Skip to main content

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 09/07/2016 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 176915
प्रतिक्रिया 484

प्रतिक्रिया

In reply to by मोदक

खालची आळी, घर क्रमांक ८४०, पोष्टाच्या मागे, हितंच, ग्रह क्रमांक 3 आणि 4 च्या मध्ये, सौरमाला, आपलीच आकाशगंगा,

In reply to by स्वामी संकेतानंद

ट ला ट आणि फ़ ला फ़ चे केले आणि यमक जुळवले तरी त्याला कवितेचा दर्जा देऊन "क्या बात है" अशी दाद देणारे शेकडो मिळून जातात. पण विडंबन हे ऐर्‍यागैर्‍याचे काम नव्हे! विडंबन करायला अभ्यास लागतो, प्रतिभा लागते आणखी बरेच काही लागते. तुम्ही स्वत:चा शोध घ्या आणि तुम्हाला काय योग्य वाटते ते करा. मी निर्णय देऊ शकत नाही.

In reply to by मृत्युन्जय

आपल्या चरणावर आस्वादासाठी माझा एक शेर अर्पण करतो; आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

भरपूर प्रतिसाद दिसतायत म्हणून कविता वाचली, प्रतिसादातले महाभारत पूर्ण वाचले नाही. कवितेत आवेश, संताप आणि उपरोध ठासून भरलेला असला तरी तिच्यात विश्लेषण नाही. शेतमालाचा भाव, कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे कवितेत मावणारे विषय नाहीत. कवितेला पूरक म्हणून एका लेखात तुमची भूमिका काय आहे, व्यवस्थेतले दोष काय आहेत, ते दूर करण्यासाठी कोणत्या योजना आखायला हव्यात हे मांडलेत तर विषयाला न्याय मिळेल.

In reply to by विशाखा पाटील

कवितेत आवेश, संताप आणि उपरोध ठासून भरलेला असला तरी तिच्यात विश्लेषण नाही. कविता तशी असते हे तुम्हाला कोणत्या मास्तरणे शिकवले? त्यांचा पगारच परत मागायला पाहिजे. फुक्कटचा पगार खातात आणि काहीबाही शिकवतात.
शेतमालाचा भाव, कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे कवितेत मावणारे विषय नाहीत. कवितेला पूरक म्हणून एका लेखात तुमची भूमिका काय आहे, व्यवस्थेतले दोष काय आहेत, ते दूर करण्यासाठी कोणत्या योजना आखायला हव्यात हे मांडलेत तर विषयाला न्याय मिळेल.
मी लिहिले नाही हे तुम्ही कसे ठरवले? जरा मिसळपाव शोधून पहा. मी काय लिहिले हे आता प्रत्येक आयडीच्या घरोधरी जाऊन सांगू का?

In reply to by गंगाधर मुटे

मी काय लिहिले हे आता प्रत्येक आयडीच्या घरोधरी जाऊन सांगू का?
जौ द्या हो मुटेसाहेब. पण तुमचा मुद्दा पटला.

२७७ प्रतिसाद, काय झालय काय मिपाला ? गोपाला गोपाला, हवे करुणा राखजो हां !

In reply to by मुक्त विहारि

गोळा झाल्यावर सांगा बादाम सातला पाच भिडू तयार आहेत , पाँईटची रमी नको उगा भांडणाला कहार. नाखु पिसून पत्ते

In reply to by मुक्त विहारि

गड्डा झब्बू सगळ्यात चांगला! नाहीतरी १०-१५ जणांचा 'कंपू' आहेच.. असं 'त्यांचं' मत आहे!

तुम्ही स्वतःला शेतकरी म्हणवता अाणि इथे या धाग्यावर एवढा वेळ घालवता? खरा शेतकरी शेतात काम करतो, आमच्यावर कसा अन्याय झालाय हे जगाला सांगायला जात नाही. शिवाय तुमच्याकडे इंटरनेट आहे, वाया घालवायला भरपूर वेळ आहे. तुम्ही सधन शेतकरी आहात बहुतेक. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचे त्रास तुम्हाला समजणं शक्यच नाही. त्यामुळे हा खोटा कळवळा सोडून द्या!

In reply to by सस्नेह

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; लक्ष्मीस आणखी मी, सांगा किती पुजावे? नांदूच देत नाही, ही अवदसा सुखाने! (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

In reply to by बोका-ए-आझम

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; डोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी काही तरी 'अभय' कर; मुक्ती मिळेल ज्याने (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

In reply to by सनईचौघडा

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

In reply to by गंगाधर मुटे

मुटे साहेब एक प्रश्न पवारांनी संपुर्ण कर्ज माफी देउनहि शेतकर्याचा सातबारा हा कसा भरला हो,म्हणजे कर्जमाफी हा आत्महत्यांवर रामबाण उपाय असु शकतो का?असेल तर कसा?नसेल तर का नाही?

श्री. मुटे यांची मते मला पटत नाहीत. आमचे मतभेद जाहीर आहेत. पण या कवितेत त्यांनी त्यांच्यातीलच पुढार्‍यांवर टिकेचे आसूड ओढले आहेत. जे दुर्दैवाने खरे आहे. त्याबाबतीत काय तक्रार आहे हे मला तरी कळले नाही. श्री. मुटे, मला तरी या कवितेतील भाव आवडला. किंचित राग, हतबलता, बोचरा.... आवडली मला कविता.

In reply to by बाळ सप्रे

नाही. पण त्यांनी कविता लिहिली आहे तेव्हा त्यावर प्रतिसाद असावेत अशा अपेक्षेने हा धागा उघडला होत... :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

सामना संपलाय तेव्हा ज्यांना क्षणचित्रे बघायची आहेत त्यांना बघु द्या.

In reply to by जयंत कुलकर्णी

त्याबाबतीत काय तक्रार आहे हे मला तरी कळले नाही. तक्रार येथे आहे ******************* गंगाधर मुटे - दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते मोदक - हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे? गंगाधर मुटे - अव्याहत सुरू आहे. मोदक - १६ ऑगस्ट १९४७ पासून का? गंगाधर मुटे - १६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? (या वाक्यापुढेही प्रतिसाद आहे) मोदक - इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? गंगाधर मुटे - भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा. मोदक - वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत? *******************

In reply to by मोदक

इथे ठीणगी पडली.. आणि
तुम्हाला मानसोपचारतज्ञाची प्रचंड गरज आहे.
याने त्यावर पेट्रोल ओतले.. मग पत्त्यांचा डाव सुरु झाला :-)))

In reply to by कपिलमुनी

मुटेंच्या लिखाणात सत्ताबदलाचे धागे (ट्रेसेस या अर्थी) सापडतात म्हणून सरळ सरळ विचारले. हो / नाही इतके सरळ उत्तर अपेक्षित होते.

In reply to by मोदक

हो / नाही इतके सरळ उत्तर अपेक्षित होते. ते त्यांनी दिले. त्यांना जे खटकले नाही ते तुम्हाला का खटकले ते सांगता का?

In reply to by बाळ सप्रे

तुमी नाय वो, हे त्या कमु ला उद्देशून आहे. मे २०१४ चा मुद्दा मुटेंना खटकला नाही, मात्र कमुंना खटकला...

In reply to by मोदक

मे २०१४ चा मुद्दा मुटेंना खटकला नाही...
तुम्ही काय मुटेंचे अधिकृत प्रवक्ता आहात का हे अधिकारवाणीने सांगायला? मला खटकला की नाही हे ठरवण्याइतपत मनकवडे आहात का तुम्ही? अस्तित्वहीन आहात म्हनून काहीच्या काहीही लिहायचे?

In reply to by कपिलमुनी

त्यांनाच सत्ताबदल झाल्याचा इतका राग आहे की इथेच पहा मनातले शब्द बरं त्याम्च्या मतांबद्दल, आकडेवारीबद्दल आक्षेप असलेले प्रतिसाद सन २०११ पासून येत आहेत त्याची उत्तरे त्यांनी काय पद्धतीने दिली हे सगळ्यांनी पाहिले आहे,इथेहे मोदकने साधा प्रश्न विचारला त्याला शब्दाच्या जाळ्यात अडकवून गोल गोल फिरवले पण उत्तरपक्षी मत काही दिले नाही. इतकएच काय मुनीवर तुम्ही वगळता (त्यांच्या) एकाही पाठीराख्यांना त्यांनी जरातरी तारतम्य राखून आणि मुद्देसूद (माहीत नसेल तर प्रांजळपणे यातले मला माहीत नाही) मते/प्रतिसाद द्या असे एकदाही म्हटले नाही, फक्त आगीत तेल ओतण्याचेच काम केले. त्यांनी काही विधायक सकारात्मक काम केले असेल तर सांगावे.लोक त्याचे स्वगतच करतील, खटपट्या यांनी गावाकडे बंधार्याचे काम केले मिपाकरांना ते भावले आणि पटलेही. बाकी काय सांगणार आप्लाच नम्र नाखु

In reply to by नाखु

मी मुटे किंवा इतर शेतकरी संघटनांचा पाठीराखा मुळीच नाही. यांचा राजकारण फार जवळून पाहिला आहे. आजचा विद्रोही उद्या सत्तेत भागीदार व्हायला किती आसुसलेला असतो ते पाहिला आहे. बाकी मुटे हे प्रॅक्टीकली बोलत नाहीत , विदा देत नाहीत याबद्दल सहमत. आणि विधायक कामाबद्दल मी सुद्धा वरतीच लिहिले आहे

In reply to by कपिलमुनी

लगेच भक्त वगैरे??? तुमच्यासारख्यांना "मे २०१४" मुळे लैच जळजळ झाली आहे बहुदा.. अजुनही बरी होण्याचे नाव घेत नाहीये. असूदे असूदे.. २०१९ पर्यंत (आणि रागांची कामगिरी अशीच सुरू राहिली तर किमान २०२४ पर्यंत) रोजच्या रोज इनो घेत रहा.

In reply to by नाखु

आज २१ मोदक फस्त कर्नार :) मे २०१४ ला आनंद झाला होता . पण नंतर त्यावर पाणी ओतले गेलेय . बाकी रागां सध्या पोकेमॉन खेळत असतात असे ऐकून आहे , त्यांच्याकडून अपेक्षा करणार नाहीच. अवांतर : भक्तांबद्दलची टीका बोचण्याचे कार्ण काय बरं??

In reply to by कपिलमुनी

भक्तांबद्दलची टीका बोचण्याचे कार्ण काय बरं?? सरसकटीकरन वो.. मानूस द्वेषात आंदळा व्हू न्ये याची क्ल्जी घ्याय्ची.

In reply to by मोदक

आमच्याकडे ५२ पत्ते आणि २ जोकर फ्री मिळतील शिवाय १ वाइल्ड कार्ड देखील फ्री.

In reply to by सूड

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; शेती कसून दाखव, विद्याप्रचूर तज्ज्ञा सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

In reply to by जयंत कुलकर्णी

कुळकर्णी सर, या धाग्यावर झुंडशाहीने इतका चिखल आणि घाण करून ठेवला आहे की कुणाला धन्यवाद द्यायची इच्छा होत नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद म्हणण्याच्या मुड मध्ये नाही आहे.म्हणेल कधीतरी. तोपर्यत उधार असू द्या.

मै तो हूं पागल ये कहूं हर पल कर कोई हलचल होने दे होने दे होने दे होने दे होने दे कोई दीवानगी...!

In reply to by बोका-ए-आझम

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; स्मशानातल्या मसन्याउदास, कुठे काय वर्ज्य मेल्यावरती मर नाहीतर, जिवंतपणी मर (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

असं नाय करायचं बाबा! इतक्यात संपलं पण???? हे काय ब्रोब्र नाही. आत्ता कुठे इन्वेस्टमेंट केलो होतो. सगळे दुत्त दुत्त आहेत.

संपादित. कृपया व्यक्तिगत टीकाटिप्पणी टाळावी.

मिपावर फुकटात लिहाय्ला मिळणारी मंडळी १००% आहेत त्यात ७०% उजवी असुन ३०% डावी आहेत. आणी हे ७०% मधले १००% लोक हे झुंडशाहीने वागतात , कंपु बनवुन ३०% मधल्या २% लोकांना त्रास देतात. ह्यावरुन एक सिद्ध होते की ७०% मधले १००% जे असे वागतात त्यातले ४८% हे दुष्ट, २२% हे अतिदुष्ट, आणी ७% हे अतिअतिदुष्टदुष्ट आहेत.उरलेले तर हाता बाहेर गेलेले केस आहेत. प्रत्येकाने आपापले इव्ह्यलुएशन करुन आपण कोणत्या % मधे येतो हे पडताळुन पहावे. बाकीच्यांनी शेती, नोकरी, व्यवसाय करावा.

In reply to by इरसाल

आणि आपणहून पत्ता देणार्‍या किंवा कधीही या, स्वागतच आहे, असे सांगणार्‍या मिपाकरांचे % न दिल्याबद्दल, इरसाल ह्यांचा णिषेढ.

In reply to by मुक्त विहारि

पत्ते देणार्‍यांचा डाटा जमा करायचं काम डाव्यांमधल्या १.५% जणांना दिलेले आहे, विदा मिळताच ते % दिले जाईल.

In reply to by इरसाल

आता एखादी ट्रिप बडोद्याला काढावीच लागणार. बादवे, बडोद्याच्या आसपास बघण्यासारखे काय आहे? सयाजीरावांचा महाल तर बघायचा आहेच. अज्जुन काही महत्वाची ठिकाणे असतील तर फार उत्तम.

In reply to by मुक्त विहारि

माधव आचवलांनी साकारलेले EME टेंपल, श्रीराम टमटमवाला (टमटम हा भेळे सारखा एक प्रकार असतो) बाकी खादाडी इरसालबुवा सांगतीलच. सयाजीरावांचा महाल बघण्यास बहुदा परवानगी नाहीये. (लक्ष्मी विलास पॅलेस हाच सयाजीरावांचा महाल आहे का?) जमले तर आणंदला जावून या.

In reply to by मोदक

उगाच चांगल्या धाग्यात मोडता घालत आहेत हे माझे आता सपष्ट मत झालेले हाये. ईथे लोकांना शेतीकरुन खायची पडलीय नी तुम्हाला खादाडी सुचतेय होय......