विखार - कथा - काल्पनीक
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
विखार - कथा - काल्पनीक
लग्नसमारंभाचा हॉल छान सजवलेला होता . सकाळपासुन पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली . थोड्याच वेळात लग्नाचे विधी सुरु झाले . वधुपक्षाची मंडळी लगबगीने इकडुन तिकडे धावत होती . दोन्ही बाजुंकडील लोकांचे आगत- स्वागत , मानपान कौतुकाने करीत होती . वरपक्षाच्या लोकांना काय हवे नको ते बघुन त्यांच्या मागण्या हसत हसत पुरवीत होती.
पण हळुहळु वरपक्षाची मंडळी पिसाटल्यासारखे करु लागली . त्यांच्या मागण्या अचानक वाढतच जाउ लागल्या .
"मुलाला नवीन घड्याळ हवे " , "मुलाच्या अमक्या तमक्या नातेवाईकांचे आहेर , मानपान नीट झाले नाही ते आधी पार पाडा" अशा एकेक फर्माईशी सुटु लागल्या . या मागण्या पुरविता पुरविता वधुपक्षाची चांगलीच दमछाक झाली . वधुपक्षाच्या डोक्यावरील खर्चाचा आणी कर्जाचा आकडा एकाच वेळी वाढु लागला .
"पुजेसाठी तबक हवे आहे " अशी मागणी झाली . वधुकडील लोकांनी घाईघाईने आपल्या सामानातुन आणलेले पुजेचे तबक काढुन दिले .
"हे काय ? इतके साधे तबक ? तुम्ही सोन्याचे तबक का नाही आणले ? एवढी ऐपत नाही तर द्यावी कशाला आमच्या सारख्या थोरामोठ्यांच्या घरी मुलगी ? " मुलाकडील एकजण करवादला .
"नाहीतर काय ? दळभद्री कुठले . आम्ही काय तुमच्या दाराशी आलो होतो काय मुलगी द्या म्हणुन ?" दुसरा बडबडला .
"अहो , तुमची मुलगी एवढ्या चांगल्या तालेवार , मातब्बर आणी घरंदाज कुळात जात आहे तर कशाला खर्चात हात आखडता घेताय ? हि सोयरीक तोडु नका . होउद्यात खर्च...." मुलाकडचा आणखी एकजण आगीत भर घालत म्हणाला .
या सगळ्या अपमानाने वधुपक्षामधील सर्वजण पार खजील होउन गेले . "मुलीचे लग्न मोडले तर समाज काय म्हणेल ?" या भितीने ते आता चांगलेच अडकले होते . हवालदिल झाले होते . वधुकडील काही मंडळी घाईघाईने बाहेर पडली . बाजारपेठेतल्या एका नामवंत दुकानात जाउन त्यांनी सोन्याचे तबक खरेदी केले आणी ती परत हॉलमध्ये आली . सोन्याचे तबक मिळाल्यावर मग मुलाकडील लोक थोडावेळ जरा शांत झाले .
वधुमुलगी हा चाललेला सर्व अपमानास्पद प्रकार हताशपणे पाहात होती . तिच्या मनात जुन्या आठवणी साठु लागल्या. दोन वर्षांपुर्वी याच ठिकाणी , याच मुलाशी तिच्या ताईचे - मोठ्या बहीणीचे लग्न झाले होते . लग्नानंतर काही दिवसांतच सासरी ताईचा होणारा छळ , जाच या कुरबुरी कानावर येउ लागल्या . काही महिन्यांपुर्वीच या त्रासाला वैतागुन ताईने अखेर आपले जीवन .....
वधुमुलगी दचकुन भानावर आली . ताईच्या या दुर्घटनेनंतर मुलाकडच्या लोकांनी परत वधुच्या माता पित्यांशी गोड बोलायला सुरुवात केली होती . त्यांनी आता या मुलासाठी धाकट्या मुलीची मिनतवारीने मागणी सुरु केली .
"तुमच्या मोठ्या मुलीच्या बाबतीत जे घडले ते दुर्दैवी होते . हा सर्व प्रकार काही गैरसमजातुन घडला . यामध्ये जशी आमची चुक होती तशी तिचीही चुक होती . तिने आम्हाला कधी चुक सुधारण्याची संधीच दिली नाही . पण तुमच्या धाकट्या मुलीच्या बाबत असे काही घडणार नाही याची आम्ही काळजी घेउ हि खात्री बाळगा ." अशी अनेक आर्जवे त्यांनी प्रत्यक्ष भेटुन तर कधी मध्यस्थांतर्फे केली .
ताईच्या या दुर्घटनेमुळे धाकटीचे लग्न ठरवणे तसेही वधुच्या माता पित्यांना अवघड जात होते . त्यामुळे या आर्जवांना ते अखेरिस भुलले . ज्या ठिकाणी आधी कटु अनुभव आला होता , त्याच ठिकाणी नाते संबंध जोडायला ते विरघळुन तयार झाले .
आणी आता ऐन लग्नाच्या दिवशी मुलाकडच्या लोकांनी परत आपले मुळ रंग दाखवायला सुरुवात केली होती . जणु काही इतके दिवस केलेल्या आर्जवांचा अपुर्ण राहिलेला सुड ते आता पुर्ण करत होते . वधुला आपले भवितव्य स्पष्ट दिसत होते . जी वेळ ताईवर आली ती बहुतेक आता आपल्यावरही .....
"पुजेसाठी फुले हवी आहेत ." मुलाकडच्यांनी आता नवीन हुकुम सोडला .
"थोडी थोडकी नाही तर चांगली चारशे पाचशे फुले घेउन या . लवकर ... आणी उगाच कंजुशी करु नका ."
परत वधुकडील मंडळी घाईघाईने बाहेर पडली . अनेक दुकानात जाउन , दुकानदारांच्या हातापाया पडुन त्यांनी कशीबशी
पाचशे फुले मिळवली . हि सर्व फुले एका मोठ्या टोपलीमध्ये भरुन ते सर्वजण परत हॉलमध्ये आले .
वरपित्याने फुलांची टोपली घेतली . तो ओंजळीने पुजेच्या ठिकाणी फुले वाहु लागला .
त्या टोपलीमध्ये , अनेक फुलांच्या खाली एक बारका साप दडलेला होता . ओंजळीने फुले वाहताना अचानक तो साप वरपित्याच्या हातात आला . सासरेबुवांची पार घाबरगुंडी उडाली . डिवचल्या गेलेल्या त्या सापाने वरपित्याला कडकडुन दंश केला . आणी सळसळ करत जशी वाट फुटेल तशी तो हॉलच्या बाहेर निघुन गेला . त्या सापाची ती सळसळ बघुनच अनेकांना घाम फुटला . अनेकांची भीतीने गाळण उडाली .
तो साप जरी बारका असला तरी त्याचा दंश चांगलाच विखारी होता . वरपित्याच्या अंगाची पार लाहीलाही होउ लागली. जीवाची तडफड वाढु लागली . पाच दहा मिनीटांतच सासरेबुवांचा खेळ आटोपला . हॉलमध्ये मुलाकडच्या लोकांची एकच रडारड सुरु झाली . वरपक्षाची मंडळी पार शोकात बुडुन गेली .
लग्न आता मोडल्यातच जमा होते . इतका वेळ हा सर्व प्रकार खालमानेने पाहणारी वधु अचानक उठली . तिच्या अंगात जणु दहा हत्तींचे बळ आले होते . चेहराही करारी झाला होता . तिने भराभरा आपले सारे सामान आवरले . आपल्या लोकांना आपले सर्व सामान , आहेर व मानपानाच्या भेटवस्तु गोळा करुन व-हाडाच्या बसमध्ये ठेवायला लावले. सर्वांना बसमध्ये बसण्याची खुण केली . सर्वजण बसताच बस त्वरेने परतीच्या वाटेने निघाली .
थोड्याच वेळात सर्वजण निवांत झाले . बरेचजण झोपी गेले . वधुही खुप दमली होती . खिडकीतुन बाहेर पाहताना तिचा चेहरा एका त्रासदायक भवितव्यातुन सुटका झाल्याच्या आनंदात होता .
अचानक वधुला आपल्या कानापाशी कसलीतरी सळसळ जाणवली . पण ती घाबरली नाही , दचकली नाही . कारण गेले काही दिवस हि सळसळ तिच्या चांगल्याच ओळखीची झाली होती .
खिडकीतुन अंदाजाने बाहेर कुठेतरी बघत वधु समाधानाने म्हणाली " थँक्स ताई....."
-------- समाप्त -------- काल्पनीक -----------------------------------------------
प्रतिक्रिया
ओ मॅन. व्हॉट अ स्टोरी!
मस्त कलाटणी.
...
बाब्बौ.
काटा आला अंगावर .. छान
भारीच फिरवली की राव !!!
मस्तच
भन्नाट
कथा आवडली
छान ट्वीस्ट. पण 'नीळा'
खूपच छान!!
वा वा! मस्तच!
सुंदर कथा. शेवटची कलाटणी
आवडली कथा.
छान
आवडेश
सर्वांचे
सुन्दर
=)) =)) =))
?
कसचा ?
आवडली ...
भन्नाट जमलिये!
छान जमलिये..
@अभिजीत अवलिया , @रातराणी,@संजय पाटिल
सध्याच्या स्थितीतील