Skip to main content

कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

लेखक विवेक ठाकूर यांनी शनिवार, 05/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतिही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. यापूर्वी त्याचा जेएनयू कँपसमधे बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस नायप्रविष्ट असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 70150
प्रतिक्रिया 362

प्रतिक्रिया

In reply to by विवेक ठाकूर

अत्यंत नादानपणे त्याला कम्युनिस्ट ठरवणं आणि मग त्या फ्रेममधून निष्कारण सिपीआयची कुंडली मांडणं कन्हैय्या कुमार All India Student Federation (AISF) चा नेता आहे आणि त्याच संघटनेच्या पाठिंब्यावर जनेविच्या विद्यार्थी संघटनेचा प्रेसिडेंट म्हणून निवडून आला आहे... आणि AISF is the student wing of the Communist Party of India (CPI), हे राजकारणासंबंधी जबाबदारीने बोलणार्‍या/लिहिणार्‍या निम्नस्तराच्या विद्यार्थ्यालाही जालावरून सहज पाहता येईल. विठाजी, निदान आपण ज्याची बाजू घेत आहोत... (अ) त्याचे स्वतःचे काय म्हणणे/मत आहे; (आ) त्याचा वर्तमान/भूतकाल कसा आहे/होता; (इ) तो कोणत्या संघटनांशी संलग्न आहे/होता; या गोष्टींचा थोडातरी अभ्यास असावा, याबाबत आपले काय म्हणणे आहे ? जालाच्या कृपेने असा अभ्यास अत्यंत सोपा झाला आहे आणि थोडे तारतम्य वापरले तर नीरक्षीरविवेक करून, तोंडघशी पडण्याचे टाळण्याजोगे, सबळ मुद्दे शोधणे फार कठीण नाही. असे असूनही, कल्पनेने तयार केलेले मुद्दे किंवा माध्यमांमधले सोईचे पण सबळ नसलेले मुद्दे वापरण्याच्या फ्याशनला तुमच्यासारखा विचारवंत सतत बळी पडत आहे, हे पाहून दु:ख होते. याशिवाय, अभ्यास न करता दिलेल्या माहितीत फार मूलभूत चुका निघाल्या तर, इतरांसाठी तुम्ही सतत वापरत असता ती नादान, इ सारखी शेलकी विषेशणे स्वतःवरच उलटतात, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीच म्हणा.

In reply to by अनुप ढेरे

ये जो आजकल नौटंकि हो रहा है ई सब केरळ और प.बंगाल के लिये हि हो रहा है. पुरस्कार वापसि एक दौर चला था...बिहार इलेक्सन कि बाद ऊ एकदम से खतम हुआ. वैसन हि इ नौटंकि भि खतम हो जायेगा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अहो मागच्या बिहार मधील निवडणुकीत कनैह्या बिहार मध्ये ७ ते ९ दिवस त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गेले होता , तेही त्याच्या गावात मोदी संघ विरोध करणारा कोणीही दिसला कि त्याच्या नावाने गळे काढताना आंजा वर त्याच्या संबंधी माहिती मिळावा अशी नम्र विनंती

एका प्रश्नाचं उत्तर हवंय बघा देता आलं तर द्या,स्पष्टीकरण नकोय उत्तर हवंय कन्हैय्या ने आज जेव्हा परांजपे वक्ता म्हणून बोलायला लागले तेव्हा तो घोषणा बाजी करून वारंवार अडथळे का आणत होता,आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्यांची खिल्ली का उडवली,नाही म्हणायला कन्हैया म्हणतोय ना आजच्या तरुणाई ला बोलू दिल जात नाही म्हणून म्हटलं तो बाकीच्यांना का बोलू देत नाही।त्याची बाजू घेणाऱ्यांनी ह्याच उत्तर दिलच पाहिजे अस नाही ,मौनव्रत धारण करू शकता

कन्हय्या उवाच--- भारतीय जवान काश्मीरात बलात्कार करतात अशा काही घटना नक्कीच झाल्या आहेत आणि संबंधित सैनिकांना शिक्षाही झाली आहे.पण सरसकट 'भारतीय जवान' काश्मीरात बलात्कार करतात असे हा नवा युगपुरूष बोलला आहे असे मटामधले वृत्त सांगते. काश्मीरात पूर आला होता तेव्हा भारतीय जवानांनीच काश्मीरातल्या लोकांना कशी मदत केली होती हे या हरामखोराला दिसले नाही का? काय संक्षी हीच का तुमच्या कन्हय्याची वास्तविकता आणि प्रांजळपणा? असल्या लोकांच्या आणि त्यांच्या पित्त्यांच्या कारवाया आणि इथेच मिपावर त्यांचे समर्थन करणारे लोक बघितले की खरोखरच तळपायाची आग मस्तकात जाते.

In reply to by तर्राट जोकर

बातमीचा विपर्यास कसा करावा याचा उत्तम नमुना म्हणजे ही क्लिप ! तो म्हणतोयं "मानवी हक्कभंगावर मी बोलीन, एफएसपीए (Armed Forces Special Powers Act) विरुद्ध बोलीन, सैनिकांचा सन्मान करुन सुद्धा म्हणीन की काश्मिरी महिलांवर सुरक्षादलांकडून बलात्कार केले जातात" आता खरंच बलात्कार होत असतील, आणि हे वर सदस्यानं कबूल केलंच आहे : अशा काही घटना नक्कीच झाल्या आहेत आणि संबंधित सैनिकांना शिक्षाही झाली आहे. पण सरसकट 'भारतीय जवान' काश्मीरात बलात्कार करतात असे हा नवा युगपुरूष बोलला आहे असे मटामधले वृत्त सांगते नीट ऐकलं तर वरच्या भाषणाचा `सरसकट' असा अर्थ होत नाही. आणि समतेतून दृष्टीनं बघितलं तर बलात्कार सैनिकानं केला तर तो सन्मान होत नाही. एकूणात झी न्यूजवाल्यांनी त्याच्या आधीच्या वाक्यांचा संदर्भ न घेता, (ह्युमन राइट्स आणि सैनिकांप्रती आदर), ऑट ऑफ काँटेक्स्ट बातमी भडकवली आहे.

In reply to by विवेक ठाकूर

-१ काहीही सपोर्ट करायच. खूपच खाली आलात तुम्ही तर.

In reply to by शलभ

ट्रुमन आणि शलभ, जवानांकडून होणार्‍या बलात्कारांबद्दल कन्हयाने काय बोलले असते तर नक्की योग्य असते? त्याने सारे के सारे असे म्हटलेले नाही. आता तुम्हाला त्याच्यावर गोली चालवायचीच असेल तर त्याला कुठलंही निमित्त पुरतं. हा सरसकट शब्द नको तिथेही घुसडल्या जातोय. अर्गुमेंट जिंकण्यसाठी व प्रतिपक्षाला हलकं दाखवण्यासाठी त्याने जनरलायझेशन केलंय असं म्हटले की झाले. मी इथे कन्हयाची बाजू घेत नाही. जवानांकडून बलात्कार होतात हे जर सत्य आहे तर आहे. आता एन्टोनीसारखे असे म्हणावे काय की जे बलात्कार करतात त्यांच्या अंगावर भारतीय वर्दी असते? इथे कोन म्हणतंय, काय म्हणतंय हे महत्त्वाचे की जी समस्या आहे त्यावर विचार करणे?

In reply to by तर्राट जोकर

यांच्यापैकी कोणीही बलात्कार केला तर तो गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा - जी कायद्याने दिलेली आहे ती झालीच पाहिजे. पण भारतीय सैनिक काश्मीरमध्ये बलात्कार करतात असं जेव्हा तो म्हणतोय तेव्हा तो सरसकटीकरण जरी करत नसला तरी तो ज्या पद्धतीने हे म्हणतोय त्यावरून भारतीय सैनिक बलात्कार करतात आणि त्याबद्दल त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही, in other words, भारतीय सैन्य अशा गुन्ह्यांना पाठीशी घालतं असं सुचवू पाहतोय आणि त्याचा विरोध हा करायलाच पाहिजे कारण ते चुकीचं आहे. असा अर्थ तर नक्कीचनिघतोय. दुस-या शब्दांत सांगायचं तर तो बलात्कार करणाऱ्या सैनिकांबरोबर तिथल्या बाकीच्या सैन्यालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोय. त्याचा विरोध हा करायलाच हवा. आणि जर कुणाला वाटत नसेल की त्याचा असा काही हेतू नाहीये तर १. तो माणूस खूप भाबडा आहे किंवा २. कन्हैयाचा भक्त झालेला आहे असंच म्हणायला पाहिजे.

In reply to by बोका-ए-आझम

जवानांकडून होणार्‍या बलात्कारांबद्दल कन्हयाने काय बोलले असते तर नक्की योग्य असते? >> ह्याचे उत्तर अपेक्षित होते.

In reply to by तर्राट जोकर

तजो संघर्षकाळात स्त्रीयांचे हाल हा असमर्थनीय पण ऐतिहासिक काळापासून चालत आलेला प्रकार आहे त्यावर टिका व्हावयास हवी युनाटेड नेशन्सच्या माध्यमातून या विषयावर काम होते आहे मी सुद्धा मिपावर या विषयावर मागे लिहिले आहे. पण केवळ भारतीय सैनिकांना वेगळे लक्षकरुन नव्हे, पाकीस्तानी सैनिकांचा इतिहासही अदर्श नाही बांग्लादेशला साडे नऊशे पाकीस्तानी सैनिकांवर युद्धकालीन गुन्ह्यांवर केस चालवणे बाकी आहे पाकीसानने ते सैनिक बांग्लादेशला सोपवावेत, -पाकीस्तानी सैनिकांबद्दल अजूनही यादी देता येईल, सौदी अरेबीयाच्या दुतावास अधिकार्‍यांचे स्त्री शोषणाचे भारत आणि तांझानिया देशाकडून कारवाईस राजनैतिक अपवाद मिळवला पण सौदी अरेबीयाने स्वतःच्या देशाच्या कायद्यानुसार कोणता खटला सौदी अरेबीयात चालवला ? इराक मधल्या चालू गोंधळात याझिदी स्त्रीयांची खरेदी विक्री आणि बलात्कार आणि असे अनेक विषय हवे तर मी यादी देतो कन्हैया किंवा त्याचे जेएनयुकर मार्गदर्शक प्राध्यापक काही बोलले का ? एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थनही करावयाचे नाही पण जेव्हा जे एन युतील अपवादामुळे सरसकट जे एन यु ला दोषी ठरवू नये असे तुम्हाला वाटते तसेच काही अपवादांवरून सर्व भारतीय सैन्यास दोषी धरून भारतीय सैन्याचे हकनाक सरसकटपणे प्रतिमा हनन करणारी विधाने आदर्श ठरतात किंवा कसे ?

In reply to by माहितगार

तुमचा पहिला परिच्छेद 'त्यांना का नाही सांगत' छाप वाटतो. तरी माध्यमांत आलेल्या बातमीनुसार कन्हया महिलादिनाच्या निमीत्त काढलेल्या रॅलीला संबोधित करतांना एकूण जगात दंगलींच्या काळात स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांबद्दल बोलत असतांना हे उद्गार काढलेत. त्यात रवांडा, आफ्रिका, गुजरात इत्यादी भागात झालेल्या अत्याचारांचा उल्लेख केला आहे. इथे फक्त गुजरातचाच संदर्भ देण्याचे कारण पुरेसं स्पष्ट आहे. ही इज अनदर ओवेसी इन डिस्गाईज ऑफ कम्युनिस्ट लीडर. सर्व भारतीय सैन्यास दोषी धरून भारतीय सैन्याचे हकनाक सरसकटपणे प्रतिमा हनन करणारी विधाने आदर्श ठरतात किंवा कसे ? >> अर्थात आदर्श नाहीतच.

In reply to by तर्राट जोकर

'त्यांना का नाही सांगत'
ऑफ कोर्स ! त्याने पाकीस्तानी सैनिकांबद्दलही बोलणे अगदीच गरजेचे आहे कारण काश्मिरचा प्रश्न रंगवण्यात पाकीस्तानचा हात आहे आणि पाकीस्तानचा हात स्वच्छ नाही -भारतीय सैनिकांच्या चुकांबद्दल कारवाई होते- तरीही केवळ भारतीय सैनिकांकडे कसे बोट दाखवता हे खडसावून त्याने विचारावयास नको होते ? स्वतःला प्रसिद्धी मिळाली की देश विरोधी तत्वांना आगीत तेल टाकण्यासाठी वापरू द्यायची ?

In reply to by माहितगार

The Armed Forces Special Powers Act अंतर्गत सेनेला मिळालेले अधिकार आणि त्याचा गैरवापर ह्याबद्दल गेल्या दोन दशकांपासून बरिच चर्चा सुरु आहे. त्यात कन्हयाने जे वाक्य आता बोलले आहे ते गेल्या दोन दशकापासून जिथे जिथे हा अ‍ॅक्ट लागू आहे तिथे तिथे बोलले गेले आहे. इरोम शर्मिला ह्याच कायदाविरूद्ध गेल्या पंधरा वर्षांपासून उपोषण करत आहे. २००४ मध्ये मणिपूरमधे स्त्रियांनी 'इंडियन आर्मी, रेप अस' असे फलक घेउन नग्न मोर्चा काढला होता. हे सर्व असत्य आहे काय? नाही. The Armed Forces Special Powers Act अंतर्गत सैनिकांना विशेष सुरक्षा प्रदान केली आहे, त्यांच्याविरूद्ध तक्रार होऊ शकत नाही (हे खरे आहे काय?) AFSPA चा गैरफायदा घेऊन काही सैनिक गैरव्यवहार करत असतील, त्यांच्या विरोधात सिलेक्टीवली मोर्चा न काढता सर्व इंडियन आर्मीच्या नावाने नग्न मोर्चा काढणार्‍या स्त्रियांना आपण काय म्हणाल?

In reply to by तर्राट जोकर

तक्रार होऊ शकत नाही (हे खरे आहे काय?)
पूर्णतः खरे नाही, खोट्या आरोपांपासून सुरक्षीत करणे एवढाच उद्देश -भारतात पोलीसदले राज्यसरकरच्या अखत्यारीत येतात उर्वरीत भारतात सैनिकांच्या सिव्हील ऑफेन्स करता पोलीस सैनिकास अटक करु शकतात पण जिथे अतिरेक्यांचा प्रभाव आहे तिथे पोलीसांचे नातेवाईकच किडनॅप करून किंवा अतिरेकी असलेल्या नातेवाईकास सोडवण्यासाठी सैनिकांवर खोटे आरोप लावण्याचे उद्योगही होऊ शकतात-, AFSPA सहसा वरीष्ठांची परवानगी लागत असावी आणि स्थानिक पोलीसांना केस करता येत नसली तरी कोर्टमार्शल पासून संरक्षण मिळणे कठीण असते- लगेच कारवाई नाही झाली तरी ती पुढे चालूनही होऊ शकते- ; वस्तुतः शक्यतो भारतीय सैन्य मुख्यत्वे अतिरेक्यांशी मुकाबला करण्यापुरते वापरले जाते अतिरेकी पकडल्या नंतर शक्यतोवर स्थानिक पोलीसांच्या स्वाधीन केले जातात. सैनिकांच्या चुकांचे सरसकट समर्थन केले जात नाही, सध्या भाजपातच कुणी माजी लष्कर प्रमुख मंत्रि आहेत ते स्वतःही समर्थन करत नाहीत कडक कारवाईची भूमिका घेतात, सध्याच्या भाजपा सरकारने काश्मिरात एक चुकीच्या गोळीबारीची चुक झाली तर लगोलग जाहीर माफी मागून कारवाई केल्याचे उदाहरण आहे. विदाऊट वॉरंट धाडी टाकण्याचे अधिकार सैनिकांना अतिरेक्यांच्या मुकाबला करण्याच्या दृष्टीने असतात, अशांत क्षेत्रात बाहेरच्या राज्यातील पोलीसदलातील महिला मोठ्या प्रमाणावर सैन्यात तात्पुरत्या भरतीवर वापराव्यात म्हणजे गैरवर्तन आणि गैरप्रसिद्धीचा वाव कमी होऊ शकेल. पण अतिरेक्यांशी लढण्याकरता पोलीसदले कमी पडत असतील तेव्हा तेव्हा सैन्याचा रोल येणे सहाजिक असावे.
नग्न मोर्चा काढणार्‍या स्त्रियांना आपण काय म्हणाल?
१) नग्न मोर्चा काढल्याने नग्न मोर्चा काढणार्‍याचे म्हणणे सिद्ध होते हा तर्क दोष आहे. २) नग्न मोर्चाकाढून काही सिद्ध होत असेल तर तेथिल अतिरेक्यां विरुद्धही काढावा एकीकडे अतिरेक्यांना संरक्षण द्यायचे आणि दुसरीकडे अपवाद पकडून सर्व सैन्याला बदनाम करावयाचे हे स्विकार्ह नाही हेच म्हणेन ३) उपोषणे आधी स्वतःच्या लोकांनी हिंसा करू नये म्हणून करावीत

In reply to by माहितगार

पूर्णतः खरे नाही, खोट्या आरोपांपासून सुरक्षीत करणे एवढाच उद्देश --- अतिरेकी पकडल्या नंतर शक्यतोवर स्थानिक पोलीसांच्या स्वाधीन केले जातात. >> आपली माहिती योग्य आहे पण अर्धवट आहे. अ‍ॅक्टमधली सर्व कलमे बघितली तर सैन्याला विशेष अधिकार आहेत हे स्पष्ट आहे. त्याविरूद्ध आंदोलने सुरु आहेत ती गैरवापराच्याबद्दलच आहेत. सैनिकांच्या चुकांचे सरसकट समर्थन केले जात नाही,-- उदाहरण आहे. >> इथे भाजपा सरकारचा विशेष उल्लेख करायची गरज नव्हती. सैन्याला विशेषाधिकार देण्याचा कायदा काँग्रेसकाळात झालाय. जिथे हे कायदे लागू आहेत ती सगळी ठिकाणे बरीच जुन्या वादाची आहेत. इथे कोणते सरकार आत्ता सत्तेत आहे त्याने काही फरक पडत नाही. किंवा आता मोदीसरकार आहे म्हणून ही आंदोलने गेल्या २० महिन्यांतच सुरु झाली आहेत असेही नाही. विदाऊट वॉरंट धाडी टाकण्याचे अधिकार----सहाजिक असावे. >> सुचवलेला उपाय रोगापेक्षा इलाज भयंकर अशा स्वरुपाचा आहे. १) २) ३) >> वरिल तीन्ही मुद्दे मला पटलेले नाहीत. तुम्ही नागा स्त्रियांना कांगावाखोर म्हणत आहात व भारतीय मानत नाही असे दिसते आहे. राजकिय मुद्द्यांमुळे सैनिक आणि सामान्य नागरिक दोहोंनाही हकनाक बळी पडावं लागतं. सैन्य सीमेवर (प्रत्यक्ष युद्ध नसतांना) रक्त सांडत असेल तर तो मला राजकिय नेतृत्वाचा (ते कोणत्याही पक्षाचे असो) पराभव वाटतो. सरकार आणि अतिरेकी यांच्यामधे सैनिक आणि नागरिक भरडले जातात. मला सैनिकाची जेवढी काळजी आहे तेवढीच सामान्य नागरिकाचीही आहे. कारण ह्या दोन्हींमुळे आपला देश बनतो. आपण आपल्या देशावर जेव्हा प्रेम करतो म्हणतो तेव्हा ते अशा देशवासीयांवर करतो असे अभिप्रेत असते. फक्त सैनिकांवर, जमिनीवर प्रेम म्हणजे देशप्रेम नाही. स्पेशल अ‍ॅक्ट अंतर्गत होणारे कथित अत्याचार यांची चर्चा खूप जुनी आहे. त्यात नवीन काहीच नाही. भारतीय सैन्याच्या नावाने खडे फोडणेही. हे सगळे प्रकरण खूप गुंतागुंतीचे व सामान्य नागरिकाच्या आकलनापलिकडे आहे. कन्हया जे बोलला ते काही नवीन, वेगळे नाही. पण मीडियाला हॉट टी आर पीसाठी बातमी अशीच बनवावी लागते की सामान्य नागरिक चटकन प्रक्षोभित होईल. "कन्हयाने कहा भारतीय सेना बलात्कारी" "कन्हयाका भारतीय सेनापर एक और सनसनीखेज आरोप" अशा ब्रेकिंग न्युज फिरवल्या जातील. अर्थात मोदीविरुद्ध उभ्या राहिलेल्या कन्हयाला हिरो मानायला लागलेल्या जनतेला तो कसा नालायक आहे हे पटवण्यासाठी असे डावपेच आवश्यक आहेत. पण मिसळपाववर अभ्यासू प्रतिसाद देणार्‍यांनी तरी माध्यमांचा बनाव समजून घ्यावा व कन्हयाला फुटेज देणे बंद करावे. कारण आता पुढे कन्हया पश्चिमेकडे पाय करुन झोपला तरी 'कन्हयाका रुझान पाकिस्तानकी ओर' अशीही ब्रेकिंग न्युज येईल. रच्याकने, कन्हया जेही बोलत आहे ते तद्दन परंपरागत भारतीय कम्युनिझम आहे. वर्षानुवर्षे ते एकाच प्रकारचे दळण दळतायत. नाविन्य एवढंच की ते आता आंबेडकरवादी चळवळीला फूस लावण्याचा प्रयत्न करत आहेत. कन्हया जे म्हणतोय ते कित्येक वर्ष म्हटलं जातंय तेव्हा आता फक्त कन्हया म्हणतोय म्हणून ते महत्त्वाचं झालंय की कसे हा प्रश्न व्यक्तिलक्ष तर्कदोषाचा आहे काय?

In reply to by माहितगार

दुसरे असे इथे स्पष्ट करावे वाटते की पुर्वोत्तर राज्यांमधे अशांतता नांदावी म्हणून चीन व काश्मिरात पाक बरेच प्रयत्न करत आहे हे सर्वज्ञात आहे. जसे जनमत प्रभावित करणे, अरिरेक्यांना मदत, इत्यादी. त्यामुळे सैन्याला विशेष अधिकार आवश्यक आहेत, ते काढुन घेऊ नये ह्याबद्दल माझे दुमत नाही. गैरवापराबद्दलच्या तक्रारींवर ताबडतोब चौकशी व कारवाई करणे हेही होत असेल असा विश्वास आहे. कश्मिरी जनता, पुर्वोत्तर जनता कशी विचार करते, जगते ह्याची अनुभूती आपण शांत शहरांमधे असलेल्या आपल्या वातानुकूलित खोल्यांमधे घेऊ शकत नाही, त्यामुळेच त्यांचे विखारी, विघटनवादी विचार आपल्याला खटकतात. वरच्या प्रतिसादात हे उल्लेख आवश्यक होते.

In reply to by तर्राट जोकर

अलिकडच्या पठाणकोण प्रसंगात टिका होऊनही अजित डोवालांनी सैन्यदल लगोलग उपलब्ध असूनही वापरण्याचे टाळले, अर्थात सैनिकी स्थळावर हल्ला झाला म्हणून डोवालांना तसे करता आले. अतिरेक्यां विरुद्ध लढण्यासाथी तयार केलेल्या सैनिक नसलेल्या दलांना पोलीस हा राज्यसरकारच्या अखत्यारीतला विभाग असल्यामुळे कठीण होते, काही अटींवर केंद्रसरकार कडे स्वतंत्र पोलीस दल आणि अतिरेकी विरोधी दल असण्याच्या अधिकारांसाठी घटनात्मक दुरुस्त्यांची गरज आहे, त्यासाठी असलेले राजकीय सहमती अजूनही होत नाही त्यामुळे केंद्र सरकारांची सैन्य दले सिव्हीलीअन एरीआत न वापरण्याची इच्छा असूनही त्यास मर्यादा येतात हे टिकाकार मंडळी लक्षात घेत नाहीत.

In reply to by तर्राट जोकर

एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थनही करावयाचे नाही हे सुद्धा मी माझ्या प्रतिसादातून लिहिले आहे त्याचा विसर पडावयास नको.

In reply to by तर्राट जोकर

प्रत्येक जण गुन्हेगार आहे आणि त्यातले काही जण सैनिक आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं म्हणाला असता तर १००% मान्य. बलात्कार करणारा माणूस काय व्यवसाय करतो याने फरक पडतो का? त्याने गुन्हा केलाय, तो गुन्हेगार आहे. त्या गुन्हेगाराचा व्यवसाय काय आहे हा मुद्दा त्याने जाणीवपूर्वक काढलेला आहे, कारण तिथे त्या व्यवसायाचा आणि त्या संस्थेचा (पक्षी: भारतीय सैनिक आणि भारतीय सैन्य)अपमान करायचा आणि त्यांना बदनाम करायचा हेतू आहे. नंदीग्राम आणि सिंगुर इथल्या संघर्षात अनेक कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनीही बलात्कार केले पण कम्युनिस्ट पक्षांना नावं ठेवली का कुणी? आणि ती ठेवणं चुकीचंच आहे. गुन्हा करणारा हाच त्याच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे, तो ज्या संघटनेचा सदस्य आहे त्यावर ताशेरे मारणं हा गंभीर प्रकार आहे. तरुण तेजपाल हेही त्या आरोपावरुन तुरुंगात आहेत. उद्या जर तो सिद्ध झाला तर भारतीय पत्रकार बलात्कार करतात असं म्हणू का आपण?

In reply to by बोका-ए-आझम

तुमच्या प्रत्येक शब्दाशी बिनशर्त सहमत. प्रश्नाचे उत्तर मिळाले, धन्यवाद. फक्त एक. प्रत्येक जण गुन्हेगार आहे आणि त्यातले काही जण सैनिक आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं म्हणाला असता तरी माध्यमांनी (इथे झी न्युज) वरचीच हेडलाईन वापरली असती की नाही?

In reply to by तर्राट जोकर

तो स्त्री पोलीसांची संख्या वाढवा स्त्री सैनिकांची संख्या वाढवण्याच्या गरजे बद्दलही बोलू शकला असता नाही का ?

In reply to by तर्राट जोकर

Distortion आणि manipulation हा वेगळ्या लेखमालेचा विषय आहे. विल्यम रँडाॅल्फ हर्स्ट हे अमेरिकन माध्यम क्षेत्राचे बादशहा. ते त्यांच्या वार्ताहराला म्हणाले होते - You give me photographs, I will give you war. आजकालची माध्यमं फार वेगळं वागत नाहीत. अर्थातच सन्माननीय अपवाद तिथेही आहेत पण आपल्या टीआरपीसाठी माहितीचं distortion, manipulation आणि gate keeping होतं हीदेखील वस्तुस्थिती आहे.

In reply to by तर्राट जोकर

माझा प्रश्नच वेगळा आहे. सध्याचं JNU मधील प्रकरण, त्यात काश्मीर च्या स्वतंत्रतेचा / अवैध कब्जाचा काही लोकांनी उचललेला मुद्दा या पार्श्वभूमीवर अशी वक्तव्ये करणे आगीत तेल ओतण्याचा प्रकार नाही का ? पार्श्वभूमी लक्षात न घेता या हे भाषण कसे बरोबर आहे हे म्हणणेच चूक आहे (भक्तिमार्गाला लागू नये हि विनंती) या माणसाचा खरोखर विभाजनवाद्यांना पाठींबा असेल व मत असेल कि भारत काश्मीरचा अवैध ताबा घेऊन आहे, तर या वक्तव्याचा त्याच्या अन्य समर्थकांमध्ये हि कल्पना दृढ बनण्यासाठी उपयोग होतो. वर "मी बोललो ते खोटे आहे का ?" असे बोलून हात झटकायला हा मोकळा. दुसऱ्या बाजूने या माणसाला एवढी हुशारी नाही त्याच्या मनात जे आलं ते हा बोलतोय (कदाचित जामीन देतानाच्या निर्णयातील सैन्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य याचे विधान आणि याच्या मनातील आधीपासूनची सैन्याबाबतची चीड). कोणत्याही बाबतीत हा माणूस फक्त त्याच्या नवसमर्थकांना तोंडघाशी पडतोय. (केजरीवालांच्या बाबतीत तोंडघाशी पडलेला एक)

In reply to by बोका-ए-आझम

कनैह्या चा दांभिंग पणा बघा त्याने काश्मीर चे उदाहरण दिले आफ्रिकन स्टडीज करतो म्हणून आफ्रिकेचे उदाहरण दिले मान्य मग काश्मीर पलीकडे बलुचिस्तान मध्ये मानवी हक्काचे हनन पाकिस्तानी सैन्य करते तेथे नागरिकांचे अपहरण खून बलात्कार करते त्याबदाल अवाक्षर नाही काश्मीर पलीकडचा पाकिस्तान तेथील महिलांचे मानवी हक्क ह्याबाबत कनैह्या बोलला नाही नसेल बोलायचे त्याला पाकिस्तान विरोधात त्यांची मर्जी

In reply to by तर्राट जोकर

बलात्कार व खून तर कम्युनिस्टही करतात. प. बंगालमधे डाव्या सरकार्च्या काळात हे प्रकार सर्रास होत असत. त्यावर हे २९ वर्षांचे बालक काही बोलत नाही. काश्मिरी अतिरेकी व मुसलमानांनी पंडीतांवर केलेले अत्याचार अर्थातच त्याला माहीत नसणार. केरळमधे संघ स्वयंसेवकांच्या हत्या तर माओच्या तत्वात बसतातच. हा सगळा प्रकार पाहुन काय अप्पावरची एक पोस्ट आठवली, "४५ सालका युथ लिडर, २९ सालका छात्र और हमही *** है की २१ साल कि उमर में नौकरी लेके टक्स भर रहे है।"

In reply to by एक सामान्य मानव

कम्युनिस्ट म्हटले की हिंसाचार आलाच. केरळ आणि बंगाल ही राजकीय हिंसाचारात आघाडीवर असलेली राज्ये का आहेत याचे कारण तर उघडच आहे.या एका तथाकथित विचारसरणीच्या नावावर हिटलरला लाजवतील अशी हत्याकांडे झालेली आहेत. या सगळ्या गोष्टींविषयी हे नवे युगपुरूष काहीच बोलणे अपेक्षित नाही.

In reply to by विवेक ठाकूर

१) भारतीय सेना दलांच्या जवानांकडून काही चूक झाली तर कोर्ट मार्शल होते, सामान्य कोर्टापेक्षाही अधिक वेगाने शिक्षा होते. कन्हैया कोर्ट मार्शल होऊन झालेल्या शिक्षांबद्दल आणि दिलेल्या न्याया बद्दल काही बोलला आहे का ? २) कन्हैय्या म्हणतोय काही सैनिक बलात्कार करतात म्हणजे काय त्यांना सैनिक आहेत म्हणून बलात्कार करण्याची सवय असते का ? हे अपवादावरुन नियम सिद्ध करणे नाही का ? आपण कन्हैय्याच्या वक्तव्याला बलात्कारांचा अभ्यास असलेल्या अभ्यासकाची जागा देत आहोत का ? प्रश्नांचा काहीच अभ्यास नसताना एकांगी अप्रत्यक्ष सरसकटीकरण, काश्मिरी आणि मुस्लिमांच्या भावनांना भडकवणे आगीत तेल ओतणे नाही का ? ३) काही काश्मिरी मुस्लीम पुरुषही बलात्कार करत असणार, समजा एखाद्या काश्मिरी मुस्लिम तरुणाने काश्मिरात बलात्कार केला असेल तर तुम्ही उर्वरीत सर्व काश्मिरी पुरुषांना काश्मिर सोडण्यास सांगणार आहात का ? ४) कन्हैय्या उमर आणि त्यांना ह्वा देणारे प्राध्यापक सोबतचा जीनयुचा तथाकथीत एनलायटंड विद्यार्थी वर्गाने अतिरेक्यां विरुद्ध काश्मिर मध्ये जाऊन सोडून द्या दिल्लीत बसून तरी निषेध नोंदवले आहेत का ? यांना फक्त अतिरेक्यांचे मानवाधिकार दिसतात अतिरेक्यांनी मारलेल्या माणसांचे मानवाधिकार दिसत नाहीत का ? तुम्ही अतिरेक्यांना संरक्षण देणे सोडून द्या तेथे सैनिक नेमण्याची गरजच राहणार नाही हे ह्यांनी काश्मिरींना कधी सांगितले आहे का ? ५) भारतीय सैनिक धार्मीक स्थानात जावेच लागले तर पायातली पादत्राणे काढून जातात, सिव्हीलीअन्सनी रागाच्या भरात कधी दगडफेक अथवा इजा केल्या तरीही बहुतांश वेळा त्यांचा व्यक्तिगत दोष नसतानाही प्रत्युत्तर न देता दिलदारपणे सहन करतात हे तुमच्या कन्हैयाबाळाच्या भाषणात नेमके कुठे येते हे सांगण्याचे कष्ट कन्हैय्या आणि जेएनयु प्रेमी घेतील का?

In reply to by माहितगार

कन्हैय्या प्रेमींसाठी काही शंका काही प्रश्न, तुमच्या कन्हैयाबाळाच्या, कन्हैय्या आणि जेएनयु प्रेमी >> वरील शब्द वापरुन आपण चर्चा सुरु करण्याऐवजी बंद केली आहे हे नमूद करु इच्छितो. ज्याला उत्तर द्यायचे असेल तो देणार नाही. दिले तर कन्हयाप्रेमी, भक्त म्हणजेच त्याच्या विचारांना सरसकट पाठिंबा देणारा म्हटला जाईल. गुड मूव!

In reply to by तर्राट जोकर

हाच गूड मुव्ह कन्हैय्या बाळाने पण केलाय हे लक्षात घेता येईल का ? भारतीय सैनिकांच्या चुकांची चर्चा करून तिथे स्त्री सैनिक स्त्री पोलीस कसे वाढवाता येतील या विषयाकडे चर्चा नेता येते पण जर उद्देश देश विरोधी अल्टीरीअर मोटीव्ह आणि निवेदीता मेनननांसारख्यांकडून सिद्ध होताना आश्चर्य वाटावयास नको निवेदिता मेननानां मी चांगले वाचले आहे. कुणाला आवडो अथवा न आवडो, जे एन यु कर आणि त्यांची बाजू घेणारे यांच्याकडून भारतीय सैनिकांबद्दल अवाक्षरही ऐकण्याची इच्छा शिल्लक राहीलेली नाही. देशप्रेम काय सारखे फालतू प्रश्न न विचारता देशासाठी सिमेवर जिव द्या आणि मग भारतीय सैनिकांबद्दल प्रश्न विचारा हा जे एन यु प्रेमींसाठी एकमेव उत्तर आहे. देशप्रेम हि आमच्यासाठी निगोशीएट करण्याची गोष्ट नाही प्रसंगी देशासाठी जिव हसत हसत देण्याची गोष्ट आहे हे निश्चित !

In reply to by विवेक ठाकूर

तो म्हणतोयं "मानवी हक्कभंगावर मी बोलीन, एफएसपीए (Armed Forces Special Powers Act) विरुद्ध बोलीन, सैनिकांचा सन्मान करुन सुद्धा म्हणीन की काश्मिरी महिलांवर सुरक्षादलांकडून बलात्कार केले जातात" एका अथवा काही सैनिकांनी जर बलात्कारच कशाला सैनिकी अथवा नागरी कायद्याच्या विरोधात कुणाविरुद्धही काही केले असले तर त्यावर जरूर आवाज उठवा. आणि अशांना शिक्षापण झाल्या पाहीजेत आणि झालेल्या आहेत देखील. गंमत म्हणजे या संदर्भातील भारतीय मिलिटरी कोर्टाने दिलेल्या शिक्षांबद्दल भारतीय माध्यमांनी नाही पण पाकीस्तानी डॉन आणि ट्रिब्यून ने लिहीले आहे... पण त्या एका अथवा काही सैनिकांनी केलेल्या गुन्ह्यामुळे सुरक्षादलच करत आहे असे तुमचे अथवा तुमच्या लाडल्या कन्हैय्याचे आणि त्याच्या राजकीय बापजाद्यांचे म्हणणे असेल तर त्यात सरसकटीकरण होत आहे. मग सुरक्षादलापर्यंतच कशाला थांबा, भारतीय पुरूष असले प्रकार करत आहेत म्हणा की - त्यात सगळेच येतील. चालेल का हे तुम्हाला? मानवी हक्कभंग संरक्षण - हे असलेच पाहीजे. पण त्याची जी काही व्याख्या एनजीओज् करतात, त्यानुसार जेंव्हा सरकारने केलेले अन्याय (state abuses) असतात तेंव्हा त्याला मानवी हक्कभंग म्हणतात. पण व्यक्तीने केले असले अथवा दहशतवाद्याने/दहशतवादी संघटनेने केले असले तर मात्र त्याला मानवी हक्कभंग म्हणले जात नाही... मग त्यात काश्मिरी पंडीतांना दहशतवादाने बेघर केले गेले ते मानवी हक्कभंग धरले जात नाही. थोडक्यात जेंव्हा कन्हैय्या असेल नाही तर अजून कोणी असेल जेंव्हा ठामपणे म्हणतो की मानवी हक्कभंग झाला आहे, तेंव्हा तो भारत सरकार आपल्या नागरीकांवर अत्याचार करत आहे असे म्हणत असतो. आणि हे काही आत्ताचेच भारत सरकार नाही तर वर्षानुवर्षांचे.

In reply to by विकास

कन्हैय्याने हि नवीन टुम का बरं काढली असावी ? अहो सिंपल.. माल्यांना परदेशात पळुन जायला धुकं निर्माण व्हावं म्हणुन. (आणि त्या मागे केंद्र सरकाराचा हात आहे असं मला वाटतं)

मिपा वरच्या कन्हैय्या च्या समर्थकांच काय म्हणणं आहे ह्या विषयावर ,प्रतिआरोप न करता व अजून काही पुरावे न मागता किंवा अजून ह्याची सत्यता पडताळली गेली नाहीये अस काही न म्हणता हा बोललेला असू शकतो अस समजून त्याच्या कैवाऱ्यांनी ह्याबाबत त्यांचे म्हणणे मांडावे ।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

हा बोललेला असू शकतो अस समजून >> व्हाट डु यू मीन? एवढं का अधीर होताय गाववाले?

हा किती ओरडेल मे जून पर्यंत ,त्याला दिलेली चावी इलेकशन संपताच संपेल आणि ह्याचाही हार्दिक होईल ,संबंध आयुष्याचं नुकसान करू ऱ्हायला ना भो ।येचुरी चे पण दिवस संपल्यात जमा आहेत अस दिसतंय

जेएनयु प्राध्यापक निवेदीता मेनन यांच्या दृष्टीने काश्मीर हा भारताचा भाग नाही. एकवेळ भारत-पाक मधील disputed territory आहे असे म्हणले असते तरी समजू शकलो असतो. पण तसे नाही... त्यांची अशीच मते पुर्वांचल प्रदेशातील राज्यांसंदर्भात आहेत. जगात सीमावाद अनेक ठिकाणी आहे. पण असे कदाचीत एकच राष्ट्र असेल जेथे त्या देशाचे तथाकथीत "विद्वान" नागरीक हे देशाच्याच विरुद्ध बोलतात आणि वर सहीष्णुता संपली म्हणून गळा काढतात!

In reply to by विकास

मधल्या या अशा वादग्रस्त आणि टीअारपी वाढवण्यासाठी विधानं करणाऱ्याला agent provocateur हा शब्द अगदी चपखल लागू पडतो. आधी अशी विधानं करायची, मग लोकांना उकसवायचं, मग बघा कशी असहिष्णुता आणि फॅसिझम वाढलाय अशी आरोळी ठोकायची ही अगदी ठरलेली modus operandi आहे. आणि आमच्या काही मित्रांना अाणि अमित्रांना त्यात काहीही वावगं वाटत नाही. उलट तो प्रांजळपणा वगैरे वाटतो!

अजून काय बोलणार.कोणीही सोम्या गोम्या उठतो आणि.. अगदी भारतातून अमेरिकेत रोजी रोटी कमवायला गेलेले बुद्धीवादी लोक पण तेथे बसून भारतातल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गळे काढतात तेंव्हा मोठी गम्मत वाटते.

In reply to by आरोह

India under Modi

Conference/Symposium | March 11 | 8:30 a.m.-5 p.m. | To mark the impending two year anniversary of the Modi government and to assess its impact and the challenges ahead, the University of California at Berkeley, through its Institutes for South Asia Studies and International Studies, is organizing an international symposium titled, India under Modi: A look back on 2-years of BJP rule, to be held on March 11-12, 2016 in Berkeley,CA. The symposium will bring together influential political, business, policy, scientific, and academic leaders to debate six key areas of governance under the Modi government: business and industry, culture and education, digital government and service provision, health and poverty, law and minority rights, and media and its future.

मी ह्या आधीच्या प्रतिसादात जे म्हणालो होतो की कनैह्या उमरच्या लोकांचा धांगडधिगा चालू असतांना त्यांचे कवचकुंडल बनून अभाविप च्या लोकांना नडत होता. पुढे दुसर्या दिवशी प्रकरण वाढलेले पाहून कनैह्या ने पलटी खाऊन बाहेर आलेल्या लोकांना ओळखू शकलो नाही कारण अभाविप चे विद्यार्थी गुंडा गर्दी व महिलांना धक्का बुक्की करत होते असे त्याचे म्हणणे होते सदर विडीयो पूर्णपणे निर्दोष आहे. ह्यात शांतपणे भारत विरोधी घोषणा देणाऱ्या लोकांचे चित्रीकरण करणाऱ्या माणसाला कनैह्या जाब विचारत आहे मात्र मागे चाललेल्या तमाष्याला तो अजिबात थांबवात नाही आहे.

हे अगदि बरोबर अहे ते सुद्धा ह्याचा लक्षात येत नाही तर ह्याची लोणकढी थाप मला ह्या कार्यक्रमाबद्दल माहिती नव्हती अरे बाबा ह्या कार्यक्रमाचे पोस्टर त्याचे मुख्य मुद्दे तुझ्या विद्यापिठ्याच्या सर्व परिसरात होते त्याहून महात्व्याचे तूच एका मुलाखतीत हा कार्यक्रम नियोजित वेळेच्या एक तास आधी रद्द झाला तेव्हा तो का झाला ह्या बद्दल तू विध्यार्थ्यांचा अध्यक्ष म्हणून प्रशासनाला विचारणा केली असे बोलला होता तेव्हा ज्या कार्यक्रमाविषयी तुला कल्पना नाही त्यासाठी तू प्रशासनासाठी भांडला

In reply to by अनिरुध

तुरुंगातून बाहेर आलेल्यावर देशाचे नवे हिरो ,ह्यांनी रविश ह्यांना मुलाखत देतांना जो गाढवपणा केला म्हणजे कार्यक्रमाबद्दल माहिती नव्हते किंवा तेथील घटना थांबवणे माझ्या दायरे मे नही था , अशी मुक्ताफळे उधळली , म्हणजे अभाविप चे लोक हा कार्यक्रम थांबवत आहेत तर ते गुंड आणि हा कोण पण जश्या मी ह्यालाच्या आधीच्या मुलाखतीची क्लिप येथे दाखवली तसे ह्याचे जे बोलवते जे धनी आहेत त्यांनी सुद्धा त्याला ऐकवली असावी ह्यानंतर राजदीप ने त्याची मुलाखत घेतली त्यात त्याला खोदून खोदून त्या घटनेविषयी विचारले पण साहेबांनी त्यावर भाष्य करण्याचे टाळले , परत काही बोललो तर आपलाच गाढवपणा आपल्याला नडेल. किंबहुना त्यांनतर च्या प्रत्येक मुखातीत त्याने हे प्रकरण नायालयीन प्रविष्ट असल्याने मी ह्यावर काही बोलत नाहि ही भूमिका घेतली , बिचारा रविश पुढे बोलून फसला. आणि त्याचे हे खोटारडेपणा त्यांच्या नव समर्थकांना दिसत नाहि.

In reply to by निनाद मुक्काम …

त्याचे हे खोटारडेपणा त्यांच्या नव समर्थकांना दिसत नाहि >> तुम्हाला दिसतोय ना? वाजवा की ढोल. पेढे वाटा. =))

ही कन्हैय्या कुमार, निवेदिता मेनन यांचं वक्तव्य, जनेवि वगैरे प्रकरणं म्हणजे मोदींच्या मतांची सोय वाटते. म्हणून की काय कन्हैय्या कुमार बाहेर आहे आणि हार्दिक पटेल आत आहे. दोघांवरही आरोप तर देशद्रोहाचाच आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जर तुमचे तर्कट जरासे जरी तथ्त्य असेल तर डावे व त्यांचे वाक्लिनी करणे काही प्रसार माध्यमे हे मोदींच्या सापळ्यात अडकत आहेत आणि हीच जर त्यांची राजनैतिक समज आहे तर जगभरातून त्यांचा सफाया का झाला ह्याचा उलघडा होतो भांडवलशाही ने साम्यवादाची केली पारध असे शीर्षक देण्यात आले. अवांतर कलाकारांनी जे एन यु मधील आंदोलनाला पाठिंबा दिला ही लोणकढी थाप त्याने राजदीप च्या मुलाखतीत दिली कोणते कलाकार आहेत बर जे एन यु साठी समर्थन देणारे स्वर भास्कर ने सुरवातीला तो तुरुंगात होता तेव्हा कनैह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्यांची वकिली केली मात्र कोर्टाने त्यांच्या वर जे ताशेरे ओढले त्यात त्यानंतर ती सुद्धा गायब झाली आता भांडवलशाही युक्त बॉलीवूड मध्ये रमली आहे किंबहुना राम रतन धन पयो सारख्या शिनेमात जेथे राम त्याची लीला सारखी गाणी व त्याद्वारे हिंदुत्वाचा प्रचार करण्यात तिने अभिनय करून सक्रिय सहभाग घेतला ह्या बद्दल तिचा लाल माकडे निषेधाचा ठराव त्यांचा जे एन यु मध्ये पास करून घेतल्याची फेकिंग न्यूज आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद जर खरेच असे काहि असेल तर मात्र तो जबरा धुर्त पणा मानायला हवा, हि स्ट्रॅटेजि ज्याने ठरवलि असेल त्याला बहुधा ह्याचि आयडीया फिल्म इन्स्टिट्युट मधे जे काहि रंगारंग कार्यक्रम झाले त्यावरुन आलि असणार. उनके हथियार (रंगारंग कार्यक्रम + मिडिया) उनके हि खिलाफ इस्तेमाल किये. रच्याकने एक न्युज बघितलि कोणि प्रशांत किशोर आहे म्हणे जो चिफ स्ट्रेटेजिस्ट होता २०१४ ला बिजेपि चा, नंतर त्याने आपलि सेवा नितिश कुमार आणि आता काँग्रेस ला देतोय. हेच विरोधक तेव्हा मोदिं ना ईव्हेंट मॅनेजर वगैरे म्हणायचे आता ते सुद्धा मोदिं ना फॉलो करतायत त्याचे काय ? ह्यावरुन एक लक्षात येतय कि विरोधकांचे धाबे जबरा दणाणलेयत.

संपादक मंडळ यांस, खालील प्रतिसाद अयोग्य असेल तर काढून टाकावा. ___________________________________________________________________________________

Kanhaiyya's moment of right and freedom to pee in open

Amid a raging row at JNU, it has now emerged that its students’ union president Kanhaiya Kumar, who is facing sedition charge, was fined by the varsity administration last year for allegedly “misbehaving” with a girl student and “threatening” her. The incident had occurred on June 10, 2015, when the girl student asked Kanhaiya, who at the time was not the students’ union president, to not urinate in the open inside the campus. The girl, who now teaches at Delhi University, alleged that Kanhaiya “misbehaved” with her when she objected and also called her a “psychopath” while threatening her with dire consequences. (केजरीवालांनी देखील मोदींना psychopath असे म्हटले होते हे या निमित्ताने आठवले. बाल केजरीवालांनी हा शब्द आधीच वापरला. सिनिअर केजरीवालांनी त्याच्यापासूनच प्रेरणा घेतली असावी.) Following a complaint by her, the JNU administration held a proctorial inquiry that found Kanhaiya guilty. “The university… has found Kanhaiya Kumar guilty of misbehaving with an ex-student (female) and threatening her. This act is serious in nature and unbecoming of a student of JNU and calls for a strict disciplinary action against him (Kanhaiya)… keeping his career prospects in mind, the Vice Chancellor has taken a lenient view in the matter,” said the office order issued on October 16, 2015 by the then Chief Proctor, Krishna Kumar. “Kanhaiya is fined Rs 3,000 and also warned to be careful and not get involved in any such incidents in future. Otherwise, strict disciplinary action will be taken against him,” the order said. While an unsigned order was shared on social media by the girl, who accused Kanhaiya of being a “false revolutionary making claims about upholding the dignity of women”, the university administration confirmed in a statement that the letter was authentic and action was taken against the student leader. “I am dejected and pained to see how my JNU community has ganged up to create false revolutionary. I want to ask, do you really understand the D for Dignity of a female, Mr Kanhaiya? Unzipping your private part in public and urinating on road – are these your revolutionary tools to uphold a female’s dignity? I am shocked to see how a misogynist like Kanhaiya is being hailed as revolutionary,” she said in an open letter that is circulating online. आणि हा ऐआयएसफने केलेला कन्हैय्याचा बचाव - Meanwhile, All India Students Federation (AISF), the outfit to which Kanhaiya belongs, said in a statement “talk about public urination and threatening are being spread to malign Kanhaiya’s image. He had a verbal argument with the girl following which she had registered a complaint. “We do respect the girl’s right to criticise Kanhaiya but we want to reiterate that he has always stood for gender justice. Also, when the incident took place, he was not the president of the students’ union,” it added. http://indianexpress.com/article/india/india-news-india/kanhaiya-was-fi…

In reply to by श्रीगुरुजी

हा अगदी कांगावा झाला... त्या बिचार्‍या कन्हैय्याला गुंतवण्यासाठी काहीही! तो जे काही करतो ते प्रांजळपणे हे लक्षात असुंदेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने फक्त विद्यालयांसाठी स्वच्छतागृहे बांधायच्या योजना केल्या, विश्वविद्यालयांसाठी नाही... मग सांगा खर्‍या दोषी कोण? ;)

In reply to by श्रीगुरुजी

नैसर्गिक वातावरण म्हणजे वास्तविकता आणि तिथे मुक्तपणे नैसर्गिक विधी करणे म्हणजे प्रांजळपणा. आत्ता कुठे मला या धाग्याच्या शीर्षकाचा अर्थ समजायला लागला होता. असं टाचणी लावून फुगा फोडायचं काम नाही सांगून ठेवतो!

In reply to by बोका-ए-आझम

आणि एका विद्यार्थिनि / अध्यापिकेला ला त्रास देणे हि झालि ह्यांचि वास्तविकता वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट! बोका भौ जमला कि जांगडगुत्ता ;)

In reply to by श्रीगुरुजी

चला निधर्मांधांचा आणखी एक मसिहा पडला. असे एकामागोमाग एक मसिहे त्यांना उभे करू देत आणि एकामागोमाग एक असेच उघडे पडूदेत. या निमित्ताने लिबरल लोकांची दातखिळ बसलेली नाहीतर 'त्यावेळी तो विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष नव्हता' वगैरे मल्लीनाथी करायचे प्रयत्न बघून अगदी असुरी आनंद होत आहे. शेवटी डावे लोक जे कोण मसिहे उभे करतील ते त्यांच्यासारखेच असणार--एक नंबरचे ढोंगी आणि good for nothing!!

In reply to by श्रीगुरुजी

यासंबंधी काही चित्रे इथे डकवत आहे. घाबरू नका-- कन्हैय्याच्या मूत्रविसर्जनाची (शब्दप्रयोग श्रेय-- थ्री इडियट्समधला चतुर रामलिंगम) ही चित्रे नाहीयेत. तर लिबरल लोकांची दातखिळ कशामुळे बसली आहे नाहीतर त्यांना उसने अवसान आणून मल्लीनाथी का करायला भाग पडत आहे याविषयीची ही चित्रे आहेत. हो कन्हैय्या म्हणतो ते बरोबर आहे. आम्हाला भारतातच आझादी हवी आहे. पण ती आझादी या असल्या ढोंगी आणि कुठल्याकुठल्या तत्वज्ञानाच्या नावावर देश विकायलाही कमी न करणार्‍या लिबरल लोकांपासून हवी आहे. Pic 1 Pic 2 Pic 3 यातील तिसरे चित्र -- जे.एन.यु च्या लेटरहेडवर पब्लिक रिलेशन्स ऑफिसने म्हटले आहे---"It is to confirm that an office order dated 16 October 2015 was issued by the Chief Proctor Office for a strict discliplinary action against Shri Kanhaiya Kumar and he was fined Rs. 3000". (दिनांक १० मार्च २०१६)

Also, when the incident took place, he was not the president of the students’ union मग ? तो ? सो व्हॉट ?

तरीही विडीओत व्यक्त केलेल्या त्याच्या साम्यवादी विचारांशी मी शेवटपर्यंत सहमत असेन . व्यक्ती चूक करू शकते आणि त्याचे परिणाम तिला भोगावे लागतील . पण विचारांकडे निर्वयैक्तिकपणे पाहिल्यास ते योग्य आहेत आणि ते व्यक्त करणारी व्यक्ती चूक ठरली तरी विचारांचं मूल्य अजिबात कमी होत नाही .

In reply to by विवेक ठाकूर

तरीही विडीओत व्यक्त केलेल्या त्याच्या साम्यवादी विचारांशी मी शेवटपर्यंत सहमत असेन . व्यक्ती चूक करू शकते आणि त्याचे परिणाम तिला भोगावे लागतील . पण विचारांकडे निर्वयैक्तिकपणे पाहिल्यास ते योग्य आहेत आणि ते व्यक्त करणारी व्यक्ती चूक ठरली तरी विचारांचं मूल्य अजिबात कमी होत नाही .
विचार कितीही उदात्त वाटले तरी तसे विचार करणार्‍या व्यक्तीचे आचरण तसे नसेल तर विचार व्यर्थ आहेत. साम्यवादी विचार (म्हणजे संपत्तीचे समान वाटप, जमिनीचे समान वाटप, सर्वांना समान न्याय, जमीनदारीचा नाश इ. इ.) हे कितीही आदर्श वाटत असले तरी अधिकृतरित्या साम्यवादी देशांमध्ये (रशिया, चीन, उत्तर कोरिया, पूर्व युरोपिअन देश इ.) हुकुमशाही, दडपशाही, लाखो विरोधकांना तुरूंगात टाकून, छळ करून, मृत्युदंड देणे, इ. शिवाय दुसरे काहीही नव्हते. त्याचमुळे आज चीन, क्यूबा व उत्तर कोरिया व्यतिरिक्त सर्वत्र साम्यवाद नष्ट झाला. कन्हैय्याच्या मुलाखतीतील विचार कितीही आदर्श वाटले तरी प्रत्यक्षात त्याचे वर्तन पूर्ण वेगळे दिसते. विद्यापीठात भर रस्त्यावर चारचौघात उभे राहून लघवी करणे आणि ते करताना ज्या मुलीने हटकले तिला धमकावून सायकोपाथ म्हणणे, महिषासूरपूजनानिमित्त काढलेल्या पत्रकात दुर्गादेवी बद्दल अत्यंत हीन लेखन केलेल्या पत्रकावर याची सही असणे, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतर दोषी सिद्ध होऊन फासावर गेलेल्या अफझल गुरूच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमावरील बंदीला विरोध करणे, देशद्रोही घोषणा सुरू असताना विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असूनही विरोध न करणे (तो घोषणा देत होता असे पुरावे उपलब्ध आहेत असा पोलिसांचा दावा आहे व न्यायालयाने देखील त्याच्यावरील देशद्रोहाचा आरोप न काढता सशर्त तात्पुरता जामीन दिला आहे) अशा अनेक घटनातून त्याच्या मुलाखतीतील विचारांचा व प्रत्यक्ष आचरणाचा संबंध नसल्याचे दिसत आहे.

In reply to by विवेक ठाकूर

पण विचारांकडे निर्वयैक्तिकपणे पाहिल्यास ते योग्य आहेत आणि ते व्यक्त करणारी व्यक्ती चूक ठरली तरी विचारांचं मूल्य अजिबात कमी होत नाही . अगदि अगदि हे पार जेएनयु पासुन ते ईसिस पर्यंत तंतोतंत लागु पडते.

In reply to by विवेक ठाकूर

म्हणजे थोडक्यात, मोठ्या मोठ्या गोष्टींबद्दल फुकाच्या गप्पा मारा, ते शब्द आचरणात आणले नाही (किंवा आचरण त्या शब्दांच्या अगदी विरुद्ध असले) तरी काहीच हरकत नाही, जै हो !!! =))

जे एन यू मधील इतिहासाचे एक डावे प्राध्यापक रजत दत्ता यांनी मकरंद परांजपे नावाच्या जे एन यू मधील इंग्रजी प्राध्यापकांस खुले पत्र लिहिले त्या पत्रास मकरंद परांजपेंचे उत्तर मोठेच उद्बोधक आणि काही महत्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकणारे आहे. जिज्ञासूंनी आवर्जून वाचावे.

In reply to by माहितगार

दुव्याबद्दल दुवा! :) प्रा. परांजपे यांच्या पत्रातील डो दत्तांना उद्देशून असलेला आणि अगदी शेवटाला असलेला भाग विशेष महत्वाचा आणि व्यापक वाटला म्हणून येथे चिकटवत आहे... ... Isn't a call to reorient our students toward academics therefore necessary to re-intellectualise and safeguard our academic ecosystem?You claim that "this is precisely the advice RSS has been giving in its shakhas all these years." Since I don't attend RSS shakhas I wouldn't know; but perhaps you do, since you speak with such authority about what is said there "all these years." Don't worry: even if you do frequent RSS shakhas, I for one, shall not start treating you as an "untouchable." I believe that talking and listening to all sections of our ideologically and socially diverse country is one of the demands of our times, especially if we wish not to escalate the uncivil strife that engulfs us.Ironically, this morning's papers quote the recently released JNUSU President condemning outright the 9 February 2016 event: now that he has reversed his stand so diametrically and drastically, what will you say of his intentions and integrity?

आता सगळ्यांनी एवढे प्रांजळ पणे त्याच्या विरोधात पुरावे दिले तर वाहत्या ओल्गे मध्ये हात धुऊन घेतो. माझ्या मते कनैह्याच्या त्या ऐतिहासिक भाषणाचा ऐतिहासिक पंचनामा केला आहे .त्यातील आवडलेली आणि विचार करायला लावणारी वाक्य National interest has one definition, whereas Nationalism has many. If you’re not a communist before 30, you don’t have a heart. If you’re still a communist after 30, you don’t have a brain.” Kanhaiya Kumar is 28, so he has a couple of years to make up his mind. मागे मिसळपाव वर बिका ह्यांना विनायक सेन ह्यांचा पुळका आला होता त्यासंबंधी त्यांनी धागा काढला होता. आता कनैह्या च्या पार्श्वभूमीवर जे एन यु आणि माओवादि आणि त्यांचे कारनामे व त्यांचे सहानभूतीदार ह्यांचा पंचनामा सुद्धा वाचनीय आहे. जे एन यु मध्ये सध्या भूपिंदर झुस्त्शी ह्यांच्या नावाचा कनैह्या समर्थक शिमगा घालत आहेत. कारण त्यांनी सत्य नको त्यावेळी भारतीय जनतेच्या समोर आणून कनैह्या चा प्रांजळ खोटारडे पणा उघडकीस आणला. सगळ्यात शेवटी आतापर्यंत अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या निवेदिता मेनन ह्यांचे गांधीच्या देशातील हिंदू समाजाच्या बाबतीत हे ऐतहासिक वक्तव्य कनैह्या ह्यांचा पोष्टर बॉय आहे, म्हणूनच जे एन यु चे प्रकरण गंभीर आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

Hindu Society is the most violent in the world :- निवेदिता मेनन मज्जा आहे बॉ ! लोक नसलेल्या अकलेचे काय तारे तोडतिल सांगता येत नाहि. पण मुळात कम्युनिस्ट कुठल्याच धर्माच्या अस्तित्वाला मानत नाहित, ते धर्म म्हणजे अफु चि गोळि म्हणतात. मग इतका व्देष हिंदुंचाच का ?

In reply to by दुर्गविहारी

हम्म.. सुयश देसाईच्या मुलाखतीतून लोकसत्तेत उतरलेला ९ फेब्रुवारी १०१६ चा आंखोदेखा हाल वस्तुस्थितीच्या अधिक जवळचा असण्याची शक्यता वाटते. दुव्यासाठी आभार.

के. के.( कन्हैया कुमार) ची ए. के.( अरविन्द केजरीवाल ) बनण्याकडे वाटचाल http://maharashtratimes.indiatimes.com/nation/kanhaiya-kumar-slapped-and-abused-in-jnu/articleshow/51346637.cms आणि हे कमी म्हणुन काय हे बघा http://maharashtratimes.indiatimes.com/nation/kanhaiya-kumar-was-fined-by-jnu-for-alleged-misbehaviour-with-girl-student/articleshow/51347628.cms

विवेक ठाकूर, >> पण विचारांकडे निर्वयैक्तिकपणे पाहिल्यास ते योग्य आहेत आणि ते व्यक्त करणारी व्यक्ती चूक ठरली तरी >> विचारांचं मूल्य अजिबात कमी होत नाही . मान्य. पण इथे कन्हैय्याच्या मूल्यांची चर्चा चालली नसून त्याच्या मूल्याची (=किंमतीची) चाललीये. त्याची काय किंमत आहे ते सगळ्यांना माहितीये. रच्याकने : आसारामबापूंवर तर आरोपही सिद्ध झाले नाहीयेत. मग वरील तर्काच्या आधारे त्यांचं प्रवचन शाळेतून शिकवायला काय हरकत आहे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तरीही जिथे जिथे त्याची चूक आहे तिथे मी चूक आहे असंच म्हटलंय. या उप्पर अंतीमात जरी तो दोषी ठरला तरी त्याचे साम्यवादी विचार मला कायम समर्थनीय आहेत. उदाहरणार्थ : तो म्हणतो, सीमेवरच्या जवानाची शहादत, शेतकर्‍याची आत्महत्त्या आणि विद्यार्थ्याचा मृत्यू एकाच व्यवस्थेच्या दोषाचा परिणाम आहे त्यामुळे त्यांच्यात भेदभाव करणं अयोग्य आहे. कुणी नीट विचार करु शकेल तर कळेल की जवानाचा मृत्यू हा युद्धात उतरलेल्या दोन्ही राष्ट्रांच्या अमानवी दृष्टीकोनातून झालायं. शेतकर्‍याची आत्महत्या जलसंधारणात झालेल्या अफाट भ्रष्टाचाराचा परिणाम आहे आणि विद्यार्थी त्याच्या दृष्टीनं, देशात जगण्याची सर्व आशा संपल्यामुळे गेलायं. शिवाय तो म्हणतो की हे सर्व विचार पटायला सार्वत्रिक एकमताची गरज नाही. तस्मात, त्या विचारांचा एक राजकीय पक्ष होण्याची गरज नाही. ज्यांना ते विचार पटतील त्यांची एक मिनिमम युनिटी झाली आणि त्यांनी त्या दिशेनं काम सुरु केलं की किमान त्या क्षेत्रात बदल घडायला सुरुवात होईल. मला वाटतं हे देशात बदल घडवून आणण्याची वैयक्तिक जवाबदारी घेण्याचं सर्वात योग्य असं पहिलं पाऊल आहे. तो प्रांजळ आहे हे मत मी त्याच्या तीन वेगवेगळ्या पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखती बघून ठरवलं होतं. त्याच्या व्यक्तिमत्त्वात दुभंग आहे किंवा कसं ते भविष्यकाळ ठरवेल पण त्याच्या साम्यवादी विचारांनाच बाद ठरवणं म्हणजे समतेप्रती आपली वैयक्तिक जवाबदारी डावलणं आहे.

In reply to by विवेक ठाकूर

सीमेवरच्या जवानाची शहादत = शेतकर्‍याची आत्महत्त्या ! शेतकर्‍याची आत्महत्त्या = सीमेवरच्या जवानाची शहादत ! विवेकजी आपण अर्थशास्त्रामधील साम्यवादाबद्दल गप्पा करताय ना ? आग्रह नाही पण खुपणार नसेल तर खेळतं भांडवल या चर्चेत सहभागी होऊन शेतकर्‍यांच्या खेळते भांडवल विषयक समस्यांवर तुमचा काय अभ्यास आहे तो मांडून दाखवाल का ?

In reply to by विवेक ठाकूर

एक साम्यवादी माणूस चक्क शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतोय हे ऐकून मौज वाटली. त्याच तागडीत सैनिकांना तोलतो हे पाहून तर अजून वाटली. हा माणूस अस्सल कम्युनिस्ट नाहीच. शेतकऱ्यांना कम्युनिस्ट प्रतिगामी समजतात, कारण तो संपत्तीचा, म्हणजे शेतमालाचा साठा करतो. त्यांच्या दृष्टीने कामगार हाच खरा proletariat कारण त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नसतं. त्याचे श्रम हेच त्याचं भांडवल. सैनिकांविषयी कम्युनिस्टांचे असेच विचार आहेत. एकतर त्यांना देश आणि राष्ट्रवाद या संकल्पनाच मान्य नाहीत. त्यामुळे देशाच्या सीमांचं रक्षण करणारे सैनिक हे त्यांच्या दृष्टीने प्रतिगामी आणि दमनकारी आहेत. शिवाय भारतीय सैन्य हे राजकीय दृष्ट्या पूर्णपणे तटस्थ आहे, हे कम्युनिस्ट तत्वज्ञानाच्या विरोधात आहे. त्यानुसार सैन्याचा उपयोग हा राजकीय तत्वज्ञानाचं extension असा होतो. मार्क्स स्वतः, लेनिन आणि ट्राॅट्स्की यांनी मांडलेले हे विचार आहेत. त्यांच्या वाङ्मयात या विचारांचे अनेक संदर्भ आहेत. कन्हैया हा कम्युनिस्टांच्या दृष्टीने revisionist आहे, जो इस्लामींसाठी ' काफिर ' हा शब्द जसा आहे तसाच कम्युनिस्टांसाठी आहे - एक शिवी. तुम्हाला कन्हैया मांडतोय ते तत्वज्ञान साम्यवादी वाटतंय कारण तो CPI च्या विद्यार्थी संघटनेचा सदस्य आहे. बाकी त्याच्या या थ्वज्ञानाशी साम्यवादाचा संबंध नाही.

In reply to by बोका-ए-आझम

* नैसर्गीक संकटात शेतकर्‍यांना -किंवा संकटात सापडलेल्या इतर नागरीकांना- मदत करण्याचा साम्यवादी देशांचा काय इतिहास आहे ? साम्यवादी देश नैसर्गीक संकटे का लपवून ठेवत असत याचे कारणच अगम्य असते. * हे चीन मधल्या शेतकर्‍यांच्या सध्याच्या आत्महत्यांचे आकडे आहेत. * माओच्या काळातील खोटा दुष्काळ आणि साम्यवादी कव्हरअप

In reply to by विवेक ठाकूर

तो प्रांजळ आहे हे मत मी त्याच्या तीन वेगवेगळ्या पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखती बघून ठरवलं होतं.
चला हा धागा गुंडाळा. साम्यवाद वि. भांडवलशाही म्हणून नवीन धागा काढा.

In reply to by विवेक ठाकूर

तो प्रांजळ आहे हे मत मी त्याच्या तीन वेगवेगळ्या पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखती बघून ठरवलं होतं.
जर राहुल गांधींची मुलाखत कुमार केतकर, निखिल वागळे आणि प्रसन्न जोशी या ३ वेगवेगळ्या पत्रकारांनी घेतली तर राहुलबद्दल तुमचे काय मत असेल?

आसारामबापूंवर तर आरोपही सिद्ध झाले नाहीयेत. मग वरील तर्काच्या आधारे त्यांचं प्रवचन शाळेतून शिकवायला काय हरकत आहे? आणि पण विचारांकडे निर्वयैक्तिकपणे पाहिल्यास ते योग्य आहेत आणि ते व्यक्त करणारी व्यक्ती चूक ठरली तरी विचारांचं मूल्य अजिबात कमी होत नाही . अहा हा पैलवान समिकरण जुळतय कि राव ! ह्यालाच वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट अस म्ह्न्त्यात.

जवानांकडून होणार्‍या बलात्कारांबद्दल कन्हयाने काय बोलले असते तर नक्की योग्य असते? जवानांकडुंन तुरळक होणार्या बलात्कारांबद्दल कन्हैय्या ने का बोलायला पाहीजे ? त्याचा काय संबंध ? तो नाही सैन्यात ना त्याच्याकडे दोषी सैनिकांना शिक्षा देण्याचे वा अश्या केसेस मध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार आहेत !