Skip to main content

केजरूके गुलाम

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 31/03/2015 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला. या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी. पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये? मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच. असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो. केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे. नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा. प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली. हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे. अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा. या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर). या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

वाचने 207733
प्रतिक्रिया 893

प्रतिक्रिया

अजित पवार तटकरे, सिंचन घोटाळा, त्याबाबत अतिशय व्यवस्थित सुरु असलेली कारवाई इ. वर मी सविस्तर स्पष्टीकरण देऊ शकतो. परंतु हा या लेखाचा विषय नाही. धागा भरकटेल. या विषयावर कोणी वेगळा धागा काढला तर तिथे उत्तर देईन.

मोफत वायफाय, ९ वीत गेलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही, २५ लाख नवीन नोकर्‍या, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, जनलोकपाल विधेयक, प्रत्येक खेड्यात मोफत तपासण्या व औषधे, .... वरील गोष्टी परिचित वाटताहेत का?

भगवंत मान युगपुरुषांच्या ट्यार्पि चे स्वारि पार्टि चे सांसद ह्यांचे टल्ली असलेले, पोलिस त्यांना उभे राहण्यास मदत करत असलेले फोटो मध्यंतरी बघण्यात आले होते पण आज कॅ. अमरींदर सिंग ह्यानि गौप्यस्फोट केलाय कि हे भगवंत मान संसदेत सुद्धा दारु पिवुन येत असत. जय हो जय हो पांच साल केजरीवाल

कालपरवाचीच गोष्ट. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते (आणि सध्या कॉंग्रेसमध्ये असलेल्या) संजय निरूपम यांनी शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांच्यावर आरे कॉलनीतील जमीन लाटल्याचा आरोप केला. त्याविरूध्द रविंद्र वायकरांनी निरूपमांना नोटिस धाडली आणि १५ दिवसात जाहिर माफी मागावी अन्यथा अब्रूनुकसानीच्या खटल्याला सामोरे जायची तयारी ठेवावी असे सांगितले. त्यावर न्यूज चॅनेलवर बोलताना निरूपम यांनी म्हटले की ते अजिबात माफी मागणार नाहीत. रविंद्र वायकरांना पाहिजे तर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करू देत. कोर्टाने विचारल्यावर मी कोर्टापुढे पुरावे सादर करेन आणि मग वायकरांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही!! आणि हे आपले युगपुरूष!! उठल्यासुटल्या सगळ्यांवर आरोप करत सुटायचे. मग कोर्टाने विचारल्यावर ’मी असे बोललोच नव्हतो’ असे म्हणायचे. हे बघा-- Kejru 1 मागे नितीन गडकरींना ’सर्वात भ्रष्ट माणूस’ असे म्हणून झाले. त्यावर गडकरी कोर्टात गेल्यावर आपल्याकडचे पुरावे सादर न करता हे युगपुरूष प्रत्येक वेळी पुढची तारीख मागत राहिले. मग पुढच्या तारखा मागता येणे कठिण झाल्यावर मग तिहार तुरूंगात आठवडाभर राहायचे ढोंग झाले.जामिनावर सुटायची वेळ आली तेव्हा पहिल्यांदा ’मी जामिन भरणार नाही’ असेही म्हणायचे ढोंग झाले. जामिन भरायचा नव्हता तर मग राहायचे ना आयुष्यभर तुरूंगात. हा ढोंगी माणूस कुठून आला आहे कुणास ठाऊक. यावेळी अरूण जेटलींनी या हलकटाला अजिबात सोडू नये अशी फार इच्छा आहे. फेब्रुवारी १९९८ मध्ये तामिळनाडूत कोईम्बतूर येथे लालकृष्ण अडवाणी लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभेत भाषण करणार होते त्यावेळी शहरात बॉम्बस्फोट झाले. आणि हे बॉम्बस्फोट रा.स्व.संघाने केले आहेत असा आरोप तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी केला.इतकेच नव्हे तर त्यात रा.स्व.संघाच्या सहभागाविषयी आपल्याकडे पुरावा आहे असेही केसरींनी म्हटले. त्यांच्याविरूध्द रा.स्व.संघाने अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला.पण नंतर तो खटला मागे घेतला. बहुदा केसरींचे वय झाल्यामुळे म्हातारचळ लागले आहे आणि म्हणून ते वाटेल ते बरळत आहेत असे वाटले असावे कदाचित.पण या युगपुरूषांना मात्र अजिबात कोणत्याही प्रकारचे सौजन्य दाखवू नये असे फार वाटते. केजरीवालांचे हे वाटेल ते आरोप करून धुराळा उडवायचा, सतत प्रसिध्दीचा झोत आपल्यावर ठेवायचा आणि मग पुरावे सादर करायची वेळ आली की हात वर करायचे हे 'हिट अ‍ॅन्ड रन' चे दुकान कायमचे बंद करून टाकायला हवे.

In reply to by गॅरी ट्रुमन

याच धाग्यावरील याच विषयाशी संबंधित एक जुना प्रतिसाद जसाच्या तसा इथे देत आहे. http://www.misalpav.com/comment/807812#comment-807812 ________________________________________________________________________________ एक मजेशीर बातमी सापडली. अरूण जेटलींनी केजरीवाल, कुमार विश्वास इ. आआपच्या ६ नेत्यांविरूद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानी व बदनानीचा दावा दाखल केला आहे. दिल्ली क्रिकेट असोसिएशन मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून त्यात जेटलींचा हात आहे अशा स्वरूपाचे आरोप (अर्थातच कोणत्याही पुराव्याशिवाय) या मंडळींनी जाहिररित्या केले होते. आपला कोणत्याही भ्रष्टाचारात हात नसून कोणताही पुरावा नसताना केलेल्या या आरोपांमुळे आपली मानहानी व बदनामी झाली आहे असा दावा करून संबंधितांना शिक्षा देण्यासाठी जेटलींनी या सहा जणांविरूद्ध फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही स्वरूपाचे दावे न्यायालयात दाखल केले आहेत. या दाव्याविरूद्ध आपले म्हणणे मांडताना केजरीवालांनी न्यायालयात खालील शब्दात आरोपांचे समर्थन केले. Arvind Kejriwal today responded to Arun Jaitley's defamation suit with a stinging reply in which he taunted the Union Finance Minister for "losing by over one lakh votes" in the national election and said he has no high public "reputation to protect". In a statement to a Delhi court, the Chief Minister said Mr Jaitley's "claim that he enjoys a high public character is totally frivolous and unsustainable." He wrote: "The last time he contested the election to the Lok Sabha was from Amritsar as a BJP candidate in 2014. Despite the success of the BJP this plaintiff lost by a margin of more than 1,00,000 votes. Indian democracy has never accepted his claim of public character." In a democracy, he argued, one's public reputation can only be the reaction, response and manifestation of the people's attitude. हा युक्तिवाद वाचल्यावर हसावे का रडावे का केजरीवालांची कीव करावी हेच समजेना. जो निवडणुक हरतो त्याला कोणतीच सार्वजनिक प्रतिष्ठा नसते (व त्यामुळेच त्याच्यावर कोणतेही आरोप केले तरी त्याची बदनामी व मानहानी होत नाही) व जनता निवडणुकीत जसा जनादेश देते तीच त्याची सार्वजनिक प्रतिष्ठा असते (म्हणजे निवडणुक जिंकलेल्याला सार्वजनिक प्रतिष्ठा असते व हरलेल्याला प्रतिष्ठा नसते) असा अत्यंत अतार्किक युक्तिवाद कोणी न्यायालयात करेल असे कधीही वाटले नव्हते. दस्तुरखुद्द केजरीवाल वाराणशीत मोदींविरूद्ध तब्बल २.५ लाखाहून अधिक मतांनी हरले होते. इंदिरा गांधी, सुषमा स्वराज व वाजपेयी हे देखील निवडणुकीत हरले होते. बाबासाहेब आंबेडकर व मनमोहन सिंग हे देखील निवडणुकीत हरले होते. अनेक दिग्गज नेत्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. पुण्यातून अविनाश धर्माधिकारी हे देखील पडले होते. केजरीवालांच्या युक्तिवादानुसार निवडणुकीत पराभव झाल्याने या सर्वांना कोणतीही सार्वजनिक प्रतिष्ठा नाही. http://www.ndtv.com/india-news/what-reputation-arun-jaitley-lost-by-1-l…

In reply to by श्रीगुरुजी

असले गुडघ्यातले युक्तिवाद केजरीवाल सोडून अन्य कोणी करू शकेल असे वाटत नाही. उठल्यासुटल्या सगळ्यांवर पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप करणार्‍या केजरीवालांना एका तरी केसमध्ये कोर्टाने शिक्षा ठोठावावी असे फार वाटते.

दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिक चालू करायची आपल्या युगपुरूषांची महत्वाकांक्षा आहेच. त्या मोहल्ला क्लिनिकचा असाही उपयोग होऊ शकेल हे आमच्यासारख्यांच्या लक्षातच आले नव्हते. त्याचे झाले असे की आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कन्या सौम्या हिला दिल्लीमधील जवळपास १०० मोहल्ला क्लिनिक सांभाळायची जबाबदारी देण्यात आली ही बातमी कालच आली. इतकी जबाबदारी देण्यात आली म्हणजे ती किमान डॉक्टर असावी असे कोणाला वाटावे. पण कुठचे काय. ती आहे आर्किटेक्ट!! अर्थातच अशा कोणत्याही पदांवर आपल्याच नातेवाईकांची वर्णी लावली गेल्यास नेपोटिझमचा आरोप होणारच. आणि तो सत्येंद्र जैन यांच्यावर झालाच. त्यानंतर आताच बातमी आली आहे की सौम्या जैनने त्या पदाचा राजीनामा दिला आहे. अर्थातच करदात्यांचे पैसे आपल्यावरच खर्च करणे हा प्रकार आआपला नवीन नाहीच. त्याच उदात्त परंपरेतील हा एक प्रकार दिसतो. मोहल्ला क्लिनिक सांभाळायला डॉक्टर न नेमता आर्किटेक्ट नेमावा यामागचे गणित समजण्यापलीकडचे आहे. आणि आर्किटेक्ट नेमायचा तर नेमायचाच. पण ती आर्किटेक्ट आरोग्यमंत्र्यांची कन्या असणे हा पण योगायोग समजायचा का? बरं ती त्या कामासाठी इतकी पात्र आणि योग्य असेल तर मग बोंबाबोंब झाल्यावर तिनी राजीनामा का दिला असावा? आमच्यासारख्यांनाच हे प्रश्न पडतात. आपटर्ड्सना मात्र असे प्रश्न कधीच पडत नाहीत का?

In reply to by श्रीगुरुजी

नौटंकीसम्राटांची नवी नौटंकी
प्रचंड नाटकीपणा आणि ढोंगीपणा यात केजरीवालांचा हात कोणीच धरू शकत नाही हे कित्येक वेळा सिद्ध झाले आहेच. त्याचेच आणखी एक उदाहरण कालपरवाच पुढे आले. केजरीवालांनी सुवर्णमंदिरात जाऊन भांडी घासली ती म्हणे खरकटी नव्हतीच आणि मुळातच घासलेली स्वच्छ भांडी होती. उत्तम. चालू द्या.

=))))

आजच श्री नवज्योत सिद्धू भा.ज.पा तून बाहेर पडून आ.आ.प मधे जाणार असल्याची बातमी आहे. आपचा पंजाबचा मुख्यमंत्री पदाचा चेहेरा म्हणुनही त्यांचे नाव घेतले जात आहे. आता नौटंकी सोबत कॉमेडीचीही सोय झाली बघा.

In reply to by मोहन

कालपर्यंत पवित्र असलेला सिद्धू आज अचानक कॉमेडीयन झाला ! राज्यसभेवर खासदारकी दिली तेव्हा कोणी ब्र काढला नाही.

आपल्या युगपुरूषांच्या पक्षाच्या एक स्त्री सदस्य सोनी हिने आत्महत्या केली आहे.त्याचे झाले असे की कुणी रमेश वाधवा नामक आम आदमी पार्टीच्या नेत्याने तिचा विनयभंग केला होता.त्यानंतर तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. ही गोष्ट २ जून रोजीची. रमेश वाधवाला पोलिसांनी दुसर्‍या दिवशी अटक केली.पण त्याची ४ जून रोजी जामिनावर मुक्तता झाली. या प्रकारानंतर रमेश वाधवाविरूध्द पक्षाने कोणतीच कारवाई केली नाही म्हणून सोनी अत्यंत व्यथित झाली होती.शेवटी तिने आज आत्महत्या केली. अधिक माहिती इथे. हे जर अन्य कोणत्या पक्षात झाले असते तर या युगपुरूषांनी नक्की काय केले असते याची कल्पनाही करवत नाही. पण कसे आहे हा प्रकार संपूर्ण विश्वातील सर्वात प्रामाणिक पक्षात झाला आहे. त्यामुळे कोणतेही प्रश्न विचारायला बंदीच आहे. (केजरीवालचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात नव्हे तर अस्मानात जाणारा) ट्रुमन

दिल्लीच्या आआप सरकारला उच्च न्यायालयाने आज झटका दिला. सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासून गेली दीड वर्षे सातत्याने नायब राज्यपाल व केंद्र सरकारशी भांडणार्‍या व आपल्या अपयशाचे खापर सातत्याने नायब राज्यपाल व केंद्र सरकारवर फोडणार्‍या आआप सरकारला नायब राज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय मुख्य आहेत व नियुक्तींसाठी व कोणताही चौकशी आयोग नेमण्यासाठी त्यांची संमती अनिवार्य आहे असा उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. आम्ही दिल्लीत निवडून आल्याने आम्हाला वाटेल ते करायची परवानगी आहे, मग ते घटनाबाह्य का असेना अशा आविर्भावात गेली दीड वर्षे वावरणार्‍या व नायब राज्यपाल, मोदी व केंद्र सरकार यांच्यावर जवळपास दररोज अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार्‍या केजरीवाल व आआप सरकार यांना या निर्णयाने नक्कीच झटका बसलेला आहे. In a jolt to AAP, Delhi HC holds Lt. Governor as administrative head In a big blow to the Aam Aadmi Party government's fight for Statehood for Delhi and control of power with the Union government, the Delhi High Court on Thursday held that National Capital Territory continues to be a Union Territory and the Lieutenant Governor is its administrative head. With this, a series of moves made by the Delhi government such as commissions of inquiry into CNG fitness scam, Delhi and District Cricket Association illegalities, policy directions to electricity regulatory commission for compensation to people for disruption in power supply, were declared illegal by the court since the same were made without the approval or views of the Lieutenant Governor. The court also held as illegal the appointment of Nominee Directors of Government of NCT of Delhi on Board of BSES Rajdhani Power Limited, BSES Yamuna Power Limited and Tata Power Delhi Distribution Limited by the Delhi Power Company Limited on the basis of the recommendations of the Chief Minister of Delhi without communicating the decision of the Chief Minister to the Lt. Governor of NCT of Delhi for his views. In its 194-page judgement, the court concluded that “On a reading of Article 239 and Article 239AA of the Constitution together with the provisions of the Government of National Capital Territory of Delhi Act, 1991 and the Transaction of Business of the Government of NCT of Delhi Rules, 1993, it becomes manifest that Delhi continues to be a Union Territory even after the Constitution (69th Amendment) Act, 1991 inserting Article 239AA making special provisions with respect to Delhi.”

In reply to by श्रीगुरुजी

आता केजरीवाल (किंवा आशिष खेतान) दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीशही मोदींचे किंवा अंबानी-अडानींचे एजंट किंवा बीजेपीच्या पेरोलवर आहेत असे म्हणाले तरी आश्चर्य वाटू नये. गेल्या काही दिवसात केजरीवालांनी अजून जास्त मर्कटलिला केल्याच आहेत. वेळ मिळेल त्याप्रमाणे त्याविषयी अधिक लिहिणारच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. केजरीवाल आणि आआपला मिपावर पूर्ण उघडे पाडणे हे माझे उद्दिष्ट आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

मिपावर अरूणाचल प्रदेश च्या वेळी न्यायालयीन निर्णयावर टीका करणारे अचानक निर्णय योग्य असल्याचे सांगतात ते पाहून आश्चर्य वाटले या तो घोडा कहो य चतूर

In reply to by श्रीगुरुजी

म्हणजे आता दिल्लीचा जे काही वाटोळा चालला आहे त्याला नायब राज्यपाल जबाबदार आहेत का केजरीवाल ?

In reply to by कपिलमुनी

अर्थातच केजरीवाल. जे काम करायचे आहे ते सोडून इतर राज्यांना भेटी देऊन तिथल्या प्रश्नात नाक खुपसणे (हैद्राबाद, गुजरात, उ. प्र. इ.), ज्या क्षेत्रात काम करण्याचा घटनादत्त अधिकार आहे तिथे काम करायचे सोडून घटनात्मक अधिकार नसलेल्या क्षेत्रात ढवळाढवळ करणे, रोज एक नवीन नौटंकी करणे, पक्षातील भ्रष्टाचार्‍यांना व गुन्हेगारांना पाठीशी घालणे, प्रदर्शित झालेला प्रत्येक नवीन चित्रपट बघून त्याचे परीक्षण लिहिणे, दिवसभर ट्विटरवर वेळ वाया घालवून मोदींना शिव्या देत बसणे, आपल्या पक्षात नसलेल्यांवर वाटेल ते बिनबुडाचे बेछूट आरोप करणे, केंद्र सरकारविरूद्ध सातत्याने न्यायालयाचा पायर्‍या चढणे, बदनामीच्या खटल्यांना तोंड देण्यासाठी वारंवार न्यायालयाच्या पायर्‍या चढाव्या लागणे .... इ. साठी केजरीवालच जबाबदार आहेत. यासाठी नायब राज्यपाल जबाबदार नाहीत. बादवे, सध्या दिल्लीचे वाटोळं होत आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by श्रीगुरुजी

मोदींना शिव्या देत बसणे
केजरीवालबद्दल तुमची दुखरी नस फक्त एवढीच आहे... म्हणून स्वतःचा दिवसातला बहुमुल्य वेळ घालवून इथे त्याच्याबद्दल कुरकूर करायला येता.

In reply to by श्रीगुरुजी

कैच्या काय !
प्रदर्शित झालेला प्रत्येक नवीन चित्रपट बघून त्याचे परीक्षण लिहिणे
एवढा पण खोटा बोलू नये , ग्रेट ग्रँड मस्तीचा परीक्षण दाखवा बघू ! किंवा वन नाईट स्टँडचा ! काहीजणांना पतंग उडवायला आवडतो काहींना चित्रपट बघायला .

In reply to by श्रीगुरुजी

प्रत्येक गोष्ट वाढवून चढवून सांगितली पाहिजे का ? पुन्हा प्रत्येक चित्रपट पाहिल्याचा आरोप सिद्ध करा म्हणला की पळून जाल

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला भूत असल्याचा पुरावा मागितला तर तुम्ही भूत नसल्याचा मागता. तुम्ही जे काय ४ पिक्चर वरुन विधाने केली कारण त्यांनी त्याबद्दल ट्वीट केले. म्हणून लोकांना कळले । यावरुन प्रत्येक पिक्चर बघतात असला बिनडोक निष्कर्ष काय लॉजिक वापरुन काढला?

In reply to by कपिलमुनी

फिदीफिदी . . . सगळाच टीपी होता. मुद्दा नव्हताच. मग तो संपणार कसा?

In reply to by कपिलमुनी

कैच्या काय ! >>> प्रदर्शित झालेला प्रत्येक नवीन चित्रपट बघून त्याचे परीक्षण लिहिणे एवढा पण खोटा बोलू नये , ग्रेट ग्रँड मस्तीचा परीक्षण दाखवा बघू ! किंवा वन नाईट स्टँडचा !
वरील वाक्यातील उपरोध आवडला. केजरी अंधभक्तांकडून इतके उपरोधिक वाक्य यावे हे एक आश्चर्यच!

केजरीवाल सरकारने दिल्ली मधे आमदारांचे पगार वाढवल्यावर रडणारे लोक महाराष्ट्रामधे आमदार , मंत्र्यांचा पगार पेंशंन वाढून सुद्धा मूग गिळून आहेत. दुटप्पीपणाचा कहर आहे

धरणेसम्राट केजरीवाल सरकारने मुख्यमंत्री निवासाजवळ धरणे धरायला बंदी घातली आहे. जानेवारी २०१४ मध्ये केजरीवालांच्या त्या कुप्रसिध्द धरण्याचे समर्थन करणारे लोक आता मात्र मूग गिळून आहेत. दुटप्पीपणाचा कहर आहे

In reply to by गॅरी ट्रुमन

शांततामय मार्काने विरोध व्यक्त करायला परवानगी हवीच. अशी बंदी चुकीची आहे

In reply to by गॅरी ट्रुमन

हे पद कोणाच्या अखत्यारीत आहे ? दिल्ली सरकार की केंद्र की नायब राज़्यपाल? ( दिल्ली च्या पदांबद्दल कंफ्यूजन आहे म्हणून विचारला)

नुकतेच मोदि साहेब दलितांविषयीच्या कळवळीतुन (हा कळवळा बहुतेक उत्तरेकडुन पश्चिमेत नुकताच दाखल झाला आहे) "दलितांऐवजी मला गोळ्या घाला" टाईपचे डायलॉग मारायला लागले आहेत. हि खास केजरीस्टाईल आता मोदिंना पण आवडायला लागली बहुतेक :)

मोदींवर टीका करण्यासाठी केजरीवाल यांनी खर्चिले ७० लाख रूपये

जाहिरातीवर खर्च केलेल्या रक्कमेपैकी ८५ टक्के खर्च दिल्लीबाहेर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. आप सरकारने कामांची माहिती देण्यासाठी केलेल्या जाहिरांतीवर तब्बल ५२६ कोटी रूपये खर्च केले असून यातील १०० कोटींचा हिशेब त्यांनी दिला नसल्याचे भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालातून समोर आली आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी दिल्लीतील कायदा सुव्यवस्था बिघडण्यास केंद्र सरकारला जबाबदार धरत त्यावर ७० लाख रूपये खर्च केल्याचे उजेडात आले आहे. दिल्ली सरकारने टीव्हीवरील जाहिरातीसाठी जनतेच्या पैशाचा गैरवापर केल्याचे कॅगने आपल्या ५५ पानी अहवालात नमूद केल्याचे एनडीटीव्ही दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. कॅगने आपल्या अहवालात केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीत आप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोठ्याप्रमाणात जाहिराती करण्यात आल्या होत्या. केजरीवाल यांनी त्यावेळी आपच्या जाहिरातीसाठी ३३.४ कोटी रूपये खर्च केले असून त्यातील ८५ टक्के रक्कम ही दिल्ली बाहेर खर्च केली आहे. एका जाहिरातीत एक व्यक्ती झाडू दाखवताना दिसतो. झाडू हे आपचे निवडणूक चिन्ह आहे. हे राज्य सरकारने केलेल्या कामाची जाहिरात नसून पक्षाचा प्रचार असल्याचे कॅगने म्हटले आहे. जाहिरातीत राज्य सरकारची उपलब्धी ही केजरीवाल यांच्या वैयक्तिक प्रयत्नांमुळे झाले असल्याचे दाखवण्यात आले आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/aap-government-spent-75-lacs-o…

केजरीवालांच्या अंधभक्तांना त्यांनी पंतप्रधानांवर आपली हत्या करण्यासाठी प्रयत्न करु शकतात असा आरोप केला, दिल्लीत पूर आलेला असताना ते धरमशाला इथे विपश्यनेसाठी निघून गेले वगैरे गोष्टी दिसणार नाहीतच. काय करतील बिचारे? अव्यापारेषु व्यापार केल्यावर असंच होणार.

दिल्लीच्या आआप सरकारमधील एक मंत्री संदीप कुमार एका चित्रफितीत महिलांशी अश्लील चाळे करताना सापडला. त्याची चित्रफीत मिळाल्यापासून केवळ ३० मिनिटांच्या आत आम्ही त्याला हाकलले, आम्ही कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन करीत नाही इ. तात्विक भाषण करून केजरीवालांनी आपण महान असल्याचा पुन्हा एकदा दावा केला. ज्याने चित्रफीत बाहेर आणली त्याच्या म्हणण्यानुसार ही चित्रफीत बर्‍याच दिवसांपासून केजरीवालांकडे होती. पण ते गप्प बसून राहिले. जेव्हा काल माध्यमांकडे ही चित्रफीत पोहोचली तेव्हा नाईलाजास्तव त्यांना मंत्र्याला काढायला लागले. अर्थात हे केल्यावर सुद्धा आपल्याला हे माहित नसल्याचे त्यांनी साळसूदपणे सांगितले. एखादा माणूस काय करणार हे कोणाच्याही चेहर्‍यावर लिहिलेले नसते, त्यामुळे संदीप कुमार काय करीत होता हे मला माहितीच नव्हते असा आव त्यांनी आणला. "वो परेशान करते रहे और हम 'काम' करते रहे" हे आआपच्या जाहिरातीतील वाक्य संदीप कुमारने खरे करून दाखविले आहे. आणि आज आआपच्या पवन शर्मा नावाच्या आमदाराला न्यायालयाने १८ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा दिलेली आहे. २००९ मध्ये झालेल्या एका कामगाराच्या मृत्युप्रकरणी गुन्हा सिद्ध होऊन पवन शर्माला ही शिक्षा झाली. हे प्रकरण २००९ चे आहे. त्यामुळे २०१५ मध्ये त्याला आमदारकीचे तिकीट देताना त्यावेळी मला हे प्रकरण माहितीच नव्हते अशी लोणकढी थाप केजरीवालांना मारता येणार नाही. जितेंद्र तोमरवर बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप असूनसुद्धा त्याला तिकीट देऊन निवडून आल्यावर केजरीवालांनी त्याला मंत्री केले. संदीपकुमारबद्दल माहिती मिळूनसुद्धा त्याच्यावर लगेच कारवाई केली नाही. पवन शर्मावरील गुन्ह्याची माहिती असूनसुद्धा त्याला तिकीट दिले. आणि ह्यांनी म्हणे इथली व्यवस्था बदलण्यासाठी अवतार धारण केला आहे! http://www.business-standard.com/article/news-ians/aap-mla-sentenced-fo…

In reply to by श्रीगुरुजी

आताच आलेल्या बातमी नुसार केजरीवाल साहेबानी आरोप केला आहे कि मंत्र्यांच्या चावट चित्रफीतिचा सर्वत्र प्रसार करण्यासाठी श्री मोदींनी अंबानींना हाताशी धरून नेट स्वस्त केले आहे. "सब मिले जुले है"

भारत देशाचे आंतर राष्ट्रिय ख्यातीचे नेते श्री केजरीवाल यांनी वॅटीकन सिटिला मदर तेरेसा सेंट हुड प्रोग्रामला उपस्थित रहाण्याचा निर्णय घेतला आहे. धर्म निरपेक्ष राजकारणाचा उत्तम पायंडाच श्री केजरीवाल यांनी पाडलेला आहे !!

धाग्याचे नाव

केजरूचे गुलाम विरुद्ध मोदींचे अंधभक्त

असे करण्यात यावे ही माननीय संपादक मंडळाला विनंती!! जरा फुकट कंदील लावणे, हे आपलं कलगी तुरा रंगल्याचा फील तरी येईल. ह्या निमित्ताने मिपावरील एका माजी (का पाजी!) अन विद्यमान काळात आपटार्ड असलेले एक मजेशीर भोचक पात्र आठवले!

गेल्या काही दिवसात आआपमध्ये आणखी काही शिसारी आणणार्‍या गोष्टी घडल्या आहेत. अर्थात आआपमध्ये शिसारी न आणणार्‍या फारच थोड्या गोष्टी आहेत (इफ अ‍ॅट ऑल असल्याच तर). त्याच मांदियाळीतल्या या आणखी काही गोष्टी: मंत्री संदीप कुमार सीडी प्रकरण उघडकीस आले. हा व्हिडिओ सादर करणार्‍याचे म्हणणे असे की त्याने हा व्हिडिओ केजरीवालांना काही दिवस आधीच दिला होता.पण काही दिवस केजरीवालांनी त्यावर काहीच पावले उचलली नाहीत.पण मग तो व्हिडिओ उपराज्यपाल नजीब जंग यांच्याकडे आणि मिडियाकडे पोहोचल्यावर मात्र 'अर्ध्या तासात' संदीप कुमार यांची उचलबांगडी केली गेली. एकीकडे केजरीवाल म्हणत होते की या कृत्याने संदीप कुमार यांनी पक्षाच्या विचारसरणीला धक्का पोहोचवला तर दुसरीकडे मकराश्रू फेम आशुतोष म्हणत होते की जे काही झाले ते संदीप कुमार आणि त्या स्त्री मध्ये परस्परसहमतीने झाले तेव्हा इतरांना याविषयी तक्रार करायचे कारण नाही.इतकेच नाही तर आशुतोष यांनी महात्मा गांधींच्या ब्रम्हचर्यावरील प्रयोगांचे आणि सरला चौधरी यांच्याबरोबरच्या संबंधांचे दाखले दिले.पण असे दाखले उठल्यासुटल्या कुणीही देऊन कसे चालेल?गांधीजींची ध्येयनिष्ठा आणि त्याग याच्या ०.०१% ही न करता कोणीही उठावे आणि असे काहीतरी दाखले द्यावेत हे कसे काय समर्थनीय आहे? याच न्यायाने हे उद्या रेल्वेगाडीतील खजिना लुटतील आणि म्हणतील की काकोरी प्रकरणात क्रांतिकारकांनीही हेच केले होते!! २०१४ च्या निवडणुकांच्या काळात उजव्या गटाच्या अनेकांनी (ज्यांना 'मोदीभक्त' म्हणतात अशांपैकी अनेकांनी) नेहरू आणि एडविना माऊंटबॅटन यांचे फोटो फॉरवर्ड करायचा प्रकार केला होता.त्यावर टिका केलीच पाहिजे. पण मग काहीसा प्रकार फोटोच्या माध्यमातून नाही तर शब्दाच्या माध्यमातून आआपच्याच एका नेत्याने केल्यावर ही शांतता का? असो.हे थोडेच झाले की काय म्हणून त्या पिडीत स्त्रीने संदीप कुमारने आपल्यावर बलात्कार केला असा दावा केला. त्यानंतर संदीप कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतले. "वो परेशान करते रहे हम काम करते रहे" यातील 'काम' चा असा अर्थ लागेल असे वाटलेही नव्हते!! सध्या केजरीवालांना पंजाबात मोठा विजय मिळवायची महत्वाकांक्षा आहे. त्यासाठी दिल्लीवरून संजय सिंग आणि दुर्गेश पाठक यांना केजरीवालांनी पंजाबात रवानाही केले. कर्नल देविंदर सेहरावत हे पक्षाचे बिजासवान येथील आमदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना पक्षाने दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.कालच त्यांनी केजरीवालांना पत्र पाठवून पंजाबातील नेते पक्षातील स्त्री नेत्यांचे उमेदवारी द्यायच्या आमिषावरून शोषण करीत आहेत असा आरोप केला. हा आरोप करणारे कोणी बाहेरचे नाहीत तर दोनदा पक्षाच्या अत्यंत उच्च मुल्यांच्या चाळणीतून पार झालेले नेते आहेत. आता त्याविरूध्द आआपचे नेते सेहरावतांविरूध्द अब्रूनुकसानीचा खटला दाखल करायची गोष्ट करत आहेत. तर आशुतोष यांच्या ब्लॉगपोस्टविरूध्द राष्ट्रीय महिला आयोगाने नोटिस बजावल्यानंतर आशुतोष महिला आयोगावर उखडले आहेत!! म्हणजे एकूणच काय तर यांच्या अमर्याद मर्कटलीला चालूच आहेत. हा सगळा प्रकार शिसारी आणणारा नाही का? आणि याविरूध्द काही लिहिले तर काही सन्माननीय सदस्यांना माझा आय.डी हॅक झाला असे वाटू लागते. असो. इतर कोणालाही काहीही वाटले तरी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल या भारतीय राजकारणावरील कलंक असलेल्या प्रकाराविषयी मी मिपावर तरी लिहिणे सोडणार नाही!!

In reply to by गॅरी ट्रुमन

याविरूध्द काही लिहिले तर काही सन्माननीय सदस्यांना माझा आय.डी हॅक झाला असे वाटू लागते हे मी बोललो होतो. नेहमी तुमच्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया वाचण्याची सवय आहे मात्र केजरीवालबद्दल बोलताना तुमची लेखणी वेगळे रूप धारण करते आणि ते नेहमी खटकत राहते म्हणून तो प्रतिसाद दिला होता. केजरीवाल कितीही पातळी सोडून वागूदे किंवा राजकारणात कोलांट्या उड्या मारूदे... आपण येथे चर्चा करताना पातळी सोडणे अयोग्य आहे इतकेच माझे मत आहे. (क्लिंटनचा चाहता) मोदक

In reply to by मोदक

शिव्यांचा जन्म कसा झाला? तर जेव्हा शिव्या द्यायच्याच लायकीच्या लोकांचा जन्म झाला, तेव्हा शिव्यांचा जन्म झाला. हा formula आहे. यात पाहिजे ती नावं substitute करा म्हणजे सगळी समीकरणं सुटतील. - (क्लिंटनचा, गॅरी ट्रूमनचा आणि मिल्टनचा चाहता) बोका-ए-आझम

In reply to by गॅरी ट्रुमन

तुमचे प्रतिसाद खूप माहितीपूर्ण असतात, पण आप बाबतीत आपला पूर्वग्रह दिसून येतो. खालील वाक्याशी सहमत नाही
आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल या भारतीय राजकारणावरील कलंक असलेल्या प्रकाराविषयी
केजरीवाल यांनी विकासावर लक्ष केंद्रित न करता खूप उचापती केल्या आहेत पण याचा अर्थ ते कलंक वैगेरे नाहीत. त्यांच्यापेक्षा इतर खूप पक्षांनी वाईट दिवे लावले आहेत. त्यांच्यामुळे भ्रष्टाचार हा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. आप ला लोकांनी विकास आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार साठी निवडून दिलेलं, त्यांनी पाणी आणि वीज यावरती चांगलं काम केलं आहे. तसेच भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, दिल्ली सरकार च्या अख्ततिरित असणाऱ्या सेवा चांगल्या प्रकारे पुरवल्या जातात. खाजगी शाळा ची मुजोरी कमी केलीय. PWD डिपार्टमेंट सुधरवल, जेणेकरून रस्ते बांधणी आणि दुरुस्ती चांगली होईल. अर्थात जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासन बरोबर तुलना करून नाही चालणार कारण सगळेच पक्ष मतदारांना चंद्राचं आमिष दाखवतात. आप च्या चांगल्या कामाबद्दल इथे वाचा. तसेच अनेक दुवे जालावर मिळतील. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे संदीप कुमार प्रकरणात आप ची नाचक्की झाली, मग काँग्रेस चे मनू सिंघवी सेक्स प्रकरण मध्ये काँग्रेस ने साधी कारवाई पण केली नाही. इथे तर आप ने कारवाई केली. तसेच आप चे स्थानिक नेते अजून राजकारणात मुरलेले नाहीत त्यामुळं political correct राहायला जमत नाही. पण चांगल्या लोकांना आप ने राजकारणाचे दरवाजे खुले केले हे नाकारून चालणार नाही. आप धर्माच्या नावांनी ते काँग्रेस चे बाप आहेत, ultra psedu secularist आहेत. सतत मोदींच्या नावाने किंवा जंग च्या नावाने ओरड करून आप ने पत घालवली आहे. परदेश नीती संदर्भात त्यांची मते फालतू आहेत. अजून बरेच दोष निघतील पण ते सगळीकडे आहेत. मी आप समर्थक अजिबात नाही. सतत बोंबलणारे केजरीवाल डोक्यात जातात मी हि आप बद्दल जास्त वाचत नाही परंतु तुम्ही जेवढ वाईट रंगवताय तेवाढे पण ते वाईट नाहीत. माझा प्रतिसाद खूप विस्कळीत आहे, तसेच मला तुम्ही मांडलेले मुद्दे मान्य आहेत पण त्याची जी तीव्रता तुम्ही दाखवताय तेवढि ती नाही.

या बाबतीत मी क्लिंटन साहेबांशी एकदम सहमत आहे. आम आदमी पार्टी व अरविंद केजरीवाल यांचे नाव जरी काढले तरी प्रचंड संताप येतो. अरविंद केरीवाल यांची तुलना मी इदी आमेन वगैरेंशी करेन. क्रूरतेच्या बाबतीत नाही परंतु चेहेऱ्यावर सोज्वळ भाव असणाऱ्या केजरीवाल यांच्यासारख्या व्यक्ती मनातून अतिशय घाण प्रवृत्तीच्या असतात . सत्तापिपासू , दुसऱ्यांच्या सतत द्वेष करणे , त्यासाठी कोणत्याही थराला जाणे , दुसऱ्या व्यक्तीचा पूर्णपणे उपयोग करून घेणे आणि वरपांगी मात्र सज्जनतेचा अभिनय करणे अशी या व्यक्तींची दुटप्पी भूमिका कायम असते. आज फक्त एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री असूनही या घाणेरड्या माणसाची पंतप्रधानांना वेडा म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. भगवंत मान या व्यक्तीने देशाच्या सर्वोच्च संस्थेला धोका येईल असे चित्रण केले व स्पष्टीकरण विचारल्यावर निर्लज्जपणे मोदींचे नाव पुढे केले होते. जर यांच्या हातात पंजाब सारखे सुरक्षादृष्टीने महत्वाचे राज्य मिळाले तर तिथे हे लोक नंगानाच चालू करतील. काँग्रेस व आप या दोनपैकी निवडायचे ठरल्यास मी निश्चितपणे काँग्रेस लाच निवडीन. पंजाब मधूनहि काँग्रेस निवडून यावे असे मला व्यक्तिशः वाटते मात्र ज्यांना निववळ हुल्लडबाजी करायची आहे अशा मूर्ख आप पार्टी कडे इथून पुढे कधीही कुठलेहि राज्य जाऊ नये. आजपर्यंत कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा इतका तिरस्कार वाटला नसेल तितका केजरीवाल चा वाटतो कारण केजरीवाल हा माणूस राजकारणी म्हणून अत्यंत नालायक आहेच पण एक माणूस म्हणूनही (human Being) अत्यंत व नीच व ढोंगी आहे.

In reply to by सुज्ञ

आम आदमी पार्टी व अरविंद केजरीवाल यांचे नाव जरी काढले तरी प्रचंड संताप येतो.
आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात नव्हे तर अस्मानात जाते!!
दुसऱ्या व्यक्तीचा पूर्णपणे उपयोग करून घेणे आणि वरपांगी मात्र सज्जनतेचा अभिनय करणे अशी या व्यक्तींची दुटप्पी भूमिका कायम असते.
असे म्हणतात की a man's character is known by what he does when nobody is watching!! वरकरणी "इन्सान का इन्सान से हो भाईचारा" वगैरे घोषणा देणारेच केजरीवाल योया आणि प्रभू यांच्या विशिष्ट अवयवावर लाथ मारून हाकलून द्यायची भाषा करतानाचे फोनवरचे बोलणे जाहिर झाले आहे. आणि हो उंटाच्या त्याच विशिष्ट अवयवाचा उल्लेख मिपावर झाल्यावर "ही कसली भाषा" म्हणून आआपसमर्थक तुटून पडले होते.पण प्रत्यक्ष केजरीवालांनी माणसाच्या त्याच अवयवाचा उल्लेख केल्यावर मात्र त्यांनी सोयीस्कर मौन पाळले होते. आमचे जॉर्ज ऑरवेल साहेब म्हणूनच गेले आहेत--"all animals are equal. But some animals are more equal than others." आता त्या न्यायाने उंट माणसापेक्षा कमी equal निघाला असे म्हणायचे तर!!
आज फक्त एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री असूनही या घाणेरड्या माणसाची पंतप्रधानांना वेडा म्हणण्यापर्यंत मजल गेली होती.
आपण नक्की कोणत्या पदावर काम करत आहोत, त्या पदाचे अधिकार आणि मर्यादा किती याचे भान प्रत्येकाने ठेवलेच पाहिजे आणि त्या प्रमाणेच वर्तन असले पाहिजे ही अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काय? ठिक आहे. दिल्लीच्या लोकांनी तुम्हाला भरभरून प्रचंड बहुमताने निवडून दिले पण याचा अर्थ तुम्हाला त्या पदाच्या अखत्यारीत नसलेल्या गोष्टींविषयी बेताल बडबड करायचा परवाना मिळत नाही. समजा उद्याला कुणा गैबी कुडुत्री गावच्या सरपंचपदी ९९.९% मते घेऊन कोणी निवडून आला आणि मला जनतेचे मॅन्डेट प्राप्त आहे असा दावा करत त्या पदाच्या अखत्यारीत नसलेल्या गोष्टींविषयी (उदाहरणार्थ भारताचे परराष्ट्रधोरण) कोणी बडबड करू लागला तर ते जितके गैर ठरेल तितकेच केजरीवालांचेही वर्तन गैर आहे. (अवांतरः याच कारणामुळे आमच्या रघुराम राजन साहेबांचे वर्तनही अनेकवेळा खटकण्यासारखे होते.अशा पदावरील कोणीही त्यांच्या पदाच्या अखत्यारीत नसलेल्या गोष्टींवर जाहिरपणे बोलणे अयोग्य आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. तरीही सरकारला अर्थकारण सोडून विविध गोष्टींवर free advice मधूनमधून राजनसाहेब देत असत. त्यांची गव्हर्नर म्हणूनची इतर कारकिर्द कशीही असली तरी हा प्रकार म्हणजे त्यावर नक्कीच डाग होता असे मला वाटते)
काँग्रेस व आप या दोनपैकी निवडायचे ठरल्यास मी निश्चितपणे काँग्रेस लाच निवडीन.
नक्कीच. पंजाबात अकाली-भाजपने प्रचंड गोंधळ घातला आहे आणि त्यांचा धुव्वा उडणे गरजेचे आहे. तसेच देशपातळीवर समर्थ विरोधी पक्षही हवा आहे. जर पंजाबात काँग्रेस जिंकली तर काँग्रेस गेल्या अडीच वर्षात बसलेल्या एकामागोमाग दुसर्‍या पराभवाच्या तडाख्यातून काही अंशी तरी सावरेल आणि ते राष्ट्रीय राजकारणाला चांगले असेल. त्याऐवजी असे मर्कटलीला करणारे केजरीवाल आणि आआपचा विजय होणे चांगले लक्षण नसेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

नक्कीच. पंजाबात अकाली-भाजपने प्रचंड गोंधळ घातला आहे आणि त्यांचा धुव्वा उडणे गरजेचे आहे. तसेच देशपातळीवर समर्थ विरोधी पक्षही हवा आहे. जर पंजाबात काँग्रेस जिंकली तर काँग्रेस गेल्या अडीच वर्षात बसलेल्या एकामागोमाग दुसर्‍या पराभवाच्या तडाख्यातून काही अंशी तरी सावरेल आणि ते राष्ट्रीय राजकारणाला चांगले असेल. त्याऐवजी असे मर्कटलीला करणारे केजरीवाल आणि आआपचा विजय होणे चांगले लक्षण नसेल.
देशात समर्थ विरोधी पक्ष असावा, पण तो काँग्रेस नक्कीच नसावा. काँग्रेस हा विरोधी पक्ष होण्यास सुद्धा पात्र नाही. काँग्रेस ही फक्त गुन्हेगार, भ्रष्टाचारी, देशद्रोही व जातीयवाद्यांची देशविघातक टोळी आहे. या टोळीचा संपूर्ण नि:पात होणे भारतासाठी गरजेचे आहे. विरोधी पक्ष असावा पण त्यात नवीन पटनाईकांसारखे नेते असावेत. पंजाबात अकाली-भाजपने चांगला कारभार केला नसला तरी काँग्रेस, बसप, आआप, सिधूचा नवीन पक्ष इ. पर्याय हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारातले आहेत. एकवेळ अकाली-भाजप परवडले, पण यापैकी कोणीही नको.

In reply to by श्रीगुरुजी

अगदी योग्य बोललात गुरुजी. पण, सध्या सगळी खान्ग्रेसी मंडळी भाजप मधे जाताना दिसत आहे त्याचे काय? म्हणजे काहिही होउ दे, हि लोकं सत्तेपासुन दुर नाहिच आहेत!!!!!

In reply to by सुखी

असल्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. एखादा खांग्रेससी भाजप मध्ये गेल्यावर गोमूत्र शिंपडले लगेच शुद्ध होतो.. तेवढी पावरच आहे गोमूत्रात...

In reply to by सुज्ञ

आजपर्यंत कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा इतका तिरस्कार वाटला नसेल तितका केजरीवाल चा वाटतो कारण केजरीवाल हा माणूस राजकारणी म्हणून अत्यंत नालायक आहेच पण एक माणूस म्हणूनही (human Being) अत्यंत व नीच व ढोंगी आहे.
संपूर्ण प्रतिसादातील वाक्यावाक्याशी सहमत, अपवाद फक्त खालील वाक्यांचा.
काँग्रेस व आप या दोनपैकी निवडायचे ठरल्यास मी निश्चितपणे काँग्रेस लाच निवडीन. पंजाब मधूनहि काँग्रेस निवडून यावे असे मला व्यक्तिशः वाटते
मी दोघेही निवडणार नाही. कॉंग्रेस हा आआपइतकाच नालायक पक्ष आहे.

In reply to by पिलीयन रायडर

असे झाले का Btw जेंव्हा अण्णा हजारेंच्या आंदोलनात हा माणूस होता, तेंव्हाच मी नवरोबांबरोबर पैज लावली होती , कि हा माणूस खूप पाताळयंत्री वाटतो आहे, आणि अण्णांच्या मागे येण्यात ह्याचा स्वतःचा अजेंडा आहे, आमच्या नवरोबाना हा चांगला माणूस इ इ वाटत होता पैज हरला ना राव त्यामुळे येत जाता त्याला ऐकवू शकते, तुला कशी माणसाची पारख नाही आणि मला कशी आहे

In reply to by सामान्य वाचक

त्यामुळे येत जाता त्याला ऐकवू शकते, तुला कशी माणसाची पारख नाही आणि मला कशी आहे >> फार वेळा म्हणू नका हं.. नाहीतर "तुझी पारख मी केली आणि तू माझी" असे उत्तर ऐकायला मिळेल ;)

In reply to by सामान्य वाचक

जेंव्हा अण्णा हजारेंच्या आंदोलनात हा माणूस होता, तेंव्हाच मी नवरोबांबरोबर पैज लावली होती , कि हा माणूस खूप पाताळयंत्री वाटतो आहे, आणि अण्णांच्या मागे येण्यात ह्याचा स्वतःचा अजेंडा आहे,
यावरून एक गोष्ट आठवली. अण्णांचे २०११ मधले उपोषण जोरात चालू होते त्यावेळी त्या उपोषणाला विरोध करणे म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन देणे वगैरे हिस्टेरिया जाणीवपूर्वक तयार करण्यात आला होता. त्यावेळी मिपावरही जोरदार चर्चा झाली होती.सुरवातीला अनेक भाजप समर्थक अण्णा-केजरीवाल कंपनीचा उदोउदो करत होते तर काँग्रेस समर्थक अर्थातच या प्रकाराचा विरोध करत होते.पुढे आआपची स्थापना झाल्यावर केजरीवाल भाजपविरूध्द उलटल्यावर भाजप समर्थक केजरीवालांना नावे ठेवायला लागले आणि काही काँग्रेस समर्थक केजरीवालांच्या बाजूने बोलायला लागले.(मुळचे इकडचेच असलेले) पण सध्या तिकडे असलेले काही या कॅटेगिरीमध्ये मोडतात. या बाबतीत मात्र माझी भूमिका कन्सिस्टन्ट आहे याचा सार्थ अभिमान मला आहे :) अण्णांच्या उपोषण काळापासूनच या असल्या अराजकवादाला माझा विरोध होता.आणि त्यातही केजरीवाल म्हणजे गुड फॉर नथिंग लोकांचा सरताज आहे हेच मत होते. आणि हो. मिपावर तरी केजरीवाल आणि आआपचा माझ्यापेक्षा अधिक कडवा विरोधक सापडणे तसे कठिणच आहे याचाही मला अभिमान आहे :)

In reply to by गॅरी ट्रुमन

कारण प्रामुख्याने हे महोदय आहेत ते खोटे वागणे, बोलणे, खोटा साधेपणा इ इ पहिले कि tv फोडीन असे वाटते बाकी तुमच्या पोस्ट शी सहमत सगळाच एकंदरीत भंपकपणा होता

In reply to by गॅरी ट्रुमन

त्यावेळी मिपावरही जोरदार चर्चा झाली होती.
ह्या चर्चेची लिंक मिळेल का ? दुर्दैवाने त्यावेळी मी मिपावर नव्हतो.. आशुतोषची शप्पथ घेऊन सांगतो, ती चर्चा फक्त वाचेल. धागावर काढणार नाही. :-)

In reply to by गॅरी ट्रुमन

आआपच्या पवन शर्मा नावाच्या आमदाराला काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने २००९ मधील एका कामगाराच्या मृत्युच्या संदर्भात दोषी जाहीर करून १८ महिन्यांच्या तुरंगवासाची शिक्षा जाहीर केली. ही बातमी बहुतेकांच्या नजरेतून निसटलेली दिसते. २०१२/१३ मध्ये केजरीवालांनी असे जाहीरपणे सांगितले होते की "शिक्षा झाल्यावर आमदारकी/खासदारकी रद्द होण्याऐवजी एखाद्यावर नुसते आरोप असले तरी त्याची/तिची आमदारकी/खासदारकी रद्द व्हायला पाहिजे". या पवन शर्माचे प्रकरण २००९ चे आहे. खोटी पदवी प्रमाणपत्रे तयार करणार्‍या जितेंद्र तोमरवर २०१५ मधील निवडणुक होण्याच्या आधीपासून आरोप होते. अर्थात केजरीवालांनी त्याला जाहीररित्या निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. त्या निवडणुकीच्या वेळी या दोघांना तिकीट देताना केजरीवालांना आपल्याला जाहीर घोषणेचा सोयिस्कर विसर पडला.
सुरवातीला अनेक भाजप समर्थक अण्णा-केजरीवाल कंपनीचा उदोउदो करत होते
सुरवातीला त्यात मीही होतो. २०१३ मधील विधानसभा निवडणुकीत राजस्थान, म. प्र. व छत्तीसगड येथे भाजपला बहुमत मिळावे व दिल्लीत आआपला बहुमत मिळावे अशी माझी इच्छा आहे असे मी एका धाग्यावर लिहिले होते. केजरीवालांमुळे मी त्यावेळी खूप प्रभावित झालो होतो. अर्थात नंतर इतरांप्रमाणे माझाही भ्रमनिरास झाला. मात्र अण्णांबद्दल मला अजूनही पूर्वीइतकाच आदर आहे व त्यांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे.

दुसरा धागा काढताय का ? कारण अजून खूप लोकाना खूप बोलायचे असणार आहे

In reply to by सामान्य वाचक

दुसरा धागा काढताय का ?
हो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अन्य कोणी मिपाकराने नवीन धागा काढल्यास हा धागा वाचनमात्र करायला काहीच हरकत नाही. ८००+ प्रतिसाद म्हणजे तसे खूपच झाले. या क्षणी तरी नवा धागा काढायचा उत्साह नाही. पण तुम्ही किंवा अन्य कोणी नवा धागा काढल्यास नक्कीच सहभाग घेईन :)