रमन राघव २.०
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सामान्यतः समाजात चांगली आणि वाईट अशा दोन प्रव्रुत्तीची माणसं असतात असं मानतात. दोन्ही प्रव्रुत्तींचे रंग ही ठरलेले.....चांगल्यासाठी सफेद तर वाईटासाठी काळा. एवढ साध सरळ सोप असुनही आपण वर्गिकरण करण्यात चुकतो... बर्याच वेळा समोर असणारी व्रुत्ती ही फक्त चांगली वा वाईट एवढ्याच फरकात बसवता येत नाही किंबहुना ते ओळखणही खूप कठीण असतं. चांगला आणि वाईट, सफेद आणि काळा हे दोन्ही रंग जिथे एकमेकांना भिडतात तिथे अजुन एक छटा निर्माण होते....करडी(ग्रे शेड). कदाचित समोर दिसणारं करड्या छटेतलंही असु शकेल. काही प्रव्रुत्त्या, काही माणसं या ही छटेतली असतात...असु शकतात. समोर दिसणार तेवढच खर अस बर्याच वेळा नसतं. हेच पटवून देणारा चित्रपट.....रमन रघव २.०..
रमन राघव हा ७० च्या दशकातला एक सायको किलर. पण हा चित्रपट त्यावर नाही अशी स्पष्ट सुचना अगदी सुरुवातीलाच आपल्याला दिसते. रमन राघव हे नाव त्यात मिडिआने दिलेलं एक वलय आणि समोर ची सुचना...क्षणासाठी आपण गोंधळतो. तेवढ्यात चित्रपट सुरु होतो. ही कथा आहे ११ खूनांची, एका पोलिसाची आणि स्वतःला रमण म्हणनार्या एका माणसाची. आठ सलग भागांमधे ही कथा आपल्यासमोर येते. अगदी पहिल्या काही मिनिटांपासुन ते शेवटाच्या काही मिनिटांपर्यंत आपण भिती, चिड, राग, घ्रुणा या सगळ्याची सफर आपण या कथेबरोबर करतो. या रमणला त्याच्या राघवची तलाश असते. आठ भागात त्याचा राघवला शोधण्याचा आणि त्याला पोलिसांनी शोधण्याचा प्रवास आपल्यासमोर येतो. तस पाहिल तर त्या रमन राघवचा आणि या रमन काहिच संबंध नाही फक्त व्रुत्ती सोडली तर. पण ज्या पद्धतीनं अनुराग कश्यप आणि वसन बाला या द्वयींनी कथा- पटकथा बांधली त्याला पाहुन आपण काही काळ हे सर्व विसरुन जातो. कथेला एक वेग आहे आणी मध्यांतरापूर्वी आणि मध्यांतरानंतर त्याच वेगात ही कथा पुढे सरकते. त्यामुळे आपण नीट खिळुन असतो. दिग्दर्शक म्हणुन त्याला आपल्या लिखाणाचा फायदा झालाच आहे पण खरा प्रभाव चित्रपट पाहताना आपल्यावर जाणवतो. हे त्या द्वयींच यश आहे.
अभिनय या चित्रपटचा सगळ्यात मोठा महत्वाचा आणि प्रभाव टाकणारा भाग. हा चित्रपट कशासाठी पाहावा असा प्रश्न पडला उत्तर एकच...अभिनय. नवाझुद्दिन अभिनय करतो म्हणन्यापेक्षा तो प्रत्येक भूमिका जगतो हेच खर. रमनच ते सायको असणं त्याच्या डोळ्यात अक्षरशः दिसत. त्याच्या विरुद्ध पोलिसाच्या, राघवन च्या भूमिकेत असणारा विकि कौशल त्याला तगडी टक्कर देतो. लवशव ते चिकन खूराना किंवा मसान सारखे चित्रपट केल्यानंतर त्याच्या अभिनयत बदल जाणवतो. त्याला समांतर असणारी त्याची फिजिकल फ्रेंड सिम्मि शोभिता धुलिपला उत्तम उभी करते. या तिघांसोबत अम्रुता सुभाष असेल, अशोक लोखंडे असतिल, हर्श सिंग, राजेश जैस अगदी सगळे आपापल काम चोख बाजावतात. प्रत्येकात एक वेगळी अस्वस्थता अगदी चित्रपट संपेपर्यंत जाणवते..
अभिनय, कथा-पटकथेबरोबर संगीत हे सुद्धा एक महत्वाचं माध्याम या चित्रपटात मोठी भुमिका बजावतं. राम संपथच संगीत तेवढच भारदस्त. खिळवून ठेवणारं.. जो प्रभाव कदचित कथेनं वा पटकथेनं टाकला नसता तो संगीत आपल्यावर टाकतं. पार्श्वसंगीताचा प्रभाव आपल्यावर चित्रपटग्रुहातुन बाहेर पडल्यावरही काही काळ जाणवतो.यातच सर्व काही आलं. आरती बजाजची कात्री आणि जय ओझाचा कॅमेरा या दोघांकडे लक्ष द्यायला कथा-पटकथा आणि संगीत वेळच देत नाहीत.
एकंदरीत, काळ्या-सफेदातला फरक जो कदाचित आपण उघड्या डोळ्यानींसुद्धा पाहु शकत नाही पण तो आहे आणि हे सत्य आहे हेच हा चित्रपट सिद्ध करण्याचा उत्तम प्रयत्न करतो. त्याची सिद्धता ज्याच्या त्याच्या वैयक्तिक पातळीवर अवलंबुन आहे. फक्त अनुराग कश्यपचा आहे म्हणुन जर चित्रपट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा चित्रपट आहेच पण तगडा अभिनय काय असतो, पटकथा-कथा-संगीत ही तिकडी काय परिणाम साधु शकतात हे पाहायचं असेल तर मात्र हा चित्रपट नक्किच पाहावा. अनुरागची रिस्क घेण्याची शैली आणि त्याच्यातला वेडेपणा हा चित्रपट पुन्हा एकदा सिद्ध करतो हे नक्की....
प्रतिक्रिया
मला सर्वात जास्त यात जर काही आवडलं असेल तर detailing.
साक्षीदार
@तिमा
वाकटकर रामन राघवला
रमन राघव २.०
मस्तं आहे परीक्षण.
परीक्षण आवडले....
वा वाटच बघत होतो....
तुम्ही परीक्षण छान लिहिता
@सगळे