नमस्कार !
महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल.
काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला.
प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्यांची संख्या घटेल असा अंदाज आहे.
शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे.
मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे.
गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.)
युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे.
सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये.
अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते.
आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित.
तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे.
अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.
वर्गीकरण
वाचने
61707
प्रतिक्रिया
405
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या महापालिकेत असलेला पैसा
ह्या महापालिकेत असलेला पैसा हे खरे दुखणे आहे असे वाटते.
In reply to ह्या महापालिकेत असलेला पैसा by फेदरवेट साहेब
मलाही
फार छान प्रतिसाद गॅरीभाऊ!
In reply to मलाही by गॅरी ट्रुमन
+१
In reply to फार छान प्रतिसाद गॅरीभाऊ! by आदूबाळ
मिसळपाववर एखादा आयडी फॉलो कसा
In reply to मलाही by गॅरी ट्रुमन
शिवसेना सर्वात मोठा पक्ष?
विनाश काले विपरित बुध्दी
In reply to शिवसेना सर्वात मोठा पक्ष? by गॅरी ट्रुमन
शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळतील असे वाटते.
भाजपचा आताचा ट्रॅक रेकॉर्ड
मनसेने शिवसेनेसमोर युतीचा
मुंबई सेनेकडे रहावी हे मला
मुंबई आणि ठाण्यातील निवडणुका
शिवसेना आणि भाजप
खळ खट्याक
In reply to शिवसेना आणि भाजप by गामा पैलवान
बाकी सत्तेत कोणीही येवो
:)
In reply to बाकी सत्तेत कोणीही येवो by धर्मराजमुटके
मूळ मुद्दा अर्थकारण आहे .
इंग्रजी सुभाषित
निवडणुकीत उभा राहलेला
हार्दिक पटेल
हार्दिक निरुपयोगी
In reply to हार्दिक पटेल by गॅरी ट्रुमन
एकगठ्ठा मराठी मते
बऱ्याच जणांना आपण फेकींग
विशुमित भाऊ..
In reply to बऱ्याच जणांना आपण फेकींग by विशुमित
नवी मुंबई मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर
In reply to बऱ्याच जणांना आपण फेकींग by विशुमित
श्रीकर परदेशीपण!
In reply to नवी मुंबई मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर by फेदरवेट साहेब
श्रीकर परदेशींना पिंपरी
In reply to श्रीकर परदेशीपण! by अनुप ढेरे
कैच्या कै! श्रीकर परदेशींना
In reply to श्रीकर परदेशींना पिंपरी by विशुमित
हा हा हा. पण लक्ष्मण जगताप
In reply to कैच्या कै! श्रीकर परदेशींना by हतोळकरांचा प्रसाद
जे इतर पक्ष होते त्यात जगताप
In reply to हा हा हा. पण लक्ष्मण जगताप by अनुप ढेरे
जे इतर पक्ष होते त्यात जगताप
In reply to जे इतर पक्ष होते त्यात जगताप by विशुमित
जगताप आता भाजपात गेले म्हणून
In reply to जे इतर पक्ष होते त्यात जगताप by विशुमित
<<<<अनधिकृत बांधकामं पाडायला
In reply to जगताप आता भाजपात गेले म्हणून by अनुप ढेरे
संपादक मंडळ..!!
In reply to <<<<अनधिकृत बांधकामं पाडायला by विशुमित
विशुमतीसाहेब, डोळ्यांनी पहिले
In reply to जे इतर पक्ष होते त्यात जगताप by विशुमित
<<<<विशुमतीसाहेब, डोळ्यांनी
In reply to विशुमतीसाहेब, डोळ्यांनी पहिले by हतोळकरांचा प्रसाद
आंदोलनांनेही परदेशी थांबले
In reply to <<<<विशुमतीसाहेब, डोळ्यांनी by विशुमित
<<<परदेशींच्या हातात होते का
In reply to आंदोलनांनेही परदेशी थांबले by हतोळकरांचा प्रसाद
सिडको च कौतुक नक्कीच व्हायला
In reply to नवी मुंबई मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर by फेदरवेट साहेब
शहराच्या बाहेर असलेल्या
In reply to सिडको च कौतुक नक्कीच व्हायला by विशुमित
गावाकडची माणसं शरद पवारांच्या
In reply to शहराच्या बाहेर असलेल्या by श्रीगुरुजी
हा हा हा
In reply to गावाकडची माणसं शरद पवारांच्या by विशुमित
हा हा हा केल्याने पिवळे दात दिसतात... इति- आमची चिमुकली..!!
In reply to हा हा हा by अनुप ढेरे
खेड्यापाड्यातील सरंजामशहा
In reply to गावाकडची माणसं शरद पवारांच्या by विशुमित
असले स्टेण्टबाज अधिकारी फक्त
In reply to सिडको च कौतुक नक्कीच व्हायला by विशुमित
अतिशयोक्तीपुर्ण प्रतिसाद.
In reply to बऱ्याच जणांना आपण फेकींग by विशुमित
<<<शरद पवार म्हणजे कोणीतरी
In reply to अतिशयोक्तीपुर्ण प्रतिसाद. by मराठी कथालेखक
आपण कशाला घरला पळताय?
In reply to बऱ्याच जणांना आपण फेकींग by विशुमित
<<<७०, ५५, ४५.४०,१७ असे
In reply to आपण कशाला घरला पळताय? by खेडूत
अशक्य. मुंबईत अशी क्रमवारी
In reply to <<<७०, ५५, ४५.४०,१७ असे by विशुमित
हैला भारीच की!
In reply to अशक्य. मुंबईत अशी क्रमवारी by श्रीगुरुजी
मुंबई महानगरपालिका
In reply to बऱ्याच जणांना आपण फेकींग by विशुमित
प्रतिसाद आवडला.
In reply to मुंबई महानगरपालिका by श्रीगुरुजी
हे एकदम पटले !! >> लोल!
In reply to प्रतिसाद आवडला. by मराठी कथालेखक
एव्हडंच नाही, तर औरंगजेबाला
In reply to मुंबई महानगरपालिका by श्रीगुरुजी
फोटोमध्ये दाखवलेल्यांच्या मते
In reply to एव्हडंच नाही, तर औरंगजेबाला by खेडूत
पण ते राष्ट्रवादीच्या
In reply to फोटोमध्ये दाखवलेल्यांच्या मते by विशुमित
खरे जी...
In reply to पण ते राष्ट्रवादीच्या by सुबोध खरे
श्या! असं कसं व्हायचं विशुमित
In reply to खरे जी... by विशुमित
असं म्हणता..!! असलं जमलंच
In reply to श्या! असं कसं व्हायचं विशुमित by संदीप डांगे
=)) काय आजचा हालहवाल?
In reply to बऱ्याच जणांना आपण फेकींग by विशुमित
मिपाकर मंदार भालेराव यांचे
In reply to =)) काय आजचा हालहवाल? by अनुप ढेरे
आता पुण्यामध्ये शेवटच्या
In reply to मिपाकर मंदार भालेराव यांचे by संदीप डांगे
नोटबंदीनंतर मुंबईकरांना
स्थलांतर
In reply to नोटबंदीनंतर मुंबईकरांना by निष्पक्ष सदस्य
गॅरी भाऊ...
In reply to स्थलांतर by गॅरी ट्रुमन
ते राष्ट्रवादीच्या दोन
In reply to गॅरी भाऊ... by विशुमित
वाद मिटला कधीच..!!
In reply to ते राष्ट्रवादीच्या दोन by हतोळकरांचा प्रसाद
३८००० कोटीच्या बजेटच्या २
In reply to स्थलांतर by गॅरी ट्रुमन