[खो कथा] पोस्ट क्र. ५
[खो कथा] पोस्ट क्र. १
[खो कथा] पोस्ट क्र. २
[खो कथा] पोस्ट क्र. ३
[खो कथा] पोस्ट क्र. ४
खुदिराम: मी खुदिराम तांत्रिक नसून एक शास्त्रज्ञ आहे. हा आरसा माझ्या संशोधनाचा भाग आहे. प्रकाशाच्या विशिष्ट परिवर्तनातून एका मितीतून दुस-या मितीत तो घेऊन जातो. परंतु हा माझा शोध अजून पूर्णत्वाला गेलेला नाही. हा आरसा घेऊन मी माझ्या मुलांवर प्रयोग केला होता परंतु ते कुठल्या तरी मितीत अडकले आहेत. मी जर त्यांना शोधायला गेलो तर मीही कुठेतरी अडकून बसेन म्हणून मी शशिकांत कडे मदत मागितली होती. तोही तयार होता. पण नियतीने घात केला यामागे माझं कोणतंही चेटूक वगैरे नाही. शशिकांत आता जिवंत नाही .त्याचा मित्र म्हणून तू मला मदत कर. तुला करावीच लागेल. कारण ह्या आरश्याच्या चमत्कारात तू अडकला आहेस. एक तर तुला माझी मदत करावी लागेल किंवा अशीच उलथापालथ सहन करत मृत्यूला कवटाळावं लागेल.
बोल काय म्हणतोस?
आशोकः- एवढ सोप नाही आहे हे, माझा मित्र सुध्दा शास्त्रज्ञ होता तो ही प्रकाशासी संबंधित संशोधन करत होता. शशिकांत ने मरणा पुर्वि मला पाठविलेला मेल मी तुझ्याकडे येण्याआधीच वाचला आहे. त्यानुसार तर तु दुस-या मितितुन आला आहेस. "ही जागा, हे आयुष्य माझं नाही आणि मी इथे राहणार नाही" अस तु शशिकांतला म्हणाला होतास तसेच तु हे सुध्दा म्हणाल होतास की "...तुझ्या दोस्ताकडून मात्र माझं आयुष्य परत मिळवीनच", म्हणजे माझ्या कडुन. आणि आता तु स्वतःला
शास्त्रज्ञ म्हणतोस आणि प्रयोगात तुझे मुले कुठल्या तरी मितीत अडकले आहेत अस सांगतोस आणि माझी मदत मगतोस. तुझ्यावर विश्वास कसा ठेऊ. मला तर वाटत तु माझ्या मित्राला मारुन त्याच संशोधन चोरल आहेस. आणि आता माझा पण जिव घेशिल तुझं इसपित साध्या करण्यासाठी. बोल खर काय आहे. सोडव मला यातुन नाही तर मी मरेलच पण सोबत तुलाही नेईल.
खुदिराम:.................. [ कथा पुढे वाढविण्यसाठी खो देत आहे]
[खो कथा भाग १ ते ४ - आतापर्यंत... आणि भाग ५]
शालू आणि शशिकांत हे नवरा बायको आहेत. नाशिकमध्ये राहतात. अशोक हा शशिकांतचा लहानपणीचा मित्र आणि अगदी घरातला मेँबर असल्यासारखा आहे. तो मुंबईला राहतो. खुदीराम नावाचा गुढ इसम पांडव लेण्यांच्या परिसरात राहत असतो. एकदा खुदीरामची आणि शशिकांतची भेट होते. या भेटीत तो शशिकांतला त्याच्याजवळ असलेल्या गुढ आरशाबद्दल सांगतो. आरसा पाहिल्यावर शशिकांतला तो खुपच आवडतो त्याला त्याच्या पुढिल संशोधनासाठी फायद्याच असतो. तो खुदीरामकडे आरशाची मागणी करतो. खुदीराम त्याच्यासमोर दोन अटी ठेवतो - १. आरशाबद्दल तू कुणालाच सांगायचं नाहीस. सांगितलं तर तुझा मृत्यू अटळ आहे. २. तुला माझी मदत करावी लागेल. बोल कबूल आहे? यावर शशिकांत म्हणतो कबूल आहे पण माझा एक मित्र आहे, अशोक. त्याला अशा गोष्टींत इंटरेस्ट आहे. फक्त त्याला सांगतो, चालेल का? खुदीराम म्हणतो ठीक आहे पण याद राख... याव्यतिरिक्त जर अजून कुणाला कळाले तर तुझा मृत्यू अटळ आहे. ह्या आरस्याबद्दल शशिकांत अशोकजवळ बोलतो व त्याला नाशिकला येण्याची गळ घालतो.अशोकही उत्सुकतेपोटी नाशिकला जातो. नंतर शशिकांत आणि अशोक पांडवलेणीकडे जातात सोबत शालूही असते. शशिकांत जेव्हा पांडवलेणीच्या आसपास खुदिरामला शोधत असतो तेव्हा चुकून अशोक आरशाविषयी शालूजवळ बोलतो व तिला आरसा दाखवतो.नंतर ही गोष्ट शालू शशिकांतला सांगते. हे ऐकून धक्क्याने/ भितीने शशिकांत मरतो. शशिकांतच्या मरणाला आपणच जबाबदार आहोत असे वाटुन काही दिवसांनी शालूही आत्महत्या करते. मधल्या काळात अशोक खुदिरामला गाठतो. खुदिरामकडून तो आरसा मिळवतो. तो आरसा मिळाल्यानंतर अशोकच्या आयुष्यात बराच गोंधळ उडतो. या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी अशोक पुन्हा खुदिरामकडे जातो. त्या दोघांमध्ये खूप बाचाबाची होते. शेवटी खुदिराम नरमतो व त्याला सत्य परिस्थिती सांगतो.Book traversal links for [खो कथा] पोस्ट क्र. ५
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे काही तरी वेगळंच झालंय ह्या
आता पुढे नक्की काय लिहतील
झक्कास. मजा आली. पण खो कोणाला
पुढचा खो चॅटसवूड यांना देत आहे.
धन्यवाद दीपकजी : )
कथासूत्र रिकॅप केल्याने आता
छान दीपकजी. मजा आली.
आता सगळ्याचा संदर्भ लागतोय.
उत्कंठावर्धक!!!!
अर्धे जिगसॉ जुळवून
रिक्याप साठी धन्यवाद !
छान
++१११.. जरा जास्तच लवकर शेवट
भन्नाट ट्वीस्ट
कथा अजुन मोठी हवी होती
धन्यवाद @
धन्यवाद @
पिलीयन रायडर, ज्योति अलवनि, चॅट्सवूड, गवि, अॅस्ट्रोनाट विनय, प्राची अश्विनी, आषाढ_दर्द_गाणे, जव्हेरगंज, मोहन, पैसा, सौरा, टवाळ कार्टा, बरखा@
मोहन, पैसा, सौरा, बरखा--बरोबर आहे, भाग जरा छोटा झाला आहे, वाढवता आला असता पण पहिला प्रयत्न होता आणि पोस्ट करायची घाई पण
मस्त
मस्त ! धन्यवाद सगळं विस्कटून
जमलाय
खो कथेच्या वर आता जी
अनुक्रमणिका
नाही छोटेखानी असला जरी हा भाग
हो
चांगल्या खेळाडूला परत खो देता