✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी बाई होते म्हणुनी .. भाग ०८

५
५० फक्त यांनी
Fri, 06/10/2016 - 03:12  ·  लेख
लेख
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964 मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०६ http://misalpav.com/node/36166 मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०७ http://misalpav.com/node/36252 सगळे नगरवासी आता, स्वयंवराची तयारी आवरुन विवाहाच्या तयारीला लागले होते, तीन चार दिवसांनी राजा दशरथ आपल्या कुटुंबियांसहित मिथिलेला येत असल्याची वार्ता आमच्या गुप्तचरांतर्फे आम्हाला मिळाली..... पुढे... पुर्वी एका रात्री मी आईच्या मांडीवर डोकं ठेवुन झोपण्याचा प्रयत्न करत होते, तेंव्हा आईनं विचारलं, ' बाळा, काहीतरी विचारायचं आहे तुला, आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मला सुद्धा शांतता मिळणार नाही, विचार काय हवंय तुला ?' मी आईला आज पुन्हा तोच प्रश्न् केला, ‘’ आई, स्वयंवर् म्हणजे आपल्याला जो आवडेल्, हवासा वाटेल् असा वर् निवडण्याच्ं स्वात्ंत्र्य् देणारी व्यवस्था ना, मग् ताईच्या स्वय्ंवरात् तो धनुष्याचा पण् कशासाठी ठेवला गेला ?, त्या धनुष्याच्ं अन् ताईच्ं काही नात्ं आहे. आणि तु मागे एकदा क्षत्रिय असा उल्लेख् केला होतास्, त्याचा इथ्ं काही स्ंब्ंध् आहे अशी श्ंका आहे मला, या सगळ्याचा उलगडा झाल्याशिवाय् मला देखिल् शांतता लाभणार् नाही.’’ आईच्या चेह-यावरचे शांत भाव् बदलत चालल्याच्ं मला जाणवल्ं, अगदी तिच्याकड्ं न पाहता देखील्, माझ्या डोक्यावर् फिरणारा तिचा हात् आता एकाच् ठिकाणी स्तब्ध् झाला होता. ‘’ हे पहा बाळा, तु म्हणतेस् ते अगदी योग्य् आहे, एखाद्या स्त्रिला तिला योग्य वाटेल् अशा पुरुषाशी विवाह् करण्याची मोकळीक् असण्ं म्हणजे स्वयंवर्, पर्ंतु हे तुम्हां तिघींच्या, क्षत्रियकन्यांच्या बाबतीत् खर्ं आहे, कारण् तुमचा जन्मच् झालेला असतो, स्वत्ंत्र विचाराच्या आणि निर्णयक्षमता असलेल्या स्त्रि पुरुषाच्या संकरातुन्, तुमच्या आईन्ं देखील् स्वयंवराचा अधिकार् वापरुन् आपल्या पतिची निवड् केलेली असते, पर्ंतु तुझ्या ताईच्ं तस्ं नाही, ती भुमिकन्या, जमिनिच्या पोटात् एका पेटित सापडलेली, तिच्या ख-या मातापित्यांविषयी कुणालाच सत्य् माहित् नाही. मग या भुमिलाच तिची आई मानल्ं जाउ लागल्ं, क्षत्रिय् हे या भुमिवर् राज्य करणारे आणि भुमि हे राज्य् करुन् घेणारी हा नियम् आहे या जगाचा. या भुमिच्ं रक्षण् करण्ं हे आपणा क्षत्रियांच्ं कर्तव्य, या बदल्यात् हि भुमी त्यांना धान्य्, धातु अशी स्ंपत्ति देत् राहते.. तिला आपला रक्षक् निवडण्याच्ं स्वात्ंत्र्य् नाही, अनेक् वेळा युद्धातुन् किंवा तहांमधुन् तिचा रक्षक् , तिचा अधिकारी बदलतो, म्हणुन् तुझ्या ताईसाठी हा स्वयंवरात् हा पण् ठेवला गेला, निदान् या धनुष्याच्या निमित्तान्ं तरी या भुमिकन्येचा विवाह् योग्य अशा क्षत्रियाबरोबर् व्हावा जो तिच्ं रक्षण् करु शकेल्, तिला जपु शकेल् आणि तिच्यापासुन् प्राप्त् होणा-या स्ंपत्तीचा अधिकारी होउ शकेल्. या उत्तरान्ं ना माझ्ं समाधान् झालं, ना आईच्ं पण् आता अजुन् झोप् टाळण्ं शक्य् नव्हत्ं, म्हणुन् आम्ही दोघीही झोपी गेलो. या दिवसान्ंतर् आमच्या नगरांत् फिरण्यावर् ब्ंधन्ं आली, कुठेही जायच्ं असेल् तर् बाबांना किंवा काकांना विचारुनच् जाव्ं लागे आणि प्रत्येकवेळी महिष् दलाच्या आवरणातच् वावराव्ं लागे, नाट्यशाळा असो की गोशाळा, एखादाच् दिवस् उद्यानात् आणि नदी किनारी जायची परवानगी मिळे. ‘ उद्या राजा दशरथ् आणि त्यांचे म्ंत्रिगण् वाड्यात् येणार् आहेत्’ बाबांनी आमच्या दालनात् येत् घोषणाच् केली, आम्ही तिघी उठुन त्यांना नमस्कार् केला, उद्या तिस-या प्रहरी राजा दशरथ् आणि त्यांचे सहकारी म्ंत्रि तसेच् कुलगुरु येणार् असल्याच्ं कळाल्ं, बाबा, काका आणि इतर् मोठ्यांना तर काही वेळ् नव्हता, त्यांच्या सोबत् सगळी मिथिला नगरी एक् लग्ननगरी झाली होती.. सगळे जण् विवाह समारंभाच्या तयारीत् लागले होते, पण् अजुन् विवाह् कधी आहे हेच् ठरलेल्ं नव्हत्ं, उद्याच्या भेटीच्या वेळी या सर्व् गोष्टी ठरतील् अस्ं आईन्ं सांगितल्ं. ती रात्र मी आणि ताईन्ं वाड्यातल्या पुष्करिणिच्या काठावर् बसुन् बोलत् जागवली.. ‘’ ताई, तुला पुन्हा भेटावं अस्ं वाटलं का गं रामाला, ? मी विचारल्ं ‘ नाही ग, त्या दिवशी आपण् नाट्यशाळेत् जात् होतो तेंव्हा त्यांच्या निवासाजवळुन् रथ् जाताना दिसले होते, थांबाव्ं अस्ं वाट्लं देखील्, पण् बाबांची आज्ञा आठवली अन् काही बोलले नाही.’’ ‘हो, पण् तेंव्हा तर् ते दिसले होते ना, च्ंपकव्रुक्षाखाली बसलेले त्या ऋषींसोबत्, एका हातात् खड्ग् होत्ं अन् दुस-या हातात् बाण्, तुझा विचार् होता तर थांबलो असतो, मी तर बाबांची अनुमती घेतली असती अशा वेळी.. अजाणतेपणी मी तिला तिच्ं वेगळ्ंपण् जाणवुन् देण्याचा प्रयत्न् केला, अन् ती एकदम् शांत झाली, समोरच्या पाण्यात् पाहात्. मग मीच् माझ्या डोक्यातुन् एक् फुल् काढुन् पाण्यात् टाकल्ं अन् पाणि हलल्ं तस्ं तिच्ं एकटक् पाहण्ं भंगल्ं, ‘’ खर्ं सांगु, आता या पाण्यात् पण् मला रामाच्ंच् चित्र दिसत्ंय्,’’ तिच्या चेह-यावर् पुन्हा तेच आश्चर्य् आणि मोहाचे तर्ंग् उमटत होते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान

प्रतिक्रिया द्या
2532 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

खूपच सुरेख. थोडंसं वेगळं वळण

प्रचेतस
Fri, 06/10/2016 - 05:14 नवीन
खूपच सुरेख. थोडंसं वेगळं वळण मिळालंय कथेला.
  • Log in or register to post comments

लेखावर टंकनसंस्करणाची गरज आहे

एस
Fri, 06/10/2016 - 08:41 नवीन
लेखावर टंकनसंस्करणाची गरज आहे. बाकी उत्तम.
  • Log in or register to post comments

...

नीलमोहर
Fri, 06/10/2016 - 10:19 नवीन
छान सुरू आहे मालिका, पुभाप्र.
  • Log in or register to post comments

छान लिहिताय.

रेवती
Sat, 06/11/2016 - 04:34 नवीन
छान लिहिताय.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा