पवनचक्की.
अन्न,वस्त्र, निवार्या नंतर जर मानवाची चौथी गरज असेल तर ती म्हणजे ऊर्जा. भारत हा जगातील तीसरा सर्वात मोठा विद्युत ऊर्जा निर्माण करणारा व चौथा सर्वात मोठा ऊर्जेचा वापर करणारा देश आहे.
देशात एकुण ऊत्पादन क्षमतेत पवनऊर्जेचा वाटा जवळपास 10% आहे. भारतात पवनऊर्जेची सुरूवात 1990 च्या जवळपास झाली.
भारताचा जगात पवनऊर्जा निर्मीतीत पाचवा क्रमांक लागतो. सुझलाँन ही भारतातील पवनऊर्जा निर्मीती क्षेत्रातील पहीली व सर्वात मोठी कंपनी. तीचे अध्यक्ष तुलसी भाई तंटी यांनी भारतात पवनऊर्जेची बीजे रोवली. असं म्हणतात की तुलसी तंटी हे आधी कापडाचे व्यापारी होते. त्यांची अहमदाबादेत कपड्यांची मील होती. ते विदेशात फिरायला गेले असतांना त्यांनी तीथे पवनचक्क्या पाहून स्वत: काही व काही त्यांच्या मित्रांनी पवनचक्क्या खरेदी केल्या. पण नंतर त्या कंपनीला ईतक्या दुरून त्यांच मेंटेनन्स करण जमेना म्हणून त्यांनी तुलसी भाईंना स्वतः मेंटेनंस करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी ह्याबाबत माहिती जमा करून स्वतः ह्या व्यवसायात ऊतरण्याचा निर्णय घेतला. कपडा मील विकूण ते ह्या व्यवसायात ऊतरले. त्यांनी कंपनीचं नाव सुझलाँन ठेवण्याच हेतु म्हणजे ग्राहक आकर्षित करणे. हे नाव थोडं जापनीज वा कोरीयण वाटतं. सुझलाँन जेव्हा 1993 च्या आसपास ह्या क्षेत्रात आली तेव्हा तीला राण मोकळं होतं. कोणीही मोठा प्रतिस्पर्धी नसल्याने व भारत सरकारच्या ह्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी भरमसाठ योजना असल्याने सुझलाँन लवकरच फोफावली.
पवनऊर्जा ही निसर्गासाठी सर्वात कमी त्रासदायक. हवेशिवाय कोणताही ईनपुट नाही. व वातावरणात कोणताही गँस ऊत्सर्जीत होत नाही. त्यामुळे शुन्य प्रदुषण.
"हवेच्या गतीज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत व यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर" (Kinetic energy of wind is converted into mechanical energy and then mechanical energy is converted in to electrical energy) ह्या तत्वावर पवनचक्की चालते. जीथे हवेचा वेग सरासरी 7~10 मीटर प्रती सेकंद व त्याच्यावर असतो. त्याच ठिकाणी पवनचक्क्या लागू शकतात.
भारतातल्या तामिलनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश,केरळ ह्या राज्यांत पवनचक्कया आहेत. महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापुर, अहमदनगर, पुणे, नाशिक. ऊत्तरेत धुळे,नंदूरबार ह्या जिल्ह्यांत पवनचक्कया लावण्यासाठी चांगले हवामान आहे. पवनचक्की लावण्यासाठी आधी सरकार हवा मोजण्याचं यंत्र चांगली हवा असलेल्या ठिकाणी दोन ते तीन वर्षासाठी लावते पवनचक्की लावण्यासाठी हवेचा वेग योग्य असेल तर ती माहीती पवनऊर्जा कंपनींना दिली जाते. त्यानंतर कंपन्या स्वतः चे यंत्र लावुन हवा मोजतात. जर त्यांना हवा योग्य वाटली तर तिथे पवनचक्की लावण्यासाठी हालचाली सुरू होतात. त्यानुसार सँटेलाईट द्वारे जमिनीचं नेमकं ठिकाण ठरवलं जातं व पुढे जमीन खरेदी केली जाते. जमीन सरकारी असेल तर सरकार कडून, जर शेतकर्याची असेल तर त्याच्या कडून ती खरेदी केली जाते. कोणत्याही प्रकारच्या भाडेतत्वावर न घेता सरळ खरेदी केली जाते. त्यानंतर तीथे मोठमोठ्या क्रेन्स वापरून पवनचक्की उभी केली जाते.
पवनचक्की चा आयुष्यकाळ हा विस वर्षांचा असतो. विस वर्षांनंतर पुन्हा त्या जागी नवीन पवनचक्की ऊभी केली जाते. पवनचक्की ची ऊंची त्यांच्या माँडेल वर अवलंबून असते. माँडेल मध्ये 300 कीलोवँट(kwph) प्रती तास पासुन तर 2000 ते 3000(kwph) कीलोवँट प्रती तास पर्यंत कंपनी नुसार अनेक माँडेल्स असतात. 1 कीलोवँट म्हणजे आपल्या घरातील एक युनीट. आपण साधारणतः घरात 300 ते 700 युनीट महीन्याला वापरतो. पवनचक्की एका तासाला 2000 युनीट तयार करते. व ती ऊर्जा त्या त्या राज्य सरकारला ठरवलेल्या दराने जवळपास 4 ₹ ते 6 ₹ युनीट विकली जाते. यावरून आपल्याला ऊत्पादन क्षमतेचा अंदाज येईल. सध्या केंद्र सरकारणे केलेल्या कायद्या नुसार नव्या ऊभ्या राहणार्या पवनचक्क्यांवर 2000 kw च्या खालच्या माँडेल्सवर बंदी आणण्यात आलीय. असं नाही की पवनचक्क्या बाराही महीने चोवीस तास फीरत असतात. साधारणतः एप्रिल ते सप्टेंबर हा सहा महिन्याचा पावसाळी काळं चांगल्या वाहत्या हवेचा असतो. ह्या काळात पवनचक्क्या चांगल ऊत्पादन देतात. एरवी हवा नसल्याने त्या थंड ऊभ्या असतात. ऊत्पादन झालेली ऊर्जा कुठेही साठवणूक न करता सरळ राज्य सरकारच्या ग्रीड ला जोडली जाते. व तीथून तीचं वर्गीकरण होतं. जगात पवनचक्की बनवणार्या(manufacturer) व सेवा(service) देणार्या अनेक कंपन्या आहेत. त्यापैकी वेस्टास व जीई ह्या ह्या क्षेत्रातील बाप कंपन्या. पण भारतीय कंपनी सुझलाँन ने देखील अनेक देशांत आपला चांगलाच विस्तार केलाय. भारतीय कंपनीत सध्या सुझलाँन, आयनोक्स विंड ह्या कंपनीज ने चांगलीच मजल मारलीय.
पवनचक्की ला नेहमीच तीन पाते असतात. त्याचं कारण 360 भागीले 3 बरोबर 120 ह्या नुसार दोन पात्यांमध्ये 120 अशांचा कोण असतो. तो ह्या साठी की कोणत्याही स्थीतीत एक पातं हवेच्या अँक्टीव भागात असतच. पवनचक्कीची ऊंची 70 ते 110 मीटर असते.
पवनचक्कीचे तीन मुख्य भाग असतात हब ( जीथे तीनही पाते एकत्र येतात.) गीअरबाँक्स व जनीत्र(Generator) हे तीनही भाग ज्यावर ऊभे असतात त्याला शेल म्हणतात. (70 ते 110 मीटर वर्तुळाकार मधुन पोकळ) त्यात वर जाण्यासाठी जागा असते.
गीअर बाँक्स चे काम शाफ्टची चक्रीय गती (RPM) वाढवणे. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेरून पवनचक्की चा एक फेर बघतात. तेव्हा आत 100 फेरे झालेले असतात. तर शाफ्ट प्रचंड वेगाने फीरल्याने जनीत्रात ऊर्जा तयार होते. व ती केबल्स द्वारे वरून खाली येऊन मुख्य वाहिनीला जोडली जाते.
काही कंपनीच्या पवनचक्क्या गीअरबाँक्स विरहीत देखील असतात. व त्या ठीकाणी ऊच्च प्रतीचे जनीत्रे असतात. पवनचक्की चे वैशिष्ट्य म्हणजे हवेची दिशा बदलली तरी पवनचक्की त्या दिशेने आपले मुख फीरवते. त्यामुळे हवेच्या दिशा बदलल्याने पवनचक्कीवर कोणताही परीणाम होत नाही.
आता बघु पवनचक्की ची कींमत
एका पवनचक्की ची कींमत साधारणतः 8 ते 25 कोटी रूपये असते. व ती माँडेल्स नुसार बदलत जाते. पवनचक्की बनवणार्या कंपन्या फक्त बनवण्याच व सेवा देण्याचं काम करतात. पवनचक्की चे मालकं वेगळे असतात. त्यांत टाटा, अदानी, हीरोहोंडा, आदीत्य बिर्ला, गायछाप वाले डी. जे. मालपाणी ह्यांसारखे अनेक मोठमोठे ऊद्योजक अाहेंत. तसेंच नट, नट्या व खेळाडू हे देखील पवनचक्कया खरेदी करतात. मी स्वतः नंदूरबार मध्ये ऐश्वर्या राँय च्या दोन पवनचक्कयांवर काम केलय. त्यांचे वडिलही एकदा नंदुरबारला येऊन गेलेत. ह्या क्षेत्रात गुंतवणूक करणं हे आपल्या सारख्या सामान्य माणसाचं काम नाही. सातार्यातला एक सुझलाँन कंपनीचा प्रकल्प एकेकाळी आशियातील सर्वात मोठा प्रकल्प होता.
पुर्वी केंद्र सरकार ह्या क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सबसीडी द्यायचं जवळपास 40% पण आता ह्या क्षेत्रात भरपुर गुंतवणूक झाल्याणे सबसीडी बंद करण्यात आलीय. हा व्यावसाय ऊद्योजकांसाठी खुप फायद्याचा आहे त्याच कारण म्हणजे कार्बन क्रेडीट. पवनऊर्जा अपारंपारीक क्षेत्रात येत असल्याने व कोणत्याही प्रकारचा हानिकारक वायु ऊत्सर्जीत होत नसल्याने सरकार ह्यावर कार्बन क्रेडीट देतं.
सरकारचा एक कायदा आहे त्या नुसार कोणताही कारखाना वातावरणात जितक्या प्रमाणात हानीकारक वायु सोडतो. तीतक्या प्रमाणात शुध्द हवा वातावरणात सोडण्याची जबाबदारी कारखानदाराची असते. ह्यासाठी कारखानदार सरकारला झाडे लावण्यासाठी पैसे देतो. त्याला कार्बन क्रेडिट म्हणतात. एक पवनचक्की वर्षाला ऊत्पादनाच्या हिशोबाने 1 कोटी चे कार्बन क्रेडिट देते. ते कार्बन क्रेडिट ऊद्योजक एकतर स्वतः च्या कारखान्यास वापरतात. किंवा मग ईतर ऊद्योजकांना विकतात. ह्यात प्रचंड नफा असतो. एका पवनचक्कीचं वार्षिक ऊत्पन्न जवळपास दोन ते चार कोटी व कार्बन क्रेडिट चे एक ते दीड कोटी वेगळे.
सध्या काळानुरूप तंत्रज्ञानात फार मोठा बदल झालाय. आता समुद्रात तेखील पवनचक्क्या ऊभ्या करण्याचं तंत्रज्ञान भारतात आलयं. विदेशात आधी पासुनच होतं. सध्या भारतात गुजरातच्या समुद्रात पवनचक्क्या ऊभारण सुरू झालय. डेन्मार्क ह्या देशात सर्वात जास्त पवनऊर्जेचा वापर केला जातो. त्या देशात जवळजवळ 80% वीजनिर्मिती पवनचक्क्यांपासुन होते.
भारतात ह्या क्षेत्रात सध्या फार मोठी गुंतवणूक सुरूय. व ह्या क्षेत्राचं भविष्य ऊज्वल आहे.
भारताचा जगात पवनऊर्जा निर्मीतीत पाचवा क्रमांक लागतो. सुझलाँन ही भारतातील पवनऊर्जा निर्मीती क्षेत्रातील पहीली व सर्वात मोठी कंपनी. तीचे अध्यक्ष तुलसी भाई तंटी यांनी भारतात पवनऊर्जेची बीजे रोवली. असं म्हणतात की तुलसी तंटी हे आधी कापडाचे व्यापारी होते. त्यांची अहमदाबादेत कपड्यांची मील होती. ते विदेशात फिरायला गेले असतांना त्यांनी तीथे पवनचक्क्या पाहून स्वत: काही व काही त्यांच्या मित्रांनी पवनचक्क्या खरेदी केल्या. पण नंतर त्या कंपनीला ईतक्या दुरून त्यांच मेंटेनन्स करण जमेना म्हणून त्यांनी तुलसी भाईंना स्वतः मेंटेनंस करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी ह्याबाबत माहिती जमा करून स्वतः ह्या व्यवसायात ऊतरण्याचा निर्णय घेतला. कपडा मील विकूण ते ह्या व्यवसायात ऊतरले. त्यांनी कंपनीचं नाव सुझलाँन ठेवण्याच हेतु म्हणजे ग्राहक आकर्षित करणे. हे नाव थोडं जापनीज वा कोरीयण वाटतं. सुझलाँन जेव्हा 1993 च्या आसपास ह्या क्षेत्रात आली तेव्हा तीला राण मोकळं होतं. कोणीही मोठा प्रतिस्पर्धी नसल्याने व भारत सरकारच्या ह्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी भरमसाठ योजना असल्याने सुझलाँन लवकरच फोफावली.
पवनऊर्जा ही निसर्गासाठी सर्वात कमी त्रासदायक. हवेशिवाय कोणताही ईनपुट नाही. व वातावरणात कोणताही गँस ऊत्सर्जीत होत नाही. त्यामुळे शुन्य प्रदुषण.
"हवेच्या गतीज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत व यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर" (Kinetic energy of wind is converted into mechanical energy and then mechanical energy is converted in to electrical energy) ह्या तत्वावर पवनचक्की चालते. जीथे हवेचा वेग सरासरी 7~10 मीटर प्रती सेकंद व त्याच्यावर असतो. त्याच ठिकाणी पवनचक्क्या लागू शकतात.
भारतातल्या तामिलनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश,केरळ ह्या राज्यांत पवनचक्कया आहेत. महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापुर, अहमदनगर, पुणे, नाशिक. ऊत्तरेत धुळे,नंदूरबार ह्या जिल्ह्यांत पवनचक्कया लावण्यासाठी चांगले हवामान आहे. पवनचक्की लावण्यासाठी आधी सरकार हवा मोजण्याचं यंत्र चांगली हवा असलेल्या ठिकाणी दोन ते तीन वर्षासाठी लावते पवनचक्की लावण्यासाठी हवेचा वेग योग्य असेल तर ती माहीती पवनऊर्जा कंपनींना दिली जाते. त्यानंतर कंपन्या स्वतः चे यंत्र लावुन हवा मोजतात. जर त्यांना हवा योग्य वाटली तर तिथे पवनचक्की लावण्यासाठी हालचाली सुरू होतात. त्यानुसार सँटेलाईट द्वारे जमिनीचं नेमकं ठिकाण ठरवलं जातं व पुढे जमीन खरेदी केली जाते. जमीन सरकारी असेल तर सरकार कडून, जर शेतकर्याची असेल तर त्याच्या कडून ती खरेदी केली जाते. कोणत्याही प्रकारच्या भाडेतत्वावर न घेता सरळ खरेदी केली जाते. त्यानंतर तीथे मोठमोठ्या क्रेन्स वापरून पवनचक्की उभी केली जाते.
पवनचक्की चा आयुष्यकाळ हा विस वर्षांचा असतो. विस वर्षांनंतर पुन्हा त्या जागी नवीन पवनचक्की ऊभी केली जाते. पवनचक्की ची ऊंची त्यांच्या माँडेल वर अवलंबून असते. माँडेल मध्ये 300 कीलोवँट(kwph) प्रती तास पासुन तर 2000 ते 3000(kwph) कीलोवँट प्रती तास पर्यंत कंपनी नुसार अनेक माँडेल्स असतात. 1 कीलोवँट म्हणजे आपल्या घरातील एक युनीट. आपण साधारणतः घरात 300 ते 700 युनीट महीन्याला वापरतो. पवनचक्की एका तासाला 2000 युनीट तयार करते. व ती ऊर्जा त्या त्या राज्य सरकारला ठरवलेल्या दराने जवळपास 4 ₹ ते 6 ₹ युनीट विकली जाते. यावरून आपल्याला ऊत्पादन क्षमतेचा अंदाज येईल. सध्या केंद्र सरकारणे केलेल्या कायद्या नुसार नव्या ऊभ्या राहणार्या पवनचक्क्यांवर 2000 kw च्या खालच्या माँडेल्सवर बंदी आणण्यात आलीय. असं नाही की पवनचक्क्या बाराही महीने चोवीस तास फीरत असतात. साधारणतः एप्रिल ते सप्टेंबर हा सहा महिन्याचा पावसाळी काळं चांगल्या वाहत्या हवेचा असतो. ह्या काळात पवनचक्क्या चांगल ऊत्पादन देतात. एरवी हवा नसल्याने त्या थंड ऊभ्या असतात. ऊत्पादन झालेली ऊर्जा कुठेही साठवणूक न करता सरळ राज्य सरकारच्या ग्रीड ला जोडली जाते. व तीथून तीचं वर्गीकरण होतं. जगात पवनचक्की बनवणार्या(manufacturer) व सेवा(service) देणार्या अनेक कंपन्या आहेत. त्यापैकी वेस्टास व जीई ह्या ह्या क्षेत्रातील बाप कंपन्या. पण भारतीय कंपनी सुझलाँन ने देखील अनेक देशांत आपला चांगलाच विस्तार केलाय. भारतीय कंपनीत सध्या सुझलाँन, आयनोक्स विंड ह्या कंपनीज ने चांगलीच मजल मारलीय.
पवनचक्की ला नेहमीच तीन पाते असतात. त्याचं कारण 360 भागीले 3 बरोबर 120 ह्या नुसार दोन पात्यांमध्ये 120 अशांचा कोण असतो. तो ह्या साठी की कोणत्याही स्थीतीत एक पातं हवेच्या अँक्टीव भागात असतच. पवनचक्कीची ऊंची 70 ते 110 मीटर असते.
पवनचक्कीचे तीन मुख्य भाग असतात हब ( जीथे तीनही पाते एकत्र येतात.) गीअरबाँक्स व जनीत्र(Generator) हे तीनही भाग ज्यावर ऊभे असतात त्याला शेल म्हणतात. (70 ते 110 मीटर वर्तुळाकार मधुन पोकळ) त्यात वर जाण्यासाठी जागा असते.
गीअर बाँक्स चे काम शाफ्टची चक्रीय गती (RPM) वाढवणे. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेरून पवनचक्की चा एक फेर बघतात. तेव्हा आत 100 फेरे झालेले असतात. तर शाफ्ट प्रचंड वेगाने फीरल्याने जनीत्रात ऊर्जा तयार होते. व ती केबल्स द्वारे वरून खाली येऊन मुख्य वाहिनीला जोडली जाते.
काही कंपनीच्या पवनचक्क्या गीअरबाँक्स विरहीत देखील असतात. व त्या ठीकाणी ऊच्च प्रतीचे जनीत्रे असतात. पवनचक्की चे वैशिष्ट्य म्हणजे हवेची दिशा बदलली तरी पवनचक्की त्या दिशेने आपले मुख फीरवते. त्यामुळे हवेच्या दिशा बदलल्याने पवनचक्कीवर कोणताही परीणाम होत नाही.
आता बघु पवनचक्की ची कींमत
एका पवनचक्की ची कींमत साधारणतः 8 ते 25 कोटी रूपये असते. व ती माँडेल्स नुसार बदलत जाते. पवनचक्की बनवणार्या कंपन्या फक्त बनवण्याच व सेवा देण्याचं काम करतात. पवनचक्की चे मालकं वेगळे असतात. त्यांत टाटा, अदानी, हीरोहोंडा, आदीत्य बिर्ला, गायछाप वाले डी. जे. मालपाणी ह्यांसारखे अनेक मोठमोठे ऊद्योजक अाहेंत. तसेंच नट, नट्या व खेळाडू हे देखील पवनचक्कया खरेदी करतात. मी स्वतः नंदूरबार मध्ये ऐश्वर्या राँय च्या दोन पवनचक्कयांवर काम केलय. त्यांचे वडिलही एकदा नंदुरबारला येऊन गेलेत. ह्या क्षेत्रात गुंतवणूक करणं हे आपल्या सारख्या सामान्य माणसाचं काम नाही. सातार्यातला एक सुझलाँन कंपनीचा प्रकल्प एकेकाळी आशियातील सर्वात मोठा प्रकल्प होता.
पुर्वी केंद्र सरकार ह्या क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सबसीडी द्यायचं जवळपास 40% पण आता ह्या क्षेत्रात भरपुर गुंतवणूक झाल्याणे सबसीडी बंद करण्यात आलीय. हा व्यावसाय ऊद्योजकांसाठी खुप फायद्याचा आहे त्याच कारण म्हणजे कार्बन क्रेडीट. पवनऊर्जा अपारंपारीक क्षेत्रात येत असल्याने व कोणत्याही प्रकारचा हानिकारक वायु ऊत्सर्जीत होत नसल्याने सरकार ह्यावर कार्बन क्रेडीट देतं.
सरकारचा एक कायदा आहे त्या नुसार कोणताही कारखाना वातावरणात जितक्या प्रमाणात हानीकारक वायु सोडतो. तीतक्या प्रमाणात शुध्द हवा वातावरणात सोडण्याची जबाबदारी कारखानदाराची असते. ह्यासाठी कारखानदार सरकारला झाडे लावण्यासाठी पैसे देतो. त्याला कार्बन क्रेडिट म्हणतात. एक पवनचक्की वर्षाला ऊत्पादनाच्या हिशोबाने 1 कोटी चे कार्बन क्रेडिट देते. ते कार्बन क्रेडिट ऊद्योजक एकतर स्वतः च्या कारखान्यास वापरतात. किंवा मग ईतर ऊद्योजकांना विकतात. ह्यात प्रचंड नफा असतो. एका पवनचक्कीचं वार्षिक ऊत्पन्न जवळपास दोन ते चार कोटी व कार्बन क्रेडिट चे एक ते दीड कोटी वेगळे.
सध्या काळानुरूप तंत्रज्ञानात फार मोठा बदल झालाय. आता समुद्रात तेखील पवनचक्क्या ऊभ्या करण्याचं तंत्रज्ञान भारतात आलयं. विदेशात आधी पासुनच होतं. सध्या भारतात गुजरातच्या समुद्रात पवनचक्क्या ऊभारण सुरू झालय. डेन्मार्क ह्या देशात सर्वात जास्त पवनऊर्जेचा वापर केला जातो. त्या देशात जवळजवळ 80% वीजनिर्मिती पवनचक्क्यांपासुन होते.
भारतात ह्या क्षेत्रात सध्या फार मोठी गुंतवणूक सुरूय. व ह्या क्षेत्राचं भविष्य ऊज्वल आहे.
वाचने
45588
वाचनखूण
प्रतिक्रिया
131
छान माहिती
खूपच मस्त माहिती.. ह्यावर
In reply to खूपच मस्त माहिती.. ह्यावर by शलभ
प्लस वन.
छान लिहिलय. पाती कुठल्या
In reply to छान लिहिलय. पाती कुठल्या by अनुप ढेरे
पाती फायबरची असतात. त्यावर
In reply to पाती फायबरची असतात. त्यावर by अमरेंद्र बाहुबली
भारतातील पाती कुठे बनतात?
In reply to भारतातील पाती कुठे बनतात? by अनुप ढेरे
हो! पाती भारतातच बनतात. धुळे
In reply to हो! पाती भारतातच बनतात. धुळे by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद!
In reply to छान लिहिलय. पाती कुठल्या by अनुप ढेरे
रेझिन ची
छान लेख .आमच्या सातार्यातील
In reply to छान लेख .आमच्या सातार्यातील by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मी येऊन गेलोय तिथे. सज्जनगडा
छान माहीती.
In reply to छान माहीती. by बबन ताम्बे
हो वार्या चा परीणाम होतो.
In reply to छान माहीती. by बबन ताम्बे
हो
भारी लिहिलंय बाहुबली! काही
In reply to भारी लिहिलंय बाहुबली! काही by आदूबाळ
हो. जरूर विचारा!
खूप नवीन माहिती मिळाली
आता 6MW
In reply to आता 6MW by सामान्य वाचक
आपनही आहात का ह्या क्षेत्रात
In reply to आपनही आहात का ह्या क्षेत्रात by अमरेंद्र बाहुबली
होते , आत्ता नाही
In reply to आता 6MW by सामान्य वाचक
सामान्य वाचक. आपनही आहात का
उत्तम माहिती !
छान माहितीपूर्ण लेख
सुंदर माहिती !
छान माहिती
In reply to छान माहिती by चष्मेबद्दूर
तंत्रज्ञानात जास्त फरक नसतो.
In reply to तंत्रज्ञानात जास्त फरक नसतो. by अमरेंद्र बाहुबली
वजन?
In reply to वजन? by चष्मेबद्दूर
ईतकीही वजनदार नसते. फार छोटी
जर्मनीत यांचा अतिरेक होऊन
In reply to जर्मनीत यांचा अतिरेक होऊन by कंजूस
हो. बरोबर. तिथे हे क्षेत्र
In reply to हो. बरोबर. तिथे हे क्षेत्र by अमरेंद्र बाहुबली
मग तेथे बॅटरीवरच्या चारचाकी
माहितीपूर्ण लेख... नवीन
In reply to माहितीपूर्ण लेख... नवीन by मोदक
हे माहीत नव्हतं! नवीन माहिती
सोप्या भाषेत छान माहिती.
In reply to सोप्या भाषेत छान माहिती. by मार्मिक गोडसे
सबसीडी मीळत नाही. आणि ह्या
खूप छान माहिती दिली आहे. अजून
उत्तम लेख...छान माहिती.
In reply to उत्तम लेख...छान माहिती. by अमितदादा
ऊर्जेचं एककं वँट हे आहे. kwph
In reply to ऊर्जेचं एककं वँट हे आहे. kwph by अमरेंद्र बाहुबली
चूक, ऊर्जा म्हणजे energy
In reply to चूक, ऊर्जा म्हणजे energy by अमितदादा
अहो. ईथे आपण ऊत्पादन क्षमता
In reply to अहो. ईथे आपण ऊत्पादन क्षमता by अमरेंद्र बाहुबली
kWph हे युनिट च अस्तित्वात नाही, सहमत !
perhour" मधला per काढून टाका. 'KWH'चाच अर्थ, तासाला 'इतकी' किलोवॅट उर्जा असाच होतो. बाकि लेख अत्यंत माहितीपूर्ण आहे. यावर अजून लिहा.In reply to ऊर्जेचं एककं वँट हे आहे. kwph by अमरेंद्र बाहुबली
आधी चुकून पवनचिक्की वाचलं :)
उत्तम लेख. फार रोचक क्षेत्र
बरीच नवीन माहिती मिळाली या
In reply to बरीच नवीन माहिती मिळाली या by अत्रे
काँम्प्युटरला जोडलेल्या असतात
सुझलॉन
In reply to सुझलॉन by रामपुरी
कंपनीच्या पात्यात दोष (तडे
In reply to सुझलॉन by रामपुरी
सुझलाँन डबघाईला येण्याचं कारण
In reply to सुझलाँन डबघाईला येण्याचं कारण by अमरेंद्र बाहुबली
RE पॉवर हा एकच प्रॉब्लेम नव्हता
In reply to RE पॉवर हा एकच प्रॉब्लेम नव्हता by सामान्य वाचक
कमी वेळेत अमाप पैसा आल्याने..
In reply to सुझलॉन by रामपुरी
आयनॉक्स आणि सूझ्लॉन, दोन्हीचे
In reply to आयनॉक्स आणि सूझ्लॉन, दोन्हीचे by अनुप ढेरे
इन्फॅक्ट आयनॉक्सवर नव्या
उत्तम माहिती .
माहिती पूर्ण लेख. अजून आतल्या
In reply to माहिती पूर्ण लेख. अजून आतल्या by प्रमोद देर्देकर
ते नाही देऊ शकत. confidential
In reply to माहिती पूर्ण लेख. अजून आतल्या by प्रमोद देर्देकर
इथे तुम्हाला पाहिजे असलेली माहिती मिळेल.
पवणचक्क्यांमुळे पावसावर
In reply to पवणचक्क्यांमुळे पावसावर by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ह्या अफवा आहेत हो. 70 ते 110
In reply to पवणचक्क्यांमुळे पावसावर by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
हाच डौट होता!
In reply to पवणचक्क्यांमुळे पावसावर by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
सगळ्य पवनचक्क्या या हजार
सगळ्य पवनचक्क्या या हजार बाराशे मीटरवर उभ्या केल्याने ढगांचे फॉर्मेशन बिघडते व पाऊस कमी पडतो.खरेच ?! काही सर्वसामान्यपणे माहित असलेल्या वस्तूस्थिती पाहूया... १. ढगांचे फॉर्मेशन बिघडते व पाऊस कमी पडतो : सर्वप्रथम, पवनचक्क्या घरातल्या विजेच्या पंख्यासारखे काम करत नाही. घरातला पंखा विजेच्या वापराने हवा हलवून तिचा वारा बनवतो*, त्याविरुद्ध, पवनचक्की वारा निर्माण करत नाही तर वातावरणात वारा असलाच तर त्याने होणार्या यांत्रिक हालचालीचे रुपांतर विजेत करते. (*: संदर्भ : दुशली ब मधिल शास्त्राचा धडा --> "हवा हलू लागली की तिला वारा म्हणतात.") २. हजार-बाराशे मीटर उंचीच्या पवनचक्क्या : ???!!! =)) =)) =)) सर्व प्रकारे जगातली सर्वात उंच इमारत/रचना असलेली बुर्ज खलिफा ही इमारत ८३० मीटर उंच आहे. जगातली सर्वात उंच, Vestas V164 ही, पवनचक्की २२० मी उंच आहे. सर्वसाधारण पवनचक्क्यांची उंची १०० +/- १०-२० मीटर असते. जितकी उंच पवनचक्की तेवढी तिची किंमत, उभारणीचा खर्च, देखभालीचा खर्च आणि धोकादायकता वाढत जाणार आणि ती व्यापारासाठी अधिकाधिक निकामी होणार हे सांगायला नकोच*. (*: संदर्भ : सर्वसामान्य ज्ञान उर्फ कॉमन सेन्स) वरचे उद्धृत केलेले वाक्य (किंवा तश्या अर्थाचे विधान) काही काळापूर्वी एका राजकारणी व्यक्तीने केले होते. हे विधान, "आधुनिक शास्त्राचा गंधही नसलेले व राजकार-शास्राने ठासून भरलेले विधान स्वार्थाने प्रेरित आणि / किंवा बुद्धी गहाण ठेवलेल्या लोकांसाठी" आहे हे सिद्ध करायला फार हुशारी लागत नाही. अर्थातच, त्यावेळीही, बहुसंख्य लोकांनी त्या विधानाला केराची टोपलीच दाखवली होती :) साधेसुधे हुशार नव्हे तर टर्बोचार्जड फिलॉसॉफर अशी आयडी घेणारे सुद्धा असे साध्यासुध्या अफवांना बळी पडतात हे पाहून आश्चर्य वाटले ! =)) ;)In reply to सगळ्य पवनचक्क्या या हजार by डॉ सुहास म्हात्रे
सहमत!
In reply to सगळ्य पवनचक्क्या या हजार by डॉ सुहास म्हात्रे
त्या आरडाओरडी नंतर ...
In reply to त्या आरडाओरडी नंतर ... by बबन ताम्बे
"जलविद्युत केंद्रात याच
In reply to "जलविद्युत केंद्रात याच by मोदक
खरोखर असा आरोप झाला की नाही
In reply to खरोखर असा आरोप झाला की नाही by मार्मिक गोडसे
असा आरोप बहुतेक हरयाणात झाला होता .
In reply to असा आरोप बहुतेक हरयाणात झाला होता . by बबन ताम्बे
हो देवीलालच!
छान माहितीपूर्ण लेख! आवडला.
लेख आवडला. बरीच माहिती मिळाली
जर्मनीच्या नॅशनल - dwtv - या
छान माहीती
In reply to छान माहीती by IT hamal
माझं लेखन कधीच शुध्द नव्हतं
उत्तम माहिती. या पुर्वी विटा,
In reply to उत्तम माहिती. या पुर्वी विटा, by दुर्गविहारी
1990 च्या आधीही पवनचक्क्या
In reply to उत्तम माहिती. या पुर्वी विटा, by दुर्गविहारी
२०१३-१४ पासून Alstom -T&D चा
सुझलॉन चा भाव हजार च्या आसपास
In reply to सुझलॉन चा भाव हजार च्या आसपास by खाबुडकांदा
बरोबर! तुमच्या म्हणण्याला
माहितीपुर्ण लेख .
होय लेख खरच छान आहे. अभिनंदन
In reply to होय लेख खरच छान आहे. अभिनंदन by खाबुडकांदा
पाते कितीही असो. efficiency
ओके. धन्यवाद !
टेबलफ्यान वीज तयार करेल काय
+१
उत्तम माहिती
In reply to उत्तम माहिती by पैसा
हे कोणी सांगितले आपल्याला??
In reply to हे कोणी सांगितले आपल्याला?? by अमरेंद्र बाहुबली
ह्या सर्व अफवा आहेत हो.
In reply to ह्या सर्व अफवा आहेत हो. by अमरेंद्र बाहुबली
अमेरिकेतले आकडे मिळतात
In reply to अमेरिकेतले आकडे मिळतात by पैसा
आपल्याकडे असा अभ्यास सुद्धा
मी ही या विषयातील अधिकारी
दमण ला सुझलान आणि एनोरकॉन
In reply to दमण ला सुझलान आणि एनोरकॉन by जेडी
आता स्थीती उलट आहे. लोकं