Skip to main content

लेखाजोखा ४ वर्षाचा

लेखक संन्यस्त खड्ग यांनी मंगळवार, 06/02/2018 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
अच्छेदिन वाले सरकारचे ४ वर्षातील कामे ▪️आधार कार्ड बनवा. ▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा ▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा. ▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा ▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा ▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा. ▪️नोट बदलून घ्या. ▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया. ▪️गैस सब्सिडी सरेंडर करा. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा ▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा. ▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा. ▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा ▪️सर्विस वर टॅक्स भरा ▪️कफन वर टैक्स भरा. ▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही. ▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश ▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका गोव्यात मजेत खाऊ शकतात. ▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. ▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. ▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? ▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला. ७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का? "अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते. हे तुम्हाला माहीत नाही का?" ▪️आधार कार्ड बनवा. ▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा ▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा. ▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा ▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा ▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा. ▪️नोट बदलून घ्या. ▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया. ▪️गैस सब्सिडी सरेंडर करा. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा ▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा. ▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा. ▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा ▪️सर्विस वर टॅक्स भरा ▪️कफन वर टैक्स भरा. ▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही. ▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश ▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका गोव्यात मजेत खाऊ शकतात. ▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. ▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. ▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? ▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला. ७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का? "अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते. हे तुम्हाला माहीत नाही का?"

वाचने 40915
प्रतिक्रिया 222

प्रतिक्रिया

In reply to by मार्मिक गोडसे

अग्गोबै , म्हणजे सरकारने डंपिंगची भूमिका पार पाडली की काय ? .... विकिपेडियावरपण वाढती मागणी व स्वस्त कच्चा माल यामुळे दर कमी होत आहेत , असे लिहिले आहे. .... असो , भक्त अभक्तांचे तिमिर जाओ..

In reply to by manguu@mail.com

यात काँग्रेसचा घोटाळा काय, हे समजले नाही. मग अशीच उलट उदाहरणे दिली.. तर ? भाजपाचा पेट्रोल घोटाळा ... काँग्रेसच्या काळात ५० होते . ह्यांच्या काळात ८० झाले ... !

In reply to by manguu@mail.com

बिनबुडाचे आरोप करणे अंधभक्तीचे पहिले लक्षण आहे असे कोणीसे म्हणून गेले आहे. तुम्ही लक्षणे सार्थ करण्याचा प्रयत्न करत आहात का? खालील लिंक वर जाऊन पेट्रोल कधी कधी कसे कसे वाढत गेले तेवढे पाहून घ्या अंधभक्ती/अंधविरोध सोडून. https://www.mypetrolprice.com/petrol-price-chart.aspx

In reply to by बिटाकाका

ते उदाहरण sarcastically दिले होते. काँग्रेसच्या काळात बल्बच्या किमती जास्त होत्या.. नंतर प्रायसेस जगभर पडल्या , तेंव्हा नेमके मोदी सरकार आहे , एल् इ डी बल्बच्या किमती स्वस्त आहेत. मोदीजी म्हणतात ... हा काँग्रेसचा घोटाळाच आहे म्हणून. कारण तेंव्हा म्हणे किमती जास्त होत्या. म्हणून दुसरे मी उलट उदाहरण दिले .

In reply to by manguu@mail.com

अहो तुम्ही दिलेले उदाहरण तरी बरोबर आहे का हे पहा म्हणून सांगत आहे. दुसरं उदाहरण शोधायला हरकत नसावी!

In reply to by मार्मिक गोडसे

मागणी कोणामुळे आणि कशी वाढली हे पण गुगल करा. EESL नामक सरकारी कंपनीबद्द्ल गुगल करा. या कंपनीने दिलेल्या मास ऑर्डरी आणि त्यांचं सरकारी वीज कंपन्यांकडून केलेलं एफेक्टीव वितरण हे या बल्बची किंमत कमी होण्यामागचं कारण आहे. मोदी म्हणतायत त्यात पूर्ण तथ्य आहे. या किमती सरकारने दिलेल्या अतिप्रचंड ऑर्डरींने कमी झालेल्या आहेत.

In reply to by अनुप ढेरे

Global decline. https://www.ledinside.com/pricequotes/2016/10/recovery_of_global_led_ma… https://www.ledinside.com/pricequotes/2016/10/recovery_of_global_led_ma… पेट्रोलच्या किमती पडल्या तर त्याच्या किमती कमी नाही केल्या , कारण तेल विक्री व टॅक्स ह्याना म्हणजे सरकारला मिळत होते. LED च्या प्रायसेस ग्लोबली ढासळल्या तर जणू काही मुंगीमुळेच मेरुपर्वत हलला अशा थाटात गाजावाजा... आयजीच्या जिवावर बायजी उदार , हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ... या म्हणी आठवल्या.

In reply to by manguu@mail.com

अंधविरोध! वेळ काढून वाचा! कुणी काय केले, कुणाचा जिवावर कोण उदार वगैरे सगळं सापडेल. सरकार ने बल्ब च्या ऑर्डर कधी टाकल्या, आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव कधी पडले वगैरे सगळं शोधलं कि सापडतं! अंधविरोध करायचा असला कि हवं ते सापडतं! पियुष गोयल यांच्या योग्य नियोजनाखाली युपीए सरकारची हि संथ गतीने धावणारी योजना अत्यंत योग्यपणे राबवली गेली हे मान्य करायला फक्त अंधविरोधच आडवा येऊ शकतो. https://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/how-modi-gov…

In reply to by बिटाकाका

Consumers, however, may still be in a state of confusion. Here's why. In the open market, locally branded LED bulbs retail for Rs 200-300; and at the other end of the price spectrum you have the imported LED bulbs that can be picked up for as low as Rs 60. Further, some have BIS marks, others don't. And the warranty period varies from two years to three years. Those who buy the cheapest Chinese LED, for example, don't get any warranty at all. The intensity of brightness (measured in Lumens) varies, leading to further confusion for consumers. A 9 watt Chinese LED, for example, is half as bright as a 9 watt BIS-marked LED of an Indian manufacturer. The imported variety, meanwhile, are of two types. One is that being retailed by Indian firms like Syska LED, and the other are the cheaper unbranded ones of Chinese manufacturers. Syska LED has not participated in any one of the nine rounds of bidding for government procurement, relying solely on imported bulbs and selling at a cost much higher than government-determined prices. That raises the question whether the price will bounce back once the government exits and the industry fully takes over the LED space, tentatively by April 2019. Bajaj Electricals, one of the leading players in the LED market and contemplating an expansion of its LED manufacturing facility beyond its current unit in Nashik, does not foresee prices rising back to unaffordable levels. चायनीज कंपन्या !!! ते चायना म्हणजे तेच ना , तिथले अध्यक्ष अन इथले प्रधानसेवक झोपाळ्यावर झुलत होते ?

In reply to by manguu@mail.com

तुमच्या अंधभक्ती/अंधविरोधाला सलाम! नीट वाचत चला हो! सिलेक्टिव्ह रिडींग बरेच वेळेला तोंडघशी पाडतं, अनुभव आहेच तुम्हाला! तुमचं तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय म्हणताय ते?

सरकारने फक्त LED बल्ब वितरीत केले आहे,तेही ९ wattचे, मग led tubelight का स्वस्त झाल्या? उगाच ढोल बडवण्यापेक्षा मार्केट मध्ये फिरून बघा. स्वस्त मालामुळे गल्लोगल्ली led बल्ब व tube च्या जुळवणीचे उद्योग सुरू झाले आहेत. चीनची कृपा.

In reply to by मार्मिक गोडसे

आँ? ज्या इकॉनॉमि ऑफ स्केलचा बल्ब असेंब्लीला फायदा होतो त्याचा ट्युबला नाही होणार?? त्या गुंतवणूकिने ट्युब असेम्ब्लीला फायदा नाही होणार? कैच्याकै.

भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानात निघून जावं असं विधान करणं भाजप खासदार विनय कटियार यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कटियार यांच्या या वक्तव्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला प्रचंड भडकले आहेत. 'हा देश तुमच्या बापाचा आहे काय?,' अशी टीका फारूख अब्दुल्ला यांनी केली आहे. ...... परवा पेप्रात बातमी आली आहे. राष्ट्रपती भवनच्या मागे १२ एकरात मोघल गार्डन मस्त फुलले आहे म्हणून . सध्या काही दिवस आम आदमी को खुला है म्हणे .. मी एका आर्किटेक्टला विचारले .. मोघल गार्डन , मोघल आर्किटेक्ट , चारबाग ( कुराणातले ) शिकवतात का ? तर उत्तर मिळाले ... हो SSSSS.... ( मग म्या इचारले .. पर्णकुटी कशी बांधायची हे शिकवतात का ? तर वस्स करून अंगावरच आले !! )

In reply to by manguu@mail.com

( मग म्या इचारले .. पर्णकुटी कशी बांधायची हे शिकवतात का ? तर वस्स करून अंगावरच आले !! ) ==>> हाहाहा ..!!

In reply to by सुबोध खरे

सगळंच गॉड गॉड म्हंटल्यावर कसे चालायचे??? दुसरी काळी बाजू पण माहिती पाहिजे ना. त्यातून विचार करता येईल नेमके काय निवडायचे ते. बाकी 'सूर्याचा किरण आणि अंधार' हा रेफरन्स नीट समजला नाही आहे.

In reply to by विशुमित

त्यांना ray ऑफ hope म्हणायचं असावं.. बाकी भारतीय वास्तुशास्त्राचे एकाहून एक अस्सल नमुने असताना यांना परणकुटी आठवावी आणि तुमच्यासारख्यानी केवळ विरोधासाठी विरोध म्हणून दुजोरा द्यावा यासारखे दुर्दैव नाही. असो चालायचंच.

In reply to by आनन्दा

लोक विनोद पण फार गंभीरपणे घेतात बुवा...!! आता विनोदावर हसण्याला देखील आधार नंबर लिंक करायला लावू नये म्हणजे मिळवले.

In reply to by विशुमित

आता विनोदावर हसण्याला देखील आधार नंबर लिंक करायला लावू नये म्हणजे मिळवले.
ह्याह्याह्या... (......नाहीतर पुन्हा न हसणे म्हणजे असहिष्णुता वगैरे म्हणायचे लोक म्हणून हसून घेतले...:):)).

In reply to by बिटाकाका

छान केलंत. त्या रेणुका दीदी हसल्यातर नमो साहेबानी त्यांना राक्षसीण घोषित केले. म्हणून म्हंटले हसण्यासाठी आधार लिंक करायला पण लावतील सांगता येत नाही. त्यामुळे हसत आनंदित मजेत राहा...!! हसण्यासाठी पुरोगामी असण्याची काही गरज नाही आहे. अच्छे दिन आणे वाले है!

In reply to by विशुमित

नक्की बातमी द्या ना. कारण मी जे भाषण पाहिलं त्यात "असं हसू रामायण सिरियल नंतर ऐकलं नव्हतं" असं म्हटलं होत. ते वाक्य ऐकून मला दीपिका चिखलियांच्या हसूची आठवण झालेली. तुम्हाला राक्षशिणीची झाली. सो राक्षसिणीबरोबर तुलना तुम्ही केलीत.

In reply to by विशुमित

पाहिलंत, चष्मा घालून सगळ्या गोष्टींकडे पाहिले कि दुटप्पीपणा समोर येऊ शकतो! एकीकडे तुम्ही विनोदावर हसायला पाहिजे वगैरे सांगताय आणि दुसरीकडे मोदींच्या विनोदाला मात्र स्वतःचा अर्थ! हे म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते....! पंतप्रधानांचे भाषण चालू असताना जोरजोराने हसणाऱ्या रेणूकांना सभापती थांबवत असताना मोदींनी "त्यांना थांबवू नका, रामायण मालिकेनंतर पहिल्यांदाच असं हास्य ऐकण्याची संधी मिळाली आहे." असं काहीसं म्हटल्याचे वर्तमानपत्रे सांगतात! का बाबा आता कुठे गेली सहिष्णुता? हा विनोद चालत नाही का? (मला वैयक्तिकरित्या हा विनोद आवडला नाही, पण भाषणादरम्यान चालू असलेला थिल्लरपणाही चीड आणणारच होता).

In reply to by बिटाकाका

काका माझे डोळे शाबूत आहेत, कोणता ही चष्मा अजून तरी लागला नाही. तुम्हीच माझा प्रतिसाद नीट वाचा, चष्मा लावून. मी उलट म्हणतोय हसा, विनोदाला दाद द्या. आणि तो यू ट्यूब वर विडिओ पाहून घ्या. नायडू कसले बरसले आहेत रेणुका चौधरींवर. नंतर त्यांनी शांत राहून सभागृहाचा मान देखील राखला. भाजपीय सदस्य हस्तिनापूरच्या सभेत कौरव जसे हसत होते तसे बाके वाजवत होती. तो थिल्लरपणा जत्रेत मिळणाऱ्या रंगीत चष्मा घातल्यामुळे दिसणार नाही. असो चालायचे...

In reply to by विशुमित

अभ्यास वाढवा साहेब, सभागृहात बाके वाजवणे थिल्लरपणा केव्हापासून झाला? हाच तर तो चष्मा आहे. तेवढं राक्षसीण कुठे म्हटले तेवढं दाखवून द्या नाहीतर शब्द मागे घेण्याचं औदार्य दाखवण्याचा प्रयत्न करा. हसल्याबद्दल राक्षसीण म्हटले असा दावा करताय तो विनोद कळला म्हणून का? लंगडं समर्थन कशाचं करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे ते एक असोच!

In reply to by बिटाकाका

६०+ वय असलेल्या, अनेक वर्षे खासदार व केंद्रीय मंत्री असलेल्या महिलेने अक्राळविक्राळ हास्य करण्याचा पोरकटपणा करावा यात खांग्रेसींना अजिबात वावगं वाटलेलं नाही. कसं वाटणारं? ज्यांचा मालकच इतका पोरकट आणि अजिबात पाचपोच नसलेला आहे, त्यांना या महिलेची पप्पूगिरी आवडणारच. या आचरट महिलेने एक नवीन टर्म जन्माला घातली आहे. यापुढे LOL ऐवजी LLRC (Laughing Like Renuka Chaudhari) असे वापरले जाईल.

In reply to by बिटाकाका

manguu@mail.com या आयडी च्या समर्थानात कोणतेच कृत्य करायचे नाही हा मिपा वरचा अलिखित नियम आहे का? या वर देखील निष्पक्षतेचा चष्मा लावून कृपया भाष्य केले असते तर बरे वाटले असते. बाकी गा पै, अजो (आजकाल मिपावर फिरकताना दिसत नाहीत) आणि आता manguu@mail.कॉम यांच्या लिखाणाचा प्रामाणिकपणे सांगतो मी फॅन आहे. विषयांचे वेगवेगळे कंगोरे समजतात, ते ही अफलातून भाषेत.

In reply to by विशुमित

तुम्ही काय लिहिताय हे तुमहाला तरी उमगत असेल अशी अपेक्षा करतो. मी तुम्हाला किंवा कोणाला तुम्ही प्रतिसाद देता/देत नाहीत यावर काही बोललोय का? असेल तर दाखवून द्या. ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना मी उत्तर नाही दिले म्हणजे माझे त्यांना समर्थन आहे असा सोयीस्कर अर्थ तुम्ही काढला नसावा अशी अपेक्षा करतो.

In reply to by बिटाकाका

आम्ही मूढ, आम्हाला काय लिहतो हे उमगत नाही असे एकवेळ गृहीत धरा पण असहिष्णुतेचा शिक्का कोणावर आणि कशासाठी मारत चालला होतात? ""(......नाहीतर पुन्हा न हसणे म्हणजे असहिष्णुता वगैरे म्हणायचे लोक म्हणून हसून घेतले...:):)).""" हे तुम्हीच लिहले आहे ना? माझ्या प्रतिसादाला उप प्रतिसाद दिला म्हंटल्यावर तो माझ्यासाठीच होता अशी समजूत करून घायला मला वाव आहे. विनोदाला फक्त ह्यह्यह्या केले असते तर पुरेसे ठरले असते. हसण्यासाठी मी तरी अडवले नव्हते कोणाला. सुरवात तुम्ही करायची आणि परत म्हणायचे दाखवून द्या, याला काय अर्थ आहे.

In reply to by विशुमित

लोक विनोद पण फार गंभीरपणे घेतात बुवा...!!
ह्या तुमच्या वरच्या वाक्याबद्दल होतं ते! त्यातीलही विनोद खपला नाही होय, बरं! बाकी ते राक्षसीण कुठे म्हटले तेही सांगून टाका! कि तेही विनोद म्हणून घ्यायचं होतं? नाही तिथे हसायचं राहिलं आहे. पुन्हा म्हणाल लोक विनोदही गंभीरपणे घेतात वगैरे.

In reply to by बिटाकाका

https://www.misalpav.com/comment/981671#comment-981671 हा तुमचा प्रतिसाद वाचा आणि सांगा . लोक विनोद पण फार गंभीरपणे घेतात बुवा...!! ह्या वाक्यासाठी तुम्ही ह्याह्याह्या केले होते का? स्वतःचे प्रतिसाद तरी नीट वाचत चला मग लोकांना अभ्यास वाढवायला सांगा. आणि "लोक विनोद पण फार गंभीरपणे घेतात बुवा...!!" हे माझ्यासाठी कोणीतरी वापरले होते. हे वाक्य ह्या धाग्यातील प्रतिसादावर चपखल बसत होते म्हणून वापरले होते. त्यांनी कॉपी राईटचा दावा केला तर हटवायला माझी हरकत नसेल. https://www.misalpav.com/comment/980407#comment-980407 त्या धाग्यात विनोदासारखा काय होते हा संशोधनाचा भाग असताना देखील. त्या वेळेस मी पण नाईलाजास्तव नाही तिथे हसलो होतो विनोद समजून. https://www.misalpav.com/comment/980351#comment-980351 त्यामुळे म्हणतोय हसत खेळत मजेत राहा... चिल्लाक्स...!! आणि हो राक्षसीणच राहिले. तुम्ही वाच्यार्थाच घेणार म्हंटल्यावर भावार्थ कुठला तुम्हाला समजणार आहे. असो चालायचे.

In reply to by विशुमित

हा एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करण्याचा प्रयत्न आहे असे समजायला हरकत नसावी! भावार्थ, वाच्यार्थ वगैरे सोडा...लिहिलेलं काय हे तरी नक्कीच कळत असणार तुम्हाला! तुम्ही दुसऱ्याला विनोद सिरिअसली घेऊ नका हे सांगताय आणि मोदींनी केलेल्या विनोदाचा तुम्हाला हवा तसा अर्थ काढून त्यावर भाष्य करताय - हा मी काढलेला अर्थ भावार्थ/वाच्यार्थ कशातही बसवून कसा चुकीचा आहे हे सांगाल का? कुठे हसायचे कुठे नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि हे मी वर लिहिलेलेच आहे. पण विनोद पण चालत नाही हा शिक्का तुम्ही लावताय लोकांना (मागे कुणी कुठे म्हटलं होतं याच्याशी माझा काही संबंध नाही, मी त्याचा ट्रॅक ठेवून चालावं अशी अपेक्षा नसावी), म्हणून मी असहिष्णुतेचा मुद्दा मांडला! राक्षसीण कुठेही म्हणाले नाहीत, मी तो तसा अर्थ काढलाय असा सरळ मान्य करण्यात काय अडचण असावी? जाताजाता, मोदींच्या विनोदावर मते मांडणार्यांना ते छद्मी/कुत्सित/कि अजून कसलं हसणं योग्य वाटलं का यावर कोणी मत मांडताना दिसत नाही. यालाच मी माझ्या वैयक्तिक मतांनुसार चष्मा किंवा दुटप्पीपणा म्हणतो.

In reply to by बिटाकाका

हा एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करण्याचा प्रयत्न आहे असे समजायला हरकत नसावी!>> ==>> ते मी दाखवून दिलेच आहे तुमच्या बाबतीत. असो. भावार्थ, वाच्यार्थ वगैरे सोडा...लिहिलेलं काय हे तरी नक्कीच कळत असणार तुम्हाला!>>> ==>> एकाच कलरचा जत्रेतील गॉगल घातल्यावर भावार्थ, वाच्यार्थ कुठला समजायला. तुम्ही दुसऱ्याला विनोद सिरिअसली घेऊ नका हे सांगताय आणि मोदींनी केलेल्या विनोदाचा तुम्हाला हवा तसा अर्थ काढून त्यावर भाष्य करताय - हा मी काढलेला अर्थ भावार्थ/वाच्यार्थ कशातही बसवून कसा चुकीचा आहे हे सांगाल का? कुठे हसायचे कुठे नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि हे मी वर लिहिलेलेच आहे. पण विनोद पण चालत नाही हा शिक्का तुम्ही लावताय लोकांना (मागे कुणी कुठे म्हटलं होतं याच्याशी माझा काही संबंध नाही, मी त्याचा ट्रॅक ठेवून चालावं अशी अपेक्षा नसावी), म्हणून मी असहिष्णुतेचा मुद्दा मांडला!>>> ==>> स्वतःच्या प्रतिसादांचा क्रम एकदा चेक करून बघा आणि मग सांगा. राक्षसीण कुठेही म्हणाले नाहीत, मी तो तसा अर्थ काढलाय असा सरळ मान्य करण्यात काय अडचण असावी?>>> ==>> खालील लेखाचा शेवटचा परिच्छेद वाचा, मोदीजींच्या विनोदाचा सरळ अर्थ काय होतो हे बऱ्याच जणांनी व्यक्त केला आहे. आणखी काही उदाहरणे सापडली तर चिकवतो. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. लगेच बिगुलला देशद्रोहाच्या यादीत टाकू नका. http://www.bigul.co.in/bigul/2147/sec/9/modi%20speech तुमची अडचण काय आहे हे मला ज्ञात आहे फक्त मला कोणाच्या वर्मावर आता बोट ठेवायला जास्त आवडत नाही. जाताजाता, मोदींच्या विनोदावर मते मांडणार्यांना ते छद्मी/कुत्सित/कि अजून कसलं हसणं योग्य वाटलं का यावर कोणी मत मांडताना दिसत नाही. >>> ==>> प्रक्षुब्ध हा शब्द पण ऍड करा. मी जर संसदेत रेणुका चौधरींच्या जागेवर असतो तर यांचे भाषण ऐकून ढसाढसा रडलो असतो, चष्मा काढून. विडिओ पाहिला असेल तर शाह कसे बाके वाजवून हसत होते, इसके उपर भी गौर फर्माइये. मागे घोषणा बाजी करून कितीतरी तास संसदचे कामकाज वाया घालवले होते उसको भी याद करो...म्हणजे चष्मा आणि दुटप्पीपणाचा वाच्यार्थ भावार्थ नीट समजेल.

In reply to by विशुमित

पहिल्या चार मुद्द्यांना एकही उत्तर नाही, फक्त वैयक्तिक टीका!! हेच धोरण आहे का तुमचं? 100 जणांनी राक्षस असा अर्थ लावला म्हणून मोदी तसे म्हणाले हे सिद्ध होतं का?? मी तुम्हाला स्पष्ट विचारलं की मोदी तसे म्हणाले कि तुम्ही तसा अर्थ लावला तर तुम्ही इतरांनीही तसाच अर्थ लावलाय त्यामुळे मोदी तसेच म्हणाले हे सिद्ध करायचा प्रयत्न करत आहात. माझी काय अडचण आहे हे सांगून टाका, उगाच फालतू खडे मारून पळून तर गल्लीतली छोटी पोरं पण जातात. संसद बंद पाडणाऱ्या, धिंगाणा करणाऱ्या सगळ्या खासदारांवर, मग ते भाजप चे असले म्हणून काय झाले, टिका करण्यात मला अडचण किंवा कमीपणा नाहीये. तुम्ही शहा आणि रेणुका यांच्या हसण्याची तुलना करताय यातच काय ते आले. तुम्हाला फक्त तुमचा मुद्दा सिद्ध करायचा आहे आणि बाकी काहीही नाही असे दिसते. तुम्हीही त्यांच्यासारखेच किंबहुना त्यापेक्षा अजून विचित्रपणाने वागला असतात हे आपणच सांगत आहात, त्यामुळे त्यांच्या वागण्यात काहीच गैर नाही असे आपल्याला वाटणे साहजिक आहे. बाके वाजवणे म्हणजे थिल्लरपणा हे आपले मत आहे, अजून दुसरे काय बोलणार!

In reply to by बिटाकाका

पहिल्या चार मुद्द्यांना एकही उत्तर नाही, फक्त वैयक्तिक टीका!!>>> तुमचे चार मुद्दे जरा बुलेट करून देता का? म्हणजे उत्तर द्यायला सोपे जाईल. वैयक्तिक टीका कुठून चालू झाली ती पुन्हा विनंती करतो आणखी एकदा तपासून पहा. 100 जणांनी राक्षस असा अर्थ लावला म्हणून मोदी तसे म्हणाले हे सिद्ध होतं का??>>> ==>> बालिश प्रतिवाद. आपला पास. ते maangu दुसऱ्या धाग्यावर म्हंटल्या प्रमाणे काय अर्थ होतो तो तुम्ही सांगा. आमची बुद्धी तिथं पर्यंत पोहचत नाही. त्यांच्या बाबत बऱ्याच गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत म्हणजे त्यांनी त्या केल्याचं नाहीत हे म्हणणे थोडे धाडसाचे होईल. माझी काय अडचण आहे हे सांगून टाका, उगाच फालतू खडे मारून पळून तर गल्लीतली छोटी पोरं पण जातात.>>> ==>> माणूस एकदा काका झाले की त्यांना सगळे जण लहान लहान पोरेच दिसतात. तुमच्या हसण्याचा आणि माझ्या असहीष्णूतेचा काय संबंध ? हे पण सांगून टाका. काका झाले म्ह्णून डबल बायटिंग मिळणार नाही, सांगून ठेवतो. संसद बंद पाडणाऱ्या, धिंगाणा करणाऱ्या सगळ्या खासदारांवर, मग ते भाजप चे असले म्हणून काय झाले, टिका करण्यात मला अडचण किंवा कमीपणा नाहीये.>>> ==>> चांगली गोष्ट आहे. मी तरी कुठे कोणाचे उदात्तीकरण केले. फक्त आरसा दाखवला. नायडू म्हणत होते कोणीच संसदेत हसायचे नाही. संपूर्ण विडिओ तुम्ही बघितला आहेच. तुम्हाला फक्त तुमचा मुद्दा सिद्ध करायचा आहे आणि बाकी काहीही नाही असे दिसते.>>> ==>> तुम्ही काय करताय मग. सुरवात तुम्ही केली. तुम्हीही त्यांच्यासारखेच किंबहुना त्यापेक्षा अजून विचित्रपणाने वागला असतात हे आपणच सांगत आहात, त्यामुळे त्यांच्या वागण्यात काहीच गैर नाही असे आपल्याला वाटणे साहजिक आहे.>>> ==>> असे विचित्रपणाने वागायला पुढचा माणूस तसे भाग पाडत असेल तर मानवी स्वभावाच्या मर्यादा समजा हवे तर. मला तर केस उपटू वाटतात माझे यांचे भाषण चालू झाल्यावर. माझ्यासारखे बरीच जणांचे हे म्हणणे झाले आहे. अशा लोकांची सांगत लाभली नसावी बहुतेक म्हणून माहित नसेल. बाके वाजवणे म्हणजे थिल्लरपणा हे आपले मत आहे, अजून दुसरे काय बोलणार!>>> ==>> माझा प्रतिसाद पुन्हा नीट वाचावा हि विनंती करतो मग समजेल थिल्लरपणा मी कशाला बोललो ते.

In reply to by विशुमित

मी परत प्रतिवाद करायलाच हवा असं मला वाटत नाही. कोणते चार मुद्दे, बुलेट वगैरे अनावश्यक आहे. फक्त वर स्क्रोल करा आणि कळेल. मी तुमचे प्रतिसाद वाचलेत म्हणूनच तर मी माझी प्रतिक्रिया लिहिली आहे. बाकी ते काका, केस उपटणे वगैरे अतिशय बलिशपणाकडे झुकणारे वाटले, त्याबद्दल माझा पास! मी पातळी सोडू शकत नाही. मोदींनी राक्षस म्हटले की तुम्ही तसा अर्थ लावला? आणि त्यांचे हसणे संसदेची शोभा वाढवणारे होते का? हे दोन थेट प्रश्न!

In reply to by बिटाकाका

कोणते चार मुद्दे, बुलेट वगैरे अनावश्यक आहे.>> ==>> पहिल्या चार मुद्द्यांना एकही उत्तर नाही, फक्त वैयक्तिक टीका!!... हे तुम्हीच लिहले आहे. असे काय करताय. खाली तर फक्त दोनच मुद्दे दिलेत. बुलेट वगैरे अनावश्यक वाटत असेल तर राहू द्यात. मी तुमचे प्रतिसाद वाचलेत म्हणूनच तर मी माझी प्रतिक्रिया लिहिली आहे.>>> ==>> तेच म्हणतोय तुम्ही नीट वाचले नाहीत चष्मा लावून. बाकी ते काका, केस उपटणे वगैरे अतिशय बलिशपणाकडे झुकणारे वाटले, त्याबद्दल माझा पास! मी पातळी सोडू शकत नाही.>>> ==>>'काका" तुमच्या सदस्य नामामध्ये काका होते म्हणून वापरले. आपल्याला रुचले नसेल तर क्षमस्व. केस उपटणे हे मी कशासाठी वापरले हे तुम्हाला समजलेच नाही बहुतेक. असो. पातळी तुम्ही तुमच्या पहिल्याच मला दिलेल्या उप-प्रतिसादात सोडली म्हणून एवढे मोठे 'यदाकदाचित' घडलं. याला आपण दोघे समसमान जवाबदार आहोत असे वाटते. तुम्हाला तुमचा वाटा घायचा नसेल तर मी घेतो. हाकानाका. असहिष्णुताचा मुद्दा तुम्ही सोयीस्कर बाजूला केलात. असो. मोदींनी राक्षस म्हटले की तुम्ही तसा अर्थ लावला? ==>> वाच्यार्थ आणि भावार्थ तुम्हाला सांगितलं आहेच. तुम्हीच ठरवा, तुम्हाला काय घायचा तो. आणि त्यांचे हसणे संसदेची शोभा वाढवणारे होते का?>> ==>> नक्कीच नव्हते. पण माझा रोख तो नव्हताच. हसायचे कि नाही हे मी आनंद याना विचारला होता. तुम्हाला कोठून असहिष्णुता दिसली काय माहित. असो... आशा करतो तुमचे समाधान झाले असावे.

स्वतःच्या राजकीय प्राधान्यांना सुखावण्यासाठी अंधविरोध आणि प्रत्येक गोष्टीकडे चष्मा घालून बघण्यात लोकांना काय आनंद होतो देव जाणे. भाजप चांगलं सरकार चालवत नाही ते या कारणांमुळे आणि हिच कारणे आधीचे सरकार व्यवस्थित हाताळत होते म्हणून त्यांना परत सरकारात आणलं पाहिजे असं सरळ मत ठेवण्यात अडचण ती काय? वरील मुद्द्यांपैकी बहुतेक मुद्द्यांवर आक्षेप काय हे काहीच कळले नाही . भाजप ने हे केले, ते केले, पण त्यात चुकीचे काय केले हे कोण लिहिणार? बाकी लेखक महोदय परत धाग्याकडे फिरकलेले दिसत नाहीत!

In reply to by सुबोध खरे

कधी परत येतील, त्यांना बर्याच जणांनी या लिंका जोडणी करून घ्यायच्या खोळंबल्या आहेत. अखिल मिपा नानावतारी वडाची साल पिंपळाला लावण्याची कलाबाज स्वयंघोषित सुधारक (धूमकेतू) विचारवंत यांच्या नमोकावीळ या साथीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या बद्दल अनुकंपा असलेला नाखु

मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले तसं ही पण हिट अँड रनची केस दिसतेय.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हीही एकच केक कापून हिट ॲंड रन केलेत. पुढच्या वाढदिवसांचे केक आलेच नैत की !

“When Indira Gandhi signed the Shimla Agreement, or the pact with Benazir Bhutto, we were not in agreement. However, Atal Bihari Vajpayee did not go out and talk about it, instead, he took time from Indira Gandhi and talked to her. We didn’t let the nation suffer.” मा. पं. प्र. मोदी ( लोकसभा भाषण ) कुणीतरी यांना सांगायला हवे , हे प्रचाराचे भाषण नाही , संसद आहे , इथले रेकॉर्ड असते. फेकत जाउ नका. सिमला करार झुल्फिकार भुत्तोसोबत झाला होता .

In reply to by कपिलमुनी

अर्थात कोणीतरी मोदींना सांगायलाच हवे की हे सतत संदर्भ चुकणे हास्यास्पद होत चालले आहे. भाषणाच्या ओघात हे रेफरन्स चुकतात तेव्हा प्रत्येकवेळेला मुद्यांपेक्षा चुकांवर लक्ष देणाऱ्या (भावार्थ की वाच्यार्थ वगैरे न बघणाऱ्या) लोकांना आयतेच कोलीत मिळते. मोदीसाहेब, या बाबतीत सुधारणा करणे गरजेचे आहे. बाकी, ते बेनझीर विररुद्ध झुल्फिकार काही क्षण बाजूला ठेवून वरील मुद्द्याबद्दल आपले काय म्हणणे आहे तेही मांडा की राव! अनावधानाने संदर्भ चुकणे म्हणजे फेकणे असते होय, छानय की!!

In reply to by बिटाकाका

बिटाकाका,
अनावधानाने संदर्भ चुकणे म्हणजे फेकणे असते होय, छानय की!!
काय बोललात! 'गरिबी ही मानसिक अवस्था आहे' हे विधान फेकणे या सदरांत मोडेल काय? आ.न., -गा.पै.

In reply to by बिटाकाका

ठीक आहे त्यांच्याकडून अनावधानाने झालेल्या चुकीला फेकणे म्हणता येणार नाही. परंतू जमीन कसायला घेताना ती नापीक आहे हे माहीत असताना ती कसायची सोडून उगाच ज्याने ती नापीक केली त्याच्या नावाने खडे फोडण्यात काही अर्थ नाही. भरपूर मनुष्यबळ असूनही नसेल जमत तर द्या सोडून जमीन कसने. आणि बजेटच्या भाषणात अर्थमंत्री म्हणाले होते की , आम्ही रब्बी पिकाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव दिला आता हे ही अनावधानाने म्हटले असं समजून दुर्लक्ष करायचे का ?

In reply to by मार्मिक गोडसे

जमीन कसण्यात त्याना interest असता तर ४७ साली त्यांचे लोक पंतप्रधानच नसते का झाले ? आजादी की लडाई लढून मुस्लिम लीग आणि काँग्रेसने आपापल्या वाटण्या घेतल्या. हे ना ह्यांच्या बाजूचे , ना त्यांच्या बाजूचे. ना ४२ ला लढले , ना ४७ ला खुर्चीत बसले .. नुसती काव काव काव काव.

In reply to by manguu@mail.com

हे अतिशय आक्षेपार्ह आहे. लढाईत कोण लढले कोण नाही हे कसे काय ठरवले तुम्ही? साधारण अशी बालीश वक्तव्ये स्वतःला मुस्लिम समाजाचा नेता समजणारा एक इसम सतत करत असतो. आजच्या पक्षांमधील कोणते नेते देशासाठी लढलेले आहेत हो? मग त्या पार्श्वभूमीवर तुमचे वरील वक्तव्य बलिशपणाचे ठरणार नाही का? @मार्मिक गोडसे - तुम्हाला खरच वाटत असेल कि तुमचा विरोध सेन्सिबल आहे तर मोदींची लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही भाषणे तुम्ही ऐका (तुमच्यासाठी तो कष्टदायक प्रकार असेल पण ऐका). शिवाय आदल्या दिवशीचे खर्गे यांचे आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे भाषण ऐका. मोदींचे भाषण हे त्या मुद्द्याना उत्तर होते. या भाषणामध्ये फक्त काँग्रेसवर टीका होती हे म्हणणे फक्त एवढेच सिद्ध करते की तुम्ही त्यांचे भाषण (स्वतः) पूर्ण ऐकले नाही हे निरीक्षण नोंदवू इच्छितो. आपल्याला ज्याचा विरोध करायचंय त्याचे पूर्ण ऐकून घेऊन विरोध करणे हे खऱ्या बुद्धिवादी लोकांचे लक्षण आहे याबाबतीत दुमत नसावे.

In reply to by बिटाकाका

कोण म्हणजे ? काँग्रेसने देशाचे वाटोळे केले अन भाजपा देशाचा उद्धार करत आहे , हे बोलताना भक्त लोक थोडेच काँग्रेसच्या व्यक्ती अन भाजपाच्या व्यक्ती , असा वेगळा हिशोब देतात ?

In reply to by manguu@mail.com

म्हणून त्याचा संबंध तुम्ही भारतीय स्वातंत्र्यसमराशी लावणार? मग त्याच हिशेबाने त्याआधीच्या युद्धांमध्ये भारताकडून कोण लढले आणि अफगाणी सत्तांकडून कोण लढले हाही हिशेब लावणार का? सर्वाधिक काळ काँग्रेस सत्तेत होती म्हणून त्या काळामध्ये ज्या एका वेगाने विकास व्हायला हवा होता तो झाला नाही म्हणून काँग्रेसला जबाबदार धरले तर त्यात चुकले काय? भाजपच्या काळात जे काही चुकले त्यावर टिका कराच की कोण नको म्हणतंय पण नुसती पूर्वग्रहित टिका करायला काही विशेष कौशल्य लागत नाही.

In reply to by बिटाकाका

या भाषणामध्ये फक्त काँग्रेसवर टीका होती हे म्हणणे फक्त एवढेच सिद्ध करते की तुम्ही त्यांचे भाषण (स्वतः) पूर्ण ऐकले नाही हे निरीक्षण नोंदवू इच्छितो. ते भाषण तुम्ही पूर्ण ऐकले असेलच, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असं पंतप्रधान म्हणतात आणि रब्बी पिकाबावत अर्थमंत्री बजेटच्या भाषणात धातांत खोटं बोलतात हे कसं असा मी प्रश्न विचारला तर त्याला तुम्ही सोयीस्कर बगल दिली. मागच्यांनी शेण खाल्ले त्याची शिक्षा त्यांना जनतेनी दिली आहे , स्वातंत्र्यानंतर अमुक पंतप्रधान असता तर तमुक झाले असते अशा अात्याबाईला मिशा असत्या तर? अशा गोष्टींमध्ये मध्ये मला तरी रस नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

आघाडीचे कीर्तनकार असतात ना अभंग घेतात एक आणि दृष्टांत देतात कुठली तरी प्रापंचिक, विनोदी, नेहमीचे, दोन चार इकडचे तिकडेच मस्त अभंग गातात आणि दीड तासाचे कीर्तन समाप्त. पुन्हा दुसऱ्या कार्यक्रमाला, तिकडे तेच कॅसेट लावतात. दृष्टांत आलटून पालटून. लोकांना असले कीर्तनकार खूप म्हणजे खूप आवडतात. लोकांना फक्त फर्डा वक्तृत्व करणारा, हावभाव करणारा, प्रसंगी रडणारा नौटंकीबाज कलाकार कीर्तनकार भावतो. सगळीकडे कॅसेट एकच. त्यांनी कीर्तनासाठी घेतलेला अभंग कोणता आहे, त्याचा कशा प्रकारे वाच्यार्थ आणि नंतर भावार्थ सोडवला आहे याचे कोणाला सोयरे सुतक नसते. दिसतो कसला भारी, कपडे कसले भारी, बोलतो कसला भारी, गातो कसला भारी , विनोद करतो कसला भारी एवढेच प्रिय असते. बाकी सगळी फेका फेकी का करेना.. कोण तपासायला जातंय. बाकी घेतात/ म्हणतात म्हणून आपण पण घ्या त्यांचे चरण दर्शन...! सब मायेचा दरबार...

In reply to by विशुमित

वाच्यार्थ आणि भावार्थ शब्द आवडले. परवा तीन तलाकबद्दल एक नेते काहीतरी बोलले तो वाच्यार्थ होता की भावार्थ? की अजून कोणता अर्थ होता? त्यांनी लाख फेकफेकी करूद्यात हो, तुम्ही आहात ना सुज्ञ? मग दाखवा ना त्यांची फेकफेकी उघड करून. उगाच फेकफेकी वगैरे मोठे शब्द वापरले की आपण फार अभ्यास करून बोलतो असे वाटायचे काही कारण नसावे. लोक कीर्तनातून काहीही सांगितले तर माना डोलावतात, कारण ते "श्रद्धाळू/भक्ताळू" किंवा इथल्याच एका नास्तिक लेखकाच्या मतानुसार मूर्ख असतात असे आपल्याला म्हणायचे आहे का? बाकीचे काही कीर्तनकार कधीही न बोलता, काही इंग्लिशबाधित हिंदीमध्ये आणि काही कीर्तनकार फक्त काड्या सारण्यासाठी कीर्तन करायचे हे निदर्शनास आणू इच्छितो. लोक त्यांनाही माना डोलावतात!

In reply to by बिटाकाका

वाच्यार्थ आणि भावार्थ शब्द आवडले.>> ==>> धन्यवाद. आमच्या गुरुवर्यांचे आहेत (जेष्ठ कीर्तनकार आहेत, कृपया गैरसमज नसावा) परवा तीन तलाकबद्दल एक नेते काहीतरी बोलले तो वाच्यार्थ होता की भावार्थ? की अजून कोणता अर्थ होता?>>> ==>> हे मला कशाला विचारता ? अशी शिक्के मारून सुरवात तुम्ही करता आणि मग म्हणता पोरेसोरे दगडे मारून पळून गेली. त्यांनी लाख फेकफेकी करूद्यात हो, तुम्ही आहात ना सुज्ञ?>> ==>> ढिगाने लेख पडलेत, वाचून काढा. लोक कीर्तनातून काहीही सांगितले तर माना डोलावतात, कारण ते "श्रद्धाळू/भक्ताळू" किंवा इथल्याच एका नास्तिक लेखकाच्या मतानुसार मूर्ख असतात असे आपल्याला म्हणायचे आहे का? >>> ==>> काहीही सांगितले/सांगत असेल आणि त्याला "श्रद्धाळू/भक्ताळू" फक्त माना डोलवत असतील तर अशा लोकांना मूर्खच म्हंटले पाहिजे नाही का? बाकीचे काही कीर्तनकार कधीही न बोलता, काही इंग्लिशबाधित हिंदीमध्ये आणि काही कीर्तनकार फक्त काड्या सारण्यासाठी कीर्तन करायचे हे निदर्शनास आणू इच्छितो.>>> ==>> अडचण खरी ही आहे, म्हणून लोकांना चष्म्याचे कारण पुढे करून टोप्या घालायचे काम चालले आहे. लोक त्यांनाही माना डोलावतात!>> ==>> लोकांनी त्यांच्या माना मोडल्या आहेत . त्यामुळे सध्य कीर्तनकारांनी देखील त्या भ्रमात राहू नये. टाळकरी प्रसंगी डोक्यात टाळ घालायला पण मागे पुढे पाहत नाहीत.

In reply to by विशुमित

काही म्हणजे काही कळले नाही बघा! तुम्हाला का विचारायचे म्हणजे? तुम्ही का विचारत आहात मग इतरांना? कसले शिक्के? गुरुवाऱ्यांचे नाव आले की तिथे आपली प्रतिक्रिया असते हे एक निरीक्षण आहे. तुम्ही आणखी कोणाचे समर्थक असाल तर तसं सांगा, म्हणजे त्यांचे प्रश्न तुमच्याकडे वळवू, हा.का.ना.का. ढिगानी लेख पडले आहेत तुमच्यासाठी देखील. असली उत्तरे कोणीही देऊ धकतो, कौशल्य काहीही नाही. तेच सांगतोय, (बहुतांशी)जनता हुशार आहे हो, निश्चिन्त रहा! तुमच्या मूर्ख म्हणण्याने ती मूर्ख ठरत नाही.

In reply to by बिटाकाका

कोण गुरुवर्य ? कसले निरीक्षण? कोणाचे समर्थक ? कोणाला काय विचारायला गेलो मी? काही म्हणजे काही कळले नाही बघा! आता कुठे प्रतिक्रिया द्याची यासाठी पण आधार लिंक करावा लागणार की काय ? तेच सांगतोय, (बहुतांशी)जनता हुशार आहे हो, ते काहीही सांगितले तरी माना डोलावणारे मूर्ख नाही आहेत. त्यामुळे आम्ही देखील निश्चिन्त आहोत.

In reply to by विशुमित

गुरुवर्य कोण हे पुढे संदर्भ दिसला की सांगतो/कळवतो! बाकी, "आधार लिंक..." बद्दल परत एकदा ह्याह्यह्या...(सर्कल पूर्ण झाले)!!

In reply to by मार्मिक गोडसे

पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते मला अजूनही कळले नाही. पंतप्रधान उत्पादन दुप्पट करण्याबद्दल बोलले आणि जेटली रब्बीचा भाव दिडपट दिला म्हणाले असं तुम्ही म्हणताय. बरं मग? तुम्हाला नेमकं कोण काय खोटं बोललं असं सूचित करायचंय ते सांगता का? दुसरा मुद्दा - अत्याबाईला मिशा आल्या असत्या तर वगैरे गोष्टींमध्ये तुम्हाला नसेल हो रस पण म्हणून जनतेला ते कळुच नये की काय? मागाच्याना जनतेने शिक्षा ही त्यांनी शेण खाल्ले म्हणून होती हे मान्य केल्याबद्दल अभिनंदन! तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्याच्या सत्तेतील पक्षाने चुनावी जुमले वापरू नये असा नियम आहे की काय? त्यांच्या भाषणातील बरेचसे मुद्दे (मी परत अधोरेखित करू इच्छितो की त्यांची कॉंग्रेसवरील सगळी टिका बहुतांशवेळी "आपने कहा.." याने सुरुवात करून होती) हे काँग्रेस करत असलेल्या हिट अँड रनला प्रत्युत्तर म्हणून होते. तुम्हाला फक्त त्यांचे काही जुमले लक्षात राहतात हा मोदींचा दोष असू शकत नाही. असो, ज्याच्या त्याच्या भूमिकेनुसार माणूस एखादी गोष्ट ग्रहण करत असतो. तुम्ही एखादेवेळेला तरी त्यांच्या भाषणात हे चांगलं वाटलं किंवा ते सत्य परिस्थितीला धरून होतं असं लिहिणार आहात का? नसेल तर मग तुम्ही मोदी फेकू आहेत ह्या तुमच्या मताला कवटाळून बसण्यास हरकत नसावी. ह्यांनीही शेण खाल्ले तर जनता कदाचित कोणी जास्ती शेण खाल्ले ते बघून त्यांना पुढच्यावेळी शिक्षा देईल हे नक्की!

In reply to by बिटाकाका

पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते मला अजूनही कळले नाही. अर्थमंत्री बजेट भाषणात धातांत खोटं बोलतात हे मी स्पष्ट म्हटलं आहे, त्याच आकडेवारीचा आधार घेवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले असे पंतप्रधान म्हणणार. त्यापेक्षा आताच अर्थमंत्र्यांना खोटी आकडेवारी फेकल्याबद्दल तंबी का देत नाही? की त्यांनाही ही फेक आकडेवारी मान्य आहे? मागाच्याना जनतेने शिक्षा ही त्यांनी शेण खाल्ले म्हणून होती हे मान्य केल्याबद्दल अभिनंदन! मी कधीच अमान्य केलेले नाही. अभिनंदनाची गरज नाही. सध्याच्या सत्तेतील पक्षाने चुनावी जुमले वापरू नये असा नियम आहे की काय? मी असं काही म्हटलेच नाहीये. चूनावी जुमल्याकरता संसदेचा वापर करत असतील तर चांगलेच आहे. पडुदे प्रथा, वाटल्यास श्रेयही घेऊ द्या.

In reply to by मार्मिक गोडसे

जेटली काय म्हणाले हे वाचून त्याबद्दल बोलतो. तुम्ही त्या दोघांच्या वक्तव्याचा संबंध जोडून मोदी पुढे असे म्हणतील असा काहीसा निष्कर्ष काढता आहात असे जाणवते, अधिक माहितीची आवश्यकता आहे. संसदेत राजकीय भाषणाची प्रथा पडू दे? हाहाहा! थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे कि कालचे मोदींचे भाषण म्हणजे संसदेतील पाहिले राजकीय भाषण आहे? काहीच्या काही! तरी मी वर विचारले तुम्ही खरगे यांचे भाषण आणि इतर नेत्यांचे भाषण वाचले/ऐकले का. मोदींचे भाषण आतापर्यंतच्या अनेक भाषणांपैकी मुद्देसूद आणि चांगले होते असे नम्रपणे नमूद करू इच्छितो!