Skip to main content

लाईफलोंग ब्याचलर

Published on रवीवार, 01/05/2016
आज नेहमी प्रमाणे कोरा (Quora) वर फिरत असताना एक इंटरेस्टिंग प्रश्न सापडला. तोच इथे चोप्यपस्ते करतोय. "लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?" काही दुवे:

वाचन संख्या 31749
प्रतिक्रिया 255

प्रतिक्रिया

स्पिन्स्टरचा भावार्थ थोडा वेगळा आहे.पंचवीसतिशीच्च्या आतल्या मुलास आपण ब्याचलर म्हणू तसे मुलीला अनमॅरिड ठीक आहे .spinster मधून थोडा लग्नाचे वय उलटून गेलेली घोडी { पण जमल्यास लग्न करू अशी }माफ करा. लग्न न करण्याचं पक्कच केलं असेल तर conformed bachelor

In reply to by कंजूस

छान वाटलं!! पण स्वतःच्या मुलं/लींनी लग्न करायचं नाही असं ठरवलं तर त्यांनाही त्यांचे पालक बिनलग्नाचा/ची घोडा/डी म्हणत असतील का हा एक आपला प्रश्न येऊन गेला, की आपला तो बाब्या या न्यायाने चालवून घेत असावेत?

In reply to by सूड

घरात एक घोडी आहे,आमच्या नंतर हिचं कोण पाहणार असाच विचार येतोच.बाब्या कल्पना वेगळी.दिवटेपणा केला तरी कौतुक. घोडीचा दोष नसतो ,तिचं जमत नसतं एवढंच.

नेहमीचेच गोलंदाज, नेहमीचेच फलंदाज. पाच दिवस असेच जाणार. नेहमीप्रमाणेच लाथाळी होणार. जेफ बोयकोटचे आणखीन एक द्विशतक होणार. सामना अनिर्णित अवस्थेत संपणार. इथे कितीही गमज्या मारल्या तरी धागाकर्ते एक दिवस निमूटपणे बोहल्यावर चढणार.

लग्न करावं की नाही आणि केलं तर मुल होऊ द्यावं की नाही असा चर्चाविषय आहे. विषयाचं भान ठेवलंत तर प्रतिसाद समजतील. तरीही उत्तर देतो. बहुसंख्य स्त्रियांना मुल असावे असे वाटते हे खरेच आहे.....वगैरे मी फक्त नैसर्गिक शब्द वापरला आहे. ध्येयवादी जीवनाला आधी ध्येय हवं, त्या केसमधे मग लग्न सुद्धा अडचण ठरेल. इथे ध्येयाचा मुद्दाच नाही. सदस्य पर्यायांचा विचार करतायंत. ....किशोरी आमोणकर, लता मंगेशकर (बॉलीवुड मध्ये तर कितीतरी नावं असतील..) हय बायकांना स्वतः विषयी अभिमान नाही असं तुम्हाला वाटतं का? कुण्या पुरुषाने येऊन ह्यांचे जीवन धन्य करणे आवश्यक आहे असं वाटतं का? ह्या व्यक्ति ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत असं वाटत नाही का? आपण त्या कॅटॅगरीत आहोत का असा जरा विचार कराल का ? मला लोकांच्या विचारसरणीचं कायम नवल वाटतं, एकदम एक्स्ट्रीम उदाहरणं घ्यायची आणि मग मी दुसर्‍याच्या विचाराचा आदर करत नाही अशी हूल उठवायची. पुलं निपुत्रिक होते पण आपण तितके व्यासंगी आहोत का ? आपल्याला तितकं स्वच्छंद जगता येईल का असा विचार केलात तर मुद्दा कळेल. लग्ना बाबतीतही तुम्ही अशीच होलसेल मध्ये विधाने केली आहेत. माझ्या ओळखीत एक शिक्षक जोडपे आहे. आता त्यांना रिटायर होऊनही १०-१५ वर्ष झाली...... वगैरे मुल नसल्यावर सामोपचारानं घेणं हा मोठेपणाचा भाग झाला (कारण फॉल्ट नक्की कुणाचांय, का दोघांचायं हे मुद्दे प्रकर्षानं येतातच) पण त्यामुळे मूल नसल्यानं जवळीक निर्माण झाली हा फार मजेशीर तर्क आहे. मुल नसल्याच्या दु:खात जोडपी फार जवळ येतात. कोणत्याही आनंदापेक्षा कोणतेही दु:ख, संघर्ष आपल्याला जास्त जवळ आणतो. चुकीचा निष्कर्श आहे. प्रेम असेल तरच दु:ख जवळ आणतं पण त्या केसमधे बाकीचे फॅक्टर्स आपसूक गौण होतात. इथे प्रेम हा विषय नाही. लग्न करावं की नाही आणि केलं तर मुल होऊ द्यावं की नाही असा विषय आहे. संसार टिकतात ते नवरा बायको मधल्या प्रेमाने. ....वगैरे यात वाद कुठे आहे ? तुम्ही चर्चेचा विषय लक्षात घ्या म्हणजे आवेश कमी होईल.

In reply to by विवेक ठाकूर

आपण त्या कॅटॅगरीत आहोत का असा जरा विचार कराल का ? मला लोकांच्या विचारसरणीचं कायम नवल वाटतं, एकदम एक्स्ट्रीम उदाहरणं घ्यायची आणि मग मी दुसर्‍याच्या विचाराचा आदर करत नाही अशी हूल उठवायची. पुलं निपुत्रिक होते पण आपण तितके व्यासंगी आहोत का ? आपल्याला तितकं स्वच्छंद जगता येईल का असा विचार केलात तर मुद्दा कळेल.
मान्य की माझा व्यासंग पुलंच्या एक शंतांश देखील नाही. पण म्हणून निपुत्रिक राहण्याचा निर्णय घेण्याचा मला अधिकार नाही असा त्याचा अर्थ होतो काय ?
आपल्याला तितकं स्वच्छंद जगता येईल का
तितक ? कुणाशी तुलना कशाला हवी ? मला पाहिजे तितकं स्वच्छंदी मी जगेन.. नव्हे जगत आहेच.

In reply to by मराठी कथालेखक

तितक ? कुणाशी तुलना कशाला हवी ? मला पाहिजे तितकं स्वच्छंदी मी जगेन.. नव्हे जगत आहेच
हे आवडलं.. मी लता मंगेशकर नसेन म्हणुन मी कुणी कमी दर्जाची व्यक्ति आहे. किंवा माझ्या भाव-भावना वेगळ्या आहेत असे नाही. सामान्य आयुष्य असलेले लोकही लग्न न करण्याचा अथवा मुल न होऊ देण्याचा निर्णय घेऊ शकतातच.

In reply to by विवेक ठाकूर

मी तुम्हाला हो किंवा नाही मध्ये उत्तरं देता येतील असे काही प्रश्न वर विचारले आहेत. आपण ह्यावेळेस अशी चर्चा करुन पाहुयात का? तुम्ही मला अज्ञानी म्हणणार मग मी तुम्हाला हेकेखोर.. त्यातुन निष्पन्न काय होते? तुमच्या मते मी अत्यंत टोकाची उदाहरणे घेत आहे. पण तुम्ही सुद्धा तुमच्या बघण्यात नाही म्हणुन एखाद्याचे उदाहरण सरळ उडवुन लावत आहात. बहुतांश स्त्रियांना अमुक एक गोष्ट वाटणे आणि "सर्व" स्त्रियांना अमुक एक वाटणे ह्यात फरक आहे. मुल न होऊ देताही परिपुर्ण आयुष्य जगणार्‍या स्त्रियांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तुम्ही बराच पारंपारिक विचार करत आहात. असो.. एकमेकांचे वाभाडे न काढता काही बोलणे शक्य असेल तर मी चर्चेस जरुर तयार आहे. शिवाय माझी मते चर्चेने बदलु शकतील अशी असतात. त्यामुळे तुमचे माहित नाही, मला विचारांना खाद्य मिळेल म्हणुन मी ह्या फंदात पडत आहे. अन्यथा आपली चर्चा नंतर कुणीकडे जाते हे जगजाहीर आहे.

In reply to by पिलीयन रायडर

जर आपल्याशी चर्चा करायची आहे माझ्या १०० वर्षांच्या आयुष्यात मी समुद्र पहिला नाही पुण्यात समुद्र नाही ना, म्हणून तुम्ही परवा काहीतरी तद्दन खोटे आणि बिनबुडाचे वर्णन करत होता, समुद्र असतो म्हणे, तो असा असतो इ इ जर मी एवढ्या मोठ्या आणि अत्यंत व्यासंगी आयुष्यात समुद्र पाहिला नाही। तर समुद्र कसा काय अस्तित्वात असेल ? तुमच्या लक्षात मुदा येत नाही आणि तुम्ही आस्तित्वात नसलेल्या गोष्टीवर निरर्थक आत्मरंजन करत राहता कस बै होणार तुमचं

In reply to by विवेक ठाकूर

मला लोकांच्या विचारसरणीचं कायम नवल वाटतं, एकदम एक्स्ट्रीम उदाहरणं घ्यायची
मला वाटतंय ही उदाहरणं एक्स्ट्रीम असण्यापेक्षा प्रसिद्ध आहेत म्हणुन नमूद केली आहेत बाकी 'माझा एक मित्र' , 'माझी एक बहीण' अशी उदाहरणं ही आलेलीच आहेत. पण ती इतरांना माहित नसतात आणि त्यामुळे काय म्हणायचे आहे ते नीट सगळ्यांपर्यंत पोहोचत नाहित. पण सामन्य आयुष्यात लता देखील एक स्त्रीच आहे.

In reply to by मराठी कथालेखक

मान्य की माझा व्यासंग पुलंच्या एक शंतांश देखील नाही. पण म्हणून निपुत्रिक राहण्याचा निर्णय घेण्याचा मला अधिकार नाही असा त्याचा अर्थ होतो काय ? सामान्य आयुष्य असलेले लोकही लग्न न करण्याचा अथवा मुल न होऊ देण्याचा निर्णय घेऊ शकतातच. निपुत्रिक राहाण्याचा निर्णय तर तुम्ही घेतला आहेच. पण मुलाची कटकट होईल इतकं सामान्य आयुष्य व्यस्त नसतं असा अर्थ आहे. तुलना कशाला हवी ? मला पाहिजे तितकं स्वच्छंदी मी जगेन.. नव्हे जगत आहेच. आम्ही मुलगा असून सुद्धा स्वच्छंदी जगतो. काय प्रॉब्लम आहे ?

In reply to by मितान

सापेक्ष वगैरे काही नाही. ते एक नैसर्गिक आणि वैश्विक सत्य आहे जे निसर्गाने त्यांना हळूच कानात सांगितलंय आणि ते त्यांना सगळ्यांपर्यंत पोहोचवायच आहे

In reply to by विवेक ठाकूर

निपुत्रिक राहाण्याचा निर्णय तर तुम्ही घेतला आहेच. पण मुलाची कटकट होईल इतकं सामान्य आयुष्य व्यस्त नसतं असा अर्थ आहे.
नसू देत की व्यस्त, उरलेल्या वेळात झोपा काढेन मी नाहीतर मिपावर पडीक राहीन.. काय प्रॉब्लेम आहे ? आणि व्यस्त असण्याबद्दल मी कुठे काय म्हणालो ? नसतो मी फार व्यस्त , मग ? म्हणून मुल जन्माला घालावं ? मला संगोपनाची आवड/इच्छा नाहीये तरी ?? व्यस्त असण्याबद्दलच म्हंटल तर लताजींनी वर्षाला शंभर एक गाणी कमी गायली असती तरी त्यांच्या आजच्या पोजिशनला धक्का नसताच पोहोचला. रतन टाटांनी एक दोन प्लांट कमी उभारले असते तरी भारतीय अर्थव्यवस्थेला फार हानी पोहोचली असती असं नाहीचेय. त्यामुळे व्यस्त असल्याने त्यांनी लग्न केलं नाही असंच म्हणणार का ?
आम्ही मुलगा असून सुद्धा स्वच्छंदी जगतो. काय प्रॉब्लम आहे ?
काहिच नाही. इथे मी 'चाईल्डफ्री व्हा रे बाबांनो' अशी जाहिरात करतोय असं वाटलं की काय ?

In reply to by टवाळ कार्टा

गम्मत पाहा हावडा ब्रिजवरून, एक कटिंग चाय हातात घेऊन.बांगलात पॅापकॅार्न नसतंय ब्रिटिशांचा चाय असतोय.

खुप जमता है रंग... जब मिल जाते है तीन यार - खरे, पिरा और विठा.. :)

In reply to by पिलीयन रायडर

ए गपे...तुला मी म्हणालो का कि गप्प बैस (म्हणालो तरी तू नै ऐकणार हे पण म्हैत आहे)...तू तेरा कर मै मेरा कर रहा हू =))

In reply to by विजय पुरोहित

पहिलं वाक्य बजरबट्टुला.. पुढचं वाक्य टक्याच्या वरच्या प्रतिसादाला.. असं असतय ते..

In reply to by पिलीयन रायडर

तसे तुमचे मुद्दे आवडतात. पण मुळ मुद्दे सोडून भलतेच मुद्दे पकडून धाग्याला ज्वलंत ठेवण्यात तुम्हा तिघांचा खारीचा सिंहाचा वाटा असतो. बर वर आपला रान्ग नम्बर लागलाय हे तिघेही मान्य करता , पण फ़ोन काही कोणी खाली ठेवताच नाय... :)

In reply to by ब़जरबट्टू

भलतेच नाही.. अनुषंगिक मुद्दे म्हणतात त्यांना..! मला विषयालाच धरुन शेवटपर्यंत चर्चा झालेला मिपाचा एखादा मेगाबायटी धागा दाखवा बरं... आपण तरी गप्पा मारताना एकाच मुद्द्याला धरुन बोलतो का? चर्चा, गप्पा, वाद, भांडणं ही उलगडत जातात.. एका विषयाला धरुन बोलणे आणि निष्कर्षाला येणे हा हेतु नसतोच. खुमखुमी जिरवणे आणि कुकरच्या शिट्ट्या काढणे हेच खरे कारण! खरं सांगायचं झालं तर माझ्याकडे सध्या खुप जास्त वेळ आणि कंपनीचे अमर्याद इंटरनेट आहे. तेव्हा वेळ घालवायला मला काही तरी टाईमपास नको का? असे असताना फोन खाली का च ठेवायचा म्हणते मी??!! ;)

In reply to by ब़जरबट्टू

ओ....मी पण मी पण, तसाही संक्षी आयडीचा आणि माझा वादविवाद पुर्वी एकदोनदा रंगला होता. आता नव्या रुपात ....म्हणजे त्यांचे नवे रुप...माझा जुनाच आयडी शाबूत आहे :)

विठा हा मूर्ख प्राणी इथे पण नको ते पचकत आहे . वंध्यत्व हे फक्त स्त्रीला असते का ? वंध्य पुरुषाबद्दल काही म्हणत नाही. -->अपत्यजन्म ही स्त्रीची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. पुरुषाला बाप व्ह्यायला आवडत नाही का ? आपल्याला मूल असावा ही पुरुषाला नैसर्गिक इच्छा नसते का ? -->मूल नसलेल्या कपलमध्ये बाँड तयार होत नाही म्हणे ! नसलेली अक्कल बघा ! याला काडीची माहिती नसते ! अनुभव तर मुळीच नसतो तरी जिथे स्त्रिया , सहजीवन आला की अकलेचे तारे तोडलेच . आणि कोणत्याही माहितीचा विदा नसतो , नुसताच हवेत गोळीबार.

In reply to by तात्या

तुमची भाषा कठोर वाटतेय पण तुमच्या मुद्द्यांशी सहमत. @विठा..ज्याला जे जसं वाटतय त्याला ते तसं करुद्या जोपर्यंत इतरांना त्रास होत नाही. उगाच स्व:ताचे विचार दुसर्यांवर का लादायचे. वेगळे विचार दिसले आपल्यापेक्षा तर लगेच चालू.

In reply to by शलभ

ज्याला जे जसं वाटतय त्याला ते तसं करुद्या जोपर्यंत इतरांना त्रास होत नाही. उगाच स्व:ताचे विचार दुसर्यांवर का लादायचे. वेगळे विचार दिसले आपल्यापेक्षा तर लगेच चालू. ज्यांचे विचार ठाम असतात ते धागा काढून विचारणा करत नाहीत. ते आपला अनुभव सांगतात. जर धाग्यावर चर्चाच झाली नाही तर मग इथे काथ्याकूट हा पर्यायच बाद करावा लागेल. शिवाय प्रत्येक जण आपल्या अकलेनंच निर्णय घेतो तस्मात, विचार लादतो म्हणणं निव्वळ बालीशपणा आहे.

In reply to by तात्या

त्यांना वाचायला दिसत नाही हे ठीक पण लिहायचं तरी कळतं का ? वंध्यत्व हे फक्त स्त्रीला असते का ? वंध्य पुरुषाबद्दल काही म्हणत नाही. काय पण समज आहे विषयाची, व्वा! . इथे वंध्यत्वाची चर्चा चालू आहे का ? आपल्याला मूल असावा ही पुरुषाला नैसर्गिक इच्छा नसते का ? इथे एका सदस्याच्या विनापत्य राहाण्याच्या निर्णयाबद्दल चर्चा चालू आहे. पण असले घोडे छाप प्रतिसाद द्यायला वाचायला लागतंय कशाला ? मूल नसलेल्या कपलमध्ये बाँड तयार होत नाही म्हणे ! तुमचा विवाह झाला आहे का ? इथे आता कुणी विचारत नाही इतकं लक्षात घेऊन पुढचा प्रतिसाद द्या.

In reply to by विवेक ठाकूर

चर्चेचा विषय तर हा आहे. "लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय?" मला वाटतं मकलेंनी त्यांचे विचार मांडले. त्यातील एक वाक्य पकडून त्यावर का चर्चा/कीस पाडताय. त्यांना जसं जगायचं तसं जगू द्या.

आणि मग इथे लावली आम्ही दहा हजाराची लड, ये धतड ततड, धतड ततड, धतड ततड, धतड ततड, धड. खाडेसाहेबांना शतकोत्तर धाग्याच्या शुभेच्छा. कॉन्ट्रॅडिक्शनला इम्पॉसिबल म्हटलंय. खोडून दाखवा आणि पंचशतकी धागा मिळवा.

In reply to by तर्राट जोकर

शुभेच्छा मला नाही विवेक ठाकूर साहेबांना द्या.. =))
कॉन्ट्रॅडिक्शनला इम्पॉसिबल म्हटलंय. खोडून दाखवा आणि पंचशतकी धागा मिळवा.
थोडासा निवांत वेळ काढून संध्याकाळी करतो हे काम...

In reply to by निशांत_खाडे

शुभेच्छा मला नाही विवेक ठाकूर साहेबांना द्या..
अरेरे ! तुमच्याकडे जरा म्हणून अहंकार नाही !! कसं व्हायचं तुमचं मिपावर ? ( चिंतित ) स्नेहा

In reply to by तर्राट जोकर

विवेक ठाकुरांच्या प्रतिक्षेत स्पा - Mon, 02/05/2016 - 08:40 विवेक ठाकुरांच्या प्रतिक्षेत स्पा यांनाही शतकोत्तर धाग्याच्या शुभेच्छा.

In reply to by वैभव जाधव

एखादा बोहल्यावर चढून उभा आहे, हातात वरमाला आहेत, डोकीस मुंडावळ्या आहेत, चेहर्‍यावर संभ्रम आहे, थकून जाऊन तो डाव्या बाजूने मान वळवून त्या निरोपाची वाट बघत आहे. तो निरोप आला की वरमाला घालायची की नाही हे ठरणार आहे. तो वाट बघतोय तळमळत. तो निरोप आला नाही म्हणून विचारतोय - अजून ठरलं का नाही?????

In reply to by तर्राट जोकर

ठरलं नाही तर वरमाला घेऊन, मुंडावळ्या बांधुन कशाला उभं रहायचं म्हणते मी?!!!! =)) आणि तसे उभे असाल तर बाकीच्यांच सोडा, तुमचं तुम्ही आधीच ठरवलय की!

In reply to by तर्राट जोकर

चुकीचं चित्र उभं राहिलं आहे. माझा प्रश्न आसमंताला कवेत घेणारा आहे. आपली सर्टिफाईड आकलन क्षमता कमी असल्याने आपणास प्रश्न समजणं अशक्य आहे. तस्मात राहूच द्या.... जमलंय का?

In reply to by वैभव जाधव

नै जमलं. 'आकलन क्षमता कमी असल्याने' असं काही विठाजगतात नसतं. बायनरी असतं. थेट असते किंवा नसतेच. त्यामुळे वाक्य बदलून: आपल्याला आकलन क्षमताच नसल्याने आपणास प्रश्न समजणे शक्यच नाही तस्मात अज्ञानाच्या अंधारात चाचपडणे चाललंय.

In reply to by तर्राट जोकर

मुळात प्रश्नाकडे लक्ष देऊ शकत नसल्यानेच असल्या गोष्टी आपणास सुचत आहेत हे तुम्ही कबूल कराच. अक्कल वापरता येत नसल्याचेच प्रतीक. तस्मात असोच!

गे - लेस्बियन लोकांच्या देहरचना वेगळ्या असतात???????????????? डॉक्टर लोकहो, आवरा हो ह्यांना.

लग्न करून लोक सुखी होतात की नाही याची कल्पना नाही आम्ही मात्र लग्न करण्याचा प्रयत्न करून दु:खी झालो हे खरे. माझा अनुभव असा की अनेक वर्षे घराबाहेर एकटं राहिल्याने त्या कोषात राहायची सवय होते.मग दुसरी बंधनं नकोशी वाटू लागतात. ब्यॅचलरपणात ऐच्छिक की मारून मुटकून बॅचलर ह्या प्रमुख कॅटेगरी आहेत. त्यांचा स्वतंत्र विचार व्हावा.

In reply to by प्रचेतस

यशस्वी अजून पूर्ण झाले नाहीयेत कसाही करून आस्तिक नास्तिक, देव आणा यात गावडे काका उतरले चिखलात हे आपल आखाड्यात कि धागा भरून पावेल

In reply to by शाम भागवत

माझं नाव आलंच आहे तर मी हा दोनशेवा प्रतिसाद देतो आणि मजा पाहायला पुन्हा एकदा झाडावर जाऊन बसतो.

In reply to by प्रचेतस

आम्हाला चांदोबामधल्या "विक्रम आणि वेताळ" या सदरात येणार्‍या गोष्टींमधील विक्रम माहिती आहे. :)

In reply to by सतिश गावडे

तर तोच दुसरा चंद्रगुप्त. ह्याने वाकाटकांची मदत घेउन माळव्याच्या रूद्रसिंह क्षत्रपाला पराभूत केले व पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या क्षत्रपांची सम्पूर्ण राजवट संपवली. इंडोग्रीक राजाने स्थापन केलेले संवत ह्याच्याच नावे ओळखले जाते ते म्हणजे विक्रम संवत.

In reply to by प्रचेतस

या धाग्यावर धागालेखकाला "लग्न करावे का?" आणि "मुल जन्माला घालावे का?" या प्रश्नांची जी उत्तरे मिळतील (जर मिळालीच तर) त्यांचा तुम्हीही विचार करा. नाही तर तुमचं लेकरु बाबा "विक्रम आणि वेताळ"ची गोष्ट सांगा म्हणून तुमच्याकडे हट्ट करायचं आणि तुम्ही त्याला दुसर्‍या चंद्रगुप्ताचा इतिहास ऐकवायचेत. अगदी कुठल्याशा लेण्यातील शिलालेखातील उल्लेखासहीत. =))

In reply to by सतिश गावडे

खी खी खी. ह्यावरून सिंहासन बत्तिशी मधली सातवी पुतळी कुरंगनयना भोज परमाराला जी गोष्ट सांगते त्यात हेमाद्रीच्या दानखंडाचा उल्लेख आलेला आहे ह्यावरून ही निदान ही गोष्ट तरी १३ व्या शतकानंतर लिहिली गेली आबे हे स्पष्ट होते.

In reply to by स्पा

कसाही करून आस्तिक नास्तिक, देव आणा यात
मी स्वतः नास्तिक आहेच आणि माझ्या मते (अजून विदा जमविलेला नाही) स्वतःहून विनापत्य जीवनशैली (चाईल्डफ्री लाईफस्टाईल) जगणारे वा त्याकडे ओढा असणारे सगळेजण नास्तिकच असावेत (म्हणजे सगळ्या नास्तिकांचा या जीवनशैलीकडे ओढा असेल असे मात्र नाही) ज्यांच्या पाहण्यात अशी काही चाईल्डफ्री जोडपी आहेत त्यांनी यावर प्रकाश पाडावा ही विनंती.

लग्न करायला हरकत नाही, पण मुलं जन्माला घालू नयेत या मताचा मी आहे.ज्याला " जाणिव " आहे त्याला दुखः ओघाने येतात.आयुष्य म्हणजे दुख्खाचा उकीरडा आहे,या उकीरड्यात आप्ल्या आई बापाने आपल्याला जन्माला घालून ढकलले आहे ,आपण आणखी कुणाला तरी जन्माला घालून या उकीरड्यात ढकलू नये. स्वतःला मुल होऊ न देता सुंदर आयुष्य जगलेले अनेक जोडपी आहेत, मुल होणं म्हणजे आपले आयुश्य पुर्णत्वाला जाणं या समजुतीत बाहेर येणे गरजेचे आहे.प्रत्येक स्त्रीला मातृत्वाची ओढ असती हा तर मोठाच गैरसमज आहे.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

सर्वानी असे केले की शंभर वर्षात पृथ्वी निर्मनुष्य होइल. मग मिसळपावावर कोण येइल ? दु:खे आहेत म्हणुन जन्मच घेउ नका हे म्हणजे लाइट बिल येते म्हणुन विजेचे कनेक्शनच घेउ नका असे म्हटल्यासारखे आहे.

In reply to by mugdhagode

गौतम बुद्ध म्हणतात त्यानुसार जीव जन्माला येतो तिथपासूनच दुखः सुरु होते,माणुस रडतच येतो आणि रडतच जातो.त्यामुळे लग्न करा ,मस्त लैंगिक आयुष्य जगा ,पण पोरं जन्माला घालून या प्रचंड अनिश्चीत,दुखःमय, जगाच्या डोहात त्यांना ढकलू नका.बाकी ज्याची त्याची मर्जी.

चला मंडळी,(अ)विवेकवाणीतून 'शोचनीय प्रतिसाद', 'अज्ञानी', 'बालिशपणा', 'घोडेछाप प्रतिसाद' असे पवित्र शब्द सांडले आहेत. आज मला एवढे विटॅमिइन 'मी' पुरे ! टाटा.

मूळ धाग्याचा मूळ प्रश्न काय होता आणि लोक काय गंजिफा खेळतायत राव. लग्न,कुटुंब यांच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? अविवाहित आयुष्य जास्त आनंदी आहे काय? लग्न, कुटूंब विरुद्ध अविवाहित असा चॉइस करायचाय. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकेल? १. लग्न झालेला कसा देउ शकतो, त्याचे तर लग्न झालेले आयुष्यभर अविवाहितचा अनुभव-अभ्यास नाही. ओके? २. आयुष्यभर अविवाहित असलेला कसा देणार, लग्न झाल्याचा अनुभव नाही. ओके? प्रश्नच नल आणि वॉइड होतोय. आणि पबलिक करतंय भजन. लगे रहो. =)) त्याच मुलं, नैसर्गिक उर्मी, देहरचना इत्यादी बिनमहत्त्वाचे विषय घुसडून भलतंच चाललंय. एखाद्याने विचारले की पैसे म्युचुअल फंडमधे टाकू का आयुश्यभर एफडीत ठेवू तसा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर फक्त चॉईसशी रिलेटेड आहे. मन-बीन सगळ्या बाता. मनाचे काय, पोरं किंकाळ्या मारत असली की हिमालयात जाऊन राहावंसं वाटतं, बाललीला बघितल्या की धन्य झाल्यासारखं वाटतं. ये सब वाटणे पे डिपेंड करता है. मनाचं सगळं चंचल कारभार. आता धरतीवर तर आता आभाळात. तस्मात् ----- जो जे वांछिल तो ते लाहो. अरे मग लाठ्याकाठ्या कशा व्हायच्या, लोक आप आपले घरचे मसाले, मिर्च्या, खोबरं घेऊन खलबत्ते कुटत बसलेत.

In reply to by तर्राट जोकर

प्रश्नच नल आणि वॉइड होतोय.
असं कसं ? दोघे आपापला अनुभव लिहितील आणि मग धागाकर्ता त्यातून जे घ्यायचे ते घेईल. पण खरच धागाकर्त्याला व्यक्तिशः तळ्यात की मळ्यात असा प्रश्न पडलाय आणि इथले प्रतिसाद वाचूनच ते निर्णय घेणार आहेत असं तर तुम्ही समजत नाहीत ना ? एक शतकी धागा काढण्याकरिता प्रयत्न केला आणि तो जाम यशस्वी ठरला इतकंच.
त्याच मुलं, नैसर्गिक उर्मी, देहरचना इत्यादी बिनमहत्त्वाचे विषय घुसडून भलतंच चाललंय.
त्यामुळेच तर धागा व्यवस्थित पेटलाय :)

In reply to by मराठी कथालेखक

तुम्ही माझा प्रतिसाद सिरियसली घेतलाय? अहो दंग्याचाच उद्देश होता खाडेसरांचा. पण प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही हे स्पष्ट आहे. कारण प्रश्न तुलनेचा विचारला आहे, अनुभवाचा नाही. आयुष्यभर अविवाहित राहिलेला लग्नाच्या तुलनेत उत्तर कसं देणार? आणि लग्न झालेला आयुष्यभर अविवाहित राहणारा नाही त्यामुळे तुलनेत उत्तर कसं देणार? प्रश्नात गडबड आहे असं वाटतं.

In reply to by तर्राट जोकर

हे बरोबर नाही म्हणजे पुरुष "स्त्रीरोग" तज्ञ होऊच शकत नाही असे म्हणण्यासारखे आहे. आणि त्यांनी मुलाला जन्म दिला नाही म्हणजे बाळंत कळा काय आहेत ते स्त्रीरोग तज्ञाला समजणारच नाहीत असे म्हणण्यासारखे आहे.

In reply to by सुबोध खरे

ह्या अर्थाने तर मग विठांचे स्त्रीदेहाबद्दलचे सर्व प्रतिसाद वॅलिड ठरतील. हाउ'ज दॅट? आयुष्यभर वेज खाणारा आणि आयुष्यभर नॉनवेज खाणारा एकापेक्षा दुसरं कसं चांगलं ह्याबद्दल मत देण्यास लाय्क आहे का? अनुभवाच्या तुलनेचा प्रश्न आहे डॉक्टरसाहेब. अभ्यासाचा-चिकित्सेचा नाही.

कसही असो, मला 'हाउस ऑफ कार्डस' मधली जोडी आठवली :) त्यांनी निर्णय घेतलेला असतो की करीअर साठी मूल न होऊ देण्याचा. एका टप्प्यावर 'ती'ला मुलाची ओढ वाटू लागते.

In reply to by मराठी कथालेखक

गरजच नाई. ब्रायन लारा बॅटिंग करायचा तेव्हा नॉन स्ट्रायकर पण प्रेक्षकात जमा व्हायचा. इथे तर लारा, तेंडुलकर, धोनी, वॉर्नर सगळेच खेळतायत!

250 व्या अपत्य प्राप्ती नंतर या धाग्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन संपेल. तस्मात, नंतर चर्चाच करण्याचे कारण राहणार नाही. ओळखा :- धाग्याचे लिंग नेमके कोणते आहे? साडे दोन गुण

मलाही एक धागा काढायचाय, एकोळी पुरुष बनण्याच्या लफड्यात पडण्यापेक्षा आयुष्यभर स्त्री राहणे जास्त व्यवहार्य व चांगले आहे काय? पुरुषाचे आयुष्य जास्त आनंदी आहे काय?

डुआयडी-जन्म ही मिपाब्यानांची अत्यंत नैसर्गिक इच्छा आहे. कारण मिपाब्यान देहाची घडणच संमंनं डु-आयडी जन्मासाठी केली आहे. तस्मात, डु-आयडी जन्माविना मिपाब्यानाला अपूर्णत्व जाणवत राहातं हा डु-आयडी-वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणार्‍यांचा अनुभव आहे. थोडक्यात, डुआयडी-फ्री सर्वज्ञ हा फार काळ टिकणारा पर्याय असू शकत नाही. सर-चरणी समर्पित

In reply to by पिशी अबोली

हा सर्वज्ञ नेमका बॅन कसा झाला ? कोणता होता तो धाग, तो प्रतिसाद ज्यामुळे तो बॅन झाला ?