Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ओम शतानन्द on Sat, 11/18/2017 - 12:48
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी - १२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ . स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात . लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते . या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत . आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे
  • Log in or register to post comments
  • 87363 views

प्रतिक्रिया

Submitted by जेम्स वांड on Sat, 11/18/2017 - 21:24

In reply to मग रुळवायला पुढाकार कोणी by टवाळ कार्टा

Permalink

अर्थात सामान्य

धर्म ठेकेदार मंडळीने त्याला मान्यता दिली तर उत्तम, तसंही पहा, उद्या मी एखादी मुस्लिम पोरगी पटवली अन लग्न करतो म्हणले तर पहिले उठून त्यांचे धार्मिक नेतेच बोंब ठोकतील. त्याला प्रत्युत्तर सामान्य लोक देऊ शकत नाहीत ना! आपल्याला कितीही राग आला तरी अश्याजागी ठेकेदार हवेतच, अन त्यांची कमी नाही, पब मध्ये एक ड्रिंक घेतलं म्हणून मंगळूर मध्ये पोरींना बडवणारे वीर येतील का कामी बघावे लागेल ;) , अन त्यांची प्रयोरिटी हिंदू धर्म असल्यास त्यांना यावेच लागेल!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 11/18/2017 - 21:50

In reply to अर्थात सामान्य by जेम्स वांड

Permalink

+११११११११११

+११११११११११
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sun, 11/19/2017 - 08:44

In reply to अर्थात सामान्य by जेम्स वांड

Permalink

ते येतील, पण तुम्चे नातेवाइक

ते येतील, पण तुम्चे नातेवाइक तिला स्वीकारतील का हे महत्वाचे आहे
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Sun, 11/19/2017 - 09:13

In reply to ते येतील, पण तुम्चे नातेवाइक by आनन्दा

Permalink

मी वैयक्तिक रुपात

माझ्या नातलगांची हमी घेऊ शकतो, तुम्ही त्यांची 'हमी' घेऊ शकता का आनंदाभाऊ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user Duishen

Submitted by Duishen on Sun, 11/19/2017 - 03:03

In reply to यू आर राईट by गामा पैलवान

Permalink

मीनाक्षीपुरम..

मला वाटत ही घटना १९८९ सालची असावी अनेक हिंदुनी जातीव्यवस्थेला कंटाळून धर्मांतर केले त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घ्यावे असे अनेक पंडितांचे मत होते. पण सगळे प्रकरण पुन्हा जातीवर आले. कारण धर्मांतर केले तर नेमक्या कुठल्या जातीत घेणार?
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Sat, 12/09/2017 - 15:58

In reply to मीनाक्षीपुरम.. by Duishen

Permalink

ज्या ज्या हिंदू धर्म सोडून

ज्या ज्या हिंदू धर्म सोडून जायचे आहे त्यांनी तो सोडून कुठेही (मसणात) जावे. परत यायची गरज नाही. जे सध्याला हिंदू म्हणून सुखाने जगत आहेत त्यांचे जगणे हराम करू नये.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Sat, 12/09/2017 - 15:54

In reply to जे झाले ते झाले ! by babu b

Permalink

तुम्ही त्यांचा पुरुष वापरुन

तुम्ही त्यांचा पुरुष वापरुन तेच का नाही करत ?
ज्या कंच्या मुसलमानाला त्याच्या लेकरांची संमिश्र (हिंदू प्लस मुस्लिम) आयडेंटीटी मान्य असणार आहे त्याच्येशी हिंदू पोरिंनी आरामात लग्न करावे. आमचा सहर्ष पाठींबा आहे. ---------------- तेच मुस्लिम पोरिंनी करावे नि हिंदू पोरांनी मिश्र आयडेंटीटी पुढच्या पिढीला ठेऊ द्यावी. ===================================================================== पण धाग्यातली स्टोरी वेगळी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Sat, 11/18/2017 - 16:50

Permalink

स्पेशल मॅरेज कायद्यात मुलांची

स्पेशल मॅरेज कायद्यात मुलांची कस्टडी कशी ठरवतात?
  • Log in or register to post comments
Profile picture for user Duishen

Submitted by Duishen on Sun, 11/19/2017 - 03:10

In reply to स्पेशल मॅरेज कायद्यात मुलांची by एमी

Permalink

कस्टडी...

कस्टडीसाठी वेगळा नियम लागू नाही. जे इतर विवाहांच्या केसेस मधे होते त्याप्रमाणेच याही केसेस मधे होते. कालच मुंबई कोर्टाने आंतरधर्मीय विवाहातून झालेल्या मुलीची कस्टडी हिंदू आजीकडे सोपवली. मुल त्याचे शिक्षण, पालन-पोषण कोण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते असा नेहमीचाच निकष गृहीत धरल्या गेला आहे. पण वारसा हक्कासाठी आंतरधर्मीय विवाहांतील संततीसाठी "इंडिअन सक्शेशन कायदा" पण बौद्ध, जैन असल्यास "हिंदू सक्शेशन कायदा" लागू आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Sun, 11/19/2017 - 06:18

In reply to कस्टडी... by Duishen

Permalink

धन्यवाद!

धन्यवाद! पण मला एक शंका आहे. ती खाली babu ना उपप्रतिसाद देऊन विचारली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Sat, 11/18/2017 - 17:56

Permalink

अत्यंत हायपोथेटिकली पुढील

अत्यंत हायपोथेटिकली पुढील प्रश विचारतोय.... याचा सत्याशी तिळमात्र संबंध नाही.... समजा पुण्यातील एका उच्चशिक्षित सेक्युलर विचाराच्या ब्राम्हण तरूणाने, त्यांच्याच ऑफिस मधील एका सुस्वरूप उच्चशिक्षित दलित तरुणीशी ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन विवाह केला, त्यांना एक सुंदर निरोगी कन्या झाली. मुलीला आई वडील भावंड नाहीत.... काही वर्षे नंतर, त्यांच्या परस्परात मनोभेद होऊ लागले... त्यामुळे वाद वाढू नये म्हणून, मुलगा सोसायटीतील शेजारच्या विंग मधे राहत असलेल्या दूरच्या बॅचलर भावाच्या फ्लॅटवर राहायला गेला....परंतु घरखर्चाच्या संसाराच्या सर्व आर्थिक सामाजिक बाबतीत समान हातभार लावणे त्याने चालूच ठेवलं....कर्तव्ये करण्यात काही कमी नाही केली.... इकडे दोघांनीही घटस्फोट साठी तयारी केली, मुलीची वकील सौ भोसले, या घटस्फोट विषयातील अत्यंत नामांकित वकील होत्या, त्यांनी मुलीला कल्पना दिली, की आपल्याला केस लढताना, भावनिक होऊन चालत नाही... तर अत्यंत विजिगीषु पद्धतीने आक्रमकपणे समोरच्या पार्टीवर हल्ले करावे लागतील.... त्याचाच एक भाग म्हणून, तु (मुलीने) आपण दलित असल्याने, सासरी वारंवार अवहेलना सहन करावी लागते, व सासरकडचे आपल्यावर बौद्ध प्रार्थना पद्धत सोडून, वैदिक प्रार्थना पद्धतीची जबरदस्ती करून एक प्रकारे माझं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून मला घटस्पोट मिळावा व मुलीचा पूर्णपणे ताबा मिळावा... अशी स्ट्रॅटेजी करण्याचे ठरवले... वाचकहो तुम्ही, मुलाचे समजा वकील आहात.... श्री मानेशिंदे. तर तुम्ही वरील पार्श्वभूमीवर, मुलाचा पक्ष कसा मांडणार ? त्याचा बचाव कसा करणार ???
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 11/18/2017 - 19:48

In reply to अत्यंत हायपोथेटिकली पुढील by पगला गजोधर

Permalink

डोळे लै पाणावले

पग आपण अशा समस्त मुलांचे वकीलीपत्र किमान मिपावर घेतल्याचे पाहुन डोळे लै पाणावले ;) *** हे खरय की लेखन स्वातंत्र्याचा आदरकरूनही कोर्टातून सिद्ध न झालेल्या केसेसना हवा मर्यादीतच द्यावी किंवा अद्यापी कोर्टातून सिद्ध झालेले नाही अशी टॅग लावावी. पण म्हणून वरील पग विरोधी कॅरेक्टर असॅसिनेशन करणार्‍या पग स्टाईलचे समर्थनही पोकळपायावरचे निस्टते ठरत असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Sat, 11/18/2017 - 22:01

In reply to डोळे लै पाणावले by माहितगार

Permalink

माहितीगार सर, आपला वरील

माहितीगार सर, आपला वरील प्रतिसाद २-३ वेळा वाचूनही इंटरप्रीट करू शकलो नाही, क्षमस्व. कृपया, आपण मला, मी एक ५वी नापास मुलाच्या कुवतीनुसार समजून, बाळबोध दैनंदिन मराठीतुन आपला प्रतिसाद समजावून सांगण्याची विनंती करू शकतो का ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Sat, 11/18/2017 - 20:13

In reply to अत्यंत हायपोथेटिकली पुढील by पगला गजोधर

Permalink

झकास एकदम पटल

साध्या हिन्दु हा धर्म आणि ब्राम्हण या जातीला सर्वच झोडपतात. त्यामुळे अशा खोट्या केसेस होऊ शकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Sat, 11/18/2017 - 20:21

In reply to झकास एकदम पटल by सुखीमाणूस

Permalink

ह्या निमित्ताने

आजकालचे ब्राह्मण ब्राह्मण आहेत का? (धार्मिक दृष्ट्या, मनुस्मृती नुसार त्यातल्या कायद्यानुसार) हा प्रश्न ह्या निमित्ताने पुन्हा एकदा पडतो आहे, सनातन हिंदू धर्म अन ब्राह्मण जात ह्यांना जर 'इतर सगळेच कायम झोडपत' असले(च) तर आजवर हिंदुधर्म टिकून कसा काय आहे असा एक प्रश्न पडतो आहे.... ही पावती होय का? ब्राह्मणेत्तर जनतेच्या धर्मनिष्ठेची?
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Sat, 11/18/2017 - 21:30

In reply to ह्या निमित्ताने by जेम्स वांड

Permalink

कुठे टिकतो

आहे हिन्दु धर्म? ज्या पद्धतीने ब्राम्हणान्चे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यात जास्त हानी हिन्दु धर्मांची होते आहे. अगदी मान्य की पुर्वी ब्राम्हणानी जातीवर्चस्व गाजवलं. पण आज त्यान्च्यावर अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करायचीच वेळ आली आहे. ज्या मनुस्म्रुतिने त्याना अमर्याद अधिकार दिले तिनेच सद्वर्तनाचे बन्धन घातले. हिन्दुधर्म टिकून आहे तो केवळ सर्व जातीतल्या मूठभर धार्मिक लोकांमुळे.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Sat, 11/18/2017 - 21:38

In reply to कुठे टिकतो by सुखीमाणूस

Permalink

नका लोड घेऊ आणि श्रेयही...

नका लोड घेऊ आणि श्रेयही... दोन्ही गोष्टी फुकाच्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by Nitin Palkar on Sat, 11/18/2017 - 21:39

In reply to कुठे टिकतो by सुखीमाणूस

Permalink

पुर्वी ब्राम्हणानी जातीवर्चस्व गाजवलं

'पुर्वी ब्राम्हणानी जातीवर्चस्व गाजवलं' खरोखरी असं कधी घडलं? कारण वर्ण तर कर्माधीष्ठीत होते! ज्याला काहीच जमेत नसे तो शुद्र ठरत असे....
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Sat, 11/18/2017 - 22:02

In reply to पुर्वी ब्राम्हणानी जातीवर्चस्व गाजवलं by Nitin Palkar

Permalink

ज्याला काहीच जमेत नसे ????

ज्याला काहीच जमेत नसे ???? काय असतं हे काहीच न जमणे? जरा विश्लेषण कराल काय?
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Sat, 11/18/2017 - 22:04

In reply to पुर्वी ब्राम्हणानी जातीवर्चस्व गाजवलं by Nitin Palkar

Permalink

तुम्ही भगवद्गीता मानता का सरजी?

म्हणजे कुठली गीता आपण मानता?
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Sat, 11/18/2017 - 22:01

In reply to कुठे टिकतो by सुखीमाणूस

Permalink

मूठभर म्हणजे आकड्यांच्या

मूठभर म्हणजे आकड्यांच्या भाषेत किती असावेत सरजी ?, सहज आपलं एक कुतूहल. बरं, अजून एक सांगा, तुमचं विधान आहे की 'प्रत्येक जातीतल्या मूठभर धर्मप्रेमी लोकांमुळे हिंदुधर्म टिकून आहे' चला म्हणजे ब्राह्मणांत पण मूठभरचं धार्मिक लोक आहेत हे पण मान्य झालं, ते एक असो, हे मूठभर कसं ठरलं? म्हणजे तुमचा आत्मविश्वास खरंच वाखाणण्याजोगा आहे तुम्ही बरोबर सांगू शकाल मला असे वाटते. एक हिंदू म्हणून, मी पूर्ण हिंदुधर्माला घट्ट करेल अश्या आंतरजातीय विवाहांना समर्थन द्यावे की त्याचा निषेध करावा?
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Sat, 12/09/2017 - 16:24

In reply to मूठभर म्हणजे आकड्यांच्या by जेम्स वांड

Permalink

ब्राह्मणांत पण मूठभरचं

ब्राह्मणांत पण मूठभरचं धार्मिक लोक आहेत हे पण मान्य झालं,
मूठभर धार्मिक आहेत, नि ढिगभर हिंदूविरोधी पुरोगामी आहेत. (जन्माने) ब्राह्मणांइतके हिंदूविरोधी कोणीच नाहीत, अगदी मुसलमानही नाहीत. जे उरलेले आहेत ते सगळे ब्राह्मण वागायला ख्रिश्चन आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Sat, 11/18/2017 - 22:20

In reply to कुठे टिकतो by सुखीमाणूस

Permalink

शिवाय

ज्या पद्धतीने ब्राम्हणान्चे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यात जास्त हानी हिन्दु धर्मांची होते आहे. हे नेमके कसे ते समजवून सांगाल का? ब्राह्मण एकंदरीत लोकसंख्येच्या ५% मात्र आहेत, ह्यातले मुसलमान , शीख, ख्रिस्ती, जैन वगैरे काढले तर ७% पकडा वाटल्यास, सात टक्के लोकांना उर्वरित खूप लोक मिळून खच्ची करायचा प्रयत्न करतायत असं समजा, त्याने उर्वरित ९३% हिंदूंचे नुकसान कसे काय होते आहे ते समजवून सांगा न कृपा करून. म्हणजे बघा ९६ कोटी हिंदू त्यातले ७% म्हणजे ६.७२ कोटी ब्राह्मण, ह्यातले सुविद्य लिबरल वगैरे धेंड सोडून द्या ५० लाख उर्वरित मध्यमवर्गीय पापभिरू, लॉ आबायडिंग गॉड फियरिंग ब्राह्मण नाडले जातायत असं धरलं तर त्याने उर्वरित ९० कोटी हिंदूंची 'हानी' कशी होते आहे ते पण सांगा प्लीज.
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Sat, 11/18/2017 - 22:48

In reply to शिवाय by जेम्स वांड

Permalink

सोपे आहे

मुसलमानांचे मौला, ख्रिश्चन लोकांचे पाद्री, बौद्ध लोकांचे भिख्खू तसेच हिन्दु धर्मात ब्राम्हण मग एखादा धर्म संपवण्यासाठी त्यातल्या मार्गदर्शन करणाऱ्या लोकांना सम्पवले की संपलाच तो धर्म. मी मान्य करते की जात पात मानणे चुकीचे आहे. पण उठसुठ सगळ्या गोष्टी मध्ये ब्राम्हण आणले जातात तेव्हा निषेध नोन्दवावा लागतो. आत्ता देखील पग याना उदाहरण द्यायला ब्राम्हण तरुणच मिळाला...
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Sat, 11/18/2017 - 23:18

In reply to सोपे आहे by सुखीमाणूस

Permalink

खरं तर तुम्हा लोकांना फक्त

खरं तर तुम्हा लोकांना फक्त तुमची काळजी आहे हे यानिमित्ताने उघडे पडले. १०० कोटी हिंदूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:ची चामडी वाचवायचा प्रयत्न चालू आहे तुम्हा लोकांचा. अजिबात गरज नसतांना हिंदुंचे स्वयंघोषित मार्गदर्शक होऊ जाता म्हणून विरोध होतो हे समजले नाही का इतक्या वर्षांत...?
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Sat, 11/18/2017 - 23:40

In reply to खरं तर तुम्हा लोकांना फक्त by तर्राट जोकर

Permalink

नाही

प्रत्येक जण स्वताची काळजी घेण्यासाठी समर्थ असतो. आगदी मान्य की ब्राम्हण स्वघोषित मार्गदर्शक आहेत. काही गुण नसतानाही त्यानी नेत्रुत्वाचा ठेका घेतला आहे. मग तरी ब्राम्हण प्रगत म्हणत त्याना आरक्षण नको म्हणता. नक्की काय खरे मानायचे?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Sun, 11/19/2017 - 02:25

In reply to नाही by सुखीमाणूस

Permalink

काय लिहिलं आहे ते काहीही कळलं

काय लिहिलं आहे ते काहीही कळलं नाही. असो. ब्राह्मणांना आरक्षण कोणी नाकारलंय? होऊन्देत ना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. सगळ्यांचेच.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Sun, 11/19/2017 - 06:34

In reply to काय लिहिलं आहे ते काहीही कळलं by तर्राट जोकर

Permalink

ब्राह्मणांना आरक्षण कोणी

ब्राह्मणांना आरक्षण कोणी नाकारलंय? होऊन्देत ना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. सगळ्यांचेच. >>+१
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 11/20/2017 - 11:23

In reply to काय लिहिलं आहे ते काहीही कळलं by तर्राट जोकर

Permalink

मला वाटते की बहुसंख्य

मला वाटते की बहुसंख्य ब्राह्मणांना आरक्षण नकोच आहे. बहुसंख्य ब्राह्मण आरक्षणविरोधी आहेत. बहुसंख्य ब्राह्मणांना स्वतःला आरक्षण नको आहे फक्त ते कूणालाच नको अशी भूमिका आहे. तुम्हा लोकांमध्ये आणि ब्राह्मणांमध्ये हाच फरक असल्याने तुमच्या विचारांना विरोध होतो आहे हे कळाले नाही का तुम्हाला अजुन? बाबासाहेबांच्या खांद्यावर बंदु़क ठेउन आणि दलितांचा वाली असल्याचे भासवुन तुमच्यासारख्या लोकांना केवळ स्वत:चे उखळ पांढरे करुन घ्यायचे आहे. खरं तर तुम्हा लोकांना फक्त तुमची काळजी आहे हे यानिमित्ताने उघडे पडले
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 11/20/2017 - 11:44

In reply to मला वाटते की बहुसंख्य by मृत्युन्जय

Permalink

ह्या ह्या ह्या. ते समजलं तर

ह्या ह्या ह्या. ते समजलं तर "धंदा" बंद नाही होणार का? बरं दुसरा धंदा करायचा तर त्याला कौशल्य लागतं. आता ते काही मिळवायची बौद्धिक पातळी आरक्षणातुन नं मिळता झगडल्याने मिळते ह्याची समज नसल्याने सद्ध्या तरी ब्राह्मणांना शिव्या देउन चडफडायचा बिनभांडवली धंदा चालु आहे. मग ब्राह्मणांनी फाट्यावर मारलं तरी कोपर्यातुन शुक शुक करायची सवय जाणारे का? सगळचं अनधिक्रुत. आपलाच नम्र कॅजॅस्पॅ
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 11/20/2017 - 11:49

In reply to ह्या ह्या ह्या. ते समजलं तर by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

सत्यम् ब्रूयात् प्रियम्

सत्यम् ब्रूयात् प्रियम् ब्रूयात् न ब्रूयात् सत्यम्अप्रियम्।
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दबम्बाळ on Tue, 11/21/2017 - 11:43

In reply to सत्यम् ब्रूयात् प्रियम् by श्रीगुरुजी

Permalink

आरक्षणाचा मुद्दा निघाला कि

आरक्षणाचा मुद्दा निघाला कि आलेच नेहमीचे खेळाडू आम्ही कसे भारी बाकीच्यांपेक्षा दाखवायला! आरक्षणाच्या धाग्यावर आरक्षणाची गरज आणि त्याचे फायदे यावर अभ्यासपूर्ण चर्चा झाली होती. जिथे तिथे इतरांना अभ्यास वाढवण्याचे सल्ले देणार्यांनी तिथे अभ्यास करावा जरा, चुकून डोक्यात प्रकाश पडला तर पडेल! आणि तरीपण जर आपल्या समाजाचा/जातीचा इतरांच्या तुलनेत प्रगत असण्याचा इतकाच अभिमान असेल तर ती इतरांच्या तुलनेतली ती प्रगती ज्या अमानुष आणि भेदभावाच्या प्रथांमुळे आपल्या पूर्वजांकडून आली आहे त्याची पण जबाबदारी घेता का ते पण सांगा! शेकडो हजारो वर्षे शिक्षणापासून वंचित ठेऊन हिंदू धर्मात ज्यांचे ज्यांचे शोषण केले त्यांना तुमचा ६०-७० वर्षात सर्वंकष विकास का झाला नाही हे निगरगट्टपणे विचारावं तरी कसे वाटत काय माहित! आंबेडकरांनी त्यांना त्याचे अधिकार मिळवून दिले! माझ्यासोबत इंजिनीरिंगला असलेले काही मित्र जर आरक्षण आणि सवलती नसत्या तर आयुष्यात ते शिक्षण घेऊ शकले नसते आणि आज चांगल्या ठिकाणी कमावत नसते. त्यामुळे ते आंबेडकरांना इतकं मानतात! अजूनही धुणं भांडी करणाऱ्या बायका विशिष्ट समाजाच्या का असतात? कमी प्रतीची काम करणारी माणसं सवर्ण का नसतात... मंडल आयोगामध्ये या सगळ्याचा विचार करून आरक्षण आखणी केली गेली होती आणि जे लोक नोकऱ्या दलितांनी लाटल्या वगैरे सांगत असतात त्यांच्यासाठी... भारतात सरकारी नोकऱ्या एकूण नोकऱ्यांच्या जवळपास ४% आहेत. आता भारताच्या जनगणनेनुसार बहुजन असलेल्या वर्गाची काय टक्केवारी आहे बघूया त्यात! Image removed. अरेच्चा! प्रत्येक ठिकाणी ६०% च्या वर नोकऱ्या सवर्णांकडेच आहेत कि! मग इतकी आरडाओरड कशासाठी? का सहनच होत नाही इतरांची प्रगती होत असलेली? आरक्षण योग्य ठिकाणी कसे पोहोचेल इतकेच बघण्याची गरज आहे! त्याचे फायदे समाजात होत आहेतच... आणि हो मी कधी आरक्षण घेतलेली नाही बर का, नाहीतर याल लगेच धावून...
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Tue, 11/21/2017 - 20:20

In reply to आरक्षणाचा मुद्दा निघाला कि by शब्दबम्बाळ

Permalink

माझा एक प्राथमिक प्रश्न आहे.

जुने भारतिय शिक्शण म्हणजे वेद, पुराणे काही कामाचे होते का? कारण आधुनिक शिक्शण ब्रिटीशानी आणले ते साधारण १२५ वर्षापुर्वी. भारताच्या घटनेने सर्वान्साठी शिक्षण खुले केले म्हणजे वन्चित समाज फार थोडी वर्ष खर्या शिक्षणापासुन दुर राहीला. हो शिक्शणाची आवड निर्माण व्हायला थोडा वेळ लागतो. हजारो वर्ष ज्या शिक्षणापासुन समाज दुर राहीला ते माझ्यामते पोथ्या पुराणे असे निरुपयोगी शिक्शण होते. तेव्हा आरक्शणाच्या मागणीपेक्शा अजुन समाज जाग्रुती आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दबम्बाळ on Wed, 11/22/2017 - 10:20

In reply to माझा एक प्राथमिक प्रश्न आहे. by सुखीमाणूस

Permalink

पोथी पुराणे किंवा भारतीय

पोथी पुराणे किंवा भारतीय साहित्य हे नक्की निरुपयोगी होते का? म्हणजे ब्रिटिश भारतात येण्याआधी आपल्याकडे आपल्या भाषांमध्ये ज्ञानच नव्हते असे तुम्हाला म्हणायचंय का? हे खूप धाडसी किंवा बेजबाबदार विधान वाटत नाही का? आणि समजा जरी मानले कि ते निरुपयोगी होते तरी लिहिता वाचणे येणे आणि अक्षरओळख असणारे याचा काही फायदा असतो कि नाही? इंग्रजी सोडा साधी मराठी लिहिता वाचता येत नव्हती लोकांना! मग इंग्रजांच्या काळात देखील शिकून नोकऱ्यांमध्ये लागणारे कोण असणार होते? जेव्हा काही स्पर्धाच नव्हती अशा वेळी घेतलेल्या शिक्षणाचा जास्त फायदा झाला असेल असे जाणवत नाही का तुम्हाला? समाजाची प्रगती का झाली त्याची कारण याच गोष्टींमध्ये आहेत! म्हणून म्हणालो कि आम्ही "समाज" म्हणून(व्यक्ती म्हणून नाही) इतरांपेक्षा किती पुढारलेले आहे याच्या टिमक्या वाजवताना ती प्रगती बाकीच्यांना आधीच बाजूला सारल्यामुळे झाली आहे हे ध्यानात असू द्यावे! ज्या समाजाच्या गोतावळ्यात अजूनही शिकले सवरलेले लोक कमी असतील, ज्यांना आपल्या आजूबाजूला वैचारिक अभिसरण होईल अशी परिस्थितीच मिळत नाही तिथे प्रगतीचा वेग हि मंद राहणार... निदान आता शाळा सर्व जाती/धर्मांसाठी आहेत त्यामुळे मुले एकमेकांशी संवाद साधून प्रगती करू शकतात... म्हणून फक्त आर्थिक स्थिती नाही तर सामाजिक स्थान आणि परिस्थिती जास्त महत्वाची आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 11/22/2017 - 11:38

In reply to पोथी पुराणे किंवा भारतीय by शब्दबम्बाळ

Permalink

सुप्पर! असे मुद्दे फार रेअरली

सुप्पर! असे मुद्दे फार रेअरली पुढे येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Sat, 12/09/2017 - 17:05

In reply to आरक्षणाचा मुद्दा निघाला कि by शब्दबम्बाळ

Permalink

माझ्यासोबत इंजिनीरिंगला

माझ्यासोबत इंजिनीरिंगला असलेले काही मित्र जर आरक्षण आणि सवलती नसत्या तर आयुष्यात ते शिक्षण घेऊ शकले नसते आणि आज चांगल्या ठिकाणी कमावत नसते. त्यामुळे ते आंबेडकरांना इतकं मानतात!
त्यांच्या लेकरांना आरक्षण घेऊ नका म्हणावं. ते वंचितांसाठी असतं. बाप इंजिनिअर झाला मोप झालं, आता गावातल्या नि जंगलातल्या पोरांना त्या जागा ठेवा. ----------------------- आम्हीही इंजिनिअरींग केलं. दलित अर्थातच जास्त गरीब होते. अनेक सवर्ण पण गरीब होते. पण दोन पिढ्या आरक्षण घेऊन, पैशाची काही ददात नसलेली तथाकथित दलित मंडळी तिथे का होती हे कळलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Sat, 12/09/2017 - 17:17

In reply to आरक्षणाचा मुद्दा निघाला कि by शब्दबम्बाळ

Permalink

अरेच्चा! प्रत्येक ठिकाणी ६०%

अरेच्चा! प्रत्येक ठिकाणी ६०% च्या वर नोकऱ्या सवर्णांकडेच आहेत कि! मग इतकी आरडाओरड कशासाठी?
अगोदर १००% सवर्ण असलेल्या व्यवस्थेत हळूहळू आरक्षण आले आहे. ५०% आरक्षणाच्या दिवशी जॉइन झालेला माणूस रिटायर होइल त्या दिवशी हे प्रमाण व्यवस्थित झालेले असेल. किमान त्यादिवसापर्यंत आरक्षण हवे. ------------------- सरकारी नोकर्‍या ४% (हाच आकडा २०१७ मधे मोदीच्या काळात किती रोजगारी वाढली ते चर्चिताना मना करायचा!!!) असताना नविन दलितांना संधी दिली नाही तर इतर ९६% वर परीणाम होणार नाही. मात्र एकदा आरक्षण घेतलेल्या लोकांनी जर ९६% मधे उडी घेतली तर ज्यांना खरी गरज आहे त्यांना मदत होइल.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Sat, 12/09/2017 - 16:58

In reply to मला वाटते की बहुसंख्य by मृत्युन्जय

Permalink

बाबासाहेबांच्या खांद्यावर

बाबासाहेबांच्या खांद्यावर बंदु़क ठेउन आणि दलितांचा वाली असल्याचे भासवुन तुमच्यासारख्या लोकांना केवळ स्वत:चे उखळ पांढरे करुन घ्यायचे आहे.
आरक्षण फक्त दलितांनाच देणं योग्य मानलं तरी ते फक्त एकाच पिढीला द्यावं. ज्यांची पोटं भरली आहेत आणि जे ब्राह्मणांवर सामाजिक अन्याय करू धजतात त्यांना कोणताही आर्थिक वंचितता नसताना आरक्षण मिळते. तेच त्यांच्या गावातल्या नि जंगलातल्या चुलतभावांना मिळत नाही. ही आरक्षणाची शोकांतिका आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 11/20/2017 - 20:21

In reply to काय लिहिलं आहे ते काहीही कळलं by तर्राट जोकर

Permalink

@ तर्राट जोकर

@ तर्राट जोकर होऊन्देत ना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. सगळ्यांचेच. जोकर बुवा गुणवत्तेला किती टक्के आरक्षण द्यायचे? का त्यांना प्रतीक्षासूचीमध्ये (WAITING LIST) ? मंगळावर जायला अंतराळवीर कोणी जायचे यासाठीची तयारी असताना म्हणजे ३५ % मागासवर्गीय १५ टक्के, इतर मागासवर्गीय, ५% शारीरिक अपंग, १० टक्के मानसिक अपंग, ३५% उच्च वर्णीय असे १०० लोक झाल्यावर प्रत्यक्ष अंतराळवीरांना जागा मिळेल का याची शंका वाटते म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 11/21/2017 - 00:59

In reply to @ तर्राट जोकर by सुबोध खरे

Permalink

आरक्षणाचा मुद्दा कुणी काढला,

आरक्षणाचा मुद्दा कुणी काढला, आणि वरचे हे तीन चार बुद्धीवंत कोणावर आगपाखड करतायत? कळले कौशल्य, गरज आणि गुणवत्तेचे लॉजिक. =))
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 11/21/2017 - 15:23

In reply to आरक्षणाचा मुद्दा कुणी काढला, by तर्राट जोकर

Permalink

कुठेतरी झोंबललं दिसतंय।

कुठेतरी झोंबललं दिसतंय।
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Tue, 11/21/2017 - 17:05

In reply to आरक्षणाचा मुद्दा कुणी काढला, by तर्राट जोकर

Permalink

<<<< कळले कौशल्य, गरज आणि

<<<< कळले कौशल्य, गरज आणि गुणवत्तेचे लॉजिक. =))>>> ==>> कशाचं आलाय कौशल्य आणि गुणवत्ता? ते कोणाची जहागिरी राहिली नाही आहे. ससा आणि कासवाच्या गोष्टीतील सशासारखा भ्रम आहे तो. आमच्या वाडीत मजुराची पोरं-पोरी देखील इतरांच्या रेट्याने इंग्रजी माध्यमात जातात. काय फाडफाड इंग्रजी बोलतात राव. कौतुक वाटते त्यांचे. जे काही प्रत्येक क्षेत्रात आघाडीचा टेम्बा मिरवत असतात तिथे बहुतेक जण पोहचले आहेत आणि अजून येत्या काळामध्ये स्वतःला अति प्रगत (?) बाय डिफाल्ट हुशार समजणाऱ्या लोकांना किती मागे टाकतील हे त्यांना समजणार पण नाही. आमच्या तालुक्याची ही मुलगी एवढे उतुंग यश मिळवू शकते. अनेक जण त्या यशाच्या शिखरावर जायच्या रांगेत आहेत. https://sputniknews.com/asia/201604141038016753-india-space-science/
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Tue, 11/21/2017 - 17:32

In reply to <<<< कळले कौशल्य, गरज आणि by विशुमित

Permalink

खरंय, स्पर्धा परीक्षांच्या

खरंय, स्पर्धा परीक्षांच्या यशस्वी उमेदवारांची यादी बघितली तर खात्रीच पटते.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Sat, 12/09/2017 - 17:22

In reply to <<<< कळले कौशल्य, गरज आणि by विशुमित

Permalink

ह्या इतक्या हुशार लोकांना

ह्या इतक्या हुशार लोकांना आरक्षण नाही दिले पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Sat, 12/09/2017 - 17:21

In reply to @ तर्राट जोकर by सुबोध खरे

Permalink

गुणवत्तेला किती टक्के आरक्षण

गुणवत्तेला किती टक्के आरक्षण द्यायचे? का त्यांना प्रतीक्षासूचीमध्ये (WAITING LIST) ?
ब्राह्मणांना/सवर्णांना सिस्टिमच्या बाहेर काढायच्या नादात हे लोक स्वतःला गुणवत्ताहिन समजू लागले आहेत. आणि हे त्यांनाही कळत नाहीय.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Sat, 12/09/2017 - 16:55

In reply to काय लिहिलं आहे ते काहीही कळलं by तर्राट जोकर

Permalink

ब्राह्मणांना आरक्षण कोणी

ब्राह्मणांना आरक्षण कोणी नाकारलंय? होऊन्देत ना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. सगळ्यांचेच.
+१. जातीच्या प्रमाणांत देशाचे तुकडे होऊन जाऊ देत. सर्वत्र १००% जागांचे १००% आरक्षण याचा हाच अर्थ होतो. ------------ मी एक ब्राह्मण म्हणून १००% ब्राह्मण असलेल्या ब्राह्मणदेशात अत्यंत सुखाने राहिल असं वाटतं. अन्य जातींचा ड्रॅग असल्यामुळे भारतात ब्राह्मणांची जी प्रगती होत नाहीये ती अशा १००% ब्राह्मण देशात होइल.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Sat, 12/09/2017 - 16:34

In reply to खरं तर तुम्हा लोकांना फक्त by तर्राट जोकर

Permalink

अजिबात गरज नसतांना हिंदुंचे

अजिबात गरज नसतांना हिंदुंचे स्वयंघोषित मार्गदर्शक होऊ जाता म्हणून विरोध होतो हे समजले नाही का इतक्या वर्षांत...?
भारतात ब्राह्मण नसते तर युरोपीय लोकांनी अमानव म्हणून इथल्या लोकांना संपवले असते. त्यांनी अन्य खंडांत करोडो लोक ती माणसेच नाहीत म्हणून मारून टाकले.
  • Log in or register to post comments
Profile picture for user Duishen

Submitted by Duishen on Tue, 11/21/2017 - 04:35

In reply to सोपे आहे by सुखीमाणूस

Permalink

सुखीमाणुसजी, त्यातल्या मार्गदर्शन करणाऱ्या लोकांना

मार्गदर्शन करणे ही जीवनात मिळवलेल्या ज्ञान आणि प्रज्ञेवर अवलंबून आहे. मार्गदर्शन करण्याचा अधिकार (आरक्षण!) जन्मावर नसावे असे तुमचेही मत असावे. मुसलमानांचे मौला, ख्रिश्चन लोकांचे पाद्री, बौद्ध लोकांचे भिख्खू इथे कुणीही जन्माधारित न होता त्यांच्या अभ्यासाच्या क्षमतेवर होतात. उद्या एखाद्या ओबीसी / क्षत्रिय/ वैश्य समाजातील व्यक्तीने भिक्कू बनण्याचे ठरवले तर होऊ शकतो पण तोच ओबीसी समाजातील / क्षत्रिय/ वैश्य समाजातील बांधव ब्राह्मण होऊ शकतील काय?
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Tue, 11/21/2017 - 06:59

In reply to सुखीमाणुसजी, त्यातल्या मार्गदर्शन करणाऱ्या लोकांना by Duishen

Permalink

माझ्या मते

सर्व जाती मधून पौरोहित्य करणारे मुद्दाम तयार व्हायला हवेत. तसेही ब्राम्हण भिक्शुकान्ची(माझ्या माहिती प्रमाणे) हल्ली लग्न जमत नाहीत. त्यामुळे या पुढच्या पिढ्या किती जण भिक्षुकी साठी उरतील कोण जाणे?
  • Log in or register to post comments
Profile picture for user Duishen

Submitted by Duishen on Wed, 11/22/2017 - 07:47

In reply to माझ्या मते by सुखीमाणूस

Permalink

सुखीमाणूसजी, मान्य आहे पण...

सर्व जाती मधून पौरोहित्य करणारे मुद्दाम तयार व्हायला हवेत. हे मत मान्य आहे पौराहित्य हा धर्मसंमत आणि सेवेच्या हेतूने प्रेरित एक व्यवसाय आहे पण माझा प्रश्न असा आहे की - "मुसलमानांचे मौला, ख्रिश्चन लोकांचे पाद्री, बौद्ध लोकांचे भिख्खू इथे कुणीही जन्माधारित न होता त्यांच्या अभ्यासाच्या क्षमतेवर होतात. उद्या एखाद्या ओबीसी / क्षत्रिय/ वैश्य समाजातील व्यक्तीने भिक्कू बनण्याचे ठरवले तर होऊ शकतो पण तोच ओबीसी समाजातील / क्षत्रिय/ वैश्य समाजातील बांधव ब्राह्मण होऊ शकतील काय?"
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: विजय दिनानाथ चौहान
    नोंदणी: गुरुवार, 03/19/2026 - 23:21
  • सदस्य: CHETAN KAMBLEEE
    नोंदणी: गुरुवार, 03/19/2026 - 16:53
  • सदस्य: बाबासाहेब गायकवाड
    नोंदणी: गुरुवार, 03/19/2026 - 16:36
  • सदस्य: अमित+
    नोंदणी: गुरुवार, 03/19/2026 - 15:55
  • सदस्य: विजयनवीन
    नोंदणी: गुरुवार, 03/19/2026 - 14:07

Pagination

  • First page « पहिले
  • Previous page ‹ मागे
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com