Skip to main content

माझ्या मनातला एक ना-पाक प्रश्न

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 03/10/2016 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
खरडफळ्यावर आदूदादूंनी पाकिस्तानी अभिनेत्यांनी काम केलेल्या हिंदी चित्रपटाविषयी एक प्रश्न विचारला आहे. त्यावरून हे विचार मनात आले. पाकिस्तानी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित न होऊ देणं वगैरे ठीक आहे. पण १.जे आधीच प्रदर्शित झालेले चित्रपट आहेत त्यांच्या टीव्ही प्रसारणाचं काय? बंदी तर त्यावरही आणायला हवी. आतिफ अस्लमने गायलेली गाणी चालतात पण पाकिस्तानी अभिनेते चालत नाहीत, हा दुटप्पीपणा आहे. २.बंदीच घालायची तर सगळ्या पाकिस्तानी कलाकारांवर घालायला हवी. उदाहरणार्थ कुठल्याही music shop मध्ये गुलाम अली, मेहदी हसन, आबिदा परवीन, फरिदा खानम,राहत फतेह अली खान, नुसरत फतेह अली खान यांचे आल्बम ठेवता कामा नयेत. कुठल्याही संगीत स्पर्धेत ' हंगामा है क्यूं बरपा ' आणि ' रंजिशी सही ' गाणाऱ्या कलाकारांना कितीही चांगले गायले तरी स्पर्धेबाहेर फेकून द्यायला हवं. इथे मिपावर ' छाप तिलक सब छीनी रे ' वर आलेला लेख काढून टाकायला हवा. ३. जो न्याय पाकिस्तानी अभिनेत्यांना,तोच इतर कलाकारांनाही. सैयोनी ऐकणं हा देशद्रोह जाहीर करायला हवा. फवाद खान आणि अली फझल यांना एक न्याय आणि राहत फतेह अली खान आणि गुलाम अली यांना दुसरा - हे कितपत बरोबर आहे? Either everybody counts, or nobody counts!व ४. रच्याकने नदीम श्रवण जेव्हा जोरात होते तेव्हा ते सर्रास पाकिस्तानी संगीतरचना उचलायचे. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांचं काय? जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन व्हायला हवं. पण पूर्वलक्ष्यी प्रभाव किंवा retrospective effect ने! तुम्हाला काय वाटतं?

वाचने 27698
प्रतिक्रिया 116

प्रतिक्रिया

In reply to by यशोधरा

हो,हल्ली तो चक्क इतरांनाही थोड फार बोलु देतो. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

कस्काय येवढे प्रश्न पडतात तुम्हाला? ब्लँकेट बॅन करा न सरळ? पब्लिकनी बहिष्कार टाका! कोण कोण्ता बायकी राहत फ्तेह अन किंचाळणारा सय्योनीवाला. आमचे कान तेव्हाही किटायचे अन आताही किटतात. लोक्स तेव्हाही आम्हाला द्वेषमुर्ती म्हणायचे अन आताही म्हणतील अन नंतरही म्हणतील, पण आमच्यातर्फे पाकड्याचं गुणगान गाणारे, त्यांना सपोर्ट करणारे अन खेळ कला सीमाविरहीत असते म्हणणारे सगळ्या सगळ्यांवर स्वयंघोषीत बहिष्कार असतोच, गेली १५ वर्ष हैच, अन असणार आहेच.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

कस्काय येवढे प्रश्न पडतात तुम्हाला?
ते डोकं असल्याचं लक्षण आहे.
१५ वर्ष हैच, अन असणार आहेच.
१५ वर्षे? त्याआधी काय परिस्थिती होती हे जाणण्यासाठी उत्सुक.

In reply to by बोका-ए-आझम

१५ वर्षे? त्याआधी काय परिस्थिती होती हे जाणण्यासाठी उत्सुक. >> त्याआदी आमी धावी बारावी करण्यात बिजि होतु.

पाकिस्तानी कलाकारांना प्रश्न सोपाच विचारला गेला होता,भारतात जे दहशवादी हल्ले होत आहेत त्यांचा तुंम्ही निषेध कराल का ? या फवाद खान आणि तत्सम मंडळींनी तोंड बंद ठेवले. जर पाकिस्तान चे सरकार आणि माध्यमे जगाला ओरडून सांगत आहेत कि आमचा दहशतवादाशी काहीच संबंध नाही उलट पाकिस्तानच दहशतवादाचा शिकार आहे . मग या कलाकारांना मग अशी कोणती सक्ती आहे कि त्यांनी तोंड बंद ठेवावे ? वस्तुस्थिती अशी आहे कि पाकिस्तानात तीन प्रकारच्या सर्वोच्च म्हणावे अशा ताकदी आहेत. १) सरकार २) पाकी लष्कर /ISI ३)LeT /JuD आणि अशा अनेक दहशतवादी संघटना. यातली पहिली ताकद हि फक्त चेहरा म्हणून काम करते (अमेरिका आणि इतर देशांकडून भीक मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून ). वास्तवात सत्ते चे संचालन लष्कर आणि दहशतवादी संघटनाच करतात.जे खरे दुखणे आहे. आपण आपल्या देशात ज्या काही वाईट घटना घडतात जसे कि बलात्कार,दहशतवादी हल्ले. तेव्हा त्या बाबतीत आपण आपल्या कलाकारांकडून अपेक्षा करतोच ना ? की त्यांनी त्या घटनांवर मत प्रदर्शन करावे /टीका करावी. इथे तर दहशतवाद आहे ज्यात माणसे मारली जात आहेत,ते हि धर्माच्या नांवाने प्रशिक्षित दहशतवाद्यांकडून. मग अशा वेळी कलाकार म्हणून नाही तर एक माणूस म्हणून असल्या घटनेची निंदा/टीका न करण्याचे कारण समजत नाही.

वस्तुस्थिती अशी आहे कि पाकिस्तानात तीन प्रकारच्या सर्वोच्च म्हणावे अशा ताकदी आहेत. १) सरकार २) पाकी लष्कर /ISI ३)LeT /JuD आणि अशा अनेक दहशतवादी संघटना. यातली पहिली ताकद हि फक्त चेहरा म्हणून काम करते (अमेरिका आणि इतर देशांकडून भीक मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून ). वास्तवात सत्ते चे संचालन लष्कर आणि दहशतवादी संघटनाच करतात.जे खरे दुखणे आहे.
कसं बोललात! म्हणजेच पाकिस्तानात जो यापैकी कोणत्याही ताकदीला आव्हान देईल तो संपवला जाईल. मग हे पाकिस्तानी कलाकार कशावरून त्याला भिऊन मत देत नाहीयेत? शेवटी जिवाची पर्वा असतेच ना प्रत्येकाला.

In reply to by संदीप डांगे

त्यांचे विचार असे नाहीयेत असं म्हणायचंय का तुम्हाला? ते फक्त उघडपणे बोलत नाहीयेत. जे बोलताहेत ते निदान प्रामाणिक आहेत असं म्हणू या आपण. जे बोलत नाहीत त्यांचं काय? त्यांनाही हाकला. क्राॅसवर्डसारख्या दुकानांत जी पाकिस्तानी लेखकांची पुस्तकं असतात त्यांनाही काढून टाकायला हवं. क्राॅसवर्डवर मोर्चा आलेला पाहिलाय का तुम्ही? आमच्या इथे राज ठाक-यांच्या कृष्णकुंजपासून हाकेच्या अंतरावर क्राॅसवर्ड आहे आणि तिथे पाकिस्तानी लेखकांची पुस्तकं सुखेनैव विकायला ठेवलेली आहेत. का? त्यावर का नाही बंदी? जर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालायची तर लेखकांना का सोडायचं? तेही कलाकारच आहेत ना? Be fair to everyone, even while throwing them out!

In reply to by बोका-ए-आझम

साब, जमीर नाम कि भी चीज होती है ! हे सगळे लोक आर्थिदृष्ट्या संपन्न अशा घरातून येतात. वडिलोपार्जित पैश्या च्या जीवावर त्यांना घर/देश सोडणे शक्य आहे.पण केले जात नाही. https://en.wikipedia.org/wiki/Fawad_Khan

भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल स्ट्राईकनंतर जावेद मियाँदाद बरळला

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. यातच जावेद मियांदादने हे संतापजनक विधान केलं आहे. पाकिस्तानने आता भारतावर हल्ला करावा, असं जावेदने म्हटलं आहे. http://abpmajha.abplive.in/world/pak-ex-cricketer-javed-miandad-calls-for-all-out-attack-on-india-following-surgical-strike-across-loc-294920

In reply to by प्रसाद_१९८२

माफीवीर व्यंगचित्र वाल्यानी तर याला पायघड्या घातल्या होत्या. वरून सुंदर सुंदर फोटो ही काढले होते....!!

तुम्हाला काय वाटतं? बरचं काही वाटतं ! पण नुसतं वाटुन काय उपयोग ? बाकी त्या पाकड्यांचे मरु दे.... पण आपल्याकडच्या माकडांचे काय करायचे ? याचा विचार आपल्या लोकांनी आधी करायला हवा नाही ? लेटेस्ट माकड :- राजकारणासाठी सर्जिकल स्ट्राईकची अफवा : संजय निरुपम मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

असू ही शकतं... या सरकारचा काही भरोसा नाही. पुणे-मुंबई मध्ये बसून थोडीच कळत नक्की काय परिस्थिती आहे तिथे. पिताडी, मूर्ख आणि वेडी माणसं बऱ्याच वेळा खरं बोलत असतात, फक्त लोक यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. पण या माकडांच्या हातात कोण बरं कोलीत देत असावं???

पिताडी, मूर्ख आणि वेडी माणसं बऱ्याच वेळा खरं बोलत असतात, फक्त लोक यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. आपले DGMO { Director General of Military Operations } Lt Gen रणबीर सिंह देशाला चुकीची माहिती देतील असे मला वाटतं नाही,मला माझ्या देशाच्या आर्म फोर्सेसवर आणि त्यांच्या पराक्रम गाजवण्याच्या क्षमतेवर संपूर्ण विश्वास आहे. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

In reply to by मदनबाण

मी ऊपरोधक प्रतिसाद दिला होता...!! माकडांनी कसा उच्छाद मांडला आहे ते सांगायला... DGMO आणि आर्मी वर 100% काय 1000% संपूर्ण विश्वास आहे. गैरसमज नसावा...

भारतात एक प्रथा आहे.. दसऱ्याला रावणदहन करतात ... वाईट प्रवृत्तींचे प्रतीक म्हणून... तसेच प्रत्येकाला आपली देशभक्ती दाखवायला अशी प्रतिके लागतात.. काही विधायक.. जसे झेंडावंदन.. किंवा मग असे.. पाक कलाकरांवर बंदी वगैरे... बंदीची मागणी करणारे कितीजण न चुकता 15 ऑगस्टला झेंडवंदन करतात हा वेगळा संशोधनाचा विषय आहे... दुसरा मुद्दा म्हणजे हे रेट्रोस्पेक्टिव (पूर्वलक्षी प्रभावाने) बंदी घालणे ... आता गुलाम आलीच्या सगळ्यअ सीडी फेकुन द्याल.. विकायला बंदी आणाल.. पण मग इतकी वर्षे हे गाणे ऐकले.. त्याचा आनंद घेतला.. त्याचे काय? कुठे फेडाल ही पापे ? अर्थात या पापक्षालनाचा एक उपाय आहे.. करून बघा.. उपयोग झला तर कळवा... उपाय असा : ओळीने नउ दिवस आपले संपूर्ण भारतीय असलेले श्री हिमेश रेशमीया यांचे "तेरा सरूर" हे गणे रोज एकाशेआठ वेळा ऐकावे.. त्यानंतर दहाव्या दिवशी (जर जगण्याची उभारी राहिली तर) भारतमाता की जय ओरडावे.. जरूर पापक्षालन होईल.. बघा प्रयातना करून.. ऑल ते बेस्ट..

In reply to by अमर विश्वास

दुसरा मुद्दा म्हणजे हे रेट्रोस्पेक्टिव (पूर्वलक्षी प्रभावाने) बंदी घालणे ... आता गुलाम आलीच्या सगळ्यअ सीडी फेकुन द्याल.. विकायला बंदी आणाल.. पण मग इतकी वर्षे हे गाणे ऐकले.. त्याचा आनंद घेतला.. त्याचे काय? कुठे फेडाल ही पापे ?
म्हणजे तुमच्या दृष्टीने गुलाम अलींचं गाणं ऐकणं हे पाप आहे? बाकी प्रयातना हा शब्द आवडला. ज्याने यातना होतात अशा गोष्टी स्वतःहून करणे म्हणजे प्रयातना ;)

बोकोबांशी तात्विक दृष्ट्या पूर्ण सहमत आहे. ग़ुलाम अली, मेहदी हसन न ऐकणं तेवढं जरा कठीण वाटतंय. एकवेळ न ऐकणंही जमेल, पण न गुणगुणणं.... विचारही न करणं.... कठीण आहे. तरीही सहमत.

ऐकणंही जमेल, पण न गुणगुणणं.... विचारही न करणं.... कठीण आहे.>>>>> म्हणजे सोशल मीडिया वरची सर्व फुकाची देशभक्ती म्हणायची. शेवटी सलमान खान निर्दोषच सुटणार....!! ओम पुरी झिंदाबाद म्हणायची च वेळ येणार...!! संजय निरुपम देशाचा संरक्षण मंत्री बनवा म्ह्णून सिद्धिविनायक आणि हाजी अली ला साकडे घालावे लागणार...!!

In reply to by वेल्लाभट

टेन्शन कोणी घेतलंय ?? तसं त्या इक्बाल च पण गाणं आपण गुणगुणतच असतो की--- सारे जहाँ से अच्छा हिन्दोसिताँ हमारा हम बुलबुलें हैं इसकी यह गुलसिताँ हमारा

In reply to by विशुमित

हँहँहँ... नवाज शरिफ यांच्या मातोश्रींची आणि सुषमा स्वराज यांची मागच्या वर्षी डिसेंबर {बहुधा} मध्ये भेट घेतली होती. त्यांचे शब्द होते, तू तो मेरे वतन से आयी हो इं इं इं... मग पाकिस्तानी लोकांचे काय मत असेल यावर ? ते समजले की मी वरच्या प्रश्नाचे उत्तर देइन ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

असो(च)!

बोका-ए-आझम,
मग जे जे पाकिस्तानी आहे त्या सगळ्यावर बॅन टाकायला हवा, बरोबर? त्याशिवाय देश श्रेष्ठ आहे यावर शिक्कामोर्तब कसं होणार?
नाक दाबलं की तोंड उघडतं. सरसकटपणे सगळे अवयव पिरगळंत बसायची गरज नाही. घोट्या (पायाच्या बरंका) पिरगळल्या की डोळे उघडतात. फावड्याखानास हाकलून दिला कारण त्याने कमावलेला पैसा पाकिस्तानात परत जाऊ शकला असता. त्यातून दहशतवादास प्रोत्साहन मिळाल्यासारखं झालं असतं. दांभिकपणाचं म्हणाल तर शिवसेनेचे मुंबईतले पहिले महापौर सुधीर जोशींना निवडून आणतेवेळी बाळासाहेबांनी चक्क मुस्लिम लीगची मदत घेतली होती. पुरंदरच्या तहानंतर शिवाजीमहाराजांना आदिलशाहीविरुद्ध मोगलांचे अंकित बनून (दिलेरखानाच्या(?) हाताखाली) लढाई लढावी लागली. तिच्यात त्यांचा सपशेल पराभवही झाला होता. आ.न., -गा.पै.

दांभिकपणाचं म्हणाल तर शिवसेनेचे मुंबईतले पहिले महापौर सुधीर जोशींना निवडून आणतेवेळी बाळासाहेबांनी चक्क मुस्लिम लीगची मदत घेतली होती.
हो, पण तेव्हा पाकिस्तानने हल्ला केलेला नव्हता आणि मुस्लीम लीग हा भारतात नोंदणी केलेला अधिकृत पक्ष आहे. बाकी शिवाजीमहाराजांनी जे केलं, तो त्यांच्या मुत्सद्दीपणाचा एक भाग होता. या दोन्हीही ठिकाणी दांभिकपणाचा संबंध कसा येतो हे सांगितलं तर बरं होईल.

बोका-ए-आझम, अहो, दांभिकपणाचा संबंध येतंच नाही मुळी. तेच तर सांगायचं होतं. दांभिक हा शब्द तुम्ही तीन ठिकाणी वापरला आहे.
काही जणांना ती लागू आणि काही जणांना नाही हे जाॅर्ज आॅरवेलच्या All people are equal but some are more equal या वाक्याप्रमाणे होईल आणि तो दांभिकपणा असेल.
नाहीतर मग आपण selective ban करणार हे मान्य करुन आपला दांभिकपणा चालू ठेवावा.
कुणाला एकाला हाकलायचं आणि बाकीच्यांसाठी पायघड्या पसरायच्या यात अर्थ नाही. हा माझ्या मते दांभिकपणा आहे.
हे तिन्ही राजकारणात मोडतात. राजकारण म्हंटलं की दांभिक काय अन अदांभिक काय सगळं सारखंच नाही का? आ.न., -गा.पै.

हा लेख वाचून मी बायकोला म्हणालो, आजपासून मी गुलाबजाम, रसगुल्ला वगैरे 'पाक' असलेले पदार्थ खाणार नाही... बायको म्हणाली, छान... आजपासून मीसुद्धा स्वयं'पाक' करणार नाही. वाचा आणखी मिसळपाव.

माझ्या मर्यादीत वाचनाप्रमाणे IMMPA या मला वाटते बिगर सरकारी असलेल्या चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्यांच्या संघटनेच्या नावाने बातमी आलेली आहे. त्यांचा अधिकृत ठराव खाली चिकटवेला आहे. ज्यांना माझ्याप्रमाणे अधिकृत प्रस्ताव (सही शिक्क्यानुसार) बघून खात्री करून घेण्याची हौस आहे त्यांनी येथे बघावा. यात म्हणल्याप्रमाणे त्यांनी, "...appeal to all IMPPA members" अर्थात त्यांच्या सभासद कंपान्यांना वगैरे जाहीर आवाहन केले आहे. आवाहन करणे म्हणजे बॅन करणे असते का? त्यात काही "आज्ञा" असते का? आणि असली तरी ती एका संघटनेच्या सदस्यांना दिलेली आज्ञा फारतर असू शकेल... सरकार काही मधे पडले आहे का? बरं कोणी कुणाला घ्यावे आणि का घेऊ नये आणि घेतले तरी नंतर फायर करावे हे आवडो अथवा न आवडोत, पण ते त्या पैसे देणार्‍याचे हक्क असतात, हे खाजगी कंपन्यांमधे नोकरदार असतात त्यांना तरी किमान कळायला हवे. IMPPA takes significant decisions in its Extraordinary General Body Meeting and Annual General Meeting IMPPA in its Seventy Seventh Annual General Meeting began the meeting with obituary and condolence for the brave martyrs of the Indian Armed Forces in the cowardly terrorist attack at Pathankot and Uri. All members present were highly concerned and aggrieved at the total silence of the Pakistani artistes and technicians towards the shameful attack on India and after discussions and deliberations the members in the meeting unanimously decided that this silence of Pakistani artistes was an insult and humiliation of our armed forces and the country at large. The members unanimously felt that this is the right time to react and stand by the emotions and dignity of our Country and passed the following resolution. It is unanimously resolved to appeal to all IMPPA members to henceforth in future not to work with any artistes, singers or technicians from Pakistan until the situation of hostilities between Pakistan and India subsides and the Government of India declares that all is well with Pakistan and India. माझ्या दृष्टीने हा ठराव म्हणजे शुद्ध चावटपणा पक्षी धूळफेक आहे... मराठीत "हात रे" म्हणणे अथवा इंग्रजी, "slap on the wrist" वाक्प्रचारासारखा प्रकार आहे... त्यातून ऐन पंजाब-युपि निवडणुकांच्या वेळेस नवीन कावकाव करण्याची तयारी झालेली आहे इतकेच.