उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्
वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संततिः
समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते.
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.
हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे.
पुरातन काळापासूनच आपण आपल्या भरत भूमीला आई म्हणतो. युरोपियन लोक हि देशाला पितृभूमी म्हणतात. एकदा का देशाला आपण माता /पिता मानले कि देशात बंधुत्वाचे वातावरण आपसूक निर्मित होते. जिथे सोख्य असेल तिथे शांती, आणि समृद्धी हि आलीच
प्रकृतीने हिमालयापासून समृद्रापर्यंत एक विशिष्ट भूभागाची रचना केली आहे. या भू-भागात अनेक भाषा-भाषी, पंथ आणि जातींचे लोक राहतात. एकाच राजाचे राज्य नेहमीच या भूभागावर राहील, हे संभव नाही. सत्तेसाठी युद्ध हे अटळ आहेच. आपल्या देशात सत्ता बदलली तरी लोकांवर जास्त अत्याचार होत नव्हते. कारण लोकांमध्ये बंधुत्व भाव आहे.
आपले ऋषी-मुनि दूरदर्शी होते. धर्म आणि जातीच्या नावाने संपूर्ण भरत भूमीत राहणार्या लोकांना सांस्कृतिक दृष्ट्या एक सूत्रात बांधणे शक्य नाही हे त्यांना माहित होते. प्रत्येकाला त्याचीच भाषा, जाती आणि पंथ श्रेष्ठ वाटतो. पण देशाच्या मातीप्रती लोकांच्या मनात आत्मीयता उत्पन्न करणे शक्य होते. आपल्या ऋषींनी हेच केले. सकाळी म्हणण्याचे श्लोक म्हणजे प्रात:स्मरणची रचना केली. लोकांच्या मनात देशाची माती आणि तिथे जन्मलेल्या महापुरुषांप्रती आदर भाव जागृत करणे हाच दूरदर्शी ऋषींचा उदेष्य हेतू होता. उदा:
गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती.
नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु.
महेन्द्रो मलय: सह्ये देवतात्मा हिमालय:.
ध्येयो रैवतको विन्ध्यो गिरिश्चारावलिस्तथा.
अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका.
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका.
रोज सकाळी प्रात:स्मरण केल्याचा परिणाम, लोकांच्या मनावर नकळत होतोच. घरात नळाच्या पाण्याने किंवा गावात विहिरीच्या पाण्याने, स्नान करत असताना आपण देशातील सर्व नद्यांच्या पाण्याने आंघोळ करण्याचा आनंद घेतो. यमुनेच्या पाण्यात स्नान करताना माझ्या मनात कावेरी नदीत स्नान करण्याची इच्छा उत्पन्न होते. सर्व पर्वतांचे आणि नगरांचे दर्शन घेण्यासाठी यात्रेची इच्छा होणारच.
भरतभूमी वर जन्म घेणार्या आपल्या पूर्वजांप्रती आपल्या मनात आदर आणि श्रद्धा निर्माण करण्याचे काम हि आपल्या ऋषींनी केले. भारतभूमीत जन्म घेणारी महान विभूती मग ती स्त्री असो वा पुरुष, त्यांची स्मृती नेहमी आपल्याला राहावी म्हणून त्यांना हि प्रात:स्मरणात स्थान दिले. आयुष्यभर संघर्ष करून आपले उद्दिष्ट साध्य करणार्या आपल्या ५ महान स्त्रियांचे आपण रोज प्रात: स्मरण करतो:
अहल्या द्रोपदी सीता तारा मंदोदरी तथा.
पंचकन्या स्मरेनित्यं महापातक नाशनम्.
तसेच पुण्यश्लोको नलो राजा... ‘अश्वत्थामा बलिर्व्यासो... सारांश अश्यारीतीने पुरातन ऋषींनी आपल्या मनात या देशाच्या माती आणि पूर्वजांच्या प्रती आपल्या मनात आदर आणि भक्तीभाव उत्पन्न केला. आज आपण आपल्या पूर्वजांची पूजा करतोच मन देशाच्या मातीला ‘भारत माँ’ संबोधून तिची हि पूजा करतो.
जेंव्हा देशाचे राजकीय दृष्ट्या शेकडों तुकडे झालेले होते, त्याच वेळी आदी शंकराचार्यांनी देशाच्या चारी भागात चार मठांची स्थापना केली. चार धाम यात्रेची सुरवात बहुधा आदी शंकराचार्यांमुळेच सुरु झाली असेल. शाक्त पंथीयांनी देशात विभिन्न भागात (पाकिस्तान सहित) ५२ शक्तीपीठांची स्थापना केली. शैवांनी देशात विभिन्न प्रांतात १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना केली. जवळपास सर्व हिंदू तीर्थ क्षेत्री जैनांनी सुद्धा आपली मंदिरे उभारली. गुरु गोविंद जर काही काळ आणिक जिवंत राहिले असते तर निश्चित कन्याकुमारीला हि एक गुरुद्वारा बांधला असता. असो. आज हि विभिन्न स्थानांवर भरणार्या कुंभ मेळ्यात देशातील सर्व ठिकाणाहून यात्रेकरू येतात, सर्व पंथीय साधू सन्यासी, यात्री एकत्र बसून चर्चा करतात. अश्यारितीने देशातील सर्वपंथांनी, या मातीप्रती लोकांचे प्रेम, श्रद्धा आणि आदरण निर्माण करण्यात महत्वाचे योगदान दिले आहेत.
देशाला मातृभूमी किंवा आई मानण्याने, देशात राहणार्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होतोच या शिवाय एक राजनीतिक सत्ता स्थापन करण्यात हि यश येते. आपल्या देश्यात शेकडों चक्रवर्ती झाले. एकदा दिल्ली काबीज केली कि संपूर्ण देशाची सत्ता सहज प्राप्त होत होते हे आपण इतिहासात पाहिलेच आहे. आत्ताचेच उदाहरण घ्या. देशाला स्वतंत्रता मिळण्याच्या वेळी देशात ६०० पेक्षा जास्त राजे-महाराजे होते. त्यातील अधिकांश राजा-महाराजांनी स्व:खुशीने आपल्या राज्यांचे भारतात विलीनीकरण केले. तेथील जनतेने हि विरोध केला नाही. कारण विभिन्न राज्यात राहणारी लोक या देशाला ‘भारत माँ’ म्हणून ओळखत होते. भारतमाते प्रती त्यांच्या मनात श्रद्धाभाव होता.
इस्लाम मध्ये देशाला मातृभूमी मानण्याची अवधारणा नाही. पण धर्मावर आधारित बंधुभावाची अवधारणा आहे. त्यांच्या मनात आपल्या गैर इस्लामिक पूर्वजांप्रती सम्मानाची भावननेला हि स्थान नाही. तेथील जनतेला एकत्र ठेवण्याचा कुठलाच दुआ उरलेला नाही. एकाच देशात राहणारे लोक, एकच धर्म मानणारे, पंथ, कबीला, जातीच्या नावावर एका दुसर्याच्या विरुद्ध लढत आहे. कोण स्वकीय आणि कोण परीकीय हे कळण्याची बुद्धी हि त्यांच्यात उरलेली नाही. जे लोक त्यांच्या कबील्याचे किंवा पंथाचे नाही, त्यांची हत्या करण्यात त्यांना काहीच वाईट वाटत नाही आहे. मग लहान मुले असो किंवा स्त्रिया सर्वांचाच वध होतो. लाखोंच्या संख्येने लोकांना आपली जन्मभूमी सोडून शरणार्थी बनावे लागले आहे. ह्या देशांचा संपूर्ण विनाश झालेला आहे. एकच धर्म मानणारे बंधुभावाने राहू शकतात, हि अवधारणा फोल ठरली आहे. गेल्या शतकात दोन विश्व युद्ध इसाई धर्म मानणार्या युरोपियन देशांत झाले. नेपाल हिंदू धर्मावलंबी असला तरी भारताशी त्याचे संबंध चांगले नाही. इस्लामी देशांची परिस्थिती तर आपण पाहताच आहोत..
ज्या देशांत त्यांची पूर्वजांना सम्मान दिल्या जातो, तेथील परिस्थिती वेगळी आहे. इराणी लोक आज हि अग्निपूजक जाल, रुस्तम, सोहराब यांचे तराणे गातात, तिथे शांती आहे. ५००० पेक्षा जास्त द्वीपसमूह आणि भारताप्रमाणे भिन्न-भिन्न जनजातीय असलेल्या इंडोनेशियात लोक एकत्र राहतात. रामायण आणि महाभारतातल्या कथांनी आणि चीनी परंपररेनी तिथल्या लोकांना एकत्र जोडलेले आहे. मिस्त्रच्या लोकांना आपल्या पिरामिड आणि त्यांना बनविणार्या पूर्वजांवर गर्व आहे. नील नदी प्रती त्यांच्या मनात आदर भाव आहे. परंतु आजकाल इस्लामी कट्टरता त्यांच्या मनात त्यांच्या पूर्वजांप्रती अनादर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचेच परिणाम आज मिस्त्रचे लोक भोगत आहेत.
१९४७ मध्ये भारताच्या ज्या भागात इस्लाम मानणारे लोकांची संख्या जास्त होती, तो भूभाग देशापासून वेगळा झाला त्याचे कारण हेच. पण हे इथेच थांबणार नाही, देशाच्या मातीप्रती आदर नसल्यामुळे पाकिस्तानचे भविष्यात आणखीन हि तुकडे होण्याची संभावना नाकारता येत नाही. आज तिथे अराजकतेचे वातावरण आहे. बलूच, पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी सर्वच दुसर्याला आपले शत्रू समजतात. जर इस्लामी जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर मातृभूमीला आईचे स्थान देण्याची अवधारणा इस्लाम मध्ये समाविष्ट करावी लागेल. अर्थात हे कार्य इस्लामी विद्वानांच करावे लागेल. एकदा देशाला आई म्हंटले कि त्या भूमीत जन्म घेणार्या सर्व पंथीय आणि जातीय लोकांविषयी बंधुत्व भाव आपसूक निर्माण होतो. लोक एका दुसर्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. देशात शांती प्रतिस्थापित होते.
आज आपल्या देशाला ‘भारत माता’ म्हणण्याचा विरोध काही अतिशहाणे पुरोगामी करीत आहे. एक तर त्यांना इतिहासाचे ज्ञान नाही. होणार तरी कसे? अंग्रेजानी देशावर राज्य करण्यासाठी ‘फूट डालो राज करो’ च्या नीतीचे अवलंबन केले होते. त्या साठी त्यांनी आपल्या पुरातन इतिहासालाच खोटे ठरविले. हेतू आपल्या पूर्वजांप्रती आपली श्रद्धा नष्ट करणे. एकदा लोकांच्या मनात ते वेगवेगळे आहेत, हि भावना रुजविली कि त्यांच्यात दुही माजविण्यात यश येतेच. त्याच साठी देवासुर संग्राम म्हणजे आर्य आणि द्रविडांचे युद्ध. असा इतिहास शिकवणे सुरु केले. आज देशाला स्वत्रंत होऊन हि ७० वर्षे झाली तरी हि आपल्याला पूर्वजांचा खरा इतिहास शिकविला जात नाही. अंग्रेजानी त्यांच्या स्वार्थासाठी तैयार केलेला खोटा इतिहास शिकून तैयार झालेले अतिशहाणे आपल्या भूमीला ‘माता’ कसे मानणार. भारत मातेच्या बर्बादीचे नारे लावणारे त्यांचे हिरो झालेले आहे. या विद्वानांना एवढे हि कळत नाही, एकदा भारत माते विषयी आपली श्रद्धा नष्ट झाली तर या मातीचे शंभर तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. मग लिबिया आणि इराक सारखी आपली गत व्हायला कितीस वेळ लागेल.
हे टाळायचे असेल, तर उद्यापासूनच आपल्या मुला-बाळांना प्रात: स्मरणीय श्लोक शिकवा. आपल्या देशातील नद्या, पर्वत, पवित्र सरोवरे, पुरातन ऋषी-मुनि, राजा-महाराजा, बादशाह आपले सणवार त्यांच्या मागच्या कहाण्या इत्यादी बाबत माहिती दिली तरी चालेल.
याद्या
32688
प्रतिक्रिया
184
मिसळपाव
काय गैर आहे नियोगात?
In reply to एक एक करुन उत्तरे माझ्यापरीने by नाना स्कॉच
नानासाहेब,
In reply to एक एक करुन उत्तरे माझ्यापरीने by नाना स्कॉच
टिका करायची म्हणुन तुम्ही
In reply to नानासाहेब, by भंकस बाबा
काय राव इतक्यातल्या इतक्यात
In reply to नानासाहेब, by भंकस बाबा
उद्धिष्ठ काय आहे?
In reply to काय राव इतक्यातल्या इतक्यात by नाना स्कॉच
तुम्हाला नियोगाचे नियम माहीती
In reply to उद्धिष्ठ काय आहे? by भंकस बाबा
हे नियोगाचे नियम म्हणजे काय?
In reply to तुम्हाला नियोगाचे नियम माहीती by नाना स्कॉच
..
In reply to हे नियोगाचे नियम म्हणजे काय? by प्रचेतस
रामायणाचा काळ वायला गो.
In reply to .. by mugdhagode
तुझी परिक्षा घेतली गो ! खरे उत्तर !!....
In reply to रामायणाचा काळ वायला गो. by प्रचेतस
साधनशुचिता , ठो!
In reply to तुम्हाला नियोगाचे नियम माहीती by नाना स्कॉच
ओके म्हणजे ही कॉन्सेप्ट
In reply to साधनशुचिता , ठो! by भंकस बाबा
जे झेपनार नाही ते नाही म्हणावे माणसाने!
In reply to ओके म्हणजे ही कॉन्सेप्ट by नाना स्कॉच
तुम्ही एकीकडे म्हणताय व्यभिचार
In reply to एक एक करुन उत्तरे माझ्यापरीने by नाना स्कॉच
एकीकडे म्हणताय उत्कट प्रणय.
In reply to तुम्ही एकीकडे म्हणताय व्यभिचार by बोका-ए-आझम
हरकत नाही.
In reply to एकीकडे म्हणताय उत्कट प्रणय. by नाना स्कॉच
...
In reply to बापाची कबर वाळायच्या आत by गॅरी शोमन
hahaha
In reply to ... by mugdhagode
तार्किक दृष्टीने पाहावयास
+१
In reply to तार्किक दृष्टीने पाहावयास by खालीमुंडी पाताळधुंडी
+१
In reply to +१ by मराठी कथालेखक
अपि स्वर्णमयी लङ्का न मे
..
In reply to अपि स्वर्णमयी लङ्का न मे by सतिश गावडे
महालोल!!
In reply to अपि स्वर्णमयी लङ्का न मे by सतिश गावडे
बराचसा माल गडबड आहे राव, किती
In reply to महालोल!! by नाना स्कॉच
मी तर हा श्लोक रामायणात
In reply to अपि स्वर्णमयी लङ्का न मे by सतिश गावडे
घ्या! नैले पर दैला !!
In reply to मी तर हा श्लोक रामायणात by प्रचेतस
तंवर वेट एंड वॉच >>>
In reply to घ्या! नैले पर दैला !! by नाना स्कॉच
ओ आय सी!! असा सगळा प्रकार
In reply to तंवर वेट एंड वॉच >>> by जेपी
..
In reply to मी तर हा श्लोक रामायणात by प्रचेतस
मुग्धे..मुग्धे...!!!
In reply to .. by mugdhagode
ती ती नाही तो आहे त्याचा वरचा
In reply to मुग्धे..मुग्धे...!!! by प्रचेतस
तेच ते
In reply to ती ती नाही तो आहे त्याचा वरचा by viraj thale
..
In reply to मुग्धे..मुग्धे...!!! by प्रचेतस
प्रचू डार्लिंग
In reply to .. by mugdhagode
mugdhagode
In reply to प्रचू डार्लिंग by कॅप्टन जॅक स्पॅरो
मिपाच्या गार्डनमधे
In reply to .. by mugdhagode
रामाच्या काळात देश ही संकल्पना आजच्या संदर्भाने अस्तित्वात होती
In reply to .. by mugdhagode
तो ऐकून घेतो म्हणून काय कडेवर
In reply to रामाच्या काळात देश ही संकल्पना आजच्या संदर्भाने अस्तित्वात होती by बोका-ए-आझम
या संदर्भात, श्री. तारेक फतेह
हम्म दुसरं काही नसलं कि,
In reply to या संदर्भात, श्री. तारेक फतेह by होकाका
ओके
ठ्ठो
In reply to ओके by दिग्विजय भोसले
हाट!
In reply to ओके by दिग्विजय भोसले
..
In reply to हाट! by पैसा
तो बुरखा असतो काय!
In reply to .. by mugdhagode
अर्ज है
In reply to तो बुरखा असतो काय! by पैसा
लांडक्यांना असे फरक कळत
In reply to अर्ज है by नाखु
मुद्दा तो नाही,
In reply to हाट! by पैसा
तद्दन येडेपणा
In reply to मुद्दा तो नाही, by दिग्विजय भोसले
+१
In reply to तद्दन येडेपणा by पैसा
..
In reply to तद्दन येडेपणा by पैसा
मग?
In reply to .. by mugdhagode
रहमानने म्हंटल म्हणून
In reply to तद्दन येडेपणा by पैसा
एक्जॅक्टली
In reply to रहमानने म्हंटल म्हणून by मराठी कथालेखक
खीक्क
In reply to एक्जॅक्टली by दिग्विजय भोसले
मुळगावकरांचे चित्र काय?
In reply to खीक्क by प्रदीप साळुंखे
नो आयडिया,पण त्या धाटणीचं
In reply to मुळगावकरांचे चित्र काय? by पैसा
=((
In reply to खीक्क by प्रदीप साळुंखे
चित्रातल्या मागच्या नकाशाच्या
In reply to हाट! by पैसा
अजिबात नाही.
In reply to चित्रातल्या मागच्या नकाशाच्या by बाळ सप्रे
एका मातीत जन्मलेल्या लोकांची
In reply to ओके by दिग्विजय भोसले
....
संपादकीय मधून डांबरट शेलकी
In reply to .... by mugdhagode
..
In reply to संपादकीय मधून डांबरट शेलकी by खालीमुंडी पाताळधुंडी
न्यायप्रविष्ट
In reply to .. by mugdhagode
यांची बदलती रूपं पाहून
In reply to .. by mugdhagode
मां नको तर मुस्लिमांनी अम्मी
तुम्हाला मुद्दा कळाला नाही.
In reply to मां नको तर मुस्लिमांनी अम्मी by कॅप्टन जॅक स्पॅरो
ओह त्यांची विचारसरणी म्हणजे
In reply to तुम्हाला मुद्दा कळाला नाही. by खालीमुंडी पाताळधुंडी
बराचसा इस्लाम आम्हाला पण कळला नाही.
In reply to तुम्हाला मुद्दा कळाला नाही. by खालीमुंडी पाताळधुंडी
+१
In reply to बराचसा इस्लाम आम्हाला पण कळला नाही. by भंकस बाबा
देशाला देवीसारखं मूर्त स्वरूप
In reply to +१ by खालीमुंडी पाताळधुंडी
पण तरीही देश हि संकल्पना
In reply to देशाला देवीसारखं मूर्त स्वरूप by कॅप्टन जॅक स्पॅरो
देश हा धर्मापेक्षा मोठा असायला हवा
In reply to पण तरीही देश हि संकल्पना by नाना स्कॉच
strong>जे भारताला माता म्हणू
In reply to पण तरीही देश हि संकल्पना by नाना स्कॉच
चतुराईने दोन असंबद्ध मुद्दे
In reply to strong>जे भारताला माता म्हणू by सुबोध खरे
strong>जे भारताला माता म्हणू
In reply to चतुराईने दोन असंबद्ध मुद्दे by तर्राट जोकर
तुम्ही पुण्याचे का हो साहेब??
In reply to मां नको तर मुस्लिमांनी अम्मी by कॅप्टन जॅक स्पॅरो
धाग्यावर वमनांची सुरुवात झाली
no subject
कमाल आहे
देशातल्या सगळ्या मुसलमानांचे
In reply to कमाल आहे by गामा पैलवान
हा लेख केवळ आपल्या देशाच्या
In reply to देशातल्या सगळ्या मुसलमानांचे by तर्राट जोकर
दोन समुदाय एकमेकांना भीडतात
In reply to हा लेख केवळ आपल्या देशाच्या by विवेकपटाईत
भारतमाता की जय : एक तौलनिक अभ्यास
In reply to देशातल्या सगळ्या मुसलमानांचे by तर्राट जोकर
बरोबर आहे. तुम्ही दारुल उलुम
In reply to भारतमाता की जय : एक तौलनिक अभ्यास by गामा पैलवान
..
In reply to बरोबर आहे. तुम्ही दारुल उलुम by तर्राट जोकर
पोटं भरल्यावर करण्याच्या
In reply to .. by mugdhagode
यू आर राईट
In reply to बरोबर आहे. तुम्ही दारुल उलुम by तर्राट जोकर