पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
29 Sep 2016 - 3:16 pm
गाभा: 

वेगवेगळ्या वाहिन्यांवरील वृत्तानुसार व वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील बातमीनुसार भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी आज पहाटे भारत व पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील काही अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करून काही अतिरेकी व सैनिकांना मारून भारतीय सैनिक सुखरूप भारतीय प्रदेशात परतले. काही वाहिन्यांवरून ५ अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ले केले असे सांगण्यात येत आहे. काही वाहिन्या हीच संख्या ६ व ७ असे सांगत आहेत.

आपले २ सैनिक मारले गेले व काही जखमी झाले असे पाकिस्तानने जाहिररित्या मान्य केले आहे. परंतु भारताने सीमारेषा ओलांडलेली नाही असा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी ३०-३५ अतिरेकी मारले असेही आकडे वाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे.

एकंदरीत प्रत्येक वृत्तसंस्था वेगवेगळे आकडे सांगत आहे.

इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, (http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted-...)

ndia conducted surgical strikes last night along the LoC to safeguard our nation, the Defence Ministry said on Thursday. “Significant casualties have been caused to terrorists and those trying to shield them. We don’t have a plan to further conduct such strikes. India has spoken to Pakistan,” DGMO Lt Gen Ranbir Singh said.

“… Now, based on very specific and credible information we received yesterday, that some terrorist teams had positioned themeselves at launch pads along the LoC with an aim to carry out infiltration and terrorist strikes in J&K and various other metros in our country. There were launch pads at the LoC where terrorists were present waiting to infiltrate the nation and attack areas in Kashmir and metros across the country,” the DGMO said. No Indian casualties occurred during the surgical strikes that were carried out last night by the Indian Army.

Meanwhile, Pakistan, in a statement issued has said: At least two Army men were killed as Indian and Pakistani troops exchanged fire over the Line of Control in “Azad Jammu and Kashmir”. The exchange of fire began at 2:30am, ISPR said, and continued till 8:00am. “Pakistani troops befittingly responded to Indian unprovoked firing on the LoC in Bhimber, Hotspring Kel and Lipa sectors,” the statement said.

दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी यांनी सुषमा स्वराजांची २ वेळा भेट घेऊन "पाकिस्तानबरोबरील वाद चिघळवू नका" असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर दोनच दिवसात हा हल्ला झाल्यामुळे भारत या हल्ल्याची तयारी करीत आहे असा अमेरिकेला अंदाज आलेला असावा. या हल्ल्याची व्याप्ती वाढली तर त्याचे छोट्या युद्धात रुपांतर होऊ शकते व त्यामुळे अमेरिकेच्या भारतीय उपखंडातील हितसंबंधावर परीणाम होऊ शकतो. म्हणूनच केरी यांनी जाहीररित्या हा सल्ला दिला असावा.

http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-pakistan-s...

_________________________________________________________________________

असे हल्ले करण्याशिवाय भारताकडे पर्यायच शिल्लक नव्हता. आपली वाट लागली तरी चालेल, पण भारताला सुखाने जगू द्यायचे नाही हा विडा उचललेल्या पाकिस्तानला इतर कोणत्याही मार्गाने थोपविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर टीका, ट्रॅक २ डिप्लोमसी, पीपल-टू-पीपल कॉंटॅक्ट, बस-ट्रेन सेवा, मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा, भूतकाळातील सर्व युद्धात झालेले पराभव . . . अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन व शस्त्रे व इतर सर्व तर्‍हेची मदत देऊन भारतात पाठवून दहशतवादी कारवाया घडवून आणणे व अतिरेक्यांना आपल्या देशात आश्रय देण्याचे धोरण पाकिस्तान बदलायला तयार नाही. त्यामुळे जशास तसे उत्तर देणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता.

आधी पठाणकोट हल्ला आणि आता झालेला उरी हल्ला यामुळे मोदींना जोरदार टीकेचा सामना करावा लागला. आपल्यात व आधीच्या सरकारमध्ये काहीच फरक नाही, आपण नुसते बोलघेवडे आहोत इ. स्वरूपाच्या टीकेमुळे मलीन झालेली आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा हल्ला करणे आवश्यकच होते.

परंतु असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही. मागील वर्षी आणि परत यावर्षी सुद्धा भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये प्रवेश करून फुटीरतावाद्यांना मारले होते. सिंधू पाणीवाटप करार रद्द करावा यासाठी चर्चा सुरू आहे. आणि आता आज पहाटे हा हल्ला झाला. या प्रत्येक घटनेनंतर प्रकर्षाने दिसतोय तो प्रसिद्धीचा उतावीळपणा. असे हल्ले गुपचूप करून हल्ले केल्यावरसुद्धा त्याची जाहिरात किंवा गाजावाजा केला नाही तर ते योग्य ठरेल. गतवर्षी म्यानमारमधील कारवाईनंतर लगेच लष्कराने पत्रकार परीषद घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यावर लगेच म्यानमारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. जुलैमध्ये सुरक्षा दलांनी काश्मिरमध्ये अतिरेकी बुर्‍हान वाणीला मारल्यानंतर लगेच ते जाहीर केले होते. त्यामुळे काश्मिरमध्ये जनतेला भडकावण्यात येऊन आजही तिथली परिस्थिती अशांत आहे. बुर्‍हान वाणी ७-८ महिने फरारी होता. त्याला मारल्यानंतर ते जाहीर न करता त्याचा अंत्यविधी गुपचुप उरकला असता तर तो मेल्याचे बाहेर समजले नसते व त्यामुळे पुढील समस्याही निर्माण झाल्या नसत्या. निदान भविष्यात तरी अशा कारवाया शेवटपर्यंत गुपचूप ठेवल्या तर नवीन समस्या निर्माण होणार नाहीत.

आजच्या कारवाईची जाहीर माहिती देऊन मोदी सरकारला आपली प्रतिमा उजळून घेण्यास मदत झाली असेल. परंतु त्यातून जिन्गोइझम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढील काही दिवसात अत्यंत बेजबाबदार वाहिन्यांवरून वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी व माजी लष्करी अधिकारी एकत्र बोलावून चर्चांचा कीस पाडला जाईल. भाजपचे प्रवक्ते स्वतःची पाठ थोपटून घेतील व काँग्रेसमध्ये असे करायची हिम्मतच नव्हती असे टोमणे मारतील. काँग्रेसवाले बांगलादेश मुक्तीचे उदाहरण देऊन आम्हीचे कसे ग्रेट होता व आमच्या काळातसुद्धा अशा कारवाया होत होत्या, पण आम्ही जाहिरातबाजी करीत नव्हतो असे प्रत्त्युत्तर देतील. यातून युद्ध होऊन दोन्ही देशातील नागरिकांना त्रास होईल व म्हणून अशा हल्ल्यांऐवजी चर्चा करावी असा सल्ला पाकिस्तानप्रेमी निधर्मांध देतील (मराठी वाहिन्यांवर प्रकाश बाळ, जतीन देसाई, हेमंत देसाई इ. मंडळी यात आघाडीवर असतील). भारताने काय करायला हवे याबाबत अनेकांचे सल्ले सुरू होतील. एकंदरीत पुढील काही दिवसात वाहिन्यांवरून प्रचंड धुरळा उडणार आहे.

आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

6 Oct 2016 - 3:44 pm | मदनबाण

हे जरी सत्य असले, तरी वेपन सेल्स मध्ये चीन ने अमेरिकेला आधीच रिप्लेस केले आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India asks Pakistan to 'abandon futile quest' of Kashmir at the United Nations

विकास's picture

6 Oct 2016 - 7:39 pm | विकास

जो पर्यंत जग अँड्रॉईड, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, अगदी इंटरनेट सर्वर्स पण अमेरीकेतले वापरत राहील तो पर्यंत अमेरीका ही declining power होण्याची शक्यता कमी आहे... दुसरा महत्वाचा भाग (आणि तो भारताच्या संदर्भात देखील तितकाच आहे): अमेरीका हे लोकशाही राष्ट्र आहे त्यामुळे चुका झाल्या तरी त्या दुरूस्त करून (corrective actions) पुढे जाऊ शकते आणि तसे ते आज पर्यंत जात राहीले आहे. असो.

असं असेल तर या महान देशाला गेल्या ७-८ वर्षात फक्त रिक्व्हरीच्याच चर्च्या का करता आल्या ?
बाकी येणारा काळ सांगेलच... की पॅडलिंग फिक्शन आहे कि अजुन काही... ;)
बाकी मनिला ओबामामामांना सन ऑफ टिंब टिंब म्हणुन देखील अमेरिका त्यांच्या बद्धल ब्र देखील काढत नाही !

असो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शराफ़त अली को शराफ़त ने मारा... :- अमृत

बाकी मनिला ओबामामामांना सन ऑफ टिंब टिंब म्हणुन देखील अमेरिका त्यांच्या बद्धल ब्र देखील काढत नाही !

म काय करायचं म्हणता? शिवी दिली म्हणून युद्ध सुरू करायचं का?

हे म्हणजे पाकिस्तान च्या राष्टीय चारित्र्य नुसारच झाले. जे एका वारांगनेचे (सामान्य भाषेत "वेश्या")आहे. अमेरिका नावाच्या बाप्याकडून भाव आणि पैसे मिळणे कमी झाले की चीन नावाचा बाप्याची संगत आधी छुपी होतीच, आता उघडपणे तो माझा यार आहे हे सांगणे सुरु होईल. तिकडे रशिया नावाच्या बाप्याला डोळा मारणे,खुणावणे चालू आहेच.
थोडक्यात काय ? तर जो मला पैसा पुरवेल त्याच्याबरोबर मी जाणार.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Oct 2016 - 1:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

कृपया वारांगनांचा अपमान करू नयेत ही विनंती! बाकी पाकिस्तानबद्दल सेम उच्चार आमचे लाडके तारेक फतेह साहेब सुद्धा काढतात , ;)

सचु कुळकर्णी's picture

7 Oct 2016 - 4:28 pm | सचु कुळकर्णी

कृपया वारांगनांचा अपमान करू नयेत

सहमत. अटलांटिक कौसिंल मध्ये जबरा कपडे फाडले पाकड्यांच्या स्पेशल ऐनव्हॉय चे बलोच, सिंध आणि POK वाल्यानी. या पाकि भिकारड्यांचा निलाजरेपणा तर बघा ह्यांच स्टेटमेंट आहे कि अमेरीकेला आवडो की न आवडो पण अफगाणिस्तानात अमेरीकेला आमची मदत लागणारच आहे, जर अमेरीका काश्मिर प्रश्नी मदत करणार नसेल तर आम्हि काबुल सुध्दा शांत होउ देणार नाहि. चिन, रशिया आणि ईराण आमच्या पाठीशी आहे जर अमेरीकेचा कल असाच भारताच्या बाजुने राहिला तर वुई विल अबांडन अमेरीका फॉर चिन, रशिया आणि ईराण. ह्याले वर्हाडीत भिक्कार ठस्सन ह्मणतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Oct 2016 - 4:35 pm | कैलासवासी सोन्याबापु

इचिभन हे म्हणजे खेल देशपांडे बुद्रुक न उमरोतीले इकासाची ठसन देने झाले न भो

खेल देशपांडे - अकोला जिल्ह्यातील एक अत्युच्च टशन देणारे गाव! इथे सगळेच देशपांडे आहेत, अजून काय एक्सप्लेनेशन द्यायची गरज नसावी

सचु कुळकर्णी's picture

7 Oct 2016 - 4:50 pm | सचु कुळकर्णी

सहि पकडे है ;)
बेक्कार ईज्जत काढली ना हो पाक एनव्हॉय ची निरा चोर, खोटारडे म्हनल त्याईले त्याईच्याच पब्लीकन वर हे बि विचारल का सब्बन पैशे संपले वाट्टे काहुन का तुम्हि कटोर घेउन परत अंकल सँम कडे आले.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Oct 2016 - 5:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

अटलांटिक काऊंसिल मधे बोललेले बोल तुम्हाला बेइज्जती वाटते आहे, तर एकदा हा विडीयो पहा(च) असे सुचवतो देवा. अंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चार भद्र लोकांत बोलणे कौतुकास्पद आहेच हो, पण खुद्द पाकिस्तानात, जिथे बलुचिस्तानचा ब बोलले तरी गोळ्या घालतात, तिथे ह्या कॉलेजात जाणार्या पोरांनी ज्या डरकाळ्या फोडल्यात त्या वाचुन त्यांच्या लढाऊ बाण्याला खरंच मुजरा करावा वाटला मला, नमन करतो मी त्या बलोच भुमीला अन तिथे जन्माला येणार्या निधड्या वाघांना

सचु कुळकर्णी's picture

7 Oct 2016 - 5:30 pm | सचु कुळकर्णी

बाप्पु धन्यवाद हा व्हीडियो पाहिलाय भावा. अटलांटिक कौंसील च उदाहरण एव्हढ्याच करता देल्ल देवा का हे आता बसता लात अन उठता बुक्की खाउन रायलेत. आता तर थोडेच का होईना पण POK मध्ये सुध्दा टेरर कँप विरोधात
लोक मोर्चा काढुन राहिले.

सचु कुळकर्णी's picture

7 Oct 2016 - 5:32 pm | सचु कुळकर्णी

उठता लात बसता बुक्की असे वाचावे. ****

श्रीगुरुजी's picture

6 Oct 2016 - 3:28 pm | श्रीगुरुजी

पाकिस्तानची परिस्थिती पाहता नवाज शरीफच्या विरूद्ध लष्करी उठाव होऊन लष्करप्रमुख राहील शरीफ देश ताब्यात घेईल अशी शक्यता वाटतीये. तसाही राहील शरीफ महिन्या दिडमहिन्यात निवृत्त होतोय. अर्थात एक शरीफ जाऊन दुसरा आला तरी भारताच्या दृष्टीने तसूभरही फरक पडणार नाही. दुसरी शक्यता म्हणजे लष्कर उठाव करून आपला पित्त्या इम्रान खानला पंतप्रधानपदी बसवेल.

यातले काहीही झाले तरी, योग्य वेळ मिळताच आपण त्यांचे कंबरडे मोडुन टाकावे. म्हणजे भविष्यात आपले जवान त्यांचे प्राण गमवणार नाहीत किंवा त्यांची विटंबना केली जाणार नाही, टिव्हीवर डिबेट्स होणार नाहीत्,असे धागे निघणार नाहीत आणि चु केजरीवाल / चु संजय निरुपम / चु सलमान यांना अजुन चु करण्याची संधी मिळणार नाही !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India asks Pakistan to 'abandon futile quest' of Kashmir at the United Nations

- सध्या पाकची आर्थिक स्थिती सध्या जेमतेम आहे. अजुनही गुंतवणुकीला पोषक वातावरण नाही आणि निर्यातीवर ताण बर्‍यापैकी आहे.
- राहिल शरीफ यांनी सत्ता ताब्यात घेतल्यास -
--- आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांवर ताण आणखी वाढतील
--- आधीच एकाकी पडलेल्याला पाकिस्तानला चीनही खुलेआम मदत करतांना दहादा विचार करेल.
--- देशांतर्गत वाढत जाणारा महागाई/बेरोजगारीचा ताण आणि खालावणारी आर्थिक स्थिती यांतील समतोल साधणे अत्यंत कठीण होत जाईल. मंदीसदृश परिस्थितीसुद्धा उद्भवू शकेल.
--- बलूच आणि सिंध येथे आणखी धुरळा उठायला अत्यंत पोषक वातावरण निर्माण होईल.
--- भारताला आयते कोलीत हातात दिल्यासारखे होईल.
--- युद्धाशिवाय पर्याय उरणार नाहीत अशा परिस्थितीकडे वाटचाल सुरू होईल.. किंबहुना ते अपरिहार्य ठरेल.

अर्थात् हे सगळे माझे विचार आहेत, असेच होईल असे काही नाही. पण अगदीच मूर्ख वा सत्तापिपासू नसलेत तर राहिल शरीफ सत्ता सध्यातरी बळकावणार नाहीत. आणि तसे केलेच तर तो आत्मघात ठरेल.

सचु कुळकर्णी's picture

6 Oct 2016 - 7:01 pm | सचु कुळकर्णी

Top trend in Pakistan: #PakStandsWithKejriwal for demanding proof of surgical strikes
अरारा :(

पैसा's picture

6 Oct 2016 - 7:31 pm | पैसा

आजच फेसबुकवर अजून एक पोस्ट बघितली. रागां आणि केजरीवल भाजपाच्या २०१९ ला लोकसभेच्या ४०० हून जास्त जागा निवडून येतील याची व्यवस्था करण्यात बिझी आहेत म्हणे! =))

विकास's picture

7 Oct 2016 - 7:38 am | विकास

मा. केजरीवाल जे काही बोलले त्याला त्यांच्या जिभेवर शस्त्रक्रीया करणारे डॉक्टर जबाबदार आहेत. चुकून त्यांनी शस्त्रक्रीया करताना उरलंसुरलं जिभेच हाड काढून टाकलं असे म्हणतात... ;)

मोहन's picture

7 Oct 2016 - 9:41 am | मोहन

+१०००

लोल

तिमा's picture

7 Oct 2016 - 10:03 am | तिमा

रागां तर आता रक्ताच्या दलालीवर आलाय. मोदींना आयतीच मदत होतीये. मौत का सौदागर, खूनका दलाल ....
आणखी काही डोक्यांत येत असलं तर तेही एकदाच ओकून टाक बाबा.

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 1:49 pm | श्रीगुरुजी

काही टारगट मुलं गाढवाच्या शेपटीला लवंगी फटाक्याचा बांधून मजा बघायची. सर पेटला की फटाक्यांच्या आवाजाने आणि भाजल्यामुळे गाढव किंचाळत, सैरावरा लाथा झाडत वाट फुटेल तिकडे पळत सुटायचं. या सर्जिकल स्ट्राईकमुळे काही जणांच्या बुडाला आग लागलेली दिसतेय.

संदीप डांगे's picture

7 Oct 2016 - 2:06 pm | संदीप डांगे

काही टारगट मुलं सैन्याला शक्तीचा विसर पडलेल्या हनुमानाची उपमा देत आहेत, तिकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे की नाही, बुडाला आग लागलेल्या गाढवांपेक्षा?

संदीप डांगे's picture

7 Oct 2016 - 2:08 pm | संदीप डांगे

तसेही युपीए काळात दहा सर्जिकल स्ट्राईक झाले असे पवार बोललेत, तेव्हा बुडाला आग लागण्याचे कारण तरी काय हा मला प्रश्न पडलाय, बहुतेक राजकीय लाभ उठवू शकले नाहीत म्हणून जळजळ होत असावी;)

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 2:23 pm | श्रीगुरुजी

पवारांची राजकीय कारकीर्द संपलेली आहे. ते काय बोलतात ते कोणीही गांभिर्याने घेत नाही. अर्थात त्यांचे उपद्रव मूल्य अजून शाबूत आहे हे मात्र नक्की.

संदीप डांगे's picture

7 Oct 2016 - 2:27 pm | संदीप डांगे

वरच्या माझ्या प्रतिसादातील फक्त पवार शब्द उचलला, म्हणजे तुम्च्यालेखी ते बोललेत ते सर्व खोटे असते का?

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 2:30 pm | श्रीगुरुजी

होय. बहुतांशी ते खोटे असते.

नाखु's picture

7 Oct 2016 - 2:31 pm | नाखु

राजकीय लाभासाठी खोटे बोलतात हे शर्वश्रुत आहेच.

खुद्द तातकालीन सैन्ममुखांनी असे काहीही झालेले नाही असा निर्वाळा दिला आहे. ़अल्हई गेलेल्या भांदाय्ला कल्हई लावायचे केविल्वाणे प्रयत्न म्हणजे हे प्रकार आहेत.

अर्थात तुम्ही क्रिकेटमुळे पॉवरबाज छक्केपंजे नक्कीच ओळखून असाल की?

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 2:37 pm | श्रीगुरुजी

समजा युपीएच्या काळात असे हल्ले केले होते व ते अत्यंत गुप्त ठेवले गेले होते, तर त्याची माहिती फक्त पंतप्रधान, लष्कराचे अत्यंत वरीष्ठ अधिकारी, संरक्षणमंत्री, राष्ट्रपती इ. मोजक्याच व्यक्तींकडे असायला हवी होती. पवारांसारख्या अत्यंत लहान पक्षाचे प्रतिनिधित्व करणार्‍या पक्षाबाहेरील व्यक्तीला आणि कृषी खात्यासारख्या कमी महत्त्वाचे खाते सांभाळणार्‍याला अशा हल्ल्यांची माहिती असण्याचे कारणच नाही.

रागा, निरूपम, केजरी इ. प्रमाणे पवार, चिदंबरम यांच्या बुडालाही आग लागलेली आहे. परंतु ते इतरांइतके अपरिपक्व नसल्याने "We too" अशी भूमिका घेऊन सौम्य प्रतिक्रिया देत आहेत.

संदीप डांगे's picture

7 Oct 2016 - 2:48 pm | संदीप डांगे

पवार संरक्षण मंत्री होते बहुतेक, नव्हते का?

तसेच ह्या ताज्या कारवाईसाठी मोदींनी पवारांना पाचारण केले ते का बुआ?

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 2:58 pm | श्रीगुरुजी

पवार जून १९९१ ते मार्च १९९३ या २० महिन्यात संरक्षणमंत्री होते. ते ज्या युपीएचा उल्लेख करताहेत तो काळ २००४ ते २०१४ हा होता व त्या काळात ते कृषी मंत्री होते. केंद्रीय मंत्रीमंडळात सर्वाधिक महत्त्वाची समजली जाणारी अर्थ, संरक्षण, गृह, परराष्ट्र व्यवहार इ. खाती त्यांच्याकडे नव्हती. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस नामक जेमतेम ९ खासदार असलेल्या एका अत्यंत लहान पक्षाचे प्रतिनिधि होते व त्या पक्षाच्या पाठिंब्याची केंद्र सरकारात गरज नव्हती. पक्ष अत्यंत लहान, पक्षाच्या पाठिंब्याची गरज नाही व दुय्यम खात्याचे मंत्री असल्यामुळे इतकी महत्त्वाची आणि अत्यंत गुप्त असलेली कारवाई त्यांना माहिती असण्याचे कारणच दिसत नाही.

समजा सांप्रत केंद्र सरकारने हा हल्ला अत्यंत गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला असता तर अवजड उद्योग मंत्री अनंत गीते किंवा क्रीडा मंत्री अशी दुय्यम खाते दिलेल्यांना ही गुप्त माहिती सांगण्याची गरजच भासली नसती.

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 3:00 pm | श्रीगुरुजी

तसेच ह्या ताज्या कारवाईसाठी मोदींनी पवारांना पाचारण केले ते का बुआ?

मोदींनी फक्त पवारांना माहिती दिलेली नसून सर्वपक्षीय नेत्यांना बोलावून माहिती दिलेली आहे. फक्त पवारांना हॉटलाईनवरून काही खास माहिती दिल्याचे ऐकिवात नाही.

संदीप डांगे's picture

7 Oct 2016 - 3:02 pm | संदीप डांगे

=)) get out of blindzone!!

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 3:04 pm | श्रीगुरुजी

कसला blindzone?

तर आता पवारांचा problem काय आहे? आपल्याला चांगले मार्क्स मिळाल्यावर आपण ते मुद्दामच आपला दुस्वास करणाऱ्याला सांगतो. जेव्हा तो त्याच्या मनाविरूद्ध आपलं अभिनंदन करतो तेव्हा पाहायला मजा येते. मोदींनी हाच विचार करुन पवारांना सर्जिकल स्ट्राईकबद्दल सांगितलं असणार. बाकी पवारांनी चार सर्जिकल स्ट्राईक्स केले होते म्हणे -
पहिला धरणांत,
दुसरा महाराष्ट्र सदनात,
तिसरा लवासात
चौथा पुरावे मिटवण्यासाठी मंत्रालयात.

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 3:26 pm | श्रीगुरुजी

दिल्लीत आपल्याला फार मान आहे, आपण फार महत्त्वाचे समजले जातो, सर्व पंतप्रधान व इतर सर्व पक्षांचे नेते नेहमी आपला सल्ला घेतात अशा गप्पा पवारांनी, त्यांच्या चमच्यांनी व त्यांच्या वृत्तपत्राने कायमच पसरविल्या आहेत. पूर्वी युपीए असताना किमान समान कार्यक्रम Common Minimum Program (CMP) या नावाने ओळखला जायचा. 'सकाळ'वाल्यांनी पसरविले होते की यातला C म्हणजे चिदंबरम, M म्हणजे मनमोहन सिंग आणि P म्हणजे पवार (म्हणजे पवार मनमोहन सिंग व अर्थमंत्री चिदंबरम यांच्या बरोबरीचे आहेत असे सांगण्याचा हा प्रयत्न होता). मनमोहन सिंग कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी सर्वात प्रथम पवारांशी सल्लामसलत करतात असेही पसरविले गेले होते. आपण खूप अनुभवी व व वरीष्ठ असल्याने सर्वजण आपला सल्ला घेतात, आपल्याला केंद्र सरकारमध्ये व इतरत्र फार महत्त्व आहे, मनमोहन सिंगांखालोखाल आपण सर्वात महत्त्वाचे आहोत असे पवारांबाबत कायम पसरविले गेले. काँग्रेस किंवा इतर कोणत्याही नेत्याने यावर कधीच प्रतिक्रिया दिली नाही. ते जे दावा करतात त्यावर इतर नेत्यांनी कधीच आक्षेप घेतला नाही. मात्र पवार त्यांना ठरवून दिलेल्या चाकोरीबाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागले किंवा आपल्या खात्याबाहेर लुडबूड करू लागले की की लगेच काँग्रेसचा एखादा वरीष्ठ नेता डोळे वटारायचा व लगेच पवारांना गप्प व्हायला लागायचे. २००९ मध्ये पवारांच्या पक्षाने महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर व ओरिसात कॉंग्रेसचा विरोधक असलेल्या बिजादबरोबर युती केली होती. नवीन पटनाईकांनी इतर विरोधी पक्षांबरोबर एक सभा आयोजित केली होती व त्यात युती असल्याने पवारांना आमंत्रण दिले होते. सभेच्या काही तास आधी चिदंबरम यांनी फोन करून समज दिल्यावर लगेच पवारांनी माघार घेतली व सभेला गेले नाहीत.

या हल्ल्याबाबत माहिती देण्यासाठी मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती. इतर सर्व लहानमोठ्या, चिल्लर पक्षांच्या नेत्यांप्रमाणेच पवारांना सुद्धा त्यात बोलविले होते. 'सकाळ'ने बातमी देताना असे काही लिहिले की जणू काही पवारांसारख्या अनुभवी व वरीष्ठांना सल्ल्यासाठी तातडीने दिल्लीला बोलावून घेण्यात आले.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Oct 2016 - 4:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

बाकी अजून किती चिल्लर पक्षांच्या चिल्लर नेत्यांच्या अंगणात हेलिकॉप्टर उतरवून माननीय पंतप्रधान त्या चिल्लर नेत्यांच्या पंगतीत जेवले आहेत हो??

पवार ह्यांनी भ्रष्टाचार केले आहेत, तसेच ते काही पवित्र वगैरे नाहीत, हे बहुदा आपले एकमत व्हावेच, फक्त पवार तुम्ही म्हणता तसे फुटकळ , चिल्लर किंवा दुर्लक्ष करण्याजोगे नक्कीच नाहीत, अन असे तुम्ही कुठल्या फाजील आत्मविश्वासापाई समजत आहात ते कारण अनाकलनीय आहे, इतका ओव्हर कॉन्फिडन्स बरा नव्हं गुर्जी.अस्तु

+१००
पवार एकटे असले तरी वन मॅन आर्मी आहेत...

श्रीगुरुजी's picture

8 Oct 2016 - 12:11 am | श्रीगुरुजी

ते वन मॅन आहेत, आर्मी वगैरे अजिबात नाहीत. इतर पक्षांनी त्यांचे पाणी जोखले असल्याने राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या ऐवजी द्रमुक, अद्रमुक, सप इ. पक्षांना जास्त मान आहे. त्यांच्या पक्षाचे शिवसेनेशी बरेच साम्य आहे. उद्धव ठाकरे वगैरे मंडळीसुद्धा आपला पक्ष फार ग्रेट, आपल्यामुळेच भाजप वाढला इ. वल्गना करीत असतात. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. राष्ट्रवादीचे व पवारांचे अगदी तसेच आहे.

अर्धवटराव's picture

8 Oct 2016 - 8:13 am | अर्धवटराव

असो.
मूकमोर्चाने सरकारचे काळीज चिरले असं ऐकतोय. ते ही असो.

श्रीगुरुजी's picture

8 Oct 2016 - 12:08 am | श्रीगुरुजी

पवार ह्यांनी भ्रष्टाचार केले आहेत, तसेच ते काही पवित्र वगैरे नाहीत, हे बहुदा आपले एकमत व्हावेच, फक्त पवार तुम्ही म्हणता तसे फुटकळ , चिल्लर किंवा दुर्लक्ष करण्याजोगे नक्कीच नाहीत, अन असे तुम्ही कुठल्या फाजील आत्मविश्वासापाई समजत आहात ते कारण अनाकलनीय आहे, इतका ओव्हर कॉन्फिडन्स बरा नव्हं गुर्जी.अस्तु

२०१४ च्या निवडणुकीनंतर पवारांची राजकीय कारकीर्द संपलेली आहे. केंद्रात किंवा कोणत्याही राज्यात ते किंवा त्यांचा पक्ष सत्तेवर नाही व निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग नाही. बीसीसीआयमधून त्यांची हकालपट्टी अटळ आहे. उर्वरीत काळ ते फक्त साहित्य संमेलनाला हजेरी लावणे, नाट्यसंमेलनाला हजेरी लावणे, जातीयवादी काड्या घालणे व फडणवीस सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे इ. त घालविणार आहेत. अर्थात फेब्रुवारी २०१७ मध्ये महाराष्ट्रात १० महापालिकांच्या निवडणुका आहेत. हे 'राष्ट्रीय स्तरावरील बलाढ्य नेते' महापालिकांच्या निवडणुकीत भरपूर प्रचार करणार हे नक्की.

मुळात सुरवातीपासूनच म्हणजे १९८० पासून ते फार मोठे नेते आहेत असा भ्रम निर्माण करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ते एकत्रित काँग्रेसच्या माध्यमातून (१९९० व १९९५), स्वत:च्या वेगळ्या पक्षाची इतर पक्षांबरोबर युती करून (१९८५ २००४ व २००९) व स्वत:च्या वेगळ्या पक्षाच्या माध्यमातून पूर्णपणे स्वतंत्र निवडणुक लढविणे (१९८०, १९९९ व २०१४) अशा ३ माध्यमातून ८ वेळा जनतेसमोर गेले. त्यांना या ८ प्रयत्नात कधीही बहुमत मिळविता आले नाही. १९९० ते मुख्यमंत्री असताना एकत्रित काँग्रेसला मिळालेल्या १४१ जागा व १९९५ मध्ये पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री असताना एकत्रित काँग्रेसला मिळालेल्या ८० जागा ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी. दोनही वेळा त्यांना बहुमताचा १४४ हा आकडा पार करता आला नाही. कॉंग्रेसबरोबर युती केल्यावर त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती ७१ जागा व पूर्णपणे स्वतंत्र लढल्यावर त्यांची मजल जास्तीत जास्त ५८ पर्यंत पोहोचली. महाराष्ट्रातील आपण फार मोठे नेते आहोत, राष्ट्रीय स्तरावर आपला फार मोठा दबदबा आहे, सर्व पक्षांचे सर्व राष्ट्रीय नेते आपल्याला मानतात असा भ्रम निर्माण करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या काही भागातच त्यांना व त्यांच्या पक्षाला थोडेफार स्थान आहे. विदर्भ व मुंबई या दोन मोठ्या भागात त्यांच्या पक्षाला फारसे स्थान नाही. राष्ट्रीय स्तरावर त्यांचा पक्ष चिल्लर म्हणून ओळखला जातो. त्यांच्यापेक्षा करूणानिधी, नवीन पटनाईक, ममता बॅनर्जी, मुलायम, मायावती, जयललिता इ. प्रादेशिक नेते जास्त बलवान समजले जातात. बेसिकली त्यांच्या किंवा त्यांच्या पक्षाच्या असण्याने किंवा नसण्याने इतर पक्षांना काहीच फरक पडत नाही.

भक्त प्रल्हाद's picture

8 Oct 2016 - 12:54 am | भक्त प्रल्हाद

खरे तर, आप च्या जागा या शिवसेना, राष्ट्रवादी आणी मनसे या प्रत्येक पक्शापेक्षा जास्त आहेत हे पाहुन याणी आत्मपरीक्षन करायची गरज आहे.

संदीप डांगे's picture

8 Oct 2016 - 7:49 am | संदीप डांगे

अजून किती चिल्लर पक्षांच्या चिल्लर नेत्यांच्या अंगणात हेलिकॉप्टर उतरवून माननीय पंतप्रधान त्या चिल्लर नेत्यांच्या पंगतीत जेवले आहेत हो??

ह्या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित होते गुरुजी

श्रीगुरुजी's picture

8 Oct 2016 - 3:26 pm | श्रीगुरुजी

राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना बारामतीला बोलावून त्यांचा पाहुणचार करणे व त्यांच्या तोंडातून आपली स्तुती ऐकणे हे पवार अनेकदा करतात. अनेक राष्ट्रीय नेत्यांना पवारांनी बारामतीला बोलाविले आहे. जसे आपण एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून गेल्यावर त्याच्याबद्दल चार शब्द बरे बोलतो तसेच बारामतीला भेट देऊन पवारांचा पाहुणचार स्वीकारणारे नेते तिथून येताना पवारांबद्दल चार बरे शब्द बोलून येतात व त्यामुळे पवारांच्या अंगावर मूठभर मांस चढते. आपण खूप महत्त्वाचे नेते आहोत, राष्ट्रीय पातळीवर आपल्याला खूप मान आहे, सत्ता असो वा नसो आपले महत्त्व कायम आहे हे दाखविण्याचा पवारांना खूप जुना छंद आहे. अगदी १९८३ मध्ये महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते असताना पवारांनी पुण्यात विविध राज्यातील विरोधी पक्षनेत्यांचे संमेलन बोलावून मिरवून घेतले होते. ९० च्या दशकात चंद्रशेखर व इतर काही नेत्यांनी बारामतीला भेट देऊन पवारांचे कौतुक केले होते. अगदी जानेवारी २०१४ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी बारामतीला भेट देऊन पवारांवर स्तुतीसुमने उधळली होती. तशीच मोदी व जेटलींनीही बारामतीला भेट दिलेली आहे.

आपल्याला खूप राष्ट्रीय महत्त्व आहे, आपण खूप महत्त्वाचे वरिष्ठ नेते आहोत, आपला दिल्लीत खूप दबदबा आहे हे पवारांना कायम दाखवून द्यायचे असते. त्यामुळेच त्यांनी २००१ मध्ये आपला ६१ वा वाढदिवस (त्यावेळी पंतप्रधान वाजपेयी सुद्धा आले होते ज्यांचा उल्लेख नंतर पवारांनी १० तोंडाचा रावण असा केला होता) व २०१५ मध्ये आपला ७५ वा वाढदिवस सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देऊन साजरा केला होता. इतर कोणताही नेता इतका गवगवा व गाजावाजा करून आपला वाढदिवस साजरा करीत नाही. अगदी १९९३ मध्ये सुद्धा (ज्या वर्षात मुंबईतील दंगली, मुंबईतील १३ बॉम्बस्फोट, लातूरचा महाभूकंप, लोकलच्या डब्याला आग लागल्याच्या अफवेने धावत्या लोकलमधून उडी मारून मृत्युमुखी पडलेल्या २५-३० महिला, फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वेने स्कूलबसला धडक दिल्यामुळे झालेला ३०-४० मुलांचा मृत्यु अशा अनेक दु:खदायक घटना एकाच वर्षात महाराष्ट्रात घडल्या होत्या) पवारांनी आपला वाढदिवस वानखेडे स्टेडियममध्ये नोटांचे हार स्वीकारून थाटामाटात साजरा केला होता.

तस्मात बारामतीला कोण गेले होते या घटनांना फारसे महत्त्व नाही. पवार खूप महत्त्वाचे नेते आहेत म्हणून हे नेते तिथे जात नसून आपण महत्त्वाचे आहोत हे जगाला दाखविण्यासाठी पवार या नेत्यांना आमंत्रण देत असतात.

संदीप डांगे's picture

10 Oct 2016 - 2:07 am | संदीप डांगे

पवार खूप महत्त्वाचे नेते आहेत म्हणून हे नेते तिथे जात नसून आपण महत्त्वाचे आहोत हे जगाला दाखविण्यासाठी पवार या नेत्यांना आमंत्रण देत असतात.

हे पण भारी आहे हां गुरुजी! मानलं तुम्हाला. खतरनाक लॉजिक आहे!!! _/\_

तरी मांज्या डोस्क्यात येक सवाल येऊन रायलाय, का बा, हे पवार कोण तिसमारखां लागून गेलं की त्याने बोलावलं का लोग धावू धावू त्याच्या अंगणात जाऊन त्याच्या पंगतीत जेवतेत? आम्ही नमस्कार केला तर च्यामारी कोपर्‍यावरचा चहावालाबी परतुन नमस्कार नाही करत बुवा. काय तरकिब आसंल बरं?

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Oct 2016 - 8:46 am | कैलासवासी सोन्याबापु

डांगे डांगे डांगे कसं कळत नाही तुम्हाला म्हणतो मी!

"आमचा बबल्या नाय हो त्यातला, ते जाधवाचं कारटं बसवतंय बघा त्याला प्यायला अन पिऊन पत्ते कुटायला, आमच्या पोराला नाही नाद, ते हलकट बसवतात अन हे बिचारं फसतं"

वरील दिलेला एका आईचा आपल्या पोराबद्दलचा अंधतर्क, अन गुरुजींनी दिलेला 'पवारच बोलवून घेतात' हा महान उच्च तर्क ह्यात काहीही समानता नाहीये! तसा संबंध तुम्ही शोधल्यास तुमच्यावर आमचे परममित्र मोदकभाऊ ह्यांची अवकृपा होईल अन तुम्ही कसे देशद्रोही आहात हे परत एकदा सगळ्यांना उच्चारवाने सांगितले जाईल, तेव्हा हा तुमचा सुडो सिक्युलर दंगा बंद करा!

श्रीगुरुजी's picture

10 Oct 2016 - 2:43 pm | श्रीगुरुजी

गुरुजींनी दिलेला 'पवारच बोलवून घेतात' हा महान उच्च तर्क

अहो तसंच आहे ते. पवार वारंवार अनेकांना डोळा मारत असतात. १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पवार मुख्यमंत्री झाले होते. १९७९ मध्ये इंदिरा गांधींनी तत्कालीन पवार सरकार बरखास्त केल्यावर पवारांना काळाची पावले ओळखून इंदिरा काँग्रेसमध्ये जायचा प्रयत्न केला होता. परंतु आपल्याला इंदिरा कॉंग्रेसमध्ये घेण्यास वसंतदादा पाटलांचा तीव्र विरोध आहे हे ओळखून "मी वसंतदादांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार आहे" असे पवारांनी जाहीररित्या सांगितले होते. आपले सरकार पाडल्यामुळे संतापलेल्या वसंतदादांनी पवारांना धुडकावून लावले होते.

नंतर १९९६ मध्ये देवेगौडांना पंतप्रधानपदाची लॉटरी लागल्यावर पवारांनी देवेगौडांशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रशेखर व जनता दलाच्या इतर नेत्यांना बारामतीला बोलाविणे हा त्याच प्रयत्नाचा एक भाग होता. पवारांच्या प्रयत्नातून देवेगौडांनी मुंबईत येऊन बाळ ठाकर्‍यांची भेट घेतली होती. शिवसेना आपल्याला पाठींबा देईल का याची चाचपणी ते करायला आले होते. नंतर पवार देवेगौडांबरोबर एकत्रित ओरिसांच्या दौर्‍यावर गेले होते. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरींनी, कॉंग्रेस देवेगौडांच्या दावणीला नेऊन बांधण्याचे पवारांचे प्रयत्न ओळखून लगेचच देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेऊन ते सरकार पाडले व पवारांचे प्रयत्न फसले.

२०१४ नंतर सुद्धा पवार भाजपच्या वरीष्ठ नेत्यांशी जवळीक वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत याचे तेच कारण आहे. बारामतीला वरीष्ठ नेत्यांना बोलावून त्यांच्याशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न करायचा व त्याचबरोबर आपलेही महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करायचा, जमल्यास सत्तेत घुसण्याचा प्रयत्न करायचा, आपल्या पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना वाचवायचे यासाठीच ही आमंत्रणे आहेत. अर्थात पवारांनी कितीही वेळा डोळा मारला तरी भाजप नेते बधणार नाहीत हे उघड आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Oct 2016 - 5:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

गुर्जी, पवार डोळा मारतात म्हणून पवार वाईट असे एकावेळेस मानले तर त्यांनी कचकून डोळा मारल्यावर त्यांच्या अंगणात उतरून जेवण करणारे चांगले मानावे का वाईट असा माझा थेट प्रश्न थेट तुम्हाला विचारून मी थेट माझे चार थेट शब्द संपवतो!

श्रीगुरुजी's picture

10 Oct 2016 - 8:09 pm | श्रीगुरुजी

गुर्जी, पवार डोळा मारतात म्हणून पवार वाईट असे एकावेळेस मानले तर त्यांनी कचकून डोळा मारल्यावर त्यांच्या अंगणात उतरून जेवण करणारे चांगले मानावे का वाईट असा माझा थेट प्रश्न थेट तुम्हाला विचारून मी थेट माझे चार थेट शब्द संपवतो!

तुमच्या थेट प्रश्नाचं थेट उत्तर असं आहे की ते चांगले किंवा वाईट असे काहीच मानू नयेत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Oct 2016 - 9:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

म्हणजे जेवणारे चांगले किंवा वाईट काहीच मानू नयेत, फक्त यजमान वाईट मानावा असे का?

श्रीगुरुजी's picture

10 Oct 2016 - 10:41 pm | श्रीगुरुजी

कोण चांगले, कोण वाईट याचा काथ्याकूट करण्याइतपत ही घटना महत्त्वाची नाही. या घटनेला काहीही महत्त्व नाही.

तसा संबंध तुम्ही शोधल्यास तुमच्यावर आमचे परममित्र मोदकभाऊ ह्यांची अवकृपा होईल अन तुम्ही कसे देशद्रोही आहात हे परत एकदा सगळ्यांना उच्चारवाने सांगितले जाईल, तेव्हा हा तुमचा सुडो सिक्युलर दंगा बंद करा!

शिक्के मारणे वाईट असते असे आमचे मित्र सोन्याबापू सांगतात त्याची आठवण आली.

बाकी मी संदिप डांगेंना दिलेला प्रतिसाद आणि त्याच्या वरचे खालचे त्यांचे प्रतिसाद पुन्हा एकदा वाचावेत ही नम्र विनंती.

असो. :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Oct 2016 - 5:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

जालीम एक मूहर लग गई तो तुम तिल
मिला उठ्ठे हो दोस्त, सोचो रोज जो मूहरे लगाते हो क्या रोता होगा ! ;)

कसंय न मोदक भाऊ, चर्चा कोणाची चालली अन कश्यावर चालली होती हे जरा तुम्ही अगोदर पहा, बाकी एरवी कोणाला तात्विक समर्थन दिले की त्याला "महफिल" संबोधणारे महान सरजी इथे मात्र सोईस्कर वाचन मात्र मोड घेऊन बसलेत हे एक नव्याने निघालेले निरीक्षण, चिंता नको, आम्ही तसे करत नाही, ती आमची रीत नाही, तुम्ही वैयक्तिक होत नाही हा किमान अमच्यासंबंधी तुमचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून मी तुमच्याशी मोकळ्या मनाने वाद घालू शकतो(च) ते संबंध तसेच राहतील, मुद्दे पटो न पटो माणूस आम्हाला मोदक पटतो, बाकी तुम्ही समर्थ आहात :)

मोदक's picture

10 Oct 2016 - 5:50 pm | मोदक

असो :)

विशुमित's picture

7 Oct 2016 - 4:26 pm | विशुमित

व्हेरी रडका प्रतिसाद...!!

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Oct 2016 - 4:17 pm | अनिरुद्ध.वैद्य

तसेच ह्या ताज्या कारवाईसाठी मोदींनी पवारांना पाचारण केले ते का बुआ?

अगदी आतल्या गोटातली माहिती नसेल तर एखादी लींक वगैरे शेअर करु शकाल का?
धन्यवाद.

बोका-ए-आझम's picture

7 Oct 2016 - 3:05 pm | बोका-ए-आझम
कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Oct 2016 - 3:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

कृषीमंत्रालय महत्वाचे नाही म्हणता ?? अजून कियी लवासा झाले तयार की मग महत्वाचे वाटू लागेल?

संदीप डांगे's picture

7 Oct 2016 - 3:11 pm | संदीप डांगे

आत्ता कोण आहेत कृषिमंत्री? महत्वाचे नसतील ते मंत्रीमहोदय ;)

नाव आठवत नाही... गुरुजींना पण सांगता येणार नाही लवकर..

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 3:31 pm | श्रीगुरुजी

राधामोहन सिंग हे केंद्रीय कॅबिनेट कृषी मंत्री असून या खात्यासाठी अजून ३ राज्यमंत्री सुद्धा आहेत. मुळात हे खाते फारसे महत्त्वाचे नसल्याने पोलिटिकल हेवीवेट्स कधीही हे खाते स्वीकारत नाहीत. पोलिटिकल लाईटवेट्स किंवा ज्यांना नाईलाजाने मंत्रीमंडळात घ्यावे लागते अशांना कृषी, अवजड उद्योग, क्रीडा इ. दुय्यम खाती दिली जातात.

भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे म्हणून तर गावाकडे उगाच शेतकरी लोक या सरकारला शिव्या देत नाहीत.

साधं उधाहरण दुधाचं घेतला तर रु.25/ लिटर सरकारी रेट असताना हे आल्यावर रु.16-17 झाला. शेणाचे सुद्धा पैसे गवळ्यांकडे राहत नाहीत.

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 3:12 pm | श्रीगुरुजी

सत्तेच्या राजकारणात कृषी मंत्रालय महत्त्वाचे समजले जात नाही. पंतप्रधानाखालोखाल गृह, अर्थ, परराष्ट्र व्यवहार व संरक्षण ही चारच खाती याच क्रमाने महत्त्वाची समजली जातात. त्यामुळे कोणताही खासदार या ४ पैकी एक खाते मिळविण्याची धडपड करीत असतो. महाराष्ट्रात सुद्धा भाजपमधील व सेनेमधील अनेकांना गृहमंत्रीपद हवे होते. परंतु फडणविसांनी चतुराईने हे खाते स्वतःकडेच ठेवले आहे.

गुर्जींच्या म्हण्या प्रमाणे कृषी मंत्रीपद हे खूपच हलक्या दर्जाचे आणि बिन कामाचे खाते आहे. मान्य आहे. पण देश आणि देशातील नागरिक फक्त वित्त, गृह, संरक्षण आणि पराष्ट्र व्यवहारा वरतीच देशात जिवंत आहेत अशी यांची धारणा झालेली झालेली दिसतेय. शेतकऱ्याचे काय नेहमीचेच रडगाणे आहे, अशी पक्की समजूत काही लोकांची झालेली दिसत आहे. असो

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 3:44 pm | श्रीगुरुजी

हलक्या दर्जाचे किंवा बिनकामाचे खाते असे शब्द माझे नाहीत. तुमचे शब्द माझ्या तोंडात टाकू नका. मी फक्त एवढंच सांगतोय की भारतीय राजकारणात अर्थ, गृह इ. च्या तुलनेत कृषी खाते हे दुय्यम किंवा कमी महत्त्वाचे समजले जाते.

दर्जा काय आणि महत्वाचे काय, मतीतअर्थ तर तोच आहे ना. शरद पवारांकडे एकदम खालच्या क्लास च खातं होतं, एवढ्यासाठीच तर लोकांचा आटापिटा चालू दिसतोय.

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 3:56 pm | श्रीगुरुजी

खालच्या क्लासचं नाही हो, सत्तेच्या राजकारणात दुय्यम किंवा फारसं महत्त्वाचं नसलेलं असा त्याचा अर्थ आहे.

काय करतो केंद्रीय कृषिमंत्री? Rural Development आणि Agriculture एकत्र असायला हवेत आणि agriculture आणि food वेगळे असायला हवेत ही जुनी मागणी आहे. FCI मध्ये अन्नधान्याचे पडून असणारे आणि सडणारे साठे आणि किरकोळ स्तरावर होणारी भाववाढ हेच कुठल्याही केंद्रीय कृषीमंत्र्याचं आजवरचं कर्तृत्व आहे. Correct me if I am wrong.

विशुमित's picture

7 Oct 2016 - 3:39 pm | विशुमित

बोका साहेब- पवारांच्या कृषिमंत्रिपदाच्या काळामध्ये- अन्न धान्य उत्पादकता, फळबागा, फुलशेती, मत्यशेती, वेगवेगळ्या संशोधन, ऊस उत्पादकांचे कल्याण, डाळिंब-द्राक्ष- सफरचंद- आंबे-इ फळांसाठी जागतिक बाजारपेठेत शिरकाव करण्या साठी घेतलेले कष्ट उल्लेखनीय आहे. एक विदा देतो आता आणखी ही देऊ शकतो. http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=80384

पवारांबाबत फक्त द्वेष दिसतो लोकांच्या मनामध्ये त्याची खंत वाटते.

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 3:46 pm | श्रीगुरुजी

हे प्रसिद्धीपत्रक पवारांच्याच (Press Information Bureau, Government of India, Ministry of Agriculture) खात्याने प्रसिद्ध केले आहे. सुज्ञांस अधिक सांगणे नलगे!

म्हणजे हे खोटे किंवा अतिरंजित आहे, असं तुम्हाला म्हणायचं का?

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 3:53 pm | श्रीगुरुजी

सुज्ञांस अधिक सांगणे नलगे!

संदीप डांगे's picture

7 Oct 2016 - 3:55 pm | संदीप डांगे

हे हे, हा हा, हो हो!

गुरुजींचा हा प्रतिसाद सर्वांनी सेव्ह करून ठेवा, वारंवार गरज पडणार आहे यापुढे! ;)

मला वाटते या पुढे गुरुजींच्या प्रत्येक प्रतिसादाला मला फक्त एवढाच प्रतिवाद करावा लागेल..

"" एक हास्यापद रडका प्रतिसाद"'"

("श्रीगुरुजी हालके घ्या पण मी तसं करणार नाही कारण अजून तरी सुसंस्कृतपणा टिकून आहे)

श्रीगुरुजी's picture

8 Oct 2016 - 12:14 am | श्रीगुरुजी

हे हे, हा हा, हो हो!

गुरुजींचा हा प्रतिसाद सर्वांनी सेव्ह करून ठेवा, वारंवार गरज पडणार आहे यापुढे! ;)

हरकत नाही. करा सेव्ह. आवश्यकता भासल्यास खालील वाक्ये सुद्धा सेव्ह करून ठेवा.

पवारांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे व वर्तमानात आणि भविष्यात त्यांना व त्यांच्या पक्षाला काहीही भवितव्य नाही. अर्थात राष्ट्रवादीतील नेत्यांनी (पवारांसहीत) राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात प्रवेश केला तर त्यांचे भवितव्य बदलू शकते. पण ते राष्ट्रवादीलाच चिकटून राहिले तर त्यांना काहीही भवितव्य नाही.

संदीप डांगे's picture

8 Oct 2016 - 7:53 am | संदीप डांगे

आप समझे नही,
"मंत्र्यांच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही पत्रकाला खरे मानू नये" ह्यासाठी तुमचा प्रतिसाद जपून ठेवूया म्हटले,

श्रीगुरुजी's picture

8 Oct 2016 - 3:28 pm | श्रीगुरुजी

"मंत्र्यांच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही पत्रकाला खरे मानू नये" ह्यासाठी तुमचा प्रतिसाद जपून ठेवूया म्हटले,

"मंत्र्यांच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही पत्रकाला डोळे झाकून खरे मानू नये" असा त्याचा अर्थ होता.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Oct 2016 - 4:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

बरोबर, फक्त मंत्री कोण होता त्यावर तुमचे डोळे उघडे होते की झाकलेले होते हे तुम्हीही नाही तिसरेच कोणीतरी ठरवणार! अन त्यांनी दिलेला निर्वाळा नाही ऐकला तर तुम्ही एकतर अंधभक्त म्हणवले जाल किंवा सिक्युलर किंवा ते कोण ते क्लिंटन का कोण म्हणतात तसे बुबुडा का काय म्हणतात ते म्हणवले जाल! तात्पर्य काय बेंबट्या कुंपणावर बसणे आवडत असले तर बुडास तारा रुतत राहतात म्हणून रडण्यात हशील नाही ;)

श्रीगुरुजी's picture

9 Oct 2016 - 2:54 pm | श्रीगुरुजी

बरोबर, फक्त मंत्री कोण होता त्यावर तुमचे डोळे उघडे होते की झाकलेले होते हे तुम्हीही नाही तिसरेच कोणीतरी ठरवणार! अन त्यांनी दिलेला निर्वाळा नाही ऐकला तर तुम्ही एकतर अंधभक्त म्हणवले जाल किंवा सिक्युलर किंवा ते कोण ते क्लिंटन का कोण म्हणतात तसे बुबुडा का काय म्हणतात ते म्हणवले जाल! तात्पर्य काय बेंबट्या कुंपणावर बसणे आवडत असले तर बुडास तारा रुतत राहतात म्हणून रडण्यात हशील नाही ;)

पवारांच्या खात्याच्या प्रसिद्धीपत्रकावरून काही वर्षांपूर्वी घडलेली सत्य घटना आठवली. २००४-२००९ या काळात लालू रेल्वेमंत्री होता. २००५ पासून २००९ पर्यंत रेल्वे खात्याच्या अंदाजपत्रकात प्रचंड नफा दाखविला गेला. विशेषत: आधीच्या अनेक वर्षांच्या कालखंडात रेल्वे अंदाजपत्रकात कायमच तोटा दिसायचा. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे नफ्यात आल्याने लालूवर स्तुतीसुमनांचा वर्षाव सुरू झाला. लालूच्या दूरदृष्टीचे व मॅनेजमेंट स्किल्सचे अग्रलेखातून कौतुक करताना संपादकांच्या लेखण्या झिजल्या. लालू दिसायला व बोलायला गावंढळ असला तरी अत्यंत बुद्धिमान असून त्याच्याकडे कमालीचे व्यवस्थापन कौशल्य आहे असे अनेकजण प्रमाणपत्र देऊ लागले. कहर म्हणजे आयआयएम (अहमदाबाद) या देशातील प्रथम क्रमांकाच्या व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात लालूला व्याख्यानासाठी निमंत्रित करून लालूचा सन्मान करण्यात आला (त्यावेळी मला आयआयएम मधील विद्यार्थ्यांची व प्राध्यापकांची कीव वाटली होती). लालूला हॉर्वर्ड विद्यापीठाने व्याख्यानासाठी सन्मानपूर्वक निमंत्रण पाठविले आहे असेही वृत्तपत्रात छापून येत होते. एकंदरीत लालू म्हणजे मॅनेजमेंट गुरू म्हणून प्रसिद्धीस पावला.

२००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत लालूने काँग्रेसबरोबर युती न करता स्वतंत्र निवडणुक लढविली. त्यात लालूच्या खासदारांची संख्या २२ वरून ४ वर आली व कॉंग्रेसची संख्या १४५ वरून २०६ वर पोहोचली. आता काँग्रेसला लालूची गरज राहिली नसल्याने लालूला मंत्रीमंडळात घेतले गेले नाही. युपीए-२ मध्ये ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्या. रेल्वे खात्याचा पहिला अर्थसंकल्प मांडताना त्यांच्या लक्षात आले की लालूने मागील ५ वर्षे आकडेवारीत गडबड करून अर्थसंकल्पात खोटे आकडे टाकून रेल्वे नफ्यात आहे असे दाखविले होते. अर्थसंकल्पातले आकडे व प्रत्यक्षातले आकडे यात प्रचंड तफावत होती. आता अर्थसंकल्प मांडायचा तर त्यात खरे आकडे टाकावे लागून त्यात तोटा दिसणार व केवळ एक वर्षात तुफान नफ्यात असणारी रेल्वे सेवा ममता बॅनर्जींनी तोट्यात नेली असा त्यांच्यावर दोषारोप होणार हे ओळखून ममता बॅनर्जींनी श्वेतपत्रिका काढून खरे आकडे जाहीर केले व लालूचे पितळ उघडे पाडले.

आता लक्षात आलं असेल की मंत्र्याच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांवर व प्रसिद्धीपत्रकांवर डोळे झाकून का विश्वास ठेवू नये. तो मंत्री जर कै. मधू दंडवते यांच्यासारखा अत्यंत स्वच्छ व प्रामाणिक असेल तर असा विश्वास ठेवायला अजिबात हरकत नाही. पण लालू, पवार इ. मंत्र्यांच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांवर मिठाची चिमूट घेऊनच बघावे लागेल.

संदीप डांगे's picture

9 Oct 2016 - 5:43 pm | संदीप डांगे

एखादं उदाहरण भाजप मंत्र्यांचे नाही आहे का?

तुम्ही शोधा की, सापडल्यावर गुरुजींना "मिपावरून पायउतार व्हा" असे सांगूया. ;)

संदीप डांगे's picture

10 Oct 2016 - 2:01 am | संदीप डांगे

आम्हाला शोधायला गुरुजींइतका रिकामा वेळ असता तर... काश!!

गुरुजींचे लै कौतुक वाटते, इतक्या लोकांची इतकी लफडी इतक्या अचूक घटनां-तारखांसकट लक्षात ठेवतात आणि क्षणाचाही विलंब लागू न देता भदाभदा ओतत जातात. भारी!!!

बाकी, कोणाला पायउतार व्हा सांगणारे आपण कोण राव? समझदार को इशारा काफी.
आपण फकस्त इशारे करायचे काम इमानेइतबारे करायचे. =))

श्रीगुरुजी's picture

10 Oct 2016 - 8:22 am | श्रीगुरुजी

>>> आम्हाला शोधायला गुरुजींइतका रिकामा वेळ असता तर... काश!!

+१

खरं आहे तुमचं म्हणणं. आम्ही रिकामटेकडे असल्याने आमच्याकडे रिकामा वेळ भरपूर आहे हे सर्वांना ठाऊक आहे.

तुम्ही यच्चयावत प्रत्येक धाग्यावर अनेक टेराबायटी प्रतिसाद लिहिण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यात व्यस्त असता. त्यामुळे माहिती शोधण्यासाठी पुरेसा रिकामा वेळ तुम्हाला मिळू शकत नाही याची सर्वांना जाणीव आहे.

संदीप डांगे's picture

10 Oct 2016 - 9:11 am | संदीप डांगे

तुम्ही यच्चयावत प्रत्येक धाग्यावर अनेक टेराबायटी प्रतिसाद लिहिण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यात व्यस्त असता

>>>> काहीही खोटं बोलू नका गुरुजी, आधी सिद्ध करा बघू वरचं विधान कि आम्ही यच्चयावत प्रत्येक धाग्यावर अनेक टेराबायटी प्रतिसाद देत असतो ते!

श्रीगुरुजी's picture

10 Oct 2016 - 2:59 pm | श्रीगुरुजी

त्यात काय सिद्ध करायचंय. सगळ्यांनाच माहिती आहे ते. तरीसुद्धा पुरावेच हवे असतील तर देतो पुरावे.

सहर्ष सादर करीत आहोत नामदार श्रीमान संदीप डांगे यांच्या टेराबायटी प्रतिसादांच्या मालिकेतील प्रथम पुष्प -

http://www.misalpav.com/comment/884032#comment-884032

संदीप डांगे's picture

10 Oct 2016 - 10:46 pm | संदीप डांगे

अहो गुरुजी, "यच्चयावत प्रत्येक धाग्यावर" ह्याचा अर्थ कळतो का, कि उचलले बोट आणि निघाले बडवत किबोर्ड?

मी लिहितोच टेराबायटी, त्यात काय लाजायचं? तुम्ही फक्त एवढं सिद्ध करा की "मिपाच्या यच्चयावत प्रत्येक धाग्यावर".

श्रीगुरुजी's picture

10 Oct 2016 - 11:16 pm | श्रीगुरुजी

तेच सिद्ध करतोय की. टेराबायटी प्रतिसादांचं रोज एक उदाहरण देणार आहे.

संदीप डांगे's picture

12 Oct 2016 - 10:52 am | संदीप डांगे

ओके! माझं विधान सिद्ध करताय.. । ;)

आणि माझी जाहिरातही!!! =))

श्रीगुरुजी's picture

12 Oct 2016 - 2:44 pm | श्रीगुरुजी

वेगळी जाहिरात करण्याची गरजच नाही. तुमचे असंख्य टेराबायटी प्रतिसाद त्यासाठी पुरेसे आहेत.

diggi12's picture

19 Sep 2024 - 1:51 pm | diggi12

??

संदीप डांगे's picture

7 Oct 2016 - 3:53 pm | संदीप डांगे

विरोधी पक्षाचे व नेत्याचे जे चांगले आहे ते चांगले म्हणायला जीभ अडखळणे आणि जे चुकीचे ते तिखटमीठ लावून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणे हे 'सर्वच' राजकीय पक्षांचे गुण असतात,

पण एक सामान्य नागरिक म्हणून निरक्षीर विवेकाची अपेक्षा असते तेही हल्ली पूर्ण होत नाही,

मी काही भाजप नेते व काही काँग्रेस नेते ह्यांच्यासोबत काही विशिष्ट प्रसंगी काम केले आहे, नेते मंडळींची चांगली कामे पुढे येत नाहीत हि खंत आहे, 'कोणत्याही' नेत्याला सामान्य जनता विरोधचयच नजरेतून बघायला लागली तर कठीण होत जाते,

विशुमित's picture

7 Oct 2016 - 3:57 pm | विशुमित

मलाही तेच म्हणायचं आहे.

दुसऱ्याला कमी करून आपण मोठे होत नसतो, त्या दोन काड्यांची गोष्ट शाळेत ऐकली होती.

अप्पा जोगळेकर's picture

7 Oct 2016 - 4:08 pm | अप्पा जोगळेकर

हा प्रतिसाद पवारांच्या काँटेक्स्ट मधे आहे का ? तसे असेल तर पवारांचे कोणते गुण भारतीय किंवा महाराष्ट्रीय राजकारणाला दिशा देऊन गेले यावर प्रकाश टाकाल का ?

नाखु's picture

7 Oct 2016 - 4:16 pm | नाखु

महाराष्ट्रीय राजकारणाला दिशा देऊन गेले यावर प्रकाश टाकाल का ?

नसलयास पक्षी महाराष्ट्रीय राजकारणाला (दु)र्दशा देऊन गेले यावर प्रकाश टाकाल का ?

साठीही चालेल.

मीही पवार पंप्र व्हावेत असे (सन १९९० पर्यंत अगदी ) वाटणारा एक होतो.

विशुमित's picture

7 Oct 2016 - 4:17 pm | विशुमित

ह्या धाग्यावर नाही...

येईल येईल लवकर येईल..!!

पाणी घातलेलं दूध प्यायची एवढी सवय झालेली आहे लोकांना की नीरक्षीरविवेक वगैरे गोष्टी बाराच्या भावात गेलेल्या आहेत. शिवाय मोदींनी सर्जिकल स्ट्राईक हा राजकीय फायद्यासाठी आणि ब्रँड मोदीची पडझड रोखण्यासाठी केला वगैरे मत जर प्रसारमाध्यमं व्यक्त करत असतील तर लोक्स आपल्याला हवे तेच तर्क काढणार आणि मांडणार. नीरक्षीरविवेक हा दोन्ही बाजूंनी असावा लागतो. मोदींना शिव्या घालण्याला निःपक्षपातीपणा म्हणणं आणि दुसरीकडे नीरक्षीरविवेकाची अपेक्षा करणं हा बावळटपणा आजकाल राहुल गांधी पण करत नाहीत. ;)

संदीप डांगे's picture

8 Oct 2016 - 7:42 am | संदीप डांगे

अंदाधुंद प्रतिसाद, मी व्यक्त केलेले मत आणि तुमचा प्रतिसाद याचा काहीच संबंध नाही, ;)

असो!

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Oct 2016 - 4:22 pm | अनिरुद्ध.वैद्य

शेतकरी आत्महत्या रोखण्याचे त्यांचे प्रयत्न वादातीत आहेत.

बोका-ए-आझम's picture

7 Oct 2016 - 9:29 pm | बोका-ए-आझम

पवारांबाबत फक्त द्वेष दिसतो लोकांच्या मनामध्ये त्याची खंत वाटते

त्याला जबाबदार ते स्वतः आहेत.

पवारांच्या कृषिमंत्रिपदाच्या काळामध्ये- अन्न धान्य उत्पादकता, फळबागा, फुलशेती, मत्यशेती, वेगवेगळ्या संशोधन, ऊस उत्पादकांचे कल्याण, डाळिंब-द्राक्ष- सफरचंद- आंबे-इ फळांसाठी जागतिक बाजारपेठेत शिरकाव करण्या साठी घेतलेले कष्ट उल्लेखनीय आहे.

हे कष्ट पवारांनी स्वतः घेतले की त्यांच्या मंत्रालयात काम करणाऱ्या अधिका-यांनी घेतले? बरं, यात सडलेल्या धान्याची दारु बनवायचा प्रतिसाद कसा नाही? आणि सर्वात शेवटचं - एक कृषीमंत्री म्हणून हे करणं पवारांचं कामच होतं. काय उपकार केले का? किंवा आमच्या अकोल्याच्या भाषेत - काय उखाडलं बे ?

संदीप डांगे's picture

8 Oct 2016 - 7:47 am | संदीप डांगे

एक कृषीमंत्री म्हणून हे करणं पवारांचं कामच होतं. काय उपकार केले का? किंवा आमच्या अकोल्याच्या भाषेत - काय उखाडलं बे ?

^^^
हा पण प्रतिसाद सेव्ह करून ठेवतो, भाजपच्या कोणत्याही केंद्रीय व राज्य मंत्र्याने यापुढे अमूक केले तमुक केले म्हटले की असेच म्हणता येईल, काय म्हणता?

बोका-ए-आझम's picture

8 Oct 2016 - 9:09 am | बोका-ए-आझम

जोपर्यंत लोकांची वृत्ती अशी demanding होत नाही, तोपर्यंत लोकप्रतिनिधी, मग ते कुठल्याही पक्षाचे का असेना, काम करणार नाहीत हे तर तुम्हीही मान्य कराल.जर लोकशाहीमध्ये लोक अंतिम सत्ताधारी आहेत तर असले appraising प्रश्न विचारायलाच पाहिजेत. पण असेच प्रश्न इतर पक्षांनाही विचारा. 'पक्ष'पात करु नका. Is it a fair expectation?

विशुमित's picture

8 Oct 2016 - 10:04 am | विशुमित

सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केला का सैन्यांनी?

मग एवढी पोस्टर बाजी कशा साठी?

http://www.ndtv.com/india-news/pms-message-yet-to-reach-up-as-bjp-plans-...

सर्जिकल स्ट्राईक करून मोदींनी आणि भाजप ने उपकार नाही केले देशावर.
त्या सरकारच्या **डा ला पेट्रोल लावल्याशिवाय काम करणारच नाही का?

शिव्या देण्यामुळे तुमचंच frustration समोर येतंय हे लक्षात येतंय का?
Surgical Strike करुन मोदींनी देशावर उपकार केले असं कुठे म्हटलंय? त्यांनी पंतप्रधान म्हणून स्वतःचं काम केलंय. पोस्टर लावण्याची गोष्ट असेल तर त्यात चुकीचं काय आहे? जर काँग्रेसने केलं असतं तर त्यांनी पोस्टर्स छापली नसती असं जर तुमचं म्हणणं असेल तर बोलणंच खुंटलं. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या दुर्दैवी हत्या ' मां बेटे का यह बलिदान, नही भूलेगा हिंदुस्तान ' अशा घोषणा देऊन काँग्रेसवाले अजूनही वापरतात; स्वातंत्र्यलढ्यातली काँग्रेस आणि आत्ताचा काँग्रेस पक्ष हे पूर्णपणे वेगळे असतानाही ' आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं' असं धादांत खोटं बोलतात ते चालतं, मग भाजपच्या पंतप्रधानाने घेतलेल्या निर्णयामुळे झालेल्या सकारात्मक गोष्टीचा जर त्यांच्या पक्षाने राजकीय फायदा उठवायचा प्रयत्न केला तर त्यात चुकीचं काय आहे?
जे दोन वर्षे सत्तेवर असलेला पक्ष करु शकला ते १० वर्षे सत्तेवर असलेला आणि त्याही आधी सत्ता उपभोगणारा पक्ष का करु शकला नाही? सैन्य तेच होतं, त्याची क्षमताही तीच होती. एका पक्षाने इच्छाशक्ती दाखवली, ते त्याचा फायदा उठवणार. दुस-याने संधी असताना दवडली. ते आरडाओरडा करणार. हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेचं आश्चर्य वाटलं नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Oct 2016 - 11:35 am | कैलासवासी सोन्याबापु

बरोबर! सैन्य सत्ताधारी पक्षाची बटीक असल्याचे ट्रेंड सेट करणे म्हणजे अत्युच्च देशभक्ती आहे, जय हिंद!.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Oct 2016 - 11:37 am | कैलासवासी सोन्याबापु

जे चुकीचे आहे त्याचे समर्थन तुमच्याकडून तरी अपेक्षित नव्हते बोक्याभाऊ, असो. बाजू निवडायची अहमहमिकाच लागली आहे त्याला कोण लय करणार, वाईट वाटले मनापासून इतकेच म्हणतो :(

' सैन्य ही सत्ताधारी पक्षाची बटीक आहे ' या तुमच्या उद्गारांबद्दल सखेद आश्चर्य वाटलं. शेवटी लोकशाहीत सैन्य हे लोकप्रतिनिधींनी बनवलेल्या सरकारच्या आदेशाप्रमाणे चालतं. सैन्याने सरकारचे आदेश पाळणे म्हणजे सैन्य बटीक होणं आहे का हे आपण सांगावे. आपल्याला अनुभव आहे. १९७१ मध्ये बांगलादेशसाठी लढताना आणि १९८६-८८ मध्ये श्रीलंकेत लढताना आपलं सैन्य बटीक होतं का हेही जाता जाता सांगून टाकावे. तुमच्यामते जर कोणता पक्ष सत्ताधारी आहे यावर हे अवलंबून असेल तर तसंही सांगा म्हणजे यापुढे गैरसमज होणार नाही. :(

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Oct 2016 - 1:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

लोकशाही तत्वधनात तुम्ही वर्णन केलेला सैन्याचा रोल ह्यात असहमती दर्शवण्यालायक काहीच नाही हे आधीच स्वच्छ शब्दात मान्य करतो,

"सैन्य हे सरकारचे बटीक आहे" हे विधान का आले त्याच्याकडे जरा वळतो आता मी.

पहिली गोष्ट, तुम्ही जे बांगलादेश युद्ध किंवा इतर युद्धाचे रेफरन्स देत आहात ते इथे गैरलागू होतात कारण सर्जिकल स्ट्राईक अन फुल स्केल वॉर ह्यात फरक असतो (तो वरती एक्का काकांनी उत्तमरीत्या विशद केला आहेच) सर्जिकल स्ट्राईकवर एक राजकारणाचे सावट कायम असते, ह्याचे भान कायम ठेवायला लागते, सुदैवाने मोदींना त्या बाबीची पूर्ण जाण आहेच हे ही मी नमूद करतो, फक्त त्या बाबतीत त्यांची पार्टी महामूर्ख आहे हे तुम्ही मान्य कराल काय?

क्षणभर जर 71 वगैरे युद्धे अन त्याचे राजकीय वापर जे तुम्ही सांगताय ते valid धरले तर इथेही धरायला हरकत नाही, पण किती?? हा कळीचा मुद्दा आहे, राजकीय पोस्टरबाजी इतकी करावी का ? हा पण मुद्दा आहे , काल कामानिमित्त आग्रा मार्गे हिंडन एअरबेसला गेलो होतो, आग्रा महानगर बीजेपी ने जी आचरट पोस्टर लावली आहेत त्याचे मला दुर्दैवाने फोटो घेता आले नाहीत, पण त्या पोस्टर्सवर कुठेही सैन्याला धन्यवाद आभार वगैरे नाहीये तर फक्त अन फक्त मोदी आहेत, ह्या दळभद्री उद्योगांनी कमीपणा कोणाला येतोय? इतका की शेवटी मोदींना त्यांच्या मंत्री अन कार्यकर्त्यांना "इनफ ऑफ चेस्ट थांपिंग नाऊ" सांगावे लागले असावे?? ज्या पार्टीला आपण जगातली सर्वात मोठी कॅडर बेस्ड पार्टी असल्याचा अभिमान आहे तिला एका गावातली पोरेटोरे सांभाळता येऊ नयेत? बरं परत एक मुद्दा मांडतो, दरवेळी जर बीजेपी ने काही चूक केल्यास काँग्रेसनेही हेच केले होते असे उद्धृत करावे लागले तर माझ्यामते त्याच्याइतका पॉलिटिकली इनकरेक्त स्टँड दुसरा नसावा कारण जनतेने काँग्रेसला कंटाळून बहुमत दिलेले आहे, दिल्लीत बसून प्रतिकाँग्रेस व्हायला नाही हे आपण एकमेकांना अन बीजेपीला सांगून उपयोग नाही असेही नोंदवतो. बाकी दिल्लीकर जाणोत

बाकी सर्जिकल स्ट्राईक आणि फुल स्केल वाॅर यात फरक आहे हे मान्य आहेच, पण दोन्हीही वेळा हे निर्णय लोकनियुक्त सरकारचे असतात या संदर्भात ते उदाहरण आहे, बाकी काही नाही.
Real reason why Cong never took credit for pre-2014 surgical strikes in Pak
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/heres-the-r...

via The Economic Times App(Download Now):
http://ecoti.in/etapps

बाकी भाजप हा काही धुतल्या तांदळासारखा पक्ष नाही, पण जेव्हा ते काही चुका करतात तेव्हा ज्या पद्धतीने त्या media मध्ये highlight होतात त्यावरून media चा anti-BJP bias स्पष्टपणे दिसतो. इतर पक्षांनी असं करूनही भाजपने ती चूक भारतीय राजकारणात पहिल्यांदाच केल्याचा जो आव आणला जातो ते खटकतं. इथे मिपावरही तसंच होतं. लोकांनी भाजपच्या चुका, घोडचुका जरुर दाखवाव्या पण मग दुस-या पक्षांबाबतही तसं वागावं. भाजपच्या चुका दाखवायच्या आणि दुस-या पक्षांच्या चुका दाखवल्या की भक्त, नमोरुग्ण असे शेरे मारायचे याला अर्थ नाही. किंवा मग सरळ आपण biased आहोत हे मान्य करावं. निस्पृह असल्याचे दावे करु नयेत. (हे अर्थातच तुम्हाला उद्देशून नाही. प्रतिसाद जरी तुम्हाला असला तरी.)

अर्धवटराव's picture

8 Oct 2016 - 11:54 am | अर्धवटराव

तवा गरम असेल तर पोळी भाजणे हा राजकारणाचा गुण आहे. मागच्या काहि दिवसांमधे अनेकवेळा बॅकफुटवर गेलेलं सरकार आणि पक्ष आल्या संधीचं सोनं लुटायला बघतय हे दुर्दैवी असलं तरी स्वाभावीक आहे (फार काहि दुर्दैवीसुद्धा नाहि... राजकारणातली नैतिकता स्वच्छ व्हायला अजुन बरच साबण घासायचं आहे भारताला)

सुबोध खरे's picture

8 Oct 2016 - 12:07 pm | सुबोध खरे

बोका साहेब
भाजपने या बातमीचा राजकीय लाभ उठवावा कि नाही हा प्रश्न वेगळा आहे ( कोणताही राजकीय पक्ष त्याचा फायदा उठवणार नाही असे होणारच नाही) परंतु अजून तशी वेळ आलेली नाहि. हा मामला थंड होऊ द्यायला हवा होता. पाकिस्तानी लष्कर याचे काय उत्तर देते आहे ते पाहणे आवश्यक आहे. आणि या राजकीय धुरळ्यामुळेच संजय निरुपम किंवा केजरीवाल सारखे लोक लष्करावर उघडपणे अविश्वास दाखवत आहेत.
राजकीय इच्छाशक्ती मोदी साहेबानी दाखवली हि वस्तुस्थिती. अन्यथा आता त्यांच्या वर टीका करणारे मिपावरील हेच लोक कुठे गेली तुमची ५६ इंची छाती म्हणून विचारत होते. आता त्याला उत्तर मिळाले म्हणून हि कोल्हेकुई चालू आहे.
तरीही हि वेळ योग्य नाही असेच मी म्हणेन.

बोका-ए-आझम's picture

8 Oct 2016 - 12:50 pm | बोका-ए-आझम

हे मला सांगून काय फायदा आहे? भाजपची राजकीय धोरणं मी ठरवतो का? मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. हा सर्जिकल स्ट्राईक होण्याआधी मिपावर उरी हल्ल्यासंदर्भात जो धागा धर्मराज मुटकेंनी काढलेला आहे त्यावर एका प्रतिक्रियेत मी स्पष्टपणे म्हटलं आहे की उत्तर प्रदेशात निवडणुका असल्यामुळे आणि त्या महत्वाच्या असल्यामुळे सरकारला उरी प्रकरणावर काहीतरी ठोस कृती करावीच लागेल. कुठलाही राजकीय पक्ष हा त्याच्यासंदर्भात होणाऱ्या सकारात्मक गोष्टींचा राजकीय फायदा उचलण्याचा किंवा पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोच. ते नाकारणं चुकीचं आहे. जर कुणाचा दोष असला तर तो लोकशाही आणि त्याच्या अनुषंगाने निवडणूक आणि ती जिंकणं या ज्या अपरिहार्य गोष्टी आहेत त्याचा आहे. आज भाजप आहे, उद्या काँग्रेस असती तरी ते असंच वागले असते याबद्दल मला खात्री आहे. आपल्या नैतिकतेच्या कल्पना आणि राजकीय पक्षांचे आडाखे यात फरक असल्यामुळे आपल्याला धक्का बसत असेल, पण मी पत्रकारिता करत असताना जे थोडंफार राजकारण पाहिलंय त्यावरून मला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही.

विशुमित's picture

8 Oct 2016 - 3:44 pm | विशुमित

<<<<<<शिव्या देण्यामुळे तुमचंच frustration समोर येतंय हे लक्षात येतंय का?>>>>

साहेब तुम्हीच शिव्या देताय मी नाही--- आमच्या कडे उखडण्याला उपटणे म्हणतात., हे लक्षात येतंय का????

बोका-ए-आझम's picture

10 Oct 2016 - 4:22 pm | बोका-ए-आझम

तर मग ** असे दोन तारे का टाकलेत? सरळसरळ जो शब्द वापरायचा होता तो वापरायचा. मी जो शब्द वापरला आहे तो शिवी नसल्यामुळे व्यवस्थित पूर्णपणे वापरला आहे.

श्रीगुरुजी's picture

8 Oct 2016 - 3:37 pm | श्रीगुरुजी

सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केला का सैन्यांनी?

मग एवढी पोस्टर बाजी कशा साठी?

http://www.ndtv.com/india-news/pms-message-yet-to-reach-up-as-bjp-plans-...

या विशिष्ट लिंकवर एक पूर्ण पोस्टर आहे व दुसर्‍या एका फलकाचा थोडासा भाग आला आहे. दोन्ही फलकांवर जे लिहिले आहे ते अत्यंत अस्पष्ट असल्यामुळे नक्की काय लिहिले आहे ते समजत नाही.

पहिल्या पूर्ण फलकावर मोदी व पर्रीकरांची चित्रे आहेत. परंतु त्यावर भाजप या पक्षाचे नाव व कमळ हे चिन्ह नाही. त्यामुळे हा फलक भाजपने लावलेला नाही असे दिसत आहे. दुसर्‍या फलकाचा जो अगदी थोडासा भाग दिसतो त्यात मोदींचे चित्र व त्याखाली कमळाचे चिन्ह एवढेच दिसते. उर्वरीत फलक दिसत नाही व त्यामुळे त्या फलकावर काय लिहिले आहे ते सांगता येत नाही. त्यामुळे ही पोस्टरबाजी भाजपने केली आहे असे दिसत नाही.

हा वृत्तांत 'एनडीटीव्ही'ने दिला असल्याने मिठाची चिमूट घेऊनच त्याकडे पहायला हवे. मुद्दाम अस्पष्ट चित्रे टाकून वाचकांची दिशाभूल करणे व भाजपबद्दल मत कलुषित करणे हाच त्यामागचा उद्देश दिसतो.

सर्जिकल स्ट्राईक करून मोदींनी आणि भाजप ने उपकार नाही केले देशावर.
त्या सरकारच्या **डा ला पेट्रोल लावल्याशिवाय काम करणारच नाही का?

कोण म्हणतंय मोदींनी किंवा भाजपने देशावर उपकार केले आहेत? जे केलंय ते त्यांचं कामच आहे व ते करायलाच हवं होतं. आणि **डा ला पेट्रोल लागल्याचं म्हणाल तर निदान पेट्रोल लागल्यावर तरी त्यांनी काम केलं. आधीच्या सरकारने तर आग लागून **ड पूर्ण जळून गेलं होतं तरी ते ढिम्म होते.

विशुमित's picture

8 Oct 2016 - 3:51 pm | विशुमित

म्हणजे NDTV सुद्धा खोटा आणि अतिरंजित चॅनेल म्हणायचं.

जी अगदी विश्वासू अशी वृत्त वाहिन्या असतील त्याची कृपया यादी देता का म्हणजे पुढे मला अडचण येणार नाही खरे खोटे करण्याची.

<<<<<<<<कोण म्हणतंय मोदींनी किंवा भाजपने देशावर उपकार केले आहेत?>>>

तुम्हीच. तुमच्या प्रत्येक प्रतिसादामध्ये.

बाकी हा प्रतिवाद बोका शेठना होता, तुम्ही त्यासाठी कष्ट घेतले अत्यानंद झाला .

श्रीगुरुजी's picture

8 Oct 2016 - 4:01 pm | श्रीगुरुजी

तुम्हीच. तुमच्या प्रत्येक प्रतिसादामध्ये.

कोणत्या प्रतिसादात? मोदींनी देशावर उपकार केले आहेत असे लिहिलेला एकतरी प्रतिसाद दाखवा.

म्हणजे NDTV सुद्धा खोटा आणि अतिरंजित चॅनेल म्हणायचं.

एनडीटीव्ही हे पराकोटीचे भाजपविरोधी चॅनेल आहे. भाजप विरोधी व्यक्तीना या वाहिनीवरून कायमच मोठे कव्हरेज मिळते. या चॅनेलची मते मिठाची चिमूट घेऊनच पहायला हवीत. तुम्ही वर दिलेल्या लिंकमध्ये अस्पष्ट फोटो का दिले असावेत हे सांगता का जरा? तसेच त्या फलकांवर भाजप किंवा कमळ नसताना सुद्धा ही पोस्टरबाजी भाजपचीच आहे असे ते कोणत्या आधारावर सांगतात?

युपिएच्या काळात "सर्जिकल स्ट्राईक्स" झाले नाहीत. जे काही झाले ते "जरा मोठ्या प्रमाणावर झालेली लाईन ऑफ कंट्रोल जवळची स्किर्मिशेश" होती; सर्जिकल स्ट्राईक ही विशिष्ट व्याख्या असलेली कारवाई असते; अश्या अर्थाची माहिती त्या काळात DGMO पदावर काम करणार्‍या लष्करी अधिकार्‍याने (ज्यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही प्रकारच्या कारवाया होतात) एका राष्ट्रिय वाहिनीवर दिली आहे.

त्या अधिकार्‍याच्या मते भारतिय सेनेने "काही दिवसांपूर्वीचे म्यानमार ऑपरेशन" आणि "आताचे पाकिस्तान ऑपरेशन" हे केवळ दोनच सर्जिकल स्ट्राईक्स आत्तापर्यंत केले आहेत.

म्यानमारमध्ये आपले सैन्य व म्यानमारचे सैन्य यांच्यामध्ये एक समन्वय होता. त्याविरुद्ध, पाकिस्तान ऑपरेशनमध्ये सहकार्य नसलेल्या (किंबहुना अत्युच्च्य पातळीवरच्या सामरिक तयारीत उर्फ रेड अ‍ॅलर्टमध्ये असलेल्या शत्रूच्या ताब्यातल्या) प्रदेशात घूसून २५० किलोमीटर लांबीच्या लाईन ऑफ कंट्रोलवरून ०.५ ते ३ किलोमीटर आतवर घूसून ७ ते ८ अतिरेकी तळ उद्धवस्त केले गेले आहेत. इतक्या मोठ्या स्तराचा आणि आवाक्याचा सर्जिकल स्ट्राईक यश्स्वीपणे करणे हे भारतालाच नव्हे तर सामरिक महासत्ता म्हणवणार्‍या देशानाही भूषणावह वाटेल.

दुसर्‍या एका मान्यवर सैन्यतज्ञाच्या मते हा सर्जिकल स्ट्राईक काही दिवसांनी देशोदेशीच्या लष्करी शिक्षणसंस्थांत "केस स्टडी" म्हणुन शिकवला जाईल.

गेल्या काही दिवसांत पाकिस्तानी सरकार आणि सैन्य यांच्याबद्दल ज्या बातम्या पाकिस्तानी व इतर माध्यमांत येत आहेत त्यावरून या सर्जिकल स्ट्राईकचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पुरावे बाहेर येत आहेत. विषेशतः पाकिस्तानी संसदेमधिल भाषणे; मुलकी सरकारच्या आणि सैन्याच्या (व विशेषतः ISI च्या) अधिकार्‍यांमधिल सभांचे तपशील; आणि एका वरिष्ठ पाकिस्तानी पोलिस अधिकार्‍याच्या केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये त्याच्या तोंडून मिळालेली माहिती; इत्यादींमुळे सर्जिकल स्ट्राईकसंबंधी अतीसंशयी लोकांचेही संदेह दूर झाले आहेत.

सर्जिकल स्ट्राईकची पहिली माहिती भारताच्या DGMO या उच्च्पदस्थ सैनिक अधिकार्‍याने दिली होती, त्यांची विश्वासार्हता आव्हान देण्यापलिकडची आहे. पाकिस्तानी मुलकी सरकार, सैन्य आणि ISI इत्यांदीसारखे खोटे बोलण्याची परंपरा भारतिय सैन्यात नाही, हे सांगायला नकोच. त्यामुळे जे झोपल्याचे सोंग घेऊन आपल्या स्वार्थी संकुचित हितसंबंधांसाठी अजून खुसपटे काढत आहेत, त्यांना जागे करण्याचे प्रयत्न करणे म्हणजे आपल्या वेडपटपणाचे प्रदर्शन करण्यासारखे होईल. आपली शक्ती फुका खर्च करण्याऐवजी त्यांच्या चालू असलेल्या अजेंड्याला अनुल्लेखाने मारणेच योग्य होईल.

सर्जिकल स्ट्राईकची माहिती/पुरावे अजिबात उघड करू नये असे मला वाटते, कारण...

१. पाकिस्तानी सैन्याला सर्जिकल स्ट्राईक होताना तर कळले नाहीच, पण "हा स्ट्राईक कसा काय झाला ?" हे पण त्यांना अजून उमगलेले नाही. या कारवाईला "अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू" हा इंग्लिश वाक्प्रचार चपखलपणे बसतो. थोडक्यात या सर्जिकल स्ट्राईकचे तंत्र भारतिय सेनेचे गुपित म्हणा, Intellectual Property Right (IPR) म्हणा, आहे. पाकिस्तानी सैन्याला येन केन प्रकारेण (स्वतःच्या र्‍हेटोरीकने किंवा उल्लू भारतीय वाचाळविरांच्या टीकाटीप्पणीने) याबद्दलची माहिती मिळाली तर हवी आहेच. कारण त्या माहितीचा उपयोग त्याला (अ) भविष्यातले सर्जिकल स्ट्राईक्स टाळण्याचे उपाय करायला आणि (आ) स्ट्राईक्स झालेच तर त्यांचा प्रतिकार करायला होईल.

२. याचा दुसरा अर्थ असा की, या स्ट्राईक्सची माहिती उघड करण्याने (अ) आपले भविष्यातले स्ट्राईक्स धोक्यात येतील व (आ) त्यातली गुपिते उघड झाल्यामुळे, स्ट्राईक करणार्‍या भारतिय सैनिकांच्या सुरक्षेला, आरोग्याला आणि जीवाला धोका वाढेल, हे नक्की.

३. आपल्या शक्तीबद्दल शत्रूला जेवढी कमी माहिती असते, तेवढा त्याच्या मनातला गोंधळ जास्त असतो आणि त्याच्यामध्ये यशाबद्दलची खात्री कमी राहते. "Keep them guessing." या तत्वामुळे मिळणारा वरचढपणा युद्धात बर्‍याचदा अस्त्र-शस्त्रांपेक्षा जास्त फायदा देऊन जातो.

=====================================

अवांतर : कारगिल युद्धात आपल्या सैन्याला "लाईन ऑफ कंट्रोल" चे जमिनीवर अथवा हवेत उल्लंघन करू नये असा सरकारच आदेश होता. त्यामुळे...

(अ) भारतिय स्थलसेनेला खडतर मार्ग चोखाळायला लागून त्यांचे काम कठीण झाले होते आणि
(आ) भारतिय वायूसेनेच्या कारवायांवर बंधने येऊन त्यांचेही काम कठीण झाले होते.

याचाच अर्थ असा की, "लाईन ऑफ कंट्रोलचे जमिनीवर अथवा हवेत उल्लंघन करू नये" ही अट त्यावेळेस नसती तर भारतिय सैनिकांची जीवितहानी, इजा व इतर सामरिक खर्च लक्षणीय प्रमाणात कमी झाला असता.

अप्पा जोगळेकर's picture

7 Oct 2016 - 4:39 pm | अप्पा जोगळेकर

या स्ट्राईक्सची माहिती उघड करण्याने (अ) आपले भविष्यातले स्ट्राईक्स धोक्यात येतील व (आ) त्यातली गुपिते उघड झाल्यामुळे, स्ट्राईक करणार्‍या भारतिय सैनिकांच्या सुरक्षेला, आरोग्याला आणि जीवाला धोका वाढेल, हे नक्की.
जर कधी पुरावे जाहीर झालेच तर ते बहुधा सेन्सर्ड असतील पण
१. ही कारवाई सैन्याने केली. सरकारने त्यासाठी आवश्यक तो पाठिंबा दिला. त्याबद्दल कौतुक आहेच. पण पुरावे सरकारने जाहीर केले तर उगाच सरकारने कारवाई केली असा मेसेज जाईल आणि सैन्याला या कारवाईसंदर्भात दिले जाणारे महत्व कमी होईल.
२. सैन्य कोणाही सोम्यागोम्याला अ‍ॅन्सरेबल आहे असा मेसेज जाईल. हेही चुकीचे आहे. (लादेनच्या कारवाईच्या चित्रफीती कोणीही न मागता उपलब्ध करुन दिल्या गेल्या.)

निदान यासाठी तरी पुरावे जाहीर होऊ नयेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Oct 2016 - 5:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

जर कधी पुरावे जाहीर झालेच तर ते बहुधा सेन्सर्ड असतील

(अ) अश्या कारवाईचे सेन्सर्ड पुरावे हे "डॉक्टर्ड" आहेत असे म्हणणे विरुद्ध पार्टीला सोपे असते (आणि पाकिस्तान तर १००% सबळ पुराव्याला, तो पुरावाच नाही असे म्हणतो असा आतापर्यंतचा अनुभव म्हणतो, नाही का? ) या प्रकरणात तर अधिकाधिक माहिती उघड व्हावी म्हणुन तो नकाराच्या अनेक क्लृप्त्या वापरेल हे सूर्याहून जास्त सत्य आहे !!

आणि

(आ) पुरेसे सबळ पुरावे देण्यामध्ये कारवाईची गुप्तता आणि प्रक्रिया उघड होते, जे करणे आत्मघातकी होईल. तज्ञ लोक शीत पाहून पूर्ण भाताचे पातेले ओळखतात, हे सांगायला नकोच !

++++++++++++++

लादेनच्या कारवाईच्या चित्रफीती कोणीही न मागता उपलब्ध करुन दिल्या गेल्या.

लादेनची कारवाई कही शेकडा किमी पाकिस्तानच्या हद्दीत शिरून केलेली होती. अशी कारवाई पाकिस्तानी सैन्यदलाच्या सहकार्याशिवाय होणे शक्य नाही. कारण देशाच्या इतक्या आत अनेक हेलिकॉप्टर्स शिरतात आणि त्यांचा सुगावा रडार्सच्या अनेक रांगांना लागू शकत नाही, इतकीही पाकिस्तानी फौज बुळी नाही !

पाकिस्तानी सैन्याकडे लादेनच्या घराचा पुरेसा पुरावा देऊन "ही कारवाई तुम्ही करा किंवा ती आम्हाला विनाअडथळा करू द्या" अन्यथा "तुमच्या अबोटाबाद या महत्वाच्या सैनिकी तळाशेजारी होणारी ड्रोन/रॉकेट हल्ल्याची तयारी ठेवा व त्यामुळे होणारी नामुष्की सोसा" असा काहीसा सज्जड दम दिला गेला होता असे अंदाज आहेत. पाकिस्तानी सैन्याकडे लादेनला मारण्याचे श्रेय/आरोप पचविण्याची ताकद/धमक/तयारी नव्हती. तसे केले असते तर पाकिस्तानातले सर्व रंगांचे सर्व अतिरेकी गट उलटून त्यांचे जानी दुष्मन होण्याचा धोका होता.

या ऑपरेशन नंतर कोणाही लष्करी अधिकार्‍यावर कामचुकारीच्या आरोपावरून कारवाई झाली नाही. फक्त लादेनच्या जागेची माहिती देणारा सिविलियन डॉक्टर कैदेत खितपत पडला आहे आणि अमेरिका त्याला सोडविण्याची अजून धडपड करत आहे; यावरून काही बोध होऊ शकतो.

राहता राहिला प्रश्न चित्रफितीचा. ती जाहीर केली किंवा न केली असती तरी तात्कालीक गदारोळ सोडता (आणि तो झालाच ! ) काही फार फरक पडला नसता. अमेरिकेने "बनवलेल्या" कोणत्या पुराव्याला कोणता महत्वाचा देश चुकीचा म्हणतो ? आणि जे चिल्लर लोक त्याला चुकीचा म्हणतात त्यांना भीक घालायची गरज अमेरिकेला वाटत नाही. "वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनच्या पुराव्यांच्या" आधारे इराकवरचा हल्ला केला गेला तेव्हा त्यांना कोणी फारसा विरोध केला नव्हता. इथे तर ओसामाचा खातमा व्हावा असे, अतिरेकी गट आणि पाकिस्तान या दोघांना सोडून, बहुतेक सर्व जगाला वाटत होते. अर्थातच, अमेरिकेने दिलेला भलाबुरा कोणताही पुरावा खोटा आहे असे म्हणून स्वतःला अवलक्षण करून घ्यावे असे कोणा महत्वाच्या देशाला वाटले नाही, आणि ज्यांनी त्या पुराव्यावर विश्वास ठेवला नाही त्यांची दखल घ्यावी असे इतरांना वाटले नाही... उलट "गुड रिडन्स" असे म्हणत जगाने सुस्कारा सोडला. याला जागतिक राजकारण म्हणतात ! :)

संदीप डांगे's picture

7 Oct 2016 - 5:27 pm | संदीप डांगे

मस्त!! +1111

अप्पा जोगळेकर's picture

7 Oct 2016 - 5:52 pm | अप्पा जोगळेकर

माहितीपूर्ण प्रतिसाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Oct 2016 - 4:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

वरचे आवांतर लिहिण्याचा उद्देश हाच की...

"लाईन ऑफ कंट्रोल ओलांडा" अशी आज्ञा सैन्यदलांना देणे ही अत्युच्च्य दर्जाची "राजकीय इच्छाशक्ती असणे आणि ती वापरण्याची धमक असणे" याचे लक्षण आहे. कारण अशी आज्ञा देणार्‍यावर (म्हणजेच भारतात, पंतप्रधानांवर) त्या आज्ञेमुळे होणार्‍या सर्व जागतिक-देशांतर्गत-सामरिक परिणामाची जबाबदारी असते... तेथे राजकारणी सारवासारव चालत नाही. पूर्णविराम (PERIOD).

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Oct 2016 - 4:47 pm | अनिरुद्ध.वैद्य

"लाईन ऑफ कंट्रोल ओलांडा" अशी आज्ञा सैन्यदलांना देणे ही अत्युच्च्य दर्जाची "राजकीय इच्छाशक्ती असणे आणि ती वापरण्याची धमक असणे" याचे लक्षण आहे.

अगदी अगदी!! आणि हीचे महत्व अजुन वाढते, जेव्हा ती प्रत्युत्तर म्हणुन, बदला घेण्यासाठी केली जाते!

श्रीगुरुजी's picture

8 Oct 2016 - 12:16 am | श्रीगुरुजी

वरचे आवांतर लिहिण्याचा उद्देश हाच की...

"लाईन ऑफ कंट्रोल ओलांडा" अशी आज्ञा सैन्यदलांना देणे ही अत्युच्च्य दर्जाची "राजकीय इच्छाशक्ती असणे आणि ती वापरण्याची धमक असणे" याचे लक्षण आहे. कारण अशी आज्ञा देणार्‍यावर (म्हणजेच भारतात, पंतप्रधानांवर) त्या आज्ञेमुळे होणार्‍या सर्व जागतिक-देशांतर्गत-सामरिक परिणामाची जबाबदारी असते... तेथे राजकारणी सारवासारव चालत नाही. पूर्णविराम (PERIOD).

पूर्ण सहमत

संदीप डांगे's picture

7 Oct 2016 - 5:00 pm | संदीप डांगे

म्हात्रेसाहेब, व्याख्या करण्याच्या तांत्रिकेत न शिरता आपल्याला असे म्हणता येईल काय कि लष्कराने पाकी व आतंकी हल्ल्यांचे बदले घेण्याची - युपीए व एनडीए काळातही- कारवाई केली? कारण आतापावेतो असे काही (हल्ल्यानंतर कारवाई केल्याचे) झाले नसल्याचे जनमानसात रूढ असल्यानेच चीड जास्त होती, जर असे झालं असेल तर ते skirmish होते की strike ह्याने जनतेला काय फरक पडतो? म्हणजे कि आपण उत्तर दिले होते व नेहमी देतो, ह्यावेळेस जरा जास्त केले. ( जागतिक राजकारनावर या तांत्रिकतेने खूप फरक पडतो हे थोडा वेळ नाही मानले तर)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Oct 2016 - 6:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

तीव्र असहमत !

याची कारणे वरचे प्रतिसाद परत वाचलेत तर सहज कळेल. सोईसाठी त्यातले काही महत्वाचे भाग खाली परत देत आहे (पण त्यातली सर्व वाक्ये मुळातून वाचल्यास जास्त योग्य होईल)...

१. युपिएच्या काळात "सर्जिकल स्ट्राईक्स" झाले नाहीत. जे काही झाले ते "जरा मोठ्या प्रमाणावर झालेली लाईन ऑफ कंट्रोल जवळची स्किर्मिशेश" होती; सर्जिकल स्ट्राईक ही विशिष्ट व्याख्या असलेली कारवाई असते; अश्या अर्थाची माहिती त्या काळात DGMO पदावर काम करणार्‍या लष्करी अधिकार्‍याने (ज्यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही प्रकारच्या कारवाया होतात) एका राष्ट्रिय वाहिनीवर दिली आहे.

२. त्या अधिकार्‍याच्या मते भारतिय सेनेने "काही दिवसांपूर्वीचे म्यानमार ऑपरेशन" आणि "आताचे पाकिस्तान ऑपरेशन" हे केवळ दोनच सर्जिकल स्ट्राईक्स आत्तापर्यंत केले आहेत.

३. "लाईन ऑफ कंट्रोल ओलांडा" अशी आज्ञा सैन्यदलांना देणे ही अत्युच्च्य दर्जाची "राजकीय इच्छाशक्ती असणे आणि ती वापरण्याची धमक असणे" याचे लक्षण आहे. कारण अशी आज्ञा देणार्‍यावर (म्हणजेच भारतात, पंतप्रधानांवर) त्या आज्ञेमुळे होणार्‍या सर्व जागतिक-देशांतर्गत-सामरिक परिणामाची जबाबदारी असते... तेथे राजकारणी सारवासारव चालत नाही. पूर्णविराम (PERIOD).

लाईन ऑफ कंट्रोलचा छोटामोठा भंग आणि तिच्यावरीन गोळीबार ही पाकिस्तानच्या बदमाशीमुळे होणारी नेहमीची गोष्ट आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात जास्त स्किरमिश (चकमक) होणे ते करताना काही मीटर्स LOC ओलांडणे हे नेहमीपेक्षा जास्त असले तरी आक्रमण समजले जात नाही.

तसा आताही आपला एक जवान चुकून LOC पलिकडे जाऊन पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात आहे हे वाचले असेलच. हे आक्रमण नाही.

याविरुद्ध... "आम्ही लाईन ऑफ कंट्रोल ओलांडून खोलवर लष्करी कारवाई केली व त्यात अनेक लोकांना (मग ते अतिरेकी असले तरी ते परकिय सत्तेच्या ताब्यात असलेल्या भूमीवरचे लोक असतात) ठार करून आलो" असे सीमेवरच्या सर्व्वोच्च अधिकार्‍याने पत्रकार परिषद घेऊन सांगणे... म्हणजेच साध्या शब्दांत "आम्ही तुमच्या घरात घुसून काही जणांना ठार करून आलो आहोत. तुमच्यात हिम्मत असेल तर काय करायचे ते करा" असे "अधिकृतरित्या" सांगणे होते." यात गैरसमजाला थारा नाही.

जागतिक राजकारनावर या तांत्रिकतेने खूप फरक पडतो हे थोडा वेळ नाही मानले तर

हा राजकारणी तांत्रिकतेचा भाग नाही "रोजच्या ओढाताणीत धक्काबुक्की करणे" आणि "घरात घूसून हातपाय तोडून व काहींना यमसदनाला पोचवणे" या दोघातला फरक आहे. यातून पुढे एस्कॅलेशन होत होत फुल स्केल युद्ध होऊ शकते... व त्या सगळ्याची जबाबदारी भारतामध्ये पंतप्रधानांवर पडते, त्यात कोणतीही सारवासारवी किंवा कारणे चालत नाहीत.

याच कारणांसाठी...

अ) १९६५ च्या युद्धाच्या आदेशाचे श्रेय योग्य रितीने श्री लाल बहादूर शास्त्रींना दिले जाते.

आ) १९७१ च्या युद्धाच्या आदेशाचे श्रेय श्रीमती इंदिरा गांधींना दिले जाते. त्यावेळेस, वाजपेयींनी सर्वात पुढे राहून इंदिरा गांधींना दुर्गादेवीची उपमा दिली होती हे विसरता कामा नये.

मात्र,

इ) कारगिल युद्धाचे श्रेय "तेवढ्याच मोकळ्या मनाने" श्री वाजपेयींना दिले गेले असे दिसले नाही, आणि

ई) आताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर, सद्याची राजकीय अवस्था पाहूनच असावे बहुतेक राजकीय गदारोळ टाळण्यासाठी, मोदींनी नाही तर भारताच्या DGMO नी पत्रकार परिषद घेऊन ती बातमी सांगितली. (आठवण असू द्या : अमेरिकेची दर लष्करी कारवाई व ओसामाच्या प्रकरणातही त्यांच्या प्रेसिडेंटने ती बातमी सर्वप्रथम सांगताना त्या प्रत्येक कारवाईचे श्रेय "माझ्या आदेशाने झालेल्या कारवाईने" अश्या अर्थांच्या शब्दांनी घेतले आहे.) असे असतानाही, "किमान पाकिस्तानला दाखविण्यासाठी तरी देशाची एकता स्पष्ट व्हावी इतकीही प्रगल्भता न दाखवता" केवळ राजकिय पोळी भाजण्यासाठी, (भारत सरकार नव्हे तर) भारताचे DGMO यांनी जे सांगितले आहे ते कसे विश्वासू नाही आणि त्या दाव्याचे पुरावे द्यावे" अश्या अर्थाची वक्तव्ये देऊन, वर आमचा सैन्यावर पूर्ण विश्वास आहे पण तरीही सरकारला दोष द्यायचा आहे असा जगावेगळा पवित्रा घेतला आहे. एकंदरीत, भारतात किती दुही आहे आणि तात्कालिक स्वार्थासाठी आम्ही शत्रूला मदत होईल असे वागायलाही कमी करणार नाही याचे पुरावे दिले आहे. याचा भारतिय सैन्याच्या मनोबलावर काय परिणाम होईल आणि याचा उपयोग पाकिस्तान सरकार, सैन्य आणि माध्यमे पुरेपूर करतील / करत आहेत याचे आपल्या राजकारण्यांना काही देणे घेणे पडलेले दिसत नाही. पाकिस्तानात याबद्दल आश्चर्ययुक्त (इतर वेळी ठीक आहे पण आताही तेच या अर्थाने) आनंद होत असेल हे नक्की.

हे वरचे सर्व लिहिण्याची कारणे अशी आहेत...

अर्थात, अशी कारवाई हे केवळ सैन्यबळावर शक्य नसते. अश्या कारवाईमुळे होणारे परिणाम (जगातल्या इतर देशांचा विरोध आणि ज्यावर हल्ला केला त्याला प्रतिहल्ला करण्यास दिलेले कारण) टाळण्यासाठी जागतिक पटलावर पार्श्वभूमी तयार करावी लागते... जी गेल्या दोन-अडिच वर्षात झाली आहे. मोदींच्या परदेश दौर्‍यांवर टीका करणार्‍यांची अडचण होणे आणि त्यामुळे धागा हायजॅक होणे हे टाळण्यासाठी हा मुद्दा मी मुद्दामहून टाळला होता !

जागतिक राजकारणात अथवा अर्थकारणात यशस्वी व्हायचे असले तर पुढची २५-३० वर्षे पाहून खेळ्या खेळाव्या लागतात. त्यामानाने गेल्या दोन-अडिच वर्षांत या सरकारने जागतिक स्तरावर मिळवलेल्या पतीमुळेच, माध्यमांतल्या बातम्यांवरून पूर्वी न दिसणारे खालील संकेत दिसत आहेत...

(अ) भारताने आक्रमक कारवाई केली असली तरीसुद्धा कोणत्याही देशाने पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही. अगदी चीनही स्पष्टपणे हल्ल्यांविरुद्ध बोललेला नाही.

(आ) उलट, सर्व महत्वाच्या देशांची वक्तव्ये भारताच्या बाजूची आहेत.

(इ) पाकिस्तानातले मुलकी सरकार सैन्यदलाला अतिरेक्यांना मदत करू नका असे म्हणण्याची धमक दाखवू लागले आहे.

(इ) पाकिस्तानच्या लोकसभेत अतिरेक्यांच्या विरोधी स्पष्टपणे बोलले जात आहे.

असो, त्याच त्याच मुद्द्यांवर खूप चर्वण झाले. समझदार को इशारा काफी है । परत परत तेच न विचारता / लिहिता, इतर काही वेगळा मुद्दा आला तरच लिहायला आवडेल.

संदीप डांगे's picture

7 Oct 2016 - 7:03 pm | संदीप डांगे

प्रतिसाद उत्तमच आहे आणि पूर्ण सहमतही आहेच पण माझा मुद्दा वेगळा व एवढाच की भारतीय जनतेची तगमग ह्यासाठी होती की 'आपण फक्त हल्ले सहन करतोय व लष्कर गप्प, बंदुकीवर बंदूक ठेऊन बसलंय' अशी जी प्रतिमा होती, त्याच्या बद्दल वरचा माझा प्रतिसाद होता, आपण लिहिलेला प्रतिसाद सर्व बाजूने बिनतोड असला तरी माझ्या मुद्द्याशी सुसंगत वाटला नाही,

प्रस्तुत स्ट्राईक वर इतर मोदी विरोधक काय म्हणतायत (ज्याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे) ते बिल माझ्यावर फाडले जात आहे असे दिसते.. तेही न झाले तर बरेच होईल, ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Oct 2016 - 9:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रस्तुत स्ट्राईक वर इतर मोदी विरोधक काय म्हणतायत (ज्याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे) ते बिल माझ्यावर फाडले जात आहे असे दिसते.. तेही न झाले तर बरेच होईल, ;)

माझे लेखन नेहमीच व्यक्तीकेंद्रित नसून मुद्दाकेंद्रित असते.

विष्लेषण सर्वसमावेशक व पूर्ण होण्यासाठी अनेकदा 'अगोदर पुढे आलेले' आणि 'न आलेले' असे दोन्ही प्रकारचे मुद्दे त्यात समाविष्ट करणे आवश्यक होते. त्यामुळे, प्रतिसादात मी जर/तर, जेव्हा/तेव्हा, जो/तो अशी वाक्यरचना नेहमी वापरतो. त्यामुळे, जो मुद्दा ज्याला लागू असेल त्यांच्या नावेच त्यातले बिल 'सकारण' फाडले जाते ('बिल फाडणे' हा वाक्पचार मला नवीन आहे, पण आवडला म्हणून वापरला आहे :) ) . तुम्ही जर एखाद्या गटांत नसाल, तर त्यावरची टिप्पणी तुम्ही स्वतःवर ओढून घेण्याची गरजच नाही :)

संदीप डांगे's picture

8 Oct 2016 - 8:06 am | संदीप डांगे

वोक्के सर, गॉट इट!

मुद्दाकेंद्रित चा माझा अर्थ तुमच्या अर्थापेक्षा वेगळा आहे म्हणून गोंधळ झाला, प्रतिपक्षाने उपस्थित न केलेले व करणार नाही असे मुद्दे आपणच मांडून ते मुद्दे डिफेन्ड करणे हे माझ्यासाठी नवीन आहे, मी शक्यतो चर्चा भले मेगाबायटी झाली तरी चालेल पण असे करत नाही त्यामुळे तुमची मांडणी समजून घेण्यात माझीच चूक झाली, क्षमा असावी.

धन्यवाद चांगल्या चर्चेबद्दल, विशेषतः गप्प बसून राहणे, रेटारेटी करणे आणि घरात घुसून मारणे ह्या तिघांतला फरक कळला!

सुबोध खरे's picture

8 Oct 2016 - 10:18 am | सुबोध खरे

डॉक्टर साहेब
बाडीस
एकच पुरवणी
अगोदरचे हल्ले आणि आताच यातील फरक सांगतो. अगोदरचे हल्ले हे पाठलाग या स्वरूपातील होते (hot persuit). म्हणजे एखादा दहशतवादी सीमेच्या आत घुसून घातपाती कारवाई करीत असताना त्याच्याशी सामना होतो. यावेळेस हा दहशतवादी पळून जाताना आपली सीमा ओलांडूनपरत पाकिस्तानात गेल्यावर त्याचा पाठलाग करून पाकिस्तानी हद्दीत त्याला कंठस्नान घातले जात असे. या हल्ल्याला सरकारची मूक संमती होती परंतु अशा प्रत्येक हल्ल्याच्या वेळेस सरकारची औपचारिक स्वरूपात परवानगी घेतलेली नसे.
आताचा हल्ला हा फार वेगळ्या प्रमाणात होता. हा म्यानमारमध्ये केलेल्या हल्ल्यापेक्षा नक्कीच धाडसाचं आणि खतरनाक हि होता. याचे कारण या वेळेस आपले कमांडो पाकिस्तानात घुसले होते आणि तेथल्या लष्कराचा त्यांना नुसता पाठिंबाच नव्हता तर ते लष्कराच्या तावडीत सापडले असते तर पाक लष्कराने त्यांना हाल हाल करून ठार मारले असते.
म्यानमारच्या हल्ल्याच्या वेळेस सार्वजनिक न्यासांवर ( कि मिपावरच) अनेक लोकांनी हिम्मत असेल तर पाकिस्तान बरोबर असे करून दाखवा असे हि बोलून दाखवले होते.
या वेळेस आपल्या नकाशा दर्शक उपग्रह कार्टो सॅट २ बी याच्या प्रतिमांचा वापर करून( यात इसरोच्या शास्त्रज्ञांचे मोठे योगदान आहे) पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी तळांचा अचूक ठावठिकाणा शोधण्यात आला. यानंतर एक आठवडाभर त्या तळावर हल्ला करायला जाण्यासाठी लष्कराची ठाणी टाळून जाण्याचे(आणि येण्याचे) सोपे मार्ग शोधून काढले. एवढा वेळ पाकिस्तानशी चर्चेचे गुऱ्हाळ चालू ठेवले आणि शेवटी ठरलेल्या वेळेस एकाच वेळेस सहा( कि सात) ठिकाणी ( ही ठिकाणे एकमेकांपासून २५० किमी दूर आहेत) हल्ला केला. पाकिस्तानलष्कराला याचा सुगावा सुद्धा लागला नाही त्यामुळे त्याचा प्रतिकार (जवळ जवळ) झालाच नाही. अत्याधुनिक शस्त्रे आणि अस्त्रे वापरून केलेला हा हल्ला एकमेवाद्वितीय असा होता.
लष्कर असे हल्ले करायला अगोदरही तयार होते परंतु त्याची पार्श्वभूमी तयार नसेल किंवा राजकीय इच्छा शक्ती नव्हती म्हणून असे हल्ले(surgical strikes) पूर्वी झालेले नाही. (माझी माहिती माझ्या खात्रीच्या लष्करी स्रोतांकडून मिळालेली आहे.)
श्री मोदींच्या कणखरणाबद्दल त्यांना मिळत असलेल्या प्रसिद्धी चा द्वेष वाटल्यामुळे श्री शरद पवार दर्पोक्ती करीत आहेत असे मी स्पष्टपणे म्हणतो.
हा प्रश्न पक्षीय दृष्टिकोनातून पहिला गेला नसता तर बरे झाले असते.
मोदीभक्तांनी इतका उदो उदो करायला नको होता किंवा त्याचा राजकीय फायदा उठवायचा प्रयत्न करायला नको होता.
परंतु एकंदर श्री चिदंबरम, शरद पवार यांनी कोतेपणा दाखविला आणि
श्री केजरीवाल किंवा राहुल गांधी यांच्या प्रगल्भ पणा बद्दल न बोललेलेच बरे.
दुर्दैवाने मोदी द्वेषाची कावीळ झालेले लोक मिपावरही बेताल वक्तव्ये करीत आहेत.

संदीप डांगे's picture

8 Oct 2016 - 11:26 am | संदीप डांगे

बाकी प्रतिसादाशी सहमत,

पण,

दुर्दैवाने मोदी द्वेषाची कावीळ झालेले लोक मिपावरही बेताल वक्तव्ये करीत आहेत.

^^^
कोणी कुठे केलीयेत अशी वक्तव्य??

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Oct 2016 - 4:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत.

"hot persuit" ! त्याचा मराठी प्रतिशब्द शोधण्याचा नादात तो लिहायला विसरलो... त्याचा चपखल अर्थाचा मराठी प्रतिशब्द मला अजून सापडलेला नाही.

गामा पैलवान's picture

9 Oct 2016 - 11:07 am | गामा पैलवान

.... = निकराचा पाठलाग ?

-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Oct 2016 - 4:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा चपखल शब्दप्रयोग होणार नाही. निकराचा याचा "अर्थ सर्व बळानिशी" असा होतो.

हॉट परसूट म्हणजे, "शत्रू पळून जात असताना त्याचा खातमा करण्यासाठी केलेला पाठलाग", यात बळ किती वापरले आहे त्यापेक्षा घटना "हॉट" असताना (घटनेचा भाग म्हणून किंवा घटनेचा त्वरीत पाठपुरावा करताना) केलेली कारवाई असते. म्हणजेच बळापेक्षा कारवाईची वेळ हे जास्त महत्वाचे परिमाण आहे.

विशुमित's picture

7 Oct 2016 - 5:37 pm | विशुमित

तर्क आवडला...

विकास's picture

7 Oct 2016 - 7:11 pm | विकास

राहूल गांधींचे ज्ञान लक्षात घेता त्यांना राजीव गांधींनी शांतीसेना श्रीलंकेत कशी पाठवली, त्यातून पुढे काय घडले, त्या सेनेतील सैनिकांचे नंतर कसे हाल घडले आणि एका अर्थी भारताचे लहान प्रमाणात पण जे अमेरीकेचे व्हिएटनाम मधे घडले तसे कसे झाले हे माहीत नसावे.

सचु कुळकर्णी's picture

7 Oct 2016 - 7:19 pm | सचु कुळकर्णी

राहूल गांधींचे ज्ञान लक्षात घेता ;)
बास ईतनाईच काफी है

विकास's picture

7 Oct 2016 - 8:48 pm | विकास

=)) =))

ज्ञानाच्या आधीचा "अ" सायलेंट आहे हो! ;)

सचु कुळकर्णी's picture

7 Oct 2016 - 9:36 pm | सचु कुळकर्णी

अहो तो सायलेंट असलेला 'अ' युवराज रोज बोल्ड & ईटँलीक फॉंट मध्ये सादर करतात.

गामा पैलवान's picture

8 Oct 2016 - 11:59 am | गामा पैलवान

सोन्याबापु,

तुमचा इथला संदेश वाचला. तिथे तुम्ही दिलेल्या बलुची युवकांच्या चलचित्राच्या या दुव्याबद्दल धन्यवाद! चलचित्र उडतउडत बघितलं.

हे युवक अतिशय शांत आणि ठामपणे युक्तिवाद करंत होते, त्यावरून ते सुशिक्षित दिसंत आहेत. आता सुशिक्षित बलुच्यांत बुगती मराठ्यांचे प्राबल्य आहे. हे आपले दुरावलेले भाऊबंद तर नसतील? चेहऱ्यावरून पठाण कमी आणि मराठा जास्त वाटतात काय? की मलाच असे भास होताहेत?

आ.न.,
-गा.पै.

टीप : एकाच्या बोलण्यात कुलमुखत्यार हा मराठी शब्द ऐकला.

धर्मराजमुटके's picture

19 Sep 2024 - 5:59 pm | धर्मराजमुटके

इस्त्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना टार्गेट करुन एकदम मोठ्या संखेने पेजर, वॉकी टॉकी चे स्फोट केले यावर मिपाकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत ?