सांज मुकी आक्रंदताना
ह्रदयाची उदास वाणी
पाखरांची हरवून वाट
सांजकीनारी ना साजणी
ओढून आसवांत रात्र
अंबरात केविलवाणे दिवे
या चिरेबंदी अंधारात
अवचित मिटून जावे
सर्वस्व उधळून तरीही
झेलीत शापांचे चांदणे
आयुष्याचा दाटून काळोख
धूसर पडसाद जुने
असुरी अनाहत दिशा
गहिवरला अंतरी गुंजारव
हेलावतो अतूट बंध
दिठीत तेवतो जन्म तुझ्यास्तव
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1237
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता ठीक आहे.
खोल आशय असलेली कविता.
धन्यवाद