Skip to main content

सुशिक्षितांमधे आजही असे विचार जीवंत आहेत?

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 01/02/2017 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
arunjoshi123 हे अभ्यासू सदस्य म्हणतातः आर्यन इन्वेजन थेरी हा धाग्याचा विषय नाही. पण तरीही... ती मांडली तेव्हा मांडणार्‍या लोकांची मानसिकता पाहून , राजकारण पाहून अनेक इतिहासकारांनी त्यातला फोलपणा तत्क्षणी दाखवला होता. पण असे इतिहासकार नॅशनालिस्ट असल्याने अर्थातच देशद्रोही मंडळीनी सोयीस्कररित्या खास देश तोडण्यासाठी ती थेरी स्वीकारली. त्या थेरीला तेव्हाही काही अर्थ नव्हता, आजही नाही. पण इंग्रजाच्या तोडो आणि राज करो नितिला या लोकांची थेट साथ होती. म्हणून सत्य काय आहे याचेशी त्यांना कधीच काही देणेघेणे नव्हते. ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते. . http://www.misalpav.com/comment/916211#comment-916211 ----------------------------------------------- वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते. मला अरुणजोशींना विचारायचे आहे की त्यांनी वर जी मते मांडली आहेत त्यावर त्यांचेकडे काय स्पष्टीकरण आहे की नाही? असली जातीयवादी विचारसरणी बाळगायचे कारण काय? ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे हा काय प्रकार आहे? फेदरवेट यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत काय? संबंधित धाग्यावर अवांतर नको म्हणून हा धागा वेगळा काढत आहे.

वाचने 30736
प्रतिक्रिया 179

प्रतिक्रिया

संदीपभाऊ...त्याच्यातही आधी चित्पावन,मग देशस्थ,यजुर्वेदी,ऋग्वेदी अशी उतरती क्रमवारी केली नाही हे नशीब समजा की राव!!

In reply to by चिनार

चला, आता ती उणिव भरून काढतो. माझ्यामते कोकणस्थ (चित्पावन? सारस्वत? लै घोळै राव) ब्राह्मण हे त्यातल्या त्यात सर्वात प्रखर राष्ट्रवादी असतात.

In reply to by arunjoshi123

माझ्या मते कोकणास्थांमध्ये अरुण जोशी हेच तकोकणास्थांमध्येप्रखर राष्ट्रवादी असतात. बाकी सगळे पानी कम आहेत.

पंचाइत अशी आहे की आर्यांचे मूळ स्थान कुठेतरी आर्क्टिक भागात होते असं लोकमान्य म्हणाले. एकतर "प्रत्यक्ष लोकमान्य चुकले" असं म्हणायला हवं नाहीतर इथे राहणारे -म्हणजे आपण सगळे- आर्य नाहीत असं म्हणायला हवं. :)

In reply to by नितिन थत्ते

सायबेरियामधल्या गुफांमधे जे फॉसिल्स मिळाले आहेत त्यामुळे "इथिओपियामूलम अन्यत्रशाखम" असा मानववंशशास्त्राचा वृक्ष उन्मळून पडला आहे. तेव्हा खोट्यारड्यांची लिस्ट बनवण्यासाठी थोडा दम धरा.

ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते.>>> -- विशेष म्हणजे ह्या प्रतिक्रियेला जातीने ब्राह्मण असणाऱ्या मिपाकरानी (बऱ्याच लोकांनी तसा उल्लेख केला आहे की मी जातीने ब्राह्मण आहे) बिलकुल आक्षेप घेतला नाही की तुटून पडले नाहीत. गडकरी पुतळा प्रकरणी सगळेच हताश होऊन व्हिक्टिम कार्ड खेळत होते. कालच्या मराठा चक्का जामचा अजून कोणी धागा काढला नाही हे नशीब. जो पर्यंत असा सुलेमानी किडा वळवळत राहणार कथित सुशिक्षित लोकांना ब्रिगेडिंना हिणवायचा नैतिक अधिकार राहणार नाही. असो...

In reply to by विशुमित

तिथे वाक्यरचना गंडली आहे. पूर्ण चर्चा वाचलीत तर लक्षात येईल की नंतरची दोन वाक्ये द्रविड किंवा अन्य कुणासाठीतरी आहेत. मग कुणी कशाला तुटून पडेल?

In reply to by खेडूत

घ्या समजून, एरवी जोशींच्या वक्तव्यात 'म रा ठा' असा शब्दही दिसून आलेला नसताना मधेच चक्काजामचे शेपूट जोडले की डांगेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बार काढताच येतो, कसं? ;)

In reply to by फेदरवेट साहेब

कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे विधान मी केले नाही. मराठा मूक मोर्चा निमित्ताने भरभरून मराठा जातीचा माज उद्घृत करताना मजा घेणारे ह्या वेळेस पुढे नाही आले याचे आश्चर्य वाटले.

In reply to by खेडूत

होय, संपूर्ण संदर्भाशिवाय हा धागा वाचणे चूक आहे. ========= संदिप साहेबांच्या प्रश्नात वा धाग्यात कोणतीही "तांत्रिक" चूक नाही.

In reply to by विशुमित

"ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते." या जोशींच्या वाक्याशी पूर्ण सहमत नाही. खासकरून "सर्वात" या शब्दाशी. पण, इथे ब्राह्मण असणाऱ्या मिपाकरांनी ती प्रतिक्रिया वाचलीच होती हे तुमचे गृहीतक कशासाठी? शिवाय तुटून पडण्याचा काय संबंध? गडकरी पुतळा प्रकरण आणि ब्राम्हण याचा संबंध काय? त्या प्रकरणाला विरोध करणारे सगळेच जण ब्राम्हण होते असे आपल्याला म्हणायचे आहे का? बाकी ते वरील वाक्य संदर्भविरहित दाखवून सोयीस्कर अर्थ काढला गेला आहे असे मला वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मंजे मला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, लिबरल थॉट्स, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, इ इ विषयांच्या बर्‍याच अस्पेक्टांबाबत फार कंफ्यूजने आहेत, पण तो सर्वात शब्द सर्वमान्य असावा असे मला अभिप्रेत नव्हते.

In reply to by विशुमित

जातीने ब्राह्मण असणाऱ्या मिपाकरानी (बऱ्याच लोकांनी तसा उल्लेख केला आहे की मी जातीने ब्राह्मण आहे) बिलकुल आक्षेप घेतला नाही की तुटून पडले नाहीत.
संदीप डांगे जातीने ब्राह्मण नाहीत सुस्पष्ट अर्थ या विधानावरून निघतो. माझ्यामते त्यांनी लै जबर्‍या आक्षेप घेतला आहे आणि तुटून पडले आहेत. =============== का हो, यावर ब्राह्मण आणि अब्राह्मण लोकांची रिअ‍ॅक्शन वेगवगळी राहावी (किमान हिरीरी वेगळी राहावी) असे तुम्हाला अभिप्रेत आहे. म्हणजे लोकांना जातीची जातीने जाण आहे. ============= मला अस्सं अजिबात लिहायची इच्छा नव्हती पण लिहितो. मराठी आंतरजालावर (वा कुठेही) असं लिहू नये वा लिहायला लागू नये. माझं राष्ट्रवादावर प्रेम पातळ आणि ब्राह्मणवादावर घट्ट असा अर्थ का काढला जातोय. "ब्राह्मण सर्वाधिक राष्ट्रवादी" या फ्रेजचा अर्थ निगेटिवच असायला पाहिजे का? "भारत सर्वात महान" हे देखिल असंच क्षुद्र विचार करणं आहे का? हे नेसेसरीली निगेटेवच असतं का?

In reply to by arunjoshi123

"ब्राह्मण सर्वाधिक राष्ट्रवादी" या फ्रेजचा अर्थ निगेटिवच असायला पाहिजे का?
पॉझिटिव्ह अर्थ समजावून सांगा बरं?

In reply to by विशुमित

म्हणजे ब्रिगेड वर टीका केली म्हणून सतत अरुण जोशींच्या लिखाणावर लक्ष ठेवत बसायचे असे आहे का काही ? कैच्या कैच अपेक्षा आहे. अरुण जोशी काहीबाही बाता मारत असतात बर्याचदा. तो त्यांच्या अजेंड्याचा भाग असावा. पण ऐसीवर फुरोगामी मंडळींमध्ये त्यांची जी दहशत आहे त्याबद्दल आणि त्यामुळे मला त्यांचे कौतुक वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

पण ऐसीवर फुरोगामी मंडळींमध्ये त्यांची जी दहशत आहे त्याबद्दल आणि त्यामुळे मला त्यांचे कौतुक वाटते.
कृतकृत्य झालो. जीवन सार्थकी लागलं. इ इ भाव उमाळून आले.

In reply to by सूड

त्यांना असं वाटलं कारण डांगे सज्जन आहेत. त्यांना इतरांच्या अभिव्यक्तिचा सन्मान आहे. इतरांचे विचार सरळ आणि जमान्यास धरून असे सुयोग्य असायला हवेत अशी अपेक्षा/कळकळ (कैतरी) आहे. शिवाय त्यातली चूक दाखवायची खुमखुमी पण असेल. नैतर तुमच्यासारखं नाही. "सर्वात"-वर-आपण-भाव.

In reply to by arunjoshi123

अरे वा!! माझ्याबद्दल फारच लवकर निष्कर्षाप्रत पोचलात आपण. तस्मात आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो. आपण लवकर मोठे व्हाल हीच त्या आकाशातल्या बापाचरणी प्रार्थना. ॥ इति लेखनसीमा ॥

In reply to by सूड

सुरुवातीला असं होतं. म्हणजे लोक अशिक्षित आहेत असा निष्कर्ष काढायची आपली घाई पाहून ते विधान केले गेले होते. ते असो. ========== तुम्हाला एखादा मुद्दा मांडायचा असेल तर जरूर मांडा, मी सन्मानपूर्वक उत्तर देईन.

तुमचा बहुतेक 'सुशिक्षित' अन 'साक्षर' ह्या दोन संकल्पनांत गोंधळ उडालेला दिसतो आहे. मनुष्य साक्षर असू शकतो मग तो फक्त नाव लिहू शकणारा ते पीएचडी सगळे काही असू शकतो. तो फक्त कमी जास्त अक्षरओळख असलेला एक साक्षर प्राणी असतो. 'सुशिक्षित' असणे हा एक चॉईस आहे म्हणजे पर्याय आहे, साक्षरतेला सुशिक्षिततेपर्यंत नेता न येणे ही खरी भारतीय शिक्षणपद्धतीची शोकांतिका आहे. अजून बोलण्यासारखे काही नाही. जोशींना त्यांच्या अडनावावरून जोखण्याइतके हलके माझे संस्कार नाहीत, तरीही एक सेकंदभर मी जोशींचे वक्तव्य ग्राह्य धरतो की 'ब्राह्मण सर्वाधिक देशप्रेमी जमात होती'. मी अर्ध्या वक्तव्यावर परिस्थितीक सहमती दर्शवतोय. ब्राह्मण देशप्रेमी 'होतेच' कारण एकंदरीत आधीपासून राज्यसत्ता अबाधित राहणे किंवा राजाश्रय असणे ह्यावरच ब्राह्मणांचे अस्तित्व अन उपजीविका आधारित होती. आता राजाश्रय असायला राज्य सुस्थापित हवे. त्यामुळे राज्यनिष्ठा ह्या गुणाला थारा देणे सोडून ब्राह्मणांकडे पर्याय नव्हता. हे झाले प्राचीन. आधुनिक काळात फिरंगी जेव्हा भारतात आले तेव्हा सर्वप्रथम पाश्चात्य शिक्षणपद्धती अंगिकारणारा आद्य समाज म्हणजे ब्राह्मण समाज त्यामुळे साहजिकच आधुनिक राज्यशास्त्रातल्या राष्ट्र (नेशन स्टेट) अन राष्ट्रवाद (नॅशनलिझम) ह्या संकल्पनांना जेव्हा ब्राह्मण समजून घेत होते किंवा त्यांना समजून घ्यायचा मौका मिळत होता तेव्हा बरीच जनता गावकुसाबाहेर राहायला भाग होती. आज जेव्हा शिक्षण खुले झाले आहे तेव्हा सगळे समसमान येत आहेत. अश्या काळात जर आधी ब्राह्मण देशभक्त होते म्हणले तर पटायला हरकत नाही (ते ही त्या काळी ब्राह्मणांना वाढीव संधी होत्या हे ध्यानात ठेवुन) पण जर आजही ब्राह्मणच सर्वात जास्त देशभक्त आहेत(च) असे कोणी म्हणत असले तर नारायणदत्त तिवारी नाव असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व कसली देशभक्ती दर्शवते? असा प्रश्न विचारवा वाटतो.

In reply to by फेदरवेट साहेब

प्रथमतः इतक्या चांगल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी देखिल डिट्टो हेच विचार मांडलेत (अन्यायी व्यवस्था चालू ठेवणे म्हणजे राष्ट्रवाद अशी वेगळी फोडणी मी दिली आहे, पण म्हणायचं तेच आहे.)
अश्या काळात जर आधी ब्राह्मण देशभक्त होते म्हणले तर पटायला हरकत नाही (ते ही त्या काळी ब्राह्मणांना वाढीव संधी होत्या हे ध्यानात ठेवुन) पण जर आजही ब्राह्मणच सर्वात जास्त देशभक्त आहेत(च) असे कोणी म्हणत असले तर नारायणदत्त तिवारी नाव असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व कसली देशभक्ती दर्शवते? असा प्रश्न विचारवा वाटतो.
राष्ट्रवाद हा अंततः सामाजिक , आर्थिक, इ इ स्वार्थांतून प्रेरित होतो का? मंजे मागे ब्राह्मणांचे प्रभुत्व होते नि स्वार्थ होता म्हणून ते सर्वात राष्ट्रवादी? मग आज अब्राह्मणी जातींचा जो राष्ट्रवाद आहे तो देखिल स्वार्थप्रेरित आहे? मला वाटतं परिस्थीत काही फरक नाही. उलट हा देशच नाही (बल्कि आप पुरुषही नही हो टाईप), तो उगाच बनवला आहे, त्याच्यात कॉमन असं कुठे काही नाही, इंग्रजांनी तो बन्वला आहे, इ इ विचार भयंकर बळावला आहे. देशात ब्राह्मण ही एकच जात सर्वत्र (गुजरात ते मणिपूर, काश्मिर ते तामिळ नाडू) आहे. दुसरे आहेत ते मुस्लिम पण त्यांनी एकदा फाळणी केली आहे. आज ब्राह्मणद्वेष भारतात शिगेवर आहे. तरीही मी भारताचा द्वेष करणारे ब्राह्मण पाहिले नाहीत. असे लोक असण्याची कल्पना देखिल मला विचित्र वाटते. शिवाय ज्या ज्या अन्य जाती आहेत त्यांनी आपापले स्वार्थ थेट मांडले आहेत. आदिवास्यांचे म्हणाल तर भारतातले ४०० जिल्हे लाल होते. (आता ३०-४० झालेत, पण त्यांना भारतातून फूटून निघायचं होतं हे विसरायचं कसं?). दलितांचे म्हणायचे तर एका अत्यंत प्रभावी नेत्याने पाकिस्तानात जायचा प्रयोग झालाय. https://en.wikipedia.org/wiki/Jogendra_Nath_Mandal ईशान्येतले राज्ये तर आजही फक्त नकाशावर भारतात आहेत. काश्मिर आणि पंजाबचे प्रोब्लेम होतेच. द्रविडस्तानी लोक होतेच. मुस्लिमांचा पाकिस्तान झालाच. ब्राह्मणांच समाजातलं स्थान गेलं, पैसे गेले (मागे अन्यायी होते असं नै म्हणायचं मग), इज्जत गेली, लोक दूषणं द्यायला लागली, कशाचाही दोष त्यांच्यामाथी फोडू लागली, तरी या लोकांना भारताबद्दल आणि इथल्या सगळ्या लोकांबद्दल प्रेम असलेले "मला" दिसते. आदित्य कोर्डे चा लेख मी नीट वाचला असेल तर असेच वैतागून दुसर्‍या महायुद्धाआधी ज्यूंनी इस्त्रायल बन्वला होता. भारतात ब्राह्मणांना मार बसायची वा जिनोसाइड व्हायची शक्यता अगदी शून्यच आहे असं म्हणता येत नाही. पण मंडळी कूल आहेत. दलितांबद्दल जेव्हा जागॄती वाढली, तेव्हा त्यांनी अगोदर फक्त ब्राह्मणांवर टिका केली. पण एवढं काही झालं नाही. पण दलितांना आपल्यात पुरेशी ताकद आली आहे असे वाटून त्यांनी जेव्हा क्षत्रियांबद्दल बोलायला चालू केले तेव्हा देशाचा माहौलच गरम झाला आहे. अशा काही कारणांनी मी ब्राह्मणांना आजही सर्वात राष्ट्रवादी म्हणतो.

In reply to by arunjoshi123

स्व जातीचं व्हिक्टिम कार्ड खेळून बघा आलेच का नाही दलित आणि क्षेत्रियांवर ? माझा हाच आक्षेप होता. बाकी चालू द्या.

In reply to by विशुमित

पक्षभार (फेदर्वेट) साहेबांना मी ब्राह्मण हे आज हायड्रोजन आणि नायट्रोजन अणूंपेक्षा राष्ट्रवादी आहेत हे सिद्ध करून पाहिजे होते का?

आजही सुशिक्षितांत संदीप डांगे यांच्यासारखे लोक, विचार आहेत? मला देखिल कमाल वाटते. =============== आता मला कमाल का वाटते ते सांगतो. तुम्हाला मी ब्राह्मण सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे म्हणालो याचे नवल वाटले तर ते ठिक आहे. माझ्यासारखे असे मानणारे लोक (सुशिक्षित ब्राह्मण वैगेरे?) आहेत ही गोष्ट नवलाचीच आहे. ते मिसळपाववर सांगणे अजूनच नवलाचे आहे. तर तुमचे हे नवल मला मान्य आहे. या नवलात एक निगेटिवपणा आहे. तो मला १०% मान्य आहे, ९०% नाही. १०% यासाठी मान्य आहे कि राष्ट्रवादाची माझी जी आकलन पद्धती आहे ती चूक असू शकते. शिवाय अभ्यास कमी असू शकतो. ९०% यासाठी नाही कि मला यात अन्य जातींबद्दल काहीही म्हणायचं नाही. =============== आपल्या जातीचा उल्लेख करणे, तिच्या बद्दल काहीतरी चांगले वा वाईट वा सुधारात्मक बोलणे यावर कोणतेही घटनात्मक बंधन नाही. शिवाय लिबरल जमाने के नॉर्म्स के हिसाब से यात काही प्रोटोकॉलच्या विरुद्ध नाही. ==================== ब्राह्मणांचे "सर्वात" (वा कितीही) प्रखर राश्ट्रवादी (ते शरद पवार वाले नै) असणे, तथ्यहिन असेल तर मागे. उगाच व्यक्तिगत बायस ऐतिहासिक सत्यांच्या कुरगोडिला पाठवू नये. (पण लिबरल लोकांना एक प्रश्न आहे. मला असे मत ठेवायचा अधिकार आहे का नाही? शिक्षित असलो तरी? मी समजा असं लिहिलं की ब्राह्मणांनी दलितांवर फार अन्याय केले तर माझं शिक्षण काढलं जात नाही. अहो पण असं अन्याय करत राहाण्यासाठी लागणारी व्यवस्था एत्तद्देशियांच्या हाती ठेवणे (मंजे राष्ट्रवाद!) यासाठी देखिल प्रयत्न केलेच असतील ना त्यांनी असं लिहिलं तर माझं शिक्षण काढलं जातं! यार या तो घोडा बोलो नै तो चतुर बोलो, ये घोडा चतुर घोडा चतुर क्या है?) ========================= आता दुसरा भाग. "हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते." हा तिथल्या चर्चेचा मूळ विषय होता. हे कशाला बोल्ड केलेत? हे ऐतिहासिक सत्य आहे. पेरियार शुद्ध ब्राह्मणद्वेष्टा तर होताच होता "पण म्हणून" त्याला वेगळा द्रविडस्तान पाहिजे होता. https://en.wikipedia.org/wiki/Dravida_Nadu वाचा. (वाटल्यास इथल्या लिंका आणि उपलिंका चाळा.). त्याच्यात आपला महाराष्ट्रही होता थोडा थोडा. लॉजिक काय होतं त्याचं? आर्य , ब्राह्मण या अन्यायकारी लोकांपासून विमुक्त असा वेगळा देश हवा. मग द्क्षिन भारत्तीय ब्राह्मणांचं काय करायचं? आणि उत्तर भारतातले दलित गेले का वार्‍यावर उडत? भारतीय समाज तेव्हा आजच्यासारखा खरोखरीच विभागलेला नव्हता (ब्राह्मण -अब्राह्मण या लाइनवर), नैतर आज बेळगाव काश्मिर राहिला असता. =================
ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे हा काय प्रकार आहे? फेदरवेट यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत काय?
का हो, ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे का नाही? ब्राह्मण भारतीय नाहीत का? भारतातल्या कोणत्याही समाजाचा द्वेष करणे भारताचा द्वेष करणे नाही का? डांगे साहेब सीन लक्षात घ्या. २०१७. भारतात अ ब क द इ फ ..... झ जातीचे लोक राहतात. पैकी य जातीच्या मूठभर लोकांनी उठून आम्हाला अ आणि ब ह्या जातीच नकोत म्हणून दुसरा देश द्या म्हणणे राष्ट्रद्रोह नाही का? ब्राह्मणद्वेष्टे असणे म्हणजे भारतद्वेष्टे नसणे कसे काय हे तुम्हीच मला सांगाल काय? ============ आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला. पण जाताना त्याचे नुकसान नै केले. म्हणून त्यांना धर्मद्रोही म्हणता येत नाही. पेरियार आणि कं बनिया होती. आंबेडकरांसारखा त्यांच्यावर प्रत्यक्ष अन्याय झालाच नाही. आपल्या जातबांधवांचे दु:ख पाहून आंबेडकर कधी दलितस्थान नै मागून राहिले (जसे त्यांचे स्पर्धक जोगेंद्रनाथ मोंडोल मागून राहिले.). म्हणून धर्मद्रोही वा देशद्रोही हे शब्द आंबेडकरांना लागू पडत नाहीत. (उलट त्यांना ब्रह्मसुधारक ही पदवी देता येईल.) पेरीयारचं काय? ब्राह्मणद्वेषजनित देशद्रोह ही वाक्यरचन्ना मी अशा कारणाने लिहिली आहे. ============== अजून शिक्षण घ्यायला मी ओपन आहे. ============ मी अभ्यासू नाही. "अरुण जोशी नावाचा कोणी राजकीय सामाजिक विचारवंत ऐकून आहे का? आय हॅव नथिंग टू लूज" असं मी लिहिलेल्या धाग्यावर तुम्हीपण होतात. ========== इतरांनी उगाच हवे तसे निष्कर्ष काढून तमाशा करू नये. पेरियार माणूस ड्यांजर होता. नशीबानं देश वाचला त्याच्यापासून. जिन्नापेक्षा मोठ्ठा जमिनीचा लचका तोंडात धरून होता.

आणि खाली तिवारींचं नाव घेणं हा विरोधाभास नाही का?? राज्यशास्त्र शिकवल्यामुळे राष्ट्र संकल्पना कळते म्हणजे आधी राष्ट्र भावना नव्हती का? अशिक्षितांना अजूनही राष्ट्रभावना कळलीच नाही असे म्हणावे लागेल म्हणजे.किंवा फिरंगी येण्या आधी राष्ट्रभावना नव्हती किंवा स्वतंत्रलढ्यात काही कमी शिकलेले, अशिक्षित होते त्यांची राष्ट्रभावना कमी होती असे म्हणावे का??साहेब शिक्षणाने राष्ट्रभावना येत नसते . राज्यशास्त्रासोबत नागरिकशास्त्र हि शिकले असतील आधीच तर मग रूढी परंपरा जायला इतका वेळ का लागला बरे ? असाही प्रश्न उद्भवतो . गावकुसाबाहेर होते बाकीचे त्यामुळे विचारलं आपलं. राज्य सुस्थापित असायला सैन्य लागत होतं प्राचीन काळात .नुसती राजनिष्ठा नाही .कारण राजनिष्ठेने राज्य अबाधित राहत असत तर तर इतिहासच बदलला असता कि हो .असो प्राचीन काळात आधुनिक राज्यशास्त्र नव्हतं मग राज्य निष्ठा कशी आली ?आणि आधुनिक काळात जे पहिले शिकले त्यांच्यात राज्यनिष्ठ आली म्हणजे काय ?

In reply to by वरुण मोहिते

'ब्राह्मण सर्वात प्रखर ....' मध्ये मला 'सर्वात' हा शब्द खटकला आहे, त्यावर जोशी काही बोलले नाहीत तिथेही अन आता इथेही. त्या सर्वात ह्या शब्दाचा फोलपणा दाखवायला मला ब्राह्मण जातीची असलेली अन प्रस्थापित नियमानुसार देशभक्त नसलेली एक व्यक्ती वानगीदाखल देणे क्रमप्राप्त होते, असे मी समजतो. माझे संस्कार अजूनही मी म्हणले तसेच आहेत. 'सर्वात' म्हणले की श्रेष्ठत्वाची फालतू भावना येते. जात्यांतर्गत उच्चनीच 'सर्वात - कमी/जास्त' ह्या मूर्खपणामुळेच एकंदरीत देशाचे किती नुकसान झाले आहे हे मी तुम्हाला सांगू नये, नाहीका? राज्यशास्त्र शिकवल्यामुळे राष्ट्र संकल्पना कळते म्हणजे आधी राष्ट्र भावना नव्हती का? पुन्हा तिसरंच समजला तुम्ही. मी राष्ट्रभावना नव्हती असे म्हणत नाहीये तर तेव्हा 'राष्ट्र' ह्या संकल्पनेचा अर्थच आपण आज ग्राह्य धरतो तसा नव्हता हे म्हणतोय त्याकाळी आधुनिक राष्ट्र ही पोस्ट रेनेसंस संकल्पना विकसित झाली नव्हती. ती कळायला आधुनिक राज्यशास्त्र शिकावे लागते म्हणजे नेशन स्टेट उर्फ 'राष्ट्र' ही आधुनिक व्याख्या स्पष्ट होते. बाकी इतर स्वातंत्र्यपूर्व काळातल्या लोकांनी ज्यांनी राष्ट्रकार्यात सहभाग नोंदवलाय त्यांच्याबद्दल आदरच आहे. प्रसंगोद्भव नेत्यांनी आधुनिक राष्ट्रवाद सोपा सुलभ करून जनतेला शिकवला होता. म्हणजे एकार्थाने जनतेला आधुनिक संकल्पनांना एक्सपोजर मिळालेच होते.

In reply to by फेदरवेट साहेब

सर्वात शब्द वापरला की इतर तेवढे नाहीत हे अध्यारूत होतं. जोशींचा प्रतिसाद पटला नाही. निषेध!

In reply to by अनुप ढेरे

सोन्याची वाहकता सर्वात जास्त आहे म्हटले तर बाकी सगळी मूलद्रव्ये फेकून द्यायची असं होतं का? रँकिंगच करणं चूक आहे असं म्हणायचं आहे का? का? माझं रँकिंग चूक आहे तर बरोबर काय ते सांगा. मला तुमच्या मतांचा आदर असेल. ============== मोजमापातच काय चूक आहे? आणि मी असं म्हटल्यानं अहमहमिका चालू झाली, तर मी (खोटं का होईना) तोच माझा उद्देश होता असं सांगेन. राष्ट्रवाद को बढावा देना हर भारतीय का कर्तव्य है.

In reply to by फेदरवेट साहेब

'सर्वात' म्हणले की श्रेष्ठत्वाची फालतू भावना येते.
संवाद करणारांमधे भाव कसा आहे यावर हे अवलंबून आहे. एकतर अशा गोष्टींची मोजमापं करता येत नाही. ही व्यक्तिगत मत असतात, काहीशा माहितीवर आधारित. कधी खरी असतील खरी नसतील. पण माझ्या संवादात काहीतरी फालतू आहे का नाही हे सर्वस्वी आपले डीसीजन आहे. श्रेष्ठत्वात काय गैर आहे? समजा चुकून ब्राह्मण?सर्व अब्यासाअंती सर्वात राष्ट्रवादी निघाले तर माझ्या श्रेष्ठत्वाच्या भावनेत (मंजे तसे ब्राह्मण श्रेष्ठ मानण्याच्या भावनेत, मी श्रेष्ठ असण्याच्या नाही) चूक काय? ============ सरळ सांगा ना हे नै वाटत हे वाटतात म्हणून.

In reply to by फेदरवेट साहेब

मी राष्ट्रभावना नव्हती असे म्हणत नाहीये तर तेव्हा 'राष्ट्र' ह्या संकल्पनेचा अर्थच आपण आज ग्राह्य धरतो तसा नव्हता हे म्हणतोय त्याकाळी आधुनिक राष्ट्र ही पोस्ट रेनेसंस संकल्पना विकसित झाली नव्हती. ती कळायला आधुनिक राज्यशास्त्र शिकावे लागते म्हणजे नेशन स्टेट उर्फ 'राष्ट्र' ही आधुनिक व्याख्या स्पष्ट होते.
या धाग्यावर हे विधान मला सर्वात अगम्य वाटले. मोहिते म्हणतात त्याच्याशी मी १००% सहमत आहे. शिक्षण आणि "राष्ट्राची आधुनिक आयडिया" यांचा काही संबंध नाही राष्ट्रवादी असण्याशी. सामाजिक स्वार्थ, शिक्षण, राष्ट्र शब्दाची व्याख्या (जी मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी नसल्याने अद्यापि वाचलेली नाही), इ इ चा देशप्रेमाशी संबंध नाही. उलट स्वार्थ हिच ज्यांची प्रेरणा आहे ते लोक गद्दार निघण्याची जास्त संभावना आहे. ========= राज्यशास्त्रः अ‍ॅनि वे, असा व्याख्या शिकलेल्या लोकांच्या आणि न शिकलेल्या लोकांच्या देशप्रेमात काय फरक आहे ते उदाहरणाने, इ सांगाल काय? ========= शिक्षणः उद्या भारतावर संकट आले. एका सिक्षित माणसाने (ज्याला संकट इ इ खरेच डिटेल मधे कळते, किंवा संकट नसेल तर एखाद्या गोष्तीत देशाचे भले आहे हे कळते.) एका अशिक्षित माणसाला आवाहान केले. दोघांनी आपापल्या परीने सेवा केली तर केवळ ज्याला जास्त जाण आहे तो मोठा देशप्रेमी नसेल. मदतीची कळकळ कोणाला आहे हे महत्त्वाचे.

In reply to by वरुण मोहिते

मोहिते साहेब, राष्ट्रवादाचा उद्गम कधी नि कशामुळे झाला (नाही) याबद्दल माझं मत आपणाशी बरंच जुळतं. ================ फेदरवेट यांना "होता" हे मान्य पण "आहे" हे अमान्य आहे. आपणांस "होता" हे देखिल अमान्य आहे असे दिसते. पण मग माझी तशी भावना का आहे असं विचारायचं आहे का?

वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते. तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले याचे मला प्रचंड आश्चर्य वाटत आहे. अपवाद असला तरी, कांही उच्चविद्याविभूषीत लोकं आर्थिक गुन्ह्यांमध्ये सापडतात, टॅक्स वगैरे चुकवून किंवा सरकारात चांगल्या पदावर असली तर देशद्रोह करतात, बॉम्बस्फोट आणि जिहादबद्दल तर बोलायला नको. मग अशावेळी अरूण जोशींच्या एका विधानाला खास धागा काढण्याइतके महत्व तुम्हाला का द्यावेसे वाटले हे जाणण्यास उत्सुक. अरूण जोशींचे सरसकटीकरण करणारे विधान स्वीकारार्ह नाहीच तसेच (माझ्यासह) कोणीही (विशिष्ट विचारसरणीचा चष्मा न घातलेली) सुजाण व्यक्ती अशा विधानाला सहमत होणारही नाही हे उघड आहे. अशा अनेक पुड्या मिपावर सोडल्या जातात. आपल्या मुद्द्याची भलामण करण्यासाठी वाट्टेल ती काल्पनीक उदाहरणे दिली जातात, एक थिअरी सांगून त्याच थिअरीने निघणारे दुसरे (स्वतःला गैरसोयीचे) निष्कर्ष नाकारले जातात, मग अशावेळी अशा एका विधानासाठी पेश्शल धागा काढून काय साध्य करत आहात ते कळाले नाही.

In reply to by मोदक

अरूण जोशींचे सरसकटीकरण करणारे विधान स्वीकारार्ह नाहीच.
कोणी कोणाला कोणते विधान स्वीकारायला सांगीतले आहे? उद्या मी खीर हेच सर्वात चविश्ट अन्न आहे असे म्हणालो तर गुंड, मवाली, विकृत, दुष्ट, इ इ लोक खीर चवीने खातात असा प्रतिसाद लिहाल कि काय? अवघड आहे बाबा. ======== गर्दी बघून हात मोकळा करून घ्यायची प्रवृत्ती बरोबर नाही हो.

In reply to by arunjoshi123

कोणी कोणाला कोणते विधान स्वीकारायला सांगीतले आहे? सार्वजनिक ठिकाणी विचार मांडले तर त्यावर प्रतिवाद येणारच. त्याचा आणि गर्दी बघून हात मोकळा करून घेण्याच्या प्रवृत्तीचा काय संबंध कळाला नाही.

In reply to by मोदक

आपली प्रवृत्ती तशी नाही याचा आनंद आहे. ============== प्रतिवादाचं स्वागत आहे. पण फक्त फेदरवेट या एकाच माणसाने प्रतिवाद केलाय. बाकी हात धूवून घेत आहेत असं मला तरी वाटतंय.

संदीप भाऊ, तुम्ही असं ढोलकी घेऊन धागा काढायच्या आधी मला लिहायला हवं होतं. पण बरं केलंत धागा काढलात ते. मला खालील गोष्टींची माहिती होइलः १. ब्राह्मणांनी भारतात नेहमी पोलिटिकली करेक्ट आणि सांभाळून सांभाळूनच बोलावे का? २. ब्राह्मण लोकांना एखाद्या सब्जेक्टीव गोष्टीत सुपरलेटिव डीग्री वापरणे देशात बॅनच आहे का? ३. माझे (किंवा कोणाचेही) प्रतिसाद माझे आडनाव डोळ्यासमोर ठेउनच वाचले जातात का? मंजे ब्राह्मणांची अशी येडीवाकडी स्तुती जर एखाद्या अब्राह्मण माणसाने मिसळपाववर केली तर तर त्यालादेखिल अस्साच विरोध व्हायला पाहिजे. तो होतो का? का फक्त स्वतःच्या जातीची स्तुती करणे (आता अभ्यासापोटी एखादे स्तुतीपर वाक्य पडणे असं म्हणणे असू देत.) ४. लोक जनरली समोरच्याला किती मागास वा मूर्ख वा संकुचित मानून चालतात. ५. ब्राह्मणांवर टिका करणे हे फॅशनेबल आणि उपयुक्त आणि त्यांच्याबद्दल काही चांगले बोलणे तोट्याचे असा कै जगाचा ट्रेंड आहे का? शक्यतो लोक ब्राह्मणांबद्दल चांगले बोलणे टाळतच असतील का?

एखाद्याने आपले मत मांडले किंवा तसा त्याचा ग्रह आहे यात वेगळा धागा काढण्यासारखे काय आहे हे कळत नाही. सुशिक्षित असला म्हणजे सुविचारी असतो असे कुठे लिहिलेले आहे? मी १९९४ साली एक डॉक्टर पाहिला आहे ज्याने आपल्या बायकोचा पहिलाच गर्भ मुलीचा असल्यामुळे गर्भपात करवून घेतला होता. तेंव्हा सुशिक्षित माणूस हा सुसंस्कृत सुविचारी असतोच असे नाही. ( ता. क. यात मला श्री डांगे अथवा श्री अरुण जोशी यांच्या बद्दल काहीच म्हणायचे नाही कृपया व्यक्तिगत घेऊ नये) मत हे घड्याळासारखे असते आणि प्रत्येकाला वाटते कि आपलेच घड्याळ बरोबर म्हणून त्यावर वितंडवाद घालणे हा शुद्ध कालापव्यय आहे. देशभक्ती हि कोणत्याही जातीची( ब्राम्हण क्षत्रिय वैश्य व शूद्र) धर्माची किंवा व्यवसायाची (डॉक्टर वकील लष्करी अधिकारी) मक्तेदारी नाही. तसेच हरामखोरी आणि देशद्रोह हि सुद्धा कोणत्याही जातीची किंवा धर्माची व व्यवसायाची मक्तेदारी नाही. यात काथ्याकूट करण्यासारखे काय आहे? उगाच रिकामा न्हावी आणि कुडाला तुंबड्या लावी

In reply to by सुबोध खरे

अन्य सगळे म्हणने मान्य आहे.
देशभक्ती हि कोणत्याही जातीची( ब्राम्हण क्षत्रिय वैश्य व शूद्र) धर्माची किंवा व्यवसायाची (डॉक्टर वकील लष्करी अधिकारी) मक्तेदारी नाही.
मी आणि डांगेसाहेबांनी right to patriotism हा विषय चर्चिला नाही. ऑर्डर ऑफ पॅट्रिऑटिझम हा चर्चिला आहे.
यात काथ्याकूट करण्यासारखे काय आहे?
आहे हो. कालच आदित्य कोर्डे म्हणाले कि भारतीय ज्यू देश बनवण्यासाठी ईस्रायलला गेले. मी वर उदाहरणे दिली आहेत. (नक्षली, मुस्लिम, द्रविड, ईशान्य भारतीय, कास्मिरी, खलिस्तानी, इ इ. काही उत्तर भारतीयांना "जय महाराष्ट्र" मध्ये देखिल तसा वास येतो. ) लोकांच्या अस्मिता काय आहेत, त्या कोणत्या वारश्याशी निगडित आहेत, विद्यमान राष्ट्र त्याची काळजी घेत आहे का, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. असं झालं नाही तर एखादा अरब स्प्रिंग इथल्या व्यवस्थेची वाट लावू शकतो.

In reply to by arunjoshi123

येतो, येतो! सध्या तुंबड्या लावायला रिकामा वेळ सापडत नाहीये.... ;-) बाकी.. मतभिन्नता असली तरी संयमित व संतुलित चर्चा करायची पद्धत आवडली.. ह्या चर्चेतून कोणाचेही काहीच मतपरिवर्तन होणार नाही अशी बहुतांश शक्यता असली तरी आपल्याला तुमचा स्वभाव लै आवडला... त्यामुळे चर्चा करूयात. आयमिन तुंबड्या लावूयात :-)

In reply to by संदीप डांगे

अशी फस्टक्लास दाद दिल्याबद्दल अनेक अन्यवाद. एक तारखेला रात्री अकरा वाजता लिहिलेला हा प्रतिसाद मी तीन तारखेला दुपारी दोन वाजता वाचून इतक्या काळातल्या आनंदाला फुकटच मुकलो. =========== माझ्यामते चर्चेतून धान्नकन मतपरिवर्तन होत नसते. आपल्या इतक्या विरुद्ध विचारांचा (शेमलेस!.?!) माणूस जगात आहे ही भावनाच परिवर्तनाचा पाया खणायला चालू करते. तुम्ही प्रामाणिक असा नाही तर नसा, संवेदनशील असा नाहीतर नसा; हा किडा त्याच्या गंतव्याला मार्गस्थ होतो. ============== मी एक खेड्यात वाढलेला माणूस आहे. आम्ही एकच ब्राह्मण कुटुंब आणि इतरांना आमच्या ब्राह्मणत्वाचा फार आदर या वातावरणात वाढलेला. शहरात ब्राह्मणांवरची टिका ऐकून (आईच्या संस्कारांमूळे) आपली जात फार सात्विक आहे असे मानणार्‍या (दुसरीकडे मी तेव्हा स्वतःला क्वाझी-नास्तिक मानत असलो तरी) माझ्या मनाला ताप होई. आजही मी वैचारिक रित्या बराच तसाच आहे तरी मला अनेक ब्रह्मपापे मान्य आहेत. तो किडा पान्थस्थ आहे. याचं मुख्य कारण माझ्या जातीवर टिका करणारे संयमी सवर्ण, दलित , नास्तिक, पुरोगामी, इ इ मित्र, शिक्षक, लोक, इ. भाषा (अ‍ॅज अ‍ॅन अर्लि ह्यूमन डीस्कवरी) ही एका लूज कॅरॅक्टरच्या बाईसारखी* असते. एका विधानात एक विश्व प्रकट करून जाते. त्यात वास्तवाचे आणि कल्पनेचे काहीही रंग भरते. परंतु तिच्या वापरात वापरकर्त्याचा सहसा मैत्रभाव असला पाहिजे. समोरच्या वाचकाचा मैत्रभाव नसेल तर एक डाव तर एखादा चान्स अवश्य दिला पाहिजे. (कधी कधी हवापालट म्हणून मांडी ठोकली पाहिजे.) ============= भाषा स्त्रीलिंगी आहे म्हणून बाई. (टरकून राहावं लागतं बाबा स्त्रीवाद्यांना.)

In reply to by arunjoshi123

परंतु तिच्या वापरात वापरकर्त्याचा सहसा मैत्रभाव असला पाहिजे. समोरच्या वाचकाचा मैत्रभाव नसेल तर एक डाव तर एखादा चान्स अवश्य दिला पाहिजे. (कधी कधी हवापालट म्हणून मांडी ठोकली पाहिजे.)
यासाठी +१००००.

In reply to by संदीप डांगे

लेखकाने आपले मत शेवटी बदलले हे सांगायचे विसरलात काय ट्रु'मन साहेब?
मत बदलले असेल तर वरील प्रतिसाद लिहिल्याबद्दल १००% दिलगिरी. मलाही एकेकाळी गांधींचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जात असे. पण एकेकाळची अशी एक्स्ट्रिम मते बदलू शकतात. त्या धाग्यात साडेतीनशेच्याही वर प्रतिसाद आहेत. सुमारे पहिले १०० प्रतिसाद झाल्यानंतर पुढचे प्रतिसाद बघितले नव्हते त्यामुळे तुमचे मत बदलले असेल याची कल्पना नव्हती. परत एकदा १००% दिलगिरी. मिपा-१०१ कोर्समधील हा एक धडा या निमित्ताने मिळाला.

In reply to by गॅरी ट्रुमन

इट्स ओके सरजी, मला पुसट शंका होतीच कि आपण कदाचित शेवटपर्यंत वाचले नसावे! त्यामुळे चिंता नाही. मी माझा मत बदलल्याचा प्रतिसाद नंतर शोधून देतो. एकूण कारणमीमांसा संदर्भ लक्षात येईल त्यामुळे. दमदार तर्क असेल तर माझे कितीही हट्टी मत असले तरी 180 डिग्रीत फिरवायला सदैव तयार असतो त्याचा हा एक छोटासा पुरावा. ;-)

हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते.
ब्राह्मणद्वेष्टेपणा म्हणजे भारतद्वेष्टेपणा हे त्यांनी एक लांबलचक प्रतिसाद लिहून माझ्यासारख्या वाचकांना उपकृत करावे. अवांतर: अरूण जोशींची सामाजिक निरीक्षणे बर्‍याचदा चोख (लक्ष देण्यासारखी)असतात पण ते त्यावरून जे तात्पर्य काढतात ते मात्र फारच विपरीत असते.

In reply to by अनरँडम

ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे हा काय प्रकार आहे? फेदरवेट यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत काय?
का हो, ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे का नाही? ब्राह्मण भारतीय नाहीत का? भारतातल्या कोणत्याही समाजाचा द्वेष करणे भारताचा द्वेष करणे नाही का? डांगे साहेब सीन लक्षात घ्या. २०१७. भारतात अ ब क द इ फ ..... झ जातीचे लोक राहतात. पैकी य जातीच्या मूठभर लोकांनी उठून आम्हाला अ आणि ब ह्या जातीच नकोत म्हणून दुसरा देश द्या म्हणणे राष्ट्रद्रोह नाही का? ब्राह्मणद्वेष्टे असणे म्हणजे भारतद्वेष्टे नसणे कसे काय हे तुम्हीच मला सांगाल काय? ================ वरचेच खाली पेस्ट केले आहे. तो प्रतिसाद पूर्ण वाचा. प्रश्न संदीपजींस आहेत.

In reply to by arunjoshi123

समजा भारतात पाच प्रकारचे लोक राहतात. पहिल्या प्रकारचे लोक फार थोडे आहेत (१% पेक्षा कमी) आणि तिसर्‍या प्रकारचे लोक बरेच आहेत (४०%). पहिल्या क्रमांकाच्या लोकांकडे भारतातील ४०% मालमत्ता आहे तर तिसर्‍या क्रमांकाकडे फक्त १%. तिसर्‍या प्रकारचे लोक अतिशय देशभक्त (सैन्यात यांचा वाटा समजा ६०% आहे) आहेत पण ते पहिल्या प्रकारच्या लोकांचा द्वेष करतात. त्यांना पहिल्या प्रकारचे लोक भारतात नसावे असे वाटते. इतर प्रकारच्या ४९% (म्हणजे एकूण ९९% लोकसंख्येवर) त्यांचे प्रेम आहे. तिसर्‍या प्रकारच्या लोकांना भारतद्वेष्टे म्हणता येईल का? (जातींचे नाव जाणुनबुजून टाळलेले आहे. उदाहरणातल्या टक्केवारीचा संबंध वास्तव जातींशी कृपया लावू नये.)

In reply to by अनरँडम

उत्तम प्रश्न आहे. ========= समजा भारतात पाच प्रकारच्या स्त्रीया राहतात. पहिल्या प्रकारच्या फार थोड्या आहेत (१% पेक्षा कमी) आणि तिसर्‍या प्रकारच्या बर्‍याच आहेत (४०%). पहिल्या क्रमांकाच्या १००% पटाखा आहेत तर तिसर्‍या क्रमांकाच्या एकदम सुमार. तिसर्‍या प्रकारचे नवरे अतिशय देशभक्त (सैन्यात यांचा वाटा समजा ६०% आहे) आहेत पण ते पहिल्या प्रकारच्या नवर्‍यांचा द्वेष करतात. त्यांना पहिल्या प्रकारचे नवरे भारतात नसावे असे वाटते. इतर प्रकारच्या ४९% (म्हणजे एकूण ९९%) लोकसंख्येवर, स्त्रीयांवर त्यांचे प्रेम आहे त्यांचे सर्व वैवाहिक इ अधिकार मान्य आहेत. मात्र पहिल्या प्रकारच्या स्त्रीयांना वैवाहिक अधिकार नसावेत आणि त्यांनी इतर ९९% च्या वासना पुरवाव्यात असे त्यांचे द्वेष्टे मत आहे. यात तिसर्‍या प्रकारच्या लोकांना भारतद्वेष्टे म्हणता येईल का? ========== मला नक्की काय म्हणायचं आहे? देशभक्ती ही संख्यात्मक का गुणात्मक? ======== ज्या एक टक्क्यांचे उरलेल्या ९९% टक्क्यांवर (४०% पैसे असले तरी) अपार प्रेम आहे त्यांना अकारण का हाकलायचं? काश्मिरी पंडितांना हाकललं त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवताय कि काय? =========== मी कधीही कोनाला असले साधर्म्य पाहू नये, तसले पाहू नये असं लिहित नाही. ते पाहायचेच नसते. (सध्याला स्त्रीवाद्यांनी सोडून द्यावे अशी विनंती. विषय वा वृत्ती ती नाही.)

In reply to by शब्दबम्बाळ

माझ्या मानसिकतेचं आकलन करणं सोडा. माझ्या प्रतिसादाचं आकलन केलंत तरी फार उपकार होतील.

In reply to by arunjoshi123

पटाखा, सुमार, हल्क किंवा अशा कुठल्याही पद्धतीने स्त्री किंवा पुरुष यांचे वर्गीकरण करणे हे त्यांना वस्तू समजण्यासारखे आहे. जर हे वस्तूकरण नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमची पत्नी /आई / वडील/मुलगा/मुलगी यांना कुठल्या गटात टाकाल ते कळू शकेल का.

In reply to by अप्पा जोगळेकर

मी विषय तो नाही असं लिहिलं आहे. वृती नाही असं पण लिहिलं आहे. ================== असू देत. स्त्रीयांच्या लैंगिक आकर्षकतेत फरक असतो कि नसतो? त्याच्या दोन टोकांना तुम्ही जी नावे वापरता ती सांगा. त्या शब्दांत काही चूक असेल तर मागे. तुमचे शब्द वापरायला मी तयार आहे. ================ प्रश्न आहे - देशभक्ती गुणात्मक असते कि संख्यात्मक. दुसरे उदाहरण दिले असते तर माझा भाव पोचला नसता याची मला खात्री आहे. ======== कमी अधिक लैंगिक आकर्षकता माझ्या सगळ्या नातेवाईकांना आहे.

In reply to by arunjoshi123

उगाच व्यक्तिगत स्तरावर कोणाचा अपमान करण्याची इच्छा नाही. निव्वळ याकरता तुमच्या दाव्याचा प्रतिवाद करता येत नाही. इत्यलम.

In reply to by arunjoshi123

संख्यात्मक देशभक्ति: तिसर्‍या प्रकारच्या लोकांना भारतद्वेष्टे म्हणता येणार नाही. ते बहूसंख्य भारतीयांवर प्रेम करतात पण सर्व भारतीयांवर नाही. उदा. काही (सर्व नाही याची नोंद घ्यावी) कट्टर हिंदुत्ववादी लोक भारतातल्या इतर धर्मियांचा द्वेष करतात. पण इतरधर्मिय अल्पसंख्यांक असल्याने हिंदूंवर प्रेम करणारे हे लोक भारतद्वेष्टे नाहीत. गुणात्मक देशभक्ति: देशाची अशी काही किमान मूल्यप्रणाली असते. तिला न पाळणार्‍या लोकांना राष्ट्रद्वेष्टे म्हणावे. या अर्थाने तिसर्‍या प्रकारातले लोक हे भारतद्वेष्टे आहेत. तुम्हाला 'संख्यात्मक' देशभक्ति अपेक्षित नसावी. तुम्हाला 'गुणात्मक' राष्ट्रभक्ति अपेक्षित असल्यास स्वातंत्र्यपूर्व काळात भारत या देशाची किमान मूल्यं काय होती हे सांगता यावे. समजा नाही जमले तरी कुठल्याही समाजघटकाचा द्वेष न करणे हे लक्षण 'गुणात्मक' देशभक्तिचे प्रतिनिधीत्व करते असे समजले जावे. या अर्थाने स्वातंत्र्यपूर्व काळातला ब्राह्मणच काय कुठलाही भारतीय समाजघटक राष्ट्रभक्त समजता येणार नाही.

In reply to by अनरँडम

पण इतरधर्मिय अल्पसंख्यांक असल्याने हिंदूंवर प्रेम करणारे हे लोक भारतद्वेष्टे नाहीत.
लोकशाही नावाचा प्रकार राज्यशास्त्रात समाविष्ट झाला तेव्हापासून अशी विधाने करणे सुसंगत मानायला चालू झाले असावे. कितीही प्रमाणात असलेल्या अल्पसंख्यांक लोकांचा द्वेष करणे हे राष्ट्रद्रोही लोकांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मुस्लिमांचा द्वेष करणारे हिंदुत्ववादी लोक हे क्लिअर भारतद्वेष्टे आहेत. आपल्या समाजात अनंत गट असू शकतात. त्या गटात अनेक प्रकारच्या भिन्नता, भेद, वाद आणि संघर्ष असू शकतात. यात वावगं काहीच नाही. परंतु या वादांचा आणि संघर्षांचा मूलाधार काय असायला हवा? तर न्यायाची मागणी. मुसलमान राममंदिर देत नाहीत? ते देत नाहीत हे चूक आहे, त्यांनी द्यायला पाहिजे, त्याकरिता आम्ही आवश्यक त्या गोष्टी न्याय्य पद्धतीने करू असे म्हणणारे राष्ट्रवादी. पण त्यांना मारून टाकले पाहिजे, पाकिस्तानात पाठवले पाहिजे इ म्हणणे मग ते दुसरीकडे हिंदूंसाठी सर्वस्व्वाचा त्याग करत का असेना, राष्ट्रद्रोही आहे. आपण राष्ट्र बनून का राहतो? कदाचित १ माणसाने सवते राहणे वा ७२५,००,००,००० माणसांनी एकत्र राहणे असंभव असावे. स्पेक्ट्रमच्या काही संलग्न भागाला आपण राष्ट्र मानणे पसंद करतो. त्या सीमांत आपण फार हिशेब करत नाही. परंतु तरीही त्या सीमांत देखिल हितसंबंध संघर्षाची पाळी आणतात. शक्यतो व्यवस्थेच्या आत संघर्ष मिटवायची तयारी दाखवली, किंवा व्यवस्थेत काही हलके फुलके बदल करायचे ठरवले तर ठिक असते. कधी कधी संघर्ष नच मिटणारा असा निष्कर्ष निघाला तर सीमा वळणे बदलतात. पण त्यात देखिल तारतम्य हवे. पण ज्यांजेशी संघर्ष आहे त्यांचे अस्तित्वच नको असणे हे न्याय हवे असण्यापेक्षा फार वेगळे आहे. म्हणून पेरियार हे राष्ट्रद्रोही आहेत. ते अहिंसावंत आहेत, मानववंशशास्त्राच्या हिशेबाने इथलेच आहेत आणि सैन्यात पराक्रम करून आलेत या गोष्टी दुय्यम आहेत. मुस्लिमांनी भारतात कसे राहावे, हिंदूशी कसे वागावे याच्या रास्त अपेक्षा असलेला हिंदुत्ववादी हा राष्ट्रवादी, नाहीतर राष्ट्रद्रोही. तसेच ब्राह्मणांनी भारतात कसे राहावे ते मागणारे आणि नाही राहिले तर काय करू याची धमकी देणारे आणि ती प्रत्यक्षात उतरावण्याची धमक असलेले आणि आजच्या गतकालापराधजनितन्यूनगंडग्रस्त ब्राह्मणांचे जन्मदाते बनलेले (म्हणजे ब्राह्मणांचे उद्धारक) आंबेडकर हे सच्चे राष्ट्रभक्त आहेत.
तुम्हाला 'गुणात्मक' राष्ट्रभक्ति अपेक्षित असल्यास स्वातंत्र्यपूर्व काळात भारत या देशाची किमान मूल्यं काय होती हे सांगता यावे.
लातूरला माझ्या घरात चांगला पिता बनण्यासाठी लागणारे गुण आणि गोंदियाला संपतरावांच्या खानदानात चांगला पिता बनायला लागणारे गुण हे सारखेच असावेत. म्हणून या विधानातला भारत शब्द रिडंडंट आहे. उदा. लातूरची आणि गोंदियाची संस्क्रूती वेगळी असेल, पण 'संस्कृतीचा सन्मान असणे' असले कि खूप झाले.
समजा नाही जमले तरी कुठल्याही समाजघटकाचा द्वेष न करणे हे लक्षण 'गुणात्मक' देशभक्तिचे प्रतिनिधीत्व करते असे समजले जावे. या अर्थाने स्वातंत्र्यपूर्व काळातला ब्राह्मणच काय कुठलाही भारतीय समाजघटक राष्ट्रभक्त समजता येणार नाही.
प्रत्येक समाजघटक किमान एका अन्य समाजघटकाचा द्वेष करत होता असे म्हणायचे आहे का? अहो, ऑफिसमधल्या मार्केटींग डिपार्ट्मेंट मधल्या एका माणसाचं प्रॉक्यूरमेंट मधल्या एका माणसाशी पॉलिटिक्स चालत असेल तर ही कंपनी अस्तित्वातच नाही असं म्हणण्यात काय अर्थ आहे? आणि कोणते हे म्हणे समाजघटक द्वभारतातल्या) उदाहरण मिळेल? हे द्रविड बनिया पेरियार जेव्हा उत्तर भारतीय ब्राह्मणांना हाकला म्हणायचे तेव्हा त्यांचे जातबंधू कोमटी लोक आमच्या लातूरच्या (मंजे उ. भारतातल्या) ब्राह्मण आजोबांना पोटभर जेवणे घालायची नि नमस्कार करून १.२५ रु द्यायचे. अहो सक्रीय प्रेम करणे वेगळं आणि द्वेष न करणं वेगळं. उलट आपल्या देशात उलटा प्रकार आहे. कोणाला कोणाचा द्वेष नसल्यामुळे सगळे कामापेक्षा जास्त कूल असतात. भारतात आपल्या जातीच्या माणसाला मत देणे राष्ट्रद्रोह (अन्य जातींचा द्वेष) नाहीच असे मानत असल्यामुळे लोक जातीय मतदान करतात.