बरोबरीने तुझीया आले,
तुझ्याहून ही नाव जाहले,
काय कमी रे माझ्या ठायी
जे मी लढण्या आधीच हरले ...
नऊ मास मी त्रास सोसुनी
जन्म जरी हा तुजला देते,
तरी पुन्हा हे भ्रुणहत्येचे
पाप माझ्याच माथी येते. ...
तुच अपुरा माझ्यावाचुन
साथ तुला शतजन्मी देते,
मान्य तुला ना सत्य हे सारे
म्हणून भोग हे निमित्त ठरते ...
जाणुन घे रे किंमत माझी
तुला न ठावे हिम्मत माझी
शांत ज्योतीसम ही जळणारी
आग अंतरी शतजन्माची ...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1915
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
नवरात्रानिमित्त सुंदर,
समयोचित कविता
कविता आवडली.
सुंदर कविता!
@माहिराज