Skip to main content

PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!

लेखक डँबिस००७ यांनी बुधवार, 01/03/2017 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
एका राम सुब्रमण्यम नावाच्या बेकार माणसाने एका बिंडोक मॉडेलला घेऊन " वॉईस ऑफ राम " या बॅनरसाठी एक फिल्म बनवली. त्यानंतर हा उठलेला गदारोळ !! PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !! ह्या वाक्याचा अर्थ कोणी मला समजुन सांगेल का ? ह्या राम सुब्रमण्यंम चे काम : While the Profile for Peace campaign found many takers from both the neighbouring countries, celebrities like filmmaker Mahesh Bhatt and music composer Vishal Dadlani also extended their support. It was relaunched last year after Indian army’s surgical strike across the Line of Control (LoC) into Pakistani territory. Subramanian who has volunteered for Arvind Kejriwal’s anti-corruption political movement claims that he is not a member of the Aam Aadmi Party. गुरमेहर कौरचे वडिल पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगील युद्धात शहीद झाले, तेंव्हा ही गुरमेहेर फक्त २ वर्षांंची होती.

वाचने 28905
प्रतिक्रिया 144

प्रतिक्रिया

In reply to by फेदरवेट साहेब

'युद्धात बाप गेलेल्या पोरीने युद्धविहीन जगाची कल्पना करणे हे प्रॅक्टिकल नसले तरी तिच्या वैयक्तिक आयुष्या संदर्भातील फॅक्ट पाहून तिने युटोपियन संकल्पना मांडली तरी तिच्यावर शरसंधान करणे कितपत माणुसकी अन औचित्याला धरून असेल?'
नाहीच ना. मी पण माझ्या प्रतिसादात म्हटलेच आहे की अशी शेखमहंमदी स्वप्ने बघणे हा मूर्खपणा असला तरी त्यात आक्षेप घेण्यासारखे नाही. तरीही एक गोष्ट पुढे येत आहे. गुरमेहर ही काही हलकटांच्या हातातील एक प्यादे म्हणून पुढे येत आहे. काल सिमरनजितसिंग मान यांनीही तिच्या समर्थनार्थ टिवटिवाट केला आहे अशा बातम्या आहेत. नेहमीचे यशस्वी कलाकार--केजरीवाल, काँग्रेसचे नेते इत्यादी आहेतच. असे लोक प्यादे म्हणून एखाद्याला वापरत असतील तर ती व्यक्ती मुळात काही प्रमाणात तरी तशी असलीच पाहिजे. केजरीवाल माझ्यासारख्या कोणाला प्यादे म्हणून वापरूच शकणार नाहीत कारण माझ्यासारखे पहिल्यांदाच तो प्लॅन हाणून पाडतील. आणि अशा लोकांचे प्यादे म्हणून ती मुलगी स्वतःला वापरू देत असेल तर त्याबद्दल काही प्रमाणात तरी तिच्यावर टिका होणारच.
तुम्ही जेव्हा 'पाकडे' म्हणता त्यात नेमके कोण कोण समाविष्ट असते
भारताविषयी वाईट भावना असलेले सगळे. मग ते सामान्य लोक असोत की सरकारमध्ये बसलेले असोत की आय.एस.आय मधले असोत की लष्करातले असोत.

In reply to by फेदरवेट साहेब

फेदरवेट साहेब कामटे, तुकाराम ओंबळे इ लोकांना मुंबईत घुसून कसाब आणि त्यांच्या इतर दहशतवाद्यांनी मारले.हे तर युद्ध नव्हते ना? कि रुमालात हात बांधून पाकिस्तानला शरणागत जायचे? तुम्ही म्हणाल त्या मागण्या मान्य करू पण युद्ध नको. तत्व म्हणून युद्ध नको हे ठीक पण शेळीची अहिंसा हि भंपक असते हे लक्षात ठेवले पहिजे. जैन आणि बुद्ध धर्म भारतात टिकले कारण हिंदूंनी शास्त्र हातात घेतले होते हे विसरून चालणार नाही. गुरमेहर कौर च्या वडिलांचे हौतात्म्याला वंदन करून मी एवढेच म्हणेन कि आपला वापर कुणाला आणि कशासाठी करू द्यायचा हे त्या मुलीला समजत नसेल तर ते तिचं दुर्दैव आहे. तिच्या सारख्या अशा काही अधिकाऱ्यांच्या मुलांच्या संपर्कात आजही मी आहे. ( ज्यांचे वडील लष्करी कारवाईत हुतात्मा झाले.) जर ती आपल्या वडिलांच्या हौतात्म्याचे राजकारण करत असेल तर तिचा पूर्ण निषेध. आता राहिला प्रश्न पाकडे म्हणजे कोण यात तुम्ही वर्णन केलेले चारही लोक येतात होय पाकिस्तानी जनता सुद्धा. कारण गेल्या ७० वर्षात त्यांना भारत काश्मीर मध्ये मुसलमानांवर अनन्वित अत्याचार करीत आहे आणि काश्मीरमधील मुसलमानांच्या अत्याचाराचा बदला घेतला पाहिजे हा इतिहास सातवी आठवी पासून शिकवला जातो. मुद्दाम पाकिस्तानी शाळात शिकवला जाणारा इतिहास काय आहे याचे खोदकाम करून पहा. अख्ख्या दोन पिढ्यांचे मानसिक दूषीकरण झाले असल्याने आता शांततेची कबुतरे उडवून काहीही साध्य होणार नाही. काँग्रेस पक्ष केवळ मतांसाठी हे "अमन कि आशा" गीत आळवत असते. बॉलिवूड चे 'सगळेच" लोक हरामखोर आहेत. आपले सिनेमे पाकिस्तानात चालावेत म्हणून तेथील सर्व लोक शांती, अमन इ नाटकीपणा चालवत असतात. त्यांच्यासाठी पैसे हेच सर्वस्व आहे देश खड्ड्यात गेला तरी चालेल. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला सज्जड प्रत्युत्तर ( सर्जिकल स्ट्राईक) मिळेल. जेंव्हा "ब्लीडींग विथ थाऊजंड कट्स" या त्यांच्या डावपेचाला "ब्लीडींग विथ मिलियन कट्स" असेच उत्तर मिळेल तेंव्हाच पाकिस्तानची नाटके थांबतील.massive retaliation भयंकर प्रतिहल्ला याची भीती पाकिस्तानी हृदयात धडकी बसवेल तेंव्हा हि त्यांची नाटके कमी होतील. कबुतरे उडवली तर ती तुमच्याच डोक्यावर बसून डोक्यावरच शीटतात हे अजून आपल्या सुडो सेक्युलर ओकून कळत नाही हेच आपले दुर्दैव

गॅरी ट्रुमन आणि डॉ खरे यांचे प्रतिसाद नेहमीप्रमाणेच आवडले. फेद्॑रवेट साहेबांचे मुद्दे व्यक्तीचा विचार करता योग्य आहेत. पण समूहाचे मानसशास्त्र आणि वागणे याचा विचार करताना त्यांचे महत्त्व कमी होते.

यापुर्वी या डाव्यांची भारताच्या धोरण निर्मितीत मजबुत पकड होती आणि दिल्लीच्या वरीष्ठ वर्तुळात यांच्या मनाप्रमाणे ध्येय्य धोरणे सहज तयार होत होती. त्यातुन यांना भरपुर पैसा आणि सवलती मिळत होत्या. त्या आता बंद झाल्यात. एबीव्हीपी ने डाव्या संघटनांच्या हडेलहप्पी प्रकाराच्या विरोधात सरळ संघर्ष सुरु केल्याने यांची कोंडी होत आहे. सरकारचा विरोध, हातात पैसा नाही, संघटना चालविणे अवघड, जनतेचा पाठिंबा तर राहिला नाहीच त्यात विरोध सुरु झाला या कोंडीत डावे सापडलेत. मागील एक महिन्यात केजरीवाल टीव्हीवर दिसत नव्हता. त्याचा आपला भयानक त्रास होत असेल. या सर्व असंतुष्टांच्या सहभागाने रामजसची पटकथा लिहली असेल असे म्हणायला हरकत नाही. रामजसच्या प्राचार्याला उमर खालीद आणि ईतर वक्ते आल्यावर काय होईल याची कल्पना नसेल असे कसे समजायचे? हे ठरवलेले आणि घडवलेले आहे. एबीव्हीपी आणि भाजपाची प्रतिक्रिया काय होणार याविषयी खात्री असावी.

माझ्या माहिती प्रमाणे आणि "आज तक" या वाहिनीवर दिनांक २८/०२/२०१७ रोजी रात्री दाखवलेल्या माहिती प्रमाणे (जी त्यांनी सैनादलाकडून मिळवलेली आहे) गुरमेहेर कौर चे वडील कारगिल युद्धात शहिद झालेले नसून ते कुपवाडा मध्ये आतंकी लोकाबरोबरील चकमकीत शहिद झालेले आहेत आणि इतकी basic माहिती सुद्धा तिला असू नये याचे आश्चर्य वाटते. जी मुलगी आपल्या वडीलांच्या मृत्यू बद्दल इतकी बेफिकीर असू शकते त्या मुलीच्या या प्रकारे केलेल्या twit ला काय अर्थ असू शकतो . यु ट्यूब वर वरील विडिओ ची लिंक मिळाली कि लवकरात लवकर देण्याचा प्रयन्त करतो

साहेब, वडील प्रत्यक्ष युद्धात मारले गेले कि घुसखोरीविरुद्ध कार्यवाहीत(CI ops) मारले गेले हे माझ्या दृष्टीने गौण आहे. कारण असे कर्तव्य करीत असताना मृत्यूच्या छायेतच वावरावे लागते. ते प्रत्यक्ष शत्रूच्या विरुद्ध लढत असताना मारले गेले आहेत ( killed in action) आणि त्यामुळे त्यांच्या हौतात्म्यात कोणतीही कसर येत नाही. मुलीला हे माहित "असणारच" पण ती सुडोसेक्युलर लोकांच्या हातातील प्यादे बनून राहिली आहे. आणि अशा वक्तव्याला फाटे फुटले कि हेच सुडोसेक्युलर लोक म्हणणार कि, "पहा हिचे वडील हुतात्मा झाले आणि या "तथाकथित देशभक्तांना" त्यांची कदरच नाही". हे सर्व हलकटपणाचे डावपेच असतात. http://indiatoday.intoday.in/story/gurmehar-kaur-captain-mandeep-singh-…

पण दोन्ही बाजूच्या आततायी विचारांनी हे राजकारण बाहेर आलं . मुळात त्या मुलीकडे लक्षच द्यायला नव्हतं पाहिजे . असे शांतीचे कबुतर सोडणारे लै झाले भारतात . त्यावर मीच देशभक्त म्हणून लोकांनी धडाधड सोशल मीडिया वर प्रतिक्रिया देऊन त्यांचीही इमेज गेली . तिच्या बोलण्यात एक वाक्य होतं पाकिस्तान नाही युद्धाने मारलं . म्हणजे काय भारत एकाचवेळी १०० लोकांशी युद्ध खेळत असतो का ???ते पाहून तेवढं सांगता आलं असतं बाई हे चूक आहे .पण सगळीकडून आततायी पणा नडला.

In reply to by वरुण मोहिते

एक्साक्टली... समजावून सांगणे आणि समजून घेणे हा प्रकारचं उरला नाही. लगेच हमरातुम्बरी. बाकी वरील बरेच गोलगोल प्रतिसाद आणि त्याला दिलेले अनुमोदन एकच अजेंडा पुढे रेटण्याची धडपड दिसत आहे, हे लपून राहिले नाही.

पहिले तर तो ट्विटर नावाचा टिवटिवाट बंद केला पाहिजे. देशातल्या कोणत्यातरी कॉलेजमध्ये दोन-चार पोट्टे भांडले तर अक्ख्या देशात युद्ध चालू झाल्याचं चित्र ट्विटरवर दिसतं. हे अश्या प्रकारचे भांडणं प्रत्येक गल्लीबोळातल्या कॉलेजमध्ये रोजच होत असतील. त्यांना इतकं महत्व देण्याचं कारण नाही. राहिला प्रश्न त्या मुलीचा तर तिचे विचार अति आदर्शवादी आहेत. पण तसे विचार ठेवण्यात काही गैर वाटत नाही. फक्त देशातला प्रत्येक हरामखोर राजकारणी आपला उपयोग करून घेत आहे (ह्यात उजवे -डावे-आडवे -उभे सगळेच आलेत) हे तिला कदाचित कळत नसावं.

In reply to by चिनार

राहिला प्रश्न त्या मुलीचा तर तिचे विचार अति आदर्शवादी आहेत. पण तसे विचार ठेवण्यात काही गैर वाटत नाही.>>> -- तीव्र सहमत. त्याचबरोबर त्या मुलीला विरोध करणारे सुद्धा अति राष्ट्रवादी (?) आहेत. पण तसे विचार ठेवण्यात ही काही गैर वाटत नाही. हे राजकारणी त्यांचा उपयोग करून घेत आहेत हे त्या बिचाऱ्या मुलीला आणि एबीव्हीप च्या मुलांना पण कळत नसावं, याची खंत वाटते.

In reply to by विशुमित

राष्ट्रवादाची अलीकडली व्याख्या : राष्ट्रवाद: ज्यात राष्ट्रहित सोडून इतर सर्व गोष्टींवर वाद घातला जातो तो राष्ट्रवाद.. ज्यादिवशी राष्ट्रवादाचा अर्थ समजून घेण्याची कुवत परमेश्वर माझ्यासहित सर्वांना देईल तो सुदिन!

In reply to by चिनार

राष्ट्रवादाची अलीकडली व्याख्या : राष्ट्रवाद: ज्यात राष्ट्रहित सोडून इतर सर्व गोष्टींवर वाद घातला जातो तो राष्ट्रवाद.. +1111111

In reply to by विशुमित

स्वयंघोषित राष्ट्रवादी तयार होत आहेत . अशी संधी मिळाली नव्हती म्हणून . बराच काळ काँग्रेस च वर्चस्व होत . त्यावेळी देशासाठी काँगेस ने चांगले निर्णय घेतलेही असतील . पण राष्ट्रभक्त ह्या विचारसरणी ला तेव्हा चालना मिळाली नाही . जी आताच्या काळात मिळाली . प्रश्न वृत्तीचा असतो . जगात सगळीकडे राष्ट्रभक्त हा मुद्दा झालाय केव्हा ना केव्हातरी . हि मानसिकता आहे .आणि ह्या मानसिकतेतून काहीच साध्य होत नाही .

In reply to by चिनार

राष्ट्रवादाची अलीकडली व्याख्या : राष्ट्रवाद: ज्यात राष्ट्रहित सोडून इतर सर्व गोष्टींवर वाद घातला जातो तो राष्ट्रवाद..
बाकीचा फापटपसारा राहू द्या हो. फक्त खाली दिलेल्या गोष्टीसारख्या गोष्टींवर आक्षेप घेतला तर तसा आक्षेप घेणे म्हणजे राष्ट्रहित सोडून इतर सगळ्या गोष्टींवर घातलेला वाद का?की ते पण अभिव्यक्तीस्वातंत्र्य? एकदाचा उलगडा होऊन जाऊ द्या. JNU अशा पध्दतीने दिशाभूल करून मुख्य विषयावरून लक्ष भरकटवायचे काम विचारवंत नेहमीच करत असतात.

In reply to by गॅरी ट्रुमन

अशा पध्दतीने दिशाभूल करून मुख्य विषयावरून लक्ष भरकटवायचे काम विचारवंत नेहमीच करत असतात. बाबो!! हे वाक्य मला उद्देशून आहे की काय ??? मी नाही हो ट्रुमन भाऊ विचारवंत... शिवाय थोडीशी सुधारणा.. अशा पध्दतीने दिशाभूल करून मुख्य विषयावरून लक्ष भरकटवायचे काम विचारवंत/राजकारणी/सरकार/विरोधक/समाजकंटक नेहमीच करत असतात. राहिला प्रश्न ह्या पोश्टरचा.. ज्याने कोणी हे असले पोश्टर लावले असतील त्याच्या पार्श्वभागावर फटके द्यायला हवे. पण ते कोणी ?? तर पोलिसांनी आणि न्यायव्यवस्थेने...अभाविप आणि इतर कोणत्याही संघटनेला तसे करण्याचा अधिकार आहे का? झालंय काय की आजकाल मूळ विषय बाजूला राहतो आणि सुरु होतो तो बोभाटा..मग बोभाटयावर बोभाटा...बोभाटयावरच्या बोभाटयावर बोभाटा..आणि तुमच्या आमच्यासमोर येतो एक वेगळाच बोभाटा.. माना अथवा नका मानू पण ह्या सगळ्याला सोशल नेटवर्किंग थोड्याफार प्रमाणात जबाबदार आहेच. त्यावर नियंत्रण हवे. पण तसे केल्यास परत अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे बोंबा चालू होतील.

In reply to by चिनार

मी नाही हो ट्रुमन भाऊ विचारवंत...
नक्कीच :)
अभाविप आणि इतर कोणत्याही संघटनेला तसे करण्याचा अधिकार आहे का?
नक्कीच नाही ना. ते काम पोलिसांचे आणि न्यायव्यवस्थेचेच. पण प्रश्न कुठे निर्माण होतो? असे काही तिरपागडे विचार ठेवणे यात काही चुकीचे आहे हेच विचारवंतांना वाटत नसते. अशा विचारवंतांना शारीरीक नाही तरी शाब्दिक लाठ्या मिपासारख्या ठिकाणी लगावल्या जाणारच. कुठेही शारीरीक लाठ्या लगावल्या जात असतील तर ते नक्कीच चुकीचे आहे.
माना अथवा नका मानू पण ह्या सगळ्याला सोशल नेटवर्किंग थोड्याफार प्रमाणात जबाबदार आहेच.
मी म्हणेन याला मानवी स्वभाव जास्त जबाबदार आहे. सोशल मिडिया हे एक व्यासपीठ मिळाले आणि गॉसिप जास्त प्रमाणावर पसरले. एक उदाहरण द्यायचे झाले तर लॅन्डलाईन फोन आल्यानंतर पूर्वी 'कानगोष्टी' स्वरूपातील गॉसिप जास्त प्रमाणावर पसरले त्याला लॅन्डलाईन फोनपेक्षा मुळातील गॉसिपिंग प्रवृत्ती जास्त जबाबदार आहे. तसेच काहीसे सोशल मिडियाच्या बाबतीत.

१. गुरमेहर कौर या 'व्यक्ति'ला(शहीदाची मुलगी वगैरे नव्हे) आपले मत व्यक्त करण्याचा मुलभूत अधिकार घटनेने दिला आहे. तो समाजाने मान्य केला आहे. कायदेमंडळाने त्याच्या रक्षणासाठी कायदे केलेले आहेत आणि न्यायपालीका तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कटीबद्ध आहे. तिचे मतस्वातंत्र्य अबाधीत आहे आणि त्याचा मी आदर करतो. २. तरीदेखील तिचे विधान तद्दन गल्लाभरू, दांभिक आहे असा दावा करण्याचा आणि तिच्या वाक्यांची तार्किक चिरफाड करण्याचा अधिकार सेहवाग, मी, रणदीप हूडा आणि समस्त भारतियांना आहे. गुरमेहर करते ती अभिव्यक्ति आणि सेहवागचे ते ट्रोलींग आणि बुलीइंग हा वेगळा न्याय का? ३. सध्या तीने केलेले 'मी अभाविप ला घाबरत नाही' हे विधान योग्य आहे. माझ्या मते, कुठल्याही विद्यार्थी संघटनेला (डाव्यांची असो वा हिंदूत्ववाद्यांची) इतर विद्यार्थ्यांनी घाबरणे हे चांगले नाही. ४. कन्हैय्या असो वा सध्याचे हे रामजास कॉलेज प्रकरण, या दोहोंचाही हेतू आपापल्या शक्तींचे प्रदर्शन करणे हाच आहे. भाजपच्या मागे सामान्यांत असलेला प्रचंड पाठींबा आहे तर डाव्यांच्या बाजूला त्यांनी इतकी वर्षे निगुतीने सांभाळलेली डाव्या विचारांची बुद्धीवादी मंडळी आहेत. तुम्ही राष्ट्रद्रोही आहात हे ठरवायला उजव्या बाजूच्या मंडळींना एक सेकंदही लागत नाही, तुम्ही भाजपाच्या विरोधात काहीही बोललाअत की झाले. दुसर्‍या बाजूला नुसते सेहवागला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय? असे विचारलंत की तुम्ही फॅसिस्ट, ट्रोल होता, हिंदूराज्य निर्माण करण्याच्या संघाच्या कटात तुम्ही सहभागी आहात, असे डावे म्हणतात. मध्यममार्गी, असल्या कुठल्याही विचारधारेच्या आहारी न गेलेल्या विचारी जनांची असल्या टोणग्यांमुळे आणी त्यांच्या रोज चालणार्‍या कळवंडीमुळे निष्कारण कुचंबणा होते. तेव्हा शहाण्यांनी असल्या कोणत्याही आयडियॉलॉजीला शरण न जाता प्रत्येक घटनेचा स्वतंत्रपणे संविधान, मानवी मुल्ये, नैतिकता आणि राष्ट्रीय सुरक्षा या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मत बनवावे असे वाटते.

गुरमेहर करते ती अभिव्यक्ति आणि सेहवागचे ते ट्रोलींग आणि बुलीइंग हा वेगळा न्याय का? हे असं विचारलं तर तुमचं बुर्ज्वा, बुरसटलेल्या विचारांचे, प्रतिगामी, मनुवादी, स्वातंत्र्यवैरी अशा विशेषणांनी मिपावरील बुद्धिवंतांकडून स्वागत होईल.

In reply to by सुबोध खरे

अन गुरमेहरला तिचे मत मांडायचे स्वातंत्र्य आहे, असे म्हणले की (ते ही तिचा वापर होतोय हा मुद्दा मान्य केल्यावर) सुद्धा 'खणखणीत प्रतिसाद डाव्या अन समाजवाद्यांना' असे नथीतून तीर मारल्या जातात, माझ्यामते डॉक्टर सौरा एकंदरीत पूर्ण व्यवस्थेबद्दल बोलतायत फक्त मिपाबद्दल नाही , मिपाचे काय घेऊन बसलात, परवाच एक पात्र 'अरे वा तुम्ही पण कुंपणावरचे का?' म्हणून एका (त्यातल्यात्यात) निष्पक्ष माणसाची लाज काढून गेलं, मुद्दा काय मूर्खपणा कुठेच चुकलेला नाही, डावे नाही का उजवे नाही. आपला कल जिकडे असतो त्याच्या विरुद्ध दिशेने किटाळ दिसते फक्त :)

थोडक्यात सारांश - १) गुरमेहर कौर या व्यक्तीला आपले मत असण्याचे, ते जाहीरपणे बोलून दाखविण्याचे, एखाद्या संघटनेविरूद्ध असण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याला विरोध करणे अयोग्य आहे. २) तिने १०-१२ फलक तयार करून ते एकापाठोपाठ दाखविण्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रदर्शित केली. असे करण्याचा तिला पूर्ण हक्क आहे. ३) आपले वडील आपण २ वर्षाच्या असताना कारगिल युद्धात मारले गेले. सुरवातीची काही वर्षे आपण मुस्लिमविरोधी होतो. परंतु मला आईने समजावून सांगितले व त्यामुळे आपले वडील पाकिस्तानने मारले नसून त्यांना युद्धाने मारले आहे असे आपले मत जाहीर सांगण्याचा तिला पूर्ण हक्क आहे. ४) तिने समाजमाध्यमांवर आपली चित्रफीत प्रदर्शित केल्यानंतर त्यावर तिच्या बाजूने किंवा विरूद्ध प्रतिक्रिया देण्याचा सर्वांना पूर्ण हक्क आहे. ५) सेहवागने किंवा भाजपच्या एका मंत्र्याने प्रसिद्ध केलेले चित्र हे तिच्या "आपले वडील पाकिस्तानने मारले नसून त्यांना युद्धाने मारले आहे" या तिच्या एका फलकावरील वाक्याविरूद्ध दिलेली उपरोधिक प्रतिक्रिया होती. अशी प्रतिक्रिया देण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे. अशी प्रतिक्रिया देताना सेहवागने युद्धाची तुलना क्रिकेटशी किंवा भाजपच्या मंत्र्याने तिची तुलना दाऊदशी केलेली नसून आणि तिचा किंवा तिच्या वडीलांच्या हौतात्म्याचा अपमान केलेला नसून, तिच्या फलकावरील वाक्यावर दिलेली ही उपरोधिक प्रतिक्रिया आहे. हिरोशिमा व नागासकी येथील लाखो नागरिकांना अमेरिकेने मारले नसून युद्धाने त्यांना मारले आहे किंवा ६० लाख ज्यूंना हिटलरने मारले नसून युद्धाने त्यांना मारले आहे हा युक्तिवाद जितका हास्यास्पद भासेल तितकाच माझे वडील पाकिस्तानने मारले नसून त्यांना युद्धाने मारले आहे हा युक्तीवाद देखील हास्यास्पद आहे. यापुढे जाऊन असेही म्हणता येईल की तिच्या वडीलांना युद्धाने मारले नसून भारताने मारले आहे कारण भारताने १९९९ मध्ये युद्ध न करता शांततेची बोलणी केली असती तर युद्धच झाले नसते व तिचे वडील शहीद झालेच नसते. अर्थात तिच्या नकळत ती पुढे आणत असलेली विचारसरणी देशासाठी घातक आहे हे तिच्या अजून लक्षात आलेले नाही. या देशात एक विशिष्ट वर्ग भारत-पाकिस्तानमधील तणावाला, युद्धांना, दहशतवादी हल्ल्यांना, काश्मिरमधील फुटिरतावादाला व परिस्थितीला पाकिस्तान जबाबदार नसून भारतच जबाबदार आहे असे मानतो. भारत काश्मिरींवर अत्याचार करीत आहे, भारत तिथे दडपशाही करीत आहे असा ते सातत्याने प्रचार करीत असतात. भारताने काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे, काश्मिरला स्वातंत्र्य द्यावे, सीमेच्या दोन्ही बाजूकडील नागरिकांना व्हिसाची अट न घातला मुक्तद्वार ठेवावे अशा तर्‍हेच्या मागण्या ते वारंवार करीत असतात. असे करण्याने उर्वरीत भारतावर किती वाईट परीणाम होईल याचा विचारदेखील त्यांच्या मनात येत नाही. मालेगाव, समझोता एक्सप्रेस, अजमेर इ. ठिकाणी झालेले बॉम्बस्फोट "हिंदू" अतिरेक्यांनी केले, गोध्रामध्ये हिंदूंनी मुस्लिमांचे वांशिक हत्याकांड केले, संसदेवरील हल्ला हे वाजपेयी व अडवानींचेच कारस्थान होते, इशरत जहां निर्दोष होती, अफजल गुरू निर्दोष होता, याकूब मेमनची फाशी म्हणजे न्यायालयीन हत्या असा प्रचार ते आंतरराष्ट्रीय पातळीवर करून भारताची बाजू लंगडी करण्याचा ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. ही मुलगी दाखवित असलेल्या फलकातून देशासाठी अत्यंत घातक असलेली हीच ती "बुद्धीवादी निधर्मी व पुरोगामी" विचारसरणी पुढे येते आहे हे या मुलीच्या लक्षात आलेले दिसत नाही. ६) तिला ज्यांनी मारहाणीच्या किंवा बलात्काराच्या धमक्या दिल्या असतील, त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. अशा धमक्या देणे अत्यंच चूक आहे. ७) तिने #studentagainstABVP असा हॅशटॅग प्रसिद्ध केला असून आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने असून हिंसाचाराच्या विरूद्ध आहोत असे तिने सांगितले आहे. यातून जरा गोंधळ निर्माण होतो. ती इतर कोणत्याची विद्यार्थी संघटनांविरूद्ध नसुन फक्त अभाविपविरूद्ध आहे, ती फक्त अभाविपने केलेल्या कथित हिंसाचाराविरूद्ध असून इतर विद्यार्थी संघटनांच्या हिंसाचाराविरूद्ध नाही, अभाविप वगळता इतर विद्यार्थी संघटना अजिबात हिंसाचार करीत नाहीत असे अनेक गैरसमज यातून निर्माण होऊ शकतात. ८) या सर्व प्रकरणात केजरीवाल, राहुल, डावे नेते इ. यशस्वी कलाकारांनी भरपूर तेल ओतले असून आपल्या पोळ्या भाजून घेण्याचे कार्य सुरू आहे. तिचा प्यादे म्हणून वापर करून या निमित्ताने मोदी सरकार, अभाविप, भाजप इ. विरूद्ध वातावरण पेटवायचे प्रयत्न सुरू आहेत. २०१५ मध्ये एफटीआयआय, २०१६ मध्ये आधी हैद्राबाद विद्यापीठ व नंतर जनेवि येथे अगदी याच पद्धतीने वातावरण पेटविले गेले होते. आताही अगदी तसेच सुरू आहे. ९) १५-२० दिवसांपूर्वी मराठवाडा विद्यापीठात आयोजित केलेला दीनदयाळ उपाद्याय जयंतीचा कार्यक्रम बहुजन विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळला होता. शाजिया इल्मी यांना अलिगड विद्यापीठात तलाक विषयावर बोलण्यासाठी मज्जाव करण्यात आला. काही वर्षांपूर्वी तस्लीमा नसरीन यांच्यावर दोन वेळा शारिरीक हल्ला झाला होता. २-३ आठवड्यांपूर्वी जनेविमधील निष्पक्ष वृत्तीचे प्रा. मकरंद परांजपे यांना तेथील काही विद्यार्थ्यांनी त्त्यांना यांच्या कार्यालयात जाण्यास मज्जाव करून त्यांना अडवून धरले. त्यांनी वारंवार विनंती करूनसुद्धा त्यांना अडवून धरण्यात आले. माझ्या कार्यालयात जाणे हा माझा हक्क आहे हे वारंवार सांगूनसुद्धा विद्यार्थ्यांनी ऐकले नाही. शेवटी त्यांनी गांधीवादी पद्धतीने सर्व विद्यांर्थ्याचे पाय धरले. याची चित्रफीत उपलब्ध आहे. जनेवि किंवा रामजसमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जीवाच्या आकांताने टाहो फोडणारे या प्रकारांबद्दल अजूनही मूग गिळुन गप्प आहे. निवडक विरोध व निवडक मौन हे यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. १०) लहानपणी मुस्लिमविरोधी असलेली मुलगी आज वडीलांच्या मृत्युसाठी पाकिस्तानला जबाबदार धरीत नाही. कदाचित अजून १०-१५ वर्षांनी तिच्या जाणीवेच्या कक्षा विस्तृत झाल्यानंतर खरोखर पाकिस्तानमुळेच आपले वडील गेले असे तिच्या लक्षात येऊ शकेल किंवा कदाचित आताच्याच मार्गावर पुढे जाऊन, "माझ्या वडीलांना युद्धाने मारले नसून, त्यासाठी आक्रमक भारतच जबाबदार आहे" अशीही तिची समजूत होऊ शकेल. ११) ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार होणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.

In reply to by श्रीगुरुजी

२-३ आठवड्यांपूर्वी जनेविमधील निष्पक्ष वृत्तीचे प्रा. मकरंद परांजपे यांना तेथील काही विद्यार्थ्यांनी त्त्यांना यांच्या कार्यालयात जाण्यास मज्जाव करून त्यांना अडवून धरले. त्यांनी वारंवार विनंती करूनसुद्धा त्यांना अडवून धरण्यात आले. माझ्या कार्यालयात जाणे हा माझा हक्क आहे हे वारंवार सांगूनसुद्धा विद्यार्थ्यांनी ऐकले नाही. शेवटी त्यांनी गांधीवादी पद्धतीने सर्व विद्यांर्थ्याचे पाय धरले. याची चित्रफीत उपलब्ध आहे.
हे खरे असेल तर भयानक आहे. ह्या विद्यार्थी संघटना नक्की कसल्या मोटिव्ह ने काम करतात?

In reply to by पुंबा

हे खरं आहे ही बातमी अनेक माध्यमातून आलेली आहे. http://m.dailyhunt.in/news/india/english/the+quint-epaper-quint/democra… JNU students stop faculty from entering office; professor threatens satyagraha, touches students' feet. वरील बातमीत चित्रफीत आहे. नजीबचा पुळका आलेल्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गफ्फा हाणणाऱ्या असहिष्णु टोळीने ही गुंडगिरी केली आहे.

तद्द्न मूर्खपणा आहे. आधी येडछाप चाळे करायचे आणि झेपेनासे झाले की लहान मुलगी / मुलगा आहे अशी रड चालू करायची. गुरमेहेरबद्दल मला राग नाही कारण तिनं जे काही केलय ते अटेंशन ग्रॅबिंग ;'मला बघा - फुलं वहा' प्रकारच वाटतं. पण त्यानंतर 'सिलेक्टिव्ह फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन' चे कैवारी जसे वागत आहेत त्याचा जास्त राग आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीच्याबद्दल मत खराब होत चाललय माझं; तिथं काही रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स / प्रोजेक्ट्स / परिक्षा असं काही नसतं का? इतक्या विद्यार्थ्यांना इतका मोकळा वेळ कसा मिळतो? खुद्द दिल्लीमधे राहणारे कमी असावेत यांत बरेचसे हॉस्टेल मधे राहणारे आहेत का? घरून काही विचारणा होत नाही का या बाळांची? गुरमेहेरची कॉलेजमधिल अ‍ॅडमिशन डिफेन्स कोट्यातून आहे का? असली तर ती सुद्धा 'युद्धखोरीत' अप्रक्षरित्या सहभागी आहे. कारण भारतानं सैन्य बाळगणं हाच जर 'युद्धखोरी' चा क्रयटेरिया असेल तर सरकारनं सैनिकांना / त्यांच्या परिवारांना दिल्या जाणार्‍या कोणत्याही सोयी-सुविधा तिनं घेउ नयेत आणि पर्यायानं या युद्धखोरीतला स्वतःचा सहभाग बंद करावा. भारतात सक्तीची मिलिटरी सर्व्हिस नसल्यानं तिला हे सहज शक्य आहे.

In reply to by पुष्करिणी

रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स / प्रोजेक्ट्स / परिक्षा देऊन कोणाचे भले झाले म्हणा ? गुरमीत तिचे मित्रमंडळी आणि एबीव्हीप मधील मुलांच्या पालकांनी नक्कीच आपल्या पाल्यांवर वचक ठेवला पाहिजे. काय म्हणता?

In reply to by विशुमित

त्यांचं भलं होउ दे अथवा नाही इतरांना तरी त्रास नाही, एकीकडे स्वतःला 'यंग इंडिया' वगैरे म्हणत चमकोगिरी करायची आणि विरूद्ध बाजूनं कोणी बोलायला लागलं की मी लहानच आहे म्हणून रडायला सुरूवात करायची. मी फक्त गुरमेहेर किंवा तिच्या कंपूबद्दल नाही तर अभाविप सहित सगळ्याच विद्यार्थीसंघटनांबद्दल बोलतीये, यांना इतका वेळ कसा मिळतो, वेळ तर वेळ वर फुकटची प्रसिद्धी पण ...थोडी जेलसी म्हणा हवं तर; आम्हांला असं आरामाचं विद्यार्थीजीवन का कधी नाही मिळालं? आत्ता अभ्यास नाही केला / नीट रिझ्ल्ट नाही लागला तर काय होइल / नोकरी मिळेल का अशी भविष्याची चिंता पण असायची वयाच्या २० व्या वर्षी, असं 'सर पे कफन' वगैरे बांधून काही करता येइल इतका वेळ आणि पैसाच नव्हता.

In reply to by विशुमित

रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स / प्रोजेक्ट्स / परिक्षा देऊन कोणाचे भले झाले म्हणा ? हे मात्र वट्ट खरे आहे ! एफटीआयआयमधले विद्यार्थीही दोन वर्षांचा अभ्यासक्रम ९-१० वर्षे करण्यासाठी प्रसिद्ध असल्याचे आणि त्या वाढीव काळासाठी त्यांना शिष्यवृत्ती वाढवून मिळत होती असे मागे उघड झाले आहेच ! :)

परंपरा फार जुनी आहे . एका फटक्यात कोण बोललं असतं दोन्ही बाजू चुकीच्या आहेत . काय करता येईल यावर चर्चा चांगली झाली असती

In reply to by वरुण मोहिते

काय करता येईल यावर चर्चा चांगली झाली असती -- अनुमोदन...!! ह्या बारक्या पोरांच्या भांडणां पायी देशातील मोठ्या माणसांमध्ये जुंपली आहे.

In reply to by वरुण मोहिते

अजेंडा घेऊन यायची मिपा परंपरा फार जुनी आहे
फक्त प्रॉब्लेम असा असतो की आपण स्वतः सोडून (आणि कदाचित आपल्या कंपूमध्ये असलेले सोडून) इतर सगळे अजेंडा घेऊन मिपावर येतात पण "तो मी नव्हेत" (किंवा ते आम्ही नव्हेच) असे वाटायला लागले तर ते अधिक घातक आहे. अशा छुप्या लोकांपेक्षा उघडउघडपणे कुठला तरी अजेंड्याचा झेंडा घेऊन मिपावर येणारे लोक कधीही परवडले. असो.

२०१० साली काँग्रेस सरकारच्या आदेशानुसार, तिस्ता सेटलवाडच्या (सबरंग ट्रस्ट ) ने एन सी ई आर टीच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षणार्थ पुस्तक लिहुन दिली. त्या पुस्तकात ईयत्ता ५ व ६ च्या मुला मुलींना काय शिकवायच हे दिलेल होत. त्या पुस्तकातले काही ठळक उदा, १. महम्मद गझनीने सोमनाथ मंदिर हे कधीच तोडल नव्हत. २. औरंगजेब , टिपु सुलतान, महम्मद गझनवी सारखे बादशहा दयाळु होते. ३. हिंदु राजांनी जनतेचा फार छळ केला. ४. मुसलमांन लोकांना आताच्या भारता बद्दल प्रेम असायलाच पाहीजे अस नाही, त्याची भावना ईतरत्र गुंतलेली असु शकते. हा व्हीडीयो बघीतला तर कळेल. https://www.youtube.com/watch?v=R8s2xRN66zY&t=969s

भारत व पाकीस्तान या दोन मानव समुहात जे काही चाललेल आहे. शत्रुत्व हिंसाचार एकमेकांना ठार मारणे इ. हे दोन्ही कडच्या मानवी टोळ्यांच्या उन्नत प्रगल्भ अवस्थेचे लक्षण आहे का ? यात दोन्ही टोळींकडुन प्रत्येकाने रक्त न सांडता आपापल्या टोळीसाठी रक्त सांडण्यासाठी काही ठराविक माणसांची निवड केलेली आहे. इतर टोळी सभासदांनी रक्त सांडलेल्या व्यक्तीचा सन्मान त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ त्यांना वंदन आर्थिक आधार इ. देणे अपेक्षीत आहे. आता यात रक्त सांडलेल्या टोळी सभासदाच्या कुटुंबियाने ही टोळी संदर्भात मान मर्यादा पाळणे अपेक्षीत आहेच तसे न झाल्यास ते एक पापच आहे. तर एक टोळी सभासद म्हणुन काहींचा सात्विक संताप होऊन त्यांनी सामुहीक बलात्काराचे शासन तुला या पापासाठी देऊ अथवा व्हीडियो व्हायरल करु असे टोळीप्रतीच्या प्रेमभावनेच्या आवेगात जर एखादा टोळी सभासद बोलला तर त्याचे काय नेमके चुकले ? टोळीप्रती निष्ठा असण्यात नेमके गैर काय ? युद्ध हिंसाचार इत्यादीवर प्रमाणापेक्षा जास्त विचार करणे किंवा त्याचे खापर टोळी धुरीणांवर फोडणे हे गैरच नाही का ? मुळात इतका विचार करणे हेच किती सरळ सरळ टोळी प्रती गद्दारी असण्याचाच पुरावा नाही का ? जेव्हा ती मुलगी असे म्हणते की पाकीस्तानने मारले नाही युद्धाने मारले तेव्हा ती ज्या युद्ध संदर्भातील मुलभुत कारणाकडे त्यातील राजकारणाकडे त्यामागील गुंतागुंतीच्या हितसंबंधाकडे निर्देश करते तो मी म्हणतो मुळातच टोळीवादा ला टोळीच्या सभासदांना विनाकारण सेल्फ कॉन्शस करण्याचा एक घातक प्रयत्नच नाही का ? शिवाय टोळी लोकशाहीवादी असण्याचे किती तोटे सहन करावे ? म्हणजे शासन करावेसे वाटुनही आवंढा गिळुन किंवा मुग गिळुन स्वतःलाच शासन करुन घ्यावे लागते शिवाय मुलगी स्वत रक्त सांडण्याची जबाबदारी " वाहीलेल्या " घरातील सभासद आहे. कर्तव्याचे ओझे वाटुन दिलेले आहे तिच्याकडे चर्चेचे ओझे वाहण्याचे कारणमीमांसा करण्याचे ओझे वाहण्याची जबाबदारी दिलेली नसतांना ती अशी नेमलेल्या टोळी विचारवंताची जागा का घेऊ पाहतेय ? याला उद्धटपणा नाहीतर काय म्हणावे ?

In reply to by मारवा

मारवा साहेब आपले विचार आदर्शवादी वाटतात. म्हणूनच ते व्यवहारात अने कठीणच नव्हे तर अशक्य आहेत. बाकी आदर्शवादी विचारसरणी असू नये असे मी म्हणत नाही पण तो वास्तवाच्या जवळ असावी असे वाटते. दुर्दैवाने पाकिस्तानशी सलोखा करण्याचे जेवढे प्रयत्न आपल्या राजकारण्यांनी( सर्व पक्षाच्या) केले ते सर्व आतापर्यंत फोलच गेलेले आहेत. आपल्या प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या विचारसरणी नुसार केंव्हा ना केंव्हा प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत असेच मी म्हणेन.( साम्यवादी लोकांबद्दल शंकाच आहे. पण ते सोडून द्या) विचारसरणीबद्दल त्यांचे आपसात विरोध असतील आणि त्याचे ते राजकारण करणारच( तो त्यांचा पूर्णवेळ धंदा आहे) अशा परिस्थितीत केवळ आपल्याच बाजूने शांततेचे प्रयत्न चालू ठेवणे हे कितपत योग्य आहे. उगाच शांतता हवी म्हणून बॉलिवूडचे लोक म्हणतात आणि सर्वच्या सर्व सिनेमे राजकारणी लोक कसे हरामखोर आहेत हे सांगत सिनेमे काढतात ते सुद्धा स्वतःचे सिनेमे पाकिस्तानात चालावेत म्हणून. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. जोवर पाकिस्तान दहशतवादाची "निर्यात" थांबवत नाही तोवर स्थायी स्वरूपात काहीच होणार नाही हेही सर्वाना माहित आहे. बाकी गुरमेहर, कन्हेय्या कुमार सारखी प्यादी येतील आणि जातील. शब्दांचे बुडबुडे खूप झाले. प्रत्यक्ष काय करावे म्हणजे हा प्रश्न सुटेल हे मात्र कोणीच लिहीत नाही.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब आदर्शवादाची प्रमाणपत्र स्वस्त झाली आहेत का ? हल्ली फार सहजपणे आणि नाही त्यांना वाटली जाताना दिसताहेत !

In reply to by माहितगार

आदर्श टोळ्यांनी नाही म्हणावायास आदर्श शब्दाची व्याख्या बदललेली आहे हे ही तेवढेच 'खरे' आहे.

In reply to by मारवा

मारवा, तुमचं पाहिलंच गृहीतक चुकीचं आहे. भारत ही टोळी नाही. पाकिस्तान ही मात्र टोळी आहे. चुकीच्या गृहितकावर आधारलेला प्रश्न चुकीचा ठरतो. चुकीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर घेऊन काय फायदा! आ.न., -गा.पै.

In reply to by मारवा

भारत खाज म्हणून युद्ध करत नाही. भारताने केलेले प्रत्येक युद्ध त्यावर लादले गेलेले आहे. देशाची फाळणी होऊन दोन देशांच्या सीमा ठरवलेल्या असताना जर पाकडे गोळीबार करत घुसत असतील तर त्यांची खणा नारळाने ओटी भरायची का? टोळी पोळी करून उगाच बुद्धीभेद कशाला करताय?

मारवा साहेब व ईतर, तुमच्या एक लक्षात येत नाहीय !! हा व्हिडीयो २०१६ मध्ये एका जाहीरात क्षेत्रात काम करणार्या व स्वतःचा जम बसवु पहाणार्या राम सुब्रमण्यम नावाच्या डायरेक्टरने बनवलेला आहे. त्यात त्या मुलीने (गुरमेहेरने) फक्त काम केलेल आहे, त्या मुलीचा बॅग्राऊंड ही ह्या डायरेक्टरने कथा म्हणुन वापरलेली आहे. त्या मुळे त्या प्लॅकार्डवर काय लिहीलेल आहे हे त्या मुलीने वाचल देखील नसेल कारण मूळात ती फिल्म म्युट आहे. गुरमेहेर सारख्या मॉडेल म्हणुन काम हव असलेल्या मुलीला ईतका विचार नसावा ! त्या नंतर रामजस कॉलेज मधल्या विद्यार्थी परिषद व अभाविपच्या भांडणात परत ह्या गुरमेहेरचा वापर करुन घेतलेला आहे. तीने त्या फिल्म सारखाच हातत प्लॅकार्ड धरुन बनवलेला आहे. आताच्या गदारोळात धुर्तपणे तोच व्हिडीयो बाहेर येणे, लगेच गुर मेहरला सपोर्ट म्हणुन राम सुब्रम ण्य म चे अव तरणे हे संशयास्पद वाटते. हा व्हीडीयो वायरल सुद्धा कोणीतरी खास उद्देशाने केलेला आहे. हा राम सुब्रमण्यम हा केजरीवाल बरोबरचाच कार्यकर्ता आहे . त्याचे धेय्य उघड आहे. थोडक्यात ह्या मुलीचा वापर राम सुब्रमण्यम नावाच्या माणसाने केलेला आहे.

कायद्यासमोर सगळे समानही आहे म्हणायचे वर विशिष्ट समूहाबद्दलच टिका करायची. त्यातून इतर समूहाची चिकीत्सा करायची नाही. देशाबद्दल काहीबाही बोलणाऱ्यांचे लंगडे समर्थन करायचे. इतरांनी बोलले की असहिष्णूता आणि ह्यांची आरोळी म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य. शिवाय आम्ही म्हणू तेच पुरोगामित्व अशी माळही वारंवार हेच जपणार. कोण पुरोगामी ह्याचे प्रमाणपत्रही हेच देणार. व्वा! तुम्हाला विरोध करता-करता आम्हीच तुम्ही झालो, वेष्टन फक्त वेगळे, आतून आरोपांचे खेळ खेळत राहिलो.

त्या मुलीला तिचे मत मांडण्याचा अधिकार आहे. सेहवाग लोकांना तिच्या मतास विरोध करण्याचा हक्क आहे. इतरांनाही या दोघांविषयी मत मांडण्याचा अधिकार आहे. थोडक्यात वटवटणार्‍या लोकांना वटवट करण्याचा अधिकार आहे. हे सर्व मान्य करून काही मत मांडण्याचा माझा अधिकार वापरून पुढील मत मांडतो: गुरमेहर कौर या मुलीने किंवा त्या चित्रफितीच्या कर्त्याधर्त्यांना त्यांचे मत अधिक परिणामकारकपणे मांडता आले असते. त्यांनी ती संधी वाया घालवली. इंग्रजीत लिहीलेला मजकुर, मुलीच्या शर्टावरचे आयफेल टॉवरचे चित्र वगैरेंमुळे चित्रफीत पाहणार्‍या व्यक्तिचा नकारात्मक पूर्वग्रह होणे सोपे झाले. डाव्या लोकांना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उच्चभ्रुपणा टाळायला हवा. म्हणून माझे मत काहीसे डाव्या बाजूला झुकलेले असले तरी या मंडळींनी उजव्यांच्या हातात कोलित दिल्यामुळे माझे मत त्या चित्रफितीविषयी नकारात्मक झाले आहे. तिच्या वडिलांनी देशासाठी केलेला त्याग इतक्या उथळपणे वापरल्याने मला वाईट वाटले. जाता जाता: 'बुबुडाविपुमाधवि' म्हणजे काय हे कोणी स्पष्ट केल्यास बरे होईल. धन्यवाद.

ऑटो चालकों का ऐलान, 'देशद्रोहियों' को नहीं बैठाएंगे ही बातमी आज नवभारत टाईम्समध्ये आली आहे. अशी गोष्ट प्रत्यक्षात करणे फारच कठिण आहे कारण कोणी कपाळावर 'देशभक्त' आणि 'देशद्रोही' असे शिक्के मारून वावरत नसतो. त्यामु़ळे रिक्षावाले दिल्ली विद्यापीठातच कोणाला घेऊन जाणार नाहीत असेही म्हटले आहे. त्याचे कारण तिथे मारामारी झाली तर विनाकारण गोत्यात यायला नको हे दिले आहेच पण त्याचबरोबर "'पुलिस को इन देशद्रोहियों को तुरंत गिरफ्तार करना चाहिए ताकि इस तरह की गतिविधियों पर रोक लगायी जा सके।" हे महत्वाचे वाक्यही आहे. एकूणच या प्रकारावरून अभिव्यक्तीस्वातंत्र्य मोजणे वगैरे प्रकार जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक आणि कन्हैय्यासारखे विद्यार्थी (?), मोठे मोठे विचारवंत, परदेशातील पैशावर माजलेले एन.जी.ओ वाले, आपवाले इत्यादी इत्यादी सोडून इतर कोणी करत असेल ही शक्यता कमीच वाटते. सामान्य माणसाला "भारत तेरे तुकडे तुकडे होगे" असे म्हणणे मोठे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे नाही तर खाल्ल्या ताटात *गायचे लक्षण वाटत असावे हे म्हणायला नक्कीच जागा आहे. दिल्लीतले रिक्षावाले असे काही म्हणत असतील तर त्यामागचे कारणही तेच असावे असे म्हणायला नक्कीच जागा आहे.

अहो गेली ती .......... जिच्या मुळे ह्या धाग्यावर बाजार भरवला गेला तीच गुरुमेहर गेलीय सोडून डाव अर्ध्यावर टाकून जालंधरला तिच्या घरी . बहुधा घरच्यांकडून कानपिचक्या मिळालेल्या असतील . आता इथे भोंगे वाजवून , आदळ आपट करून काय उपयोग ? आवरा आता धागा.

In reply to by रॉजरमूर

अस कस , मिपा हे समाजमनाचा आरसा आहे . . . इथे प्रत्येक महत्वाच्या गोष्टीचा उहापोह झालाच पाहिजे :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एखाद्याचे समर्थन करायचे ठरवले कि त्याच्या बाजूच्या कसल्याही/कुठल्याही (म्हणजे या तद्दन भिकार पातळीच्या या लेखासारख्या) गोष्टी डोळ्यावर पट्टी बांधून सत्यच मानायचे का? त्याला लेख पण म्हणता यायचे नाही, पप्पू वगैरे शब्दप्रयोगावरूनच वैचारिक पातळी दिसून येतेय. खेद याचा वाटतोय कि सिनियर लोक देखील असल्या "काहीही" लिंक शेअर करतात!

In reply to by शब्दबम्बाळ

दोन्ही बाजू नीट पडताळून मगच निर्णय घ्यावा, असे तुम्हाला वाटत नाही, याचे खरेच दु:ख झाले ! हवे (किंवा नावडते) असलेले शब्दप्रयोग तुम्हाला स्पष्ट दिसले पण एनडिटिव्हीने घेतलेली गुरमेहरची मुलाखत, बरखा दत्त बाईंचे ट्वीट्स, त्यातली व्हिडिओ क्लिपमधल्या शब्दांची बरहुकुम कॉपी आणि दर ट्वीटखाली गुरमेहर, कारगिल हिरोज डॉटर, इत्यादी गोष्टी "गौण" वाटतात याचे आश्चर्य नाही पण दु:ख जरूर वाटले ! :( असा काहीसा प्रतिसाद अपेक्षित असल्यामुळेच मी त्या दुव्याचे विश्लेषण हेतूपूर्वक केले नव्हते :) असो. खुल्या मनाने, डोळे उघडून, पूर्ण दुवा, परत नीट वाचलात तर अजून बरेच धागेदोरे हाती लागतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बरखा दत्त सारख्या जान्यामान्या आणि मोठी साधनसंपत्ती असलेल्या एनडीटीव्हीसारख्या राष्ट्रीय वाहिनीच्या इन्व्हेस्टीगेटीव्ह रिपोर्टरने गुरमेहरचे वडिल कारगिल युद्धात शहीद झाले नव्हते हा मुद्दा नीट न तपासता मुलाखत घ्यावी आणि काररगिलचा उल्लेख असलेल्या ट्वीटसची (एक नव्हे) मालिका, अचूकतेची खात्री करून न घेता प्रसिद्ध करावी (की कारगिलला वलय आहे म्हणून ते मुद्दाम केले गेले ?) आणि तीच "अचूक, भेदक व अर्थपूर्ण" शब्दयोजना व्हिडिओमध्ये केवळ "किड्" असलेल्या (म्हणजे एका अर्थी गंभीर विचार न करू शकणार्‍या, निरागस) गुरमेहरच्या हातातील पाट्यांवर यावी... किती ते आश्चर्यकारक योगायोग... या सगळ्यात तुम्हाला काहीच आश्चर्य न वाटल्यास, मलाही तुमच्या वरच्या प्रतिसादाचे काहीच आश्चर्य वाटले नाही, असे समजायला अजिबात हरकत नाही. :)

म्हात्रे सा, खरच डोळे उघडणारा लेख !! अगोदर म्हटंल्या प्रमाणेच ह्या गुरमेहेरचा वापर प्यादी म्हणुन करण्यात आलेला आहे . बरखा दत्त सारखी सुद्धा त्यात शामिल असेल हे वाटले नव्हते. परिस्थीती खुप क्लीअर होत चाललेली आहे. डावे व डावी कडे झुकलेले , कललेले लोक आता टोटलच कलंडायला लागलेले आहेत. युनिवर्सिटीजमध्ये ब्रेन वॉशींगमध्ये डावी कडे झुकलेल्या शिक्षकांचा वापर होत आहे. १. आभा देब हबिब : ही म्हणते बुरहान वानी हा अतिरेकी नव्हता, स्वातंत्र सैनिक होता. २. निवेदिता मेनॉन : ही म्हणते, भारताने काश्मिरवर बेकायदेशीर अतिक्रमण केलेल आहे , काश्मिर पाकिस्तानला दिला पाहीजे, तसेच भारताचा उत्तर पुर्व भाग हा चीनला परत केला पाहीजे,

चिनार,
ज्याने कोणी हे असले पोश्टर लावले असतील त्याच्या पार्श्वभागावर फटके द्यायला हवे. पण ते कोणी ?? तर पोलिसांनी आणि न्यायव्यवस्थेने...अभाविप आणि इतर कोणत्याही संघटनेला तसे करण्याचा अधिकार आहे का?
माझ्या मते प्राचार्यांनी बोलावल्याशिवाय विद्यापीठात प्रवेश करायचा अधिकार पोलिसांना नाही. साहजिकंच न्यायालयही हस्तक्षेप करू शकंत नाही. म्हणून अभाविपसारख्या विद्यार्थी संस्थांनाच प्रत्युत्तर द्यावं लागतं. त्यातून पोलीस पडले भ्रष्ट आणि न्यायव्यवस्था आहे चेंगट. मग कोण करणार न्याय? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माझ्या मते प्राचार्यांनी बोलावल्याशिवाय विद्यापीठात प्रवेश करायचा अधिकार पोलिसांना नाही. साहजिकंच न्यायालयही हस्तक्षेप करू शकंत नाही.
आ.न.गा.पै. आपले बरोबर आहे पण प्राचार्य नाहि तर कुलगुरुंची (V.C.) परमिशन लागते, पण एक गोष्ट आपण विसरत आहात कि ह्या देशात पोलिसांना जेव्हा जेव्हा खुलि छुट दिलि जाते त्यांच्या ईतका मोठा गुंड मग कोणिच नसतो चांगल्या चांगल्या ऑरगनाईझ क्राईम च मग ते कंबरड मोडतात इथे तर कोवळे विद्द्यार्थि आहेत हो. उदाहरणच द्यायच झाल तर आमच्या अकोल्याला पंजाबराव देशमुख कृषि विद्द्यापिठ आहे ह्याचे कँपस नॅशनल हायवे ६ (आता बायपास झालाय) च्या बरोबर दोन्हि बाजुस विखुरलेले आहे महिन्याला एक तरि तिथे अपघात व्हायचा आणि विद्द्यापिठातले विद्यार्थि टोटल हायवे बंद पाडायचे, जाळपोळ करायचे आणि कँपस मध्ये निघुन जायचे, पोलिस मुकदर्शक म्हणुन रहायचि. देवेन भारती S.P. म्हणुन आले आणि एकदा सेम ईसिंडंट झाला जाळपोळिचा त्यावेळेस पोलिसांनि जे झोडपले होते ना विद्दार्थ्याना हॉस्टेल, कँपस मध्ये घुसुन लाठिचार्ज केला होता. मुलांनि भितिने २ र्या ३र्या माळ्यावरुन उड्या मारल्या होत्या. कित्येकांचे हात पाय तुटेस्तोवर मारल होत.

In reply to by गामा पैलवान

गापै, तुम्ही समांतर न्यायव्यवस्थेला पाठींबा देताहात. अश्या स्वयंघोषीत देशभक्तांच्या संघटनेच्या हातात न्याय करण्याचा अधिकार दिला की काय किंमत राहील संविधानाची अन त्याने निर्माण केलेल्या institutions ची? ह्याच लॉजीकने खाप पंचायत आणि जात पंचायत समर्थनीय ठरतील. लोकशाहीत न्याय, स्वातंत्र्य, समता ही सारी मुल्ये संविधानाने निर्माण केलेल्या institutions च्या मार्फतच प्रस्थापित व्हावी अन्यथा अराजक माजते. अभाविप असो किंवा डाव्यांची विद्यार्थी संघटना. त्यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार नसला पाहीजे. जी काही आंदोलने करायचीत ती अहिंसक मार्गाने करा नाही तर कारवाईला तयार रहा असा स्पष्ट संदेश सरकारने द्यायला हवा.

In reply to by पुंबा

जी काही आंदोलने करायचीत ती अहिंसक मार्गाने करा नाही तर कारवाईला तयार रहा असा स्पष्ट संदेश सरकारने द्यायला हवा. --++111111111

https://www.youtube.com/watch?v=WHNlmxBdKQM बरेच देश द्रोही जे एन यु च्या विद्यार्थ्यांच्या मागे राहुन आपल काम करत आहेत, १. कविता कृष्णन : ही कम्युनिस्ट पार्टीच्या मासिकाची एडीटर आहे. २. जॉन दयाल : हा युएस मध्ये जाऊन भारता विरुद्ध गरळ ओकत असतो. ३. निवेदीता मेनॉन : ही म्हणते, सैनिक भारताच्या सिमेवर आपल्या ब्रेड बटर साठी उभे रहातात देशासाठी नाही. ह्या लोकांना फक्त कायद्याच्या चौकटीत आणुन उअपयोग नाही. त्यांना जनतेने शिक्षा दिली पाहीजे.

In reply to by डँबिस००७

मोदींना फॅसिस्ट, एकाधिकारशहा, हिटलर ईई संबोधणाऱ्यांनी खरी एकाधिकारशाही किंवा त्यांची लाडकी कम्युनिस्ट राजवट अनुभवायला पाहिजे. सरकारी, म्हणजेच हुकूमशहाच्या, धोरणांविरुद्ध एक शब्द काढणारी व्यक्ती एका रात्रीत गायब केली जाते, पुन्हा कधीही न दिसण्यासाठी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर जाऊच द्या, कसलेच स्वातंत्र्य नसते. मला एका गोष्टीचा उलगडा अजून होत नाहीये की या असल्या देशद्रोह्यांवर सरकार सरळ सरळ कारवाई का करत नाही? या घटनांवर मोदी एक सुध्दा कमेंट करत नाहीत, याचे काय कारण असावे? एवढी मोठी यंत्रणा हाती असताना तसंही एखाद्याला "कामाला" लावायला फारसे प्रयास पडू नयेत.

In reply to by ट्रेड मार्क

कम्म्युनिस्ट पूर्वी न्हवते का ?? २०१४ नंतर आले का ???मनमोहन सिंगांना ह्यांना फासावर लटकवायला हवं असं कोणी बोलले का ?? असा मारण्याचा आतातायी निर्णय घेऊन नाही जमत कोणाला म्हणून मोदी गप्प आहेत .५ वर्ष टिकवायची आहेत ना प्रत्येकाला

In reply to by ट्रेड मार्क

या घटनांवर मोदी एक सुध्दा कमेंट करत नाहीत, याचे काय कारण असावे? एवढी मोठी यंत्रणा हाती असताना तसंही एखाद्याला "कामाला" लावायला फारसे प्रयास पडू नयेत.
बिरादर यहि तो वो चाहते है. १) देशाच्या पंतप्रधानाने असल्या गोष्टि नोटिस करुन त्यावर कॉमेंट करणे म्हणजे एकप्रकारे त्यांना महत्व देणे होईल आणि सध्याच्या काळात तरी असलेले पंतप्रधान असल्या खेळांमध्ये ह्यांचे बाप आहेत. २००२ पासुन आरोप होताहेत खरे खोटे देवजाणे पण या देशाच्या सुप्रिम कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले आहे, असंख्य वेळा डिवचायचे प्रयत्न झाले पण ह्यांनी पब्लिक प्लेस किंवा मिडियासमोर तरी आपला धीर सोडल्याचे माझ्या बघण्यात नाहि. तेव्हा असल्या पोरखेळांना ते महत्व देतिल असे वाटत नाहि. २) आंदोलन मग ते कसलेहि असो आणि कितिहि उग्र किंवा मोठे असो कुठल्याहि राज्य किंवा केंद्र सरकार साठि ते चिरडणे काहि फार मोठे काम नाहि, आठवा रामदेव बाबांना मुलिचा वेष करुन पलायन करावे लागले होते. असेच एक आंदोलन (गोवारी हत्याकांड) चिरडण्याचा नागपुर मध्ये सुद्धा प्रयत्न तेव्हाच्या राज्यसरकार ने केला होता बहुधा मि अकरावि ला असेन त्यावेळेस पण नक्कि आठवत त्या चेंगराचेंगरित खुप लाहन मुले बायका मरण पावल्या होत्या. पण ह्या दिल्लि युनिवर्सिटि किंवा जे.एन.यु. साठि बळाचा वापर चुकुनहि केंद्र सरकार करणार नाहि कारण एकदम साफ आहे कि सरकार हे ओळखुन आहे कि ह्या सो कॉल्ड कोम्रेड लोकांना हेच हवे आहे कि असे काहि घडावे म्हणजे देशभर राळ उठवता येईल आणि अराजक माजवता येईल. नॉन स्टेट अ‍ॅक्टर किंवा प्रॉक्झि वॉर हे शब्द आपण नेहमि ऐकतो पण ते पाकिस्तान च्या संदर्भात, तुम्हाला नाहि वाटत कि ते सेम सेम टु सेम इथे लागु पडतय. हम तेरे दर पे सनम रोज आयेंगे...... हम तेरे दर पे सनम रोज आयेंगे...... घंटि बजायंगे और भाग जायेंगे. मागच्या फेब्रुवारीत थोर क्रांतिकारक कॉम्रेड कन्हैय्या कुमार ह्यांच्यावर एक धागा आला होता मिपावर बहुधा २ धागे आले होते एक रींगमास्टरांचा* होता दुसरा आठवत नाहि कोणि काढला होता ते पण मि तेव्हाच म्हणालो होतो कि ये बहोत बडा गेम है और खेलने वाले भि इसे बडि फुरसत से खेल रहे है. पटावरच्या सोंगट्या बदलत जाणार त्यामागे खेळणारे हात मात्र तेच आहेत आणि राहतिल, होळि पेटलि कि नारळ वहायला युगपुरुष केजरीवाल, रा.रा. राहुलजी गांधि, झालेच तर लेनिन चे भारतिय व्हर्जन :) शिताराम येचुरि हे दरवर्षी येतच राहणार. तिकडे भाजप चे काहि महाराज किंवा साध्वि लोक काहि बाहि बरळत राहतात ह्यामधे होतय काय कि ह्या सगळ्या घटना पोलरायझेशन नामक रीअ‍ॅक्शन मधे कॅटॅलिस्ट चा काम करताहेत.

In reply to by सचु कुळकर्णी

मोदींनी कन्हैया किंवा बाकी गँगपैकी कोणाचं नाव घेऊन कमेंट करावी असं म्हणणं नाहीये. पण इन जनरल या देशद्रोही मंडळींचं जे चाललंय त्यावर नेहमीच्या इस्टाईलने कोणाचं नाव न घेता कानफटात मारायला पाहिजे असं वाटतं. कदाचित योग्य वेळ आली नसावी. बळाचा वापर करून चिरडलं तर ती राजकीय चूक ठरेल. पण प्यादी वापरून उपाय करता येईल. कदाचित अभाविपचा वापर म्हणूनच केला असावा. पण कुठे तरी गडबड झाली आणि प्रकरणाला वेगळा रंग चढला असावा. त्यात मेनस्ट्रीम मीडिया पण विरोधात आहे. बहोत बडा गेम है और खेलने वाले भि इसे बडि फुरसत से खेल रहे है माझं पण हेच मत आहे. बुद्धिबळाचे पट मांडले आहेत आणि खेळ्या चालू आहेत. आत्तापर्यंतच्या घटनांवरून वाटतं की मोदी आपल्या विरोधकांना मुद्दाम एखादी गोष्ट करायला प्रवृत्त करतात आणि मग अडकवतात. काय होतंय ते बघू पण हा प्रतिसाद वाचा. देशद्रोही विचारांचं लोण जास्त पसरू नये असं वाटतं एवढंच.

In reply to by ट्रेड मार्क

त्यात मेनस्ट्रीम मीडिया पण विरोधात आहे.
मिडिया ने मिडिया च काम करावच साहेब अगदि कठोर बनुन कराव पण विद्यार्थ्यांना प्याद बनवुन, त्याला एक रेडीमेड स्क्रिप्ट देउन आपल्या लॉबिंग* च्या घाणेरड्या खेळात सामिल करु नये.
आत्तापर्यंतच्या घटनांवरून वाटतं की मोदी आपल्या विरोधकांना मुद्दाम एखादी गोष्ट करायला प्रवृत्त करतात आणि मग अडकवतात.
ह्याबाबतित नशिब पण मस्त साथ देत ह्या माणसाला, विरोधक सुद्धा असे फसतात कि २०१४ ला "एक चायवाला" संबोधल होत आणि आता तर कच्छ च्या गाढवाचिच उपमा दिलिय. लॉबिंग* :- बरखा दत्त चा मेन ऑक्युपेशन हाच आहे शि इज अ पॉलिटिकल लॉब्यिस्ट. NDTV न्युज अँकरिंग हा तर जोडधंदा आहे.

In reply to by सचु कुळकर्णी

मिडिया ने मिडिया च काम करावच साहेब अगदि कठोर बनुन कराव पण विद्यार्थ्यांना प्याद बनवुन, त्याला एक रेडीमेड स्क्रिप्ट देउन आपल्या लॉबिंग* च्या घाणेरड्या खेळात सामिल करु नये. दुर्दैवाने, हे शक्य नाही. कारण, आजकालची मिडिया उच्च तत्वांवर चालणारी नाही किंवा केवळ पैशासाठी चालणारीही नाही तर राजकारणी आणि इतर पैसेवाले हितसंबंधी यांनी खरेदी केलेला (त्यांचे मेजर शेअरहोल्डिंग असलेला) आणि त्यांच्या हितसंबंधांचा पाठपुरावा करणारे उद्योगधंदे आहेत. खालील दुवा चाळून पहा म्हणजे ही पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत आणि एकमेकात किती गुंतलेली आहेत हे पाहून चक्कर येईल...

Who owns your media?


कम्म्युनिस्ट पूर्वी न्हवते का ? होतेच. चीन, रशिया यासाठी प्रसिद्ध होते. भारतातही प. बंगाल कम्युनिस्ट विचारसरणीसाठी प्रसिद्ध आहे. नक्षलवाद ही पण कम्युनिझमचीच देणगी आहे. प. बंगालमधील कम्युनिस्ट लोकांनी केलेल्या हत्याकांडांविषयी जालावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. सध्या केरळमध्ये पण हेच चालू आहे. २०१४ नंतर आले का ?? २०१४ नंतर यांना उघड विरोध होऊ लागला असावा का? मनमोहन सिंगांना ह्यांना फासावर लटकवायला हवं असं कोणी बोलले का ?? याचा काही संदर्भ लागला नाही. असा मारण्याचा आतातायी निर्णय घेऊन नाही जमत कोणाला म्हणून मोदी गप्प आहेत. मारायला कोण सांगतंय? इतर बऱ्याच गोष्टी करता येतात. एखाद्या भानगडीत अडकवता येतं, प्रत्येकाचा कुठला न कुठला वीकपॉइंट असतोच, त्याचा वापर करता येतो. अगदी मारायचंच ठरवलं तरी जाहीरपणे मारायला पाहिजे असं कोणी सांगितलंय? बरेच मार्ग आहेत. ५ वर्ष टिकवायची आहेत ना प्रत्येकाला मोदींना या टर्ममध्ये तरी कार्यकाळ पूर्ण होईल का नाही ही चिंता नाहीये. असल्या देशद्रोह्यांना वेळीच धडा शिकवला पाहिजे.

In reply to by ट्रेड मार्क

लेडी श्रीराम च्या मुली किंवा उच्च विचारसरणी टाईप मुले माहित आहेत दिल्ली सर्कल ची . मी आधी पण एका धाग्यात उल्लेख केलाय ह्याचा. पण त्याच बरोबरीने स्वघोषित राष्ट्रभक्त नको हेच म्हणायचंय . ह्या लोकांना विचारांनी ठेचा . हा मुद्दा का उठला कारण सगळ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट . कारण राष्ट्रभक्ती काय कम्युनिस्ट काय नुकसान देशाचाच होत . फार उदाहरण आहेत अशी जगात

In reply to by वरुण मोहिते

सध्या परिस्थिती अशी दिसतेय की देशाच्या विरोधात कोणी बोलत असेल तर ते त्याचं/ तिचं FoE असतं पण जर कोणी त्या व्यक्तव्याच्या विरोधात बोलायला लागलं की मात्र त्याला स्वघोषित राष्ट्रभक्त म्हणून हिणवलं जातं. इतर कुठल्या देशात अशी देशविरोधी विधानं सार्वजनिक ठिकाणी केली तर ती व्यक्ती अशी उजळ माथ्याने वावरू शकते का? माझ्या मते इतक्या वर्षांनी केवळ इतरधर्मीय अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन न करता हिंदूंना सपोर्ट करेल असे सरकार आहे असं लोकांना वाटतंय त्यामुळे राष्ट्रभावना जरा जास्त उचंबळून आलीये. कुठलीही टोकाची भावना (Extremism) ही धोकादायकच असते, पण जो पर्यंत हे केवळ देशविरोधी बोलण्याला व कृतीला विरोध म्हणून आहे तोपर्यंत ठीक आहे. हे स्वघोषित राष्ट्रभक्त किंवा सरकारसुद्धा अशी देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना गोळ्या घालत नाही किंवा फासावर लटकावत नाही. प्रत्येक कुटुंबात एक कांगावखोर मूल असतं, जे जे स्वतः खोड्या काढतं पण इतरांनी नुसतं बघितलं तरी कांगावा करायला लागतं आणि मग तिथे त्यावेळी उपस्थित नसलेल्या पालकांना वाटतं की या मुलाला बाकीचे किती त्रास देतात. तशी ही टोळी कांगावखोर आहे. बाकी विद्यार्थी संघटनांमधली मारामारी खूप पूर्वीपासून चालू आहे. विद्यार्थी संघटनांचे व राजकीय पक्षांचे लागेबांधे असणे हे पण बरीच वर्षे आहे. पण सध्या मात्र अभाविप भाजपशी संलग्न आहे म्हणून जरा काही झालं की त्यांच्याविरुद्ध रान उठवलं जातं.

कारण राष्ट्रभक्ती काय कम्युनिस्ट काय नुकसान देशाचाच होत . खर आहे या अति राष्ट्रभक्ती मुळेच, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक भारतीयांना स्वत:च्या जीवाची हकनाक आहूती द्यावी लागली, याच अतिराष्ट्रभक्ती मुळे स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीत अनेक निरपराध लोक मारली गेली आणि याच अतिराष्ट्रभक्ती मुळे पाकिस्तान सारखा कुरापती देशाची निर्मिती झाली आणि त्याचा परिणाम आजही भारतीय जनता भोगत आहे.

लोकहो, गुरुमेहेरबाईंच्या वक्तव्याप्रमाणे तिच्या पित्यास पाकिस्तानने मारलं नसून युद्धाने मारलं आहे. यावरून एक प्रश्न पडलाय. पाकिस्तानात २००३ पासून दररोज सरासरी १२ लोक हल्ल्यांत मरतात (आकडेवारी : http://www.satp.org/satporgtp/countries/Pakistan/database/casualties.htm). ह्यांना कोण मारतो? पाकिस्तान की युद्ध? आ.न., -गा.पै.