कुठे उलथला होतास रे मेल्या इतके दिवस?
आम्हाला वाटलं की ह्या सरपंचगिरीमध्ये तुझ्यातला लेखक मेलाबिला की काय!!!!
:)
छान लिहिलंयस!!!!
शॉर्ट, सॉफ्ट ऍन्ड स्वीट!
जियो....
खरं तर खुप आधीपासुन मी प्रतिक्रीया लिहायचा विचार करतो आहे, नेमकं काय लिहावं हे शब्दात सापडत नाही.
बर्याच जणांच्या प्रतिक्रीयेची वाट पाहिली पण मनात जे आहे ते चपखलपणे व्यक्त होईल अशी एकही प्रतिक्रीया मला दिसली नाही की पर्टकन "+१, सहमत" म्हणुन मोकळं होऊ ...
शब्दशः सुन्न झालो ...!
लहानपणी पुस्तकात भरपुर वाचायचो के शापीत राजकन्या थवा अप्सरा असतात व त्यांच्या अंगात भरपुर गुण असुनसुद्धा त्यांना कुठेतरी कष्टात व दर्जाच्या मानाने कमी मानसन्मानात, हालअपेष्टात व सामाजीक अहवेलना असनारे जीवन जगायला लागायचे. "रौशनी + रौशनी - अवांतर " वाचुस्तोवर ह्या खरोखरीच "पुस्तकी कल्पनाच" वाटायच्या, पण आज हे सर्व तात्यांच्या शब्दात व नजरेने पाहुन मन सुन्न झाले ...
छे, देव एखाद्यावर फारच अन्याय करतो वा भविष्य वाटताना जरासे माप चुकीच्या बाजुला झुकवतो असे वाटायला लागले आहे ...
सर्व आयुष्य अगदी आरामात एखाद्या गर्भश्रीमंत घरात सुनबाई म्हणुन टेचात राहुन अथवा फिल्मइंडस्ट्रीत आरामात झकपक रोल मिळवण्याची पात्रता असताना काय आयुष्य जगायला लागते हे पाहुन खरेच कसेकसेच झाले. अर्थात तात्या म्हणतात त्याप्रमाणे अगदीच "वाईट" जरी नसले तरी ह्यापेक्षा भारी आयुष्य नक्कीच तिच्या पदरात पडु शकते / शकले असते असे राहुन राहुन वाटते ...
>>तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी..!
निशब्द ..!
तात्या, खरच अप्रतिम उतरलं आहे, असे पहायला व ते तेवढ्याच ताकदीने कागदावर उतरवायला जीगर लागते, ते आपल्यात आहे हे नक्की ...!
असेच लिखाण येऊ देत , त्या शिंच्या मिपा संपादक / मालकाच्या धांदलीत असे "काळीज चिरत जाणारे" लेखन कॄपया बाजुला ठेऊ नका ...!
बाकी काय लिहु, शब्दसंपदा अतिच तोकडी वाटत आहे आज.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
अगदी लक्कन काळिज हललं बघ! कुठे कुणाचे ऋणानुबंध असतात ते सांगता येत नाही!
जियो!!
तू असं काही लिहिलंस ना की तुझ्यात मला भाईकाकांच्या रावसाहेबांची काही लक्षणं अगदी प्रकर्षाने दिसतात.
जे काय आहे ते सरळसरळ, आडपडदा नाही! मला तुझ्या अशा स्वभावाचा हेवा वाटतो.
लिहीत रहा. आणि भरपूर लिही रे आजच्या सारखं चटका लावून जाणारं थोडंसंच नको!
चतुरंग
>> तिच्या त्या 'आओगे ना?' या प्रश्नाच्या टोनमध्ये मला तिची ममत्वाची भूक जाणवली! अगदी विलक्षण जाणवली! कारण तिच्या ठुमक्यांकडे हावरेपणाने बघणारा मी कुणी तिचा गिर्हाईक नव्हतो! मी तिथे गेलो होतो तो तिच्या आईच्या ओळखीचा कुणीतरी होतो म्हणून..!
मानलं तात्या.... इतकं प्रामाणिकपणे राहणं अवघड असतं.
लेखणीला धार लागली तात्या.
जे लिहिलं... अगदी पार उतरलं काळजात.
निलम.. नावाप्रमाणेच परीसारखी आहे. ती तिथे आहे तिचं दुर्दैव. आणि तुम्ही मायेने भेटायला गेलात, हे तिचं सुदैव.
मस्त लेखन झालंय.
खूप बरं वाटलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
लिखाण आवडले . "रौशनी"वर लिहा असे तात्यांना अनेकांनी सांगून झालेले मी पाहिले आहे. त्यांची ही लेखमाला वाचकांना नक्की आवडेल. गावकुसाबाहेरच्या जीवनावरचे फर्स्ट हॅन्ड , झगझगीत लिखाण.
असेच लिखाण येत राहो ही शुभेच्छा.
फारच सुंदर लिहीलयं तात्या. शब्द अपुरे आहेत प्रतिक्रिया देण्यासाठी.
रौशनी चे ही ५ हि भाग वाचून काढलेत. खूपच उत्कंठा वाढली आहे पुढचा भाग वाचण्यासाठी. रौशनीचे ही पुढचे भाग लवकर येऊ द्यात हि विनंती.
नीलम त्या माहोलमधून बाहेर पडू शकली नाही ह्याचे वाईट वाटत आहे.
लेख खूप आवडला.
नीलम तिथे कशी काय अडकली. रौशनी नक्कीच खंबीर वाटली होती जी नीलमचे आयुष्य ह्याही पेक्षा चांगले करु शकली असती. असो.
आता एक वेगळीच शंका डोक्यात "रौशनी" मालीका अपूर्णच राहणार का? कृपया खुलासा करा.
जी नीलमचे आयुष्य ह्याही पेक्षा चांगले करु शकली असती.
कोणाच्या मदतीनं? कुठे? नीलमचं रूप पाहिलंस का? अरे त्या महोलमध्ये असतांनादेखील लोकं डोळे फाडफाडून अधाश्या भुकेल्या वाघासारखे बघत असतात! मग बाहेरची तर बातच सोडा!
जशी आपल्या लोकांना त्या वस्तीतल्या अंधाराची कल्पना नसते तशी त्या बायकांनाही बाहेरच्या जगाची काहीच माहिती नसते! कुणाकडे जाणार होती रौशनी त्या मुलीला घेऊन? कुणी ठेऊन घेतलं असतं? पोटापाण्याचं काय? धुण्याभांड्यांची कामं रौशनी करू शकली असती का? तिनं केली असती का? प्रश्न अनेक आहेत..! महिन्याला हजार-दोन हजार कमावणारा एक तात्या अभ्यंकर रौशनी आणि तिच्या मुलीकरता कुठवर पुरी पडणार होता? अशक्य होतं ते, आजही आहे!
आज तरी शक्य आहे का मला त्या मुलीला घेऊन माझ्या घरी येणं किंवा अन्य कुठल्या चांगल्या जागी ठेवणं? आणि काय गॅरेंटी तिला ते पटेल? खर्चाचं काय? उदरनिर्वाहाचं काय? बरं, परत लोकांना काय सांगू? घरी काय सांगू? लोक असंच म्हणणार ना की तात्याने एक बाई ठेवली आहे?! :)
प्रश्न अनेक आहेत..!
त्या माहोलबाबत,
तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी..!
हेच खरं!
तात्या.
मुलीला हॉस्टेल/परगावी उच्च शिक्षण, पैसा व्यवस्थीत जोडून, लग्न लावून, कुठल्या संस्थेची मदत घेउन इ इ ह्या स्थितीतुन बाहेर देउ या. पण ते सोडून देउ या.. बर बॉ असेल अशक्य तिला. मान्य.
पण "लोकांना काय सांगू?" असा प्रश्न कधी तुमच्याच तोंडून ऐकायला मिळेल असे कधीच वाटले नव्हते ;-)
तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी..!
बरं रौशनी मालीका चालू रहाणार की अपूर्णच हे नाही सांगीतलेत :-(
ते जे खातेरे आहे, तिथून त्या दुर्दैवी स्त्रीया सहजपणे बाहेर येऊ शकतील असे वाटते काय तुम्हाला? तिथे त्यांच्या जीवावर रहाणारे अनेक आहेत, त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. ते कुठल्याही स्त्रीला (ती त्यांच्या पोटापाण्याच्या दृष्टिने पूर्णपणे 'टाकाऊ' होत नाही, तोपर्यंत) बाहेर जाउ देणारच नाहीत. ती जे ते 'जीवन डोर तुम्हीसंग बांधी, क्या तोडेंगे इस बंधन को, जग के तूफां, आँधी रे आँधी' म्हणत होती ते कुठल्याही राजकुमाराला उद्देशून नव्हते, तर त्या खातेर्याला उद्देशून होते. तेच तिचे जीवन आहे, त्यातून तिची व तिच्यासारख्या अनेक स्त्रीयांची सुटका कठीण आहे.
आपण नुसते 'वो सुबह कभी तो आएगी' म्हणतच बसायचं!
जशी आपल्या लोकांना त्या वस्तीतल्या अंधाराची कल्पना नसते तशी त्या बायकांनाही बाहेरच्या जगाची काहीच माहिती नसते!
१००% सहमत.
कोणाच्या मदतीनं?
तात्या, मदत हे नेहेमीच पैशाचे असते असे नाही. ज्याला पाण्याबाहेर यायचयं त्याला एका हाताचा आधारदेखिल पुरेसा असतो!
असो. नेहेमीप्रमाणेच अगदी डोळ्यासमोर चित्र उभे करणारे लिखाण. सुंदर.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
आणि काय गॅरेंटी तिला ते पटेल? खर्चाचं काय? उदरनिर्वाहाचं काय? बरं, परत लोकांना काय सांगू? घरी काय सांगू? लोक असंच म्हणणार ना की तात्याने एक बाई ठेवली आहे?!
यावरून एक घडणारं उदाहरण डोळ्यासमोर आलं. पोटच्या पोरीच्या वयाच्या मुलीलाही जर एक पुरुष मदत करत असेल तर त्याच्या हेतूबद्दल वाईट शंका हमखास घेतली जाते हे प्रत्यक्ष पाहतोय.
तात्या, धाडस करा असं इथून लांबून सांगणं फार फार सोपं आहे.
सूर्य लाचार असला तरी निदान अंधारापर्यंत प्रकाश घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय हे अगदी उच्च आहे.
बर्याच प्रतिक्षेनंतर रौशनीचा भाग आल्यामुळे उत्सूकता होतीच.
लेख चांगला झालाय. असे असले तरी नीलमबद्दल अनेक प्रश्न मनात येत राहतात.
एकूण, त्या वेगळ्याच दुनियेतले प्रश्न भरपूर आणि उत्तरं फारशी नाहीतच असं वाटतं.
रेवती
आजचा दिवस चांगला जाणार बहुधा !!
सकाळी -सकाळी रोशनीचा भाग वाचायला मिळाला !!
साधं पण ह्रदयस्पर्शी लिखाण !!
सिंपली ग्रेट !!! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
वाह वाह. छान तात्या. नि:शब्द.
(सूर्यही जरासा लाचार पाहीला मी अक्षरशः पटले रे )
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
तात्या , तुमचा प्रामाणीकपणा मला नेहेमीच आवडतो.
या सगळ्या अनुभवांना अलंकृत न करता छोट्या छोट्या वाक्यात केलेलं लिखाण त्यामुळे बटबटीत न वाटता एक अस्सल अनुभव वाचल्याचा आनंद येतो.
असं सगळं आयुष्य बघूनही एखाद्या सुडो सोशालीस्टासारखं यांचं लाइफ सुधारायला काय करता येईल याची चर्चा नसते.
पुन्हा तिथे जाईन की नाही हे मला माहीत नाही!
खोट्या भूमीका घेणं हे तुमच्या स्वभावात नाहीच असं वाटतं.
तिच्या त्या 'आओगे ना?' या प्रश्नाच्या टोनमध्ये मला तिची ममत्वाची भूक जाणवली! अगदी विलक्षण जाणवली! कारण तिच्या ठुमक्यांकडे हावरेपणाने बघणारा मी कुणी तिचा गिर्हाईक नव्हतो! मी तिथे गेलो होतो तो तिच्या आईच्या ओळखीचा कुणीतरी होतो म्हणून..!
खुप छान लिखाण. नेहमीची तात्या स्टाईल वाक्यरचना. स्वगत, कथन अन संवाद यांची उत्तम सरमिसळ !! लिखाणाला प्रवाही वाचनीय ठेवणारी.
अवांतरः एकेकाळी तात्यांचे असे लिखाण निरनिराळी व्यक्तीचित्र भरभरुन वाचायला मिळायची, सकाळी आंतरजालावर आले की तात्या अभ्यंकराचा असा एखादा लेख अन खाली प्रतिसादाची जंत्री असे चित्र काहे विरळा नसायचे. आता मात्र आहे. काल परवाच प्राजुला "संपादकगिरीच्या ओझ्याखाली तुझा सचिन झाला नाही हे छान" असे शब्द्शः म्हटले होते, तात्यांचीही लेखणी चालत रहावी. आम्हीही आंतरजालावर दर्जेदार लिखाण वाचत रहावे.
तात्या, खूपच सुंदर लिखाण.
(आजच रौशनीचाही फोटो पाहिला आणि खूप वाईट वाटलं. म्हणे, यक्षांना शाप असतात, पण अप्सरांनाच्याही वाट्याला काही कमी भोग नाहीत.)
अदिती
लेखन आवडले.
नीलमचे वय कळले नाही. तिच्याबद्दल बोलताना रौशनीचा उल्लेख "होती" वगैरे असल्याने नक्की काय झाले असावे असा प्रश्न पडला.
वाचून वाईट वाटले, पण याबद्दल नंतर कधीतरी.
तात्या,
तुमच्या या लेखावर प्रतिक्रिया देण्याइतकी माझी कुवत नाहीये...
फक्त इतकच म्हणेन....
तुम्हाला सलाम.................!!!
असेच लिहिते राहा ...
-स्मिता
तात्या,
अहो संत नामदेवांच्या वेळेस एक वेश्या होती. आख्या गावाला तिने वेड लावले होते. एकदा ती असे म्हणाली होती कि नामदेव जेव्हा तिच्याकडे बघायचे तेव्हा तिला त्यांच्या डोळ्यात कधी 'पुरुष' दिसत नाही तर त्यांच्या डोळ्यात तिला कायम अथांग करूणेचा झराच दिसला. या गोष्टीची आज आठवण झाली.
- नाटक्या
एकदा ती असे म्हणाली होती कि नामदेव जेव्हा तिच्याकडे बघायचे तेव्हा तिला त्यांच्या डोळ्यात कधी 'पुरुष' दिसत नाही तर त्यांच्या डोळ्यात तिला कायम अथांग करूणेचा झराच दिसला. या गोष्टीची आज आठवण झाली.
नि:शब्द..!
परंतु मी मात्र नामदेव नाही. माझेही पाय मातीचेच आहेत रे! नीलमला लहानपणापासून पाहिलं आहे म्हणून तसं काही वाटलं नाही. तिच्या जागी अन्य कुणी अशी देखणी मुलगी असती तर माझं मन चाळवलं नसतं असं नाही..! खिशात पैसेही होते..!!!!
असो..
नामदेव एकच असतात..! परक्या तरूण पोरीत आपल्या मातोश्रींचा चेहेरा पाहणारे शिवछत्रपती एकच असतात..! खर्या अर्थाने एकमेवाद्वितीय...!
बाकी तुम्हाआम्हा मंडळींचे पायही मातीचेच रे!
आपला,
(प्रांजळ) तात्या.
तात्या,
माझे पाय मातीचे आहेत हे अगदी मान्य.
तिच्या जागी अन्य कुणी अशी देखणी मुलगी असती तर माझं मन चाळवलं नसतं असं नाही..
ते चाळवलं नाही यामध्येच सारं काही आलं. आपल्या पोटच्या पोट्च्या पोरीवर, सख्ख्या पुतणीवर/भाचीवर, शेजारच्या लहानग्या पोरींवर अत्याचार करणारे महाभाग पाहीलेत तर या कशावरच विश्वास उरत नाही. त्या पार्श्वभूमीवर तुमचे हे वागणे देखील डोळ्यातं अश्रू उभे करतात आणि या जगात माणूसकी शिल्लक आहे असे पुन्हा वाटायला लागते.
काय लिहू.. शब्दच संपले....
- नाटक्या
आपल्या पोटच्या पोट्च्या पोरीवर, सख्ख्या पुतणीवर/भाचीवर, शेजारच्या लहानग्या पोरींवर अत्याचार करणारे महाभाग पाहीलेत तर या कशावरच विश्वास उरत नाही.
खरं आहे! असतात असे काही नराधम!
तात्या.
तात्या, छान लिहिलं आहेत. आणि ह्या नीलम बाई पण फारच सुंदर आहेत. डोळे निवले.
नामदेव जेव्हा तिच्याकडे बघायचे तेव्हा तिला त्यांच्या डोळ्यात कधी 'पुरुष' दिसत नाही तर त्यांच्या डोळ्यात तिला कायम अथांग करूणेचा झराच दिसला.
अहो हे काही तितकंसं खरं वाटत नाही. माझ्या मते या अशा कथा महापुरुषांबाबत नेहमीच रचल्या जातात. तात्यांनी प्रतिसादामध्ये शिवछत्रपतींबाबत जे लिहिले आहे तेदेखील तितकेसे पटले नाही. पण जाऊंदे अवांतर होतंय त्यामुळे तो विषय टाळतो. असंच छान लिवत र्हावा तात्या.
तात्या, लेखन केवळ अप्रतिम. अशाच लेखनाचे आम्ही आपले चाहते आहोत.
''अवांतरः एकेकाळी तात्यांचे असे लिखाण निरनिराळी व्यक्तीचित्र भरभरुन वाचायला मिळायची, सकाळी आंतरजालावर आले की तात्या अभ्यंकराचा असा एखादा लेख अन खाली प्रतिसादाची जंत्री असे चित्र काहे विरळा नसायचे.
आनंदयात्री प्रतिसादात जे म्हणतोय ते मला पटतंय...! तो तात्या हल्ली फार क्वचित दिसतो..तेव्हा तात्याने सतत लिहिते राहावे.
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
सुंदर!!!
+१
+२
शापीत अप्सराच ह्या ...
तात्या, अरे काय हे!
असेच म्हणतो
सहमत!!!
खूप दिवसांनी..
+१
पटले
+१ +१
शब्द खुंटले!
फारच सुंदर
तात्या
जी नीलमचे
हे काय
सहजराव, वेक अप अँड स्मेल द कॉफी
सहमत-असहमत
लाचार सूर्य
बर्याच
अप्रतीम !!
वाह वाह.
अभी मुजरा शुरू होनेमे वक्त है.
असेच
उत्तम
आओगे ना?
सुरेख
+१
+२
सरळ साधे
काय बोलु?
लायन हार्ट
बहोत आच्छे
अतिशय प्रामाणिक!
सहमत!
सहमत...
+१
अतिशय प्रामाणिक!
तात्या..
एकदा ती
तात्या, माझ
आपल्या
तात्या,
सुंदर....
+
++
लेखन आवडलं
अप्रतिम लेख
तात्या,
सुंदर लेखन !!!