Skip to main content

लिवैनरिलेशनितेचे आईस पत्र

लेखक खटासि खट यांनी मंगळवार, 03/12/2013 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितका वेळ झोपु शकते. मला सर्वांच्या आधी उठायची काही एक गरज नाही इन मिन दोघंच घरात. त्याला काही पाहीजे असेल तर तो करून खातो. नाहीतर आम्ही दोघे मिळून हाटेलात जातो. मी गबाळयासारखी घरभर फिरु शकते. समोरच्या बिल्डींगवर तरूण मुलं येऊन बसतात. त्याला एण्जॉय करता येत नाही पण तो काही बोलू शकत नाही. मला एण्जॉय करता येतं मी पण बोलत नाही. मी टापटीप राहाणं गरजेच नाही. वाटेल तितका वेळ लोळू शकते. तुझ्याशि फोनवर बोलायची इच्छाच होत नाहि ........... ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळाली नाहि तर मी याला चल फूट म्हणू शकते. मग दुस-या स्वप्नातला राजकुमार. मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे नाहि. त्यांना इथं आणणंच अलाऊड नाहि. मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा जाउ शकते. अगदि तुझ्याकडेहि ........................ पण लिईरित असल्यापासुण इच्छाच झालि नाहि. एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं नसेल?'. खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत. खुप गप्पा माराव्याशा वाटतात. पण त्या कोंडवाड्यात तुम्ही दोघांनी काढलेले दिवस आठवून शहारे येतात. अजुणही तुच करतेस ना ? मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला. सगळ्या नातेवाइकांना, शेजार्यांना जळवायला. वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत. म्हणजे यू सर्टिफिकेटवाल्या गं पण अचानक मला जाणिव झाली कि तु लग्न केल होतंसं ना? माझ्या अंगावर शहारे आले. त्या काळि फक्त लग्न झाल्यावरच मुलं व्हायची ना ? आज इतकी प्रगती झाली कि त्यासाठी लग्नाची गरज नाही. आणि मुलांचीही नाही. कूटुंबा साठी किति फसवणुक केलीस स्वतःची . आहे त्या मधे मन मारत राहिलिस. ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........ आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते. आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात. तुम्हि दोघांनी स्वतःची ही फसवौक केली नसतीत तर आज माझ्या जवळ जे काहि शहाणपण आहे ते कदाचित नसतं. हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या लिवैन्रिलेशनिता असण्याचा अर्थ उमगतो. मुलीच्या शहाणपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे. वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी तू ही अ‍ॅक्सेप्ट करशील हे सर्व आणी लग्ना शिवायचं आमचं आयुश्यही आवडु लागेल तुला हळु हळू........................................... तू आणि पप्पांनी केलेल्या घोडचुकां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम......... तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................

वाचने 39821
प्रतिक्रिया 153

प्रतिक्रिया

In reply to by सांजसंध्या

ह्यात तुम्हाला कुठेच तडजोड दिसली नसेल तर वादच मिटला. झोपलेल्याला जागं करता येतं झोपेचे सोंग घेणार्‍याला नाही. समजविण्याचा प्रयत्न संपल्यावर पुरुषाला माघारीची तडजोड करावीच लागते. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

काका, इतकी वर्षे मिपावर काढुन सुद्धा तुम्हा पाशवी शक्तींना समजवावेसे वाटते या बद्दल कौतुक वाटते. रच्याकने, मूळ प्रतिसाद सुंदर !

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

वाद घातल्याने कांहीतरी ज्ञानात भर पडतेच. आजचा ट्रेंड काय आहे ह्याचे ज्ञान झाले. 'बाईने केली की तडजोड, पुरुषाने केली की 'कर्तव्य'.'

In reply to by प्रभाकर पेठकर

कसली मज्जा आहे. घुम फिर के भोपळे चौक मे गाडी बार बार आती है. मैलामंडळ रजेवर गेलंय. त्यांच्यावतीनं पुरुषानं बाजू मांडली कि त्यालाच तै म्हणतात, गायनॉकॉलॉजिस्टला प्रेग्ननसीवर बोलायला प्रेग्नंट असण्याची अट घालतात, महाभारताचं थेट प्रक्षेपण करणारी वाहीनी मधेच मनोरंजक कार्यक्रम करतेय... मज्जा मज्जा !!

In reply to by सांजसंध्या

विश्वासघात करणे ही नेहमी पुरषांची मक्तेदारी असल्यासारखा समज का असतो हे कळलेलं नाही. एकदा मेघना पेठेंचं 'नातिचरामि' वाचा, खाडकन उघडतील डोळे!! पुरुषच विश्वासघात करु शकतात असा तुमचा समज असावा, असं निदान तुमच्या एकतर्फी विधानांवरुन वाटतंय. तसं असेल तर हे पुस्तक मनाला पटणार नाही तुमच्या.

In reply to by सूड

विश्वासघात फक्त पुऊषच करतात असं म्हटलेलं नाही. स्त्री ने केला तर त्याकडे पहायचा दृष्टीकोण वेगळा असतो. ती होतीचतशी, वाईट चालीची, बदफैली पासून अनेक विशेषणं लावली जातात. लगेचच त्या बिचा-या पुरुषाला अनेक सल्ले दिले जातात. पण पुरुषाकडून हे झालं तर जाऊ द्या.. एक डाव माफ करा. तरुण वय आहे, असं व्हायचंच असे सल्ले दिले जातात. एखाद दुसरं उदाहरण वेगळं. प्रत्यक्षात फक्त संशयावरूनही बाईला मारहाणीपर्यंत मजल जाते. सुशिक्षित समाजात प्रत्यक्ष मारहाण होत नसेल पण शब्दांचा मार पुरेसा असतो. थोडक्यात चुकला तर पुरूष हा माणूस असतो, पण चुकलेली बाई ही माणूस नसते. त्यामुळं न चुकण्याची जबाबदारी शेवटी बाईवरच येऊन पडते. वरच म्हटलंय ना विधवा, टाकून दिलेया बाईवर लोकांचा डोळा असतो म्हणून ? हे पुरुषाचं वर्तन सहज म्हणून स्विकारलं जातं. इथंही काळजी बाईनेच घ्यायची असते. रात्री दार वाजवलं तर त्या बाईचाच काहीतरी दोष असला पाहीजे हा समज घट्ट असतो. दार वाजवणारा काय पुरूष असल्याने तो हे करणारच हे गृहीत धरलेलं असतं. जर चुकून काही झालं तर दोष बाईचाच. "रक्षण" न करू शकणारा पुरूष लगेच बिच्चारा ठरून काडीमोड द्यायला पात्र ठरतो. ही उदाहरणं अर्थातच सुशिक्षित वस्त्यांमधली नाहीत. पण मानसिकता ब-यापैकी सगळीकडे लागू पडते. प्रश्न प्रत्यक्षात फसवणूक / विश्वासघात कोण करतं याचा नसून उघडकीस आल्यानंतर त्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोणाचा आहे. बिपाशा बासू आणि जॉन अब्राहमचं उदाहरण आहेच. दहा वर्षे रिलेशन मधे राहील्यानंतर परदेशातल्या फुटबॉलप्लेयर बरोबरच्या पार्टीवरून बिनसलं. हीच गोष्ट जॉन च्या बाबतीत अनेकदा घडते तेव्हां ती अभिमानाने मिरवण्याची असते. तिने ते समजावून घ्यायचं असतं. पण तीच गोष्ट तिने केल्यावर मात्र फिल्म इंडस्ट्रीसारख्या क्षेत्रात राहूनही त्याचा पुरुषी इगो हर्ट झाला. त्या एका कारणावरून त्यांना वेगळं व्हावं लागलं. एकदा नात्याला तडा गेल्यानंतर उगाचच एकत्र राहण्यापेक्षा तो निर्णय केव्हांही चांगला होता.

आजच्या सकाळ पेपरमधे (पुणे शहर पुरवणी) पान नं ३ वर लिविन वर लेख आहे. त्यात मानसोपचार तज्ञ,समुपदेशक, वकील यांची मते आली आहेत. फायद्या पेक्षा तोटेच जास्त सांगितले आहेत.

सदाहरीत विषयावर श्री रा रा रा यमगर्नीकर साहेबांनी आपले अनुभवसिद्ध विचार द्यावेत या कारणाकरीता हा धागा वर काढीत आहे. कोल्हापुर कट्ट्यातील मंडळीनी आठवण करून द्यावी ही विनंती