मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताज्या घडामोडी - १२

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
चालू धाग्यात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा

वाचने 38868 वाचनखूण प्रतिक्रिया 197

अभिजीत अवलिया Mon, 09/25/2017 - 12:45
एकतर दर महिन्याचा वेगळा धागा असावा नाहीतर १५० प्रतिसाद झाल्यावर नवा काढावा. एक काहीतरी फिक्स ठरवावे. कुठल्या धाग्यावर लिहावे याबद्दल गोंंधळ होतो.

In reply to by अभिजीत अवलिया

श्रीगुरुजी Mon, 09/25/2017 - 15:05
बरोबर आहे. नवीन प्रतिसाद शोधण्यासाठी सोपे जावे व त्यासाठी सर्व प्रतिसाद फक्त एकाच पानावर असावे या उद्देशाने आधीच्या धाग्यात अंदाजे १५० प्रतिसाद पूर्ण झाले तर नवीन धागा सुरू व्हावा हा मूळ उद्देश होता. प्रत्येक महिन्यासाठी वेगळा धागा काढण्याची कल्पना सुद्धा चांगली आहे. परंतु ३०-३१ दिवसांमध्ये ३००+ प्रतिसाद होतात व त्यामुळे वेगवेगळ्या पानांवर आलेले नवीन प्रतिसाद शोधण्यास अडचण होते. म्हणून धाग्याचे शीर्षक काहीही ठेवले तरी व कोणीही धागा काढला तरी अंदाजे १५० प्रतिसादानंतर नवीन धागा सुरू व्हावा.

In reply to by श्रीगुरुजी

शलभ Wed, 10/04/2017 - 14:52
अंदाजे 150 प्रतिसाद एकाच पानावर राहतात असे दिसत नाही. काही 200 प्रतिसादाचे धागे पाचव्या पानावर पोहोचलेत. सबब दर महिन्याचा एकच धागा असावा.

श्रीगुरुजी Mon, 09/25/2017 - 12:47
http://m.indiatoday.in/story/sm-krishna-ccd-it-raids-vg-siddhartha/1/1055240.html कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थवेरे यांच्या घरावर व कार्यालयांवर धाड टाकून आयकर विभागाने ६५० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली आहे. हे Cafe Coffe Day या साखळी दुकानांंचे मालक आहेत.

मोहनराव Mon, 09/25/2017 - 14:13
अग्नेला मर्केल पुन्हा एकदा चान्सलरपद भुषवणार आहे. जर्मनीत २४ तारखेला रविवारी मतदान झाले. यामध्ये CDU / CSU पार्टीला ३३% मते मिळाली. पण यावेळी आश्चर्यकारकरित्या एका नवीन पार्टीला (फक्त ४ वर्ष जुनी) AfD याला १२.६ % मते मिळाली. हि पार्टी उजव्या विचारसरणीची आहे. हि पार्टी anti muslim पार्टी म्हणून ओळखली जाते. SPD पार्टीला २०.५ % मते मिळाली पण यावेळी हि पार्टी विरोधी पार्टी म्हणून काम करणार आहे त्यामुळे मर्केल ला २ नवीन पार्टीशी बोलून नवी आघाडी तयार करावी लागणार आहे. तिच्यासमोर यावेळी खूप आव्हाने आहेत.

श्रीगुरुजी Mon, 09/25/2017 - 15:36
'अंमलबजावणी संचलनलायकडून'कडून कार्ती चिदंबरम यांची संपत्ती जप्त; बँक खातीही गोठवली. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्यावर सोमवारी अंमलबजावणी संचलनलायकडून (ईडी) कारवाईचा बडगा उभारण्यात आला. ‘ईडी’ने कार्ती चिदंबरम यांची सर्व संपत्ती जप्त केली आहे. तसेच त्यांची बँक खाती आणि ९० लाख रूपये रकमेच्या मुदत ठेवी गोठवण्यात आल्या आहेत. कार्ती चिदंबरम यांनी आपली संपत्ती विकण्याचा आणि बँक खाती बंद करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ‘ईडी’ने हे पाऊल उचलल्याचे कळते. http://www.loksatta.com/desh-videsh-news/enforcement-directorate-attaches-assets-bank-accounts-fds-worth-rs-90-lakh-of-karti-chidambaram-in-aircel-maxis-case-1557447/

पुंबा Mon, 09/25/2017 - 18:44
बाकी काहीही असो, इडी, प्राप्तिकर विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या संस्थांना भाजपने जी मोकळीक दिली आहे आणी कुठल्याही राजकिय तडजोडीला बळी न पडता आअर्थिक गुन्ह्यांचा ज्या वेगाने छडा लावला जात आहे ते काबिल ए तारीफ आहे. भाजपचे अभिनंदन. जर हे सुडाचे राजकारण असेल तर असे सुडाचे राजकारण अवश्य व्हावे. काँगेस किंवा आणखी कोणी सत्तेवर आले तरी त्यांनी सुद्धा असेच सुडाचे राजकारण करत रहावे. साटेलोटे करून आयुष्यभर माया गोळा करत राहणार्‍या सोकॉल्ड सुसंस्कृत व्यक्तिगत मित्रांपेक्षा हाडवैर असणारे राजकारणी भारी.

In reply to by पुंबा

सौन्दर्य Wed, 09/27/2017 - 07:19
एक शंका, ह्या धाडी फक्त विरोधकांच्या घरा-दारावर पडताहेत की सत्तेतील शंकास्पद नेत्यांवर देखील ? जर फक्त विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ह्या धाडी पडत असतील तर त्या योग्य नाहीत.

In reply to by सौन्दर्य

पुंबा Wed, 09/27/2017 - 11:13
जर फक्त विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ह्या धाडी पडत असतील तर त्या योग्य नाहीत.
असे कसे? धाडी वैध आहेत की नाही हे पहायला हवे. भ्रष्टांवर धाडी पडायलाच पाहिजेत. केवळ सध्याच्या सरकारविरूद्ध आवाज उठवताहेत या सबबीखाली विरोधक चिदंबरम अन लालू सारख्यांचे समर्थन करणार असतील तर ते बरोबर नाही.

राघव Tue, 09/26/2017 - 17:36
१ सप्टेंबर २०१७ पासून, टोकियो ऑलंपिक, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स साठी तयारी करत असणार्‍या टॉप १५२ अ‍ॅथलीट्सना, रु. ५०,०००/- प्रति महिना पॉकेट अलाऊंस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधी हा अलाऊंस रु.३०००/- ते रु.५०००/- होता. अभिनव बिंद्रा च्या अध्यक्षतेखालील टॉप्स कमिटीनं हा सल्ला दिलेला होता. लिंक

गामा पैलवान Wed, 09/27/2017 - 12:16
देव, धर्म मानणारे मनोरुग्ण : इति राजन खान बातमी : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/faith-in-god-and-religion-is-mental-illness-rajan-khan/articleshow/60846378.cms
रोचक विधान आहे. यातून भारतातले बहुसंख्य लोकं मनोरुग्ण आहेत असा निष्कर्ष निघतो. राजन खान हे मात्र अपवाद आहेत. तर प्रश्न असा आहे की राजन खान यांच्यासारख्या मनोनिरामय लोकांनी उर्वरित जनतेचा मानसिक आजार दूर करावा का? की घटनेने दिलेल्या उपासनास्वातंत्र्याचा आधारे तसाच राहू द्यावा? -गा.पै.

गामा पैलवान Wed, 09/27/2017 - 12:39
आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीचे पत्रकार गणेश बच्छाव यांचं सोमवारी रात्री प्रदीर्घ आजारानं निधन झालं. बातमी : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/journalist-ganesh-bachchav-no-more/articleshow/60851067.cms त्यांचा प्रदीर्घ आजार कोणता यावर माहिती दिलेली नाही. हा दारूबळी आहे का? -गा.पै.

विशुमित Wed, 09/27/2017 - 12:42
राज ठाकरेंच्या फेसबुक पेज ला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच बरोबर त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियासुद्धा संयत वाटल्या. पाहू त्याचा किती फायदा नवनिर्माणला होतोय ते.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Wed, 09/27/2017 - 15:24
राज ठाकरे हा एक भलामोठा शून्य आहे. २००५ मध्ये काँग्रेस/राष्ट्रवादीने फूस लावून त्याला फोडले. शिवसेनेची मते फोडणे हा त्यामागे उद्देश होता. २००९ मध्ये राजने आपले अवतारकार्य पूर्ण केले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात किमान ८ लोकसभा मतदारसंघ असे होते ज्यात भाजप, शिवसेना व मनसे यांना मिळालेली एकूण मते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा खूप जास्त होती. परंतु मनसे, भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीन पक्ष/आघाड्या वेगळे लढल्याने भाजप-शिवसेना-मनसे यात विरोधी मते विभागली जाऊन त्या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. पुणे मतदारसंघात अनिल शिरोळेंविरूद्ध कलमाडी फक्त २५ हजार मतांनी निवडून आला. परंतु त्या मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराला ७५००० मते होती. मुंबईत राम नाईक फक्त ५००० मतांनी हरले कारण मनसेच्या उमेदवाराने १ लाखाहून अधिक मते घेतली होती. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराने बरीच मते घेतल्याने भाजप-सेना युतीचे उमेदवार थोड्या मतांनी हरले. याचीच पुनरावृत्ती २००९ च्या विधानसभा निवडणुकीत झाली. या निवडणुकीत भाजप-सेना युतीला ९० व काँग्रेस-राष्ट्रवादी युतीला १४४ जागा होत्या. परंतु मनसेला १३ जागा होत्या व काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकलेल्या इतर २५ मतदारसंघात भाजप-शिवसेना व मनसे यांच्या एकत्रित मतांची बेरीज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांपेक्षा जास्त होती. म्हणजे मनसेमुळे भाजप-शिवसेना युतीला एकूण ३८ जागा गमवाव्या लागल्या. जर मनसे नसती तर भाजप-सेना युतीला १२८ व काँग्रेस-राष्ट्रवादी युतीला ११९ जागा मिळाल्या असत्या. मनसेला मिळालेली सर्व मते ही शिवसेनेची होती. त्यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. राज अत्यंत विश्वासघातकी आहे. २००७ मधील महापालिका निवडणुकीत मनसेने पुणे, मुंबई इ. महापालिकेत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. नंतर कल्याण-डोंबिवलीत त्याने शिवसेनेला पाठिंबा दिला. नाशिकमध्ये २०१२ मध्ये पहिल्या अडीच वर्षात भाजपचा पाठिंबा घेतला व नंतरच्या अडीच वर्षात राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला. २०१४ मध्ये त्याने पुणे व नगरमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. एकंदरीत पाठिंबा देण्यासाठी व घेण्यासाठी त्याला कोणत्याही पक्षाचे वावडे नाही. त्याच्या धरसोड वृत्तीमुळेच २०१४ पासून मनसेचे अस्तित्व संपले. २०१४ मध्ये लोकसभेत ०, विधानसभेत १ अशी मनसेची दारूण कामगिरी होती. २०१६ पासून महाराष्ट्रात झालेल्या वेगवेगळ्या नगरपालिका निवडणुकीत एकूण ४७०० नगरसेवकांपैकी मनसेचे ४० नगरसेवक सुद्धा निवडून आले नाहीत. २०१७ मध्ये झालेल्या १७ महापालिकांच्या १७०० नगरसेवकांमध्ये मनसेचे जेमतेम ३०-३२ नगरसेवक आहेत. मनसे हा पक्ष पूर्णपणे संपला आहे. परंतु राज ठाकरेची वाचाळता, अहंकार, पोकळ बढाया, फुशारक्या आणि उर्मटपणा अजिबात संपलेला नाही. अर्थात उद्धव ठाकरेही असाच आहे. वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून ठाकरे बंधू कायम स्वतःच्याच धुंदीत वावरत असतात. मनसेप्रमाणे शिवसेनाही संपण्याच्या मार्गावर आहे. राज ठाकरे म्हणजे नुसती पोकळ बडबड आणि काम शून्य हे जनतेने केव्हाच ओळखले आहे. मोदींना शिव्या दिल्या की तात्काळ प्रसिद्धी मिळते हे ओळखून आता उद्धवपाठोपाठ राज मोदींवर दुगाण्या झाडत आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मुळात फेसबुक हे माध्यम आता फारसे प्रभावी राहिलेले नाही. कायप्पा, इन्स्टाग्राम इ. आल्यापासून फेसबुकचा वापर बर्‍यापैकी कमी झाला आहे. मुळात राजला फारसा पाठिंबा नाही. त्याच्या कट्टर समर्थकांशिवाय इतर फारसे कोणी त्याचे पान वाचणार नाही आणि कोणी वाचले तरी त्याचा परीणाम शून्य असेल.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित Wed, 09/27/2017 - 16:04
राज ठाकरे हा एक भलामोठा शून्य आहे.>> ==>> गणिती भाषेत राज ठाकरे १ आहेत बहुतेक. बरं जरी एक नसले तरी शून्य मात्र नाहीत. ०.१, ०.२, ....०.९९ पैकी असू शकतात. २००५ मध्ये काँग्रेस/राष्ट्रवादीने फूस लावून त्याला फोडले.>> ==> या विधानाला काही आधार? (मणघडत गोष्टी कृपया टाळा) मुंबईतील सर्व सहा मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराने बरीच मते घेतल्याने भाजप-सेना युतीचे उमेदवार थोड्या मतांनी हरले.>> ==> जनतेने ज्याला मतदान करायचे होते ते केले. त्यात मनसेचा दोष कसा? राज अत्यंत विश्वासघातकी आहे.>> ==> दिलेल्या उदाहरणात विश्वासघाताची व्याख्या खूपच त्रोटक आहे तुमची. असो.. त्याच्या धरसोड वृत्तीमुळेच २०१४ पासून मनसेचे अस्तित्व संपले. २०१४ मध्ये लोकसभेत ०, विधानसभेत १ अशी मनसेची दारूण कामगिरी होती.>> ==>>कोणे एके काळी एका राष्ट्रीयपक्षा जवळ फक्त २ च खासदार होते. धरसोडी मध्ये भाजप अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. असो.. परंतु राज ठाकरेची वाचाळता, अहंकार, पोकळ बढाया, फुशारक्या आणि उर्मटपणा अजिबात संपलेला नाही. >>> ==>> असतो एका एकाचा स्वभाव. सर्वच पक्षा मध्ये आहेत असे नग. भाजप मध्ये जास्त आहेत, माझे निरीक्षण. बळंच जुन्या आठवणी काढत रडणारे प्रधानसेवक जास्त भावतात काही लोकांना. असो.. त्याच्या कट्टर समर्थकांशिवाय इतर फारसे कोणी त्याचे पान वाचणार नाही आणि कोणी वाचले तरी त्याचा परीणाम शून्य असेल.>>> ==>> गुरुजी गाफील राहू नका. रात्र वैऱ्याची आहे.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Wed, 09/27/2017 - 21:08
राज ठाकरे हा एक भलामोठा शून्य आहे.>> ==>> गणिती भाषेत राज ठाकरे १ आहेत बहुतेक. बरं जरी एक नसले तरी शून्य मात्र नाहीत. ०.१, ०.२, ....०.९९ पैकी असू शकतात. शून्य म्हणजे असा आकडा जो कोणत्याही आकड्यात मिळविला किंवा त्यातून वजा केला तरी मूळ आकड्यात फरक पडत नाही. राजकारणात शून्य म्हणजे ज्या नेत्यामुळे किंवा पक्षामुळे राजकारणात अजिबात फरक पडत नाही असा नेता/पक्ष. यादॄष्टीने राज ठाकरे हे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परीषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा सर्व ठिकाणी शून्य आहेत. २००५ मध्ये काँग्रेस/राष्ट्रवादीने फूस लावून त्याला फोडले.>> ==> या विधानाला काही आधार? (मणघडत गोष्टी कृपया टाळा) २००५ मधील संदर्भ मिळाले तर टाकतो. परंतु राजने सुरवातीच्या काही वर्षात शिवसेनेचे खच्चीकरण व काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत असे धोरण ठेवले होते. २००७ च्या महापालिका निवडणुकीनंतर ठाणे व मुंबई महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मत दिले होते. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराने बरीच मते घेतल्याने भाजप-सेना युतीचे उमेदवार थोड्या मतांनी हरले.>> ==> जनतेने ज्याला मतदान करायचे होते ते केले. त्यात मनसेचा दोष कसा? मनसेचा जनाधार शिवसेनेतून आला होता. राजने वेगळा पक्ष काढला नसता मतांची फाटाफूट टळली असती. राज अत्यंत विश्वासघातकी आहे.>> ==> दिलेल्या उदाहरणात विश्वासघाताची व्याख्या खूपच त्रोटक आहे तुमची. असो.. मनसेने आजवर महाराष्ट्रातील सर्व पक्षांबरोबर साटेलोटे केले आहे. त्यामुळेच मनसेची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे. त्याच्या धरसोड वृत्तीमुळेच २०१४ पासून मनसेचे अस्तित्व संपले. २०१४ मध्ये लोकसभेत ०, विधानसभेत १ अशी मनसेची दारूण कामगिरी होती.>> ==>>कोणे एके काळी एका राष्ट्रीयपक्षा जवळ फक्त २ च खासदार होते. धरसोडी मध्ये भाजप अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. असो.. भाजपचे धोरण अनेक बाबतीत स्थिर आहे. भाजपने कधीही काँग्रेस, डावे पक्ष, मुस्लिम लीग इ. पक्षांचा पाठिंबा घेतलेला नाही किंवा त्यांना पाठिंबा दिलेला नाही. १९८४ ची निवडणुक ही एका विशिष्ट परिस्थितीत झाली होती. इंदिरा गांधींची हत्या झाली नसती तर त्या निवडणुकीत काँग्रेस जरी सर्वात मोठा पक्ष ठरला असता तरी काँग्रेस बहुमतापासून लांब राहिली असती. भाजप, जनता पक्ष इ. चीही धूळधाण झाली नसती. त्यामुळे मनसेची २०१४ मधील दारूण परिस्थिती व भाजपची १९८४ मधील दारूण परिस्थिती यांची तुलना अयोग्य आहे. २०१४ मध्ये अशी कोणतीही विशिष्ट परिस्थिती नव्हती. किंबहुना राज्यातील चार प्रमुख पक्ष एकमेकांविरूद्ध लढत असल्याने पाचव्या पक्षाला चांगली संधी मिळविता आली असती. परंतु मनसे हा पक्ष तेव्हा जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरल्यामुळे त्या पक्षाला पंचरंगी लढतील जेमतेम १ जागा मिळाली. अगदी एमआयएमने सुद्धा २ जागा जिंकल्या. तसेच सपने व शेकापने सुद्धा ३ जागा जिंकल्या. परंतु मनसेला फक्त १ जागा मिळाली ते सुद्धा बहुरंगी लढतीत. परंतु राज ठाकरेची वाचाळता, अहंकार, पोकळ बढाया, फुशारक्या आणि उर्मटपणा अजिबात संपलेला नाही. >>> ==>> असतो एका एकाचा स्वभाव. सर्वच पक्षा मध्ये आहेत असे नग. भाजप मध्ये जास्त आहेत, माझे निरीक्षण. बळंच जुन्या आठवणी काढत रडणारे प्रधानसेवक जास्त भावतात काही लोकांना. असो.. काहीही भरीव न करता मारलेल्या फुशारक्या, बढाया आणि वर्तनात असलेला अहंकार, उर्मटपणा जनतेला आवडत नाही. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी वृत्ती जनता नाकारते. प्रधानसेवक कदाचित या दुर्गुणांनी भरलेले असतीलही. परंतु त्यांचे २००१ पासूनचे काम डोळ्यांसमोर आहे. तसेच त्यांना इतरांनी किती त्रास दिला हेही जनतेला माहित आहे. त्यामुळे जरी कदाचित प्रधानसेवकांमध्ये हे दुर्गुण असतील तरी त्यांची आणि राजची तुलना होऊ शकत नाही कारण राजकडे जगाला दाखविण्यासारखे काहीही नाही. त्याच्या कट्टर समर्थकांशिवाय इतर फारसे कोणी त्याचे पान वाचणार नाही आणि कोणी वाचले तरी त्याचा परीणाम शून्य असेल.>>> ==>> गुरुजी गाफील राहू नका. रात्र वैऱ्याची आहे. उद्धव, राहुल आणि आता राज यांची भाषणे, लेखन वगैरे बघितले तर ते केवळ मोदीविरोध या एकाच मुद्द्याभोवती फिरताना आढळते. मोदींच्या प्रत्येक गोष्टीला, योजनेला विरोध, मोदींवर सातत्याने टीका (उद्धव तर टीका करताना अत्यंत खालची पातळी गाठतो), मोदी वाईट, मोदी नालायक . . . अशी नकारात्मक भूमिकाच फक्त दिसते. ही माणसे मोदींना विरोध करण्यासाठी इतक्या टोकाला गेली आहेत की मोदींची स्वच्छ भारत योजना हाणून पाडण्यासाठी हे मुद्दाम टमरेल घेऊन रस्त्यावर संडासला बसतील. आपण काय चांगले करणार हे सांगण्याऐवजी मोदी किती वाईट हेच यांच्या प्रचाराचे मुख्य आणि एकमेव सूत्र आहे. राजचे परवाचे भाषण किंवा त्याचे फेबु पान पाहिले तर ते संपूर्णपणे मोदी वाईट याच मुद्द्याभोवती आहे. जनतेला पूर्णपणे नकारात्मक प्रचार आवडत नाही. फक्त नकारात्मक प्रचार करण्याऐवजी समोरचा किती वाईट आहे हे सांगतासांगता मी किती चांगला आहे हे सांगणे सुद्धा आवश्यक आहे. अन्यथा नकारात्मक प्रचार बूमरँग होतो. २००९ मध्ये अडवाणींनी असाच मनमोहन सिंहांविरूद्ध बर्‍यापैकी नकारात्मक प्रचार केला होता व त्याची फळे भोगली होती. केजरीवालांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी आता मोदीपुराण थांबविले आहे. राजने फेबु पानावरून मोदी, मोदी अशी कितीही बोंब ठोकली तरी जोपर्यंत आपण त्यांच्यापेक्षा किती चांगले हे तो जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत अशा लेखनाला काहीही महत्त्व नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे Wed, 09/27/2017 - 23:31
ही माणसे मोदींना विरोध करण्यासाठी इतक्या टोकाला गेली आहेत की मोदींची स्वच्छ भारत योजना हाणून पाडण्यासाठी हे मुद्दाम टमरेल घेऊन रस्त्यावर संडासला बसतील. काय लिव्हलय!-/ हसून हसून मुरकुंडी वळली

In reply to by विशुमित

सुबोध खरे गुरुवार, 09/28/2017 - 13:29
स्वच्छ भारत अभियानाचा नाटकीपणा? http://www.financialexpress.com/india-news/why-narendra-modis-swachh-bharat-mission-is-a-success-and-it-must-power-on-adil-zainulbhai-qci-chief-explains/873931/ घरात साधं शौचालय असणं हि एक चैनीची बाब नाही. २०११ च्या जनगणने प्रमाणे एकंदर ५० % घरात शौचालय नव्हते किंवा ७० टक्के खेड्यातील आणि २० टक्के शहरातील घरांमध्ये शौचालय नव्हते. हीच स्थिती आता २६. ७५ % घरात शौचालय नाही अशी आहे. म्हणजेच एकंदर ५० % घरात शौचालय होते ते आता ७३.२५ % घरात आहे. सरकारी कर्मचारी लोक वेळेवर कामावर आले हि काय बातमी असू शकते का? तसेच प्रत्येक घरात शौचालय आहे हि काय बातमी आहे का? इतक्या प्राथमिक सुविधेसाठी केंद्र सरकारला मोहीम राबवावी लागते हे सरळ सरळ पणे आतापर्यंतच्या सर्व सरकारांचे अपयश आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे गुरुवार, 09/28/2017 - 13:31
आणि ते "ठोस कामं" म्हणजे काय काय ते हि सांगा कि. आपल्या नात्यागोत्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखी नकोत हो

In reply to by सुबोध खरे

विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 14:17
Dr. खरे विषयाशी सुसंगत नसताना तुम्ही माझ्या व्यवसायाच्या निगडित व्यक्तिगत पातळी ओलांडायचे काही कारण नव्हते. तसे मला तुमच्या बरबटलेल्या डॉक्टरी पेशा बद्दल बरेच काही लिहता येऊ शकते. पण तशी पातळी सोडण्याची माझी संस्कृती किंवा संस्कार परवानगी देत नाही. असो.. -- विषयाला धरून प्रतिक्रिया देत चला. शेतकरी, नातेगोते, कर्जमाफी असले बदनारायण संबंध असलेल्या प्रतिक्रिया टाळा. लोकांचा तुमच्याबद्दलचा आदर कमी होत चालला आहे. तुम्हाला नसेल त्याचा फरक पडत पण आम्हाला पडतो. सर्वात महत्वाचे वाक्याच्या शेवटी सारखे "हो" वापरायला तुमची-आमची सोयरीक जुळली नाही अजून. त्यामुळे अदबीने. पुढे असल्या कुचाळक्या मी खपवून घेणार नाही. संपादक मंडळ कृपया त्यांना समाज द्या. --- बाकी ठोस कामाच्या बाबतीत म्हणायचे तर जेवढे माझ्या डोळ्यासमोर दिसते त्यानुसार पुण्याचा कचरा प्रश्न सोडवा. त्या हडपसर, फुरसुंगी, भेकरेनगर एवढेच काय खराडी सारख्या एरिया मध्ये सुद्धा वेळच्या वेळी कचरा उचलला जात नाही. हॅन्ड ग्लोज आणि मास्क लावून हिरवी पाने झाडण्याचे इव्हेंट्स करण्यापेक्षा कचरा उचलणे, त्याचे डम्पिंग, त्याचे रेसियलिंग अशी ठोस कामे करून घेतलीत तरी पुरेशी आहेत. यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवून पण तसा काही फायदा नाही.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 14:42
बाकी ठोस कामाच्या बाबतीत म्हणायचे तर जेवढे माझ्या डोळ्यासमोर दिसते त्यानुसार पुण्याचा कचरा प्रश्न सोडवा. त्या हडपसर, फुरसुंगी, भेकरेनगर एवढेच काय खराडी सारख्या एरिया मध्ये सुद्धा वेळच्या वेळी कचरा उचलला जात नाही. हॅन्ड ग्लोज आणि मास्क लावून हिरवी पाने झाडण्याचे इव्हेंट्स करण्यापेक्षा कचरा उचलणे, त्याचे डम्पिंग, त्याचे रेसियलिंग अशी ठोस कामे करून घेतलीत तरी पुरेशी आहेत. यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवून पण तसा काही फायदा नाही. ही महापालिका अखत्यारीतील कामे सुद्धा मोदींनीच करायची का?

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद_१९८२ गुरुवार, 09/28/2017 - 14:53
ही महापालिका अखत्यारीतील कामे सुद्धा मोदींनीच करायची का? हे हगायला बसल्यावर ह्यांचे टमरेल देखील श्री मोदींनीच भरुन द्यायला हवे. अशी अपेक्षा देखील करतील येत्या काही दिवसात ही लोक.

In reply to by प्रसाद_१९८२

विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 15:19
मोदींचे आणि स्वच्छ भारत अभियानाचे सच्चे पाईक म्हणून जवाबदारी येऊ शकते तुमच्याकडे. अभिनंदन..!!

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 15:16
ही महापालिका अखत्यारीतील कामे सुद्धा मोदींनीच करायची का?>> ==> कामे करून (करवून) घेतलीत तरी पुरेशी आहेत. ---- मग ते गल्लोगल्ली झाडू मारायचे काम (नाटक) तरी कशासाठी करत आहेत? --- स्वच्छ भारत सेस नेमका कोणत्या गोष्टींसाठी वापरणार आहेत?

In reply to by विशुमित

विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 15:21
पुण्यातील भाजपचे खासदार नेमकी काय पावले उचलत आहेत पुण्यातील कचऱ्याप्रश्नी? काही ठोस दिसत नाही म्हणून विचारले.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 15:31
ही महापालिका अखत्यारीतील कामे सुद्धा मोदींनीच करायची का?>> ==> कामे करून (करवून) घेतलीत तरी पुरेशी आहेत. सरकारमध्ये किंवा कंपनीत सुद्ध एक उतरंड असते. कंपनीचा अध्यक्ष थेट शिपायाच्या किंवा कारकुनाच्या कामात हस्तक्षेप करीत नाही. तो संचालक मंडळाकडून कामे करवून घेतो. तसेच केंद्रसरकार व महापालिका यांच्यामध्ये राज्य सरकार असते. विकेंद्री व्यवस्थेत कोणी काय करायचे याची विभागणी असते. महापालिका राज्य सरकारला जबाबदार असते, तर राज्य सरकार केंद्र सरकारला जबाबदार असते. महापालिका काम करीत नसेल तर त्यात राज्य सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. थेट मोदींनीच हडपसरमधील कचरा उचलायचे काम करून घेणे सुरू केले तर त्यांना देशपातळीवरील किंवा जागतिक पातळीवरील कामे करताच येणार नाहीत. ---- मग ते गल्लोगल्ली झाडू मारायचे काम (नाटक) तरी कशासाठी करत आहेत? --- नाटक!!!!!! स्वच्छ भारत सेस नेमका कोणत्या गोष्टींसाठी वापरणार आहेत? http://www.hindustantimes.com/india/services-to-attract-0-5-swachh-bharat-cess-from-november-15/story-oEEmzrPFb75fJstQmQmJWN.html असाच प्रश्न तुम्हाला व्यवसाय कर किंवा वीजबिलात दाखविलेले असंख्य कर व अधिभार याविषयी कधी पडला होता का?

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 17:32
कामे करून (करवून) घेतलीत तरी पुरेशी आहेत.>> हे स्पष्ट लिहले आहेच मी. मी कोठे म्हणालो की मोदींनी येऊन हडपसर मधील कचरा उचला पाहिजे. नाटक>> ==>> फक्त फोटो पुरते इव्हेंट्स कशा करिता ? गाव/ वॉर्ड पातळीवरती जर आठवड्याला लोक अभियान सक्तीने राबवा. त्यासाठी आर्मी कॅम्प मध्ये कशी स्वच्छता राखली जाते, याचा अभ्यास करून राबवली तरी चालेल. असाच प्रश्न तुम्हाला व्यवसाय कर किंवा वीजबिलात दाखविलेले असंख्य कर व अधिभार याविषयी कधी पडला होता का?>> ==>>हो पडलेत ना. पेट्रोल/ डिझेल वरचे अधिभाराचे सुद्धा प्रश्न पडलेत. जर या गोष्टींवरती प्रश्न पडले नसते तर स्वच्छता सेस वरती प्रश्न पडलेच नाही पाहिजे, असा काही अध्यादेश निघाला आहे का?

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 17:48
कामे करून (करवून) घेतलीत तरी पुरेशी आहेत.>> हे स्पष्ट लिहले आहेच मी. मी कोठे म्हणालो की मोदींनी येऊन हडपसर मधील कचरा उचला पाहिजे. परत तेच. ही महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कामे असतात. ही कामे महापालिकेने करवून घ्यायची असतात. केंद्राचा याच्याशी संबंध नसतो. =>> फक्त फोटो पुरते इव्हेंट्स कशा करिता ? गाव/ वॉर्ड पातळीवरती जर आठवड्याला लोक अभियान सक्तीने राबवा. त्यासाठी आर्मी कॅम्प मध्ये कशी स्वच्छता राखली जाते, याचा अभ्यास करून राबवली तरी चालेल. ते सुरूच आहे. =>>हो पडलेत ना. पेट्रोल/ डिझेल वरचे अधिभाराचे सुद्धा प्रश्न पडलेत. जर या गोष्टींवरती प्रश्न पडले नसते तर स्वच्छता सेस वरती प्रश्न पडलेच नाही पाहिजे, असा काही अध्यादेश निघाला आहे का? मग ते विचारलेत का कोणाला आणि त्याची उत्तरे काय मिळाली?

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 18:03
तुम्हीच तर वर म्हंटला आहात. "कंपनीचा अध्यक्ष थेट शिपायाच्या किंवा कारकुनाच्या कामात हस्तक्षेप करीत नाही. तो संचालक मंडळाकडून कामे करवून घेतो." ते सुरूच आहे.>> ==>> इव्हेंट्स ?? मग ते विचारलेत का कोणाला आणि त्याची उत्तरे काय मिळाली?>>> ==>> स्वच्छता सेस बद्दल प्रश्न विचारायचे नाहीत का? आणि मी विचारलेल्या प्रश्नांना तुम्हीच उत्तरे द्यावीत हा माझा आग्रह नाही. मी इन जनरल विचारले होते. तसा गैरसमज झाला असेल तर क्षमस्व.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 20:19
तुम्हीच तर वर म्हंटला आहात. "कंपनीचा अध्यक्ष थेट शिपायाच्या किंवा कारकुनाच्या कामात हस्तक्षेप करीत नाही. तो संचालक मंडळाकडून कामे करवून घेतो." कंपनीचा अध्यक्ष संचालक मंडळाकडून नफा वृद्धी, व्यवसाय वृद्धी, नवीन क्षेत्रात पदार्पण इ. कामे करवून घेतो. आपल्या कंपनीच्या एखाद्या शाखेतील कारकुनाने काय काम करावे इतके खालचे काम तो संचालक मंडळाला करायला सांगत नाही. हडपसरमधील कचरा उचलणे हे त्या भागातील नगरसेवकाचे काम आहे व ते महापालिकेने करवून घ्यायचे असते. त्यात राज्य सरकार सुद्धा लक्ष घालत नाही. पण तुमची अपेक्षा की मोदींनी त्यात लक्ष घालावे! ते सुरूच आहे.>> ==>> इव्हेंट्स ?? कसले ईव्हेंट्स? मग ते विचारलेत का कोणाला आणि त्याची उत्तरे काय मिळाली?>>> ==>> स्वच्छता सेस बद्दल प्रश्न विचारायचे नाहीत का? आणि मी विचारलेल्या प्रश्नांना तुम्हीच उत्तरे द्यावीत हा माझा आग्रह नाही. मी इन जनरल विचारले होते. तसा गैरसमज झाला असेल तर क्षमस्व. स्वच्छता सेसबद्दल जरूर विचारा. परंतु येथील कोणी त्याविषयी उत्तर देण्यास पात्र असतील असे वाटत नाही.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 17:49
कामे करून (करवून) घेतलीत तरी पुरेशी आहेत.>> हे स्पष्ट लिहले आहेच मी. मी कोठे म्हणालो की मोदींनी येऊन हडपसर मधील कचरा उचला पाहिजे. परत तेच. ही महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कामे असतात. ही कामे महापालिकेने करवून घ्यायची असतात. केंद्राचा याच्याशी संबंध नसतो. =>> फक्त फोटो पुरते इव्हेंट्स कशा करिता ? गाव/ वॉर्ड पातळीवरती जर आठवड्याला लोक अभियान सक्तीने राबवा. त्यासाठी आर्मी कॅम्प मध्ये कशी स्वच्छता राखली जाते, याचा अभ्यास करून राबवली तरी चालेल. ते सुरूच आहे. =>>हो पडलेत ना. पेट्रोल/ डिझेल वरचे अधिभाराचे सुद्धा प्रश्न पडलेत. जर या गोष्टींवरती प्रश्न पडले नसते तर स्वच्छता सेस वरती प्रश्न पडलेच नाही पाहिजे, असा काही अध्यादेश निघाला आहे का? मग ते विचारलेत का कोणाला आणि त्याची उत्तरे काय मिळाली?

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 17:40
link बद्दल धन्यवाद...!! त्या नुसार "The proceeds from this cess will be exclusively used for Swachh Bharat initiatives of the government, it added." Swachh Bharat initiatives कोठे दिसले नाहीत या बातमी मध्ये. नक्की काय काय करणार आहेत सेस गोळा करून? फक्त पब्लिक हेअल्थ बाबत मखलाशी केली आहे.

In reply to by विशुमित

विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 17:44
त्यात खाली दिलेल्या poll मध्ये ४५.८ % लोक सेस देण्यासाठी तयार नाहीत. सॅम्पल साईझ छोटी असू शकते पण इंग्लिश पेपर वाचणारे आहेत म्हंटल्यावर थोडीफार सुशिक्षित लोकांचे वोटिंग असावे. (मी तयार होतो आणि अजून सुद्धा आहे)

In reply to by विशुमित

सुबोध खरे गुरुवार, 09/28/2017 - 19:22
@विशुमित "Dr. खरे विषयाशी सुसंगत नसताना तुम्ही माझ्या व्यवसायाच्या निगडित व्यक्तिगत पातळी ओलांडायचे काही कारण नव्हते." मुदलात मी तुम्हाला ओळखतच नाही किंवा तुमचे मूळ नाव काय आहे हे हि मला माहित नाही तर तुम्ही कोणता व्यवसाय करता आहेत याच्याशी मला काय करायचे आहे? आणि मी व्यक्तिगत पातळी कुठे ओलांडली आहे जरा दाखवता येईल का? "तसे मला तुमच्या बरबटलेल्या डॉक्टरी पेशा बद्दल बरेच काही लिहता येऊ शकते." तुम्हाला कुठल्या व्यवसायातील घाणीबद्दल लिहायचे आहे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मिपावर डॉक्टरी व्यवसायावर ताशेरे ओढणारे अनेक धागे आहेत तुम्ही पण एक काढा. पण तशी पातळी सोडण्याची माझी संस्कृती किंवा संस्कार परवानगी देत नाही. असो.. ?? -- विषयाला धरून प्रतिक्रिया देत चला. विषयाला धरूनच प्रतिसाद दिला होता दुव्यासकट. आता तुम्हीच स्वच्छता अभियानाला नाटकीपणा म्हणता आहात. हे अभियान हा ठोस कार्यक्रम नाही असे तुमचे मत होते म्हणून ठोस कार्यक्रम काय ते विचारले. यात अर्थातच कर्जमाफी येत नाही शेतकरी, नातेगोते, कर्जमाफी असले बदनारायण संबंध असलेल्या प्रतिक्रिया टाळा. लोकांचा तुमच्याबद्दलचा आदर कमी होत चालला आहे. तुम्हाला नसेल त्याचा फरक पडत पण आम्हाला पडतो. ?? सर्वात महत्वाचे वाक्याच्या शेवटी सारखे "हो" वापरायला तुमची-आमची सोयरीक जुळली नाही अजून. त्यामुळे अदबीने." "हो" वापरणे हा साधा वाक्प्रचार आहे त्यात सोयरीक जुळवण्याचा कुठे संबंध आला? आणि माझा सूर कुठे उर्मट पणे आला ते दाखवता काय? मी अदबीनेच लिहितो किंवा वागतो. "पुढे असल्या कुचाळक्या मी खपवून घेणार नाही." यात काय कुचाळक्या आल्या संपादक मंडळ कृपया त्यांना समाज द्या. --- 'बाकी ठोस कामाच्या बाबतीत म्हणायचे तर जेवढे माझ्या डोळ्यासमोर दिसते त्यानुसार पुण्याचा कचरा प्रश्न सोडवा. त्या हडपसर, फुरसुंगी, भेकरेनगर एवढेच काय खराडी सारख्या एरिया मध्ये सुद्धा वेळच्या वेळी कचरा उचलला जात नाही." पुण्याचा कचरा प्रश्न सोडवा खराडी सारख्या एरिया मध्ये कचरा उचलणे हा ठोस कार्यक्रम असेल आणि तो पंतप्रधानांनी घ्यावा असे आपले म्हणणे आहे? धन्य आहे. हॅन्ड ग्लोज आणि मास्क लावून हिरवी पाने झाडण्याचे इव्हेंट्स करण्यापेक्षा कचरा उचलणे, त्याचे डम्पिंग, त्याचे रेसियलिंग अशी ठोस कामे करून घेतलीत तरी पुरेशी आहेत. यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवून पण तसा काही फायदा नाही. पंतप्रधानांनी कचरा उचलून त्याचे डम्पिंग करवून घेणे हि कामे केली तर राष्ट्राचा कारभार कुणी चालवायचा बाबू लोकांनी? कोणतेही नक्की कारण नसताना तुम्ही माझ्याविषयी ग्रह करून घेतला आहे कि मी तुमच्या व्यवसायाबद्दल लिहिले आहे या गैरसमजाला मी कारणीभूत नसताना तुम्ही कुचाळक्या सारखे शब्द वापरता माझ्या व्यवसायावर घसरता मला अदबीने वागण्यास सांगता आणि वर संपादक मंडळाला मला समज देण्यास सांगता? खाली मी दिलेला प्रतिसाद (०१.३५वाजता चा) माझ्या या प्रतिसादाच्या (०१. ३१ वाजताच्या) खाली यायला पाहिजे होता तो तसा खाली का गेला ते मला माहित नाही पण त्यातीळ दुव्यात महाराष्ट्राचे मंत्री स्पष्टपणे असे म्हणत आहेत कि १० लाख बोगस कर्जाची खाती उघडकीस आली आहेत.हि खाती अर्थातंच नात्यागोत्यातील आणि सग्या सोयऱ्यातील लोकांचीच असणार आणि त्यात जमा झालेले पैसे लायकी नसणाऱ्या माणसांना मिळणार होते. अशा खात्याना कर्जमाफी देणे हे काम नक्कीच ठोस नाही म्हणून मी तो प्रतिसाद दिला त्यावर तुम्ही काय वाटेल ते माझ्यावर आरोप करताय. धन्य आहे. द्वेष इतकाही असू नये कि आपण संदर्भ हीन लिहितो याचे भान येऊ नये. बाकी मी परत एकदा सांगतो आहे मी आपल्याला कधी पाहिल्याचे आठवत नाही आपण काय करता हे मला माहित नाही आणि मला त्याच्याशी कर्तव्य पण नाही. आपण माझ्या व्यवसायावर घसरला वैयक्तिक पातळीवरही आलात ते सुद्धा मी आपल्याला अजिबात ओळखत नसताना,आपले मूळ नाव गाव पत्ता माहित नसताना. आपल्या "वर्मावर आघात झाला असावा" अशी माझी धारणा आहे जर तसे असेल तर ते पूर्ण काकतालीय न्यायाने आहे आणि त्यात माझा कोणताही हेतू किंवा रस नाही. जर तसे असेल तर क्षमस्व पातळी सोडून प्रतिसाद देऊ नका एवढीच विनंती आहे. --/\-- बघा पटलं तर.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान गुरुवार, 09/28/2017 - 20:33
खरे डॉक्टर,
आपल्या "वर्मावर आघात झाला असावा" अशी माझी धारणा आहे
काय हसलोय यावर. बोगस कर्जे मिळवून देणे हे विशुमित यांचं वर्म आहे की काय असं सूचित होतंय. आ.न., -गा.पै. विशेष सूचना : विशूमित यांनी कृपया हलक्याने घ्यावे. जडाने घेतले तर आजून विनोद उत्पन्न होतील.

In reply to by गामा पैलवान

विशुमित Fri, 09/29/2017 - 13:09
विशूमित यांनी कृपया हलक्याने घ्यावे. जडाने घेतले तर आजून विनोद उत्पन्न होतील.>>> ==>> बोगस नाही पण निकर्षांमध्ये बसणाऱ्या अडाणी शेतकऱ्यांचे काही अर्ज मी स्वतः ऑनलाईन भरून दिले आहेत. बिचाऱ्यांकडून ते सेवा केंद्रवाले रु.६० घेत होते. सुरवातीला तर काही लोकांकडून त्यांनी रु.५०० पण घेतले मग आरडाओरड झाल्यावर रु.१०० वर परत रु.६० वर आले. --- हलकेच घेतो मी इथल्या चर्चेला. जडाने घायला लष्कराच्या भाकऱ्या भाजणाऱ्यापैकी मी नाही आहे. --- विनोद एन्जॉय करा...! तुम्ही खुश तर आम्ही खुश..!!

In reply to by सुबोध खरे

विशुमित Fri, 09/29/2017 - 12:59
आणि ते "ठोस कामं" म्हणजे काय काय ते हि सांगा कि. आपल्या नात्यागोत्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखी नकोत हो>>> ==>> हा तुमचा १.३१ चा प्रतिसाद स्वच्छता अभियान बद्दलचा माझ्या प्रतिसादाला दिलेल्या उप प्रतिसादाचा उप-प्रतिसाद. " आपल्या नात्यागोत्यातील शेतकऱ्यांना" यात माझ्या नात्यागोत्याचे, शेतकऱ्यांचे आणि कर्जमाफीचा काय संबंध? तुम्हाला जर माझे खरे नाव आणि माझा खरा व्यवसाय माहित नाही तर मग माझ्या नात्यागोत्यात शेतकरी आहेत आणि त्यांनी कर्जमाफीला अर्ज केला हे कोठून समजले तुम्हाला? हे व्यक्तिगत होत नाही का? ---- वर्मावर बोट म्हणत असाल तर २००८ नंतरच्या कर्जमाफी नंतर प्रत्येक पीक कर्ज वेळेवर फेडले आहे आणि ०% व्याजदराचा सरकारी फायदा सुद्धा उठवला आहे. चालूच्या कर्जमाफी मध्ये आमच्या कुटुंबात कोणीच निकर्षा मध्ये बसत नाही त्यामुळे अर्ज करण्याचा प्रश्नच नाही. निकर्षामध्ये बसत असतो तर नक्की अर्ज केला असता. का म्हणून सोडायचा फायदा? (तसे लावलेले निकर्षा बद्दल पण शेतकऱ्यांच्या मनात खदखद आहे) मागे सरकारने दिलेल्या पेट्रोल-डिझेल-गॅस वरती दिलेल्या सबसिडीचा फायदा घेतलाच की सर्व जनतेने. भुक्या जनतेसाठी वेळोवेळी शेतमालाचे भाव पाडलेच की सरकार ने. त्यावेळेस असे कोणाच्या मनात आले नसेल, नको बाबा सबसिडी, मी सगळे पैसे देणार. मिळू देत शेतकऱ्याच्या कष्टाचे चार पैसे, आता कर्जमाफीवरून स्वाभिमानाचा आव आणत आहेत काही पूर्वग्रहदूषित लोक. मला एवढे स्पष्टीकरण द्याचे तसे काहीच कारण नव्हते. पण हे जाणीवपूर्वक नीच ठरवण्याच्या विचारसरणीला वर्मावर बोट ठेवण्याचे गोंडस नाव द्याचे याला विरोध होता. तोच तुमचा हेतू होता हे " वर्मावर बोट" हा वाक्प्रचार वापरल्यामुळे लपून राहत नाही. --- कृपया तुम्ही पण भविष्यात पातळी सोडून प्रतिसाद न देण्याची काळजी घ्या. --- बघा जमलं तर..!

In reply to by विशुमित

सुबोध खरे Fri, 09/29/2017 - 15:04
10 लाख बोगस खाती याचा आणि तुमचा काही संबंध आहे असं मी कुठे म्हटलं आहे? किंवा तुम्ही मुदलात कर्ज घेतलाय का हेच मला माहित नाही तर ते फेडलं काय आणि नाही काय याच्याशी माझा काय संबंध आहे?( मुळात तुम्ही कोण हेच मला माहित नाही तर या बाकीच्या आरोपांबद्दल मी काय बोलणार तुम्हीच ही गोष्ट गृहीत धरून बोलताय की मला तुमचा व्यवसाय माहिती आहे आणि त्यावरून मी तुम्हाला बोलतो आहे. मूळ पायाच चुकीचा आहे तर इमारत काय असणार? "पातळी सोडून"वगैरे आपल्या मनाचे खेळ आहेत. "जपून ,अदबीने" हे सर्व आपल्या प्रतिसादातील शब्द आहेत. सबसिडी शेतमालाचे भाव स्वाभिमान वगैरे सर्व असंबद्ध शब्द आपण का आणता आहेत तेच समजत नाही. आपण वाटेल त्या शब्दात आरोप करत आहात त्याला काही तरी पाय असावा लागतो. इतके असंबद्ध प्रतिसाद मी कुणीच दिलेले पाहिले नाहीत. असो इति लेखन सीमा

In reply to by सुबोध खरे

विशुमित Fri, 09/29/2017 - 15:33
आणि ते "ठोस कामं" म्हणजे काय काय ते हि सांगा कि. आपल्या नात्यागोत्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखी नकोत हो>>> हा तुमचा १.३१ चा प्रतिसाद स्वच्छता अभियान बद्दलचा माझ्या प्रतिसादाला दिलेल्या उप प्रतिसादाचा उप-प्रतिसाद. " आपल्या नात्यागोत्यातील शेतकऱ्यांना" यात माझ्या नात्यागोत्याचे, शेतकऱ्यांचे आणि कर्जमाफीचा काय संबंध?>> "आपल्या" या शब्दाबद्दल आक्षेप आहे या बद्दल तुम्ही काहीच बोलाला नाही. १० बोगस शेतकरी वगैरे वर मी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही आहे तरी माझ्या प्रतिक्रियेला कशासाठी चिटकवले कळले नाही. --- आमचा पण "राम राम" घ्या ..!! --- (या बोटाचा थुका त्या बोटावं करण्याचे कसब २०१४ नंतर कमालीचे वाढले आहे. राम राम राम!!)

पुंबा Wed, 09/27/2017 - 13:36
हे कुलगुरू नक्की कोण ठरवतं? जितका भंपक, चाटू अन बिनडोक माणूस तितका त्याचे निवडला जाण्याचे चान्सेस जास्त असतात का? बिएचयू मध्ये जे चाललंय ते खरोखर हलकटपणाचे आहे. असल्या माणसाला तात्काळ हाकलून द्यायला हवे, तिथे आंदोलन करणार्‍या मुलींनाच अँटी नॅशनल म्हटलं जात आहे. योगी आंदोलकांना अँटी सोशल म्हणतो. मुलींच्या आंदोलनात नक्की अँटी सोशल/नॅशनल नक्की काय आहे कुणी सांगू शकेल काय?
indianexpress.com/article/opinion/editorials/bhu-lathicharge-violence-bhu-vc-girl-interrupted-molestation-eve-teasing-4862786/

In reply to by पुंबा

श्रीगुरुजी Wed, 09/27/2017 - 14:02
हे कुलगुरू नक्की कोण ठरवतं? ३-४ प्रकारची विद्यापीठे असतात. केंद्रीय विद्यापीठांचा (उदा. जनेवि) कुलगुरू केंद्र सरकार नियुक्त करते. राज्याच्या अखत्यारीत येणार्‍या विद्यापीठांचा (उदा. पुणे विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ इ.) कुलगुरू राज्य सरकार नियुक्त करते. खाजगी/अभिमत विद्यापीठांचा कुलगुरू त्या विद्यापीठ ज्या संस्थांच्या मालकीचे आहे त्या संस्था नियुक्त करतात (उदा. टिमवि, भारती विद्यापीठ इ.). कुलगुरूंची नियुक्ती ही राजकीय नेमणूक असते. कुलगुरू जरी उच्चविद्याविभूषित असला/असली तरी सत्ताधारी राजकीय पक्षाच्या राजकीय विचारसरणीशी जुळणार्‍या व्यक्तीला कुलगुरूपदी नेमले जाते. बनारस हिंदू विद्यापीठ हे केंद्रीय विद्यापीठ आहे का राज्य सरकारच्या अखत्यारीतील आहे का पूर्णपणे स्वतंत्र आहे याची कल्पना नाही.

In reply to by श्रीगुरुजी

जेम्स वांड Wed, 09/27/2017 - 17:56
प्रत्येक विद्यापीठाला (केंद्रीय/राज्य) 'उपकुलगुरु' उर्फ व्हाईस चांसलर असतो, केंद्रीय विद्यापीठांचा कुलगुरू राष्ट्रपती अन राज्य विद्यापीठांचा कुलगुरू राज्यपाल असतो असे ऐकून/वाचून आहे.

In reply to by जेम्स वांड

चिनार Fri, 09/29/2017 - 14:07
जेम्स भाऊ.. उपकुलगुरू हे पद प्र-कुलगुरू (Pro Vice Chanslar) या नावाने ओळखले जाते. सांगायला अभिमान वाटतो,माझे मामा श्री राजेश जयपूरकर हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नवनियुक्त प्र-कुलगुरू आहेत. त्यांची निवड राज्य सरकारने केली.

अमितदादा गुरुवार, 09/28/2017 - 12:21
भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र स्पष्ट करणारे अनेक लेख सध्या वाचनात आले बहुतांश लेख हे निराशाजनक चित्र मांडतात, अर्थव्यवस्था वर नोटबंदी आणि gst ची घाईत केलेली अमलबजावणी याचा झालेला परिणाम अनेक लेखकांनी दाखवून दिलेला आहे. कोणताही वृत्तपत्र घ्या उजवीकडे झुकणारे असो वा डावीकडे सगळेजण सरकार ने अर्थ व्यवस्थेचं केलेलं ढिसाळ नियोजन आणि काही मूर्ख निर्णय यावर बोट ठेवतात. स्वराज ह्या उजवीकडे झुकलेल्या माध्यमात ही सरकार विरोधी सूर उठू लागले आहेत, काल the hindu मध्ये अशी बातमी वाचली की भारतीय मजदूर संघाने सरकार च्या सल्लागार यांना दोषी धरलं. सुब्रम्हणयं स्वामी आणि यशवंत सिन्हा यांनी तर घरचा आहेर दिलाय. अर्थ व्यवस्थेतील दोष दाखवून देणाऱ्या तज्ज्ञना सरकार फाट्यावर मारत होते, विरोधी लोक म्हणून हिणावत होते. आता यांचीच लोक तोंड उगडाय लागल्याने सरकार ची अवस्था वाईट झाली आहे. Gdp नंबर एक वेळ बाजूला ठेवू पण रोजगार। निर्मिती ही ठप्प झालीय, the hindu मध्ये बातमी वाचली होती की रोजगार निर्मितीचा दर 2010 पासून मोठ्या प्रमाणात घसरत आहे, वर्षाला 1 कोटी रोजगार देवू च्या घोषणा करणाऱ्या मोदींना यावर कोणतीही उपाययोजना करता आली नाही ही शरमेची बाब आहे. खरेतर अनेक लोकांना भ्रष्टयाचार, काळा पैसा, पाकिस्तान या मुद्यापेक्षा ही रोजगार निर्मितीचा मुद्दा महत्वचा वाटतो, कारण लोकांना काम हवं. मनरेगा हा काँग्रेस चे अपयश आहे अशी गर्जना करणाऱ्या मोदींना ही योजना चालू ठेवावी लागली एवढच नव्हे त्यावरील खर्च वाढवावा लागला कारण जर याद्वारे होणारी रोजगार निर्मिती थंडावली तर ग्रामीण भागात असंतोष पसरेल. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञना फाट्यावर मारणाऱ्या आणि काहीही वक्तव्य करणाऱ्या मोदींना ही एक सणसणीत चपराक आहे. Livmint ह्या स्थळावर बातमी वाचली ज्यामध्ये हिंदुस्तान unilever कंपनीच्या प्रमुखांनी ग्रामीण भागात नोटबंदी मूळे मागणी घटली असे स्पष्ट म्हंटले आहे, आता नोटबंदी मुले लोक अंघोळ करायची बंद झाली का असे हास्यास्पद प्रश्न विचारू नयेत. तेलाच्या किमतीतुन काही लाखो कोटींचा घबाड मिळवून सुद्धा जेटली ची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे वित्तीय तूट ही वाढत चाली आहे, जेटली याना वन्य आश्रमात पाठवून द्यावे. Upa2 च्या सुमार कामगिरी नंतर मनमोहन सिंग यांना लोकांनी परत त्यांच्या मूळ व्यवसायात परत पाठवले (पंजाब विद्यापीठात प्रोफसर), मोदींनी ताबडतोब योग्य पाऊले टाकावीत चुकीचे निर्णय न घेता रोजगार निर्मिती करावी आणि अर्थ व्यवस्था सक्षम करावी, अन्यथा मूळ व्यवसायात परत जावे लागेल. फक्त प्रामाणिक असणे गरजेचे नाही लोकांना हाताला काम हवे अन्यथा सामाजिक असंतोष वाढत जाईल। मोदींनी एवडी सुद्धा सुमार कामगिरी करू नये की लोकांना राहुल गांधीच आसरा वाटेल।

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 15:02
Gdp नंबर एक वेळ बाजूला ठेवू पण रोजगार। निर्मिती ही ठप्प झालीय, the hindu मध्ये बातमी वाचली होती की रोजगार निर्मितीचा दर 2010 पासून मोठ्या प्रमाणात घसरत आहे, वर्षाला 1 कोटी रोजगार देवू च्या घोषणा करणाऱ्या मोदींना यावर कोणतीही उपाययोजना करता आली नाही ही शरमेची बाब आहे. खरेतर अनेक लोकांना भ्रष्टयाचार, काळा पैसा, पाकिस्तान या मुद्यापेक्षा ही रोजगार निर्मितीचा मुद्दा महत्वचा वाटतो, कारण लोकांना काम हवं. रोजगार निर्मितीची काही वस्तुनिष्ठ आकडेवारी आहे का? म्हणजे नोटाबंदीमुळे १५ लाख नोकर्‍या गेल्या, ४ कोटी नोकर्‍या गेल्या असे आकडे बरेच पुढारी कोणत्याही वस्तुनिष्ठ आकडेवारीशिवाय फेकत होते. तसेच रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे अशा आरोपांना काही वस्तुनिष्ठ आधार आहे का? Livmint ह्या स्थळावर बातमी वाचली ज्यामध्ये हिंदुस्तान unilever कंपनीच्या प्रमुखांनी ग्रामीण भागात नोटबंदी मूळे मागणी घटली असे स्पष्ट म्हंटले आहे, आता नोटबंदी मुले लोक अंघोळ करायची बंद झाली का असे हास्यास्पद प्रश्न विचारू नयेत. हा प्रश्न हास्यास्पद नाही. एफएमसीजी गुड्स ची मागणी घटली असे जेव्हा एखादी कंपनी सांगते तेव्हा दोनच शक्यता असतात. एक तर लोकांनी ही उत्पादने वापरणे कमी केलेले असते किंवा या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा खप वाढलेला असतो. पतंजली उत्पादनांमुळे युनिलिव्हरसारख्या अनेक कंपन्यांच्या विक्रीवर परीणाम झाला आहे असे वाचनात येते. युनिलिव्हरचा खप कमी झाला याचा अर्थ जनतेतूनच मागणी घटली असा काढण्यापेक्षा त्या क्षेत्रातील पतंजली, गोदरेज इ. कंपन्यांची विक्री वाढली असा सुद्धा अर्थ होऊ शकतो. तेलाच्या किमतीतुन काही लाखो कोटींचा घबाड मिळवून सुद्धा जेटली ची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे वित्तीय तूट ही वाढत चाली आहे, जेटली याना वन्य आश्रमात पाठवून द्यावे. https://currentaffairs.gktoday.in/rbi-indias-current-account-deficit-narrowed-2016-17-06201745630.html वरील वृत्तांतानुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षात चालू खात्यातील तूट आधीच्या वर्षाच्या तुलनेत कमी झाली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा गुरुवार, 09/28/2017 - 15:32
रोजगार निर्मितीची काही वस्तुनिष्ठ आकडेवारी आहे का? म्हणजे नोटाबंदीमुळे १५ लाख नोकर्‍या गेल्या, ४ कोटी नोकर्‍या गेल्या असे आकडे बरेच पुढारी कोणत्याही वस्तुनिष्ठ आकडेवारीशिवाय फेकत होते. तसेच रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे अशा आरोपांना काही वस्तुनिष्ठ आधार आहे का?
वरील प्रतिक्रिये मध्ये मी फक्त नोटबंदी मुळे नव्हे तर एकूण जॉबलेस ग्रोथ बद्दल बोलतोय जे २०१० साली सुरु होऊन अजून चालूच आहे. खालील लिंक पहा http://www.thehindu.com/business/Industry/Joblessness-rises-to-5-year-high/article15002364.ece हे पहा मोदी सरकारच्या मंत्रालयाची आकडेवारी The annual survey also showed that 47.8 percent of the surveyed population was reported to be employed in 2015-16 compared with 49.9 percent (also known as worker population ratio) two years earlier when the previous survey was conducted by the Labour Bureau, under the Ministry of Labour and Employment. खालील unemployment rate २००९-२०१०= ९.३% २०११-२०१२=३% २०१२-२०१३=४.७% २०१३-२०१४=४.९% २०१४-२०१५=५%
हा प्रश्न हास्यास्पद नाही. एफएमसीजी गुड्स ची मागणी घटली असे जेव्हा एखादी कंपनी सांगते तेव्हा दोनच शक्यता असतात. एक तर लोकांनी ही उत्पादने वापरणे कमी केलेले असते किंवा या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा खप वाढलेला असतो. पतंजली उत्पादनांमुळे युनिलिव्हरसारख्या अनेक कंपन्यांच्या विक्रीवर परीणाम झाला आहे असे वाचनात येते. युनिलिव्हरचा खप कमी झाला याचा अर्थ जनतेतूनच मागणी घटली असा काढण्यापेक्षा त्या क्षेत्रातील पतंजली, गोदरेज इ. कंपन्यांची विक्री वाढली असा सुद्धा अर्थ होऊ शकतो.
खालील लेख पहा How deep is India’s economic mess? The heads of two companies that are considered yardsticks of the broader economy have recently spoken out about the problems they are facing. Hindustan Unilever chief executive Sanjiv Mehta said in a presentation to investors that rural demand for its products has been weak because of the lingering effects of demonetization as well as the farm crisis. आता हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचा प्रमुख आपले उत्पादन कशाने घटले याबाबत प्रोफेशनल असावा असे मला वाटते तो काँग्रेस चा हस्तक नसावा नोटबंदीवर जबाबदारी झटकायला, तुम्ही दिलेलं कारण हे long टर्म आहे इथे ते शॉर्ट टर्म इफेक्ट बद्दल बोलतायत. आता मोदी साठी तुम्ही ह्याला खोटं पाडणार असाल तर माझी काही हरकत नाही.
वरील वृत्तांतानुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षात चालू खात्यातील तूट आधीच्या वर्षाच्या तुलनेत कमी झाली आहे.
आता तुटीबद्दल इथे अद्यावत माहिती आहे, तुमची माहिती पाठीमागच्या वर्षाची आहे http://www.hindustantimes.com/business-news/current-account-deficit-increases-to-2-4-of-gdp-in-q1-on-widening-trade-gap/story-fV92b6Sed5cwQ0aPTOKpnJ.html India’s current account deficit (CAD) soared to a four-year high of $14.3 billion, or 2.4% of gross domestic product (GDP), in the June quarter as gold imports picked up ahead of implementation of the goods and services tax (GST) starting July 1. In the March quarter of 2016-17, CAD was 0.6% of GDP at $3.4 billion, according to Reserve Bank of India data. म्हणजे ०.६% वरून २. ४ % झेप.

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 20:13
वरील प्रतिक्रिये मध्ये मी फक्त नोटबंदी मुळे नव्हे तर एकूण जॉबलेस ग्रोथ बद्दल बोलतोय जे २०१० साली सुरु होऊन अजून चालूच आहे. खालील लिंक पहा नोटाबंदीमुळे १५ लाख/४ कोटी नोकर्‍या गेल्यात, काम नसलेल्यांच्या संख्येचे आकडे इ. विषयी आपण एका धाग्यात सविस्तर बोललो आहोत. या आकड्यांना कोणताही वस्तुनिष्ठ आधार नाही हे त्यावेळी मी लिहिले होते. परत तेच तेच लिहायचा उत्साह नाही. Hindustan Unilever chief executive Sanjiv Mehta said in a presentation to investors that rural demand for its products has been weak because of the lingering effects of demonetization as well as the farm crisis. युनिलिव्हरच्या उत्पादनांची विक्री/मागणी घटली याचा अर्थ निश्चलीकरणाने सर्वत्र मंदी झाली असा होत नाही. युनिलिव्हरच्या उत्पादनांची मागणी कमी असली तरी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची विक्री वाढलेली असू शकते. पंतजलीची उत्पादने जोरदार खपत आहेत. याचा संबंध युनिलिव्हरच्या विक्रीत घट झाली याच्याशी नसेल का? नुकतीच बातमी वाचली. टाटा डोकोमो कंपनी बंद होणार आहे कारण त्यांना फारसे ग्राहक मिळत नाहीत. याचा अर्थ संपूर्ण मोबाईल क्षेत्रात मागणी कमी झाली असा होत नाही कारण त्यांचे इतर प्रतिस्पर्धी जोरदार व्यवसाय करीत आहेत. आता तुटीबद्दल इथे अद्यावत माहिती आहे, तुमची माहिती पाठीमागच्या वर्षाची आहे माझे आकडे हे २०१६-१७ या वर्षातीलच आहेत. हे आकडे हवे तसे वापरता येतात. प्रत्यक्ष तूट कमी झाली तरी जीडीपीबरोबरील रेशोच्या तुलनेत ती वाढली असेही सांगता येते.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा गुरुवार, 09/28/2017 - 20:25
युनिलिव्हरच्या उत्पादनांची विक्री/मागणी घटली याचा अर्थ निश्चलीकरणाने सर्वत्र मंदी झाली असा होत नाही. युनिलिव्हरच्या उत्पादनांची मागणी कमी असली तरी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची विक्री वाढलेली असू शकते. पंतजलीची उत्पादने जोरदार खपत आहेत. याचा संबंध युनिलिव्हरच्या विक्रीत घट झाली याच्याशी नसेल का? नुकतीच बातमी वाचली. टाटा डोकोमो कंपनी बंद होणार आहे कारण त्यांना फारसे ग्राहक मिळत नाहीत. याचा अर्थ संपूर्ण मोबाईल क्षेत्रात मागणी कमी झाली असा होत नाही कारण त्यांचे इतर प्रतिस्पर्धी जोरदार व्यवसाय करीत आहेत.
खूपच जनरल प्रतिसाद, टाटा डोकोमो चा काय संबंध. असो प्रतिवाद करत नाही, सहमत नाही एवढाच सांगतो.
माझे आकडे हे २०१६-१७ या वर्षातीलच आहेत.
अहो २०१६-२०१७ हे अर्थ वर्ष मार्च २०१७ ला संपत असं मला वाटत, मी माझा डेटा जून २०१७ चा म्हणजे २०१७-२०१८ ह्या अर्थ वर्षात येणार आहे.
हे आकडे हवे तसे वापरता येतात. प्रत्यक्ष तूट कमी झाली तरी जीडीपीबरोबरील रेशोच्या तुलनेत ती वाढली असेही सांगता येते.
काहीही, फक्त parcentage दिले नाहीत आकडे दिलेत ना मी, ३ बिलियन डॉलर वरून तूट १२ बिलियन डॉलर वर गेलीय

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 20:30
एका तिमाहीवरून ठाम निष्कर्ष काढता येत नाही. वृत्तांतात स्पष्टपणे लिहिले आहे की जूनमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढली व त्यामुळे तूट जास्त दिसते. सोन्याची आयात वाढली कारण व्यापार्‍यांना १ जुलैला वस्तू व सेवा कर लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त सोने आयात करायचे होते. म्हणजे या तिमाहीसाठी तूट वाढण्याचे ते तात्कालिक कारण होते. आता वसेक लागू झाल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आयात होणे अवघड आहे व त्यामुळे आयात आपोआपच कमी होईल. निष्कर्ष काढण्यापूर्वी अशीही कारणे विचारात घ्यावी लागतात. तसे केले नाही तर एकांगी निष्कर्ष निघतात.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा गुरुवार, 09/28/2017 - 20:05
अजून एक लेख ज्यामध्ये सरकारी आकडेवारी गृहीत धरली आहे . सरकारच्या लेबर ब्युरो ने आकडेवारी प्रसिद्द केली आहे http://www.firstpost.com/business/where-are-the-jobs-mr-modi-2731002.html फोटो क्रॉप करून चिटकवता येत नाही म्हणून आकडेवारी देतो. आकडे २००९= १२. ५६ लाख २०१० = ८. ५६ लाख २०११ = ९. ३० लाख २०१२=३. २२ लाख २०१३ = ४. १९ लाख २०१४ = ४. १३ लाख २०१५ = १. ३५ लाख असे अनेक लेख देता येतील तेही वेगवेगळ्या सूत्रांकडून. अजून आकडेवारी साठी खालील लेख यात हि सरकारी आकडेवारी दिली https://thewire.in/136618/whatever-happened-to-modis-development/

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 20:25
अजून एक लेख ज्यामध्ये सरकारी आकडेवारी गृहीत धरली आहे . सरकारच्या लेबर ब्युरो ने आकडेवारी प्रसिद्द केली आहे या लेखात डिसेंबर २०१५ मध्ये संपलेल्या तिमाहीची आकडेवारी आहे. त्यामुळे याच्याशी निश्चलीकरणाचा अजिबात संबंध नाही. मी आधी लिहिल्याप्रमाणे असे अनेक वेगवेगळे परस्परविरोधी वृत्तांत असतात व बर्‍याचश्या वृत्तांतात स्पेक्युलेशन असते. फारच क्वचित वस्तुनिष्ठ वृत्तांत असतो.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा गुरुवार, 09/28/2017 - 20:32
या लेखात डिसेंबर २०१५ मध्ये संपलेल्या तिमाहीची आकडेवारी आहे. त्यामुळे याच्याशी निश्चलीकरणाचा अजिबात संबंध नाही. मी आधी लिहिल्याप्रमाणे असे अनेक वेगवेगळे परस्परविरोधी वृत्तांत असतात व बर्‍याचश्या वृत्तांतात स्पेक्युलेशन असते. फारच क्वचित वस्तुनिष्ठ वृत्तांत असतो.
नोटबंदीच्या काळात जॉब गेले का नाही यावर आपले मतभेद आहेत मी मात्र माझ्या मतावर ठाम आहे, आता जरा नोटबंदी बाजूला ठेवू आणि longterm चा विचार करू. अहो मोदी सरकारच्या कालावधीत जॉब घटत चालत हे तरी मान्य कराल कि नाही. तुम्हाला सरकार विरोधी कोणताही वृत्तांत खरा वाटत नाही, मग आता असा तुम्हाला मान्य असणारा वस्तुनिष्ठ वृत्तांत कुटून आणणारा कि देव देणार का मोदी छाती बडवून जे बोलतात तेच वस्तुनिष्ठ

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 21:07
अहो मोदी सरकारच्या कालावधीत जॉब घटत चालत हे तरी मान्य कराल कि नाही. नाही तुम्हाला सरकार विरोधी कोणताही वृत्तांत खरा वाटत नाही, मग आता असा तुम्हाला मान्य असणारा वस्तुनिष्ठ वृत्तांत कुटून आणणारा कि देव देणार का मोदी छाती बडवून जे बोलतात तेच वस्तुनिष्ठ वृत्तांत कोणीही द्यावा. परंतु तो स्पेक्युलेशन, पक्षीय भूमिका, दुराग्रह, व्यक्तिगत अंदाज इ. वर आधारलेला नसून वस्तुनिष्ठ आकडेवारीवर आधारीत असावा.

In reply to by श्रीगुरुजी

अमितदादा गुरुवार, 09/28/2017 - 21:18
मी वरती दिलेला डेटा हा त्या लेखकांनी लेबर बयूरो ह्या कामगार मंत्रालयाच्या संस्थेकडून (सरकारकडून) घेतला आहे त्यात कसल्या आल्या स्पेक्युलेशन, पक्षीय भूमिका, दुराग्रह, व्यक्तिगत अंदाज इ. ह्या गोष्टी. असो थांबतो इथेच

In reply to by अमितदादा

श्रीगुरुजी Fri, 09/29/2017 - 14:01
भारत या १३०+ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात कोणाकडे रोजगार आहे व कोणाकडे नाही याची अचूक माहिती कोणत्याही यंत्रणेकडे नाही. त्यामुळे जे व्यक्त केले जात आहेत ते केवळ अंदाज आहेत. हे अंदाज कितपत खरे आहेत हे तपासण्याची यंत्रणा सुद्धा भारतात नाही. निश्चलीकरण व त्यानंतरचा काळ या काळात १५ लाख नोकर्‍या गेल्या, ४ कोटी नोकर्‍या गेल्या असे अनेक अंदाज व्यक्त केले जात होते. कोणाकडेही अचूक माहिती नव्हती. या मुद्द्यावर आलेले अनेक वृत्तांत हे परस्परविरोधी आकड्यांनी व दाव्यांनी भरलेले होते हे मी एका पूर्वीच्या धाग्यात दाखवून दिले आहे. एक तिमाही किंवा थोड्या कालावधीतील आकडेवारीवरून ठाम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते. १ जुलैपासून वसेक अंमलात येण्याच्या आधीच्या महिन्यात सोने व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीत खूप वाढ झाली व त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली हा योगायोग किंवा अर्थव्यवस्थेतील मंदीचे लक्षण नव्हते. त्याचा संबंद १ जुलैपासून अंमलबजावणी होणार्‍या वसेकशी होता. २०१५ मध्ये नवरात्र व दसरा हे सण ऑक्टोबरमध्ये तर दिवाळी नोव्हेंबरमध्ये होती. साहजिकच सणाच्या काळातील खरेदी २ महिन्यात विभागली गेली. परंतु २०१६ मध्ये सर्व सण ऑक्टोबरमध्येच आल्याने सणाची खरेदी फक्त ऑक्टोबरमध्ये होऊन नोव्हेंबर २०१६ मध्ये नोव्हेंबर २०१५ च्या तुलनेत कमी खरेदी झाली. काही जणांनी लगेच याचा संबंध निश्चलनीकरणाशी लावला. आता २०१७ मध्ये नवरात्र व दसरा सप्टेंबरमध्ये तर दिवाळी ऑक्टोबरमध्ये आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१६ मधील विक्री व ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मधील विक्री यांची तुलना करता येणार नाही कारण २०१७ चे आकडे कमीच असणार आहेत. परंतु काही जण याचा संबंध निश्चलनीकरणाशी लावतील हे नक्की. ८ नोव्हेंबरला निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर काही दिवसांनी भारतात रोखीची चणचण आहे, लोकांनी खर्चाचा हात आखडता घेतला आहे अशा बातम्या दिल्या जात होत्या. नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ या काळात चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले होते. लोकांकडे रोख पैसे नसते किंवा लोकांनी खर्च कमी केला असता तर चित्रपट पडले असते. त्याच काळात डिसेंबरमध्ये सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलुन गेल्याच्या बातम्या होत्या. निश्चचलनीकरणामुळे मागणी घटली, मंदी आली इ. गोष्टी स्पेक्युलेशनच होत्या.

सुबोध खरे गुरुवार, 09/28/2017 - 13:35
दहा लाख बोगस कर्जाची खाती आढळून आली आहेत. http://www.livemint.com/Politics/ObL8ytHgISSnbEgIrEN9BM/One-million-bank-accounts-of-Maharashtra-farmers-fake-wont.html "After the 2008-09 loan waiver scheme, NABARD had recovered Rs 117 crore from banks and credit societies in Kolhapur district that were proved misappropriated. In fact, one fraudster had got Rs 82 lakh loan waiver." http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/over-10-lakh-bank-a/cs-for-farm-loan-waiver-fake-says-minister/articleshow/60487224.cms

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Fri, 09/29/2017 - 15:09
दहा लाख बोगस कर्जाची खाती आढळून आली आहेत. शेतकऱ्यांचा बोगस असा उल्लेख करून तुम्ही त्यांचा अपमान केला आहे. पाहिजे तर त्यांना अपात्र म्हणा, पण बोगस म्हणून अपमान करू नका. - इति दादात दादा अजितदादा

पुंबा Wed, 10/04/2017 - 11:50
यवतमाळमध्ये कापसाच्या पिकावर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन किमान १८ शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. मराठी पेपरं थंड आहेत. कदाचित यवतमाळला टिआरपी नसावा.
Farmers are forced to spray pesticides such as Profenofos as the crop is vulnerable to pests such as bollworm in the current weather, he said.
तर माझे प्रश्न खालीलप्रमाणे: १. बिटी बियाणे आले तेच मुळी किडीचा प्रादुर्भाव कमी होईल या आशेने? त्याचे काय झाले? २. किटकनाशके वापरण्यासंबंधीच्या सुचना देण्याचे काम कोणाचे असते? ते केले गेले का? ३. माणूस मरावा इतकी ही किटकनाशके विषारी असतील तर सरकीचे तेल, पेंड यामध्ये त्याचा अंश उतरत असेलच. जनावरांच्या दुधात त्याचे biomagnification होत असेलच. कि नाही? आणखीही माहिती असेल तर अवश्य द्यावी.

अमितदादा Wed, 10/04/2017 - 12:09
संधीसाधू दुटप्पीपणा आणि सोयीची हिंदुविरोधी सहिष्णूता! लेख बऱयाच अंशी पटलेला आहे. अवांतर:बहुदा काँग्रेस ला याची जाणीव झालेली दिसतेय, म्हणूनच कधीमधी मंदिराच्या पायऱ्या चढणारे काँग्रेस चे सर्वोच्च नेते आता सारख्या मंदिर प्रदक्षिणा घालू लागलेत. अति सौम्य हिंदुत्व चा पुरस्कार करणारी किंवा पूर्णपणे निधर्मी काँग्रेस पाह्यला आवडेल।

In reply to by अमितदादा

पुंबा Wed, 10/04/2017 - 12:16
लेख पटला..
पण इतर धर्मांच्या, विशेषतः इस्लामच्या विरोधात काहीही लिहिले तर त्याचे परिणाम हिंसेत होतात आणि तरीही त्याविरुद्ध पारंपारिक माध्यमे ब्र काढत नाहीत. केरळमध्ये प्राध्यापक टी.जे.जोसेफ यांच्या हाताचा पंजा काही मुसलमान धर्माधांनी छाटून टाकला. एका प्रश्नपत्रिकेत प्रेषितांविषयी वादग्रस्त प्रश्न विचारल्याबद्दल इस्लामी धर्माधांनी जोसेफ यांच्यावर हा हल्ला केला. पी एफ आय ह्या इस्लामी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. या संघटनेची दहशत केरळमध्ये इतकी आहे की टी.जे.जोसेफ ह्यांच्या पाठीशी ना सरकार उभे राहिले, ना चर्च. या प्रकारानंतर निराश होऊन त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. एका संपूर्ण कुटुंबाची अशी वाताहत होऊनदेखील देशातला लिबरल मीडिया जोसेफ यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. मागे महाराष्ट्रात एका वृत्तपत्राने आयसिसला पैसे कुठून येतात, हे दाखवण्यासाठी नुसतं "पिगी बॅंक' हे रेखाचित्र वापरलं होतं तर इस्लामी कट्टर संघटनांनी या वृत्तपत्राच्या औरंगाबाद कार्यालयावर मोर्चा आणला आणि संपादकांनी सपशेल शरणागती पत्करून माफी मागितली. तेव्हा या वृत्तपत्राने माफी मागणं चूक आहे, असं म्हणण्याचं धाडस स्वतःला "पुरोगामी विचारवंत' म्हणवणाऱ्या किती लोकांनी दाखवलं? कोलकत्त्याच्या टेरेसांना मिळालेल्या तथाकथित संतपदाच्या विरोधात अग्रलेख लिहीण्याचे धाडस दाखवणाऱ्या मराठी वृत्तपत्रावर छापलेला अग्रेलख "मागे घेण्याची' नामुष्की ओढवली. त्या वृत्तपत्राच्या संपादकांनाही माफी मागावी लागली. पण त्यांच्या बाजूने त्यांच्याच व्यवसायातले किती लोक बोलले?
:((

In reply to by अमितदादा

गामा पैलवान Wed, 10/04/2017 - 12:45
अमितदादा, खरंतर जुनी काँग्रेस अतिसौम्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी होतीच. सरदार पटेलांनी स्वातंत्र्योत्तर काळात सोमनाथाचं मंदिर जीर्णोद्धार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. १९७१ साली पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा काँग्रेसला हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श प्रस्थापित करायची सुवर्णसंधी होती. इंदिरा गांधी यांचं खरं नाव मैमुना बेगम खान. तर एक मुस्लीम महिला भारताच्या ५००० वर्षांच्या विजयाचा इतिहास सांगते आणि मुस्लीम राष्ट्राचे दोन तुकडे करते हा हिंदू अस्मितेचा विजय आहे. या विजयाच्या भक्कम पायावर पाकिस्तानचा वैचारिक पराभव करणं सहज शक्य होतं. मात्र काँग्रेसकडून ते झालं नाही. शीखांना दुखावल्यावरून इंदिरा गांधींची हत्या झाली. पुढे राजीव गांधींना प्रचंड बहुमत मिळूनही शाहबानो प्रकरणात मुल्लामौलवींसमोर सपशेल लोटांगण घातलं. अशा प्रकारे हिंदू सदिच्छांची विल्हेवाट लावण्यात आली. भारतातल्या बुद्धीजीवी वर्गाचा एक लाडका सिद्धांत आहे. तो म्हणजे मुस्लीम नेहमी एकगठ्ठा मतदन करतात. आणि दुसरा लाडका सिद्धांत म्हणजे हिंदू मतदार नेहमी विखुरलेला असतो. या दोन सिद्धांतांवर विसंबून मुस्लिमांची अधिकाधिक मते मिळवण्याच्या हव्यासातून काँग्रेस आणि सेक्युलर पक्षांकडून हिंदूंना दुखावणं सुरू झालं. १९८९ ते २००९ या वीस पंचवीस वर्षांच्या कालावधीत हे चित्रं जरी सर्वसामान्य असलं तरी या दोन्ही सिद्धांतांना पुरून उरेल असा प्रचार करता येऊ शकतो. तसा मोदींनी केला. हिंदूसुद्धा एकगठ्ठा मतदान करू शकतात हे काँग्रेसच्या हळूहळू ध्यानी येऊ घातलंय. हे सुचिन्ह आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by II श्रीमंत पेशवे II

विशुमित Wed, 10/04/2017 - 16:10
पेशवे , गा पै टणाटण प्रभात वाचतात आणि तुम्ही असली खतरनाक पुस्तके वाचता..! त्याखाल्लाच्या कंमेंट्स तर लाजवाब,,,, ... चरणामृत द्या, आमच्या मस्तकावर शिंपडतो.

In reply to by विशुमित

गामा पैलवान Wed, 10/04/2017 - 17:35
विशुमित, गरजूंसाठी खालील श्लोक म्हणतो आहे : सर्वेऽपि सुखिन: सन्तु सर्वे: सन्तु निरामया: सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दु:खमाप्नुयात (वरील श्लोकात कृपया चूक भूल देणे घेणे.) कोणाला कसली गरज पडेल ते सांगता येत नाही. पहाटे पहाटे काय टणाटण होतं ते सगळ्यांना ठाऊक आहे. पण मिपावरील काही लोकांचं ते होताहोता होत नाही. म्हणून हे लोकं 'टणाटण प्रभात' असा टाहो फोडीत हिंडत असतात. तुम्ही त्यांच्यातले होऊ नका. अशा वंचितांसाठी वरील श्लोक म्हंटला आहे. कृपया वैयक्तिक रीत्या घेऊ नये. धन्यवाद! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विशुमित Wed, 10/04/2017 - 18:34
ओके.. आम्ही कोणाच्याच बाजूचे नाही. जे स्वतःला नाही पटत त्यावर बोलणारच भले दुसऱ्याला पटो अगर न पटो... बिलकुल वैयिक्तक घेणार नाही. बाकी तुमच्या आवडीनिवडीचा आदर आहेच

In reply to by II श्रीमंत पेशवे II

अनन्त अवधुत गुरुवार, 10/05/2017 - 01:13
फिरोझ गांधी बाबत सुरुवात चुकीची आहे, मी पुढे काही वाचले नाही. फिरोझ गांधी हे गांधी म्हणूनच जन्माला आले होते. खान नाही. ते जन्माने पारशी होते, त्यांचे आई आणि वडील दोघे पण पारशी होते. विकी दुआ मी विकी वर अशा गोष्टींबाबत जास्त विश्वास ठेवतो कारण मला त्या पुस्तकाच्या सत्यतेची खात्री नाही. तिकडे कोणतेही विश्वासार्ह संदर्भ नाहीत. विकी वर संदर्भ दिले आहेत. तिथे लोक सतत बघत/ संपादित करत असतात.

In reply to by अनन्त अवधुत

श्रीगुरुजी गुरुवार, 10/05/2017 - 14:10
मी थोडीशी वेगळी हकीकत वाचली आहे. फिरोज गांधींचे मूळचे आडनाव घँडी असे होते. फिरोज मुस्लिम असल्याने इंदिराजींनी त्यांच्याबरोबर लग्न करण्यास नेहरूंचा विरोध होता. गांधीजींना धर्माच्या कारणावरून केलेला विरोध मान्य नव्हता. शेवटी गांधीजींनी फिरोजना स्वतःच्या मांडीवर बसवून दत्तक घेतले व त्यामुळे त्यांना स्वतःचे गांधी आडनाव दिले. त्यानंतर ते लग्न झाले. खरेखोटे खुदा जाने.

In reply to by श्रीगुरुजी

अनन्त अवधुत Fri, 10/06/2017 - 01:47
त्यामुळे फिरोज यांनी गांधी आडनाव वापरायला सुरुवात केली असे मी पण वाचले आहे. पण त्याला कसलाही विश्वास ठेवण्याजोगा पुरावा/ संदर्भ नाही.

In reply to by अमितदादा

सही रे सई Wed, 10/04/2017 - 23:04
लेखात लिहिलेली परिस्थिती खूप विचार करायला लावणारी आहे. पण हा लेख चक्क सकाळ सारख्या कॉंग्रेस धार्जिण्या वर्तमानपत्रात पाहून जरा धक्का बसला.

सुबोध खरे Wed, 10/04/2017 - 18:18
मुस्लीम नेहमी एकगठ्ठा मतदन करतात. या गैरभाजप पक्षीयांच्या आवडत्या गृहीतकाला उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत सुरुंग लागला आहे. जवळ जवळ २० टक्के मुसलमान मतदार असलेल्या उत्तर प्रदेशात एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट न देता भाजप ला एक हाती विजय मिळाल्यामुळे इतर सर्व पक्ष बावचळल्यासारखे झाले आहेत.

अमितदादा Wed, 10/04/2017 - 19:56
बरोबर यामुळे मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतात या गृहीतकाला उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत सुरुंग लागला, तसेच उत्तर प्रदेशात एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट न देता आणखी एका गृहीतकाला उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत सुरुंग लागला तो म्हणजे सबका साथ सबका विकास.

In reply to by अमितदादा

गामा पैलवान Wed, 10/04/2017 - 23:03
कसा काय बुवा? उलट तिहेरी तलाकच्या विरुद्ध जागृती घडवून विवाहित मुस्लिम स्त्रियांना दिलासा दिला आहे. -गा.पै.

In reply to by मार्मिक गोडसे

पुंबा गुरुवार, 10/05/2017 - 11:55
परदेशी पर्यटक असोत वा देशातले. उप्र मध्ये जातातच ते मुळी ताजमहाल पहायला. पर्यटनविषयक बुकलेटमधून ताजमहाल हटवणे म्हणजे फार मोठा हिंदुत्ववादी निर्णय आहे असं योगीला वाटत आहे. ताजमहाल भारतीय संस्कृतीचा भाग नाही असेदेखील तो म्हणाला होता. पण ह्या असल्या करंटेपणामुळे ना ताजमहालच्या सौंदर्यावर काही फरक पडेल ना लोकांच्या ताजमहालवरच्या प्रेमावर. ताजमहाल बांधला हिंदू(बहुतांश) कारागिरांनी, हिंदूंच्या(बहुतांश) कराच्या पैशातून. ताजमहाल हिंदू आणि मुस्लिम स्थापत्यकलेच्या संगमातून निर्माण झाला. असे असताना निव्वळ वेडगळ द्वेशातून असली चिंधीगिरी करणं टिपीकल योगीइश आहे.

In reply to by पुंबा

गामा पैलवान गुरुवार, 10/05/2017 - 12:08
सौरा, ताजमहाल शहाजहानने बांधला असा प्रवाद प्रचलित आहे. तो हिंदू प्रासाद आहे हे मान्य करणं अवघड. म्हणून त्याला विस्मृतीत ढकलायची योजना दिसते आहे. एकदा का लोकं विसरले की हळूच हिंदू मुळं शोधून प्रस्थापित करायची अशी व्यूहरचना दिसते आहे. आ.न., -गा.पै.

मराठी_माणूस Fri, 10/06/2017 - 09:45
http://www.loksatta.com/mumbai-news/electricity-shortage-in-maharashtra-part-2-1565012/ वरील बातमित एका ठीकाणी असे म्हटले आहे की "मात्र, मुंबईत वीजकपात होणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. " असे का ? http://epaper.loksatta.com/1383575/indian-express/06-10-2017#page/11/2 वरील बातमित एका ठीकाणी असे म्हटले आहे की मुलुंड , भांडुप मधे दोन तीन तासाहुन अधिक भार नियमन करावे लागले . हीच दोन ठीकाणे का निवडली ? एकंदरीत भार नियमनाचे निकष काय आहेत ?

In reply to by मराठी_माणूस

विशुमित Fri, 10/06/2017 - 14:45
चेपुवर रात्री धिंगाणा चालला होता की राज ठाकरेंचे भाषण कोणी टीव्हीवर पाहू नये म्हणून अख्या महाराष्ट्राची लाईट गुल केली आहे. प्रत्येक्षात हे भानियमन आहे हे आज समजले. --- आमच्या कडे काल १६ तास वीज नव्हती. आज सकाळी ८ वाजता गेलेली वीज दुपारी २ वाजता आली आहे आणि पुन्हा ४.३० वाजता जाऊन रात्री १०.३० वाजता येईल असा सांगावा धाडला आहे वीज मंडळाने (व्हाट्सअप ग्रुप वर). ऑक्टोबर हिट ने लहान मुले बेजार झाली आहेत. मोठ्या लोकांना कट काढता येईना ते लहान मुले काय सहन करणार! --- पण लहान थोरांनी हा त्रास सहन केलाच पाहिजे. देशासाठी एवढे सोसू शकत नाही म्हणजे काय ? ६० वर्ष सोसले मग आता सोसले म्हणून काय झाले? ---- राज्यात कृत्रिम वीज तुटवडा कसा निर्माण केला जातो आणि महागडी वीज विकत घेऊन कसे कंपन्यांचा फायदा करून दिला जातो, याचं विश्लेषण सध्याचे मिस्टर क्लीन चिटर अगोदर घसा फाटेपर्यंत करत असायचे. पण त्यांच्या दृष्टीने आता हा प्रश्न फालतूच! दखलपात्र सुद्धा नाही!

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 15:17
शेतकऱ्यांकडे असलेली वीजबिलाची थकबाकी आता १८००० कोटींच्या पलिकडे गेली आहे. भारनियमन अटळ आहे. शेतकऱ्यांच्या थकबाकीचे परिणाम इतरांना सुद्धा सहन करावे लागणार.

In reply to by श्रीगुरुजी

मार्मिक गोडसे Fri, 10/06/2017 - 16:37
शेतकऱ्यांकडे असलेली वीजबिलाची थकबाकी आता १८००० कोटींच्या पलिकडे गेली आहे. भारनियमन अटळ आहे. भारनियमन केल्याने थकबाकी कशी वसूल होणार आहे? मुळात ही थकबाकी झालीच कशी?

In reply to by मार्मिक गोडसे

विशुमित Fri, 10/06/2017 - 16:59
भारनियमन केल्याने थकबाकी कशी वसूल होणार आहे?>> ==>> त्यांच्या कडे सुपीक डोके आहे. मुळात ही थकबाकी झालीच कशी?>> ==>> गांजा पिउन काम करत असतील या खात्यातील लोक. त्यात त्यांची तळी उचलायला YZ लोक आहेतच शेतकऱ्यांवर बिल फाडायला. ह्यांच्या कडे लाईट आहे ना, यांच्या बुडाला गार लागले ना मग मरु देत बाकी जनता. चाटूगिरी काय सोडणार नाहीत.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Sat, 10/07/2017 - 00:07
शेतकर्‍यांना पेटवायला बरेच 'जाणते', 'नेणते' राजे आणि बच्चे आहेत. बिल थकविणार्‍यांच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याने महामंडळ फारशी कारवाई करू शकत नाही. महामंडळाने कारवाई करण्याचा प्रयत्न केलाच तर अधिकार्‍यांना मारहाण करून पळवून लावणे, कार्यालयात कोंडून ठेवणे अशी गुंडगिरी चालते. आमच्याकडे वीज आहे कारण आम्ही बिले वेळेवर भरतो. आपण वीज वापरली तरी बिल भरायचे नाही व आपल्या थकलेल्या बिलाची रक्कम इतर करदात्यांच्या करातून/शुल्कातून वसूल करायची असले प्रकार आम्ही करीत नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

arunjoshi123 Fri, 10/06/2017 - 17:13
भारनियमन केल्याने थकबाकी कशी वसूल होणार आहे?
१० पोळ्या खाल्ल्याने अतिसेवन झाल्याने जेवण थांबवले असं ते विधान आहे. जेवण थांबल्याने अतिसेवन कसं जाणार हा प्रश्न असयुक्तिक आहे.
मुळात ही थकबाकी झालीच कशी?
त्यावेळेस आपण वेताचे फोक घेऊन चौकात नव्हतात. तेव्हा आपल्या लाडक्या मनमोहन सिंग यांच्या प्रणित सरकारांनी कितीही थकबाकी झाली तरी शेतकर्‍यांची वीज कापायची नाही असा नियम केला. आता तुम्हाला म्हणायला आवडेल कि आता तर तुमचे (आमचे आवडते) सरकार आहे, त्यांनी लाड का चालू ठेवले? तर त्याचं कायय, आमच्या लाडक्या सरकारने जर पैल्याच दिवशी मागचे सगळे कायदे कानून रद्द केले असते तर वेताच्या फोकासोबत तुम्ही आजून काय काय घेऊन चौकात थांबला असतात. =============================== अजाण लोकांनी वेताचे फोक काय प्रकरण आहे हे जाणण्यासाठी "ये अच्छी बात नहीं है" ही पोस्ट वाचावी.

In reply to by arunjoshi123

विशुमित Fri, 10/06/2017 - 17:38
12 तास भार नियमन?? ... याला फक्त शेतकऱ्यांची थकबाकीच कारणीभूत आहे हे कोणत्या आधारावर ठरवले प्रतिसाद कर्त्याने ? --- आम्ही इथल्या वीज कर्मचाऱ्यांना विचारले तर कमी वीज निर्मिती कारण आहे हे उत्तर मिळाले. --- मागच्या सरकारची सारंगी वाजवणे बंद करा. --- लाईट नसल्यामुळे होणारे नुकसानाने प्रतिसाद कर्त्याच्या पितरांचे काय जाणार आहे ? --- किती ही पदर घेतले तरी मकेच्या कंसासारखी उघडी राहणारच आहेत. ते काय तुम्ही झाकू शकत नाही. तुमची गोलगोल चर्चा चालू द्यात.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 17:54
उत्पन्न कमी झाले की आपोआप उत्पादन कमी होते. आपण भरपूर वीज वापरून सुद्धा वापरलेल्या विजेची किंमत दिली नाही तर निदान आपल्या पितरांचे तरी काहीही जाणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित Fri, 10/06/2017 - 18:12
काय बंडल मारताय! ही घ्या लोड शेडींग ची कारणे. त्यात कुठे ही शेतकरी थकबाकीचा उल्लेख नाही आहे. तुमची उघडली पडली आहेत. ती झाकण्यासाठी तुम्ही अजून १० पदर ओढणार यात तिळमात्र शंका नाही. --- http://www.mahadiscom.in/interpole_upload/DAS_and_LS.pdf

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 23:59
कोणत्याही देशात वेगवेगळ्या प्रकारची जनता असते. एखाद्या शहरातील सर्वच जण एकाच परिस्थितीत नसतात. शहरातील काही भागातील नागरिक शहरासाठी व देशासाठी कररूपाने भरपूर महसूल देतात. याउलट काही भागातून होणारे करसंकलन फारसे नसते. त्यामुळे शहरातील नगरपालिका शहरावर जो खर्च करते त्यातील बराचसा भाग हा कररूपाने भरपूर योगदान देणार्‍या भागासाठी वापरला जातो व ज्या भागातून फारसे उत्पन्न नाही त्या भागासाठी खर्च करताना हा आखडता घेतला जातो. अर्थात हे धोरण लिखित स्वरूपात नसते, परंतु तरीही ते राबविले जाते. त्यामुळेच उदाहरणार्थ न्यूयॉर्क सारख्या शहरात अगदी कमी उत्पन्न असलेल्या भागातील रस्ते, स्वच्छता इ. फारशी चांगली नसते कारण या भागातून करसंकलन फारसे होत नाही व त्यामुळे नगरपालिका या भागातील सोयीसुविधांवर पैसे खर्च करताना हात आखडता घेते. महाराष्ट्रात शेतकरी खेडोपाडी पसरले आहेत. शहरातून साधारणपणे नोकरी, व्यवसाय करणारेच जास्त प्रमाणात आहेत. शहरात राहणार्‍या सर्वसामान्य नागरिकाला वीजबिल थकविणे खूप अवघड असते. सलग २ महिन्यांचे बिल भरले नाहीत तर तिसर्‍या महिन्यात वीजजोडणी खंडित केली जाते. त्यामुळे शहरातून वीजबिल भरण्याचे प्रमाण बरेच जास्त आहे. खेड्यात बहुसंख्य शेतकरी आहेत. २-३ महिन्यापूर्वी आलेल्या अहवालानुसार ९०% शेतकर्‍यांची वीजबिले थकीत असून एकूण थकीत आकडा १८,००० कोटी रूपयांच्या वर गेला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा वीजेच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी पडतो, तेव्हा भारनियमन खेड्यातून जास्त प्रमाणात केले जाते. याचे कारण म्हणजे शहरातील ग्राहकांकडूनच बर्‍याच प्रमाणात वीजबिलांची वसुली होते व त्यामुळे त्यांना कमी त्रास व्हावा हा उद्देश असतो. खेड्यातून थकबाकीचे प्रमाण खूप जास्त असल्याने भारनियमनाचा बराचसा भार त्यांच्यावरच थोपला जातो. वर लिहिल्याप्रमाणे न्यूयॉर्कसारख्या शहरात ज्या भागातून करसंकलन कमी आहे तिथे सुविधांवर फारसा खर्च केला जात नाही व जिथून मोठ्या प्रमाणात कर मिळतो त्या भागांमध्येच बहुतांशी सुविधा दिल्या जातात. हे धोरण लिखित स्वरूपात नसते, परंतु सर्वत्र ते असेच राबविले जाते. वीज महामंडळाने अधिकृत कारणे कोणतीही दिली तरी जेव्हा भारनियमनाची वेळ येते तेव्हा जास्त भारनियमन खेड्यातून केले जाते व शहरात होणारे भारनियमन तुलनेने कमी असते. याचे कारण वर दिल्याप्रमाणेच आहे.

In reply to by विशुमित

मार्मिक गोडसे Fri, 10/06/2017 - 17:55
IT सेल बंद झाल्यापासून ते काहीबाही बरळू लागले आहेत. शेतकरी हा त्यांचा लाडका शत्रू असल्याने लाडक्या सरकारच्या अपयशाला शेतकऱ्यास जबाबदार ठरवायचे हा ह्यांचा लाडका खेळ झाला आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 23:40
हा आयटी सेल वगैरे नक्की काय आहे याची आम्हास कल्पना नाही. सध्याचे सरकार आमचे लाडके आहे व ते अपयशी नसून चांगलेच यशस्वी आहे. या सरकारवर भुंकणारे कोणकोण आहेत हे पाहिले की सरकार किती यशस्वी आहे हे लगेच समजते. मुळात सरकार यशस्वी असल्याने अपयशास शेतकरी किंवा इतर कोणालाही जबाबदार असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मार्मिक गोडसे Tue, 10/10/2017 - 15:18
या सरकारवर भुंकणारे कोणकोण आहेत हे पाहिले की सरकार किती यशस्वी आहे हे लगेच समजते. हे ही आता यशस्वी सरकारवर भुंकायला लागलेत.

In reply to by arunjoshi123

मार्मिक गोडसे Fri, 10/06/2017 - 17:39
आमच्या लाडक्या सरकारने जर पैल्याच दिवशी मागचे सगळे कायदे कानून रद्द केले असते तर वेताच्या फो तूकासोबत तुम्ही आजून काय काय घेऊन चौकात थांबला असतात अच्छा म्हणजे कायदा - सुव्यवस्था राखण्यात 'लाडके सरकार ' अपयशी ठरले असं म्हणायचं आहे का तुम्हाला?

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 23:37
प्रयत्न करून पहा. असा अनेकांनी आजवर प्रयत्न केला. पण ते स्वतःच कोठे भिरकावले गेले हे समजले सुद्धा नाही.

In reply to by विशुमित

arunjoshi123 Fri, 10/06/2017 - 18:13
एखाद्या नीच/वाईट/कु (जे काय ते) वृत्तीचे समर्थन करण्यात भला आमचा काय फायदा असू शकतो? काय प्रेरणा असू शकते? =================== यात असं देखिल आहे का कि मोदी हे कुप्रवृत्तींत मोडतात आणि असं ज्ञान आम्हाला आहे तरी पण आम्ही असं करतो? मंजे आमच्यात वृत्ती आणि बुद्धी दोन्हींचा प्रोब्लेम आहे का फक्त बुद्धीचा?

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 23:35
मागो शेठ कुठे नादी लागता यांच्या, हे सगळे "फेकू" समर्थक आहेत. आयुष्यभर भ्रष्टाचार करणार्‍या व जातीय विद्वेषाच्या काड्या लावणार्‍यांचे "राजा"चे आंधळे भक्त असण्यापेक्षा कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार न करता देशाला पुढे नेण्यासाठी अहोरात्र काम करणार्‍या व्यक्तीचे समर्थक असणे कधीही अनेक पटीने चांगले.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित Mon, 10/09/2017 - 11:41
पहिले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा मग मनातला कंड शमवा..!! राहिला प्रश्न भक्तीचा,वयक्तिक आयुष्यात मी जरी पवार समर्थक (तुम्ही भक्त म्हणा, मला फरक पडत नाही) असलो तरी मिपावर मी पवार/राष्ट्रवादी समर्थक म्हणून प्रतिक्रिया देत नाही ना माझी भक्ती इतरांवर लादत असतो. मिपाचा वापर करून लोक कोण्या पक्ष्याचे मीडिया सेल चालवतात हे जगजाहीर झाले आहे. स्वतः अहोरात्र कष्ट उपसणाऱ्याचे समर्थक आहेत हे पण डिकलर केलेत. फक्त त्यांची तळी उचलण्यापूर्वी इतरांवर बेछूट आरोप करणे आणि तुमच्या अवतारी देवाचा नाकर्तेपणा इतरांवर लादू नका ही कळकळीची विनंती..!!

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Mon, 10/09/2017 - 14:05
आमच्या मनात कंड वगैरे अजिबात नाही. असलाच तर तो तुमच्याच मनात असेल. चिक्की घोटाळा, तूर घोटाळा वगैरेंचा वर उल्लेख झाला तेव्हा मी हेच म्हणत होतो की पत्रकार परीषदेत किंवा विधानसभेत भ्रष्टाचारांचे आरोप करण्यापेक्षा न्यायालयात जा व आरोप सिद्ध करा. इथे तुम्हीही तेच म्हणत आहात. माझे म्हणणे तुम्हाला पटलेले दिसते. बाकी मी पवारांचे नाव घेतले नाही तरीसुद्धा तुम्हाला ते बरोबर समजलेले दिसते. नाव घेण्याची आवश्यकताच नसते. महाराष्ट्रातील सर्वाधिक भ्रष्टाचारी व सर्वाधिक जातीय विद्वेषाच्या काड्या टाकणारी व्यक्ती कोण हे नाव न सांगताही सर्वांच्या लक्षात येते. बादवे, "पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे. पण आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात." अशी जातीय काडी काही महिन्यांपूर्वी टाकून आग भडकाविण्याचा प्रयत्न करणारे एक थोर, "जाणते" नेते ३-४ दिवसांपूर्वीच सातारा-कराड या भागात राजकीय भूकंप करण्यासाठी गेले होते (मुंगीने उडी मारल्यावर जितकी जमीन हादरेल तितकी जमीनसुद्धा या भूकंपाने हादरली नाही हे अलाहिदा). त्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य छत्रपती करीत होते. पेशव्यांनी छत्रपतींची नेमणूक करण्याच्या तुलनेत छत्रपतींना सारथी बनविणे हे जास्त अवमानकारक नाही का?

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित Mon, 10/09/2017 - 14:50
आमच्या मनात कंड वगैरे अजिबात नाही. >> ==>> मग चांगले आहे. बाकी मी पवारांचे नाव घेतले नाही तरीसुद्धा तुम्हाला ते बरोबर समजलेले दिसते. नाव घेण्याची आवश्यकताच नसते. >> ==>> मी तरी "राजा" शब्दावरून ओळखले की तुम्हाला शरद पवार म्हणायचे आहे ते. "फेकू" म्हंटल्यावर व्यक्ती कोण हे नाव न सांगताही तुमच्या लक्षात आले अगदी तसेच म्हणा. पेशव्यांनी छत्रपतींची नेमणूक करण्याच्या तुलनेत छत्रपतींना सारथी बनविणे हे जास्त अवमानकारक नाही का?>>> ==>> हे मला कशाला विचारता ? "राजां"ना जाऊन विचारा. बादवे "छत्रपतींना सारथी बनविणे" म्हणजे की " मी मागे बसणार आहे आणि तुम्हाला गाडी चालवावी लागणार आहे" असे काही पवार उदयनराजेंना म्हणाले का ? गाडी छत्रपतींची, जे ते सहसा स्वतः बुंगाट चालवतात. ते घडाळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या त्यांच्या पेक्षा बुजुर्ग असणाऱ्याला चालवायला कसे देतील? त्यात एवढे समजायला कॉमन सेन्स ची सुद्धा आवश्यकता नसावी बहुदा..! गाडी कोणाची रुबाब कोणाचा..!!

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Mon, 10/09/2017 - 15:04
महाराष्ट्रात स्वयंघोषित राजे बरेच आहेत. त्यातल्या कोणाचेही नाव न घेतासुद्धा तुमच्या मनात केवळ हेच नाव कसे आले? बाकी फेकू म्हणजे कोण हे मला समजलेले नाही. छत्रपती बुंगाट चालवू देत नाही तर टुकुटुकु चालवू देत, ज्याला छत्रपतींची नेमणूक पेशव्यांनी करणे सहन झाले नाही त्याने छत्रपतींच्या पायापाशी बसून मुजरा करण्यापेक्षा छत्रपतींच्या मांडीला मांडी खेटून बसणे आणि छत्रपतींना सारथ्य करावयास लावणे हा निव्वळ छत्रपतींचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित Mon, 10/09/2017 - 15:25
बरं जाऊ द्या, तुम्हाला नाही झेपायचे !! बादवे छत्रपती तर सगळ्यांच्या बरोबर बसून भाकर तुकडा खायचे आणि खांद्याला खांदा देऊन लढायचे. 'पानिपत' सारखी अस्पृश्याच्या वेग वेगळ्या चुली नव्हते मांडत. (अजून 'बारा' पदर घेतले ना तरी उघडीच राहणार आहेत. वरून 'बारा'मतीच्या नावाने शंख करतील. चालायचे..!)

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Mon, 10/09/2017 - 15:36
सगळ्यांच्या बरोबर बसून भाकर तुकडा खाणारे आणि खांद्याला खांदा देऊन लढणारे ते छत्रपती वेगळे. हे छत्रपती सगळ्यांबरोबर बसून ग्लासाला ग्लास लावून काय करतात ते सांगण्याची गरज नाही. मुळात ज्या राजांना छत्रपतींची पेशव्यांनी नेमणूक केल्याचा अपमान सहन झाला नाही त्यांनी छत्रपतींच्या मांडीला मांडी लावून बसून छत्रपतींनाच सारथ्य करायला लावून निव्वळ छत्रपतींचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित Mon, 10/09/2017 - 18:07
हे छत्रपती सगळ्यांबरोबर बसून ग्लासाला ग्लास लावून काय करतात ते सांगण्याची गरज नाही.>> ==>> तुम्ही कोठे पाहिले ग्लासला ग्लास लावलेले ? अशा ग्लासातल्या सर्वपक्षीय पार्ट्या चिकार होत असतात. वृत्तपत्रात येत नाहीत फक्त त्या. मुळात ज्या राजांना छत्रपतींची पेशव्यांनी नेमणूक केल्याचा अपमान सहन झाला नाही त्यांनी छत्रपतींच्या मांडीला मांडी लावून बसून छत्रपतींनाच सारथ्य करायला लावून निव्वळ छत्रपतींचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे.>>> ==>> अपमान वगैरे खूपच अतिरंजित शब्द वापरून आणि तीच तीच गोष्ट हजार वेळा सांगण्याची गोबेल्स नीती तुमच्यावरच उलटू नये म्हणजे झाले. नाम साधर्म्य असल्या कारणाने ते फक्त रूपक होते हे पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिलेले आहेच. सध्याचे फडणवीस ब्राह्मण आहेत ना म्हणून ब्राहमण्यवादी कंठ दाटून आला आहे. बाकी काही कारण नाही. --- मला या बातमी बद्दल सविस्तर माहिती नव्हती. मला वाटले गाडी उदयनराजेंची होती, पण गाडी पवारांची होती वाटते. वृत्तपत्रीय कात्रणात (लिंक) पाहिले तर गाडी त्यांचा ड्राइवर चालवत होता, उदयनराजे पुढच्या सीट वर बसले होते आणि पवार साहेब मागे बसले होते. मग गाडीत मांडीला मांडी लावून कसे काय बसलेले दिसले गुरुजी/पत्रकारांना काय माहित? ड्राइवर गाडी चालवत होता तर वृत्तपत्रात उदयनराजे सारथ्य करत होते हे कसे काय छापले? (आणखी कोणाकडे लिंक असेल तर कृपया द्या, ज्या मध्ये उदयनराजे गाडी चालवत आहेत) वृत्तपत्रीय बातम्यावरच विश्वास ठेवणाऱ्या गुरुजींसारख्या लोकांचे त्यामुळेच गैरसमज होतो आणि पवारांना दूषणे देण्याचा कंड उफाळून येतो. आमच्यासारख्याना भक्ताची लेबल चीटकवण्यात येतात. --- http://www.loksatta.com/maharashtra-news/udayanraje-and-sharad-pawar-traveled-together-from-pune-to-satara-1564202/ http://www.hindustantimes.com/pune-news/sharad-pawar-udayanraje-s-pune-satara-trip-raises-eyebrows-in-political-circle/story-epyFBcYGasdgPD0YvDkvLM.html

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Mon, 10/09/2017 - 23:36
तुम्ही कोठे पाहिले ग्लासला ग्लास लावलेले ? अशा ग्लासातल्या सर्वपक्षीय पार्ट्या चिकार होत असतात. वृत्तपत्रात येत नाहीत फक्त त्या. त्यांना तर्र अवस्थेत आम्ही वाहिन्यांवर पाहिले आहे. ==>> अपमान वगैरे खूपच अतिरंजित शब्द वापरून आणि तीच तीच गोष्ट हजार वेळा सांगण्याची गोबेल्स नीती तुमच्यावरच उलटू नये म्हणजे झाले. नाम साधर्म्य असल्या कारणाने ते फक्त रूपक होते हे पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिलेले आहेच. सध्याचे फडणवीस ब्राह्मण आहेत ना म्हणून ब्राहमण्यवादी कंठ दाटून आला आहे. बाकी काही कारण नाही. कसले नामसाधर्म्य? आपल्या जातीय काडी टाकणार्‍या विधानाचे पवारांनी स्पष्टीकरण दिल्याचे वाचनात नाही. नेमक्या निवडणुकांच्या काळात अशी काडी लावण्याचा उद्देश लपून राहत नाही. एकदा निवडणुक संपल्यानंतर किंवा प्रकरण अंगावर आल्यानंतर स्पष्टीकरण दिल्यास त्यात अर्थ नसतो. फडणवीस मुख्यमंत्री नव्हते त्या काळात सुद्धा पवार जातीयवादी काड्या लावितच होते. सध्याचे फडणवीस ब्राह्मण आहेत, म्हणून ब्राहमण्यवादी कंठ दाटून आला आहे असा समज चुकीचा आहे. मला या बातमी बद्दल सविस्तर माहिती नव्हती. मला वाटले गाडी उदयनराजेंची होती, पण गाडी पवारांची होती वाटते. वृत्तपत्रीय कात्रणात (लिंक) पाहिले तर गाडी त्यांचा ड्राइवर चालवत होता, उदयनराजे पुढच्या सीट वर बसले होते आणि पवार साहेब मागे बसले होते. मग गाडीत मांडीला मांडी लावून कसे काय बसलेले दिसले गुरुजी/पत्रकारांना काय माहित? ड्राइवर गाडी चालवत होता तर वृत्तपत्रात उदयनराजे सारथ्य करत होते हे कसे काय छापले? (आणखी कोणाकडे लिंक असेल तर कृपया द्या, ज्या मध्ये उदयनराजे गाडी चालवत आहेत) वृत्तपत्रीय बातम्यावरच विश्वास ठेवणाऱ्या गुरुजींसारख्या लोकांचे त्यामुळेच गैरसमज होतो आणि पवारांना दूषणे देण्याचा कंड उफाळून येतो. आमच्यासारख्याना भक्ताची लेबल चीटकवण्यात येतात. मांडीला मांडी लावून बसणे म्हणजे समान पातळीवर बसणे. ज्यांना छत्रपतींची नेमणूक पेशव्यांनी केल्याचे इतके तीव्र दु:ख झाले, त्यांनी छत्रपतींबरोबर एकाच गाडीत बसणे (आणि तेसुद्धा छत्रपती पुढे आणि हे मागे अशा जास्त अपमानास्पद स्थितीत) हे छत्रपतींचा अपमान करण्यासारखेच आहे. बादवे, या प्रवासाची एक चित्रफीत पाहिली. पवार आणि उदय बसलेली गाडी जवळ येताच आजूबाजूला उभ्या असलेल्या रिकामटेकड्यांपैकी २-३ जणांनी गाडी त्यांच्या जवळून जाताना गाडीकडे पाहून खाली वाकून मुजरा केला. हे दृश्य पाहून सखेद धक्का बसला.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित Tue, 10/10/2017 - 11:33
त्यांना तर्र अवस्थेत आम्ही वाहिन्यांवर पाहिले आहे.>>> ==>> ते तर्र आहेत हे कसे काय समजले? टीव्ही वर वास आला का ? आपल्या जातीय काडी टाकणार्‍या विधानाचे पवारांनी स्पष्टीकरण दिल्याचे वाचनात नाही.>>> ==>> वाचनाबरोबर परिसर अभ्यास पण वाढवा. काडी लावण्याचा उद्देश लपून राहत नाही>>> ==>> ब्राह्मण्यवादाचा उद्देश पण तुम्हाला काही केल्या लपवून ठेवता येत नाही. मांडीला मांडी लावून बसणे म्हणजे समान पातळीवर बसणे.>>> ==>> आम्ही "फडणवीस" शब्दाचं लॉजिक सांगितले ते तुम्हाला पटले नाही आणि तुमचे लॉजिक आम्ही मान्य करावे ? ज्यांना छत्रपतींची नेमणूक पेशव्यांनी केल्याचे इतके तीव्र दु:ख झाले, त्यांनी छत्रपतींबरोबर एकाच गाडीत बसणे (आणि तेसुद्धा छत्रपती पुढे आणि हे मागे अशा जास्त अपमानास्पद स्थितीत) हे छत्रपतींचा अपमान करण्यासारखेच आहे.>>> ==>> दोन्ही राजे बघून घेतील. ज्याला जास्त त्रास झाला असेल त्याने उदयनराजेंचे कान फुंकावे. हाय काय आणि नाय काय. (पण मुजरा करून जावे लागते बरका त्यांच्या राजवाड्यात.) गाडी जवळ येताच आजूबाजूला उभ्या असलेल्या रिकामटेकड्यांपैकी २-३ जणांनी गाडी त्यांच्या जवळून जाताना गाडीकडे पाहून खाली वाकून मुजरा केला. हे दृश्य पाहून सखेद धक्का बसला.>>> ==>> असे रिकामटेकडे "अच्छे दिन" येतील म्हणून हुजरेगिरी करायला लाखांनी पडलेत. ज्याची त्याची भक्ती..!!

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Tue, 10/10/2017 - 16:59
ते तर्र आहेत हे कसे काय समजले? टीव्ही वर वास आला का ? ते बरोबर समजतं. रूग्णाने डॉक्टरसमोर ढोसली नाही तरी रूग्ण ढोसतो हे डॉक्टरला समजतं. त्यासाठी वास घ्यायची गरज नसते. हे सुद्धा अगदी तसंच. वाचनाबरोबर परिसर अभ्यास पण वाढवा. परिसर अभ्यास? ब्राह्मण्यवादाचा उद्देश पण तुम्हाला काही केल्या लपवून ठेवता येत नाही. पवारांच्या जातीय काड्यांबद्दल लिहिणे म्हणजे ब्राह्मण्यवादाचा उद्देश? आम्ही "फडणवीस" शब्दाचं लॉजिक सांगितले ते तुम्हाला पटले नाही आणि तुमचे लॉजिक आम्ही मान्य करावे ? काय होतं फडणवीस शब्दाचं लॉजिक? आमचं लॉजिक तुम्ही मान्य करावे असा हट्ट नाही. दोन्ही राजे बघून घेतील. ज्याला जास्त त्रास झाला असेल त्याने उदयनराजेंचे कान फुंकावे. हाय काय आणि नाय काय. (पण मुजरा करून जावे लागते बरका त्यांच्या राजवाड्यात.) बरोबर. छत्रपतींची नेमणूक पेशव्यांनी केली असेल तर ते पेशवे आणि छत्रपती बघून घेतील. बारामतीकरांनी त्यांचे कान फुंकण्याची आणि काडी लावण्याची गरज नव्हती. बादवे, ज्यांना पत्त्यांच्या कॅटमधील राजाएवढी सुद्धा किंमत नाही अशा राजांना किंवा इतर कोणालाही आम्ही मुजरा करीत नाही. असे रिकामटेकडे "अच्छे दिन" येतील म्हणून हुजरेगिरी करायला लाखांनी पडलेत. ज्याची त्याची भक्ती..!! अजूनही महाराज, छत्रपती, युवराज, राजे, श्रीमंत अशातच जे रिकामटेकडे अडकून पडलेत अशांना अच्छे दिन कधीही येणे शक्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित Tue, 10/10/2017 - 18:02
रूग्णाने डॉक्टरसमोर ढोसली नाही तरी रूग्ण ढोसतो हे डॉक्टरला समजतं>>> ==>> ये लॉजिक कुछ हजम नही हुआ. परिसर अभ्यास?>> ==>> आय टी सेल च्या बाहेर बरीच खरी माहिती मिळते. पवारांच्या जातीय काड्यांबद्दल लिहिणे म्हणजे ब्राह्मण्यवादाचा उद्देश?>> ==>> जाणून बुजून केलेला अप्रचार आहे. घीसेपीटे कॅसेट पुन्हा वाजवले जाईल. काय होतं फडणवीस शब्दाचं लॉजिक?>>> ==>> पूर्वी छत्रपती 'फडणवीस' नेमायचे आता फडणवीसांनी छत्रपतीना नेमले. त्या काळी फडणवीस वेगळी संज्ञा होती आणि आता ते विशेष नाम आहे एवढाच काय तो फरक. आमचं लॉजिक तुम्ही मान्य करावे असा हट्ट नाही.>>> ==>> तुमचा हट्ट पुरवायला आम्ही 'कथित' अच्छे दिन चे याचक नाहीं आहोत. बादवे, ज्यांना पत्त्यांच्या कॅटमधील राजाएवढी सुद्धा किंमत नाही अशा राजांना किंवा इतर कोणालाही आम्ही मुजरा करीत नाही.>>> ==>> फक्त हुजरेगिरी जमते. अजूनही महाराज, छत्रपती, युवराज, राजे, श्रीमंत अशातच जे रिकामटेकडे अडकून पडलेत अशांना अच्छे दिन कधीही येणे शक्य नाही.>>> ==>> अजून अच्छे दिन मध्ये अडकून पडलेल्या रिकामटेकड्यांची दया येते.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Wed, 10/11/2017 - 15:04
ये लॉजिक कुछ हजम नही हुआ. चालायचंच. आय टी सेल च्या बाहेर बरीच खरी माहिती मिळते. आय टी सेल म्हणजे काय? जाणून बुजून केलेला अप्रचार आहे. घीसेपीटे कॅसेट पुन्हा वाजवले जाईल. पवारांनी टाकलेल्या जातीयवादी काड्या ही वस्तुस्थिती आहे, अपप्रचार नाही. तुमचा हट्ट पुरवायला आम्ही 'कथित' अच्छे दिन चे याचक नाहीं आहोत. याचकच गाडी बघायला ताटकळत उभे असतात आणि गाडी जवळून जाताना कंबरेत वाकून मुजरे करतात. फक्त हुजरेगिरी जमते. आम्ही कोणाचीच हुजरेगिरी करीत नाही. हुजरेगिरी करायला आम्ही या तथाकथित महाराजांची प्रजा नाही. म्हणून तर आम्ही यांच्यासाठी श्रीमंत, युवराज, छत्रपती, महाराज असली हुजरेगिरीची विशेषणे वापरीत नाही. अजून अच्छे दिन मध्ये अडकून पडलेल्या रिकामटेकड्यांची दया येते. चडफड समजू शकते. परंतु आता इलाज नाही. तुमचे महाराज, छत्रपती, युवराज, पोशिंदे, जाणते/नेणते राजे इ. चे दिवस संपले आहेत (खरं तर भरले आहेत हा शब्दप्रयोगे जास्त चपखल दिसेल).

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित Wed, 10/11/2017 - 16:34
चालायचंच.>>> ==>> अजून किती दिवस फेकणार आहात. आय टी सेल म्हणजे काय?>> ==>> एकच मिपा आयडी ३ लोक चालवतात, पूर्वी असे वाचले होते. पवारांनी टाकलेल्या जातीयवादी काड्या ही वस्तुस्थिती आहे, अपप्रचार नाही.>>> ==>> चोराच्या मनात चांदणे म्हणतो ना तशी गत झाली आहे तुमची. याचकच गाडी बघायला ताटकळत उभे असतात आणि गाडी जवळून जाताना कंबरेत वाकून मुजरे करतात.>>> ==>> आम्ही वामनासारखे याचक नाही आहोत. बळीराजा आहोत. (कर्जमाफी चा पदर घेतील पहा आता) आम्ही कोणाचीच हुजरेगिरी करीत नाही. ==>> जोक ऑफ थे इयर हुजरेगिरी करायला आम्ही या तथाकथित महाराजांची प्रजा नाही.>>> ==>> मग अवतारी पुरुषाचे भक्त ? म्हणून तर आम्ही यांच्यासाठी श्रीमंत, युवराज, छत्रपती, महाराज असली हुजरेगिरीची विशेषणे वापरीत नाही.>>> ==>>व्यवहारी भाषेत वापरले असतील शब्द कुठे कुठे. पण स्वमर्जीतल्या लोकांचेच कसे उदोउदो होईल यात तुमचा हात पकडणे मुश्किल आहे. तुमचे मिस्टर क्लीन चीटर तर "आम्ही छत्रपतींचे (संभाजी) सेवक' असली विशेषणे वापरत होते. तेव्हा मुख्यमंत्री पदाची थोडी तरी आबा राखायची होती . चडफड समजू शकते.>>> ==>> "शकते" ?? श्री गुरुजी तुम्ही अनाहिता तर नाही आहात ना? अजाणतेपणी उगीच काही गैर-शब्द जायचे. तसे काही असेल तर मला बऱ्याच ठिकाणी माझ्या प्रतिक्रिया एडिट कराव्या लागतील. तुमचे महाराज, छत्रपती, युवराज, पोशिंदे, जाणते/नेणते राजे इ. चे दिवस संपले आहेत .>>> ==>> यापैकी आमचे कोणीच नाहीत हो. कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आमच्या मनाचे 'राजे' आहोत." (खरं तर भरले आहेत हा शब्दप्रयोगे जास्त चपखल दिसेल)>>> ==>> तुमची तळमळ समजली. "देव तरी त्याला कोण मारी" वाचले होते कोठेतरी.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Wed, 10/11/2017 - 18:05
अजून किती दिवस फेकणार आहात. फेकणार??? एकच मिपा आयडी ३ लोक चालवतात, पूर्वी असे वाचले होते. ???? चोराच्या मनात चांदणे म्हणतो ना तशी गत झाली आहे तुमची. कमाल आहे! काड्या टाकणार पवार आणि चांदणे मात्र आमच्या मनात!! आम्ही वामनासारखे याचक नाही आहोत. बळीराजा आहोत. (कर्जमाफी चा पदर घेतील पहा आता) वाचून हसायला आलं. पोशिंदा, अन्नदाता हे शब्दसुद्धा वापरले असते तर अजून हसलो असतो. जोक ऑफ थे इयर थे?? मग अवतारी पुरुषाचे भक्त ? जसे आम्ही कोणाचेही हुजरे नाही तसेच आम्ही कोणाचेही भक्त नाही. व्यवहारी भाषेत वापरले असतील शब्द कुठे कुठे. पण स्वमर्जीतल्या लोकांचेच कसे उदोउदो होईल यात तुमचा हात पकडणे मुश्किल आहे. तुमचे मिस्टर क्लीन चीटर तर "आम्ही छत्रपतींचे (संभाजी) सेवक' असली विशेषणे वापरत होते. तेव्हा मुख्यमंत्री पदाची थोडी तरी आबा राखायची होती . व्यवहारी भाषेत सुद्धा गुलामगिरी? "शकते" ?? श्री गुरुजी तुम्ही अनाहिता तर नाही आहात ना? अजाणतेपणी उगीच काही गैर-शब्द जायचे. तसे काही असेल तर मला बऱ्याच ठिकाणी माझ्या प्रतिक्रिया एडिट कराव्या लागतील. थोडा मराठीचा अभ्यास वाढवा. तुमची तळमळ समजली. "देव तरी त्याला कोण मारी" वाचले होते कोठेतरी. एकदा शंभरी भरली की देव सुद्धा वाचवायला येत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित गुरुवार, 10/12/2017 - 14:21
फेकणार???>> ==>> १.चेहरा पाहिला की माणूस तर्र आहे की नाही टीव्ही वरून ओळखता येतो. २.शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे भारनियमन. ३. शरद पवार जातीवादी ४. रिचर्ड थेलर ने नोटबंदीचे समर्थन केले होते.इ इ इ एकच मिपा आयडी ३ लोक चालवतात, पूर्वी असे वाचले होते. ???? ==>> लिंक सापडली की उत्तर देतो. कमाल आहे! काड्या टाकणार पवार आणि चांदणे मात्र आमच्या मनात!!>>> ==>> नावडतीचे मीठ आळणी म्हंटल्यावर तुम्हाला काड्याच वाटणार. फडणवीस म्हंटले की ब्राह्माणच हे तुम्ही पक्के मनात घट्ट केले म्हणून तर तुमच्या मनात चांदण्या दिसल्या. यात जातीय काड्या म्हणून स्वतःचे टोकरत रहायचे. जसे आम्ही कोणाचेही हुजरे नाही तसेच आम्ही कोणाचेही भक्त नाही.>>> ==>> खरे ही असेल कदाचित पण विश्वास वाटत नाही. व्यवहारी भाषेत सुद्धा गुलामगिरी?>>> ==>> छत्रपती म्हणाले म्हणून गुलामगिरी कसे काय होते? "आम्ही छत्रपतींचे सेवक" हे म्हणाऱ्याना खरे गुलाम म्हणाले पाहिजे. पण तुम्ही त्यांना काही म्हणणार नाही कारण तो आपला माणूस आहे. त्यात मी कोठे ही श्रीमंत, युवराज, महाराज वगैरे विशेषणे लावली नाहीतरी "तुमचे" म्हणून मला कशाला चिटकवलीत? थोडा मराठीचा अभ्यास वाढवा.>> ""चडफड समजू शकते" स्त्रीलिंगी वाक्य वाटले... हे "चडफड समजू शकतो" असे असायला पाहिजे होते असे वाटले होते. अनाहिता नाही आहात हे सरळ सांगितले असते तरी चालले असते. एकदा शंभरी भरली की देव सुद्धा वाचवायला येत नाही.>> ==>> शंभरच्या वर पण जगलेली माणसे मी पाहिली आहेत.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी गुरुवार, 10/12/2017 - 15:26
==>> १.चेहरा पाहिला की माणूस तर्र आहे की नाही टीव्ही वरून ओळखता येतो. नुसता चेहरा नसतो, त्याबरोबर बेताल बरळणेही असते आणि समर्थकांची ओशाळवाण्या चेहर्‍याने कबुलीही असते. २.शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे भारनियमन. त्रिवार सत्य ३. शरद पवार जातीवादी महाराष्ट्रात यांच्याइतका जातीयवादी दुसरा कोणीही नाही. ४. रिचर्ड थेलर ने नोटबंदीचे समर्थन केले होते.इ इ इ मिल्टनांचा धागा वाचा. ==>> नावडतीचे मीठ आळणी म्हंटल्यावर तुम्हाला काड्याच वाटणार. फडणवीस म्हंटले की ब्राह्माणच हे तुम्ही पक्के मनात घट्ट केले म्हणून तर तुमच्या मनात चांदण्या दिसल्या. यात जातीय काड्या म्हणून स्वतःचे टोकरत रहायचे. फडणवीस म्हटले की ब्राह्मण हे तुमच्या साहेबांच्या आणि समर्थकांच्याच मनात आहे आणि या कालच्या पोराने (तेसुद्धा ब्राह्मण असलेल्या) आपल्याला चारीमुंड्या चीत केले हे त्यांना सहन होत नाहीय्ये. म्हणून तर पेटविण्याचे प्रयत्न अथक सुरु आहेत. खरे ही असेल कदाचित पण विश्वास वाटत नाही. मग नका ठेवू विश्वास. छत्रपती म्हणाले म्हणून गुलामगिरी कसे काय होते? "आम्ही छत्रपतींचे सेवक" हे म्हणाऱ्याना खरे गुलाम म्हणाले पाहिजे. पण तुम्ही त्यांना काही म्हणणार नाही कारण तो आपला माणूस आहे. त्यात मी कोठे ही श्रीमंत, युवराज, महाराज वगैरे विशेषणे लावली नाहीतरी "तुमचे" म्हणून मला कशाला चिटकवलीत? राजे, राजवाडे, संस्थाने इ. केव्हाच खालसा झाली. परंतु त्यांच्या घराण्यातील लोकांचा श्रीमंत, युवराज, छत्रपती, राजे, महाराज असल्या विशेषणांनी उल्लेख करून त्यांना कंबरेत वाकून मुजरा करणे याला गुलामगिरी म्हणतात. शंभरच्या वर पण जगलेली माणसे मी पाहिली आहेत. शंभर वर्षे पूर्ण होणे आणि शंभरी भरणे यातला फरक समजेल अशी आशा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित गुरुवार, 10/12/2017 - 15:58
१.चेहरा पाहिला की माणूस तर्र आहे की नाही टीव्ही वरून ओळखता येतो. नुसता चेहरा नसतो, त्याबरोबर बेताल बरळणेही असते आणि समर्थकांची ओशाळवाण्या चेहर्‍याने कबुलीही असते. २.शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे भारनियमन. त्रिवार सत्य ३. शरद पवार जातीवादी महाराष्ट्रात यांच्याइतका जातीयवादी दुसरा कोणीही नाही. ४. रिचर्ड थेलर ने नोटबंदीचे समर्थन केले होते.इ इ इ मिल्टनांचा धागा वाचा.///////////////////////////////////////////////// ==>> याला फेकणे म्हणणार नाही तर काय म्हणणार ... या कालच्या पोराने (तेसुद्धा ब्राह्मण असलेल्या) आपल्याला चारीमुंड्या चीत केले हे त्यांना सहन होत नाहीय्ये. >>> ==>> बघ कसा जातीवाद तुमच्या प्रत्येक वाक्यातून बाहेर पडतोय ते. खरी कुस्ती देवाज्ञा झालेल्या मुंडेंनी गुणांच्या आधारे (चितपट नव्हे) जिंकली होती. पण माळ ह्या गड्याच्या गळ्यात पडली. फोडाफोडी करून चिटूरफुटूर डाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण एखादा धोबीपछाड बसला तर आस्मान दिसेल. मग नका ठेवू विश्वास.>> ==>> ओके. राजे, राजवाडे, संस्थाने इ. केव्हाच खालसा झाली. परंतु त्यांच्या घराण्यातील लोकांचा श्रीमंत, युवराज, छत्रपती, राजे, महाराज असल्या विशेषणांनी उल्लेख करून त्यांना कंबरेत वाकून मुजरा करणे याला गुलामगिरी म्हणतात.>>> ==>>श्रीमंत, युवराज राजे, महाराज हे शब्द मी कुठं वापरले. कोणी मुजरा केला ? मी ??? "आम्ही छत्रपतींचे सेवक" या बद्दल सोयीस्कर फाटा दिला. म्हंटले होते ना आपला माणूस आहे ..!! शंभर वर्षे पूर्ण होणे आणि शंभरी भरणे यातला फरक समजेल अशी आशा आहे.>>> ==>> फरक समजतो आणि त्यामागचा मतितार्थ सुद्धा..!

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी गुरुवार, 10/12/2017 - 20:53
याला फेकणे म्हणणार नाही तर काय म्हणणार ... वरील सर्व गोष्टी सत्य आहेत. बघ कसा जातीवाद तुमच्या प्रत्येक वाक्यातून बाहेर पडतोय ते. खरी कुस्ती देवाज्ञा झालेल्या मुंडेंनी गुणांच्या आधारे (चितपट नव्हे) जिंकली होती. पण माळ ह्या गड्याच्या गळ्यात पडली. फोडाफोडी करून चिटूरफुटूर डाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण एखादा धोबीपछाड बसला तर आस्मान दिसेल. मराठा मोर्चा, मराठ्यांना राखीव जागा, ब्राह्मणांविरूद्ध अत्यंत घाण लिहिणार्‍या खेडेकरच्या गलिच्छ पुस्तकाचे प्रकाशन, शेतकरी कर्जमाफी आंदोलन, वारंवार जातीय काड्या टाकून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न, सातत्याने सुरू असलेले बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप, शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावा यासाठी सुरू असलेले अथक प्रयत्न . . . असे अनेक डाव फडणविसांनी यशस्वीरित्या परतविले आहेत. फडणविसांना सातत्याने धोबीपछाड टाकून लोळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु फडणविसांनी प्रत्येक वेळी चाईट घालून यांना तोंडावर आपटविले आहे. यांनी टाकलेला प्रत्येक डाव फडणविसांनी जिंकून यांना अस्मान दाखविले आहे. श्रीमंत, युवराज राजे, महाराज हे शब्द मी कुठं वापरले. कोणी मुजरा केला ? मी ??? "आम्ही छत्रपतींचे सेवक" या बद्दल सोयीस्कर फाटा दिला. म्हंटले होते ना आपला माणूस आहे ..!! सुरूवात कोठून झाली ते पहा.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित Fri, 10/13/2017 - 15:57
वरील सर्व गोष्टी सत्य आहेत.>>> ==>> १, २, ३ ला काय आधार आहे ? वृत्तपत्रीय बातम्या की मणघडत फेकाफेकी? आणि ४ बद्दल खाली थॉर जी ने प्रतिसाद दिलाच आहे आणि मिल्टन सरांच्या धाग्यात थेरल यांनी भारतीय नोटबंदीचे समर्थन केले होते असे वाचनात कोठेही आढळले नाही उलट कॅशलेस बद्दल ते ८ नोव्हेंबरला नवीन धागा काढणार आहेत. (वीज थकबाकीची यादी मिळेल का?) --- मराठा मोर्चा, मराठ्यांना राखीव जागा, ब्राह्मणांविरूद्ध अत्यंत घाण लिहिणार्‍या खेडेकरच्या गलिच्छ पुस्तकाचे प्रकाशन, शेतकरी कर्जमाफी आंदोलन, वारंवार जातीय काड्या टाकून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न, सातत्याने सुरू असलेले बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप, शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावा यासाठी सुरू असलेले अथक प्रयत्न>>> ==>> १. मराठा मोर्चा- मोर्च्याच्या आखणीत आणि अंमलबजावणीत पवारांचा कोठे ही संबंध आणि सहभाग नव्हता. २. मराठ्यांना राखीव जागा- तरतुदीत बसत असेल तर इतरांचे पोटात दुखण्याचे काही कारण नाही. कायद्याने मिळत नसेल तर त्यावरच भले कोण अवलंबून राहत बसणार नाहीत. पहिल्यापासून माझी तरी हीच भूमिका आहे. किमान शिक्षण आणि नोकरीत फायदा व्हावा एवढाच हेतू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यात फडणवीसांचे काय योगदान आहे ? ३. ब्राह्मणांविरूद्ध अत्यंत घाण लिहिणार्‍या खेडेकरच्या गलिच्छ पुस्तकाचे प्रकाशन- -- आला का नाही जातीवर ? मागे त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंचा पण सत्कार केला होता. वेगवेगळ्या विचारांचे लोक कार्यक्रमाला बोलवत असतात, त्यात कुठला आलाय जातीवाद? का फक्त ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलणाऱ्याच्या कार्यक्रमाला जायचे नाही असे काही असते का? संभाजी आणि शिवाजी महाराजांवर ज्यांनी अत्यंत हीन पद्धतीने लिहले त्या गडकरींच्या नाटकाची हिरारीने बाजू ओढण्याचे काम आपण सुद्धा केले. कशासाठी?? स्वजातीसाठी केले असे आम्ही तुम्हाला म्हणायचे का ? ४. शेतकरी कर्जमाफी आंदोलन -- लोक या भाजप (खाजप म्हणालो असतो पण बाईल हेटाळणी करायची आमची संस्कृती नाही आहे) सरकार फेकू का म्हणते ते याचसाठी. फडणवीस पहिल्यापासून म्हणत होते ना कर्जमाफी देणार नाही म्हणून, तसा त्यांचा बाणाच होता ना. मग निकषा सह सरसकट कर्जमाफीचे एवढे नाटक करण्याची काय गरज होती. यात शरद पवारांचे काय नुकसान होणार आहे? उलट लोकच फडणवीसांना थापाडे म्हणायला लागले आहेत. खासगीत लोक 'साले' सरकार म्हणतात (ह्या गोष्टी पेप्रात येत नाहीत, त्यासाठी लोकात जाऊन फिरावे लागते) ५. सातत्याने सुरू असलेले बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप -- विरोधी पक्ष आहे आरोप करणारच. बिनबुडाचे का काय ते कोर्ट ठरवेल. यात फडणवीसांनी फक्त हा हू करून आखाड्यात टाईमपास केला. "अवगत केले आहे" हे लोक सहज सहजी विसरणार नाहीत. ६. शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावा यासाठी सुरू असलेले अथक प्रयत्न -- यात फडणवीसांचे कशाचे कसब? त्या शिवसेनेनी माती खाल्ली म्हणून अजून रिंगणात आहात. युतीची आंधळी कोशिंबीर नीट खेळता येईना आणि चाललेत तेल लावलेल्या पैलवानाला चाईट घालून पाडायला. --- यांनी टाकलेला प्रत्येक डाव फडणविसांनी जिंकून यांना अस्मान दाखविले आहे.>>> ==>> उलट पवारांनी टाकलेल्या प्रत्येक डावामुळे पुरते गुरफटून गेले आहेत. राज्य चालवायचे सोडून अभ्यास करत बसलेत. --डिग्री मिळवणे खूप सोपे आहे पण काम करणे खूप अवघड असते. कारण डिग्री मिळवण्यापुरताच केलेला अभ्यास हा काम करताना जास्त उपयोगी पडत नाही. - इति आमचे बॉस.

In reply to by विशुमित

विशुमित Fri, 10/13/2017 - 16:07
सुरूवात कोठून झाली ते पहा.>>> श्रीमंत, युवराज राजे, महाराज हे शब्द मी कुठं वापरले. मी कुठे मुजरा केला आणि "आम्ही छत्रपतींचे सेवक" या बद्दल बोला ...

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Fri, 10/13/2017 - 23:51
१, २, ३ ला काय आधार आहे ? वृत्तपत्रीय बातम्या की मणघडत फेकाफेकी? आणि ४ बद्दल खाली थॉर जी ने प्रतिसाद दिलाच आहे आणि मिल्टन सरांच्या धाग्यात थेरल यांनी भारतीय नोटबंदीचे समर्थन केले होते असे वाचनात कोठेही आढळले नाही उलट कॅशलेस बद्दल ते ८ नोव्हेंबरला नवीन धागा काढणार आहेत. (वीज थकबाकीची यादी मिळेल का?) वाचन वाढवा. वीज थकबाकीची यादी मराविमंकडे मिळेल. १. मराठा मोर्चा- मोर्च्याच्या आखणीत आणि अंमलबजावणीत पवारांचा कोठे ही संबंध आणि सहभाग नव्हता. हेच तर त्यांचे वैशिष्ट्य आहे.
२. मराठ्यांना राखीव जागा- तरतुदीत बसत असेल तर इतरांचे पोटात दुखण्याचे काही कारण नाही. कायद्याने मिळत नसेल तर त्यावरच भले कोण अवलंबून राहत बसणार नाहीत. पहिल्यापासून माझी तरी हीच भूमिका आहे. किमान शिक्षण आणि नोकरीत फायदा व्हावा एवढाच हेतू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यात फडणवीसांचे काय योगदान आहे ?
स्वतःकडे सर्व सत्ता, बहुतेक सर्व पदे, बहुतेक सर्व जमीन असे सर्व काही असताना स्वतःचे काहीही न सोडता दुसर्‍यांसाठी जे थोडेसे शिल्लक आहे त्यातही दांडगाई करून हात मारणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. -- आला का नाही जातीवर ? मागे त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंचा पण सत्कार केला होता. वेगवेगळ्या विचारांचे लोक कार्यक्रमाला बोलवत असतात, त्यात कुठला आलाय जातीवाद? का फक्त ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलणाऱ्याच्या कार्यक्रमाला जायचे नाही असे काही असते का? संभाजी आणि शिवाजी महाराजांवर ज्यांनी अत्यंत हीन पद्धतीने लिहले त्या गडकरींच्या नाटकाची हिरारीने बाजू ओढण्याचे काम आपण सुद्धा केले. कशासाठी?? स्वजातीसाठी केले असे आम्ही तुम्हाला म्हणायचे का ? खेडेकर/कोकाट्याच्या घाणेरड्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहून तिथे ब्राह्मणांविरूद्ध काडी टाकणे हा जातीयवादच आहे. गडकर्‍यांचे "राजसंन्यास" हे नाटक मी वाचले आहे. त्यात काहीही हीन लिहिलेले नाही. तुम्ही ते वाचले नसल्यास वाचा. मुद्दा फक्त गडकरींच्या नाटकाची बाजू मांडण्याचा नव्हता. त्या निमित्ताने ब्राह्मण संत, ब्राह्मण स्वातंत्र्यसैनिक, ब्राह्मण राज्यकर्ते इ. वर खोटेनाटे आरोप करून त्यांच्याविरूद्ध अत्यंत हीन लेखन करण्याचे काम ९० च्या दशकापासून सुरू आहे. संत रामदासस्वामी, दादोजी कोंडदेव, थोरले बाजीराव, स्वातंत्र्यवीर सावरकर इ. अनेकांविरूद्ध अत्यंत गलिच्छ लेखन केले गेले आहे. दादोजी कोंडदेवांचा पुतळा उखडून कचर्‍याच्या गाडीतून नेणे याचाच पुढचा भाग म्हणजे गडकरींचा पुतळा उखडणे. खेडेकरने ब्राह्मण स्त्रियांविरूद्ध जे लिहिले आहे ते वाचताना अत्यंत शरम वाटते. अशा अत्यंत नीच व्यक्तीने लिहिलेल्या घाणेरड्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहून एका घाणेरड्या पुस्तकाला व त्याच्या नीच लेखकाला महत्त्व प्राप्त करून देणे व त्याप्रसंगी जातीयवादी भाषण ठोकणे हे अत्यंत निषेधार्ह कृत्य आहे. अर्थात असे करण्याची ही पहिली वेळ नाही. ९० च्या दशकात भाजप-सेना युतीविरूद्ध पेशवाई-शिवशाही वाद यांनीच उठविला होता. माजी गृहसचिव माधव गोडबोले यांची जात यांनीच काढली होती. राजू शेट्टींची जात यांनीच काढली होती. छत्रपती-पेशवे ही काडी यांनीच टाकली होती. -- लोक या भाजप (खाजप म्हणालो असतो पण बाईल हेटाळणी करायची आमची संस्कृती नाही आहे) सरकार फेकू का म्हणते ते याचसाठी. फडणवीस पहिल्यापासून म्हणत होते ना कर्जमाफी देणार नाही म्हणून, तसा त्यांचा बाणाच होता ना. मग निकषा सह सरसकट कर्जमाफीचे एवढे नाटक करण्याची काय गरज होती. यात शरद पवारांचे काय नुकसान होणार आहे? उलट लोकच फडणवीसांना थापाडे म्हणायला लागले आहेत. खासगीत लोक 'साले' सरकार म्हणतात (ह्या गोष्टी पेप्रात येत नाहीत, त्यासाठी लोकात जाऊन फिरावे लागते) फडणविसांचा कर्जमाफीला विरोध होता. परंतु वातावरण पेटविले गेले. शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणविसांवर नेम धरलेला होता. शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यात शांतता राखण्यासाठी तडजोडी कराव्याच लागतात. सरसकट कर्जमाफीसाठी वातावरण तापवून या धनदांडग्यांना आपली पोळी भाजून घ्यायची होती. सरसकट कर्जमाफी केली तर राज्याच्या अर्थव्यवस्थेची वाट लागून खरा फायदा या धनदांडग्यांनाच होणार आणि अजिबात कर्जमाफी केली नाही तर वातावरण पेटत जाणार यातून फडणविसांना मार्ग काढावा लागला. म्हणूनच त्यांनी निकषासहीत कर्जमाफीचा निर्णय घेतला. कर्जमाफीची सर्व माहिती कागदावर यावी यासाठी ऑनलाईन अर्ज भरायला सांगून त्यासाठी आधारपत्र व पूर्ण माहिती मागितली आहे. त्यातूनच फुगविलेला शेतकर्‍यांचा आकडाही समोर आला आहे. फडणविसांच्या विरोधात मांडलेला हा डावसुद्धा वाया गेला आहे. -- विरोधी पक्ष आहे आरोप करणारच. बिनबुडाचे का काय ते कोर्ट ठरवेल. यात फडणवीसांनी फक्त हा हू करून आखाड्यात टाईमपास केला. "अवगत केले आहे" हे लोक सहज सहजी विसरणार नाहीत. करा की. कोर्ट त्याबद्दल ठरवेल पण ते कोणी कोर्टात गेले तर. ज्यांच्याकडे पुरावेच नाहीत त्यांची कोर्टात जायची हिंमत नाही. कालच नबाब मलिक अजून एकदा बरळला. नांदेडमध्ये म्हणे भाजपने मोपलवारांचे ३०० कोटी वाटले. या गाढवाला निकाल लागल्यानंतर हे बरं समजलं. इतके दिवस काय झोपा काढत होता का? मागच्या वर्षीही तो बरळला होता की गिरीश बापटांनी तूर डाळीत २०० कोटींचा भ्रष्टाचार केला. थोड्या दिवसांनी त्याने हा आकडा २००० कोटींवर नेला आणि नंतर काही दिवसांनी हा भ्रष्टाचार २०००० कोटींचा आहे असे बडबडायला लागला. आता विचारले तर हा घोटाळा २ खर्व रूपयांचा आहे असे तो बरळेल. असल्या फालतू आरोपांवर टाईमपासच करायचा असतो. -- यात फडणवीसांचे कशाचे कसब? त्या शिवसेनेनी माती खाल्ली म्हणून अजून रिंगणात आहात. युतीची आंधळी कोशिंबीर नीट खेळता येईना आणि चाललेत तेल लावलेल्या पैलवानाला चाईट घालून पाडायला. शिवसेनेला फारसे काही न देतासुद्धा बाहेर पडता येत नाही हेच फडणविसांचे कसब आहे. विरोधी पक्षात जाऊन बसलेली सेना एका रात्रीत सत्तेत आली. फडणविसांनी फेकलेली ३-४ फालतू मंत्रीपदे सेनेने आनंदाने स्वीकारली. त्यामुळे भाजपने न मागता पाठिंबा जाहीर केलेले तेल लावलेले पैलवान आपोआपच चित झाले व त्यांना माती खावी लागली. त्यानंतर मराठा मोर्चा, राखीव जागा, कर्जमाफी, शिवसेनेला डिवचणे, जातीयवादी वक्तव्ये या सर्व डावपेचातून फडणविस यशस्वीपणे निसटले आहेत. या तेले लावलेल्या पैलवानाने आधी अशोक चव्हाण व नंतर पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा जेरीस आणले होते. म्हणूनच लकवा अशी अभद्र भाषा त्यांना वापरावी लागली होती. अजूनही ते तेल लावून शड्डू ठोकून जोरबैठका काढायचा प्रयत्न करतात. परंतु आपली सद्दी पूर्ण संपली आहे हे त्यांना उमगतच नाही. उलट पवारांनी टाकलेल्या प्रत्येक डावामुळे पुरते गुरफटून गेले आहेत. राज्य चालवायचे सोडून अभ्यास करत बसलेत. पवारांचे सगळे डाव फडणविसांनी लीलया परतविले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

थॉर माणूस गुरुवार, 10/12/2017 - 22:58
४. रिचर्ड थेलर ने नोटबंदीचे समर्थन केले होते.इ इ इ मिल्टनांचा धागा वाचा.
आँ? तुम्हाला अजुनही म्हणायचे आहे की त्यांनी "भारतात नोटबंदी ज्यापद्धतीने लागू केली गेली आणि जे निर्णय घेतले गेले त्याचा अभ्यास करून थेलर यांनी त्याचे समर्थन केले होते?" थेलर यांनी, भारताने नोटा बाद केल्या आहेत ही बातमी ऐकल्यावर १ ट्वीट केले होते फक्त, त्यानंतर कुणीतरी त्यांना २००० च्या नोटेबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी पुढचे ट्वीट केले. तेवढीच कींमत दिली आहे त्यांनी. त्यापलीकडे कणभरही महत्व दिलेले नाही या घटनेला. जेव्हा राजन भारतातून परत गेले तेव्हा थेलर यांनी देअर लॉस इस आवर गेन अशा आशयाचे ट्वीट देखील केले होते. बास करा की राव, एखाद्या मुद्यावर मत चुकले तर सोडून द्या. चुकले तरी कशाला पुढे रेटताय? बाकीचे मुद्दे घेऊन भांडा.

In reply to by विशुमित

arunjoshi123 Mon, 10/09/2017 - 14:56
मी पवार/राष्ट्रवादी समर्थक म्हणून प्रतिक्रिया देत नाही
तुम्ही समर्थक आहात तर तशीच प्रतिक्रिया देणं जास्त योग्य आहे.

In reply to by arunjoshi123

विशुमित Mon, 10/09/2017 - 15:07
तुम्ही समर्थक आहात तर तशीच प्रतिक्रिया देणं जास्त योग्य आहे.>>> ==>> मिपावर मी चांगल्या चर्चा वाचण्यासाठी आणि जमेल तिथे आपले मत व्यक्त करण्यासाठी येतो. ज्यातून मला त्या संबंधित विषयाबाबत नाण्याच्या दोन्ही बाजू समजतील. माझे ज्ञानार्जन होईल. पक्षीय राजकारण करायला माझे गाव, माझा परिसर आणि माझा तालुका पुरेसा आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी Sat, 10/07/2017 - 00:02
भारनियमन केल्याने थकबाकी वसूल होणार नाही कारण वसुली व भारनियमन या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु भारनियमनाचा जो काही त्रास आहे तो नियमित बिल भरणार्‍यांना कमी व्हावा हा उद्देश असल्याने थकबाकीदारांच्या भागात जास्त वेळ भारनियमन करून नियमित बिल भरणार्‍यांच्या भागात ते तुलनेने कमी वेळ केले जाते.

In reply to by श्रीगुरुजी

मार्मिक गोडसे Sat, 10/07/2017 - 00:22
वीजबिल वसुली करा की मग खेड्यापाड्यातून, कोणी अडवले तुम्हाला? आता तर ठाण्यातही वीज जाऊ लागली. ठाणेकर वीजबील थकबाकीदार आहेत का?

In reply to by श्रीगुरुजी

अभिजीत अवलिया Sat, 10/07/2017 - 09:22
नक्की काय आहे विजेचे गौडबंगाल समाजात नाहीये. एकीकडे कोळशाच्या निर्धारित साठा पुरवठय़ात गेल्या तीन महिन्यांत कुठेही खंड पाडला नाही, असे सरकारी वीज निर्मिती कंपनीला कोळसा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी म्हटलेय. दिवाळीच्या तोंडावर कोळसा उपलब्धतेचे कारण सांगून भारनियमनाची घोषणा करायची, लोकांची ओरड झाल्यानंतर खासगी कंपन्यांकडून महागडय़ा दरात वीज खरेदी करायची व अशा प्रकारे खासगी कंपन्यांना फायदा व्हावा हे या कृत्रिम टंचाईमागे कारण असल्याचे बोलले जात आहे. http://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-government-creating-artificial-coal-shortage-to-buy-power-from-private-companies-1565650/ तर दुसरीकडे जलविद्युत, सौरऊर्जा आणि पवनऊर्जा प्रकल्प देखील ढेपाळले आहेत हे खालील बातमीत लिहिले आहे. नियोजनाचा अभाव हे यामागे कारण असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केला जात आहे. http://www.loksatta.com/mumbai-news/zero-management-cause-severe-power-crisis-in-maharashtra-1565635/

In reply to by श्रीगुरुजी

मार्मिक गोडसे Sat, 10/07/2017 - 09:39
मला नाही सापडले . तुमचा करसंकलन व वीजबिल वसुलीत गोंधळ होतोय. खेड्यातील वीजपुरवठा बंद का करत नाही लाडके सरकार?

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Fri, 10/06/2017 - 15:31
राज ठाकरेंचे भाषण कोणी टीव्हीवर पाहू नये म्हणून अख्या महाराष्ट्राची लाईट गुल केली आहे. ही पुडी राजसमर्थकांनी सोडली आहे. राजसमर्थक वगळता इतरांना त्याच्या बडबडीत फारसा रस नव्हता. आमच्याकडे पूर्णवेळ वीज असूनसुद्धा आम्ही त्याची बडबड ऐकली नाही. काही वाहिन्यांवर त्याच्या बडबडीच्या वेळी दुसरेच कार्यक्रम सुरू होते. त्याच्या बडबडीला मराठी वर्तमानपत्रांनी देखील फारच कमी कव्हरेज दिले आहे. राज म्हणजे नुसतीच फुसकी हवा हे सर्वांना माहिती आहे.

इरसाल Fri, 10/06/2017 - 10:11
श्री. नरेंद्र मोदींनी (भारत सरकार नव्हे हं) वर्ल्ड बँक पण मॅनेज केली अस दिसतय. https://timesofindia.indiatimes.com/india/indias-economic-slowdown-an-aberration-world-bank/articleshow/60960318.cms?utm_source=whatsapp&utm_medium=social&utm_campaign=TOIMobile

अभिजीत अवलिया Sat, 10/07/2017 - 09:32
नारायण राणे यांची ३०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जानेवारी महिन्यात प्राथमिक चौकशी सुरू केली होती. पण आता राणे सत्ताधारी पक्षाबरोबर जाणार असल्याने त्यांच्या विरोधात सुरू असलेली चौकशी थांबवण्याचे आदेश सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात केंद्र सरकारकडून देण्यात आल्याचे खालील बातमीत म्हटले आहे. या प्रकरणी केतन तिरोडकर ह्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. http://www.loksatta.com/mumbai-news/ketan-tirodkar-file-pil-against-narayan-rane-over-financial-irregularities-1565687/

अमितदादा Sat, 10/07/2017 - 14:10
२०१७ सालचे नोबेल पारितोषिके १) Physics Nobel = Rainer Weiss, Barry Barish and Kip Thorne Nobel prize in physics awarded for discovery of gravitational waves काही रोचक माहिती ------Prof Paul Hardaker, chief executive officer of the Institute of Physics, said: “For as long as we have had astronomy we have used light in some form or another to understand how our universe works. This significant result marked the beginning of another way of viewing the universe, using gravity, which is what makes it such a major step forward, and so deserving of a Nobel prize.” -----Ligo’s twin detectors, two pairs of 4km-long perpendicular pipes, one in Hanford, Washington state, the other in Livingston, Louisiana, are so sensitive that they can spot a distortion of a thousandth of the diameter of an atomic nucleus across a 4km length of laser beam. -----The notion that spacetime is malleable was first predicted by Einstein’s general theory of relativity. But Einstein himself was unsure whether this was merely a mathematical illusion, and concluded that, in any case, the signal would be so tiny that it would “never play a role in science”. २) Medicine Nobel = Jeffrey C Hall, Michael Rosbash and Michael W Young Nobel prize for medicine awarded for insights into internal biological clock काही रोचक माहिती -----They were recognised for their discoveries explaining “how plants, animals and humans adapt their biological rhythm so that it is synchronised with the Earth’s revolutions.” ------When there is a mismatch between this internal “clock” and the external surroundings, it can affect the organism’s wellbeing – for example, in humans, when we experience jet lag. ----Every living organism on this planet responds to the sun,” he said. “All plant and animal behaviour is determined by the light-dark cycle. We on this planet are slaves to the sun. The circadian clock is embedded in our mechanisms of working, our metabolism, it’s embedded everywhere, it’s a real core feature for understanding life. ३)Chemestry Nobel = Jacques Dubochet, Joachim Frank and Richard Henderson Nobel prize in chemistry awarded for method to visualise biomolecules काही रोचक माहिती ------The Nobel prize in chemistry has been awarded to three scientists for developing a technique to produce images of the molecules of life frozen in time. -----The latest versions of the technology mean scientists can record biochemical processes as they unfold in film-like sequences. -----Earlier imaging techniques, such as X-ray crystallography, required samples to be studied in a rigid state, revealing little about the dynamics of proteins and enzymes – many of which could not be successfully crystallised in any case. Another microscopic technique, the electron microscope, was only suitable for imaging dead matter, because its powerful beam destroyed delicate biological structures. ----Cryo-electron microscopy has allowed scientists to explore the architecture of everything from the proteins that cause antibiotic resistance to the surface of the Zika virus. ४) Literature Nobel = Kazuo Ishiguro Kazuo Ishiguro wins the Nobel prize in literature 2017 ५) Peace Nobel = International Campaign to Abolish Nuclear Weapons Nobel peace prize 2017: International Campaign to Abolish Nuclear Weapons wins award – as it happened

In reply to by अमितदादा

arunjoshi123 Mon, 10/09/2017 - 15:17
are so sensitive that they can spot a distortion of a thousandth of the diameter of an atomic nucleus across a 4km length of laser beam.
लेझर बिम मधे न्यूक्लिअस असते का? आणि यानं ग्रॅविटी वेव कशी डिटेक्त केली? मधली लिंक काय? अन्य डिस्टॉर्श्न्सचा इंटर्फेरन्स कसा टाळला?