यथा शास्त्रप्रमाणेनं...
सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.
1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे)
(केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले. मग 'केस काढले', म्हणून पुन्हा त्याला अंघोळ घातली गेली.
वरील प्रसंगात घडलेली गोष्ट ही व्यवहारात फक्त "चुकिची-दुरुस्ती" एवहढाच अर्थ लक्षात आणून देते. पण सदर घटना ही धर्माच्या क्षेत्रात घडलेली असल्यामुळे पाहणारे , ती गोष्ट धार्मिक मनानी पाहतात, व्यावहारीक मनानी नाहि. (कारण तो धर्म आहे) थोडक्यात सदर घटना "का व कशासाठी? " म्हणून पाहिली जात नाही.
पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते.
अश्या या गोष्टी व्यवहारधर्मातून धर्मव्यवहारात घुसत ऱहातात.
हा प्रकारही तसा सामान्य आहे. याखेरीज अजून काही प्रकार घडतात, ज्यात विधींची वेळ बदल होते. आणी त्याचंही धर्मशास्त्र होतं.
2)विवाहासंस्कारातील नाम लक्ष्मीपूजन:-
वैदिक पद्धतिनी लग्नविधी झाल्यास, सदर विधी मंगलाष्टकांच्या आधी? की नंतर योग्य? असा एक वाद अगदी हल्लीही ऐकू येतो. याची पहिली तोड अशी की वधू ही लग्न होऊन सासरी माप ऒलांडून आत आली की लगेचंच हे नामलक्ष्मीपूजन करावे, असा नियम आहे. अता घरीच हा विधी करणे "सांगितलेले" असल्यावर , तो मंगलकार्यालयात करणे ही सरऴ सरळ सोय आहे. मग तो मंगलाष्टकांच्या आधी होवो अथवा नंतर! ( पाकशास्त्रात कुकरमधे डाऴ आधिच्या डब्यात लावावी ? की नंतरच्या? असा वाद पेटणार नाही. पेटला, तर त्याची तोड काय कुठे लावल्यानी कमी/अधिक शिजते? यावर निघेल. पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते. असो! )
ज्यांना हे पटतं, किंवा अन्य कारणांनी आवश्यक वाटतं ते हा विधी आधी करतात. पण बहुसंख्य लोक हा विधी मंगलाष्टकांच्या नंतर करावा.., असेच मानणारी असतात. जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. मग हे असे एंजॉई
@यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे?
@बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का?
@कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे?
@पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे?
इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात!
सदर लेखन इथे मांडण्यामागे हेतू इतकाच की अश्या प्रसंगी सजग-कर्त्यांनी वरील गोष्टी समजून घेउन आडमुठेपणा, राजकारण इत्यादी करणाय्रांना जमेल तसे रोखावे. किंवा सवाई राजकारण करून त्यांची ताकद कमी करावी. म्हणजे अनेक ठिकाणी अनेकांची त्रासापासून सुटका होईल.
(ता. क. - ह्या प्रकारचे आणखिही गोंधळ याच धाग्यावर जमेल तसे मांडत राहीन, जेणेकरून ते माहित होतील. )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे थोडं कायद्यासारखं झालं
हरकतंही नाही. कारण त्याची
तात्पर्य
तात्पर्य : मांजर बांधणे
म्हणजे फ़क्त कपिलमुनी आणि
मुद्दा
गुद्दा द्यायचा कसा ?
जर हे सगळं खरं असेल ,
हम्म्म्म्म्
फसवणूक ??
दॅट्स इट मुनिवर. धन्यवाद.
धार्मिकविधींमध्ये साध्या
असे असेल तर ते तर त्यांच्या
मी कोणालाही बदलायला सांगत
का? आणि कस?
आज ऑफिस मध्ये काम नाहीये म्हणून आणि म्हणून फक्त
:-))
काडी होती रे =))
ते समजलं ,
:-))
मूळ
आत्मूसबुवांचा धागा आला की
सुरवंट म्हणालं धागा टमरेल आहे
इतकी अक्कल चालली तर!
यावर कधीतरी लिहीन.सध्यातरी
हेच कंजुशकाका एकच मारा पर
ज्जे बात...यासाठी मस्तानी उकळ
खीऽ क .
छ्या
ऊकळलेली म्हणजे
तो
भटजी काय घरी येवुन तुमच्या
भटजी काय घरी येवुन तुमच्या मानगुटीवर बसतो काय की माझ्याकडुनच सगळं विधी करवुन घ्या म्हणुनहेच लॉजीक पेशंट लोकांना पण लागू होते. डॉक्टर म्हणत नाहीत की माझ्याकडून उपचार करून घ्या म्हणून. तरीपण लोक्स डॉक्टरांकडे जावून उपचार करून घेतात, व परत त्याच डॉक्टरचा शक्य होईल त्या ठिकाणी उद्धार करत बसतात.चुकीचे विधी
विधी चुकीचा झाला किंवा
भयंकर फरक आहे. धार्मिक विधी
+१
एकतर मोदकने टाईमपास म्हणून
:)) काडी होती रे. :D
=))
भटजीने आता एकदोन विधिक्रम
किस्से आवडले
बुवा धर्मसुधारक पुरोहित आहे.
हॅहॅ!
ते खरं.
मारुती कशाला अता?
तोच शनिदेवाचा कोप शांत करू
बेक्कार पंच आहे हा =))
=))
माझ्या मिपाकुंडलीत एक अस्वल
तरिही तुमच्यावर अशी वेळ यावी