Skip to main content

निश्चलनीकरण सर्वेक्षण

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 16/11/2017 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
निश्चलीकरण या अत्यंत धाडसी व महत्वाच्या निर्णयाला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी संध्याकाळी ८ वाजता जाहीर केल्यानंतर देशात प्रचंड खळबळ माजली होती. काळा पैसा बाहेर काढणे, बनावट चलनाला आळा घालणे अशी काही प्रमुख उद्दिष्टे या निर्णयामागे होती असे सांगण्यात आले होते. या निर्णयाला काही जणांनी प्रचंड पाठिंबा दिला तर काही जणांनी कडाडून टीका केली. आज एक वर्षानंतर सुद्धा हेच चित्र कायम आहे. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, अनेकांचे प्रचंड नुकसान झाले, देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली, देशाच्या प्रगतीचा वेग मंदावला, अनेक उद्योगधंदे बंद पडले असे दावे अनेकजण करीत असताना या निर्णयामुळे काहीही नुकसान झाले नाही, रोखरहीत व्यवहार वाढल्याने भ्रष्टाचार कमी झाला, बनावट चलन नष्ट झाले, मालमत्ता करासारखी अनेक थकित बिले वसूल झाली, बँकांकडे मोठ्या प्रमाणात चलन जमा झाल्याने व्याजाचे दर कमी झाले इ. दावे या निर्णयाचे समर्थक करीत आहेत. आज एक वर्ष उलटल्यानंतर याच विषयावर मिपांकरांची मते जाणून घ्यावीत या उद्देशाने हे सर्वक्षण करीत आहे. खालील प्रश्नांवर ० ते १० या कक्षेत प्रश्नांचे मूल्यांकन करता येईल. ० गुण = उद्दिष्ट अजिबात साध्य झाले नाही/अजिबात नाही १ गुण = उद्दिष्ट अगदी किंचित प्रमाणात साध्य झाले/अगदी किंचित २ गुण = उद्दिष्ट अगदी थोड्या प्रमाणात साध्य झाले/अगदी थोड्या प्रमाणात . . ५ गुण - अर्धे उद्दिष्ट पूर्ण झाले (किंवा अर्धे उद्दिष्ट अपूर्ण आहे)/मध्यम प्रमाणात . . ८ गुण - उद्दिष्ट बर्‍याच प्रमाणात साध्य झाले/बर्‍याच प्रमाणात ९ गुण - उद्दिष्ट बहुतांशी साध्य झाले/खूप जास्त प्रमाणात १० गुण - उद्दिष्ट पूर्ण साध्य झाले/अत्यंत जास्त प्रमाणात असे गुणांकन करता येईल. गुणांकन करताना फक्त गुण न देता त्याविषयी सविस्तर स्पष्टीकरण, स्वानुभव इ. आकडेवारीनिशी लिहिल्यास जास्त चांगले. प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते? प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले? प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का?

वाचने 39232
प्रतिक्रिया 207

प्रतिक्रिया

In reply to by गॅरी ट्रुमन

१) अंमलबजावणी आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकली असती याबाबत दुमत नसावेच. अगदी पहिल्या दिवसापासून मिपावर अनेक नोटबंदी समर्थकांनीही ही गोष्ट सपशेल मान्य केली होती. त्यामुळे सरकारने या बाबतीत आणखी चांगले नियोजन करणे अपेक्षित होते. २) २००० च्या नोटेचे गणित अजूनही कळालेले नाही. या नोटा चलनातून हळूहळू बाहेर काढल्या जातील अशी अपेक्षा आहे. अजून ६ महिन्यांनी ATM मधूनच या नोटा बाहेर येणे बंद होईल आणि अशा मार्गाने बहुदा चलनातून कमी केल्या जातील. अवांतर.. नोटबंदीच्या निमित्ताने मिपासारख्या छोट्या सँपल साईझमध्ये.. सीएच्या सांगण्यावरून धंदा बंद ठेवेपर्यंत लोकांची झालेली पळापळ, २० लाखाच्या ट्रकसारखे बुद्धीभेद करण्याचे प्रयत्न, खोट्या लिंका देणे आणि त्याचे खोटे समर्थन करणे, अर्धीच माहिती देऊन दिशाभूल करणे, विचारवंतपणाच्या बुरख्याचा फायदा घेऊन दिशाभूल करणारे लेख लिहिणे.. आपण एक लॉजिक देऊन त्याच लॉजिकने आलेले गैरसोयीचे निष्कर्ष नाकारणे.. असे अनेक बालीश आणि हास्यास्पद प्रकार झाले. ते लाईव्ह बघणे (आणि बुरखे टरकावणे) एकदम मजेशीर प्रकरण होते. ;)

In reply to by मोदक

असे अनेक बालीश आणि हास्यास्पद प्रकार झाले. ते लाईव्ह बघणे (आणि बुरखे टरकावणे) एकदम मजेशीर प्रकरण होते. ;) + १ याच धाग्यात "या निर्णयामुळे साठविलेले पैसे एका रात्रीत मातीमोल झाले" असा हास्यास्पद निष्कर्ष काढण्यात आला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

..आणि ते हाणामारीचे पण याच धाग्यात पहिल्यांदा वाचले. घरात कर्त्या पुरूषाच्या अपरोक्ष पैसा साठवला म्हणून महिला मंडळाला मारहाण..?? आणि दोष मात्र मनुस्मृतीवर. पप्पूच्या बुद्धीमत्तेवर शंका आहेच आहे.. पण म्हणून अनुयायांनी आपआपले मेंदू गहाण टाकून प्रतिसाद देणे म्हणजे अगदीच हद्द झाली. :))

In reply to by मोदक

घरात कर्त्या पुरूषाच्या अपरोक्ष पैसा साठवला म्हणून महिला मंडळाला मारहाण..?? आणि दोष मात्र मनुस्मृतीवर.
यात तथ्य आहे.. बऱ्याच बायका दारुडा नवरा नेतो म्हणून पैसे लपवून ठेवतात. ते उघडकीला आल्यावर पैसे पण गेलेवणी मर पण पडला असं होऊ शकते

In reply to by गॅरी ट्रुमन

http://www.livemint.com/Industry/cygPqPW4X5ik9Jzbly3HDK/RBI-stops-print… १. १००० रु च्या नोटा जितक्या मूल्याच्या होत्या, तितक्याच मूल्याच्या (संख्येने अर्ध्या) २००० च्या आहेत. २. १७.७ च्या (१-३.८%) ऐवजी १५.२२ च्या (१-५.४%) चलन लोकांकडे चलनात आहे. (आकडे लाख कोटींत)

सरकारनेही किती पैसा आला ? किती गोरा किती काळा आहे , काही सांगितले नाही. अजून मोजणी सुरु आहे ! हेच उत्तर . ( आम्हाला द्या नोटा मोजायला ! )

श्रीगुरुजी, कुठलेही सर्वेक्षण हे न्युट्रल राहून करावयाचे असते. त्यासाठी शब्दवापरही काळजीपूर्वक करावा लागतो. सर्वेक्षण संशोधनाची एक पद्धती असल्यामुळे संशोधन / सर्वेक्षण याचा हायपोथेसिस न्युट्रल असणे अपेक्षित आहे. अन्यथा तो हायपोथेसिस मानल्या जात नाही. उदा: मी असे म्हटले की "महाराष्ट्रातील सर्व लोक स्वाभिमानी असतात" तेंव्हा हे विधान हायपोथेसिस नसून माझा निर्णय किंवा मत असू शकेल. जर मला हे पक्के माहिती असेल तर आणि माझा निर्णयही तोच असेल तर मी त्या निर्णयाला अनुकूल होतील असेच प्रतिसादक शोधणार आणि इतर प्रतिसाद आले तरीही त्यांची मते माझ्यासाठी महत्त्वाची ठरणार नाहीत. मी येनकेनप्रकाराने ती मते बाजूला ठेवण्याचे प्रयत्न करीन. आता तुम्ही दिलेल्या गाभ्याकडे वळतो. तुमचे पहिलेच विधान "निश्चलीकरण या अत्यंत धाडसी व महत्वाच्या निर्णयाला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले." हा तर सरळ सरळ निर्णय झाला किंवा तुमचे मत झाले. जर तुमचे हे मत असेल तर तुमचा प्रश्न क्र. ४ सर्वेक्षण म्हणून गैरलागू आहे. एकप्रकारे तुम्ही अनुकूल मत यावे यासाठी स्वत:चे मत आधीच जाहीर केले. हे सर्वेक्षणाच्या आणि संशोधनाच्या कक्षेत बसणारे नाही. दुसरे असे की प्रश्न सूचक नसावे. आपले प्रश्न क्र. २ आणि ३ हे खूपच सूचक आहेत प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले? त्रास झाला / नुकसान झाले याची कुठेतरी मनाला जाणीव आहे पण मन मनात नाही त्यामुळे असा प्रश्न टाकला असावा असे वाटण्यास पुरेसा वाव आहे. प्रश्न असा असता तर सर्वेक्षणाच्या कक्षेत योग्य असता - २) स्व आणि कुटुंब यांच्या अनुभवावर आधारित निश्चलीकरणाचे १ ते १० मधे रेटिंग करावे./ यापैकी योग्य गुण द्या ३) इतरांनी आपल्यासोबत सांगितलेल्या अनुभवानुसार / त्या अनुभवावर आधारित निश्चलीकरणाचे १-१० मधे रेटिंग करावे. / यापैकी योग्य गुण द्या तुमचा फक्त प्रश्न क्र. १ न्युट्रल होता. काही चुकले असल्यास क्षमस्व! कारण तुमचे हे सर्वेक्षण वाचतांना 'फ्यु रिसर्च सेंटरचा नुकताच झालेला सर्व्हे आठवला.

जिल्हा बॅंका या लोकांच्या बेहिशोबी पैशांचे हक्काचे घर आहे , असे हायपोथेसिस मांडून सरकारने जिल्हा बॅंकेतला पैसा , ठेवीदार व बॅंका सर्वानाच कुजवले. पण नोटाबंदीच्या काळात कितीतरी जुना ब्लॅक मनी नवीन नोटात भभरून देताना याकसिस , आयशीआयशी अशा मोठ्या ब्यांकाच घावल्या ! पण त्या ब्यान्कांवर कोणतीच कारवाई झालेली दिसत नाही. नुसत्या संशयावरुन जिल्हा ब्यान्का बंद झाल्या. प्रत्यक्ष गुन्हे केलेल्या ब्यान्का मात्र सुरु आहेत.

In reply to by babu b

भ्रष्टाचार घटला म्हणे ! मग नव्या नोटाना पाय फूटून लाखो करोडो नवीन क्याश लोकाकडे सापडली , ती भ्रष्टाचाराशिवाय का ?

अरुण जोशी,
हा मूर्ख आपटार्ड आहे.
रघुराम राजन हा माणूस मला मूर्ख कधीच वाटला नाही. तो धूर्त असू शकेल पण मूर्ख खचितच नाही. आणि तो आपटार्ड असण्याची शक्यता शून्य आहे. कारण की त्याची नजर नोबेल पारितोषिकावर आहे. केजरीवालच्या मागे लागून नोबेल नासवणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. बाकी त्यांच्या कारकिर्दीवर ग्यारी ट्रुमन यांनी वर लिहिलं आहेच. आ.न., -गा.पै.

नोटबदी हा "मोदींनी घेतलेला" निर्णय होता. त्यामुळे मोदींनी तो जाहीर करताना सांगितलेल्या तीन उद्दिष्टांवरच त्याचे मूल्यमापन व्हायला हवे. त्या तीनही उद्दिष्टांमध्ये फारसे यश मिळाल्याचे दिसले नाही. (जवळजवळ शून्य यश मिळाले आहे). "अमुक लाख खात्यांची तपासणी चालू आहे" या जुमल्यावर भक्त उरलेले दीड वर्ष खूष राहतील. ------------------------- वर कुणीतरी मालमत्ता करांसारखी थकलेली बिले वसूल झाली हा नोटबंदीचा "फायदा" असे म्हटले आहे. माझा पगार दहा हजार आहे . आज मला नोकरीवरून काढून टाकले. त्यामुळे तीन महिन्याचा पगार म्हणून तीस हजार रुपये एकरकमी मिळाले. तर नोकरी गेली आहे हे लक्षात न घेता एकदम तीस हजार रुपये मिळाले याचा आनंद मानण्यासारखे आहे हे.

In reply to by नितिन थत्ते

वर कुणीतरी मालमत्ता करांसारखी थकलेली बिले वसूल झाली हा नोटबंदीचा "फायदा" असे म्हटले आहे.
यावरुन वाचलेला विनोद आठवला. एका छोट्या दुकानदाराला मिडीयावाला विचारतो की नोटाबंदीबद्दल आपलं काय मत आहे. दुकानदार म्हणतो, माझ्या मते दर दोन वर्षांनी नोटाबंदी व्हायला हवी. मिडीयावाला चक्रावून दुकानदाराला कारण विचारतो. दुकानदार सांगतो की नोटाबंदी झाल्या झाल्या त्याच्या उधारीवाल्या गिर्‍हाईकांनी लगेच हजार पाचशेच्या नोटा देऊन त्याची सारी उधारी चुकती केली. विनोदाचा भाग सोडून द्या पण पुणे मनपा खरंच त्या काळात जुन्या नोटा देऊन आपला मालमत्ता कर भरा हे सांगण्यासाठी रिक्षा फिरवत होती, जाहीराती देत होती.

In reply to by मोदक

अहो भक्तांनीच सांगितले की..... असा निर्णय घ्यायला कायतरी इंचांची छाती लागते वगैरे. बाकी जेटलींच्या आणि उर्जित पटेलांच्या बॉडी लॅन्ग्वेजमधून कळत होतं ते.

In reply to by नितिन थत्ते

भक्तांचे म्हणणे स्वतःला सोयीस्कर असेल तेंव्हाच मान्य करणे आणि इतरवेळी त्यावरच टीका करणे असा नेमका दांभीकपणा कसा काय जमतो बुवा..? बाकी बॉडी लँग्वेजबद्दल इतकाच अभ्यास असेल तर तुमच्या भावी अध्यक्षांना जरा सल्ले द्या.. त्यांना सवाल आणि जवाब मधला फरक समजाऊन सांगा. ज्युपीटर व्हेलॉसिटीने समजावून सांगू नका अन्यथा.. हॅ हॅ हॅ... ;)

In reply to by मार्मिक गोडसे

खोटेपणा हा तुमच्या कमाईचा मार्ग. तुमच्याशी बरोबरी करण्यासाठी उच्च प्रतीचा कोडगेपणा लागेल. तो कुठे सामान्यजनांकडे मिळणार.

मूडीचा इतिहास .... २००८ च्या मंदीत चुकीच्या शिफारशी केल्याबद्दल अमेरिकेतील २०-२२ राज्यानी मुडीवर ॲक्शन घेतली होती व दंडही केला होता. https://www.theguardian.com/business/2017/jan/14/moodys-864m-penalty-fo… लेहमन बॅंकेला उत्त्म दर्जा असे प्रमाणपत्र मूडीने दिले अन त्यानंतर काही काळातच बॅंक शून्य झाली म्हणे ! ( संदर्भ बातमी मिळाली नाही . ) http://hindi.firstpost.com/india/pm-modi-government-lobby-to-improve-mo…

In reply to by babu b

अरे वा. म्हणजे अमेरिकन कंपनीवर दंड आकारणारे अमेरिकन सरकार फारच विश्वासार्ह म्हणायचे का? २००७-०८ मध्ये सी.डी.ओ ट्रॅन्चना चांगले रेटिंग का दिले गेले असावे याविषयी माझे मत मी इथे लिहित आहे. हा प्रतिसाद बाबूरावांसारख्यांसाठी नाही तर बायस्ड नसलेल्या मिपाकरांसाठी आहे. त्यावेळी बाजारातील ९९% पेक्षा लोक मृगजळाच्या मागे धावत होते. भविष्यात नक्की काय वाढून ठेवले आहे हे केवळ रघुराम राजन यांच्यासारख्या थोड्याथोडक्या लोकांनाच समजले होते. मागे वळून बघताना असे वाटते की इतकी साधी गोष्ट सगळ्यांच्या लक्षात कशी आली नसावी? पण त्यावेळी ती गोष्ट लक्षात आली नव्हती हे पण तितकेच खरे. कोणती गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नव्हती? ज्या सी.डी.ओ ट्रॅन्चना रेटिंग एजन्सींनी ट्रिपल ए रेटिंग दिले होते त्यांच्यावरील परतावा अमेरिकन सरकारच्या बॉन्डवरील परताव्याइतका असायला हवा होता हे अमेरिकन संदर्भात सांगायचे तर अगदी फायनान्स-१०१ कोर्समध्ये शिकायला मिळेल. पण प्रत्यक्षात त्या सी.डी.ओ ट्रॅन्चवरील परतावा अमेरिकन सरकारच्या बाँडपेक्षा २% ने जास्त होता. राजनसाहेबांनी केवळ हा मुद्दा सुरवातीला ध्यानात घेतला आणि त्यावर पुढे अभ्यास करून मोठे संकट येणार आहे हा इशारा २००५ मध्येच दिला होता. याविषयी राजनसाहेबांच्या Fault Lines : How Hidden Fractures Still Threaten The World Economy या पुस्तकात अधिक माहिती मिळेल. रेटिंग एजन्सींनी ती चूक का केली? त्याचे कारण होते की सी.डी.ओ ज्या गृहकर्जांच्या पूलचे बनलेले होते ती कर्जे बुडली तरी त्यावरील डिफॉल्ट हा एकमेकांशी संबंधित नसेल (अनकोरिलेटेड) हे गृहितक त्यामागे होते. पण जेव्हा परिस्थिती बिघडते तेव्हा (अनेकांच्या नोकर्‍या एकाचवेळी जाणे वगैरे) एकाचवेळी अनेक लोक गृहकर्ज थकवू शकतात आणि त्यामुळे हे डिफॉल्ट अनकोरिलेटेड असू शकत नाहीत. अशी एखादी गोष्ट लक्षात घेतली नाही किंवा लक्षात आली नाही तरी त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात याची आर्थिक बाजारात कित्येक उदाहरणे आहेत. तसेच त्यावेळी सी.डी.ओ हा त्यामानाने नवा प्रकार होता आणि बर्‍यापैकी गुंतागुंतीचाही होता. त्यामुळे त्या ट्रॅन्चना रेटिंग देताना रेटिंग एजन्सींना जास्त अडचणी आल्या आणि जर सगळेच सी.डी.ओ विषयी उत्साहित असतील तर मग आपणच वेगळे मत का द्या हा मानवी स्वभावही त्यामागे असेलच असे म्हणता येईल. राजनसाहेबांनी जे धाडस दाखविले ते सगळेच दाखवू शकतात असे नाही. तसेच सी.डी.ओ ची रचना अशी होती की त्यात जी स्थानिक बँक गृहकर्ज देणार आहे त्या बँकेच्या बॅलन्स शीटवर ते कर्ज राहणारच नव्हते. त्यामुळे स्थानिक बँकांनी कर्ज देताना जितकी काटेकोर छाननी (ड्यू डिलिजन्स) करायला पाहिजे होती ती केली नाही. त्याचे कारण जरी कर्ज बुडले तरी ते ती डोकेदुखी मला होणार नाही तर इतर कोणालातरी होईल तेव्हा मी का जास्त लक्ष घालू अशास्वरूपाची बेफिकिर वृत्ती. आणि कर्ज बुडले तर घर ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करून कधीही पैसे परत मिळू शकतील हा अनाठायी विश्वास. त्यातून महिना १४०० डॉलर्स कमाविणार्‍यांना ५ लाखांपेक्षा जास्तचे गृहकर्ज कर्ज दिले गेले अशाही घटना घडल्या होत्या. रेटींग एजन्सींनी त्या सी.डी.ओ ट्रॅन्चचे रेटिंग केले त्यावेळी मुळातली कर्जे मोठ्या प्रमाणावर गंडलेली होती हे त्यांना किती प्रमाणावर माहित होते याची कल्पना नाही. जर एका सी.डी.ओ मध्ये हजारो गृहकर्जे असतील आणि त्यातली १०% जरी गंडली असतील तरी हा प्रश्न उभा राहू शकेल. आणि रेटिंग एजन्सींनी ती हजारो प्रपोजल स्वतः बघूनच रेटिंग दिले होते का? याविषयी माहित नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की सी.डी.ओ ट्रॅन्चचे रेटिंग करताना ही पार्श्वभूमी होती. पण देशांचे रेटिंग करायची पध्दत रेटिंग एजन्सी गेल्या कित्येक वर्षांपासून वापरत आहेत आणि जेव्हाजेव्हा योग्य ती माहिती रेटिंग एजन्सींना मिळाली तेव्हातेव्हा त्यांनी देशांचे योग्य रेटिंग केलेलेही आहे. अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या या पध्दतीत रेटिंग एजन्सी मोठी चूक होऊ देतील असे वाटत नाही.२००७-०८ मध्ये रेटिंग एजन्सींची चूक झाली हे मान्यच. पण त्यामुळे रेटिंग एजन्सी आणि अशी देशांना रेटिंग द्यायची पध्दतच गंडलेली आहे असे मला तरी वाटत नाही. २००७-०८ मध्ये मोठे संकट आल्यानंतर नेहमीप्रमाणे जवळचे संशयित पकडणे ( rounding off the proximate suspect) हा प्रकार झाला त्यात रेटिंग एजन्सी मोठ्या प्रमाणावर बदनाम झाल्या. पण ते संकट आले त्यात खुद्द अमेरिकन सरकारची भूमिका (बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यू बुश या दोन्ही डेमॉक्रॅटिक-रिपब्लिकन प्रशासनांची) किती महत्वाची होती याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले. आणि त्यातून २००९ मध्ये बराक ओबामा हा अगदी मोठ्ठा देवदूतच निवडून आल्यासारखे चित्र उभे राहिले होते. त्यामुळे असे प्रश्न कोण विचारणार?

प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते?
काळा पैसा, समांतर अर्थव्यवस्था यांच्या विरोधात सरकारने उचलेल्या एकूण १८-२० पावलांपैकी निश्चलनीकरण हे एक होते. सामान्य जनतेने गैरसोय सहन करून नोटबंदीला पाठींबा दिला, म्हणून इतर कोणत्याही योजनेला विरोध करायला कोणाला जागा उरली नाही. काळ्या पैश्यामुळे समांतर अर्थव्यवस्थेत व्यवहार व्ह्यायला लिक्विडिटी राहते. ९९% पैसा पांढरा झाल्याने समांतर अर्थव्यवस्थेची भयंकर गोची झाली आहे. अगदी समांतर अर्थव्यवस्थेच्या मूळ अर्थव्यवस्थेशी असलेल्या सिनर्जीवर देखील परिणाम झाला आहे.
fight against corruption, black money, money laundering, terrorism and financing of terrorists as well as counterfeit notes,
हे सरकारचे व्हर्बॅटीम उद्देश होते. बर्‍याच मूर्खांना यात प्रोमोशन ऑफ डिजीटल इकॉनॉमी असे थेट लिहिलेले पाहायचे होते. रुग्णावर इलाज करायचा असे लिहिले असते तर इंजेक्शन द्यायचे, गोळ्या द्यायच्या असे थेट का लिहिले नाही असे हे लोक म्हणाले असते. असो. प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? मला घरातली सगळीच कामे जानेवारीपर्यंत पोस्टपोन करावी लागली. रांगेत ४-५ तास थांबावे लागले, पण तिथे राजकारणाच्या गप्पा करून वेळ सत्कारणी लावला. सुरुवातीला जवळजवळ ५०००-६००० रु दुकानदारांनी घेतले, ४००० रु पेट्रोल पंपावर घेतले. म्हणून मला पैसे बदलायला १ मिनिट देखिल द्यावा लागला नाही. प्रत्येक वेळी कार्ड घेणारी (म्हणून माझ्यामते महाग) दुकाने, हॉटेल्स निवडावी लागली. पे टी एम च्या पेमेंट सिस्टिमचे एक दिल्लीतले कंत्राट मी लिहून दिले होते. तेव्हा त्यांच्या मार्केटींग मॅनॅजरने माझ्या मोबाईलवर अ‍ॅप वापरून दाखवले होते (एक स्युडो आयडी वापरून ट्रँझॅक्न्स केली होती.). मी काहीही केले तरी मला पेटिएम वापरता येईना! शेवटी त्याला संपर्क केला तर तो बिझि! मोबाईल पासवर्ड आणि अकाउंट डीटेल्स जरा रिस्की पद्धतीने सेव करतो म्हणून मी ऑनलाईन पेमेंट मोबाईलवर टाळतो (मागे डायरेक्ट फोन बिलात पैसे आलेले, फोनचा काही संबंध नसलेल्या आयटमचे. एकदा मोबाईलने न विचारता सगळे अकाउंट डिटेल सेव केलेले आणि माझ्या १० वर्षाच्या मुलाने पे म्हटले कि ओटीपी देखील ऑटोमॅटिक एंटर व्हायचा!!!). हे सगळं शिकायचं इरिटेशन. कुटुंबीय जातीचे मोदीविरोधक असल्याने जणू काही मीच (एक भक्त या नात्याने) नोटबंदी केली असे बोल ऐकावे लागले, त्याचाही त्रास झाला. आमचे शेवटचे नवे ५०० रु लवासाच्या एंट्री फि मधे गेले, ते ऑनलाइन घेईनात तेव्हा चिडचिड झालेली. १५-२० दिवसांनी गरीब लोकांनी ऑनलाइन पैसे घ्यायला चालू केले, तेव्हापासून त्रास कमी झालेला. ऑफिसमधे एकदा स्टाफला सांगून २००० रु आणवले (हे टाळायचं होतं, पण जमलं नाही.). शेवटी ऑफिसमधल्या माझ्यापेक्षा नशीबवंत मित्रांनी एन इ एफ टी च्या बदल्यात नवी रोकड दिली नि सगळा त्रास मिटला. प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले? आमच्या एका प्रॉपर्टीचे काळे पैसे (पांढरे पैसे काळे करायला) देणारास सॉलिड प्रॉब्लेम झाला. बायकोच्या एका मैत्रिणाला नेमकी त्याच दिवशी भिषीची ८० हजार का कैतरी कॅश मिळाली नि तिची तारांबळ उडाली. नैतिक दृश्ट्ञा पाहिलं तर यांना अकारण त्रास झाला. लेबर लावणार्‍या कंत्राटदारांना सगळे लेबर तिकडेच लावावे लागले. इतर अनेक जणांना अनेक प्रकारचे (ज्याला माझा पाठींबा आहे असे) नुकसान झाले. प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का? प्रामाणिक? अर्थातच. धाडसी? या करिता मोदिंचा ऋणी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अर्रे आपुन तो खुल्ला जोकर हैच रे ... मगर इस सर्कसमें घोडे हाथीकी जगह, सब के सब गधे हैं, उसका क्या?

या सर्वेक्षणात आतापर्यंत जे काही आकडे मिळाले आहेत त्याचे पुढे काय होणार आहे? म्हणजे त्याचे विश्लेषण करून काही अनुमान बांधले जाणार आहे का? की आणखी आकडेवारी मिळेपर्यंत थांबणार आहेत?

In reply to by गॅरी ट्रुमन

मिपाकरांची मते जाणून घ्यायचा उद्देश होता. आकडेवारी कमी मिळाली, पण बर्‍याच जणांनी आकडेवारी न देता सविस्तर मत व्यक्त केले. आता वेळ मिळाला की सारांश टाकतो.

In reply to by मार्मिक गोडसे

"जीजी रं जीजी रं जीजीजी" (कानावर डावा हात ठेवून आणि उजवा हात पुढे करून) . . . चालू द्या

नोटबंदीमुळे एखादा क्ष फायदा झाला असे वाटत असेल तर तोच फायदा नोटबंदी न करता मिळवता आला असता का हे तपासून पाहिले पाहिजे.

In reply to by नितिन थत्ते

विरोधी पक्षाला / त्यांच्या जाज्वल्य समर्थकांना पोगो बघण्यातून सवड मिळाली तर हे ही काम करावे. किती दिवस दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिणार..?

प्रश्न २) निश्चलनीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? उत्तर: या प्रश्नाच्या उत्तराची गणती (count) करावी. माझे स्वतःचे उत्तर : यत्किंचीतही नाही!!! ज्यांचे उत्तर वेगळे असेल त्यांचे कठोर परीक्षण नक्की होणार.....

In reply to by Nitin Palkar

बाकी धाग्याचं काश्मीर करणारे नेहमीचे यशस्वी कलाकार गोंधळ घालतायत, तो चालू दे!

कोणताही सरकारी निर्णय जेव्हा घेतला जातो तेव्हा त्या त्या निर्णयाचे परिणाम समाजातील वेगवेगळ्या घटकांना कमी जास्त प्रमाणात बसतात. कोणतेही सर्वेक्षण करायचे असेल तेव्हा त्या निर्णयाचा परिणाम सगळ्यात जास्त कुणाला बसला असण्याची शक्यता असेल त्या लोकांना विचारल्यास उत्तम ठरते. मिपावर वावरणारी मंडळी ही स्मार्ट/नेट/पेटीम/क्रेडिट कार्ड वापरणारी जनता आहे. त्यामुळे निश्चलनीकरण केल्याने कुणाला किती त्रास झाला ह्याचे सर्वेक्षण करायचे असेल तर मिपा पेक्षा असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भेटून जरा कानोसा घेतला असता तर जास्त उत्तम माहिती मिळाली असती. जसे की ह्या निर्णयाचा फटका असंघटीत क्षेत्रातील लोकांना बसून त्यांचे रोजगार गेले असे निश्चलनीकरनाचे विरोधक म्हणतात. मग हे असंघटित क्षेत्रातील लोकांचे मत जाणून घ्यायचे असेल तर काय करता येईल? तर उदाहरण द्यायचे झाल्यास पुण्यासारख्या शहरात नाक्यानाक्यावर उभे असणारे मजूर (उदा. वारजे फ्लायओव्हर, कोथरूड मधील किनारा हॉटेल परिसर, हडपसर मधील भाजी मंडई समोरील फ्लायओव्हर खाली) ह्यांच्याकडे जाऊन चौकशी करावी. रस्त्याच्या बाजूला दिवसभर हाताने चरक फिरवून ऊसाचा रस काढून देणारी लोक असतात त्यांना विचारावे किंवा एखाद्या हॉटेल मध्ये चहा प्यायला जावे आणि चहा पिता पिता फडके मारणाऱ्या किंवा कपबश्या उचलणाऱ्या व्यक्तीला सहज चौकशी केल्यासारखे विचारावे. माहिती अशी समाजात मिसळून घ्यावी. कारण असे असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक मिपा किंवा अन्य कुठल्याही संस्थळावर असतील असे वाटत नाही. मिपावर धागा काढून फक्त समर्थक आणि विरोधक ह्यांच्यातील कलगीतुरा सोडला तर जास्त काही हाती लागणार नाही.

निश्चलीकरण या महत्त्वाच्या निर्णयाच्या एक वर्षानंतर निदान मिपाकरांची तरी या विषयावर मते जाणून घ्यावी या उद्देशाने हा धागा काढला होता. काही जणांनी सविस्तर मत देण्याबरोबर प्रश्नांचे ० - १० या कक्षेत रेटिंग दिले, तर काही जणांनी प्रश्नांना रेटिंग न देता फक्त सविस्तर मत व्यक्त केले. धाग्यात व्यक्त झालेल्या मतांचा सारांश खालीलप्रमाणे - प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते? फारच थोड्या प्रतिसादकांनी रेटिंग दिले आहे. या प्रश्नाचे सरासरी रेटिंग ६.१ आहे. इतर मते अशी आहेत - - अतिरेकी, नक्षलवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट, सामान्य माणसांना विशेष त्रास झाला नाही, अर्धे उद्दिष्ट अपूर्ण आहे पण उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली - काळ्या पैशाबद्दल जो अंदाज बांधला होता त्यामुसार सुमारे २-3 लाख कोटी पर्यंत काळा पैसा येणार असे सांगितलं जात होत. प्रत्यक्षात फक्त काही हजार कोटी पैसा बँकामध्ये आला नाही! नोटबंदी मध्ये आता पर्यंतचा मोठा भ्रष्टाचार झालाय! आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात विखुरलाय कि छाननी करणे पण कठीण आहे! आणि जर "अंदाज खोटा होता" मानलं तर मुख्य उद्दिष्टच फसलेले दिसत. म्हणजे सगळ्या देशाला उगीच वेठीला धरलं गेलं! - पैसे छपाई, वितरण, ATM यंत्र कॅलिब्रेशन फक्त यात भरपूर खर्च झाला - २००० च्या नवीन नोटेची बनावट नोट लगेच बाजारात आली, त्यामुळे बनावट चलन नष्ट करणे हा उद्देश फसला. - निश्चलीकरणामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली, जीडीपी कमी झाला. - उ प्र निवडणुकांमध्ये पैसे वाटले जाण्याचा प्रकार बंद करणे व त्यायोगे सपा/बसपा ची कोंडी करून विधान सभेत विजय मिळवणे हे भाजप चे मुख्य उद्दिष्ट असावे. हे उद्दिष्ट सफल झाले आहेच. - निश्चलनीकरणाची उद्दिष्टे बऱ्यापैकी साध्य झाली. काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या छातीत धडकी भरली आहे. सरकारी अधिकारी जे पैसे खात होते ते तसेच खात राहणार आहेत. व्यावसायिक जे औरस उत्पन्नावर कर भरत नव्हते. ते सध्या तरी भीतीमुळे का होईना आपले उत्पन्न जास्त दाखवायला लागले आहेत. - सरकारने कुठेही अधिक्रुत उद्दिष्टे सान्गितली नाहीत तरी रोख व्यवहार कमी करणे असेल तर ते साध्य झाले - १५.४४ लाख करोड पैश्यापैकी १५.२७ लाख करोड जरी परत आला तरी , १५.४४ लाख करोड मधील बरेच समान्तर अर्थव्यवस्थेत होते , ते बैन्किन्ग प्रणाली मध्ये नव्हते आता १५.२७ बैन्किन्ग प्रणाली मध्ये आले. १,३८,१६५ लोकान्नी जवळपास ४,९२,२०७,०० लाख करोड जमा केले, म्हणजे जमा झालेल्या पैश्याच्या १/३ हिस्सा. १७.७३ लाख सन्दिध्द व्यवहार सापडले. डिजिटल व्यवहारान्मध्ये लक्षणीय वाढ, स्वच्छ अर्थव्यवस्थेला सुरूवात. - नोटाबंदीचा एक काही निश्चित उद्देश जाणवत नाही. लहान मुले क्रिकेट खेळतांना खेळता खेळता अनेक नियम बदलतात. उदा: एक टप्पा आउट असा काही नियम मधेच सुचतो. किंवा चौकार मारल्याची सीमारेषा ही नसून ती होती; इ.इ.. मला नोटाबंदीचा खेळ आणि त्याचे उद्दिष्टे याप्रमाणे जाणवतात. किमान आमच्या अर्थमंत्र्यांनी एकदा नेमकी उद्दिष्टांची यादी आणावी म्हणजे त्यांना जरी समजले तरीही आमच्या सारख्या सामान्य जनतेला समजणे सोपे जाईल. - मुद्दलात उद्दिष्टे कोणती होती हेच माहित नसेल तर या प्रश्नाचे उत्तर कसे देणार? - मोदींनी तो जाहीर करताना सांगितलेल्या तीन उद्दिष्टांवरच त्याचे मूल्यमापन व्हायला हवे. त्या तीनही उद्दिष्टांमध्ये फारसे यश मिळाल्याचे दिसले नाही. (जवळजवळ शून्य यश मिळाले आहे). - काळा पैसा, समांतर अर्थव्यवस्था यांच्या विरोधात सरकारने उचलेल्या एकूण १८-२० पावलांपैकी निश्चलनीकरण हे एक होते. सामान्य जनतेने गैरसोय सहन करून नोटबंदीला पाठींबा दिला, म्हणून इतर कोणत्याही योजनेला विरोध करायला कोणाला जागा उरली नाही. काळ्या पैश्यामुळे समांतर अर्थव्यवस्थेत व्यवहार व्ह्यायला लिक्विडिटी राहते. ९९% पैसा पांढरा झाल्याने समांतर अर्थव्यवस्थेची भयंकर गोची झाली आहे. अगदी समांतर अर्थव्यवस्थेच्या मूळ अर्थव्यवस्थेशी असलेल्या सिनर्जीवर देखील परिणाम झाला आहे प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? फक्त एकानेच या प्रश्नाला रेटिंग दिले असून ते शून्य आहे. - अजिबात त्रास झाला नाही - फारसा त्रास झाला नाही - शून्य त्रास झाला - मला किंवा कुटुंबाला काहीच त्रास झाला नाही. - बराच कमी, इन्टरनेट बान्किन्ग, कार्ड मुळे त्रास झाला नाही. - फार नाही. - घरातली सगळीच कामे जानेवारीपर्यंत पोस्टपोन करावी लागली. रांगेत ४-५ तास थांबावे लागले. - यत्किंचीतही नाही!!! प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले? फक्त एकानेच या प्रश्नाला रेटिंग दिले असून ते शून्य आहे. - परिचितांपैकी कुणालाच नाही. - निश्चलनीकरणामुळे सामान्य माणसांना थोडे दिवस त्रास झाला परंतु असामान्य माणसांना आपले औरस किंवा अनौरस उत्पन्न दडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागले आणि आजही इकडम तिकडम केले ते पकडले जाईल हि डेमोक्लीसची तलवार त्यांच्या डोक्यावर टांगती आहेच. - नोटाबंदीच्या काळात राज्यातील काही जि.म.बॅंकांना संशयास्पद व्यवहारामुळे नोटा बदलून देण्यास बंदी घातली होती त्यामुळे बँकाच्या ग्राहकांचे अतोनात हाल झाले. अद्याप ह्या बँकांकडील बाद झालेल्या नोटा RBI ने बदलून दिल्या नसल्याने ह्या बँकांचे नेहमीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. राज्यसरकार राजकारण खेळत असल्याने सामान्य ठेवीदारांचे पैसे अडकून पडले आहे. शेतकऱ्यांना नवीन कर्जही मिळाले नाही आणि बँकेतील स्वतःचे पैसेही मिळण्याचे मार्ग बंद असल्याने त्याची आर्थिक कोंडी झाली आहे. नोटाबंदिमुळे कारण नसताना ग्रामीण भागातील जनतेला हा त्रास भोगावा लागतोय. - राजकिय पक्ष , त्यान्चे कार्यकर्ते विरोधाला विरोध करतात कारण ते काळ्या अर्थव्यवस्थेतले एक घटक आहेत. ज्यान्च्या कडे बेहिशोबी पैसा आहे अश्या लोकान्ची स्थिती फारच बिकट झाली. सहन करता येत नाही आणि सान्गता येत नाही. - भरपूर नुकसान झाले, खासकरून ग्रामीण विभागात. गावातल्या महिलांनी अडीअडचणीला डब्ब्यात पैसे जमवून ठेवलेले नाईलाजाने डब्ब्याच्या बाहेर काढावे लागले. अनेक घरातील "कर्त्या" पुरुषांना "काळेधन" म्हणजे हेच याचा साक्षात्कार झाला. त्यातील काही घरी काश्मीर इतका नव्हे पण हिंसाचार झाला. बऱ्याच महिलांनी या मारहाणीची कुठेही तक्रार केली नाही. तेंव्हा बऱ्याच "कर्त्या" मंडळी "राष्ट्रउभारणी" साठी अशी मारहाणही करावी लागते आणि सहन करावी लागते असेही म्हणाले. एटीएम च्या रांगेत ज्या १०० जणांचा मृत्यू झाला. काही जण या ५०० च्या नोटा बँकेत घेऊन गेले आणि जे गेले ५००/- रुपये भरण्यासाठी जाण्यायेण्याचा खर्च सरासरी रु. १५०/- दुपारच्च चहापाणी किंवा नाश्ता / जेवण १००/- .शिवाय त्यादिवशीची १५०/- ची मजुरी बुडाली. रु. ५००/- भरायला ४००/- चा खर्च! - ज्या प्रकारच्या व्यवहारात लोक कॅशच वापरत आले आहेत तिथे नक्कीच त्रास झाला असावा असे वाटते - प्रॉपर्टीचे काळे पैसे (पांढरे पैसे काळे करायला) देणारास सॉलिड प्रॉब्लेम झाला. बायकोच्या एका मैत्रिणाला नेमकी त्याच दिवशी भिषीची ८० हजार का कैतरी कॅश मिळाली नि तिची तारांबळ उडाली. प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का? ० - धाडसी परंतु राजकीय दृष्ट्या धोकादायक निर्णय - होय - निर्णय धाडसी होताच. नंतर अनेकदा नियम बदलले गेले, हा गोंधळ टाळायला हवा होता. नवीन चलन वापरात आणण्याची गरज नव्हती. - स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावून आणि ज्यात कोणताही स्वार्थ नसताना श्री मोदी यांनी हे पाऊल उचलले ते पूर्ण यशस्वी होणार नाही सुद्धा. पण एक नेता इतका धाडसी निर्णय घेऊ शकतो( भले अनेक लोकांना टोकाचा किंवा मूर्खपणाचा वाटतो) हे कौतुकास्पद आहे. आणि UPA २ च्या धोरण लकव्याच्या पार्श्वभूमीवर तर अधिकच ठळकपणे उठून दिसतो. हि केवळ अर्थ क्रांती नसून "नैतिक" क्रांती आहे. - एक मतदार म्हणून माझ्या नेत्याचा अभिमानच वाटला. सकृतदर्शनी कोणताही वैयक्तिक लाभ नसताना एवढा महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेणे नक्किच सोपे नाही. आणि निर्णय माझा पंतप्रधान घेतो आहे, त्याचा रबरस्टँप केलेला नाही. - अत्यन्त धाडसी निर्णय. मोदीन्नी चाकोरीबध्द दाम्भिक राजकारणाला, अर्थकारणाला छेद दिला, स्वतःची राजकिय कारकिर्द पणाला लावली. काळा पैसा आणणे किन्वा नवीन तयार होऊ नये यासाठीचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. - ख्रिसमस मधे सांता खरोखरच असतो असे लहान मुलांना वाटणे आणि नोटाबंदी यशस्वी झाली असे अनेक प्रौढांना वाटणे; यात फरक कसा करावा उमगत नाही. शिवाय हा प्रयत्न प्रमाणिकच होता अशा आशयाच्या गोबेल्स जाहिराती याच पुरावा असल्यामुळे अजून काय पुरावा देणार? - धाडसी आणि राजकीय फायदा-तोटा नजरेसमोर न ठेवता घेतलेला निर्णय होता हे नक्की. त्या निर्णयामागची उद्दिष्टे माहित नसतील तर तो काळा पैसा बाहेर काढायचा प्रामाणिक प्रयत्न होता की नाही हे सांगता येणार नाही. - प्रामाणिक? अर्थातच. धाडसी? या करिता मोदिंचा ऋणी आहे. ____________________________________________________________________________________________________ " निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते?" या प्रश्नावर दोन्ही बाजूने परस्परविरोधी मते व्यक्त झाली आहेत. निश्चलीकरणामुळे स्वतःला व कुटुंबियांना अत्यल्प किंवा अजिबात त्रास झाला नाही असे बहुतेकांचे मत आहे. "निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले?" या प्रश्नावर देखील परस्परविरोधी मते व्यक्त झाली आहेत, परंतु त्यात स्वानुभवाधारीत मते फारशी नसून केवळ माध्यमांवर विसंबून मत दिले आहे असे जाणविते. "हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का?" या प्रश्नाला बहुतेकांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. इति सारांशसीमा! -

प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते? सगळ्या , देशव्यापी उद्दिष्टांबद्दल मला माहित नाही. माझ्यापुरतं बोलताना महागाई / आयकराचे दर कमी झाले तर उद्दिष्टे साध्य झाली असे मी म्हणेन. अजून तसे काही दिसत नाही. काही प्रमाणात दुकानदार /व्यापारी जे पुर्वी क्रेडिट कार्ड वा पेटीएम ने व्यहवार करत नव्हते ते आता करु लागलेत. पेटीमचा व्यहवार हा माझ्याकरिता पर्यायाने क्रेडीट कार्डचाच व्यहवार आहे, त्यामुळे मला कमी रोकड जवळ तसेच बचत खात्यात बाळगून चालते. पर्यायाने मला गुंतवणू़कीवरील अधिक व्याजाचा , तसेच क्रेडिटकार्डावरील पॉइंट्सचा लाभ होतो. या लाभांमुळे मी वरील ३ गुण दिले आहेत. प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले? होय. त्रास झाला. ATM च्या रांगेत अनेकदा उभे रहावे लागले. अर्थात नोटांबदीच्या निर्णयापेक्षा त्याची ढिसाळ अंमलबजाववणी यास कारणीभूत आहे. प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले? इतरांच्या त्रासाशी मला काही देणे घेणे नाही. प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का? मला माहित नाही. मला काही देणे घेणे नाही.

In reply to by मराठी कथालेखक

पेटीएम फुकट असते का ?

In reply to by सुबोध खरे

अग्गोबै ! फुकट उद्योग करतात . मग जेवतात कसे ?

In reply to by babu b

वापरणार्‍याला फुकट असलं म्हणजे झालं.. त्यांनी कसं जेवायचं हा त्यांचा प्रश्न आहे... तुम्ही पेटीएम वापरलं नसेल कदाचित पण टीव्हीवर काही फ्री दिसणारे चॅनेल्स असतातच त्याबद्दल तर माहित असेल ना ..एकदाच त्याकरिताची डिश आणि सेट टॉप बॉक्स (साधारण दोन हजार रुपये फक्त) घेवून आयुष्यभर फुकट बघता येतात.. आणि या डिश / सेट टॉप बॉक्सच्या किंमतीतलेही काहीही पैसे त्या चॅनेलवाल्यांना मिळत नाहीत इतकं नक्की

In reply to by मराठी कथालेखक

ते मॉडेल वेगळं आहे. फ्री टू एअर वाहिन्यांचे उत्पन्न जाहीरातींवर अवलंबून असते. पेटीएम ट्रँजॅक्शन चार्जेस वर चालते बहूतेक. जोवर पैसे पेटीएम वॉलेटमधे आहेत तोवर ठीक आहे, पण ते तुम्ही तुमच्या बँक अकाऊंटवर नेण्याचा प्रयत्न केलात तर चार्जेस लागतील. अर्थात हे अत्यंत बेसिक स्पष्टीकरण आहे, त्यांचे बिजनेस मॉडेल गेटवे कमीशन, मार्केटप्लेस कमीशन, एकूण युजर्सच्या वॉलेटमधे आलेल्या पैशांची पुनर्गुंतवणूक करणे, पेमेंट बँक अशा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. - "There ain't no such thing as a free lunch"

In reply to by थॉर माणूस

पैसे तुमच्या बँक अकाऊंटवर नेण्याचा प्रयत्न केलात तर चार्जेस लागत नाहीत. पे टी एम वर अनेक जाहिराती ( नोटिफिकेशन द्वारे) दाखवल्या जातात त्याच्या उत्पन्नातून ते आपला खर्च चालवतात. ज्यादिवशी त्यांनी चार्ज लावायला सुरुवात केली त्यादिवसापासून लोक त्यांना टाटा करतील. हे त्यांनाही माहित आहे. रच्याकने --गुगल फेसबुक व्हॉट्स ऍप फुकट कसे चालवतात. चंपाबाईनी त्यांना जेवता कसे हा प्रश्न विचारला नाही? निश्चलनीकरणाबद्दल काहीही आले कि त्यांचे डोळे पिवळे होतात.

In reply to by सुबोध खरे

चंपाबाईनी त्यांना जेवता कसे हा प्रश्न विचारला नाही? निश्चलनीकरणाबद्दल काहीही आले कि त्यांचे डोळे पिवळे होतात. फक्त डोळेच पिवळे होतात?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

पेटीएम ची स्वतःची बँक आहे तिथे पैसे वळवायला फी नाही पण तुमच्या दुसऱ्या बँकेच्या अकाउंट मध्ये टाकायचे असतील तर नाममात्र फी आहे.

In reply to by सुबोध खरे

(Update with effect from April, 2017: The fee to transfer money to your bank account will continue to be 0% for merchants and change to 2% for customers.) मी वर म्हटल्याप्रमाणे पेटीएम चे मॉडेल अनेक गोष्टींवर अवलंबून आहे, फक्त एका गोष्टीवर नाही. गुगल, फेसबूक जाहीराती आणि गोळा केलेल्या माहितीमधून पैसे कमावतात (data is new oil) त्यापलीकडे सुद्धा इतर अनेक गोष्टी आहेतच (मार्केटप्लेस चार्जेस, ट्रँजॅक्शन्स, शॉपिंग, गेम्स इ. अनेक). व्हाट्सअ‍ॅपचे स्पेसिफीक रेव्हेन्यू मॉडेल नाही. फेसबूकने त्यांना ते ज्या प्रमाणात डेटा गोळा करत होते ते पाहून खरेदी केले होते. सध्या एंड टू एंड एन्क्रिप्शन मुळे त्यांना चॅट डेटा मिळवता येत नाही असे म्हणतात, तरी यूजर डेटा फेसबूकला मिळतो. त्याशिवाय फेसबूक कॉर्पोरेट चॅट प्लॅटफॉर्म म्हणून व्हाट्सअ‍ॅपला पुढे करण्याच्या तयारीत आहे बहूतेक, तिथून थोडा रेव्हेन्यू जनरेट होऊ शकेल.

In reply to by थॉर माणूस

पेटीएम वापरणार्‍या व्यापार्‍याला काय चार्जेस पडतात त्याचा विचार मी करत बसणार नाही....त्याला ते पैसे बँक अकाउंटमध्ये न्यायला पैसे पडतात का ? पडतही असतील कदाचित. मला काय करायचंय.. जर त्याला परवडत असेल तर तो मला पेटीएम ने पेमेंट करु देईल नाहीतर 'नाहीये पेटीएम' असं नम्रपणे (!!) सांगेल.. किंवा कदाचित "पेटीएम वापरणार असेल तर वर अजून अमूक इतके चार्जेस पडतील " असंही तितक्याच नम्रपणे सांगू शकेल. जर अधिकचे चार्जेस असतील तर पेटीएम वापरायचं की नाही हे मी ठरवेन. बाकी मला ते पैसे बँक अकाउंटमध्ये नेण्याची गरजच पडत नाही. मुळात मी गरजेप्रमाणे थोडे थोडेच पैसे पेटीएममध्ये आणतो. मग जी सुविधा मी वापरत नाही त्याकरिता किती चार्जेस आहेत किंवा कसे त्याचा विचार मी कशाला करु... मला एखाद्या वस्तू/सेवाकरिता पेटीएम वापरुन वा रोख पैशांतही सारखाच खर्च येतो. पेटीएम वाले जेवतात की नाही , असल्यास कसे त्याच्याशी मला देणं घेणं नाही. पण एक निरीक्षण आहे की अनेक दुकानदार कुठलाही अधिकचा भार न लावता पेटीएमने पैसे स्वीकारतात तेव्हा त्यांना किती भार लागत असेल हा एक प्रश्नच आहे.. यात आमच्या ऑफिसच्या कॅन्टीनमधले विक्रेते, ऑफिसबाहेरील एक टपरीवाला, एक औषध दुकानदार (हा मला औषधाच्या मुळ किमतीवर म्हणजे GST ज्या किमतीवर लागते त्या किमतीवर १०% सूटही देतो), न्हावी (सलून) ई येतात. [टीप : मी मोदीभक्त वगैरे नाही..]

In reply to by मराठी कथालेखक

कॅश खरेदी विक्री होती तेंव्हा विक्रेता , खरेदीदार दोघनाही कसले चार्जेस नव्हते. आता पेटी एम आले. त्यात म्हणे खरेदीदारावर चार्ज नाही. विक्रेत्याला चार्ज लागतोच ना ? मग विक्रेता तो खरेदीदाराकडून वसूल करत असेलच ना? की मोदींच्या प्रेमापोटी स्वतःचे मार्जिन जाळून उद्योग करतो ?

In reply to by babu b

बाबू भि. मी स्वतः ८ नोव्हेंबर२०१६ च्या अगोदर पासून पेटीएम वापरतो आहे आणि गेले एक वर्षपेशा जास्त माझ्या रुग्णांकडून त्याद्वारे पैसे घेतो आहे. त्यासाठी रुग्णांना कोणताही भुर्दंड पडत नाही कि मला स्वतःला एक दमडी भरायला लागलेली नाही. या आलेल्या पैशातून मी माझी विजेची, गॅसची टेलिफोन आणि मोबाईलची बिले भरतो. जेथे पाहिजे तेथे पेटीएमने पैसे हि भरतो उदा. उबर टॅक्सीसाठी. पेटीएमचा स्वतःचा अकाउंट आहे ज्याला एक संलग्न असे डेबिट कार्डही मला फुकट मिळाले आहे. त्यातून मी पैसे खर्च करतो. पेटीएम अकाउंट मध्ये पॅसीए भरायला किंवा काढायला एक दमडीहि लागत नाही. याचा बँकेसारखा वर्षाचा आवक जावकचा हिशेबही(अकाउंट पासबुक) मी आयकर खात्याला सादर केला आहे आणि माझा आयकर रिटर्नही पस होऊन आला आहे. ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव नाही त्याबद्दल फुकटच्या पिचक्या टाकण्याची सवय सोडून द्या. केवळ मोदींद्वेष म्हणून काहीही लिहायचे.

In reply to by सुबोध खरे

साखर कारखान्यागत प्रकरण दिसते आहे. साखर कारखान्यात मुलाना नेले की त्याना वाट्टेल तितकी साखर खाणे फुकट असते. पण साखर घरी न्यायची तर मात्र वजन करुन विकतच घ्यावी लागते. एकाने दुसर्याच्या पेटीएमात भरले की दोघाना चार्जेस नाहीत. पण तिथून कोणत्याही बॅंकेत ट्रान्सफर करायचे तर काहीतरी चार्जेस लागतच असतील. पेटीएम बॅंक / डेबिट कार्ड असले तरी बाकीची ब्यान्क अकाउंटही वापरणारच ना ? त्यात पैसा नको ? की सगळे पैसे फक्त पेटीएमात ठेवून फक्त पेटीएम टू पेटीएमच करायचे ? व्यवसायातून दोनचार लाख कमावून पेटीएमात पडले शिल्लक , की कुठेतरी एफ् डी , घराचा हप्ता , पोस्टात पैसे टाकायला ते दुसर्या खात्यावर फिरवावे लागतीलच ना ? तेंव्ह तरी transaction charges जात असतील ना ? नेटवर पेटीएम चार्जेस असे गुगलले की कसले कसले चार्जेस येत आहेत.

In reply to by babu b

तुमचा प्रॉब्लेम नक्की काय आहे? कॅशलेस व्यवहार कि पेटीएम? पेटीएम वर चार्जेस लागत असतील वापरू नका ना, त्यात काय एवढे. यूपीआय वापरा!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आणि वापरुन बघण्याऐवजी ते उगाच तारे तोडत बसलेयत... पेटीएम चा वापर = मोदीभक्ती असं नवीन समीकरणही मांडत आहेत.. असो.. चालू देत..

In reply to by babu b

प्रिय बाबू साहेब, पेटीएमच्या सर्व ग्राहकांचे जे एकत्रित डिपॉझीट आहे (त्याला बँकिंगमधे फ्लोट म्हणतात) त्यावरचे व्याज हाच त्यांचा धंदा.

In reply to by babu b

हो.

In reply to by babu b

नोटबंदी अयशस्वी झाली म्हणतात देशात लाचखोरीचा पैसाच नव्हता म्हणायचं, आणि नंतर पुन्हा अयशस्वी झाली म्हणताना भ्रष्टाचाराचं प्रचंड प्रमाण तितकंच राहिलं आहे असं म्हणायचं. पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं वाटतं.

In reply to by arunjoshi123

काळा पैसा नव्हता असं कोणी म्हणत नव्हते, उलट सरकारच्या बिनडोक निर्णयाला धूप न घालता काळा पैसेवाल्यांनी आपला पैसा विविध मार्गाने बँकेत जमा केला. आता सरकार अशा आयते जाळ्यात सापडलेल्यांना पकडणार आहे म्हणे. थोडेफार सापडतील, परंतू बरेचसे पळून जातील किंवा आयुष्यभर गुंगारा देत बसतील. सरकारचा घाम काढणार हे नक्की.नवीन काळा पैसा निर्मितीही व्यवस्थीत चालू आहे त्यामुळे सरकारला नवीन मूर्खपणा करायलाही बराच वाव आहे. सरकारला अपयशाच्या आगाऊ शुभेच्छा.

In reply to by मार्मिक गोडसे

मा.गो.
निर्णयाला धूप न घालता काळा पैसेवाल्यांनी आपला पैसा विविध मार्गाने बँकेत जमा केला.
नेमकं हेच तर लक्ष्य होतं नोटाबंदीचं. एकदा का काळा पैसा बँकेत दाखल झाला की तो काळा रहात नाही. कारण त्याची नोंद झालेली असते. आ.न., -गा.पै.

In reply to by मार्मिक गोडसे

उलट सरकारच्या बिनडोक निर्णयाला धूप न घालता काळा पैसेवाल्यांनी आपला पैसा विविध मार्गाने बँकेत जमा केला.
असं कसं म्हणता येईल? उलट अख्ख्या जगात ही सर्वात जलद, गुप्त, कमी काळाची नोटबंदी आहे. या पेक्षाही कठोर नोटबंदी केली असती तर तुम्ही किती कांगावा केला असता. एवढी आरामदायक नोटबंदी केली तरी तुम्ही ते तुमचे सुप्रसिद्ध बांबूचे फोक घेऊन पंतप्रधानांच्या पार्श्वभागावर हाणायला तावातावाने निघाला होता हे विसरलात का? काही लोकांनी तर १२५ लोकांच्या मर्डरची रेअरेस्ट ऑफ द रेअर केस त्यांच्यावर लावली. ------------------------ निर्णयाला बिनडोक शब्द वापरायचा बिनडोकपणा करू नका काळे पैसे होते हे मान्य असेल तर? अंमलबजावणीत नक्की काय चुकलं? तुम्ही कशी केली असती. ---------------------------- नोटबंदीच्या काळात जनधन खात्यांमधे किती पैसा वाढला मैतंय? आता हा पैसा ज्या गरीबांनी पांढरा करून दिला http://www.thehindubusinessline.com/money-and-banking/number-of-jan-dha… (बघा मी कसा डावड्या पेपरांच्या लिंका देत असतो. आकड्यांसाठी) २.२५ कोटी नविन खाती उघडली गेली. एका खात्यात लाख रु म्हटले तरी नोटबंदीचे उद्दीष्ट परिपूर्ण होते ना? सरकारने या खात्यांत जमा करायची राशी ५० हजार पेक्षा कमी असा नियम नोटबंदित केला. २२ कोटींपैकी १३ कोटी खात्यांत नोटबंदी पूर्वी खडकू नव्हता. आज अशी खाती ४ कोटी च्या आसपास आहेत. ============================= नोटबंदी अचानक (त्यात अचानक काय म्हणा) झिरो बॅलॅन्स खात्यांत वाढ झालेली. =============== सरकार असं अधिकृतपणे म्हणू शकत नाही, पण गरीबांच्या खात्यात थोडे पैसे टाकायचं काम झालेलं आहे. ============================================================================================ नोटबंदी १००% काळा पैसा मिटवण्यात १००% यशस्वी झाली असती तर अर्थव्यवस्था पूर्णतः बसलीच असती. काळी आणि पांढरी अर्थव्यवस्था बहीणी बहीणी आहेत. त्यांचं प्रमाण इथं निलाजरं होतं. काळ्या अर्थव्यस्थेला देखील चलायला तेच चलन लागतं. नोटबंदीनं पांढर्‍या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होत नाही (तत्कालिक सोडला तर). नोटबंदी मंजे फक्त काळ्या अर्थव्यवस्थेच्या शेपटावर ठेवलेलं पाउल आहे.

In reply to by arunjoshi123

एवढी आरामदायक नोटबंदी केली तरी तुम्ही ते तुमचे सुप्रसिद्ध बांबूचे फोक घेऊन पंतप्रधानांच्या पार्श्वभागावर हाणायला तावातावाने निघाला होता हे विसरलात का? हे असं मी कधी म्हटले आहे? आणि अशी कृती करून तुमच्या जिभेच्या आवडत्या कामात अडथळा आणयाची माझी तर अजिबात इच्छा नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

http://www.misalpav.com/node/41032
इथे
कुठलाही मागचा पुढचा विचार न करता(कधी करता?) ८ नोव्हें. २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली. काळा पैसा,खोट्या नोटा, दहशतवाद नष्ट करण्याचं ब्रम्हास्त्र सोडल्याचे तुम्ही घोषित केले. दोन दिवसात तुम्हाला कळाले, की ते ब्रम्हास्त्र नसून बुमरँग आहे. नोटा बदलायला लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या, त्यात अनेक जणांचे प्राण गेले. लोकांचा विरोध वाढत गेला... ३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो). पण कसचं काय , ३१ तारखेनंतरही गोंधळ चालूच होता आणि तुम्ही जनतेपासून तोड लपवत होता.
तुम्ही केलीय ना इच्छा व्यक्त पंतप्रधानांना हाणण्याची? ========================================================
तुमच्या जिभेच्या आवडत्या कामात अडथळा
माझ्या जिभेचं आवडतं बडबडणं चालूच आहे. त्यात तुमच्यासारखे अडथळा आणूच शकत नाहीत. --------------- बाकी आत्ता कळलं तो पुरो-द्धारक राहुल सारख्या सारख्या बाह्या का मागे सारत असतो, का दमलेला असतो, का लग्न करत नाही. काय सवयी लावून ठेवल्यात म्हणावं!

In reply to by arunjoshi123

ह्यात मी 'पार्श्वभाग ' असा उल्लेख केल्याचे तुम्हाला कुठे आढळले? की तुमच्या जिभेला लावलेल्या चाटवणाचाच उल्लेख तुमच्याकडून आपोआप टंकला जातो? देशाच्या पंतप्रधानांचा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नसावा ,नाहीतर त्यांनी असा फिल्मी डायलॉग मारला नसता. आणि खरोखरच जरी ते असे चौकात प्रायश्चित्त घ्यायला उभे राहिले असते तरी मी त्यांना शारिरीक किंवा कोणतीच शिक्षा करू शकलो नसतो, कारण तसा मला कायदेशीर अधिकारच नाही. हां! शाब्दिक फटकारे नक्कीच मारले असते. एखाद्याचे विचार पटले नाही तर त्याला शारिरीक शिक्षा देण्याची परंपरा असलेलेच असे निष्कर्ष काढू शकतात. बाकी आत्ता कळलं तो पुरो-द्धारक राहुल सारख्या सारख्या बाह्या का मागे सारत असतो, का दमलेला असतो, का लग्न करत नाही. काय सवयी लावून ठेवल्यात म्हणावं! हे मला कशाला सांगताय? माझा काय संबंध त्या व्यक्तीशी? कोण काय हस्तव्यवसाय करतोय ह्याच्याशी मला काही देणेघेणे नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

ह्यात मी 'पार्श्वभाग ' असा उल्लेख केल्याचे तुम्हाला कुठे आढळले?
ह्यात तुम्ही पार्श्वभाग सोडून उरलेले मोदी असं लिहिलं आहे का? अता खोटं का बोलताय? सारवासारव का करताय?
की तुमच्या जिभेला लावलेल्या चाटवणाचाच उल्लेख तुमच्याकडून आपोआप टंकला जातो?
???? तुमच्याकडच्या पाककृती आम्हाला नै ठाऊक.
देशाच्या पंतप्रधानांचा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नसावा ,नाहीतर त्यांनी असा फिल्मी डायलॉग मारला नसता.
अहो ती बोलायची पद्धत आहे. न्यायव्यवस्थे पेक्षा अजून लोकांकडून वरचा मार खाईन असं म्हणायचं होतं.
आणि खरोखरच जरी ते असे चौकात प्रायश्चित्त घ्यायला उभे राहिले असते तरी मी त्यांना शारिरीक किंवा कोणतीच शिक्षा करू शकलो नसतो, कारण तसा मला कायदेशीर अधिकारच नाही.
पोकळ बांबू स्वतःच्याच काही कामासाठी घेतला होता का मग?
एखाद्याचे विचार पटले नाही तर त्याला शारिरीक शिक्षा देण्याची परंपरा असलेलेच असे निष्कर्ष काढू शकतात.
"भर चौकात मला हाणा", "माझी धिंड काढा" हे सामान्य वाक्प्रचार आहेत. चौकात पोकळ बांबू घेऊन थांबणे हा वाक्प्रच्चार नाही. त्यामुळं प्रकटन करताना तुमची मानसिकता काय होती हे प्रामाणिकपणे सांगा
कोण काय हस्तव्यवसाय करतोय ह्याच्याशी मला काही देणेघेणे नाही.
काऊंटरपार्टिला कसं काय देणं घेणं नाही?