारे संत असतील, आधुनिक विचारांचा पुरस्कार करणारे लोकहितवादी आणि त्यांच्या परंपरेतील सहकारी असतील म. फुले असतील या लोकांनी नेहमीच वास्तवाचं भान दिलं आहे हे नाकारुन चालणार नाही. आजही जागोजागी देवाच्या नावावर फसणारी मंडळी आहे, आजारपणात दवाखान्यात जाण्याऐवजी अंगारे धुपारे, गंडे दोरे यावर विश्वास ठेवणार्‍यांची संख्या पाहता आपण कोणत्या पुरातन काळात जगत आहोत असे वाटायला लागते. आराम खूर्चीतली चळवळ म्हणा किंवा आणखी काही म्हणा मिपावरच्या काही प्रतिक्रिया पाहता प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता आहे, यनासरांचे विचार भले कोणाला पटत नसतील, पण त्याच्या जागराला समर्थन देण्याची मला गरज वाटते. आता पन्नाशीला पोहचणारी पिढी बदलेल असे म्हणने तसे धाडसाचे आहे, पण येत्या पिढीला शहाणे सुरते करता आले, आधुनिक विचाराकडे घेऊन जाता आले तरी ते पुरे आहे. आपल्या आवडत्या संताचा दाखला देऊन या धाग्यावर थांबतो. (चुभुदेघे) सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर लौकिकार्थाने मी काही आस्तिक नाही ( कदाचित नास्तिकही नाही) मी आजवर मुंबईत राहून सिद्धिविनायकाला गेलो नाही शिर्डी किंवा तिरुपतीलाही गेलो नाही. ( लष्करी अधिकाऱ्यांना ओळखपत्र दाखवल्यास तात्काळ प्रवेश मिळत असतानाही). पण तरीही यनावाला यांचा अभिनिवेश कि नास्तिक लोकच हुशार असतात आणि आस्तिक लोक मूर्ख आहेत हा पटत नाही. जर समाजात जागृती करायची असेल तर मीच शहाणा हा अविर्भाव घेऊ चालत नाही. यनावाला प्रत्यक्ष तसे नसतील परंतु त्यांच्या एकंदर लेखामध्ये असा अविर्भाव नक्कीच जाणवतो. मागच्या लेखात त्यांनी श्रद्धेवर जहाल टीका केली होती. अशा तर्हेने टीका करण्यासाठी त्या माणसाला "तितका अधिकार" असावा लागतो आणि समाजमनात अधिष्ठान असावे लागते.(जसे महात्मा फुले किंवा संत तुकाराम यांचे होते) आज अनेक लोक वेगवेगळ्या मर्त्य माणसांवर श्रद्धा बाळगून असतात ज्यात स्वतःचे वडील, शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशी माणसे असतात. हि माणसे काही अस्खलनशील नसतात पण माणसे त्यांच्यावर निरागस पणे निस्सीम श्रद्धा ठेवून असतात. अशा माणसांना आपण तुमची श्रद्धा हि अंधश्रद्धा आहे असे सांगून प्रबोधन करू शकत नाही. कारण आपली श्रद्धा हि दुसऱ्याची अंधश्रद्धा असते. उदाहरण म्हणून देतो-- एखाद्या अतिलठ्ठ माणसाला "तू मूर्ख आहेस आणि इतकं साधं कळत नाही का कि अति खाऊ नये" हे सांगितले तर तो तुमचे म्हणणे ऐकेल का? बाकी उच्च पातळीवरची चर्चा काही मला झेपत नाही तरी यनावालांचा प्रबोधनाचा हेतू स्तुत्य असला तरीही त्यांचा असा आक्रमक पवित्रा मात्र उलट परिणाम करेल असेच वाटते. असो.

In reply to by सुबोध खरे

प्रबोधन काही वेळा आंजारुन गोंजारुन करावे लागते तर काही वेळा काहींसाठी प्रहार करुन. यना वाला हे प्रहार करुन प्रबोधन करतात. ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाच्या परिक्षणात जयंत नारळीकर म्हणतात," 'फलज्योतिष ही एक अंधश्रद्धा आहे' हे समजावून सांगायला लागणे आणि तेही निरक्षरांना नव्हे तर डिग्री विभूषितांना, उच्चपद्स्थांना, समाजधुरिणांनादेखील, इथेच खरी शोकांतिका आहे. अशा वेळी तुम्ही अंधश्रद्ध आहात, फसव्या विचारसरणी मागे धावून आपले हसे करुन घेत आहात.' वगैरे आक्रमक प्रचार योग्य ठरत नाही. लहानपणी सूर्य आणि वार्‍याच्य़ा चढाओढीची गोष्ट वाचली होती, त्याचा प्रत्यय येथे येतो. वारा आणि सूर्य दोघांपैकी कोण एका पादचार्‍याचा कोट त्याच्या अंगावरुन काढून दाखवेल, अशी स्पर्धा होती. वारा वेगाने वाहू लागला, तसे पादचा-याने कोट आवळून धरला. अखेर वाराच थकला. मग सूर्य पुढे आला. त्याने संथपणे प्रकाशणे चालू ठेवले आणि काही वेळाने पादचार्‍याने फार उकडायला लागले, म्हणून कोट काढला. आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळुन धरला जातो. पण त्या व्यक्तिला सौम्य शब्दात पटवून दिले आणि त्याने स्वत:हून तो कोट काढून फेकून दिला तर ते जास्त प्रभावी ठरणार नाही का? घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे."

In reply to by प्रकाश घाटपांडे

घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे.
अर्थातच, प्रकाशच तो! तुमचे सगळेच लिखाण, त्यामागील संयत भूमिका नेहमीच अतिशय आवडत आलेले आहे. आता ह्या धाग्यावरही तुमचे प्रतिसाद, तुमच्या ह्या संयत भूमिकेला अधोरेखित करणारेच आहेत. वयाने वाढत असतांना माणसे अधिकाधिक नम्र व्हावीत, दुसर्‍यांबद्दल त्यांच्या मनांत आदर वाढावा, शब्द जपून बोलावेत व लिहावेत असे अपेक्षित असते. तुमची वाटचाल अशीच आहे. दुर्दैवाने, इतर काही मात्र जुन्याच, पोरकट म्हणाव्या अशा आक्रस्ताळी भूमिकेस चिकटून बसले आहेत. त्यांच्याविषयी काय म्हणणार?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही अतिशयोक्त वक्त्यव्ये ज्यांचं इथे मिपावर कोणीच समर्थन केल्याचं दिसत नाही. केलं असल्यास दाखवून द्या, मी माझे वक्तव्य मागे घेण्यास तयार आहे. १. उच्चशिक्षित असून तुम्ही तुम्ही जर देवाळू लोकांच्या प्रवृत्तीमुळे अजूनही अज्ञानी म्हणून जगत असाल......म्हणजे नेमके कसले अज्ञान? जगात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या अज्ञानात असतो. जोपर्यंत त्या अज्ञानाचा काही दुष्परिणाम नाही तोपर्यंत त्याचा काय त्रास आहे? तुम्ही म्हणता त्या अज्ञानाचा नेमका त्रास काय? २. समाजधुरीनांनी प्रबोधन म्हणून जे प्रयत्न केले ते वायाच गेले असे म्हणावे लागेल.....यात कोणते समाजधुरीनी तुम्ही गृहीत धरता? सगळे समाजधुरीनी नास्तिक (किंवा तुमच्या भाषेत अ-देवाळू) होते असा आपला दावा आहे का? ३.भोंदू बाबा, चोवीस बाय सात चालत असलेली वाहिन्यांवरील विविध बापू, महाराज, मा, अक्का यांच्या अनुभवातून काय काय बाहेर येतं ते पाहिलंच पाहिजे.....नक्की पहाच. ते त्यांच्या प्रवचनांमधून समाज प्रबोधन करतात कि अंधश्रद्धा पसरवतात हे कळण्यासाठी ते आधी पाहणे गरजेचे आहे. ४. ...ढोंगी निघत असूनही त्यांच्यावर बोलण्याऐवजी प्रबोधन करणार्‍यांकडे शंकेने पाहावं, त्यांच्या नावाने शिमगा व्हावा हे पाहून मात्र नवल वाटते.....शंका येते कारण ढोंगी निघण्याचे प्रमाण १००% गृहीत धरण्यात येत आहे. शिवाय जे देवाळू आहेत आणि अशा भोंदू लोकांवर विश्वास ठेवतात त्यांचे प्रमाणही सहेतुक १००% धरण्यात येत आहे. ५. आजारपणात दवाखान्यात जाण्याऐवजी अंगारे धुपारे, गंडे दोरे यावर विश्वास ठेवणार्‍यांची संख्या पाहता.....हे अतिशय परिस्थितीला धरून नसणारे वक्तव्य आहे. दवाखान्यात जाणाऱ्यांची संख्या वाढतेय कि कमी होतेय? मग खेड्यापाड्यात दवाखाने नाहीत, शहरात जावे लागते हि ओरड बरेच वेळेस ऐकण्यात का येते? कि शहरातले लोक गंडे दोरे आधी करतात आणि मग दवाखान्यात जातात? ते "संख्या" मध्ये नेमके प्रमाण किती गृहीत धरत आहात आपण? आणि कोणते देवाळू लोक त्याचे समर्थन करतात? ६. तुकारामांचा अभंग तुम्ही मानता, तुकाराम देवाला मानीत याबद्दल आपले काय म्हणणे आहे? ----------------------------------- स्वतःच्या सोयीसाठी देवाळू लोक म्हणजे अंधश्रद्धाळू लोक हे गृहीतकच मुळी नास्तिकांवर घेण्यात येणाऱ्या शंकांचं कारण आहे असे मला वाटते. ---------------------------------- तुम्ही प्रतिसादाला उत्तर नाही दिलेत तरी चालेल, प्रत्येक प्रतिसादाला उत्तर दिलेच पाहिजे हा मिपाचा नियम नाही. पण चर्चा अशी झाली पाहिजे, तशी झाली पाहिजे असे सांगणे म्हणजे....लोका सांगे...