प्रश्न साधासाच होता...

प्राची अश्विनी जे न देखे रवी...
प्रश्न साधासाच होता, त्याने उत्तर टाळले.. आणि अबोलीचे फूल तिच्या केसात माळले. त्याचा रोजचाच खेळ, चार दाणे पक्ष्यांसाठी.. पाखरांच्या नकळत, त्याने हक्काने पाळले. क्षणभर विसावला जीव बकुळीच्या खाली.. सडे अनाम दु:खाचे तिने पायाशी ढाळले. आहे सुखाचा पाऊस, डोळे भरले कशाने? वेडे मन तुझे का ग मृगजळास भाळले?
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

16 टिप्पण्या 5,059 दृश्ये

Comments

राघव नवीन

माय.. खूप सुंदर लिहितेस गो! निरतिशय आवडले. यानिमित्तानं तुझ्या काही जुन्या कविताही वाचल्यात परत.. छान वाटले. लिहित रहा! :-)

सस्नेह नवीन

आहे सुखाचा पाऊस, डोळे भरले कशाने? वेडे मन तुझे का ग मृगजळास भाळले?
...हे अगदी खास !!

आनंदयात्री नवीन

वाह, कविता आवडली.

ज्ञानोबाचे पैजार नवीन

आवडेश... सुरेख जमली आहे पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

आवडली कविता. -दिलीप बिरुटे