Skip to main content

हात दाखवून अवलक्षण

लेखक नाखु यांनी सोमवार, 24/10/2016 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला. पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
  • सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
  • निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
  • महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
  • मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
  • आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
  • या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
विधायक कामाबाबत चर्चा/विरोध याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वानवा असताना हा विनाकारण शेपटीला आग लावून फिरण्याचा प्रकार आणि बळजुबरीने सैनीकांना यात ओढण्याचा प्रयत्न पाहून मला व्य्क्तीशः राज ठाकरे यांच्याबद्दल कीव +घृणा च वाटली. (एके काळी मनसे स्थापनेवेळी मी खंदा समर्थक होतो त्या पार्श्वभूमीवर जास्तीच राग आला) कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे. काही माजी सैनीक अधिकार्यांनी याचा धिक्कार आणि निषेधही केला आहे. मिपाकरांना काय वाटते?

वाचने 65668
प्रतिक्रिया 306

प्रतिक्रिया

In reply to by नाखु

प्रतिसादाखाली तुमची सही नसल्याने हा प्रतिसाद बाद धरणेत येत आहे. - प्रचेतस (कार्यकारी अध्यक्ष, नाखु फ्यान क्लब)

In reply to by अभ्या..

सांगणार नसाल तर नक्कीच देऊ. अपेक्षीत व्यनीत पाठवणे (उगा पत्रकार परिषद बोलवू नै) सुमडीतला नाखु

In reply to by मोदक

म्हणून ही चाचपणी केली. पक्षातल्याच कार्यकर्त्याकडून निधी का मागीतला गेला याच धक्क्यातून अजून न सावरतो तोच हा पत्ता मागणे म्हणजे फार थोर वगैरे. किलवर सत्ती नाखु

In reply to by नाखु

तुम्ही म्हणताय तो एंगल आहेच या घटनेला. संभाव्य राजकीय परिणामांची गोळाबेरीज करण्यात मुख्यमंत्री चुकले काय हा निराळा मुद्दा आहे. माझं म्हणणं इतकच, कि हे सेटलमेण्ट एक सामान्य, सर्वमान्य आणि सरळधोप घटना आहे. यात कायद्याची दलाली, घटनाबाह्यता, बेकायदेशीर घटना, चुकीचे पायंडे वगैरे सारखं अजीबात काहि झालं नाहि. मिपाकरांचं एक आगळं (थोडं विचीत्र) रूप प्रकटलं या धाग्यावर. त्याचं थोडं आश्चर्य वाटलं मात्र :)

या बातमीमध्ये चांगले विश्लेषण दिलंय! "स्पष्ट होते ते हेच की, केंद्रातून चित्रपटाला बंदी नाही म्हणायचे, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा चालू ठेवायचा, केंद्रीय मंत्र्यांकडून मनसे हा गुंडांचा पक्ष आहे असे बोलवून घ्यायचे आणि इकडे राज्यात कायदा, न्यायालय, संविधान न मानणाऱ्या राज यांच्याशी खलबते करायची अशी दुटप्पी भूमिका भाजपने घेतली. तसे पहिले तर पूर्वी झाल्याप्रमाणे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्याकरवी शेलक्या शब्दात राज यांच्यावर शब्दांचे अस्त्र सोडता आले असते. परंतु भाजपने शेलार यांना शांत बसविले. ‘मनसे’ आणि राज यांना सूट दिली. १२ मनसेच्या कार्यकर्त्यांची दिखाऊ धरपकड केली. चित्रपट संघटनेने राज यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने राज किती देशभक्त आणि मुंबईत किती प्रभावी आहेत हे ‘मनसे’पेक्षा भाजपला जास्त दाखवायचे होते. शिवसेनेला या प्रकरणामध्ये बघ्याची भूमिका घ्यायला लावून भाजपने एका दगडात दोन-तीन पक्षी मारले." आता चुकीच्या गोष्टींना कोणी विरोध केला कि लगेच ते सगळे लोक "फुरोगामी" वगैरे होणार असतील तर असो मग! केवढी ती पक्षनिष्ठा! (अवांतर: सत्ताबदल होण्यासाठी मी हि बराच लांबचा प्रवास करून भाजपा ला मतदान केलं होत बर का! पण इतका 'कट्टर' नाहीये मी, कुठल्या पक्षासाठी ते पण!) मग नेहमीची कारण सुरु होतात "आधी असे तसे झाले होते त्या वेळी तुम्ही कुठं होतात? आत्तापर्यंत सगळे सज्जन होते का?" जमलंच तर वरती काही प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे द्यावीत... बऱ्याच प्रश्नांची उत्तरे वरच्या परिच्छेदातच आहेत पण अर्थातच ती चुकीची असणार! :)

आपण विचारलेले प्रश्न आपल्याला खूप भारी आणि सडेतोड वाटत असतील पण ते तसे नाहीत हे खेदाने नमूद करावेसे वाटते . उत्तर दिले न्हवते कारण प्रश्नातच मुळात दम न्हवता तरी आपल्या समाधानासाठी थोडक्यात उत्तरे. तुम्ही सांगा पाहू... 1. कारण जोहर ने कुठला कायदा मोडला होता? कोणताही कायदा मोडला नाही तरी त्याला दमदाटी झ्हाली व त्याच्या व त्याच्या चित्रपटावरील होणार हल्ला थांबवता येईल म्हणून बैठक बोलावो. 2. पाकिस्तानी कलाकार चित्रपटात घेऊ नयेत हा कायदा अस्तित्वात होता का? नाही 3. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी कोणी दिली बरे? . ते येऊन काम करू शकतात . ते नियमबाह्य नाही. 4. सेन्सर बोर्ड नि चित्रपट प्रदर्शित करायला परवानगी दिल्यावर त्याला अडवणारे समांतर सेन्सर बोर्ड कुठले? सेन्सर बोर्ड आणि राजकीय पक्ष यात गफलत करू नका . 5. चित्रपटाच्या सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून आणि 5 कोटी रुपये दान करून चित्रपट "पवित्र" झाला का?(मला सैनिकांबद्दल आदर नाही हे सोयीस्कर मत काढू नये) राज ठाकर्यांनी असे धमकीवजा बोलणे चुकीचेच आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांसकट कोणाचेच दुमत नाही. 6. मुख्यमंत्र्यांना असा तोडगा गैर आहे असे वाटले नाही का? त्यांना या पैसे देऊन काढायच्या तोडग्याबद्दल कल्पना देखील नव्हती का?(म्हणजे तुम्ही अगदी लिहिलंय कि 5 कोटी का ठाकरेंचा मुद्दा होता, मुख्यमंत्रांच्या संमती शिवाय मान्य झाला का तो?) मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंबरोबर चर्चा केली तेंव्हाच हि रक्कम ठरली आणि त्यांनी यास संमाती दिली असे तुम्ही पुरावे असल्यासारखे सांगताय. मी उद्या तुमच्याबरोबर चर्चा कारेन आणि बाहेर येऊन म्हणेन कि शब्दबंबाळ या मूर्ख आहेत तर त्यास तुमची संमती असते का ? तो माझ्हा स्वतःचा विचार 7. कुठल्याही निरपराध नागरिकाला कोण्या राजकीय व्यक्तीमुळे(अथवा गुंड) काही कारण नसताना धमक्या दिल्या गेल्या तर मुख्यमंत्री मध्यस्ती करून त्या नागरिकाला "गुंड लोक जे करायला सांगत आहे ते ऐक" असा सल्ला देणार का?(शेवटी हिंसा नको ना व्हायला) भलेही नागरिकांची काहीही चूक नसो! मुख्यमंत्र्यांनी कारण जोहर ला ५ कोटी दे असे सांगितले नाही किंवा राज ठाकरेंचे समर्थन केले नाही अथवा राज ठाकरे देखीळ असे काही म्हणत नाहीत.. असल्या धमक्या वगैरे राज ठाकरे स्वतःच्या पक्ष संस्कृतीस अनुसरून देतच असतात . त्यात नवीन काही नाही. 8. इथून पुढे कुठल्याही गुंडाने दंगल करायची धमकी दिली तर त्याला तंबी द्यावी कि चर्चेला घरी बोलावून त्याच्या मागण्या मान्य कराव्यात? रस्त्यावरील गुंड आणि एक राजकीय पक्ष यात गफलत करू नका. बादवे संरक्षण काढून घेतो असे कोणीही म्हटले नाही अथवा या चर्चेनंतरही केजो व त्याच्या चित्रापास संरक्षण कायम आहे . मी त्या जोहर चा एकही चित्रपट सिनेमागृहात पहिला नाही आणि पाहण्याची शक्यता देखील नाही. पण हे सगळे जे झालंय ते चुकीचेच होते... तुम्ही कितीही चूक चूक करून ओरडला तरी योग्य मार्ग आधीच निवडला गेला आहे. अवांतर : कृपया आता अजून प्रश्न विचारून हसे करून घेऊ नका. हसायचा देखील कंटाळा आला

माननीय श्री शब्दबंबाळ. आपण विचारलेले प्रश्न आपल्याला खूप भारी आणि सडेतोड वाटत असतील पण ते तसे नाहीत हे खेदाने नमूद करावेसे वाटते . उत्तर दिले न्हवते कारण प्रश्नातच मुळात दम न्हवता तरी आपल्या समाधानासाठी थोडक्यात उत्तरे. तुम्ही सांगा पाहू... 1. कारण जोहर ने कुठला कायदा मोडला होता? -- कोणताही कायदा मोडला नाही तरी त्याला दमदाटी झ्हाली व त्याच्या व त्याच्या चित्रपटावरील होणार हल्ला थांबवता येईल म्हणून बैठक बोलावलि 2. पाकिस्तानी कलाकार चित्रपटात घेऊ नयेत हा कायदा अस्तित्वात होता का? -- नाही 3. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी कोणी दिली बरे? . -- ते येऊन काम करू शकतात . ते नियमबाह्य नाही. 4. सेन्सर बोर्ड नि चित्रपट प्रदर्शित करायला परवानगी दिल्यावर त्याला अडवणारे समांतर सेन्सर बोर्ड कुठले? -- सेन्सर बोर्ड आणि राजकीय पक्ष यात गफलत करू नका . 5. चित्रपटाच्या सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून आणि 5 कोटी रुपये दान करून चित्रपट "पवित्र" झाला का?(मला सैनिकांबद्दल आदर नाही हे सोयीस्कर मत काढू नये) ---राज ठाकर्यांनी असे धमकीवजा बोलणे चुकीचेच आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांसकट कोणाचेच दुमत नाही. 6. मुख्यमंत्र्यांना असा तोडगा गैर आहे असे वाटले नाही का? त्यांना या पैसे देऊन काढायच्या तोडग्याबद्दल कल्पना देखील नव्हती का?(म्हणजे तुम्ही अगदी लिहिलंय कि 5 कोटी का ठाकरेंचा मुद्दा होता, मुख्यमंत्रांच्या संमती शिवाय मान्य झाला का तो?) --- मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंबरोबर चर्चा केली तेंव्हाच हि रक्कम ठरली आणि त्यांनी यास संमाती दिली असे तुम्ही पुरावे असल्यासारखे सांगताय. मी उद्या तुमच्याबरोबर चर्चा कारेन आणि बाहेर येऊन म्हणेन कि शब्दबंबाळ या मूर्ख आहेत तर त्यास तुमची संमती असते का ? तो माझ्हा स्वतःचा विचार 7. कुठल्याही निरपराध नागरिकाला कोण्या राजकीय व्यक्तीमुळे(अथवा गुंड) काही कारण नसताना धमक्या दिल्या गेल्या तर मुख्यमंत्री मध्यस्ती करून त्या नागरिकाला "गुंड लोक जे करायला सांगत आहे ते ऐक" असा सल्ला देणार का?(शेवटी हिंसा नको ना व्हायला) भलेही नागरिकांची काहीही चूक नसो! -- मुख्यमंत्र्यांनी कारण जोहर ला ५ कोटी दे असे सांगितले नाही किंवा राज ठाकरेंचे समर्थन केले नाही अथवा राज ठाकरे देखीळ असे काही म्हणत नाहीत.. असल्या धमक्या वगैरे राज ठाकरे स्वतःच्या पक्ष संस्कृतीस अनुसरून देतच असतात . त्यात नवीन काही नाही. 8. इथून पुढे कुठल्याही गुंडाने दंगल करायची धमकी दिली तर त्याला तंबी द्यावी कि चर्चेला घरी बोलावून त्याच्या मागण्या मान्य कराव्यात? --- रस्त्यावरील गुंड आणि एक राजकीय पक्ष यात गफलत करू नका. बादवे संरक्षण काढून घेतो असे कोणीही म्हटले नाही अथवा या चर्चेनंतरही केजो व त्याच्या चित्रापास संरक्षण कायम आहे . मी त्या जोहर चा एकही चित्रपट सिनेमागृहात पहिला नाही आणि पाहण्याची शक्यता देखील नाही. पण हे सगळे जे झालंय ते चुकीचेच होते... -- तुम्ही कितीही चूक चूक करून ओरडला तरी योग्य मार्ग आधीच निवडला गेला आहे. अवांतर : कृपया आता अजून प्रश्न विचारून हसे करून घेऊ नका. हसायचं देखील कंटाळा आला

येथे प्रत्येक माणूस एक गोष्ट विचारताना दिसला कि कारण जोहर ने काय बेकायदेशीर केले? उद्या समजा चार्ल्स हेब्दो सारख्या विचारसरणीच्या भारतीय माणसाने महंमदावर सिनेमा काढला (ज्यात महम्मद पैगंबरांविषयी कोणतेही अनुदार उदगार नाहीत) आणि त्याला सेन्सर बोर्डाचे सर्टिफिकेटही मिळाले. त्यावर मुस्लिम संघटनांनी कडवा विरोध केला आणि आम्ही हा सिनेमा चालवू देणार नाही अशी "धमकी" दिली तर त्यावर श्री देवेंद्र फडणवीस यांनी काय करावे? वाटाघाटी कराव्यात कि नाही? कि केवळ "प्रक्रिया" म्हणून कायद्याचा "रक्षक" होऊन मुंबईत दंगली होऊ द्याव्यात. मिपावरील "सुजाण,निधर्मी, सुधारक किन्वा सनातनी अशा सर्व" माणसांची काय प्रतिक्रिया असेल?

In reply to by सुबोध खरे

तुम्ही धार्मिक दंगली आणि हा विषय कसा कुठे जोडत आहात हे कळले तर उत्तम! धार्मिक दंगली व्यापक असतात, त्यांच्यावर चर्चेतूनच मार्ग काढतात, तसेच पोलीस व सैन्याची मदत घेतली जाते. तुम्ही वरील बादरायण मुद्दा उपस्थित करून सदर घटनेविरोधात लोक का बोलत आहेत हे समजले नाही असे दाखवत आहात. या आधीही असे विरोध झालेले आहेत, त्यावर काय झाले? वेलेन्टाइन डे , गर्ल्फ़्रेंड व वॉटर हे चित्रपट याबद्दल हिंदू संघटनांनी आंदोलने (काही वेळेस हिंसक) केली आहेत, त्यावेळी ते कसे हाताळले गेलेत ह्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर जरूर द्यावी.

In reply to by सुबोध खरे

सुबोध काका .. मुद्दा बरोबर आहे पण चार्ली हेब्दो वगैरे खूप होतय.. उदाहरण देण्यात अतिरेक झ्हाला .. इथले वाचक मुद्दा सोडून चोथा चघळतात म्हणून म्हटले हो ..

In reply to by सुबोध खरे

त्यावर मुस्लिम संघटनांनी कडवा विरोध केला आणि आम्ही हा सिनेमा चालवू देणार नाही अशी "धमकी" दिली तर त्यावर श्री देवेंद्र फडणवीस यांनी काय करावे? वाटाघाटी कराव्यात कि नाही?
सुबोध काका अशा वेळीहि त्यांनी काय्द्याचाच मार्ग वापरावा आणि फाजिल धमक्यांना भीक घालु नये असे माझे मत असेल. शासनाने हैदर, रश्दी, तस्लिमा, आणि हुसेन, सगळ्यांच्याच अभिव्यक्तीचा हक्क अबाधित राखावा.

बेकायदेशीर आणि कायदेशीर यात फरक करायचा तर तो धार्मिक किंवा सामाजिक असा करून कसा चालेल? तुम्हाला झेपत नसेल तर उत्तर देऊ नका. फाटे फोडू नका.

या संदर्भात सिंगापुर मधील बातमी रोचक आहे. Officials on Tuesday had said they were deporting the 53 men - 52 Indians and one Bangladeshi - and pursuing criminal charges against 28 others for their role in the rampage on 8 December. The rare riot left 39 persons, including police officers, injured and 25 vehicles damaged or burnt In December last year, 29 Chinese bus drivers were deported for their involvement in a work stoppage for better wages and living conditions - the first industrial strike in the city-state since 1986. जेव्हा आपल्या देशात दंग्याना असा प्रतिसाद मिळु लागेल तेव्हाच ते थांबतील. मानवाधिकाराची चिंता तेव्हा करु नये. The mass repatriation comes as international rights groups including Humans Rights Watch and Amnesty International accused the government this week of arbitrarily deporting people without due process, in its haste to punish the alleged rioters.

साहना,
पोलिसांना वाचवायची जबाबदारी १ आमदार असलेल्या ठाकरे पक्षावर आहे तर मुंबईची आणि महाराष्ट्राची परिस्तिथी कठीण आहे.
तुम्ही ठार बरोबर आहात. वेलकम टू रियालिटी. अवांतर : रियालिटी ≠ रियालिटी शो. आ.न., -गा.पै.

In reply to by Ram ram

रामराम, माझ्या माहितीप्रमाणे रमेश किणी प्रकरणाचा राज ठाकऱ्यांशी काहीही संबंध नव्हता. न्यायालयाने राज ठाकरे यांच्यावर आरोप ठेवायलाही परवानगी दिली नाही. आ.न., -गा.पै.