Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग १८

लेखक गॅरी ट्रुमन यांनी सोमवार, 11/12/2017 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवडून आल्याचे अधिकृतपणे जाहिर करण्यात आले आहे. Rahul ते १६ डिसेंबर रोजी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. राहुल गांधी गुजरातमधील मतदान पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष बनणार नाहीत असे वाटतच होते. तसेच होणार असे दिसते. अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणे गुजरात मधील मतदानापर्यंत लांबविण्यासाठी कोणी डमी उमेदवार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभा केला जाईल असे वाटले होते तसे मात्र झालेले दिसत नाही. डमी उमेदवार उभा न करताही राहुल गांधी अध्यक्षपदाची सुत्रे गुजरातमधील मतदान होईपर्यंत लांबविणार आहेत. असो. राहुल गांधींचे अभिनंदन. त्यांची अध्यक्ष म्हणून पुढील वाटचाल बरीच खडतर असणार आहे हे नक्कीच. काँग्रेस पक्ष अभूतपूर्व संकटात सापडला आहे त्याला नवी संजीवनी द्यायचे आव्हान राहुल गांधींपुढे असेल.

वाचने 44895
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

In reply to by अमितदादा

श्रीलंकेत इंदिरा आणि राजीव गांधींच्या सरकारांनी फारच मोठा गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण करून ठेवला होता. श्रीलंकेतील तामिळ भाषिक लोकांचे ज्या काही मागण्या असतील त्या कितीही न्याय्य असल्या तरी एल.टी.टी.ई सारख्या दहशतवादी संघटनेला समर्थन देणे आपल्याला नक्कीच शोभले नव्हते. एकीकडे पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवायांना समर्थन देतो म्हणून पाकिस्तानच्या नावाने बोटे मोडायची आणि आपण स्वतःही श्रीलंकेत नेमकी तीच गोष्ट करायची हे कितपत समर्थनीय आहे? ३० मे १९८७ रोजी श्रीलंकेचे सैन्य जाफनामधील तामिळ लोकांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे या कारणाखाली भारतीय वायुदलाची विमाने श्रीलंकेत घुसली होती आणि जाफनामध्ये तांदूळ आणि इतर गोष्टी विमानातून टाकण्यात आल्या होत्या. हे श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन नाही का? ही विमाने पाठवायच्या काही काळ आधी दिल्लीत परराष्ट्र राज्यमंत्री नटवरसिंग यांनी श्रीलंकेच्या राजदूताला बोलावून घेऊन 'आमची विमाने जाफनामध्ये घुसणार आहेत. जर त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न झाला तर गंभीर परिणाम होतील' अशी सरळ धमकी दिली होती. उद्या भारतीय सैन्य काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे अशी ओरड करत पाकिस्तानची विमाने श्रीनगरमध्ये आली तर आपल्याला चालेल का ते? आपले बळ श्रीलंकेच्या कित्येक पटींनी जास्त होते याचा गैरफायदा घेऊन आपण ही दादागिरी केली होती. त्याचे परिणाम म्हणून श्रीलंकेत भारतविरोधी वातावरण होणार नाही अशी अपेक्षा करणेही मूर्खपणाचे आहे. त्यानंतर काय उपरती झाली तर श्रीलंकेच्या तामिळांना वेगळे राज्य (वेगळा देश नव्हे) श्रीलंकेने द्यावा आणि इतर काही मागण्या मान्य कराव्यात याच्या बदल्यात आपली शांतीसेना एल.टी.टी.ई विरोधात लढायला पाठवली. असा १८० अंशातील धोरणातील फरक केला की दोन्ही बाजूंच्या शिव्या आणि लाथा खाव्या लागतात. आणि झालेही तसेच. १९८३ मध्ये श्रीलंकन सैन्याने जाफनामध्ये कत्तली केल्या होत्या हे नक्कीच. पण त्याला प्रत्युत्तर म्हणून श्रीलंकेतील हजारो निरपराध लोकांना ठार मारणार्‍या एल.टी.टी.ई ला समर्थन द्यायचे पाप आपल्या माथ्यावर आहे हे पण तितकेच खरे. नेपाळमध्येही आपण काही कारण नसताना असेच नाक खुपसले होते. आपले नेहरू फार मोठे लोकशाही प्रेमी ना? मग नेपाळमध्ये राजेशाही संपुष्टात आणून 'खर्‍या अर्थाने' लोकशाही आणावी हा आग्रह, एकीकडे नेपाळबरोबर मैत्रीचा करार करून राजेशाहीविरोधी तत्वांना भारतात आश्रय देणे, भारताने इसराएलला मान्यता दिली नसताना नेपाळने ती दिल्यानंतर मानवाधिकारांचे पुतळे असलेल्या दिल्लीश्वरांना त्याचा संताप येणे इत्यादी प्रकार झालेच. नेपाळला स्वतःचा समुद्रकिनारा नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नेपाळला भारतातील पूर्वेकडील बंदरांचा वापर करू द्यायचा करार दोन देशांमध्ये झाला होता. १९८९ मध्ये या कराराची मुदत संपली. त्यावेळी त्या कराराचे रिन्युअल करायच्या वेळी मतभेद होऊन भारताने नेपाळचा 'इकॉनॉमिक ब्लॉकेड' केला होता. नेपाळला चीनच्या बाजूने झुकायला आपणच परिस्थिती निर्माण करून दिली. जर नेपाळ हे भारत आणि चीनमधले राष्ट्र आपल्या बाजूला ठेवायचे होते तर थोडी पडती बाजू घेऊनही नेपाळला अ‍ॅकोमोडेट केले असते तर काय आभाळ कोसळणार होते का? नेपाळचा आकार तो किती? कितीसा व्यापार करणार होता तो देश आपल्या बंदरांमधून? नेपाळमध्ये अनेक महिने जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती त्या काळात. या सगळ्या परिस्थितीत नेपाळी काँग्रेस या भारताला अनुकूल असलेल्या पक्षास भारताचा पाठिंबा होता हे अगदी जगजाहिर होते. मग नेपाळमध्ये भारतविरोधी भावना भडकणार नाही ही अपेक्षाही आपण कशी करू शकतो? याचा आय.एस.आय ने भरपूर फायदा उठवला. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांमधील आरोपींना नेपाळच्या एका खासदाराने आश्रय दिला होता (छोटा राजनने नंतर त्याला उडवले). कंदाहार विमान अपहरण प्रकरणाची सुरवात नेपाळपासूनच झाली होती. हेच कंदाहार विमान अपहरण प्रकरण आणि नंतर झालेला संसदभवनावरील हल्ला या दोन गोष्टी एकमेकांशी निगडीत होत्या कारण कंदाहार प्रकरणी आपण सोडलेल्या मौलाना मसूद अझरनेच संसदेवर हल्ला घडवून आणला. म्हणजे शेजारी देशातील आपली दादागिरी आपल्याला केवढ्याला पडली हे लक्षात येईल. मला वाटते की आपण आपल्या या शेजारी देशांमध्ये दादागिरी करून भारतविरोधी वातावरण बनवायला कारणीभूत ठरलो आहोत. एकीकडे इतर देशांमध्ये लुडबूड का करता म्हणून अमेरिकेला नावे ठेवायची आणि आपणही नेमके तेच करायचे हे प्रकारही आपणच केले आहेत.

In reply to by गॅरी ट्रुमन

तुम्ही जे लिहिलंय ते इतिहास आहे त्यामुळे तो मान्य केलाच पाहिजे.
१९८९ मध्ये या कराराची मुदत संपली. त्यावेळी त्या कराराचे रिन्युअल करायच्या वेळी मतभेद होऊन भारताने नेपाळचा 'इकॉनॉमिक ब्लॉकेड' केला होता.
पण हे हि लक्ष्यात घ्या कि मागच्या वर्षी नेपाळची झालेली नाकेबंधी हि भारतच्या छुप्या पाठींबा वरच झाली होती. त्यामुळे नेपाल मध्ये भारत विरोधी रोष आहे. हे मी वरील प्रतिसादात जाणीवपूर्वक लिहल न्हवत, प्रतिसादाला राजकीय वळण लागू नये म्हणून. परंतु आता विषय निघालाच आहे म्हणून लिहल. आज च्या हि घडीला भारत नेपाल मध्ये दादागिरी करतो ते प्रमाण बरेच कमी आलाय परंतु आपली वृत्ती अजून बदली नाहीये. भारत-नेपाळ बिघडते संबंध हे मोदी सरकार च अपयश आहे. भारताने भूतान मध्ये अशीच दादागिरी करून (केरोसीन आणि gas ची भाववाड/पुरवठा अडवून) निवडणुकीत आपल्या बाजूच्या पक्षाला निवडून आणल होत. संधर्भ जालावर सापडतील. त्यावेळी मनमोहन सिंघ याचं सरकार होत.
मला वाटते की आपण आपल्या या शेजारी देशांमध्ये दादागिरी करून भारतविरोधी वातावरण बनवायला कारणीभूत ठरलो आहोत. एकीकडे इतर देशांमध्ये लुडबूड का करता म्हणून अमेरिकेला नावे ठेवायची आणि आपणही नेमके तेच करायचे हे प्रकारही आपणच केले आहेत.
सहमत

In reply to by गॅरी ट्रुमन

एकीकडे इतर देशांमध्ये लुडबूड का करता
या वाक्याशी मी अंशतः सहमत असायला हवं याच कारण जर आपले शेजारी आपल्या विरोधी कारवाई करत असतील, आपल्या शत्रूला मदत करत असतील तर आपल्या देशाने इंडिरेक्टली हस्तक्षेप करायला हवा, गुप्तचर यंत्रणा त्यासाठीच तर आहेत. हे करताना तेथील जनता नाराज होऊ नये, आपल्या गोष्टी चव्हाट्यावर येऊ नयेत, आपल्या कारवाया आपल्याच अंतराष्त्रीय भूमिकेशी विसंगत नको (पाकिस्तान सोडून) किंवा आपल्या कारवाई धोकादायक नकोत याची काळजी घ्यायला हवी. बांगलादेश मध्ये भारत नेहमी शेख हसीना यांच्या मागे ठामपणे उभा असतो. काही वर्षांपूर्वी भारतीय गुप्तचर यंत्रणेने त्यांच्या हत्तेच्या कटाची आणि लष्करी बंडाची गुप्त माहिती पुरवली होती. तुम्ही भारत श्रीलंका याबाबत मांडलेल्या इतिहासबाबत बोलायचं झालं तर मला वाटत बांगलादेश युद्धात पाकिस्तानी विमानांना श्रीलंकेने आपली धावपट्टी आणि तेल हे इंदिरा गांधी च्या इशारा नंतर ही उपलब्द करून दिलेलं. ही भारत विरोधी कारवाई इंदिरा गांधी च्या मनात घर करून राहिली असावी. (इंदिरा गांधी यांची भलामण करण्याचा प्रयत्न नाही)

काल लोकसभेत ट्रिपल तलाकविरोधी विधेयकावर चर्चा झाली. या चर्चेत आसाममधील सिलचरच्या काँग्रेस खासदार सुश्मीता देव यांनी काही काही अनाकलनीय मुद्दे मांडले. १. प्रस्तावित विधेयकामध्ये reconciliation ला मार्ग मोकळा नाही. म्हणजे ट्रिपल तलाक मिळालेल्या स्त्रीचे तिच्या तलाक देणार्‍या (माजी) नवर्‍याबरोबर reconciliation व्हायचे असेल तर जे काही नियम आहेत ते त्या स्त्रीचा मोठा सन्मान वाढविणारेच असतात की नाही? तसे करावे न लागता परत नव्याने त्यांनी लग्न केले तर त्याला हा कायदा आडकाठी करत आहे का? २. जर का ट्रिपल तलाक इतका वाईट आहे असे सरकारचे मत असेल तर हे विधेयक आणण्यासाठी ते सत्तेत आल्यानंतर ४३ महिने का थांबले? त्यांनी हे विधेयक आधीच आणायला हवे होते. सुश्मीतांच्या एक गोष्ट लक्षात आली नाही असे दिसते. काँग्रेस इतकी दशके सत्तेत असूनही काँग्रेसने हे विधेयक आणले नाही. इतकेच नव्हे तर राजीव गांधींनी शाहबानो प्रकरणी न्यायालयाच्या निकालाविरूध्द संबंधित कायद्यामध्ये बदल केला. याचा अर्थ ट्रिप॑ल तलाक वाईट नाही असे काँग्रेस पक्षाचे मत आहे याची एका अर्थी कबुलीच दिली की नाही? या सुश्मीता देव म्हणजे माजी केंद्रिय मंत्री कै. संतोष मोहन देव यांच्या कन्या आहेत. संतोष मोहन देब काँग्रेसचेच होते, अनेक वर्षे मंत्री होते तरीही त्यांनी अशा प्रकारची लूज स्टेटमेन्ट केल्याचे निदान मला तरी आठवत नाही. पण सुश्मीता मात्र वेगळ्या दिसत आहेत.

In reply to by माहितगार

पॅलेस्टिनींनी दरवेळी हाच प्रकार केला आहे. तरीही आपल्याला मात्र कायम त्यांचाच पुळका होता. पॅलेस्टिनींनी काश्मीर प्रश्नावर भारताचे किती वेळा समर्थन केले आहे? उत्तर शून्य. किंबहुना एक सद्दाम हुसेन सोडला तर काश्मीर प्रश्नावर भारताची बाजू घेणारा कोणी मुस्लिम देशाचा राज्यकर्ता होता का हे तपासायलाच लागेल. यासर अराफत हे तथाकथित भारताचे मित्र होते. पण १९९८ मधील पाकिस्तानच्या अणुचाचण्यांवर ते काय म्हणाले होते हे http://www.rediff.com/news/1998/jul/14bomb1.htm वर कळेलच. भारताला पॅलेस्टिनींचा इतका पुळका होता त्यामागे तेल हे एक कारण होते असे वाटते. तरीही तेलाचा सर्वात मोठा उत्पादक सौदीने पॅलेस्टिनींचे खुल्या दिलाने कधीच समर्थन केले नव्हते. सौदीने तोंडपाटीलकी बरीच केली पण सिरिया, जॉर्डन, इजिप्त प्रमाणे इसराएलविरूध्द युध्दात कधी भाग घेतला नाही. जॉर्डनने आधी इसराएलविरोधी युद्धात भाग घेतला पण १९७० च्या सुमारास त्यांनीही पी.एल.ओ ला त्यांच्या देशातून हाकलून दिले होते. इजिप्तनेही १९७९ मध्ये इसराएलबरोबर शांती करार केला. असे असताना आपण मात्र पॅलेस्टिनींचीच बाजू घेत राहिलो होतो. यामागे तेलाचेच राजकारण होते की आणखी काही कारण होते हे समजत नाही.

In reply to by सुबोध खरे

चष्मा काढा म्हणत नाही पण आंतररा राष्ट्रीय राजकारणास बरेच पदर असतात डॉ. साहेब . या वेळी मोदी-ट्रंप इस्राएल संबंध चांगले असूनही भारत जेरुसलेमच्या मुद्द्यावर त्यांच्या बाजू ने उभा दिसला नाही , आमेरीका-इस्राएलचे बरेच इतर मित्र ही त्यांच्या सोबत नव्हते त्यामुळे भारताने इतरांसोबत कंपलसरी नसलेल्या ठिकाणी आम्रेरीके विरोधी भूमिकेचे सूर उगाळळ्याने फरक पडणार नाही असा हिशेब असेल किंवा डिल प्रेमी ट्रंप अडचणीत एकटे पाहून डिलचा भारताच्या बाजूने संधी शोध साठी दबाव असेल तर ठिकच म्हणयचे.

In reply to by गॅरी ट्रुमन

तेलाच्या बाबत दबाव टाकू शकणारे दोन देश म्हणजे सौदी आणि दुसरे इराण -दुसरा एक दबाब गल्फ मध्ये असलेले भारतीय माणूस बळा कडून मिळणारी परकीय गंगाजळी वरील अवलंबित्व ? , या वेळी इराण च्या दबावाची शक्यता ? कारण अफगाणिस्तान हँडल करण्यासाठी भारत बर्‍ञापैकी इराणवर अवलंबून झाला आहे असे वाटते .

In reply to by गॅरी ट्रुमन

मुस्लीम देशांना पॅल्स्टाईन आणि काश्मिर मुद्दा एकसारखा का वाटतो ? आणि तसे वाटू नये म्हणून भारतने भूमिकेची मांडणी कशी करावयास हवी ?