Skip to main content

आता, 'न्याय' ही संतापला..!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी सोमवार, 11/12/2017 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
आता, 'न्याय' ही संतापला..! 'तपास सुरु आहे' असं ठरीव आणि ठाशीव उत्तर देणाऱ्या तपास यंत्रणांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. चार वर्ष होतात तरी नरेंद्र दाभोलकर, कॉ पानसरे यांच्या खुनाचा तपास का लागत नाही? दोभोळ्कर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे? असा सवाल विचारत या दोन्ही प्रकरणातील तपासाची सद्यस्थती न्यायालयात दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. दाभोळकर- पानसरे हत्येप्रकरणी एका याचिकेवर सुनावणी करत असताना देशातील सद्यस्थतीतवर चिंता व्यक्त करत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला. लोकशाहीप्रधान देशात विचारवंतावर हल्ले केले जातात, कलाकारांना धमक्या दिल्या जातात. त्यामुळे देशाची प्रतिमा मालिन होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दाभोळकर -पानसरे प्रकरणाचा छडा लागत नसल्याने सर्वसामान्य जनतेत असलेली संतापाची भावना न्यायालयाने मांडल्याने आता, 'न्याय' ही संतापला..! असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अर्थात, न्यायालयाचा असो कि सामान्य जनतेचा हा संताप आजचाचं नाही. यापूर्वीही न्यायालयाने अनेकवेळा तपासयंत्रणांना धारेवर धरले आहे. सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दाभोळकर पानसरे प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी सातत्याने लावून धरली. मात्र अद्यापही या प्रकरणांचा उलगडा झालेला नाही, हे वास्तव आहे. दाभोळकर हत्याकांडाला चार वर्ष पूर्ण झाली, पानसरे यांच्या प्रकरणाला दोन वर्ष झाली. तरी ना तर त्यांचे मारेकरी पकडले गेले, ना त्यामागील सूत्रधार.. तपासयंत्रणा तापस सूर असल्याचं उत्तर देत राहिल्या, अन विचारसरणीच्या नावाखाली एकामागून एक विचारवंतांचे मुडदे पाडले जाण्याचं सत्र सुरूच राहिलं..दाभोळकर नंतर पानसरे त्यांच्यानंतर कर्नाटकात डॉ. कलबुर्गी तर आता सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील “लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांचीही हत्या झाली. एकाच 'मोडस ऑपरेन्डीने' प्रागतिक चळवळीतील चार कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र, सीबीआय, सीआयडी सारख्या नामवंत तपास यंत्रणांनाही या प्रकरणाचा उलगडा करता आलेला नाही. त्यामुळे यावर न्यायालयाचा असो कि सामान्य जनतेचा संताप व्यक्त होणे सहाजिकच.. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुरोगामी चळवळीचे आधारवड डॉ नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येच्या पहिल्या दिवसापासून पोलीस प्रशासन तपासाला लागल्याचे वरकरणी दिसले, परंतु पोलिसी तपासाची ढिसाळ कार्यपद्धती पदोपदी समोर येत राहिली. सुरवातीचा काही काळ प्राथमिक तपासात गेला. दाभोलकरांच्या खुनाचा छडा लावण्यासाठी ‘प्लँचेट’ चा वापर करण्यात आल्याचा आरोपही या काळात झाला. २०१४ मध्ये मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांवर डॉ. दाभोळकर यांच्या हत्येसाठी पिस्तूल पुरवल्याचा आरोप करण्यात आला. मात्र न्यायालयात नागोरीने एटीएसवर गुन्हा काबुल करण्यासाठी २५ लाखाची ऑफर दिल्याचा आरोप केला. ९ मे २०१४ ला दाभोळकर प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपविण्यात आला. तीन वर्षानंतर म्हणजे १० जून २०१६ ला सनातन संस्थेच्या वीरेंद्र तावडे याला सीबीआयने ताब्यात घेतेले. फरार असलेले विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप ठेवत तावडेला मुख्य आरोपी करून ७ सप्टेंबर २०१६ ला सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. परंतु आजून आरोप निश्चित झालेले नाही. संशयित अटक झालेले नाही. लंडन वरून येणाऱ्या बॅलेस्टिक अहवालाचा घोळ सुरूच आहे. निव्वळ तारखमागून तारखा वाढवून घेण्याचा प्रकार सुरु असून डॉ. दाभोळकरणांचे मारेकरी कोण, त्यामागील सूत्रधार, याचा कोणताच थांगपत्ता अजून लागलेला नाही. डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास रेंगाळत असतानाच त्याच पद्दतीने कोल्हापुरात कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रावर दुसरा आघात झाला. याही प्रकरणाच्या तपासात अक्षम्य दिरंगाई झाली. सुरवातीला कोल्हापूर एटीएस आणि नंतर सीबीआयकडे तपास वर्ग करण्यात आला. दाभोळकर प्रकरणातील आरोपींशी पानसरे हत्याप्रकरणाचे धागे दोरे आढळले. समीर गायकवाडला हत्येच्या ८ महिन्यानंतर अटक झाली. बॅलिस्टिक अहवाल अगोदर स्कॉटलंड यार्ड कडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले, नंतर त्याला परवानगीच नसल्याचे समोर आले. मुंबई आणि गुजरातच्या लॅबमधून बॅलेस्टिक अहवाल मागविण्यात आला. मात्र त्यात पराकोटीची विसंगती आढळून आली. तपास संस्थांच्या गडबडीमुळे समीर गाकवाडला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला. पोलिसांचे आरोपपत्र सीबीआयने रद्द ठरविले आणि आपले आरोपांतर दाखल केलं परंतु त्याच्यातही समोर काहीच झालं नाही. दाभोळकर आणि पानसरे प्रकरणातील साम्य पाहता दोन्ही प्रकरणाचा संयुक्तिक तपास करण्याचाही प्रयत्न झाला, पण आउटपुट शून्य..! दाभोळकर-पानसरे प्रकरणाचा तपास रेंगाळला. परंतु, बंदुकीच्या गोळीने विचार संपविन्याचे सत्र मात्र थांबले नाही. कर्नाटकात डॉ. कलबुर्गी यांनाही समाजकंटकांनी गोळ्या घातल्या. सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील “लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांचीही त्याच पद्धतीने हत्या झाली. एखाद्या व्यक्तीचे विचार पटत नसतील तर त्याच्याशी विचारांचा संघर्ष करण्याऐवजी त्या व्यक्तीलाच संपविण्याची प्रवृत्ती संवैधानिक विचार स्वातंत्र्याच्या तत्वाला तर मारक आहेच, शिवाय देशाच्या इभ्रतीसही कलंक लावणारे आहे. चार वर्षात प्रागतिक चळवळीतील चार कार्यकर्त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडणारे 'हात' कुणाचे होते? हे तपास यंत्रणांना कदाचित माहीत नसेलही, मात्र त्यामागे 'मेंदू' कोणत्या विचार प्रवृत्तीचा आहे, हे सर्वसामान्य जनतेला दिसते. पण ते सरकारला आणि तपास यंत्रणांना का दिसत नाही, हा अस्वस्थ करणारा सवाल आहे. म्हणूनच न्यायालयाने यावरून तपास यंत्रणांना धारेवर धरले. विवेकवादाची लढाई लढता लढता चार शिलेदार धारातीर्थी पडले. अर्थात त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही आणि जाणार नाही. बंदुकीच्या गोळीने विचार संपवू पाहणाऱ्या प्रवृत्तीला नेहमीच कठोर प्रतिउत्तर दिल्या गेले आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्या निधनानंतरही चळवळ थांबली नाही, उलट ती फोफावते आहे. परंतु तरीसुद्धा माणुसकीचा प्रकाश देणाऱ्या या 'पणत्या' विझवण्याचे कुकर्म कुणाचे ? याचा शोध लागणे गरजेचे आहे. न्यायालयाच्या ताशेऱ्यांना गांभीर्याने घेऊन तपास यंत्रणांनी या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवे. न्यायालयाने व्यक्त केलेला संताप लोकांनाही रस्त्यावर मांडला तर, परिस्थती हाताबाहेर जाईल याची जाण तपास यंत्रणा आणि सरकारने ठेवायला हवी..!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16228
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

In reply to by arunjoshi123

साध्वीने स्कूटर विकली होती तर स्कूटर नव्या मालकाच्या नावाने झाली असती व अटक नव्या मालकाला केली गेली असती. ... असो , सध्या साध्वी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याने तिच्याबद्दल इतर चर्चा करण्यात अर्थ नाही. आधिदैविक , आधिभौतिक आणि अध्यात्मिक अशा तीतीन्ही द्:खातून तरुन जाण्यास हिंदुधर्म तिला शक्ती देवो.

In reply to by babu b

बाँबस्फोटातील स्फोट ज्या स्कूटरच्या सहाय्याने केला ती साध्वीच्या मालकीची होती ना ?
पुरोगाम्यांच्या मते हो, कायदेशीरपणे नो.

In reply to by babu b

ही साध्वी आणखी एक गुन्ह्यात होती असा संशय आहे,मालेगाव कट शिजला त्यात एक जोशी नावाचा प्रचारक होता,साध्वीकडे त्याने बरेचदा लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता असे तपास यंत्रणांचे म्हणने आहे.माझ्याशी संबंध ठेव नाही तर कटाचि माहीती पोलिसांना देईन अशी त्याने धमकी दिल्यावर त्याला २००७ साली संपवले गेले म्हणे. ब्रह्मचर्य हेच जीवन ,विर्यनाश हा मृत्यु असे वैचारीक टॉनिक भोळ्याभाबड्या हिंदूना पाजणारे तथाकथित साध्वी आणि प्रचारक वास्तवात कसे विषयवासनेत बुडालेले असतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. http://indianexpress.com/article/india/india-others/pracharak-killed-af…

In reply to by सिंथेटिक जिनियस

ही साध्वी आणखी एक गुन्ह्यात होती असा संशय आहे, ९/११ आणि २६/११ च्या हल्ल्यात तसेच दुसर्‍या महायुद्धात जपानवर टाकलेल्या अणुबाँबच्या प्रकरणात सुद्धा या साध्वीचा हात होता असा संशय आहे. मालेगाव कट शिजला त्यात एक जोशी नावाचा प्रचारक होता,साध्वीकडे त्याने बरेचदा लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता असे तपास यंत्रणांचे म्हणने आहे.माझ्याशी संबंध ठेव नाही तर कटाचि माहीती पोलिसांना देईन अशी त्याने धमकी दिल्यावर त्याला २००७ साली संपवले गेले म्हणे. साध्वी, कर्नल पुरोहित इ. ना काहीतरी करून या प्रकरणात अडकविण्यासाठी एनआयएने असे अनेक बिनबुडाचे आरोप केले होते. हा आरोप त्यातलाच अजून एक. ब्रह्मचर्य हेच जीवन ,विर्यनाश हा मृत्यु असे वैचारीक टॉनिक भोळ्याभाबड्या हिंदूना पाजणारे तथाकथित साध्वी आणि प्रचारक वास्तवात कसे विषयवासनेत बुडालेले असतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. अनेकवेळा हाकलून लावूनसुद्धा कोडगेपणे नवीन आयडी घेऊन परत येऊन त्याच त्याच ओकार्‍या परत काढणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे . . .

In reply to by सिंथेटिक जिनियस

ब्रह्मचर्य हेच जीवन ,विर्यनाश हा मृत्यु असे वैचारीक टॉनिक भोळ्याभाबड्या हिंदूना पाजणारे तथाकथित साध्वी आणि प्रचारक वास्तवात कसे विषयवासनेत बुडालेले असतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.
पुरोगामी पंडित नेहरूंची प्रेरणा, दुसरं काय. गांधीजी सुद्धा तसलेच. तरण्या नातींसोबत नागडे झोपायचे आणि जगाला ब्रह्मचर्य शिकवायचे. https://blogs.timesofindia.indiatimes.com/the-interviews-blog/gandhi-wa…

In reply to by arunjoshi123

गांधीजी सुद्धा तसलेच. तरण्या नातींसोबत नागडे झोपायचे आणि जगाला ब्रह्मचर्य शिकवायचे. >> एक कविमनाचा "अटळ "विचारांचा भाजपेई पंतप्रधान होऊन गेला ,तो दिल्लीतील संघ मुख्यालयात पोरी आणून कसा अय्याशी करायचा ह्याचे सुरस किस्से तेव्हा राजधानीत चर्चीले जात होते .

In reply to by सिंथेटिक जिनियस

हे मी देखील ऐकलं आहे. याला किती खरं मानावं देव जाणो. -------------------- पण गांधीजींचं सेक्स्यूअल पाप सिद्ध आहे. वाजपेयींवर केवळ आरोप आहे.

In reply to by arunjoshi123

मै शादीशुदा नही हू इसका मतलब ये नही की मै ब्रह्मचारी हू .... असे सोत्ता तेच सोत्ताबद्दल बोलले होते ना ?

In reply to by babu b

पण ते गांधीजीं इतका विकृत प्रकार करत नसावेत. मी दिलेली लिंक वाचलीत का? =============== आरोप करणारे आणि भाजप / संघ यांचा संबंध नाही. ============================== माझे सत्याचे प्रयोग वाचले आहे का? त्यात आहे.

In reply to by arunjoshi123

पण गांधीजींचं सेक्स्यूअल पाप सिद्ध आहे. वाजपेयींवर केवळ आरोप आहे. >> कुठे सिद्ध झाले बुवा हे! गांधी विरोधकांनि उठवलेल्या अफवांना सिद्धता मानता का जोशी? तशी अफवा तर मग हिंदू महासभेच्या एका मोठ्या मराठी नेत्याबाबतही आहे,त्याचे आणि गोडसेचे समलिंगी संबंध असल्याचे तत्कालीन तपास् अधिकार्यांनी जाहीरपणे कोर्टात सांगितले होते हे विसरलात काय.?

In reply to by सिंथेटिक जिनियस

कुठे सिद्ध झाले बुवा हे! गांधी विरोधकांनि उठवलेल्या अफवांना सिद्धता मानता का जोशी? एका पुस्तकात कन्फेशन आहे.

In reply to by सिंथेटिक जिनियस

मालेगाव कट शिजला त्यात एक जोशी नावाचा प्रचारक होता,साध्वीकडे त्याने बरेचदा लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता असे तपास यंत्रणांचे म्हणने आहे.माझ्याशी संबंध ठेव नाही तर कटाचि माहीती पोलिसांना देईन अशी त्याने धमकी दिल्यावर त्याला २००७ साली संपवले गेले म्हणे.
कटात तो स्वतः होता तर माहीती पोलिसांना कळल्यावर त्याला काय सोडणार होते का? ======================== लैंगिक अ‍ॅडवान्सेस करणे क्रिमिनल आहे, त्यासाठी साध्वीने त्याचा खून करणे क्रिमिनल आहे. पण इंडीयन एक्सप्रेसने आणि एन आय ने ओढून ताणून तिचे हात पाय तोडून याचा संबंध ब्लास्टशी लावला आहे. ========================= केरळच्या मंदिरात सोने सापडले तेव्हा काँग्रेसच्या मुख्यालयातूने दोन जहाजे इटलीतून मागवली गेली (ते सोनं घेऊन जायला) तसं साध्वीला शंकराचार्य आणि संघप्रमुखांचं मार्गदर्शन होतं असं म्हणायचं आहे का?

In reply to by पुंबा

गांधी हत्येचं समर्थन मंजे काय हे तरी कळतं का तुम्हाला? ======= आम्हाला काय शौक आहे का कोणाच्याही हत्येचं समर्थन करायला? ================ मी कधीही कोणत्याही प्रकारच्या वाईट गोश्टीचा, हिंसेचा, दुर्वर्तनाचा, इ इ समर्थन केले नाही, करणार नाही. त्यात गांधींची हत्या ही एक अशीच असमर्थनीय गोष्ट आहे.

In reply to by पुंबा

वर एका प्रतिसादात ब्राह्मणांचा उल्लेख कुत्रा असा केलेला असून त्यांची घरे जाळल्याचे समर्थन केलेले आहे. तो प्रतिसाद आपण पाहिला नसणारच.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांची घरे जाळल्याचे समर्थन केलेले आहे.
पुढे असाच प्रसाद द्यायची इच्छा देखील व्यक्त केली आहे. ============================================ पुंबासारख्या पुरोगाम्यांना १०-२० लाख पंजाबी, बंगाली लोकांवर झालेले अनन्वित अत्याचार दिसत नाहीत. हे ज्यांच्या मूर्खपणाने झाले त्यांना कुणी चोपले तर मेणबत्ती काढून चौकात.

In reply to by श्रीगुरुजी

हे लोक गांधीजींच्या धोतरावर ढेकूण चढला तरी आकांडतांडव करतील. तेच्च २० लाख लोकांचे जीव गेले आणि लाखो बायकांवर बलात्कार झाले तर कुठेत्तरी कोपर्‍यात "वैष्णव जन तो" वर टाळ बडवत बसणार. गांधी मारले गेले ते वाईट, मारणारा वाईट - अरे पण त्या लाखो लोकांवर बोला जरा.