Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग १९

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 02/01/2018 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
नववर्षाच्या सुरवातीला ट्रंपने पाकिस्तान बद्दल अत्यंत परखड ट्विट केल्यानंतर लगेच अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी २५.५ कोटी डॉलर्सची मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रंप अध्यक्श असेपर्यंत भारताने अमेरिकेच्या माध्यमातून पाकिस्तानवर दडपण आणून दाऊद, हाफिज सईद इ. अतिरेक्यांना आपल्या हवाली करण्यास लावावे. http://m.indiatoday.in/story/after-donald-trump-tweet-us-blocks-militar…

वाचने 40284
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

राष्ट्रवादीवर राळ उठवूनच दोन्ही पक्षांनी फायदा उठवला होता. कोणत्या तोंडानं जाऊन सरळ हातमिळवणी करतील? हां आतून जे काही चालतं त्यात काही फरक पडणार नाही कधी. पण पब्लिकली असं करणं दोघांनाही शक्य नाही. यात सगळ्यात जास्त गोची राष्ट्रवादीची होते. त्यांना रालोआ मधे येण्यासाठी कधीचं बाशिंग बांधून बसलेत.. पण भाजपाच त्यांना घेऊ शकत नाही [संघाचा विरोध हे आणिक एक कारण]. एक प्रादेशिक पक्ष म्हणून तरी बळकट व्हायला हवं ना.. उत्तरप्रदेशात वगैरे काय चाललंय ते दिसूनही दूधखुळं राहणं कोणताच राजकीय पक्ष करणार नाही. ४ वर्षात शिवसेनेनं सत्तेत राहून विरोध करण्याव्यतिरिक्त काय केलं हा एक जनरल प्रश्न जनतेत फिरू लागलाय लगेच. सरकार जे काही थोडं-बहुत काम करतंय, त्याचं सगळं क्रेडीट स्वतःकडे राहील अशीच पद्धतशीर आखणी भाजपानं केलेली होती. ती कळूनही साथ वेळेत न सोडण्याचा परिणाम कमी व्हावा म्हणूनच एक वर्ष आधी अशी घोषणा करण्यात आलेली आहे, असं माझं मत.

In reply to by गॅरी ट्रुमन

पवार काकांनी भाजपा राज्यसरकारला न मागता पाठिंबा देऊन जो बाण मारला त्याचे असली परिणाम आता दिसायला लागले आहेत. रालोआ ऑफीशिअली फुटायला सुरुवात झाली. केंद्रात काँग्रेस जर १०० खासदार आणु शकला तर तिसर्‍या आघाडीचे पं.प्र. उमेदवार पवारसाहेब असतील. त्याला बाहेरुन शिवसेनेची रसद मिळेल. महाराष्ट्रात चौरंगी लढत होण्याची शक्यता फार कमि आहे. शिवसेना बर्‍याच दिवसांनी कौतुकास्पद वागली. सेनेल झाला तर फायदाच होईल. लोकसभेत नुकसान होईल, पण विधानसभेत ते रिकव्हर करता येईल. राणे, खडसे यांच्याबाबत काहि निर्णय होईल आता. मुंबई महानगरपालिकेला उद्धवजी कसे मॅनेज करतील हे मात्र कळलं नाहि.

In reply to by अर्धवटराव

रालोआ ऑफीशिअली फुटायला सुरुवात झाली. कधीपासून झालं हे? उद्धटरावांनी काल जाहीर केलं की आम्ही २०१९ ची निवडणुक स्वतंत्र लढणार. पण हेच त्यांनी बरोबर एक वर्षापूर्वी जानेवारी २०१७ मध्येही सांगितलं होतं. आम्ही २५ वर्षे युतीत सडलो असे सांगून मी भविष्यात कोणाशीही युती करणार नाही असे त्यांनी उच्चरवाने सांगितले होते. शिवसेना स्वतंत्र लढणार म्हणजे रालोआ ऑफिशिअली फुटायला सुरूवात झाली असं म्हणायचं असेल तर हे एक वर्षापूर्वीच झालं आहे. अर्थात भाजप असल्या फुसक्या धमक्यांना अजिबात गांभीर्याने घेत नाही. आम्ही पाठिंबा काढणार या शिवसेनेच्या धमकीचे आता शतक व्हायला आले. अजूनही पाठिंबा सुरूच आहे. आम्ही भविष्यात कोणाशीही युती करणार नाही (जानेवारी २०१७), आमचे राजीनामे खिशात आहेत (फेब्रु २०१७), शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली नाही तर एप्रिलमधील अधिवेशन चालू देणार नाही (मार्च २०१७), एप्रिलमध्ये भूकंप होणार (मार्च २०१७), आम्ही आता निर्णयाच्या अगदी जवळ आलो आहोत (सप्टेंबर २०१७) . . . अशा अनेक फुसक्या धमक्या आल्या आणि विरून गेल्या. कालची नवीन धमकीसुद्धा तशीच विरून जाणार आहे. मुळात भाजप-सेना युती सप्टेंबर २०१४ मध्येच तुटली आहे. विधानसभा व नंतर झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले आहेत. २०१९ मध्ये सुद्धा त्यांच्यात युती होण्याची शक्यता नाही कारण भाजपचा जनाधार सेनेच्या तुलनेत खूप मोठा असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाल्याने भाजप सेनेला फारश्या जागा देणार नाही व आपणच मोठा भाऊ या भ्रमात सेना अजूनही असल्याने सेना तसे जागावाटप मान्य करणार नाही. भविष्यात युती होणार नाही हे भाजपला पक्के माहित असल्याने ते सेनेच्या धमक्यांना अजिबात गांभीर्याने घेत नाहीत. शिवसेना बर्‍याच दिवसांनी कौतुकास्पद वागली. सेनेल झाला तर फायदाच होईल. लोकसभेत नुकसान होईल, पण विधानसभेत ते रिकव्हर करता येईल. राणे, खडसे यांच्याबाबत काहि निर्णय होईल आता. मुंबई महानगरपालिकेला उद्धवजी कसे मॅनेज करतील हे मात्र कळलं नाहि. काहीही. सेनेचा मूर्खपणा अजिबात कमी झालेला नाही. आपला जनाधार भाजपच्या तुलनेत खूप कमी आहे ही वस्तुस्थिती मान्य करून युती केली तरच सेनेला फायदा होऊ शकेल. ताकद नसताना स्वबळावर लढण्याचा प्रयत्न सेनेने केला, तर सेनेचा अंत अटळ आहे. विधानसभेत स्वबळावर सेना जेमतेम ६३ जागांपर्यंत पोहोचली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाणे व काही प्रमाणात मुंबईचा अपवाद वगळला तर स्वबळावर लढणार्‍या सेनेची बहुतेक ठिकाणी वाट लागली. स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर भविष्यात सेनेचा जनाधार विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही कमी होणार हे नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

कधीपासून झालं हे?
शेट्टी आणि सेना बाहेर पडलेत. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातली हि खीडारे क्षुल्लक म्हणावी काय ? भाजपा किती सामर्थ्यवान आहे आणि सेना कशी बुळी आहे याचं चर्वीतचर्वण करण्यात काय हाशील? भाजप, काँग्रेस+राष्ट्रवादी, शिवसेना अशी तिरंगी लढत झाली भाजपाकरता फार काहि शुभ परिणाम होतील असं मला तरी वाटत नाहि. सेना अजीबात भूईसपाट होईल असं जरी गृहीत धरलं (तसं अजीबात होणार नाहि हे नक्की) तरी भाजपावर व्हायचा तो परिणाम कसा टळेल ? जाऊ द्या.

केंद्रात काँग्रेस जर १०० खासदार आणु शकला तर तिसर्‍या आघाडीचे पं.प्र. उमेदवार पवारसाहेब असतील. अख्ख्या लोकसभेत सहा आणि राज्यसभेत ५ खासदार असलेल्या राष्ट्रवादीचे (६/५) श्री. शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील हि अतिशयोक्तीचीही परिसीमा झाली. काँग्रेसचे १०० खासदार झाले तरी विळ्याभोपळ्याची मोट बांधून २७२ पर्यंत पोहोचणारे फार कठीण आहे. त्यातून ममता बॅनर्जी किंवा नवीन पटनाईक किंवा अमरिंदर सिंह सारखे ज्यांच्या कडे भरपूर खासदार आहेत ते सोडून शरद पवार पंतप्रधान होतील हे म्हणणे हास्यास्पद आहे. अण्णाद्रमुक ३७/१३ तृणमूल (२३/१२) बिजू जनता दल (२०/८) राष्ट्रवादीचे (६/५) अगदी ताणण्याचे ठरवले तरी श्रीमती सोनिया गांधी जिवंत असेपर्यंत तरी त्या शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी कधीही पाठिंबा देणार नाहीत. शरद पवार हा त्यांच्या चाहत्यांनी अवाजवी फुगवलेला फुगा आहे (ओव्हर रेटेड) असे यावरून सिद्ध होते.

In reply to by सुबोध खरे

अगदी ताणण्याचे ठरवले तरी श्रीमती सोनिया गांधी जिवंत असेपर्यंत तरी त्या शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी कधीही पाठिंबा देणार नाहीत. शरद पवार हा त्यांच्या चाहत्यांनी अवाजवी फुगवलेला फुगा आहे (ओव्हर रेटेड) असे यावरून सिद्ध होते. + २० लाख पवारांची इनिंग केव्हाच संपली आहे. दुर्दैवाने ते अजूनही पॅड बांधून, ग्लोव्हज घालून, बॅट हातात घेऊन बसले आहेत आणि त्यांच्या चाहत्यांनाही वाटतंय की ते पुन्हा एकदा खेळपट्टीवर येऊन चौकार-षटकारांची आतषबाजी करतील. ते खेळपट्टीवर असतानाही कुथत खेळत होते. आता तर ते बाद होऊन तंबूत परतले आहेत.

ओरिसातील केंद्रपाडाचे लोकसभा खासदार आणि बिजदचे ज्येष्ठ नेते जय पांडा यांची पक्षाध्यक्ष नवीन पटनायक यांनी पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षातून हकालपट्टी केली आहे. विविध चॅनेलवर पक्षाची भूमिका मांडताना त्यांना अनेकदा बघितले आहे.इतर नेतेमंडळी आक्रस्ताळेपणा करत असले तरी आपला मुद्दा शांतपणे आणि तितक्याच ठामपणे मांडायची त्यांची हातोटी आहे. ते भाजपच्या मार्गावर आहेत अशी वदंता आहे. आसामात सरबानंद सोनोवाल यांच्या रूपात एक चांगला चेहरा पक्षाला मिळाला.तसा जय पांडांच्या रूपात ओरिसात मिळू शकेल.

होयबा कॅटॅगरीचे अनेक महंत काँग्रेसमधे पं.प्र. पदाला 'न्याय' द्यायला तयार आहेत. मुद्दा असा कि काँग्रेससमर्थीत पंप्र कोण बनु शकतं. कुठलाच एस्टॅब्लीश्ड सी.एम. औटघटकेच्या पं.प्र. खुर्चीत बसायला केंद्रात यायला बघणार नाहि (ममतांबद्दल काहिही अशक्य नाहि म्हणा... पण मग डावे आडवे येतील). पवार साहेबांकडे राष्ट्रवादीचे खासदार (कितीही का असेना), सेनेचे खासदार (बाहेरुन पाठिंबा, संसदेत मतदानाच्यावेळी अनुपस्थीत राहाणे वगैरे उपचार करुन), भाजपेतर (आणि काँग्रेसेतर) महाराष्ट्रीय खासदार, आणि महाराष्ट्रात राज्यसरकार फॉर्मेशन असं पॅकेज उपलब्ध आहे. एव्हढ्या सामुग्रीवर पवारसाहेब आपली खिचडी रांधायला नक्की घेतील. असो. पवारांची उमेदवारी हास्यास्पद म्हटल्यावर तसंही पुढे बोलण्यात काहि पॉईण्ट नाहि.