Skip to main content

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ४

लेखक जेपी यांनी मंगळवार, 15/03/2016 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/32572 भाग २ http://www.misalpav.com/node/34076 भाग ३ **************************************************** मागील भागात १०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यामुळे हा नवा धागा काढत आहे. **************************************************** प्रश्न - आपल्याकडे जलव्यवस्थापना बद्दल शिक्षण / प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम उपल्ब्ध आहेत आहेत का ? असे अभ्यासक्रम कुठल्या संस्थेत उपल्ब्ध आहेत त्याची थोडक्यात महिती मिळेल का ? (उदा.संस्थेचे नाव,ठिकाण्,अभ्यासक्रम) ======================================================================= प्रतिसादासाठी धन्यवाद.

वाचने 41117
प्रतिक्रिया 206

प्रतिक्रिया

एक सरकारी नोकरीचा अर्ज भरत असताना त्यात मराठी भाषा येत असल्या बाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होते, असे प्रमाणपत्र असते हेच मला पहील्यांदा समजले, हे प्रमाणपत्र कोठे भेटते यासंबंधी कोण मार्गदर्शन करु शकेल काय?

In reply to by भीमराव

दहावीची परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र हा मराठी भाषा येत असल्याचा पुरावा समजाला जातो.

In reply to by भीमराव

दहावीची परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र हा मराठी भाषा येत असल्याचा पुरावा समजाला जातो.

binaural beats , theta waves , lucid dreaming ई बद्दल कुणी अधिक माहिती देवू शकेल वा धागा काढू शकेल काय ? (जालावरील दुवे वा उतारे देण्यापेक्षा सोप्या शब्दात धाग्यावर टंकल्यास अधिक चांगले)

ओळखीत एका मुलाचे लग्न झाल्यानंतर एक वर्षात बायकोला टी. बी. झाला आणि त्याकरता तपासण्या करत असताना HIV टेस्ट पॉझिटिव्ह आली. नवऱ्याची केली असता ती निगेटिव्ह आली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सध्या दोघे वेगळे रहात आहेत. बायको डायवोर्स देत नाही. त्या मुलाला डायवोर्ससाठी कायदा मदत करू शकेल का ?

In reply to by सस्नेह

नक्कीच. दुर्धर (बर्‍या न होऊ शकणार्‍या ) आजाराच्या निमित्ताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करु शकतो. कायद्यासमोर सर्व बाबी कायदेशीर कागदपत्रांद्वारे सिद्ध होत असल्यास घटस्फोट लवकर मिळेल.

In reply to by तर्राट जोकर

हा फसवणूकीचा मामला आहे. इथे माहितीच दिलेली नाही. मुलगी HIV +ve अाहे आणि मुलगा -ve याचा एक अर्थ असाही आहे की लग्नापूर्वी असं असल्याची माहिती दिलेली नाही. ही फसवणूक आहे. समजा उलट असतं तर मुलीने घटस्फोट मागितलाच असता की नाही? Mutual Consent किंवा परस्पर सहमतीने घटस्फोट होत नसेल तर कोर्टात जाणे हाच एकमेव उपाय ठरतो आणि कोर्ट फसवणूक हा मुद्दा ग्राह्य मानेल आणि पोटगी द्यावी लागणार नाही.

In reply to by बोका-ए-आझम

तुमच्या मुद्द्यात तथ्य आहे. पण थोडी गुंतागुंत असु शकते बोकाभाऊ, प्रश्नकर्त्याने इथे पूर्ण केस मांडलेली नाही. इथे काही प्रश्न निर्माण होतात. १. एच आय व्ही पॉझिटीव असणे व एड्स असणे ह्या दोन वेगळ्या वैद्यकिय स्थिती आहेत. इथले डॉक्टर जास्त योग्य पद्धतीने सांगू शकतील. २. प्रस्तुत केसमधली मुलगी ही एच आय व्ही ग्रस्त कशी झाली ह्याचा खात्रीशीर पुरावा व कारणमिमांसा कळायला हवी. कदाचित संक्रमित रक्ताच्या संपर्कात आल्यानेही एच आय व्ही बाधीत झालेली असु शकते. ३. लग्नापुर्वी असुरक्षित लैंगिक संबंध किंवा मुळातच लैंगिक संबंध ठेवणे गैर वा बेकायदेशीर नाही. हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे. ४. संसर्गबाधीत मुलीस ह्या अवस्थेची लग्नापुर्वी माहिती होती काय हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ५. लग्नानंतर कुणा परपुरूषाच्या संपर्कात येऊन हे झाले असेल तर केस फारच क्लिअर होइल. पण ह्या स्टेजला तुटपुंज्या माहितीवर हे बोलणे अनुचित वाटते. घटस्फोट मिळेल पण केस गुंतागुंतीची होईल जर मुलीने पोटगीसाठी अप्लाय केले तर.

In reply to by तर्राट जोकर

१. सध्या दोघे स्वतंत्र रहात आहेत. त्यमुळे मुलगी एड्सग्रस्त आहे का याची तपासणी करणे अवघड आहे. २. तसेच लग्नाच्या वेळीही मुलगी आजारी होती व लग्नानंतर वर्षाच्या आताच हा प्रकार झाला. त्यामुळे आजाराची सुरुवात कशी झाली हे मुलाच्या बाजूकडील लोकांना सांगता येणे अवघड आहे. मुलीकडचे अर्थातच सांगत नाहीत. ३. मुलीचे लग्नापूर्वी काही लैंगिक संबंध होते किंवा काय हे कळायला मार्ग नाही. ४. वरीलप्रमाणेच. ५. समजायला मार्ग नाही. मुलगा रिक्षा चालवतो त्यामुळे दिवसभर घराबाहेर आणि दोघे स्वतंत्र रहात असल्याने सासू-सासऱ्यांची नजर नव्हती. एकूणच मुलाला यातून कायद्याची मदत, तीही पोटगी द्यावी न लागता होईल काय हा प्रश्न आहे.

In reply to by सस्नेह

कायद्याची मदत होईल व पोटगी न द्यावी लागता होईल. परंतु... ह्यात 'परंतु' आहेच कारण दोन्हीकडचे वकील केस कशी लढतात त्यावर सर्व अवलंबून आहे. मी वर उपस्थित केलेले मुद्दे मुलीचा वकील उपस्थित करेल तर मुलासाठी केस किचकट होईल. अर्थात किचकट, अशक्य नव्हे. अगदी सहज सुटका सोपी नाही. मुलाच्या वकिलाला मुलीचे विवाहपुर्व/अनैतिक लैंगिक संबंध सिद्ध करावे लागतील. कोर्ट मुलीच्या तपासणीचा आदेश देऊन केव्हापासून ती बाधित आहे ह्याची खातरजमा करुन घेईल. बोका ह्यांनी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीपासून मुलाच्या वकिलाने रोख 'फसवणूकीच्या उद्देशाने लग्नापुर्वीचे सत्य लपवून ठेवले' ह्या मुद्द्यावर ठेवला तर फायदा आहे. तरी माझ्या मते दोन वर्षे तरी केसला मरण नाही. अर्थात हे अनेक परमुटेशन कॉम्बीनेशनवर अवलंबून आहे.

In reply to by तर्राट जोकर

धन्यवाद, तजोभाऊ. वकिलांचा सल्ला लवकरच घेत आहे. तथापि, अलीकडे वकिलांचासुद्धा भरोसा नाही. कायदा नक्की काय सांगतो हे वकील नक्की सांगतील का याची ग्यारंटी काय.

In reply to by सस्नेह

स्नेहांकिताताई, कायदा हे फक्त शस्त्र आहे ज्याला स्वतःची शक्ती नसते ती वापरणार्‍यावर अवलंबून आहे. वकील कसा आहे ह्यावर बरेच अवलंबून आहे. दोन्ही वकील व न्यायाधिश असलेल्या पुराव्यांचा उपलब्ध कायद्याच्या आधारे काय निर्णयापर्यंत पोचतात एवढे बघणे हातात असते. कायदा स्वयंभू नाही तसेच प्रत्यक्ष केसमधे कोणकोणते कायदेशीर संदर्भ केससाठी उपयुक्त ठरतील हे शोधणे वकिलाच्या बुद्धीमत्तेवर अवलंबून आहे. त्यामुळे चांगल्या वकिलाशिवाय पर्याय नाही. हा प्रश्न इथे मांडण्यामागची तुमची भूमिका कळली होती, जसे की कोणते कलम किंवा तत्सम कायदा सहाय्यक ठरेल असे काही विचारणे. तसे सकृतदर्शनी आपली केस कायदेशीररित्या सोपी व सुटसुटीत वाटते. पण शेवटी अनेक गोष्टींवर निर्णय अवलंबून आहे इतकेच. जमले तर केसचा निर्णय कळवाल. धन्यवाद.

In reply to by तर्राट जोकर

न्यायप्रक्रिया ही कायद्याची निर्णायक अवस्था आहे. केसचा निर्णय =)) ..आताशी कुठे सल्ला घ्यायचा आहे. यानंतर कायदेशीर नोटीस इ. प्रक्रिया मग केस न्यायप्रविष्ट आणि मग निर्णय. बरंच मोठा पल्ला आहे. तुमच्या मते निदान दोन वर्षे.

In reply to by सस्नेह

मुलीला एच आय व्ही आहे , मुलाला नाही तर कोर्ट घटस्फोट मंजुर करेल. एच आय व्ही मुलापासुन मुलीला झालेला नाही हे तर १०० % सत्य आहे. त्यामुळे त्याला घटस्फोट मिळायला अडचण नसावी. पोटगी बाबत सांगु शकत नाही. वरकरणी तरी मुलीकडुन फसवणुन केल्याचे वाटते. ते सिद्ध करणे अवघड आहे. पण घटस्फोटाला अडच्ण येणार नाही.. त्यासाठी वकिली य्कुक्तिवाद वगैरे काहीही लागणार नाहीत.

In reply to by mugdhagode

पोटगी हाही विषय महत्वाचा आहे. फसवणूक सिद्ध झाल्याशिवाय पोटगीतून सुटका मिळत नाही असे काही आहे का ?

In reply to by सस्नेह

लग्नानंतर मुलगी जर दवाखान्यात अ‍ॅडमिट झाली असेल, किंवा बाहेरुन रक्त द्यावा लागला असेल, एखादा ऑपरेशन झाले असेल तर त्या द्वारे संसर्ग होउ शकतो. फसवणूकीचा गुन्हा दाखल करायला ती लग्नापूर्वीपासूनच hiv + होती असे सिद्ध करावे लागेल.

In reply to by कपिलमुनी

मुनिवर रक्त दिल्यामुळे HIV + होण्याचे प्रमाण दहा हजारात एका पेक्षा कमी आहे याचे कारण सर्वच्या सर्व रक्तपेढ्यात रक्त तपासूनच घेतले जाते. शल्यक्रिया करणारे डॉक्टर सुद्धा रुग्णाची शल्यक्रिया करण्याचे अगोदर पूर्ण रक्त तपासणी केल्याशिवाय शल्यक्रिया करीत नाहीत. अगदी लोकांच्या नाही तरी स्वतःच्या सुरक्षितते साठी. दवाखान्याच्या सुईने किंवा "थिएटर" मध्ये सुई टोचल्याने HIV + झालो हे १०० %मिथ्या आहे. हो तसे "ड्रग्स" घेताना तीच सुई बर्याच लोकांनी वापरल्यामुळे थोड्याप्रमाणात HIV + आढळतात. पण त्याला बर्याच वेळेस ड्रग्स घेतली जातात तेंव्हा असे होते. बहुसंख्य HIV + लोक हि कारणे सर्रास देतातच कारण आपला बाहेरख्यालीपणा उघडपणे काबुल करण्याची हिम्मत लाखात एखाद्याची असते. तेंव्हा या सर्व सबबी "लंगड्याच" असतात

In reply to by बोका-ए-आझम

समजा उलट असतं तर मुलीने घटस्फोट मागितलाच असता की नाही?
अगदी बरोबर ही बघा आजचीच या विषयावरील बातमी .

In reply to by सस्नेह

पण पोटगी व इतर बाबींबद्दल पूर्ण केस समजून घेतल्याशिवाय सांगने कठिण आहे. ह्यातला विशेषज्ञ वकिल आपल्याला मदत करु शकेल. अर्थात हे तुम्हाला माहित आहेच.

Gratuity नक्की कधी मिळते. ढोबळपणे ५ वर्ष म्हणतात पण ते मुळात काही तरी १७०० दिवस / क्ष्क्ष आठवडे... असं काही तरी आहे ना? म्हणजे ४ वर्ष ८/१० महिने असं काही तरी ते गणित होतं.. मागे एकदा HR च्या सेशन मध्ये हे सांगितलं होतं पण नीट लक्षात नाही. कुणाला नक्की माहिती आहे का?

In reply to by पिलीयन रायडर

ते कंपनीच्या धोरणावर अवलंबून आहे. साधारणपणे कंपनीत किमान ५ वर्षे काम केले तर Gratuity साठी तुम्हाला पात्र धरतात. पण ही मुदत प्रत्येक कंपनीनुसार बदलू शकते.

In reply to by श्रीगुरुजी

http://hrsuccesstalk.blogspot.in/2013/03/13-facts-one-should-know-about-gratuity.html इथे तिसर्‍या प्रश्नात असं सांगितलंय की मद्रास उच्चन्यायालयाच्या निर्णयानुसार चार क्यालेंडर वर्षे पूर्ण व पाचव्या वर्षातील २४० कामाचे दिवस काम केलेले असल्यास ग्रॅच्युटिस पात्र ठरावे. मात्र त्यानंतरही ग्रॅच्युटी कायद्यात बदल न झाल्याने, हा निर्णय कदाचित फक्त तमिळनाडू राज्यात लागू होत असावा.

In reply to by तुषार काळभोर

हो, हा निर्णय वाचला मी. पण मला नाही वाटत तो बरोबर आहे. किंवा महाराष्ट्रात लागु आहे. हे ही बघा http://www.gratuity.org.in/gratuity-eligibility.php

In reply to by श्रीगुरुजी

बरोबर... मला एका कंपनीने सहा महिन्याच्या (पुण्यातली एक अमेरिकन, आयटी प्रॉडक्ट कंपनी) नोकरीवर ग्रॅच्युइटी दिली होती.

In reply to by पिलीयन रायडर

ग्रॅच्युईटी अ‍ॅक्ट १९७२ मध्ये "फाईव्ह ऑर मोअर दॅन फाईव्ह इयर्स ऑफ कंटिन्युअस सर्व्हिस..." असं काहीसं आहे, आणि कंटिन्युअस सर्व्हिस कशी मोजायची यावर काही नियम आहेत. कोणी सीएस किंवा वकील अधिक सांगू शकेल.

In reply to by आदूबाळ

हो. जालावर शोधले असता बरीच वेगवेगळी माहिती मिळाली. पण एका ठिकाणी अगदी ठामपणे लिहीले आहे की ४ वर्ष ७ महिने झाले तरी ६ महिन्याच्या वर गेल्याने त्याला वर्ष धरायचे. मग ग्रॅचुइटी मिळते. शिवाय वर्ष ३६५ दिवसांचे नसते, ५ दिवसांचा आठवडा असेल तर १९० दिवसांचे असते. असे काही काही लिहीले आहे. म्हणुन जॉइनिंग डेट नंतर बरोब्बर पाचच वर्ष काम केलं पाहिजे असं काही नाहीये म्हणे. मला ४ वर्ष १० महिन्यांनाही रक्कम कॅलक्युलेट करुन दिली. तर एका ठिकाणी ४ वर्ष ११ महिने १० दिवस झाले असतानाही दिली नाही असेही सांगितले आहे. फारच परस्परविरोधी माहिती आहे.

भारत भ्रमण करण्यासाठी हार्ले डेव्हिडसन बाईक वरून निघालेल्या 'लेडी ऑफ द हर्ली' म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरच्या बायकर विणू पालिवाल यांचे अपघातात दु:खद निधन....

शंकराचार्य पदासाठीच्या पात्रतेचे निकष काय आहेत ?

In reply to by कंजूस

खेळकर प्रतिसाद : अगोदरचा आचरट दुसरा नेमून प्रवृत्त होतो.अडवणूक असते का नाही ते माहीत नाही शात्रात बघावे लागेल पण शास्त्रच माहीत नाही. करमणूकी नाखु

In reply to by प्रचेतस

ती एक खासगी संस्था आहे आणि त्यांचे निर्णय नाही पाळले म्हणून काही अडणार नाही समाजाचे.समाजही त्यांच्या आत्रगत व्यवहारात लक्ष घालू शकत नाही.आद्य शंकराचार्यांनी आठव्या शतकात ही चळवळ सुरू केली आणि बुद्ध धर्माची उसळती लाट थोपवली.भारतातले सर्वच जण एकाच धर्मात येतील हे मानणे अतिशयोक्ती आहे.त्यांच्या मठाधिपतीलाही परंपरा,वेद वगैरे,अद्वैत मानावेच लागेल जरी आता काही पीठाधिपती वेगळी वैयक्तिक मते मांडताना दिसतात.हिंदूधर्म फारच लवचिक आहे तसा कर्मठही आहे.

In reply to by आबा

ती एक पूर्ण स्वतंत्र व्यवस्था आहे. महंत, महामंडलेश्वर, आणि काय काय उपाध्या विकत मिळतात. त्यांची स्वतःची राजकारणं असतात. खेचाखेची असते. आखाडा संस्कृतीबद्दल शोध घेतला तर शंकाराचार्य कुठून येतात हे कळेल. आता वेळ नाही म्ह्णून टंकत नाही. शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा संबंध नाही हे हिंदूंना कळेल तो सुदिन.

In reply to by तर्राट जोकर

+१ सहमत! 'इतरां'कडे पाहून 'आपल्यालाही' कोणीतरी सर्वोच्च 'अधिकारी पुरुष*' असावा या 'हव्यासा'तून हे घडवले गेले असावे. *: इतर धर्मात जर स्त्रिया सर्वोच्च धर्मगुरू पदावर असत्या, तर कदाचित हिंदूंनीही एखादी स्त्री शंकराचार्यपदी स्वीकारली असती.

फक्त बाटलीबंद पाणी (मिनरल वॉटर ) जर पिण्यासाठी रोज वापरावे लागत असेल्,तर ते आरोग्यासाठी कसे असते.? चांगले..वाईट की काहि फरक नाही..

In reply to by जेपी

माझ्या मते काही विशेष फरक पडत नसावा, पण एकदा शुद्ध पाण्याची सवय लागली तर चुकून/नाइलाजने अशुद्ध पाणी पिण्यात आले तर जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असावी. अर्थात हा माझा समज जाणकारांच्या प्रतिक्षेत...

पण एकदा शुद्ध पाण्याची सवय लागली तर चुकून/नाइलाजने अशुद्ध पाणी पिण्यात आले तर जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असावी
जंतुसंसर्गाला निदान उपाय तरी आहे, परंतू पाण्यात विरघळलेल्या विषारी घटकांमूळे किड्नीसारखे अवयव कायमचे निकामी होऊ शकतात. बाटलीबंद पाण्याचा TDS १५० पेक्षा कमी नसावा व ३०० पेक्ष अधिक नसावा.

In reply to by मार्मिक गोडसे

बरोबर. सामान्यपणे विहिरी, नद्या, धरणे, कालवे इत्यादी नैसर्गिक स्रोतांमधून थेट कुठलेही शुद्धीकरण न करता येणार्‍या पाण्याचा टीडीएस सुमारे ६०० ते ९०० असतो. गेल्या अनेक दशकांपासून होत असलेल्या बेसुमार रासायनिक खतांच्या वापरामुळे हा टिडीएस वाढत जात आहे. असे पाणी पिणे पार्किन्सन्स सारख्या अनेक रोगांना आमंत्रण देणारे ठरत आहे. बिसलेरीच्या पाण्याचा टिडीएस ३० असतो तर घरातल्या आरओ चा १०० च्या आत. सतत फिरत्या नोकरीवर असणार्‍यांनी कमी टिडीएस असणारे पाणी प्यायले पाहिजे. शुद्धीकरण न केलेल्या पाण्याचे सतत सेवन टाळले पाहिजे.

In reply to by मार्मिक गोडसे

सर, बिसलेरीचा ३० हा टीडीएस स्वतः मोजलेला आहे टीडीएस मीटरने. अधिकृत माहिती वेगळी असु शकते.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

२० पेक्षा कमी टिडीएस प्रकृतीस योग्य नाही. पिण्यायोग्य पाण्याचा टीडीएस हा ६० ते ३०० च्या रेंजमधे असावा. मुतखड्याचा त्रास टीडीएस जास्त असल्याने होतो हा गैरसमज आहे. तो काढून टाकावा. पिकांसाठी मात्र टीडीएस १०० च्या आसपास लागतो. पिकांचे पाणी आणि पिण्याचे पाणी वेगवेगळे असावे.

I had home loan with HDFC for 18 year, with "HOME Suraksha Plus" Home loan protection policy. I have closed the said loan within 5 years. My questions are : 1. What will happen to that Policy? 2. Will I get any refund? Sorry for typing in English.

जागेची वाटणी करताना (वडिलोपार्जीत घर) काही भागाची किंमत इतर जागेच्या तुलनेत जास्त असेल (मेन रोड वगैरे कारणांमुळे )आणी एका भावाला जास्त किंमत असलेली जागा हवी असेल तर दुसऱ्या भावांना क्षेत्रफळाच्या दृष्टीने जास्त जागा घेण्याचा अधिकार आहे का ?

In reply to by उगा काहितरीच

वडिलोपार्जित मालमत्ता हि सरस निरस मानाने वाटणी केली जाते. म्हणजे, मालमत्तेचे मूल्य, स्वरूप इ. लक्षात घेऊन हिस्से वाटणी केली जाते.

अँड्रॉईड ओ.एस. ऑटो अपडेट होत नसेल तर दुसरा काही ऑप्शन आहे का अपडेट करण्यासाठी? माझा टॅब मायक्रोमॅक्स पी ६०० आहे. कंपनी ओ.एस. वर्जन आहे अँड्रॉईड ४.०.४. "सिस्टिम अपडेट" -> "रिमोट अपडेट" मधे गेलो तर "Your system is currently up to date" असा मेसेज येतोय. सेटिंग्स मधे रिमोट अ‍ॅड्रेस यू.आर.एल. देऊन अपडेट होइल का? तसं असेल तर यू.आर.एल. काय द्यायची?

महत्वाचे - आजकाल पुणे शहराजवळ 5 लाखात घर..अशी मोठी जाहिरात केली जात आहे, मला या जाहिरातीतील घर घेण्यांत रस आहे. या आधीही 'भारतीय जनघर योजना' नावाने स्वस्त घर योजनेच्या जाहिराती पाहिल्या. जाहिरातीतील भाषा छायाचित्रे , रंगसंगती व योजनांची नावे ई. पहाता ह्या योजनांना सरकारी पाठबळ असावे असे वाटते.. वस्तुस्थिती काय आहे ?? कोणी जाणकार माहिती देवु शकेल काय??

In reply to by प्रसाद भागवत

प्रधान मंत्री आवास योजना व ह्या स्किमचा काहीही संबंध नाही. सबब वेट अ‍ॅण्ड वाॅच.

In reply to by प्रसाद भागवत

जाहिरातीतील भाषा छायाचित्रे , रंगसंगती व योजनांची नावे ई. पहाता ह्या योजनांना सरकारी पाठबळ असावे असे वाटते..
फुटलाय फुगा आता .

दरवेळी कोकणात जाताना घाटात सुचना लिहिलेल्या असतात. त्यामध्ये प्रामुख्याने दिसणारी आणि लक्ष वेधून घेणारी सुचना म्हणजे

>>वेडी वाकडी वळणे वाहने हळू चालवा

ही असते. आता वळणे वाकडी असू शकतात पण वळणे "वेडी" असणे कसे शक्य आहे?

In reply to by तर्राट जोकर

रस्त्यातील अनोळखी परंतु लक्ष्यवेधी "वळणदार" प्रलोभनांकडे वेडी वाट करू नये म्हणून असेल. कोकणात भुते आहे असे म्हणतात. खखो भुते आणि कोकण जाणे (आणि आता मुवीही)

In reply to by प्रसाद_१९८२

वेडी वाकडी वळणे यावरून सकाळ मुपिची "घाटात फूटला घाम" नामक कथा आठवली. प्रतिक्रिया भन्नाट आहेत. फुल्टू टाइमपास. =)) मोबाईलवरून लिंक देता येत नाही. स्वारी.....

आजकाल गुलाबाची वासाची फुले मिळेनाशी झालीत. वासाची फुले कुठे मिळू शकतील (पिंपरी-चिंचवड /पुण्यात) वासाच्या गुलाबाचे रोप कुठे मिळू शकेल ?

In reply to by मराठी कथालेखक

देहूतून तळेगाव चाकण रस्त्याकडे म्हणजेच भंडारा डोंगराकडे जाताना नदीपुलापासून अर्धा-एक किमीवर डाव्या बाजूला छानशी छोटीशी नर्सरी आहे. गुलाबाची रोपे'च' तिथे प्रामुख्याने मिळतात. तिथे हमखास वासाची फुलाबाची रोपे मिळतील. Sandy

In reply to by मराठी कथालेखक

ही घ्या गुगल भाऊने दिलेली लिंक... https://www.google.co.in/maps/@18.7323466,73.7579163,143m/data=!3m1!1e3… इतक काय अवघड नाहीये खर... तुम्ही, सांगितलेल्या रस्त्यावरून सावकाश गेलात की डाव्या बाजूला दिसेलच. रस्त्याला लागूनच आहे. आणि बहुधा त्या रस्त्यावर तेवढी एकच आहे. Sandy

माझ्याकडे सुगंधी, गुलाबी रंगाच्या गुलााचा वेल होता आठ दहा वर्षांपुर्वी तो नंतर जगला नाही.त्याच्या पानांना हात लावला तरी सुगंध येत असे.नंतर त्याच नर्सरीत तो गुलाब मिळेना.