शेजाऱ्याचा डामाडुमा - मास..अहारू... गारुनु.... - मालदीव भाग ३
मालदीव मालिकेतील आधीचे भाग येथे वाचता येतील :-
http://www.misalpav.com/node/41427
http://www.misalpav.com/node/41552
जगाच्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या कालखंडात मानवी संस्कृती नांदतात-बहरतात आणि मग कालौघात ह्या ना त्या कारणाने नाश पावतात. ह्या सर्व संस्कृती मागे काही ना काही ठेवा सोडून जातात. पुढील पिढ्यांसाठी असा विस्मृत ठेवा वेचण्याची ठिकाणे म्हणजे सामान्यतः देवळे - धार्मिक उपासनेच्या जागा, राज्यकर्त्यांचे किल्ले - महाल, थोरामोठ्यांची समाधीस्थळे वगैरे.
पण काही समाज आणि संस्कृती थोड्या वेगळ्या असतात - आपल्या शेजारच्या मालदीव बेटांवर नांदणारी प्राचीन संस्कृतीही अशीच - वेगळी आणि त्या सम तीच. (तिला थोडीफार साथ भारताच्या ताब्यातला लक्षद्वीप बेटांवरच्या संस्कृतीची) ह्या समाजाचे जीवनच वेगळे. अथांग समुद्रात ठिपक्याएवढी काही बेटे आणि त्यापैकी काही मोजक्या बेटांवर मानवी वस्ती. माणसे साधी. गरजा कमी. राज्यकर्ते म्हणावे तर तीही अगदी साधी माणसे - कोणत्याही बाह्य भपक्याशिवाय साधे सोपे जीवन व्यतीत करणारी. त्यांच्या भौगोलिक परिस्थितीमुळे, साधनांच्या दुर्लभतेमुळे आणि बिनभरवश्याच्या हवामानामुळे असेल कदाचित पण मोठे महाल-किल्ले नाहीत की भव्य समाधी स्थळे नाहीत.
खोल समुद्रात पिटुकल्या बेटांवर बिन-भरवशाचे, कमी गरजांचे आणि म्हणून स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या लोकांसाठी कर्मकांडांचे महत्व नगण्य. त्यामुळे धर्माचे आखीव रेखीव नियम-कानू फारसे अपील न होणारे. त्यामुळेच की काय मोठी भव्य धर्मस्थळे पण नाहीत.
माले शहराच्या मधोमध असलेली प्राचीन हुकुरू मिस्की (जामी मस्जिद)
पूर्वापार सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा. 'सारा समुंदर मेरे पास है - एक बूंद पानी मेरी प्यास है' अशी अवस्था. प्यायचे पाणी फक्त आकाशातून पडणारे, ते साठवायचे आणि वर्षभर वापरायचे. म्हणायला सोपे पण प्रवाळ बेटांवर ही साठवणूक कठीण. थोड्याफार गोड्या पाण्याच्या विहिरी, पण त्यातील पाणी संपायला किंवा खारट व्हायला फार काळ जावा लागत नाही. त्यामुळे लोकांनी मुक्काम सारखा ह्या बेटावरून त्या बेटावर हलवणेही नवे नाही. त्यामुळे आहे त्या साधनांत काही धर्मस्थळे-इमारती बांधल्या तरी पुढे त्यांचा वापर आणि जतन होईलच याची खात्री नाही.
* * *
मालदीवचे प्राचीन नाव 'माला-द्वीप'. मालदीवचे भारतीय मुख्य भूमीशी आणि श्रीलंकेशी संबंध शेकडो वर्षांपासून आहेत. मालदीवच्या दोन्ही शेजाऱ्यांच्या, म्हणजे पूर्व किंवा दक्षिण भारत आणि श्रीलंकेच्या दर्यावर्दी व्यापाऱ्यांना पश्चिमेच्या समुद्रमार्गानी कोठल्याही दुसऱ्या देशाकडे जहाजे हाकायची तर मालदीवची बेटे हाच मार्गातला पहिला थांबा. त्यामुळे ह्या भूमीचे महत्व अनन्यसाधारण होते (आजही आहे,पण त्याबद्दल नंतर). नेहमीचा व्यापारी मार्ग असल्यामुळे भेटीगाठी, व्यापारी देवाण देवाण, सांस्कृतिक संबंध वर्षानुवर्षे आहेत.
पार चौथ्या शतकापासून भारताच्या ओरिसा प्रातांतील व्यापारी ह्या मार्गावर व्यापारासाठी ये-जा करत असावेत. कलिंग सम्राटांच्या प्रदीर्घ राजवटीत भारतातून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात व्यापारी दले आधी श्रीलंका आणि मग मालदीवला पोचलीत. समुद्रमार्गे पूर्वेकडे येणारे आफ्रिकन आणि अरब व्यापारी मालदीवला एक थांबा घेत असल्यामुळे देशोदेशीच्या व्यापाऱ्यांमध्ये परस्पर व्यापार आणि करार करण्यासाठी ही भूमी प्रसिद्ध झाली.
* * *
मालदीवच्या इतिहासात डोकावायचे म्हणावे तर मुख्य मुद्दा खात्रीशीर पुराव्यांच्या दुर्मिळतेचा आहे. मुळात प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणा कमी आहेत. स्थानिक भाषेतील हस्तलिखिते किंवा उत्खननात सापडलेले पुरावे दुर्मिळ आहेत आणि जे आहेत ते बऱ्याच अलीकडच्या काळातील आहेत. त्यामुळे लोकश्रुती, विदेशी प्रवाश्यांची प्रवासवर्णने, त्यांनी बनवलेले नकाशे आणि स्वतःच्या मायदेशी लिहिलेली पत्रे एव्हढाच ऐवज हाताशी उरतो. त्यावरून थोडेफार निष्कर्ष काढता येतात. सबळ पुराव्याअभावी हे निष्कर्ष विवादाला कारणही होतात :-)
मालदीवच्या उत्तरेला वर असलेल्या लक्षद्वीप बेटांचे रहिवासी मूळचे केरळ प्रांतातले दर्यावर्दी आहेत हे बऱ्यापैकी मान्य मत आहे. त्यामुळे भारतातील मल्याळी आणि तमिळ दर्यावर्दी आणि कोळी लोक हे बहुदा मालदीवचे आद्य रहिवासी असावेत. स्थानिक प्राचीन जमातींमध्ये काही प्रमाणात आढळून येणारी मातृसत्ताक कुटुंबे त्यांच्या मल्याळी पूर्वजांची साक्ष पटवतात. अरबस्तानातील आणि श्रीलंकेच्या व्यापाऱ्यांपैकी काही मंडळी वस्ती करती झाली असावीत असे आडाखे बांधता येतात.
पाचव्या शतकात पाली भाषेत लिहिलेल्या 'महावंश' ग्रंथात मालदीवच्या राज्यकर्त्यांबद्दल पहिला लेखी उल्लेख सापडतो. पूर्व भारतातून मगध राज्याचा परागंदा राजा / राजपुत्र 'विजय' आधी श्रीलंका आणि पुढे मालदीवला आपले नवे राज्य स्थापन करता झाला असे उल्लेख आहेत. पण लिहिणाऱ्यांनी हे 'असे मी ऐकून आहे' अश्या प्रस्तावनेसह लिहिले आहे, त्यामुळे नेमका कालखंड ठरवता येणं कठीण आहे.
१२ व्या शतकात इस्लामच्या आगमनापूर्वी जवळपास १३०० वर्षे बुद्ध धर्माचा प्रभाव मालदीवच्या संस्कृतीवर होता, हे मात्र बहुमान्य मत.
बुद्धकाळाच्या आधी स्थानिक लोक सूर्यपूजक होते, स्वतःला 'आदित्यकुलीन' म्हणवून घेत. मालदीवच्या राजाला 'राधून' (राजनचा अपभ्रंश वाटतोय ना?) आणि त्याच्या पत्नीला 'रानींन' (राणी?) किंवा रातीन संबोधतात. 'आदीत्ता' वंशीय सूर्योपासक राधून मालदीव बेटांवर शासन करतात. काही बेटांवर 'रानीन' म्हणजे स्त्री शासक आहेत - काही राधून 'होमा' (सोम?) वंशीय आहेत असे पुसट उल्लेख विदेशी व्यापाऱ्यांच्या पत्रात मिळतात. दामहार नावाची आदित्यकुलीन राणी माले येथे ठाणे करून मालदीव बेटांवर राज्य करते, तिला आम्ही प्रवासी कर आणि नजराणा देतो असा उल्लेख अरब व्यापाऱ्यांनी स्वतःच्या राज्यकर्त्याना पाठवलेल्या पत्रात आहे. पण या पत्रांवर तारीख नाही !
मालदीवच्या इतिहासाचे जे थोडेफार संशोधन झाले आहे आणि उत्खननात जे पुरावे मिळाले आहेत त्याआधारे साधारण सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेप्रमाणे मालदीवमध्येही बौद्ध धर्म रुजला आणि पुढे अनेक शतकांपर्यंत बुद्ध धर्माचा प्रभाव मालदीवच्या संस्कृतीवर होता हे ठरवता येते. त्याकाळचे काही राज्यकर्ते स्वतःला ‘सिंहपुत्र’ म्हणवत - बहुदा श्रीलंकेच्या सिंहली राज्यांच्या प्रभावामुळे.
नव्याने झालेल्या उत्खननात बुद्धमताचा प्रभाव दाखवणाऱ्या खाणाखुणा सापडतात. बुद्धधर्माच्या अहिंसक शिकवणीमुळे बहुतेक प्राचीन धर्मस्थळे जमिनीखाली पुरली आहेत, तोडफोड करून पूर्णतः नष्ट केलेली नाहीत. (पण आता हे बदलतंय - २०१२ मध्ये काही स्थानिक माथेफिरूंनी मालेच्या राष्ट्रीय संग्रहालयात घुसून तिथे जतन केलेला ६ ते १२ व्या शतकातील दुर्मिळ बौद्ध अवशेषांचा अमूल्य ठेवा ठेचून नष्ट केला - मूर्तिपूजा इस्लामला मंजूर नाही म्हणून !)
काही उत्खननात मंडलाकार बुद्ध मंदिरांचे - स्तूपांचे जोते असावेत अश्या खुणा सापडतात.
एक मात्र आहे, मूर्तिपूजा पूर्णपणे निषिद्ध असलेल्या इस्लाम धर्माचा पूर्ण स्वीकार केल्यानंतर अनेक शतकं उलटली तरी आजही मालदीवचे लोक कुठल्याही मूर्तीला किंवा शिल्पाला 'बुधू'च म्हणतात.
* * *
मालदीवची प्रमुख भाषा 'धिवेही'. भाषा-अभ्यासकांच्या मते ही इंडो-आर्यन गटातील एक प्राचीन भाषा. लिपी वेगळी असली तरी व्याकरण, शब्द, शब्दांचे उच्चार, वाक्यरचनेची पद्धत सगळेच श्रीलंकेच्या सिंहली भाषेला जवळीक साधणारे. त्यामुळे माझ्या श्रीलंकन मित्रांना धिवेही बोलायला आले नाही तरी ऐकलेले बरेचसे समजते पण वाचता येत नाही कारण वेगळी लिपी ! परत धिवही भाषा अरेबिक प्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. त्यामुळेही थोडा संभ्रम.
धिवेही भाषेची झलक.
इराणच्या बसरा खाडीत मिळणारे नैसर्गिक मोती म्हणजे जगभरातल्या राजे-महाराजे आणि श्रीमंतांच्या जिव्हाळ्याचा विषय. भारत, चीन, बर्मा आणि थायलंड ह्या मोत्यांची फार मोठी बाजारपेठ. त्यामुळे अरब व्यापारी अगदी दहाव्या शतकाच्या पूर्वीपासून इराणच्या खाडीतून हे मोती घेऊन मोठ्या प्रमाणावर श्रीलंका, भारत आणि पलीकडे आग्नेय आशियात जात. त्यांचा पहिला थांबा हूवधू, माले किंवा गान बेटावर असे. त्यामुळे की काय इस्लामिक सत्ता स्थापन होण्याच्या बरेच आधी मालदीवमध्ये व्यापाराची अधिकृत भाषा अरेबिक होती. पर्शियन किंवा उर्दू सारख्या भारतीय उपखंडात स्थिरावलेल्या भाषांचा फारसा वावर ह्या भागात दिसून येत नाही. धिवेही भाषा अरेबिक लिपीत लिहिल्या जाण्याचे हे ही एक कारण असू शकेल.
'लोमाफानू' - धिवेही भाषेत लिहिलेले ताम्रपट्टिकांचे पुस्तक. - १२ वे शतक.
सर्व नकाशे आणि बहुतेक चित्रे जालावरून साभार.
* * *
थोडे अवांतर:
त्यांच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही...
कवडीमोल भावाने विकावा लागला सगळा ऐवज ...
फुटकी कवडी नाही खिश्यात...
कौडी-कौडी जमा कर के ये मकान खरिदा पिताजी ने...
आपल्या बोलण्या-लिहिण्यात येणारे हे 'कवडी' प्रकरण बरेच रोचक आहे. चलन म्हणून प्राचीन भारत, ब्रम्हदेश आणि श्रीलंकेत कवड्या वापरल्या जात. कवड्या चलन म्हणून वापरण्याचा फार मोठा कालखंड भारत आणि शेजारी देशांनी अनुभवला आहे.
साधारण हिशेब : -
३ फुटक्या कवड्या = १ कवडी
१० कवड्या = १ दमडी
२ दमडी = १ धेला
१.५ पाई = १ धेला
३ पाई = १ पैसा
४ पैसे = १ आणा
१६ आणे = १ रुपया
स्थानिक चलनांची नावे वेगळी असली तरी थोड्याफार फरकाने आजूबाजूच्या देशांमध्ये प्रमाण असेच होते. (जुन्या लोकांकडून 'पै-न-पै' ची वसुली, 'आणेवारी', 'दीड-दमडी' ची ऐपत, 'पाई-पाई' चुका दूंगा असे डायलॉग सुद्धा ऐकले असतील तुमच्यापैकी काहींनी)
मालदीव हा हा देश भारतीयांना माहित असण्याचे आणि तेथे आपल्या दर्यावर्दी व्यापाऱ्यांची विशेष ये-जा असण्याचे एक खास कारण होते - ते म्हणजे तेथे असलेला कवड्यांच्या प्रचंड साठा ! चलन म्हणून आपल्याकडे ज्या कवड्या वापरल्या जात, त्या कवड्या मालदीवमध्ये अगदी 'कवडीमोलाने' मिळत. होडीभर अन्नधान्याच्या बदल्यात होडीभर कवड्या असा साधा सोपा हिशेब. त्यामुळे ही पाचूची बेटे भारतीय व्यापाऱ्यांसाठी अगदी सोन्याची खाण होती.
क्रमश:
जगाच्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या कालखंडात मानवी संस्कृती नांदतात-बहरतात आणि मग कालौघात ह्या ना त्या कारणाने नाश पावतात. ह्या सर्व संस्कृती मागे काही ना काही ठेवा सोडून जातात. पुढील पिढ्यांसाठी असा विस्मृत ठेवा वेचण्याची ठिकाणे म्हणजे सामान्यतः देवळे - धार्मिक उपासनेच्या जागा, राज्यकर्त्यांचे किल्ले - महाल, थोरामोठ्यांची समाधीस्थळे वगैरे.
पण काही समाज आणि संस्कृती थोड्या वेगळ्या असतात - आपल्या शेजारच्या मालदीव बेटांवर नांदणारी प्राचीन संस्कृतीही अशीच - वेगळी आणि त्या सम तीच. (तिला थोडीफार साथ भारताच्या ताब्यातला लक्षद्वीप बेटांवरच्या संस्कृतीची) ह्या समाजाचे जीवनच वेगळे. अथांग समुद्रात ठिपक्याएवढी काही बेटे आणि त्यापैकी काही मोजक्या बेटांवर मानवी वस्ती. माणसे साधी. गरजा कमी. राज्यकर्ते म्हणावे तर तीही अगदी साधी माणसे - कोणत्याही बाह्य भपक्याशिवाय साधे सोपे जीवन व्यतीत करणारी. त्यांच्या भौगोलिक परिस्थितीमुळे, साधनांच्या दुर्लभतेमुळे आणि बिनभरवश्याच्या हवामानामुळे असेल कदाचित पण मोठे महाल-किल्ले नाहीत की भव्य समाधी स्थळे नाहीत.
खोल समुद्रात पिटुकल्या बेटांवर बिन-भरवशाचे, कमी गरजांचे आणि म्हणून स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या लोकांसाठी कर्मकांडांचे महत्व नगण्य. त्यामुळे धर्माचे आखीव रेखीव नियम-कानू फारसे अपील न होणारे. त्यामुळेच की काय मोठी भव्य धर्मस्थळे पण नाहीत.
माले शहराच्या मधोमध असलेली प्राचीन हुकुरू मिस्की (जामी मस्जिद)
पूर्वापार सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा. 'सारा समुंदर मेरे पास है - एक बूंद पानी मेरी प्यास है' अशी अवस्था. प्यायचे पाणी फक्त आकाशातून पडणारे, ते साठवायचे आणि वर्षभर वापरायचे. म्हणायला सोपे पण प्रवाळ बेटांवर ही साठवणूक कठीण. थोड्याफार गोड्या पाण्याच्या विहिरी, पण त्यातील पाणी संपायला किंवा खारट व्हायला फार काळ जावा लागत नाही. त्यामुळे लोकांनी मुक्काम सारखा ह्या बेटावरून त्या बेटावर हलवणेही नवे नाही. त्यामुळे आहे त्या साधनांत काही धर्मस्थळे-इमारती बांधल्या तरी पुढे त्यांचा वापर आणि जतन होईलच याची खात्री नाही.
* * *
मालदीवचे प्राचीन नाव 'माला-द्वीप'. मालदीवचे भारतीय मुख्य भूमीशी आणि श्रीलंकेशी संबंध शेकडो वर्षांपासून आहेत. मालदीवच्या दोन्ही शेजाऱ्यांच्या, म्हणजे पूर्व किंवा दक्षिण भारत आणि श्रीलंकेच्या दर्यावर्दी व्यापाऱ्यांना पश्चिमेच्या समुद्रमार्गानी कोठल्याही दुसऱ्या देशाकडे जहाजे हाकायची तर मालदीवची बेटे हाच मार्गातला पहिला थांबा. त्यामुळे ह्या भूमीचे महत्व अनन्यसाधारण होते (आजही आहे,पण त्याबद्दल नंतर). नेहमीचा व्यापारी मार्ग असल्यामुळे भेटीगाठी, व्यापारी देवाण देवाण, सांस्कृतिक संबंध वर्षानुवर्षे आहेत.
पार चौथ्या शतकापासून भारताच्या ओरिसा प्रातांतील व्यापारी ह्या मार्गावर व्यापारासाठी ये-जा करत असावेत. कलिंग सम्राटांच्या प्रदीर्घ राजवटीत भारतातून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात व्यापारी दले आधी श्रीलंका आणि मग मालदीवला पोचलीत. समुद्रमार्गे पूर्वेकडे येणारे आफ्रिकन आणि अरब व्यापारी मालदीवला एक थांबा घेत असल्यामुळे देशोदेशीच्या व्यापाऱ्यांमध्ये परस्पर व्यापार आणि करार करण्यासाठी ही भूमी प्रसिद्ध झाली.
* * *
मालदीवच्या इतिहासात डोकावायचे म्हणावे तर मुख्य मुद्दा खात्रीशीर पुराव्यांच्या दुर्मिळतेचा आहे. मुळात प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणा कमी आहेत. स्थानिक भाषेतील हस्तलिखिते किंवा उत्खननात सापडलेले पुरावे दुर्मिळ आहेत आणि जे आहेत ते बऱ्याच अलीकडच्या काळातील आहेत. त्यामुळे लोकश्रुती, विदेशी प्रवाश्यांची प्रवासवर्णने, त्यांनी बनवलेले नकाशे आणि स्वतःच्या मायदेशी लिहिलेली पत्रे एव्हढाच ऐवज हाताशी उरतो. त्यावरून थोडेफार निष्कर्ष काढता येतात. सबळ पुराव्याअभावी हे निष्कर्ष विवादाला कारणही होतात :-)
मालदीवच्या उत्तरेला वर असलेल्या लक्षद्वीप बेटांचे रहिवासी मूळचे केरळ प्रांतातले दर्यावर्दी आहेत हे बऱ्यापैकी मान्य मत आहे. त्यामुळे भारतातील मल्याळी आणि तमिळ दर्यावर्दी आणि कोळी लोक हे बहुदा मालदीवचे आद्य रहिवासी असावेत. स्थानिक प्राचीन जमातींमध्ये काही प्रमाणात आढळून येणारी मातृसत्ताक कुटुंबे त्यांच्या मल्याळी पूर्वजांची साक्ष पटवतात. अरबस्तानातील आणि श्रीलंकेच्या व्यापाऱ्यांपैकी काही मंडळी वस्ती करती झाली असावीत असे आडाखे बांधता येतात.
पाचव्या शतकात पाली भाषेत लिहिलेल्या 'महावंश' ग्रंथात मालदीवच्या राज्यकर्त्यांबद्दल पहिला लेखी उल्लेख सापडतो. पूर्व भारतातून मगध राज्याचा परागंदा राजा / राजपुत्र 'विजय' आधी श्रीलंका आणि पुढे मालदीवला आपले नवे राज्य स्थापन करता झाला असे उल्लेख आहेत. पण लिहिणाऱ्यांनी हे 'असे मी ऐकून आहे' अश्या प्रस्तावनेसह लिहिले आहे, त्यामुळे नेमका कालखंड ठरवता येणं कठीण आहे.
१२ व्या शतकात इस्लामच्या आगमनापूर्वी जवळपास १३०० वर्षे बुद्ध धर्माचा प्रभाव मालदीवच्या संस्कृतीवर होता, हे मात्र बहुमान्य मत.
बुद्धकाळाच्या आधी स्थानिक लोक सूर्यपूजक होते, स्वतःला 'आदित्यकुलीन' म्हणवून घेत. मालदीवच्या राजाला 'राधून' (राजनचा अपभ्रंश वाटतोय ना?) आणि त्याच्या पत्नीला 'रानींन' (राणी?) किंवा रातीन संबोधतात. 'आदीत्ता' वंशीय सूर्योपासक राधून मालदीव बेटांवर शासन करतात. काही बेटांवर 'रानीन' म्हणजे स्त्री शासक आहेत - काही राधून 'होमा' (सोम?) वंशीय आहेत असे पुसट उल्लेख विदेशी व्यापाऱ्यांच्या पत्रात मिळतात. दामहार नावाची आदित्यकुलीन राणी माले येथे ठाणे करून मालदीव बेटांवर राज्य करते, तिला आम्ही प्रवासी कर आणि नजराणा देतो असा उल्लेख अरब व्यापाऱ्यांनी स्वतःच्या राज्यकर्त्याना पाठवलेल्या पत्रात आहे. पण या पत्रांवर तारीख नाही !
मालदीवच्या इतिहासाचे जे थोडेफार संशोधन झाले आहे आणि उत्खननात जे पुरावे मिळाले आहेत त्याआधारे साधारण सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेप्रमाणे मालदीवमध्येही बौद्ध धर्म रुजला आणि पुढे अनेक शतकांपर्यंत बुद्ध धर्माचा प्रभाव मालदीवच्या संस्कृतीवर होता हे ठरवता येते. त्याकाळचे काही राज्यकर्ते स्वतःला ‘सिंहपुत्र’ म्हणवत - बहुदा श्रीलंकेच्या सिंहली राज्यांच्या प्रभावामुळे.
नव्याने झालेल्या उत्खननात बुद्धमताचा प्रभाव दाखवणाऱ्या खाणाखुणा सापडतात. बुद्धधर्माच्या अहिंसक शिकवणीमुळे बहुतेक प्राचीन धर्मस्थळे जमिनीखाली पुरली आहेत, तोडफोड करून पूर्णतः नष्ट केलेली नाहीत. (पण आता हे बदलतंय - २०१२ मध्ये काही स्थानिक माथेफिरूंनी मालेच्या राष्ट्रीय संग्रहालयात घुसून तिथे जतन केलेला ६ ते १२ व्या शतकातील दुर्मिळ बौद्ध अवशेषांचा अमूल्य ठेवा ठेचून नष्ट केला - मूर्तिपूजा इस्लामला मंजूर नाही म्हणून !)
काही उत्खननात मंडलाकार बुद्ध मंदिरांचे - स्तूपांचे जोते असावेत अश्या खुणा सापडतात.
एक मात्र आहे, मूर्तिपूजा पूर्णपणे निषिद्ध असलेल्या इस्लाम धर्माचा पूर्ण स्वीकार केल्यानंतर अनेक शतकं उलटली तरी आजही मालदीवचे लोक कुठल्याही मूर्तीला किंवा शिल्पाला 'बुधू'च म्हणतात.
* * *
मालदीवची प्रमुख भाषा 'धिवेही'. भाषा-अभ्यासकांच्या मते ही इंडो-आर्यन गटातील एक प्राचीन भाषा. लिपी वेगळी असली तरी व्याकरण, शब्द, शब्दांचे उच्चार, वाक्यरचनेची पद्धत सगळेच श्रीलंकेच्या सिंहली भाषेला जवळीक साधणारे. त्यामुळे माझ्या श्रीलंकन मित्रांना धिवेही बोलायला आले नाही तरी ऐकलेले बरेचसे समजते पण वाचता येत नाही कारण वेगळी लिपी ! परत धिवही भाषा अरेबिक प्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. त्यामुळेही थोडा संभ्रम.
धिवेही भाषेची झलक.
इराणच्या बसरा खाडीत मिळणारे नैसर्गिक मोती म्हणजे जगभरातल्या राजे-महाराजे आणि श्रीमंतांच्या जिव्हाळ्याचा विषय. भारत, चीन, बर्मा आणि थायलंड ह्या मोत्यांची फार मोठी बाजारपेठ. त्यामुळे अरब व्यापारी अगदी दहाव्या शतकाच्या पूर्वीपासून इराणच्या खाडीतून हे मोती घेऊन मोठ्या प्रमाणावर श्रीलंका, भारत आणि पलीकडे आग्नेय आशियात जात. त्यांचा पहिला थांबा हूवधू, माले किंवा गान बेटावर असे. त्यामुळे की काय इस्लामिक सत्ता स्थापन होण्याच्या बरेच आधी मालदीवमध्ये व्यापाराची अधिकृत भाषा अरेबिक होती. पर्शियन किंवा उर्दू सारख्या भारतीय उपखंडात स्थिरावलेल्या भाषांचा फारसा वावर ह्या भागात दिसून येत नाही. धिवेही भाषा अरेबिक लिपीत लिहिल्या जाण्याचे हे ही एक कारण असू शकेल.
'लोमाफानू' - धिवेही भाषेत लिहिलेले ताम्रपट्टिकांचे पुस्तक. - १२ वे शतक.
सर्व नकाशे आणि बहुतेक चित्रे जालावरून साभार.
* * *
थोडे अवांतर:
त्यांच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही...
कवडीमोल भावाने विकावा लागला सगळा ऐवज ...
फुटकी कवडी नाही खिश्यात...
कौडी-कौडी जमा कर के ये मकान खरिदा पिताजी ने...
आपल्या बोलण्या-लिहिण्यात येणारे हे 'कवडी' प्रकरण बरेच रोचक आहे. चलन म्हणून प्राचीन भारत, ब्रम्हदेश आणि श्रीलंकेत कवड्या वापरल्या जात. कवड्या चलन म्हणून वापरण्याचा फार मोठा कालखंड भारत आणि शेजारी देशांनी अनुभवला आहे.
साधारण हिशेब : -
३ फुटक्या कवड्या = १ कवडी
१० कवड्या = १ दमडी
२ दमडी = १ धेला
१.५ पाई = १ धेला
३ पाई = १ पैसा
४ पैसे = १ आणा
१६ आणे = १ रुपया
स्थानिक चलनांची नावे वेगळी असली तरी थोड्याफार फरकाने आजूबाजूच्या देशांमध्ये प्रमाण असेच होते. (जुन्या लोकांकडून 'पै-न-पै' ची वसुली, 'आणेवारी', 'दीड-दमडी' ची ऐपत, 'पाई-पाई' चुका दूंगा असे डायलॉग सुद्धा ऐकले असतील तुमच्यापैकी काहींनी)
मालदीव हा हा देश भारतीयांना माहित असण्याचे आणि तेथे आपल्या दर्यावर्दी व्यापाऱ्यांची विशेष ये-जा असण्याचे एक खास कारण होते - ते म्हणजे तेथे असलेला कवड्यांच्या प्रचंड साठा ! चलन म्हणून आपल्याकडे ज्या कवड्या वापरल्या जात, त्या कवड्या मालदीवमध्ये अगदी 'कवडीमोलाने' मिळत. होडीभर अन्नधान्याच्या बदल्यात होडीभर कवड्या असा साधा सोपा हिशेब. त्यामुळे ही पाचूची बेटे भारतीय व्यापाऱ्यांसाठी अगदी सोन्याची खाण होती.
क्रमश:Book traversal links for शेजाऱ्याचा डामाडुमा - मास..अहारू... गारुनु.... - मालदीव भाग ३
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाचतोय! खूप भारी लिहीत आहात.
@ आदूबाळ,
@ संपादक / साहित्य संपादक
खूप धन्यवाद !!!
@ राघवेंद्र,
माहितीने आणि सुंदर चित्रांनी
मस्तच!
मस्तच लिहीताय.
फारच सुंदर माहिती आणि फोटो .
अतिशय सुरेख लिहीत आहात.
उत्तम लेखमाला
तिन्ही लेख उत्तम झालेत.
@ अमितदादा,
नक्कीच ज्या पद्धतीने हा करार
तुम्ही स्थानिक प्रश्नांचा
हंबन-टोटा
:-(
प्रवाही लेखनशैली....
@ Nitin Palkar,
तुमची लिखाण स्टाइल जबरी आहे राव
@ अर्धवटराव,
...
@ babu b,
नेहमी प्रमाणे अप्रतिम
मस्त लेख आवडला.
@ डॉ सुहास म्हात्रे,
@ अभिजीत अवलिया
पटापट टाका पुढचे भाग..मालदीव
दोन्ही पद्धत्तीने.
इस्लाम प्रसार
@ कपिलमुनी
सुंदर माहिती.
'भारताच्या ताब्यातील' हे
@ संपादक / साहित्य संपादक
@ रंगीला रतन,
बहुतेक त्यांना, "भारताच्या
खूपच इंटरेस्टिंग!
@ पैसा, आभार !